Latest Post

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार, सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे  अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’ तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.)  यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण 
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना आनंदाने का  घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल. पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल. 
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’ 
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’  पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक  अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस : बुखारी)
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘तुम्हाला कधी उहुदच्या दिवसापेक्षा अधिक कठीण व त्रासदायक एखादा दिवस कंठावा लागला  आहे काय?’’ पैगंबर म्हणाले की आएशा (रजि.)! तुमच्या कुरैश समुदायाकडून मला खूप त्रास झाला आणि सर्वांत अधिक कठीण व त्रासदायक दिवस कंठावा लागला तो उ़कबाचा दिवस होता. त्या दिवशी मी स्वत:ला अब्द या लैल इब्ने अब्द किलालसमोर सादर केले, परंतु जे काही मला हवे होते ते देण्यास त्याने नकार दिला. तेव्हा मी बेचैन होऊन आणि विचार करीत  तेथून निघालो. जेव्हा मी करनुस्सआलिब पोहोचलो तेव्हा दु:ख थोडे कमी झाले, मग मी आकाशाकडे पाहिले तेव्हा मला जिब्रिल (अ.) दिसले. त्यांनी मला हाक मारून म्हटले, ‘‘तुमच्या समुदायाने जे काही तुम्हाला सांगितले आणि ज्याप्रकारे त्यांनी तुमच्या वक्तव्याचे उत्तर दिले आहे ते अल्लाहने ऐकले आणि अल्लाहने तुमच्याकडे डोंगरांचे नियोजन करणारे देवदूत  पाठविले आहेत. तुम्हाला वाटेल तो यांना आदेश द्या, ते सत्याला नाकारणाऱ्यांच्या बाबतीत तुमचा आदेश स्वीकारतील.’’ मग मला डोंगरांच्या देवदूताने हाक दिली, सलाम केला आणि  म्हटले, ‘‘अल्लाहने ऐकले आणि मला डोंगरांच्या नियोजासाठी पाठविण्यात आले आहे आणि माझ्या पालनकर्त्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे जेणेकरून तुम्ही मला जो आदेश  इच्छित असाल तो द्या आणि जे काही तुम्हाला हवे आहे ते सांगा. हवे तर दोन्हीकडील डोंगरांना मी अशाप्रकारे जवळ करीन की हे लोक त्यांच्या दरम्यान चिरडले जातील.’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही. त्याऐवजी मला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या अपत्यांपैकी असे लोक असतील जे फक्त अल्लाहची भक्ती करतील, त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनविणार  नाहीत.’’ 
(हदीस : बुखारी, मुस्लिम)

आदरणीय सहल बिन साद (रजि.) उल्लेख करतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘जो कोणी मला दोन जबड्यांमधील अवयव (जीभ) आणि दोन टांगांमधील अवयव  (जननेंद्रिय) या दोहोंची जमानत देईल तर मी त्याला जन्नतची हमी (गॅरंटी) देतो.’’ (बुखारी)

निरुपण
चारित्र्य सावरण्यासाठी माणसाचे जिव्हेवर नियंत्रण असणे अपरिहार्य आहे. जिभेवर नियंत्रण नसलेला माणूस चारित्र्यसंपन्न असू शकत नाही. खोटारडे बोलणे, लावालावी करणे, खोटी  आश्वासने देणे, मगरुरीने बोलणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे इ. सर्व जिव्हेवर नियंत्रण नसल्याची लक्षणे आहेत. कुरआनात आहे, ‘‘हे ईमानधारकांनो, सत्य तेच बोला आणि मोजूनमापून शब्द वापरा.’’ 
न्यायनिवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणसाला जिभेविषयीदेखील जाब द्यावा लागेल. निर्मिकाने माणसाला मुळात बोलण्याची क्षमता दिली ती सत्य बोलण्यासाठी आणि सत्याच्याच  प्रचारासाठी. न्यायनिवाड्याच्या दिवशी बहुतांशी लोकांना नरकाग्नीची कठोर सजा सुनावली जाईल ती जिव्हेच्या वाईट वापरामुळे. जिव्हेवर नियंत्रण जरी अवघड असले तरी सातत्याने  प्रयत्न केल्यास ते अशक्य नाही. 
चारित्र्यसंपन्न माणूस जिव्हेविषयी सदैव जागृत असतो. तो मितभाषी असतो. जिव्हेनंतर उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी जनेनेंद्रियाचा उल्लेख केला आहे. कुरआनात आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळपासही फिरकू नका.’’ 
कामवासनेवर नियंत्रण खूप खूप महत्त्वाचे आहे. कामवासनेच्या परिपूर्तीसाठी केवळ एकच मार्ग अल्लाहने वैध ठरवला आहे आणि तो आहे विवाह! विवाहबाह्य संबंध इस्लामला  अजिबात मान्य नाही. तो व्यभिचारच आहे आणि कुरआनचा सार असा आहे की व्यभिचारी माणूस कदापि जन्नतमध्ये जाणार नाही. इस्लामी कायदेशास्त्राप्रमाणे व्यभिचाऱ्याला
जगातही दगडांनी ठेचून मारण्याची कठोर शिक्षा प्रयुक्त केली आहे, तीसुद्धा समाजादेखत! वरवर ही शिक्षा कठोर वाटत असली तरी एक-दोन व्यभिचाऱ्यांनादेखील ही शिक्षा समाजादेखत  दिली गेली तर परिणामस्वरूप हजारो-लाखो भगिनींची इज्जत-अब्रू सुरक्षित होईल आणि माणसे स्वप्नातदेखील व्यभिचार करण्याचा विचारही करणार नाहीत. जिव्हेवर आणि  कामवासनेवर संपूर्णत: नियंत्रण असलेल्या माणसाचे उर्वरित जीवनही साहजिकच अत्यंत इमानी व उदात्त असेल. अशा माणसाला पैगंबरांनी याच जीवनात मरणोत्तर जीवनात जन्नत  (स्वर्ग) प्रदान करण्याचीजमानत, हमी, गॅरंटी दिली आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

आजपासून सुमारे १४५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरबस्थानच्या वाळवंटामध्ये लोक कबिले (समूह) बनवून राहायचे. प्रत्येक कबिल्याचा एक सरदार असे. वर्ण, वंश, व्यवसाय यावरून  प्रत्येकाची आपापली एक ओळख होती. प्रत्येक कबिला एकदुसऱ्यांवर आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असे. यातूनच त्यांच्यात युद्धाच्या ठिणग्या पडायच्या. अज्ञानाचा अंधकार  पसरलेला होता. मर्जीत आले तोच कायदा. दिवसाढवळ्या चोऱ्या, दरोडे पडायचे. अशा या परिस्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाले. एका मार्गभ्रष्ट   समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ज्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती ते या कुरआनच्या शिकवणीतून देण्यात येत होते. तसेच समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी कुरआनच्या  स्वरूपात एक संविधान ईश्वराने प्रेषितांच्या स्वाधीन केले. ज्याच्या माध्यमाने पैगंबरांनी समाज पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले.
समाजातील उच्चनीचता, भेदभाव, अन्याय, अत्याचार दूर करून त्या जागी न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करण्याचा पैगंबरांनी प्रयत्न केला. लोकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत करून  कुरआनमधील कायद्याची कठोर अंमलबजावणी केली. हळूहळू लोकांची मानसिकता बदलत होती, जीवनाचे वास्तविक ज्ञान वाढत होते, जीवन जगण्यासाठी काही नीतिनियम असले  पाहिजेत याची जाणीव निर्माण झाली होती. या सर्व मानवी प्रकृतीला अनुकूल गरजांची कुरआनच्या माध्यमातून पूर्तता करण्यात येत होती. चोरीची शिक्षा ठरविण्यात आली. जो चोरी  करेल त्याचे मनगटापासून हात छाटण्याचे आदेश देण्यात आले. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली. चोऱ्या दरोड्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. या काळात मदीनेत बनू मक़्जुम  नावाच्या उच्चभ्रू काबिल्यातील फातिमा नावाच्या स्त्रीकडून चोरीचा गुन्हा घडला होता! चोरीचे हे प्रकरण पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या न्यायालयात दाखल झाले! साहजिकच आता  कुरआनच्या कायद्यानुसार त्या स्त्रीला शिक्षा होणार होती; तरीसुद्धा लोकांमध्ये ही उत्सुकता लागली होती की पैगंबर (स.) आता काय न्याय देतील? कारण ही स्त्री एका उच्चभ्रू  कबिल्याची सदस्य आहे आणि त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. कबिल्यामध्ये अस्वस्थता वाढू लागली! त्या स्त्रीच्या शिक्षेमध्ये काही कपात व्हावी यासाठी प्रयत्न होऊ लागले.  पैगंबरांच्या जवळच्या लोकांना मध्यस्तीसाठी विनवणी केली गेली, शेवटी एक शिष्टमंडळ त्या स्त्रीची शिफारस घेऊन पैगंबरांच्या न्यायालयात पोहचला व शिक्षा कमी करण्याची मागणी  केली. पैगंबर (स.) काही वेळ शांत राहिले, चेहरा लाल झाला होता. थोड्या वेळाने पैगंबरांनी त्या शिष्टमंडळाला उत्तर दिले; नव्हे तर आपला निकाल सांगितला. पैगंबर (स.) म्हणाले,  ‘‘मला अल्लाहने न्याय प्रस्थापित करण्यासाठी या जगात पाठविले आहे, तुम्ही शिक्षा कमी करण्याची शिफारस करता!’’ पुढे पैगंबर (स.) जे म्हणाले ते अगदी मन सुन्न करणारे आहे.  पैगंबर (स.) शेवटी म्हणाले, ‘‘हा चोरीचा अपराध जर या फातिमाऐवजी माझ्या फातिमाच्या (पैगंबरांची प्रिय मुलगी) हातून जरी घडला असता तर तिलासुद्धा मी हीच शिक्षा दिली  असती.’’ आता यापुढे कोणाची हिंमत होती शिफारस करण्याची? सर्व जण निमूटपणे निघून गेले. न्यायानुसार त्या स्त्रीला शिक्षा करण्यात आली.
(संदर्भ:- बुखारी (हदीस संग्रह) खंड क्र.२, पान क्र. १००३)
आज आमच्या समाजाला अशा प्रकारच्या न्यायाची नितांत गरज आहे. जेणेकरून अपराधांचे प्रमाण कमी होतील. न्यायदान करताना जर ही भावना निर्माण झाली की, कोणत्याही  परिस्थितीत कोनावरही अन्याय होऊ नये, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवारिल विश्वास नक्कीच वाढेल. न्यायालयात न्यायदान करणाऱ्यांकडूंन हीच अपेक्षा!!

- संकलन : शेख अब्दुल हमीद,
मो.: ७३८५३१४१४३

आदरणीय माई आयशा (रजि.) सांगतात की, माझ्याकडे एक भगिनी आपल्या दोन मुलींसह काही मागण्यासाठी आली. (त्या तिघीही उपाशी होत्या.) त्या वेळी माझ्याकडे फक्त एक खजूर होती जी  मी तिला दिली. तिने खजुरीचे दोन भाग करून आपल्या दोन्ही मुलींना दिले पण स्वत: मात्र खाल्ले नाही. (ती स्वत: उपाशी असूनही) ती निघून गेल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) आले आणि  त्यांना मी ही घटना सांगितली. पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ज्या व्यक्तीला मुली देऊन अजमावले गेले आणि तिने मुलींचे खुशीने संगोपन केले तर या मुली त्या व्यक्तीला नरकाग्नीपासून दूर ठेवतील.’’  (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
मुलींचे संगोपन करणे एक महान सत्कर्म आहे. म्हणून मुलीच्या जन्मावर निराश न होता आनंद साजरा करावयास हवा. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा मुलींच्या बाबतीत एक उपदेश असा आहे,  ‘‘ज्याने तीन मुली अथवा तीन बहिणींचे संगोपन केले, त्यांना चांगले शिकवले, त्यांना दयेने आणि प्रेमाने वागवले, इथपर्यंत की वयात आल्यावर त्यांचा विवाह करून दिला तर अशा व्यक्तीसाठी  अल्लाहने जन्नत (स्वर्ग) राखीव अर्थात अनिवार्य केली.’’
यावर एकाने विचारले की जर कोणाला दोनच मुली असतील तर? ‘‘दोन मुलींच्या बाबतीत हाच मोबदला मिळेल.’’
इब्ने अब्बास (रजि.) म्हणतात की जर कोणी एकाच मुलीच्या बाबतीतही विचारले असते तर पैगंबरांनी हाच मोबदला सांगितला असता. कुठे ते क्रौर्य की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात लोक मुलींना जन्मत:च जिवंत पुरत होते! आणि पैगंबरांच्या प्रबोधनानंतर कसे घडले हे महान परिवर्तन कुठे की लोक मुलींच्या जन्मानंतर आनंदाने भारावून जाऊ लागले.
दिव्य कुरआनात आहे, ‘‘काय बेतेल त्या दिवशी जेव्हा अल्लाह या निष्पाप मुलींना जिवंत करून विचारली की तुम्हाला कोणत्या गुन्ह्यापायी आणि कोणी ठार केले?’’ मृत्युपश्चात अल्लाहसमोर  आपल्या प्रत्येक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल हे वास्तव मनमस्तिष्कात एकदा का बिंबले की केवळ स्त्री-भ्रूण हत्येचाच नव्हे तर सारे गंभीर प्रश्न मार्गी लागतील. अल्लाहसमोर जाब द्यावा  लागेल की ही जाणीव पतीपत्नीला मुलीचा गर्भपात करू देणार नाही. सोनोलॉजीस्टला गर्भलिंग परीक्षा करू देणार नाही. हीच भीती स्त्रीरोगतज्ज्ञाला गर्भपाताची सर्जरी करण्यापासून परावृत्तकत रील  व हीच उत्तरदायित्वाची जाणीव पतीला, सासूसासNयांना व त्यांच्या सहकुटुंबियांना हुंड्यासाठी नववधूंना जिवंत जाळण्यापासूनही रोखण्याचे काम करेल! 
समाजाला गुन्हेगारीपासून आणि दुराचारापासून रोखण्याचा आणि सदाचारी बनविण्याचा किती महान आणि गुणकारी तथा प्रॅक्टिकेबल उपाय आहे हा! आमच्या देशात हा उपाय राबविण्याची सद्बुद्धी  अल्लाह आम्हाला प्रदान करो!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

- मुहम्मद मुश्ताक तजारबी
    दहशतवाद म्हणजे काय? हा अपराध कोण करतो? काही व्यक्ती, गट, संघटना, समुदाय किंवा राष्ट्रे, सरकार किंवा वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा दावा करणारी राष्टे व राज्ये सुद्धा हा अपराध करतात का?
या पुस्तकात मध्यकालीन महत्त्वाच्या समस्याचा उहापोह केला आहे. दहशतवादासंबंधी इस्लामचा काय दृष्टिकोण आहे याचे स्पष्टीकरण करीत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 64       -पृष्ठे - 56        मूल्य - 20           आवृत्ती - 4 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/0bcopsjp8imy4q1hevrc4zuxa7bdkcoi

इस्लाम आज्ञाधारकांसाठी (मुस्लिमांसाठी) कोणती कर्तव्यें निश्चित करत आहे. हा फार विस्तृत विषय आहे. याचा खुलासा करण्यासाठी हजारहून जास्त पाने खर्च करावी लागतील. आपण येथे खोलात न जाता सर्वसामान्य चर्चा करू या. इस्लामच्या प्रमुख आदेशांचा येथे थोडक्यात आढावा घेतला तरी आपला उद्देश पूर्ण होणार आहे. हे प्रमुख आदेश दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकतात.
एक म्हणजे जे आदेश मौलिक महत्त्वाचे आहेत. इस्लामच्या शिकवणुकीत अशांचा समावेश श्रध्देनंतर लगेचच केला गेला आहे.
दुसरा प्रकार म्हणजे ज्या आदेशांचे स्वरूप हे पहिल्या प्रकारांपासून भिन्न आहे ते पहिल्या प्रकारच्या आदेशानंतर येतात. त्यांचे महत्त्व हे पहिल्या प्रकारच्या आदेशानंतरचे आहे.
म्हणून पहिल्या प्रकारच्या आदेशांचाच आपण स्वाभाविकपणे प्रथम विचार करु या कारण हे मौलिक स्वरूपाचे आदेश त्यातही प्रथम श्रेणीतील आहेत.
इस्लामने मुस्लिमांसाठी कोणत्या मौलिक अशा कर्तव्यांची जबाबदारी निश्चित केले आहे? उत्तरासाठी आपणास अनुमान अथवा कयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
‘‘इस्लामचा पाया पाच बाबींवर आधारित आहे. 1. अल्लाहशिवाय इतर कोणीही दुसरा ईश्वर नाही, मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत, 2. नमाज अदा करणे, 3. जकात अदा करणे आणि 4. रमजानचे उपवास (रोजे) ठेवणे, 5. पाचवे कर्तव्य हज यात्रा करणे होय.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एका कथनानुसार (हदीसनुसार) त्यांनी ‘‘इस्लामचा पाया पाच गोष्टींवर आधारित आहे.’’ असे म्हटल्यानंतर प्रेषितांनी ‘‘दायिम’’ हा शब्दसुध्दा वापरला आहे. या शब्दाच्या समावेशानंतर अर्थ असा होतो की ‘‘इस्लाम पाच खांबांवर उभा आहे.’’ आता खांब म्हणजे संपूर्ण इमारत नव्हे. ते त्या इमारतीचे अंग आहेत. इमारतीच्या इतर अंगाप्रमाणे खांब इमारतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. इमारतीत त्यांचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे. जोपर्यंत खांब उभे राहत नाहीत तोपर्यंत इमारतीचे इतर भाग पूर्ण होतच नाहीत आणि त्यामुळे इमारत उभी राहाणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे इस्लामची कर्तव्ये जर पाळली गेली नाहीत तर इस्लामच्या इतर शिकवणींना आचरणात आणणे कठीण जाते. जर या मौलिक कर्तव्यांना डावलून काही कर्तव्ये पार पाडली गेलीत तर तो फक्त कर्तव्याचा आभास असेल आणि तत्त्वहीन कृत्य असेल. म्हणून मौलिक अशा महत्त्वाच्या कर्तव्यांना पार पाडले म्हणजे इतर कर्तव्यांना पार पाडण्यासारखे आहे. या दुसऱ्या प्रेषितकथनात (हदीसीमध्ये) फक्त याच इस्लामच्या मूलतत्त्वांना आणि कर्तव्यांना इस्लाम असे संबोधण्यात आले आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ‘‘इस्लाम म्हणजे तुम्ही याची खात्री करावी की ईश्वर दुसरा नाही फक्त अल्लाह आणि मुहम्मद (स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत आणि तुम्ही नमाज अदा करावी, जकात द्यावी रमजानचे उपवास (रोजे) ठेवावेत आणि काबागृहाचे हज करावे आयुष्यातून एकदा तरी.’’
पहिल्या हदीसीमध्ये ही कर्तव्ये ‘‘इस्लामचे खांब’’ असे संबोधले गेले परंतु ते अतिमहत्त्वाचे असल्याने त्यांनी संपूर्ण इस्लामला प्रदर्शित केले आहे हे आपण खालील चर्चेतून पाहू या. आपण या इस्लामच्या प्रथम श्रेणीतील कर्तव्यांविषयी जाणून घेऊ या.

प्रथमतः आपण काबागृहाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व पाहू या. पितापुत्र (इब्राहीम व इस्माईल) काबागृहाचे बांधकाम उभारीत होते व प्रार्थना करीत होते,
‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे प्रभू आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव, जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. निःसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.’’ (कुरआन २: १२७-१२८)
पितापुत्राच्या वरील प्रार्थनेवरून हेच सिध्द होते की काबागृह बांधण्याचा जो मूळ हेतु होता तो साध्य करण्यासाठी त्यांच्या वंशामधूनच तो समाज उभा राहिला जो आज्ञाधारक (मुस्लिम) होता.
येथे हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेत त्यांनी विनवणी केली होती,
‘‘आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल.’’
येथे मुस्लिम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारक.
काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला आणि पत्नीला इतरत्र स्थलांतरित केले नाही. ते तेथेच स्थायिक झाले, जो वाळवंटी, ओसाड प्रदेश होता व तो निर्मनुष्य प्रदेश होता. काबागृहाजवळ त्यामुळे त्यांची जी वंशावळ जन्माला येणार होती ती सर्व ‘‘त्या एक अल्लाहचेच आज्ञाधारक असतील.’’ इब्राहीम (अ.) यनी स्वतः अल्लाहजवळ त्यावेळी प्रार्थना केली,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! मी एका निर्जल व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी.’’ (कुरआन १४: ३७)
‘‘या लोकांनी येथे नमाज कायम करावी’’ याचा अर्थ असा आहे की त्यांनी अल्लाहची सेवा (इबादत-उपासना) करावी. अल्लाहचा धर्म पाळावा आणि त्याचा प्रसार करावा. प्रार्थना श्रध्दाशीलतेचे अनिवार्य अंग आहे. म्हणून ‘‘लोकांनी नमाज कायम करावी’’ याचा अर्थच असा होतो की इस्लाम धर्म (आज्ञाधारकता) पूर्णरूपेन प्रस्थापित केला जावा. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचा (इस्लाम) एक आदर्श त्यांच्या वंशात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला याची साक्ष इतिहास देत आहे.
त्यांच्या वंशातून पुढे आज्ञाधारक समाज कसा बनणार होता? अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या पध्दती त्यांना कशा प्रकारे माहीत होणार? यासाठी त्या पितापुत्रांनी अल्लाहजवळ अशी विनवणी केली होती,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर. जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभूत्वशाली न्याय करणारा आहेस.’’ (कुरआन २: १२९)
मानवी इतिहासातील या दोन प्रार्थना आहेत ज्यांचा स्वीकार अल्लाहने कालांतराने (सुमारे २००० वर्षानंतर) केला. आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या रूपात ‘प्रेषित’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (सहाबी) रूपात ‘आज्ञाधारक समाज’ उभा केला. (इस्लामी राष्ट्र निर्माण केले.) हा आज्ञाधारक समाज म्हणजेच मुस्लिम समाज आणि मुस्लिम राष्ट्र होय. त्यांचे नाव मुस्लिम (आज्ञाधारक) यासाठी झाले की इब्राहीम (अ.) यांनी त्यांचा उल्लेख आपल्या प्रार्थनेत याच मुस्लिम शब्दाने केलेला होता. अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुस्लिम हे नाव अगोदरच दिले होते. हे कुरआनच्या ‘हज्ज’ या अध्यायाने सिध्द केले आहे.
वरील विवेचनाने हे सिध्द होते की काबागृहाला इस्लामचे प्रेरणास्रोत आणि केंद्र संबोधने अगदी योग्य आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget