Latest Post

पारा १ - भाग १


पारा १ - भाग २


पारा १ - भाग ३


पारा २ - भाग १


पारा २ - भाग २


पारा २ - भाग ३


पारा ३ - भाग १


पारा ३ - भाग २


पारा ३ - भाग १


पारा ३ - भाग ३


पारा ४ - भाग १


पारा ४ - भाग २


पारा ४ - भाग ३


पारा ५ - भाग १


पारा ५ - भाग २


पारा ५ - भाग ३


पारा ६ - भाग १


पारा ६ - भाग २


पारा ६ - भाग ३


पारा ७ - भाग १


पारा ७ - भाग २


पारा ७ - भाग 3


पारा ८ - भाग १


पारा ८ - भाग २


पारा ८ - भाग ३


पारा ९ - भाग १


पारा ९ - भाग २


पारा ९ - भाग ३


पारा १० - भाग १


पारा १० - भाग २


पारा १० - भाग ३


पारा ११ - भाग १


पारा ११ - भाग २


पारा ११ - भाग ३


पारा १२ - भाग १


पारा १२ - भाग २


पारा १२ - भाग ३


पारा १३ - भाग १


पारा १३ - भाग २


पारा १३ - भाग ३


पारा १४ - भाग १


पारा १४ - भाग २


पारा १४ - भाग ३


पारा १५ - भाग १


पारा १५ - भाग २


पारा १५ - भाग ३


पारा १६ - भाग १


पारा १६ - भाग २


पारा १६ - भाग ३


पारा १७ - भाग १


पारा १७ - भाग २


पारा १७ - भाग ३


पारा १८ - भाग १


पारा १८ - भाग २


पारा १८ - भाग ३


पारा १९ - भाग १


पारा १९ - भाग २


पारा १९ - भाग ३


पारा २० - भाग १


पारा २० - भाग २


पारा २० - भाग ३


पारा २१ - भाग १


पारा २१ - भाग २


पारा २१ - भाग ३


पारा २२ - भाग १


पारा २२ - भाग २


पारा २२ - भाग ३


पारा २३ - भाग १


पारा २३ - भाग २


पारा २३ - भाग ३


पारा २४ - भाग १


पारा २४ - भाग २


पारा २४ - भाग ३


पारा २५ - भाग १


पारा २५ - भाग २


पारा २५ - भाग ३


पारा २६ - भाग १


पारा २६ - भाग २


पारा २६ - भाग ३


पारा २७ - भाग १


पारा २७ - भाग २


पारा २७ - भाग ३


पारा २८ - भाग १


पारा २८ - भाग २


पारा २८ - भाग ३


पारा २९ - भाग १


पारा २९ - भाग २


पारा २९ - भाग ३


पारा ३० - भाग १


पारा ३० - भाग २


पारा ३० - भाग ३

जो उपजत मुस्लिम आहे आणि संपूर्ण आयुष्यभर अजाणतेपणे मुस्लिम राहिला. परंतु आपल्या ज्ञानशक्ती व बुद्धीचे सहाय्य घेऊन त्याने आपल्या ईश्वराला ओळखले नाही आणि आपल्या ऐच्छिक कार्यक्षेत्रात त्याने ईश्वराच्या आज्ञा झुगारुन दिल्या. हा मनुष्य काफीर (विद्रोही, श्रद्धाहीन, सत्याचा इन्कार करणारा) आहे. ‘कुफ्र’ चा खरा अर्थ लपविणे, झाकणे असा आहे. अशा माणसाला विद्रोही (काफीर) अशासाठी म्हटले जाते की त्याने आपल्या प्राकृतिक स्वभावावर नादानीचे पांघरूण घातले आहे. तो इस्लामी प्रकृतीवर जन्माला आला आहे. त्याचा संपूर्ण देह व देहाचे सर्व अवयव इस्लामी प्रकृतीनुसार कार्यरत आहेत. त्याच्या सभोवार सर्व सृष्टी इस्लामवरच कार्यान्वित आहे. परंतु त्याच्या बुद्धीवर पडदा पडलेला आहे. सर्व सृष्टीचा तसेच त्याचा स्वतःचा प्राकृतिक स्वभाव त्याच्यापासून दडलेला आहे. त्याची विचारधारणा त्याच्या उलट आहे आणि त्याविरुद्ध आचरण करण्यास तो प्रवृत्त होतो. जो मनुष्य ‘विद्रोही (काफीर)’ आहे तो किती मोठ्या प्रमाणात पथभ्रष्ट झाला आहे, हे तुम्ही पाहू शकता.
‘कुफ्र’ पासून होणारे नुकसान
‘कुफ्र’ एक घोर अज्ञान आहे, किंबहुना खरे अज्ञान ‘कुफ्र’ च होय. मनुष्य ईश्वराशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान आणखी कोणते असू शकते? एक मनुष्य विश्वाच्या या प्रचंड व्यापार प्रबंधाला अहोरात्र कार्यान्वित असलेला डोळ्यांनी पाहतो परंतु या प्रचंड व्यवस्थेचा निर्माता व चालक कोण आहे, हे तो जाणत नाही. ज्याने कोळसा, लोह, कॅल्शियम, सोडियम इत्यादी काही घटकांच्या मिश्रणाने अनुपम मानवनिर्मिती केली तो निर्माता कोण आहे? हे ही तो जाणत नाही.
एक मनुष्य सृष्टीमध्ये चहुकडे अशा वस्तु व असे कार्य होत असताना पाहातो ज्यामध्ये अप्रतिम कौशल्य व कारागिरी आहे. गणिती ज्ञान व रसायन शास्त्रज्ञान परिपूर्णपणे भरलेले आहे. तसेच सर्व परमकोटीची निपुणता व चमत्कार त्यामध्ये दृष्टीस पडतात परंतु ते सर्वज्ञ व निपुणता असणारे व ज्याने विश्वामध्ये हे सर्व कार्य निर्माण केले आहे ते अस्तित्व कोणते आहे? हे तो जाणत नाही!! ज्याला ज्ञानरूपी साखळीची पहिली कडीच सापडली नाही, अशा माणसाला खऱ्याखुऱ्या ज्ञानाची कवाडे कशी उघडली जाऊ शकतात? तो कितीही विचार व चिंतन करो किंवा कितीही संशोधन करो, त्याला कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाचा सरळ व उचित मार्ग आढळणार नाही कारण सुरवातीलाच अज्ञानरूपी अंधकारच त्याच्या दृष्टीस पडेल आणि शेवटीही अंधारातच तो चाचपडत असेल.
‘कुफ्र’ एक अत्याचार आहे किंबहुना सर्वांत मोठा अत्याचार ‘कुफ्र’च होय. अत्याचार कशाला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही वस्तुचा वापर तिच्या प्राकृतिक व नैसर्गिक स्वभाव धर्माविरुद्ध करणे हाच अत्याचार होय. आता तुम्हाला हे कळून चुकले आहे की सृष्टीतील सर्व चराचर वस्तु अल्लाहच्या आदेशाच्या अधीन आहेत व त्यांची प्रकृतीच ‘इस्लाम’ आहे. म्हणजेच ईशनियमांचे आज्ञापालन होय. खुद्द माणसाचा देह व त्याचा प्रत्येक अवयव, याच प्रकृतीनुसार उत्पत्ती पावलेला आहे. ईश्वराने या अवयवावर तसेच वस्तुवर अधिकार बाळगण्याचे थोडेसे स्वातंत्र्य माणसाला अवश्य दिले आहे. परंतु प्रत्येक वस्तूची प्रकृती असे इच्छिते की तिचा वापर ईशइच्छेनुसार केला जावा. परंतु जो मनुष्य ‘कुफ्र’ करतो, तो या सर्व वस्तुंचा वापर त्यांच्या प्रकृतीविरुद्ध करीत असतो. तो आपल्या हृदयात इतरांचा आदर, प्रेम व भयरुपी मूर्तीची प्रतिस्थापना करतो.
वास्तविकपणे हृदयाची प्राकृतिक हाक अशी आहे की त्यामध्ये केवळ अल्लाहची महानता, प्रेम व भय यांनाच स्थान असावे. मनुष्य आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचा व सृष्टीतील त्याच्या अधिकारा खालील सर्व वस्तूंचा वापर व उपयोग मात्र ईशइच्छेविरुद्ध करतो. खरेतर प्रत्येक वस्तुची प्राकृतिक धारणा अशी आहे की तिचा वापर केवळ ईशनियमानुसार केला जावा. तुम्हीच सांगा की अशा माणसापेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी व प्रत्येक वस्तुवर येथपर्यंत की खुद्द आपल्या अस्तित्वावरही अत्याचार करीत असतो?
‘कुफ्र’ केवळ अत्याचारच नसून तो विद्रोह, कृतघ्नपणा व नमकहरामीपणासुद्धा आहे. थोडासा विचार करा की मनुष्यापाशी आपली स्वतःची अशी कोणती वस्तू आहे? त्याचा मेंदू त्याने स्वतः निर्माण केला आहे की ईश्वराने? त्याचे हृदय, डोळे, जीभ, हातपाय व सर्व अवयवांची निर्मिती त्याने स्वतः केली आहे की ईश्वराने? त्याच्या सभोवताली जितक्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता तो स्वतः आहे की ईश्वर? या सर्व वस्तुंना माणसासाठी उपयुक्त बनविणे व कार्यान्वित करण्याची कृती त्याची स्वतःची आहे की ईश्वराची? तुमचे उत्तर हेच असेल की या सर्व वस्तू ईश्वराच्याच आहेत. त्यानेच त्याना निर्माण केले. ईश्वरच त्यांचा स्वामी आहे व ईश्वराच्याच देणगीने या सर्व वस्तू माणसाला प्राप्त झाल्या आहेत. खरी वस्तुस्थिती ही आहे पण मनुष्य ईश्वराने प्रदान केलेल्या बुद्धीचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध विचार करण्यासाठी करतो. ईश्वराने प्रदान केलेल्या हृदयात ईश्वराविरुद्ध धारणा बाळगतो. ईश्वराने जे डोळे, जीभ, हात व पाय व इतर वस्तू प्रदान केलेल्या आहेत त्यांचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध करतो. अशा माणसापेक्षा बंडखोर कोण असेल? एखाद्या सेवकाने आपल्या धन्याचे मीठ खाऊन जर त्याच्याशी बेईमानी केली, तर त्याला तुम्ही नमकहराम म्हणता.
एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने त्याला शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर जर शासनाविरुद्ध केला तर तुम्ही त्याला द्रोही म्हणता, एखाद्या उपकारकर्त्याशी जो दगाबाजी करतो तर त्याला तुम्ही कृतघ्न म्हणता. परंतु माणसाविरुद्ध माणसाची नमकहरामी, द्रोह व कृतघ्नपणाची वास्तवता काय आहे? मनुष्य दुसऱ्या माणसाला कोठून उपजीविका देतो? ती ईश्वराने प्रदान केलेली उपजीविका होय. शासन आपल्या कर्मचाऱ्यांना जे अधिकार देते ते कोठून आलेले आहेत? ईश्वरानेच शासनाला ही सत्ता प्रदान केलेली आहे. कोणीही उपकारकर्ता दुसऱ्या व्यक्तीवर कसा उपकार करू शकतो? ते सर्वकाही ईश्वरानेच तर दिलेले आहेत. माणसावर सर्वांत जास्त हक्क त्याच्या मातापित्याचा आहे. परंतु मातापित्याच्या हृदयात आपल्या अपत्याबद्दलचे प्रेम कोणी निर्माण केले? मातेच्या वक्षस्थळात दुधाची निर्मिती कोणी केली? पित्याच्या मनात अशी भावना कोणी प्रविष्ट केली की आपल्या श्रमाच्या घामाने मिळविलेली संपत्ती मांसाच्या एका निरुपयोगी गोळ्यासाठी आनंदाने उधळावी व त्याच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी व संस्कारासाठी आपला वेळ आपला पैसा व आपले सर्व सुखसमाधान अर्पण करावे. आता तुम्ही सांग जो ईश्वर माणसाचा खराखुरा उपकारकर्ता आहे, वास्तविक स्वामी आहे, सर्वांत मोठा पालनकर्ता आहे, त्याच्याशीच माणसाने जर ‘कुफ्र’ केले, त्याला ईश्वर मानले नाही. त्याची बंदगी करण्यास नकार दिला व त्याचे आज्ञापालन करण्यापासून तोंड फिरविले तर हे किती मोठे बंड व द्रोह आहे! किती मोठा कृतघ्नपणा व नमकहरामीपणा आहे!!
कोणी असा समज करून घेऊ नये की ‘कुफ्र करून मनुष्य ईश्वराचे काही वाकडे करतो. त्या सम्राटाचे राज्य इतके विशाल आहे की मोठ्यात मोठी दुर्बिण लावून आम्ही पाहिले तरी अद्यापपर्यंत आम्ही हे जाणू शकलो नाही की त्याच्या राज्याचा आरंभ कोठून होतो व त्याचा शेवट कोठे आहे. ज्या सम्राटाची शक्ती इतकी जबरदस्त व प्रचंड आहे की आपली पृथ्वी, सूर्य, मंगळ व अशाच प्रकारचे कोट्यवधी ग्रह त्याच्या इशाऱ्यावर चेंडूप्रमाणे भ्रमण करीत आहेत. त्या सम्राटाची संपत्ती इतकी अगणित आहे की समस्त विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व त्याचेच आहे आणि त्यामध्ये अन्य कोणीही त्याचा वाटेकरी नाही. तो सम्राट असा निरिच्छ व निरपेक्ष आहे की, सर्व चराचर सृष्टी त्याचीच गरजू व कृपाभिलाषी आहे. बरे तर, माणसाची अवस्था व त्याचा दर्जा तरी असा काय आहे की त्याच्या स्वीकृतीने किंवा अस्वीकृतीने अशा सम्राटाचे काही नुकसान व्हावे? त्याच्याशी ‘कुफ्र’ व अवज्ञा करून मनुष्य त्याची काहीही हानि करीत नाही तर उलट मनुष्य स्वतः आपल्या विनाशाची तरतूद करतो.
‘कुफ्र’ व अवज्ञा करण्याचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्य स्वतः नेहमीसाठी अयशस्वी व विफल होतो. अशा माणसाला ज्ञानाचा सरळ मार्ग कधीही
सापडणार नाही कारण जे ज्ञान आपल्या निर्मात्यालाच जाणत नाही ते कोणत्या वस्तूला खऱ्या अर्थाने जाणू शकते? त्याची मति सतत कुमार्गानेच जाईल कारण जी बुद्धी आपल्या निर्माणकर्त्यालाच ओळखण्यात चूक करते ती दुसऱ्या कोणत्या वस्तूला खरे जाणून घेऊ शकते? तो आपल्या जीवनातील सर्व व्यवहारामध्ये सतत ठेचा खात राहील. त्याचे चारित्र्य बिघडेल, त्याची संस्कृती व संस्कार बिघडेल, त्याचा समाज बिघडेल, त्याची उपजीविकेची अर्थव्यवस्था भ्रष्ट व विकृत होईल, त्याचे शासन व राजकारण वाईट व दोषपूर्ण असेल. तो जगात अशांतता पसरविल, रक्तपात करील, इतरांचे हक्क ओरबडून व हिसकावून घेईल, जुलूम व अत्याचार करील व आपल्या कुविचारामुळे, खोडसाळपणामुळे व आपल्या दुष्कृत्यामुळे तो स्वतःचे जीवन स्वतःसाठीच कटू व अप्रिय करून घेईल. नंतर जेव्हा तो इहलोकातून परलोकात जाऊन पोहचेल तेव्हा आयुष्यभर त्याने ज्या ज्या वस्तूंवर अत्याचार केला त्या सर्व वस्तू त्याच्या विरुद्ध तक्रार करतील. त्याचा मेंदू, त्याचे हृदय, त्याचे नेत्र, त्याचे हात-पाय किंबहुना त्याच्या शरीरातील प्रत्येक रोम न रोम अल्लाहच्या न्यायालयात त्याच्याविरुद्ध असा दावा करतील की या अत्याचारी मनुष्याने तुझ्याविरुद्ध बंड व द्रोह केला व त्या द्रोहात त्याने आमच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. ज्या भूमीवर तो अवज्ञा करीत फिरला, राहिला, जी संपत्ती त्याने अनुचित तऱ्हेने मिळविली, जे धन त्याने निषिद्ध साधनाद्वारे मिळविले व निषिद्ध हेतूसाठी खर्च केले, बंडखोर होऊन त्याने ज्या ज्या वस्तूवर कब्जा केला व त्याचा गैरवापर केला, ती सर्व साधने व उपकरणे ज्यांचा त्याने आपल्या बंडखोरीत वापर केला; हे सर्व त्याच्याविरुद्ध फिर्यादी रुपात उभे ठाकतील. ‘अल्लाह’ जो वास्तविक न्याय देणारा आहे तो या पीडितांची कैफियत ऐकून घेईल व त्या बंडखोराला अपमानजनक शिक्षा ठोठावील.

‘सवीक’च्या युद्धानंतर मक्का सरदार ‘अबू सुफियान’ची मुस्लिमांचा वचपा काढण्याची शपथदेखील वरवर पूर्ण होताना दिसत असली तरी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या हातून व्यापारी काफिल्याशी लढाई होऊन एक लाख दिरहमचे जे नुकसान झालेले होते आणि ‘बद्र’च्या युद्धात कैदी सोडविण्यासाठी जे अडीच लाख दिरहम मोजावे लागले होते, त्यामुळे मक्का शहरात प्रेषित मुहम्मद(स) आणि मुस्लिमांविरुद्ध संताप धुमसत होता. अबू सुफियानवर मदीनावर हल्ला करण्यासाठी सतत दबाव येत होता. त्यामुळे अबू सुफियानने मदीनावर हल्ला करण्याची घोषणा केली.
‘बद्र’च्या युद्धप्रसंगी सीरिया देशातून आणलेले-व्यापारी सामान आणि त्या व्यापारातून मिळालेला नफा हा मुस्लिमांविरुद्ध लढण्यात येणार्या युद्धासाठी सामरिक कोशात जमा होता. या शिवाय लोकांकडून भरपूर प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात आली. या युद्धाच्या तयारीसाठी मक्कावासीयांनी एक हजार उंट केवळ युद्ध सामग्रीच्या दळणवळणासाठी तयार ठेवले होते. प्रचंड संपत्ती खर्च करून युद्धाची जय्यत तयारी करण्यात आली होती. तीन हजार सशस्त्र सैनिक जमविण्यात आले. ‘अम्र जोम्ही’ आणि ‘मुसाफिह’ या दोन कवीनी संपूर्ण मक्का शहराचा दौरा करून सर्वांना युद्धासाठी प्रेरित केले. मक्कातून लष्कर रवाना करतेवेळेस स्त्रियांनीसुद्धा सैनिकांचा स्वाभिमान जागृत केला. या सैन्याने ‘उहुद’ पर्वताजवळील ‘ऐनैम’ या ठिकाणी पडाव टाकला.
‘बद्र’च्या युद्धानंतर प्रेषितांचे काका माननीय अब्बास(र) यांनी इस्लाम स्वीकारला होता. आदरणीय प्रेषितांच्या आदेशाने ते मदीनाऐवजी मक्केतच राहिले. त्यांनी आपल्या इस्लाम स्वीकृतीस गुप्त ठेवले होते. ते मक्कातील इस्लामद्रोह्यांवर गुप्त पाळत ठेवून त्यांचे इस्लाम व प्रेषिताविरुद्धचे कटकारस्थान प्रेषितांना खबर्यामार्फत कळवीत. त्यांनी ‘अबू सुफियान’च्या सामरिक योजनेची खबर द्रुतगती खबर्यामार्फत प्रेषितांना कळविली.
खबर मिळताच आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय अनस(र)’ आणि ‘माननीय मुनिस(र)’ या दोघांना शत्रूसेनेचा तपास करण्यासाठी पाठविले. त्यांच्याकडून खबर मिळाली की, शत्रूचे सैन्य ‘मदीना’ राज्याच्या सीमेत दाखल झाले आणि आसपासच्या परीसरात गुराख्यांची हत्या करण्याचा सपाटा लावला. इकडे आदरणीय प्रेषितांनी आपल्या अनुयायांच्या सल्लामसलतीने सैन्य तयार करून आणि स्वतःही सामरिक पोषाख धारण करून ‘मदीना’ शहराबाहेर शत्रूंचा समाचार घेण्यासाठी बाहेर आले.
तो हिजरी सन ३ च्या ‘शब्वाल’ महिन्याचा सहा तारखेचा शुक्रवारचा दिवस होता. ‘माननीय इब्ने मक्तम(र)’ यांच्यावर ‘मदीना’ शहराची जवाबदारी सोपवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक हजार मुजाहिदीन (धर्मयोद्धे) ची फौज घेऊन मदीनाहून ‘उहुद’कडे कूच केले. वाटेतच ‘शौत’ या ठिकाणी पोहोचताच ‘इब्ने उबई’ हा तीनशे दांभिकांना घेऊन इस्लामी सैन्यातून वेगळा झाला. सैन्याची साथ सोडण्याचे एवढेच निमित्त सांगितले की, त्याचा सल्ला प्रेषितांनी मान्य केला नाही. ‘इब्ने उबै’ हा दांभिकांचा सरदारच होता. वरवरून इस्लाम स्वीकारण्याचे सोंग घेऊन छुप्यारीतीने इस्लामी आंदोलनात संकटे आणणेच त्यांचा हेतु असे. याकरिता ऐनवेळेवर त्याने तीनशे दांभिक सैन्यातून वेगळे केले. आता प्रेषितांसोबत केवळ सातशे सैनिकांचीच फौज शिल्लक राहिली. या सातशेजणांना घेऊन प्रेषितांनी या ठिकाणीच पडाव घातला.
उत्तरार्ध्या रात्री आदरणीय प्रेषितांनी सैन्य घेऊन ‘उहुद’च्या मैदानाच्या जवळ आपल्या सैन्यासह ‘फज्र’ची (सूर्योदयापूर्वीची) ‘नमाज’ अदा केली. ही जागा मदीना शहरापासून चार मैल अंतरावर होती. आदरणीय प्रेषितांनी योजनेनुसार ‘उहुद’ च्या पर्वतामागे ‘माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र)’ यांच्या नेतृत्वाखाली पन्नास धनुर्धारी सैनिकांची तुकडी नियुक्त केली. प्रेषितांना या तुकडीस आदेश दिला की, कोणत्याही परिस्थितीत हे स्थान सोडू नये.
आदरणीय प्रेषितांनी लष्कराचा झेंडा ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांना सोपविला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ यांनी इस्लाम स्वीकारण्यापूर्वी अतिशय श्रीमंतीत आणि वैभवसंपन्न परिस्थितीत जीवन व्यतीत केले होते. इस्लाम स्वीकारण्यामुळे त्यांना आपल्या सुखसंपत्तीचा त्याग करावा लागला होता. या युद्धामध्ये त्यांनी आपल्या जबरदस्त युद्ध कौशल्याचे प्रदर्शन केले. डाव्या बाजूला ‘माननीय जुबैर(र)’ आणि उजव्या बाजूला ‘माननीय मुंजिर(र)’ यांना सैन्याचे नेतृत्व सोपवून आपली तलवार ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांना प्रदान केली. ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी याच तलवारीने शत्रूंचा जबरदस्त समाचार घेतला.
इकडे इस्लामद्वेष्टे कुरैशजणांनी मक्कावरून तीन हजारांचे बलाढ्य लष्कर तयार केले होते. या लष्करात सातशे कवचधारी, दोन हजार घोडे आणि तीन हजार उंट आणि सोबत सैनिकांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सरदारांच्या स्त्रियादेखील होत्या. या स्त्रिया योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी काव्य करीत सर्वप्रथम युद्ध मैदानात दाखल झाल्या. मग शत्रूफौजेतून ‘तलहा बिन अबी’ आपली तलवार उंचावत आणि मुकाबला करण्यासाठी आवाहन देत मैदानावर आला. त्याचा मुकाबला करण्यासाठी इस्लामी लष्करातून माननीय अली(र) पुढे आले. दोघांची लढत चांगलीच रंगली. माननीय अली(र) यांनी त्याचा फड्शा पाडला. माननीय हमजा(र) यांनी ‘उस्मान बिन अबी तलहा’ यास तलवारीच्या एकाच वारात यमसदनी धाडले. मग ‘मा. साअद बिन अबी वकास(र)’ यांनी बानाचा निशान साधून ‘अबी तलहा’ यास कंठस्नान घातले. त्यानंतर शत्रूकडून ‘मुसाफीह बिन तलहा’ मैदानात उतरला आणि ‘माननीय आसिम बिन साबित(र)’ यांनी त्याचा खातमा केला.
आता लढाईने जोर धरला ‘माननीय अबू दुजाना(र)’ यांनी तलवार घेऊन शत्रूच्या फौजेत घुसून त्यांची दानादान उडविली. ‘माननीय हमजा(र)’ यांनी आपल्या तलवारीने ‘सिबाअ बिन अब्दुल उज्जा’ यास ठार करून तलवारीची तृष्णा भागविली.
‘वहशी बिन हर्ब’ हा ‘जुबैर बिन मुतईम’ चा दास होता. त्याच्या मालकाने (जुबैर बिन मुतईमने) त्याच्याशी करार केला होता की, ‘माननीय हमजा(र)’ यांची हत्या केल्यास तो त्यास स्वतंत्र करील. त्याने दगडाच्या आडोशात दडी मारून अचानक ‘माननीय हमजा(र)’ यांच्या पोटात भाला आरपार केला. ‘माननीय हमजा(र)’ धरतीवर कोसळले. ईश्वराचे स्मरण करीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लढाईने उग्र रुप धारण केले. मुस्लिमांच्या जोरदार हल्ल्यामुळे ईशद्रोही ‘कुरैश’ सैन्याची दानादान उडाली. मुस्लिम लष्कर विजयाकडे वाटचाल करीत होते. युद्ध जिकण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले. लढाई अजून संपलेली नव्हती. तरीसुद्धा इस्लामी लष्कर गनीमतची संपत्ती (युद्धातील शत्रुची संपत्ती) समेटू लागले.
धनाचा लोभ आणि अनुशासनाच्या बेपरवाईमुळे हातात आलेले यश मुस्लिमांच्या हातून निसटले. प्रेषितांनी नियुक्त केलेल्या ठिकाणाहून काही सैनिक आपली जागा सोडून गनीमतची संपत्ती समेटू लागले. याच ठिकाणी आदरणीय प्रेषितांनी सैनिकांना जागा न सोडण्याचा आदेश दिला होता. यावरून आदरणीय प्रेषितांच्या युद्धनेतृत्व कौशल्याची कल्पना येते. मुस्लिम लष्कराने जागा सोडताच शत्रूसैनिकांच्या एका सेनापती ‘खालिद बिन वलीद’ (यांनी नंतर इस्लामचा स्वीकार करून इस्लामी शासच्या सीमा विस्तारित केल्या.)यांनी इस्लामी लष्करावर मागून जोरदार हल्ला चढवून इस्लामी लष्कराच्या अकरा सैनिकांना शहीद केले. पाठीमागून झालेल्या अकस्मात हल्ल्यामुळे ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ या मुस्लिम सेनापतीचा बळी गेला. ‘माननीय मुसअब बिन उमैर(र)’ हे दिसायला प्रेषितांसारखेच होते. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) शहीद (हुतात्मे) झाल्याची अफवा उडाली. या अती भयानक अफवेमुळे मुस्लिम सैनिकांचा मानसिक समतोल ढासळला. त्यांना मित्र आणि शत्रूंतील फरक समजेनासे झाले. समोर येईल तो तलवारीचा बळी चढत गेला. त्यात मुस्लिम सैनिकांच्या तलवारीस मुस्लिम सैनिकच बळी पडले.
‘खालिद बिन वलीद’च्या अचानक जोरदार हल्ल्याने मुस्लिम सैन्य विचलित झाले असले तरीही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जागेवरून किचितही हल्ले नाहीत. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय जियाद बिन सकन(र)’ हे पाच सैनिकांसह शहीद (हुतात्मे) झाले. माननीय साद बिन वकास(र) यांचा एक भाऊ ‘उत्बा’ ईशद्रोही लष्कराकडून मुस्लिमांविरुद्ध लढत होता. त्याने प्रेषितांच्या चेहर्यावर दगडाचा वार केल्यामुळे प्रेषितांचा खालचा दात पडून चेहरा रक्तबंबाळ झाला. प्रेषितांना बर्याच गंभीर जखमा झाल्याने ‘माननीय अली(र)’ आणि ‘माननीय तलहा(र)’ यांनी त्यांना हात देऊन पर्वतावर चढविले. प्रेषितांच्या रक्षणार्थ ‘माननीय तलहा(र)’ यांची बोटेदेखील कापली गेली. त्यांच्या शरीरावर सत्तर जखमा झाल्या. कारण प्रेषितांवर होणारा प्रत्येक वार त्यांनी आपल्या शरीरावर झेलला.
अशा भयानक संकटसमयी सर्वप्रथम ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांनी प्रेषितांना जीवित असल्याचे ओळखून उंच पर्वतावर जाऊन सैरावैरा पळणार्या मुस्लिम सैनिकांना मोठ्याने साद घातली आणि प्रेषित मुहम्मद(स) जीवित असण्याची सूचना दिली. ही सूचना मिळताच मुस्लिम सैनिकांचे आत्मिक बळ वाढले आणि ते प्रेषितांभोवती जमा होऊ लागले. ‘माननीय काब बिन मालिक(र)’ यांची सूचना शत्रू लष्करानेसुद्धा ऐकली आणि मुस्लिम लष्करास प्रेषितांच्या नेतृत्वात परत गोळा होताना पाहताच त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरु केला. तेवढ्यातच ‘उबई बिन खल्फ’ हा घोड्यावर स्वार होऊन प्रेषितांवर चालून आला. प्रेषितांनी तत्काळ त्याच्या मानेवर भाल्याचा वार करून त्यास नरकाग्नीत पाठविले.
शत्रूसैनिकांनी इस्लामी लष्कराच्या मृत शरीरांची विटंबना केली. मृतांच्या नाका आणि कान कापले. ‘अबू सुफियान’ या शत्रूसरदाराची पत्नी ‘हिन्दा’ हिने तर ‘माननीय हमजा(र)’ यांचे काळीज कापून चावले. त्यांची हत्या करणार्या ‘वहशी’ यास आपल्या शरीरावरील सोन्याचे सर्व दागिने बक्षीस दिले. मुस्लिम लष्कराच्या मृत शरीराचे नाक कान कापून त्यांचा हार करून गळ्यात टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सोबत्यांना घेऊन घाटीत पोहोचले. युद्ध सपले होते. माननीय अली(र) यांनी त्यांच्या चेहर्यावरील रक्त पाण्याने धुतले. मग प्रेषितांनी वुजू केला. (चेहरा व हात पाय धुतले) आणि बसल्याबसल्याच सर्वांसमवेत जुहर (दुपार) ची नमाज अदा केली.
शत्रूलष्कराने जेव्हा परत जाण्याचा विचार केला तेव्हा त्याचा सरदार ‘अबू सुफियान’ पर्वतावर चढून म्हणाला, ‘मुहम्मद(स) जीवित आहे काय?’ प्रेषितांनी सोबत्यांना उत्तर न देण्याची सूचना दिली. मग परत ओरडला ‘अबू बकर(र) जीवित आहे काय?’ मग परत ओरडला, ‘उमर(र) जीवित आहे काय?’ परंतु कोणतेही उत्तर न मिळाल्याने तो आसुरी आनंदाने आपल्या सैनिकांना उद्देशून म्हणाला, ‘सर्वजण ठार झाले. जिवंत असते तर उत्तर दिले असते.’ आता मात्र माननीय उमर(र) यांना राहावले नाही आणि प्रत्युत्तर दिले,
‘‘हे ईशद्रोह्या! ईश्वराची शपथ, तू खोटे बोललास. तू स्वतः साठी शोकसामग्री तयार करून ठेवली आहेस!!’’ मग परत ‘अबू सुफियान’ किचाळला,
‘‘हे ‘हुबल’ (देवतेचे नाव)! तुझा विजय असो!’’
‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’ माननीय उमर(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाने प्रत्युत्तर दिले.
‘‘उज्जा देवी’ आमची आहे, तुमची नव्हे!’’ अबू सुफियान
‘‘ईश्वर आमचा सहाय्यक आहे, तुमचा नाही!’’ माननीय उमर(र)
‘‘‘उहुद’चे युद्ध हे ‘बद्र’च्या युद्धाचा बदला आहे! आता तुमचा आमचा हिशोब बरोबर झाला!’’ अबू सुफियान
‘‘मुळीच नाही! आमचे सैनिक स्वर्गात गेले, तुमचे नरकाग्नीत!’’ माननीय उमर(र).
‘‘आता तुमचा आमचा सामना पुढील वर्षी ‘बद्र’च्या मैदानात होईल!’’ अबू सुफियान.
लढाई संपल्यावर आदरणीय प्रेषितांनी मृतांवर नजर टाकली. प्रेषितांनी आपले काका माननीय हमजा(र) यांचे मृत शरीर हुडकून काढले. आदरणीय प्रेषितांनी रडतरडत ईश्वराशी प्रार्थना केली, ‘‘हे हमजा(र)! तुमच्यावर ईश्वराची कृपा असो.’’ संपूर्ण हुतात्म्याचा तेथेच दफनविधी करण्यात आला.
‘उहुद’चे युद्ध मुस्लिमांसाठी दुःख, शोक आणि अरिष्टांचा दिवस ठरला. या युद्धात मोठमोठ्या दर्जाचे सोबती शहीद झाले. या युद्धात चाळीस मुस्लिम सैनिक शहीद झाले आणि शत्रुचे तीस सैनिक ठार झाले.
‘कुरैश’ ‘उहुद’च्या युद्धावरून परत जाताना ‘रौहाअ’ ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या मनात एक विक्षिप्त विचार आला. त्यांना वाटले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सैनिक अतिशय गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे अशा जखमी अवस्थेत त्यांच्यावर हल्ला चढविल्यास नेहमीची खटखट एकदाच संपून जाईल. शत्रूच्या या कारस्थानाची खबर खबर्यामार्फत प्रेषितांना समजताच मदीना शहरात सर्वांनी युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी जारी केले. तत्काळ सर्वांना घेऊन ‘शव्वाल’ महिन्याच्या आठ तारखेस प्रेषित मुहम्मद(स) यांनी मदीनावरून कूच केले आणि आठ मैल दूर असलेल्या ‘हमराऊल असद’ या ठिकाणी सैन्यासह पडाव टाकला. परंतु ‘खुजाआ’ कबिल्याचा सरदार ‘माअबद खुजाई’ याने प्रेषितांच्या सामरिक योजनेची ‘अबू सुफयान’ ला खबर देताच त्याने आपल्या सैन्यासह तेथून पळ काढला.
प्रेषित मुहम्मद(स) ‘हमराऊल असद’ या ठिकाणी तीन दिवस वास्तव्यास होते. वातावरण निवळल्यावर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या लष्करासह मदीना शहरी परत आले. या प्रसंगी प्रेषितांवर जीव ओतणार्या सोबत्यांची स्तुती करणारी कुरआनाची ही आयत अवतरली,
‘‘ज्यांनी जखमा झेलूनही ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांच्या आदेशाचे पालन केले, आणि जे लोक सदाचारी व पापभीरु आहेत, त्यांच्यासाठी (ईश्वराजवळ) मोठा मोबदला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन, ४:१७२

- सय्यद अबुल आला मौदूदी
या पॉकेट साईज् पुस्तिकेत मुस्लिम कोणास म्हणतात? याचे तपशीलवार वर्णन आले आहे. मुस्लिम होण्याकरिता कमीत कमी कोणत्या शर्थी व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यामुळे मनुष्य खरा व योग्य मुस्लिम होण्यास पात्र ठरेल.
या पुस्तिकेत मुस्लिम, इस्लाम, कुफ्र इ.चे अर्थ समजावून दिले आणि मनुष्याच्या मार्गभ्रष्टतेचे तीन मार्ग विशद करण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 81   -पृष्ठे - 12        मूल्य - 10            आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/ypnlvusp6y99hy8w2ym2ibvff8i5cala

‘बद्र’च्या युद्धापासून ‘उहुद’च्या युद्धापर्यंत
या दोन्ही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घटनांच्या परिस्थितीचा संक्षिप्तपणे आढावा घेऊ या. परंतु यापूर्वी ‘ज्यू’जणांनी निर्माण केलेल्या एका अप्रिय स्थितीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यावरून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनचर्या आणि इस्लामी इतिहास समजण्यास मदत होईल.
तसे पाहता ‘ज्यू’ समाजात पूर्वी बरेच प्रेषित येऊन गेले. ‘ज्यूं’ च्या प्राचीन धर्मग्रंथात प्रेषितांचे आज्ञापालन आणि अवज्ञा करण्याची चांगली व वाईट फळे चाखण्याची बरीच उदाहरणे आहेत. ईश्वरी ग्रंथधारक आणि प्रेषितांचे अनुयायी असल्याचा त्यांना मान होता. त्यामुळे त्यांनी प्रेषित मुहम्मद(स) यांना अंतिम प्रेषित स्वीकारून सहकार्य करावयास हवे होते. परंतु ‘ज्यू’ जणांनी प्रेषित मुहम्मद(स) यांचा विरोध केला.
‘मक्का’तील कुरैश समुदायात दंभ किवा स्वश्रेष्ठत्वाची भावना होती. परंतु ‘ज्यूं’मध्ये प्रेषितांविरुद्ध द्वेष होता. द्वेषाची भावना ही नेहमी हीन भावनेचे स्वरुप धारण करीत असते. धार्मिक मंडळी जेव्हा खालच्या स्तरावर येतात तेव्हा या स्तराच्या खालच्या पातळीची मर्यादाच नसते.
एका उच्च दर्जाच्या ‘ज्यू’ विद्वानाची मानसिकता कशी आहे ते या एका छोट्याशा घटनेवरून लक्षात येते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची एक पत्नी माननीय सफया(र) या ‘हुय्या बिन अखतंब’ या ‘ज्यू’ विद्वानांची अतिशय लाडकी कन्या होती. एकदा ‘हुय्या बिन अख्तब’ आपल्या धाकट्या भावासह आपल्या कन्येस भेटण्यासाठी ‘कुबा’ या ठिकाणी आले. ते दोघे प्रेषितांना पाहून खूप चितातूर झाले. धाकट्या बंधुने ‘हुय्या बिन अखतब’ ला विचारले की, ‘‘आपल्या धर्मग्रंथात ज्या प्रेषितांची भविष्यवाणी करण्यात आलेली आहे, ते हेच आहेत काय?’’ ‘हुय्या बिन अख्तब’ उत्तरला, ‘‘होय! ईश्वराची शपथ!’’
‘‘मग विचार काय आहे?’’ धाकट्या बंधुने विचारले, ‘हुय्या’ म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! जोपर्यंत जीवंत आहे, तोपर्यंत मी या माणसाचा (प्रेषितांचा) वैरी व शत्रूच असेन.’’
या घटनेवरून स्पष्ट होते की, ‘ज्यू’ समाजाच्या धर्मग्रंथात प्रेषित मुहम्मद(स) यांच्या बाबतीत भविष्यवाणी करण्यात आली असून आणि धर्मपंडितांनी मुहम्मद(स) यांना प्रेषित असल्याचे ओळखले असूनसुद्धा केवळ हट्टापायी त्यांच्या प्रेषितत्वाचा स्वीकार न करण्याचे दुर्भाग्य ओढवून घेतले. हीच मानसिकता संपूर्ण ‘ज्यू’ समाजात होती.
आदरणीय प्रेषितांच्या उपदेशसभेत असताना उपहासात्मक शैलीत टर उडविण्याचा ‘ज्यू’ ना छंदच होता. बिनबुडाचे प्रश्न विचारून सभेतील उपदेशकार्यात बाधा आणायची, काहीजण मुस्लिम होण्याचे नाटक रचून प्रेषितांच्या अनुयायांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करून इस्लामी आंदोलनात बाधा आणण्याचे प्रयत्न करीत. याशिवाय प्रेषितांच्या गरीब अनुयायांना अगदीच अल्प मोबदला देऊन कष्टाची कामे करवून घेत. त्यांना कर्ज देऊन कर्जवसुलीच्या वेळी त्यांचा अपमान करीत. एकदा प्रेषितांचे एक अनुयायी माननीय हदरद यांनी एका ‘ज्यू’ सावकाराकडून कर्ज घेतले. कर्ज फेडण्याच्या निर्धारित वेळेवर त्यांच्याकडे शरीरावरील कपड्याशिवाय एक कवडीदेखील नव्हती. माननीय हदरद(र) यांनी कर्ज फेडण्याची मुदत वाढवून मागितली. परंतु ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून देण्याचे नाकारले. शेवटी हे प्रकरण प्रेषितांपर्यंत आले. प्रेषितांनी मुदतवाढीची विनंती करूनही ‘ज्यू’ सावकाराने मुदत वाढवून तर दिली नाही आणि माननीय हदरद(र) यांच्या अंगावरील वस्त्र काढून घेण्याचे दुर्दैवी कर्म केले.
अगदी नाजुक वेळेवर ‘ज्यू’ समाजाने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी केलेला सहकारकरार कित्येकदा मोडून इस्लामी आंदोलनास संकटात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी गद्दारी केली. कित्येक वेळा प्रेषितांना ठार करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. प्रेषितांच्या जेवणात विष कालवले. अशा प्रकारच्या अगदी हीन दर्जाच्या व अतिशय खालच्या पातळीच्या कुकर्मांच्या वातावरणातसुद्धा प्रेषितांनी न डगमगता ‘बद्र’ या पहिल्या युद्धापासून ते ‘मक्का’वर ऐतिहासिक विजय मिळविण्यापर्यंत इस्लामी आंदोलन मोठ्या यशस्वीपणे राबविले.
‘बद्र’ आणि नंतर होणार्या ‘उहुद’ या दोन पहिल्यावहिल्या युद्धांदरम्यान घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकू या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा ‘महीन’वरून ‘बद्र’ स्थळावर पोहोचले तेव्हा त्यांना सूचना मिळाली की, ‘सुलैम’ कबिला हल्ला करण्याच्या तयारीत आहे. प्रेषित मुहम्मद(स) रमजान महिन्याच्या २५ तारखेस ‘माऊल कद्र’ या स्थानावर पोहोचले, परंतु शत्रूचा थांगपत्ता लागला नसल्याने तेथून परत आले. ‘रमजान’ महिना संपण्यास दोन दिवसांचा अवधी असताना ‘सदकतुल फित्र’ (दान धर्म)आणि ‘ईद’ ची नमाज अदा करण्याचा ईश्वरी आदेश अवतरला. हिजरी सन दोनमध्ये जकात (कमाईचा चाळीसावा भाग जनकल्यानास्तव देणे) चा आदेश आला. हे कर्म ‘नमाज’नंतर अतिशय महत्त्वाचे आहे. याच काळामध्ये प्रेषितकन्या माननीय फातिमा(र) यांचा माननीय अली(र) यांच्याशी विवाह झाला.
ज्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) ‘बद्र’च्या युद्धासाठी मदीनाबाहेर गेलेले होते, त्या वेळी ‘कैनुकाअ’ या ‘ज्यू’ परिवाराने मदीना शहरात उपद्रव माजविण्यास सुरुवात केली. ते मुस्लिमांना त्रास देऊ लागले. एक अनसारी महिला एका ‘ज्यू’ च्या दुकानापर्यंत सामान घेण्यासाठी गेली असता तिची छेड काढली. हे पाहताच एका मुस्लिमाने त्या उपद्रवी ‘ज्यू’ ला जागीच ठार केले आणि येथूनच मुस्लिम आणि ‘ज्यू’ चे चांगलेच बिनसले. आदरणीय प्रेषित युद्धावरून परत आल्यावर ‘कैनुकाअ’ परिवाराने आपल्या दुष्कृत्यावर खेद व्यक्त करण्याऐवजी प्रेषितांना सांगितले,
‘‘आम्हाला ‘कुरैश’ लोकांसारखे भ्याड समजू नका! युद्ध काय असते, ते आम्ही तुम्हास दाखवून देऊ!’’ या ठिकाणी ‘‘कैनुकाअ’ परिवाराने प्रेषितांशी केलेला ‘सहकारकरार’ भंग केला. प्रेषितांनीही या वेळी शव्वाल महिन्यात त्यांचा घेराव केला. पंधरा दिवसांच्या घेरावानंतर त्यांचा हेकेखोरपणा आणि उन्माद पार वितळून गेला आणि आपला पराभव स्वीकारून त्यांनी अभयदानाची भीक मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना जीवदान देऊन शहराबाहेर काढले.
‘बद्र’च्या युद्धभूमीवर इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांना मुस्लिमांकडून जो अपमानास्पद पराभव पत्करावा लागला, त्यामुळे मक्कावासीयांत मुस्लिमांविरुद्ध संतापाची तीव्र लाट आली. त्याचबरोबर बदल्याची तीव्र भावना व जळफळाटामुळे ते अक्षरशः फणफणत होते. या वेळी मक्कावासीयांचा सरदार हा ‘अबू सुफियान’ होता. (मक्केवर प्रेषितांनी विजय मिळविला तेव्हा अबू सुफियानने इस्लामचा स्वीकार करून इस्लामची खूप सेवा केली) म्हणून ‘बद्र’च्या युद्धात ठार झालेल्यांचा बदला घेण्याची त्याच्यावरच जवाबदारी होती. त्याने पूर्ण तयारीनिशी दोनशे सत्तर जणांची सशस्त्र टोळी घेऊन ‘जिल हज्जा’ महिन्याच्या पाच तारखेस मदीनावर चाल करून आला. मदीनापासून तीन मैल अंतरावर असलेल्या ‘अरीज’ नावाच्या वस्तीवर त्याने हल्ला चढवून आपला राग शमविण्याचा प्रयत्न केला. तेथे त्याने प्रेषितांचे खंदे समर्थक माननीय ‘साद बिन अम्र(र)’ यांना ठार केले. काही घरांना आग लावली. तेथील मुस्लिम चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार होण्याच्या आधीच त्याने तेथून पळ काढला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना घटनेची सूचना मिळताच सैनिकांची एक तुकडी घेऊन त्याचा पाठलाग केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेस ‘गजवा-ए-सवीक’ असे म्हणतात. प्रेषित मुहम्मद(स) जलहिज्जा महिन्याच्या नऊ तारखेस मदीना परत आले आणि दहा तारखेस ‘ईदुल अजहा’ (बकर ईद) ची नमाज अदा केली. तसेच दोन बोकडांची ‘कुरबानी’ (ईश्वराच्या नावावर बलिदान) देऊन संपूर्ण मुस्लिम समुदायास कुरबानीचा आदेश दिला. ही पहिली ‘बकरईद’ होय.
‘जिलहज्जा’चा महिना संपताच ‘इस्लामी राज्य मदीना’चे सर्वेसर्वा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या खबर्यामार्फत सूचना मिळाली की, ‘सालबा’ आणि ‘नज्द’ कबिल्याच्या लोकांनी मदीना आणि सभोवतालच्या वस्तींमध्ये लुटमार करण्याची योजना आखली आहे. आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय उस्मान(र)’ यांना मदीनाची जवाबदारी सोपवून साडेचारशे मुजाहिदीन (धर्मयोद्धे) घेऊन ‘नज्द’कडे निघाले. प्रेषितांच्या या आक्रमक पवित्र्याची ‘नज्द’वासीयांना खबर मिळताच त्यांनी पळ काढून डोंगरदर्यांमध्ये आश्रय घेतला. शेवटी आदरणीय प्रेषित ‘सफर’चा संपूर्ण महिना प्रवासात व्यतीत करून मदीना शहरी परतले.
इस्लामी राज्याचा एक अतिशय कट्टर शत्रू ‘काब बिन अश्रफ’ होता. तो ‘ज्यू’ समाजाचा होता. तो ‘मदीना’ आल्यावर तेथील ‘ज्यू’ जणांना इस्लामविरुद्ध चिथावणी देत आणि मक्का शहरी जाऊन तेथील लोकांनादेखील मुस्लिमांविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करीत, अशा प्रकारे चिथावणीखोर दौरा आटोपून तो मदीना सीमेबाहेर मजबूत तटबंदी असलेल्या आपल्या किल्ल्यात दबा धरून बसायचा. त्याला जेव्हा ‘बद्र’च्या युद्धाचा परिणाम कळाला, तेव्हा मुस्लिमांच्या विजयामुळे त्याचा मुस्लिमद्वेष अनावर झाला. त्याने सरळ मक्का शहर गाठले. ठार झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना मुस्लिमांविरुद्ध भडकावले. शोकगीत तयार करून मक्कावासीयांच्या बदल्याच्या आगीत तेल ओतले. त्यांच्या भावना उत्तेजित केल्या. अशा प्रकारे संपूर्ण मक्का शहराला चिथावणी देऊन ‘मदीना’ शहरी आला. तेथे प्रेषित आणि इस्लामी आंदोलनाविरुद्ध चिथावणीखोर व मानहानीकारक काव्य रचून मोठे कुभांड रचले.
या शत्रूचा नायनाट आणि बिमोड करण्यासाठी ‘माननीय इब्ने मुसलमा(र)’ यांनी एक तुकडी घेऊन ‘काब बिन अश्रफ’ या उपद्रवी माणसास ‘रब्बिउल अव्वल’ महिन्याच्या चौदा तारखेस ठार केले. ‘ज्यू’ समाजास या घटनेची खबर मिळताच त्यांना घाम फुटला. त्यांनी घाबरून तत्काळ प्रेषितांची भेट घेतली. प्रेषितांनी त्यांच्याकडून इस्लामविरोधी कुभांड न रचण्याचे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले.
‘कुरैश’जण बद्रच्या पराभवाने इतके विचलित आणि भयभीत झालेले होते की, त्यांनी सीरियाचा व्यापारी मार्गच बदलला. मदीनाऐवजी ते ‘इराक’कडून सीरिया जाऊ लागले. ‘जुमादिल उखरा’च्या महिन्यात प्रेषित मुहम्मद(स) यांना या व्यापारी काफिल्याची खबर मिळाली आणि त्यांनी ‘माननीय जैद बिन हारिसा(र)’ यांच्या नेतृत्वाखाली शंभर सैनिकांची तुकडी रवाना केली. पहिल्याच हल्ल्यात काफिल्याचे सरदार आणि इतर जण पळून गेले. परंतु काफिल्याचा प्रमुख ‘फरात बिन हय्यान’ कैदी बनविण्यात आला. त्याने मदीना आल्यावर इस्लाम स्वीकारला. या काफिल्याकडून हस्तगत झालेली ‘गनीमत’ची संपत्ती जवळपास एक लाख दिरहम होती. तिचा एक पंचमांश भाग म्हणजेच वीस हजार दिरहम सरकारी खजिण्यात जमा करण्यात आला.
‘माननीय उमर फारुक(र)’ यांची कन्या ‘माननीय हफसा(र)’ या विधवा झाल्या होत्या. त्यांचे पती ‘बद्र’च्या युद्धात हुतात्मे झाले होते. माननीय उमर(र) यांना आपल्या विधवा कन्येची चिता होती. हिजरी सन तीनमध्ये ‘शाबान’च्या महिन्यात त्यांचा प्रेषितांशी विवाह झाला.
वरील घटनांवर दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला कळून चुकते की, ईश्वराचे प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ‘बद्र’च्या घटनेनंतरसुद्धा जवाबदार्यांचे किती मोठे ओझे होते. रक्षणात्मक गरजांसाठी त्यांना सतत प्रवास करावा लागला. या घटनांवरून हे स्पष्ट होते की, सत्य धर्माची सीमा उपासना आणि उपदेशापर्यंतच मर्यादित नव्हती. तसेच हेदेखील स्पष्ट होते की, ‘सत्यधर्म’ व्यवस्थेस ईशद्रोहावर आधारित व्यवस्थेवरील समाजावर लागू करून जनकल्यानाचे आंदोलन चालू ठेवणे काही पोरखेळ नव्हे. ही एक क्रांतिकारी चळवळ असून त्यासाठी प्रत्येक पावलावर त्याग आणि बलिदानाची गरज असते.

माननीय अबु हुरैरा (र.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘माझ्या पालनकत्र्या ईश्वराने मला नऊ गोष्टींचा आदेश दिला आहे.
(१) दर्शनीय आणि अदर्शनीय - प्रत्येक स्थितीत ईश्वराचे भय बाळगणे.
(२) सत्य, रास्ती व समानतेवर टिवूâन रहावे, मग श्रीमंती असो वा गरीबी.
(३) कोणावर मेहरबानीच्या व संतापाच्या दोन्ही स्थितीत न्यायपूर्ण बोलावे.
(४) ज्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत, त्यांच्याशी संबंध जोडावेत.
(५) ज्यांनी मला वंचित केले त्यांना त्यांचा हक्क द्यावा.
(६) माझ्यावर अत्याचार करणाऱ्यास क्षमा करावी.
(७) माझे मौन राहणे विचार करण्यासाठी असावे.
(८) माझी दृष्टी बोध घेण्यासाठी असावी.
(९) माझ्या बोलचाल व चर्चेमधून ईश्वराचे महीमत्व स्मरण व्हावे.
यानंतर प्रेषितांनी सांगितले की, इस्लामचा प्रचार करणाऱ्यांच्या स्वभावात उपरोक्त गुणधर्म असावेत. क्षमा केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते
ह. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘सदका (दान) देण्याने संपत्तीचा ऱ्हास होत नाही. आणि एखादी व्यक्ती क्षमाशील असेल तर अल्लाह त्याच्या सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ करतो. आणि एखादी व्यक्ती केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी विनम्रता बाळगत असेल तर, ईश्वर अशा व्यक्तीस उच्चपदावर  पोहोचवितो. (हदीस : मुस्लीम शरीफ)

स्पष्टीकरण  
सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की, सदका (दान) दिल्याने, संपत्तीचा ऱ्हास होतो. संपत्ती कमी होते. त्याचप्रमाणे लोक असेही विचार करतात की आम्ही इतरांना क्षमा करण्याचे ठरविले आणि लोकांसमोर विनयशिलतेने वर्तुणूक ठेवली तर लोक यास आमची दुर्बलता आणि मजबूरी समझतील. विनम्रताबाबत लोकात असा गैरसमज आहे की हे आमच्या स्वाभिमान आणि प्रतिष्टेच्या विरूद्ध आहे. उपरोक्त हदीसमध्ये लोकांच्या गैरसमजुतीला आणि त्यांच्या कुशंकाला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि स्पष्ट करण्यात आले आहे की  सदका देण्याने संपत्तीमध्ये कमतरता येत नाही. वास्तविकता अशी आहे की सदका देवून भक्त, ईश्वराच्या कृतज्ञभक्तांमध्ये सामील होत असतो. ईश्वर आपल्या कृतज्ञभक्तास  आपल्याकडील अतिरिक्त अनुग्रहाने (कृपेने) सन्मानित करतो, असे ईश्वराचे वचन आहे. ‘‘जर तुम्ही माझे कृतज्ञ दास व्हाल, तर तुम्हांला मी अधीक देईन.’’ (कृपा करीन) तसेच  क्षमाशिल होण्यासाठी (हृदय) मनाचे मोठेपण, उदारपण होणे आवश्यक आहे. कोत्या मनाच्या माणसाच्या आवाक्यातील ही गोष्ट नव्हे. म्हणून या गैरसमजामध्ये राहू नका की,  क्षमाशिल आणि विनयशिल वृत्तीमूळे आपल्या सन्मानाला आघात पोहोचेल. क्षमा केल्याने प्रतिष्ठामध्ये कमीपणा येत नाही, तर त्यामध्ये वाढच होते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती  विनम्रता अंगीकारते तेव्हा ईश्वर त्याचा दर्जा उंचावत असतो. विनयशिलता ही मानवाच्या नैतीकतेच्या अस्तित्वाचे सौंदर्य आहे. सौंदर्य जिथे जिथे आढळेल, तिथे तो स्वत:चे महत्व  स्विकारण्यास भाग पाडेल. 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget