Latest Post

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.
सर्वप्रथम वाढत्या लोकसंख्येला मुख्य समस्या म्हणून पुढे केले गेले व याच्या निवारणाकरीता ‘‘कुटुंब नियोजन’’ व इतर योजना मांडल्या गेल्या, जन्म नियंत्रणाचे कायदे बनविले गेले. पुढे मागे मग गर्भलिग निर्धारणाचे प्रयत्न व्हायला लागले. विभिन्न उपकरणांद्वारे मातेच्या उदरामधील भ्रूणाचे लिग माहिती करून घेण्याचे प्रयत्न होत असून स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जात आहेत.
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हीच परिस्थिती आहे. याचमुळे जागतिक स्तरावर या समस्येविषयी चिता व्यक्त केली जात असून उपाय सुचविले जात आहेत.
जगभरात एकूण लोकसंख्येमध्ये मुलींची व मुलांची सरासरी १००:१०७ आहे. फ्रांसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज तर्फे आयोजित ऑक्टोबर २००५ मधील सर्वेक्षणानुसार चीनमध्ये सरासरी १०० मुली व १३४ मुले आहेत. हे असेच चालू राहिले तर २०१५ ते २०३० च्या दरम्यान अडीच कोटी नवयुवकांना पत्नी मिळणे अशक्य होईल अशी आशंकाही यामध्ये व्यक्त केली गेली आहे. संन्हुआ संवाद समितीच्या माहितीनुसार सन २००३ मध्ये (चीन) देशातील २४ परगण्यांमध्ये ‘‘राष्ट्रीय लोकसंख्या व कुटुंब नियोजन आयोगा’’ द्वारे ही स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबविला गेला. या योजने अंतर्गत निव्वळ मुली असलेल्या कुटुंबाला रोख रकमेव्यतिरिक्त इतर सामाजिक फायदे पुरविण्याची तरतूद आहे. मागील तीन वर्षापासून या प्रकल्पाअंतर्गत मुली व मुले यांच्यातील तफावत १००:१३३.८ पासून १००:११९.६ पर्यंत घटविण्याचे लक्ष्य ठरविले गेले आहे. हा प्रकल्प आता सर्व राज्यांमध्ये व विभागांमध्ये राबवायची योजना आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ उर्दु १८ ऑगस्ट २००६)
भारतामध्ये दर १० वर्षानी लोकसंख्या मोजली जाते. इ. सन २००१ मध्ये लोकसंख्येने एकशे दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार (१,०२,७०,१५,०००) ची संख्या पार केली. यामध्ये एकूण ५३,१२,७७,००० पुरुष व ४९,५७,३९,००० महिला होत्या अशी माहिती दिली गेली. अर्थात १०० पुरुषांच्या तुलनेने ९३ स्त्रीया आहे. इ. सन १९९१ मधील लोकसंख्या सर्वेक्षणाच्या तुलनेने हे अंतर जास्त आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ७ सप्टेंबर २००६)
देशामधील कित्येक राज्यांमध्ये मुलामुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेश उल्लेखणीय आहेत. या राज्यांमध्ये १००० मुलांमागे ८०० ते ९०० मुली आहेत. १९९१ च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये १००० मुलांमागे ८७५ मुली होत्या आणि २००१ मध्ये ती तफावत ७९३ वर पोहोचली. याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये १९९१ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमागे ९४८ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१७. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ २९ मे २००६)
मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. मुलांच्या तुलनेने मुलींना कनिष्ठ समजले जाते. त्यांच्या अस्तित्वाला माता पिता स्वतःवरील ओझे समजतात. त्यांचे पालन पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतीच्या अडीअडचणी इ. त्यांच्या (पालकां) करिता एक ओझे बनून जाते. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीत अशा नाजुक आणि गंभीर समस्या उभ्या रहात आहेत की, मुलीला जन्माला न घालणेच बरे असे आईवडलांना वाटते.
अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका रहात असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळी मध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारु त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे.
‘‘आणि त्यांपैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खूषखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो. लोकांपासून लपतछपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे, विचार करतो की, अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीमध्ये गाडावे? पहा कसे वाईट निर्णय घेत आहेत.’’ (कुरआन १६ : ५८, ५९)
मुलीपासून सुटका होण्याकरिता इस्लाम पूर्व अरबी टोळ्यांमध्ये काही अमानवी प्रथा खालील प्रमाणे होत्या.
  1. ‘‘प्रसुती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीतच तिला गाडून टाकण्यात येत असे.’’ (इब्ने अब्बास)
  2. ‘‘मुलीला जन्मानंतर लगेचच मारून टाकुन कुत्र्यासमोर टाकले जाई.’’ (कतादा)
  3. डोंगरकड्यावरुन खाली फेकुन दिले जाई.
  4. पाण्यामध्ये बुडविले जात असे.
  5. गळ्यावरुन सुरी फिरवली जात असे.
  6. थोडी मोठी झाल्यानंतर साज शृंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलूनदेऊन वरुन माती ढकलली जात असे. (तफसी कबीर)
आजही वेगळी परिस्थिती नाही. जैसलमेर (राजस्थान) मधील ‘‘देवडा’’ या गांवाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये हे नमुद केले गेले आहे की, तेथे मागील १०० वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. जन्मतःच त्यांना मारुन टाकले जात आहे. कधी कधी तर हे काम जन्मदाती आईच करीत असे. मातेच्या दूधाबरोबरच नवजात मुलीला अफू चारली जाते. अथवा नाकावर वाळू भरलेली पिशवी ठेवली जाते किवा नाका तोंडामध्ये वाळू भरली जाते. गोधडी अथवा उशी चेहऱ्यावर टाकून ठेवली जाते जेणेकरून श्वास बंद पडावा नाहीतर तोंडामध्ये मिठाचा तोबारा भरला जातो. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ ९ सप्टेंबर २००६)
स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिग करुन मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याच साठी १९९४ मध्ये एक कायदा बनविला गेला होता. Natal Diagnostic Technique Regulation & Prevention of Misuse Act. या कायद्यान्वये गर्भलिग निदान गुन्हा ठरविला गेला असून देखील दरवर्षी ५ ते ७ लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ६ जून २००६)
अशा Fertility Centres वर वेळोवेळी छापे घातले जात आहे. हे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली जाते, त्यांच्या विरुद्ध खटले चालतात आणि त्यांना शिक्षा देखील दिली जाते. तरी देखील या सामाजिक कुकर्माला थोपविणे तर दूरच उलट त्याचा प्रसार व फैलाव देखील थांबविता आला नाही.
इस्लामी उपाय
इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो, व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या ज्या कारणांमुळे अथवा आशंकांमुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तमप्रद सिद्ध झाले आहे.
सर्व प्रथम जनसामान्यांची मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केले. कारण कुठलाही कायदा तोपर्यंत प्रभावशाली होत नाही जोवर जनसामान्य त्याला जुमानित नाही किवा जोवर त्याच्या गुणधर्मांचे आकलन होत नाही. तसेच न जुमानल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव त्यांना होत नाही.
इस्लामने प्रतिपादन केले की हे एक शैतानी कृत्य आहे. ‘‘आणि अशाच प्रकारे कित्येक बहूदेववादीसाठी त्यांच्या भागिदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या संतानाच्या हत्येला आकर्षक बनविले आहे, जेणे करून त्यांना विनाशात टाकावे व त्याकरीता त्यांचा धर्म धूसर बनवून टाकावा.’’ (कुरआन ६ : १३७)
‘‘खचित नुकसानीमध्ये आहेत ते लोक ज्यांनी अज्ञान व मुर्खपणाखातीर आपल्या मुलांना ठार केले.’’ (कुरआन ६ : १४०)
काही अरबी टोळ्या मुलींना आर्थिक लचांड समजून त्यांना मारुन टाकत असत. कारण मुले मोठी झाल्यानंतर कामामध्ये मदत करतील परंतु मुली काहीच कामाच्या नसतात.
कुरआनने स्पष्ट केले की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाहच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची जबाबदारी ईश्वराने घेतली आहे. सशक्त असो वा अशक्त, धष्टपुष्ट असो वा अपंग, स्वतः उपजीविकेकरिता धावपळ करीत असो वा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती अल्लाह (ईश्वरा) च्या आज्ञा व मर्जीनेच.
‘‘आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारु नका, आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील (देतो).’’ (कुरआन ६ : १५१)
‘‘आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करु नका. आम्ही त्यांनादेखील उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांची हत्या करणे एक मोठा अपराध आहे.’’ (कुरआन १७ : ३१)
इस्लाम मध्ये मुलींची हत्या त्या अपराधांमध्ये गणली जाते ज्यांना अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी अवैध ठरविले आहे.
‘‘अल्लाहने तुम्हांकरिता अवैध ठरविले आहे, मातापित्यांची अवज्ञा, मुलींना जिवंत गाडून टाकणे व वायफळ खर्च करणे.’’ (मुस्लिम)
मुलींच्या हत्येला त्या घृणित कार्यांमध्ये समाविष्ट केले आहे ज्याबाबत परलोकामध्ये प्रश्नोत्तरे होतील.
‘‘आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली?’’ (कुरआन ८१ : ८,९)
संततीची हत्या न करण्याची प्रतिज्ञा
ईश्वराचे दूत आदरणीय मुहम्मद साहेब आपल्या अनुयायाकडून ज्या ज्या गोष्टींचे वचन घेत असत त्यामध्ये संततीची हत्या न करण्याचे देखील कलम होते. हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करुन मदिना पोहोचल्या. ईश्वराने आपल्या प्रेषितांना त्यांकडून वचन घेण्याचा आदेश दिला.
‘‘हे नबी (स.) जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की अल्लाहबरोबर कुठल्याही वस्तूला सामील करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचणार नाही आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुमची अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा. निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.’’ (कुरआन ६० : १२)
असेच वचन व प्रतिज्ञा प्रेषितांनी पुरुषांकडूनही घेतल्या, मदिनेला स्थलांतरापूर्वी ज्या ज्या नशीबवान लोकांनी ईशदूताच्या हातावर प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आदरणीय उबादा बिन सामित (रजि.) होते. ते कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले,
‘‘माझ्या जवळ या गोष्टींची प्रतिज्ञा करा की, अल्लाहच्या बरोबरीने इतर कोणालाही सम्मिलीत करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही आणि आपल्या संततीची हत्या करणार नाही.’’ (बुखारी)
मुलीचे अस्तित्व पुरुषाकरिता संकट अथवा झंझट आहे हे इस्लामला मान्य तर नाहीच उलट त्याने मुलीला स्वर्गप्राप्तीचे साधन ठरविले आहे.
आदरणीय अनस बिन मालिक (रजि.) उल्लेख करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले की, ‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलीचे पालन पोषण सज्ञान होई पर्यंत केले तो अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी माझ्या इतका जवळ राहील (हे शब्द उच्चारतांना प्रेषित (स.) नी आपली दोन बोटे जुळवून दाखवली.)’’ (मुस्लिम)
दुसऱ्या प्रेषित कथनामध्ये असे शब्द आहेत -
‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलींचे पालन पोषण केले, ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये अशा प्रकारे प्रवेश करु (यावेळी प्रेषित (स.) नी आपल्या दोन बोटांना दर्शविले.)’’ (तिरमिजी)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) कथन करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले -
‘‘ज्याच्या दोन मुली असून त्या जवळ आहेत तोपर्यंत तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल, तर त्या त्याच्याकरीता स्वर्गप्राप्तीचे साधन बनतील.’’ (सुनन इब्ने-माजा)
आदरणीय उकबा बिन आमिर (रजि.) उल्लेख करतात की, प्रेषित (स.) यांचे कथन आहे की,
‘‘ज्याला कुणाला तीन मुली असून त्याने संयम बाळगला तसेच आपल्या कुवतीनुसार त्यांना खाऊ पिऊ व लेवू घातले तर ते कर्म प्रलयाच्या दिवशी नरकापासून त्याच्याकरिता ढाल बनेल.’’ (सुनन इब्ने - माजा)
प्रेषितांच्या कथनामध्ये मुलीच्या शिक्षण व प्रशिक्षणाबाबत सक्त ताकीद केली गेली आहे. आदरणीय अबूसईद अल-खुदरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) नी सांगितले की,
‘‘ज्या व्यक्तीने तीन मुलींचे पालन पोषण केले, त्यांना समाज-रीत व शिष्टाचार शिकविला, त्यांचे विवाह करून दिले आणि त्यांच्याशी सद्व्यवहार करित राहीला, त्याच्याकरिता स्वर्ग आहे.’’ (अबू दाऊद)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) उल्लेख करतात की, ईश्वराच्या प्रेषितांनी सांगितले की,
‘‘ज्याने तीन मुलींचे अथवा भगिनींचे पालन पोषण केले, त्यांना शिष्टाचार शिकविला, त्याबरोबर सहानुभूतीने वागला येथपावेतो की ईश्वराने त्यांना (मुलींना) तृप्त केले, त्याच्या करीता ईश्वराने स्वर्ग अनिवार्य केला आहे.’’
कथन करणाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे सर्व ऐकून एकाने विचारले ‘‘हे प्रेषित (स.) जर एखाद्याला दोनच मुली अथवा भगिनी असतील आणि तो असाच त्यांच्याशी वागला तर...?’’ प्रेषित (स.) नी सांगितले ‘‘त्याच्यासाठी देखील हेच प्रतिफल आहे.’’
कथनकर्ता खाली हे देखील नमूद करतो की, जर उपस्थितांपैकी एखाद्याने एका मुलीबरोबर अथवा एका बहिणीबरोबर सद्व्यवहाराबद्दल विचारले असले तर प्रेषित (स.) नी हेच उत्तर दिले असते. (शरह-अल-सुन्ना)
इस्लामच्या या शिकवणी नी मुलींना समाजामध्ये इतकी प्रतिष्ठा व सन्मान दिला आहे. यापेक्षा वेगळी कल्पना केलीच जाऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्याठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची मदत होऊ शकते.

मानव-जीवनाला कल्याण व सदाचाराच्या मार्गावर चालविण्यासाठी एखाद्या आदर्शाची आवश्यकता असते. आदर्श खरे पाहता मापदंडाचे काम करतो. यावर मापून तोलून हे कळते की एखाद्या व्यक्तीच्या व्यवहाराचा किती भाग खरा व किती भाग खोटा आहे. मापदंड अथवा आदर्श काल्पनिक देखील असतात, जे कथा-गोष्टीच्या रूपाने उपदेशांत सांगितले जातात व ते ऐकून लोक आनंदित होतात. परंतु त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ वैयक्तिक किवा सामाजिक जीवनात होत नाही. आदर्श बनण्यासाठी केवळ इतकेच आवश्यक नाही की ते शक्य व व्यावहारिक असावे, तर हे देखील गरजेचे आहे की तो आदर्श एखाद्याचे जीवन बनलेले असावे व त्याने त्यावर चालून आदर्शाचा प्रत्यक्ष नमुना प्रस्तुत केला असावा. त्या माणसाच्या हृदयात मानवासाठी इतके प्रेम असावे की कोणीही त्याला आपला हितचितक मानावे. त्याच्या प्रेमात निमग्र होऊन त्याचे आदर्श आत्मसात करण्यासाठी त्याला नेऊ लागावे. यासाठी त्याने केवळ धनसंपत्तीची लयलूट करण्याचीच तयारी ठेवावी असे नव्हे, तर त्याने आपल्या प्राणाचे बलिदान करण्याची देखील तयारी ठेवावी.
इतिहासात अशा अगणित महापुरुषांचा उल्लेख आहे, ज्यांनी आपल्या सर्वस्वाची मानवतेच्या उत्थान व मुक्तीसाठी होळी केली. मानवाला योग्य मार्गदर्शन केले. त्या सर्वांवर ईश्वराची अपार कृपा असो! जगाच्या कोणत्याही कोपर्यात, इतिहासात कोणत्याही काळात आणि मानवांच्या कोणत्याही जातीत त्यांचा जन्म झालेला असो; आम्ही त्यांना प्रणाम करतो व आपले हार्दिक श्रध्दा-सुमन त्यांना अर्पित करतो. ते सर्वजण आमच्यासाठी आदर्श पुरुष होत.
असे असले तरी ही गोष्ट नाकारता येत नाही की कालांतराने त्यांचे जीवन-चरित्र व त्यांच्या शिकवणी सुरक्षित राहू शकली नाहीत. काही असले पुरावे उपलब्ध आहेत ज्यावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांच्या जीवनप्रणाली व त्यांच्या शिकवणीसंबंधी विस्ताराने माहिती मिळविण्यासाठी आमच्याजवळ कोणतेही प्रामाणिक साधन नाही. ईश्वराची ही मोठी कृपा होय की त्या महान विभूतींपैकी एका महान व्यक्तीचे संपूर्ण जीवन इतिहासाच्या प्रकाशझोतात आहे. त्यांच्या जीवन आणि शिकवणीसंबंधी जी काही माहिती आम्हाला हवी ती मिळू शकते. त्यात अंदाज लावण्याची गरज नाही. त्यांचे व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन व राजकीय जीवन सर्वकाही प्रकाशासारखे स्पष्ट आहे. हा प्रकाश-पुंज संपूर्ण मानवजातीची अमुल्य ठेव आहे. हे व्यक्तित्व आहे हजरत मुहम्मद(स.) यांचे.
जीवनाची एक झलक
हजरत मुहम्मद(स.) यांचा इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील ‘मक्का’ या शहरात जन्म झाला. त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांचे वडील परलोकवासी झाले. त्यांच्या बालपणांतच त्यांची आई व आजोबा थोड्या-थोड्या अंतराने हे जग सोडून गेले. त्यांच्या चुलत्याने त्यांचे पालन-पोषण केले. बालपणापासूनच त्यांच्या स्वभावात अशी नम्रता होती की संपूर्ण कुटूंब व शहरातील लोक त्यांचा आदर करीत असत. त्यांच्या खरेपणा व पुण्यशीलतेची चर्चा सर्वत्र होऊ लागली. बालपणी ते शेळ्या-मेंढ्या चारीत असत. तारुण्यात त्यांनी व्यापार सुरू केला. खदीजा(रजि.) नावाच्या एका धनाढ्य विधवेचा व्यापारिक माल लाटून नेत व बाजारपेठेत ते विकत असत. त्यांचा प्रामाणिकपणा व सदगुण पाहून त्या विधवेने त्यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव केला व तो त्यांनी मान्य केला. ते त्या काळातील सामाजिक कुरीती व लोकांच्या दुःखाने अत्यंत दुःखी होत होते. ते एका गुहेत बसून ईश्वराने चितन व समाजाच्या उद्धारासाठी प्रार्थना करीत असत. त्याच गुहेत त्यांना ईश्वरी आदेश येत असत. त्यांच्यावर ईश्वराकडून मानवजातीला मार्गदर्शन करण्याची मोठी कठीण जबाबदारी घातली गेली होती. ईश्वराने मानवकल्याणासाठी त्यांच्यावर ‘पवित्र कुरआन’ हा ग्रंथ उतरविला. ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते मानवजातीला मार्गदर्शन करीत असत. समाजातील स्वार्थी व सत्ताधारी लोकांनी त्यांना तीव्र विरोध केला. सज्जन आणि उपेक्षित लोकांनी त्यांची शिकवण आत्मसात केली. त्यांना व त्यांच्या साथीदारांना मक्का येथील दुष्ट लोकांनी घोर यातना दिल्या. त्यांना मक्का सोडून जाण्यास भाग पाडले. त्यांनी सुदूर मदीना शहरात आश्रय घेतला. मक्का वासियांनी तेथे सुध्दा आक्रमण केले. अनेक युद्धे झाली, तरीदेखील हजरत मुहम्मद(स.) यांनी त्यांच्याशी दयापूर्ण व्यवहार केला. जेव्हा मक्का शहरात दुष्काळ पडला तेव्हा, त्यांनी मदीना शहरात उंटावर धान्य लादून पाठविले. इस्लामी शिकवणींचा प्रचार चालूच राहिला. जेव्हा अरबस्तानात इस्लामचा सर्वत्र प्रसार झाला आणि अधिकांश मक्कावासियांनी इस्लामचा स्वीकार केला तेव्हा मक्का शहरावर हजरत मुहम्मद(स.) यांना विजय प्राप्त झाले व ते परत मक्का शहरी परतले. ही अशी वेळ होती जेव्हा त्यांना विरोधकांवर भरपूर सूड उगवता आला असता, परंतु त्यांनी त्या दुष्ट व अत्याचारी मंडळींना क्षमा केली. इतकेच नव्हे तर त्यांना सन्मान व श्रेष्ठत्व दिले. विजेत्याच्या या व्यवहाराने लोक अत्यंत प्रभावित झाले व त्यांनी मान्य केले की सत्य हजरत मुहम्मद(स.) यांच्या बाजूने आहे आणि त्यांनी सुद्धा सत्याच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले.
त्यांच्या जीवनकाळातच एका मोठ्या प्रदेशावर सत्याचे राज्य स्थापित झाले. या राज्यात गरीब, अनाथ आणि पीडित व उपेक्षितांना संपूर्ण सन्मान मिळाला. माणसामाणसांतील सर्व प्रकारचे भेद-भाव संपले. हजरत मुहम्मद(स.) यांनी शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. ते स्वतः अत्यंत साधे जीवन जगत राहिले. दुसर्यांच्या सेवेकडे त्यांचे इतके लक्ष होते की स्वतः न खाता दुसर्यांना ते खाऊ घालीत असत. त्यांच्या घरी कित्येक दिवस चूल पेटत नसे. काही खजूर खाऊन पाणी पीत असत. असे होते राज्याच्या सर्वोच्च अधिकार्याचे जीवन.
आपल्या अनुयायांत सुद्धा त्यांनी असेच गुम रूजविले की ते निःस्वार्थीपणे ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सेवा-कार्यात निमग्र राहत असत. स्वार्थ व भोगविलापासून ते दूर पलायन करीत. त्या सर्व लोकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे पाहता पाहता आशिया, युरोप व आफ्रिका खंडांच्या मोठ्या भू-भागात इस्लामचा प्रसार झाला. काळे-गोरे, उच्च-नीच, सबल-निर्बल यासारखे भेदभाव संपुष्टात आले. अज्ञान व अंधःकार नाहीसा होऊ लागला. बुद्धी व विज्ञानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. इस्लामचा आदर्श संपूर्ण जगात पसरला. मानवाधिकार, न्यायाधिष्ठित राज्य शांती-स्थापना, सहानुभूति, स्वातंत्र्य व संपूर्ण मानवजातीशी बंधुत्वाची वागणूक यासारख्या तत्त्वांचा त्यांना स्वीकार करावा लागला, ज्यांनी प्रत्यक्षपणे इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता. हे सिद्धांत अस्तित्वात असून देखील जगात सध्या अन्याय व अराजकता पसरलेली आहे. याचे मूळ कारण असेच आहे की या शिकवणींचा स्वीकार मनापासून केला गेला नाही. केवळ लोकांना फसविण्यासाठी या आदर्शांचे प्रदर्शन केले जाते आणि त्यांच्या आडून स्वतःच्या स्वार्थाची पूर्तता केली जाते.
हजरत मुहम्मद(स.) यांच्या जीवन-व्यवस्थेचा सार असा आहे की सत्य मार्गावर चालण्याची प्रेरक शक्ती ईश्वरावर विश्वास आणि त्याच्याशी प्रेम व त्याचे भय होय. तो न्यायपूर्ण रीतीने माणसांच्या कर्माचे फळ देणारा आहे. कोणताही चांगुलपणा अथवा वाईटपणा त्याच्यापासून लपविणे शक्य नाही. ईश्वर-प्रेमात मग्न होऊन त्याची प्रसन्नता व बक्षीस मिळविण्याची इच्छा मानवाला सत्य-मार्गावर चालण्यास प्रवृत्त करते. त्याच्या कठोर यातनांपासून स्वतःचा बचाव करण्याची चिता त्याला दुष्कृत्यापासून अलिप्त ठेवते. खरी गोष्ट अशी आहे की ईश्वरात आस्था व परलोकातील जीवनाची कल्पना स्वीकारल्याशिवाय माणसांत टिकाऊ उत्तम गुणांचा अविर्भाव शक्य नाही.
आज सर्वात मोठी आवश्यकता अशी आहे की पुन्हा त्या शिकवणी आत्मसात केल्या जाव्यात ज्या जीवनाला सत्य-मार्गावर नेऊ शकतात. असे न केल्यास मानवता वेदना व दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही.

शिकवणींची एक झलक (हदीस व कुरआनवरून संकलित)

संपूर्ण सृष्टीचा निर्माता एकच ईश्वर आहे. तो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. त्याचीच भक्ती करा आणि त्याच्याच आज्ञेचे पालन करा.
ईश्वराने मानवावर अगणित उपकार केलेले आहेत. पृथ्वी आणि आकाशातील सर्व शक्तींना मानवाच्या सेवेला लाविले आहे. तोच पृथ्वी आणि आकाशाचा स्वामी आहे, तोच तुमचा पूज्य ईश्वर आहे.
ईश्वराला(वास्तविक स्वामीला) सोडून अन्य कोणाची पूजा करणे सर्वात मोठा जुलूम व व्याभिचार आहे.
ईश्वराची अवज्ञा करून तुम्ही त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. आज्ञाधारक बनून राहा, यातच तुमचे कल्याण आहे.
ईश्वराच्या स्मरणाने आत्म्याला शांती लाभते. त्याच्या पूजेने मनाचे मळ नाहीसे होते.
ईश्वराच्या निशाण्यांवर(दिवस, रात्र, पृथ्वी, आकाश, झाडे-झुडुपे, जीव-जंतूंची रचना) विचार करा. यामुळे ईश्वरावरील विश्वास दृढ होईल आणि संकुचित विचारांपासून मुक्ती मिळेल.
मला(हजरत मुहम्मद स.) ईश्वराने जगाचा मार्गदर्शन म्हणून नेमला आहे. मला मार्गदर्शनासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नाही. माझे म्हणणे ऐका आणि माझ्या आज्ञेचे पालन करा.
मी काही वेगळा आणि परिचित प्रेषित नाही. माझ्या अगोदर जगात मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रेषित आलेले आहेत, आपल्या धर्म-ग्रंथात पहा अथवा एखाद्या ज्ञानी माणसाकडून माहिती करून घ्या.
मी पूर्वीच्या प्रेषितांच्या शिकवणींची पुनर्स्थापना करण्यासाठी व कपटीपणा करणार्यांच्या बंधनातून मानवाला मुक्त करण्यासाठी आलो आहे.
मला अशासाठी पाठविले गेले आहे की मी नैतिकता व उत्तम आचरणाला अंतिम शिखरापर्यंत पोचवावे.
मी लोकांची कंबर धरून धरून त्यांना अग्नीत पडण्यापासून वाचवीत आहे, परंतु लोक मात्र अग्नीकडेच धाव घेत आहेत.
मला जगवासियांसाठी कृपा बनवून पाठविले आहे. तुम्ही लोकांसाठी सोयी करा, संकटे उभी करू नका.
आई-वडिलांची सेवा करा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलू नका. त्यांचे तुमच्यावर मोठे उपकार आहेत, म्हणून तुम्ही त्यांचे आज्ञाधारक बनून रहा.
जर आई-वडिलांनी अन्याय करण्याची आज्ञा दिली तर ती मान्य करू नका. अन्य बाबींत त्यांच्या आज्ञेचे पालन करा.
संपूर्ण मानवजातीला एकाच ईश्वराने निर्माण केले आहे, एकाच आई-वडिलांची संतती आहे. त्यांच्यात रंग, वंश, जात, भाषा, क्षेत्र वगैरेंचा भेदभाव करणे घोर अन्याय होय.
सर्व माणसे आदमची संतती होत. त्यांच्यावर प्रेम करा, तिरस्कार करू नका. त्यांना आशावान बनवा, निराश करू नका.
मानवांत श्रेष्ठ तो आहे जो दुसर्यांचा हितचितक, पवित्र आचरण करणारा व ईश्वराची आज्ञा पालन करणारा असतो.
तुम्ही जगवासियांवर दया करा, आकाशवाला(ईश्वर) तुमच्यावर दया करील.
ती व्यक्ती सर्वात चांगली आहे जी स्वतःच्या घरवाल्यांसाठी व शेजार्यांसाठी चांगली आहे.
स्त्रिया, गुलाम व अनाथांवर विशेषतः दया करा.
जो आपल्या मुले व मुलीत भेदभाव करीत नाही आणि मुलींचे चांगल्या प्रकारे पालन-पोषण करतो, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्ता करतो; तो स्वर्गात जाईल.
जो वडीलधारी मंडळींचा आदर व लहानांवर प्रेम करीत नाही तो आमच्यापैकी नव्हे.
तुम्ही ऐहिक जीवनात उन्मत्त होऊन हे विसरून जाऊ नका की तुम्हा सर्वांना तुम्ही केलेल्या कर्मांचा हिशेब आपल्या ईश्वराला द्यावयाचा आहे. परलोकातील यशच खरे यश होय.
परलोकातील यातना फार कठोर आहेत. तेथे कुळ-वंश, सख्खे-सोयरे, धन-संपत्ती आणि कोणाचीही शिफारस उपयोगी पडणार नाही. ईश्वराची आज्ञा-पालन व उत्तम आचरणच(त्या) यातनांपासून स्वतःला वाचविण्याचे एकमात्र साधन होय.
स्वतःला व आपल्या कुटुंबियांना नरकाच्या अग्नीपासून वाचवा. तुमच्या संपत्तीत तुमचे आप्तेष्ट, गरीब व अनाथांचा वाटा आहे. त्यांची वाटणी त्यांना द्या.
दुसर्यांची संपत्ती बेकायदेशीर खाऊ नका. व्यापार अथवा करारपत्राद्वारे कायदेशीर धन प्राप्त करा.
वस्तूमध्ये भेसळ करू नका, मोज-माप करण्यात कमी करू नका. व्यापारांत फसवेगिरी करू नका. जो फसवितो तो आमच्यापैकी नव्हे.
बाजारात भाव वाढावेत म्हणून(धान्य वगैरे) वस्तू न विकता(साठा करून) ठेवू नका असे करणारा घोर यातनेला पात्र आहे.
धन मोजून-मोजून संचय करू नका आणि वायफळ खर्च सुद्धा करू नका. मध्यम मार्ग स्वीकारा.
दुसर्यांचे अपराध क्षमा करीत जा. दुसर्यांच्या दोषांचा प्रचार करू नका, ते लपवा, ईश्वर तुमच्या दोषांवर पांघरूण घालील.
खोटे बोलणे, चहाड्या करणे, खोटे आरोप करण्यापासून दूर रहा. लोकांना वाईट नावाने हाक मारू नका.
अश्लीलता व निर्लज्जतेपासून दूर रहा, मग ती उघड असो की गुप्त.
दिकाऊपणाचे कृत्य करू नका. गुप्त-दान करा. उपकार करून त्याची जाणीव करून देऊ नका.
रस्त्यावरील त्रासदायक वस्तू(काटे, दगड वगैरे) काढून टाका.
पृथ्वीवर हळूहळू चला. गर्व व अहंकार करू नका.
जेव्हा बोलाल तेव्हा चांगले बोला नाहीतर गुपचूप रहा.
आपले वचन व प्रतिज्ञा पूर्ण करा.
सत्य व न्याय्य साक्ष द्या, मग तुमचे स्वतःचे अथवा तुमच्या कुटुंबियांचे नुकसान झाले तरी बेहतर.
अन्यायाविरुद्ध लढणारा ईश्वराला प्रिय असतो.
एखाद्या पैलवानाला चित करण्यात शौर्य नाही तर खरी शूरता माणसाने रागावर ताबा मिळविण्यात आहे.
मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजूरी द्या. कोणत्याही नोकराकडून त्याच्या शक्तीप्रमाणे काम करून घ्या. त्याच्या विश्रांतीकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःजे खाल ते त्याला द्या व ते स्वतः परिधान कराल ते त्याला सुद्धा नेसण्यास द्या.
जनावरावर दया करा, त्यांच्या शक्तीपेक्षा अधिक काम करवून घेऊ नका.
कोणत्याही वस्तूचा गरजेपेक्षा अधिक उपयोग करू नका. पाण्याचा दुरुपयोग करू नका, मग तुम्ही नदीच्या काठी का असाना.
आपले शरीर, कपडे व घर स्वच्छ ठेवा. झोपेतून उठल्यावर सर्वप्रथम दोन्ही हात धुवा. तुम्हाला माहीत नसेल की तुमचे हात झोपेत कोठे कोठे गेले असतील.
युद्धात स्त्रिया, मुले, आजारी आणि बिनहत्यारी सैनिकांवर हात उचलू नका. फळधारी झाडांना कापू नका.
युद्धात पकडलेल्या सैनिकांशी चांगला व्यवहार करा, त्यांना यातना देऊ नका.
एखादी वाईट गोष्ट पाहिली तर तिला प्रतिबंध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. जर ते शक्य नसेल तर तिला मनापासून वाईट समजा.
सर्व कर्म इच्छेवर आधारित आहेत. वाईट इच्छेने केलेल्या चांगल्या कर्माचे सुद्धा फळ ईश्वराजवळ मिळणार नाही.
ईश्वर-मिलनाची आशा बाळगून जीवन जगा. आशेप्रमाणेच मानवाच्या क्रियाकलाप होत असतात.

अल्लाहची भक्ती (उपासना, पूजा) हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आहे. यासाठी प्रेषितांची नियुक्ती केली. असे कार्य (अल्लाहची भक्ती) अनिश्चित आणि अपरिपक्व स्वरूपाचे असू शकतच नाही. हे फक्त पूजापाठ अथवा उपासनापध्दतीपर्यंतच मर्यादित नाही किवा फक्त आज्ञाधारकतेपुरतेच मर्यादितसुध्दा नाही. बुध्दीविवेक आणि कुरआननुसार हे सिध्द आहे. हे बुध्दीविवेकास धरून आहे की ज्या ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तोच ईश्वर मालक, पालक आणि शासक आहे आणि तोच एकमेव ईश्वर मानवासाठी पूजनीय आहे. सर्व प्रकारची भक्ती आणि उपासना फक्त त्या एकमेव ईश्वर (अल्लाह) साठीच आहे. कुरआनचा स्पष्ट निर्णय आहे की त्याच्या अनुयायींना ईशभक्ती आणि ईशआज्ञाधारकता एकसारखी आहे. कुरआन आयती मुस्लिमांना (आज्ञाधारकांना) स्पष्ट आदेश देत आहेत की त्यांनी एकाच ईश्वरापुढे (अल्लाह) नतमस्तक व्हावे. त्याचीच प्रशंसा आणि गुणगान करावे. त्याचेच श्रेष्ठत्व स्वीकारावे आणि उपासना त्याच्यासाठीच असावी. त्याच एकमेव ईश्वर (अल्लाह) ची मदत मागावी आणि नियमित त्याचे कृपाभिलाषी बनावे. कुरआन अशा एकमेव ईश्वरलाच फक्त शासक मानतो, तोच विधीनियमांचा आणि हुकूम देणारा शासक आहे. त्याचीच आज्ञा पाळली जावी आणि त्याच्या आदेशानुसारच जीवनयापन मनुष्याने करावे. अल्लाहने घालून दिलेल्या नियमांचेच पालन व्हावे. अल्लाहने वैध ठरविलेले आणि अवैध ठरविलेले आपल्यासाठीसुध्दा मनुष्याने तेच ठरवावेत. म्हणून भक्तीचा अर्थ कुरआननुसार तेव्हाच परिपूर्ण होतो जेव्हा मानवनिर्मितीचा एकमेव उद्देश आणि प्रेषितांच्या नियुक्तींचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मनुष्य करतो. अशा प्रकारे कुरआनप्रणित भक्ती (पूजा, उपासना) मध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोघांचाही समावेश आहे. आपण हा मुद्दा आणखी स्पष्ट होण्यासाठी दुसऱ्या पध्दतीने त्याचे आकलन करू या. कुरआनने मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना खालील शब्दांचा उल्लेख केला आहे.
‘‘ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पाहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे.’’ (कुरआन ६७: २)
दुसऱ्या ठिकाणी स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ‘‘मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (कुरआन २: ३०)
मानवनिर्मितीचा उद्देश स्पष्ट करताना, निर्मात्याने भक्तीबरोबरच ‘‘अधिक चांगले कृत्य करणारा’’ आणि खलीफा (निर्मात्याचा प्रतिनिधी) हे शब्दप्रयोगसुध्दा केले आहेत. हे जरी वेगवेगळे शब्द आहेत तरी त्यांचा मतितार्थ (खरा अर्थ) एकच आहे. कुरआननुसार अल्लाहची भक्ती, अधिक चांगले कृत्य करणे (सदाचरण) आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्व करणे (खलीफा) हे एकाच ध्येयाची व उद्देशाची वेगवेगळी स्पष्टीकरणे आहेत. म्हणून तिन्हींचा मिळून भक्तीचा खरा अर्थ होतो. सदाचरण आणि निर्मात्याचे प्रतिनिधित्वाला सोडून भक्ती कुरआनच्या दृष्टीने अपूर्ण आहे. फक्त आज्ञाधारकता (भक्तीविना) हे सदारचण नव्हे. तसाच प्रकार निर्मात्याचे (अल्लाहचे) प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. येथे आज्ञाधारकता जरी अपेक्षित आहे तरी भक्तीचा त्यात समावेश आवश्यक आहे. भक्तीच्या इस्लामी संकल्पनेत या दोन्ही गोष्टींचा (आज्ञाधारकता-पूजा) समावेश होतो आणि कोणतीही धार्मिक बाब यातून सुटूच शकत नाही.
इमाम इब्ने तैमिया खालील कुरआनोक्तीचे स्पष्टीकरण देताना म्हणतात,
‘‘लोकहो, उपासना (भक्ती) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्यांनाही निर्माण केले.’’ (कुरआन २: २१)
‘‘भक्ती हा व्यापक शब्द आहे. त्यात जाहीर आणि गुप्त गोष्टी आणि अल्लाहच्या आवडत्या आणि प्रसन्नतेशी निगडीत शिकवणींचा समावेश आहे. उदा. उपासना (नमाज) रोजा, हज, चांगुलपणा, विश्वासुपणा, दयाळुपणा, आईवडिलांची सेवा, सदाचाराचा प्रसार आणि दुराचाराचा प्रतिकार, अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा, शेजारधर्म, अनाथांची सेवा, कुरआन पठण, इ. भक्तीचेच अंग आहेत. त्याच प्रकारे अल्लाहशी प्रेम, अल्लाहच्या कोपचे भय, प्रेषितांशी प्रेम, ईशपरायणता, इ. गुप्त गोष्टीसुध्दा भक्तीचेच अंग आहेत.’’ (अल अबुदियात - २)
याच भाषणात ते पुढे म्हणतात, ‘‘भक्तीमध्ये धर्म व त्याच्या सर्व अंगांचा समावेश होतो. सर्व प्रेषित भूतलावर मानवाला ईशधर्माचे धडे देण्यासाठीच आलेले होते. या वस्तुस्थितीचा कुरआनमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आला आहे. प्रत्येक प्रेषिताने ‘ईश्वरभक्ती करा’ ही शिकवण दिली. यावरून हे स्पष्ट होते की धर्म आणि भक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’’
यावरून हेच स्पष्ट होते की पूर्ण धर्मपालन म्हणजेच भक्ती होय. धर्माच्या एका अंगास भक्ती आणि दुसऱ्या अंगास भक्तीपासून दूर ठेवणे अशक्य आहे. धर्म हा एक घटक आहे त्याचे अनेक घटक करणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीर एक पूर्ण घटक आहे त्यास विविध घटकांत आपण विभागू शकत नाही.

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानवतेअंतर्गत आपल्या विभिन्न कामांत जनसेवेला प्राधान्य दिले होते. त्याचप्रमाणे जमा़अत ए इस्लामी हिंद ईशग्रंथ पवित्र कुरआन आणि अंतिम पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार कार्य करत आहे. जनसेवा हे कार्य असे आहे जसे की रात्रभर ईश्वराची (अल्लाहची) उपासना करणे, असे विचार ऱफी़कुर्रहमान खान यांनी टेकाच्या  सिद्धार्थनगर येथील मोठी मस्जिदजवळ संघटनेच्या कार्यालयात मोफत मेडिकल कॅम्पच्या उद्घाटन समारंभात सादर केले.
हे मोफत आरोग्य शिबीर जमा़अत ए इस्लामी हिंद नॉर्थ, मेडिकल सर्विस सोसायटी ऑ़फ इंडिया शाखा नागपूर, नागपूर महानगरपालिका तसेच क्रिसेंट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित करण्यात आले होते. रफीकुर्रहमान पुढे म्हणाले की इस्लामवरील आरोपांद्वारा दहशतवादाचे नाव दिले जाते, जे अगदी चुकीचे आहे. इस्लाममधे मानवतेशी संबंधित जनसेवा  आणि त्यात जीवन जगण्याची पद्धती सांगितली आहे. इस्लाममधे उपासनाच नाही तर जनसेवेला सर्वश्रेष्ठ कार्य सांगितले आहे.
मेडिकल सर्विस सोसायटी आफ इंडिया (एम एस एस) नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. नईम निया़जी यांनी आपल्या संघटनेचा परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की एम एस एस विभिन्न शासकीय योजना अंतर्गत निर्धनांचे उपचार तसेच हृदय ऑपरेशन करवीत आहे. आज या शिबिरात छावनीच्या ईवर फी़जियो थेरपीच्या टीममधे सर्वेश मालू, आषुतोष, महवश सय्यद यांनी संबंधित रुग्णांची फी़जियो थैरेपी केली. ते पुढे म्हणाले, या शिबिरामध्ये ७० रुग्णांची ईसीजी, १०० रुग्णांची शुगर तपासणी व ३० रुग्णांचे एक्स रे काढण्यात आले आणि  रुग्णांना मोफत औषधेही वितरित केली गेली. या शिबिरात २०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला. संचालन शह़जाद नवैद यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका हेल्थ केअरचे सूर्यदीप आणि इंदिरा अवलकर, क्रीसेंट हॉस्पिटलचे डॉ. हसनुल बन्ना, सलीम का़जी, जुबैर अहमद व श़गु़फ्ता जुबैर त्याचबरोबर जेआईएच नॉर्थचे अध्यक्ष  इरशादुर्रहमान खान, फार्मासिस्टच्या टीममधे शाबा़ज अंसारी, मोहसिन अंसारी, वसीम अंसारी व उवैस अंसारी समाजसेवक का़जी शफी़क अहमद आदींचे महत्वपूर्ण योगदान लाभले.

खुरिम बिन फातिक (रजी.) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फजरची नमाज पढविली, आणि लोकांकडे रोख फिरविला तर बसून राहण्याऐवजी प्रेषित (स.) सरळ उभे राहिले आणि तीनदा सांगितले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि शिर्क (अल्लाहसोबत इतरांना- उपासना व आज्ञापालनायोग्य) करणे, दोन्ही कृत्ये समान दर्जाचे अपराध आहेत.’’ नंतर प्रेषित  (स.) यांनी पठण केले, ‘‘तर तुम्ही नापाकी (अस्वच्छता, अशुद्धता) अर्थात मूर्ती वगैरेपासून दूर रहा, आणि असत्य (खोटे) बोलण्यापासून दूर रहा, आणि ईश्वरांशी एकचित्त व्हा. अनेक  ईश्वरोपासना सोडून एकेश्वरवादाचा अंगीकार करा.’’ (हदीस - अबू दाऊद)

भावार्थ- वरील हदीस कथन करताना, प्रेषितांनी ‘सूरह हज’च्या आयातीचे पठण केले, ज्याचा अर्थ - असत्य कथन सर्वत्र सदैव वाईट आहे असा होतो. असत्य कथन, मग न्यायालयात  ‘साक्ष’ देताना असो वा अन्य एखाद्या ठिकाणी. यावरून लक्षात येते की, खोटी साक्ष किती मोठा अपराध, गुन्हा आहे. परंतु मुस्लीमांच्या दृष्टीने हा गुन्हा आता गुन्हा राहिला नाही,  किंबहूना एक कलानैपुण्य बनला आहे. त्यांच्या मते ते लोक मूर्ख ठरतात जे न्यायालयात आपल्या जागृत ईमानामूळे खरी साक्ष देतात. 

पृथ्वीची साक्ष- माननीय अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी एके दिवशी कुरआनची ही आयत पठण केली, ‘‘यौ मइ़िजन तु हद्दिसु अखबाराहा’’ व नंतर  लोकांना विचारले की, ‘‘पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ काय?’’ लोक म्हणालेत की, ‘‘ईश्वर व त्याचे प्रेषितच (स.) जाणतात.’’ प्रेषित (स.) यांनी सांगितले की, ‘‘कयामतच्या  दिवशी पृथ्वीचे समाचार वर्णन करण्याचा अर्थ असा की, ईश्वरासमोर पृथ्वी, स्त्री आणि पुरुषांच्या संपूर्ण कर्माची साक्ष देईल.’’ (हदीस - तऱगीब व तरहीब)

शारिरिक अवयवांची माणसांविरूद्ध साक्ष- माननिय अनस (र.) सांगतात की, आम्ही सगळे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याजवळ बसलो होतो की, प्रेषितांना (स.) हसु फुटले, आणि
आम्हांस प्रश्न केला की, ‘‘तुम्हाला माहित आहे काय, मी का हसलो?’’ आम्ही म्हणालो की ईश्वर आणि प्रेषित (स.) यांनाच माहीत. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘मला हसु यामुळे आले  की, कयामतच्या दिवशी एक अपराधी मनुष्य ईश्वरांस म्हणेल की ‘‘हे ईश्वरा! आज माझ्यावर अन्याय तर होणार नाहीना?’’ ईश्वर म्हणेल की, ‘‘होय! आज तुझ्यावर कुठलाच अन्याय  होणार नाही.’’ यावर तो म्हणेल की, आज मी कोणालाही आपल्याविषयी साक्ष देण्याची परवानगी देणार नाही. मी स्वत:च माझी साक्ष देईन. ईश्वर सांगेल की, ‘‘आज तू स्वत: आपला  हिशोब चुकता करण्यासाठी आणि तुझे कर्म-पत्र तयार करणारे फरिश्ते (देवदूत) साक्षीसाठी पुरेसे आहेत.’’ यानंतर त्याची वाचा बंद करून शरिराच्या संपूर्ण अवयवांना आदेश देण्यात  येईल की, तुम्ही याच्या कर्माची साक्ष द्या. यावर त्याचे अवयव त्याच्या एकूण- एक कर्माची साक्ष देतील. नंतर त्याची वाचा उघडून बोलण्याची शक्ती परत करण्यात येईल. यावर ती  व्यक्ती आपल्या अवयवांना धिक्कारत म्हणेल की, ‘‘तुमच्यावर ईश्वराचा धिक्कार असो, फटकार असो. जीवनामध्ये मी तुमचा कैवार घेत असे. आणि तुमच्या खातर मी सर्वकाही  करीत असे, आणि आज तुम्ही माझ्याच विरूद्ध साक्ष दिली.’’ अर्थात तो म्हणेल, जगांमध्ये अवयवांना सशक्त करण्यासाठी, आराम व मनोरंजनासाठी वाटेल तसे वागलो. हराम, हलाल,  बरे, वाईटाची पर्वा केली नाही. व तुम्ही ऐन वेळेवर दगाबाजी करून माझी साथ सोडली. 

जमाअत-ए-इस्लामी हिंद देशहितासाठी काम करणारी व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात  नैतिकतेचा अट्टहास धरणारी एक महत्वाची संघटना आहे. देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदार आणि राजकीय पक्षांसाठी जमाअतने एक जन-घोषणापत्र तयार केलेले आहे. ते वाचकांच्या माहितीसाठी खालीलप्रमाणे सादर.

भारत एक स्वायत्त, संप्रभू, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रधान देश आहे. देशाच्या घटनेने भारतासंबंधी अशी कल्पना केलेली आहे की, या देशासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व हे पायाभूत मुल्य असतील. जेथे प्रत्येक नागरिकाशी समान व्यवहार केला जाईल आणि सर्वांना समान संधी प्राप्त होतील. संविधानाच्या अनुच्छेद 38 मध्ये एका कल्याणकारी राष्ट्राची कल्पना सादर करून याला सरकारचे कर्तव्य असल्याचे घोषित केलेले आहे. यात असेही म्हटलेले आहे की, देशात केवळ नागरिकांमध्येच नव्हे तर विभिन्न समुदायामध्ये असलेल्या सामाजिक आणि आर्थिक असमानतेला कमी करण्याचे प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी असेल.
    ऐतिहासिक दृष्टीने भारत एक बहुलतावादी देश राहिलेला आहे. जेथे अनेक धर्म, जाती, भाषा आणि संस्कृतीचे लोक आपापल्या सीमेमध्ये सद्भावनेने राहत आलेले आहेत. म्हणून संसदेने भारतीय समाजाच्या या विविधतेचे प्रतिनिधीत्व जपायला हवे. भारताने जरी विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये भरपूर विकास केलेला आहे तरी आजही आपल्या देशातील एक मोठी जनसंख्या या विकासाच्या लाभापासून वंचित आहे. देशात झालेल्या या असंतुलित विकासामुळे सामाजिक आणि आर्थिक अन्याय आणि असमानतेचा प्रश्‍न आजही जसचा तसा उभा आहे.
    देशात चालू आणि पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यापूर्वी म्हणजेच 2014 साली सार्वत्रिक निवडणुकानंतर जे सरकार मागच्या पाच वर्षात देशात राहिलेले आहे, त्या सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत संकल्पनांना सर्वात जास्त हानी पोहोचविलेली आहे. भांडवलशहांसोबत राजकीय नेत्यांची झालेली अभद्र युती एव्हाना मजबूत झालेली आहे. आणि या युतीने देशात एका अशा आर्थिक व्यवस्थेला उभारी दिलेली आहे, जिच्यात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वेगाने वाढत आहे. यामुळे असमानतेच्या आधारावर आज आपला देश जगातील वाईट देशांच्या यादीमध्ये सामील झालेला आहे. बेरोजगारी शिखरावर पोहोचलेली आहे आणि सामान्य लोकांना मिळणारे फायदे भांडवलशाहांच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत.
    कमकुवत गट आणि अल्पसंख्यांकांच्या मध्ये भीती आणि असुरक्षेची भावना आज जेवढी आहे तेवढी कधीही नव्हती. दलित सुद्धा स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आदिवासींच्या जमीनी आता जास्त मोठ्या प्रमाणात भांडवलवाद्यांच्या षडयंत्राला बळी पडत आहेत. शेतकरी आजपावेतोच्या सर्वात मोठ्या कृषी संकटाचा सामना करीत आहेत. देशातील सर्वात मोठा अल्पसंख्यांक समुदाय असलेल्या मुस्लिमांचे जीव स्वस्त झालेले आहेत. सच्चर समितीच्या शिफारशीनंतर त्यावर अंमलबजावणी करण्याचे जे प्रयत्न ज्या संथगतीने सुरू होते तेही हळूहळू बंद पडत चाललेले आहेत. आतातर मुस्लिमांचा व्यक्तिगत कायदा, त्यांची संस्कृती, धार्मिक ओळख आणि त्यांचे पायाभूत धार्मिक अधिकार हेच संकटात सापडलेले आहेत.
    भ्रष्टाचार मिटविणे हा या सरकारच्या मुख्य घोषणांपैकी एक घोषणा होती. मात्र त्याने आता एका अनियंत्रित दानवाचे स्वरूप प्राप्त केलेले आहे आणि देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपले स्थान बळकट केलेले आहे.
    सर्वात मोठा प्रश्‍न हा आहे की, देश आणि देशातील लोकशाही संस्था फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या नियंत्रणात आहेत. संस्थांची स्वायत्तता जी की, कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये जीवन वाहिनी सारखी असते ती आज अत्यंत वाईट स्थितीत आहे. सीबीआय, सीव्हीसी, रिझर्व्ह बँक सारख्या संस्थाच्या पुढे जावून आता तर निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्यावरही संशय गडद होत चालला आहे, जो की लोकशाही देशासाठी संकटाची नांदी ठरू शकेल.
    वर नमूद केल्या प्रमाणे काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तरी भारतात सामुहिकरित्या कधी अराजकता येणार नाही. आम्हाला आशा आहे की, ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर असे लोक केंद्रात सत्तेवर येतील, ज्यांचा लोकशाही आणि घटनात्मक मुल्यांवर विश्‍वास असेल. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी या मुल्यांची केवळ रक्षाच करू नये तर त्यांना अधिक बळकट करण्यासाठी होतील तितके प्रयत्न करावेत आणि भविष्यात त्यांना नेत्यांच्या हस्तक्षेपापासून वाचवावे.
    ईशभय, नैतिकता आणि अध्यात्मिकता ही अशी मुल्य आहेत की जी शाश्‍वत आहेत. आणि एका मजबूत आणि परिपूर्ण समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका वठवतात. दुर्भाग्याने आपल्या देशात धर्माचा उपयोग बहुतकरून आपसातील मतभेदांना वाढविण्यासाठी, समाजामध्ये असमानता वाढविण्यासाठी आणि गरीबांचे शोषण करण्यासाठी होत आलेला आहे. हीच परंपरा राहिलेली आहे. वास्तविक पाहता धर्माचे खरे स्वरूप समोर आणले गेले तर तो भारताच्या धार्मिक समाजामध्ये नैतिक आणि अध्यात्मिक मुल्यांची वाढ करून एक आदर्श सामाजिक क्रांती आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकार करू शकतो.
    जमाते इस्लामी हिंद हे एका ईश्‍वराच्या उपासनेकडे आमंत्रित करणारे आंदोलन आहे. आम्ही देशातील लोकांना, सर्व राजकीय पक्षांना आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या उमेदवारांना, आपल्याला जन्माला घालणार्‍याच्या उपासनेकडे आमंत्रित करतो आणि   त्याच्यासमोर आपण उत्तरदायी असल्याची भावना आपल्यामध्ये जीवंत ठेवण्याकडे लक्ष केंद्रीत करतो. आमची अशी धारणा आहे की, ही जबाबदारीची भावना मत मागणार्‍यांमध्येही आवश्यक आहे आणि मतदान करणार्‍यांमध्येही आवश्यक आहे. या भावनेमुळेच देशात खरी मानवता, न्याय आणि खर्‍या                                                                                                                                             बंधुत्वामध्ये वाढ होऊ शकते.  ईश्‍वराची उपासना ही मानवामध्ये न्याय प्रस्थापित करण्याचा एकमात्र जामीन आहे.
    जमाते इस्लामी हिंदला सदरचे जनघोषणापत्र नागरिकांच्या आणि राजकीय पक्षांच्या समोर ठेवताना आनंद होत आहे. हे घोषणापत्र एकीकडे जनतेच्या मनाची हाक आहे तर दूसरीकडे राजकीय पक्षांसाठी सत्तासंचलनाचे एक चार्टरसुद्धा आहे. जमाते इस्लामी हिंद जरी देशात होणार्‍या निवडणुकांमध्ये सरळ भाग घेत नसली तरी उच्च नैतिक व मानवी मुल्य, सामुदायिक सद्भावना, बंधुभाव आणि सर्वच समाज घटकांच्या विकास आणि न्यायावर आधारित सत्तासंचलनाला सुनिश्‍चित करण्यामध्ये आपली भूमिका वठवत आलेली आहे.
    आम्हाला     जागृत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून या जनघोषणापत्राच्या समर्थनाची अपेक्षा आहे. याशी सहमत होऊन ते जर निवडणुकीत भाग घेत असतील तर त्यांना जनतेचे समर्थन मिळू शकेल आणि देशाला योग्य दिशेकडे घेऊन जाण्यात ते निश्‍चितच यशस्वी होतील.
    सरकारचे दायित्व
    बहुलतावादी, प्रगतीशील आणि सर्वसमावेशी भारताच्या संकल्पनेला व्यवहारिक रूप देण्यासाठी खाली नमूद मुद्दे प्रत्येक गंभीर राजकीय पक्षांच्या उद्देशांमध्ये सामिल असायला हवेत.
    1) सर्व नागरिकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि गौरवशाली जीवनाची हमी आणि न्यायिक प्रगतीच्या संकल्पनेवर आधारित कल्याणकारी राष्ट्राची स्थापना.
     2) अत्याचार, अतिवाद, धार्मिक उन्माद, झुंडी व राजकीय हिंसा आणि जातीय दंग्यांचे प्रभावी निवारण, गरीब, महिला, मुस्लिम आणि देशातील अन्य असुरक्षित घटकांच्या सुरक्षेला सुनिश्‍चित करणे.
    3) अनुसूचित जाती, जनजाती, मुस्लिम समाजाचे अन्य वंचित घटक, ग्रामीण भागाचा चौफेर विकास आणि त्यांचे सशक्तीकरण याकडे विशेष लक्ष देऊन देशाच्या वातावरणामध्ये सकारात्मक परिवर्तन आणने.
    4) अल्पसंख्यांक आणि सांस्कृतिक व भाषीय गटांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची सुरक्षा, त्यांच्या व्यक्तिगत कायद्याची सुरक्षा, त्यांच्या प्रार्थनास्थळांची सुरक्षा, त्यांची धार्मिक ओळख आणि त्याच्या प्रतिबिंबाची सुरक्षा तसेच त्यांच्याविरूद्ध कोणत्याही प्रकारच्या उन्मादाचे कठोर निदान करणे.
    5) भ्रष्टाचार, अश्‍लिलता, लैंगिक गुन्हे, घराणेशाही, राजकारणात गुन्हेगार तत्वांचा प्रवेश, भेदभाव सारख्या वाईट प्रवृत्तीविरूद्ध परिणामकारक पावले उचलणे. प्रामाणिक अस्मिता आणि दूरदृष्टी सारख्या मुल्यांमध्ये वाढ करणे, प्रत्येक समाजाची ओळख आणि त्यांचा आदर करणे तसेच राजकीय व्यवस्थेला नैतिक मुल्यांच्या कक्षेत आणने.
    नीति निर्धारक उपाय
    ज्या राजकीय पक्षांना जनतेचे समर्थन हवे, आम्ही त्यांच्याकडून अशी मागणी करतो की वर दिल्या गेलेल्या उद्देशांच्या प्राप्तीसाठी निम्नलिखित कायदेशीर व नीतिवर आधारित 18 मुद्यांवर आधारित एक कार्यक्रम लागू करण्याचा त्यांनी वायदा करावा.
    1. जीवनासाठी आवश्यक अधिकार, जसे घटनेच्या भाग तीन मध्ये योग्य सुधारणा केल्या जाव्यात. ज्यामुळे सर्व देशवासियांच्या जीवनाच्या आवश्यकता निर्धारित केल्या जातील.
    2. सगळ्या जगात संरक्षण आणि सकारात्मक कार्यवाही म्हणून वंचित आणि कमकुवत समाज घटकांच्या उत्थानासाठी आरक्षण एक नीति म्हणून वापरली जाते. मुस्लिमांच्या चौफेर मागासलेपणाला दूर करण्यासाठी हे आवश्यक झालेले आहे की, त्यांच्यासाठी आता आरक्षण देण्याची नीति अवलंबिली जावी. त्यासाठी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिटीच्या शिफारशी स्विकारल्या जाव्यात. शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये अल्पसंख्यांकांना आरक्षण दिले जावे. ज्यात दोन तृतीयांश कोटा हा मुस्लिम अल्पसंख्यांकासाठी आरक्षित ठेवला जावा.
    3. लोकशाहीला मजबूत करणार्‍या संस्थांची स्वतंत्रता आणि त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलली जावीत. या संस्थांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की, यांच्या संबंधित नियुक्त्यावर सरकारी नियंत्रण हटविले जावे. माध्यमांची स्वतंत्रता आणि जबाबदार आचरणासाठी चुकीच्या बातम्या व दिशाभूल करणार्‍या कार्यक्रमांना रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जावेत आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाला अधिक अधिकार प्रदान केले जावेत. लोकपालच्या अधिकार क्षेत्रामध्ये राजकीय पक्ष आणि मोठ्या व्यावसायिक संस्थांनाही आणले जावे. सर्व शासकीय कामात संपूर्णपणे पारदर्शीता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स लागू करण्यात यावे.
    4. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सुधारणा करून या योजनेअंतर्गत काम करणार्‍या मजुरांना वर्षाच्या 365 दिवस रोजगाराची हमी दिली जावी. खाजगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या नीतिसाठी कायदा करून खाजगी क्षेत्राला ग्रामीण क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रमाणे उपयोग करण्यात यावा.
    5. देशाच्या अर्थव्यवस्थेची अशा पद्धतीने पुनर्रचना केली जावी की, ज्यात धनवृद्धीही होईल आणि त्याचे न्याय्य वाटपही होईल. यासाठी कृषी अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था, उत्पादन आणि लघू उद्योगांना प्रोत्साहित केले जावे. घरेलू आणि अन्य क्षेत्रातील पारंपारिक स्थानीय कला आणि कलाकारांच्या व्यवसायांना सुरक्षित आणि यशस्वी करण्यासाठी कायदेशीर तरतुदी केल्या जाव्यात. महत्त्वाच्या विभांगामध्ये मोठ्या वैश्‍विक कंपन्यांचा प्रवेश आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीवर नियंत्रण आणावे. बेलगाम खाजगीकरणाला चाप लावण्यात यावा. एसईझेड अर्थात खास आर्थिक क्षेत्रा संबंधीच्या कायद्यामध्ये सुधारणा करून त्यात गरीब, शेतकरी आणि मजूर यांच्यासाठी अनुकूल अशा तरतुदी करण्यात याव्यात. सार्वजनिक भांडवलाद्वारे बँका आणि भांडवलदारांना होणारा अवैध पतपुरवठा तसेच सरकारी कामांसाठी विशेष करून संरक्षणासंबंधी प्रकरणामध्ये तसेच सरकार धार्जिण्या भांडवलशहांना बेकायदेशीररित्या केल्या जाणार्‍या मदतीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी योग्य ती नीति निर्धारित करण्यात यावी.
    6. कृषी विभागाला बळकटी आणण्यासाठी ठोस अशी नीति निर्माण करून त्याला लागू करण्यात यावे. राष्ट्रीय किसान आयोग (एस.एस. स्वामीनाथन कमिशन)च्या तरतुदी लागू करण्यात याव्यात. विशेषतः कृषी उत्पादनावर उत्पादन मुल्याच्या कमीत कमी दीटपट                                                                                                                                          आधारभूत किंमत देण्यात यावी. आणि कृषी भूमीच्या विक्री आणि तीच्या हस्तांतरणासंबंधी कमिशनने सुचविलेल्या कायद्याला तात्काळ लागू करण्यात यावे. कार्पोरेट शेतीला हतोत्साहित केले जावे आणि पिकाच्या नुकसानीच्या वेळी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी क्लायमिटी फंड स्थापित करण्यात यावा.
    7. सामाजिक आणि मानवीय यशस्वीता  आणि प्रगती मध्ये सरकारची भूमीका वाढविण्यासाठी व आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक त्या आर्थिक सुधारणा केल्या जाव्यात. श्रीमंत लोकांवर अधिक कर लावण्यात यावा. अप्रत्यक्ष कराच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष कराच्या टक्क्यामध्ये वृद्धी केली जावी. जीएसटीमध्ये संशोधन केले जावे आणि ते अधिक सुलभ करण्यात यावे. लघू व्यावसाय आणि सामान्य लोकांच्या आवश्यकतेच्या वस्तू निर्माण केल्या जाव्यात. पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेले अनावश्यक कर कमी करण्यात यावेत आणि सकल रूपाने कराच्या व्यवस्थेचे असे नवनिर्माण करण्यात यावे की, वर्तमान कार्पोरेट आणि भांडवलशाही समर्थित व्यवस्थेच्या तुलनेत ही व्यवस्था अधिकाधिक जनहितांच्या जवळ होईल.
    8. अल्पसंख्यांकांविरूद्ध होणारी निरंतर हिंसा थांबविण्यासाठी एक असा कायदा असायला हवा ज्याद्वारे झुंडीद्वारा केली जाणारी हिंसा आणि झुंडीला उत्तेजित करणार्‍यांची ओळख करून त्यांना अटक करून कडक शिक्षा केली जाईल. त्याचप्रमाणे केंद्रीय सल्लागार समितीतर्फे विभिन्न गटांद्वारे केल्या जाणार्‍या हिंसेविरूद्धही महत्वपूर्ण प्रावधान या कायद्यात असायला हवेत. हिंसेला संपविण्यासाठी सामाजिक बहिष्कारासंबंधीच्या सुद्धा कलमांचा त्यात समावेश असायला हवा. विशेषकरून घृणा पसरविणारे, भडकाऊ भाषण देणारे, चुकीच्या बातम्या पेरणार्‍यांविरूद्ध प्रतिबंध करण्याची त्यात चेतावनी दिली गेली असली पाहिजे.
    9. अल्पसंख्यांकच्या धार्मिक व सांस्कृतिक अधिकारांच्या संरक्षणाची हमी दिली जावी. ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेमधून तात्काळ परत घेण्यात यावे आणि मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही, असे आश्‍वासन दिले गेले पाहिजे. अल्पसंख्यांकांच्या शिक्षण संस्था, विशेषतः अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामीया मिलीया इस्लामियाच्या अल्पसंख्यांक दर्जाचे रक्षण केले जावे. विभिन्न राज्यांमधील धार्मिक कार्याचे (इबादतींचे) स्वातंत्र्य, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार, आपली संस्कृती आणि धार्मिक ओळखीनुसार शिक्षणप्राप्त करणे, हिजाब आणि आपल्या इच्छेनुसार वस्त्र परिधान करणे इत्यादींमध्ये वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत राहिलेला आहे, अशा सर्व समस्येचे समाधान व्हायला हवे.
    10. पोलिसांना व्यावसायिक आणि मानवीय बनविण्यासाठी राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशिंना लागू करण्यात यावे आणि पोलीस व्यवस्थेमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जाव्यात. पोलीस दलामध्ये सर्वांचे प्रतिनिधीत्व राहील, यासाठी अल्पसंख्यांकांना 25 टक्के आरक्षण त्यात दिले जावे. अल्पसंख्यांकांच्या संबंधीच्या शिफारशींना लागू करण्यात यावे.
    11. सच्चर समितीच्या अहवालातील डायव्हर्सिटी इंडेक्स कन्सेप्टला सरकारी आणि खाजगी विभागांमध्ये लागू करण्यात यावे. जेणेकरून दलित, मुस्लिम आणि इतर मागासवर्गीय लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील. सर्व सरकारी आणि खाजगी कार्य, डायव्हर्सिटी इंडेक्स कन्सेप्टवर आधारित असायला हवेत. सर्वांना समान संधी मिळण्याच्या घटनात्मक तरतुदींचे कायद्यात रूपांतर केले जावे. त्याने मुस्लिम आणि विभिन्न वर्गांच्या समस्यांचे समाधान होईल. यासाठी खाजगी क्षेत्रातही त्यांना प्रतिनिधीत्व मिळू शकेल. सच्चर समितीच्या शिफारशिंना प्रत्यक्षात लागू करण्यात यावे. सर्वच सरकारी योजनांमध्ये मुस्लिमांच्या भागीदारीलाही सामील करण्यात यावे.
    12. नवीन शिक्षण नीतिचे मुल्यांकन केले जावे आणि तिच्या आकलनाच्या आधारावर समाजातील विभिन्न वर्गांचा सहभाग सुनिश्‍चित करण्यात यावा. विशेषतः शैक्षणिक नीति आणि अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये विशेषतः सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांकडे लक्ष देण्यात यावे आणि ठोस नीतिच्या आधारावर त्यांची निर्मिती केली जावी. शिक्षणावर जीडीपीची कमीत कमी 8 टक्के रक्कम खर्च करण्यात यावी. मुलभूत शिक्षणावर खर्चाची टक्केवारी निरंतर कमी होत आहे. त्यात बदल केला जावा. मुस्लिमांसह शिक्षणाच्या दृष्टीकोणातून कमकुवत वर्गांच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष प्रकारच्या नीति निर्धारित केल्या जाव्यात.
    13. केंद्रातील कायदे उदा. एएफएसपीए, युएपीए, एनएसए आणि याच प्रकारचे राज्यस्तरावरील कायदे उदा. आय.टी.अ‍ॅक्ट 2000, भारतीय दंड विधान आणि इतर वेगवेगळ्या कायद्यामध्ये बदल करण्यात यावे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कराराच्या आधारावर राजकीय आणि नागरी अधिकार इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑफ सिविल अँड पोलिटीकील राईटच्या नियमानीशी समांतर केले जावे. त्याच प्रमाणे शोषणाच्या विरूद्ध कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर अँड ऑदर क्रुयल इनह्युमन ऑर डिग्रेडिंग ट्रिटमेंट ऑर पनिशमेंट आणि त्याच्याद्वारे नियंत्रित प्रोटोकॉल म्हणजेच इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ ऑल पर्सनन्स फ्रॉम एन्फोर्स्ड डिसअ‍ॅपीयरन्सला वाढ दिली जावी आणि कन्व्हेन्शनर्सच्या सल्ल्यानुसार कायद्यात बदल करण्यात यावेत.
    14 . एका स्वतंत्र न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात यावी. ज्याच्याद्वारे कट आणि आतंकवाद तसेच झुंडीद्वारे केल्या जाणार्‍या हिंसक घटना आणि आरोपांची निरपेक्ष स्वरूपात चौकशी होईल. या घटनांशी संबंधित खटले चालविण्यासाठी वेगवान न्यायालयांच्या स्थापनेचा प्रयत्न केला जावा. अनावश्यक कायदे आणि हस्तक्षेपाने पीडित लोकांसाठी न्याय आणि नुकसानभरपाईची व्यवस्था केली जावी आणि खोट्या आरोपाखाली खटले दाखल करून निरपराधांना अडकावणार्‍यांना शिक्षा दिली जावी. त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या कलमांचा समावेश केला जावा. नागरिक कायद्यामध्ये बदल करणारे विधेयक जे की, लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे, तात्काळ परत घेण्यात यावे. हे विधेयक देश आणि देशाच्या घटनेच्या आत्म्याच्या विरूद्ध धार्मिक भेदभाव वाढविणारा आहे. त्याचप्रमाणे एनआरसी (राष्ट्रीय नागरिक रजिस्टर)च्या नावाखाली ज्या लोकांना त्रास देण्यात येत आहे तो तात्काळ थांबविण्यात यावा. जे देशाचे नागरिक नाहीत त्यांची ओळख पटविण्यासाठी दुसरी कुठलीतरी उचित व्यवस्था केली जावी. आणि त्या व्यवस्थेला सर्व वर्गांच्या सहमतीनंतर लागू करण्यात यावे. त्याचप्रमाणे जम्मूकश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसा आणि अत्याचाराच्या साखळीला तात्काळ रोखण्यात यावे. आणि त्या ठिकाणच्या जनप्रतिनिधींकडे संचलनाची जबाबदारी देऊन नागरी प्रकरणांमध्ये सैन्याच्या भूमीकेला कमी करण्यात यावे.
    16. बँकींग क्षेत्रात व्याज विरहीत व्यवहारांचा परिचय लोकांना करून देण्यात यावा. डॉ.रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग कमिशनने फायनान्सीयल सेक्टर रिफॉर्म्सच्या आर्थिक क्षेत्रासंबंधी दिलेल्या सल्ल्यानुसार संबंधित समिती आणि विभिन्न समित्यांच्या शिफारशीनुसार अल्पसंख्यांक आणि गरीब वर्गाच्या उन्नतीसाठी व देशाच्या आर्थिक विकासासाठी व्याज विरहीत भागीदारीवर आधारित कामकाज करण्याची बँकांना परवानगी दिली जावी. स्टेटबँक ऑफ इंडियाने शरियतवर आधारित ज्या इक्विटी फंडला सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्याला तात्काळ लागू केले जावे आणि इन्शोरन्स विभागात कार्य करण्याची परवानगी दिली जावी.
    17. वक्फ अ‍ॅक्ट 2013 मध्ये संशोधन करून ज्वॉईंट पार्लमेंट्री कमिटीच्या सर्व शिफारशींना त्यात सामील केले जावे. विशेष करून या कायद्याला राज्याच्या रेंट कंट्रोल अधिनियम आणि महसूल कायद्यावर वरियता द्यावी, नियमित वेळेवर सर्व्हेक्षण करण्याचे बंधन टाकावे. सर्व्हेक्षण अहवाल इंटरनेटवर उपलब्ध करावा. सीईओला कब्जे हटविण्याच्या संबंधात मॅजिस्ट्रीयल अधिकार देण्यात यावे. कब्जा हटविण्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी. कुठल्याही एका निरपेक्ष व्यक्तीला वक्फ काउन्सिलचा प्रमुख बनविण्यासारख्या शिफारशींना वक्फ अ‍ॅक्टमध्ये सामील करण्यात यावे. वक्फच्या संपत्तीला सरकारी संपत्तीप्रमाणे सुरक्षा उपलब्ध करून देण्यासंबंधीचे विधेयक ’द वक्फ प्रॉपर्टीज (इव्हीक्शन ऑफ अनअथोराईज्ड अकुपन्टस्)’ बिल 2014 प्रलंबित आहे. त्याला तात्काळ मंजुरी दिली जावी आणि सच्चर समितीच्या शिफारशींप्रमाणे युपीएससी अंतर्गत एक वेगळी नॅशनल वक्फ सर्व्हीस स्थापन करण्यात यावी.
    18. राज्य घटनेत संभाव्य सुधारणेच्या माध्यमातून एक गोष्ट निश्‍चित केली जावी, की कुठल्याही आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यापूर्वी किंवा विदेशनीतिमध्ये व्यापक बदल करण्यापूर्वी संसदेच्या मंजुरीला अनिवार्य बनविण्यात यावे, असे करणे यासाठी आवश्यक आहे की, देशाची विदेशनीति स्वतंत्र व निष्पक्ष असावी. लोकशाही आणि मानवी मुल्यांवर आधारित असावी. या नीतिचा परिणाम शेजारील देशांशी मधूर संबंध स्थापित करण्यामध्ये व्हावा. दक्षीण क्षेत्राचा (साऊथ-साऊथ कोऑपरेशन) चा मार्ग प्रशस्त व्हावा. आपली विदेशनीति आणि घटनात्मक मुल्य यात कुठलाही विरोधास नसावा.

हिंदीतून मराठी भाषांतर
उपसंपादक बशीर शेख,
एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget