Latest Post

- डॉ. अब्दुल मुघनी
     आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात गुरफटून, तो पशू आता आपल्या शारीरिक, मानसिक आर्थिक लहरींचे वेडाचे दहशतवादी प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडला आहे. या संदर्भात डॉ. अब्दुल मुघनी यांनी सुंदर सोप्या पद्धतीने या जटील समस्येचा उलगडाचा पुस्तिकेत केला आहे. दहशतवादावरील उपाय सांगतांना त्यांनी कुरआन हदीसचा उल्लेख करून दहशत हत्येपेक्षा सुद्धा जास्त वाईट आहे; हे सांगितले आहे.


आयएमपीटी .क्र. 07    -पृष्ठे - 16    मूल्य - 10           आवृत्ती - 7 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/m980h98yoi3hpda92p6n2gi6mlbvkug4


माननीय सहल इब्नी अल-खजलिय्या (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एका उंटाजवळून जात होते. त्या उंटाची पाठ आणि पोट एक झाले होते. हे पाहून पैगंबर म्हणाले, ‘‘या मुक्या जनावरांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा, त्यांच्यावर चांगल्या स्थितीत स्वार व्हा आणि चांगल्या स्थितीत त्यांना सोडून द्या.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : जनावरांना उपाशी ठेवणे म्हणजे अल्लाहच्या कोपाला आमंत्रण देणे होय. जेव्हा मनुष्य काम घेऊ इच्छितो तेव्हा त्याला खूप खाऊ-पिऊ घालतो आणि इतके काम घेऊ नये की त्या जनावराची थकून दुरवस्था होईल.
माननीय अब्दुल्लाह बिन जफर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) एका अन्सारीच्या बागेत गेले. त्या बागेत एक उंट बांधून ठेवण्यात आला होता. त्या उंटाने पैगंबरांना पाहिले तेव्हा त्याने दु:खदायक आवाज काढला आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पैगंबर त्या उंटाजवळ गेले आणि मायेने आपला हात त्याच्या मदार व मानेवरून फिरविला तेव्हा त्या उंटाला बरे वाटले. पैगंबरांनी विचारले, ‘‘या उंटाचा मालक कोण आहे? हा उंट कोणाचा आहे?’’ तेव्हा एक अन्सारी तरूण आला आणि तो म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा उंट माझा आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुला अल्लाहचे भय नाही काय? या मुक्या जनावराच्या बाबतीत ज्याला अल्लाहने तुझ्या ताब्यात दिले आहे? हा उंट (आपले अश्रू व आपल्या आवाजाद्वारे) माझ्याकडे तक्रार करीत होता की तू याला उपाशी ठेवतोस आणि त्याच्याकडून खूप काम घेतोस.’’ (हदीस : रियाजुस्सालिहीन)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुम्ही वसंत ऋतुमध्ये प्रवास कराल तेव्हा उंटाना त्यांचा वाटा जमिनीतून द्या आणि जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात प्रवास कराल तेव्हा त्यांना भरभर चालवा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : जेव्हा वसंत ऋतु असेल आणि जमिनीवर सर्वत्र हिरवेगार गवत उगवले असेल तेव्हा प्रवासात उंटाना चरण्याची संधी द्या. जेव्हा उन्हाळा असेल आणि जमिनीवर गवत नसेल तेव्हा वाहने (उंट) वेगाने चालवा जेणेकरून लवकरात लवकर लक्ष्य गाठता यावे आणि वाटेत उद्भवणाऱ्या संकटांपासून बचाव व्हावा.
माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने प्रत्येक काम वैध पद्धतीने करणे अनिवार्य ठरविले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या (जनावरा) ची हत्या कराल तेव्हा त्याला चांगल्याप्रकारे ठार करा आणि जेव्हा तुम्ही एखादे जनावर कापाल तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे कापा. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या सुरीला धार करावी आणि कापल्या जाणाऱ्या जनावराला त्रास होऊ नये (उशिरापर्यंत तडफडण्यासाठी सोडून देऊ नये. अशाप्रकारे त्याच्या मानेवर सुरी चालवा जेणेकरून त्याचे प्राण त्वरित निघून जावेत).’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना या गोष्टीची मनाई करताना ऐकले की एखाद्या चार पायांच्या जनावराला अथवा त्याच्याव्यतिरिक्त एखाद्या चिमणीला अथवा मनुष्याला बांधून उभे केले जावे आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जनावराच्या तोंडावर मारणे आणि त्याच्या तोंडावर डाग देण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याने एखाद्या गौरय्या (एक प्रकारचा जलपक्षी) अथवा त्यापेक्षाही लहान पक्ष्याला विनाकारण मारण्यात आले तर त्याबाबतीत अल्लाहकडून विचारणा होईल.’’ विचारण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! पक्ष्यांचा काय अधिकार आहे?’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘त्यांचा अधिकार हा आहे की त्यांना कापून खाल्ले जावे आणि मुंडके कापल्यानंतर त्यांना तसेच फेकून दिले जाऊ नये.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जनावराची शिकार मांस खाण्यासाठी वैध आहे परंतु आनंद घेण्यासाठी शिकार करणे इस्लाममध्ये मनाई आहे. आनंदासाठी शिकार करणे म्हणजे मनुष्य प्राण्याची शिकार करतो परंतु त्याचे मांस खात नाही तर त्याला तसेच मारून फेकून देतो.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो आपली वस्त्रे (विजार, लुंगी वगैरे) घमेंडीत जमिनीवर फरफटत नेईल, त्याच्याकडे अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी पाहणार नाही. (कृपादृष्टी टाकणार नाही.)’’ 
अबू बक्र सिद्दीक (रजि.) म्हणाले, ‘‘माझी विजार ढिली होऊन घोट्याच्या खाली जाते. जर मी सावरली नाही (तर मीदेखील आपल्या पालनकत्र्याच्या कृपादृष्टीपासून वंचित राहीन काय?)’’
पैगंबर म्हणाले, ‘‘नाही. तुम्ही घमेंडीत विजार फरफटणाऱ्यांपैकी नाही. (मग तुम्ही अल्लाहच्या कृपादृष्टीपासून का बरे वंचित राहाल!)’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : माननीय अबू बक्र (रजि.) यांची विजार ढिली असण्याचे कारण त्यांचे पोट आले होते असे नव्हे तर त्यांची शरीरयष्टी तशी होती. अबू बक्र (रजि.) खूपच दुबळे होते. पैगंबर मुहम्मद (स.) असेही सांगितले, ‘‘घमेंडी आणि फुशारकीने टाचेपर्यंत वस्त्र परिधान करणारा अल्लाहच्या कृपादृष्टीपासून वंचित राहील.’’ अबू बक्र (रजि.) यांनी हे संपूर्ण वक्तव्य ऐकले होते आणि त्यांना माहीत होते की ते जाणूनबुजून घमेंडीने तसे करीत नव्हते. परंतु जेव्हा मनुष्याला परलोकाची काळजी वाटू लागते तेव्हा पापाच्या सावलीपासूनही दूर धावू जातो. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) सांगतात, ‘‘हवे ते खा आणि हवे ते परिधान करा मात्र अट अशी की तुम्हाला घमेंडी व वायफळ खर्च करण्याची सवय नसावी.''
अत्याचार
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचार अंतिन निवाड्याच्या दिवशी अत्याचारीकरिता गडद काळोख बनेल.’’
माननीय औस बिन शुरहबील (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा अत्याचारी आहे हे माहीत असूनदेखील त्याची साथ देऊन त्याची शक्ती वाढविणारा मनुष्य इस्लाममधून बाहेर पडला. अर्थात, जाणूनबुजून एखाद्या अत्याचाऱ्याची प्रशंसा करणे आणि त्याची साथ देणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला माहीत आहे की दिवाळखोर व दरिद्री कोण आहे?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘दरिद्री आमच्याकडे त्या व्यक्तीला म्हणतात ज्याच्याकडे दिरहम नसेल आणि सामानही नसेल.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘माझ्या जनसमुदायातील दरिद्री व दिवाळखोर तो आहे जो अंतिम निवाड्याच्या दिवशी आपली नमाज, रोजा आणि जकातसह अल्लाहपाशी हजर होील आणि त्याचबरोबर त्याने जगात कोणाला शिवीगाळ केली आणि एखाद्यावर आळ घेतला असेल, कोणाची संपत्ती हडप केली असेल, कोणाची त्याने हत्या केली असेल आणि कोणाला त्याने विनाकारण मारले असेल तर त्या सर्व अत्याचारपीडितांमध्ये त्याचे पुण्य वाटले जाईल, मग जर त्याचे पुण्य समाप्त झाले आणि अत्याचारपीडितांचे अधिकार अजूनही उरले असतील तर त्यांच्या चुका त्याच्या खात्यात टाकण्यात येतील आणि मग त्याला नरकात फेकून दिले जाईल.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे महत्त्व सांगू इच्छितात. म्हणून अल्लाहचे अधिकार अदा करणाऱ्यांनी दासांच्या अधिकारांचे हनन करू नये अन्यथा ही नमाज, रोजा आणि दुसरे पुण्यकर्म सर्वकाही धोक्यात येतील.
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचारपीडिताच्या हांकेपासून स्वत:चा बचाव करा, कारण तो अल्लाहपाशी आपला अधिकार मागत आहे आणि अल्लाह कोणा अधिकार असणाऱ्याला त्याच्या अधिकारापासून वंचित करत नाही.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये अत्याचारपीडिताची पुकार ऐकण्यापासून रोखण्यात आले आहे. तो अल्लाहसमोर तुमच्या अत्याचाराची हकीकत सांगेल आणि अल्लाह न्यायप्रिय आहे, तो हक्कदाराला त्याच्या अधिकारापासून वंचित करीत नाही आणि याच कारणामुळे तो अत्याचाराला अनेक प्रकारच्या बेचैनी व संकटांमध्ये टाकतो.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कुस्तीमध्ये दुसऱ्यावर मात करणारा शक्तिशाली नसतो तर राग आल्यानंतर स्वत:वर नियंत्रण राखणाराच खरा शक्तिशाली असतो.’’
(म्हणजे रागाच्या भरात तो अल्लाह व पैगंबरांना न आवडणारी कोणतीही कृती करीत नाही.) (हदीस : बुखारी)
माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘राग शैतानी प्रभावाचा परिणाम आहे आणि शैतान आगीपासून बनविण्यात आला आहे आणि आग फक्त पाण्याने विझते, तेव्हा राग आलेल्याने वुजू करावी. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि दुसऱ्या हदीसींमध्ये ज्या रागाला शैतानी प्रभावाचा परिणाम म्हटले आहे तो राग म्हणजे स्वत:साठी आलेला राग. मोमिनला ‘दीन’ (इस्लाम धर्मा) च्या शत्रूवर येणारा राग हे खूपच चांगले गुणवैशिष्ट्य आहे. जर कोणी ‘दीन’ला नष्ट करण्यासाठी येत असेल तर त्यावेळी राग न येणे हे ‘ईमान’च्या कमीचे लक्षण आहे.
माननीय अबू जर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याच्या उभे राहण्याने राग आला तर बसावे. या पद्धतीने राग निघून गेला तर उत्तमच, अन्यथा जमिनीवर पहुडावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि यापूर्वीच्या हदीसमध्ये राग नष्ट करण्याच्या ज्या पद्धती पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितल्या आहेत, अनुभवांती माहीत होते की त्या बरोबर आहेत.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की आदरणीय मूसा (अ.) यांनी अल्लाहला विचारले, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तुझ्या दासांपैकी कोण सर्वाधिक प्रिय आहे?’’ अल्लाहने सांगितले, ‘‘बदला घेण्याची शक्ती असूनदेखील क्षमा करणारा.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो (सत्याच्या विरोधात बोलण्यापासून) आपल्या जिव्हेचे रक्षण करील, अल्लाह त्याच्या दोषांवर पडदा घालील आणि जो आपल्या रागावर नियंत्रण करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला शिक्षेपासून वाचवील आणि जो अल्लाहपाशी क्षमा मागेल अल्लाह त्याला क्षमा करील.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन गोष्टी मोमिनच्या सदाचारांपैकी आहेत, एक ही की जर कोणाला राग आला तर त्याच्या रागाने त्याच्याकडून अवैध काम करवू नये, दुसरी अशी की जेव्हा तो खूश असेल तेव्हा त्याची खुशी त्याला सत्याच्या परिघाबाहेर घालवू नये, आणि तिसरी गोष्ट अशी की सामथ्र्य असूनदेखील दुसऱ्याची वस्तू प्राप्त करू नका, ती घेण्याचा त्याला अधिकार नाही. (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य (जो कदाचित स्वभावाने हुशार होता) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाला, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘रागाऊ नका.’’ त्या मनुष्याने पुन्हा पुन्हा तेच म्हटले, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबरांनी प्रत्येक वेळी हेच उत्तर दिले, ‘‘रागाऊ नका.’’ (हदीस : बुखारी)
एखाद्याची नक्कल करणे
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्याची नक्कल करणे मला आवडत नाही, मग त्याच्या मोबदल्यात माला खूप धनसंपत्ती जरी दिली तरीही.’’ (हदीस : तिर्मिजी)
दुसऱ्यांच्या संकटावर खूश होणे
माननीय वासिला (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुच्या संकटावर खूश होऊ नकोस, अन्यथा अल्लाह त्याच्यावर दया करील (आणि संकट दूर करील) आणि तुला संकटात परिवर्तीत करील.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ज्या दोन मनुष्यांच्या दरम्यान शत्रुत्व निर्माण होते, त्यांच्यापैकी एकावर त्यादरम्यान संकट कोसळते, तेव्हा दुसरा आनंद साजरा करतो. ही इस्लामी स्वभावाच्या विरूद्ध गोष्ट आहे. मोमिन (आज्ञाधारक) आपल्या बंधुच्या संकटावर आनंद साजरा करीत नाही, जरी त्यांच्यात शत्रुत्व असले तरीही.

माननीय इकराम (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘दर आठवड्यातून एकदा धर्मोपदेश करीत जा आणि दोन वेळा करू शकता आणि तीन वेळेपेक्षा अधिक धर्मोपदेश करू नका. या कुरआनपासून लोकांना निराश करू नका. तुम्ही लोकांकडे गेला आणि ते आपल्या संभाषणात मग्न असावेत आणि तुम्ही धर्मोपदेश सुरू करावा आणि त्यांचे संभाषण मध्येच थांबवावे, असे घडता कामा नये. जर तुम्ही असे केले तर ते धर्मोपदेश आणि मार्गदर्शनापासून निराश होतील. अशा वेळी नि:शब्द राहा आणि जेव्हा त्यांच्यात उत्सुकता निर्माण होईल आणि ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील तेव्हाच तुम्ही धर्मोपदेश करा. आणि पाहा! लयबद्ध व अनुप्रासयुक्त अलंकारिक शब्दचित्रण करू नका (म्हणजे समजणार नाहीत असे अवघड शब्द बोलू नका), कारण मी पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांना पाहिले आहे की ते त्रासदायक शब्दोच्चार करीत नव्हते.’’
इमाम सरखसी (रह.) यांनी विस्तारात सांगितलेल्या एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘लोक अल्लाहच्या दासत्वाची घृणा करू लागतील अशा पद्धतीचा अवलंब 
करू नका.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘‘जेव्हा ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील’’चा अर्थ आहे की ते तोंडाने आपली इच्छा व्यक्त करतील. त्यांच्या चेहऱ्यावरून अंदाज येईल की आता ‘दीन’बाबत ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत, तेव्हाच आपण बोलायला सुरूवात करावी.
माननीय अबू यूसुफ (रजि.) यांच्या कथनानुसार, जेव्हा ‘जकात’ (इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक सक्षम मुस्लिमाने आपल्या संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरिबांना दानधर्म म्हणून द्यावयाचा असतो त्यास ‘जकात’ म्हणतात.) अनिवार्य करण्यात आली आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून आदेश देण्यात आला की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी तेव्हा पैगंबरांनी ‘जकात’ वसूल करण्यासाठी एका मनुष्याची नियुक्ती केली आणि त्याला म्हणाले, ‘‘पाहा! लोकांच्या हृदयाचा संबंध असलेली उत्तमोत्तम संपत्ती घेऊ नका, तुम्ही वृद्ध सांडणी घ्या, वांझ सांडणी घ्या आणि सदोष सांडणी घ्या.’’ ‘जकात’ वसूल करणारा निघून गेला आणि पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार लोकांच्या जनावरांमधून ‘जकात’ वसूल केली. इतकेच काय तो एका अरब खेडुताकडे गेला आणि त्याला म्हणाला, ‘‘अल्लाहने आपल्या पैगंबरांना आदेश दिला आहे की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी. ही ‘जकात’ त्यांची वितुष्टी नष्ट करील आणि त्याच्या ईमानमध्ये वाढ होईल.’’ ‘जकात’ वसूल करणाऱ्याला तो खेडूत म्हणाला, ‘‘ही आमची जनावरे आहेत. तुम्ही तेथे जा आणि त्यातून तुम्ही घ्या.’’ त्याने वृद्ध, दोषयुक्त आणि वांझ सांडणी घेतली. तेव्हा तो खेडूत म्हणाला, ‘‘तुमच्यापूर्वी आमच्या उंटांमधून अल्लाहचा हक्क वसूल करण्यासाठी कोणीही आला नाही. अल्लाह शपथ! तुम्हाला चांगले उंट घ्यावे लागतील. (अल्लाहसमोर खराब वस्तू सादर केली जाते काय?)’’ (हदीस : किताबुल खिराज)
स्पष्टीकरण : जर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पहिल्याच दिवसापासून लोकांकडून चांगल्या वस्तू ‘जकात’स्वरूपात वसूल केल्या असत्या तर कदाचित लोकांनी या आदेशाविरूद्ध बंड केले असते, परंतु हळूहळू जेव्हा लोकांमध्ये ‘दीन’ची मुळे घट्ट रोवली गेली आणि त्यांना संस्कार प्राप्त झाले तेव्हा मदीनेपासून दूरवर खेड्यापाड्यांत राहणाऱ्या लोकांची स्थिती अशी झाली की ते ‘जकात’स्वरूपात उत्तम वस्तू घेण्यास सांगू लागले.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा एखादी गोष्ट सांगत तेव्हा तिचा (जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा) तीन वेळा पुनरुच्चार करीत जेणेकरून ती गोष्ट लोकांना चांगल्या प्रकारे समजावी. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : प्रत्येक भाषेत बोलण्याचे आणि भाषण करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या हृदयांत आपली वाणी उतरविणे हाच त्यामागील उद्देश असतो. ऐकणारे कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार भाषा व वक्तव्य अवलंबावे लागेल. अल्पशिक्षित लोकांसमोर तत्त्वज्ञासारखे बोलणे आणि अवघड शब्द व पद्धतींचा उपयोग करणे आवाहनाला परिणामशून्य बनविते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत माननीय आएशा (रजि.) सांगतात–
‘‘पैगंबरांचे भाषण स्पष्ट व उघड असे, जो ऐकतो त्याला समजते.’’

अब्दुल मजीद खान, नांदेड
9403004232
मित्रानों ! जगाचं एक मुलभूत सत्य आहे़ ज्याच्या आधारे जगाची संपूर्ण व्यवस्था चालत आहे़ आपण (मनुष्य) सुद्धा या जगापासून वेगळे नाही तर या जगात त्याचा एक अंश म्हणून राहत आहोत़ म्हणून सर्वांसाठी हे सत्य ज्याप्रमाणे मुलभूत आहे त्याच प्रमाणे आपल्यासाठी सुद्धा मुलभूत सत्य आहे़ 
सध्या हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तिसाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी एक बिकट समस्या बनली आहे की, आम्हा माणसांच्या जीवनातून शांती व समाधान लोप का पावले आहे? आमच्यावर संकटे सदैव का कोसळत असतात? आमच्या जीवनाची घडी का विस्कटली आहे? राष्ट्रा-राष्ट्रामध्ये संघर्ष का निर्माण झाला आहे? त्यांच्यात ओढातान का होत आहे? माणूस माणसाचा शत्रू का बनला आहे? जगात लक्षावधी माणसे मरत आहेत़ जगाचे अब्जावधीचे नुकसान होत आहे़ वस्तीच्या वस्ती बेचिराख होत आहेत़ बलवान आणि श्रीमंत लोक दुर्बलांना गीळंकृत करीत आहेत़ राज्यकारभारात अत्याचार होत आहेत. न्यायालयामध्ये अन्याय होत आहे, संपत्तीमध्ये अतिरेक, सत्तेमध्ये उन्माद आहे, मैत्रीत लबाडी आहे़ नितीमत्तेत सचोटी राहिली नाही़ माणसावरून माणसाचा विश्वास उडाला आहे़  धर्माच्या रूपात अधर्म होत आहे. मानवजात अनेक गटामध्ये विभागली गेली आहे़  प्रत्येक गट दुसऱ्या गटास दग्या-फटक्याने जुलूम अत्याचाराने बेईमानी व लबाडीने हानी पोहोचविण्यास पुण्यकार्य समजत आहे़ या सर्व वाईटाचे कारण काय आहे? अल्लाहच्या सृष्टीत आपण पाहतो सर्वत्र शांती पसरलेली दिसते़ ताऱ्यांमध्ये शांतता आहे़, हवेत शांतता, पाण्यात शांतता, झाडे झुडपे आणि जनावरांमध्ये शांतता आहे. संपूर्ण सृष्टीचा कारभार पूर्णपणे शांततेत चालू आहे़ कोठेही उपद्रव आणि अव्यवस्थेचा लवलेशही आढळत नाही़ परंतु, केवळ मानवी जीवनच शांततेपासून वंचित आहे? 
हा एक अवघड प्रश्न आहे, जो सोडविण्यासाठी नाकीनऊ येत आहेत़ याचे थोडक्यात उत्तर असे आहे की, माणसाने आपले जीवन सत्य आणि वास्तवतेच्या विरोधी शक्तींना सोपवले आहे़ म्हणून मानवास कष्ट भोगावे लागत आहे़ जोपर्यंत मानव स्वत:ला सत्य आणि वास्तविकेतच्या सुपूर्द करीत नाही तोपर्यंत त्यास कधीही शांतता प्राप्त होणार नाही़ उदा़ तुम्ही चालत्या आगगाडीच्या दारास आपल्या घरचे दार समजलात आणि ते उघडून बिनधास्त बाहेर पडलात जणू आपल्या घरच्या दालनात पाय टाकत आहात़ तर तुमच्या गैरसमजुतीमुळे रेल्वेचे दार घरचे दार बनणार नाही आणि ते मैदान सुद्धा की, ज्यावर आपण फेकले जाऊ घराचे दालन ठरणार नाही़ तुम्ही आपल्या ठायी काहीही समजले तरी वास्तविकतेमध्ये किंचितही बदल होणार नाही़ भरधाव चाललेल्या आगगाडीच्या दारातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्याचा जो परिणाम होणार तो झाल्याशिवाय राहणार नाही मग पाय मोडल्यानंतर, डोके फुटल्यानंतर सुद्धा आपण हे मान्य करू नये की, आपण जे कांही समजले होतो ते चुकीचे होते? अगदी त्याचप्रमाणे आपण समजलो की या जगाचा कोणीही पालनकर्ता नाही किंवा आपण स्वत:च आपले ईश्वर बणून रहाल अथवा ईश्वराशिवाय अन्य एखाद्याचे ईशत्व मान्य कराल तर आपल्या अशा समजुतीमुळे वस्तुस्थिती कदापी बदलणार नाही़ ईश्वर हा ईश्वरच राहणाऱ त्याचे जबरदस्त साम्राज्य ज्यामध्ये आपण केवळ प्रजा म्हणून राहत आहोत़ सर्वाधिकारानिशी त्याच्याच अखत्यारित राहणार आहे. उलट आपल्या अशा चुकीच्या समजुतीमुळे जी जीवन पद्धती स्विकारली त्याची कटू फळे आपणास चाखावी लागतील मग यातना भोगल्यानंतर सुद्धा अशा चुकीच्या जीवनास आपल्या ठायी अचूक का समजावे?
सकल जगाचा ईश्वर कोणाच्या केल्याने सर्वव्यापी ईश्वर बनलेला नाही तो काही लाचार नाही, आपण त्याचे इशत्व मान्य करू तेव्हाच तो ईश्वर ठरेल़ आपण मान्य करा अथवा न करा तो तर स्वत: ईश्वर आहे़ त्याचे ईशत्व स्वबळावर उभे आहे़ त्याने स्वत: आम्हाला या संपूर्ण ब्रम्हांडाला बनविले आहे़  ही पृथ्वी, हा सूर्य आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या आदेशाच्या आधिन आहे़ या सृष्टीमध्ये जितक्या शक्ती कार्यरत आहेत़ त्याच्या आदेशाखाली आहेत. त्या सर्व वस्तू ज्यांच्या बळावर आपण जीवंत आहोत त्याच्या अधिकाराधीन आहेत़ स्वत: आपले अस्तित्व त्याच्या अधिकारात आहे़ आपण हे मान्य केले अथवा नाही तरी वस्तू स्थिती हीच आहे. या सर्व अवस्थेत सत्याचे तर काहीच वाईट होत नाही़ परंतु, फरक असा होतो की, आपण जर वस्तुस्थिती मान्य करून आपले तेच स्थान मान्य केले़ जे या सृष्टीमध्ये आपले वास्तविक स्थान आहे तर आपले जीवन योग्य राहील. आपल्याला सुख, शांती, समाधान लाभेल़  आपल्या जीवनाची घडी व्यवस्थित बसेल. परंतु, जर आपण व्यवस्थेविरूद्ध अन्य कोणतेही स्थान स्विकारले तर परिणाम तेच निघेल जो भरधाव चाललेल्या रेल्वेच्या दारास आपल्या घराचे दार समजून बाहेर पडण्याने निघतो. आघात आपल्या स्वत:ला सोसावा लागेल, पाय आपले मोडणाऱ, डोके आपले फुटणार, यातना आपल्या स्वत:ला भोगाव्या लागतील़ परिस्थिती जशी होती तशीच राहणार. आपण प्रश्न कराल की परिस्थितीनुसार आमचे उचीत स्थान कोणते आहे? त्याचे उत्तर असे आहे की, जर एखाद्या नोकरास आपण पगार देऊन नोकरीस ठेवले असेल़  तर त्या नोकराचे वास्तविक स्थान काय आहे? हेच की त्याने आपली़ नोकरी करावी, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करावे़ मालकाच्या मर्जीनुसार काम करावे आणि नोकरीची मर्यादा ओलांडू नये़ नोकराचे काम नोेकरी करण्याशिवाय अन्य काय असू शकते? आपण जर अधिकारी आहात आणि एखाद्या हाताखाली असेल तर हाताखालच्या व्यक्तिचे काय काम असेल? हेच की त्याने ताबेदारी करावी़ अधिकाऱ्याच्या ऐटीत राहू नये.       
जर आपण एखाद्या इस्टेटीचे मालक असाल तर त्या इस्टेटीमध्ये आपली इच्छा काय राहील? अशीच की तिच्यावर आपली मर्जी चालावी़ आपल्याला काही हवे असेल तेच तिच्यात घडावे, आपल्या इच्छेविरूद्ध तिथले पानसुद्धा हलू नये़ आपल्यावर जर एखादी सत्ता काबीज असेल आणि सर्व अधिकार तिच्या ताब्यात असतील तर अशी राजेशाही असताना तेथे आपले काय स्थान असते? हेच की आपण सरळ प्रजा बनून रहावे आणि शाही कायद्याच्या बाहेर पाउल टाकू नये़ बादशाहाच्या राज्यात राहत असताना जर आपण स्वत:च बादशाहीचा दावा किंवा अन्य एखाद्याची बादशाही मान्य करून त्याच्या आदेशानुसार वागत असाल तर आपलं बंड खोट ठरेल़  बंड खोराशी जो व्यवहार केला जातो तो आपल्याला माहीत आहे़ 
या उदाहरणावरून आपण समजू शकतो की अल्लाहच्या या राज्यात आपले स्थान काय आहे? अल्लाहने आपल्याला बनविले आहे़ स्वाभाविकपणे आपले काम याशिवाय अन्य कोणतेही नाही की आपण आपल्या बनविणाऱ्याच्या मर्जीनुसार चालावे. अल्लाह आपले पालन करीत आहे़ त्याच्या खजिन्यातून आपण पगार घेत आहोत़  याशिवाय, आपले अन्य कोणतेही स्थान नाही की, आपण त्याचे नोकर आहोत़ आपला आणि सर्व जगाचा तो मालक आहे़ त्याच्या अधिकारात आपले स्थान दासाशिवाय अन्य काय असू शकते? ही पृथ्वी आणि हे आकाश सर्व त्याचीच इस्टेट आहे़ या इस्टेटीमध्ये त्याचीच मर्जी चालेल आणि त्याचीच मर्जी चालली पाहिजे. आपणास येथे स्वत:ची मर्जी चालविण्याचा कोणताच हक्क नाही़  जर आपण आपली मर्जी चालविण्याचा प्रयत्न कराल तर तोंडघशी पडाल. या राज्यात त्याची सत्ता त्याच्या ताब्यात आहे़ या राज्यात ईश्वराची सत्ता त्याच्या स्वत:च्या बळावर उभी आहे़ पृथ्वी आणि आकाशाची सर्व सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आपण यावर राजी असो किंवा नाराज असो, कोणत्याही परिस्थितीत आपण त्याचे रयत (गुलाम) आहोत़ आपला अथवा अन्य कोणत्याही माणसाचा दर्जा मग तो लहान असो की मोठा, गुलाम असण्याखेरीज अन्य कोणताही नाही. त्याचाच कायदा साम्राज्यात आहे आणि त्याचाच हुकूम हा हुकूम आहे़ गुलामापैकी कोणासही असा दावा करण्याचा हक्क नाही की मी ’हिज मॅजिस्टी’ आहे किंवा ’हिज हायनेस’ आहे अथवा हुकूमशाह किंवा सर्व सत्ताधिकारी आहे. कोणत्याही व्यक्तिस अथवा लोकसभेस किंवा विधानसभेस अथवा मंडळास हा अधिकार प्राप्त नाही, की या साम्राज्यात अल्लाहच्या कायद्याशिवाय आपल्या स्वत:चा कायदा लागू करावा आणि अल्लाहच्या रयतेला सांगावे की, आमच्या कायद्याचे पालन करा. कोणत्याही मानवीय सत्तेस हा अधिकार पोहचत नाही की, अल्लाहच्या आदेशाची उपेक्षा करून अल्लाहच्या दासावर आपला हुकूम चालवावा हे उचीत नाही अशा सर्व अवस्था बंडाच्या आहेत़ याची शिक्षा बंड करणारे व त्यांचे आदेश स्विकारणारे दोघांनाही मिळणे निश्चित आहे. मग ती शिघ्र मिळो अथवा उशीरा. आपले आणि जगातील प्रत्येक मुनष्याच्या डोक्यावरील केस अल्लाहच्या मुठीत आहेत. हवे तेव्हा धरून त्याने ओढावे़  त्याच्या या पृथ्वी आणि आकाशाच्या राज्यातून पळून जाण्याची ताकद कोणातही नाही़ त्याच्यापासून पळ काढून आपण कोठेही आश्रय मिळवू शकत नाही़ मातीत मिसळून आपला कण न् कण जरी विखूरला गेला, आगीत जळून आपली राख हवेत पसरली, पाण्यात वाहून आपण माशाचे भक्ष बनलो किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलो़ तरी अल्लाह प्रत्येक ठिकाणाहून आपणास पकडून बोलावील़ वारा त्याचा दास आहे, पृथ्वी त्याची दास आहे, मासे आणि पाणी सर्व त्याच्या आदेशाच्या आधीन आहेत़ एका इशाऱ्यासरशी चोहोकडून आपण पकडीत सापडू मग तो आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावून विचारेल की माझी रयत असूनही सत्ताधिशाचा दावा करण्याचा हक्क तुम्हाला कोठून प्राप्त झाला होता? माझ्या राज्यात आपले आदेश चालविण्याचे अधिकार तुम्ही कोठून आणले होते़ 1़ माझ्या सत्तेमध्ये आपला कायदा चालविणारे तुम्ही कोण? माझे दास असूनही इतरांचे दास्यत्व पत्करण्यावर तुम्ही राजी कसे झालात? माझे दास असूनही तुम्ही इतरांच्या आज्ञा कशा पाळल्यात? माझ्याकडून पगार घेऊन इतरांना तुम्ही अन्नदाता आणि पालनकर्ता मानलेत़ माझे गुलाम असूनही इतरांची गुलामी केलीत, माझ्या राज्यात राहून सुद्धा इतरांची सत्ता तुम्ही मान्य केली व इतरांच्या कायद्यांना कायदा समजलात आणि इतरांच्या हुकूमाचे पालन केले़ ही बंडखोरी तुमच्यासाठी वैध कशी ठरली होती? आपणापैकी कोणापाशी या आरोपाचे उत्तर आहे सांगा बघू? कोणते वकील तेथे आपल्या युक्त्या लावून बचावाचा मार्ग काढू शकतील? या बंडखोरीच्या अपराधाची शिक्षा भोगण्यापासून तुम्हास कोण वाचविणार आहे? 
ही माणसाची वास्तविकता आहे़ त्या वास्तविकतेशी जुळवून घेऊन, त्या एकमेव सत्ताधिशाच्या आज्ञांचे पालन केल्यास अर्थात त्याने सांगीतल्याप्रमाणे जीवन जगल्यास माणसाच्या आणि संपूर्ण जगताच्या जीवनात शांतता नांदवून तो विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल़ वास्तविक मालकाच्या कायद्याचे पालन करणे म्हणजे त्याची आराधना करणे होय. हेच मानवाच्या मुक्तीचे गमक आहे आणि हाच इस्लाम आणि हीच वास्तविकता आहे़

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget