Latest Post

- सय्यद अबुल आला मौदूदी

मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी कल्याणाची संकल्पना मांडली आहे.
अल्लाहजवळ रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे. त्याला मुळीच पसंत नाही की त्याने निर्मिलेल्या सृष्टीत बिघाड व्हावा व तिला ओसाड व उजाड केले जावे. या जगाचे अव्यवस्था, दुर्गंधी व घाणीने, जुलुमाने व अत्याचाराने वाटोळे केले जावे.

आयएमपीटी अ.क्र. 10  -पृष्ठे - 32  मूल्य - 18   आवृत्ती - 13 (2013)


डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/lybwu7v5qxv3qetojhcjbniu989fomqq

सीमा देशपांडे - 7798981535
ईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून  त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे  पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने  त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले  तुमचा स्वामी कोण आहे?  सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले  निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात.   व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर  शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही  मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .
    जेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित  होवुन जाते. जेव्हा की  हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते? कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास  ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच,  सर्वात भयानक म्हणजे  ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व  त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची  उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची? असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत?
    त्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा.  नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय? खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय? मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे  परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्‍लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय?
    तुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित? काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी.  एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा? अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा? काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा? पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे  ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्‍चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु!)

    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)
    माननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,
    मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.
    माननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.
    तिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.
    त्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.)! अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?’’
    तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)
स्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या
    संकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.
विश्वास
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)

    माननीय इमरान बिन हुसैन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लज्जाचे लक्षण फक्त उत्तमता आणते.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : लज्जेचे लक्षण म्हणजे असा स्वभाव ज्यात अनेक प्रकारचा चांगुलपणा भरलेला आहे. हे लक्षण ज्या मनुष्यात असेल तो दुराचाराच्या जवळदेखील फिरकणार नाही आणि सदाचाराकडे तो आकर्षित झालेला असेल.
    इमाम नबवी यांनी ‘रिया़जुस्सालिहीन’मध्ये लज्जेची हकीगत सांगताना लिहिले आहे– ‘‘लज्जा एक असा गुण आहे जो मनुष्याला वाईट कर्म करण्यापासून रोखतो आणि परिश्रम करणारांचे पारिश्रमिक देण्यात कुचराई करण्याची मनाई करतो.’’
    तसेच माननीय जुनैद बगदादी यांनी सांगितले की ‘‘लज्जाची हकीगत अशी आहे की मनुष्य अल्लाहच्या देणग्यांना पाहतो आणि मग असा विचार करतो की त्या इनाम देणाNयाची कृतज्ञता व्यक्त करण्यात माझ्याकडून कुचराई होते, तेव्हा त्यामुळे मनुष्याच्या मनात जी स्थिती निर्माण होते तिला ‘लज्जा’ म्हणतात.’’
स्पष्टीकरण : आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या लक्षणाच्या आवश्यकतेबाबत परलोकाच्या चिंतेविषयी असलेल्या एका हदीसमध्ये स्पष्टीकरणासह सांगितले आहे.
संयम आणि दृढता
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य संयम बाळगण्याचा प्रयत्न करेल त्याला अल्लाह संयम देईल. संयमापेक्षा अधिक उत्तम आणि अनेक प्रकारचा चांगुलपणा सामावणारा पुरस्कार दुसरा कोणताही नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : मनुष्य कसोटीमध्ये सापडल्यानंतर संयम बाळगतो तेव्हा जोपर्यंत त्याला अल्लाहवर भरोसा व विश्वास बसत नाही तोपर्यंत संयम बाळगू शकत नाही. मग ज्या मनुष्यात कृतज्ञतेचे लक्षण आढळत नाही तो अजिबात संयम बाळगू शकत नाही. अशाप्रकारे लक्षपूर्वक विचार केल्यास माहीत होते की संयमाचे लक्षण आपल्याबरोबर किती वैशिष्ट्ये सामावितो.
    माननीय उसामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कन्येने संदेश पाठविला की ‘‘माझा मुलगा शरीरातून प्राण निघून जाण्याच्या अवस्थेत आहे. कृपया आपण यावे.’’ पैगंबरांनी सलाम पाठविला आणि ‘‘हे जे काही अल्लाह घेतो ते त्याचेच आहे आणि जे काही देतो ते त्याचेच आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याच्यापाशीच निश्चित होते आणि प्रत्येकाची मुदत निश्चित होते, तेव्हा तुम्ही परलोकात मोबदला प्राप्त करण्याच्या दृढनिश्चयाने संयम बाळगा.’’ मग त्यांनी संदेश पाठविला की ‘‘आपण अवश्य यावे.’’ तेव्हा पैगंबर आणि त्यांच्यासह सअद बिन उबादा (रजि.), मुआज बिन जबल (रजि.), उबय्यिब्ने कअब (रजि.), जैद बिन साबित (रजि.) आणि काही दुसरे लोकदेखील गेले. मुलाला पैगंबरांजवळ आणण्यात आले. पैगंबरांनी त्याला मांडीवर बसविले, त्या वेळी त्याचा श्वास मंदावत होता. ते दृश्य पाहून पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तेव्हा सअद बिन उबादा (रजि.) म्हणाले, ‘‘हे काय?’’ (म्हणजे पैगंबर रडतात काय. हे संयमाच्या विरूद्ध नाही काय?) तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहने आपल्या भक्तांच्या हृदयात ठेवलेली ही कृपेची भावना आहे.’’
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे आज्ञाधारक पुरुष आणि स्त्रिया कधी कधी कसोटीत सापडतात. कधी स्वत: त्याच्यावर संकट येते, कधी त्याच्या अपत्यावर येते. कधी त्याची संपत्ती नष्ट होते (आणि तो त्या सर्व संकटांच्या वेळी संयम बळगतो आणि अशाप्रकारे त्याच्या मनाची स्वच्छता होत राहते आणि दुष्टव्यांपासून दूर जात असतो.) इतकेच नव्हे तर जेव्हा अल्लाहशी त्याची भेट होते तेव्हा अशा स्थितीत भेटतो की त्याच्या कर्मपत्रात कसलेही पाप नसते.’’ (हदीस : तिर्मिजी)
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कसोटी जितकी कठोर असेल तितका मोठा पुरस्कार मिळेल (या अटीवर की मनुष्य संकटांना घाबरून सरळमार्गापासून दूर जाऊ नये) आणि अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहावर प्रेम करतो तेव्हा त्यांना (आणखी अधिक पारखण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी) कसोटीत टाकतो. जे लोक अल्लाहचा निर्णय मान्य करतात आणि संयमाने राहतात तेव्हा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि जे लोक या कसोटीत अल्लाहवर नाराज होतात तेव्हा अल्लाहदेखील त्यांच्यावर नाराज होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय हुजैफा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा रात्री झोपण्यासाठी पहुडतात तेव्हा आपला हात गालाच्या खाली ठेवत आणि म्हणत, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या नामाबरोबर मरतो आणि जिवंत होतो.’’ आणि जेव्हा जागे होतात तेव्हा म्हणतात, ‘‘अल्लाहची कृतज्ञता व्यक्त करतो की त्याने आम्हाला जिवंत केले मृत्यू दिल्यानंतर आणि आम्हाला पुन्हा जीवन व्यतीत करून त्याच्यापाशी जायचे आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जेव्हा मनुष्याच्या मनात पारलौकिक जीवनाची ‘चिंता’ घर करते तेव्हा झोपताना त्याची स्थिती अशी होते की तो अल्लाहचे नामस्मरण करतो आणि म्हणतो की अल्लाहचे नाव माझ्याबरोबर निरंतर राहावे, मरतानादेखील आणि जीवनातदेखील, झोपतानाही आणि झोपून उठल्यानंतरही. जेव्हा झोपून उठतो तेव्हा अल्लाहचे आभार व्यक्त करतो की त्याने जीवन व्यतीत करण्यासाठी आणखी मुदत दिली, जर काल माझ्या हातून एखादी चूक घडली असेल तर तशी आज माझ्या हातून चूक घडता कामा नये आणि या एक दिवसाच्या मिळालेल्या कालखंडाचा लाभ उठविला पाहिजे.
अशी अवस्था त्याची प्रत्येक दिवशी होत असते. जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याला परलोक आणि त्याचा हिशोब आठवतो की मला एक दिवस मरण येणार आहे आणि मग जिवंत होऊन हिशोबासाठी पालनकत्र्यापाशी जावे लागणार आहे. जर ही जीवनाची मुदत वाया जाऊ दिली तर कोणत्या तोंडाने त्याच्यासमोर जाईन आणि कोणते उत्तर देईन.
माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय मुआविया (रजि.) यांनी सांगितले की एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) घरातून बाहेर पडले तेव्हा पाहिले की काही लोक घोळका करून बसले आहेत. पैगंबरांनी विचारले, ‘‘साथीदारांनो! तुम्ही येथे का बसला आहात आणि काय करीत आहात?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘आम्ही येथे बसून अल्लाहचे नामस्मरण करीत आहोत, त्याने आमच्यावर केलेले उपकार स्मरण करीत आहोत, अल्लाहने आमच्याकडे आपला ‘दीन’ पाठविला आणि आमच्यावर ‘ईमान’ बाळगण्याची ईशकृपा केली आणि आम्हाला सरळमार्ग दाखविला, या उपकाराचे स्मरण करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा एखाद्या भक्ताच्या एखाद्या अपत्याचा मृत्यू होतो तेव्हा अल्लाह आपल्या देवदूतांना विचारतो, ‘‘तुम्ही माझ्या भक्ताच्या अपत्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘तुम्ही त्याच्या काळजाच्या तुकड्याचे प्राण हरण केले?’’ ते म्हणतात, ‘‘होय.’’ मग तो त्यांना विचारतो, ‘‘माझ्या भक्ताने काय म्हटले?’’ ते म्हणतात, ‘‘या संकटसमयी त्याने तुझी प्रशंसा केली आणि ‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन’ म्हटले.’’ तेव्हा अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या या भक्ताकरिता स्वर्गात (जन्नतमध्ये) एक घर बनवा आणि त्याचे नाव ‘बैतुल-हम्द’ (कृतज्ञता व्यक्त करण्याचे घर) ठेवा. (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या धर्मनिष्ठ भक्ताने तुझी स्तुती केली म्हणजे म्हटले, ‘‘हे अल्लाह! मी तुझे आभार मानतो. माझे अपत्य हिरावल्यामुळे माझ्या मनात तुझ्याविषयी कसलाही गैरसमज निर्माण झालेला नाही. तू जे काही करतो तो अत्याचार व अन्याय नसतो. आपली वस्तू जर कोणी घेतली तर त्याच्यावर नाराजी कसली?’’
‘‘इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन.’’ हा संयमाचा मंत्र आहे आणि मनुष्याला संयमाचे शिक्षण देतो कारण त्याचा अर्थ असा आहे की ‘‘आम्ही अल्लाहचे दास आणि भक्त आहोत. त्याच्या इच्छेनुसार जगात जीवन व्यतीत करणे आमचे काम आहे आणि आम्ही त्याच्याचकडे परतून जाणार आहोत. जर आम्ही संकटप्रसंगी संयम बाळगला तर चांगला बदला मिळेल अन्यथा वाईट बदला मिळेल. ‘जगातील प्रत्येक वस्तू नष्ट होणार आहे’ अशा विचारामुळे संकटाला सहज वाव मिळतो.
माननीय सुहैब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मोमिनची स्थितीदेखील विचित्र असते, तो ज्या स्थितीत असतो त्यातून चांगुलपणा व भलाईच प्राप्त करतो आणि हे नशीबवान मोमिनव्यतिरिक्त कोणालाही लाभत नाही. जर तो दारिद्र्य, आजारपण आणि दु:खाच्या स्थितीत असतो तेव्हा संयम बाळगतो आणि जेव्हा तो आनंदाच्या स्थितीत असतो तेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो आणि या दोन्ही स्थिती त्याच्याकरिता भलाईची सबब बनतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत कमी दर्जाचे आहेत त्यांच्याकडे पाहा (तेव्हा तुमच्यात कृतज्ञतेची भावना निर्माण होईल) आणि त्याच्याकडे पाहू नका जे लोक तुमच्या तुलनेत धनसंपत्ती, भौतिक प्रतिष्ठेत उच्च दर्जाचे आहेत, जेणेकरून ज्या ईशदेणग्या तुम्हाला या वेळी लाभल्या आहेत त्या तुमच्या दृष्टीने कमी दर्जाच्या ठरू नयेत (अन्यथा अल्लाहच्या कृतघ्नतेची भावना तुमच्या मनात निर्माण होईल).’’ (हदीस : मुस्लिम)

सीमा देशपांडे
7798981535
लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना  उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक आश्‍चर्यकारक बोध आहे. खासकरुन त्या लोकांसाठी जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतात आणि त्या लोकांसाठी पण जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवत नाहीत. डॉ. विन डायर ह्यांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे जे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला सादर करते. 
उदाहरण- एका मातेच्या पोटात दोन जुळे मुले असतात
पहिल्याने विचारले: काय तुझा प्रसवनंतरच्या जीवनावर विश्‍वास आहे का?
दुसरा म्हणाला: असे का विचारतोस? मला वाटते,प्रसवनंतर नक्कीच काहीतरी असावे. कदाचीत आपला जन्म एक परिक्षा देण्यासाठी तयार झाला असावा व त्यासाठी आपण इथे आलो असू.
पहिला म्हणाला:  तुझे बोल तर मला अगदी मुर्खपणाचे व व्हाय्यात वाटतात.
दुसरा म्हणाला: मला माहित नाही परंतु माझे अंतर्मन मला वारंवार हिच जाणिव करुन देत आहे कि, आपल्या पुढील जन्मात इथल्यापेक्षा जास्त प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या हाताने जेवू, स्वत:च्या पायावर चालू. याविषयी आपल्याला इथे काही संवेदना असतील ज्या आपल्याला आत्ता कळत नसाव्यात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू.
पहिला म्हणाला: तुझे हे विचार अगदी अर्थहीन आहेत. पायावर चालणे अशक्य आहे आणि मुखाने खाणे तर अगदी हास्यास्पद आहे! एकिकडे पाहिल्यास गर्भाशयात आपणास नाभीद्वारे पोषण पुरविले जाते आणि दुसरीकडून पाहिल्यास नाभीची लांबी लहान असते. म्हणजेच डिलिवरी नंतरचे आयुष्य तार्किकद्रष्ट्या वगळलेले बरे आणि ते अशक्यच आहे.
दुसरा फार आग्रहाने म्हणाला: मला वाटते, काहितरी जरुर आहे. पुढचे आयुष्य आपण जे अनुभवतोय त्यापेक्षा खूप-खूप वेगऴे असावे आणि त्यावेळेस आपल्याला आईच्या नाभीची आवश्यकता पण नसावी.
पहिला हसत म्हणाला : मुर्खपणा! डिलिवरीनंतर जर पुन्हा आयुष्य असेल तर आजपर्यंत जे मृत्यु पावले ते पुन्हा का या धरतीवर परत नाही आले? डिलिवरी नंतरचे आयुष्य हे आपले अंतिम जीवन आहे. उलट, डिलिवरी नंतर काही नसतं, फक्त काळोख व शांतता असते आणि त्यानंतर जीवन शुन्य होवुन जाते. अशा रितीने आपण कुठेही जात नाही. 
दुसरा म्हणाला: - मला माहित नाही पण निश्‍चितपणे ईश्‍वर आपली व आपल्या आईची काळजी घेईल आणि अखेरिस आपल्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे.
पहिला म्हणाला: आई? काय तू वास्तविकपणे विश्‍वास ठेवतोस कि तू पुन्हा आईला भेटशील? तो हसत म्हणाला जर आईचे अस्तित्व असेन तर ती कुठे आहे ? त्याचप्रमाणे ईश्‍वर कुठे आहे? जेणेकरुन तो आपणा सर्वांची पुन्हा भेट घालेन.
दुसरा म्हणाला: ईश्‍वर आपल्यामध्ये नाही तर आपल्याभोवती सर्वत्र आहे. त्याचा घेरा आपल्या चोहिकडे आहे. त्याच्याशिवाय आपले व या अथांग विश्‍वाचे अस्तित्व शुन्य आहे. 
पहिला म्हणाला:  मला तर असे कधीच दिसले नाही म्हणून हे तर्कसंगत आहे व त्याचे अस्तित्व कुठेही नाही.
दुसरा म्हणाला:  कधीकधी जेव्हा तु एकांतात असशील तेव्हा एकदा तुझ्या सभोवतालच्या निसर्गाकडे व खुद स्वत:कडे नजर टाक आणि पहा. रात्र-दिवस याचे प्रबोधन, असंख्य ताऱ्यांनी भरलेले सुंदर आकाश, सूर्य ,चंद्र  यांचे कार्य, विशिष्ट प्रमाणात पावसाची निर्मिती, झाडे, प्राणी, पशु, कृमी-किटक याची निर्मिती आणि मानवाची निर्मिती अजुन बरेच काही. काय हे मनुष्य सर्व निर्माण करु शकतो का? हे सूर्य ,चंद्र, तारे व सर्व निसर्ग ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे स्वत:चे काम शांतपणे पार पाडतात? मग काय मनुष्य ईश्‍वराच्या आज्ञेचे पालन करत आहे का? कारण जर  हि सृष्टी असली असती व मनुष्य नसला असता तरिही या सृष्टीला काहिही फरक पडला नसता पण जर मनुष्य धरतीवर असला असता आणि हि सृष्टीही नसली असती तर तो जगु शकला असता का? जसे, हवा नसली असती तर तो श्‍वास घेवु शकला असता? तहानलेला मनुष्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासाविस होतो मग पाऊस पडला नसता तर त्याची तहान भागली असती का?, ही झाडे, प्राणी निर्माण केले नसते तर मनुष्य त्याच्या पोटाची भूक स्वत: भागवू शकला असता का? नाही ना ! कारण ईश्‍वराने ही सृष्टि मनुष्याच्या उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे. मग मनुष्य त्याच्या निर्मात्याचा आज्ञाधारक बनला पाहिजे का त्याच्या निर्मितीचा? कदाचित मनुष्य सत्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण ते अदृश्य आहे आणि असत्याकडे लक्ष केंद्रित करत आहे कारण ते दृष्टीत आहे.
जसे एकदा पाच मित्र सहलीला अगदी उत्साहाने निघतात मात्र अचानकपणे टिव्हीवरुन एक बातमी ऐकायला मिळते की त्यांच्या सहलीला जाणाऱ्या मार्गाने लागणारा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणे घातक आहे. ही बातमी ऐकताच त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा बेत रद्द करतात. मात्र त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा निर्णय घेतात कारण त्यांचे मत असते कि ही बातमी बनावट असू शकते आणि तसेपण पुलाची स्थिती  आपण डोळ्याने थोडीना पाहीली आहे जेणेकरुन त्याच्यावर आपण विश्‍वास ठेवू. अश्या दृष्टीहीन बातमीवर विश्‍वास ठेवने मुर्खपणाचे लक्षण आहे. असे म्हणून त्यातील काही मित्र त्या मार्गाने जाण्याचे धाडस करतात. अचानकपणे दोन तासांनी एक बातमी कानावर पडते की त्या पुलावरुन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन तरुण मुले जखमी झाले व ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. ते दुसरे-तिसरे कोणी नसून तीच मुले होती ज्याना या बातमीची पुर्वसुचना त्यांना  मिळाली असतानाही त्यावर विश्‍वास न ठेवता स्वत:चा शहानपणा केल्याची ही शिक्षा ते भोगत आहेत. आज त्या मुलांचे शरीर पुर्ववत होवु शकते का? किवा कोणते अवतार त्याला पुर्ववत करण्याचे धाडस करु शकते का?..जर आपण हिच बातमी माकडाला दिली असती वा नाही दिली असती तरी त्याने त्या पुलाच्या मार्गाने जाण्याचे धाडस केलेच असते पण आपण ह्याचे कारण सहजपणे समजू शकतो ईश्‍वराने त्याला हे समजण्याची क्षमता दिलीच नाही आहे कि काय चुक व काय बरोबर आहे.  मात्र हि क्षमता मनुष्याला नक्कीच बहाल केली आहे. पण.
आज माणसाची स्थिती माकडासारखीच झालेली आहे त्याला म्हंटले की, तुम्हा-आम्हा सर्वांचा निर्माता एकच आहे. त्याच्याच मार्गाने जीवन व्यतित करा, कारण हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगुर आहे. खरे जीवन मृत्युनंतर आहे जे अथांग आहे. तेथे एकिकडे  ह्या ऐहिक जीवनापेक्षा सुंदर जीवन आहे आणि दुसरीकडे अत्यंत ज्वालामुखीने भरलेले यातनामय ठिकाण आहे. स्वत:ला नरकाग्नीपासुन वाचव. अशी अदृश्य सत्याची पुर्वसुचना दिल्यास असंख्य लोक तुझ्यासारखे (पहिल्या मुलासारखे)  विचार करतात !, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने शारिरिकदृष्ट्या ईश्‍वराला पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बनावट बातमीवर विश्‍वास का  ठेवायचा? आम्ही काय मुर्ख आहोत का? ह्यांची स्थिती त्या मुलासारखी होवू नये जे अदृश्य सत्याला बनावट मानत होते व त्यांना कायमची शिक्षा भोगावी लागेन जिथुन त्यांना पुर्ववत होणे अशक्य असेन. तसेच काही लोक या संभ्रमात आहेत कि ईश्‍वर आपल्यामधेच आहे ..असे असले असते तर मनुष्याचा जन्म-मृत्यु त्याच्या हातात का नाही? असा विचार केला असता हा संभ्रम अर्थहीन वाटतो. तसेच, आजही काही तुरळक लोक अदृश्य सत्य मान्य करतात कारण ते ईश्‍वराने त्यांना प्रदान कलेल्या विवेकबुद्धिचा वापर करतात. जागरुक बुद्धी व संवेदनशील अंत:करण ज्या मनुष्यात असेल ते ह्या सृष्टीचे चिन्ह व मनुष्याचा जन्म व मृत्युचा खरा हेतू या अदृश्य सत्येवर सडेतोर उत्तर देते की आपणा सर्वांचा ईश्‍वर/निर्माता एकच आहे व त्याच्या आज्ञेचे पालन करुन कर्म करायचे आहे. शेवटी आपल्याला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि स्वत:ला नरकाग्नीपासून वाचवायचे आहे. जे लोक या सत्याचा स्विकार करत नाहित ते स्वत:हून त्यांचे पुढील आयुष्य नरकात जाण्यास आमंत्रण देत आहेत. शेवटी पहिले मुल निरुत्तर झाले. कदाचित त्याच्या अहंकाराने त्याला निरुत्तर केले असावे पन त्याचे अंत:करणाने त्याला नक्कीच विचार करायला भाग पाडले असावे.
मित्रांनो! जरी ही एक बोधकथा असली तरी ती आपल्याला खऱ्या अदृश्य सत्याची आठवण करुन देत आहे. माझी तुम्हाला कळकऴीची विनंती आहे, आजही वेळ गेली नाही कृपा करुन सत्याचा स्विकार करा व स्वत: ला नरकापासून वाचवा. ईश्‍वर आपल्या सर्वांना हे सत्य स्विकारण्याची सदबुद्धी देवो! आमीन.

- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी
प्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.
मानवजातीच्या इतिहासात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान अद्वितीय व निरूपम आहे. प्रेषित्व शृंखलेची परिपूर्ती, मानवजीवन व्यवस्थेचे पूर्णत्व आणि त्यांच्या द्वारे मानवी जीवनात एका नव्या युगाचा आरंभ झालेला या चरित्र ग्रंथातून वाचकाला दिसून येतो. मनुष्याचे आदर्श व्यिक्तगत व सामुहिक जीवन नवनिर्माण ज्यावर केले जाऊ शकते अशा नैतिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण व आदर्श मूल्यांचे तसेच चिरंतन तत्वांचे तेच खरे खुरे उगमस्थान आहे. आणि ईशमार्गदर्शनासाठीची ते गरजपूर्तीसाधन आहेत हेच सत्य या चरित्रग्रंथाने उघड होते.

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/f49a8doreh9x47au7lz7lyp55uzep3dj

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget