Latest Post

- मुहम्मद अहमद
या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांचा संक्षिप्त परिचय करून दिला आहे. अल्लाहने मनुष्याला जीवनोद्देश सांगण्यासाठी, मनुष्य जीवन सुशोभित करण्यासाठी व यशस्वी बनविण्यासाठी ज्या प्रेषितांना पाठविले ते सर्व सत्कर्मी, सद्गुणी व चांगले मानव होते. सर्वांनी जगाला इस्लामची शिकवम दिली व अल्लाहची मर्जी सांगितली.
पैगंबर पाठविण्याचा क्रम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर समाप्त झाला कारण यापुढे दुसरा एखादा प्रेषित येण्याची आवश्यकताच उरली नाही.

आयएमपीटी अ.क्र. 68       -पृष्ठे - 8    मूल्य - 6      आवृत्ती - 8 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/vdgjdxenx44e00l4zmq6qspculvtjpoi

- मुहम्मद सिराजूल हसन 
- सय्यद जलालुद्दिन उमरी

अनुवाद 
- मुबारक हुसैन मनियार
जागतिक स्तरावर हिंसाचार व दहशतवादाचे वावटळ सध्या घोंघावत आहे. त्याच्या तडाख्यात गरीब व श्रीमंत जाती व देश सापडलेले आहेत. याविरुद्ध जगात विचारप्रवर्तक लिखाण होत आहे आणि या लिखाणामुळे जगाचे डोळे उघडत आहेत.
या पुस्तकात मौ. मुहम्मद सिराजुल हसन, मौ. सय्यद जलालुद्दीन उमरी, डॉ. फजलुर्रहमान फरीदी आणि प्रा. खुर्शीद अहमद यांच्या विचारप्रवर्तक लेखांचा समावेश आहे.

आयएमपीटी अ.क्र. 65     -पृष्ठे -72       मूल्य - 30            आवृत्ती -3 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/m7nxo6nisp0wlthfu7qivq0c1bv1uegd

पैगंबर मुहम्मद (स.) यांची विविधांगी रूपे जगासमोर आली आहेत. गोरगरिबांचे कैवारी, शूरवीर योद्धे, सेनापती, हुशार व्यापारी, तत्त्वज्ञान व उपदेशाचे सागर, लोकहिताय राजनीतिज्ञ,  तसेच अनाथ, दीनदलितांचे व गुलामांचे कैवारी, स्त्री-जातीचे उद्धारक, न्यायप्रिय, आजीवन मानवतेचे व मानवांच्या कल्याणातच जीवनाचे ध्येय रुजविणारे अशी त्यांची विविध रूपे आहेत.  त्यांचे कार्यक्षेत्र अफाट होते. अंधारमय जगाला आकाशात ध्रूवाप्रमाणे चमकणारा तारा बनून अवतरले होते. पैगंबरांची श्रेष्ठ सामाजिक सुधारणा म्हणजे शिक्षणप्रसार होय. मानवास सुसंस्कृत बनविणयाचे सामर्थ्य फक्त शिक्षणात आहे, हे त्यांनी ओळखले होते. पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘ज्ञान संपादन करा. कारण नीती व अनीती, न्याय व अन्याय, पाप व  पुण्य यामधील फरक ज्ञानामुळे कळतो. शिक्षण घेणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.’’ त्यांनी मदीना शहरात पहिले विद्यापीठ ‘अल सुफ्फा’ या नावाने सुरू केले. तो चबुतरा आजही  मदीना शहरातील मस्जिद-ए-नबवी अर्थात पैगंबरांची मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे. ते स्त्रीजातीचे उद्धारक होते. त्यांचा स्त्रीभ्रूण हत्येला विरोध होता. अशा विघातक प्रवृत्ती पैगंबरांनी समाजप्रबोधन करून बंद केल्या. पैगंबरांनी पुरुषाइतकेच हक्क स्त्रीला दिले होते. ते म्हणतात, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. आईवडिलांशी सद्व्यवहार करा, असा त्यांनी सर्व मानवजातीला उपदेश दिला आहे. 
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण, वंश, भाषा, उच्चनीच, गरीब, श्रीमंत, काळा, गोरा अशा सर्व प्रकारच्या  भेदभावांना मूठमाती देऊन प्रत्येकाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. अखिल मानवजात एक आहे आणि सर्वांचे ईश्वर एकच आहे. अल्लाहजवळ सर्व समान आहेत. मानवांत  हीच खरी इस्लामची जीवपद्धती आहे. मानवांची सेवा हीच अल्लाहची सर्वश्रेष्ठ सेवा होय, असे जो मान्य करेल तो विश्वव्यापी मुस्लिम समुदायाचा घटक आहे. मग तो कोणत्याही पंथाचा किंवा जातीचा असो.
पैगंबरांनी समता व बंधुता या तत्त्वांना अनुसरून आचरण करण्याची शिकवण दिली. सद्वर्तन ही अल्लाहची उपासना होय, असे त्याचे विचार होते. बंधुत्वाचे हे नाते समतेपेक्षाही अधिक एकमेकांशी जवळीक निर्माण करणारे आहे आणि हे नाते पैगंबरांनी केवळ मुस्लिमांपुरतेच मर्यादित ठेवले नाही. जर कुणाचा शेजारी उपाशी असेल तर असा मानव मुस्लिम होऊच शकत नाही. मग तो शेजारी कोणत्याही जातीधर्माचा का असेना. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची चिंता करावी. म्हणजे एखाद्या वस्तीतली सारी माणसं एकमेकांचे शेजारी आणि त्या वस्तीला लागून दुसऱ्या वस्तीचे लोक त्या वस्तीचे शेजारी होतील. याचा विस्तार होत एका राष्ट्राचे सारे नागरिक आणि राष्ट्राला लागून असलेल्या राष्ट्राचे सारे नागरिक एकमेकांचे शेजारी होतील. लोकांशी चांगलं बोलणं, त्यांना क्षमा करणं, कुणास पाहताना स्मितहास्य करणं, आपल्यापासून दुसऱ्याला नुकसान होईल असे वर्तन न करणं, रस्त्यातून त्रासदायक वस्तू बाजूला सारणं  अशी परोपकारी कामं म्हणजे ईश्वराच्या (अल्लाहच्या) उपासना आहेत. आपसातल्या संबंधांमध्ये आपुलकीचा व्यवहार करणं, विधवा स्त्रीची मदत करणं, गोरगरीब, गरजू, वंचित,  पीडितांच्या हक्कासाठी झटणं हीदेखील अल्लाहची उपासनाच आहे. एवढंच नव्हे तर एकदा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, आपसातले संबंध जोपासणं ही श्रेष्ठ उपासना आहे.’’
समता व बंधुता या दोन वैश्विक तत्त्वांवर आधारलेली सद्वर्तन आचरणाची इस्लामची जीवनपद्धत पैगंबरांनी आपल्या वचनांतून अनेक ठिकाणी जाहीर केलेली आहे. 
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, दुसऱ्याच्या अंत:करणात प्रेम निर्माण होईल अशा तऱ्हेने आचरण ठेवा. तुमचा कट्टर शत्रू असला तरीही त्याच्याशी प्रेमाने वागा. तुमच्या हृदयात द्वेषबुद्धीस थारा देऊ नका. अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने जीवन जगणं, लग्न कार्य करणं, गाजावाजाला प्रतिबंध पैगंबरांनी घातले आहेत. सावकारी, लाचखोरी, व्यसनाधिनता,  व्यभिचार, वेश्याव्यवसाय या सर्व बाबींस पैगंबरांनी मनाई केली आहे.
समाजातील धर्मगुरू, राजकीय नेते, हाजी लोक यांना एकत्र येऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे विचार आणि आचार तळागाळातील सर्व मानवांपर्यंत पोहचविणे ही आजच्या काळाची गरज  आहे.

-जमीर मौला नरदेकर
कसबे डिग्रज, सांगली.
९६२३२७३६४१

नागपूर (शोधन सेवा) - ’मस्जीद तसेच मदरशांमध्ये काही तरी रहस्यमय सुरू असते. विशेषत: मदरशांमधून मुस्लिम धर्मातील मुलांवर एकांगी संस्कार केले जातात आणि त्यांना कट्टरतेकडे वळविले जाते,’ असाच समज समाजातील अनेक घटकांमध्ये आहे. परंतु वास्तविकता याउलट असून मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची मूलभूत तत्त्वे तसेच इतर विषय शिकविले जातात. त्यामुळे मदरसा ही संशयास्पद कृत्यांची जागा नाही, तर ते एक प्रकारचे ज्ञानमंदिरच आहे,’ असे प्रतिपादन सैय्यद हाजी नदवी यांनी व्यक्त केले. 
’जमात-ए-इस्लामी-हिंद’ तर्फे रविवार,28 ऑक्टोबर रोजी  जाफरनगर येथील जामिआ हुसैनिया या मदरसामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नदवी बोलत होते. यावेळी राजेंद्र सिंह, महादेव विठौले, योगेश जान बंधु, आशीष जगनीत, रूपेश सोनावाला, प्रयोग श्रीराव,  प्रा. मदावे, बोरकर, मि.बावनकुड़े ,विलास खड़से  गुरुदेव सेवा मंडल चे अध्यक्ष आदी उपस्थित होते. नदवी म्हणाले, मदरशांबाबत मुस्लिमेतर समाजात बरेचसे गैरसमज आहेत. तेथे नेमके काय सुरू असते, याबद्दल समाजातील प्रत्येकालाच जिज्ञासा असते. ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आणि मदरशांबाबत असलेले गैरसमज दूर सारण्याच्या उद्देशाने ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ या अनोख्या मोहिमेची 
सुरुवात ’जमात ए इस्लामी   
हिंद’ने सुरूवात केली आहे. मदरसा परिचयाचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, त्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली. ’जमात ए इस्लामी हिंद’ने यापूर्वी ’मस्जीद परिचय’ असा उपक्रम राबविला. नागपूरसह संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला. आता जमाततर्फे ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात मुस्लिमेतर बांधवांना मदरशांमध्ये थेट प्रवेश दिला जात आहे. तेथे नेमके काय घडते, विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध असतात, हे सगळे थेट बघता येणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक हिंदू बांधवांनी हिरिरीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी मदरशातील व्यवस्था आणि तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना पहाटेच्या (फजर) च्या नमाजापासून मशिदींमध्ये सुरू होणारे धार्मिक परिचालन, अरबी भाषेतील कुरआन पठणाचे शिक्षण, दररोज पाचवेळा, तर शुक्रवारी दुपारी अदा करण्यात येणारी सामूहिक नमाज आदींबाबत माहिती देण्यात येते. याखेरीज त्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक विषयसुद्धा शिकविले जातात. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि कम्प्युटर प्रयोगशाळेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 
गैरसमज दूर सारणे आवश्यक 
कार्यक्रमात सहभागी झालेले पं. वासुदेव दिवेदी म्हणाले ’मदरसा आणि मशिदींबाबत बरेच गैरसमज आहेत. सहसा येथे इतरांना प्रवेशच नसतो, अशी धारणा असल्याने येथे नेमके काय चालते, हा कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळे जमाततर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि यात सहभागी होऊन मला खरच आनंद झाला. येथील व्यवस्था आणि कार्यपद्धती बघून सगळे गैरसमज दूर झालेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाअतचे सदस्य, मदरश्याचे शिक्षक मुफ्ती मोहम्मद साबिर, मौलाना रहमतुल्लाह , मौलाना फखरुल हसन, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना सैयद नाशीत हुसैन, मुफ्ती बिलाल अहमद, आधुनिक शिक्षाचे  शिक्षक  मोहम्मद साकिब क़ाज़ी सलीम, अब्दुल अलीम, मोहम्मद आतिफ़, कारी नौशाद, कारी सलमान, मोहम्मद राग़िब मोहम्मद सोहेल व  दीनियात चे  शिक्षक हाजी अशफ़ाक, मौलाना मुदस्सिर, माज़ अहमद,  कारी इसहाक अहमद यांनी परिश्रम घेतले. हाफ़िज़ शाकिरुल अकरम फ़लाही यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची  उत्तर दिले.

प्रेषितांचे जीवन हे समस्त मानवकल्याणासाठी मार्गदर्शक आहे़ जेव्हा मी हा ग्रंथ वाचायला सुरूवात केली तेव्हा माझ्या अंगावर शहारे येत होते़ मुहम्मद पैगंबरांची एक-एक वचने मनाला भावत होती़  त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन मला विचार करायला प्रेरित करीत होते़ साहित्यीक, चळवळीतले कार्यकर्ते, लेखक, प्रबोधक, इतिहासाचे अभ्यासक, राजकारणी, सामान्य नागरिकांनी देखील पैगंबरांचे चरित्र वाचायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांनी केले़
  सोलापूर येथील अॅड़ गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे फडकुले सभागृहात आयोजित  ‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ या ग्रंथाच्या शानदार प्रकाशन समारंभात शनिवारी ते बोलत होते़ 
मंचावर उस्मानाबाचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ग्रंथाचे लेखक इफ्तेखार अहमद, लिंगायत धर्म अभ्यासक चन्नवीर मठ, मायबोली प्रकाशन मुंबईचे संचालक सलीम खान, गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष समिउल्ला शेख आदी उपस्थित होते़ 
  पुढे बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, इफ्तेखार अहमद यांनी ‘प्रेषित मुहम्मद (स.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रंथ सरळ, सोप्या आणि उत्तम मराठीत लिहिल्याने मराठीजणांना नक्कीच समजायला सोपे जाईल. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत शेजाऱ्याचा हक्क सांगताना ते म्हणाले होते, शेजारी जर उपाशी झोपत असेल आणि तुम्ही (मुस्लिम) जर पोटभर जेवत असाल तर ते इस्लामला मान्य नाही़ जर तुमच्या घरात पंचपक्वानाच अन्न शिजत असेल तर त्याचा सुवास दरवळू नये याची काळजी घ्यावी आणि जर तुम्ही फळे अथवा अन्य खाद्य पदार्थ आणून खात असाल तर त्याची सालपटे रस्त्यावर फेकू नका. यामुळे येणारे जाणारे व आजूबाजूच्या गरीब लेकरांत अशी फळे खाण्याची इच्छा होईल आणि त्यांना ते जर नाही मिळाले तर ते नाराज होतील़ त्यामुळे एक तर त्यांना आपले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा . ते देणे होत नसेल तर कमीत कमी ते खाऊन राहिलेली सालपटं रस्त्यावर फेकू नका़ त्यांच हे उदात्त मानवीय दृष्टीकोण मला फार आवडला असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़ प्रेषितांचं चरित्र वाचल्यानंतर मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़
यावेळी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले, इफ्तेखार अहमद हे माझे मित्र असून, अत्यंत साधेपणा व उच्च विचाराची ही व्यक्ती आहे़  यांनी दीर्घ संशोधनानंतर हा ग्रंथ लिहिला असून,  वाचनाऱ्याशी हा ग्रंथ संवाद साधत असल्यासारखे वाटतो़ यात भावानुवाद दडला आहे. तो प्रत्येकाला जमत नाही़ मात्र इफ्तेखार अहमद यांनी हे पुस्तक रेखाटताना फार खबरदारी घेतली असल्याचेही ते म्हणाले़ सत्य साहित्याचा आत्मा आहे़ आज मोठ्या प्रमाणात इतिहासाचे विकृतीकरण होत चालले आहे़ प्रत्येक जण आपल्या विचारानुसार इतिहासाला कलाटणी देतोय इतिहास लेखकांनी त्यात स्वत:चे कधी मत मांडायचे नाही, असे सांगत नव्या पिढीला इतिहास माहित नसल्याने दोन समाजात दुरावा निर्माण होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ 
कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली़ प्रास्ताविक सरफराज अहमद यांनी केले़ यावेळी त्यांनी या ग्रंथातील मांडणी, संदर्भ व गरज याचे सविस्तर वर्णन केले. 
या पुस्तकाचे लेखक इफ्तेखार अहमद म्हणाले की, प्रेषितांची शिकवण आणि कुरआनचं मार्गदर्शन हे फक्त मुस्लिमांसाठीच नसून ते समस्त मानवजातीकरिता आहे़ आम्हाला हे वारसामध्ये भेटले असून, हा पैगाम सर्वांपर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे़ हाच उद्देश हा ग्रंथ लिहिण्यामागचा आहे़ कुरआनचं भाषांतर, प्रेषितांचं जीवन चरित्र बऱ्याच भाषेत झाले आहे़ मात्र मराठीत ते मोठ्या प्रमाणात झालं नाही़ समस्त मराठीभाषिकांना प्रेषितांचं जीवन कळण्यासाठी समजेल अशा मराठीभाषेत हे लिहिल आहे़ सर्वात पहिल्यांदा अनुवाद मीरमुहम्मद याकुब यांनी केला होता़ त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी फंड जमा करून मूळ अरबीतून कुरआनचं भाषांतर मराठीत करून घेतलं.  यानंतर जमाअते इस्लामी हिंदच्या इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टनंही कुरआनचं मराठीत अनुवाद केला आहे़ साने गुरूजी, मुन्शी अमीनोद्दीन यांनी देखील मराठीत अनुवाद केला मात्र ते पुरेसे झाले नाही़ मात्र हा ग्रंथ अकॅडमीक आणि सुलभ आहे. जे की प्रत्येकाला समजेल. दीर्घ अभ्यासाअंती, संशोधनानंतर हा ग्रंथ तयार झाला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून, प्रत्येकाने एकदातरी हा ग्रंथ वाचावा, असेही ते म्हणाले.   यानंतर मायबोली प्रकाशनचे सलीम खान यांचंही समयोचित भाषण झालं. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन साहिल शेख यांनी केले़  आभार संघर्ष खंडागळे यांनी मानले़   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. गाजीयोद्दीन रिसर्चच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मृत्यु नंतर जिवनावर श्रद्धा व् विश्वास याचा आमच्या जिवनाशी एक अतुट नात आहे. त्या श्रद्धेवर विश्वास (ईमान-ऐतबार) जिवनातील प्रत्येक क्षेत्रांवर परिणामकारक ठरतो. मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा ही आपल्याला एक निर्मात्याच्या अस्तित्वाला बळकटी प्रदान करते आणि त्याला एक जिवंत वास्तव बनवते. हा विश्वास मानवाला आपल्या निर्मात्याप्रति आपुलकी तर देतोच पण त्याच सोबत मानव व विश्वनिर्माता यांच्यातील बंधन दृढ करतो. मृत्यूनंतर जागतिक न्यायालयात माझी हजेरी ही श्रद्धा स्वत: मध्ये एक क्रांतीकारी आत्मा आहे. ही आत्मा जेव्हा मन आणि बुद्धीमध्ये संचार करते तेव्हा ती मानवास पुर्णपणे बदलुन टाकते. व्यक्तिमत्वाला स्वच्छ, निर्मळ दिशा देते. व्यक्तिला सत्याचा ध्वजवाहक आणि न्यायाचा पाईक बनवुन असत्य, अत्याचार,  वासना, क्रुरतेपासुन सावध करते आणि मनात सदाचार आणि पुण्यकर्माची मोचेर्र्बांधणी करते. चंगळवादात तल्लीन लोकांना पारलौकीक जिवनाबद्दल आकर्षण निर्माण करते. मानवास निर्मात्याच्या आदेशाचा आज्ञाधारक, त्याच्या व्यवस्थेचा सच्चा सैनिक व रक्षक बनविते. ही श्रद्धा माणसास सत्य व न्यायाच्या स्थापनेसाठी संघर्ष करण्यासाठी उर्जा प्रदान करते. मानवाला संकटे आणि जिवनात उद्भवलेल्या विपरित परिस्थीतीशी सामना करण्यासाठी ताकद, हिम्मत, आत्मविश्वास प्रदान करते आणि मानवजातीची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्याग व उपकाराची भावना निर्माण करते.  

- मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी 
संकलन - साजीद आझाद, निलंगा

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget