Latest Post

पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे... अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.

कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर हा ग्रंथ जसा अवतरला होता, अक्षरशः त्याच अवस्थेत आजही तो आमच्यापाशी उपलब्ध आहे. इस्लामच्या पहिल्या शताब्दीपासून ते आजपर्यंतच्या कुरआनच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. या प्रती एकमेकांना प्रमाणित करतात आणि पुष्टी देतात. कुरआन हे जगातील पहिले असे पुस्तक आहे, ज्याला प्रत्येक कालखंडात, जगातील लाखो माणसांनी मुखोद्गत केले आहे. संपूर्ण कुरआन मुखोद्गत करणार्याला ‘हाफीज’ असे म्हटले जाते. रमजान महिन्यात दररोज रात्री संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. अशा प्रकारे सबंध जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआनचे पुनःर्पठण केले जाते.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी तो संपूर्णपणे लिहून मुहम्मद(स.) यांच्याकडे देण्यात आला नव्हता. प्रेषितपद प्राप्त झाल्यानंतरच्या त्यांच्या २३ वर्षांच्या जीवनकाळात तो टप्प्याटप्प्याने अवतरित होत राहिला. कुरआनच्या अवतरणाची या शृंखलेचा, मुहम्मद(स.) यांच्याद्वारा इस्लाम धर्माच्या स्थापनेशी थेट संबंध होता.
प्रेषित मुहम्मद (स.)
पवित्र कुरआन जसा मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजला जातो. त्याचबरोबर मुहम्मद(स.) यांनाही मुस्लिमांचे प्रेषित मानले जाते. वास्तवतः ही गोष्ट खरी नाही. अल्लाहने मुहम्मद(स.) यांना अखिल मानवजातीसाठी आपला प्रेषित बनवून धाडले होते.
जगात आजवर होऊन गेलेल्या धर्मगुरूंपैकी प्रेषित मुहम्मद(स.) यांचे जीवनचरित्र सर्वांहून अधिक तपशिलासह आणि विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध आहे. त्यात त्यांचे जीवन व त्यांची शिकवण या दोहोंचा समावेश आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म कालौघाच्या अशा वळणावर झाला, जेव्हा संस्कृतीचा प्रकाश पसरला होता आणि मानवजात आधुनिक युगात प्रवेश करीत होती.
प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म मक्केत झाला. त्या काळी मक्का एक छोटे शहर होते. त्यांचा जन्म झाला, तेव्हा परिस्थिती अत्यंत विपरित होती. जन्मापूर्वीच त्यांच्या पित्याचे निधन झाले. मातेची मायाही त्यांना अधिक काळ मिळू शकली नाही. एखादा थोरला भाऊही नव्हता, त्यांचे चुलते अबू तालीब यांचा थोडासा आधार होता. आर्थिक स्थितीही हलाखीची होती. यासाठी त्यांना शेळ्या चारावयास नेण्याचे आणि दुसर्या लोकांचा व्यापारी माल विक्रीसाठी नेण्याचे काम करावे लागले. त्यांचे मोठे धन, त्यांच्या नैतिक चारित्र्यात होते, ज्याचा सुगंध मक्केतील सर्व लोकांना जाणवत होता. विश्वासू व प्रामाणिक म्हणून त्यांना ओळखले जाई. आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापाशी ठेवून सुरक्षिततेचा निःश्वास सोडीत असत. लोक त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत, त्यांचा शब्द मानीत असत. एखादे भांडण झाले आणि ते मिटण्याचे लक्षण दिसले नाही, तर लोक त्यांना पंच म्हणून निवड करीत व त्यांनी दिलेला निर्णय स्वीकार करीत असत.
त्यांचे वय चाळीस वर्षांचे झाले तेव्हा अल्लाहने त्यांना आपला प्रेषित म्हणून घोषित केले. आणि त्यांच्याकडे पवित्र कुरआनचे अंश येऊ लागले. अल्लाहचा संदेश घेऊन ते लोकांपाशी गेले. त्यांना सांगितले की केवळ एकमेव अल्लाहचीच उपासना करा आणि मूर्तिपूजा सोडा. लोकांना सांगितले की खरे बोला, न्यायाने वागा, कोणाचीही संपत्ती हडप करू नका, सर्व माणसे एकाच माता-पित्याची संतती आहेत. त्यांच्यात कसलाही भेदभाव करू नका. या गोष्टी ऐकून मक्केचे लोक बिथरले, किबहुना ते प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठार मारण्याचा कट शिजवला गेला. तेव्हा प्रेषितांनी मक्का शहर सोडण्याचे ठरविले. मदिन्याच्या लोकांनी त्यांना साथ देण्याची शपथ घेतली व आपल्या शहरात त्यांना जागा दिली. काही दिवसांतच तेथे एक आदर्श इस्लामी समाज स्थापन झाला. मक्केचे लोक तेथेही लढाई करायला आले, पण पराजित होऊन परतले. शेवटी मुहम्मद(स.) व त्यांच्या सोबत्यांची सत्ता मक्केवरही प्रस्थापित झाली. मुहम्मद(स.) यांच्या नंतरही इस्लामी राज्याचा विस्तार होत राहिला. राज्यच नव्हे, तर त्यांच्या शिकवणींचा व पवित्र कुरआनचा प्रसार सर्वदूरपर्यंत झाला.

जगात जितके धर्म आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामकरण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे. अथवा ज्या जातीत व ज्या राष्ट्रात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ धर्माचे नाव, येशू ख्रिस्तांशी निगडीत असलेल्या कारणाने ‘ख्रिश्चन’ धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते, म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव ‘बौद्ध’ धर्म असे ठेवले गेले. झरतुष्ट्र धर्माचे नाव, त्याचे संस्थापक ‘झरतुष्ट्र’ यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी (ज्यू) धर्म हा ‘यहुदा’ नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले. अशीच अवस्था अन्य धर्माच्या नावासंबंधी आहे. परंतु ‘इस्लाम’ चे वैशिष्ट्य असे आहे की, त्याचे नामकरण कोणत्याही व्यक्तीशी अथवा जाती अगर वंशाशी संबंधित नाही उलट त्याचे नामकरण एक विशिष्ट गुण प्रकट करते. या गुणाचा अविष्कार ‘इस्लाम’ शब्दाच्या अर्थामध्ये आढळतो. हे नामकरण स्वतःच असे स्पष्ट दर्शविते, की ते कोणाही व्यक्तीच्या बुद्धीची निपज नाही. तसेच कोणाही एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. त्याचा संपर्क कोणाही व्यक्तीशी, देशाशी भूभागाशी अथवा जातीशी नाही. जनमानसात ‘इस्लाम’ चा गुणधर्म निर्माण करणे हाच त्याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात व प्रत्येक जातीत व वंशात ज्या सज्जन व सद्वर्तनी लोकांमध्ये हा गुण आढळून आला ते सर्व मुस्लिम होते. मुस्लिम आहेत व पुढेही ते मुस्लिम असतील.

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ
अरबी भाषेत ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञापालन असा आहे. (‘इस्लाम’ शब्दाचा दुसरा अर्थ, शांती, कुशलता, संरक्षण, शरण इ. मनुष्याला वास्तविक शांती त्याचवेळेस प्राप्त होते, जेव्हा तो स्वतःला अल्लाहपुढे अर्पण करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनशांती प्राप्त होते आणि समाजात खरी शांती नांदू लागते.) अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव ‘इस्लाम’ असे ठेवले गेले आहे.

- वहीदुद्दीन खान
    मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती? उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे.
    मनुष्याने जीवनाची वास्तवता जाणून घेतली तर विद्यमान जगातील नव्हे तर पारलौकिक जीवनाची खरी समस्या तो जाणून घेईल, हेच सत्य या पुस्तकांत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 108    -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/f8rw0o2iz06bhjs2zhza13ue9u78nazq


जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांची निवड नुकतीच झाली. त्यांचा जन्म 1973 चा असून, ते इले्नट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर  आहेत. त्यांची स्वतःची एक संगणक कंपनी आहे. त्यांना इस्लामची अत्यंत चांगली समज असून, आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके आणि 200 पेक्षा जास्त लेख उर्दू आणि इंग्लिशमध्ये  लिहिलेले आहेत.
या पदावर निवड होण्यापूर्वी ते जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी ते स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते बोर्ड ऑफ ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन  दिल्लीचे सदस्य असून, सेंटर फॉर स्टडी अँड रिसर्च दिल्लीचे संचालक आहेत. इदारतुल तहेकीक व तसनीफ-ए-इस्लामी अलिगढचे ते आजीवन सदस्य असून, इस्लामिक अ‍ॅकॅडमिक ट्रस्ट  दिल्लीचे विश्वस्त आहेत. शिवाय, बोर्ड ऑफ इस्लामिक पब्लिकेशन दिल्लीचे सदस्यही आहेत. शिवाय, एडिटोरियल बोर्ड ऑफ तसनीफी अ‍ॅकॅडमी, एमएमआय पब्लिशर्स दिल्लीचे सदस्य  असून, अ‍ॅडव्हायझरी बोर्ड जमियतुल फलाह आजमगढचे माजी सदस्य राहिलेले आहेत. ते आपल्या लेखन शैली आणि विचारपूर्ण भाषणांसाठी इस्लामी जगतामध्ये परिचित आहेत. त्यांची  ही निवड 4 वर्षासाठी म्हणजे 2023 पर्यंत झालेली आहे. अगदी साधी राहणीमान आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.  भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून  निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी अमीर (अध्यक्ष) निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

जमाअते इस्लामीच्या अध्यक्षांची निवड कशी होते?
जमाअते इस्लामी हिंदची स्थापना ऑगस्ट 1941 मध्ये अखंड भारत असताना लाहौर येथे झाली. देशाच्या फाळनीनंतर 1948 साली जमाअते इस्लामी हिंद नावाची स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली जिचा जमाअत-ए-इस्लामी पाकिस्तानशी कुठलाच संबंध नाही. जमाअतए- इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष अबुलैस इस्लाही नदवी हे होते. आतापावेतो या संघटनेचे पाच  अध्यक्ष झालेले असून, मागच्या आठवड्यात मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या ठिकाणी तरूण अभियंते व जमाअतचे उपाध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड कशी होते? याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लोकांना वाटते की, इतर संघटनांच्या निवडीप्रमाणेच या संघटनेध्येही काही लोक अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल   करत असतील, उमेदवार जोरदार प्रचार करत असतील आणि शेवटी त्यावर मतदान होऊन अध्यक्षाची निवड होत असावी. मात्र असा काही प्रकार येथे होत नाही. जमाअत-ए-इस्लामी  हिंद हिची व्यवस्था शुराई निजाम म्हणजे एकमेकांच्या सल्लामसलतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबवून आहे. जी की पूर्णपणे देशाच्या घटनेच्या आधीन काम असून नोंदणीकृत  संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामीचे जवळ-जवळ 12 हजार पेक्षा अधिक सदस्य भारताच्या 20 मोठ्या राज्यात आहेत. 31 मार्च 2019 रोजी मागच्या अध्यक्षांची 4 वर्षांचा कार्यकाळ  संपला होता. पुढील अध्यक्षांच्या निवडीसाठी देशभरातून मजलिस-ए-नुमाईंदगान (प्रतिनिधी सभा)चे 157 सदस्य दिल्लीत जामिया नगरमधील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य  कार्यालयात 1 एप्रिलपासूनच जमा झाले होते. त्यांची निवड याआधीच झालेली होती. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची निवडसुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. यांची निवड दोन टप्प्यामध्ये  झाली.
पहिल्या टप्प्यामध्ये जमाअते इस्लामीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या पसंतीच्या राज्याबाहेरील सदस्याचे नाव सुचवायचे असते व दूसऱ्या टप्प्यात स्वतःच्या राज्यातील पसंतीचे नाव  सुचवायचे असते. यात स्वतःचे नाव सुचविता येत नाही. जमाअते इस्लामी हिंदचे वैशिष्ट्ये असे की, या संघटनेमध्ये कोणत्याही पदासाठी कोणालाही स्वतःचे नाव सुचविता येत नाही किंवा त्यासाठी लॉबिंग करता येत नाही. तसे काही आढळून आल्यास तात्काळ त्या सदस्याची संघटनेतून हकालपट्टी केली जाते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेचे सर्व सदस्य दिल्ली येथे जमा झाले. प्रतिनिधी सभा ही जमाअते इस्लामी हिंदची सर्वात मोठी आणि प्रभावशाली सभा असते. या  सभेच्या सदस्यांना अमीरे जमाअतच्या निवडीचे व त्यांना काढून टाकण्याचे सुद्धा अधिकार असतात. शिवाय, चार वर्षाच्या काळामध्ये जमाअतची ध्येय धोरण ठरविणे तसेच कामाचे नियोजन करणे हे अधिकार याच प्रतिनिधी सभेला असतात. यावर्षी 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 157 सदस्यांनी आपसात विचारविमर्श  करून अनेक नावांपैकी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. येथेही सआदतुल्लाह हुसैनी यांनी स्वतःला अध्यक्ष करावे म्हणून नामांकन  दाखल केले नव्हते किंवा लॉबिंगही केलेली नव्हती. उलट ही जबाबदारी मला नको, असे ते म्हणत होते. उपस्थित 157 सदस्यांपैकी काही सदस्यांनी काही लोकांची नावे या पदासाठी  सुचविली होती. त्यावर ज्यांची नावे या पदासाठी सुचविली गेली होती. त्यांना बैठकीत सामील न करता त्या सर्व नावावर प्रतिनिधी सभेमध्ये सखोल चर्चा झाली. जमाअतच्या  संविधानाप्रमाणे अध्यक्षामध्ये जी गुणवत्ता हवी ती सुचविल्या गेल्या लोकांपैकी कोणामध्ये जास्त आहे. त्यांची बलस्थाने कोणती आहेत इत्यादीवर सखोल चर्चा झाली व त्यानंतर  सआदतुल्ला हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड मजलिसे नुमाईंदगान ने एकमताने 7 एप्रिल रोजी केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्षपद तर सोडा साध्या सदस्यात्वासाठीही जर कोणाची निवड करायची असेल तरी त्याचे चारित्र्य तपासले जाते, त्याचे व्यवहार तपासले जातात व  जमाअतच्या संविधानाच्या कलम 8 आणि 9 प्रमाणे त्याचा दर्जा आहे काय, हे पाहिले जाते. जमाअतचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि काटेकोरपणे केले जातात.

हमारा काम ही दुश्मन से प्यार करना है
जमाने भर को दिया दर्स-ए-दोस्ती हमने
श्रद्धा आणि वर्तनाच्या आधारे जर का माणसांचे वर्गीकरण केले तर साधारणपणे तीन प्रकारची माणसं असतात. एकप्रकार अशा माणसांचा असतो की ज्यांना कुठलीच बंधने मान्य  नसतात. व्यक्ति स्वातंत्र्य हीच त्यांची विचारसरणी असते. प्रत्येक बाबतीत त्यांची स्वतःची अशी मतं असतात. असे लोक प्रचंड बुद्धी प्रामाण्यवादी असतात. कोणताही निर्णय ते  आपल्या बुद्धी प्रमाणे घेतात. त्यांना स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड विश्वास असतो. अशा लोकांना कुठल्याही धर्माची बंधने आवडत नाहीत. स्वतःला एथिस्ट (नास्तीक) म्हणवून घेतांना त्यांना कोण कौतूक वाटतं.
दुसऱ्या प्रकारची माणसे एखाद्या धर्माला जरूर माणतात. परंतु धर्माचरणामध्ये स्वतःच्या बुद्धीलाच प्रमाण माणतात. जी धार्मिक बंधने त्यांच्या बुद्धीला पटतात त्या बंधनाची ते  अंमलबजावणी करतात जी पटत नाहीत त्यांचा ते विरोध करतात. त्यांची स्वतःची अशी जीवनशैली असते. त्यानुसार ते जगत असतात. त्यांच्यात काही प्रमाणात धार्मिकता तर काही प्रमाणात धर्म विरोध दोन्ही असतात. एकंदरित ते धर्माप्रमाणे चालत नाहीत तर धर्माला आपल्या प्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करत असतात.
तीसऱ्या प्रकारचे लोक स्वतःच्या बुद्धीचा अजीबात वापर करत नाहीत तर वाडवडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांना दुसऱ्यांचे अंधानुकरण करतांना काहीच वाईट  वाटत नाही उलट अभिमान वाटतो.
पहिल्या प्रकारची माणसे स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही योग्य नियंत्रण सुद्धा नाकारतात. स्वैराचाराला सुद्धा स्वातंत्र्य समजण्याइतपत काहींनी प्रगती (?) साधलेली असते. त्यांना ही  गोष्टच मान्य नसते की विचार आणि वर्तनाच्या स्वातंत्र्यावर थोडी तरी बंधने असावित. मग अशा प्रकारची माणसं जेव्हा सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा अनियंत्रित होऊन  समाजाला हानी पोहचविण्यास सुरूवात करतात.
जी माणसं प्रत्येक बाबतीत स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, आपल्या विचारांनाच सर्वश्रेष्ठ समजतात व त्यानुसारच आचरण करतात. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीप्रमाणेच सोडविण्याचा आग्रह धरतात. दूसऱ्यांच्या विचारांना काडीची किमत देत नाहीत. अशा माणसांचा असा समज असतो की त्यांना जगातल्या साऱ्या गोष्टी कळतात. त्यांच्या बुद्धीच्या वर  कुठलीच गोष्ट नाहिये. त्यांना प्रत्येक गोष्टींचा बारिक सारिक तपशील, आरंभ आणि अंत सर्व काही माहित आहेत. अशा अविर्भावात ते जगत असतात. आपण कुठल्याही परिस्थितीचे  विश्लेषण करून त्याचे अचूक निदान करू शकतो, यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. आपण धर्मचिकित्सा करू शकतो, त्यातील क्लिष्ट गोष्टी सुद्धा आपणास समजतात. प्रत्येक  मार्गाचा शेवट आपल्याला तसाच माहित आहे जसा त्याचा आरंभ. अशा पद्धतीने जगणाऱ्या माणसांचे विचार जेव्हा त्यांच्या स्वतःच्या धर्मातील कांही संज्ञाशी जुळत नाहीत, तेव्हा असे  लोक त्या संज्ञाच बदलून त्या आपल्या विचारानुरूप करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. कुरआनमध्ये बनी इसराईल नावाच्या ज्या लोकसमुहाचा उल्लेख केलेला आहे ते लोक असे  करण्यात तरबेज होते. कुरआन अशा लोकांना मुनाफिक (पाखंडी) असे म्हणतो. धर्माविरूद्ध बंड करण्याइतपत धाडस त्यांच्यात नसते म्हणून ते धर्मात राहून त्याच्या विरूद्ध आचरण करत असतात.
तिसऱ्या वर्गातील लोक तर बौद्धिकरित्या दिवाळखोर असतात. आपल्या घराण्या किंवा समुदायाच्या चालीरितींची डोळे झाकून अंमलबजावणी करीत असतात. त्यातील उघड हानी सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. पहिल्या दोन वर्गातील लोक किमान बुद्धीचा बरा-वाईट कसा का असेना वापर तरी करत असतात. पण या तिसऱ्या वर्गातील माणसे तर चक्क बुद्धी गहाण  ठेवल्यागत वागत असतात. त्यांच्या एवढे सुद्धा लक्षात येत नाही की भुतकाळातील सर्वच रूढी ह्या योग्य नसतात. आजच्या काळात मोठ्या संख्येने जी माणंसे ज्या प्रमाणे वागत  आहेत ते सुद्धा सगळे योग्यच आहेत, असेही नाही. हंसक्षीर न्यायाने त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टींचा त्याग करावा हे सुद्धा त्यांच्या गावी नसते. यांची सर्वात मोठी चुकी  ही की हे लोक अकलेचा वापरच करत नाहीत.
म्हणजे गंमत पहा, पहिल्या दोन वर्गातील लोक बुद्धीचा क्षमतेपेक्षा अधिक वापर करतात तर तिसऱ्या गटातील लोक तिचा वापरच करत नाहीत. केवळ परंपरांचे अनुकरण करत  असतात. बुद्धीच्या दिवाळखोरीचे यापेक्षा मोठे उदाहरण ते कोणते? असे लोक म्हणत असतात की, आम्ही असे यासाठी वागतो की ही आमची वाडवडीलांपासून चालत आलेली परंपरा  आहे. किंवा असे म्हणतात की अमुक लोकांनी असे वागून प्रगती सधलेली आहे म्हणून आम्ही सुद्धा असेच वागतो. या काळात हे लोक सत्तेवर आहेत म्हणूनच ते योग्य आहेत. म्हणून  आम्ही सुद्धा त्यांच्या सारखेच वागतो. असे समजणे सुद्धा बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होय. त्यांच्याकडे स्वतःचे असे कोणतेच एकक नाही की जे चांगले-वाईट, खरे-खोटे यात फरक करू  शकेल. ते समाजा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कुठल्यातरी घराण्यात जन्मले असते तर त्यावरच ते आपला जीव ओवाळून टाकणार. योगयोगाने त्यांच्या काळात ब्रिटीश सत्तेवर  असतील तर ते ब्रिटिशांप्रमाणे वागणार, चिनी सत्तेवर असतील तर चिन्यांसारखे वागणार व त्यांच्या चालीरितीने श्रेष्ठ समजणार किंवा एखादा आफ्रीकण गट सत्तेवर असेल तर हे  आफ्रिकन चालीरितींना स्वतःच्या साठी श्रेष्ठ समजणार कारण यांचे स्वतःचे असे काही मतच नाही. मुळात कुठल्याही गोष्टीला श्रेष्ठ समजण्यासाठी हा युक्तीवाद होऊच शकत नाही के  ती आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा जगात आजकाल असेच होत आहे. जगात तर यापूर्वी ही फार काही झालेले आहे, आजही होत आहे, म्हणून ते सगळेच  चांगले आहे? असे नाही. आपले काम त्यांचे अंधानुकरण करणे नाही. अल्लाहने बुद्धी यासाठी दिलेली आहे की चांगले आणि वाईट त्यातील फरक माणसाने करावा. हे काम बुद्धी अगदी  चांगल्या प्रकारे करू शकते. कुणामागे जाण्यापूर्वी त्याला चांगल्या प्रकारे पारखून घेणे की तो आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? हे कामही बुद्धि चांगल्या प्रकारे करू शकते.

इस्लामच्या दृष्टीने श्रेष्ठ कोण?
इस्लाम वर नमूद तीन्ही प्रकारच्या माणसांना नाकारतो. पहिल्या वर्गाबद्दल इस्लामचे म्हणणे आहे की या वर्गातील लोक कुणाचेच मार्गदर्शन स्वीकारत नाहीत. त्यांचे असे मत आहे की,  त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते जगातील सर्वच गोष्टी स्वतः च्या बुद्धीच्या बळावर समजू शकतात. त्यांचे उदाहरण अशा लोकांसारखे आहे की जे अंधारामध्ये केवळ अंदाजावरून  चालत आहेत. शक्य आहे की ते, सरळही जाऊ शकतात व हे ही शक्य आहे की ते एखाद्या खड्ड्यात जाऊन पडू शकतात. कारण अंदाजावर मार्गक्रमण करणे कधीही विश्वासार्ह ठरू  शकत नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्यता आहेत. किंबहुना वाईट घडण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,

’’जो लोग खुदा के सिवा दुसरों को खुदाई का हिस्सेदार ठहराते और उनको पुकारते हैं जानते हो वो किस चीज के पैरो हैं? वो सिर्फ गुमान के पैरो हैं और महेज अंदाजे पर चलते हैं.’’ (सुरे युनूस)
जेव्हा कुरआन अवतरित होत होते त्याच काळात बनी इसराईल स्वतःला प्रेषित मुसा अलै. यांना पैगंबर तर तौरातला अल्लाहचा ग्रंथ मानत होते. मात्र त्यांचे वर्तन या दोहोंच्या  विरोधात होते. त्या दोहोंच्याही शिकवणीचा अर्थ त्यांनी आपल्या मर्जी आणि सोयीप्रमाणे लावून ईश्वरीय मार्गदर्शनाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
तिसऱ्या वर्गातील लोकांच्या बाबतीत जे बुद्धिमान असतानाही तिचा उपयोग न करता कोणाचेतरी अनुकरण करतात अशा लोकांना कुरआन खालील शब्दात संबोधतो. ’’ हे बहिरे, मुके  (व) आंधळे आहेत. तेव्हा हे मागे परतणार नाहीत.’’ (सुरे बकरा आयत नं. 18). इस्लाम त्यांना जनावरांपेक्षाही कमी समजतो. कारण जनावरांना तर बुद्धीच नसते. हे लोक तर बुद्धी असूनसुद्धा ती नसल्यासारखे इतरांचे अंधानुकरण करतात. या तिन्ही वर्गातील लोकांची विचारसरणी असंतुलित आहे, असे इस्लामचे म्हणणे आहे. या तीन वर्गाव्यतिरिक्त समाजामध्ये  इस्लाम एक चौथा वर्ग स्थापन करू इच्छितो ज्या वर्गातील लोक संतुलित विचार करणारे, आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करणारे तसेच योग्य मार्गाने जाणारे असतील. आता प्रश्न उत्पन्न होतो की, संतुलित विचार म्हणजे काय? बुद्धीचा संतुलित वापर कशाला म्हणतात? आणि योग्य मार्ग कुठल्या मार्गाला म्हणावे? तर याचे उत्तर असे की, बुद्धी ज्या आणि जितक्या कामासाठी बनविण्यात आलेली आहे, त्या आणि तितक्याच कामासाठी तिचा उपयोग करावा. तिच्यावर अधिक भार टाकला तर ती हँग होते, हे लक्षात घ्यावे. सर्वप्रथम बुद्धिचा  खरा वापर म्हणजे काय, हे ओळखण्यासाठी खालील प्रश्न स्वतः ला विचारावेत. 1. ही सृष्टी कोणी निर्माण केली? 2. ईश्वर एक आहे का अनेक? 3. माणसाला सद्मार्गावर चालण्यासाठी ईश्वरीय मार्गदर्शनाची गरज आहे किंवा नाही? 4. अल्लाह आणि त्याचे प्रेषित (अल्लाह क्षमा करो) खरे आहेत की खोटे? कुरआन  जीवन जगण्याचा जो मार्ग लोकांसमोर मांडतो तो  सरळ आहे का वाकडा?
वरील सर्व प्रश्नांवर सांगोपांग विचार केल्यानंतर जर तुमचे मन साक्ष देईल की, एका ईश्वराला मानने ही बाब तुमच्या प्रवृत्तीत सामील आहे, तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की,  सरळ मार्गाने जीवन जगण्यासाठी एक ईश्वरीय मार्गदर्शनाचा प्रकाश आवश्यक आहे आणि तो प्रकाश वेळोवेळी पृथ्वीच्या अनेक भागात पाठविण्यात आलेल्या पैगंबरांनी आणलेला प्रकाश  होय.
जर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पवित्र जीवन आणि वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर तुमचा असा विश्वास झालेला असेल की, एवढ्या उच्च चारित्र्याच्या माणूस खोटे बोलून जगाला  धोका देणार नाही. त्यांनी अल्लाह एक आहे व स्वतः त्याचे अंतिम प्रेषित असल्याचा जो दावा केलेला आहे तो खोटा असूच शकत नाही. माणसांसाठी योग्य मार्ग हाच आहे. वरील सर्व  प्रश्नांचा वेध घेतांना जी चिकित्सा करावी लागते ती करणे म्हणजेच बुद्धिचा संतुलित वापर करणे होय. एकदा का या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केल्यावर विश्वास बसला की,  मग जगाच्या विरोधाची परवा न करता, कोणाचीही भीती न बाळगता, कुठल्याही हानीची तमा न करता हा मार्ग स्वतःसाठी निवडा व ह्याच मार्गावर आपल्या घरातील इतर सदस्य,  त्यानंतर गल्लीतील लोक, त्यानंतर शहरातील, त्यानंतर राज्यातील, त्यानंतर देशातील व शेवटी जगातील सर्व लोक चालतील, यासाठी यथायोग्य, निरंतर आणि आयुष्यभर प्रयत्न करत रहा. व्यापक मानवकल्याण हाच या जीवन पद्धतीचा हेतू आहे, म्हणून इस्लाममध्ये रंग, रूप, नाते संबंध, भाषा, प्रदेश, वंश याला काडीचे महत्व नसून केवळ श्रद्धेला महत्व आहे.  इस्लाममध्ये सर्वांचा दर्जा समान व सर्वांना समान काम दिलेले आहे. एकदा का प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगासमोर मांडलेल्या एक ईश्वर, एक ग्रंथ, एक प्रेषित या विचारांचा तुम्ही स्विकार केला की, तुमच्या बुद्धीचा अनिर्बंध वापर करण्याचा तुमचा अधिकार संपला. आता तुम्हाला कुरआन आणि हदीस यांच्या चौकटीत राहूनच बुद्धीचा वापर करावा लागेल, त्याबाहेर तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला कोणताही निर्णय, कोणताही निवाडा स्वतःच्या मर्जीने करता येणार नाही. तो तुम्हाला अल्लाहच्या मर्जीनेच व प्रेषित सल्ल. यांच्या पद्धतीनेच करावा  लागेल. त्यावर टिका करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला राहिलेला नाही. आता तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याचा वापर अल्लाहने दिलेल्या आदेशामागील आणि प्रेषितांनी घालून दिलेल्या पद्धतीमागील कार्यकारणभाव शोधण्यासाठीच करता येईल. मात्र तुमच्या बुद्धिला एखाद्या आदेशामागील कार्यकारणभाव उमजला नाही. तरी तुम्हाला त्या आदेशाच्याविरूद्ध जाता येणार  नाही.
एखादा निर्णय तुमच्या हिताच्या विरोधात जरी जात असेल तरी तुम्हाला विरोध करता येणार नाही. तेव्हा असे म्हणता येणार नाही की अल्लाहचा हा आदेश आमच्या घराण्याच्या किंवा आजकालच्या रीतिरिवाजांच्या विरूद्ध आहे. म्हणून याचे पालन मला करता येणार नाही. जो काही विचार करायचा तो इस्लाम स्विकारण्याच्या पूर्वीच करायचा. एकदा का इस्लाम  स्विकारला की अनिर्बंध विचार स्वातंत्र्याचा अधिकार संपतो व शरियतच्या चौकटीत राहूनच विचार करण्याचे बंधन येते. खरे पाहता बुद्धीला सुद्धा हीच गोष्ट पटते की कुठलाही अधिकार  अमर्याद नसावा मग तो विचार स्वातंत्र्याचा का असेना. जीवनाचा हाच मार्ग इस्लाम आहे आणि या मार्गावर चलणारेच मुस्लिम आहेत. आता प्रत्येक मुस्लिमाने ज्यांनी आपले नाव  आणि धर्म जनगणनेमध्ये मुस्लिम आणि इस्लाम लिहिलेला आहे त्यांनी स्वतः स्वतःचा आढावा घ्यावा की, वर नमूद अटी व शर्तींमध्ये किती बसतो? (संदर्भ : जमाअते इस्लामीचे  संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचा तर्जुमानुल कुरआन नोव्हेंबर 1933 मध्ये प्रकाशित ’मुसलमान का हकीकी मफहूम’ या लेखावर आधारित)

एम.आय.शेख
9764000737

हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे निवेदन आहे की प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तरूणांनो! तुमच्यापैकी जो कोणी निकाहच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे सामर्थ्य राखतो, 
त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा नजर खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो. (म्हणजे मानवी नजरेला इतस्तत: फिरविण्यापासून आणि वासनाशक्तीला  बेलगाम होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही, त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधूनमधून रोजे राखावेत. (हदीस : बुखारी,  मुस्लिम)
हजरत अबू हुरैरा कथन करतात की प्रेषित (स.) यांनी सांगितले की, स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो. तिच्या धनसंपत्तीच्या आधारावर, तिच्या वंशिक सभ्यतेच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर, आणि तिच्या दीनधर्माच्या आधारावर. जेव्हा तुम्ही धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्रीला प्राप्त करा, तुमचे भले होवो. (मुत्तफिक अलैया)

भावार्थ
या हदीसवचनाचा अर्थ असा आहे की, स्त्रीच्या संदर्भात चार गोष्टी आढळून येतात. कोणी धनसंपत्ती पाहतो, कोणी वंशप्रतिष्ठेचा विचार करतो, तर कोणी तिच्या रूपसौंदर्यावर भाळून तिच्याशी विवाह करतो. आणि कोणी तिची धर्मपरायणता पाहतो. प्रेषित हजरत मुहम्मद (स.) यांनी समस्त मुस्लिमांना ताकीद केली आहे की खरी गोष्टी जी पाहण्याची आहे ती  म्हणजे स्त्रीचे धार्मिक प्रवृत्ती आणि तिची ईशपरायणता. याखेरीज इतर सर्व गुणवैशिष्ट्ये तिच्यात असतील तर अतिशय उत्तम, पण धार्मिकतेला दृष्टीआड करणे आणि केवळ  धनसंपत्ती, तिचे रूपसौंदर्य, तिचा सामाजिक दर्जा, यांच्याच आधारावर विवाह करणे, हे ईमानधारकाचे काम नव्हे. प्रेषितांनी सांगितले की स्त्रियांशी त्यांच्या सौंदर्यामुळे विवाह करू नका.  संभवत: त्यांचे सौंदर्य त्यांचा सर्वनाश करेल. त्यांच्या धनवान असल्यामुळे त्यांच्याशी विवाह करू नका, शक्य आहे त्यांची धनसंपत्ती त्यांना गर्वोन्नमत्त करून टाकील. किंबहुना  धर्माच्या आधारावर त्यांच्याशी विवाह करा. काळ्या रंगाची दासी जर धर्मपरायण असेल तर ती अल्लाहच्या नजरेत गोऱ्या उच्चकुलीन स्त्रीपेक्षा अधिक चांगली आहे.

हजरत सुफियान सुरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) यांनी आदेश दिला आहे, हे ईमानधारकांनो! अल्लाहचा कोप होण्यापासून आपला बचाव करण्याची पुरेपूर काळजी घ्या.  आणि मरेपर्यंत ईशआदेशांचे पालन करण्यात मग्न राहा. आपल्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून स्वत:चा बचाव करीत राहा. ज्यांनी तुम्हाल एका जिवापासून निर्माण केले आणि  त्यापासून त्याचा जोडा (जीवनसाथी) बनविला. मग त्या दोघांद्वारे अनेक पुरुष व स्त्रिया जगात पसरविले. तेव्हा अशा रचयित्या पालनकर्त्याच्या नाराजीपासून भय बाळगत राहा.  ज्यांच्या नावाने तुम्ही आपापसांत एकमेकांजवळ आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेवाईकांच्या हक्कांचीही जाणीव राखा. लक्षात ठेवा अल्लाह तुमच्यावर देखरेख ठेवणार
आहे.
भावार्थ
हा खुतबा (प्रवचन) आहे जो प्रत्येक निकाहच्या प्रसंगी दिला जातो. इथे त्याचा उल्लेख करण्याचा हेतू हे दर्शविणे आहे की निकाह केवळ आनंदोत्सव नव्हे तर तो एक वचनकरार आहे. तो एक पुरुष आणि स्त्री यांच्या दरम्यान ठरविला जातो की आम्ही दोघे जीवनभरचे साथी आणि सहाय्यक बनलो. हा करार करताना ईश्वव आणि उपस्थित लोक दोघांनाही साक्षीदार  बनविले जाते. निकाहच्या खुतब्याच्या आयती या गोष्टीकडे स्पष्ट इशारा करतात की,जर या वचनकरारारत पती किंवा पत्नीकडून एखादा बिघाड निर्माण केला गेला, आणि त्याचे  यथायोग्य पालन केले गेले नाही, तर अल्लाहचा कोप त्याच्यावर कोसळेल. ते जहान्नुमच्या शिक्षेस पात्र ठरतील.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget