Latest Post

‘हज’ हे इस्लामच्या मूलभूत असलेल्या पाच प्रार्थनाविधीपैकी एक विधी आहे. प्रत्येक मुस्लिमास यथासामर्थ्य जीवनात एकदा हजविधीसाठी काबागृहास जाणे अनिवार्य आहे. काबागृहाच्या भूभागात प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या त्याग व बलिदानाचा सुगंध दरवळत आहे. येथे ‘सफा’ आणि ‘मरवा’च्या टेकड्या असून येथेच प्रेषित इब्राहीम(अ) यांची भार्या माननीय हाजरा(अ) आपल्या तहानने व्याकूळलेल्या तान्हुल्याकरिता पाणी शोधत धावपळ करीत होती. याच ठिकाणी ‘जमजम’ नावाची विहीर निघाली आणि त्यांनी आपल्या तान्हुल्याची याच विहिरीच्या पाण्याने तहान भागविली. त्या रेताळ प्रदेशात आजपासून सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी निघालेल्या या विहिरीचे पाणी अतिउष्ण हवामान असूनही आजपर्यंत आटलेले नाही. आजही कोट्यवधी जनता या पाण्याचा मनमुराद लाभ घेते. त्याचप्रमाणे याच वातावरणात अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सत्यधर्माचा डंका वाजला आणि प्रारंभी इस्लाम स्वीकारून इस्लामच्या मार्गात खडतर संघर्ष केला आणि त्यांचा संदेश घरोघर पोहोचविला. त्यांच्या रक्तरंजित संघर्षाच्या खुणा प्रत्येक ठिकाणी स्पष्ट दिसतात. याबरोबरच मक्का शहरात विजय मिळविणार्या लष्कराच्या तुकड्या गस्त घालताना दिसतात. ‘जबले नूर’ (अर्थात कांतीमय पर्वत) वरील कडे हे इतर सर्व पर्वतापेक्षा भिन्न आणि विशिष्ट स्वरुपाचे आहे. याच पर्वतावर ‘हिरा’ नावाची गुहा असून याच गुहेत आदरणीय प्रेषितांवर दिव्यवाणी प्रथमतः अवतरित झाली असून या गुहेचे स्वरुपही चौदाशे वर्षांपासून आजपर्यंत जसेच्या तसे आहे. याच ठिकाणी असलेल्या ‘सफा’ पर्वतावरून पहिल्यांदा आदरणीय प्रेषितांनी लोकांना जाहीर आवाहन केले होते की, ‘‘हे मानवांनो! ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्यासाठी एकमेव असलेल्या ईश्वराचीच उपासना करा!!!’’ याच ठिकाणी माननीय उम्मे हानी(र) यांचे निवास होते. येथूनच प्रेषितांना ‘मेअराज’चा प्रवास ईश्वराने घडवून आणला. येथेच ‘शाबे अबीतालिब’चे स्थान आहे. याच स्थानावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि हाशिम कबिल्याच्या परिवारजणांना तीन वर्षांपर्यंत समाजापासून विभक्त राहावे लागले. जवळच ‘सौर’ नावाची गुहा आहे, हीच ‘गुहा’ ‘हिजरत’ (वतनत्याग) ची पहिली मजल होय. येथेच ‘तनईम’ हे ठिकाण असून याच ठिकाणी इस्लामद्रोह्यांनी माननीय जैद(र) आणि माननीय खब्बाब(र) या प्रेषितसोबत्यांना ठार केले.
याच ठिकाणी ‘मुहस्सर’ची घाटी असून याच घाटीत आदरणीय प्रेषितांच्या जन्माच्या तीन वर्षांपूर्वी हत्तींच्या फौजेवर ईश्वराचा कोप आला होता. येथेच कुरबानी (बलिदान) ची ती जागा आहे, जेथे ईश्वराच्या एका इशार्यावर प्रेषित इब्राहीम(अ) हे आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी त्यास घेऊन गेले होते.
तात्पर्य हेच की, येथील प्रत्येक ठिकाण आपल्या इतिहासाच्या पवित्र अध्यायांचे एक सुवर्ण पान आहे. ‘हज’चे उद्दिष्ट जेथे हे आहे की, ईश्वराशी पूर्णतः संबंध प्रस्थापित करणे आणि एकेश्वरवादाच्या इब्राहीमी केंद्राशी असलेले संबंध घनिष्ट करणे होय. तेथेच हादेखील उद्देश आहे की, आपले वर्तमान आपल्या धर्माच्या भव्यतम भविष्याशी एकरूप व्हावे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे हिजरी सन नऊमध्ये ‘हज’च्या प्रसंगी मुक्ती आणि विभक्तीची घोषणा झाली. ‘सूरह-ए-बरात’च्या चाळीस आयती माननीय अली(र) यांनी विरोधकांसमोर वाचून दाखविल्या, याचा वर उल्लेख झालेलाच आहे. या ‘हज’मध्ये प्रेषित मुहम्मद(स) हजर होऊ शकले नाहीत आणि यानंतर लागलीच ईश्वरातर्फे ‘हज’ हे अनिवार्य असण्याची घोषणा झाली.
हिजरी सन दहामध्ये आदरणीय प्रेषितांनी ‘हज’ करण्याचा इरादा केला. प्रेषितांच्या ‘हज’ करण्याची वार्ता समजताच जवळच्या परिसरातील सर्वजण प्रेषितांसह ‘हज’ यात्रेस जाण्याच्या तयारीस लागले. ‘हज’यात्रेवर निघण्यापूर्वी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एक विशेष भाषण दिले. एक लाख २४ हजार लोकांना घेऊन प्रेषितांनी हज यात्रेची सुरुवात केली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी काबागृहास प्रदक्षिणा घातली. मक्केतील इब्राहीम स्थळावर दोन रकअत नमाज पढली. ‘हज’चा संपूर्ण विधी संपल्यावर प्रेषितांनी लोकांना संबोधित केले. या अंतिम हजच्या वेळी झालेले प्रेषितांचे भाषण म्हणजे उच्चकोटीचे आंतरमानवी दस्तावेजच होय. हे भाषण केवळ आपल्या काळातील अतुलनीय विधानप्रणाली नसून त्यासारखी विधानप्रणाली विश्व अस्तित्वात असेपर्यंत तयार होणार नाही, तसेच या विधानप्रणालीस कोणत्याही काळात आणि कोणत्याही भागात कोणताच पर्याय नाही, ही बाब सर्वसिद्ध आहे! याच विधानप्रणालीस विश्व कल्याणास्तव आणि पवित्र धार्मिक भावनेसह लागू करण्यासाठी एका विश्वव्यापी दलाची किवा जनसमूहाची ईश्वराने निर्मिती केली आहे. या ईश्वरी विधानप्रणालीचे काही घटक वर्तमान युगात इतर विधानप्रणालींतही आढळतात. परंतु या विधानप्रणालींमागे इस्लामची प्रेरणाशक्ती नसल्याने त्या यशस्वी होत नाहीत. कारण विद्युत दिवा किती जरी मोठा असला आणि वीजच नसेल तर तो दिवा प्रकाशमान होणार कसा काय?
अंतिम ‘हज’च्या प्रसंगी प्रेषितांनी दिलेल्या भाषणात इस्लामच्या मूलभूत श्रद्धेव्यतिरिक्त काही मूलभूत इस्लामी नियमावलीसुद्धा दिली. याच नियमावलींच्या आधारावर संपूर्ण जीवनाच्या रहस्याचा उलगडा होतो. या मूल्यांबाबतीत आजचे प्रगत जगसुद्धा अज्ञान आहे.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या भाषणातून हे सत्य समोर येते की, आजतागायत ३००० वर्षांच्या इतिहासामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे पहिलेच पावन व्यक्तिमत्त्व आहेत की जे समस्त मानवतेसाठी व्यापक आणि विस्तृत संदेश घेऊन आले आणि या संदेशास एका क्रांतिकारी आंदोलनाचे स्वरुप दिले. या आंदोलनातून मानवकल्याणकारी असलेल्या इस्लामी शासनाची स्थापना केली आणि येथेच न थांबता ही शासनव्यवस्था जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचविण्याकरिता समस्त मानवजातीसमोर साक्षीदाराच्या स्वरुपात उभे राहणारा जनसमूह स्थापन केला.
आता या भाषणाच्या काही महत्त्वपूर्ण अंशाचा येथे उल्लेख करण्यात येत आहे.
‘‘लोकहो! मी आज जे सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. कदाचित या वर्षानंतर या ठिकाणी मी तुम्हासमोर नसणार! अज्ञान काळातील (इस्लामपूर्व काळातील) संपूर्ण विधान व नियम माझ्या पायाखाली आहेत. (म्हणजेच गैरइस्लामी विधान व नियम नष्ट करण्यात येत आहेत) हे मानवांनो! आपणा सर्व मानवजातीचा (व सृष्टीतील समस्त सजीव आणि निर्जीव वस्तूंचा) निर्माता व पालनकर्ता हा एकच (ईश्वर) असून आपण समस्त मानवजातीचा पितासुद्धा एकच आहे. अर्थात मानवतेत ऐक्य हे एकच पालनकर्ता आणि एकच पिता (आदरणीय आदम) असण्याच्या आधारावरच प्रस्थापित होऊ शकते. म्हणजेच एकाच ईश्वराच्या आदेशांचे पालन करण्याची आन घेतल्याने मानवांतर्गतचे कोणत्याही प्रकारचे भेदभाव पार नष्ट होतात. त्याचप्रमाणे समस्त मानवजात ही एकाच पित्याची संतती असल्याने समस्त मानव आपसात बांधव आहेत. तेव्हा भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच कोणत्याही अरब माणसाला कोणत्याही बिगरअरब माणसावर कोणत्याही प्रकारे श्रेष्ठत्व नाही. कोणत्याही गोर्या माणसास कोणत्याही काळ्या माणसावर कोणतेच श्रेष्ठत्व नाही. (अर्थात अरब असो, बिगरअरब असो, काळा असो वा गोरा असो, श्रीमंत असो की गरीब असो, कोणीच कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. कोणासही कोणत्याही पटीने फाजील आभिमान बाळगण्याचे कारण नाही.) एवढेच सत्य आहे की, ईश्वराच्या दृष्टिकोनात श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, जो ईशप्रेमास्तव आणि ईशभयास्तव उत्तम आचरण ठेवतो आणि संयमाने वागतो. (अर्थातच वंश, वर्ण, प्रदेश, राष्ट्र, भाषा व यासारख्या इतर सर्वच बाबींमुळे माणूस श्रेष्ठ होत नसून श्रेष्ठत्वाचे मूळ हे मानवाचे योग्य (इस्लामी) आचरण होय. इस्लाम धर्माची हीच ती मूळ विचारसरणी आहे, जिचा स्वीकार केल्याने माणूस माणसांचा बंधु होतो. बंधुभावाचा यापेक्षा सत्य आधार इतर दुसरा कोणताच असू शकत नाही. जगात कोणासही या गोष्टीचा अधिकार नाही की, त्याने देश, वर्ण, वंश व अशा इतर आधारांवर मानवास संघटित होण्याची हाक द्यावी.)
हे लोकहो! तुम्ही आपल्या निर्माता व पालनकर्ता असलेल्या ईश्वरास भेटण्याच्या अंतिम क्षणापर्यंत अवैधरीत्या कोणत्याही मानवाची हत्या करणे व त्याची संपत्ती (आणि शील) घेणे निषिद्ध आहे. जे लोक तुमच्या सेवेत आहेत, त्यांना तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि त्यांना तीच वस्त्रे द्या, जी वस्त्रे व पोषाख तुम्ही स्वतः वापरता.
अज्ञानकाळात (गैरइस्लामी काळात) झालेल्या सर्व हत्यांच्या बदला घेण्याची चालू असलेली शृंखला येथेच थांबविण्यात येत आहे. अज्ञानकाळात दिलेल्या कर्जावरील घेण्यात येणारे आणि देण्यात येणारे व्याज संपविण्यात येत आहे. आजपासून कोणीही आपल्या कर्जावरील व्याज घेऊ नये. (इस्लामपूर्व काळात व्याजाची प्रथा खूप जोरात होती, ती प्रेषितांनी नष्ट केली व व्याजव्यवहारास निषिद्ध ठरविले.)
हे मानवांनो! स्त्रियांवर पुरुषांचे आणि पुरुषांवर स्त्रियांचे अधिकार आहेत. स्त्रियांनी आपल्या पतींचे आणि पतींनी आपल्या पत्नींचे अधिकार अनिवार्यरीत्या पूर्ण करावेत. स्त्रीकडून एखादी चूक घडलीच तर पुरुषांनी त्यांना आपल्या शयनगृहापासून वेगळे ठेवावे. केवळ एवढीच शिक्षा देण्याचा पतीला अधिकार आहे. खबरदार! स्त्रियांवर कोणत्याच प्रकारची सक्ती करू नये. आपल्या पत्नींना मारझोड करू नये. मग जेव्हा पत्नीस आपल्या चुकीची जाणीव होईल तेव्हा चांगल्या परीने त्यांना क्षमा करावी.
स्त्रियांच्या बाबतीत मी तुम्हास खबरदार करीत आहे की, त्यांच्याशी चांगले व प्रेमपूर्वक वर्तन करा. कारण त्या तुमच्यावर अवलंबून आहेत. त्या ईश्वराने तुमच्याकडे ठेवलेल्या ठेवी व अनामती आहेत. (म्हणून त्यांना धक्कादेखील लागता कामा नये.) ईश्वराने घालून दिलेल्या (अर्थात इस्लामी) नियमांनुसार त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावे.
हे लोकहो! मी ईश्वराचा अंतिम प्रेषित आहे. माझ्यानंतर कोणीही प्रेषित येणार नाही. म्हणून मी तुम्हास ईश्वराचा आदेश देतो की, आपल्या निर्माता व पालनकर्ता ईश्वराचीच उपासना करावी. केवळ त्याच्याच आदेशानुसार आणि त्यानेच घालून दिलेल्या नियमांनुसार जीवन व्यतीत करावे. पाच वेळा नमाज पढावी, रमजान महिन्यात रोजे (उपवास) धरावे, आपल्या ईश्वराच्या घराचे दर्शन घ्यावे (अर्थात ‘हज’ करावे) आणि आपल्या प्रमुखाचे (वैध) आदेश व नियमांचे पालन करावे, तरच तुम्हास मुक्ती मिळून स्वर्गप्राप्ती होऊ शकते.
तुम्ही कधीही मार्गभ्रष्ट होऊ नये म्हणून मी तुम्हास दोन बाबी प्रदान करीत आहे. एक म्हणजे ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) आणि दुसरे म्हणजे माझी जीवनप्रणाली (प्रेषितप्रणाली).’’ एवढे बोलून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस की, मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला.’’ मग लोकांना उद्देशून म्हटले, ‘‘हा संदेश येथे हजर नसलेल्या मानवांपर्यंत पोहोचवावा.’’
प्रेषितांनी आपले भाषण संपविल्यावर नमाज अदा केली आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. याचप्रसंगी दिव्य कुरआनची ही आयत अवतरित झाली, ज्यामध्ये ईश्वराने म्हटले आहे,
‘‘या दिवशी तुमच्यासाठी तुमचा धर्म परिपूर्ण केला आहे आणि तुमच्यावरील माझी कृपा पूर्णत्वास नेली आहे. तसेच तुमच्यासाठी (जीवनविधीस्तव) मी (ईश्वराने) इस्लाम धर्म पसंत केला आहे.’’(संदर्भ : दिव्य कुरआन - ५ -४)
या आयतींचा स्पष्ट अर्थ असा होय की, आदरणीय प्रेषितांना ज्या उद्देशपूर्वीस्तव जगात पाठविण्यात आले होते, तो उद्देश पूर्ण झाला आणि ईश्वरातर्फे धर्माचे (जीवनसंहितेचे) जे नियम व आदेश यायचे होते ते सर्व आदेश व नियम प्रेषितांमार्फत आलेले आहेत.
यानंतर आदरणीय प्रेषितांनी ‘हज’च्या बाकीच्या विधी आटोपल्या. कुरबानीसाठी आणलेले ६३ उंट आदरणीय प्रेषितांनी स्वतःच्या हाताने ‘जबह’ केले. (कापले) बाकीचे उंट माननीय अली(र) यांच्या हस्ते जबह करण्यात आले.
जिलहज्जा महिन्यादरम्यान उत्तर रात्री मक्का शहरी ‘तवाफे विदाअ’ (निरोप प्रदक्षिणा) केल्यावर ‘फजर’ (सकाळ) ची नमाज अदा करून आपल्या सोबत्यांसह मदीना शहरी परत आले.
‘अंतिम हज’च्या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी म्हटले होते,
‘‘या वर्षानंतर पुढील वर्षी कदाचित मी तुमच्या समोर नसेलही.’’
तसेच असेदेखील म्हटले की,
‘‘हे ईश्वरा! तू साक्षी आहेस, की मी तुझा संदेश मानवजातीपर्यंत पोहोचविला आहे.’’
मग असेदेखील म्हटले की,
‘‘लोकहो! मी तुमच्याकरिता ईश्वरी आदेश (दिव्य कुरआन) आणि माझी जीवनप्रणाली देऊन जात आहे. या दोन्हींवर आचरण केल्यास तुम्ही कधीच वाट भटकणार नाही.’’
मग ईश्वराचा आदेश असा आला की,
‘‘आजच्या दिवशी समस्त मानवांसाठी धर्मास (जीवनसंहितेस) पूर्णत्वाचे स्वरुप देण्यात आले आहे.’’
प्रेषितांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी ‘सूरह-नस्त्र’ अवतरित झाली व यामध्ये असलेल्या संकेतावरून हे स्पष्ट झाले की, ईश्वरी दूत सत्य धर्माचे प्रवक्ते, इस्लामी समुदायाचे मार्गदर्शक नवीन सभ्यतेचे दाता आणि मानवतेचे उपकारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे लवकरच जगाचा निरोप घेणार आहेत. एवढेच नव्हे तर अंतिम हज करून परत येताना ‘गदीरे खुम’ या ठिकाणी पोहोचल्यावर प्रेषितांनी स्पष्टपणे म्हटले की,
‘‘मीसुद्धा एक मानव आहे आणि माझ्याकडे ईश्वरातर्फे लवकरच मृत्यूचा दूत येईल.’’
यानंतर असेही म्हटले,
‘‘मी तुमच्यावर दोन जवाबदार्या टाकून जात आहे, एक ईश्वरी ग्रंथ (दिव्य कुरआन) की ज्यामध्ये मार्गदर्शन आहे. म्हणून ईश्वरी ग्रंथास नेहमीच आपले मार्गदर्शक बनवा. दुसरी जी जवाबदारी तुम्हास सोपवीत आहे, ती माझ्या परिवारजणांची आहे. त्यांचा विसर पडू देऊ नका.’’
प्रेषितांच्या बोलण्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता. प्रेषितानंतर येणार्या काळाच्या बाबतीत ते सूचना देत होते. पहिल्या वाक्यात ईश्वरी ग्रंथास मार्गदर्शक आणि जीवनाचे विधान बनविण्याची सूचना आणि दुसर्या वाक्यात प्रेषितांच्या परिवारजणांची काळजी घेण्याची सूचना होती. कारण प्रेषितपरिवाराच्या लोकांनी संपूर्ण जीवनच सत्यास अर्पण केलेले तर होतेच, शिवाय जीवनभर त्यांना धनहीन राहूनच जगावे लागलेले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या परिवारजणांसाठी कोणतीच संपत्ती कमावून ठेवली नव्हती. तसेच त्यांच्यासाठी कोणतेही हित, अधिकार वा आरक्षण निश्चित केले नव्हते. प्रेषितांनीही स्वतः आपले प्रत्येक हित व अधिकार सत्यावर बळी चढविले तर होतेच, शिवाय आपल्या परिवारजणांनासुद्धा संपत्ती न जमविण्याची आणि संपत्तीचा लाभ न घेण्याची शिकवण दिली होती. म्हणून प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की, माझ्या परिवारजणांची काळजी वाहावी. त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषितांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या परिवारजणांनी खूप जवळून पाहिल्यामुळे त्यांना प्रेषित जीवनप्रणालीचा चांगला अभ्यास होता आणि मुळातच प्रेषित जीवनप्रणाली मानवांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वांत उत्तम साधन म्हणजेच त्यांचे परिवारजण होय. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनापासून वंचित न राहण्याकरितासुद्धा त्यांची काळजी वाहणे आवश्यक होते. याचप्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी असेदेखील म्हटले, ‘‘मी ज्याचा प्रिय मित्र आहे, ‘अली(र)’ सुद्धा त्याचा प्रिय मित्र होय! हे ईश्वरा! जो ‘अली(र)’ यांच्याशी मैत्री करील, तूदेखील त्याच्यांशी मैत्री कर आणि जो ‘अली(र)’ यांच्याशी वैरभाव ठेवील, तूसुद्धा त्याच्याशी वैरभाव ठेव!’’
अर्थातच माननीय अली(र) हे प्रेषितांचे जावई आणि चुलत भाऊदेखील होते. त्यांनी बर्याच महत्त्वाच्या कामगिर्या पार पाडल्या होत्या. प्रेषितांकरिता पावलोपावली नाना संकटे झेलली आणि बर्याच वेळा आपले प्राण धोक्यात घालून प्रेषितांचे प्राण वाचविले. धर्मयुद्धात प्राण पणाला लावून रणभूमी गाजविली. ते ज्ञान आणि विधीशास्त्रात पारंगत होते. अगदीच बालपणापासून त्यांनी प्रेषितांसोबत आपल्या जीवनाचा एक एक क्षण घालविला आणि प्रेषितांवर येणारे प्रत्येक संकट आपल्यावर घेतले. प्रेषितांशी त्यांचे नातेही होते आणि ते प्रेषितांच्या मुलासारखेच होते.
‘गदीरे खुम’च्या ठिकाणी माननीय अली(र) यांच्या बाबतीत प्रेमपूर्वक वर्तन करण्याची प्रेषितांची सूचना ऐकताच माननीय उमर(र) यांनी त्यांना शुभकामना देऊन आलिगन दिले. माननीय बरीदा अस्लमी(र) यांनी तर जीवनभर अली(र) यांची सेवा केली.
‘सफर’ महिन्याच्या (अकरा हिजरी सनात) वेळी प्रेषितांनी ईश्वर मिलनाची तयारी सुरु केली. एके दिवशी ‘उहुद’च्या ठिकाणी जाऊन ईश्वरासमोर नतमस्तक झाले आणि प्रार्थना केली, मग सर्वांना संबोधून म्हटले,
‘‘लोकहो! मी तुमचा निरोप घेणार आहे आणि ईश्वरासमोर तुमच्याबाबतीत साक्ष देणार आहे. मी ‘कौसर’च्या हौदाचे येथूनच दर्शन करीत आहे. मला या गोष्टीची भीती नाही की माझ्यानंतर तुम्ही अनेकेश्वरवादी व्हाल. केवळ एवढीच भीती वाटते की, माझ्या पश्चात तुम्ही ऐहिक सुखात गुरफटून सत्याची साथ सोडाल.’’
मग निम्या रात्री ‘बकीअ’ या कब्रस्तानात जाऊन आपल्या मृत नातेवाइकांसाठी मोक्षप्राप्तीची प्रार्थना केली आणि मृतांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी लवकरच तुम्हाला येऊन भेटणार आहे.’’
नंतर एके दिवशी आंदोलनाच्या विशेष कार्यकर्त्यांची भेट घेऊन म्हणाले,
‘‘हे विश्व ईश्वराचे आहे. या विश्वात राहणारा प्रत्येकजण ईश्वराची निर्मिती आहे. तुम्हाला ईश्वराने शासन याकरिता प्रदान केले आहे की, तुम्ही त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यांचे दुःख दूर करावे. त्यांचे अधिकार त्यांना प्रदान करावेत. त्यांच्यावर तुम्हास प्रभुत्व मिळाल्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की, तुम्ही त्यांच्याशी उदंडपणाचे आणि दांभिकतेचे वर्तन करावे.’’
‘बकीअ’ कब्रस्तानातून परतताना प्रेषितांची प्रकृती खालावू लागली. आजारपणातही आदरणीय प्रेषित आंदोलन आणि इस्लामी राज्याची पूर्णतः काळजी वाहात होते. सफर महिन्याच्या सव्वीस तारखेस प्रेषितांनी ‘रोम’ वर हल्ला करण्याचा आदेश दिला आणि दुसर्या दिवशी माननीय उसामा बिन जैद(र) या तरुण व तडफदार योद्ध्यास या लष्करी मोहिमेचा प्रमुख नियुक्त केले. माननीय उसामा(र) यांचे वय या वेळी खूप कमी होते.
मृत्यूच्या पाच दिवसांपूर्वी प्रेषितांची प्रकृती थोडी सुधारली असल्याने ते मस्जिदमध्ये आले आणि आपल्या अनुयायांना संबोधित करताना म्हटले,
‘‘तुमच्यापूर्वी असे लोक होऊन गेलेत की ज्यांनी आपल्या प्रेषित आणि धार्मिक नेत्यांच्या कबरींना पूजास्थळे बनविली होती. (अर्थात प्रेषित आणि धर्मगुरुंच्या कबरींची पूजा व आराधना करू लागले व कबरींवर माथा टेकू लागले होते.) तुम्ही मात्र असे मुळीच करु नका. (कारण पूजा व आराधना केवळ ईश्वराचीच करणे आवश्यक आहे.)’’
मग प्रेषितांनी सामूहिक नमाज पढविली व परत लोकांना उद्देशून म्हणाले,
‘‘मी तुम्हास अन्सार (मदीनावासी जनता) च्या अधिकारांच्या बाबतीत विशेष जाणीव करून देत आहे. कारण हे लोक माझ्या शरीराचा पोषाख आणि माझ्यासाठी मार्गसाधन होय. त्यांनी त्यांच्या वाट्याची जवाबदारी पूर्ण केली. आता तुमच्यावर त्यांच्या जवाबदार्या शिल्लक आहेत.ईश्वराने आपल्या दासास (मानवास) याचा पूर्ण अधिकार दिला आहे की त्याने वाटल्यास केवळ ऐहिक सुखसमृद्धी घ्यावी अथवा वाटल्यास ईश्वराची मर्जी मिळवावी.’’आता प्रेषितांची प्रकृती मात्र खालावली. लोकांमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले. तेव्हा लोकांची अवस्था पाहून प्रेषित मुहम्मद(स) दोन जणांच्या सहार्याने परत मस्जिदमध्ये आले आणि लोकांना संबोधित केले,
‘‘प्रिय जणांनो! मला खबर मिळाली आहे की, तुम्हास माझ्या मृत्यूचे भय वाटते. माझा मृत्यू तुम्हासाठी असहनीय बाब झाली आहे. परंतु तुम्हास हे सहन करावे लागणारच आहे. कारण माझ्यापूर्वी जेवढे प्रेषित या जगाच्या पाठीवर आलेत, तेसुद्धा नेहमी जीवंत राहिले नाहीत. मला पण ईश्वरभेटीस जाणे भाग आहे. मी तुम्हास सूचना देतो की अंसार (मदीनावासी जनता) शी भलाई आणि उपकार व सौहार्दाचे वर्तन करा. तसेच मी सूचना करतो की, मुहाजिरीन (स्थलांतरीत) जणांनी आपसात सद्भावाचे व स्नेहभावाचे वर्तन करावे.’’
या भाषणानंतरच्या सोमवारी प्रेषितांनी आपल्या सोबत्यांना पाहून स्मीत हास्य केले. याच्या काही क्षणानंतर प्रेषितांनी हात उचलून प्रार्थना करताना तीन वेळेस म्हटले,‘‘अल्ला हुम - मा अर - रफीऊल आला!’’आणि माननीय आयशा(र) (प्रेषितांची अंतिम भार्या) यांच्या कुशीत डोके ठेवून ईश्वरभेटीस गेले. हा ‘रब्बील अव्वल’ महिन्याच्या बारा तारखेचा दिवस असून सकाळची वेळ होती. या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय चौसष्ट वर्षे आणि चार दिवस एवढे झाले होते. प्रेषितांचा मृत्यू म्हणजे एक विलक्षण घटना होती. एकाच क्षणामध्ये कित्येक शतकांचा अंत झाला होता. काळ जागीच स्तब्ध झाला होता. सर्वांचाच थरकाप उडाला होता. काळीज पार फाटून गेले होते. मने शिथील झाली होती. रक्त गोठून गेले होते. शब्द अबोल झाले होते. विश्वात निख शांतता पसरली होती. पाकळ्या कोमेजून गेल्या होत्या. सगळीकडे स्तब्धता! जीवनभर मानव कल्याणास्तव झटणार्या एका युगपुरुषाचा अंत झाला होता. माननीय उस्मान(र) यांना काही सुचत नव्हते. माननीय अली(र) अचेतावस्थेत पडले होते. माननीय अब्दुल्ला बिन अनीस(र) यांना शोक अनावर झाल्याने त्यांनी जागीच प्राण सोडला होता. माननीय उमर(र) यांचे काही वेळासाठी मानसिक संतुलन बिघडले होते.
आदरणीय प्रेषितांच्या मृत्यूमुळे केवढी मोठी पोकळी निर्माण झाली होती. प्रेषितांनी तयार केलेल्या समूहाने खरोखरच अशा संकटमय परीस्थितीतही आपल्या जवाबदारीची जाणीव आणि चारित्र्याच्या अभूतपूर्व दृढतेचा पुरावा अशा प्रकारे सादर केला की तत्काळ नेतृत्वाची ही पोकळी भरून काढली आणि या अतिशय नाजुक परिस्थितीतही कोणत्याच प्रकारची स्पर्धा झाली नाही.
ही आहे या थोर महामानवाची चरित्रकथा, ज्याचे उपकार समस्त मानवतेवर आहेत. आपण या अंतिम प्रेषितांची उम्मत (अनुयायीसमूह)आहोत. आपल्या प्रेषितांनी आपल्या हित व कल्याणासाठी अपार दुःख झेलले, ना ना प्रकारचे बलिदान दिले. त्यामुळे आपल्याजवळ त्यांचे ऋृण फेडण्याची ऐपतसुद्धा नाही.
शेवटी ईशदरबारी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रार्थना करू या की, हे ईश्वरा! तुझ्या आदेशांवर आणि प्रेषितांनी दाखविलेल्या मार्गावर समस्त मानवजातीस जाण्याची सद्बुद्धी मिळो आणि समस्त मानवजातीचे कल्याण होवो!तथास्तु!

उपवास धर्माचा एक आधारभूत स्तंभ आहे. अल्लाहचे भय व शुचिर्भूतता आणि अल्लाहशी संबंध जोडण्यात नमाजप्रमाणेच उपवासाचे (रोजा) सुद्धा फार महत्व आहे. याच कारणामुळे फर्ज रोजांच्या (अनिवार्य उपवास) शिवाय नफल (जे केले नाही तरी चालते) रोजांचीसुद्धा महत्ता सांगितली गेली आहे आणि त्यांची प्रेरणा दिली गेली आहे. हदीस आणि प्रेषित मुहम्मद (स) यांच्या चरित्राच्या पुस्तकावरून ज्ञात होते की, महिलासहाबी नफल रोजे मोठ्या प्रमाणात ठेवीत असत.
उम्मुलमोमिनीन माननीय आयेशा (र) यांच्यासंबंधी साद बिन इब्राहीम म्हणतात -
‘‘त्या सदैव रोजे ठेवीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ६८)
त्यांचे पुतणे कासिम बिन मुहम्मद म्हणतात -
‘‘त्या निरंतर उपवास (रोजे) करीत असत.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ७५)
उम्मुलमोमिनीन माननीय हफ्सादेखील फार अधिक नफिल रोजे ठेवीत असत. माननीय नाफे (र) म्हणतात -
‘‘माननीय हफ्सा (र) यांचे निधन तेव्हा झाले जेव्हा त्या निरंतर उपवास करू लागल्या होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ८६)
असे एक कथन आहे की, एकदा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना घटस्फोट देण्याची इच्छा केली, तेव्हा ईश्वरसंदेश (वही) अवतरली आणि माननीय जिब्रईल (अ) यांनी सांगितले,
‘‘हफ्सा (र) यांना परत रूजू करून घ्या. ते अशासाठी की त्या फार उपवास करणाऱ्या व रात्री नमाज पढणाऱ्या आहेत आणि त्या स्वर्गातसुद्धा आपल्या पत्नी राहतील.’’ (अलइस्ती आब - ४ : २६९)
महिला सहाबींच्या नफिल रोजासंबंधी अनेक विखुरलेले प्रसंग हदीसच्या पुस्तकांत आढळतात. यावरून रोज्यासंबंधी त्यांच्या आवडीची कल्पना येते. माननीय आयेशा (र) वर्णन करतात की, त्या आणि माननीय हफ्सा (र) या दोघींनी रोजा ठेवलेला होता. इतक्यात जेवण समोर आले, तेव्हा त्या जेवल्या. माननीय हफ्सा (र) यांनी ही गोष्ट प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितली, तेव्हा दुसऱ्या दिवशी तो पुरा करण्याची (कजा) प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना आज्ञा दिली. (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
प्रेषित मुहम्मद (स) उम्मुलमोमिनीन माननीय जुवैरिया (र) यांच्या घरी गेले. शुक्रवारचा दिवस होता. त्यांनी रोजा ठेवलेला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘तुम्ही काल रोजा ठेवलेला होता काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी परत विचारले, ‘‘उद्या रोजा ठेवण्याची इच्छा आहे काय ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘रोजा तोडा (सोडा)’’ एका कथनात उल्लेख आहे की, त्यांनी रोजा तोडला. (बुखारी (किताबुस्सौम))
माननीय उम्मे हानी (र) मक्का विजयाच्या दिवशीच्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) बसलेले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या डाव्या बाजूला आणि त्या उजवीकडे बसल्या होत्या. एक दासी एक पेय घेऊन आली. प्रेषित मुहम्मद (स) यांनी ते प्यायल्यानंतर माननीय उम्मे हानीकडे दिले. त्या ते (प्रसाद म्हणून लगेच) प्यायल्या आणि म्हणाल्या, ‘‘हुजूर ! माझा उपवास होता. परंतु मी (आपले उष्टे) प्याले.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘कजा (नंतर पुरा करण्याचा) चा रोजा तर ठेवला नव्हता ना ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘नाही, नफल होता.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की, ‘‘नाफल रोजा ठेवणाऱ्याला हा अधिकार आहे की, त्याने इच्छिले तर रोजा पूर्ण करावा अथवा मध्येच तोडावा.’’ (मिश्कातुलमसाबीह (किताबुस्सौम) तिर्मिजी.)
उम्मे अम्मारा म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) एके दिवशी त्यांच्या घरी आले. त्यांनी जेवण वाढले. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुम्हीही खा.’’ त्या म्हणाल्या, ‘‘माझा रोजा आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘रोजेदराच्या घरी जेव्हा जेवले जाते तेव्हा जेवण पूर्ण होईपर्यंत फरिश्ते (देवदूत) घर मालकासाठी प्रार्थना करीत राहतात.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुस्सौम) अहमद, तिर्मिजी, इब्ने माजाचे प्रमाण.)
रूबीअ बिन्ते मुअव्वज (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आशूरा (मुहर्रम महिन्याची दहा तारीख) च्या दिवशी अन्सारांच्या मोहल्ल्यात घोषणा करविली की, ‘‘ज्या लोकांनी जेवण-खाण केले असेल, त्यांनी संध्याकाळपर्यंत काही खाऊ नये व ज्यांनी रोजा ठेवला असेल, त्यांनी आपला रोजा पूर्ण करावा. यानंतर आम्ही स्वतःदेखील रोजा ठेवीत होतो आणि आपल्या मुलांनासुद्धा ठेवावयास सांगत होतो. जेव्हा ते भुकेने रडत असत, तेव्हा आम्ही लोकरीची खेळणी बनवून संध्याकाळपर्यंत त्यांना त्यात रमवीत असू.’’ (बुखारी (किताबुस्सौम) मुस्लिम (किताबुस्सियाम)
दुसऱ्याकडून रोजे ठेवण्याचादेखील उल्लेख आढळतो. एका महिलेने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझ्या आईचे निधन झाले आहे. तिच्यावर पंधरा रोजे फर्ज (अनिवार्य) आहेत. एका कथनात आहे की, तिच्यावर एक महिन्याचे रोजे फर्ज आहेत. अन्य एका कथनात दोन महिन्यांचे रोजे फर्ज आहेत. काय मी तिच्याकडून रोजे ठेऊ शकते ? प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारले, ‘‘जर तिच्यावर कोणाचे कर्ज असते तर तुम्ही अदा केले नसते का ?’’ ती म्हणाली, ‘‘होय.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘अल्लाहचे कर्ज तर या गोष्टीचे अधिक हक्कदार आहे की ते अदा केले जावे.’’
एका कथनावरून असे कळते की, प्रश्नकर्ता पुरुष होता. (बुखारी (किताबुलहज्ज) किताबुस्सौम, मुस्लिम (किताबुस्सियाम) येथे हा प्रश्न धर्म विधानाच्या रूपात विवाद्य नाही, केवळ इतका संकेत पुरेसा आहे की, हनफी पंथानुसार मृत माणसातर्फे रोज्यांची पूर्तता केली जात नाही.) असेही शक्य आहे की, हे वेगवेगळे प्रसंग असतील. याचे समर्थन यावरूनदेखील होते की, प्रश्न विभिन्न प्रकारचे आहेत.

- राजेंद्र नारायण लाल

भाषांतर : अब्दुर्र्हमान शेख



आयएमपीटीअ.क्र. 100    पृष्ठे- 65      मूल्य - 22           आवृत्ती - 4 (March 2015)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ii4a47pu4fyw8kmqws6i68p6ogvm99wg

ज्या काळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे  नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध माक्र्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म  ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षाच्या कालखंडात  प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४५० वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार  भारतीय मुस्लीम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक एनमेरी स्कीमेल म्हणतात कि, तुलनात्मक दृष्टीने पहिले असता  असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मदांनी आईला जगातील कोणत्याच धर्मात नसलेला दर्जा दिला आहे. प्रत्येक धर्मात स्वर्ग आणि नरक या कल्पना आहेत. ‘स्वर्ग’ प्रत्येक धर्मात सर्वोच्च असून धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला 'स्वर्ग' इस्लामने आईच्या 'पाया'खाली आणून ठेवला आहे.  ’जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण आपल्या सर्व अनुयायांना पैगंबरांनी दिली आहे. आईसोबतच पत्नीलाही विशेष दर्जा दिला आहे. सांगितले आहे की, ’तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती असेल.’
मुलीला हे स्थान दिले की ’ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझ्या शेजारी असेल ही शिकवण  प्रेषितांनी दिली. 'लेडीज फस्ट' ही संकल्पना ही इस्लामचीच जगाला देणं आहे. कुटुंबात कोणत्याही गोष्टीचे वाटप मुली किंवा महिलांपासून करायला हवे असा अलिखित संकेत प्रत्येक  इस्लामी कुटुंबात पाळला जातो.
कुणाला काही द्यायचे असेल तरीही आधी ते मुली किंवा महिलांना देण्याची परंपरा आहे. त्यामुळे घरात आलेली नवीन वस्तू असो की नवीन विचार तो घरातील मुली आणि महिलांना  सर्वात आधी दिल्या किंवा सांगितल्या जातो. त्यामुळे घरात होणाऱ्या सर्व निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग असतोच असतो. पैगंबरांनी कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सल्ला वैध  मानला आहे.
लग्न ही सर्व धर्म, पंथ व जाती समुदायांमध्ये सांगितलेली महत्वाची सामाजिक परंपरा आहे. मात्र बहुतांश समाजात लग्न प्रक्रीयेत महिलेला दूय्यम स्थान दिले आहे. अनेक समाजात  मुलीच्या पसंती आधी मुलाची संमती महत्वाची मानली जाते. मुलीला पहायला मुले जातात. मुलींना मात्र तशी सवलत दिली जात नाही. लग्नात माला घालण्याचा पहिला अधिकार  नवरदेवालाच असतो. मुलीचे लग्न करण्यासाठी वधूपक्ष वरपक्षाला हुंडा देतो. इस्लाम मध्ये मात्र यापैकी बऱ्याच प्रथा परंपरा मोडून काढण्यात आल्या आहेत. इस्लाम मधील निकाह  वधूच्या परवानगीने सुरु होतो. प्रत्येक निकाहसाठी एक काझी, एक वकील व दोन साक्षीदार नियुक्त केले जातात. प्रत्येक निकाहसाठी ही मंडळी वेगवेगळी असते. काझींच्या सुचनेवरुन  निकाहसाठी नियुक्त वकील व दोन्ही साक्षीदार वधूची परवानगी घ्यायला वधू जिथे बसून असेल त्या जागेवर जातात. तिला वर मुलाचा परिचय देतात आणि या मुलाशी तुझा निकाह  होत असून तो तुला कबूल आहे का? असे विचारतात. वधूने होकार दिल्यास हा होकार आणखी दोनदा वदवून घेतल्या जातो. मुलीने दिलेला निकाहचा होकार वकील आणि साक्षीदार  सार्वजनिकरित्या जाहीर करतात आणि ही प्रक्रीया पुर्ण केल्याशिवाय काझी मुलाला मुलीच्या स्विकार करण्याविषयी विचारणा करीत नाही. निकाहमध्ये अशा प्रकारे मुलगा पसंत आहे  किंवा नाही हे सांगण्याचा पहिला अधिकार नवऱ्या मुलीला दिला आहे. शिवाय ‘मेहर’ ही अतिशय चांगली पध्दत इस्लाम मध्ये आहे. निकाह पुर्वी नवऱ्या मुलाला एक विशिष्ट रक्कम  मुलीला देत असल्याचे जाहिर सांगावे लागते. 'मेहर' रक्कम किंवा दागिन्याच्या रुपात कबूल करावा लागतो. हे नवऱ्या मुलीचे नवर देवावर कर्ज किंवा उधार असते. ते त्याला पुढे कधी  ही फेडता येते. शिवाय हा निकाह पंजिकृत असतो. प्रत्येक मशिदीत निकाह नोंदणी रजिस्टर असते. त्यात प्रत्येक निकाहची नोंद केली जाते. यात नवरा, नवरीन, वकील, साक्ष, काझी  यांची नावे व स्वाक्षरी असते. शिवाय मेहरची नोंदही केलेली असते. या नोंदीच्या प्रती म्हणजेच निकाहनामा वर व वधू दोन्ही पक्षांना दिल्या जातो. या सर्व महिला हिताच्या प्रथा  इस्लाम मध्ये निकाह रुढ झाल्या पासूनच आहेत आणि अजूनही कोणत्याही अडचणी शिवाय सुरु आहेत.
लग्ना प्रमाणेच एखाद्या महिलेला लग्नानंतर पती पसंत नाही किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपल्या पतीला सोडायचे असल्यास ती आपल्या पतीला बिनदिक्कत सोडू शकते. याला  'खुला' म्हणतात. लग्न झालेल्या कोणत्याही महिलेला आपल्या पतीला सोडण्याचा असा अधिकारही फक्त इस्लामने दिला आहे. पूर्वी महिलांवर अतोनात अत्याचार केले जात. अरब  प्रांतही त्यापासून सुटला नव्हता. अशा परिस्थितीत त्याकाळी अरबातील विवाहित महिलांना मिळालेला हा अधिकार क्रांतिकारक असाच होता.
इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा विवाह सुद्धा महिलांचा समाजात सन्मान वाढविणारा होता. ज्या काळी महिलांना माणूस म्हणूनही फारशी समाजमान्यता नव्हती त्याकाळी महंमदांनी अतिशय आदर्श विवाह करुन आपल्या अनुयायांपुढे अद्वितीय असे उदाहरण ठेवले. पैगंबरांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेशी विवाह केला. शिवाय  त्यांची ही पत्नी विधवा होती. सुमारे चौदाशे वर्षांपुर्वी झालेला हा अशा प्रकारचा जगातील पहिला विवाह असावा. ज्यात एका वयाने मोठ्या व विधवेशी विवाह केल्या गेला होता.

-आमीन चौहान
यवतमाळ, मो. ९४२३४०९६०६

माननिय मआज बिन जबल (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहचा हक्क दासांवर  हा आहे की, दासांनी फक्त त्याचीच उपासना व आज्ञापालन करावे, आणि या बाबत दुसऱ्या कुणाला तिळमात्र सहभागी ठरवू नये.  तसेच प्रेषितांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहची उपासना व आज्ञापालन करणाऱ्या दासांचा अल्लाहवर हा हक्क आहे की त्याने  (अल्लाहने) दासांना शिक्षा, यातना देऊ नये. (संदर्भ - हदीस - बुखारी व मुस्लीम)

भावार्थ
प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या आदेशान्वये, एकेश्वरवादाचे महत्व समजून येते. केवळ अल्लाहच्या उपासना व  आज्ञापालनामुळे नरकाच्या शिक्षेपासून बचाव होईल. एकेश्वरवाद ही गोष्ट ईशप्रकोपापासून वाचविणारी आहे आणि स्वर्गाचे हक्कदार बनविणारी आहे. याहून अधिक मौल्यवान गोष्ट दासाच्या नजरेत आणखी कोणती असेल? ‘अल्लाह’च्या  अस्तित्वासंबंधी वास्तवतेचा ठाव घेणे मानवी विचारशक्तिला शक्य नाही. म्हणून अल्लाहला केवळ त्याच्या त्या गुणांद्वारेच ओळखले जाऊ शकते, ज्याच्या तेजोवलयांनी हे संपूर्ण  सृष्टीजीवन व्यापून आहे. सृष्टीमध्ये जे जे आहे, ते सर्वचे सर्व अल्लाहच्या कोणत्या ना कोणत्या गुणांचे प्रदर्शन आहे. म्हणूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे.  ‘‘अल्लाहच्या निर्मितीवर विचार व चिंतन करीत रहा. परंतु खुद्द त्याच्या अस्तित्वासंबंधी तसे प्रयत्न करू नका.’’ ईश्वरी अस्तित्वाची वास्तवता मानवी दृष्टीच्या व विचारशक्तिच्या  अवाक्या बाहेरची गोष्ट आहे हे उघड सत्य आहे. निर्मितीपैकी अगदी सामान्यातील सामान्य गोष्टीची स्थिती अशी आहे की आमचे ज्ञान तिच्या गुणांपर्यंतच पोहचून थांबते. त्याच्या  अस्तित्वाची काय हकीकत आहे, ही गोष्ट बव्हंशी आमच्यासाठी एक रहस्यच राहते. मग त्या अस्तित्वाचा ठाव घेणे आमच्यासाठी कसे शक्य आहे? जे इतर सर्व निर्मितीपासून मुलत:च  वेगळे आहे. जे सर्वंकषपणे अनुपम आहे, ज्याला इतर कोणत्याही वस्तूशी कसलीही सदृश्यता (समानता) नाही. जो निर्माता आहे व त्याच्या व्यतिरिक्त समस्त सृष्टी व सृष्टीतील  समस्त घटक त्याची निर्मिती आहे. जे अस्तित्व स्वयंभू आहे तर प्रत्येक घटक ऱ्हास पावणारी, नष्ट होणारे आहे. ज्याचा प्रत्येक गुण परमोच्च बिंदूला पोहोचलेला, अनादी व अनश्वर आहे, जेव्हा की या चिंतनाच्या कक्षेत तर कोणती गोष्ट येऊ शकते तर ती सर्वोच्च अल्लाहच्या केवळ गुणांचे ज्ञान होय. त्याच्या अस्तित्वाच्या वास्तवतेचा ठाव घेणे मानवी  बौद्धिकदृष्टीने केवळ अशक्य गोष्ट आहे म्हणूनच महान कुरआनने आपला संवाद केवळ अल्लाहच्या गुणांपुरताच, चर्चेपुरताच मर्यादित ठेवला आहे. अल्लाहच्या परमोच्च गुणांची ही मोठी  संख्या, अस्तित्वाची अनेकता दर्शविणारी आहे, असे कदापी नाही. (जसे की काही धर्माच्या अनुयायांनी कल्पना करून घेतली आहे) किंबहुना हे गुण वा हे शक्ती सर्वच्या सर्व त्याच  एका असितत्वात, ‘अल्लाह’मध्येच केंद्रित आहेत. म्हणून महान कुरआनने हे उघड सत्य असे फर्मावून मध्यान्हींच्या सूर्यासमान स्पष्ट केले आहे. हवे तर तुम्ही ‘अल्लाह’ म्हणून  पुकारा, हवे तर ‘रहमान’ (मेहेरबान) म्हणून. जे कोणते चांगले नाव तुम्ही घ्याल (तर (त्याच्याने अभिप्रेत अल्लाहचे अस्तित्वच असेल) कारण सर्व चांगली नावे त्याच्यासाठीच आहेत. (सुरह - बनीइस्राईल) म्हणजे तुम्ही ईशत्वाचा जो गुण व ज्या शक्तीला दृष्टीसमोर ईश अस्तित्वाचे ध्यान कराल, त्याच्याने अभिप्रेत नेहमी तेच एक अस्तित्व असेल, ज्याचे नाव  अल्लाह आहे. उदा. जर तुम्ही कृपा व मेहेरबानीची कल्पना मनात बाळगून ‘रहमान’ म्हणाल तर त्याच्याने अभिप्रेत दुसरे एखादे अस्तित्व असेल, आणि जर काही इतर गोष्टी आणि  गुणाच्या दृष्टीने ‘अल्लाह’ असे म्हंटले तर त्याच्याने अभिप्रेत अन्य एखादे अस्तित्व असेल, असे कदापी समजू नका.

तबूक युद्धावरून परतल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) काही महिण्यांसाठी मदीना शहरीच वास्तव्यास राहिले. यादरम्यान त्यांनी माननीय अबू बकर(र) यांच्या नेतृत्वाखाली तीनशे जणांना ‘हज’ यात्रेवर रवाना केले.
माननीय अबू बकर(र) हज यात्रेस रवाना झाल्यावर ‘सूरह-ए-बरात’ची आयत अवतरली, ज्यामध्ये इस्लाम विरोधकांसाठी वचनभंग करण्याबाबतीत वर्णन होते. तो संदेश ‘हज’ संमेलनात पोहोचविण्याकरिता आदरणीय प्रेषितांनी आपले व्यक्तिगत सचीव माननीय अली(र) यांना रवाना केले की, जेणेकरून ते ‘हज’च्या संमेलनात ‘सूरह-ए-बरात’ विरोधकांसमोर वाचून दाखवतील.
रस्त्यात ‘माननीय अली(र)’ हे जेव्हा ‘हज’ यात्रेकरूंच्या काफिल्यात पोहोचले तेव्हा नियमानुसार ‘माननीय अबू बकर सिद्दीक(र)’ यांनी त्यांना विचारले की, ‘‘आपण कबिलाप्रमुखाच्या नात्याने आलात की आणखीन इतर उद्देशाने आलात?’’ तेव्हा ‘माननीय अली(र)’ यांनी त्यांना सांगितले की, ‘‘मी काफिलाप्रमुखाच्या नात्याने आलेलो नसून ‘सूरह-ए-बरात’च्या विरोधकांसमोर प्रेषितांचा संदेश वाचून दाखविण्यासाठी आलो आहे!’’
हा पहिलाच प्रसंग होता की ‘हज’चा विधी ही प्रेषित इब्राहीम(अ) यांच्या मूळ प्रणालीनुसार अदा करण्यात आला. दिव्य कुरआनने ‘हजविधी’मध्ये ज्या सुधारणा केल्या, त्या खालीलप्रमाणे आहेत.
  1. ‘हजविधी’च्या प्रसंगी भरविण्यात येत असलेल्या जत्रा आणि बाजार बंद करण्यात आले. आत्मप्रतिष्ठेसाठी आणि स्वश्रेष्ठत्वासाठी आयोजण्यात येणारे कवी संमेलन आणि काव्यस्पर्धा बंद करण्यात आल्या.
  2. ‘हजविधी’च्या वेळी होणारा अभद्र शब्दप्रयोग बंद करण्यात आला आणि आत्मश्रेष्ठत्वासाठी होणारा उपद्रव आणि मारामार्या पार बंद करण्यात आल्या.
  3. वाडवडिलांचे स्तुतीगान करून त्यावर फाजील आभिमान वाखाणण्यासाठी जी अज्ञानकाळातील परंपरा होती ती संपूष्टात आणून केवळ एकमेव ईश्वराचे स्मरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
  4. ‘कुरबानी’ (ईश्वराच्या नावावर पशुबळी) करण्याच्या आदेशाबरोबरच या जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली की, बळी दिलेल्या पशुचे मास काबागृहात टांगावे व त्याचे रक्त भितीस लावावे.
  5. मूर्तीपूजेच्या परंपरेनुसार विवस्त्र होऊन प्रदक्षिणा घालण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आणि अश्लीलपणावर सक्तीने बंदी घालण्यात आली. दिव्य कुरआनने या गोष्टीचे सक्तीने आदेश दिले की, प्रत्येक प्रार्थना व उपासनेच्या प्रसंगी शरीर झाकण्यासारखे वस्त्र अनिवार्यरीत्या वापरावे.
  6. ‘नसी’ची अज्ञानप्रथा बंद करण्यात आली. अर्थात ‘हजविधी’साठी जे चार महिने सन्मानित घोषित करण्यात आलेले होते त्या महिन्यांत अनेकेश्वरवादी लोक आपल्या स्वार्थानुसार बदल करीत म्हणजेच ‘कॅलेंडर’मध्ये बदल करीत असत. त्यावरसुद्धा प्रतिबंध लावण्यात आले.
उपरोक्त उल्लेखण्यात आलेल्या सुधारणांवरून हे लक्षात येते की, कोणतेही सुधारणावादी शासन आणि विशेष करून ‘इस्लामी शासन’ हे विभिन्न तर्हेच्या संस्था आणि प्रकरणांना जशासतसे चालू ठेवू शकत नसून उलट ते उपासना वा प्रार्थनाविधी, परंपरा आणि मानवी संबंधाच्या रचना व बनावटी, तसेच मानवी मूल्यांच्या क्रमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अज्ञानता अथवा असत्य किवा चुकीच्या प्रथांचा प्रभाव पाहते, त्या त्या ठिकाणी त्या असत्य व चुकींच्या प्रथा आणि इतर सर्वच चुकीच्या बाबींचा प्रभाव नष्ट करते. ईश्वराने तर धर्मा(आचरणविधी अर्थात इस्लाम धर्म) चा मूळ उद्देशच स्पष्ट शब्दांत असा सांगितला आहे की, पावित्र्यास अपावित्र्यापासून विभक्त करण्यात यावे.
माननीय अबू बकर सिद्दीक(र) जेव्हा मदीना शहरी परतले तेव्हा आदरणीय प्रेषितांना विचारले, ‘‘हे प्रेषित! माझ्याविरुद्ध एखादा ईश्वरी आदेश आला आहे काय?’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘नाही! मुळीच नाही!!’’ कारण या प्रश्नाचा उद्देश प्रेषितांना चांगलाच माहीत असल्याने ते पुढे म्हणाले, ‘‘हे उचित नव्हते की, माझ्या परिवाराव्यतिरिक्त दुसर्याने ‘समझोत्या’च्या बाबतीत घोषणा करावी!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेल्या या स्पष्टीकरणांमुळे माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांना खूप समाधान झाले. माननीय अली(र) यांनी आदरणीय प्रेषितांच्या आदेशानुसार ‘सूरह-ए-तौबा’तील ‘बरात’ची घोषणा (अर्थात मुक्तीची घोषणा) वाचून दाखविली. ही घोषणा अशा प्रकारे होती.
  1. स्वर्गात अशी कोणतीच व्यक्ती दाखल होऊ शकणार नाही जी इस्लामचा स्वीकार करणार नाही.
  2. या वर्षापासून पुढे कधीच कोणत्याही मूर्तीपूजकाने ‘हज’करिता येऊ नये.
  3. ईश्वराच्या या घरात चारीबाजुंने नग्न होऊन प्रदक्षिणा करण्याची मनाई असेल.
  4. ज्या लोकांशी प्रेषितांचा करार (समझोता) बाकी आहे, अर्थात ज्यांनी करार भंग केलेला नाही, त्यांच्याशी समझोत्याच्या निश्चित झालेल्या मुदतीपर्यंत करार पाळण्यात येईल.
कुरआनाच्या या मूळ आदेशामध्ये एकूणरीत्या अनेकेश्वरवाद्यांच्या अस्तित्वास एकार्थाने अवैध किवा बेकायदेशीर आणि कायद्याविरुद्ध घोषित करून त्यांना चार महिन्यांची मुदत विचार करण्यासाठी देण्यात आली की, त्यांनी अनेकेश्वरवादावर कायम राहून प्रेषितांशी लढायचे आहे की देश सोडून जावयाचे आहे की इस्लाम स्वीकारून शांतीपूर्ण जीवन जगावयाचे आहे, ते ठरवावे.
‘मदीना’ शहरात लोकांच्या झुंडी येऊ लागल्या
ईश्वराची ही विलक्षण महिमा आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा मानवोपकारी प्रेषित मुहम्मद(स) हे एकेका माणसास शोधून इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करीत होते आणि या प्रयत्नात मोठी बाधा येत असे. आता मात्र वेळ अशी आली की, अरब समाजाचे विभिन्न क्षेत्रांचे प्रतिनिधी मंडळ मोठ्या संख्येत प्रेषितदरबारी हजर होऊ लागले आणि स्वतःहून इस्लामच्या मानवकल्याण आंदोलनात सहभागी होऊ लागले.
इतिहासात अगणित उदाहरणे साक्षी आहेत की, प्रत्येक धर्मप्रचार किवा धर्मांदोलन जर आपल्यामध्ये एक क्रांतिकारी प्रेरणा आणि स्पीरिट ठेवीत असेल, अर्थात मानवी चरित्र आणि समाजाच्या सामूहिक व्यवस्थेची जी रचना पहिल्यापासूनच अस्तित्वात असेल, तिला तोडायचे अथवा बदलायचे असेल, तर त्यास म्हणजेच धर्मप्रचार आंदोलणास परंपरागत असलेल्या स्वार्थी शक्तींचा मुकाबला करावा लागतो. पावलोपावली संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष दोन अल्पसंख्याक असलेल्या तत्त्वांच्या दरम्यान होतो. या संघर्षात परंपरागत असलेल्या नेतृत्वाचा विजय झाला, तर जनसाधारण समाज आपल्या जागेवर जशास तसा राहतो. परंतु परिवर्तनवादी शक्ती विकसित होत गेली, तर सर्वसामान्य जनतासुद्धा या शक्तीकडे आकर्षित होत राहते. विशेषकरून ज्या प्रसंगी सर्वसामान्यांच्या लक्षात येत राहिले की, जुनाट परंपरागत नेतृत्व कोलमडत असून आता नवीन शक्तीचे भविष्य उज्ज्वल आहे, तेव्हा ते नवीन शक्तीचे नेतृत्व स्वीकार करतात व या शक्तीभोवती जमा होत जातात.
अरब प्रदेशातसुद्धा नेमके असेच घडले. मक्कातील कुरैश सरदारांनी व त्यांच्या समर्थकांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनास चिरडण्याचा जो भयानक प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध संघर्षाची जी शृंखला सुरु केली, त्यात ते सतत पराभूत होत गेले आणि त्यांची शक्ती कमी होत जाऊन प्रेषितांचे मानवकल्याणकारी आंदोलन प्रगती पावत गेले. एवढेच नव्हे तर विरोधी शक्तींचे कंबरडे मोडले. परिणामी अरब समाजाचे सर्व स्तरांतील लोक प्रेषितांच्या हातावर इस्लामची प्रतिज्ञा घेण्यासाठी मोठ्या संख्येत हजर होऊ लागले. म्हणूनच ‘हिजरी सन दहा’ हे वर्षच ‘साले वफूद’ अर्थात प्रतिनिधी मंडळ वर्ष या नावाने नामांकित झाले. तसे पाहता हि. स. नऊ पासूनच लोकांचे प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितांना भेटू लागले होते. दोन तीन प्रतिनिधी मंडळांचा मागे उल्लेख आलेलाच आहे. आता आणखीन काही प्रतिनिधी मंडळांचा या ठिकाणी उल्लेख करू या. कारण सर्वच प्रतिनिधी मंडळांचा उल्लेख करणे या ठिकाणी अशक्य आहे.
‘सकीफ’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परत येत असताना ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ यांनी रस्त्यातच प्रेषितांच्या सेवेत हजर होऊन इस्लाम स्वीकारला आणि आपल्या कबिल्यात इस्लामचा प्रचार करण्याची परवानगी मागितली. प्रेषित मुहम्मद(स) यांनी शंका व्यक्त केली की, ‘तुमच्या कबिल्याचे अडाणी लोक तुम्हास ठार करतील’ झालेही तसेच. ‘माननीय उर्वा बिन मसऊद(र)’ हे आपल्या घराच्या छतावर जाऊन आपल्या कबिल्याच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देत होते. तेवढ्यात लोकांनी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करुन त्यांना ठार केले. यानंतर त्या कबिल्याच्या लोकांनी सतत महिनाभर विचार केला की, आता आपण काय करावे? शेवटी ‘अब्द’ हा कबिल्याचा सरदार पाचसदस्यीय प्रतिनिधी मंडळ येऊन प्रेषितदरबारी हजर झाला आणि त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर तीन विलक्षण प्रकारच्या अटी ठेवल्या.
  1. आम्हास ‘नमाज’ (अनिवार्य असलेली पाच वेळेची ईशप्रार्थना) माफ करण्यात यावी.
  2. आमचे अराध्य दैवत असलेल्या ‘लात’ या देवाची मूर्ती तीन वर्षांपर्यंत तोडू नये.
  3. आमच्या देवीदेवतांच्या मूर्ती आमच्या हाताने तोडण्यास आम्हास भाग पाडू नये.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सुरुवातीच्या दोन्ही अटी मान्य न करता तिसरी अट मान्य केली. मग सर्वांनी प्रेषितांसमोर इस्लामची दीक्षा घेतली. नंतर प्रेषितांनी सोबत्यांचा एक समूह पाठवून ‘लात’ या दैवताची भव्य मूर्ती नष्ट केली.
‘हनिफा’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
‘यमामा’ या ठिकाणाहून शमामा बिन असाल(र) यांच्या प्रचारकार्याने प्रभावित होऊन तेथील लोक इस्लाम धर्मात दाखल झाले. त्यांच्यात मुसैलमा बिन कज्जाब नावाचा एक दांभिकदेखील होता. त्याने प्रेषितांच्या इस्लामी शासनात निम्मा वाटा मागितला. त्याला इस्लामी आंदोलन हे स्वार्थसाधूपणा वाटत असे. त्याने प्रेषितांकडे मागणी केली की, ‘‘आपल्यानंतर आपल्या जागेवर मला स्थानापन्न करावे, तरच मी इस्लामची दीक्षा घेईन.’’ प्रेषितांनी आपल्या हातात असलेल्या खजुरीच्या एका डहाळीकडे इशारा करीत त्यास उत्तर दिले की, ‘‘तुला तर ही डहाळीसुद्धा मिळणार नाही. कारण तू दांभिक आणि खोटारडा आहेस.’’
‘आमिर’ परिवाराचे प्रतिनिधी मंडळ
आमिर परिवाराकडून एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले. बोलताबोलताच या मंडळाच्या एका सदस्याने मदीना शहरावर हल्ल्याची धमकी दिली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, ‘‘ईश्वर तुला याची शक्ती देणार नाही.’’ हे मंडळ परत जाताना धमकी देणार्या या सदस्यास ‘प्लेग’ झाला व तो ठार झाला. बाकीच्या इतर सदस्यांनी इस्लामचा मनःपूर्वक स्वीकार केला.
अशा प्रकारे ‘फजारा’, ‘अब्दुल कैस’, ‘मर्रा’, ‘तै’, ‘हमदान’, ‘असद’, ‘अबस’, नजरान येथील ‘ख्रिस्ती समाज’ आणि इतर शेकडो प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार करून मानवकल्याण आंदोलनात सहभाग घेतला.

अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे. म्हणूनच त्यांच्यात हे आकर्षण फक्त तितकेच ठेवले गेले आहे, जितके प्रत्येक जात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावात अशी नियंत्रणशक्ती ठेवली गेली आहे, जी त्यांना कामसंबंधात त्या ठराविक मर्यादेचे उल्लंघन करू देत नाही. या उलट माणसांत ही अभिरुचि असीमित, अनियंत्रित आणि सर्व इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यासाठी वेळ आणि काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या स्वभावात अशी कोणतीही नियंत्रणशक्तीसुद्धा नाही जी त्याला एका विशिष्ट मर्यादेवर मज्जाव करील. पुरुष व स्त्रीमध्ये एकमेकासाठी स्थायी आकर्षण असते. त्यांच्यात एकमेकाला आकर्षित करण्याचे अपरिमित साधने एकत्रित केली गेली आहेत. त्यांच्या हृदयात विरूद्ध लिग-जातीबद्दल प्रेम व अनुरक्ततेची एक प्रबळ प्रेरणा ठेवली गेली आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि त्याचा डौलदारपणा, रंग-रूप आणि त्याचा स्पर्श व त्याच्या अंग-प्रत्यांगात विरुद्ध लिग-जातीसाठी आकर्षण उत्पन्न केले गेले आहे. त्यांचा आवाज, गती, चाल प्रत्येक गोष्टीत आकर्षित करण्याची शक्ती भरली गेली आहे. सभोवतालच्या जगातसुद्धा असली असंख्य साधने निर्माण केली गेली आहे जी दोघांच्या लैंगिक प्रेरणांना गतिमान करतात आणि त्यांना एकमेकाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. वार्याचे घोंगावणे, पाण्याचा प्रवाह, गवताची हिरवळ, फुलांचा सुगंध, चिमण्यांची चिवचिव, आकाशातील मेघ, चांदण्या रात्रीचे माधुर्यः तात्पर्य असे की, निसर्गाच्या सौंदर्याची लोभनीय शैली आणि ब्रह्मांडाच्या सौदर्याचे चित्र प्रत्यक्ष अथवा परोक्ष रूपाने त्या प्रेरणा गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय माणसाच्या शारीरिक व्यवस्थेचे निरीक्षण केल्यास कळते की यात जो शक्तीचा मोठा खजिना ठेवला गेला आहे, त्यात एकाच वेळी जीवनशक्ती आणि कार्यशक्तीसुद्धा आहे व कामसंबंधी शक्तीसुद्धा. याच ग्रंथी ज्या त्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उत्पन्न करतात.

त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे.

निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
संस्कृतीरचनेवर याचा परिणाम-
हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच माणसात विरुद्ध लिग-जातीविषयी आकर्षण, त्याच्या यथार्थ काम-शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ठेवले गेले आहे. जर त्याच प्रमाणात, नव्हे तर एकास-दहाच्या प्रमाणात त्याने संततीला जन्म दिला, तर त्याचे आरोग्य बिघडेल आणि दीर्घ आयुष्याला पोहचेपर्यंत त्याची शारीरिक शक्ती संपुष्टात येईल. या गोष्टीचे हे उघड प्रमाण आहे की, मनुष्य परलिग-जातीच्या आकर्षणाच्या आधिक्याचा अर्थ असा नाही की, त्याने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक संभोग करावा, तर याचा अर्थ असा आहे की, स्त्री व पुरुषाची एकमेकाशी बांधिलकी असावी आणि त्यांच्या पारस्परिक संबंधात स्थायित्व व दृढता उत्पन्न केली जावी.
म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे.

म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे.

म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठी
इच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-
यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो.

जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget