Latest Post

- मुहम्मद फारूक खान
    इस्लाम एक गंभीर विषय आहे मात्र तो मानवतेच्या दृष्टीने अत्यंत सरळ व सुलभ विचार आहे. या पुस्तिकेत इस्लामचे वास्तविक स्वरूप देशवासीयांसमोर माडण्याचा प्रयत्न केला आहे.
    भारतीय धर्म ग्रंथात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा उल्लेख अल्लाहसंबंधी उपनिषदाचे भविष्य कथन, महात्मा बुद्धाचे भविष्य कथन, पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली पुस्तके आणि पवित्र कुरआन सेवेत भारतातील मुस्लिमेतर विद्वानांचा सहभाग इ. विषयावर विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 111   -पृष्ठे - 20     मूल्य - 08           आवृत्ती - 2 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2nctzdwtp5h7w30838duqkewkstf05jv

इस्लाम एकमेव धर्म आहे ज्याला आचरणात आणले जावे. आता इस्लाम हाच एकमेव धर्म आहे ज्याला अल्लाहने मान्यता दिली आहे. अल्लाहने इतर सर्व धर्म रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे सर्व युगांतील, देशांतील लोकांनी इस्लामला आचरणात आणावे. कारण हा धर्म आणि त्याचे प्रेषित समस्त मानवजातीसाठी आहेत. इतर प्रेषितांचे धर्म संपुष्टात आले आहेत. प्रेषित या पृथ्वीवर पाठविण्यात आले याचसाठी की त्यांना ईशप्रेषित मान्य करून त्यांचे आज्ञापालन विनाअट व्हावे. हे सर्वसमक्ष आहे,
‘‘आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे याकरिताच की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.’’ (कुरआन ४: ६४)
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यास अपवाद नाही. वरील तत्त्व सर्व प्रेषितांसाठी आहे. प्रेषित मुहम्मद (स.) हे समस्त मानवजातीसाठी प्रेषित आणि तेसुध्दा अंतिम प्रेषित आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व मानवांची श्रध्दा त्यांच्यावर आहे आणि त्यांचे सर्व अनुयायी आहेत. कोणी त्यांचे प्रेषित्व स्वीकारित नसेल आणि त्यांचे आज्ञापालन (इस्लामचे) करत नसेल तर ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशीच द्रोह करीत नाही तर विश्वनिर्मात्याशी द्रोह करते, ज्याने मुहम्मद (स.) यांना संपूर्ण जगासाठी त्याचा अंतिम प्रेषित आणि मार्गदर्शक म्हणून पाठविले.
कुरआनव्यतिरिक्त आज कोणताही दुसरा ईशग्रंथ सुरक्षित नाही किवा त्याची मूळ भाषा जिवंत भाषा म्हणून आज अस्तित्वात नाही. मग दुसऱ्या ग्रंथाचा विश्वासपूर्वक स्वीकार कसा कराल? ही स्थिती इतर ईशग्रंथ आणि धर्मांना त्याज्य करण्यास बळकटी देते कारण आज ते मूळ स्थितीत नाहीत आणि ते कालबाह्य झालेले आहेत. वरील सर्व विवेचन हे न्यायसंगत आणि सुबुध्दीने घेतलेला निर्णय आहे. आता इस्लामचा स्वतःचा निर्णय काय आहे ते पाहू या.
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
‘‘इस्लामशिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपध्दती) अंगिकारत असेल, त्याची ती पध्दत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो अयशस्वी व विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
वरील दोन्ही आयतींचे शब्द अगदी स्पष्ट आहेत आणि सर्वकाही स्पष्ट करतात. पहिल्या आयतीचा निर्णय ‘‘धर्म अल्लाहजवळ केवळ इस्लाम आहे.’’ हे अगदी स्पष्ट आहे तर दुसऱ्या आयतीचा निर्णय आहे की इस्लामव्यतिरिक्त दुसरा धर्म जर कोणी अंगिकारत असेल तर त्याचा तो धर्म स्वीकृत होणार नाही आणि त्यास अल्लाहची भक्ती म्हणता येणार नाही. यापेक्षा अधिक स्पष्ट निर्णय दुसरा कोणता असू शकतो?
असे समजणे की या दोन आयतींमध्ये इस्लाम हा शब्द साधारण अर्थाने वापरला आहे आणि तो तांत्रिक अर्थाने वापरलेला नाही हे अगदी चुकीचे आहे. साधारण अर्थ म्हणजे सर्व ईशधर्म आणि त्यांचे आज्ञापालन करणे. परंतु हे चूक आहे, कारण कुरआनमध्ये वरील आयतीत (कुरआनवचन) ‘इस्लाम’ नव्हे तर ‘अल्इस्लाम’ हा शब्दप्रयोग आला आहे. अरबी भाषेच्या नियमानुसार, कुरआन जेव्हा ‘अल्इस्लाम’ हा शब्द वापरतो तेव्हा तो साधारण अर्थाने नव्हे तर तांत्रिक अर्थाने (पारिभाषिक) वापरला आहे. अल्लाहजवळ खरा आणि स्वीकार्य धर्म हा आहे की व्यक्तीने अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारावी आणि त्याला पूर्ण शरण जावे. म्हणून अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आल्यानंतर अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता पूर्ण शरणागती ही आहे की व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी आणि त्यांचे आज्ञापालन करावे. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व वैश्विक आणि शाश्वत असे आहे. जर एखाद्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा नसेल किवा त्यांना ती व्यक्ती प्रेषित मान्य करीत असेल, परंतु त्यांचे आज्ञापालन करीत नसेल तर ही अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता होत नाही आणि असे कृत्य अल्लाहचा उघड उघड विरोध ठरते.
इस्लामची आज्ञाधारकता आवश्यक आहे. याचा पुरावा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचरणात मिळतो. हा महत्त्वाचा पुरावा आहे आज्ञाधारकतेचा जी अनिवार्य आहे अन्यथा अशी व्यक्ती घोर अन्यायी आणि आत्मप्रेमप्रवण असते. ही संकल्पना की सर्व धर्म दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय’ आहे. एकीकडे ते इतर प्रेषितांवर श्रध्दा बाळगून अल्लाहवर श्रध्दा ठेवण्याची गरज पूर्ण करतात आणि दुसरीकडे मुहम्मद (स.) यांना अल्लाहचा प्रेषित अमान्य करून ते अल्लाहच्या ईशत्वाला आणि स्वामीत्वाला विरोध करतात. ही मानसिकता ‘अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह’ आहे. कारण ही संकल्पना अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह करण्यासारखे आहे. हे ‘स्व’पुढे लोटांगण घेण्याससारखे आहे. ग्रंथधारक लोकांच्या या वृत्तीबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जे काही अवतरले आहे त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण करतो जे आमच्याकडे (इस्राईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात.’’ (कुरआन २: ९१)
ग्रंथधारक लोक इस्लाम स्वीकार करण्याच्या आमंत्रणाला जे उत्तर देतात ते अधिक लक्ष देऊन पाहिले पाहिजे, हीच ती मानसिकता आहे आणि तत्त्वज्ञान आहे ज्यावर सर्व धर्म समभावचे तत्त्व आधारित आहे. ते युक्तिवाद करतात की आमचा धर्मसुध्दा ईशधर्म आहे, मग हे पूरेसे नाही की आम्ही त्याचे पालन करतो आणि त्यावर आमचा विश्वास आहे? हे असे का आहे की आमच्यावर दुसऱ्याची आज्ञाधारकता आणि अनुयायित्व लादले जात आहे जे आमच्या धर्मासारखेच सत्य धर्म आहे? अशा आमच्यासारख्याच धर्मावर आम्हाला श्रध्दा ठेवण्यास सांगितले का जात आहे? त्यांचे हे तत्त्वज्ञान अल्लाहने खोटे ठरविले, ज्यात त्यांच्या धर्मासारखेच इतर धर्मांना ते मानतात. अल्लाहने त्यांना (अशा ग्रंथधारकांना) ‘पक्के अश्रध्दावंत’ म्हणून घोषित केले आहे. ग्रंथधारक लोकांनी इस्लामचा स्वीकार करण्यास नकार देणे हे कुरआनच्या दृष्टिकोनातून अश्रध्दावंतांसारखे कृत्य आहे. दोघांचे दुष्परिणाम एकसारखेच आहेत. अल्लाहला त्यांच्या त्या धर्म आणि श्रध्देला चिकटून राहाणे मान्य नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘मूसा (अ.) जिवंत असते तर त्यांच्यापुढे माझे अनुयायित्व स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.’’ (मिश्कात)
वरील प्रेषितांचे कथन अगदी स्पष्ट आहे. जर इतर प्रेषित हे सर्वजण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जिवंत असते तर सर्वांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचेच अनुयायित्व पत्करले असते. त्यांना त्यांच्या धर्मांवर आचरण करण्याचा पर्याय शिल्लक राहिला नसता. अशा स्थितीत सर्वसामान्य माणसाला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञाधारकतेपासून सूट कशी देता येईल? प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित इस्लामच्या उपस्थितीत इतर धर्मांवर आचरण करणे कसे शक्य आहे?
इस्लाम मुक्तीसाठी आवश्यक: दुसरा महत्त्वाचा परिणाम या वैशिष्टपूर्ण गुणाचा हा आहे की पारलौकिक जीवनातील मुक्ती इस्लामवर अवलंबून आहे. प्रत्येकावर इस्लामचे आचरण करणे बंधनकारक आहे आणि इतर धर्म हे अल्लाहजवळ मान्य नाही आणि स्वीकार्यसुद्धा नाहीत. याचाच अर्थ असा आहे की इस्लाममध्येच मुक्ती आहे. आता आपण पाहू या की अल्लाह त्या लोकांना जे इतर धर्म पाळतात त्यांना अल्लाह अमान्य करत आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्म जो कोणी अंगिकारत असेल तर तो धर्म कदापि स्वीकारला जाणार नाही.’’ (कुरआन ३: ८५)
‘‘मरणोत्तर जीवनात तो अयशस्वी आणि विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वरील कुरआनोक्तींना स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘अल्लाहची शपथ, ज्याच्या हातात मुहम्मद (स.) यांचा जीव आहे ज्या कोणाजवळ माझ्या प्रेषित्वाचा संदेश पोहचेल, मग तो यहुदी असो की ख्रिश्चन, जर त्यांनी माझा संदेश स्वीकार केला नाही तर तो नरकाग्नीचा भक्ष ठरेल.’’
वरील हदीसमध्ये यहुदी आणि ख्रिश्चनांचे नाव उदाहरणाखातर घेण्यात आले आहे. वरील संदेश समस्त मानवजातीसाठी आहे हे अगदी स्पष्ट आहे. कोणताही समाज, कोणत्याही देशाला अथवा धार्मिक गटाला या संदेशापासून सुटका नाही.
हा फक्त अनुमान नाही तर स्पष्ट आणि उघड सत्य आहे, ‘‘जो कोणी मानवी समाजाची व्यक्ती.’’ अर्थातच याचा अर्थ इस्लामकडे आमंत्रिक लोक असा आहे. हा तो लोकसमुदाय आहे ज्यात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अल्लाहने प्रेषित म्हणून पाठविले आहे. येथे समस्त मानवजातीचा उल्लेख आला आहे. म्हणून हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी. प्रत्येकजण मग तो हयात असेल अथवा पुढील पिढ्यांमध्ये जन्माला येत असेल. म्हणून हा निर्णय इतर सर्वांप्रमाणेच यहुदी आणि ख्रिश्चनांनासुध्दा सारखाच लागू आहे. जगातील समस्त मानवजातीं पैकी यहुदी आणि ख्रिश्चनांनाच कुरआनने ‘ग्रंथधारक लोक’ म्हणून संबोधले आहे. त्यांनाच फक्त प्रेषितांचे अनुयायी आणि ईशधर्माचे अनुयायी म्हणून संबोधले गेले आहे. ज्याप्रमाणे मुक्तीसाठी ग्रंथधारकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आज्ञाधारक बनणे आवश्यक आहे. तितकेच इतर लोकांसाठीसुध्दा आवश्यक आहे. म्हणून आज्ञाधारकता ही इस्लामची अनिवार्यता आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. ज्या माणसाला इस्लामचा संदेश मिळाला नाही त्यालाच या नियमातून वगळण्यात येईल.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविषयी उल्लेख केला आहे, ‘‘जो कोणी मला ऐकले नसेल.’’
ही व्यवस्था यासाठी आहे की अशा स्थितीत एखादा निरपराध असतो. जोपर्यंत मनुष्य इस्लामचा संदेश प्राप्त करत नाही तोपर्यंत तो आज्ञाधारकतेपासून मुक्त असतो. अशा स्थितीत प्रत्येकाला जबाबदार धरणे हा घोर अन्याय आहे. परंतु ज्याला हा संदेश प्राप्त होऊनसुध्दा त्याने इस्लामवर श्रध्दा ठेवली नाही तर त्यास तो जबाबदार असेल. अशांना शिक्षेविना सोडून देणे न्यायविरोधी कृत्य ठरेल, कारण इस्लामची आज्ञाधारकता स्वीकारण्यास नकार देणे ही काही किरकोळ बाब नाही. सत्य धर्माला स्वीकारण्याला हा त्याचा नकार आहे. हे अल्लाहच्या सार्वभौमत्वाला नाकारणे आहे. अशा द्रोहींना शिक्षा देणे हे अन्यायकारक आणि गैरकृत्य ठरविणे हे सत्याचे विडंबन आहे. अशा बादशाहाची आपण कल्पना करू शकतो की तो आपल्या प्रजेला पूर्ण स्वातंत्र्य देतो की त्याने आज्ञापालन करू नये, त्याच्या सेनापतिचे ऐकू नये आणि ज्यांना बादशाहने काढून टाकले अशांचे आज्ञापालन करावे आणि अशा धर्माचे आज्ञापालन करीत जावे जो राजधर्म नाही? हे अगदी अशक्य आहे. मग हे कसे शक्य आहे की निर्माणकर्त्या स्वामीने तुम्हाला शिक्षा करू नये जेव्हा तुम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांना नाकारता ज्यास अल्लाहने समस्त मानवतेसाठी पाठविले आहे? त्याचा धर्म ज्यास त्या ईश्वराने समस्त मानवतेसाठी मान्य केला, त्याला तुम्ही नाकारल्यानंतर तो ईश्वर तुम्हाला जाब का म्हणून विचारणार नाही? हे किती हास्यास्पद आहे की अल्लाहने ‘अ’ या व्यक्तीला प्रेषित म्हणून समस्त मानवजातींसाठी नियुक्त करावे की त्या प्रेषितांने सर्वांना मार्गदर्शन करावे. परंतु लोकांनी दुसऱ्या कुणाला या कामासाठी स्वतः नियुक्त करावे. हे किती हास्यास्पद आणि विचित्र आहे. जर कुणाचे हे अज्ञान असेल की त्यास ‘अ’ हे अल्लाहचे अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित आहे हे माहीत नाही. परंतु ज्यांना हे माहीत आहे की ईश्वराचा अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित कोण आहे तरी ते आपल्या मनोकामनांचेच बळी ठरतात? त्यांचे हे कृत्य क्षम्य कसे ठरवता येईल?

कुरआनमधील आले इमरान या अध्यायात आयत क्र. 26 मध्ये म्हटले आहे की, ’वतु इज़्ज़ुमनत्तशाऊ वतू ज़िल्लूमनत्तशाऊ’ अर्थात सन्मान आणि अपमान दोन्ही अल्लाहकडूनच  आहेत. सदरची आयत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित झाली ती प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शक आहे. याचा अर्थ समजून घेणे प्रत्येक व्यक्तीसाठी  आवश्यक आहे. या आयातीचा अर्थ लावताना कुरआनच्या अनेक भाष्यकारांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे या आयातीचा उद्देश पुण्यवान लोकांना  अधिक पुण्याची कामे करण्यासाठी प्रेरित करणे आहे.
माणूस जेवढा जास्त नीतिमान होतो आणि पुण्याची कामं करतो तेवढाच तो अल्लाहच्या पसंतीला उतरतो आणि त्या बदल्यात त्याला जगामध्ये सन्मान आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतात.  पुण्याची कामे केल्याने सन्मान आणि प्रसिद्धी विनासायास यासाठी मिळते की, त्या कामामुळे सामान्य जनांना त्याचा सरळ लाभ होतो आणि सामान्य माणसं मग पुण्यवान माणसांची  कदर करू लागतात, त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नाव लोकांच्या तोंडात राहते आणि लोकालोकी त्यांच्या पुण्यकर्माची प्रसिद्धी उत्तरोत्तर वाढत जाते.
जगामध्ये काही असे लोकही आहेत जे स्वार्थी, घमंडी आणि सदैव प्रसिद्धीस हपापलेले असतात. त्यांना येनकेन प्रकारेन स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची आणि काहीही करून प्रसिद्धी  मिळवायची इच्छा असते. अशा लोकांना सुद्धा या आयातीमध्ये चेतावनी दिलेली आहे की, तुम्ही कितीजरी प्रयत्न केला तरी जोपर्यंत अल्लाह सन्मान आणि प्रसिद्धी प्रदान करणार नाही  तोपर्यंत तुम्हाला ती प्राप्त होणार नाही. सर्वसाधारणपणे पुण्य न करता प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या लोकांनी आपल्या मनाशी एक खूनगाठ बांधलेली असते की, प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही  स्वतःच्या प्रयत्नांनी अर्जित करता येतात. अनेक लोक बोलूनसुद्धा दाखवितात की, ही प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आम्ही स्वकष्टाने अर्जित केलेली आहे. मात्र ती कमावतांना ते अनैतिक मार्गाचा सुद्धा अवलंब करत असतात. ज्यावेळेस असे लोक अनैतिक मार्गाचा अवलंब करतात तर अल्लाह त्यांना मोहलत (संधी) देत असतो. मात्र काही लोक या संधी मागील ईश्वरीय  मन्सुब्याला ओळखू शकत नाहीत आणि आपल्याच भ्रमात फार पुढे निघून जातात. अशा लोकांना प्रसिद्धी आणि सन्मान दोन्ही मिळतात पण त्यातील फोलपणा त्यांना कळत नाही. अशा लोकांना मिळालेली प्रसिद्धी ही नकारात्मक असते आणि सन्मान हा फक्त तोंडावर केला जातो. पाठ फिरताच लोक वाईट बोलू लागतात. कारण ज्या पद्धतीने खोटे बोलून, चोरी   करून, फसवणूक करून, अप्रामाणिकपणे असे लोक धन, सन्मान आणि प्रसिद्धी मिळवत असतात त्याबद्दल जनतेला खडा न् खडा माहिती असते. केवळ ते तोंडावर बोलून दाखवत  नाहीत एवढेच. या वाईट गोष्टींबरोबर केली जाणारी प्रगती ही खरी प्रगती नसते. कारण या सगळ्या गोष्टी अल्लाहला नापसंत असून, त्याचा रोष ओढवून घेण्यासाठी पुरेशा आहेत.  अल्लाह आपल्या प्रत्येक बंद्याकडे पाहत असतो. त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्माकडे पाहत असतो. ज्याला ज्या पद्धतीने प्रसिद्धी आणि प्रगती हवी असते तो त्याला त्याच पद्धतीने  पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करत असतो. जर वाम मार्गाने सन्मान आणि प्रगती मिळविणारे लोक वेळीच सावधान झाले आणि त्यांनी तौबा केली व वाईट मार्गाचा त्याग करून सन्मार्गाला लागले तर अल्लाह त्यांना क्षमा करतो. मात्र प्रगती आणि प्रसिद्धीच्या नशेमध्ये ती खेचून आणण्याकडेच ज्या लोकांचा कल असतो ते संधी मिळूनही सावध होत नाहीत, असे  लोक जेव्हा एका मर्यादेपेक्षा जास्त पुढे जातात तेव्हा अल्लाह त्यांना त्यांची जागा सुद्धा दाखवून देण्यास मागे पुढे पाहत नाही. हाच या आयातीचा खरा अर्थ आहे.
म्हणजेच अल्लाह ज्याला सन्मान आणि प्रगती देऊ इच्छितो त्यांना ती देतो आणि ज्यांना देऊ इच्छित नाही त्यांना ती बिल्कूल देत नाही. तो अल्लाहच आहे ज्याने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आपलीही रचना त्यानेच केलेली आहे आणि तोच पूजनीय आहे.
अनेक लोक खोट्या सन्मान आणि प्रसिद्धीच्या मागे आयुष्यभर पळत असतात. आजकाल स्वस्थ प्रसिद्धी आणि खोटा सन्मान प्राप्त करण्यामध्ये लोक एकमेकांशी स्पर्धा  करीत आहेत  आणि हीच लालसा त्यांना वाममार्गाकडे घेऊन जात आहे. पण प्रसिद्धीच्या नशेमध्ये झिंगलेल्या या लोकांना आपण काही वाईट करत आहोत, हेच लक्षात येत नाही, असे लोक चांगल्या  लोकांचा दुस्वास करतात, त्यांची इर्शा करतात. अनीतिने कमाविलेल्या पैशाच्या जोरावर सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात.
त्याच वेळेस दूसरे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अल्लाहने सांगितलेल्या मार्गावर चालून कठीण परिश्रम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. खऱ्याने वागत असतात.  इतरांची मदत करतात. मग अल्लाह त्यांना त्याच मार्गामध्ये बरकत अता करतो. ज्यामुळे अशा लोकांची प्रगती आणि सन्मान जनतेमध्ये उत्तरोत्तर वाढत जातो. मात्र यामध्ये  कोणताही नकारात्मक पैलू नसतो.
या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते की, प्रसिद्धी आणि प्रगती एका गटाला अल्लाहकडून पुरस्कार स्वरूपात मिळत असते तर दूसरा  गट ती स्वतःच्या बळावर खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतो. अशा लोकांना अल्लाह सन्मार्गावर चालण्याची समज देओ आणि जी प्रगती आणि सन्मान अल्लाहकडून मिळतो त्या  पुण्यवान लोकांची तशीच प्रगती होवो. (आमीन.)

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget