Latest Post

‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या प्रा. बेन्नूर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन : अरफा

मुंबई-
स्वत:च्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. समाज सुसंस्कृत होतो म्हणून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेण्यासाठी मुस्लिम  समाजातील मुलांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे॰ गरिबी असली तरी शिक्षण अर्धवट सोडू नका, विज्ञानयुगामध्ये शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. समाजाच्या विकासासाठी शिक्षण  आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री, राष्ट्रीय प्रवत्तेâ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलीक यांनी केले.
बीड मायनॉरिटी वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या वतीने मदरसा अन्वरुल कुरआन, कुर्ला येथे २३ जानेवारी २०१९ रोजी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या कलाहुणांना चालना देण्यासाठी आणि  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी नवाब मलीक बोलत होते.
ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य के. ए. सय्यद सर यांच्या अथक परिश्रमाने कुर्ला जागृतीनगर परिसरातील गोरगरीब समाजाबरोबरच मुस्लिम समाजासाठी माता  सावित्री / फातिमा सार्वजनिक वाचनालयाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सय्यद सर म्हणाले, वाचनाने मस्तक सुधारते, ते  कोणापुढेही नतमस्तक होत नाही. वयाला हरवायचे असेल तर वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. वाचनामुळे जीवनात मौज आहे. नाही तर समस्या रोज आहेत. सय्यद सरांनी  विद्यार्थ्यांना वाचनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची गरज आहे. मुलींनीसुद्धा चांगल्या पद्धीतने शिक्षण घेऊन जुन्या चालीरिती दूर केल्या पाहिजेत. समाजाची शिक्षश्रणाची टक्केवारी वाढविली  पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्य मुनिसा आबेदी यांनी केले. पाहुणे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद सर, पदाधिकारी अस्लम पठाण, गणी सय्यद, करीम शेख यांच्या हस्ते ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाईट हायस्कूल एज्य. कॉलेजचे प्राचार्य सुनिल पाटील, शकूर सय्यद, लियाकत भाई, अकबर खान, मुख्तार सय्यद, राजूभाई, मिलिंद केदारे यांचे अनमोल  सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नसीम खान यांनी केले तर एजाज सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बुरखा म्हणजे काय व कशासाठी? हे जाणून घेणे आवश्यक आह़े बुरखा प्रयोजनामागील भूमिका जाणून घेतल्याशिवाय त्याचे फायदे व तोटे लक्षात येणार नाही़त ते समजून घेतल्यानंतर  आम्हाला कोणत्या दिशेने प्रगती करावयाची आहे, हे निश्चित करता येईल व बुरखा प्रगतीस अडथळा निर्माण करतो किंवा नाही याबद्दल निर्णय देता येई़ल॰ ‘हिजाब’ या अरबी शब्दाचे  उर्दू भाषांतर ‘परदा’ असे करण्यात आले आह़े ‘हिजाब’ हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आह़े त्या आयतीत अल्लाहने पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या घरात नि:संकोचपणे ये-जा  करणाऱ्यांना मनाई केल़ी घरातील महिलांकडून काही हवे असेल तर ते पडद्याआडून मागावे, असे आदेश देण्यात आल़े याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखापद्धत अस्तित्वात आल़ी तद्नंतर  बुरख्यासंबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात आल़े बुरखाबाबतच्या आदेशाचें तपशीलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहतीस या दोन  अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आह़े ज्यात म्हटले आहे, ‘‘ महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावराव़े इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीच असभ्य राहणीमान सोडून द्यावे व  नटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नय़े घराबाहेर जाताना डोक्यावर एक चादर पांघराव़ी ज्या दागिन्याचे मधुरनाद (ध्वनि) निर्माण होत असल असे दागिने काढून  ठेवावे़त घरातील सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगाव़ी ज्यांच्याशी विवाह करता येतो (गैरमहरम) अशा नातेवाईकांसमोर शृंगार करून जाण्याचे टाळाव़े घरातील आप्तजना  (महरम) समोर जातानासुद्धा आपल्या वक्षस्थळावर ओढनी (दुपट्टा) पांघरून आपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण कराव़े’’ पुरूषांना आदेश देण्यात आले आहेत, ‘‘त्यांनी  आपल्या आयाबहिणींच्या खोलीत जाताना परवानगी द्यावी जेणेकरून अचानक प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाह़ी’’ यालाच ‘परदा’ (बुरखापद्धत) म्हणता़त॰ पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी याबाबत अधिक खुलासा करताना म्हटले आहे, ‘‘स्त्रियांनो, आपल्या सख्ख्या भावा व वडिलांसमोर जातानासुद्ध चेहरा, हाताचा पंजा व  घोट्यापर्यंत पायाव्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्त्राने आच्छादित करूनच जाव़े असे पारदर्शक व घट्ट वस्त्र धारण करू नये की ज्यातून शरीर प्रदर्शन घडेल, तसेच आपल्या घरातील  आप्तजनां (महरम) शिवाय इतर कोणत्याही नात्याच्या पुरूषासोबत एकांतात बसू नय़े’’ पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध (अत्तर वगैरे) लावून घराबाहेर जाण्याबाबतही मनाई केलेली आह़े  मस्जिदीत महिलांना नमाज पढण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होत़े एकाच रांगेत स्त्री- पुरूषांनी नमाज अदा करण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे नमाज  अदा झाल्यानंतर महिला निघून जाईपर्यंत पैगंबर मुहम्मद (सल़्ल) व इतर मुस्लिम पुरूष मस्जिदीत आपल्या बसल्या ठिकाणावरून उठत नस़त या आदेशाची कुरआनातील सूरह  (अध्याय) नूर व अहजाब आणि पैगंबराच्या आदेशा (अहादीस)मध्ये पडताळणी करता येई़ल बुरख्यामध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येत़े मात्र बुरख्याबाबतच्या मूळ तत्त्वात व  उद्देशांत फरक झालेला नाह़ी मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही, मात्र मला सांगावेसे वाटते की जे लोक सांगतात की ‘बुरखा आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो,’ ते  दुंतोडीपणाचे धोरण प्रगट करीत आहे़त त्यांचे वक्तव्य अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या विरोधात आह़े दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, अल्लाह
व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण केले आहे़त खरोखर आम्ही जर अशा प्रकारचे विचार बाळगत असू तर आम्ही स्वत:ला मुस्लिम कसे  मानावे?
ज्या अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असा अन्याय केला आहे ते त्यांच्यापासून पूर्णत: अलिप्त का होत नाहीत? अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी बुरख्याचा आदेश  दिलेलाच नाही, असे म्हणताच येणार नाह़ी मी आताच सांगितले आहे की, ज्याची इच्छा असेल त्याने कुरआन वा हदीसचे अध्ययन करू शंकासमाधान करून घ्याव़े एखाद्यास हदीसच्या  अध्ययनाने समाधान होत नसेल तर त्यांनी कुरआनचे आदेश पडताळून पाहावे़त बुरखा पद्धतीबाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्त्वाचे उद्देश लक्षात येती़ल
(१) पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यात यावे व अशा दुर्वर्तनांपासून त्यांना अलिप्त ठेवावे, जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होता़त
(२) स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात याव़े नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास  येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्या़त
(३) कुटुंबव्यवस्था मजबूत व सुरक्षित कराव़ी कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्त्वाची बाब आह़े बिनबुरख्याच्या कुटुंबव्यवस्थेने महिलांना कुटुंबात गुलामांचा दर्जा प्राप्त झाला आह़े त्या सर्व प्रकारच्या हक्कांपासून वंचित झाल्या आहे़त तसेच ज्यांनी महिलांना त्यांचे हक्क तर दिले आहेत मात्र बुरख्याच्या बंधनातून मुक्त ठेवले आह़े, अशा कुटुंबाची  व्यवस्था अस्तव्यस्त झाली आह़े इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकारसुद्ध देऊ पाहतो, त्याचबरोबरच घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छित़ो हे केवळ बुरखापद्धतीचा अवलंब केल्यानेच  शक्य होऊ शकत़े मी आपणांस विनंती करते की आपण कृपया उपरोक्त तीन उद्देशांवर शांतपणे विचार कराव़ा चारित्र्यरक्षणाचा समस्येबाबत जर कोणी उदासीन असेल तर त्यांच्या  बाबतीत मी काही करू शकत नाह़ी जे चारित्र्याबाबत गंभीर आहेत त्यांनी विचार करायला हवा की ज्या समाजात स्त्रिया नटून थटून-स्वैराचरण करत असतील व पुरूषांसोबत सर्वच  क्षेत्रात एकत्र काम करीत असतील तर तेथील लोकांचे चारित्र्य कसे व कुठवर सुरक्षित राहू शकेल? आपल्या देशात जसजशी स्वैराचारी परिस्थिती निर्माण होत आहे तसतशी लैंगिक  अपराधांची संख्या वाढत चालली आह़े त्याबाबत वर्तमानपत्रात आपण रोजच वाचत असत़ो बुरखा पद्धतच लैंगिक अपराधाचे मूळ कारण आहे, तसेच बुरखा न राहिल्यास लोकांमधील  स्त्रियांबद्दल कुतूहल व आकर्षण आपोआप कमी होईल, असे म्हणणे व मानणे साफ चुकीचे आह़े ज्या काळात बुरखा पद्धत नव्हती त्या काळातसुद्धा लैंगिक आकर्षण कमी झाले नव्हत़े  त्यांच्या वासनासक्तीने चरमसीमा गाठली होत़ी नम्रतेने समाधान होत नव्हते, म्हणून उघडपणे कामक्रीडा होऊ लाली व आता तर लैंगिकसंबंधाचे परवाने देऊन ही वासनात्मक भूक शमण्याचे चिन्ह दिसत नाह़ी अमेरिका, इंग्लंड व इतर देशांच्या वर्तमानपत्रात अनेक लैंगिक अपराधांबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असता़त ही समाधानकारक परिस्थिती मानली जाईल  काय?
ही केवळ वैयक्तिक चारित्र्यची समस्या नसून संपूर्ण सामाजिक संस्कृतीचा प्रश्न बनला आह़े समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आह़े हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त कमाईने पुरा होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्टाचाराने वाढता खर्च पूरा केला जात  आह़े त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आह़े कोणत्याच कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होऊ शकते नाह़ी जे लोक आपल्या स्वत:च्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते  दुसऱ्यावर शिस्तीचे नियम कसे लागू करू शकतील? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वासपात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ठ कसा राहू शकेल?
स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसर्गिक व्यवस्था आह़े स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आह़े पुरूषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदाऱ्या  त्याच्यावर सोपविण्यात आल्या आहे़त स्त्री-पुरूषांच्या शरीररचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यात आले आहे़त मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आह़े तिच्या ममत्व व कोमल भावनांमुळे बालकांचे संगोपण व  पालनपोषण अत्यंत सहृदयपणे पार पाडले जात़े पुरूष त्या मानाने कणखरवृत्तीचा असत़ो त्याच्यावर कुटुंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहाच्या कठीण जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहे़त  स्त्री - पुरूषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणास मान्य नसतील तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल व परिणामत: संपूर्ण मानवसमाज हैड्रोजन वा अणुबॉम्बविना संपुष्टात येई़ल  स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारीबरोबरच पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार  करणे आह़े मानवजातीच्या उत्पत्ती व सेवा - शुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असत़े त्यात पुरूषांचा काडीमात्र सहभाग नसत़ो या उलट पुरूषांच्या जबाबदारीतही तिने  सहभागी व्हावे व कितपत न्याय्य ठरेल?
स्त्रियांनी परिस्थितीनुरूप अन्यायकारक जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला आह़े एवढेच नव्हे तर आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामूहिक चळवळी सुरू केल्या आहे़त आपण मातृत्वाचा उपहास केला आह़े गृहणीचा अपमान केला आह़े महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा-शुश्रुसेला तुच्छ लेखले आह़े तिच्या सेवाकार्याचे महत्त्व पुरूषांचे राजकारण, उद्योगधंदे व युद्धच्या जबाबदाऱ्यांपेक्षा कमी मानता येणार नाह़ी बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होऊन पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहे़त पुरूषांची कामे न केल्यास  तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार होत नव्हत़ा इस्लामने महिलांना घरगुती स्त्रीसुलभ जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आदेश दिला होत़ा मातृत्व व बालकांच्या संगोपनाच्या  उदात्त कार्यामुळे तिला समाजात सन्मानजनक स्थान प्राप्त होत़े मात्र आता कुटुंब व्यवस्थेबाबतचा आपला दृष्टिकोनच बदलत चालला आह़े आपला आग्रह आहे की स्त्रियांनी मातेची  कर्तव्ये पार पाडावीत, त्याबरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेटसारखे पद भूषवावे, पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या महफिलीही सजवाव्या़त अशा अनेक  प्रकारच्या कामांचे ओझे तिच्यावर लादले गेल्यामुळे ती एकही जबाबदारी पूर्णत: समाधानकारकपणे पार पाडू शकत नाह़ी ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला  पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही अशी कामे तिच्यावर सोपवण्यात आली आहे़त मात्र तिचे कौतुक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळचे होते!

– सय्यद परवीन रिजवी

प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘ला कतअअला खाइनिन’’ खयानत (धोकाधडी) करणाऱ्या माणसाचे हात  कापले जाऊ नयेत.
स्पष्टीकरण- उपरोक्त हदीसवरून माहित होते की चोरीमध्ये धोकाधडी (खयानत) याचा समावेश नाही. चोरी म्हणजे एखाद्या मालाला  (धनाला) एखाद्याच्या कब्जातून काढून आपल्या कब्जात घेणे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे की एका ढालीच्या  किमतीपेक्षा कमी रकमेच्या चोरीसाठी हात कलम करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात अब्दुल्लाह बिन अब्बास यांच्या  कथनानुसार एका ढालीची किंमत दहा दिरहम, इब्ने उमर (रजी.) यांच्यानुसार, तीन दिरमह, तर अनस बिन मालिक (रजी.) यांच्या  मतानुसार पाच दिरहम तर माननीय आयशा (रजी.) यांच्या कथनानुसार एकचतुर्थांश दिनार होती. याच मतभेदाच्या आधारावर 
धर्मशास्त्रींच्या मते चोरीची कमीतकमी मात्राबद्दलसुद्धा मतभेद आहेत. इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, चोरीची मात्रा दहा दिरहम  आहे तर इमाम मालिक, शाफई आणि अहमद यांच्यानुसार एकचतुर्थांश दिनार आहे. अनेक अशा वस्तू आहेत ज्यांच्या चोरीबद्दल हात कापण्याची शिक्षा दिली जाऊ शकत नाही.प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे की, ‘‘फळे आणि भाज्यांच्या चोरीत हात कापला जाऊ शकत नाही.’’ खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. माननीय आएशा (रजी.) यांचे कथन आहे की, तुच्छ वस्तूंच्या चोरीत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात हात कापला जात नसे. माननीय हजरत अली व हजरत उस्मान (रजी.) यांचा निर्णय आहे आणि सहाबांचा याविषयी मतभेदसुद्धा नाही की पशूंच्या चोरीत हात कापण्याची शिक्षा नाही. या स्त्रोतांच्या आधारावर इस्लामी धर्मशास्त्रींनी अनेक वस्तूंना हात कापण्याच्या शिक्षेतून वगळले आहे.
इमाम अबू हनिफा (रह.) यांच्या मते, फळभाज्या, मटण, धान्य, जेवण, खेळ आदि वस्तूंच्या चोरीमध्ये हात कापण्याची शिक्षा नाही. तसेच जंगलात चरणारी जनावरे आणि बैतुलमालची  चोरी करण्यात हात कापण्याची शिक्षा नाही. परंतु याचा अर्थ असा होत नाही की या चोऱ्यांविषयी बिल्कुल काही शिक्षा दिली जाऊ शकत नाही. म्हणजेच अपराधामध्ये हात कापला  जाणार नाही परंतु योग्य शिक्षा होईल. हात कापल्यानंतर जो मनुष्य क्षमायाचना करतो आणि आपल्या मनाला चोरीच्या अपराधाने पवित्र करतो तोच अल्लाहचा सदाचारी दास बनून  राहतो. तो अल्लाहच्या कोपापासून वाचला जाईल आणि अल्लाह त्याच्या त्या अपराधाचा डाग धुवून टाकील. एखाद्याने हात कापल्यानंतरसुद्धा आपल्या स्वत:ला वाईट संकल्पापासून  पवित्र केले नाही आणि त्याच दुष्ट भावनांना आपल्या मनात घर करून ठेवले ज्यांच्यामुळे त्याने चोरी केली व त्याचा हात कापला गेला होता तर याचा अर्थ असा होतो की हात तर  त्याच्या देहापासून वेगळा झाला परंतु चोरी त्याच्या मनात पूर्वीसारखीच राहून गेली. म्हणून तो अल्लाहच्या कोपाला पात्र राहील जसा पूर्वी होता. म्हणून अपराध्याने अल्लाहची क्षमा  मागावी आणि आपल्या मनाचा सुधार करावा कारण हात कापणे सामाजिक शिस्तपालन करण्यासाठी आवश्यक आहे. तथापि या शिक्षेपासून मन पवित्र होऊ शकत नाही. मनाचे पावित्र्य  फक्त क्षमायाचनेने व अल्लाहकडे परत येण्यातच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हदीसमध्ये असा आदेश आहे की, एका चोराचा हात जेव्हा त्यांच्या आदेशाने कापला गेला तेव्हा  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्याला आपल्या जवळ घेतले व सांगितले, ‘‘सांग! मी अल्लाहची माफी मागतो आणि क्षमायाचना करतो.’’ प्रेषितांच्या आदेशानुसार त्या व्यक्तीने क्षमायाचना  केली. नंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्या माणसासाठी अल्लाहजवळ प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह! याला क्षमादान दे.’’

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)
    या पुस्तिकेत दिनांक 13 एप्रिल 1939 रोजी या विषयावर मौलाना साहेबांनी दिलेले भाषण आहे. यात त्यांनी जिहादचा खरा अर्थ आणि विरोधकांनी काढलेला चुकीचा अर्थ आणि त्यांचा त्या मागील हेतु विशद करून जिहाद बाबत गैरसमज होण्याची कारण दिली आहेत. इस्लामी जिहाद केवळ जिहाद नसून अल्लाहच्या मार्गातील जिहाद आहे आणि त्या बाबतच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
    जिहाद का व कसा, विश्वव्यापी इस्लामी क्रांती आणि तिचे स्वरूप वर्णन केले आहे आणि या संदर्भात साम्राज्यवादाची आशंका व्यक्त केली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 93   -पृष्ठे - 24    मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/7vxp3dho80ov1p8woxjjo3gt16fzegpg

‘हिजरत’ (मदीना स्थलांतर) च्या सहाव्या वर्षाच्या शेवटी घडलेल्या एका महत्त्वाच्या घटणेकडे वाचकांचे लक्ष आम्ही वेधत आहोत. या घटनेचे इस्लामी आंदोलनावर अतिशय दूरगामी परिणाम झालेले आहेत.
त्या वेळी प्रेषित मुहम्मद(स) यांना एक असे स्वप्न पडले की, ते आपल्या काही सोबत्यांना घेऊन शांतीपूर्वक मक्केस गेले आणि उमरा (काबादर्शन) केला. या स्वप्नाचा त्यांनी आपल्या सोबत्यांसमोर उल्लेख करताच सर्वांच्या मनात ‘उमरा’ (काबादर्शन) करण्याची तीव्र कामना निर्माण झाली.
शेवटी एके दिवशी म्हणजेच हिजरी सन सहामध्ये ‘जीकादा’ महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरबानीसाठी काही उंट घेऊन चौदाशे सोबत्यांसह मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषितांसह सर्वांनीच केवळ रक्षणात्मक हत्यार सोबत घेतले. मक्कातील कुरैशजणांना आपल्या ‘उमरा’ करण्याच्या उद्देशाची सूचना देण्यासाठी प्रेषितांनी ‘माननीय बिशर बिन सुफियान(र)’ यांना पुढे पाठविले. ‘माननीय बिशर(र)’ मक्कावरून परत आले आणि प्रेषितांना खबर दिली की, ‘कुरैश’ जणांनी प्रेषितांना मक्का शहरात दाखल होण्यास मज्जाव करण्यासाठी लष्कर जमविले असून याच्या तयारीचा भाग म्हणून खालिद बिन वलीद दोनशे स्वारांना घेऊन प्रेषितांशी दोन हात करण्यासाठी ‘गनीम’ या ठिकाणी पोहोचला आहे.
या वार्ता मिळाल्यावर प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपला मार्ग बदलून दुसर्या मार्गाने ‘सनीयतुल मरार’ या स्थानावर पोहोचले. तेथून जवळच ‘हुदैबिया’ नावाची एक विहीर आणि वसती होती. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या सोबत्यांसह येथेच पडाव टाकला. विहिरीत पाणी कमी होते, परंतु ईश्वरी चमत्काराने या विहिरीचे पाणीसुद्धा वाढले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय खिराश(र) यांना मक्कावासीयांशी बोलणी करण्यासाठी पाठविले. परंतु मक्कावासीयांनी त्यांच्याशी बोलणी करण्याऐवजी त्यांची स्वारी असलले उंट ठार केले व त्यांचीदेखील हत्या करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मध्यस्थी केल्यावर मात्र त्यांची हत्या टळली. मग मध्यस्थीसाठी प्रेषितांनी माननीय उस्मान(र) यांना मक्केस पाठविले. माननीय उस्मान(र) यांना परत येण्यास उशीर झाल्याचे पाहून प्रेषितांना वाटले की, कदाचित मक्कावासीयांनी त्यांची हत्या केली आणि ते शोकसागरात बुडाले. सर्वजण चिताग्रस्त झाले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी बाभळीच्या एका झाडाखाली आपल्या सोबत्यांसह प्रतिज्ञा केली की, माननीय उसमान(र) यांच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय येथून हलणारदेखील नाही. सर्वांनी एकमताने प्रेषितांच्या हातावर हात ठेवून प्रतिज्ञा घेतली. या झाडाचे नाव ‘रिजवान’ असल्यामुळे या प्रतिज्ञाकर्मास इस्लामी इतिहासात ‘बैतुर्रिजवान’ (रिजवान येथील प्रतिज्ञा) या नावाने ओळखले जाते. दिव्य कुरआनात ‘सूरह-ए-फतह’मध्ये या प्रतिज्ञा समारंभात सामील झालेल्यांना ईश्वराची प्रसन्नता लाभल्याची शुभवार्ता देण्यात आली आहे. मक्कामध्ये कुरैशजणांना या बदल्याच्या प्रतिज्ञेची खबर मिळताच ते घाबरले. शेवटी माननीय उस्मान(र) परत आले आणि प्रेषित व त्यांच्या सोबत्यांची चिता दूर होऊन आनंदाचे वातावरण पसरले.
मक्कावरून ‘खुजाआ’ कबिल्याच्या बुदैल बिन वरका या माणसाने हितैषीच्या स्वरुपात आदरणीय प्रेषितांना कुरैशजणांच्या भावना आणि लष्करी तयारी कळविली. उत्तरादाखल प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘आम्ही लढण्याच्या उद्देशाने मुळीच आलो नसून आमचा हेतु केवळ काबादर्शन करण्यचाच आहे.’’ मग प्रेषित मुहम्मद(स) परत म्हणाले, ‘‘कुरैशजण’ सतत लढाया करून खूप कमजोर झाले आहेत. त्यांनी एका ठराविक मुदतीकरिता युद्धबंदीचा आमच्याशी समझोता केल्यास हे त्यांच्या हिताचे ठरेल.’’ बुदैल बिन वरका याने प्रेषितांचा हा संदेश कुरैशजणांना कळविला. ‘कुरैश’च्या इतर काही बड्या नेत्यांसह उरवा बिन मसऊद सखफीनेसुद्धा म्हटले की, ‘‘मुहम्मद(स) यांनी पाठविलेला प्रस्ताव योग्यच आहे. मी स्वतः त्यांची भेट घेतो.’’
उर्वा बिन मसऊद प्रेषितदरबारी हजर झाला आणि प्रेषितांनी त्याच्यासमोरही आपला युद्धबंदी प्रस्ताव बोलून दाखविला. तो प्रेषित आणि त्यांच्या स्नेही सोबत्यांना पाहून खूप प्रभावित झाला. तो कुरैशजणांना जाऊन भेटला आणि म्हणाला, ‘‘हे कुरैशच्या सरदारांनो! मी रोमन सम्राट कैसर आणि पर्शियन सम्राट किसरा आणि ‘नेगूस’ यांच्या दरबारीसुद्धा जाऊन आलो. परंतु यापैकी कोणत्याच सम्राटाचा असा सन्मान करताना मी मुळीच पाहिला नाही, जेवढा सन्मान आणि आदर मुहम्मद(स) यांचे सोबती करतात. हे कुरैशच्या सरदारांनो! मुहम्मद(स) यांनी तुमच्याविषयी कोणतेच अपशब्द काढले नाहीत. त्यांचा संदेश स्वीकार करा!’’
मग मक्केतील ‘कनाना’ कबिल्याचा ‘हुलैस’ हा माणूस आला. त्याला लांबून पाहताच प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘कुरबानीसाठी आणलेल्या उंटांची रांग लावा. हा माणूस कुरबानीसाठी आणलेल्या प्राण्यांचा आदर करतो.’’ हुलैसने कुरबानीच्या उंटांची लांबलाचक रांग पाहताच कुरैशजणांकडे धावत जाऊन म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! मुहम्मद(स) आणि त्यांचे अनुयायी केवळ उमरा (काबादर्शन) करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना यापासून रोखने योग्य ठरणार नाही!’’ कुरैशजणांनी त्याचे ऐकले नाही, तेव्हा त्याला संताप चढला आणि त्याने स्पष्ट शब्दांत त्यांना ठणकावले की, ‘‘जर तुम्ही प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायांना या पुण्य कर्मांपासून रोखले तर मी आपल्या कबिल्यासह तुमच्यापासून विभक्त होईन!!!’’
शेवटी सुहैल बिन अम्र आले आणि काही वेळ बोलणी झाल्यानंतर समझोत्याच्या अटी निश्चित झाल्या. माननीय अली(र) हे समझोत्याचा करारनामा लिहिण्यासाठी बसले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘‘असीम दयाळू व कृपाळू ईश्वराच्या नावाने’’ लिहिण्यास सांगताच सुहैल बिन अम्र यांनी आक्षेप घेतला की, ‘‘आम्ही रहमान व रहीम (असीम दयाळू व कृपाळू) वर श्रद्धा ठेवीत नाहीत. त्यामुळे अरब समाजात प्रचलित असेलल्या परंपरेनुसार करारपत्र लिहावे.’’ म्हणून माननीय अली(र) यांनी त्याऐवजी ‘‘ईश्वराच्या नावाने’’ ने सुरवात केली. दुसर्या ओळीत दोन्ही पक्षांची नावे लिहिण्यात आली, तेव्हा माननीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नावाचा ‘‘ईश्वराचे प्रेषित’’ असा उल्लेख केला, त्यावर परत सुहैल याने आक्षेप घेताना म्हटले, ‘‘आम्ही जर मुहम्मद(स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकारले असते, तर मग आपल्यात कलह आणि वैर निर्माण होण्याचा प्रश्नच कुठे येतो? म्हणून तुम्ही ‘मुहम्मद बिन अब्दुल्लाह’ असे लिहावे. प्रेषितांनी त्यांची ही अटसुद्धा मान्य केली. या समझोत्याच्या निश्चित झालेल्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
  1. दहा वर्षांपर्यंत दोन्ही पक्ष आपसात युद्ध करणार नाहीत.
  2. प्रेषित मुहम्मद(स) यांचे जे सोबती काबादर्शन, ‘हज’ अथवा व्यापार किवा इतर कोणत्याही हेतुस्तव मक्का शहरात येतील त्यांच्या प्राण, वित्त आणि अब्रूचे रक्षण व्हावे. त्याचप्रमाणे ‘कुरैश’जणांच्या प्रत्येक व्यक्तीस मदीना शहरातून जाताना प्राण, वित्त व अब्रूचे संरक्षण मिळेल.
  3. कुरैशजणातील जो मनुष्य रक्षकाशिवाय मुहम्मद(स) कडे येईल त्यास सुरक्षितपणे परत जाता येईल आणि याउलट मुहम्मद(स) च्या अनुयायांपैकी जो मनुष्य ‘कुरैश’जणाकडे जाईल त्याला परत केले जाणार नाही.
  4. समझोत्यातील जवाबदार्यांमध्ये ज्या माणसास मुहम्मद(स) बरोबर राहावयाचे त्याने त्यांच्याबरोबर राहावे आणि ज्याला कुरैशबरोबर राहावयाचे त्याने कुरैशबरोबर रहावे.
  5. या वर्षी मुहम्मद(स) उमरा (काबादर्शन) केल्याविनाच परत जातील, मात्र पुढील तीन दिवस तीन रात्रीपर्यंत ते मक्का शहरात राहू शकतील आणि नंतर त्यांना मक्का सोडावे लागेल.
हा समझोता अजून पूर्णही झाला नव्हात, एवढ्यात ‘सुहैल बिन अम्र’चे पुत्र ‘माननीय अबू जुंदल(र)’ साखळदंडासहित कैदेतून बाहेर आले (माननीय अबू जुंदल(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला असल्याने कुरैशजणांनी त्यांना साखळदंडाने बांधून कैद केले होते.) ‘सुहैल’ त्यांना पाहताच म्हणाले की,
‘‘समझोता कराराच्या अट क्र. तीनप्रमाणे या माणसास आमच्या स्वाधीन करावे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘अजून तर करारपत्र लिहूनही झाले नाही.’’ ‘‘अशा प्रकारे तर कोणत्याही अटीवर करार पूर्ण होऊ शकणार नाही.’’ सुहैल उत्तरले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दुःखाचे घोट गिळत मोठ्या संयमाने ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना शत्रूच्या स्वाधीन केले आणि ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांचे सांत्वन करीत दुःखद स्वरात म्हणाले, ‘‘ईश्वर तुमच्या मुक्तीचा मार्ग अवश्य काढेल.’’ ‘माननीय अबू जुंदल(र)’ यांना आपल्या हाताने शत्रूच्या विळख्यात देताना प्रेषितांच्या अनुयायांचे दुःख अनावर झाले. त्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटत होता आणि ‘माननीय उमर(र)’ यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ‘‘आपण सत्यमार्गावर आहात काय? आणि असल्यास शत्रूसमोर आपण एवढे नमते कशासाठी घ्यायेच?’’
‘‘मी ईश्वराचा सच्चा प्रेषित आहे. त्याच्या आदेशाशिवाय काहीही करू शकत नाही!’’ प्रेषितांनी शांत स्वरात ‘माननीय उमर(र)’ यांना उत्तर दिले.
समझोतापत्र तयार झाल्यावर रिवाजानुसार प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना शीरमुंडनाचा आदेश दिला. परंतु मुस्लिमांमध्ये एवढा संताप होता की कोणीच जागेवरून हलण्याच्या मनःस्थितीतही नव्हते. सर्वजणांवर निराशेचे सावट पसरले होते. या प्रसंगी माननीय उम्मे सलमा(र) यांनी आपले अवसान एकवटून गहिवरल्या स्वरात प्रेषितांना म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! हा समझोता मुस्लिमांसाठी असह्य होत आहे. तुम्ही यांना काहीही म्हणू नका, स्वतःच कुरबानी करून स्वतःचे शीर मुंडन करावे. आपले सर्व अनुयायी आपले अनुकरण करण्यास्तव शीर मुंडन करतील.’’
आणि नेमके असेच घडले. दोन आठवडे थांबल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या चौदाशे सवंगड्यांसह हुदैबियावरून कूच केले. रस्त्यात दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-फतह’ अवतरली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांना जमवून या ‘सूरह’ मधील ईश्वराचा संदेश ऐकविला की ‘हुदैबिया’चा तह हाच आपला स्पष्ट विजय होय!’’ ही ईशवाणी ऐकताच सर्वांनी आश्चर्यचकित होऊन प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! खरंच हा विजय आहे?’’ ‘‘त्या पवित्र ईश्वराची शपथ की, ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहे! निश्चितच हा शानदार विजय आहे! प्रेषित गंभीरपणे उत्तरले. इतिहासात पुढे घडणार्या घटनेवरून हे सिद्ध झाले की, हीच घटना पुढे चालून इस्लामप्रचार, शत्रूवर विजय आणि मक्काविजयाची मुख्य आधारशिला ठरली.

आपल्या सभोवताली पसरलेले हे अनंत विश्व अगणित तारे, सूर्यमालिका व आकाशगंगा यांनी व्यापलेले असून, ज्यांच्या प्रकाशाची गती प्रती सेकंदास तीन लक्ष कि.मी. (1,86,000 miles/sec.) असून त्यास पृथ्वीवर पोहोचण्यासाठी कित्येक वर्षे लागतात. हे ब्रह्मांड अनादी नसून काही अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहे. हे ब्रह्मांड आकस्मित किंवा अपघाती अस्तित्वात आलेले नाही, किबहुना असे होणे अशक्यप्राय आहे ! याचा एक निर्माता आहे व तो ‘अल्लाह’ आहे. या विश्वाच्या कानाकोपऱ्यात एकाच प्रकारचे समान कायदे, व्यवस्था लागू आहेत. म्हणजेच येथे अनेक ईश्वर नसून एकच ईश्वर आहे. हे विश्व ना देव-देवतांची लीला आहे आणि ना ही मायाजाळ. वास्तविक ही अल्लाहची विशिष्ट व ठोस विचारपूर्वक केलेली निर्मिती आहे. ईश्वराने विश्वाला ज्ञान, विवेक व बुध्दिचातुर्याने निर्माण केले आहे आणि याच्या प्रत्येक कणाकणांमध्ये शिस्त, नियमबद्धता, समतोलता, बुध्दिचातुर्य व विशिष्ट उद्देश दिसून येतो.
मनुष्य हा योगायोगाने, अपघाती किंवा स्वयंभू जन्मलेला नाही. तो मोकाट सुटलेला प्राणी पण नाही. अल्लाहने त्याला मनुष्य म्हणूनच निर्माण केलेले आहे. अल्लाहने त्याला सर्व प्राणीमात्रांमध्ये संपूर्ण श्रेष्ठता प्रदान केलेली आहे. पृथ्वीतलावर ईश्वराचा प्रतिनिधी म्हणून आणि त्याच्या मर्जीप्रमाणे जीवन व्यतीत करण्याचा हक्क त्याला दिला आहे. अल्लाहने त्याला स्वातंत्र्य, स्वयंनिर्णय घेण्याची क्षमता प्रदान केली असून त्यानुसार तो पुण्य आणि पाप यांसारखे कर्म करु शकतो. त्या अधिकार व स्वातंत्र्यामुळे तो अल्लाह आणि त्याच्या दासांजवळ आपल्या कृत्याला जबाबदार आहे.
ईश्वराने त्याच्या अंतर्मनामध्ये सत्य-असत्य, चांगले-वाईट ओळखण्याची पारख व क्षमता दिलेली आहे. मनुष्य जन्मतःच गुन्हेगार वा पापी नसतो किंवा असा निष्पापही नसतो. ज्याकडून पुन्हा पाप घडणार नाही त्याच्याकडून पाप किंवा पुण्य घडू शकते आणि असे घडतेसुद्धा. एवढेच नव्हे तर केलेल्या चुकांची, पापांची क्षमायाचना करुनसुद्धा तो सन्मार्गाकडे वळू शकतो आणि तो तसे करतोदेखील.
प्रत्येक मानव, मग काळा असो वा गोरा, पाश्चिमात्य असो वा पौर्वात्य, एकाच ईश्वराची निर्मिती आणि भक्त आहे. त्याच्यामध्ये ईश्वराचा अंश नसून तो ईश्वराचे अपत्यही नाही. सर्व मानव आदम व हव्वा या एकाच आईवडिलांची अपत्ये आहेत. अखिल मानवजातीतील प्रत्येक व्यक्ती आपआपसात भाऊ-भाऊ आहे. वर्ण, जात, वंश, देश, भाषा, व्यवसाय, भाऊबंदकी यांच्या फरकावरुन त्यांच्यामध्ये भेदभाव करणे योग्य नाही. कोणत्याही जाती, वंश, भाऊबंदकी किंवा व्यवसायाशी त्यांचा संबंध असला तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून ते सर्व एकसारखे, समान व एकरुप आहेत आणि तो सत्प्रवृत्त, सदाचारी किंवा ईशभिरु, पापभिरु असेल तर तो ईश्वराजवळ व मानवाजवळ दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठित व आदरणीय आहे. उच्च-नीच आणि स्पृश्य अस्पृश्यता, समाजाने वाळीत टाकणे हा धार्मिक व नैतिक गुन्हा आणि संपूर्ण मानवतेवर होणारा अन्याय आहे. प्रत्येक मानवाचा देह पवित्र आहे. कोणा मानवाला स्पर्श केल्याने कोणी अपवित्र होत नाही. पण त्याच्या हाताला व शरीराला घाण लागलेली असेल तर तो अस्वच्छ होऊ शकतो. तसेच प्रत्येक मानवाचे उष्टे पवित्र आहे. मग तो कोणत्याही जाती, जमातीचा किंवा धर्माचा असो, प्रत्येक मनुष्याबरोबर बसून तो निर्धास्तपणे खाऊ-पिऊ शकतो. परंतु त्या खाण्या-पिण्याच्या वस्तू, स्वच्छ, पवित्र आणि वैध असाव्यात.
स्त्री ना सैतानाची एजंट आहे ना पापाचे मूळ, ना ती तिरस्करणीय वा अपवित्र आहे. ती मानवतेच्या व कायदेव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन ईश्वराजवळ हिशोब देण्यास जबाबदार आहे आणि ईश्वराचा कोप, शिक्षा, बक्षीस आणि चांगले फळ यांस पुरुषाएवढीच पात्र आहे. मातेचे स्थान मानवांमध्ये सर्वोच्च आहे आणि सर्वांमध्ये सद्वर्तन आणि सेवा यासाठी तिचे स्थान उच्च पातळीवर आहे.

- मर्कजी मकतबा
    या पुस्तिकेत दिव्य कुरआनच्या ज्या चोवीस आयतींवर आक्षेप घेण्यात आला होता त्याचे समर्पक उत्तर देण्यात आले आहे. यासाठी कुरआनच्याच आयतींना आधार बनविले आहे. संदर्भविहीन अर्थाचा अनर्थ लावून देण्याच्या कुप्रवृत्तील सडेतोड उत्तर देतांना पुस्तिकेत प्रथम स्पष्ट केले आहे -
    कुरआनने अखिल मानवजातीचा निर्माता एकमेव अल्लाह आहे आणि सर्व मानवजात एकाच आईवडीलांची संतती आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व मानव बंधु आहेत, असा उद्घोष केला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 91    -पृष्ठे - 16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2011)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/tmrxlej9c4zl19ag7acuqv348g2rja20
 
 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget