Latest Post

रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम 'मेसहेराती' करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय
सहेरी करण्यासाठी लोकांना जाग आणण्याकरिता काही लोकं घरोघरी जाऊन आवाज देऊन उठवतात. त्यांना 'मेसहेराती' म्हणतात. हे मेसहेराती लोकं गल्ली बोळात फिरून काही खास भक्ती गीते गात असतात, त्यांना ''सदा ए रमजान'' देखील म्हटले जाते. याला आपण 'रमजानची भूपाळी' म्हणू या.

सर्वात पहिले मेसहेराती आदरणीय बिलाल हबशी (निग्रो) होते. जुन्या काळात भा.रा. तांबेंची भूपाळी ''उठ उठी गोपाळा ...'' ही फार प्रसिद्धीस पावली होती. कारण सकाळी उठण्याचे महत्व जुन्या लोकांना कळले होते. सकाळी आणि विशेष करून पांढरं फाटण्यापूर्वीच्या वेळी वातावरणात एक प्लाझ्मा स्टेट तयार होते. म्हणजे एकावर एक असलेल्या हवेच्या थरावरचे ओझोनचे महत्वाचे थर हे खालील हवेच्या थरात मिसळले जाते आणि त्यावेळी प्रदूषणरहित शुद्ध हवा उपलब्ध होते. पण अशावेळी बंदिस्त घरात ढाराढूर झोपणारे निसर्गाच्या या देणगीला पारखे होतात. म्हणूनच आज वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातले आहे. फार कमी जण याबद्दल जागृत आहेत.

यावेळी उठण्याचे फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक कारणे देखील आहेत. उठायला उशिर झाला तर दिवसाची इतर कामे पुढे पुढे ढकलली जातात. कधी कधी त्या कामांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी काढावी लागते तर व्यापाऱ्यांना दुकान अर्धा दिवस बंद करावे लागते. सकाळी उठून दुकान उघडणाऱ्यांचा धंदा नेहमीच जोरात असतो. म्हणूनच त्या एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे -
''पहाटेचं झोपणं हे रोजीरोटीला आडकाठी आणणे आहे.''

अशाप्रकारे सहेरच्या वेळी खाने हे रोजाधारकाला फक्त अध्यात्मिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिक फायद्याच्या सवयीदेखील लावते.
पण आजकाल अलार्म घड्याळे, मोबाईल अलार्ममुळे या मेसहिरातींची गरज नाही, असे सांगण्यात येते. म्हणून हे मेसहेराती शहरी भागातून लुप्त झाले आहेत. पण आलं;अलार्म वाजल्यानंतरही घडीचे बटन किंवा मोबाईल अलार्मचे 'स्नूज'ऐवजी 'डिसमिस'चे बटन दाबून पुन्हा झोपणारे तरुण महाभाग खूप आहेत. अशा लोकांना सकाळी उठणे हे एक दिव्य वाटते. काही देशात तर अलार्म वाजल्यावर इलेक्ट्रिक पलंग हा आपोआप वर खाली हलवून त्यावर झोपणाऱ्याला जागे करतो, अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा माणसाची जागा मशीन घेऊच शकतं नाही, हेच खरं. त्यामुळे आजही या मेसहेरातीची गरज आहेच आहे.

ग्रामीण भागात आजही हे मेसहेरातीं बाकी आहेत. परंतु त्यांना आता फार विकृत नाव देण्यात आले आहे - ''सहेरी के फकीर''. खरे म्हणजे हे भिकाऱ्यांचे काम नाही, यापूर्वी नव्हते. एक धर्मकार्य आणि समाजकार्य म्हणून विनामूल्य ही सेवा केली जात होती, त्यामुळे त्या कार्याची अस्मितादेखील जिवंत होती. परंतु आज त्यांना 'सहेरी के फकीर' म्हणून ईदच्या दिवशी थोडं जास्त धान्य दान (फितरा) म्हणून दिला जातो. हे काम कुणी दुसरे करत नसल्यामुळे आणि पोटाला प्रपंच देखील लागलेला असल्याने जे फकीर लोकं हे करत आहेत, तेही काही कमी नाही. काही मेसहेराती भूपाळीसोबतच खंजेरी, डफलीदेखील वाजवतात. याचा फायदा सकाळी उठणाऱ्या मुस्लिमेतर चाकरमान्यांनाही होतो. आज झोपलेल्या समाजाला बोधप्रत भूपाळी गाऊन जागे करणाऱ्या मेसहेराती आणि मराठीत अजरामर प्रभातगीते लिहिणाऱ्या भा.रा.तांबेंची खरंच गरज आहे!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

इस्लाम धर्मात चंद्राचे नेमके काय महत्व आहे, त्याविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी रमजाननिमित्त केलेले विवेचन.
मशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारण्पणे चंद्रकोरीच्या उपयोग केला जातो. पहिली चंद्रकोर पाहूनच रमजानचे रोजे सुरु होतात आणि त्यानंतर येणाऱ्या 'शवाल' या अरबी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रकोर पाहूनच रमजानची सांगता होते आणि दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. अशाप्रकारे ही चंद्रकोर एकप्रकारे नैसर्गिक कॅलेंडरच आहे. कुरआनात  याविषयी म्हटले आहे -
''तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. '' - कुरआन  (10:5)
या श्लोकात वाढत्या आणि कमी होणाऱ्या चंद्रकला या फक्त तारखा निश्चित करण्यासाठीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. यापेक्षा जास्त चंद्राचे महत्व इस्लाम धर्मात नाही.
मशीद, मदरसा किंवा मुस्लिमांची लग्न पत्रिकेवर बहुतेकवेळा चंद्रकोर काढलेली असते. तुर्कस्थान, पाकिस्तान या मुस्लिमबहुल देशांच्या राष्ट्रध्वजावरही चंद्रकोर काढलेली असते. त्यामुळे आमच्या बऱ्याच मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, मुसलमान हे चंद्राची पूजा करत असतात.
मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सण १९२४ पर्यंत मुसलमानांची एक वैश्विक सत्ता होती, त्याचे मुख्यालय तुर्कस्थानातीळ इस्तंबूल होते. तेथील खलिफा हा जगातील समस्त मुस्लिमांचा खलिफा गृहीत धरला जात होता. त्या उस्मानी खिलाफत (राज्य प्रणाली)च्या ध्वजावर हिलाल (चंद्रकोर) होती. तेव्हापासून मुस्लिमांचे एक सांस्कृतिक चिन्ह चंद्रकोर बनले. अशाप्रकारे यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु याला काहीही धार्मिक आधार मुळीच नाही. चंद्र एक उपग्रह असून तो आपले काहीही बरे वाईट करू शकत नाही, तो पूज्य अजिबात नाहीये, ही समस्त मुस्लिमांची धारणा आहे, इस्लामचीही तीच भूमिका आहे. फक्त मुस्लिम समाज सौर कालगणना (सोलर केलेंडर) ऐवजी  ''चांद्र कालगणना (लुनार केलेंडर)'' नुसार आपले धार्मिक सण उत्सव साजरा करत असतो आणि ही कालगणना चंद्रावर अवलंबून असते.
चंद्र कालगणनेनुसार वर्ष हे ३६५ ऐवजी ३५५ किंवा ३५४ दिवसांचेच असते. त्यामुळे सौर कॅलेंडरच्या वर्षाच्या तुलनेत ते दरवर्षी दहा दहा दिवस मागे मागे येत असते. त्यामुळे पूर्ण ३६ वर्षात रमजान हा महिना पूर्ण इंग्रजी वर्षात फिरत असतो. त्यामुळे रमजान हा एखाद्या देशात कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंड हिवाळ्यात तर कधी ओल्या पावसाळ्यात येतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकांना नेहमीच एकाच ऋतूत रोजे ठेवण्याची पाळी येत नाही. सौर कॅलेंडरनुसार जर रोजे ठेवले गेले असते तर काही विशिष्ट देशांना भर उन्हाळ्यात दर वर्षी रोजे ठेवावे लागले असते. पण चांद्र कालगणनेचा हा नैसर्गिक फायदा रोजेधारकांना होतो. अशाप्रकारे निसर्गनियमांवर आधारित इस्लाम धर्म हा निसर्ग नियमांचे पालन करण्याचे एकप्रकारे संकेत देतो. कारण इस्लाम हा नैसर्गिक धर्म आहे. रमजानमधील आकाशातील चंद्रकोर जणू स्मित हास्य करत हेच सांगत असते.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

जशी सहिष्णुता एक प्रवूत्ती आहे, तशीच दहशतवाद हीदेखील एक प्रवृत्ती आहे. असंयम, असहिष्णुता व कुणाचीही भिती मनात नसणे ही प्रवृत्ती म्हणजे दहशतवाद होय. कायदा, पोलीस व सरकारी यंत्रणा कुणाचं काहीही बरंवाइट करू शकत नाही कारण या ऐहिक संस्थांना अनेक मर्यादांनी वेढलेले आहे. अमर्याद अशा एका प्रचंड सार्वभौम शक्तीची भिती माणसावर असणे आवश्यक आहे. ती शक्ती म्हणजे ईश्वर होय. ईश्वराची प्रेमयुक्त भिती मनात जपण्यासाठी उपवास हे प्रभावी साधन आहे. सध्या उपवासांचा रमजान महिना सुरू आहे. यानिमित्त दहशतवादाच्या निर्मूलनात रमजान कसे सहकार्य करू शकतो यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे. 
रमजान महिन्यात ईश्वराने त्याचा सर्वात शेवटचा ग्रंथ कुराणाचे अवतरण केले. कुराण हा रमजानचा आत्मा आहे. कुराणावर जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी उपवास ठेवले जातात. शांततेचा संदेश देणाऱ्या कुराणाला आत्मसात करण्यासाठी उपवास ठेऊन आपल्या अंतकरणात ईशपरायणतेचा प्रकाश आवश्यक आहे. कारण कुराणाची शिकवण ही मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. कुराणात ईश्वर सांगतो:
‘‘... खुनी अथवा जगातील दहशतवाद्यांशिवाय इतर कुणालाही ज्याने ठार केले त्याने जणू समस्त मानवांना ठार केले आणि ज्याने एखाद्याचा जीव वाचविला त्याने जणू समस्त मानवांचा जीव वाचविला.’ परंतु त्यांची (इस्रायली लोकांची) अवस्था अशी आहे कि, आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड-उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात भूतलावर आंतक माजविणारे मोठ्या संख्येने अतिरेकी आहेत’’
-भावार्थ:  कुराण (५-३२)
इस्रायली लोकांना उपदेश देण्यासाठी आलेल्या प्रेषितांवर अवतरित ग्रंथांवर त्यांची श्रद्धा असल्याचे ते सोंग करत होते. परंतु त्यावर आचरण न करता भूतलावर दहशतवाद पसरविण्याचे घृणास्पद काम करत होते. कारण त्यांची ग्रंथावरची श्रद्धा प्रामाणिक नव्हती. प्रामाणिक श्रद्धेसाठी ईश्वराच्या प्रकोपाची भिती, ईशप्रेम व ईश्वराच्या कृपेची अभिलाषा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यालाच तकवा म्हणजे ईशपरायणता म्हणतात. ही ईशपरायणता नसानसात भिनली पाहिजे यासाठीच रमजान महिन्यात उपवास हे कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहे. म्हणून हे उपवास ठेवणाऱ्यांनी कुराणानुसार आचरण करायलाच हवं हे ओघानं आलंच. उपरोक्त श्लोकावरून कळते कि, जगभरातला दहशतवाद समूळ नष्ट करण्याची जबाबदारी उपवास ठेवणाऱ्यांची आहे. त्यांनी कुराणाच्या शांती संदेश जगभरातल्या समस्त मानवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. उपवासामुळे संयम, सहिष्णूता व ईश्वराची प्रेमयुक्त भिती म्हणजेच ईशपरायणता उत्पन्न होऊ शकते. गरज आहे फक्त उपवासाची वास्तविकता समजून उपवास ठेवण्याची, कुराणावर आचरण करण्याची आणि त्याचा सर्वांना परिचय करून देण्याची! अशाप्रकारे रमजान व रोजे यांच्या संस्कारातून येणाऱ्या सहिष्णुतेचा सुगंध वर्षभर दरवळू द्या, आमीन!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

माणूस हा समाजशील, दुसऱ्या शब्दात, कळपात राहणारा प्राणी आहे. संवाद हा समाजाचा आत्मा असतो. पण आज सोशल मीडियाच्या युगात संवादच हरवलाय. आज लाखो कोस दूरवरच्या माणसाशी चॅट करायला वेळ आहे पण आपल्याजवळ शेजाऱ्यांसाठी दोन मिनिटे नाहीत. अशावेळी गेट टू गेदर, स्नेह संमेलनं फायदेशीर ठरतात. अशाचप्रकारे रमजान व ईदनिमित्तदेखील परस्पर सुसंवादाच्या माध्यामातूनही जातीय सलोखा कायम राहू शकतो. इफ्तारच्या फराळाचा आस्वाद घेतांना शिरकुर्म्याच्या दुधात साखर व कुर्मा (खारिक/खजूर) मिसळावी त्याप्रमाणे ईदच्या दिवशी माणसांची मनं एकमेकांत मिसळतात. धन्य-धन्य तो अल्लाह! ज्याने आम्हाला विविधतेने नटलेल्या या देशात जन्मास घातले! गरमागरम सुगंधीत शिरकुर्मा रिचवताना गप्पा रंगतात. ‘काय खबरबात, खुशाल? वावरात काय पेरलं आणि पोरगी कुठे दिली? यासारख्या विषयांवर गप्पा मारल्या जातात. तर तरूण घोळक्यात ‘ग्रॅज्युएशननंतर काय करणार? किंवा ईदनिमित्त कोणत्या टॉकीजवर कोणता नवीन पिक्चर लागला’ वगैरे.
 पण इतर खाजगी गोष्टींसह ज्या मुख्य मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यावर सहसा कुणी बोलत नाही, तो म्हणजे या ईदचा, रमजानचा मूळ उद्देश! कोणतीही गोष्ट आपण का करतो हे जर ती गोष्ट करणाऱ्याला माहीत असणे अभिप्रेत असते. त्यामुळे कोणताही धार्मिक उत्सव किंवा विधी आपण का पार पाडत आहे हेही प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याविषयी आपण एकमेकांना विचारायला हवे. ‘कपडे कितीला घेतले' किंवा ‘शिरकुर्म्याचं दूध काय भाव घेतलं’ अशा शुल्लक गोष्टींऐवजी ‘‘ईदच्या दिवशी जिथे नमाज पढली जाते, त्या ईदगाहच्या मैदानावर मूर्ती किंवा काहीही अधिष्ठान मांडलेले नसते. मग तिथं उपासना होते तरी कशाची?" "तुझा देव कोणता?" "तुझे देव किती ?", "तुझा ग्रंथ कोणता?"" तो कुणी लिहिला अन् कुणी सांगितला?" या सर्व प्रश्नांवर बिनधोक मुद्देसुद चर्चा व्हायला हवी. "नाही बा! धर्माबिर्माचं काही विचारायचं नाही. उगीच त्याला राग आला तर?" ही भीती नको. एकमेकांच्या श्रद्धा, धर्मभावना समजून घ्यायला हव्या. मनात साचलेल्या गढूळ डोहाला रमजाननिमित्त मोकळी वाट करून द्यायला हवी. आपण सर्व एकच वडिल आदम व एकच आई हव्वाची संतती असून परस्परांचे बांधव आहोत, एकाच ईश्वराचे भक्त आहोत, असा संदेश देणारे कुरआन रमजानमध्ये अवतरीत झाल्याची आणि त्यामुळेच रमजान साजरा केला जात असल्याची माहिती सर्वांना करून देण्याची गरज आहे. त्यासाठी संवादाची गरज आहे, सोशल मीडियावर "तू तू - मै मै" ची नव्हे! या रमजानच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा सामाजिक संवादाला नवी झळाळी देऊ या इन्शा अल्लाह!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान इस्लामचे अभ्यासक आहेत)

    - जलालुद्दीन उमरी
    संपत्ती महान अल्लाहची फार मोठी देणगी आहे म्हणून प्रत्येकाने अल्लाहचेच ऋणी राहिले पाहिजे. परंतु मनुष्य संपत्तीला स्वत:च्या योग्यतेचे फळ मानतो. ही मानवी निचपणा आहे, याविषयीचे विवेचन मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या पुस्तिकेत प्रभावीपणे केले आहे.
    व्यिक्त, समाज व राष्ट्राला सुद्धा हे लागू पडते. ते सर्व स्वत:च्या संपत्तीत अल्लाहचा वाटा विसरले तर ते धनलोभी बनून लक्ष्मी भक्त बनतात आणि शेवटी विनाशाचे हे एक कारण बनते, हे सत्य स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 29    -पृष्ठे - 12    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vdnj47h8fufuoxdmwwgyvg5d51mvdehw

- अबुल आला मौदूदी
    पुस्तिकेच्या नावावरूनच कळते की यात एकेश्वरत्व व प्रेषित्व विषयीची तर्कशुद्ध चर्चा करण्यात आली आहे.
    कुरआन जर पैगंबर (स.) यांच्याच बुद्धीची उपज असती तर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईशत्वाचा दावा करावयास हवा होता. जर त्यांनी असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्याने कृष्णाला भगवान ठरविण्यात मागेपुढे पाहिले नाही, ज्याने बुद्धाला आपोआप उपास्य बनविले, ज्याने येशुला ईश्वर पुत्र मानले, ज्याने ह्या, अग्नी, ग्रह, तारे अशा अनेकांची पूजा केली, त्या जगाने अशा महान, अद्भूत व प्रचंड सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला निश्चितच ईश्वर मानले असते,याची चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 28    -पृष्ठे - 24     मूल्य - 10            आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/sx6jhwr9ltwu2c0kqmcfg1gelnmn84lo

लेखक - मौलाना वहिदुद्दिन खान   
भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी

   
   

    आयएमपीटी अ.क्र. 26     -पृष्ठे - 36      मूल्य - 18                आवृत्ती - 2 (2016)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/z9lm31edb135degmun4di644nmzxcsob

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget