तारूण्यात प्रवेश करताच मुहम्मद (सल्ल.) यांनी वयाच्या 25 व्या वर्षी पहिले लग्न एका वयस्कर विधवा महिलेशी केले ज्यांचे वय 40 वर्ष होते. त्यांचे नाव खतिजतुल कुब्रा (रजि.) असे होते. बहुपत्नीत्व ही त्याकाळाची एक सामान्य स्थिती असली तरी मुहम्मद (सल्ल.) आपल्या पत्नीच्या सोबतीत तिच्या मृत्यूपर्यंत, एकपात्री विवाहात वावरले, तेही आपल्या वयाच्या पन्नास वर्षापर्यंत. खतिजतुल कुब्रा (रजि.) ह्या अरबी कबिल्यांमधील एक व्यावसायिक महिला होत्या. ज्यांनी मुहम्मद (सल्ल.) ह्यांनी त्यांच्या व्यावसायामध्ये मदत केली.
इस्लामने अमर्याद बहुपत्नीत्वाची प्रथा बंद केली आणि काही अटी आणि शर्तींच्या आधीन केले. बहुपत्नीत्वसाठी कुरआनमध्ये जे श्लोक अवतरित झाले ते परित्या्नत्या, विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या बरोबर विवाह करून त्यांच्या जीवनाला आधार म्हणून देण्यासाठी पण ह्या अटीवर की सगळ्या पत्नींना समान वागणूक आणि दर्जा मिळावा आणि जर तुम्हाला भीती वाटते की तुम्ही त्यांना न्याय देऊ शकणार नाही, तर एक पत्नीवरच थांबा. (कुरान 4: 3)
अशाप्रकारे आपण पाहतो की, पैगंबर (सल्ल.) यांचे पुढील सर्व विवाह एकतर राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी किंवा विधवेला आश्रय देण्यासाठी होते. त्यांच्या दत्तक मुलाच्या घटस्फोटीत पत्नीबरोबर त्यांचे लग्न हे ईश्वराच्या आज्ञेनुसार, अज्ञानाची परंपरा मोडून काढण्यासाठी होते. त्या काळी दत्तक मुलाला खऱ्या मुलाची मान्यता मिळायची.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फक्त एका अशा मुलीबरोबर विवाह केला ज्या कुमारी होत्या. त्यांचे नाव हजरत आयशा (रजि.) होते. हजरत आयशा रजि. हदीसच्या महान विद्वान म्हणून ओळखल्या जातात. मुहम्मद (सल्ल.) यांनी त्यांना धार्मिक प्रश्नांवर इतर लोकांबरोबर सल्लामसलत करण्याचा अधिकार दिला होता जो की पैगंबर (सल्ल.) यांच्या पर्दा फरमावल्यानंतर सुद्धा आचरणात होता. ह.आयशा (रजि.) ह्यांनी इस्लाममधील फिख (न्यायशास्त्र) ची पहिली शाळाही उघडली.
ह.आयशा (रजि.) आणि मुहम्मद (सल्ल.) ह्यांचा संबंध इतका मोहक होता की ते एकत्र खेळत, एकाच पात्रातून पाणी पीत आणि सतत एकमेकांबरोबर गोड शब्दांची देवाणघेवाण करत. मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांची पत्नी ह.आयशा (रजि.) यांची एकदा झालेली एकत्रित धावण्याची स्पर्धा इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. एकदा, जेव्हा एका माणसाने ह. आयशा (रजि.) यांना विचारले की पैगंबर (सल्ल.) घरात काय करतात? त्यावर ह. आयशा (रजि.) यांनी उत्तर दिले की, ते आपल्या कपड्यांना रफू करतात, घरकामात व्यस्त असतात. जनावरांची देखभाल करतात आणि बाजारातून घरासाठी साहित्य खरेदी करून आणतात. आपल्या फाटलेल्या बुटांना ते स्वतः शिऊन घेतात. ते पाण्याच्या बादलीला दोरी बांधतात, उंटाना सुरक्षित बांधतात आणि पीठ मळतात. (बुखारी)
पुरूषांना त्यांनी त्यांच्या पत्नींबद्दल जे मार्गदर्शन केले ते खालीप्रमाणे :
’’तुमच्यात सर्वात चांगला तो आहे जो आपल्या पत्नींबरोबर चांगला आहे आणि मी तुम्हा सर्वांपेक्षा आपल्या पत्नीबरोबर सर्वात जास्त चांगला आहे’’ (तिर्मिजी)
’’अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही जे काय खर्च करता त्याच्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळेल मग तो आपल्या पत्नीच्या तोंडात घातलेला एक घास ही का असेना’’ (बुखारी)
पत्नींच्या आब्रू च्या संरक्षणाबाबत, पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले की, ’’ त्या व्यक्तींचा समावेश सगळ्यांत वाईट लोकांमध्ये होईल जे आपल्या पत्नींबरोबरचे व्यवहार दुसऱ्यांसमोर उघड करतात.’’ ( मस्नद अहमद)
इस्लामी इतिहासामध्ये ह. मुहम्मद (सल्ल.) आणि त्यांची मुलगी ह. फातिमा (रजि.) ह्या दोघांमधील अपार स्नेहाच्या अनेक घटना नमूद आहेत. जेव्हा त्या ह. मुहम्मद (सल्ल.) यांच्या खोलीत प्रवेश करायचे तेव्हा त्यांच्या कपाळाचे चुंबन घ्यायचे, त्यांचा हात पकडून त्यांना आपल्या जागेवर बसवायचे.
ह. पैगंबर (सल्ल.) म्हणत, ’’फातिमा माझा एक भाग आहे आणि जो कोणी तिला त्रास देईल तो मला त्रास देईल’’ (बुखारी 3767)
फक्त आपल्या कुटुंबातील स्त्रियांनाच नाही तर सामान्य स्त्रियांचा सुद्धा दर्जा पैगंबर (सल्ल.) यांनी उंचावला. त्यांना समाजात समान अधिकार आणि सन्मान प्रदान केला. त्यांनी त्यावेळी प्रचलित असलेली स्त्रीभ्रूण हत्येची प्रथा नष्ट केली. लोकांना परलोकांत न्यायाच्या दिवशी होणाऱ्या या अपराधाच्या शिक्षेची आठवण करून दिली, जेव्हा सर्वशक्तिमान ईश्वर सर्वांना आपल्या कर्मांचा हिशोब देण्यासाठी जमा करेल. ’’आणि जेव्हा प्राण (शरीरांशी) जोडले जाती आणि जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की तू कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरकभडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे (कुरआन 81: आयत नं. 7-14)
प्रेषित सल्ल. यांनी मुलींना आपल्या पसंदीच्या लग्नासाठी संमती दिली
’एकदा एक मुलगी प्रेषित (सल्ल.) यांच्याकडे तक्रार करत आली की तिच्या वडिलांनी तिला आपल्या भाच्याबरोबर लग्न करायला भाग पाडले, हे जाणून सुद्धा कि ती त्याला पसंत करत नाही. पैगंबर (सल्ल.) यांनी वडिलाला बोलावले आणि मुलीला प्रस्तावित विवाह स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास स्वातंत्र्य दिले. त्यानंतर तिने स्वतः ते लग्न मान्य केले आणि म्हटले,’’ हे अल्लाहचे दूत. माझ्या वडिलाने जे केले ते मी स्वीकार केले आहे ; तरीही मला स्त्रियांना हे दाखवून द्यावयाचे होते की वडिलांचा या बाबतीत अधिकार नाही.’’(अबू दाऊद)
स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला :
एकदा थबीत नावाच्या एका गृहस्थाची पत्नी बीकैस ने प्रेषित (सल्ल.) यांना तिच्या पतीकडून घटस्फोटाची विनंती केली. पैगंबर (सल्ल.) यांनी तिला लग्नाच्या वेळी जे महेर म्हणून भेट दिले होते ते परत करायला सांगितले तिने ही अट मान्य केली आणि तिला खुला मिळाला.
महिलांच्या आब्रूचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर खोटे आरोप टाळण्यासाठी अल्लाहने कुरआनमध्ये दिलेल्या आदेशानुसार साक्ष देण्याची कडक अट लागू केली.
’’तुमच्या स्त्रियांपैकी ज्यानी व्यभिचार केला असेल त्यांच्यासंबंधी आपल्यापैकी चार पुरुषांची साक्ष घ्या व जर चार पुरुषांनी साक्ष दिली तर त्यांना घरात बंद करून ठेवा येथ पावेतो की त्यांना मृत्यू येईल अथवा अल्लाह त्यांच्यासाठी काही मार्ग काढील.’’ (4:15)
महिलांच्या ह्नकासाठी जे प्रावधान आज मान्य केले गेले आहेत, इस्लामने सातव्या शतकातच ते तिला देण्याचे पाऊल उचलले. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या वारसा हक्कात पूर्वी महिलांना वाटा मिळत नव्हता व आजही मिळत नाही. मात्र सातव्या शतकातच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अशी काही सामाजिक सुधारणा केली की, मृत व्यक्तीच्या महिला वारसदारांना सुद्धा वारसाहक्क मिळण्यास सुरूवात झाली. पुरुष आणि स्त्रियांना जरी वारसामध्ये भिन्न हिस्से आसले तरी समाजांत पुरुष आणि स्त्रियांची स्थिती आणि भूमिका लक्षात घेऊन हे समभाग न्याय्य कुरआनद्वारे अवतरित झाले आहेत . पवित्र कुरआन मध्ये ईश्वराची आज्ञा म्हणून हे उघड झाले कि पुरुष आणि स्त्री दोघांना वारशात वाटा आहे.
‘‘पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल, मग ती कमी असो अथवा जास्त, हा वाटा (अल्लाहकडून) ठरविलेला आहे. ( कुरआन 4:7) - (उर्वरित आतील पान 7 वर)
प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी या शब्दांत चेतावणी देऊन या आज्ञेची अंमलबजावणी केली. ’’जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वर्ग प्राप्तीसाठी योग्य अशा लोकांसारखे काम केले, पण मरता मरता आपले जीवन चुकीच्या मृत्यूपत्राने संपवले , तर त्याला नरकात घातले जाईल.’’ (इब्न कसीर, खंड 2, पृ. 218.) ही एक भयानक चेतावणी आहे ज्यात ईश्वराच्या वारशाच्या कायद्यांबरोबर छेडछाड करणाऱ्याला ईश्वराने आपल्या पुस्तकात स्पष्टपनांने दिलेल्या कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याला लोकांना अनंत शिक्षेचा इशारा दिला.
स्त्रियांच्या हक्कांबद्दल त्यांच्या आणखीन ही काही शिकवणी आहेत : ’’महिलांना मशिदीत जाण्यापासून रोखू नका’ (मुस्लिम). ज्याला मुलगी आहे आणि तो तिला जिवंत पुरत नाही , तिची विटंबना करत नाही , किंवा मुलाला तिच्यापेक्षा जास्त प्राधान्य देत नाही , अल्लाह त्याला स्वर्गात प्रवेश देणार. (अबू दाऊद). ज्ञान मिळवणे हे मुस्लिम पुरुष आणि स्त्रीचे कर्तव्य आहे. (इब्ने माजा)
आईबद्दलच्या वागणुकीचा उल्लेख केल्याशिवाय लेखन पूर्ण होऊ शकत नाही जिच्याबद्दल पैगंबर (सल्ल.) यांनी सांगितले कि,’’ चांगल्या वागणुकीच्या बाबतीत माता सर्वात प्रथम पदावर आहे आणि पुढील दोन पदांवर सुद्धा तिचे पद प्रथमच राहते त्यानंतर चौथ्या स्थानावर वडिलांचे पद आहे. (बुखारी)
अशाप्रकारे आपण पाहतो की, ईश्वराचे अंतिम प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी स्त्री आणि पुरूष या दोघांनाही समान वागणूक देणारी एक परिपूर्ण अशी जीवनशैली दिली आहे जी फक्त महिलांना सामाजिक स्थान प्रदान करत नाही तर त्यांची समाजात सामाजिक जागाही सुनिश्चित करते.
पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी म्हणालो, ''हुजूर, गुलाम हजर आहे, आदेश द्यावा.'' पैगंबर (स.) काही बोललेच नाहीत. मग काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ''हे मुआज़ बिन जबल!'' मी तेच शब्द पुन्हा उच्चारले जे पहिल्यांदा म्हटले होते. (परंतु पैगंबर काहीच बोलले नाहीत.) मग काही अंतर पुढे गेल्यानंतर पैगंबर म्हणाले, ''दासांवर अल्लाहचा कोणता अधिकार आहे हे तुम्हाला माहीत आहे काय?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांनाच खरे काय ते माहीत.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचा अधिकार दासांवर असा आहे की त्याने (दासाने) त्याचीच उपासना करावी आणि त्याच्या उपासनेत कोणा दुसऱ्याला अजिबात भागीदार बनवू नये.'' मग काही अंतर चालल्यानंतर पैगंबर (स.) म्हणाले, ''हे मुआज!'' मी म्हणालो, ''बोला. हा गुलाम आपले वक्तव्य लक्षपूर्वक ऐकून घेईल आणि प्रामाणिकपणे आपले आज्ञापालन करील.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''तुम्हाला ठाऊक आहे काय की दासांचा अल्लाहवर कोणता अधिकार (हक्क) आहे?'' मी म्हणालो, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरांनाच उत्तमप्रकारे ठाऊक.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''अल्लाहचे दासत्व करणाऱ्या दासांचा अल्लाहवर असा हक्क आहे की अल्लाहने त्यांची शिक्षा माफ करावी.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
स्पष्टीकरण : माननीय मुआज यांच्या कथनाचे स्पष्टीकरण असे आहे की मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अगदी जवळ बसलो होतो, ऐकणे व ऐकवण्यास कसलाही अडथळा नव्हता, पैगंबरांचे वक्तव्य अगदी सहजतेने मी ऐकू शकत होतो परंतु जी गोष्ट पैगंबर (स.) ऐकवू इच्छित होते ती अत्यंत महत्त्वाची होती, म्हणून पैगंबरांनी तीन वेळा हाक दिली आणि ती गोष्ट सांगितली. असे यासाठी केले जेणेकरून मला या गोष्टीचे महत्त्व चांगल्या प्रकारे कळावे आणि मी अगदी लक्ष्यपूर्वक कान देऊन ऐकावे. पैगंबरांच्या वक्तव्याद्वारे 'एकेश्वरत्वा'चे महत्त्व स्पष्ट झाले की ते नरकाच्या यातनांपासून वाचविणार आहे. जी गोष्ट अल्लाहच्या क्रोधापासून वाचविणारी असेल आणि स्वर्गाचा (जन्नतचा) हक्कदार बनविणारी असेल, तिच्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट दासालाच्या दृष्टीने दुसरी कोणती असू शकते?
(२) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (अब्दुल कैस यांच्या कबिल्याची देखभाल करणाऱ्यांना) विचारले, ''एक अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय?'' त्यांनी उत्तर दिले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबरच उत्तमप्रकारे जाणतात.'' पैगंबर (स.) म्हणाले, ''ईमान म्हणजे मानवाने या सत्याची ग्वाही द्यावी की अल्लाहशिवाय कोणीही उपास्य नाही आणि मुहम्मद अल्लाहचे पैगंबर आहेत आणि नमाज (प्रार्थना) योग्य पद्धतीने अदा करावी आणि जकात (दानधर्म) द्यावी आणि रमजान महिन्याचे रोजे (उपवास) करावेत.'' (हदीस : मिश्कात)
(३) माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा जेव्हा प्रवचन दिले, त्यात हे अवश्य सांगितले की ''ज्याच्यात ठेव नाही त्याच्यात ईमान नाही आणि ज्याच्यात वचनाचे संरक्षण व आदर नाही त्याच्याकडे दीन (जीवनधर्म) नाही.'' (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा की जो मनुष्य अल्लाहचे हक्क आणि दासांचे हक्क, ज्यांची पूर्ण यादी अल्लाहच्या ग्रंथात आहे, अदा करीत नाही त्याचा ईमान परिपूर्ण नाही आणि जो मनुष्य एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे वचन देतो, मग ती गोष्ट पूर्ण करीत नाही आणि ते वचन पाळत नाही, तो धर्मपरायणतेच्या ईशदेणगीपासून वंचित राहतो. ज्याच्या मनात ईमानची मुळे दृढ रुतलेली असतात तो सर्व प्रकारचे हक्क प्रामाणिकपणे अदा करतो. कोणताही हक्क अदा करण्यात कुचराई करीत नाही. अशाप्रकारे ज्या मनुष्यात धर्मपराणता असेल तो मरेपर्यंत वचनाचे पालन करील. लक्षात असू द्या की सर्वांत मोठा हक्क अल्लाहचा आहे, त्याच्या पैगंबरांचा आहे, त्याने अवतरित केलेल्या ग्रंथाचा आहे आणि एखाद्या मनुष्याने आपल्या अल्लाहशी आणि त्याने पाठविलेल्या पैगंबराशी आणि पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्माशी केलेला करार सर्वांत मोठा करार असतो.
(४) माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ''ईमान म्हणजे काय?'' पैगंबरांनी उत्तर दिले, ''संयम आणि दानशूरता म्हणजेच ईमान होय.'' (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : याचा अर्थ असा की ईमान म्हणजे मनुष्याने अल्लाहचा मार्ग स्वत:साठी पसंत करावा आणि त्या मार्गात जी काही संकटे येतील ती सहन करावीत आणि अल्लाहच्या आधारे पुढे पुढे जावे (हा संयम आहे) आणि मनुष्याने आपली मिळकत अल्लाहच्या वंचित व निराश्रित दासांवर अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी खर्च करावी आणि खर्च करून खुशी अनुभवावी (ही दानशूरता आहे).
लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट आणि कठीन असेल, वायफळ खर्च करून झालेला असेल तर ते कुटुंब, समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही. इस्लाममध्ये लग्न फक्त एक इबादत (उपासना) आहे. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांची सुन्नत (अनुकरण) आहे. आणि एक सामाजिक करार आहे. याचीच प्रचिती लातूर येथे मुहम्मद युनूस पटेल यांच्या मुलीच्या निकाह दरम्यान उपस्थितांना आली. दोन मुस्लिम गवाह, दोन हिंदू निरीक्षक आणि दोन खजुरांच्या अल्पोपहारात साधा, सोपा आणि अध्यात्मिक वातावरणात निकाह संपन्न झाला
लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या महेबुबीया मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदचे सदस्य युनूस पटेल यांची सुकन्या अनम जोहरा आणि बीदरचे रहिवाशी मुहम्मद जहीर यांचे चिरंजीव मुहम्मद सुलेमान यांचा निकाह 22 नोव्हेंबर रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्ये असे की, अतिशय पवित्र वातावरणात मस्जिदीत निकाह झाला. यात कुठल्याही प्रकारचा आवाजवी खर्च झाला नाही. मुलीच्या वडिलांनी मुलाला हुंडा दिला नाही. दहेजच्या नावाखाली कुठल्याही वस्तू दिल्या नाहीत उलट वर सुलेमान यांनी 50000 रुपये रोख वधू अनम जोहरा हिला महेर (भेट) म्हणून दिले. याप्रसंगी इस्लामी लग्न हा एक सामाजिक करार आहे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सर्वधर्मीय 50-55 बांधवांच्या उपस्थितीत, अल्पोपहार म्हणून फक्त दोन खजूर आणि पाणी देण्यात आले. निकाह-ए-खुत्बा (विवाह विधी) वधूचे पिता मुहम्मद युनूस पटेल यांनी पठण केला.
विवाहात प्रारंभी वधू अनम जोहरा हिची सम्मती वकील आणि साक्षीदार यांनी घेतल्याची घोषणा वकील अश्फाक अहमद (अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंद लातूर) यांनी केली. त्या नंतर करार पत्रावर वर मोहम्मद सुलेमान मोहम्मद जहीर अहमद यांनी सही केली. यावेळी साक्षीदार म्हणून सय्यद अब्दुल रऊफ लातूर आणि शहरीयाज पटेल बिदर हे उपस्थित होते. या निकाहचे विशेष निरीक्षक म्हणून शाहू महाविद्यालयातील प्रा.डॉ. रणजीत जाधव (अध्यक्ष कबीर प्रतिष्ठान लातूर) आणि प्रा.डॉ. अनिल जायभाये (समाजशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर) उपस्थित होते.
या प्रसंगी औरंगाबादहुन आलेले जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र संदेश विभागाचे सचिव प्रा. वाजिद अली खान, यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. त्यात इस्लामी निकाह म्हणजे काय असतो? तो कसा असतो? या प्रसंगी काय वाचले जाते? कुरानच्या आयतींचा अर्थ वगैरे समजून सांगितला.
यावेळी जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान म्हणाले, ’’विवाह एक सोहळा नसून ती एक प्रार्थना आहे. विवाहाला इस्लामने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचे आवाहन करत तो कसा असावा याची नियमावली सांगितली आहे. विवाह त्याच पुरूषाला करण्याचे आवाहन केले आहे जो त्याला निभावण्याची ऐपत राखतो. ज्याला वाटते की आपण विवाह व त्यानंतर येणारी जबाबदारी पार पाडू शकत नाही त्याने विवाह न केलेलाच बरा. कारण विवाहानंतर सगळी जबाबदारी पुरूषावरच असते. आज आपण पाहिलात की विवाहाप्रसंगी मुलीच्या पित्याकडून मुलाला काहीही देणेघेणे झाले नाही. उलट वराने मुलीला 50 हजार रूपये नगदी मेहरची रक्कम दिली आणि मुलीला विचारले गेले की तुम्हाला ही रक्कम मंजूर (कुबुल) आहे का, वर कबुल आहे का? ज्यावेळी मुलीने ’कबुल है’ असे साक्षीदार आणि वकीलासमोर म्हटल्यानंतर पुढील विवाहाची कार्यवाही करण्यात आली. मुलीने निकाहनाम्यावर हस्ताक्षर केले. म्हणजेच मुलीच्या मर्जीनुसार विवाह करावा. कारण या विवाहातून पुढील समाजाची, आपआपसातील नात्यांची विण घट्ट बसत असते. या जोडप्यांमध्ये प्रेम, आपुलकीची भावना अधिक निर्माण होते. या दोघांत सामंजस्य असेल तर हे दोघे घराला, समाजाला, देशाला अधिक फायदा पोहोचवू शकतात. त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना ते चांगले संस्कार, शिक्षण देऊन ते देशाला चांगले नागरिकही देवू शकतात.’’
निकाहाचे विशेष निरीक्षक प्रा. रणजीत जाधव याप्रसंगी म्हणाले की, ’’एवढ्या सोप्या पद्धतीने असा विवाह मी पहिल्यांदाच पाहिला आहे. त्यामुळे मी युनूस पटेल आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करतो. आपल्या समाजात जी वाईट पद्धती आहे ती म्हणजे हुंडा पद्धत. आणि जो विवाहात अकारण खर्च होतो ती एक चुकीची पद्धत आहे. मोठ्या व्यक्तींच्या लग्नात होणारा खर्च पाहून गरीब मुलीचा पिता आपल्या मुलीसाठी आपण काहीच करू शकत नसल्याची खंत मनात बाळगून असतो. तो तिच्या लग्नासाठी सर्वस्व पणाला लावून पैसे जमा करत असतो. त्यालाही वाटते की आपण खर्च करावा, तो व्याजाने पैसे काढतो. मुलीचे लग्न करतो. पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलीचा निकाह केला त्या पद्धतीने जर समाजातील इतर बांधवांनी आपल्या मुलीचे विवाह केले तर अनेक समस्या मिटू शकतील. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्येत एक कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे नसणे हे ही आहे.’’ आदर्श इस्लामी निकाहाची आज मला पहिल्यांदाच प्रचिती आल्याचेही प्रा.डॉ. रणजित जाधव म्हणाले.
उर्दूचे प्रसिद्ध शायर अजय पांडे ’बेवक्त’ याप्रसंगी म्हणाले की, ’’आमचे मित्र मो. युनूसभाई पटेल यांच्या मुलीचे इस्लामी परंपरेनुसार लग्न झाले. अत्यंत साधेपणाने हा विवाह पार पडला. या विवाहाला उपस्थित राहून आम्हाला सुद्धा लग्नामधील नवीन प्रकार पहायला मिळालेला आहे. पटेल परिवाराचे याप्रसंगी अभिनंद करतो. शुभेच्छा देतो.’’
याप्रसंगी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभिजित देशमुख म्हणाले की, ’’आमचे मित्र युनूस पटेल यांच्या मुलीचा विवाह मस्जिद मध्ये आमच्या उपस्थितीत झाला. त्यांना व नववधू-वरांना शुभेच्छा. ज्या साध्या पद्धतीने हा विवाह संपन्न झाला ते पाहून फार आनंद झाला. मालमत्ता अल्लाहने दिलेली देणगी आहे. समाजात असे होत आहे की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यानेच मोठे विवाह करावे आणि ज्याच्याकडे नाही तो करण्यास असमर्थ ठरतो. यासाठी ईश्वराने आम्हाला साध्या पद्धतीने विवाह करण्याची जी शिकवण दिली त्यावर पूर्णरूपाने अमल झाला पाहिजे. या मस्जिदीतील विवाहाप्रसंगी आमचे काही हिंदू बांधवही उपस्थित होते. वधूपिता युनूस पटेल यांच्या स्वभावानुसार ते सर्वधर्मीय बांधवांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहातही सर्वांना बोलावून मस्जिदीत साध्या पद्धतीने विवाह केला. विशेष बाब तर ही आहे की त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात दोन निरीक्षकही हिंदू बांधव होते. ही एकोप्याची दृष्टी पाहूनही फार आनंद झाला. खरे तर लातूर कौमी एकतेसाठी प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही ते प्रत्यक्षात पाहत आहोत. या एकतेचा संदेश दूरवर पोहचेल. जो आमच्या मनाला फार आनंद देऊन गेला आहे.’’
या निकाहसाठी लातूर शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मोईज शेख, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे माधव बावगे, कवी योगिराज माने, प्राध्यापक हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रयोगशील शिक्षक नजिउल्लाह शेख यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिलांची उपस्थिती होती. तौफिक असलम खान (सदस्य केंद्रीय प्रतिनिधी मंडळ जमाते इस्लामी हिंद) यांनी शेवटी दुआ मागितली. युनूस पटेल यांनी आभार मानले.
तसेच एक दुसरी व्यक्ती प्रेषितांकडे आली आणि म्हणाली, हे प्रेषिता! मला काही शिकवण द्या. पण थोडक्यात सांगा, मला सजता येण्यासारखे. प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (हदीस – अबू हसीन, तिर्मिजी)
हजरत अब्दुल्लाह बिन उमरो म्हणतात, मी प्रेषितांना अल्लाहच्या प्रकोपापासून बचाव करण्यास काय करावे, असे विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘‘रागावू नका.’’ (मुसनद अहमद)
तसेच हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक म्हणतात की रागावर नियंत्रण हे सर्वोत्कृष्ट चारित्र्याचे प्रतीक आहे.
एक व्यक्ती प्रेषितांकडे येऊन विचारले की कोणते कर्म सर्वश्रेष्ठ आहे? प्रेषित म्हणाले, ‘‘उच्चतम चारित्र्य.’’ त्यांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर प्रेषित म्हणाले, ‘‘कुणावर रागावू नये.’’
प्रेषितावच्या या शिकवणीचा अर्थ असा की अशी कर्मं करणे ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे दर्शन होते. म्हणजे मनाची उदारता, लोकांशी आपुलकी, लाज, नम्रता, कुणास त्यास न देणे, क्षमेचा व्यवहार करणे, कुणाला भेटताना दिलखुलासपणे त्याचे स्वागत करणे.
पवित्र कुरआनात अल्लाह अशा लोकांविषयी म्हणतो की त्यांना राग आला तर त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसऱ्यांकडून झालेल्या चुका माफ करतात. अशा प्रकारचे नेक लोक अल्लाहला आवडतात. (पवित्र कुरआन-३:१३४)
प्रेषितावचे एक सेवक हजरत अनस यांनी लहानपणापासून सुमारे दहा वर्षे त्यांची सेवा केली. या दहा वर्षांच्या काळात प्रेषितांनी एकदाही त्यांच्यावर थोडादेखील राग केला नाही. एखादे काम का झाले नाही, असा प्रश्न कधी विचारला नाही. घरातल्यांनी हजरत अनस यांना एकदा कामाबाबतीत विचारले तर प्रेषित म्हणायचे, ‘‘जाऊ द्या, अल्लाहची इच्छा असती तर ते काम झाले असते.’’
प्रेषित म्हणाले, ‘‘राग माणसाच्या मानेभोवतीच्या रिंगीसारखा आहे. अशा परिस्थितीत तो जर उभा असेल तर खाली बसावे, बसलेला असेल तर जमिनीवर झोपावे.’’
प्रेषित म्हणाले, ‘‘रागावणे सैतानाचे कृत्य आहे. सैतानाला आगीपासून निर्माण केले आहे. तेव्हा कुणाला राग आवरला नाही तर त्याने थंड पाण्याने वुजू करावी.’’
वो जिनके होते हैं खुर्शिद आस्तीनों में
उन्हें कहीं से बुलाओ बडा अंधेरा है
भारतीयांना या गोष्टीचा मोठा अभिमान आहे की, युरोप व अमेरिकेमध्ये आपल्या नागरिकांनी मोठी झेप घेतलेली आहे. सिलीकॉन व्हॅली तर जवळ-जवळ भारतीयांच्या ताब्यात आहे. पण असे का आहे? याचा फारसा कोणी विचार करतांना दिसत नाही. वास्तविक पाहता आम्हा भारतीयांची मागील पिढी कष्टाळू, प्रामाणिक, पापभिरू आणि उच्च नैतिक मुल्यांनी नटलेली शेवटची पिढी होती, म्हणून त्यांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला व स्थानिकांच्या नाकर्तेपणामुळे रिक्त झालेल्या महत्त्वाच्या खुर्च्या आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर मिळविल्या. मात्र त्यांचीच पुढची पिढी त्यांच्यासारखी कर्तृत्वान न निपजता वाया जातांना दिसून येत आहे. नव्या पिढीने समकालीन स्थानिक पिढीचे संस्कार आत्मसात केले असून आता ही पिढी आळशी, उद्धट, अप्रमाणिक असल्याचे दिसून येते. उच्च नितीमुल्यांचा त्यांनी त्याग केलेला आहे. शालेय स्तरापासूनच ड्रग्जचे सेवन व लैंगिक सक्रीयता त्यांना निष्क्रिय करून टाकत आहे. दळणवळणाच्या साधनांची सहज उपलब्धता, सोशल मीडिया, ओटीटी प्लेटफॉर्ममुळे जग एकवटलेले आहे. दर्जेदार मनोरंजनाच्या नावाखाली अनैतिक संबंधांचे उदात्तीकरण करणाऱ्या मालिकांचा सुळसुळाट झालेला आहे. एकंदरित पाश्चिमात्य (अ) सभ्यता युरोप आणि अमेरिकेमधून विस्तारित होऊन आता भारतामध्ये पूर्ती स्थिरावलेली आहे. हे मुंबई क्रूझ ड्रग पार्टीच्या घटनेतून नुकतेच स्पष्ट झालेले आहे.
चांगली युवा पिढी महागड्या शाळा महाविद्यालयातून नव्हे तर चांगल्या कुटुंबातून निपजते व चांगले कुटुंब चांगल्या मात्यापित्यामुळे निर्माण होते आणि त्यांची वाणवा आजकाल सर्वत्र दिसून येत आहे. जीवनमान उंचावण्याच्या नादात पती-पत्नी दोघेही ’जॉब’ करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतात व रात्री उशीरा घरी येतात. साहजिकच त्यांच्या या दिनचर्येचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. मुलं चांगली निपजावीत म्हणून महागड्या शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. तेथे त्यांना भौतिक शिक्षण जरूर मिळते पण नैतिक शिक्षण मिळत नाही. याचा एकंदरित परिणाम मुलं सुशिक्षित तर होतात पण सुसंस्कृत होत नाहीत. म्हणून आजची तरूण पिढी व्याभिचारी, बलात्कारी, भ्रष्ट, संकीर्ण, जेमतेम योग्यता असलेली पुढे येतांना दिसून येते आणि हा भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेचा अपरिहार्य परिणाम आहे. या व्यवस्थेतून चांगले व्यापारी उद्योजक तर मोठ्या संख्येने निर्माण होतात पण चांगली माणसं निर्माण होत नाहीत.
मुलांच्या बाल्यवस्थेतील संगोपनाची नैसर्गिक जबाबदारी मातेची असते. पण काही महिन्याच्या मेटर्निटी लिव्ह शिवाय तिला मुलांच्या संगोपनासाठी पुरेशी सुट्टी मिळू शकत नाही. अनेक मातांना दूध पिणारे बाळ पाळणाघरात सोडून ऑफिसला जावे लागते आणि छातीत दाटून आलेले अमृतसमान दूध अक्षरशः पिळून वॉसबेसनमधून वाहून टाकावे लागते. त्यातून बाळाच्या मुलभूत अधिकारांचे हनन तर होतेच स्त्रीला आपल्या मातृत्वाशी तडजोड करावी लागते, हे मोठे दुर्दैव आहे. दूध पिण्याच्या आणि पाजण्याच्या प्रक्रियेतून आई अन् बाळाची जी जवळीक निर्माण होत असते त्यातून मातेचे बाळाप्रती वात्सल्य वाढते. दूध बेसीनमध्ये वाहवल्याने बाळाची आईशी जी शारीरिक सलगी असते ती कमी होते. त्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दोघांनाही भविष्यात भोगावे लागते. मूल आणि मातेमध्ये एका प्रकारचा अदृश्य दुरावा निर्माण होतो, जो मूल जसजसे मोठ होत जाईल तसतसा वाढत जातो.
भ्रष्टाचारातून मिळविलेल्या मिळकतीतून मुलांचे संगोपन
मुलांचे शिक्षण महाग आहे. आई-वडिल दोघेही कमावल्याशिवाय ते पूर्ण करणे शक्य नाही. असा समज व्यापक प्रमाणात निर्माण झाल्यामुळे आई-वडिल मुलांच्या प्राथमिक आयुष्याशी तडजोड करून पैसा कमावण्यासाठी सातत्याने घराबाहेर राहतात. त्यामुळे मुलांचा त्यांच्या जवळीकीचा नैसर्गिक हक्क हिरावल्या जातो. एवढेच नव्हे तर रात्रंदिवस काम व भ्रष्टाचार करून जो प्रचंड पैसा आई-वडिल कमावतात त्यातून मुलं चांगली निपजण्यापेक्षा वाईट निपजतात याची असंख्य उदाहरण आपल्या आजुबाजूला पसरलेली आहेत. भ्रष्टाचार करून मिळविलेल्या संपत्तीतून शिकून मोठे झालेली मुलं पुढे तिसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून पुढे येतात. या संबंधित सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांचे विचार चिंतनीय असे आहेत. ते खालीलप्रमाणे -
राष्ट्रीय उन्नती का रहस्य
’’राष्ट्रों की उन्नती के लिए ये बात लाभदायक नहीं बल्कि अति हानिकारक है कि उनकी नस्लों की शिक्षा-दिक्षा तमाम की तमाम सुख एवं वैभव के वातावरण में हो और उनको कठिनाइयों, विपत्तियों, धनहीनता तथा अथक परिश्रम का सामना ही न करना पड़े. ये चीज़ उस सब से बड़े प्रशिक्षालय (ट्रेनिंग सेंटरों) को बन्द कर देगी जिस में मनुष्य की शिक्षा-दिक्षा, तुम्हारे स्कुलों और कॉलेजों से अत्युत्तम ढंग पर होती है. वो प्रशिक्षालय समय का प्रशिक्षालय है जिस को श्रेष्ठ अल्लाह ने स्थापित किया है, ता कि मनुष्य की सहनशीलता, सहिष्णुता, साहस तथा उत्साह की परीक्षा करे और उन्हीं को पास करे जो परीक्षा में पूरे उतर आयें. ये एक ऐसी भट्टी है जो अशुद्ध को शुद्ध से विभेदित करती है और तपा-तपा कर खोट निकालती है. यहां विपदायें इसलिए डाली जाती हैं कि हमारे अंदर उन से मुक़ाबले की शक्ति पैदा हो, कठिनाइयां इस लिए पैदा की जाती हैं कि मनुष्य उन पर अधिकार प्राप्त करने का प्रयास करे, कठोरता इसलिए होती है कि मनुष्य की कमजोरियां दूर हों और उस की छिपी हुई शक्तियां व्यवहारिक-क्षेत्र में प्रकट हों. जो लोग इस प्रशिक्षालय से निवृत्त होकर निकलते हैं, वही संसार में कुछ कर के दिखाते हैं, और संसार में आज तक जितने बड़े-बड़े काम किए गए हैं, वो इस प्रशिक्षालय की सनद हासिल किए हुए लोगों ने ही किए हैं. तुम इस प्रशिक्षालय को बन्द कर के संसार को सुख-गृह में परिवर्तित करना चाहते हो, ता कि तुम्हारी नस्लें सुखार्थी, दुस्साहसी, कामचोर और डरपोक बनकर उठें. तुम चाहते हो कि तुम्हारी सन्तान भोगविलास के पालने में आंख खोले, ऊंचे स्कूलों और विराट निवास स्थानों में रह कर शिक्षा प्राप्त करे और युवक होकर जीवन-क्षेत्र में कदम रखे तो इस प्रकार कि उनके पास एक ’उपयुक्त आरम्भ’ के लिए पर्याप्त पूंजी मौजूद हो. तुम आशा रखते हो कि इस प्रकार वे संसार में सफल होंगे और उन्नति के आसमानों पर चमकेंगे. परन्तु तुम को मालूम होना चाहिए कि ऐसी शिक्षा-दिक्षा के साथ तुम तीसरी श्रेणी के पशु पैदा कर सकते हो या अधिक से अधिक द्वितीय श्रेणी के, प्रथम श्रेणी के मनुष्य तुम्हारी नस्लों में कभी न उठेंगे. विश्वास न आये तो विश्व का इतिहास और महान विभूतियों की जीवन-चर्या उठा कर देख लो, तुम को प्रथम श्रेणी के जितने भी मनुष्य मिलेंगे, उन में कम से कम नब्बे प्रतिशत ऐसे होंगे जो दीन व अकिंचन (ग़रीब) माता-पिता के यहां पैदा हुए, विपदाओं की गोद में पल कर उठे, इच्छाओं के खून और कामनाओं के त्याग के साथ युवावस्था व्यतीत किया, जीवन रूपी समुद्र में बिना किसी साधन-सामग्री के फेंक दिए गए, लहरों से तैरना सीखा, थपेड़ों से बढ़ने का पाठ पढ़ा और अन्ततः सफलता-तट पर अपनी उच्चता की पताका लहरा कर ही छोड़ा.’’ (इस्लाम और बर्थ कंट्रोल सफा नं 119-121)
ईश्वराने स्त्री पुरूषांची शारीरिकच नव्हे तर मानसिक रचना सुद्धा अशी केलेली आहे की पुरूष घराबाहेरील कष्टाची कामे करण्यासाठी अनुकूल असतात तर महिला घरातील कामांसाठी अनुकूल असतात. महिलांना अर्थार्जनापासून पूर्णपणे मुक्त ठेवण्यामागे ईश्वरीय इच्छा हीच आहे की तिने बालसंगोपन (जे की तिच्यासाठी उत्तम आणि अनुकूल आहे) व्यवस्थित करावे. पण पाश्चिमात्यांच्या मूर्ख विचारसरणीचा एवढा जबरदस्त परिणाम झालेला आहे की, अनेक पिढ्यांचे उध्वस्तीकरण, याची देही याची डोळा पाहूनही आपल्याला अजून अक्कल आलेली नाही. उदा. जी गृहिणी अंगभर कपड्यात राहून घरातील कामे करते त्या गृहिणीला तुच्छ लेखणारे आपण तेच काम, परपुरूषांच्या बिभत्स नजरेच्या कैदेत राहून विमानातील महिला तोकड्या कपड्यात करतात तेव्हा त्यांना हवाई सुंदरी म्हणून आपण खोटा सम्मान देतो. केवढा हा दांभिकपणा? कुठलेही तर्कसंगत कारण नसताना गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आपली तरूण पिढी केवळ यासाठी घालून फिरते की युरोप आणि अमेरिकेतील लोक तशा जिन्स घालतात. अशा मूर्खपणापासून आपल्या पिढीला विनाशाकडे ढकलणारेही आपणच. ही मानसिक गुलामगिरी ज्यांना करावयाची आहे त्यांनी खुशाल करावी. किमान गंभीर प्रवृत्तीच्या हिंदू बांधवांनी आपल्या गुरूकुल परंपरेची लाज बाळगून व मुस्लिम बांधवांनी आपल्या शरई परंपरेची लाज बाळगून आपापल्या पाल्यांचे संगोपन आपापल्या पद्धतीने जरी केले तरी आपण देशाला पर्यायाने जगाला चांगल्या नागरिकांचा पुरवठा करू शकतो. नसता कुठलाही अणुबॉम्बचा न वापरता हे पिसाळलेले तरूण पृथ्वीचा नाश करतील.
पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय. आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तुलनेत जास्त चालतात. याचाच अर्थ तेथे आणि आता येथेही मनोरूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. म्हणून किमान मुस्लिमांनी आपल्या मुलांचे संगोपन शरियतनुसार करावे.कारण इस्लाम आलाच मुळी सभ्यतेची स्थापना करण्यासाठी आणि ही सुरूवात लहान मुलांपासून करणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास कशी पिढी निर्माण होते याचे प्रात्यक्षिक आपण आपल्या अवतीभोवती रोजच पाहतोय. सभ्यतेचे मेरूमनी म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने एक रोल मॉडेल आपल्यासमोर उपलब्ध आहे. त्यांच्या बाबतीत कुरआनने घोषणा केलेली आहे की, ’’आणि निःसंशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.’’ (कुरआन : सुरे अलकलम : आयत नं.4). दुसऱ्या एकेठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’’प्रत्येक धर्माचे एक वैशिष्ट्ये असते आणि इस्लामचे वैशिष्ट्ये लज्जा आहे.’’ या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपण आपल्या मुलांचे संगोपन करून तेव्हा देशात व विदेशात चारित्र्यसंपन्न, संयमी, दृढ निश्चयी, आपल्या इच्छा-आकांक्षावर (नफ्स) नियंत्रण ठेऊन जबाबदारीची कामे करण्यासाठी तरूणांची सर्व क्षेत्रीय मागणी वाढेल तेव्हा मागणी प्रमाणे आपण पुरवठा करू शकू. असा पुरवठा करण्यासाठी जग मुस्लिमांकडूनच अपेक्षा ठेवेल हे लक्षात असू द्या. कारण बालसंगोपनाचे सर्वंकष योजना (कुरआन आणि हदीसच्या स्वरूपात) फक्त तुमच्याकडे आहे दुसऱ्यांकडे नाही. विशेषतः मुस्लिम महिलांनी कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तुमच्या पदराखाली भविष्यातील अबुबकर रजि., उमर रजि., उस्मान रजि., अली रजि., सुमैय्या रजि., आएशा रजि. आकार घेत आहेत. पुढच्या पिढीला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आणि बलवान बनविण्यामध्ये तुमची भूमिका तुमच्या पुरूषांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.
बालसंगोपन एक दुर्लक्षित विषय
कुठल्याही देशाला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श मनुष्यबळाची सातत्याने गरज भासत असते. ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी त्या-त्या देशातील नागरिकांची असते. ती जबाबदारी कुठल्याही कारणाने जर एखाद्या देशाचे नागरिक पूर्ण करू शकत नसतील तर त्या एवढा राष्ट्रीय कृतघ्नापणा दूसरा कोणता असू शकतो बरे ! आपल्याच देशातील सध्याची स्थिती पहा गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अधिकाऱ्यांची सातत्याने कमतरता भासत आहे, ती पूर्ण करण्यासाठी पुरेसे पात्र तरूण आपल्याकडे नाहीत. आज आयटी क्षेत्राला ज्या दर्जाचे अभियंते पाहिजेत त्या दर्जाचे अभियंते मिळत नाहीत. त्यांच्याकडे पदव्या आहेत पण कौशल्य नाही. इच्छा आहे पण लायकी नाही. म्हणून अनेक कंपन्यांची कामगिरी खालावलेली आहे अनेक अभियांत्रिकी विद्यालये बंद पडलेली आहेत. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. शिकूनही रोजगार मिळत नसल्याने तरूणांमध्ये वैफल्य वाढत आहे. अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत. या सर्वासाठी त्यांचे आई-वडिल जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांचे संगोपन व्यवस्थित केलेले नाही. मागची पिढी स्वार्थी ठरल्याने नवीन पिढीची अडचण झालेली आहे.
चंगळवादी जीवन पद्धती माणसाला ऐशआरामी व निरूद्देश्य जगण्याकडे प्रेरित करत असते. आणि एकदा का माणूस चंगळवादाच्या चक्रव्यूवहात अडकला की त्यातून तो सुटू शकत नाही. म्हणूनच आपण पाहतो एकीकडे कृषी सारखा महत्त्वाचा जीवनावश्यक व्यवसाय धोक्यात आलेला असतांना सिनेमा, टीव्ही, ओटीटी, यू ट्यूब, फेसबुक, फॅशन, कॉस्मॅटिक्स सारख्या निरूपयोगी व्यवसायांची भरभराट होत आहे. देशाला दृढनिश्चयी संयमित पिढीची गरज असतांना कंबर हलवून डान्स करणाऱ्या नाच्यांचा पुरवठा मात्र जोरात सुरू आहे. ही परिस्थिती जगात सर्वत्र वाढत असून, लवकरच ही आपल्या शेवटच्या टोकाला पोहोचणार आहे. किंबहुना पश्चिमेत ती पोहोचलेली सुद्धा आहे. अफगानिस्तानमध्ये 41 देशाच्या सर्वसाधन संपन्न फौजांचा झालेला लाजीरवाना पराभव हे याचे ताजे उदाहरण आहे.
माणसांच्या मनात जे काही चांगले वाईट मुल्यं रूजतात ते बालपणीच रूजतात आणि नेमक्या त्याच काळात आई-वडिल दोघेही जॉबनिमित्त बाहेर असतील आणि मोलकरणींकडे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असेल तर अशाच पिढ्या आकार घेणार जश्या आज घेत आहेत.
उपाय
आपल्या प्रिय भारत देशाला भविष्यात लागणाऱ्या संयमी आणि चारित्र्यवान नागरिकांचा सर्वक्षेत्रीय पुरवठा करण्यासाठी मुस्लिमांना उभे रहावे लागेल. त्यासाठी कुठली नवी योजना तयार करण्याची गरज नाही. फक्त शरीयतमध्ये दिलेल्या तरतुदींची मुलांच्या वयानुसार कालबद्ध अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गरीबीमुळे ज्यांना या जबाबदारीची जाणीव नाही त्यांच्या पाल्यांची जबाबदारी श्रीमंत शेजाऱ्यांनी तसेच मुस्लिम संस्था संघटनांनी उचलावी. ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे.
विस्तार भयामुळे शरई संगोपनाचा तपशील देणे शक्य नाही. कारण कुरआनमध्ये बाळ जन्मताच त्याला आईने किती वर्ष दूध पाजवावे? त्याचे नाव कसे ठेवावे? त्याच्यावर संस्कार कोणते करावेत? त्यांचे अंथरूण कधी वेगळे करावे? त्याला कुठल्या वयात नमाजची सक्ती करावी? भींतीवर चाबूक कधी लटकवून ठेवावा? इथपासून ते मुलांना शिक्षण कधी, कोणते आणि कसे द्यावे? याचा सविस्तर तपशील उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन सुरे लुकमानमध्ये केलेले आहे. त्याचा वाचकांनी अभ्यास करावा आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श नागरिकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी उचलावी. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’हे अल्लाह! आम्हाला व आमच्या देशबांधवांना देशासाठी भविष्यात लागणारे योग्य नागरिक घडविण्याची समज आणि शक्ती दे.’’ (आमीन.)
- एम. आय. शेख
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो,
‘‘मी मानवांवर अत्याचार करणारा नाही.’’ (सूरह – काफ : ३९)
‘‘अल्लाहला आपल्या दासांवर अत्याचार करण्याची कोणती इच्छा नाही.’’
(सूरह – अलमोमिन : ३१)
‘‘जगवासीयांवर अत्याचार करण्याची अल्लाहची मुळीच इच्छा नाही.’’
(सूरह – आलेइमरान : १०)
माँ के लिए वक्त-ए-जुदाई है
रस्मे तआम जबसे निकाह में आयी है
इस रस्म ने बडी तबाही मचाई है
ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है
दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है.
लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.
इस्लाममध्ये निकाहची संकल्पना
रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई
गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)
की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).
आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत.
विवाह सोपा करा
ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है
ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है
विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.
मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! ... प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले.
भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे. ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे.
अल-मारूफ वल-मशरूत
एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.
निकाह सोपा करा
इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत.
इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत.
काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की -
एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.
एक अनाहुत संकट
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही.
केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे.
एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील.
आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.
काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.
मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.
लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक - वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल.
शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.)
- एम. आय. शेख
ह. अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात, एका व्यक्तीने प्रेषितांकडे इस्लामच्या बाबतीत विचारणा केली असता प्रेषित (स.) म्हणाले, ‘तुम्ही ज्या लोकांना ओळखता आणि ज्यांच्याशी तुमची ओळख नसेल तर अशांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हा उच्चतम इस्लाम आहे.’
ह. हुरैरा यांनी म्हटले आहे की रात्री रस्ता दिसण्यासाठी जसे गावात, शहरांमध्ये प्रकाशाची सोय करण्यासाठी लाईटचे खांब असतात. तसेच इस्लामची वाट दाखवण्यासाठी अल्लाहची भक्ती, त्याच्याबरोबर कुणाला भागीदार न जोडणे, नियमित नमाज अदा करणे, जकात देणे, रोजे ठेणे या सर्व गोष्टी इस्लामचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशाचे दिवे आहेत. याचबरोबर भल्या गोष्टी लोकांना सांगत राहाणे, वाईटापासून त्यांना रोखणे. आदम (अ.) यांच्या सतती (सबंध मानवजातीतील लोकांना) सलाम करणे, घरात गेल्यावर घरच्या लोकांना सलाम करणे हे सर्व इस्लामचे दीपस्तंभ आहेत. मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा बंधू आहे. एकमेकांनी दुसऱ्यावर अत्याचार करू नये. त्याला अपमानित करू नये. जर कुणी दुसऱ्या मुस्लिमाचा अपमान करत असेल तकर त्याला वाईट समजण्यासाठी हे कारण पुरेसे आहे. प्रत्येक मुस्लिमावर दुसऱ्या मुस्लिमाचे रक्त सांडणे, त्याची मालमत्ता हडप करणे आणि त्याची मानहानी करणे निषिद्ध आहे.
ह. उमरो बिन अतबा (र.) म्हणतात की मी प्रेषितांना विचारले, इस्लाम म्हणजे काय? त्यांनी उत्तर दिले, ‘सभ्य बोलणे आणि लोकांना जेवू घालणे.’ मी परत विचारले, ईमान (श्रद्धा) काय आहे? ‘संयम ठेवणे आणि मनाची उदारता.’ कोणता इस्लाम उच्चतम आहे? मी पुन्हा विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून लोक सुरक्षित असतील. तसेच उदार मनाने लोकांशी संभाषण करणे.’ (हदीस : मुस्नद अहमद)
सर्वांत श्रेष्ठ मुस्लिम तो जो चारित्र्यसंपन्न असेल. प्रेषित म्हणतात, सर्वश्रेष्ठ ईमान (श्रद्धा) ही आहे की तुम्ही जिथे कुठे असाल अल्लाह तुमच्या संगे आहे याची जाणीव ठेवणे होय.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा असा उच्चा केला की ‘अल्लाहची शपथ, ती व्यक्ती श्रद्धावंत होऊच शकत नाही ज्याच्या वाईट वृत्ती आणि इजा पोहोचण्यापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल.’
ती खूप आनंदात होती. तिला बाबांसोबत बाहेर जायचे होते ना. आईने तिला छान तयार केले होते. बाबांचा हात धरून बाहेर पडताना तिला व तिच्या आईला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार? कदाचित थोडाही संशय आला असता तर तिच्या आईने तिला बाबांसोबत जावू दिले नसते. बाबांसोबत चालता-चालता ती एका सुनसान रानात आली होती. तेथे बाबांनी माती खणायला सुरुवात केली. ते खणत असताना जी माती बाबांच्या कपड्यांवर, तोंडवर लागत होती ते तिला बघवत नव्हते. आपल्या लहानशा हातांनी ती बाबांच्या अंगावरची माती झटकत, तोंडावर लागलेली माती आपल्या चिमुकल्या हातांनी साफ करत. हे करत असताना तिचे प्रश्न चालू होते की बाबा आपण कोठे आलो आहोत ? आपल्याला तर फिरायला जायचे होते ना? ही मध्येच आपण काय काम काढलात? बाबा ! हा खड्डा कशासाठी? बाबा लवकर चला ना कधी जायचंय? पण बाबा काही न सांगता आपल्या कामातच मग्न होते. खड्डा पूर्ण करून झाल्यावर त्यांनी त्या चिमुकलीला खड्ड्याच्या कडेला उभी करून त्यात तिला ढकलून दिले. ती ओरडत होती परंतु, बाबा तिच्या अंगावर सरसर माती टाकत होता, ती रडत होती, ओरडत होती बाबा हे काय करता, मला वाचवा ना! बाबा असे करू नका म्हणत तिने आपले प्राण सोडले. अशा सत्य घटना प्रेषित सल्ल. जगात येण्याच्या पूर्वी सतत होत असत.
स्वतःच्या मुलीला खड्डा खणून जिवंत पुरणे किती ही क्रूरता? त्या माणसाला दया नाही का आली? एवढे निर्दयी कसे होऊ शकते कोणी? ही सत्य घटना त्या इसमाने येऊन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सांगितली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सलम् यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्यालाही डोळ्यांत आले असेल अश्रू नसेल आले तर आणण्याचा प्रयत्न करा, तरी येत नसतील तर रडल्यासारखा चेहरा करून आपले संवेदनशीलतेचे पुरावा द्या, स्त्री जातीसाठी. स्त्रीची अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. काही कबिले आपल्या मुलींना जिवंत पुरून टाकायचे तर काही प्रसूतीच्या वेळेस एक खड्डा तयार ठेवायचे. मुलगी जन्मल्याबरोबरच तिला पुरून टाकायचे. आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खंडा खाण्याची गरज नाही नऊ महिने वाट पहायची सुद्धा गरज नाही. चौथा महिना झाला की तपासणी करून स्त्री भ्रून हत्या करण्यात येते. यावर कायदेशीर प्रतिबंध असले तरी हे कुकर्म थांबत नाही. केवळ आपल्या भारतातच दरवर्षी पाच लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात आणि जगात याबाबतीत भारत सर्वप्रथम येतो. लग्नाच्यावेळी भली मोठी भीक (हुंडापद्धती) मुळे लोक लेकीला ओझे समजतात व या जगात येण्याचा त्यांचा अधिकार देत नाहीत. भारताच्या मागे चीन आणि पाकिस्तान चा नंबर येतो. भारतातही आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यातही परळी वैजनाथ ते गर्भपात केंद्राचे गाव म्हणून कुख्यात आहे.
महाराष्ट्रातील सहा वर्षाखालील बालिकांचे दरहजारी प्रमाण 913 मुली असे होते. 2001 साली हे प्रमाण 883 पर्यंत घसरले. गेल्या दहा वर्षात 4 लाख 68 हजार 480 स्त्री भ्रूणहत्या झाल्याचे नमूद केले आहे. 1994 मध्ये गर्भलिंगनिदान करणे हे फौजदारी कृत्य म्हणून घोषित केले गेले. व सोनोग्राफी करतांना लिंग सांगणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद केली गेली. पीसीपीएनडीटी अॅ्नट गर्भधारणापूर्वी व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध करणारा कायदा 1994 असे म्हणतात. केंद्र सरकारचा निर्णय 1 जानेवारी 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला तरी आजही स्त्रीला अशक्त तुच्छ समजलं जातं. जावईचे नखरे उचलणे पसंत करत नाही. अरबमध्ये रोजच्या युद्धामध्ये लेकिला कैदी बनविले जायचे. स्त्रीची सुरक्षा करावी लागते आणि ती सुरक्षित नव्हती म्हणून तिला पसंत नाही करायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार बंद झाला. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ आणि स्मरण करा ती वेळ जेव्हा जीवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली.’’ (सुरे अलत्नवीर आयत क्र.9). एकीकडे मुलीसोबत अत्याचार करण्यास नरकाचे यातनामय जीवन तर दूसरीकडे त्या लोकांना आनंदाची वार्ता देण्यात आली ज्यांनी मुलीवर अत्याचार न करता सद्व्यवहार केला आणि मुला-मुली दोघांनाही समान वागणूक दिली. त्यांच्याशी वागतांना कुठलाही भेदभाव केला नाही किंवा करत नाही. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास रजि. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे कथन कथित करतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्या माणसाला मुलगी झाली त्याने न तिला जीवंत पुरावे न गाडावे न तिला अपमानास्पद वागणूक द्यावी न तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे तेव्हा ईश्वर त्याला जन्नतमध्ये दाखल करेल. (अबु दाऊद)
म्हणजेच 1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही. इस्लाममध्ये मुलीच्या पालनपोषणास विशेष प्रोत्साहन दिले आहे व या कामाला एक पवित्र कर्तव्य घोषित केले आहे. बुखारी व मुस्लिमच्या हदीसमध्ये आलेले आहे की, कन्या देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमाविले आणि त्या माणसाने आपल्या मुलीशी सद्व्यवहार केला तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार त्याच्या नरकाग्नीपासून बचावाचे साधन होईल.’’ जो माणूस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरूण होईपर्यंत करील निवाड्याच्या दिवशी मी आणि तो असे असतील हे सांगतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली दोन बोटे जोडली. (मुस्लिम)
ज्ञान नसेल तर जगून काय उपयोग
स्त्री म्हणजे निम्मी मनुष्य जात. मानव समाजाचा अर्धा वाटा तिचाच. स्त्री ज्ञानी तर पुढची पीढिही ज्ञानी. म्हणून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणावरही जोर देण्यात येतो. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी महिलांना दीन आणि दुनिया दोघांचेही ज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले. ज्ञानाशिवाय, आचरण अशक्य असते. म्हणून धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे स्त्री पुरूष दोघांवरही अनिवार्य आहे. ज्ञान प्राप्त करणे स्त्रीचा कायदेशीर हक्क आहे. स्त्री जर अज्ञानी असेल तर लग्नाआधी तिच्या पित्याचे व लग्नानंतर तिच्या पतीचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी तिला ज्ञान द्यावे. अथवा अशी व्यवस्था करावी की तिला शिक्षण मिळावे. नैतिक मर्यादांचे पालन करून शिक्षण मिळविण्यासाठी ती घराबाहेरही पडू शकते आणि तिच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही. प्रेषित सल्ल. यांच्या काळात एकीकडे मुलांना कुरआन तोंडपाठ असायचे तर दूसरीकडे घुडस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजीतही त्या तज्ञ असायच्या. एवढेच नव्हे तर वैद्यकीय ज्ञानही मुलींना अवगत होते. इलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या 1847 मध्ये जगातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आनंदीबाई जोशी कल्याण या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून 1886 मध्ये पुढे आल्या. हजरत आएशा रजि. यांच्या विवाहावर आक्षेप घेणाऱ्यांना माहीत असायला हवे की, आनंदीबाईचा विवाह ही वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे गोपाळरावांशी झाला होता. असो त्या एकच वर्षे डॉ्नटर म्हणून जगल्या. 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
रूफैदा अल असलमिया या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉ्नटर. खरं तर जगातल्याच पहिल्या महिला डॉ्नटर म्हटले तरी बरोबर होईल. कारण त्या आजपासून 1400 वर्षापासून मस्जिदे नबवीजवळ आपली वैद्यकीय सेवा देत. शिक्षणाच्या क्षेत्रात माननीय आएशा रजि. माननीय सफिया रजि., माननीय आसमा बिन बिन्ते अबुबकर रजि., माननीय फातेचा बिन कैस रजि., माननीय उम्मे हबीबा रजि., माननीय खौला रजि. यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो स्त्रिचा विवाह. अनादी काळापासून स्त्रीला विवाहाच्या बाबतीत तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिच्या परिवारातील आई-वडिल आणि बुजूर्ग मंडळी ज्या व्यक्तीबरोबर विवाह करवून देतील निमुटपणे तिला तो निर्णय स्वीकारावा लागेल. त्याविरूद्ध एक शब्दही बोलण्यास तिला अधिकार नव्हता. कोणत्याही मुलीचे आईवडिल तिच्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि मुलीचे शत्रू नसतात आणि शुभचिंतक असतात. मुलींपेक्षा मुलीच्या चांगल्या-वाईटाची त्यांना जास्त काळजी असते. म्हणून तिच्या चांगल्या भविष्याचे निर्णय तेच घेऊ शकतात ही धारणा काही प्रमाणात सत्य असली तरी ही गोष्ट कधीच योग्य नाही की स्त्रीवर तिच्या आवडीविरूद्ध विवाहाचा निर्णय थोपवावा. इस्लाममध्ये विवाहाच्या बाबतीत पालकाच्या मर्जीला महत्व जरूर दिलेले आहे परंतु, विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेमध्ये मुलींच्या पसंतीचीही नोंद घेण्यास -(उर्वरित आतील पान 7 वर)
समाजाला बाध्य केलेले आहे. माननीय अबु हुरैरा रजि. प्रेषितांचे कथन करतात की, त्यांनी एकवेळेस सांगितले, ’’ विधवा आणि तलाकपीढित स्त्रीचा विवाह त्यांचे मत माहित होईपर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगीशिवाय होवू शकत नाही. (बुखारी व मुस्लिम). यावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सोबती (रजि.) यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तीची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तीचे मौन धारण करणे हीच तिची परवानगी समजण्यात येईल. जर एखाद्या स्त्रीच्या पालकाने तिचा विवाह केला व त्यास स्त्रीने या विवाहास मान्यता दिली नाही तर हा विवाह रद्दबातल ठरणार. माननीय खन्सा (रजि.) यांचा विवाह त्यांच्या मर्जीविरूद्ध वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी तो रद्दबातल ठरविला.
आपल्याला कोणी भेट वस्तू दिली तर काय होते? खूप आनंद होतो आणि भेट देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण होते. मग आपणही त्याला काही भेट द्यावी, असे वाटते. महेर एक सुंदर भेट आहे. जी पती आपल्या पत्नीला देतो. नवीन जीवनाची सुरूवात या प्रकारे एका सुंदर पद्धतीने होते.
’’ आणि स्त्रीयांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता’’ महेर हा केवळ स्त्रीचाच अधिकार आहे. शरियतद्वारे महेर किती असावे याची काही मर्यादा निश्चित केलेली नाही. ती माणसाच्या आर्थीक कुवतीच्या प्रमाणात कमी जास्त असू शकते. इस्लामने महिलांवर पैसा कमाविण्याची जबाबदारी अजिबात टाकली नाही. लग्नाआधी पिता व लग्नानंतर पती यांच्यावर तिच्या खर्चाची जबाबदारी टाकलेली आहे. घराचे काम करणे बंधनकारक नाही. उलट जर कोणती स्त्री ते करत असेल तर तर हे तीचे कुटुंब प्रमुखावर उपकार समजण्यात येईल व तिलाही पुन्य मिळेल. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य व संपत्ती बाळगण्याचा अधिकार तिला आहे. आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क आहे. हा अधिकार इस्लामने 1443 वर्षापूर्वी दिला. तर भारतात आपल्या घटनेद्वारे 1956 मध्ये तो महिलांना मिळाला.
स्त्रीच्या अब्रूवर दोन प्रकारे हल्ले होतात. एक तिच्यावर व्याभीचाराचा आरोप लावून तिच्यावर मानसिक हल्ला केला जातो आणि दूसरे म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक अत्याचार दिला जातो. आपल्या देशात दररोज साधारणपणे 77 बलात्काराच्या घटना होतात. एखाद्या स्त्रीवर व्याभीचाराचा आरोप सिद्ध झाला तर तिला 80 फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. जबरी लैंगिक अत्याचार केल्यास बलात्काराला तो अविवाहित असेल तर 100 फटके व विवाहित असेल तर रजम म्हणजे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने दिलेली आहे. जी शिक्षा नैसर्गिक आहे. याचा अंदाज अनेक धर्मनिरपेक्ष लोकांनी याच शिक्षेची मागणी निर्भया, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डी, आसिफा इत्यादींच्या वेळी केली होती. या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास बलात्काराचे प्रमाण निश्चित कमी होणार हे एक सत्य आहे. ज्या देशात या शिक्षेची अंमलबजावणी होते त्या देशाचे बलात्काराचे प्रमाण शुन्यवत आहे. प्रेषित सल्ल. यांच्या काळात तर एक महिला अंगभर सोन्याचे दागिने घालून प्रवास करीत होती. तेव्हा तिला जनावराव्यतिरिक्त कोणाची भीती नव्हती.
प्रेषित सल्ल. यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहेत. त्यांना अल्लाहच्या आदेशावरून जे बदल समाजामध्ये घडवून आणले त्याचे दूसरे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच मिळणार नाही.
घडस्फोटाला भयानक समजणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, कोणत्याही दाम्पत्याच्या जीवनात अगदी शेवटच्या टोकाचा क्षण येतो. जेव्हा पती व पत्नीच्या स्वभावात अनुकूलता व समन्वय नसल्याने संसाराची गाडी चालविणे अवघड होते. दररोजच्या भांडणामुळे बळजबरीने एकत्र राहून जीवन नरकासारखे होते. तेव्हाच शरियतने घडस्फोटाची परवानगी दिली. जेणेकरून दोघांना वेगळे होवून नवीन जोडीदार निवडून शांतीने जगता यावे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल किती जरी लिहिले तरी मन भरत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. वाचकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सखोल अभ्यास केल्याशिवाय, त्यांनी स्त्रीयांवर केलेले उपकार कळू शकत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की वाचकांनी प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा खोल अभ्यास करावा. अल्लाह सर्व पुरूषांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून स्त्रीयांचे अधिकार देण्याची सद्बुद्धी देवो, आमीन.
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”
नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)
संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत.
जफर आदमी उसको न जानीएगा
हो वो कितना ही साहेबे फहम व जका
जिसे ऐश में यादे खुदा न रही
जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा
जकाल ’’मानवी गरजां’’मध्ये लोकांच्या ’इच्छा-आकांक्षा’ ही सामील झाल्याने लोकांचे आर्थिक वर्तन बिघडले आहे. यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक लोकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा जणू मॅनिआच झालेला आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी वाढते आहे. रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून अशी मागणी सातत्याने वाढत राहील, याची काळजी कार्पोरेट जगताकडून घेतली जात असल्यामुळे आदर्श आर्थिक वर्तन कसे असावे, यावर विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.
संपत्ती गोळा करण्याची इच्छा
मुफलिसी हिस-ए-लताफत को मिटा देती है
भूक आदाब के सांचे में ढल नहीं सकती
प्रत्येक माणसाला संपत्ती गोळा करण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो. त्यातून प्राप्त केेलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी तो स्वतंत्र असतो. यातूनच माणसाचे आर्थिक वर्तन ठरत असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात, ’’गरज’’ या शब्दात चंगळवादी इच्छा आकांक्षांची सरमिसळ झाल्यामुळे बाजाराचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सातत्याने बिघडत आहे. श्रीमंत माणसे वाट्टेल ती किंमत देऊन त्यांच्या मनाला येईल त्या वस्तू मग गरज असो की नसो खरेदी करत असतात. त्यामुळे गरजेच्या अनेक वस्तू विनाकारण महाग होत जातात. याचा परिणाम कमी उत्पन्न गटातील लोकांवर होतो. त्यांच्यापर्यंत त्या वस्तूही पोहोचणे दुरापास्त होवून जातात ज्या जीवनावश्यक असतात. जी गत वस्तूंची तीच गत अत्यावश्यक सेवांची. उदा. शिक्षण किंवा आरोग्य सेवा. संपत्ती कमावण्यावर कुठलेही नैतिक बंधन नसल्याकारणाने व कायदेशीर बंधन झुगारण्याजोगे असल्याकारणाने अनेक लोक भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती कमावतात व त्यातून दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा खरेदी करतात. साहजिकच मग या दोन्ही जीवनावश्यक सेवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या हाताबाहेर जातात आणि ’आहे-रे’ आणि ’नाही-रे’ या दोन सामाजिक गटातील दरी अधिकाधिक रूंद होत जाते.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या विषमतेवर उपाय नाही. म्हणूनच जगात दिवसागणिक विषमता वाढत आहे. श्रीमंतांची डोळे दिपवणारी आर्थिक वर्तणूक पाहून गरीबांची मानसिक स्थिती बिघडत आहे. त्यातूनच गुन्हेगारीचा जन्म होत आहे. म्हणूनच आज संघटितरित्या केली जाणारी गुन्हेगारी आधुनिक जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. ’गन कल्चर’ वाढत आहे. माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जात आहेत. नैतिकता रसातळाला जाऊन पोहोचली आहे. अमाप संपत्तीतून राजकीय पदे व प्रसंगी न्याय खरेदी करून स्वतःला मजबूत करण्यात श्रीमंतांना यश मिळत असल्याने लायक परंतु गरीब लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे.
आर्थिक वर्तणुकीचे इस्लामी नियम
भूक में इश्क की तहेजीब भी मिट जाती है
चाँद आकाश में थाली की तरह लगता है
नवश्रीमंतांच्या चमकदार चंगळवादी जीवन शैलीपासून नैसर्गिकरित्या गरीबांना इर्ष्या होत असते. त्या इर्षेतून जागतिक स्तरावर गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक वर्तन बिघडल्या कारणाने सर्वत्र आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झालेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये यावर उपाय नाही. उलट हे आर्थिक वर्तन बिघडण्यासाठी हीच व्यवस्था कारणीभूत असल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. माणसाची आर्थिक वर्तणूक नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक व्यवस्था कुरआनमध्ये दिलेली आहे. परंतु हा एवढा दुर्लक्षित विषय आहे की, बहुसंख्य मुस्लिम लोकांमध्ये सुद्धा यासंबंधीची पुरेशी जागरूकता नाही.
कुरआनच्या शिकवणींचा सार असा आहे की, पृथ्वीच नव्हे तर सर्व सौर मंडलाचा मालक ईश्वर आहे. त्यातील सर्व संपत्तीचा मालक ईश्वर आहे. माणसं जन्माला येतात आणि आपल्या ईश्वरदत्त कौशल्यातून त्या ईश्वरीय संपत्तीचा काही भाग हस्तगत करतात त्याचा वापर करतात व सर्व संपत्ती येथेच ठेवून मरून जातात. कुरआनने माणसाच्या संपत्ती कमावण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत व खर्च करण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत. हे प्रतिबंध, ’’हलाल आणि हराम’’ या सज्ञेच्या माध्यमातून जगाला परिचित आहेत. कुरआनमध्ये हराम गोष्टी कोणत्या आहेत याची यादीच दिलेली आहे. त्या वगळता बाकी सर्व गोष्टी हलाल आहेत. इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा हा पहिला नियम आहे. कुरआनमध्ये असे म्हटलेले आहे की, ’’आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.’’ (सुरे आराफ : आ.क्र.10)
या आयातीच्या शब्दरचनेवर गांभीर्याने विचार केला असता खालील गोष्टींचा बोध होतो. यात सुरूवातीलाच ईश्वराने मानवाला संबोधित करत म्हटलेले आहे की, आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले. याचा अर्थ मूळ अधिकार माणसाचे नसून ते ईश्वराने प्रदान केलेले आहेत. स्पष्ट आहे मुळात अधिकार ज्याने प्रदान केलेले आहेत त्याच्याच मर्जीप्रमाणे त्या अधिकारांचा वापर केला जावा. तसा तो केला जात नसेल तर यात माणसाचा कृतघ्नपणा दिसून येतो. म्हणून आयातीच्या दूसऱ्या भागामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला अधिकार दिले पण तुम्ही लोक माझ्याप्रती कमी कृतज्ञ आहात. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. फार महत्त्वाचे मत नोंदवितात ते खालीलप्रमाणे,
’’ इन्सान को दुनिया में जिंदगी बसर करने के लिए जिस हिदायत व रहेनुमाई की जरूरत है, अपनी और कायनात की हकीकत और अपने वजूद की गर्ज व गायत समझने के लिए जो इल्म उसे दरकार है, और अपने अख्लाक (चांगल्या सवयी), तहेजीब (सभ्यता), मुआशरत (सामाजिक) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिए जिन उसूलों का वो मोहताज है, उन सबके लिए उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहेनुमा तस्लीम करना चाहिए और सिर्फ उसी हिदायत की पैरवी (अनुसरण) इख्तीयार करनी चाहिए जो अल्लाहने अपने रसूलों के जरीये से भेजी है. अल्लाह को छोडकर किसी दूसरे रहेनुमा की तरफ हिदायत के लिए रूजू करना और अपने आपको उसके रहेनुमाई के हवाले कर देना इन्सान के लिए बुनियादी तौर पर एक गलत तरीकेकार है. जिस का नतीजा हमेशा तबाही के सूरत में निकला है और हमेशा तबाही की सूरत ही में निकलेगा.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन : खंड 2, पान क्र . 7, अनुच्छेद क्र. 4).
या आयातीचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की, जीवन जगण्यासाठी ईश्वराने मानवाला जे अधिकार आणि वस्तू प्रदान केलेले आहेत ही त्याची केवळ, ’’कृपा’’ आहे. म्हणून त्यांचा वापर आवश्यक तेवढा व न्याय पद्धतीने करावा, असे केल्यास कोणालाच कधीही कसल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. परंतु भ्रष्ट पद्धतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी जी पद्धत जागतिक स्तरावर रूढ झालेली आहे व भांडवलशाही ने त्या पद्धतीला वैधता प्रदान केेलेली आहे त्यातून माणसाचे आर्थिक वर्तन बिघडले असून, त्याची शिक्षा माणसाला या जीवनातही मिळणार व मरणोपरांतही मिळणाार एवढे नक्की. चुकीच्या सामाजिक आणि आर्थिक वर्तनातून जगामध्ये जी अव्यवस्था माजलेली आहे त्यामुळे, ’’नाही रे ची’’ जी हानी होत आहे तिची भरपाई संसाधनांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाच करावी लागणार आहे. म्हणूनच आपण पाहतो भ्रष्ट मार्गाने अनेकजण गडगंज संपत्ती कमवूनही समाधानी व आरोग्यदायी जीवन जगताना दिसून येत नाहीत. उलट मृत्यूपरांत जीवनामध्ये सुद्धा त्यांना ईश्वरासमोर खजील व्हावे लागेल. तो त्रास वेगळाच. कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा दूसरा नियम आहे. न्याय एक असा ईश्वरी गुण आहे ज्याला माणसाच्या प्रवृत्तीमध्येच ईश्वराने सामील केलेले आहे. म्हणूनच माणसाला न्याय आवडतो व अन्यायाची चीड येते. यावरूनच वाचकांच्या लक्षात एक गोष्ट येईल की जगात चुकीचे आर्थिक व सामाजिक वर्तन करून ज्यांनी संपत्तीच्या बळावर येथून कशीबशी सुटका जरी करून घेतली तरी मरणोपरांत त्यांची गाठ ईश्वराशी आहे, हे सत्य कोणालाच नाकारता येण्यासारखे नाही. कारण जीवनापेक्षा जास्त शास्वत सत्य मृत्यू आहे.
आर्थिक वर्तणुकीचा तीसरा सिद्धांत वैध मार्गाने संपत्ती कमाविणे आहे. हे प्रत्येकावर फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे योग्यता असूनही जर कोणी वैध मार्गाने काम न करता निरूद्देश जीवन जगत असेल तर तो ही ईश्वराच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि आपल्या, ’’योग्यते’’चा दुरूपयोग करून भ्रष्ट पद्धतीने जीवन जगत असेल तर तो ही गुन्हेगार आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (सुरे जुमआ : आयत नं. 10)
या ईश्वरीय आदेशातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक अजानची आवाज झाल्याबरोबर मुस्लिमांनी आपल्या सर्व व्यावसायिक गतीविधी तात्काळ थांबवायला हव्यात व नमाजसाठी मस्जिदीकडे जावयास हवे. याचा अर्थ व्यावसाय करणे आवश्यक आहे मात्र नमाज सोडून व्यावसाय करणे प्रतिबंधित आहे. जरी यात शुक्रवारचया नमाजाचा विशेष उल्लेख आहे तरी अजान होताच व्यवसाय थांबविण्याचा हा आदेश सर्वच नमाजांसाठी लागू असल्याचे मत इस्लामी विद्वानांचे आहे. हा आर्थिक गतीविधींचा चौथा सिद्धांत आहे. आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती गोळा करण्यासाठी काम धंदा करणे, व्यावसाय करणे हे प्रत्येकावर अनिवार्य करण्यात आले आहे. याचा दूसरा अर्थ असा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा त्याग करणे (संन्यास घेणे) हराम आहे. तसेच जीवनावश्यक संसाधने गोळा करण्यामध्ये कुचराई करणे हे सुद्धा ईश्वराला नापसंत आहे. म्हणून मुस्लिमांमधील एक वर्ग जो जीवनावश्यक आर्थिक गतिविधींपेक्षा धार्मिक गतिविधींनाच अधिक महत्त्व देतो. त्याचे वर्तनही या आयातीमध्ये नमूद ईश्वरीय आदेशाविरूद्ध आहे. थोडक्यात माणसाची आर्थिक वर्तणूक ही संतुलित असावी. आर्थिक संसाधने गोळा करताना ईश्वर आणि त्याच्या आदेशांची हर हाल जपणूक केली जावी. संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत. हा इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा पाचवा नियम आहे. थोडक्यात आर्थिक वर्तणुकीच्या ईश्वरीय नियमांचा परिचय देशबंधू तसेच बिगर इस्लामी जगाला करून देण्याची मुख्य जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील बहुतेकांचे स्वतःचेच आर्थिक वर्तन या नियमांउलट असल्याने एवढ्या सुंदर व्यवस्थेचा परिचय आज जगाला नाही. म्हणून ही योग्य वेळ आहे, आता मुस्लिमांनी आपल्या वर्तनात सुधारणा करून ईश्वराला अपेक्षित आर्थिक वर्तणुकीच्या नियमांचा सर्वांना परिचय करून द्यावा. त्याशिवाय, आर्थिक शिस्त राखली जाणार नाही व आर्थिक शोषण कमी होणार नाही. पर्यायाने ’नाही रे’ गटातील शोषण असेच सुरू राहील. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आमचे आर्थिक धोरण तुला आवडत असलेल्या नियमांप्रमाणे सुधारण्याची व जगाला त्याचा परिचय करून देण्याची संधी व शक्ती प्रदान कर.’ आमीन.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही धनसंपत्ती आणि मालमत्ता गोळा करू नका. तुमच्यामध्ये दुनियेची लालसा घर करेल.’’
ह. आयेशा (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणत होते की, ‘‘ज्या कुणाला अल्लाहच्या भेटीची आवड असते, अल्लाहदेखील त्याच्या भेटीस पसंत करतो. आणि जो व्यक्ती अल्लाहच्या भेटीस पसंत करीत नाही, अल्लाहदेखील त्याला भेटण्यास नकार देतो.’’ ह. आयेशा (र.) यांनी यावर विचारले की अल्लाहच्या भेटीस पसंत न करण्याचा अर्थ काय? कुणीही मृत्यू पसंत करत नाही. असे असेल तर आमच्यापैकी सर्वच जण मृत्युला पसंत करत नाहीत.
प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वर्ग, अल्लाहच्या देणग्यांविषयी सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात अल्लाहशी भेट व्हावी अशी इच्छा होते. अशा माणसाशी अल्लाह देखील भेटू इच्छितो. आणि दुसरीकडे नाकारणाऱ्या माणसाला जेव्हा अल्लाहचा प्रकोप, त्याच्या नाराजीबाबत कळवले जाते तेव्हा असा माणूस अल्लाहच्या भेटीला पसंत करत नाही.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे, कयामतच्या दिवशी अल्लाह अशा लोकांना यातना देणार नाही ज्यांनी या जगात अनाथांशी दयेचा व्यवहार केला असेल. त्यांच्याशी मायाळूपणे बोलले असतील आणि त्यांच्या अनाथावस्थेची आणि दुर्बलतेची त्यांना कीव वाटली असेल. आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्यांवर दबाव टाकत नसेल.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘हे मुहम्मदच्या उम्मतचे लोकहो, मला शपथ आहे त्या अस्तित्वाची ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे. अल्लाह अशा लोकांच्या दानधर्माला स्वीकारणार नाही ज्याचे नातेवाईक त्याच्याकडून वंचित राहिले असतील.’’ (हुरैरा, तिबरानी)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत
बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत
स्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो.
व्हॅलेंटाईन डे चा इतिहास
अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लाउडियस नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्ध पिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व 14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.
या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचेही व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केला. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या लोकांनी केले.
व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण
अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या आकडेवारीप्रमाणे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज कार्डस एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा.
मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली आणि म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही.
मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता.
इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाउले आधी संगीत, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली. 18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांच्या ठोकळ्यांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे शिल्प तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या वुड पोर्नोग्राफीने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.
1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्सनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली.
अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो.
आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज अश्लील संवादासह उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलांवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात.
ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज यांचा सनदशीर मार्गाने व जमेल तसा विरोध करावा.
मुस्लिमांची जबाबदारी
सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की,
1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).
2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).
व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.
मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकांत कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. काही वर्षापूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री कर्नाटकाच्या बेंगलुरू शहरामध्ये नवीन वर्षे साजरे करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणींचे सामुहिक विनयभंग व वस्त्रहरण करण्यात आले. हा इतिहास पाहता मुलींनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पोर्नोग्राफीच्या आहारी गेल्यामुळे आज अनेक पुरूष हे लैंगिकदृष्ट्या विकृत झालेले आहेत. वरूण सर्वच पुरूष सभ्य दिसतात. पण त्यांच्यात कोण विकृत आहे याचा अंदाज मुलींना करता येत नाही. म्हणून त्या अशा लांडग्यांच्या हल्ल्यांना बळी पडतात. अशा अनेक घटना रोज वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात. तरी त्याची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. हे आपले सामाजिक दुर्दैव आहे. याचे कारण असे की, अनैतिक गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासह जगण्याची सवय माणसांना लागते.
या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्याने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.
यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाही. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां! हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35).
तरी पालकांनों व मुलींनो व्हॅलेंटाईन डे च्या जाळ्यात अडकू नका. स्वतःची सुरक्षा स्वतः करा. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, व्हॅलेंटाईन डे सारख्या अश्लील उत्सवामध्ये सामील न होण्याची समज व शक्ती आम्हा सर्वांना प्रदान कर आमीन.
- एम.आय. शेख