Latest Post

- इनामुर्रहमान खान
   
    अल्लाह सर्वसत्ताधिकारी आहे, तोच मालक, पालक, नियंता व शासक आहे. अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणीही भागीदार नाही. अल्लाह स्वयंभू आहे. आदर्श जीवन एकेश्वरत्वावरच अवलंबून आहे. अल्लाहशिवाय इतर कोणीही उपास्य नाही आणि अन्य कोणीही शासनकर्ता नाही.
    याउलट नास्तिकता, भौतिकता आणि अनेकेश्वरत्व जोडण्यापेक्षा फोडण्याचे काम करतात. या दोघी भटक्या भगिणी मानवी स्वभावाला प्रेमळ व मित्रत्वाचे न बनवता संघर्षरत व विरोधक बनवितात. मुस्लिम समाजाचा एकेश्वरत्व प्रारंभ व अंतसुद्धा आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 34    -पृष्ठे - 32       मूल्य - 18                आवृत्ती - 6 (2013)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/v8ou14j1yyczoimwtqkmmafwsmwi618l

- स. जलालुद्दीन उमरी
    या छोटेखानी पॉकेट बुकमध्ये मानवी एकता इस्लाम कशी स्थापित करतो. या विषयीचे विवेचन आले आहे. जीवनाला एका उद्देशाची गरज आहे. परंतु जीवनाचे चुकीचे उद्देश निश्चित केल्याने ते मानव जातीच्या विघटनास कारणीभूत ठरतात.
    आजच्या विश्वव्यापी बंधुत्वाच्या कल्पना व उणीवा स्पष्ट करून जीवनोउद्देश चुकीचे असल्याने ते शत्रुत्वाला जन्म देतात हे स्पष्ट करून मानवी एकतेचा इस्लामी पाया स्पष्ट करून सांगितले. संपूर्ण मानवजात एकाच अल्लाहची निर्मिती व सेवक आहे आणि मानव जातीचे मूळ एक आहे आणि मानवजातीची एकता भंग करणे विकृती आहे.

आयएमपीटी अ.क्र. 33   -पृष्ठे - 18    मूल्य - 10      आवृत्ती -3 (2011)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/knq9hure4vjvzn13lnh0foo60kymlwpt

- अबुल आला मौदूदी
    या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासून सुरू होत असेल, असे स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांच्या संकल्पनेचा प्रारंभ कसा झाला याचे विवेचन यात आले आहे. कुरआन व हदीस द्वारा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि इस्लाम मानवी मौलिक अधिकार बहाल करतो, हे सिद्ध केले आहे
आयएमपीटी अ.क्र. 32    -पृष्ठे - 24           मूल्य - 07           आवृत्ती - 2 (2005)



डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/133zfgz6oj4qqjif4rqqfpkiz3be9ruv

 -अनुवादक : अब्दुल हुसैन मनियार
    या पॉकेट साईझ पुस्तिकेत मानवी जीवनात आदर्शाची आवश्यकता सांगितली गेली आहे. आदर्श खरेतर मापदंडाचे काम करतो.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन समस्त मानवजातीसाठी आदर्श आहे. त्याचे संपूर्ण जीवन प्रकाशासारखे स्पष्ट आहे. या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अत्यल्प जीवन चरित्राची झलक आणि त्यांच्या शिकवणुकीची झलक देण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 31     -पृष्ठे - 8     मूल्य - 06         आवृत्ती - 5 (2014)




डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/ral3g6xva7qvclq602ubwroo9ec5e2nf


  - एस. एम. इक्बाल
    या पुस्तिकेत लेखकाने सांगितले की, सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळते. परंतु मनुष्याने परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे.
    इस्लामचा संक्षिप्त परिचय देवून आणि जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन सांगितला आहे. अल्लाहने जेव्हा जेव्हा पैगंबर या पृथ्वीवर पाठविले तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोहचविला हे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 30     -पृष्ठे - 24     मूल्य - 10       आवृत्ती - 3 (2012)


डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/sotnn36kc0n7o1pofqcpxk0eko3whhx8


- नौशाद उस्मान

मजानचा अनेक अंगाने अभ्यास केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेदेखील रमजानचे काय महत्व असू शकते ते आज आपण पाहू या.

मूळात रमजानचा महिनाच माणसाला एखाद्या घोड्यासारखा चपळ बनवण्यासाठीच असतो. रोजा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ "दिवस" किंवा "वार" होतो. हिंदूमध्ये जसं उपवासासाठी "वार धरणं" म्हणतात तो वार, पण रोजा आठवड्यातील विशिष्ट वारालाच ठेवला जातो असे नाही. रोजा फक्त दिवसाच ठेवला जातो, रात्री नाही, म्हणून कदाचित त्यासाठी ''दिवस (रोजा)'' शब्दप्रयोग केला गेला असेल. कुरआनात रोजा हा शब्द नसून मूळ अरबी शब्द "सौम" आहे. अरबस्थानात एखाद्या घोड्याला अधिक चपळ बनविण्यासाठी त्याला काही दिवस उपाशी ठेवलं जायचं, अशा उपाशी घोड्याला "फरजूस- सौम (उपासधारक घोडा) " म्हटलं जायचं. तो लांबच्या प्रवासासाठी किंवा युद्ध मोहिमेवर कामी येत असे. रमजानचा रोजा देखील कुणाच्या अंगात आळस असेल तर तो काढून त्याला चपळ बनवितो आणि कुणी चपळ असेल तर त्याला आणखी चपळ, चाणाक्ष बनवितो. कारण जास्त जेवण केल्याने सहसा स्थूलता वाढत असते, आळस येतो. म्हणूनच परीक्षेला जातांना जास्त खाऊन जाऊ नये असं तज्ज्ञ सांगत असतात.

चपळता हा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा नेहमीच एक अविभाज्य भाग असतो. आळसी व्यक्तिमत्व काहीही कामाचं नसते आणि ते दुसऱ्याला आवडतही नसते.

चपळतेमध्ये जो सर्वात महत्वाचा गुन असायला पाहिजे तो म्हणजे वक्तशीरपणा. रमजानच्या सर्व उपासनांचे वेळापत्रक ठरलेले असते. वृत्तपत्रात तुम्ही वाचतच असाल कि, आजका इफ्तार, कल की सहेरी. त्यात इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी सहेरी आणि इफ्तार करायची वेळ दिलेली असते. रमजानच्या आधीच्या शुक्रवारी मशिदीबाहेर रमजानचे छापील वेळापत्रक वितरित केले जाते. अनेक मुस्लिमेतरांच्या कंपन्यादेखील आता  जाहिरातीसाठी असे वेळापत्रक वितरित करत आहेत.

फक्त रमजानच नव्हे तर इतर महिन्यातही नमाज ही वेळेवरच अदा करायची असते. परंतु रमजानमध्ये तराविह ही विशेष नमाज इमामच्या नेतृत्वातच पढली जाते, कारण त्यात संपूर्ण कुरआन महिनाभर थोडे थोडे मुखोदगत पढले जाते आणि संपूर्ण कुरआन प्रत्येकाला मुखोदगत असत नाही. म्हणून एकाच मशिदीत अगदी वेळेवर नमाजला हजर राहण्याचा अनेक जन प्रयत्न करत असतात.

हा रमजानचा सगळा ताळेबंद हा महिना सुरु होण्यापूर्वीच ठरवावा लागतो, सगळं नियोजन करावं लागतं. यासाठी ''इस्तेकबाल ए रमजान (रामजानचे स्वागत)'' म्हणून अनेक संघटना कार्यक्रम घेतले जातात.
अशाप्रकारे वक्तशीरपणा पाळणे, नियोजन करणे, सतत क्रियाशील राहणे, समय सूचकता पाळणे, कामात दिरंगाई, आळस न पाळणे, सकाळी लवकर उठणे हे संस्कार महिनाभर रोजाधारकांवर होत राहिल्याने त्याचं व्यक्तिमत्व उजळून निघते. ज्यांनी इमाने इतबारे पूर्ण रोजे ठेऊन तराविह अदा केली, त्यांचं व्यक्तिमत्व ईदच्या दिवशी तेजाळलेले असते, इमानचे एक भारदस्त तेज त्यांच्या  चेहऱ्यावर दिसते. अशाप्रकारे रमजान व्यक्तिमत्व विकासातही योगदान देतो. फक्त गरज आहे त्या बहुउद्देशीय महिन्याचा प्रत्येक अंगाने अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करण्याची.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

रमजान मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा महिना. या महिन्यातच प्रेषितांनी मक्केवर विजय मिळवतानाच शांतीचा संदेश दिला होता. कसा ते समजून घेऊया

रमजानमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. बद्रच्या युद्धाखेरीज काही वर्षांनी आणखी एक युद्ध होता होता वाचले आणि युद्ध न होताच शांतीच्या मार्गाने रक्तहीन क्रान्ती घडली होती. हो,   रमजानमध्येच प्रेषितांनी मक्का शहरावर विजय मिळवला होता. त्याची पार्श्वभूमी आपण सुरुवातीला समजून घेऊ.

प्रेषित आदम यांच्यापासून तर प्रेषित इब्राहिम (यांचा इ.स.पूर्व १८६१ मध्ये जन्म म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २,४३१ वर्षांपूर्वी) आणि प्रेषित इस्माईल (जन्म- इ.स.पूर्व १७८१ म्हणजे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २, ३५१ वर्षांपूर्वी) यांच्यापर्यंत काबागृहात एकाच निर्गुण निराकार अल्लाहची उपासना होत होती. तीस चाळीस फूट उंच, लांब आणि जवळपास तेवढीच रुंद चौरस इमारत असलेल्या काबागृहात त्याकाळी काहीही मांडलेले नव्हतं, आत स्वच्छ जागा होती फक्त अल्लाहच्या उपासनेकरिता. प्रेषित इस्माईल नंतर मात्र खूप वर्षांनी हारिस इब्न अमीर नावाचा एका पुढाऱ्याने सीरियाहून काही मुर्ती आणून काबागृहात ठेवल्या. उज्जा, मनात, लात, हुबल अशी त्या मुर्तींची नावं होती.  त्यानंतर तिथे त्या मुर्तींची पूजा होऊ लागली. (संदर्भ: मुस्लिम मनाचा शोध, ले. प्रा.शेषराव मोरे) अशाप्रकारे काबागृहात पुरोहितगिरी सुरु झाली होती. तसेच तिथे ज्योतिषगिरीदेखील वाढली होती. लहान सहान कामासाठी लोकं तिथे फल ज्योतिष्य पाहायला यायचे. तिथले पुरोहित तिथल्या भोळ्या भाबड्या बहुजन जनतेचे शोषण करत होते. अशा या पुरोहितगिरीतून प्रेषित मुहम्मद सल्लम यांना काबागृहाला आणि पर्यायाने समस्त जनतेलाच मुक्त करायचं होतं. त्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्थापितांविरुद्ध चळवळ सुरु केली होती. पण प्रस्थापितांनी प्रचंड छळ केल्याने त्यांनी सहकाऱ्यांसह मक्केहून मदिनेकडे स्थलांतर केले होते.

मदिनेत समतावादी व्यवस्था कायम केल्यानंतर काही वर्षांनी प्रेषितांनी मक्केकरांसोबत ''दोन्ही पक्ष एकमेकांच्या लोकांवर हल्ला करणार नाहीत'' असा शांतता करार केला होता. पण मक्केकरांकडच्या लोकांकडून या कराराचा भंग झाल्यामुळे प्रेषितांनी दहा हजारांची फौज सोबत घेऊन मक्केकडे कूच केले. प्रेषित आणि त्यांचे सैन्य मक्केजवळील एका डोंगराजवळ थांबले. प्रेषितांनी रात्री प्रत्येक सैनिकाला दहा दहा चुली पेटवायला सांगितले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दहा हजारांनी पेटवलेल्या एक लाख चुलीच फक्त डोंगरावरून बघत असलेल्या मक्केकरांना दिसत होत्या. ते पाहून मक्काप्रमुख अबू सुफियान शरण आले. तेदेखील प्रेषितांचे अनुयायी बनले. अशाप्रकारे रक्ताचा एक थेंबही न सांडता प्रेषितांनी २० रमजान हिजरी ८ (११ जानेवारी इ.स. ६३०) ला मक्केवर विजय मिळविला आणि सर्व सैनिकांसह मक्का शहरात प्रवेश केला. काबागृहात जाऊन तेथील सर्व मुर्तींचे अतिक्रमण तेथून काढून काबा स्वच्छ केले. आता प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची हीच वेळ होती. पण प्रेषितांनी सर्वांना सांगितलं कि, ''जा माफ केलं तुम्हाला.'' क्षमा आणि दयेचा हा कळस आहे.

त्यांनतर आफ्रिकन आदिवासी समाजातून आलेले आदरणीय बिलाल हबशी यांनी काबागृहावर उभे राहून मक्केतली पहिली अजान दिली. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या एका पुरोहितवाद्याने पाहिले आणि तो पुटपुटला कि, ''माझा बाप आज जिवंत असता तर हे दृश्य (आफ्रिकन आदिवासी समाजातला माणूस काबागृहावर पाय देऊन उभा असल्याचे दृश्य) पाहून तो दुःखावेगाने मरून गेला असता.'' इतका भयानक असलेला वर्णवाद, पुरोहितवाद प्रेषितांनी संपविला.

मक्का विजयानंतर केलेल्या आयुष्यातील त्यांच्या अंतिम प्रवचनात प्रेषितांनी घोषणा केली कि, आज मी सगळा वर्णवाद माझ्या पायाखाली तुडवलाय. कोणत्याही अरबाला कोणत्याही अरबेतरावर आणि कोणत्याही अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नाहीये तसेच कोणत्याही काळ्याला गोऱ्यावर आणि गोऱ्याला काळ्यावर श्रेष्ठत्व नाहीये. तुम्ही सगळे आदमची संतती आहात आणि आदम मातीपासून बनलेले होते.''
अशाप्रकारे रमजान महिन्यात झालेली ही इमान, समता, बंधुता, न्याय व बंधुभावावर आधारित रक्तहीन झालेली क्रान्ती म्हणजे मक्का विजय होय. ही घटना रमजानच्या वीस तारखेला घडली होती. म्हणून आजही अनेक जागी विसाव्या रोजच्या दिवशी ''फतेह मक्का'' (मक्का विजय)''चा कार्यक्रम घेतले जातात आणि लोकांचे या ऐतिहासिक घटनेतून अहिंसेचे महत्व विशद केले जाते. इस्लामवर रक्तपाताचा आरोप करणाऱ्यांना ही ऐतिहासिक रक्तहीन क्रान्ती म्हणजे एक सडेतोड उत्तरच म्हणावे लागेल.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget