Latest Post

-डॉ. सबीहा ख़ान
नागपूर – (डॉ. एम. ए. रशीद) 
आज मुस्लिम महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या साक्षरतेबाबत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व इस्लामी ज्ञान नसल्याने कारण ट्रिपल तलाक़चा मुद्दा समोर आला. इ.सन १९३९मध्ये शरियतवर आधारित मुस्लिम पर्सनल लॉ बनविण्यात आला होता. मुस्लिम विवाह याच विधीअंतर्गत येतो. या विधीचे पालन करणे आमचा संवैधानिक अधिकार आहे. विवाह अधिनियमच्या अनुसार वधू पक्षाला हुंडा न देत निकाह कार्यक्रम आयोजित करण्याची शर्त ठेवण्यात आली आहे. वधूला सुनिश्चित रक्कम (मेहर) च्या आधारावर निकाह स्वीकार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. निकाह झाल्याबरोबरच पतीला मेहरची रक्कम पत्नीला देणे आवश्यक असते. असे विचार आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या वेळी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सबीहा ख़ान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
हा कार्यक्रम कांग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहाच आयोजित करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की मेहर प्राप्त करने पत्नीचा पहिला अधिकार आहे आणि हुंडा वधू पक्षावर अत्याचार आहे. तलाक़च्या अंतर्गत महिलांकरिता ख़ुलअ ( तलाक़ घेण्याचा) सुद्धा अधिकार आहे. वर्तमान शासन तलाक़बाबत मुस्लिम महिलांना ज्या परिस्थितीत आणू इच्छित आहे, त्यात अनेक कठीण बाबी आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही एकाच मंचवर १९ विभिन्न महिला संघटना मिळून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करीत आहोत.
सरोज आगलावे यांनी सांगितले की महिलांच्या शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता त्या पुढे जात आहेत, शिक्षणामुळे त्यांचे शोषण कमी झालेले आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांचे पारिवारिक जीवन अनेक बलिदानांनी युक्त आहे. ज्या प्रकारे आम्ही मुलींना चांगले संस्कार देतो त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा सुसंस्कृत करण्याची गरज आहे.
अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले की स्त्री सक्षम असते, ती परिवाराला सुख आणि समृद्धीत साहाय्य प्रदान करते. मुलांना जन्म दिल्यापासून स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत आम्हा स्त्रियांची मुख्य भूमिका असते.
अरुणा सबाणे विदर्भातील प्रथम महिला संपादक आहेत, त्या म्हणाल्या की आत्मनिर्भर बनूनच मी माझ्या मुलांचे भविष्य बनविले आहे.
डॉ. शरयुताई तायवाड़े यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करीत सांगितले की स्त्रियांचे परिवारमध्ये उच्च स्थान आहे, ती  मॅनेजमेंटची गुरू आहे. ती घरकामाला योजनाबद्ध पद्धतीने आवरून बाहेरची कामेही पूर्ण करते.
शुभांगी घाटोळे यांच्या संविधान वाचनाने श्रोत्यांना अतिशय उत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वनकर तसेच आभार संध्या राजुरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफीया अंजुम आणि बेनज़ीर ख़ान यांनी केले.
या कार्यक्रममध्ये भारतीय महिला फेडरेशन, शेतकरी संघटना, जमाअत ए इस्लामी हिंद, नागपुर महिला विभाग, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, अनाथ पीडित महिला क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ, राष्ट्रीय ओ.बी.सी. महिला महासंघ, माहेर सामाजिक संस्था, जे. के. एस. सखी मंच, विदर्भ असंघटित कामगार संघटना, सुबुद्ध महिला संघटना, पलीता महिला बहु समाजसेवा संस्था तसेच आवाज़ आशा, टॉपर फाउंडेशन आदी महिला संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विभिन्न समुदायाच्या मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

माननीय अब्दुल्लाह इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह दासाचा पश्चात्ताप शेवटच्या श्वासापूर्वीपर्यंत कबूल करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : जर एखाद्याने आपले संपूर्ण जीवन दुष्कर्मांत व्यतीत केले असेल परंतु 
मृत्यूपूर्वीच्या बेशुद्धावस्थेअगोदर त्याने खऱ्या मनाने अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त केला तर सर्व पाप धुतले जातील. शेवटचा श्वास घेण्यापूर्वीच्या अवस्थेत (म्हणजे प्राण निघून जाण्याच्या स्थितीत), त्या वेळी जर क्षमा मागील तर त्याला क्षमा केली जाणार नाही. म्हणूनच मरण डोळ्यांपुढे दिसण्यापूर्वी मनुष्याने पश्चात्ताप व्यक्त करावा.
माननीय इब्ने यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो! अल्लाहपाशी आपल्या दुष्कर्मांची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परता. मला पाहा, मी दिवसातून शंभर-शंभर वेळा अल्लाहपाशी मुक्तीची दुआ करतो.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू जर गिफ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या दासांनो! मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो! तुम्ही रात्री आणि दिवसा दुष्कर्म करता आणि मी सर्व दुष्कर्म क्षमा करू शकतो, तेव्हा माझ्यापाशी क्षमा मागा, मी तुम्हाला क्षमा करीन.’’ (हदीस : मुस्लिम)
मानवावर प्रेम
माननीय अबू जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘कोणते काम उत्तम व उच्च दर्जाचे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प्रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नका. हा तुमचा ‘सदका’ (दानधर्म) असेल, ज्याचा बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘अल्लाहवर ईमान बाळगणे’ म्हणजे ‘दीने तौहीद’ म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे. ‘जिहाद’चा अर्थ आहे जे लोक ‘दीने ह़क’ (इस्लाम) ला नष्ट करण्यासाठी तयार होतील त्यांचा सामना करणे. जर ते ‘दीन’ व त्याच्या अनुयायींना नष्ट करण्यासाठी तलवार उचलतील तर मुस्लिमाचे कर्तव्य आहे की त्यानेदेखील तलवार उचलावी आणि जाहीर करावे की ‘दीन’ आमचे प्राण आणि तुमच्या प्राणांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर तुम्ही त्याचा वध कराल तर आम्ही तुमचा वध करू अथवा स्वत: मरण पत्करू.
अरबस्थानात गुलामीची प्रथा होती आणि अरबस्थानाच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण सुसंस्कृत जगात ही निर्भत्र्सना आढळत होती. इस्लामचे जेव्हा पुनरागमन झाले तेव्हा त्याने मानवांना प्रोत्साहन देणे आणि मानवतेच्या समाजात सामील करण्यासाठी गुलामांच्या मुक्ततेला आपल्या कार्यक्रमात सामील केले आणि ते फार मोठे पुण्य असल्याचे निश्चित केले.
समाजातील गरजवंत लोकांची मदत करणे आणि एखाद्या मनुष्याचे काम करणे जे तो करू शकत नाही अथवा ओबडधोबड करीत आहे, फार मोठे पुण्य आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाम स्वीकारलेल्या एखाद्या गुलामाला मुक्त करील तर अल्लाह त्या गुलामाच्या प्रत्येक अवयवाच्या बदल्यात त्या मनुष्याचा प्रत्येक अवयव नरकाच्या आगीपासून सुरक्षित करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

-नझराना शेख, पणजी (गोवा)
इंटरनॅशनल सेंटर, दोनापाऊला, गोवामध्ये नुकतेच लैंगिक समानतेबद्दल अतिशय दुर्मिळ
चर्चासत्र पार पडले. स्त्रियांचे सबलीकरण करणे आणि लैंगिक समानताच्या दृष्टीने त्यांच्या काय समस्या आहेत यावर खूप चर्चा झाली.
प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकतर उत्साहाने साजरा केला जातो. परंतु महिलांसंबंधित समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. एका काळात समाजात ती अत्यंत दबलेली होती आणि आता ती स्वातंत्र्य व मुक्त आणि बहुतेक अधिकारांची हक्कदार असूनसुद्धा तिच्या दडपशाहीची आणि गैरवापराची कहाणी अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात तिच्या दडपशाहीत दुसऱ्या मार्गाने वाढ होत आहे.
संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०१६-२०१७ ने सांगितले की अपहरण, मुली व स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, या गुन्हेगारीची संख्या भयावह पातळीवर पोहचली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तिची असुरक्षित वाढली आहे.
एनसीआरबी डेटा २०१६ नुसार २०१६ मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २.९ टक्के वाढ झाली आहे.
बलात्काराची प्रकरणे जी २०१५ मध्ये ३४,६५१ होती त्यातही २०१६ मध्ये १२.४ टक्के वाड झाली आहे.
वर नमूद केलेले आकडे स्पष्ट करतात की, ‘स्वतंत्र आणि मुक्त’ अशी असणारी पश्चिम संस्कृतीचा नमुना घेऊन स्त्रियांची उन्नती करण्याचा आमचा निर्णय अयशस्वी ठरला आहे. ही संस्कृती तिला तो सन्मान देण्यासाठी चुकली आहे ज्यावर तिचा हक्क आहे. या संस्कृतीने  लैंगिक समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर खोटी प्रतिष्ठा देऊन तिला असला असुरक्षित आणि धोकादायक मंच दिला आहे ज्यामध्ये तिचे खूप चालाकीने शोषण चालू आहे.   
समानतेच्या नावावर तिला सर्व कृतींच्या क्षेत्रांत आणले गेले. तिला पुरुषाचे अनुकरण करून त्याच्यासारखे वागायला, त्याच्यासारखे दिसायला आणि त्याच्यासारखे सामथ्र्य दाखवायला भाग पाडले. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांची प्रमुख भूमिका म्हणजे एक परिपूर्ण गृहिणी, आई, पत्नी, बहीण, हीसुद्धा जबाब्दारीने पार पडण्याची अपेक्षा तिच्यापासून केली गेली. स्त्रियांनीदेखील स्त्री-पुरुष अशी दुहेरी भूमिका निभावण्याची तडजोड केली. असे करताना तिला हे कळून चुकले की तिने दीर्घकाळामध्ये काय गमावले. तिला या दुहेरी भूमिकेत आपले कौटुंबिक जीवन आणि मातृत्वाचे बलिदान द्यावे लागले, पुरुषांच्या पूर्वाभिमुख समाजात चांगल्यारीतीने रचलेल्या सापळ्यात ती सहजपणे अडकत गेली. आज स्त्रिया शिक्षित, आत्मनिर्भर होऊनसुद्धा जुन्या काळाची स्त्रियांवरील अत्याचाराची कहाणी आजच्या आधुनिक जगात कायम आहे.
पूर्वीच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणारी दडपशाही आज स्वातंत्र्य व समानता आणि न्याय या कवचाखाली एक सुनियोजित पद्धतशीर चालविली जात आहे, ज्यात तिचे शोषण नजरेला पडत नाही पण त्यामुळे तिला खूप नुकसान झाले आहे आणि तिच्यावरील वाढत्या अत्याचार आणि गुन्ह्यांचे मुख्य कारण बनले आहे.
ज्ञान किंवा शिक्षण मानवजातीसाठी एक मोठी भेट म्हणून मानला जाते. ज्यामुळे व्यक्ती, समाज आणि जगाचा विकास होतो. पण याला मनुष्याने फक्त संपत्ती मिळवून देण्याचे साधन मानले. पूर्वी स्त्रियांना काम करावे लागत नव्हते म्हणून त्यांना ज्ञान आणि शिक्षणापासून दूर ठेवले गेले आणि आता आधुनिक काळात मुलींना तो अधिकार मिळाला तेव्हा तिच्या भक्षकांनी त्याला तिचापासून पैसे उत्पन्न करायचा  स्रोत बनवून टाकले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालकही स्वार्थी होतात आणि मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च मिळवून घेण्यासाठी तिला स्रोत बनवतात. पुत्रांनी जे केले नाही किंवा करू शकत नाहीत अशा सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा मुलींना दिली जाते. मुलींपासून या वाढत्या अपेक्षा त्यांना पुढे जीवनात महाग पडतात. यासाठी त्यांचा विवाह उशिरा होतो आणि मग एक चांगला जोडीदार शोधणे तिला अवघड होते आणि वैवाहिक जीवन सुरू करण्यातही तिला समस्या येतात. काही स्त्रिया आयुष्यभर अविवाहितसुद्धा राहतात.
हुंडा प्रणालीचा धोका हाताळण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले गेले आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा फायदाही झाला आहे. परंतु इथेसुद्धा भक्षकांनी हुंडा हाताळण्याच्या नवीन पद्धतीं शोधून काढल्या आहेत. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलींची नवरी म्हणून निवड होते ते याच कारणामुळे की ती काम करून त्यांच्या संपत्तीला भर घालेल. स्त्रियांवरच सर्व आर्थिक आणि घरगुती जाबाबदारी घालून  काही बाबतीत त्यांचे पती पूर्णत: बेजबाबदार बनले आहेत. ज्या स्त्रिया स्वत:च्या इच्छेनुसार नोकरी करायच्या अधीन असतात त्यांना पण भावनांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या कमाईतून बराच पैसा या भक्षकांसाठी खर्च करण्यास लुभावले जाते. काही स्त्रियांना असल्या नोकऱ्यांतदेखील खेचले जाते, ज्यामध्ये फक्त त्यांच्या सौंदर्याची आणि शरीराची प्रशंसा होते आणि तिच्या अंत:करणाच्या प्रतिभेचे काही मोल होत नाही.
या आकर्षित करणाऱ्या ग्लॅमरस दुनियेत तिची गुंतागुंत होते ज्यामुळे शेवटी तिच्या नशिबाला एकाकीपणा, नैराश्य, विनाश वाट्याला येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्या करून तिला आपली सुटका करावी लागते. एका बाजूला जेथे लैंगिक समानतेची पदोन्नती चालू आहे तिथेच दुसरीकडे वय, वर्ग, सौंदर्य, शरीर यांच्या आधारावर महिलांचा भेदभाव चालू आहे. आणि हाच निकष पाळून लग्न व नोकरीसाठी तिची निवड होते. जी स्त्री उच्च पदावर पोचली आहे तीसुद्धा कुठल्यातरी पुरुषाची किंवा पुरुषासंबंधी गटाचीच कठपुतळी म्हणून चालते. या सर्व प्रकरणांत स्त्रिया आपल्या विरूद चालणाऱ्या कटाला ओळखण्यात चुकतात आणि ज्या वेळेस ते जाणतात तेव्हा फारच उशीर झालेला असतो.
आजच्या आधुनिक लढायांमध्ये सैनिकांपेक्षा जास्त नागरिकांची बळी जाते. त्यातही स्त्रियांना जास्त अत्याचार सहन करावा लागतो जो खूप वेळा लष्करी किंवा राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पद्धतशीरपणे विविध रूपाने स्त्रियांवर घडविला जातो. देहव्यापाराच्या वाढत्या गरजेमुळे मानवी तस्करी आणखीनच वाढली आहे आणि याचा परिणामसुद्धा स्त्रियांनीच जास्त भोगला आहे.
स्त्रियांना न्याय देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याबाबतचे विश्लेषण करताना हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरुषाची नक्कल करणे आणि त्याला आदर्श म्हणून मानणे हे या समस्यांचे समाधान नाही. पुरुष आणि स्त्री ही दोन भिन्न लिंग आहेत आणि त्यांना  समाजात आपली अनोखी भूमिका निभावण्यासाठी रचले गेले आहे. त्यांची विशिष्ट शारीरिक, जैविक आणि मानसिक निर्मिती हे दर्शविते की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांना समान करण्याचा प्रयत्न शेवटी व्यर्थ ठरेल.
प्रश्न हा आहे की स्त्रीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषाची नक्कल करणे किंवा त्याच्या पातळीवर पोहचणे का आवश्यक आहे? मानवाला जन्म देण्याची आणि मानवजातीला आपल्या प्रेमळता व काळजीने उभारण्याची उत्कृष्ट भूमिका तिला ईश्वराने दिली आहे, जी एक पुरुष प्रयत्न करूनसुद्धा साध्य करू शकत नाही. या भूमिकेने ती अशी मानवजाती आपल्या शिकवणीने निर्माण करू शकते जी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या दुर्बल शरीराचा फायदा न घेता त्यांच्या कोमल हृदयाचे मोल करू शकते आणि तिला तो आदर देऊ शकते ज्यास ती पात्र आहे. आईच्या पदरात लहानपणीच हे संस्कार पुरुषांना मिळाले तर पुढे ते स्त्रियांविषयी होणाऱ्या प्रत्येक शोषणला बंदी घालू शकतात आणि असले वातवरणही निर्माण करू शकतात जिथे स्त्रियांविरुद्ध सगळ्या षड्यंत्रांना रोखू शकतात आणि सर्व वाईट गोष्टीचा मुळांपासून नाश होऊ शकतो.
लैंगिक समानता हा आजच्या आधुनिक समाजाचा नारा आहे. हा तोच समाज आहे जो भौतिकवाद, स्वार्थ, अमानवीपणा, लोभ, दृष्टा, शक्ती आणि संपत्तीसाठी वेड, असल्या बुद्धीच्या आधारावर विकसित झाला आहे. अशा समाजात स्त्रियांची सुरक्षितता कशी काय होणार? हा समाज लैंगिक समानता व स्वातंत्र्यच्या नावाखाली बनावट स्वाभिमान प्रदान करून महिलांचा लाभ घेऊन फक्त स्वत:ची तहान तृप्त करू शकतो. आज समता आणि मुक्तीची खरी परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तीची मर्यादा आणि समता चे स्पष्टीकरण केल्याशिवाय यात पाऊल टाकणे अतिशय धोकेदायक आहे. स्त्रीच्या शोषणास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सामाजिक वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी वातावरण तयार करणेही गरजेचे आहे. पुरुषाचे अनुकरण करून स्त्री-जातीच्या विशिष्ट दर्जाचा केवळ अपमानच होईल आणि ही दुहेरी भूमिका बजावताना फसवणूकच स्त्रियांच्या हाती लागेल.

माननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा मनुष्य दुर्भाग्यशाली आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ‘तवक्कुल’ म्हणजे अल्लाहला आपला प्रतिनिधी बनविणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. पालनकर्त्याला प्रतिनिधी म्हणतात आणि सुख-समृद्धीबाबत विचार करणारा आणि वाईटापासून वाचविणाऱ्याला पालनकर्ता म्हणतात.
‘मोमिनचा प्रतिनिधी अल्लाह आहे.’ याचा अर्थ असा होतो की त्याला यावर दृढविश्वास असतो की अल्लाहकडून जे काही येते ती भलाई आहे, त्यातच माझ्याकरिता समाधान आहे, अल्लाह ज्या स्थिती ठेवील त्यावर मी आनंदी आहे. मोमिन स्वत:हून प्रयत्न करीत असतो आणि मग मामला अल्लाहच्या हवाली करतो आणि म्हणतो, ‘‘हे पालनकर्त्या! तुझ्या दुर्बल दासाने हे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी दुर्बल व विवश आहे. या कामात जी काही त्रुटी राहिली असेल तिला तू पूर्ण कर. तू वर्चस्वशाली व शक्तिशाली आहे.’’
एक मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.)! मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अगोदर तू तिला बांधून ठेव मग विश्वास ठेव.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : एखाद्या वस्तूला प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यांचा पूर्णत: अवलंब करा आणि मग अल्लाहपाशी दुआ करा की ‘‘मी उपाय केला आहे, आता तू मदत कर.’’ हे आहे ‘तवक्कुल!’
माननीय अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचे मन प्रत्येक डोंगरकपारीत भटकत असते. जर एखादा मनुष्य आपल्या मनाला डोंगरखोऱ्यात भटकण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला कोणती दरी त्याला नष्ट करील याची अल्लाहला पर्वा नाही. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवील त्याला अल्लाह त्या डोंगरकपारीत आणि मार्गांवरून भटकण्यापासून आणि नष्ट होण्यापासून वाचवील.’’ (हदीस : इब्ने माजा)
स्पष्टीकरण : जर मनुष्य अल्लाहला आपला प्रतिनिधी व पालनकर्ता बनवीत नसेल तर त्याचे मन नेहमी उद्विग्न राहील आणि अनेक मनोवृत्तींचे घर बनून राहील, परंतु जो मनुष्य आपल्या मनाला अल्लाहकडे वळवील त्याला निश्चिंतता प्राप्त होईल.
पश्चात्ताप आणि क्षमायाचना
माननीय अनस बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास गुन्हा केल्यानंतर क्षमा मागण्यासाठी जेव्हा अल्लाहकडे परततो तेव्हा अल्लाहला आपल्या दासाच्या परतण्यावर त्या मनुष्याच्या तुलनेत अधिक आनंद होतो, ज्याचे आयुष्य ज्या सांडणीवर अवलंबून होते ती सांडणी एखाद्या वाळवंटात हरवली असेल आणि मग त्याला ती अचानक सापडली असेल (तर ती सांडणी सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.) अशाच मनुष्याच्या पश्चात्तापाने अल्लाहला आनंद होतो. इतकेच नव्हे तर अल्लाहचा आनंद त्याच्या तुलनेत वाढलेला असतो कारण तो दया व कृपेचा स्रोत आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह रात्री आपला हात पसरतो जेणेकरून ज्या मनुष्याने दिवसा एखादे पापकर्म केले असेल त्याने रात्री अल्लाहकडे परतावे आणि दिवसा तो आपला हात पसरतो जेणेकरून रात्री जर एखाद्याने पापकर्म केले असेल तर त्याने दिवसा आपल्या पालनकत्र्याकडे परतावे आणि पापकर्मांची क्षमा मागावी. अल्लाह असेच करीत राहील, सूर्य पश्चिमेला उगवेपर्यंत (म्हणजे अंतिम निर्णयाचा दिवस येईपर्यंत). (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘अल्लाहचे हात पसरणे’ म्हणजे तो आपल्या पापी दासांना बोलवितो की 
माझ्याकडे या, माझी दया तुम्हाला आपल्या बाहूत घेण्यास तयार आहे. जर तुम्ही तात्पुरते भावनेच्या भरात रात्री पापकर्म केले असेल तर दिवस उजाडताच क्षमा मागा, जर उशीर कराल तर शैतान तुम्हाला आणखीनच दूर करील आणि अल्लाहपासून दूर जाण्यात आणि दूर जात राहण्यात मनुष्याचा नाश आहे.

- अबुल आला मौदूदी
कुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.
कुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.

आयएमपीटी अ.क्र. 12   -पृष्ठे - 32  मूल्य - 18      आवृत्ती - 4 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/uqsa7nfu1ubroxwrnzd8svunu9zs7h19

- सय्यद अबुल आला मौदूदी

या पुस्तिकेत कुरआन आणणाऱ्याचे कुरआन प्रस्तुत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच इतर धर्मांत त्यांच्या धर्मप्रवर्तकांना कसे ईशत्व देण्यात आले आहे, याविषयीचे संक्षिप्त वर्णन आले आहे.
प्रेषितांचे मनुष्यत्व स्पष्ट करून त्यांचे सामर्थ्य व शक्तीविषयीचे वर्णन आहे. अल्लाहने प्रत्येक राष्ट्रात व प्रत्येक काळात पैगंबर पाठविले आणि अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कार्य अखिल मानवजातीसाठी व सार्वकालिक आहे, त्याविषयी विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 11   -पृष्ठे - 24        मूल्य - 16            आवृत्ती - 6 (2013)


डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/l3trd88ujlm013ny4h34l8qlqisoo66q

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget