Latest Post

सीमा देशपांडे
7798981535
लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना  उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक आश्‍चर्यकारक बोध आहे. खासकरुन त्या लोकांसाठी जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतात आणि त्या लोकांसाठी पण जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवत नाहीत. डॉ. विन डायर ह्यांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे जे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला सादर करते. 
उदाहरण- एका मातेच्या पोटात दोन जुळे मुले असतात
पहिल्याने विचारले: काय तुझा प्रसवनंतरच्या जीवनावर विश्‍वास आहे का?
दुसरा म्हणाला: असे का विचारतोस? मला वाटते,प्रसवनंतर नक्कीच काहीतरी असावे. कदाचीत आपला जन्म एक परिक्षा देण्यासाठी तयार झाला असावा व त्यासाठी आपण इथे आलो असू.
पहिला म्हणाला:  तुझे बोल तर मला अगदी मुर्खपणाचे व व्हाय्यात वाटतात.
दुसरा म्हणाला: मला माहित नाही परंतु माझे अंतर्मन मला वारंवार हिच जाणिव करुन देत आहे कि, आपल्या पुढील जन्मात इथल्यापेक्षा जास्त प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या हाताने जेवू, स्वत:च्या पायावर चालू. याविषयी आपल्याला इथे काही संवेदना असतील ज्या आपल्याला आत्ता कळत नसाव्यात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू.
पहिला म्हणाला: तुझे हे विचार अगदी अर्थहीन आहेत. पायावर चालणे अशक्य आहे आणि मुखाने खाणे तर अगदी हास्यास्पद आहे! एकिकडे पाहिल्यास गर्भाशयात आपणास नाभीद्वारे पोषण पुरविले जाते आणि दुसरीकडून पाहिल्यास नाभीची लांबी लहान असते. म्हणजेच डिलिवरी नंतरचे आयुष्य तार्किकद्रष्ट्या वगळलेले बरे आणि ते अशक्यच आहे.
दुसरा फार आग्रहाने म्हणाला: मला वाटते, काहितरी जरुर आहे. पुढचे आयुष्य आपण जे अनुभवतोय त्यापेक्षा खूप-खूप वेगऴे असावे आणि त्यावेळेस आपल्याला आईच्या नाभीची आवश्यकता पण नसावी.
पहिला हसत म्हणाला : मुर्खपणा! डिलिवरीनंतर जर पुन्हा आयुष्य असेल तर आजपर्यंत जे मृत्यु पावले ते पुन्हा का या धरतीवर परत नाही आले? डिलिवरी नंतरचे आयुष्य हे आपले अंतिम जीवन आहे. उलट, डिलिवरी नंतर काही नसतं, फक्त काळोख व शांतता असते आणि त्यानंतर जीवन शुन्य होवुन जाते. अशा रितीने आपण कुठेही जात नाही. 
दुसरा म्हणाला: - मला माहित नाही पण निश्‍चितपणे ईश्‍वर आपली व आपल्या आईची काळजी घेईल आणि अखेरिस आपल्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे.
पहिला म्हणाला: आई? काय तू वास्तविकपणे विश्‍वास ठेवतोस कि तू पुन्हा आईला भेटशील? तो हसत म्हणाला जर आईचे अस्तित्व असेन तर ती कुठे आहे ? त्याचप्रमाणे ईश्‍वर कुठे आहे? जेणेकरुन तो आपणा सर्वांची पुन्हा भेट घालेन.
दुसरा म्हणाला: ईश्‍वर आपल्यामध्ये नाही तर आपल्याभोवती सर्वत्र आहे. त्याचा घेरा आपल्या चोहिकडे आहे. त्याच्याशिवाय आपले व या अथांग विश्‍वाचे अस्तित्व शुन्य आहे. 
पहिला म्हणाला:  मला तर असे कधीच दिसले नाही म्हणून हे तर्कसंगत आहे व त्याचे अस्तित्व कुठेही नाही.
दुसरा म्हणाला:  कधीकधी जेव्हा तु एकांतात असशील तेव्हा एकदा तुझ्या सभोवतालच्या निसर्गाकडे व खुद स्वत:कडे नजर टाक आणि पहा. रात्र-दिवस याचे प्रबोधन, असंख्य ताऱ्यांनी भरलेले सुंदर आकाश, सूर्य ,चंद्र  यांचे कार्य, विशिष्ट प्रमाणात पावसाची निर्मिती, झाडे, प्राणी, पशु, कृमी-किटक याची निर्मिती आणि मानवाची निर्मिती अजुन बरेच काही. काय हे मनुष्य सर्व निर्माण करु शकतो का? हे सूर्य ,चंद्र, तारे व सर्व निसर्ग ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे स्वत:चे काम शांतपणे पार पाडतात? मग काय मनुष्य ईश्‍वराच्या आज्ञेचे पालन करत आहे का? कारण जर  हि सृष्टी असली असती व मनुष्य नसला असता तरिही या सृष्टीला काहिही फरक पडला नसता पण जर मनुष्य धरतीवर असला असता आणि हि सृष्टीही नसली असती तर तो जगु शकला असता का? जसे, हवा नसली असती तर तो श्‍वास घेवु शकला असता? तहानलेला मनुष्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासाविस होतो मग पाऊस पडला नसता तर त्याची तहान भागली असती का?, ही झाडे, प्राणी निर्माण केले नसते तर मनुष्य त्याच्या पोटाची भूक स्वत: भागवू शकला असता का? नाही ना ! कारण ईश्‍वराने ही सृष्टि मनुष्याच्या उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे. मग मनुष्य त्याच्या निर्मात्याचा आज्ञाधारक बनला पाहिजे का त्याच्या निर्मितीचा? कदाचित मनुष्य सत्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण ते अदृश्य आहे आणि असत्याकडे लक्ष केंद्रित करत आहे कारण ते दृष्टीत आहे.
जसे एकदा पाच मित्र सहलीला अगदी उत्साहाने निघतात मात्र अचानकपणे टिव्हीवरुन एक बातमी ऐकायला मिळते की त्यांच्या सहलीला जाणाऱ्या मार्गाने लागणारा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणे घातक आहे. ही बातमी ऐकताच त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा बेत रद्द करतात. मात्र त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा निर्णय घेतात कारण त्यांचे मत असते कि ही बातमी बनावट असू शकते आणि तसेपण पुलाची स्थिती  आपण डोळ्याने थोडीना पाहीली आहे जेणेकरुन त्याच्यावर आपण विश्‍वास ठेवू. अश्या दृष्टीहीन बातमीवर विश्‍वास ठेवने मुर्खपणाचे लक्षण आहे. असे म्हणून त्यातील काही मित्र त्या मार्गाने जाण्याचे धाडस करतात. अचानकपणे दोन तासांनी एक बातमी कानावर पडते की त्या पुलावरुन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन तरुण मुले जखमी झाले व ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. ते दुसरे-तिसरे कोणी नसून तीच मुले होती ज्याना या बातमीची पुर्वसुचना त्यांना  मिळाली असतानाही त्यावर विश्‍वास न ठेवता स्वत:चा शहानपणा केल्याची ही शिक्षा ते भोगत आहेत. आज त्या मुलांचे शरीर पुर्ववत होवु शकते का? किवा कोणते अवतार त्याला पुर्ववत करण्याचे धाडस करु शकते का?..जर आपण हिच बातमी माकडाला दिली असती वा नाही दिली असती तरी त्याने त्या पुलाच्या मार्गाने जाण्याचे धाडस केलेच असते पण आपण ह्याचे कारण सहजपणे समजू शकतो ईश्‍वराने त्याला हे समजण्याची क्षमता दिलीच नाही आहे कि काय चुक व काय बरोबर आहे.  मात्र हि क्षमता मनुष्याला नक्कीच बहाल केली आहे. पण.
आज माणसाची स्थिती माकडासारखीच झालेली आहे त्याला म्हंटले की, तुम्हा-आम्हा सर्वांचा निर्माता एकच आहे. त्याच्याच मार्गाने जीवन व्यतित करा, कारण हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगुर आहे. खरे जीवन मृत्युनंतर आहे जे अथांग आहे. तेथे एकिकडे  ह्या ऐहिक जीवनापेक्षा सुंदर जीवन आहे आणि दुसरीकडे अत्यंत ज्वालामुखीने भरलेले यातनामय ठिकाण आहे. स्वत:ला नरकाग्नीपासुन वाचव. अशी अदृश्य सत्याची पुर्वसुचना दिल्यास असंख्य लोक तुझ्यासारखे (पहिल्या मुलासारखे)  विचार करतात !, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने शारिरिकदृष्ट्या ईश्‍वराला पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बनावट बातमीवर विश्‍वास का  ठेवायचा? आम्ही काय मुर्ख आहोत का? ह्यांची स्थिती त्या मुलासारखी होवू नये जे अदृश्य सत्याला बनावट मानत होते व त्यांना कायमची शिक्षा भोगावी लागेन जिथुन त्यांना पुर्ववत होणे अशक्य असेन. तसेच काही लोक या संभ्रमात आहेत कि ईश्‍वर आपल्यामधेच आहे ..असे असले असते तर मनुष्याचा जन्म-मृत्यु त्याच्या हातात का नाही? असा विचार केला असता हा संभ्रम अर्थहीन वाटतो. तसेच, आजही काही तुरळक लोक अदृश्य सत्य मान्य करतात कारण ते ईश्‍वराने त्यांना प्रदान कलेल्या विवेकबुद्धिचा वापर करतात. जागरुक बुद्धी व संवेदनशील अंत:करण ज्या मनुष्यात असेल ते ह्या सृष्टीचे चिन्ह व मनुष्याचा जन्म व मृत्युचा खरा हेतू या अदृश्य सत्येवर सडेतोर उत्तर देते की आपणा सर्वांचा ईश्‍वर/निर्माता एकच आहे व त्याच्या आज्ञेचे पालन करुन कर्म करायचे आहे. शेवटी आपल्याला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि स्वत:ला नरकाग्नीपासून वाचवायचे आहे. जे लोक या सत्याचा स्विकार करत नाहित ते स्वत:हून त्यांचे पुढील आयुष्य नरकात जाण्यास आमंत्रण देत आहेत. शेवटी पहिले मुल निरुत्तर झाले. कदाचित त्याच्या अहंकाराने त्याला निरुत्तर केले असावे पन त्याचे अंत:करणाने त्याला नक्कीच विचार करायला भाग पाडले असावे.
मित्रांनो! जरी ही एक बोधकथा असली तरी ती आपल्याला खऱ्या अदृश्य सत्याची आठवण करुन देत आहे. माझी तुम्हाला कळकऴीची विनंती आहे, आजही वेळ गेली नाही कृपा करुन सत्याचा स्विकार करा व स्वत: ला नरकापासून वाचवा. ईश्‍वर आपल्या सर्वांना हे सत्य स्विकारण्याची सदबुद्धी देवो! आमीन.

- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी
प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.
मानवजातीच्या इतिहासात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान अद्वितीय व निरूपम आहे. प्रेषित्व शृंखलेची परिपूर्ती, मानवजीवन व्यवस्थेचे पूर्णत्व आणि त्यांच्या द्वारे मानवी जीवनात एका नव्या युगाचा आरंभ झालेला या चरित्र ग्रंथातून वाचकाला दिसून येतो. मनुष्याचे आदर्श व्यिक्तगत व सामुहिक जीवन नवनिर्माण ज्यावर केले जाऊ शकते अशा नैतिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण व आदर्श मूल्यांचे तसेच चिरंतन तत्वांचे तेच खरे खुरे उगमस्थान आहे. आणि ईशमार्गदर्शनासाठीची ते गरजपूर्तीसाधन आहेत हेच सत्य या चरित्रग्रंथाने उघड होते.

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/f49a8doreh9x47au7lz7lyp55uzep3dj

- डॉ. अब्दुल मुघनी
     आज कोणाचा कोणावरही विश्वास राहिला नाही. आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाले आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युिक्तवादात गुरफटून, तो पशू आता आपल्या शारीरिक, मानसिक आर्थिक लहरींचे वेडाचे दहशतवादी प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडला आहे. या संदर्भात डॉ. अब्दुल मुघनी यांनी सुंदर सोप्या पद्धतीने या जटील समस्येचा उलगडाचा पुस्तिकेत केला आहे. दहशतवादावरील उपाय सांगतांना त्यांनी कुरआन हदीसचा उल्लेख करून दहशत हत्येपेक्षा सुद्धा जास्त वाईट आहे; हे सांगितले आहे.


आयएमपीटी .क्र. 07    -पृष्ठे - 16    मूल्य - 10           आवृत्ती - 7 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/m980h98yoi3hpda92p6n2gi6mlbvkug4


माननीय सहल इब्नी अल-खजलिय्या (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एका उंटाजवळून जात होते. त्या उंटाची पाठ आणि पोट एक झाले होते. हे पाहून पैगंबर म्हणाले, ‘‘या मुक्या जनावरांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा, त्यांच्यावर चांगल्या स्थितीत स्वार व्हा आणि चांगल्या स्थितीत त्यांना सोडून द्या.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : जनावरांना उपाशी ठेवणे म्हणजे अल्लाहच्या कोपाला आमंत्रण देणे होय. जेव्हा मनुष्य काम घेऊ इच्छितो तेव्हा त्याला खूप खाऊ-पिऊ घालतो आणि इतके काम घेऊ नये की त्या जनावराची थकून दुरवस्था होईल.
माननीय अब्दुल्लाह बिन जफर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) एका अन्सारीच्या बागेत गेले. त्या बागेत एक उंट बांधून ठेवण्यात आला होता. त्या उंटाने पैगंबरांना पाहिले तेव्हा त्याने दु:खदायक आवाज काढला आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पैगंबर त्या उंटाजवळ गेले आणि मायेने आपला हात त्याच्या मदार व मानेवरून फिरविला तेव्हा त्या उंटाला बरे वाटले. पैगंबरांनी विचारले, ‘‘या उंटाचा मालक कोण आहे? हा उंट कोणाचा आहे?’’ तेव्हा एक अन्सारी तरूण आला आणि तो म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा उंट माझा आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुला अल्लाहचे भय नाही काय? या मुक्या जनावराच्या बाबतीत ज्याला अल्लाहने तुझ्या ताब्यात दिले आहे? हा उंट (आपले अश्रू व आपल्या आवाजाद्वारे) माझ्याकडे तक्रार करीत होता की तू याला उपाशी ठेवतोस आणि त्याच्याकडून खूप काम घेतोस.’’ (हदीस : रियाजुस्सालिहीन)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुम्ही वसंत ऋतुमध्ये प्रवास कराल तेव्हा उंटाना त्यांचा वाटा जमिनीतून द्या आणि जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात प्रवास कराल तेव्हा त्यांना भरभर चालवा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : जेव्हा वसंत ऋतु असेल आणि जमिनीवर सर्वत्र हिरवेगार गवत उगवले असेल तेव्हा प्रवासात उंटाना चरण्याची संधी द्या. जेव्हा उन्हाळा असेल आणि जमिनीवर गवत नसेल तेव्हा वाहने (उंट) वेगाने चालवा जेणेकरून लवकरात लवकर लक्ष्य गाठता यावे आणि वाटेत उद्भवणाऱ्या संकटांपासून बचाव व्हावा.
माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने प्रत्येक काम वैध पद्धतीने करणे अनिवार्य ठरविले आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या (जनावरा) ची हत्या कराल तेव्हा त्याला चांगल्याप्रकारे ठार करा आणि जेव्हा तुम्ही एखादे जनावर कापाल तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे कापा. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या सुरीला धार करावी आणि कापल्या जाणाऱ्या जनावराला त्रास होऊ नये (उशिरापर्यंत तडफडण्यासाठी सोडून देऊ नये. अशाप्रकारे त्याच्या मानेवर सुरी चालवा जेणेकरून त्याचे प्राण त्वरित निघून जावेत).’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना या गोष्टीची मनाई करताना ऐकले की एखाद्या चार पायांच्या जनावराला अथवा त्याच्याव्यतिरिक्त एखाद्या चिमणीला अथवा मनुष्याला बांधून उभे केले जावे आणि त्याच्यावर बाणांचा वर्षाव करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जनावराच्या तोंडावर मारणे आणि त्याच्या तोंडावर डाग देण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याने एखाद्या गौरय्या (एक प्रकारचा जलपक्षी) अथवा त्यापेक्षाही लहान पक्ष्याला विनाकारण मारण्यात आले तर त्याबाबतीत अल्लाहकडून विचारणा होईल.’’ विचारण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! पक्ष्यांचा काय अधिकार आहे?’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘त्यांचा अधिकार हा आहे की त्यांना कापून खाल्ले जावे आणि मुंडके कापल्यानंतर त्यांना तसेच फेकून दिले जाऊ नये.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जनावराची शिकार मांस खाण्यासाठी वैध आहे परंतु आनंद घेण्यासाठी शिकार करणे इस्लाममध्ये मनाई आहे. आनंदासाठी शिकार करणे म्हणजे मनुष्य प्राण्याची शिकार करतो परंतु त्याचे मांस खात नाही तर त्याला तसेच मारून फेकून देतो.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो आपली वस्त्रे (विजार, लुंगी वगैरे) घमेंडीत जमिनीवर फरफटत नेईल, त्याच्याकडे अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी पाहणार नाही. (कृपादृष्टी टाकणार नाही.)’’ 
अबू बक्र सिद्दीक (रजि.) म्हणाले, ‘‘माझी विजार ढिली होऊन घोट्याच्या खाली जाते. जर मी सावरली नाही (तर मीदेखील आपल्या पालनकत्र्याच्या कृपादृष्टीपासून वंचित राहीन काय?)’’
पैगंबर म्हणाले, ‘‘नाही. तुम्ही घमेंडीत विजार फरफटणाऱ्यांपैकी नाही. (मग तुम्ही अल्लाहच्या कृपादृष्टीपासून का बरे वंचित राहाल!)’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : माननीय अबू बक्र (रजि.) यांची विजार ढिली असण्याचे कारण त्यांचे पोट आले होते असे नव्हे तर त्यांची शरीरयष्टी तशी होती. अबू बक्र (रजि.) खूपच दुबळे होते. पैगंबर मुहम्मद (स.) असेही सांगितले, ‘‘घमेंडी आणि फुशारकीने टाचेपर्यंत वस्त्र परिधान करणारा अल्लाहच्या कृपादृष्टीपासून वंचित राहील.’’ अबू बक्र (रजि.) यांनी हे संपूर्ण वक्तव्य ऐकले होते आणि त्यांना माहीत होते की ते जाणूनबुजून घमेंडीने तसे करीत नव्हते. परंतु जेव्हा मनुष्याला परलोकाची काळजी वाटू लागते तेव्हा पापाच्या सावलीपासूनही दूर धावू जातो. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) सांगतात, ‘‘हवे ते खा आणि हवे ते परिधान करा मात्र अट अशी की तुम्हाला घमेंडी व वायफळ खर्च करण्याची सवय नसावी.''
अत्याचार
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचार अंतिन निवाड्याच्या दिवशी अत्याचारीकरिता गडद काळोख बनेल.’’
माननीय औस बिन शुरहबील (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा अत्याचारी आहे हे माहीत असूनदेखील त्याची साथ देऊन त्याची शक्ती वाढविणारा मनुष्य इस्लाममधून बाहेर पडला. अर्थात, जाणूनबुजून एखाद्या अत्याचाऱ्याची प्रशंसा करणे आणि त्याची साथ देणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला माहीत आहे की दिवाळखोर व दरिद्री कोण आहे?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘दरिद्री आमच्याकडे त्या व्यक्तीला म्हणतात ज्याच्याकडे दिरहम नसेल आणि सामानही नसेल.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘माझ्या जनसमुदायातील दरिद्री व दिवाळखोर तो आहे जो अंतिम निवाड्याच्या दिवशी आपली नमाज, रोजा आणि जकातसह अल्लाहपाशी हजर होील आणि त्याचबरोबर त्याने जगात कोणाला शिवीगाळ केली आणि एखाद्यावर आळ घेतला असेल, कोणाची संपत्ती हडप केली असेल, कोणाची त्याने हत्या केली असेल आणि कोणाला त्याने विनाकारण मारले असेल तर त्या सर्व अत्याचारपीडितांमध्ये त्याचे पुण्य वाटले जाईल, मग जर त्याचे पुण्य समाप्त झाले आणि अत्याचारपीडितांचे अधिकार अजूनही उरले असतील तर त्यांच्या चुका त्याच्या खात्यात टाकण्यात येतील आणि मग त्याला नरकात फेकून दिले जाईल.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहच्या दासांच्या अधिकारांचे महत्त्व सांगू इच्छितात. म्हणून अल्लाहचे अधिकार अदा करणाऱ्यांनी दासांच्या अधिकारांचे हनन करू नये अन्यथा ही नमाज, रोजा आणि दुसरे पुण्यकर्म सर्वकाही धोक्यात येतील.
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचारपीडिताच्या हांकेपासून स्वत:चा बचाव करा, कारण तो अल्लाहपाशी आपला अधिकार मागत आहे आणि अल्लाह कोणा अधिकार असणाऱ्याला त्याच्या अधिकारापासून वंचित करत नाही.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये अत्याचारपीडिताची पुकार ऐकण्यापासून रोखण्यात आले आहे. तो अल्लाहसमोर तुमच्या अत्याचाराची हकीकत सांगेल आणि अल्लाह न्यायप्रिय आहे, तो हक्कदाराला त्याच्या अधिकारापासून वंचित करीत नाही आणि याच कारणामुळे तो अत्याचाराला अनेक प्रकारच्या बेचैनी व संकटांमध्ये टाकतो.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कुस्तीमध्ये दुसऱ्यावर मात करणारा शक्तिशाली नसतो तर राग आल्यानंतर स्वत:वर नियंत्रण राखणाराच खरा शक्तिशाली असतो.’’
(म्हणजे रागाच्या भरात तो अल्लाह व पैगंबरांना न आवडणारी कोणतीही कृती करीत नाही.) (हदीस : बुखारी)
माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘राग शैतानी प्रभावाचा परिणाम आहे आणि शैतान आगीपासून बनविण्यात आला आहे आणि आग फक्त पाण्याने विझते, तेव्हा राग आलेल्याने वुजू करावी. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि दुसऱ्या हदीसींमध्ये ज्या रागाला शैतानी प्रभावाचा परिणाम म्हटले आहे तो राग म्हणजे स्वत:साठी आलेला राग. मोमिनला ‘दीन’ (इस्लाम धर्मा) च्या शत्रूवर येणारा राग हे खूपच चांगले गुणवैशिष्ट्य आहे. जर कोणी ‘दीन’ला नष्ट करण्यासाठी येत असेल तर त्यावेळी राग न येणे हे ‘ईमान’च्या कमीचे लक्षण आहे.
माननीय अबू जर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याच्या उभे राहण्याने राग आला तर बसावे. या पद्धतीने राग निघून गेला तर उत्तमच, अन्यथा जमिनीवर पहुडावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि यापूर्वीच्या हदीसमध्ये राग नष्ट करण्याच्या ज्या पद्धती पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितल्या आहेत, अनुभवांती माहीत होते की त्या बरोबर आहेत.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की आदरणीय मूसा (अ.) यांनी अल्लाहला विचारले, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तुझ्या दासांपैकी कोण सर्वाधिक प्रिय आहे?’’ अल्लाहने सांगितले, ‘‘बदला घेण्याची शक्ती असूनदेखील क्षमा करणारा.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो (सत्याच्या विरोधात बोलण्यापासून) आपल्या जिव्हेचे रक्षण करील, अल्लाह त्याच्या दोषांवर पडदा घालील आणि जो आपल्या रागावर नियंत्रण करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला शिक्षेपासून वाचवील आणि जो अल्लाहपाशी क्षमा मागेल अल्लाह त्याला क्षमा करील.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन गोष्टी मोमिनच्या सदाचारांपैकी आहेत, एक ही की जर कोणाला राग आला तर त्याच्या रागाने त्याच्याकडून अवैध काम करवू नये, दुसरी अशी की जेव्हा तो खूश असेल तेव्हा त्याची खुशी त्याला सत्याच्या परिघाबाहेर घालवू नये, आणि तिसरी गोष्ट अशी की सामथ्र्य असूनदेखील दुसऱ्याची वस्तू प्राप्त करू नका, ती घेण्याचा त्याला अधिकार नाही. (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य (जो कदाचित स्वभावाने हुशार होता) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाला, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘रागाऊ नका.’’ त्या मनुष्याने पुन्हा पुन्हा तेच म्हटले, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबरांनी प्रत्येक वेळी हेच उत्तर दिले, ‘‘रागाऊ नका.’’ (हदीस : बुखारी)
एखाद्याची नक्कल करणे
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्याची नक्कल करणे मला आवडत नाही, मग त्याच्या मोबदल्यात माला खूप धनसंपत्ती जरी दिली तरीही.’’ (हदीस : तिर्मिजी)
दुसऱ्यांच्या संकटावर खूश होणे
माननीय वासिला (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुच्या संकटावर खूश होऊ नकोस, अन्यथा अल्लाह त्याच्यावर दया करील (आणि संकट दूर करील) आणि तुला संकटात परिवर्तीत करील.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ज्या दोन मनुष्यांच्या दरम्यान शत्रुत्व निर्माण होते, त्यांच्यापैकी एकावर त्यादरम्यान संकट कोसळते, तेव्हा दुसरा आनंद साजरा करतो. ही इस्लामी स्वभावाच्या विरूद्ध गोष्ट आहे. मोमिन (आज्ञाधारक) आपल्या बंधुच्या संकटावर आनंद साजरा करीत नाही, जरी त्यांच्यात शत्रुत्व असले तरीही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget