
वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर
एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच
तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट या
चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट, कीचकट आणि नाजुक होत गेला. या
प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरुपात इस्लाम धर्माची सुद्धा एक स्पष्ट भूमिका
आहे. ही भूमिका आधुनिक काळाने प्रेरित नसून ती इस्लामच्या प्रारंभी पासूनच
होती. आजही आहे व जग संपेपर्यंत जशीच्या तशीच राहणार. ही इस्लामी भूमिका
त्या भूमिकेच्या अगदी विरोधात होती. जी शतकानुशतके जनमानसांत रूजलेली व
मान्य करण्यात आलेली होती. या मध्ये स्त्रीच्या वयोमानानुसार पुरुषाच्या
संबंधाच्या स्वरूपानुसार प्रेम व सहानुभूती आणि सहकार्य, समानता, तसेच
तिच्या स्थायी व्यक्तीमत्वाची स्वीकृती आहे. यात तिचा जीव, संपत्ती व
विनयाचे संरक्षण आले. शिवाय तिचे अर्थिक, सामाकिड व राजनैतिक अधिकार आहेत.
असे म्हणावयास हरकत नाही की, या मध्ये तिच्या व्यक्तीमत्वा च्या
परिपूर्णतेची सर्व साधन-सामग्री उपलब्ध आहे. ही अतिशय स्पष्ट, प्रमाणित व
कणखर भूमिका आहे. या भूमिकेमुळे ते सर्व प्रश्न सुटतात जे वर्तमान काळाच्या
भुमिकेने समाज जीवनात निर्माण करून ठेवलेत.
इस्लाम धर्माच्या बाबतीत काही लोकांची भूमिका अज्ञानी व पक्षपाती असते.
ते त्यांच्या विशेष धार्मिक व राजनैतीक विचारसरणीमुळे इस्लाम धर्माच्या
कोणत्याच विशेषत्वास पचवू शकत नाहीत. हे लोक स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या
सकारात्मक भूमीकांकडे काना डोळा करतात. म्हणजेच द्वेष आणि शत्रुत्वाची सूड
भावनाच माणसाला सत्यापासून दूर ठेवते. जो मनुष्य या क्लिष्ट मानसिक रोगास
बळी पडतो तो महा महीम वास्तवांना पाहु शकत नाही. व पाहिल्यावर सुद्धा
त्यांना न पाहण्याचे ढोंग करीत असतो. परंतु सत्य लपविल्याने व डोळे मिटवून
घेतल्याने लपत नसते. ते आपले अस्तित्व प्रखरपणे प्रकाशमयरित्या मान्य
करण्यास भाग पाडते. जो पर्यंत या भूतलावर दिव्य कुरआन व हदीसची स्पष्ट
शिकवण अस्तित्वात आहे, ज्या नुसार शतकानु शतके संपूर्ण जगामध्ये निर्णय व
त्यावर कार्य होत राहिल, स्त्री वरील इस्लामच्या उपकारांना नाकारता येत
नाही.
काहींना वाटते की इस्लाम-पूर्व काळात स्त्रिची जी दयनीय अवस्था होती.
इस्लामने त्यात सुधारणा अवश्य केली व काही अधिकार सुद्धा दिलेत ज्यापासून
ती वंचित होती. परंतु स्त्री बरोबर परिपूर्ण न्याय करण्यात आला नाही.
पुरुषाला मिळालेल्या अधिकारापेक्षा स्त्रिला मिळालेले अधिकार तुलनात्मक
दुष्टया खूप कमी आहेत. व ही तफावत अजूनही बाकी आहे जी पूर्वी
‘स्त्रि-पुरुषांत’ अधिकारांच्या बाबतीत होती. दुसऱ्यां शब्दांत इस्लामने
पुरुष व स्त्रिला समान दर्जा दिला नाही व त्यांच्या दरम्यान परिपूर्ण
समानता प्रस्थापित केली नाही.
इस्लामने स्त्रीला जे अधिकार दिले आहेत. त्यावर विषमतेच्या या
दृष्टिकोनानुसार पुष्कळ आक्षेप व हरकती घेण्यात येतात. हे असे म्हणता येते
की इस्लाम मध्ये पुरुष श्रेष्ठत्वाची कल्पना आहे. पुरुष घराचा स्वामी व
मालक आहे. तो एका पेक्षा जास्त विवाह करू शकतो. त्याला तलाक (घटस्फोट)
देण्याचा अधिकार आहे. वारशात स्त्री पेक्षा दुप्पट अधिकार पुरुषाला आहे.
साक्ष, बदला आणि दैयत (भरपाई) च्या कायद्यात स्त्रिवर अन्याय झालेला आहे.
असे व अशा प्रकारच्या कीतीतरी हरकती व आक्षेप घेणारे इस्लामी कायद्यात बदल
घडविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांची मागणी आहे की पुरुषाचे अधिकार
संपुष्टात आणावे. स्त्रिला खाजगी जीवनात पुरुषांना मिळालेले.डछएकअङ सर्व
अधिकार देण्यात यावे. दोघांचे अधिकार समान असावेत. वारसा हक्कात दोघांचा
समान वाटा असावा. पतीला तलाक देण्याचा अधिकार स्त्रिला सुद्धा असावा. तिला
जेव्हा वाटल्यास पती पासून विभक्त होण्याचा अधिकार असावा. पुरुषाने तलाक
दिल्यास आजीवन घटस्फोटित स्त्रिला पोटगी द्यावी. पुरुषाला एक पत्नी घरात
असताना दुसऱ्या लग्नाची परवानगी नसावी. कधी-कधी तर जीभ एवढी अवाक्या बाहेर
जाते की पुरुषांना असलेल्या बहुपत्नीत्वाच्या अधिकारा प्रमाणेच स्त्रिलाही
बहुपतीत्वाचा अधिकार मिळावा. अशा प्रकारे स्त्रिला पण पुरुषांना
मिळालेले, सर्वच राकडीय व सामाकिड अधिकार मिळावेत. हे सर्व आक्षेप इस्लाम
विषयी अज्ञानाचे कडू फलीत आहेत. दुर्दैवाने या अज्ञानी मंडळी मध्ये बरेचसे
जण सुशिक्षित आहेत व विचारवंत देखील आहेत. इस्लाम धर्माने जीवनाची जी
विस्तारित आणि परिपूर्ण कल्पना सादर केली आणि ज्या प्रमाणे व्यक्तीगत व
सामुहिक जीवनाची त्याने उभारणी केली. याच्या प्रकाशात हे आक्षेप आपोआप लोप
पावतात.
हे आक्षेप काही नवीन नाहीत. हे फार जुने आहेत. या मुदतीत विविध अगांनी
त्यांचे समाधान करण्यात आले. परंतु ही गोष्ट कीती आश्चर्याची व खेदजनक आहे
की प्रत्येक वेळी या आक्षेपांना अगदी नवीन व आधुनिक स्वरूपात सादर करण्यात
येते. आणि याचा प्रचार करण्यात येतो की ही समस्या जग निर्मिती पासून आज
पर्यंत पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आली व इस्लामी विद्वांनाजवळ यांचे
उत्तरच नाही. या त्यांच्या नीतीमुळे असे सहसा वाटते की यांच्यात इस्लाम
धर्म समजण्याची भावना कमी आणि टिके चे लक्ष्य बनविण्याचीच भावना जास्त आहे.
गरज याची आहे की ज्या आक्षेपांची उत्तरे त्यांना मिळालीत त्यावर त्यांनी
गंभीरपणे विचार करावा आणि त्यातही त्रुटी आढळल्यास स्पष्ट करावे. या मुळे
आकलन व विवेकशीलतेचे मार्ग मिळतील. गैरसमजुती दूर होतील आणि इस्लामच्या
वास्तव स्वरूपाचे आकलन होईल.
हे सर्व आक्षेप अशा प्रकारचे लोक घेतात ज्यांच्या विचारांवर व बुद्धींवर
स्त्रि-पुरुषांचा पाश्चात्यांनी दिलेला विषमतेचा पगडा बसलेला आहे. या
पगड्याच्या विळख्यात ते स्वतः विवश आहेत. ही विचारसरणी आता केवळ विचारसरणी
राहीलेली नसून तिला मोठ्या प्रमाणात आजमावण्यात आले आहे. आणि परिणामी
लैंगिक स्वैराचार आणि परिवारांच्या विघटनाच्या स्वरूपात भीषणता ओढवून
घेण्यात आली. (याचे तपशील वार वर्णन ‘स्त्रि स्वातंत्र्याची पाश्चात्य
कल्पना’ या लेखात आपल्या समोर मांडण्यात आले आहे.) परंतु या भीषण
परिणामांकडे काना-डोळा करून त्याचा अशारितीने पुरस्कार करण्यात येतो की ती
केवळ उपयुक्त विचार सरणी नसून स्त्रिची मुक्ती आणि उत्तुंग यशाची
गुरुकील्ली आहे. इस्लामने या विचारसरणीचा पुरस्कार केला नाही तर
विवेकशीलतेची मागणी आहे की इस्लामलाच नेहमी करिता घटस्फोट देण्यात यावा.
वस्तुस्थिती अशी आहे की स्त्रिच्या बाबतीत इस्लामने दिलेल्या विचारसरणीची
उपयुक्तता व मोल आणि पावित्र्य इतिहासात सिद्ध झाले आहे. जेव्हा केव्हा
पश्चिमच्या स्त्रि-पुरुष समानतेच्या कल्पनेत सुधारणा घडवून आणण्यात येईल व
त्यातील विषमतेस दूर करण्यात येईल तेव्हा ती कल्पना इस्लामी-विचारसरणी
च्या जास्त जवळ येईल. एवढेच नाही तर हे सांगणे अयोग्य होणार नाही की
इस्लामच्याच माध्यमाने त्यात सुधारणा घडवून त्याच्या त्रूट्या संपविण्यात
येतील.
स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या भुमिकेवर विरोधकांकडून टीकांची झोड
उठविण्यात आली व सतत हल्ले होत आलेत. हे हल्ले एवढे तीव्र आहेत की बरेचसे
इस्लामचे नाव घेणारे सुद्धा खूप प्रभावित झालेत आणि त्यांना इस्लामी
शिकवणीत मोठ्या चुका व त्रुट्या आढळून येऊ लागल्या.
या न्यूनगंडाचेही भरपूर प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना निश्चित करणे
सोपे नाही. काही मंडळी मग ते तोंडी दावा करो अथवा न करो, परंतु इस्लाम
धर्माच्या कायद्यापासून मुक्त होऊ इच्छितो. त्यांच्या दृष्टिकोनात वर्तमान
काळात स्त्रिचे लक्ष्य इस्लाम धर्माने नव्हे तर पाश्चात्यांनी निश्चित
केले आहे. ती इस्लामच्या बंधनात अडकून स्वतःचा विकास करू शकत नाही. यासाठी
तिला त्या मुक्त वातावरणामध्ये बागडावयास हवे जे पाश्चिमात्यांच्या
मार्गदर्शनात निर्माण झाले आहेत. त्याच्या या कामना व प्रयत्नांना एक
मुस्लिम तो मुस्लिम असे पर्यंत तरी साथ देऊ शकत नाही. कारण त्या
मुस्लिमांसाठी शरीयतच्या त्या मर्यादा आहेत ज्यांचे उल्लंघन करण्याची
त्याला परवानगी नाही. यदाकदाचित त्याच्या कडून अशी चूक घडली तरी तो स्वतःला
अपराधी आणि ईश्वरासमोर उत्तरदायी असण्याची जाणीव बाळगेल व तात्काळ
‘शरीयत’ च्या मर्यादा कक्षेत येण्याची धडपड करील. हीच त्याच्या श्रद्धेची
मागणी आहे. यावेळी शरीयतचे संपूर्ण आदेश चर्चेत घेतलले नाहीत. केवळ
पारिवारिक जीवन विषयक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आदेशांना दिव्य
कुरआनने विविध ठिकाणी ‘ईश्वरीय मर्यादा’ च्या शब्दाने ने संबोधित केले
आहे. आणि या मर्यादांचे उल्लंघन करण्यास सक्तीने बंदी घातली आहे. एका
ठिकाणी ‘तलाक’ च्या कायद्याच्या उल्लेखा संबंधी दिव्य-कुरआनने सांगितले
की,
‘‘ईश्वराने निश्चित केलेल्या या मर्यादा आहेत. त्यांचे उल्लंघन करू
नका. जे लोक त्यांचे उल्लंघन करतील, तेच अत्याचारी आहेत.’’
(सुरह-ए-बकरा : २२९)
सुर-ए-तलाक मध्ये सुद्धा तलाकचे नियम वर्णन करण्यात आले आहेत. त्यांच्या नंतर तात्काळ नंतर सांगितले की,
‘‘कित्येक वस्त्या अशा आहेत ज्यांनी आपला पालनकर्ता आणि त्याच्या
प्रेषितांच्या आज्ञे विरुद्ध दुर्लक्ष केले तर मी (स्वयं ईश्वराने) त्यांचा
सक्तीने हिशोब घेतला आणि त्यांना कठोर शिक्षा दिली. त्यांनी त्यांच्या
कर्मांची फळे चाखली आणि त्यांची कार्यपरिणती तोटाच तोटा आहे. ईश्वराने
(परलोकात) त्यांच्यासाठी तीव्र प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. म्हणून
ईश्वराच्या प्रकोपाचे भय बाळगा. हे बुद्धीमान लोक हो ! ज्यांनी श्रद्धा
ठेवली आहे. ईश्वराने तुमच्याकडे एक आदेश अवतरला आहे.’’ (सुरह-ए-तलाक : ८ ते
१०)
मग कोणतीही मुस्लिम व्यक्ती या मर्यादा आणि ताकीद व तंबी नंतर स्त्रिचे
अधिकार किवा आदेश अथवा कोणत्याही शरीयतच्या कायद्याचा विरोध करण्याची
कल्पनाच कशी करणार?
काही जणांच्या बुद्धी व विचारांवर पाश्चात्यांचा एवढा पगडा व प्रभाव
नाही की ते कुरआन च्या नियमांना प्राचीन विधी समजून व प्राचीन परंपरा समजून
रद्द बातल ठरवतील. परंतु त्यांना असे वाटते की, इस्लामी विधी ज्या
परिस्थितीत अवतरली होती. ती परिस्थिती आता पार बदलून गेली आहे. बदलत्या
परिस्थितीत शतकानुशतके प्राचीन नियम व कायदे आणि परंपरा वर कार्यरत
असण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. हा काळ स्पर्धेचा काळ आहे. इस्लामने स्त्रि
विषयी जी भुमिका घेतली आहे. त्या भुमिकेवर ठाम राहून वर्तमान काळातील
स्पर्धात्मक जीवनांत ती वावरू शकत नाही. स्त्रिच्या इतरांबरोबरील स्पर्धेत
मागे पडण्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण समाज व राष्ट्रच मागे राहील. या
करिता इस्लामी कायद्यात सुधारणा करून वर्तमान काळाशी साम्य साधण्याची
नितांत आवश्यकता आहे. या मंडळीच्या दृष्टिकोनात हे आवश्यक झाले आहे. जे लोक
असे पुनरुज्जीवन करण्याची भाषा करीत नाहीत त्यांच्यावर हे परिवर्तनवादी
लोक परिस्थिती बद्दल अज्ञानी, पुरातनवादी व अगतीक असण्याचे आरोप करीत
असतात.
काही मंडळी याही पुढे जाऊन मोठ्या साधेपणाने व भोळसुद पणाने असे म्हणतात
की इस्लाम एक आधुनिक धर्म आहे. त्याने स्त्रिला आधुनिक युगातील संपूर्ण
अधिकार बहाल केले आहेत. परंतु या पुरातन वादयांना कुरआन आणि हदीसचा अर्थच
अशा प्रकारे वर्णन केला की गुलामगिरीच्या काळातील आठवण यावी. करिता इस्लाम
धर्माचे आधुनिक व विकासवादी वर्णन करण्याची गरज आहे. कोण आहे जो या आकलन
शक्ती आणि दूरदर्शिता व उच्च विचारांची दाद देणार ?
जे लोक इज्तेहाद (साकल्लयाने केलेला विचार) च्या नावावर इस्लामी
कायद्यात सुधारणेचे इच्छूक आहेत ते कदाचित इस्लामी कायद्यांना मानव निर्मित
कायदा समजतात की जो कायदा मानव निर्माण करतो व तो गरज भासल्यास त्याच्या
मर्जीनुसार त्यात बदल करीत जातो. इस्लामी कायदा हा मानव निर्मित नसून
ईश्वराने स्वतः अवतरित केलेला आहे. या करिता कोणत्याही व्यक्तीस त्यात
सुधारणा व परिवर्तन करण्याचा अजिबात अधिकार नाही. हा अधिकार त्याने
प्रेषितास सुद्धा दिला नाही ज्याच्यावर ‘शरीयत’ अवतरली. कारण दिव्य कुरआनात
आहे की,
‘‘जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकविल्या जातात तेव्हा ते लोक
जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करीत नाहीत म्हणतात, याच्या ऐवजी एखादा
अन्य कुरआन आणा अथवा यांच्यात काही बदल करा.’’ हे पैगंबर (स) त्यांना
सांगा, ‘‘माझे हे काम नव्हे की मी आपल्या कडून याच्यात काही फेर बदल
करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचे अनुसरण करणारा आहे, जे माझ्याकडे
पाठविले जाते. मी जरी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या
भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे.’’ (सूरह-ए-युनूस : १५)
दुसरी गोष्ट अशी की मानवाने निर्माण केलेले कायदे वेळ आणि परिस्थितीचे
द्योतक असतात. ते काळ आणि परिस्थितीच्या प्रभावा पासून मुक्त नसतात.
त्यांच्यात मोठी लवचिकता असते. ते काळानुसार बदलत असतात. मानवीय कायद्यांत
लवचिकता असणे म्हणजे ती त्यातील त्रुटी आहे जी बदलत्या काळात त्यावर कर्म
करण्यास अपात्र बनविते. परंतु ज्याने इस्लामचा शुद्ध अंतःकरणाने अभ्यास
केला आहे तो या वास्तवास कधीच नाकारू शकत नाही की दिव्य कुरआनाने स्वतःस
एका कायम स्वरुपी धर्माच्या स्वरुपात सादर केले व ज्या मध्ये कयामत
(महाप्रलय) पर्यंत परिवर्तन घडणे शक्य नाही. इज्तेहाद (विचार साकल्य)
म्हणजे कुरआनच्या नियमांना बदलण्याचे नाव नसून या नियमांना बदलत्या
परिस्थितीवर लागू करण्याचे कौशल्य व त्याच्या प्रकाशात व मार्गदर्शनात नवीन
नियमांचा शोध लावणे आहे. हे काम स्वतंत्र विचारसरणी व स्वैर विचारसहीत
शक्य नसून त्या नियमांच्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे जे इस्लामने
निर्माण केले आहेत.
येथे एक प्रश्न राहून-राहून डोक्यात येतो, तो म्हणजे शेवटी या
सुधारकांना स्त्रीचे अधिकार आणि मुस्लिमांची सामाकिड सुधारणेची एवढी काळजी
का लागली? मुस्लिमांमध्ये भरपूर बिघाड आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ही आणि
कार्याबाबतीतही बिघाड आहेत. त्याच प्रमाणे नैतिक आणि व्यवहारिक बिघाड
आहेतच. परंतु हा सुधारक या सर्व बिघाडांना दूर करण्याऐवजी मुस्लिम स्त्रि
वर होत असलेल्या अत्याचार व अन्यायावरच का चितित आहे?
या मंडळीच्या बुद्धी व विचारधारेचे निरिक्षण केल्यास याचे एक कारण
लक्षात येते की त्यांच्या विचारा नुसार मानवाच्या जीवनाचे उद्दिष्ट व
त्याचे लक्ष्य हे पाश्चात्यांनी निश्चित केलेले उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे.
म्हणून त्यांनीच निश्चित केलेला मार्ग यांनी स्वीकारला आहे. त्यांचे एक
स्पष्ट वैशिष्टय हे की धर्म एक निरर्थक बाब आहे व त्याचा आपल्या जीवनाशी
सुतराम संबंध नाही. कोणाला जर रस असलाच तर त्याने धर्माला केवळ त्याच्या
व्यक्तिगत जीवना पर्यंतच मर्यादित ठेवावे. सामुहिक जीवन त्या पासून मुक्त
असावे. जो पर्यंत मानव धर्माच्या बंधनात जखडलेला आहे. भुतकाळाच्या अंधकारमय
युगात पडलेला असेल आणि विकासाचे मार्ग त्याच्यासाठी बंद असतील. आजच्या
काळात त्याला जगण्याचा अधिकार नाही.
हे संपूर्ण इस्लामी अनुयायांना याच मार्गावर चालविण्याचे इच्छूक आहेत.
या करिता प्रथम पाऊलाच्या स्वरूपात कदाचित ते ‘समाज-सुधारणे’ स जास्त
लाभकारी समजतात आणि मुस्लिम स्त्रिच्या अधिकाराच्या माध्यमाने त्यांना या
क्षेत्रात यशस्वितेची जास्त आशा आहे. कारण की जो पर्यंत मुस्लिम स्त्रि
धर्माच्या प्राचिन कल्नपेच्या ‘दलदली’ मध्ये फसलेली आहे व नवीन पिढीला
ईश्वर आणि प्रेषिताचे दास्यत्व आणि त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची शिकवण
देत आहे तो पर्यंत धर्माची बंधने इतकी सैल होणार नाहीत की इस्लामच्या
अनुयायांना त्यांच्यात हजारो दुष्कर्म असूनही त्यांच्या मार्गाची दिशा
बदलणे शक्य होईल. त्यांची दिशा बदलणे केवळ अशा प्रसंगीच शक्य होईल जेव्हा
स्त्रिच धर्मांच्या दिशेत असलेले तिचे तोंड वळवील. व आपले अधिकार
मिळविण्यासाठी धर्माविरुद्ध रणशिग फुंकेल. वस्तुस्थिती अशी आहे की विरोधक
त्यांच्या उद्दिष्टात यशस्वी झालेले नाहीतच आणि त्यांना यशस्वी होण्याची
आशा बाळगण्याची गरज सुद्धा नाही. याचाच संताप आणि राग ते धार्मिक नेत्यांवर
काढतात व त्यांना अज्ञानी, प्राचीनवादी व पुरातनवादी आणि मूलतत्ववादी
सारख्या संबोधनांद्वारे संताप व्यक्त करीत असतात. त्यांच्या मुखाद्वारे व
लेखणी द्वारे निघालेला प्रत्येक शब्द ‘प्रमाण-पत्र’ आहे आणि आधुनिक काळाने
त्यास विस्तारण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न विकास
आणि संस्कृतीच्या नावावर मोठ्या बिनधास्तपणे विस्तारीत करण्यात येत आहे.
काही जण स्वतः धार्मिक वृत्तीचे आहेत. आणि पाश्चात्य संस्कृतीच्या कटू
अनुभवांपासून दहा पावले दूर राहू इच्छितात. परंतु चारही बाजूंनी या
संस्कृतीचा विळखा एवढा घट्ट आहे की ते तिच्या प्रभावापासून सुरक्षित राहू
शकत नाहीत. हळू-हळू त्यांच्या समाज जीवनात बदल होत आहे आणि पाश्चात्य
संस्कृतीचा विळखा घट्ट होत आहे. परंतु अजूनही ते या बाबतीत समाधानी व
आनंदित आहेत की, पार्चिमात्यांच्या अनुकरणाच्या स्पर्धेत सामील होऊन सुद्धा
तिच्या वाईट प्रभावापासून त्यांचे समाज जीवन सुरक्षित आहे व यापुढे
सुद्धा असेच सुरक्षित राहील. परंतु हे खोटे समाधान व गैरसमज आहेत जे जास्त
काळ टिकू शकणार नाही. अद्याप पर्यंत त्यांना पाश्चात्यांचे कडू फलित
भोगावे लागले नसतील तरी हे केवळ इस्लामचे परिणाम आहेत जे या संस्कृतीच्या
परिणामांना प्रगट होऊ देत नाहीत. जेव्हा हे परिणाम संपतील तेव्हा
पाश्चात्य संस्कृती तिच्या संपूर्ण दुष्कर्मांसहीत त्यांच्या घरांत
नांदणार आहे. वादळाच्या पूर्वानुमानांना पाहून जो माणुस सावध होणार नाही व
आपल्या घराचे संरक्षण करणार नाही. त्याचे घर वादळाच्या एका तडाख्याने
नेस्तनाबुद होईल. आणि कोणीही त्यास वाचविण्यासाठी येणार नाही.