Latest Post

अरब समाज ज्या अनैतिक गोष्टीने ग्रस्त होता त्यांचा येथे थोडक्यात आपण उहापोह करू या.
युद्धप्रियता आणि भांडखोर वृत्ती
अरब समाजात असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे ते आपसांत खूप लढाया करीत असत, सूडबुद्धीने पेटलेल्या या लोकांची आपसांतील युद्धे पिढ्यान्पिढ्या चालत आणि अगदी क्षुल्लक कारणावरून रक्तपात होत असे. म्यानातून तलवारी बाहेर निघण्यासाठी साधे निमित्तच पुरेसे असे.
समाजातील भेदभाव
हा समाज संघटित नव्हता. छोट्या-छोट्या कबिल्यांत दुभंगलेला होता. प्रत्येक परिवार एकदुसर्यांविरुद्ध सुडाने पेटलेला, डोळ्यांत प्रचंड द्वेश आणि मत्सराच्या धगधगत्या ज्वाला आणि सर्वत्र आपसांत रक्तपात सुरुच. शांती आणि सद्भावनेचा मागमूसही कोठे दिसत नव्हता. त्यांच्या सामरिक वृत्तीचे चित्र एका इतिहासकाराने ‘अय्यामुल अरब‘ (अर्थात - अरब समाजाच्या संकटमय काळाचे स्मरण) या ग्रंथात शेकडो पृष्ठांवर रेखाटलेले आहे. ‘मीदानी नेशापुरी‘ (मृत्यू ११२४) या इतिहासकाराने ‘किताबुल अमसाल‘ या ग्रंथात १३२ युद्धांचे वर्णन करताना लिहिले की,
‘‘या युद्धांची गणना करणे हे कोणत्याही गणनाशास्त्रानुसार शक्यच नाही. म्हणून मी या ठिकाणी या युद्धांचे शक्यतोपरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला.‘‘
मुळात ही युद्धे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी लढण्यात आली होती. अर्थातच हिंसा, निर्दयीपणा, हत्या, लूटमार आणि यासारख्या अत्यंत क्रूर घटनांची एक कधीही न संपणारी शृंखला सुरुच होती.
दारुचे व्यसन
जगामध्ये प्रत्येक अनैतिकता, अन्याय, अत्याचार, दुष्कर्म, व्यभिचार आणि वैरभावाची जननी असलेली ही दारू! ही दारू समस्त अरब समाजाच्या कंठात रिचलेली होती. अरब समाजाचे साहित्य म्हणजे दारू, प्रतिष्ठा म्हणजे दारू, पाहुणाचार म्हणजे दारू, अभिमान म्हणजे दारू, मान-सन्मान म्हणजे दारू, त्यांचे सर्वकाही दारूच असे समीकरणच झालेले होते. मद्यपनाच्या मैफली सजन असत. सहकुटुंब सहपरिवार मिळून दारूचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा. दारुच्या प्रत्येक घोटावर आपल्या वंश-प्रतिष्ठेचे काव्यात्मक गुणगान होत आणि अश्लील कवन होत. दारूचे २५० प्रकार या समाजात अस्तित्वात होते. पूर्ण समाजास दारूने आपल्या कंठात रिचविले होते.
जुगार
पायापासून डोक्यापर्यंत दारूत चिंब झालेल्या या समाजास जुगाराची भंयकर कीड लागलेली होती. आपली धन-संपत्ती डावावर लावण्याची आणि ती संपली की बायका-मुलेसुद्धा डावावर लावायची, विजय-पराजयाच्या या खेळीमुळे आधीच सुडाने पेटलेल्या समाजात रक्तपात सुरु व्हायचा. धन-संपत्ती आणि अहंकाराच्या आहारी जाऊन पिढ्यान्-पिढ्या नष्ट व्हायच्या.
व्याज आणि सावकारी धंदा
अरबांच्या या विविध कबिल्यांत दुभंगलेल्या समाजामध्ये समस्त वाईट प्रथांप्रमाणेच मानवी शोषण आणि उत्पीडनाचे आणखीन एक भयानक स्वरूप होते आणि ते म्हणजे ‘व्याजखोरी‘. एका निश्चित व्याजदरावर कर्ज देऊन वेळेवर कर्ज परत न मिळाल्यास परतफेडीची संधी वाढवून देताना मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर वाढीव व्याज आकारण्यात येत असे. हे वाढीव व्याज इतके वाढीव होते की याची परतफेड करण्यासाठी पूर्ण संपत्तीच सावकाराच्या तिजोरीत जात असे. हा प्रकार शेतकरी आणि मजुरांच्या नशिबी येत असे. यामुळे शेतकरी आणि मजूर सावकारी करणार्यांच्या गुलामीत जखडलेले असत. मूठभर सावकार आणि श्रीमंतवर्ग मूठभर पैसा देऊन शेतकर्यांच्या सर्व जमिनी बळकावून घेत आणि यातूनही कर्जाची फेड न झाल्यास त्याला आजीवन गुलाम करून घेत आणि केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या बायकोला आणि मुलांना गुलामीच्या दावणीस बांधत असे. (संदर्भ: बुखारी)
म्हणजेच ‘सोने सत्य-मानव मिथ्या‘ असा प्रकार होता. संपत्तीसमोर माणसाची कवडीकिंमत नव्हती. प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार व प्रसिद्धीचा हव्यास, भोगविलास, कठोरता आणि क्रूरतेच्या या रखरखत्या वाळवंटात प्रेम आणि बंधुत्वाचा एक दवबिंदूसुद्धा नव्हता. भांडवलशाहीचा या काळात उदय झाला नसला तरी समस्त अरब समाज क्रूर आणि जुलमी भांडवलशाहीच्या अभिशापाने शापित झालेला होता.

लूटमार
दररोजची लुटालूट सुरुच होती. वाटमारी आणि दरोड्यांचे वातावरण होते. सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते. दरोडेखोरांचे विशिष्ट जत्थे होते. दरोडे आणि लूटमारीवर या जत्थ्यांचे अर्थार्जन, पोटपाणी व भोगविलास अवलंबून होते. दरोडे टाकण्याची पद्धतसुद्धा विलक्षण होती. दरोडे फक्त द्रव्य आणि संपत्तीवरच नव्हे तर बायकापोरांवरसुद्धा टाकण्यात येत असत. व्यापारीवर्ग मालवाहतूक करताना खंडणी दिल्याखेरीज पुढे सरकू शकत नव्हता. सफल आणि विजयी कामगिरी करणारे डाकू आपली कामगिरी आणि कर्तृत्व कविताबद्ध करीत असत आणि मोठ्या गर्वाने आपली ‘अहंकार गाथा‘ वाचून दाखवत असे.
चोरी
दरोडे टाकण्याव्यतिरिक्त गरिबी आणि दारिद्र्यास बळी पडून ग्रामीण भागातील लोक लहानसहान चोर्या आणि वाटमारी करायचे. काहीजणांनी तर पूर्णपणे हाच धंदा वा उपजीविका पत्करली होती. शिवाय हा धंदासुद्धा एक प्रकारे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून ते मिरवित असत.
बलात्कार, व्यभिचार आणि अश्लीलता
हा समाज व्यभिचार आणि लैंगिक मार्गभ्रष्टतेत खितपत पडलेला होता. स्त्रियासुद्धा यात कमी नव्हत्या. व्यभिचारीणी बाया आपापल्या घरांवर लैंगिक आमंत्रणाची खूण असलेले झेंडे लावून व्यभिचारी पुरुषांना आमंत्रित करीत असत. मोठमोठे प्रतिष्ठित व श्रीमंत लोक आपल्या दास्यांकडून पाहुण्यांचा पाहुणचार करीत, आपल्या दास्यांकडून देहविक्रीचा व्यवसाय करीत आणि यातून संपत्ती मिळवीत असत. या प्रकारच्या व्यभिचारांवर प्रशंसापूर्ण काव्य करण्यात येत असे.
निर्लज्जता आणि नग्नता
निर्लंज्जतेने सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. अगदी धर्माच्या आधारावरसुद्धा मानवतेच्या छातीवर या नग्नतेने तांडव माजविले होते. काबागृहात हजच्या प्रसंगी हजारो लोक हज करण्यासाठी येत असत. मात्र कुरैश कबिल्याव्यतिरिक्त सर्वजन बिनधास्त कपडे काढून काबागृहाची प्रदक्षिणा करीत.
महिलांवरील अत्याचार
जग अस्तित्वात आल्यापासून अत्याचारांमध्ये सुसंस्कृत देश काय आणि असंस्कृत देश काय, धार्मिक काय आणि निधर्मी काय, सर्वांच्याच अन्याय, अत्याचार, शौर्य आणि इतर सर्व बाबींचे जुलमी भोग महिलांनाच भोगावे लागतात. भूत असो, भविष्य असो की वर्तमान असो, प्रत्येक काळात तिचाच बळी जात आहे. हीच अवस्था नारीची होय. त्यातल्या त्यात अगदी असंस्कृत आणि असभ्य समजल्या जाणार्या अरब प्रदेशात तर विचारता सोय नाही. महिलांना वारसासंपत्तीत कोणताही अधिकार नसायचा, असंख्य महिलांशी लग्न करायची पुरुषांना पूर्ण मुभा असे आणि कधीही घटस्फोट देऊन घराबाहेर काढून देण्यात पुरुषार्थावर कोणतीही बाधा येत नसे. यामुळे कुटुंबव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेलेली आणि महिला अन्याय व अत्याचारांच्या अÎalÉपरीक्षेतून कधीही बाहेर निघण्याची संभावना दिसत नव्हती. (संदर्भ: सीरतुन्नबी - लेखक सय्यद सुलैमान नदवी)
मुलींची हत्या
क्रूर सावकारी बाहूपाशात आवळलेली मानवता, सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान आणि उपासमारी, अहंकार आणि वंश-श्रेष्ठत्वाच्या विखारी झिंगेमुळे पेटलेला वैरभाव, द्वेष आणि मत्सर, गरीब व सर्वसामान्यांच्या मानगुटीवर भांडवलदारांचा जुलमी पाय, सर्वत्र चालू असलेली लूटमार आणि अशा परिस्थितीत पोटात उठलेली भुकेची आग, मान-सन्मानाच्या असुरक्षिततेची भावना आणि याच अवस्थेतून नको वाटत असलेला मुलीचा जन्म, काळजाचा तुकडा असलेल्या मुलींचा निर्घृण वध करून मानवता भरडून निघाली होती. मुलगी जन्मली की तिच्या रक्षणाचा, तिच्या पोटापाण्याचा प्रश्न बापाला भेडसावत असे. कोणीतरी आपला जावई होईल आणि आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, या कल्पनेने त्याच्या आत्म्याचा थरकाप उडत असे. म्हणून तो आपल्या प्रेम, ममत्वाची मुस्कटदाबी करून तिला जीवंत पुरुन टाकायचा आणि संपूर्ण अरब समाजात ही प्रथा बर्याच अंशी रुढ होती.
गुलामी
आपसात भेदभाव आणि वैरभावाने पेटलेल्या या समाजाचा आणखीन एक भयानक अभिशाप म्हणजे गुलामीची प्रथा होय. माणसांचा बाजार भरायचा, गुलाम पुरुष आणि स्त्रियांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री व्हायची. गुलाम आणि दासींबरोबर पशुपेक्षाही जास्त जुलमी व्यवहार करण्यात येत असे.

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच ५७१ साली अरबच्या मरुभूमीवर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला. या वेळी समस्त अरबसमाज अज्ञानतेच्या अंधकारात खितपत पडलेला होता. या समाजात समग्र अनिष्ट परंपरा आणि अमानवी रीती प्रचलित होत्या. तो श्वापदांपेक्षाही भयानक झाला होता, मानवतेचे क्रूरपणे लचके तोडत होता, हे अंधार युग होते. मानवता पशुच्या स्तराहून खालावली होती.
सामाजिक निरीक्षण
सुप्रसिद्ध समाजतज्ञ सी.राइट मिल्स यांनी एखाद्या समाजाचे अचूक निरीक्षण करण्यासाठी तीन पद्धती सांगितल्या आहेत.
  1. त्या समाजाचा ढाचा कशा स्वरुपाचा आहे आणि त्याच्या विभिन्न भागांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे निरीक्षण करणे.
  2. मानव-इतिहासात त्या समाजाचे कोणते स्थान आहे आणि मानवतेच्या सर्वांगीण विकासाची त्या समाजात कोणती व्याख्या आहे, याचा मागोवा घेणे.
  3. त्या समाजावर कोणत्या प्रकारच्या लोकांचे वर्चस्व आहे, याचे निरीक्षण करणे.
    सी. राइट मिल्स यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अरब समाजाचे निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची निम्नलिखित तथ्ये प्राप्त होतात.
    1. हा समाज विभिन्न कबिल्यांमध्ये दुभंगलेला होता. कबिल्यांतर्गत प्रचंड भेदभाव होता. समाजातील विविध घटक एक-दुसर्यांचे शोषण करीत होते. ‘बळी तो कान पिळी‘ अशी या समाजाची स्थिती होती. आपसांत हेवे-दावे, इर्ष्या, द्वेश, मत्सर आणि वैरभावासारख्या अमानवी भावनांच्या ज्वालांनी पेटलेला होता, अक्षरशः धगधगत होता. वंश-वर्ण आणि श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाच्या अहंकारी भावनांच्या आहारी होता हा समाजाचा विशिष्ट गुणधर्म होता.
    2. मानव-इतिहासात या समाजाचे स्थान अत्यंत खालच्या पातळीवर होते. मानवतेचा वैरी असलेला हा समाज पूर्णतः भौतिकवादी आणि संपत्तीचा भक्त होता. थोड्या लोभापायी कोणाचाही गळा कापण्यासाठी किंचितही मागेपुढे पाहत नव्हता. दीन-दुबळ्यांना पायाखाली तुडवून त्यांची संपत्ती हस्तगत करून आपलेच वर्चस्व गाजविण्यापेक्षा जीवनाचा कोणताही हेतू शिल्लक नव्हता. अशा या दयनीय आणि शोचनीय परिस्थितीत मानवतेची अन्याय व अत्याचारांच्या धगधगत्या भट्टीतून सुटका होण्याची मुळीच संभावना दिसत नव्हती.
    3. समाजात दीन-पददलितांचे रक्त शोषून जे लोक गब्बर झाले होते आणि स्वतः सर्वांचे स्वामी व प्रभू झाले होते, ते संपत्तीची भक्ती, पूजा आणि भोगविलासात बरबटलेले होते. स्वतःस वरिष्ठ, श्रेष्ठ, स्वामी व प्रभू समजून इतरांना गुलाम समजत होते. गर्व, व्यर्थ अभिमान आणि अहंकारी भावनेने पिसाळून जाऊन सर्वांना आपले गुलाम व दास समजत होते. इतरांचे शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या रक्तने दात लाल करणेच जणू त्यांचा परमधर्म होता. सत्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या शाश्वत मूल्यांची साधी कल्पनाच तेवढी बाकी होती. एकूणरित्या असत्य, अन्याय व अनैतिकतेची एक परिपूर्ण व्याख्या नीट समजून घ्यायची असेल तर या समाजास पाहावे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सामाजिक शास्त्राच्याच दृष्टीने जर निरीक्षण करावयाचे झाल्यास या समाजाचे उपरोक्ती चित्र समोर आलेले आहेच. ही बाब स्पष्ट करण्याचे कारण एवढेच आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा या भूतलावर जन्मले, तेव्हा त्यांच्यासमोर किती प्रचंड मोठे आव्हान होते. अर्थातच एका अत्यंत बिघडलेल्या आणि शाश्वत मानवी मूल्यांचा आधार हरवून बसलेल्या या समाजात सुधारणा घडवून आणणे किती अवघड कार्य होते!

खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.
या ठिकाणी ही गोष्ट लक्षणीय आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केलेला धर्म अर्थात इस्लाम हा इतर सर्वच धर्मांपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. कारण हा केवळ धर्म नसून एक अत्यंत महान सामाजिक आंदोलन होय. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने केवळ मानसिकताच बदलली नसून समाजाच्या आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्णतः क्रांती घडली. हा एक असा चमत्कार घडला की जगातील मोठमोठ्या विचारवंतांनी आश्चर्यचकीत झाले.

कुरआनच्या आदेशाचा सारांश असा की, वाचा, शिका त्या परमेश्वराच्या नावाने ज्याने ज्ञान दिले, माहीत नसलेले, लेखणीच्या द्वारे. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी  प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नसते आणि ही विकासात्मक प्रक्रिया असते. ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात घडत असते, परिवर्तनशील आणि गतिशील असते.
पैगम्बर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या काळातील हदीस आहे की, ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन ला देखील जा. पैगरबर (स.अ.स.) यांच्या काळात मक्का हे तत्कालीन  आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. या बाजारपेठेत विविध देशाचे जीन्नस, कपडे, भांडी, विविध यंत्रे व नवसंशोधित बाबींची माहिती व वस्तू येत असत. कुरआन आणि पैगरबर (सल्ल)  यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र चिंतन आहे. चिंतन हा मानवाच्या अंगी असलेला ईेशरदत्त आणि शक्तिशाली गुणधर्म आहे. यालाच चेतना माणून ही प्रत्येक समयी क्रीयाशील ठेवण्याचे  संशोधनात्मत आवाहन वारंवार कुरआन करीत असतो. आणि त्याच अनुषंगाणे पैगरबर सल्ल. यांनी नविन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन पर्यन्त जाण्याची आज्ञा केलेली आहे.  मक्का शहराच्या बाजारात चीन निर्मीत विविध वस्तू जिन्नस येत असते. त्यांच्या उत्पादनाचे ज्ञान चीनमधे होते. तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी मुस्लिमांनी चीनला देखील जायला पाहिजे,  हा स्पष्ट संदेश होता.
याचा दुसरा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, इस्लाम, कुरआन आणि पैगरबरांच्या शिक्षणात आध्यात्मिक शिक्षणाएवढेच भौतिक शिक्षणही महत्वाचे, आवश्यक व त्यासाठी कुठेही जाण्याची,  खर्च व त्याग करण्याची दिशा स्पष्ट आहे! इस्लाम, कुरआन यांचा शिक्षणाकडे पाहन्याचा दृष्टिकोण हा वास्तविक जगताच्या समाज विकास व भौतिक विकासाच्या संदर्भात देखील स्पष्ट  आहे.मानवाच्या, समाजाच्या विकासासाठी ज्ञानाकडे, शिक्षणाकडे इस्लाम निरपेक्ष (म्हटल्यास धमनिर्पेक्षपने!) दृष्टीने पहात असतो.
खलीफांच्या काळात व अनेक सुलतान,बादशाह यांच्या काळात (७ वे शतक ते १७ व्या शतकापर्यंत) मोठाल्या विद्यापीठांचि निर्मिति, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची निर्मीती, संशोधनाना  दिलेले उत्तेजन, आणि विशेष म्हणजे, अरब पंडितानी विविध भाषेतील ग्रन्थांचे केलेले भाषांतरण अत्यंत महत्वाचे व इस्लामच्या वैश्विक शैक्षणिक दृष्टिकोणाचे मार्गदर्शक आहेत.  इजिप्त आणि यूनान च्या तत्वज्ञानांचे, राज्यशास्त्र ते अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, गणीत, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र आणि विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांचे केलेले संशोधन, त्यांच्या ग्रंथांचे विश्लेषण, भाषांतरण यावर मुस्लिम पंडितांनी केलेले श्रम त्यांच्या ज्ञान प्राप्तिच्या सन्दर्भातील तृष्णेचि ग्वाही देणारे आहे! कुरआन व पैगम्बर प्रणीत निरिक्षण करा, शोध घ्या, विचार  करा, निसर्गात दडलेल्या घटनांचे कार्यकारण भाव शोधा ईत्यादी मार्गदशन ज्ञानाच्या क्षेत्राच्या व्याप्तिला समजून घेण्यासाठीच आहे.
ज्ञान हे बंदिस्त, साचेबंद व स्तिथिवादी कधीच नसते! म्हणून ते नीट समजून घेण्यासाठी कुरआन दोन प्रकारच्या ज्ञान प्रवाहांचा मार्ग स्पष्ट करतो. एक प्रवाह ज्ञान प्रवाह तो, जो  प्रेषित, ईश्दूत यांच्या मार्फत दिल्या जातो! यात अध्यात्म, ईेशरीय रचना, प्रेरणा आदींचा समावेश असतो.
दुसऱ्या प्रकारात ज्ञान हे निसर्गात अस्तीत्वात आहेच! त्याचा शोध स्वतःच्या प्रज्ञेनें घ्यायचा असतो. यासाठी प्रत्यक्ष निरिक्षण, संशोधन, विश्लेषण व तर्क-परीक्षण या द्वारे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन आहे. यालाच वैज्ञानिक ज्ञान प्राप्तिचा मार्ग, असे इस्लामिक संशोधनांचे तत्वज्ञान आहे.
हे सर्व असतानांही, विशेष करून भारतीय मुस्लिमांत आणि महाराष्ट्रातील मुस्लीमात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे वर्तमानातील ६ टक्केच शिक्षित आहेत! मुसलमांनातील  आर्थिक- समाजिक दुर्बलतेच्या अनेक कारकांपैकी हे महत्वाचे कारण आहे.  मध्ययुगाच्या अंतापर्यंत जगात आद्योगिक व वैज्ञानिक क्रांतिने उचल खाल्लेली  होती. उत्पादन साधने तांत्रिक, आधुनिक बाजारपेठ, विपणन व्यवस्थेतील बदल, यासह वेगाने बदलत असलेले आर्थिक, सामाजीक व राजकीय व्यवस्थेतील बदल वेगाने घडत होते. या  बदलांच्या मुळाशी होते. मानवाला प्राप्त होत असलेले ज्ञान. त्याने संशोधन, प्रयोग, विज्ञानाच्या सहाय्याने लावलेले नवे शोध व नवे तंत्र व यंत्र. याबाबतचे त्याने लिपीबद्ध केलेले, ग्रंथांच्या स्वरूपात लिहिलेले फार्मुले, आणि पुढच्या ज्ञानासाठी सुचविलेला आणि प्रशस्त केलेले मार्ग. या ज्ञानाच्या विस्ताराने पारम्पारीक ज्ञान देणाऱ्या संस्था यांचे पारम्पारिक ज्ञान व  पद्धति ही कालबाह्य ठरू लागली. नव्या शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था स्थापन व्हायला लागल्या. ज्ञानाच्या भाषा संशोधकांच्या व देश निहाय भाषांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था निर्माण व्हायला लागली.
ज्या मुस्लिम देशांनी हे वास्तव ओळखले आणि ज्ञानाच्या बाबतीत खऱ्या इस्लामिक मार्गदर्शनाचे वास्तव समजून घेतले, त्या-त्या देशांनी आपआपल्या शैक्षणिक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला. कुराणाची भाषा अरबी, म्हणून कुरआन समजून घेण्यासाठी या भाषेसोबत स्थानिक भाषांचा वापर हा ९ व्या, १० व्या शतकापासूनच या देशांनी चालू केला  (भारतात याला १८ वे शतक यावे लागले) मात्र, वास्तविक भौतिक ज्ञानासाठी इंग्रजी, भाषा व तत्सम ज्ञान देणारी भाषा शैक्षणिक म्हणून वापरली व जगातील ज्ञान, तंत्रज्ञान, व समस्त  स्पर्धेत अस्तित्वात राहिले! इजिप्त, तुर्कस्तान, ईरान, सीरिया, लेबनान असे असंख्य देश उदाहरणादाखल घेता येतील.
भारतातही इंग्रज राज्यानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडत होते! या बदलात किमान त्याही काळी सुशिक्षित असलेला मुस्लिम (उर्दू भाषिक) वर्ग (मुस्लिमातील २० टक्के होता)  हा या स्पर्धेत तिकला पाहिजे म्हणून सर सय्यद अहमद, मौलाना आजाद, तुफेल अहमद मंगलोरी, मौलाना हसरत मोहानी यानी इंग्रजी शिक्षणाची कास धरण्याची, शिक्षणासाठी स्थापन  होत असलेल्या  मुस्लिमेतर शिक्षण संस्थांमधे शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन करितच होते.
भारतीय मुस्लिमातील ८० टक्के समाज हा श्रम संस्कृतीतून आला असल्याने परम्परागत व्यवसायात जीवन जगणे व आपल्या धर्माचे पालन करणे एवढेच त्याच्या आवाक्यात होते!  म्हणून स्वातंत्र्यानंतरही भारतातील मुस्लिमांच्यां ७० ते ७५ टक्के अशिक्षित असण्याचे कारण सहज लक्षात येते. 
दूसरीकडे कुरआन स्पष्ट सांगत आहे की, ज्ञान घेणे मुस्लिमांसाठी फर्ज आहे, व हे सांगणारे आलीम, मौलाना साहेब कितीही घसा ओरडून सांगते झाले तरीही, शिक्षण घ्यायला व  द्यायला एका व्यवस्थेची गरज असते. शिक्षण संस्थेसह, वास्तुसह, मोठ्या नियोजनाची आणि आर्थिक व्यवस्थेची गरज असते. ही जबाबदारी दोन स्तरावर असते. एक तर सरकारने ही व्यवस्था पूरवायची असते. कारण हा समूह नागरिकांचा असतो व मतदान करून सरकार निवडून देत असतो.
दुसरे, भारताच्या संविधानाने असली व्यवस्था प्रत्येक समाजाला दिलेली आहे की त्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणाच्या सोयी स्वतः उभाराव्यात. ही जबाबदारी त्या त्या समाजातील  उच्चवर्ग, साधन सम्पन्न वर्ग, जागरूक वर्गाची, सत्ताधारी वर्गाची असते. आज महाराष्ट्रात मराठा, जैन, मारवाड़ी, कुनबी, माळी आणि इतर समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था भौतिक  ज्ञान व स्पर्धेच्या युगात आपल्या समाज समुहांच्या अस्तित्व व सहभागासाठी उभ्या टाकलेल्या आहेत. या स्तरावर मुस्लिम समाजाचा विचार केला असता काही मोजक्या, अपवादात्मक  कॉलेज, शाळा सोडल्या तर दुःखदायक स्थिती आहे. मुस्लिमातील वरिष्ठ वर्गीय समाजाकडे भरपूर पैसा आहे. अफाट जमीनी आहेत. पण नाइलाजाने म्हणावे लागते, कुरआनने दिलेले  आदेश की ज्ञान प्राप्त करा, जे दिलेत लेखनीच्या माध्यमातून हे वास्तवात उतरविण्यासाठी कॉलेजेस, हॉस्टेल्स, शाळा, ग्रंथालय स्थापन करण्याची चळवळ उभारण्यासाठी दृष्टी नाही.  मोहल्ल्यातील शाळा बंद झाली, मात्र त्याच मोहल्ल्यात ४ मस्जिदी लोकवर्गनितून उभ्या झाल्याचे चित्र आहे. विचार करा, या मस्जिदीसोबत भौतिक-अभौतिक ज्ञान देणाऱ्या शाळा उभ्या  राहिल्यात तर, जगाचा विज्ञानाचा इतिहास लिहीणारा जॉर्ज सरटोंन आणि रॉबोर्ट ब्रिफोल्ट म्हणतात त्या प्रमाणे कुरआनच्या मार्गदर्शनाने ७ व्या शतकातील अंधकार युगात विज्ञानाची  प्रकाशमय दारे उघडली हे सत्य आजच्या युगात वास्तवतेत आणता येईल.

- हाजी प्रा.जावेद पाशा कुरेशी
9422154223

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हांपैकी सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या कुटुंबियांशी सर्वोत्तम वर्तन करीत असावा. आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तन करण्यात मी तुम्हा सर्वांत  अग्रेसर आहे. (कुटुंबियांपैकी) एखाद्याला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा कदापि करू नका.’’ (तिर्मिजी)

निरुपण- कुटुंब समाजाचा एक घटक आहे. उपरोक्त हदीसमध्ये आदर्श कुटुंबाचे विवरण आहे. पैगंबरांनी जो माणूस आपली पत्नी, मुलेबाळे आणि इतर नातेवाईकांशी सद्वर्तन करतो,  त्याला सर्वोत्तम माणूस संबोधले आहे. माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची कसोटी त्याचे आपल्या घरातील वर्तन आहे. घराबाहेर अर्थात समाजात चांगले वाकायचे पण घरात मात्र उलट  वागायचे, ही चारित्र्यसंपन्नता नव्हे! मातापित्यांशी, बायकोशी, मुलाबाळांशी, भावाबहिणींशी अर्थात सर्वच नातलगांशी सद्वर्तन करीत असेल तो सर्वोत्तम माणूस आहे, असा पैगंबरांचा  संकेत आहे.
पत्नीशी सद्वर्तन करणे म्हणजे तिची हमदर्दी करणे, तिच्यावर प्रेम करणे, तिच्या भावनांचा आदर करणे, तिला न दुखावणे, शिवीकाळ न करणे, तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी  तिच्यावर न टाकणे, तिच्या रास्त इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे इ. आहे. कारण लग्नानंतर ती आपले मातापिता, घरदार सोडून पतीच्या घरी येते व नवजीवनाची सुरूवात करते. अशा  वेळी तिला पतीच्या प्रेम आणि सद्वर्तनाची, आपुलकीची नितांत गरज असते. आजारपणात तिची सेवा करणे, घरकामांत तिला सहकार्य करणे, इ. म्हणजे तिच्याशी सद्वर्तन करणे  होय.
घरात मुलाबाळांशी सद्वर्तन करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिक्षणाची, सुसंस्कारांची व चांगल्या संगोबनाची काळजी घेणे म्हणजेच त्यांच्याशी सद्वर्तन होय. घरातील इतर  नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याने अभिप्रेत त्यांच्याशी आदरसन्मानाने वागणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या चूकभुलींकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे  होय.
‘‘मी आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तनामध्ये तुम्हां सर्वांत अग्रेसर आहे.’’ हे एक वास्तव आहे. पैगंबरांसारख्या श्रेष्ठतम चारित्र्यसंपन्न व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाला इतिहासात जोड नाही!  त्यांच्या उदात्त चारित्र्याची साक्ष त्यांच्या हाडाच्या वैऱ्यांनीही दिली आहे.
‘‘ज्याला कालपरवापर्यंत पत्थर फेकून मारीत होते, त्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून  पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम! सहृदय प्रणाम त्या महापुरुषाला!’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबद्दल साने गुरुजींचे हे खूप बोलके आहेत. ‘‘तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा करू नका.’’ याचा अर्थ हा आहे की ज्याने इहलोकाचा निरोप घेतला आहे त्याची निंदानालस्ती करू नका. किती महान  उपदेश आहे हा! जित्यापणी तर त्यांच्याशी सद्वर्तन कराच, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याशी चांगलेच वागा, त्यांच्या चागल्या गुणांचीच चर्चा करा, वाईट कुणांची नको! असे उदात्त  चारित्र्य ज्या माणसाचे असेल, तो सर्वोत्तम माणूस होय! यात शंका ती कसली?

संकलन : डॉ. सय्यद रफीक

- नसीम गाझी फलाही
    अल्लाहची महानता व सर्वसत्ताधिशता स्वीकार करण्यासाठी इस्लामने जी उपासना व्यवस्था प्रस्तुत केली आहे. त्यापैकी नमाज एक महत्त्वपूर्ण आहे. नमाजचे महत्त्व व आवश्यकतेचा उल्लेख पवित्र कुरआन व हदीसमध्ये अनेक ठिकाणी आला आहे.
    दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष व स्त्रीसाठी अनिवार्य आहे. या पुस्तकात नमाजसंबंधी सुचिर्भूतता, अटी, आजान, नमाजची पद्धत, स्त्रियांची नमाज व इतर नमाज या विषयींचा खुलासा आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 55     -पृष्ठे - 24   मूल्य - 16          आवृत्ती - 4 (2014)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/tjs0205o7he9pd9196ha3mjvtd7sz7ha

- अमरपाल सिंह
    प्रस्तुत पुरनकाचा एकमेव उद्देश मानवतेशी संबंधित इस्लामच्या नैतिक चेतनेशी प्रत्येकाला परिचित केले जावे ज्यामुळे मनुष्याने स्वत:चे जीवन सुधार व जीवन सुशोभित करण्यासाठी या चेतनेचा उपयोग करावा.
या पुस्तकात इस्लाम धर्माच्या नैतिकचेतना प्रदर्शित करताना पवित्र कुरआनचे आदेश, कुरआन शिकवणीचे शाब्दिक अर्थासह भावनात्मक हेतुला देखील व्यक्त केले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य या ग्रंथाचे आहे. कुरआन ग्रंथांत जागोजागी विखुरलेल्या नैतिक शिकवणींना या पुस्तकात विषयानुरूप एकत्रित केले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 49              -पृष्ठे - 64                  मूल्य - 15               आवृत्ती - 2 (2005)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/tk8zo0p20wpvm2417nc4l1lhkm1cz1er

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget