Latest Post

-अर्शिया शकील खान, नालासोपारा

प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्रियांचे स्थान, मर्यादा, हक्क मानसन्मान या बाबतीत नियमित चर्चा घडत आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीला पापाची जजनी, नरकाचे घर आणि सर्व मानवी संकटांचे उगमस्थान मानले जाते. ग्रीसमध्ये तर बऱ्याच काळापर्यंत या विषयावर चर्चा होती की स्त्रियांच्या शरीरात आत्मा आहे की नाही. अरबस्थानात मुलगी जन्माला आली की तिला जिवंत गाडले जायचे. भारतामध्ये मृत पतीच्या चितेवर सतीच्या नावावर तिला जाळण्यात यायचे. प्रत्येक राष्ट्रात व प्रदेशात स्त्रियांची फार वाईट अवस्था होती.
अल्लाहने आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यामार्फत स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त केले. अल्लाहने स्त्री व पुरुष यांना एका जीवापासून निर्माण केले गेले. दोघांना समान स्थान दिले. व्यावहारिक व सामाजिक घटनांमध्ये स्त्रियांच्या हक्कांना स्थान दिले जेणेकरून स्त्रियांचे शोषण होऊ नये. मालमत्तेत वारसाहक्क प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
‘‘स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्काधिकार आहेत जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत.’’ (सूरह अल बकरा – २२८)
अल्लाहने कुरआनमधील या आयतीद्वारे स्त्रियांच्या पूर्ण हक्कांची पूर्तता केली. तिला शिक्षण, प्रशिक्षणाचा अधिकार दिला. आपल्या पसंतीने लग्न करणे, पती व पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर आणि एकत्र राहणे शक्य नसेल तर विभक्त होऊन दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली. विधवा स्त्रियांच्या दुसऱ्या विवाहाला अनुमती दिली गेली.
महान कवी अल्लामा इक्बाल म्हणतात की, ‘‘कदाचित जर मी मुस्लिम नसतो आणि हे मान्य केले नसते की कुरआन हा ईशग्रंथ आहे, तर मग माझे मत असे असते की हा ग्रंथ कोणा बुद्धिवान स्त्रीकडून लिहिला गेला असावा. कारण कुरआनात स्त्रियांना इतके अधिकार दिले गेले आहेत की जे जगातील कुठल्याही धर्मात आढळत नाहीत.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींना प्रोत्साहन देताना ई. उरम्हगंम म्हणतो, ‘‘इस्लामच्या आधी स्त्रियांना खरा अभिमान व दर्जा प्राप्त नव्हता. चो मुहम्मद (स.) याच्या शिकवणींनंतर त्यांना मिळाला.’’
तसेच डी. बलॉडनने आपले पुस्तक ‘सुन्नत नबवी व जदीद सायन्स’मध्ये नमूद केले की ‘‘इस्लामने स्त्रियांना जे हक्क प्रदान केले ते इतिहासात कुठेही आढळत नाहीत.’’
सध्या ‘तलाक’चा मुद्दा खूप चर्चिला जात आहे. तलाक स्त्रियांवर अत्याचार आहे. वगैरे!
‘तलाक’ म्हणजे विवाहबंधनातून मुक्त होणे. तलाक हे विवाहबंधनातून मुक्त होण्याचे पहिले पाऊल नव्हे तर अंतिम पाऊल आहे. हा हक्क पती व पत्नी दोघांना देण्यात आला आहे. स्त्रीने घेतलेल्या तलाकला ‘खुलअ’ म्हणतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नींमध्ये स्वाभाविक भिन्नता, दुराचार, संकुचितपणा, एकत्र कुटुंब व्यवस्था अशा बऱ्याच कारणांमुळे विवाद झाले आणि मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे एकत्र राहणे अवघड होऊन बसले. इस्लामने तलाकची परवानगी दिली. थोडक्यात जखम असह्य झाली तर तो अवयव कापून टाकणे क्रमप्राप्त ठरते. इस्लाम ताबडतोब कारवाई करण्याचा आदेश देत नाही. कोणत्या वाईट प्रथेला नीट करण्याचे उपाय सुचवितो. नंतर नाइलाज झाला तरच ही अंतिम कारवाई किंवा शिक्षेचा आदेश देतो.
उदा. तलाकचा अगोदर वाद मिटविण्यासाठी असा उपाय सुचविण्यात आला आहे की पत्नीची समजूत घालावी. जर प्रतिसाद मिळाला नाही तर पती व पत्नीच्या नातेवाईकांकडून एक एक सदस्य नियुक्त करून मतभेदांची चौकशी करण्यात यावी आणि उपाय सुचविण्यास सांगावे. अर्थात अल्लाहने आपल्या कायद्यानुसार मानसाच्या चांगल्या जीवनाचा प्रारंभ केला आहे. आपल्याला त्याची जाणीव ठेवली पाहिजे. इस्लामी शिकवणींवर विचारमंथन केल्याने नक्कीच इस्लाम हा स्त्रियांचा रक्षक असल्याची आपली खात्री पटेल.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहची ९९ नावे आहेत, शंभरात एक कमी. ती मुखोद्गत करणारा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘मुखोद्गत करणे’ म्हणजे जो मनुष्य त्या नावांचा अर्थ व उद्देश जाणून 
घेईल आणि त्यांची निकड व मागणी पूर्ण करील, दुसऱ्या शब्दांत त्याचा अर्थ असा आहे की मनुष्याने ती गुणवैशिष्ट्ये आत्मसात करावीत आणि आपल्या संपूर्ण जीवनात त्या निकडींवर आचरण करावे.
या हदीसमध्ये सर्व नावांची यादी देण्यात आलेली नाही. ती नावे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या निकडी माहीत करून घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे मनुष्याने पवित्र कुरआनचे पठण करावे. त्यात अल्लाहने आपली सर्व गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत आणि त्यांच्या निकडी काय आहेत आणि मनुष्याने त्यांचा कशाप्रकारे लाभ घेतला पाहिजे हे सर्व कुरआनमध्ये सांगितले गेले आहे. परंतु त्यापासून पूर्णत: तोच लाभ घेऊ शकतो जो कुरआनचे पठण व समजून पठण करण्याची सवय लावून घेईल. मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ती आपल्या शब्दांत निकडींसह व्यक्त केली आहेत. त्या दोन्हींच्या अध्ययनांति माहीत होईल की अल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांपासून नामोस्मरण व मुखोद्गत कशाप्रकारे करण्यात यावे. आम्ही या ठिकाणी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये ज्यांचा कुरआनमध्ये वारंवार उल्लेख आला आहे आणि ज्यांपासून मुस्लिमांच्या प्रशिक्षणातून मोठ्या प्रमाणात काम घेण्यात आले आहे, उद्धृत करीत आहोत आणि तेही संक्षिप्तपणे, कारण हे पुस्तक तो विषय विस्तृतपणे सांगण्याची परवानगी देत नाही.
१. अल्लाह : हे त्या अस्तित्वाचे नाव आहे ज्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. हा शब्द एकमेव ईश्वराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासाठीही वापरला गेलेला नाही. हा ज्या मूळ शब्दापासून निर्माण झाला आहे त्याचे दोन अर्थ आहेत- प्रेमाने एखाद्याकडे झडप घालणे, पुढे जाणे आणि धोक्यापासून बचाव करण्यासाठी एखाद्याकडे धावणे आणि त्याच्या आश्रयात स्वत:ला झोवूâन देणे. अल्लाह आमचे उपास्य आहे. आमचे हृदय त्याच्या प्रेमाने भरलेले असावे ही त्याची निकड आहे. आमच्या मनात त्याच्या प्रेमाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही प्रेम असू नये. आमच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व शक्ती आणि क्षमता त्याच्यासाठी अर्पित असावीत. फक्त त्याचीच उपासना आणि दासत्व असावे. फक्त त्याच्याचपुढे नतमस्तक व्हावे आणि फक्त त्याच्याचसाठी भेटवस्तू व बलिदान सादर करावे. फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवावा आणि फक्त त्याच्याच कार्यासाठी स्वत:ला झोवूâन द्यावे. अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडेही संकटसमयी व कठीणसमयी मदत मागू नये. ही निकड आहे अल्लाहच्या उपास्य असण्याची आणि नि:संशय प्रोत्साहित झालेली निकड आहे.
२. रब : हा शब्द ज्या मूळ शब्दापासून बनला आहे त्याचे अर्थ आहेत- पालनपोषण करणे, संगोपन करणे, व्यवस्थित ठेवणे, अनेक धोक्यांपासून वाचवून आणि सर्व साधनसामुग्रीचे नियोजन करीत शिखरावर पोहोचविणे, अल्लाहचे ईशत्व एक स्पष्ट गोष्ट आहे. आईच्या उदरातील अंधारात हवा आणि अन्न कोण पोहोचवितो? जगात येणापूर्वी बालकाच्या अन्नाचे कोण नियोजन करतो? मग आई-वडील आणि दुसऱ्या लोकांच्या हृदयांत प्रेम निर्माण करणारा कोण आहे? असे घडले नसते तर मांसाच्या गोळ्याला कोण उठविल? त्याच्या गरजा कोण पूर्ण करील? मग हळूहळू शरीर आणि बुद्धीच्या क्षमतांची कोण वृद्धी करतो? तारुण्य व आरोग्य कोणाची देन आहे? मग ही जमीन व आकाशाचा कारखाना कोणासाठी चालत राहतो? हे सर्व त्याच्या ईशत्वाचे उपकार नाहीत काय? त्याच्याव्यतिरिक्त कोणी आहे काय? आणि तो त्याच्या ईशत्वात भागीदार आहे काय? जर फक्त तोच आमचे कल्याण करणारा आणि पालनपोषण करणारा आहे तर जीभ, हात, पाय, शरीर व प्राणाच्या सर्व क्षमता फक्त त्याच्याच बनून राहाव्यात, ही त्याची अगदी उचित निकड आहे. मग त्याने फक्त अन्नपाण्याचीच व्यवस्था केली नाही तर हे त्याच्या ईशत्वाचे उपकार आहेत की आमच्या जीवनाला योग्य स्थितीत ठेवण्यासाठी आणि आमच्या आत्म्याचे संगोपन करण्यासाठी त्याने आपला ग्रंथ पाठविला जो सर्व उपकारांमध्ये सर्वांत मोठा उपकार आहे. या उपकाराची निकड आहे की आम्ही त्याच्या ग्रंथाचा मान राखावा, त्याला आपले हृदय व आत्म्याचे अन्न बनवावे, त्याचा आपल्या जीवनात समावेश करावा आणि उपकृत गुलामाप्रमाणे जगभर त्याची चर्चा करावी आणि ज्या लोकांना त्याची रुचि व गोडवा माहीत नाही त्यांना तो माहीत करून द्यावा.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू पुण्यकार्य क्षुल्लक समजू नकोस. तू आपल्या बंधुला हसतमुखाने भेटलास तरी ते पुण्य आहे  आणि आपल्या हौदातील पाणी बंधुच्या भांड्यात ओत, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन मनुष्यांदरम्यान तडजोड घडवून आणा, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्ही एखाद्याला आपल्या वाहनावर बसवा, अथवा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवा हेदेखील पुण्यकर्म आहे. चांगले बोलणेदेखील पुण्यकर्म आहे. नमाजकडे उठणारे तुमचे प्रत्येक पाऊल पुण्यकर्म आहे. वाटेतील दगड व काटे बाजूला सारणे हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : बुखारी) 
स्पष्टीकरण : दुसऱ्या एका हदीसमध्ये आहे की ‘‘तुम्ही आपल्या संपत्ती व प्रतिष्ठेद्वारे एखाद्याला लाभ पोहचवाल, हेदेखील पुण्यकर्म आहे. एक मनुष्य आपले मत चांगल्या प्रकारे  सांगू शकत नसेल आणि तुम्हाला ती देणगी मिळाली असेल तर आपल्या बंधुची बाजू मांडणे आणि त्याचे मत स्पष्ट करून सांगणे, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्हाला शक्ती प्रदान  करण्यात आली आहे तर एखाद्या दुर्बलाची मदत करा, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुमच्याजवळ ज्ञान आहे, तेव्हा दुसऱ्यांना योग्य गोष्ट सांगणे, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ 
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक मुस्लिमावर ‘सदका’ (दान) करणे अनिवार्य आहे.’’ तेव्हा मी विचारले, ‘‘जर  एखाद्याजवळ देण्यासाठी काहीही नसेल तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याने कमवावे, स्वत: खावे आणि गरिबांनाही द्यावे.’’ मी म्हणालो, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘एखाद्या गरजवंत संकटात सापडलेल्या मनुष्याची मदत करावी.’’ मी विचारले, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना पुण्य करण्यास प्रोत्साहित करावे.’’ मी  म्हणालो, ‘‘जर तो असे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नये, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या बंधुच्या गरजेला उपयोगी पडणाऱ्या मनुष्याला त्याच्या गरजेच्या वेळी अल्लाह मदत करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : एका हदीसमध्ये आहे की ‘‘अल्लाहने आपले काही दास लोकांची मदत करण्यासाठी निर्माण केले आहेत. लोक आपली गरज त्यांच्यापर्यंत पोहचवितात आणि ते ती  पूर्ण करतात. हे लोक अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहचा राग आणि शिक्षेपासून सुरक्षित राहतील.’’ 
आचरणाचे शिष्टाचार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले की अल्लाहने सांगितले, ‘‘मी दुसऱ्या भागीदारांच्या तुलनेत अनेकेश्वरत्वापासून अधिक निस्पृह आहे. ज्या  मनुष्याने एखादे पुण्यकर्म केले आणि त्यात माझ्याबरोबर त्याने कोणा दुसऱ्याला भागीदार बनविले तर माझा त्याच्या आचरणाशी काहीही संबंध नाही. मी त्याच्या आचरणाने निराश  आहे. ते आचरण त्या दुसऱ्याचा वाटा आहे ज्याला माझ्याबरोबर भागीदार बनविले.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : विशेषत: पुण्याईची ईशकृपा लाभलेल्या लोकांनी आणि ‘दीन’चे कार्य करणाऱ्यांनी विचार करायला हवा की या हदीसमध्ये काय सांगितले गेले आहे. यात पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले की पुण्याईचे कसलेही कार्य असू दे, मग त्याचा संबंध उपासनेशी असो की व्यवहारांशी, नमाजशी असो की अल्लाहच्या दासांच्या सुश्रूषेशी, अथवा त्याचा उद्देश  देखावा आणि प्रतिष्ठा करणे असो की एखाद्या गटाकडून किंवा मनुष्याकडून शाबासकी मिळविण्याशी असो; अल्लाहपाशी त्याचे मूल्य फक्त शून्य असेल. जर त्याची प्रसन्नतादेखील  याचा उद्देश असेल आणि लोकांची प्रशंसा प्राप्त करणेदेखील त्याचा हेतू असेल तरीही ते आचरण वाया जाईल आणि जर सुरूवातीला अल्लाहच्या प्रसन्नतेने आचरणास प्रोत्साहन मिळाले  मात्र नंतर दुसऱ्यांच्या प्रसन्नतेने त्याची जागा घेतल्यास हेदेखील आचरण वाया जाईल. म्हणून अतिशय सतर्क राहावे लागेल. शैतान येण्याचे हजारो दरवाजे आहेत. अशा अदृश्य  शत्रूच्या हल्ल्यांपासून बचाव करण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे अल्लाहपुढे नतमस्तक होणे, त्याला आपली विवशता सांगणे, अल्लाहने मदत केली नाही तर दुर्बल मनुष्य शैतानाच्या  हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?

        - अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत लेखकाने मानवी जीवनाच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधून त्याच्या सोडवणुकीचे मार्ग सांगितले आहेत.
जो पर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, ``मी कोण आहे? मी कसा आहे? मी जबाबदार आहे की बेजबाबदार? स्वतंत्र आहे की अधिन, अधीन आहे तर कुणाचा? या जगातील जीवनाची निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती?
जीवनाच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लेखकाने तीन प्रकार सांगितले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 15     -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती - 7 (2013)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/e7fqimphcxncr0zez8m6k4zcv4j4j9tc

        - इनामुर्रहमान खान
या पुस्तिकेत मनुष्यस्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर एकच आहे की अनेक आहेत? त्याचे गुण कोणकोणते आहेत? मनुष्याचे ईश्वरांशी संबंध कोणते असले पाहिजे? मनुष्याचे यश व कल्याण कशात आहे? त्याचे अपयश म्हणजे काय?
ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे धर्म आहे. या प्रश्नांची अचूक उत्तरांवर मानवी जीवनाचे या जगातील व परलोकातील यश अवलंबून आहे, हे स्पष्ट केले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 14   -पृष्ठे - 12        मूल्य - 10            आवृत्ती - 9 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/mrsikqz2jav6b0rktica0g2tmqj77dj9


फेरोजा तस्बीह- 9764210789 
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)
बहुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना आपला विजय झाला, असे वाटत असावे. दिवसभर काम करून थकून भागून घरी आलेल्या पती बरोबर पत्नी जर असा वाद घालत असेल तर अशा पुरूषांचे जीवन यातनामय होवून जाईल, यात वाद नाही. वास्तविक पाहता पती जेव्हा थकून भागून घरी येतो तर त्याची अपेक्षा केवळ हीच असते की पत्नीने हसतमुखाने त्याचे स्वागत करावे. मुलांनी पळत येवून त्याची गळाभेट घ्यावी. घर त्याला एका संरक्षित किल्यासमान भासत असते. जेथे थकून भागून आल्यानंतर त्याला सुरक्षा व समाधान मिळण्याची अपेक्षा असते. हेच मिळत नसेल व घरी आल्याबरोबर पत्नीकडून उशीर का केला? आता पावेतो कुठे होते? अशा सारखे प्रश्‍न विचारले जातील व आल्या-आल्या पतीसमोर आपल्याच अडचणींची यादी मांडली जात असेल तर त्या पुरूषाची काय अवस्था होत असेल हे अल्लाहच जाणो. अशा पुरूषांना घरात संतोष मिळणार नाही, हे ही तेवढेच खरे. छोट्या-छोट्या गोष्टींना मोठ्या करून ज्या महिला पतीबरोबर वाद घालतात आणि प्रत्येक वेळी आपण खरे असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करतात, अशा महिला आपल्या पतीच्या नजरेतून उतरून जातात. अनेक महिला वाद घालताना टोकाची भूमिका घेतात. तुम्हाला जर पत्नी नाही सेवक पाहिजे असेल तर, मी चालली माहेरी तुम्ही तुमच्यासाठी अशी पत्नी घेऊन या जी उठता बसता तुमच्या आज्ञांचे पालन करेल.
अशा वर्तनापेक्षा प्रत्येक पत्नीने जर का हा विचार केला की, अल्लाहने आपल्याला पैसा कमावण्याच्या अपरिमित कष्टापासून सुरक्षित ठेवलेले आहे. आपल्यासाठी हे कष्ट आपला पती उपसतो आहे. तो कोण-कोणत्या परिस्थितीला तोंड देवून येत असेल त्यालाच माहित. पैसा कमाविणे सोपी गोष्ट नाही. गळेकापू स्पर्धेच्या आजच्या युगामध्ये हलाल मार्गाने पैसा कमावण्याएवढे दिव्य कोणतेच नाही. याची कल्पना जर महिलांनी ठेवली तर त्यांना त्यांच्या पतीच्या कष्टाचा अंदाज येईल व आपल्या अडचणी त्याच्या कष्टासमोर कसपटासमान वाटू लागतील. यातून त्यांच्या मनात पतीच्या हसतमुख स्वागताची इच्छा निर्माण होईल व त्या लहान सहान गोष्टीतून पतीला कसे समाधान मिळेल, यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी मला खात्री आहे.
इस्लामने महिलेला कुटुंब व्यवस्थेमध्ये केंद्रस्थानी ठेवलेले आहे. मात्र टीव्ही व सोशल माध्यमावर येणार्‍या सततच्या उलट-सुलट मालिकांमुळे अनेक महिलांची सारासार विवेक बुद्धी बाधित होत आहे. त्यातून अनेक महिलांना लाज, लज्जेचा विसर पडलेला आहे.
भारताच्या राज्यघटनेने स्त्री-लाही तेवढेच अधिकार दिलेले आहेत, जेवढे पुरूषांना दिलेले आहेत. अनेक महिला या अधिकारांचा खर्‍या अर्थाने लाभही घेत आहेत. मात्र काही महिलांमध्ये या सवलतींमुळे उर्मटपणा आलेला आहे. त्यांनी त्या उरमटपणामधून सातत्याने पतीच्या विरूद्ध भूमिका घ्यावयास सुरूवात केलेली आहे. त्यांना वाटते की आपण आर्थिकरित्या स्वतंत्र असल्यामुळे घराच्या प्रत्येक सदस्याला आपल्या बोटावर नाचवू शकतो. मात्र महिलांनी हे विसरता कामा नये की, महिलांची सर्वात मोठी संपत्ती त्यांची पवित्र वागणूक असते. ज्यामुळेच त्या कुटुंबामध्ये सन्माननीय ठरत असतात. महिलांनी आपल्या हट्टी स्वभावाला मुरड घालून पतीला साथ देण्याची भूमिका जर का घेतली आणि अडचणीच्या वेळेस पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला तर त्या महिलेचा सन्मान पतीच नाही तर घरातील सर्व सदस्य करतील, यात शंका नाही. मात्र आजच्या आधुनिक महिलांच्या वर्तणुुकीमुळे अनेक कुटुंबात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वैवाहिक कलाहांना सीमा राहिलेली नाही. फॅमिली कोर्टांची व त्यात येणार्‍या दाव्यांची, दोहोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा महिलांवर कौटुंबिक अत्याचार होतात तर त्याचे रक्षण करण्यासाठी कायदे आहेत. परंतु, महिलांच्या अशा उर्मट वागण्याने कुटुंबाला होत असलेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी कुठलाच कायदा नाही.
इस्लामने महिलांना लाज आणि लज्जेसह नेक वर्तन करण्याचा आदेश दिलेला आहे. मात्र आज अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांची नक्कल करत त्यांच्या सारखे दिसण्या आणि वागण्याचा प्रयत्न   करीत आहेत. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे वागणे, त्यांच्याचसारखे बोलणे, जाणून बुजून आपल्या वर्तनात आणत आहेत. अशा वर्तनातून पुरूषांसमोर आपले महत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा महिलांचा कल मग बेपर्दा राहण्याकडे वाढत आहे. अनेकवेळा अशा महिला आपल्या या वर्तनामुळे संकटात सापडतात. स्त्री-पुरूषांमध्ये यातून विनाकारण स्पर्धेचा भाव निर्माण होत आहे. ज्या महिला आपले स्त्रीत्व विसरून पुरूषांची कृत्रिम बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात त्या नेहमीच तोंडघशी पडतात.
अल्लाहच्या नजरेतही त्यांची ही कृती निंदणीय ठरते. महिलांनी आपल्या ह्या वर्तणुुकीसंबंधी आत्मपरिक्षण करावयास हवे. आपले अधिकार क्षेत्र म्हणजेच घर हे सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज राहील याकडे जर त्यांनी अधिक लक्ष दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पुरूषांसारखा पोशाख व त्यांच्यासारखीच वर्तणूक तात्काळ सोडावयास हवी.
महिलांना जो शरई पोशाख घालण्याची परवानगी आहे त्यात महिला ह्या नितांत सुंदर व सुरक्षित भासतात. याची आठवण प्रत्येक महिलेने ठेवावयास हवी. शिवाय, महिला म्हणून जे अधिकार आम्हाला इस्लामने दिलेले आहेत, ते पुरेसे आहेत. नवीन पिढीचे संवर्धन करून देशासाठी जबाबदार नागरिक घडविणे ह्यापेक्षा दूसरे मोठे काम असूच शकत नाही. हे काम ज्या महिला मन लावून करतील त्याच आपल्या पतीच्याच नव्हे तर कुटुंबाच्या व समाजाच्या आदरास पात्र राहतील, यात शंका नाही.

ढूंडनेवाला सितारों की गुजरगाहों का
अपने अफकार की दुनिया में सफर कर न सका
जिसने सूरज की शुआओं को गिरफ्तार किया
जिंदगी की शबे तारी़क सहेर कर न सका
स्टिफन विल्यम फ्रँक हॉकिंग, एक नास्तीक होते. उच्च कोटीचे भौतिक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्री होते. त्यांनी ईश्वराचाच नव्हे तर स्वर्ग आणि नर्क या दोन्ही संकल्पनांचा सुद्धा इन्कार केला होता. त्यांचे मत होते की, जे काही आहे हेच जीवन आहे. याच्या मागेही काही नाही व मृत्यूनंतरचे जीवन तर नाहीच नाही. आश्चर्य म्हणजे त्यांचे हे नास्तीक विचार त्यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांनीच सूक्ष्म नजर टाकली असती तर ते नक्कीच आस्तीक झाले असते. खंत या गोष्टीची आहे की, त्यांना ईश्वर असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने पटवून देण्यामध्ये मुस्लिमांना यश आलेले नाही. म्हणून एक कुशल वैज्ञानिक कुफ्र (सत्याचा इन्कार) च्या स्थितीत 14 मार्च 2018 रोजी जगाचा निरोप घेऊन गेला. म्हणून मला म्हणावेसे वाटते की, ”सॉरी स्टिफन! आम्ही तुला तुझ्याच भाषेमध्ये ईश्वर असल्याचे पटवून देऊ शकलो नाही.” 
वास्तविक पाहता उच्चशिक्षित नास्तीक लोक हे कुठल्याही धर्माविषयी पूर्वग्रह दुषित नसतात. म्हणून त्यांच्या समोर इस्लामच्या खर्‍या स्वरूपाची कार्यकारणभावासह मांडणी केल्यास ते तात्काळ इस्लामकडे आकर्षित होतात. याचा पुरावा हा की, मोरीस बुकॅले पासून ते किथ मूर पर्यंत अनेक वैज्ञानिकांनी इस्लामचा स्विकार केलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे आजही दरवर्षी सरासरी किमान 20 हजार मूळ ब्रिटिश नागरिक इस्लामचा स्विकार करतात. त्यातील बहुतेक नास्तीक असतात. इंटरनेटवर ” इस्लाम इन ब्रिटन” एवढे टाईप करताच शेकडो लोकांची यादी स्क्रीनवर चमकू लागते. ज्यांनी अनैतिक जीवनाला कंटाळून इस्लामच्या शीतल छायेत येणे पसंत केले. 
बुद्धीवादी व्यक्तिंसाठी स्टीफन हॉकिंगचे आयुष्य हेच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होते आणि आहे. स्टीफन हॉकिंग यांना जरी इस्लाम समजला नसला तरी त्यांच्या जीवनाकडे पाहून इतर लोकांना मात्र इस्लाम नक्कीच समजेल याची मला खात्री आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.
स्टिफनचा जन्म 8 जनवरी 1942 साली ऑक्सफर्ड मध्ये एका विज्ञाननिष्ठ परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम फ्रँक हॉकिंग तर आईचे नाव ईसाबेला होते. दोघेही औषध निर्माण शास्त्रामध्ये निपुण होते. स्टिफन शालेय जीवनामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना न्युरॉन मोटर अर्थात इनोट्रॉफिक लॅट्रल स्केलरॉसिस नावाचा दुर्धर रोग जडला. या आजारासंबंधी वैद्यक शास्त्रात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा आहे की, हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्या इसमाच्या मज्जासंस्थेचा हळूहळू विनाश करतो. 2. हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्याच्या हृदयाच्या पेशी हळूहळू निकामी होत जातात. मात्र जास्त वैज्ञानिक या आजारामुळे रूग्णाचा मेंदू बाधित होतो याच मतावर ठाम आहेत. म्हणून हे मानण्यास हरकत नाही की वयाच्या 21 व्या वर्षी झालेल्या या रोगामुळे स्टिफनच्या मेंदुतील न्युरॉन (जैविक रचना) हळूहळू बाधित होत गेले. ज्या कारणाने त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवू लागला. माता-पिता दोघेही वैद्यक शास्त्राशी संबंधित असल्याने त्यांनी तात्काळ तज्ञ डॉक्टर्सकडून स्टीव्हनवर उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी स्टिफनचे आयुष्य दोन वर्ष असल्याची भविष्यवाणी केली. तेव्हा स्टिफनने स्वतः म्हटले होते की, यानंतरचे (उर्वरित पान 7 वर)
त्याचे संपूर्ण जीवन हे बोनस आहे. 
15 मार्च 2018 रोजी जगातील जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रामध्ये स्टिफनच्या मृत्यूच्या बातमीमध्ये डॉक्टरांच्या या भविष्यवाणीचा उल्लेख ठळकपणे करतांना असे म्हटले गेले की,  स्टिफनने दोन वर्षात होणार्‍या संभाव्य मृत्यूला धोका दिला व ते पुढे 50 वर्षापेक्षा जास्त जगले. यासंबंधीचे माझे मत असे की, स्टीफनने मृत्यूला धोका नाही दिला तर अल्लाहने त्याला उदंड आयुष्य देऊन हे सिद्ध केले की, ”वल्लाहु आला कुल्ली शैईन कदीर” अर्थात अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यावर कादीर (वर्चस्व ठेऊन) आहे. तो काहीही करू शकतो. ज्याला तज्ञ डॉक्टरांनी दोन वर्षात मरणार असे घोषित केले त्याला 76 वर्षाचे उदंड आयुष्य देऊ शकतो. या एकाच गोष्टीवर सकारात्मकपणे स्टिफनने विचार केला असता तर त्याला ईश्वर असल्याचा साक्षात्कार झाला असता.
एका हायटेक व्हिलचेअरवर कपड्यावर कपडे रचलेले आणि त्यातून एक मुंडके दिसत असलेल्या स्टिफनला पाहताच दया येईल इतपत ते विकलांग होते. मात्र स्टिफनला एक यशस्वी आयुष्य देऊन अल्लाहने ती इंग्रजी म्हणही खोटी ठरविली की, A Healthy body can possess a healthy mind. ईश्वर असल्याचा हा पहिला पुरावा आहे. 
विकलांग अवस्थेतही न्युरो डिसीज म्हणजे मेंदू रज्जेचा विकार झालेला असतांनाही अल्लाहने स्टिफनला इतके वैज्ञानिक ज्ञान हस्तगत करण्यास पात्र बनविले की, तो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगाचे नेतृत्व करू शकला. हा ही ईश्वर असण्याचा दूसरा पुरावा आहे.
स्टिफन फक्त 76 वर्षाचे आयुष्य जगले एवढेच नाही तर त्यांनी जीवनाचा भरपूर आनंदही घेतला. त्यांनी एक नव्हे दोन लग्न केली. त्यांना तीन अपत्येही झाली. त्यांनी प्रेमही केले. ते ही आपल्याच मित्राच्या बायकोशी. स्टिफनने त्यांच्या हायटेक व्हील चेअरवर विशेष संगणक बसवून, त्यांच्यावर उपकार करणार्‍या डेव्हिड मेसनच्या बायकोशी, म्हणजे ऍलन मेसनशी प्रेम करून तिच्याशी दूसरे लग्न केले. ती स्टिफनची नर्स म्हणून काम करीत होती. अर्थात ते नास्तीक असल्यामुळे एक बायको असतांना, तिने दुर्धर आजारात साथ दिलेली असतांना, तिला सोडून आपल्या मित्राच्याच बायकोला त्याच्यापासून काढून स्वतः तिच्याशी लग्न करणे यात त्यांना कुठलाही अनैतिकपणा वाटला नाही. याबाबत आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य संगीताचा आस्वाद घेतला. शिवाय, जे भल्या-भल्यांना उपलब्ध होत नाही, अशी अंतराळची सफर सुद्धा केली. डोळे दिपवणारे यश, प्रसिद्धी मिळविली. अर्थात हे सर्व त्यांना देऊन अल्लाहने जगाला दाखवून दिले की, मला वाटले तर मी विकलांग व्यक्तीला सुद्धा एवढे वैभव देवू शकतो. बुद्धिमान लोकांसाठी स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे. 
स्टिफनच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी मेंदू बाधित झाल्यावरसुद्धा जे खगोलशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडले ते स्वस्थ मेंदू असणार्‍यांनासुद्धा जमले नाही, हे कसे शक्य झाले? स्पष्ट आहे सृष्टीच्या निर्मात्याने, तुम्हा आम्हाला तसेच सार्‍या जगाला हा संदेश दिला की, मेंदू स्वस्थ असो का बाधित असो, शरीर स्वस्थ असो का विकलांग असो, ज्याला जे आणि जेवढे द्यायचे आहे ते मी देऊनच राहणार. म्हणजे पुन्हा कुरआनची ही आयत, ” वल्लाहु अला कुल्ली शैईन कदीर” या ठिकाणी पुन्हा सिद्ध होते. स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू सुद्धा अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे.
1985 मध्ये जेव्हा स्टिफन वैज्ञानिकांच्या सर्न वर्ल्ड कॉन्फ्रन्ससाठी जेनेव्हा येथे गेले तेव्हा तेथे ते प्रचंड आजारी पडले. त्यांना तीव्र निमोनिया झाला. इतका की त्यांना वेंटीलेटरवर ठेवावे लागले. जेव्हा त्यांच्या प्रकृतीत फरक पडणार नसल्याची खात्री झाली तेव्हा त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांच्या पत्नी जेन ला वेंटिलेटर काढण्याची परवानगी मागितली. ज्या योगे स्टिफन यांना किमान शांतपणे मृत्युला सामोरे जाता येईल. मात्र जेन ने वेंटिलीटर काढण्याची परवानगी नाकारली व कसेबसे त्यांना परत इंग्लंडला आणले. त्या ठिकाणी त्यांच्यावर नव्याने उपचार करण्यात आले. मृत्यूच्या दाढेत गेलेल्या स्टिफनला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र हे करत असतांना डॉक्टरांनी स्टिफनच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडावे लागले. त्यामुळे त्यांची वाचा गेली. त्यानंतरही स्टिफन विशेष यंत्राच्या साह्याने 14 मार्च 2018 पर्यंत जगले. हा सुद्धा ईश्वर असल्याचा पुरावाच आहे. 
यातून प्रत्येक बुद्धिमान माणसाला हा धडा घेता येऊ शकेल की, अल्लाह हाच जीवन आणि मृत्यूचा मालक आहे. कोणाला किती आयुष्य द्यायचे याचा सर्वस्वी अधिकार त्याचाच आहे.
स्टिफनचे शोध हे ईश्वर असण्याचा पुरावा आहे
स्टिफन हॉकिंग यांचा बिग बँग थेअरीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात की, अनंत वर्षापूर्वी एक मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी ही विभक्त झाली. त्यांच्या या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर कुरआनच्या खालील आयातीचे अवलोकन करण्याचे आवाहन मी शोधनच्या प्रज्ञावंत वाचकांना करतो. 
1. “काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?” (संदर्भ ः कुरआन - सुरह अल्अंबिया- आयत क्रमांक 30)
या आयातीमध्ये दिले गेलेले जबरदस्त आव्हान पाहा! यात मानवजातीला विचार करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. यात दोन वैज्ञानिक सत्य मांडलेली आहेत. ज्यापैकी एक बिग बँग थेअरीच्या रूपात स्टीफनने मांडले. सातव्या शतकात जेव्हा कुरआन अवतरीत झाले तेव्हा सभ्य जगाला याची माहित नव्हती की आकाश व पृथ्वी एकसंघ होते व नंतर ते विभक्त झाले. 
2. “आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.” (संदर्भ ः कुरआन - सुरह अ़ज़्जरियात आयत नं.47)
स्टिफन हॉकींग यांनी आपले पुस्तक ’ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ मध्ये लिहिलेले आहे की, युनिव्हर्स (ब्रह्मांड) हे असिमीत आहे व त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. हे पुस्तक एवढे लोकप्रिय झाले की, त्याच्या 1 कोटी प्रती विकल्या गेल्या. यात स्टिफन ब्रह्मांडातील कृष्णविविरांच्या बाबतीत असे म्हटलेले आहे की, ही विविरे ज्यांना ते ब्लॅक होल असिमीत आकाराची आहेत. व त्यात ज्या गोष्टी एकदा आत गेल्या त्या बाहेर पडू शकत नाहीत. याबाबतीत कुरआनमध्ये अल्लाहने ब्रह्मांड स्वसामर्थ्याने बनविण्याचा दावा 1439 वर्षापूर्वी केलेला आहे. अर्थात जी गोष्ट जगाला स्टिफनने विसाव्या शतकात सांगितली ती गोष्ट कुरआनमध्ये सातव्या शतकात नमूद केलेली आहे. म्हणजेच कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे. 
एकंदरित स्टिफनचे जीवन आणि त्यांनी शोधानंतर मांडलेले वैज्ञानिक सिद्धांत हे कुठल्याही डोळस माणसाला अल्लाह आहे आणि तोच सर्व सृष्टींचा मालक आहे. त्यानेच आदम अलै. पासून या क्षणापर्यंत जन्मलेल्या लोकांना जन्माला घातलेले आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत येणार्‍या प्रत्येक माणसाला जन्माला घालणार आहे. तोच कर्ता, तोच करविता आहे. माणसाच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कुरआनला समजणे व त्यातील आदेशांचे पालन करणे याच्यातच दडलेले आहे. इतिसिद्धम.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget