Latest Post

    - जलालुद्दीन उमरी
    संपत्ती महान अल्लाहची फार मोठी देणगी आहे म्हणून प्रत्येकाने अल्लाहचेच ऋणी राहिले पाहिजे. परंतु मनुष्य संपत्तीला स्वत:च्या योग्यतेचे फळ मानतो. ही मानवी निचपणा आहे, याविषयीचे विवेचन मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या पुस्तिकेत प्रभावीपणे केले आहे.
    व्यिक्त, समाज व राष्ट्राला सुद्धा हे लागू पडते. ते सर्व स्वत:च्या संपत्तीत अल्लाहचा वाटा विसरले तर ते धनलोभी बनून लक्ष्मी भक्त बनतात आणि शेवटी विनाशाचे हे एक कारण बनते, हे सत्य स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 29    -पृष्ठे - 12    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vdnj47h8fufuoxdmwwgyvg5d51mvdehw

- अबुल आला मौदूदी
    पुस्तिकेच्या नावावरूनच कळते की यात एकेश्वरत्व व प्रेषित्व विषयीची तर्कशुद्ध चर्चा करण्यात आली आहे.
    कुरआन जर पैगंबर (स.) यांच्याच बुद्धीची उपज असती तर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईशत्वाचा दावा करावयास हवा होता. जर त्यांनी असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्याने कृष्णाला भगवान ठरविण्यात मागेपुढे पाहिले नाही, ज्याने बुद्धाला आपोआप उपास्य बनविले, ज्याने येशुला ईश्वर पुत्र मानले, ज्याने ह्या, अग्नी, ग्रह, तारे अशा अनेकांची पूजा केली, त्या जगाने अशा महान, अद्भूत व प्रचंड सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला निश्चितच ईश्वर मानले असते,याची चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 28    -पृष्ठे - 24     मूल्य - 10            आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/sx6jhwr9ltwu2c0kqmcfg1gelnmn84lo

लेखक - मौलाना वहिदुद्दिन खान   
भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी

   
   

    आयएमपीटी अ.क्र. 26     -पृष्ठे - 36      मूल्य - 18                आवृत्ती - 2 (2016)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/z9lm31edb135degmun4di644nmzxcsob

    - शम्स पीरजादा
   
    या पुस्तिकेत जे काही लिहिले आहे ते आजसुद्धा लागु पडते. पुरोगामी व नव-संस्कृतीचे पाठीराखे म्हणतात, आज राजकीय व आर्थिक क्षेत्रा धर्मापासून वेगळे आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र धर्मापासून अलग केले पाहिजे ज्या निधर्मीपणाचा शिक्का बाहेर चालतो तो घरातसुद्धा चालला पाहिजे.
    या विचारसरणीचे लोक देशात इस्लामला इतर धर्मांच्या रांगेत उभा करतात. इस्लाम ही एक ईशप्रदत्त परिपूर्ण जीवनपद्धती आहे, हे सत्य ते विसरतात. मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल देशात ह्याचमुळे गैरसमज पसरविला जात आहे, हे स्पष्ट केले आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 21     -पृष्ठे - 32      मूल्य - 18                आवृत्ती - 5 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/lsug4rtx7y540w906vvdikzdg3ir0sye

सर्व आभार ईश्वराचे मानते की सृष्टीचा निर्माणकर्ता अल्लाह/परमेश्वर आहे. आणि त्याचे आशीर्वाद मुहम्मद (स.) आणि त्याच्या कुटुंबावर आहेत.
           जर कुरआनमधे पूर्णपणे या विश्वनिर्मिती चे पुरावे स्पष्ट केले गेले आहेत तर मग पैगंबर मुहम्मद (स.)  यानी त्याचे स्पष्टिकरण का बरे दिले नाही जेव्हा की कुरआन त्यांवर अवतरित झाले होते. परंतु, प्रेषिताने त्यांच्या सोबत्यांना तेवढेच सांगितले जे  त्यांच्या काळासाठी योग्य होते. तथापि, जेव्हा सृष्टी, आणि कुराणचे रहस्य यासंबंधी ईशसंन्देश पैगम्बरावर अवतरित झाले , तेव्हा पैगम्बराने सोबत्याना तेवढेच ज्ञान दिले जेवढे त्या काळातील लोक आकलन करू शकले.
            कुराणच्या प्रकटीकरणाचा हेतू वैज्ञानिक शोध उघड करणे किंवा सृष्टीच्या गुपितांना स्पष्ट करणे असा होत नाही.  ह्या विश्वनिर्मिती ची प्रत्येक महत्वाची बाब कुरआन मधे लपलेली आहे आणि ती वेळेप्रमाणे पुराव्यानिशी सिद्ध होत आहे.  जसेजसे विज्ञान संशोधनात पुढे जात आहे तसेतसे कुरआन मधले श्लोक त्याच्याशी पुरक ठरत आहेत. यामुळे कुराणामध्ये प्रत्येक वैज्ञानिक शोध हा योग्य वाटतो जेव्हा तो संशोधनाद्वारे सिद्ध होतो. उदाहरणार्थ:” पृथ्वी वरील आकाश, किंवा वातावरण हे सात स्तरांचे बनलेले आहे. हे प्रत्येक थर मानवी जीवन आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवसृष्टीच्या फायद्यासाठी महत्वाची कामे करते. प्रत्येक थर विशिष्ट कार्य करते, ज्यामुळे रेणु तरंगांना परावर्तित करण्यापासून, उल्काचा हानिकारक प्रभाव दूर होण्यापासून, हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी पाऊस तयार होतो. हे एक अद्भुत चमत्कार आहे की, 20 व्या शतकाच्या तंत्रज्ञानाविना शोधून काढता येत नाही पण अशी वस्तुस्थिती स्पष्टपणे कुराणाने 1400 वर्षांपूर्वी स्पष्ट केली होती.” कुरआन सांगतो: तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. नंतर आकाशाभिमुख झाला आणि सप्तआकाश (सात थर)  बनविले. आणि तोच प्रत्येक गोष्टीला जाणतो आहे .(कुरआन 2:29)


 अशाप्रकारे. प्रेषिताने कुराणाचे काही बाबिंचे स्पष्टीकरण दिले नाही, जे कर्तव्ये आणि धार्मिक कायद्याच्या बाबींशी संबंधित नाही , अर्थातच ते वेळेनुसार  पुराव्यानिशी सिद्ध होईल.
            कुराण हे ईश्वराची वाणी आहे.  ईश्वर  त्याच्या श्लोकांना अरबी भाषेत “ आयात ” آيات - म्हटले आहे  ज्याचा अर्थ " चिन्ह " असा होतो. ईश्वर आयात् " آيات "  या शब्दाचा वापर त्याने निर्माण केलेल्या विश्वाचे (जसे की सूर्य, तारे, सर्व स्वरुपातील जीवन (सजीव),निर्जीव व ईत्यादी) वर्णन करण्यासाठी वापरतो.  सर्वशक्तिमान ईश्वर म्हणतो:
" निसंशय आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीमध्ये, रात्रंदिनाच्या परिवर्तनामध्ये आणि समुद्रांत वाहणार्‍या नौकांमध्ये ज्या लोकांना लाभ देतात आणि जे पर्जन्य अल्लाहने आकाशांतून वर्षविले, व मृत जमीनीला पुनरुज्जीवीत केले आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या सजीवांचा विस्तार केला तसेच हवेच्या परिवर्तनामध्ये आणि आकाश व पृथ्वीच्या दरम्यान निरपेक्ष सेवा करण्यास कार्यरत केलेल्या ढगांमध्ये त्या लोकांसाठी संकेत आहेत जे ज्ञानी आहेत . “  (अध्याय 2: श्लोक 164)
तर हे निशाण्या ह्या विश्वात आणि ईश्वराचे  पुस्तक “क़ुरआन्” या दोन्ही ठिकाणी उपस्थित आहेत जे काळानुसार एकमेकांशी पुरक ठरतील.
            आता, “ कुरआन ” या शब्दाचा अर्थ पाहुया.  अरबी भाषेतील " कुरआन " हे " वाचा " या क्रियापदापासुन प्राप्त झाले आहे.  याचा अर्थ " वाचणे " किंवा " वाचलेले " असा होतो . " कुरआन " या शब्दाचा उपयोग, फक्त ईश्वराचे वचन (ईशवाणी) त्याच्या प्रेषित मोहम्मद यांच्यापर्यंतच मार्गदर्शनासाठी आणि पुराव्याच्या कारणास्तव मर्यादित आहे .त्याचबरोबर ईश्वर कुरआन हे " पुस्तक " म्हणून देखील संदर्भित करतो. कारण जेव्हा ते वाचनाशी सबन्धित असते  तेव्हा त्याला " कुरआन " असे म्हटले जाते आणि जेव्हा ते लेखी स्वरूपामध्ये त्याच्याशी संबंधित असते तेव्हा त्याला " पुस्तक " म्हटले जाते.
            ऐतिहासिकदृष्ट्या, ज्याप्रमाणे कुराण एकत्रित केले गेले आणि त्याच्या पुस्तकी स्वरुपात लिहिलेले गेले होते, प्रत्येक श्लोक लिहून ठेवण्यासाठी दोन नियम लागू केले गेले: पहिला नियम की दोन सोबतींची साक्ष ज्याने हे श्लोक लक्षात ठेवले असेल आणि दुसरे नियम असा की हे श्लोक पैगम्बराच्या एका सोबत्याने लिहिलेले असेल.  फक्त एक श्लोक  वगळता कुरआनातील प्रत्येक श्लोक लिहित असताना  ह्या  दोन अटींची पूर्तता होणे गरजेचे होते. .  मात्र एक श्लोक असा होता जो लिखित सापडला परंतु तो फक्त एकाच सोबत्याने लक्षात ठेवला होता. नियमाच्या अटिनुसार हा श्लोक वगळणे गरजेचे होते.  मात्र इथे  एक घटना घडली  ज्यामध्ये सर्वसमर्थ ईश्वराचे ज्ञान आणि दया दिसून येते.  हा श्लोक एकाच सोबत्याने लक्षात ठेवला होता ज्याचे नाव  खुझैमा ( خزيمة )  होते . कुराण लिहित असलेल्या लेखकाला स्मरण आहे की एकदा पैगम्बर म्हणाले  "ज्या कोणाला  खुझैमाने  साक्ष दिली आहे ती त्यासाठी पुरेशी आहे". पैगम्बरानी याविषयी एका घटनेचा उल्लेख केला जी घडली जेव्हा पैगम्बर जिवंत होते. “एकदा पैगम्बराने एका माणसाकडुन पैसे उधार घेतले होते आणि नंतर त्याला कर्ज परत केले. काही दिवसानी तो माणुस आपल्या पैशांची मागणी करण्यासाठी पैगम्बराकडे  परत आला. तेव्हा पैगम्बर त्याला  म्हणाले कि मी तुझे कर्ज आधीच फ़ेडले आहे. तर मग हा माणूस पैगम्बराना म्हणाला की बोलवा एक साक्षीदार जो हा व्यवहार करताना उपस्थीत होता. तथापि, हा व्यवहार होत असताना कोणिही पैगम्बरासोबत उपस्थित नव्हते. तेव्हा खुझैमा पुढे आले आणि म्हणाले, "जेव्हा पैगम्बर तुम्हाला पैसे परत देत होते तेव्हा मी तिथेच होतो". तो माणुस  निघून गेल्यानंतर, पैगम्बराने  खुझैमाकडे वळुन पाहिले  आणि म्हणाले, "मला माहीत आहे की जेव्हा मी माझ्या कर्जाची परतफेड करत होतो, तेव्हा तिथे कोणीही नव्हते.  मग तुम्ही कसे म्हणालात  की तुम्ही माझ्याबरोबर होते? " खुझैमाने पैगम्बराकडे पाहिले व आत्मविश्वासाने म्हणाले, "मी तुम्हाला स्वर्गातून आणलेल्या सर्व खुलाशांवर विश्वास ठेवू शकतो, आणि मग ह्या छोट्याश्या व्यवहाराविषयी कसा अविश्वास दाखवु". तेव्हा पैगम्बराना हे कळुन चुकले की  खुझैमा ,जो सर्वात प्रामाणिक व सत्यप्रिय माणूस आहे कारण तो ईश्वराच्या संदेशाविषयी एवढा प्रामाणिक होता की तो एक लहान सांसारिक गोष्टीबद्दल अप्रामाणिक राहु शकत नव्हता.  जेव्हा पैगम्बराने  खूजैमाचा ईश्वरावरील विश्वास पाहुन अतिशय आनंदाने म्हणाले , " "ज्या कोणाला  खुजैमाने  साक्ष दिली आहे ती त्यासाठी पुरेशी आहे".   ( Al-Bukhari, Matn vol. 3, 225).
अशाप्रकारे आपणास कळाले कुरआन कसे लिखीत तयार झाले.  येथे एका विद्वानांने कुराणाची थोडक्यात व्याख्या सांगितली आहे: “ कुरआन म्हणजे ईश्वराचे वाणी/वचन जे प्रेषित मुहम्मदकडे मार्गदर्शनासाठी आणि त्याच्या संदेशाचा एक पुरावा म्हणून अवतरित करण्यात आले. "
            काही अर्थाने, कुरआन हे पूर्वी अवतरित झालेल्या सर्व पवित्रग्रथांसारखे(पुस्तक) आहे , जसे तोराह आणि इंजिल . ही पुस्तके अवतरित होण्याचा उद्देशही ईश्वराचा सन्देश स्पष्ट करण्यासाठी व मार्गदशनासाठी होता. ईश्वर म्हणतो,
 हे पैगंबर (स.), त्याने तुमच्यावर हा ग्रंथ(कुरआन) अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथांच्या सत्यतेची साथ देत आहे, जे पूर्वी अवतरले होते. यापूर्वी त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता तौरात व इन्जील अवतीर्ण केले आहे .(कुरआन 3:3)
  दुसर्या दृष्टिकोणाने बघितले असता  कुरआन हे दोन उद्देशासाठी अवतरित झाले आहे. : प्रथम मार्गदर्शन देणे आणि ईश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण करणे , आणि दुसरे म्हणजे एक प्रकटीकरण असणे आणि संदेष्टा ईशसंदेशाचा पुरावा देणे. तोरहमधे ईश्वराचे संदेश आणि कायदे सेट केले, तर मुसा (अ.स.) व त्यांचे कर्मचारी यान्द्वारे ते प्रकटीत झाले. इंजिल / बायबल मधे पण ईश्वराचे संदेश आणि कायदे सेट केले व त्याचे संदेष्टा येशू यावर ते प्रकटीत झाले. येशू त्याद्वारे आंधळ्या आणि आजूबाजूच्या रोग्यांना बरे करत असे हे  त्याचे चमत्कार होते. मात्र, कुराणाने ईश्वराचा संदेश आणि प्रेषित मुहम्मद (स.)यावर त्यांचे प्रकटीकरण व त्याचे चमत्कार याचे एकत्रिकरण केले
           यावरुन् तुम्हाला प्रश्न पडत असावा की सर्व ग्रंथ एकच ईशसन्देश सांगत असताना क़ुरआन व पुर्वीचे ग्रंथ प्रकटीकरणांमध्ये फरक का बरे आहे? कारण ईश्वराचे पूर्वीचे संदेश विशिष्ट कालावधीसाठी होते, आणि ते एका विशिष्ट लोकांसाठी होते; दुसरीकडे कुरआनचा संदेश सर्व मानवजातीसाठी आहे व  आणि न्यायाच्या दिवसापर्यंत तसेच राहणार आहे.  म्हणून, त्याचे चमत्कार सतत उपस्थित राह्तील. एखाद्या संदेष्ट्याच्या अनुयायांपैकी कोणत्याही व्यक्तीने हे सांगण्यास सक्षम असावे - कोणत्याही वेळी मुहम्मदच ईश्वराचा दूत होता आणि हे त्याचे चमत्कार आहे. एखादा असे म्हणू शकतो की येशू हा देवाचा संदेष्टा आहे, तथापि, तो किंवा ती म्हणू शकत नाही की हे त्याचे चमत्कार आहे.
मागील संदेष्ट्यांचा चमत्कार ज्योत जसा ज्योतीने चमकत होता तसा होता. जो कोणी त्या ज्योत ला पाहिले, एखादा साक्षीदार ती ज्योत विझल्यावर्, त्याची शक्ती आणि प्रकाश केवळ कथा सांगण्याद्वारे हस्तांतरित केले जाऊ शकते. आम्ही या सर्व चमत्कारांवर विश्वास ठेवतो कारण त्यांच्यात कुराणमधे यांचा उल्लेख आहे. (याचे reference तुम्ही कुरआन सुरह अलमायदा(५) मधे पाहु शकता.)
ह्यावर काहीजणाना हा पण प्रश्न पडत असेन की प्रेशित मुहम्मद (स.) व त्यांच्यापुर्वीचे प्रेशित हेच फक्त का बरे आम्ही ईश्वराचे संन्देशकर्ता मानायचे आणि फक्त मुहम्मद हेच फक्त सर्व मानवजातीसाठी ईश्वराचे शेवटचे संन्देशकर्ता आहे हे पण का बरे मानायचे ?  ईश्वर म्हणतो,
 मग हे पैगंबर मुहम्मद  (स.), आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ( *कुरआन ) पाठविला जो सत्य घेऊन आला आहे आणि अलकिताब (पूर्वकालीन ईश्वरीय ग्रंथ) पैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा व त्याचा संरक्षक व त्याची निगा राखणारा आहे, म्हणून तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्यापासून पराडमुख होऊन त्यांच्या इच्छेचे अनुकरण करू नका* - आम्ही तुम्हा (मानवा) पैकी प्रत्येकासाठी एकच शरीअत (जीवनाचा कायदा) व एकच कार्यप्रणाली निश्चित केली. जर तुमच्या ईश्वराने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह (उम्मत) बनवू शकत होता परंतु त्याने हे यासाठी केले की जे काही त्याने तुम्हा लोकांना दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसर्‍यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जावयाचे आहे, मग तो तुम्हाला सत्यःस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करीत राहिला आहात (कुरआन 5:48)

चलातर ईशसन्देशाच्या   प्रकटीकरण बद्दल चर्चा करूया. कारण ईश्वरास आपली दृष्टी पाहु शकत नाही किव्हा प्रत्यक्षात त्याचे बोल आपण ऐकु शकत नाही  आणि मानवाची( स्वरूप)  प्रकृती आणि निर्मिती  प्रत्यक्षपणे त्याला प्राप्त करू शकत नसल्याने ईश्वराचे  संदेश प्रकटीकरणाद्वारे वितरित करावे लागतात.

 पण प्रकटीकरणाचा अर्थ काय आहे? प्रकटीकरण म्हणजे गुप्तपणे किंवा शांतपणे कोणालाही माहिती पुरविणे असा होतो . उदाहरणार्थ,
जेव्हा एखादी व्यक्ती किवा  विक्रेता (सेल्समन) आपल्या दारशी येतो त्याक्षणी आपल्याकडे त्याला भेटण्याची वेळ नसते , तेव्हा आपण कदाचीत त्या व्यक्तीस आपल्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्यामार्फत विनंती करुन जाण्यास सांगतो, म्हणजे थोडक्यात, आपण आपल्या कुटुंबाच्या  सदस्या मार्फत शांतपणे  त्या व्यक्तीला पाहू इच्छित नसल्याचे सूचित करत असतो आणि आपली इच्छा व्यक्त करतो.

कुरआन मध्ये उल्लेख केलेल्या प्रकटीकरणाचे अनेक प्रकार आहेत. ईश्वराने देवदूतांकडे(फरिश्ते) प्रकट केले आहे.  प्रेशीत (संदेष्ट्यांच्या )व्यतिरिक आपल्या सृष्टीतील इतर लोकांपर्यंतही हे संदेश प्रकट केले आहे: जसे मुसाची आई वगैरे.
उधारणार्थ खालीनुमुद केलेल्या वचनात (आयात)

" आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव* .' "(कुरआन अध्याय 16: श्लोक 68)

याशीवाय सैतान  सुद्धा  स्वतःचे प्रकटीकरण करतात,व त्यांचे  प्रकटीकरण मानवांना चुकीचा मार्गाकडे व ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करतात.
उदाहरनार्थ, जेव्हा ईश्वराने मोमीन ला पाच वेळेस नमाज कायम करण्यासाठी सांगितलेली आहे मात्र आज तो या ऐहिक जीवनात स्वतः चे श्रेष्ठत्व प्राप्त करण्यात इतका मग्न झालाय  की त्याला नमाज कायम करणे ओझे वाटत आहे..ईथेच मनुष्यात सैतानाचे प्रकटीकरण होते जो  ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करत असतो.
परंतु जेव्हा प्रकटीकरणाचा शब्द वापरला जातो, तेव्हा त्याच्या एक विशिष्टपणे अर्थ सहसा घेतला जातो कि  ईश्वर त्याच्या विशिष्ट प्रेशीताद्वारे त्याच्या संदेशांना प्रकट करतो. खालीलप्रमाणे दीलेल्या श्लोकामधे(आयात) उल्लेख केल्याप्रमाणे तीन प्रकारचे प्रकटीकरण असु शकतात

“ कोणत्याही मनुष्याचा हा दर्जा नाही की अल्लाहने त्याच्याशी समक्ष बोलणी करावी. त्याची बोलणी एक तर वह्य (संकेता) च्या स्वरूपात होते, अथवा पडद्यामागून, अथवा मग तो एखादा संदेशवाहक (फरिश्ता) पाठवितो आणि तो त्याच्या आज्ञेने जे काही इच्छितो ’वह्य’ (बोध) करतो, तो उच्चतर आणि बुद्धिमान आहे .” (कुरआन 42:51)

चला तर एकेक प्रकटीकरणाचे प्रकार आत्मसात करून घेऊ या .

प्रथम: जेव्हा ईश्वर् एखाद्याला प्रेरणा देतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या मनात विचार मांडतो, नंतर व्यक्ती त्यावर कार्य करते . तथापि, आपल्याला माहिती आहे की अनेक कल्पना  जे  एखाद्या मनुश्याच्या डोक्यामध्ये प्रकट होतात, किंवा एखाद्याच्या हृदयात व्यक्त होतात. मग आपणास कसे कळेल कि  त्यांच्यापैकी कोणता संदेश हा  दिव्य संदेश आहे ? जेव्हा एका व्यक्तीला ऐश्वर्य प्रेरणा प्राप्त होते, तेव्हा त्या व्यक्तीस त्या विचारानमुळे  मनाशी पुर्णपने समाधान आणि मानसिक शांती जाणवते. ती व्यक्ती कोणतीही आक्षेप किंवा आत्म-संशय न घेता कार्य करेल/ करते. जरी अशी प्रेरणा कार्यरत करण्यास एखाद्या सामान्य विचारशील व्यक्तीच्या  मनाविरूद्ध असु शक्ते. कुरआन कडून या प्रकारच्या प्रकटीकरणाचे उदाहरण घेऊ या.

 “आम्ही मूसा (अ.) च्या आईला संकेत दिला की, ’’याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जिवाचे भय वाटेल तेव्हा त्याला नदीत सोडून दे आणि कसलेही भय आणि दुःख बाळगू नकोस  आम्ही त्याला तुझ्यापाशीच परत घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांत समाविष्ट करू.’’ (कुरआन 28:7)
कोणतीही स्त्री जी समजदार असो वा नसो  ती आपल्या मनात आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल भीती बाळगतच असते. तिच्या मनात सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे "माझ्याबाळाला कोणतीही इजा होवु नये"-  असे असताना ती तिच्या बाळाला समुद्रात फेकून देईल काय? आई स्वतःहुन आपल्या बाळाला मृत्युच्या दाराशी पाठवेल का? तरीदेखील प्रेशीत मुसा च्या आईने , ईश्वराने तिला प्रेरणा दील्याने  तीने आपल्या बाळाला नदीत टाकुन दिले असे करत असताना एखादी आई दुःखी होवुन जाते मात्र मुसाची आई हे कृत्य अगदी आनन्दाने व समाधानपुर्वक केले कारण तीला ऐश्वर्य प्रेरणा लाभलेलि होती.

दुसरे: एक पड्द्या आडुन प्रकटीकरण. प्रत्येक प्रमुख धर्माचा, जसे ज्यू ,ख्रिश्चन किंवा इस्लाम ईश्वराचे संदेश , काही प्रमाणात या  पद्धतीने संदेश   वितरित केले आहेत , उदाहरणार्थ, जेव्हा  मुहम्मद(स.) (पैगम्बराना ) याना पाच दैनंदिन प्रार्थना (नमाज) प्रारंभ व कायम करण्यासाठी आज्ञा देण्यात आली तेव्हा ईश्वराने त्याना  एका पडद्याच्या मागुन  सांगितले,  अगदी तसेच जसे पुर्वी  मुसा (अ.स.)  पैगंबराना  सांगितले होते.

आणि तिसरे: ईश्वराकडुन् पाठविलेल्या दूताच्या(फरिश्ते)  माध्यमातून प्रकटीकरण. कुराण चे अनन्य प्रकटीकरण एक थेट संदेशवाहक  ( जिब्राइल ) देवदूतास   पाठवून स्पष्टपणे प्रकट करण्यात आले. मुहम्मद(स.) पैगंबरावर  एका ऐश्वर्य प्रेरणे मार्फत  कुरआन प्रकट झाले नाही, किंवा ते पडद्याच्या मागुन  थेट ईश्वरा कडून भाषणा  मार्फत देखील झाले नाही. कुरआन हे एकमेव  ( जिब्राइल )देवदूतामार्फत पूर्णपणे वितरित करण्यात आले होते, म्हणून हे त्याचे मूळचे आहे याबद्दल काही शंका नाही.  ( जिब्रियल )देवदूत दाखल होऊन प्रकटहोण्याआधी मुहम्मद(स.) पैगंबर एक मोठ्या घंटानादाचा आवाज ऐकायचे व मग  देवदूत ( जिब्राइल )च्या  उपस्थितीत मुहम्मद(स.)  पैगम्बर याना  मोठा थकवा यायचा  व त्यांच्या  चेहऱ्याचा  रंग बदलुन जायचा . . .  जर ते आपल्या एका सोबत्याच्या शेजारी बसलेले असत व  सोबती वर आपले पाय  ठेउन विश्रांती घेत असतील, तर त्या व्यक्तीला प्रेशिताचे पाय इतके भारी वाटत असत  जसेकाही एक पठारच त्यांच्या पायावर ठेवले आहे. तसेच, प्रेशीत जर एखाद्या घोड्यावर किंवा उंटवर स्वारी करत  असतील तर प्राण्याला त्यांचे ओझे ईतके भारी वाटत असत की ते प्राणी अक्षरशःथकुन जात असत व चालण्यास खुप ताकत लावत असत.
प्रारंभी, देवदुताशी या तणावग्रस्त मुलाखतीमुळे  संदेष्टा ( मुहम्मद(स.)  पैगंबर ) वर थकवून टाकणारा परिणाम झाला. मग, पहिल्या काही (आयात) अध्यायांच्या साक्षात्कारांनंतर, एक विराम कालावधी आला आणि देवदूत  काहीकाळ परत आलेच् नाही. त्यावेळी मुहम्मद(स.)  पैगंबराना  प्रकटीकरणाची उत्कट इच्छा निर्माण झाली व ते दिव्य साक्षात्काराची राहुनराहुन आठवण  करु लागले. सामान्यत: जेव्हा आपण काहीतरी चुकवतो, किंवा जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो आणि नंतर अचानकपणे विश्रांती घेतो तेव्हा आपणास कठोर परिश्रमाचा गोडवा आणि यश मिळविण्याची इच्छा निर्माण होते . जेव्हा आपण विश्रांतीनंतर कामावर परत येतो तेव्हा ही भावना आपल्यासाठी  काम सुलभ करते.त्याचबरोबर् जेव्हा आपण प्रत्यक्षात ती  अपेक्षा करतो व त्यातून मिळविलेल्या सुखांचे निराकरण करतो तेव्हा आपण सहजपणे कष्टावर मात करू शकतो. अध्याय 9 4 मध्ये ईश्वर म्हणतो:

 (हे पैगंबर (स.)) काय आम्ही तुमचे मन तुमच्यासाठी उघडले नाही? आणि तुमच्यावरून ते भारी ओझे उतरविले जे तुमची कंबर खचवीत होते. आणि तुमच्याखातर तुमच्या लौकिकाचा नाद दुमदुमला. तर वस्तुस्थिती अशी आहे की, अडचणीबरोबर संपन्नताही आहे. निःसंशय अडचणींबरोबर संपन्नताही आहे. (कुरआन 94:1-6)
कुरआनच्या संदेशाच्या सत्यतेविषयी आणखी एक पुरावा लक्षात घ्या. कधीकधी पैगम्बराना (जिब्राईल) देवदुत् याच्यासोबत एका बैठकीत कुरआनचे एक दीर्घ अध्याय प्राप्त होत असे . जेव्हा प्रकटीकरण सत्र संपले, तेव्हा पैगम्बर आपल्या साथीदारांना नवीन श्लोकांचे पाठपुरावा तोंडी करायचे तेव्हा ते त्यांना खाली लिहून काढायचे . नवीन अध्यायचा तोंडी पाठपुरावा करायला शक्यतो 30 मिनिटे किंवा एक तासाचा वेळ लागायचा व  त्यादरम्यान त्यांचे सोबती ते अध्याय लिहून घेत असत ; आणि काही कालावधी नंतर जेव्हा प्रार्थनेची वेळ व्हायची , तेव्हा मुहम्मद(स.)   पैघंबर  तोच अध्याय ३० मिनिट् किंवा एक तास प्रार्थनांचे नेतृत्व करताना, शब्दशः तोंडी उस्फूर्तपणे आवाजात सांगायचे .
आपल्यापैकी कोणीही 30 मिनिटे  किव्हा एक तास बोलून   इतरांना आपले भाषण लिखित नोन्द करण्यास सांगू शकतो. तथापि, कोणिही मुखाने शब्दशः व  एक ना एक  अक्षर   पुन्हा एक तासाने त्या भाषणाची पुनरावृत्ती करू शकत नाही.
 मुहम्मद(स.)   पैगम्बर अध्यायचा एक ना एक शब्दाचा  अचूकपणे उच्चार करायचे हा आहे  पुरावा की कुरआन मधली ईशवाणी त्याच्याद्वारेच   प्रकटित झाली होती आणि उच्च शक्तीच्या माध्यमातून त्याच्या स्मृतीत पटल करण्यात आलेले होते.
 कुरआनमधील अध्याय एकमेकांना खूप समान आहेत, याचे उदाहरण म्हणजे काही श्लोकात तर एका अक्षराची  भिन्नता दिसते यावरुन हे लक्षात दिसुन येते की  मुहम्मद(स.)  पैगम्बर् यानी कुरआनचे प्रासंगिक भाषण किंवा सहज  वाचन हे एक सर्व सामान्य अर्थ घेउन केले नाही. ते कुरआनचे श्लोक वारंवार नमाझ मध्ये पठण करायचे. जे स्पश्ट, अचुक व काटेकोर पणे आत्मसात करणे एका साधारण मनुश्याला अतीशय कठिण आहे.
त्याचबरोबर प्रेशित मुहम्मद(स.)   द्वारे जे प्रकटेकरण झाले त्याचे काही चमत्कार प्रेशित मुहम्मद(स.)   द्वारे दिसुन आले कारण ते त्या कालावधीती लोकांपर्यंत योग्य होते. तथापि त्याचे चमत्कार अखेरीपर्यंत खुलासा करणे आवश्यक आहे. ही एक अशी देणगी आहे जिच्यामुळे काळानुसार या पृथ्वीचे संशोधन व शोध लावणे  चालुच आहे आणि त्याचे पुरावे कुरआन देत आहे व न्यायाच्या दिवसापर्यंत तो देतच राहील. यासाठी आवश्यक आहे की कुराणच्या सर्व भागांना नबीच्या वेळी समजावून सांगितले जाऊ नये.  कुराणात ईश्वर म्हणतो:
" लवकरच आम्ही यांना आमचे संकेत बाह्यजगतातही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगातसुद्धा, येथपावेतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुरआन खरोखरीच सत्याधिष्ठित आहे. काय ही गोष्ट पुरेशी नाही की तुझा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहे? " (कुरआन 41:53)
.म्हणूनच कुरआन हे ईशसन्देश सर्व मानवजातीसाठी आहे व मुहम्मद(स.) हे ईश्वराचेच पैगम्बर आहेत ज्याच्याद्वारे कुरआनचे प्रकटीकरण झाले. हेच सत्य सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक शोध आणि कुरआनचे पुरावे हे एकमेकांशी पुरक ठरत आहे.  व ते सातत्याने लोकांसमोर येत आहे व येतील….
                        
सिमा देशपांडे
 7798981535

मुल्यविहीन भौतिक शिक्षणाच्या प्रसारामुळे आज देशात प्रत्येक क्षेत्रात चरित्रहीन लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. चरित्रहीन हा शब्द ज्या विशिष्ट अर्थाने वापरला जातो तो अर्थ इथे अपेक्षित नाही. चरित्रहीन म्हणजे मानवतेला नुकसान पोहोचवणार्‍या सर्व अवगुणांचा समुच्चय असलेली माणसे असा घेण्यात यावा. आज कोणत्याही क्षेत्रात, कोणालाही विश्‍वासाने एखादे काम सांगून, निवांत बसता येण्यासारखी परिस्थिती नाही. सातत्याने ज्याला काम सांगितलेले आहे, तो ते काम नीट करत आहे किंवा नाही? याकडे लक्ष ठेवावे लागते. यात प्रत्येकाची ऊर्जा आणि वेळ विनाकारण वाया जातो. उदा. आपण एखादे घर बांधायला घेतले असेल तर बांधकामाचे सर्व साहित्य घर बांधणार्‍याला देऊन, आपण निवांतपणे आपल्या कामावर जावू शकत नाही. कारण आपल्या माघारी बांधकाम करणारा व्यवस्थित बांधकाम करेल, याची आपल्याला शाश्‍वती नसते. म्हणून त्याच्या बोकांडीवर उभे रहावे लागते. तो सिमेंटमध्ये माती तर मिसळत नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. आदर्श स्थिती तर अशी हवी होती की, बांधकामासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू पुरवून, त्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या कामाला लागायला हवे होते. पण बांधकाम करणार्‍याच्या चारित्र्यावर विश्‍वास नसल्यामुळे आपल्याला आपला कामधंदा सोडून त्याच्यावर देखरेख करीत बसावी लागते. हे झाले एक उदाहरण.
आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या अनेक गोष्टी अशा असतात की, त्यांच्यावर लक्ष ठेवल्याशिवाय त्या अपेक्षेप्रमाणे केल्या जात नाहीत. कारण त्या क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चरित्रहीन लोकांची संख्या जास्त असते. सारांश तक्वाविहीन (चरित्रहीन) लोकांची वाढती संख्या हे आजचे वास्तव आहे. आणि वास्तव नाकारल्याने प्रश्‍न संपत नाहीत. समाजाला अनैतिकतेची लागण झाली की, सामाजिक वातावरण विषक्त होऊन जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. आज समाजातून स्वार्थी, कपटी, लिंगपिसाट लोकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. पोलीस, कायदे व न्यायालये त्यांना रोखण्यास असमर्थ आहेत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा लोकांच्या उपद्रवाचा त्रास समाजातील संसाधनविहीन लोकांना जास्त होतो. हे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोक हेच समाजाचे खरे शत्रू आहेत. अशा लोकांची संख्या कमी करून चारित्र्यवान लोकांची संख्या वाढविण्यासाठी वार्षिक प्रशिक्षणाची व्यवस्था अल्लाहने रमजानच्या माध्यमातून केलेली आहे. ज्याप्रमाणे पोलीस खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात, त्याचप्रमाणे मुस्लिम सुद्धा खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात. एका दृष्टीने मुस्लिमांची समाजात पोजीशन (स्थिती) पोलिसांसारखीच असते. वाईट गोष्टीं (मुनकरात) चे उच्चाटन व चांगल्या गोष्टीं (मारूफात) ची प्रतिष्ठापणा हेच इस्लामचे उद्देश्य आहे. समाजामधून वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यापूर्वी आपल्या व्यक्तिमत्वातून त्यांचे उच्चाटन करणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण स्वत: दारू पीत असतांना दुसर्‍याला पीऊ  नको म्हणून सांगण्याचा कुठलाच नैतिक अधिकार आपल्याला नसतो. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वात वाईट प्रवृत्ती ठेवायच्या व समाजातून त्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करायचा, यापेक्षा मोठा विरोधाभास असूच शकत नाही.
समाजातून वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे मुस्लिमांनासुद्धा विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण दैनंदिन आणि वार्षिक अशा दोन स्तरावर असते. रोज पाच वेळेच्या नमाजच्या माध्यमाने माणसांच्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टींचा नाश केला जातो व चांगल्या सवयी रूजविल्या जातात. काही लोक नमाजमध्ये अनियमितता बाळगतात म्हणून त्यातही काही त्रुटी राहून गेल्या असतील तर वार्षिक प्रशिक्षणात ३० दिवसांचे उपवास (रोजे) ठेवण्यास भाग पाडून लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून उरल्या-सुरल्या त्रुटीही संपविण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आदर्श समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. 
तक्वा म्हणजे काय?
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ज्याप्रमाणे आपण जंगलातून जातांना स्वत:ला इजा होवू नये म्हणून काट्या-कुपाट्यापासून वाचत काळजीपूर्वक चालतो. त्याचप्रमाणे ज्या सवयींपासून माणसाला व पर्यायाने समाजाला नुकसान होईल, अशा गोष्टींपासून स्वत:ला वाचवून आयुष्याची वाटचाल करणे म्हणजे तक्वा.
सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यस तक्वा म्हणजे, अल्लाहची भीती बाळगून चांगले वागणे. चांगले चारित्र्य, चांगल्या सवयींमधून निर्माण होते व चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी, ’चांगल्या सवयी जपा’ असा सुभाषितवजा सल्ला देवून भागत नाही. म्हणून इस्लामने लोकांमध्ये चांगल्या सवयी रूजविण्यासाठी द्विस्तरीय अशी ठोस योजना, नमाज आणि रोजांच्या माध्यमातून दिलेली आहे. डोळ्यासमोर योजना असेल तर कोणालाही त्या योजने बरहुकूम चालणे सोयीचे असते. योजनेविना कोणतेही महान कार्य पूर्ण होऊ शकत नाही. ऐन वेळेसच्या जुळवा-जुळवितून फारसे काही साध्य होत नाही. तक्वा ऽ चारित्र्य भौतिक शिक्षणातून निर्माण होत नाही. म्हणून इस्लामने त्याच्या निर्मितीसाठी नैतिक शिक्षणाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था कशी आहे? हे पाहण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिमाने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला एकाच वेळी दोन युद्धांचा सामना करावयाचा आहे. एक अंतर्गत युद्ध तर दुसरे बर्हिगत युद्ध. अंतर्गत युद्धात राग, लोभ, द्वेष, मत्सर, भेदभाव इत्यादी मनोविकारांशी युद्ध करावे लागते. तर बर्हिगत युद्धात दुषित वातावरण, वाईट मित्र, अश्‍लिलता, नशा, इत्यादी वाईट गोष्टींशी युद्ध करावे लागते. सकृतदर्शनी हे युद्ध जरी सोपे नसले तरी त्या लोकांसाठी हे युद्ध सहज जिंकता येण्यासारखे आहे जे कुरआनच्या खालील निर्देशांवर ईमान (श्रद्धा) ठेवतात.
१. ” जे अल्लाहचे भय बाळगतात, परोक्षवर श्रद्धा ठेवतात, नमाज कायम करतात आणि जी उपजिविका आम्ही त्यांना दिली आहे, तिच्यातून खर्च करतात. जो ग्रंथ प्रेषित मुहम्मद सल्ल.वर अवतरित करण्यात आलेला आहे, अर्थात कुरआन आणि जे ग्रंथ प्रेषितांपूर्वी अवतरीत करण्यात आलेले आहेत त्या सर्वांवर देखील श्रद्धा ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवतात. असेच लोक आपल्या पालनकर्त्यांकडून सन्मार्गावर आहेत आणि तेच सफल होणार आहेत. ” (सुरे बकरा आयत नं. २,३,४,५). सुरे बकराच्या वर नमूद आयातींमध्ये चारित्र्य निर्मितीसाठी सात आवश्यक गुणांची अत्यंत प्रभावशाली पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. हे गुण ज्यांच्या अंगी रूजले ते खरे तक्वावान अर्थात चारित्र्यवान लोक असतील याची हमी स्वत: अल्लाहने दिलेली आहे आणि हेच लोक सन्मार्गावर आहेत आणि हेच सफल होणार याची शुभवार्ताही दिलेली आहे. ते सात गुण म्हणजे १. अल्लाहचे भय बाळगणे २. परोक्ष (गायब) वर श्रद्धा ठेवणे ३. नमाज कायम करणे ४. जे काही उपजिविकेचे साधन अल्लाहने दिलेले आहे त्यातून अल्लाहच्या मार्गामध्ये खर्च करणे. ५. कुरआनवर श्रद्धा ठेवणे ६. कुरआनच्या पूर्वी जे ईश्‍वरीय ग्रंथ अवतरले आहेत त्यांच्यावरही श्रद्धा ठेवणे ७. मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवणे. वरील सद्गुण अंगात बाणवल्याशिवाय माणसात तक्व्याची निर्मिती होऊच शकत नाही.
२. दुराचारांच्या नेतृत्वाखाली कधीच सदाचारी समाज आकार घेवू शकत नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, समाजात सदाचारी लोक, बहुसंख्येने असण्याची आवश्यकता असते. सदाचाराच्या बाबतीत कुरआन खालीलप्रमाणे निर्देश देतो, ”सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पुर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे करावे, तर सदाचार हा आहे की, जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर इमान ठेवतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथांवर, सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवतात. अल्लाहच्या प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपल्या नातेवाईकांवर, अनाथांवर, गरजवंतांवर, वाटसरूंवर तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनाची पूर्तता करतात आणि अडचणी, संकटे तथा युद्धप्रसंगी देखील सयंम राखतात, हेच लोक सत्यशिल (सदाचारी) आणि अल्लाहचे भय (तक्वा) बाळगणारे आहेत.” (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.१७७).
या आयातींमध्ये आयत क्रं. २,३,४ आणि ५ मध्ये नमूद केलेल्या सद्गुणांपैकी काही सद्गुणांचा पुनरूच्चार करून चार अतिरिक्त सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करणे, जकात अदा करणे, एकमेकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे आणि अडी-अडचणी, संकटाच्या काळात एवढेच नव्हे तर युद्ध प्रसंगी देखील संयम राखणे. या सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
३. रोजांच्या बाबतीत कुरआनमध्ये एक संपूर्ण आयातच अवतरित झालेली आहे ती खालीलप्रमाणे.
”हे ईमानधारकांनो! तुमच्यावर रोजे अनिवार्य केलेले आहेत. जसे की, तुमच्या पूर्वीच्या लोकांवरही अनिवार्य केले होते. जेणेकरून तुम्ही तक्वावान (धर्मपारायण) व्हाल.” (कुरआन : सुरे बकरा आयत नं. १८३).
कुरआन पुन्हा-पुन्हा चारित्र्यनिर्मितीच्या आवश्यकतेवर भर देत आहे. यावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, चारित्र्यवान व्यक्तीशिवाय कुठलाही समाज संतुलित प्रगती करू शकत नाही. या आयातींमध्ये रोजांचा सरळ संबंध चारित्र्यनिर्मितीशी जोडलेला आहे व म्हटलेले आहे की, रोजे हे फक्त धर्मपारायणतेसाठी अर्थात चारित्र्यनिर्मितीसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहेत.
ते कसे हे आता आपण पाहू. उदा. एक रोजदार आहे. त्याला दिवसातून चोरून खाण्या-पिण्याच्या शेकडो संधी मिळत असतात. सर्वांची नजर चुकवून सहज तो काहीतरी खाऊ-पिऊ शकतो. परंतु, तो असे करत नाही. भूक लागल्याने व्याकूळ होतो, तहान लागल्याने जीव कासावीस होतो पण सर्वकाही सहन करून सूर्यास्तापर्यंत तो संयम ठेवतो. असे करण्यास त्याला अल्लाहचे भयच भाग पाडते. स्पष्ट आहे रोजांमुळे अल्लाहचे भय अंगी बानवते. ३० दिवसाच्या कठिण प्रशिक्षणातून तो मग पुढील ११ महिने वाईट गोष्टींपासून लांब राहण्याची शक्ती प्राप्त करतो. म्हणजेच तो चरित्रवान बनतो. दैनंदिन नमाज आणि वर ३० दिवसांचे रोजे यापेक्षा सुलभरित्या चारित्र्यनिर्मितीची व्यवस्था जगात दूसरी नाही. रोजे म्हणजे फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहणे एवढेच नाही. रोजाच्या कालावधीमध्ये नुसते उपाशी रहायचे नसते तर डोळ्यांनी वाईट पहायचे नाही, कानांनी वाईट ऐकायचे नाही, तोंडाने वाईट बोलायचे नाही, दिवसभर सत्कृत्य करायचे, वाईट कृत्यांपासून दूर रहायचे. संधी मिळूनही जसे खायचे-प्यायचे नाही तसे संधी मिळूनही वाईट कृत्य करायचे नाही. शिवाय, जवळजवळ १४ तासांचा रोजा, त्यातून निर्माण होणारी भुकेची तीव्रता, या सगळ्यांची जाणीव प्रत्येक माणसाला सतत ३० दिवस होत राहते. त्यातून गरीबांना उपाशी राहिल्यामुळे होणारा त्रास प्रत्येक श्रीमंताला सुद्धा अनुभवता येतो. म्हणून रोजा ठेवणारी श्रीमंत मंडळी सुद्धा कुठलाही माणूस गरीबीमुळे उपाशी झोपणार नाही, यासाठी खर्च करण्यासाठी प्रेरित होतात.
४. ”लोकहो उपासना करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पुर्वीच्यांनाही निर्माण केलेले आहे. जेणेकरून तुम्ही (दुष्कृत्यांपासून) परावृत्त राहू शकाल.” (सुरे बकरा, आयत नं. २१).
या ठिकाणी सुद्धा अल्लाहने उपासना अर्थात इबादत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. उपासनेची सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे नमाज. दिवसातून पाच वेळेसची नमाज माणसामध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्याची हमी देते आणि ज्यांच्या सवयी चांगल्या असतात त्याचे चारित्र्य चांगले असते हे ओघाने आलेच. 
५.”हे श्रद्धावंतांनो! अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्त्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की, तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा हे ईशपारायणतेशी (तक्वाशी) अधिक निकट आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहा, जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची पूरेपूर खबर ठेवणारा आहे.” (सुरे अलमायदा आयत नं.८).
माणूस असेल किंवा जनसमूह त्यांच्यामध्ये न्यायबुद्धी असणे, चांगल्या चारित्र्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. न्याय हे फक्त आपल्या समुहाशीच नव्हे तर समाजातील सर्वच समुहाशी करणे हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्ती किंवा गटाशी काही कारणाने असलेले वैर आपल्याला त्यांच्याबरोबर न्याय करण्यापासून रोखत असेल तर ते आपल्या चारित्र्याचे सर्वात मोठे वैगुण्य ठरेल, या आयातींमध्ये याच महत्त्वाच्या गुणाकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
आदर्श समाज रचना
आदर्श समाजाची रचना, भौतिक शिक्षण घेतलेल्या, चंगळवादी शैलीत रंगलेल्या, अनैतिक जीवनशैली अंगिकारलेल्या, लोकांकडून होवूच शकत नाही. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना एव्हाना आलेला आहे. पश्‍चिमी जीवनशैली मुळे निर्माण होणार्‍या वाईट चारित्र्यांच्या लोकांचा कारखाना बंद पाडायचा असेल व आपल्य प्रिय भारत देशात चांगल्या चारित्र्याच्या लोकांची निर्मिती करावयाची असेल तर पश्‍चिमेकडून आलेल्या वाईट जीवनशैलीचे हे आव्हान मुस्लिमांनी स्विकारायलाच हवे. दुर्भाग्याने मुस्लिम समुदायातील एका मोठ्या वर्गाला हे आव्हान स्वीकारण्याची गरज वाटत नाही. उलट ते जन्माने जरी मुस्लिम असले तरी मनाने पूर्णतया पाश्‍चिमाळलेले आहेत. अशा लोकांनाही त्यांच्या मार्गापासून परावृत्त करून सद्मार्गाकडे आणण्याचे दुहेरी आव्हान चारित्र्यवान मुस्लिमांसमोर आहे. आज देशामध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांची गर्दी झालेली आहे. चांगल्या चारित्र्यांच्या लोकांची वाणवा आहे. ही जागा भरून काढण्याची सुवर्णसंधी, रमजाननिमित्त मुस्लिमांनी साधायला हवी. चांगल्या, सद्गुणी व जबाबदार नागरिक घडविणे यापेक्षा मोठी देशसेवा असूच शकत नाही.
सारांश - दुभंगलेली मने, वाईट चारित्र्य या आदर्श समाजाच्या रचनेमधील प्रमुख अडचणी आहेत. आपसातील असलेले वैरभावनेतून शत्रुत्व वाढते आणि त्यातून अनेक गुन्हे घडतात. एकमेकांविषयी प्रेम, दया, करूणा, बंधुभाव, सद्भावना या गोष्टी अल्लाहच्या उपासनेमुळेच आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अल्लाहच्या उपासनेपासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढेच हे सद्गुण आपल्यापासून दूर जातात. म्हणून मुस्लिमांनी रमजानची संधी साधून आपल्यामध्ये चारित्र्याची निर्मिती करण्याचे नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. नुकताच सुरू झालेला रमजानचा महिना हा खडतर प्रशिक्षण काळ आहे. या प्रशिक्षणात जो जीव ओतून स्वत:ला जेवढा प्रशिक्षित करील तेवढाच तो समाजोपयोगी होईल, याची खुनगाठ प्रत्येकाने बांधावी.
प्रत्यक्षात आपण पाहतो रमजान म्हणजे काही लोकांसाठी डायटींगचा महिना असतो. अशा लोकांची गरज अल्लाहला नाही, असे अनेक हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अनेक लोक या महिन्यात रात्रभर जागतात, मेजवाण्या उडवितात, दिवसभर झोपतात ही दिनचर्या सुद्धा अल्लाहला अपेक्षित नाही. आपले दैनंदिन काम करत, रमजानचे हे खडतर प्रशिक्षण घेणे यातच तर खरा आनंद आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना रमजानचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याची, सुंदर असे चारित्र्य निर्माण करण्याची व त्यातून देशसेवा करण्याची शक्ती दे. आमीन.

- एम आय. शेख
www.naiummid.com

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget