इस्लाम एकमेव धर्म आहे ज्याला आचरणात आणले जावे. आता इस्लाम हाच एकमेव
धर्म आहे ज्याला अल्लाहने मान्यता दिली आहे. अल्लाहने इतर सर्व धर्म
रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे सर्व युगांतील, देशांतील लोकांनी इस्लामला
आचरणात आणावे. कारण हा धर्म आणि त्याचे प्रेषित समस्त मानवजातीसाठी आहेत.
इतर प्रेषितांचे धर्म संपुष्टात आले आहेत. प्रेषित या पृथ्वीवर पाठविण्यात
आले याचसाठी की त्यांना ईशप्रेषित मान्य करून त्यांचे आज्ञापालन विनाअट
व्हावे. हे सर्वसमक्ष आहे,
‘‘आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे याकरिताच की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.’’ (कुरआन ४: ६४)
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यास अपवाद नाही. वरील तत्त्व सर्व
प्रेषितांसाठी आहे. प्रेषित मुहम्मद (स.) हे समस्त मानवजातीसाठी प्रेषित
आणि तेसुध्दा अंतिम प्रेषित आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व मानवांची
श्रध्दा त्यांच्यावर आहे आणि त्यांचे सर्व अनुयायी आहेत. कोणी त्यांचे
प्रेषित्व स्वीकारित नसेल आणि त्यांचे आज्ञापालन (इस्लामचे) करत नसेल तर ती
व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशीच द्रोह करीत नाही तर
विश्वनिर्मात्याशी द्रोह करते, ज्याने मुहम्मद (स.) यांना संपूर्ण जगासाठी
त्याचा अंतिम प्रेषित आणि मार्गदर्शक म्हणून पाठविले.
कुरआनव्यतिरिक्त आज कोणताही दुसरा ईशग्रंथ सुरक्षित नाही किवा त्याची
मूळ भाषा जिवंत भाषा म्हणून आज अस्तित्वात नाही. मग दुसऱ्या ग्रंथाचा
विश्वासपूर्वक स्वीकार कसा कराल? ही स्थिती इतर ईशग्रंथ आणि धर्मांना
त्याज्य करण्यास बळकटी देते कारण आज ते मूळ स्थितीत नाहीत आणि ते कालबाह्य
झालेले आहेत. वरील सर्व विवेचन हे न्यायसंगत आणि सुबुध्दीने घेतलेला
निर्णय आहे. आता इस्लामचा स्वतःचा निर्णय काय आहे ते पाहू या.
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
‘‘इस्लामशिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपध्दती) अंगिकारत असेल,
त्याची ती पध्दत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो
अयशस्वी व विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
वरील दोन्ही आयतींचे शब्द अगदी स्पष्ट आहेत आणि सर्वकाही स्पष्ट करतात.
पहिल्या आयतीचा निर्णय ‘‘धर्म अल्लाहजवळ केवळ इस्लाम आहे.’’ हे अगदी
स्पष्ट आहे तर दुसऱ्या आयतीचा निर्णय आहे की इस्लामव्यतिरिक्त दुसरा धर्म
जर कोणी अंगिकारत असेल तर त्याचा तो धर्म स्वीकृत होणार नाही आणि त्यास
अल्लाहची भक्ती म्हणता येणार नाही. यापेक्षा अधिक स्पष्ट निर्णय दुसरा
कोणता असू शकतो?
असे समजणे की या दोन आयतींमध्ये इस्लाम हा शब्द साधारण अर्थाने वापरला
आहे आणि तो तांत्रिक अर्थाने वापरलेला नाही हे अगदी चुकीचे आहे. साधारण
अर्थ म्हणजे सर्व ईशधर्म आणि त्यांचे आज्ञापालन करणे. परंतु हे चूक आहे,
कारण कुरआनमध्ये वरील आयतीत (कुरआनवचन) ‘इस्लाम’ नव्हे तर ‘अल्इस्लाम’ हा
शब्दप्रयोग आला आहे. अरबी भाषेच्या नियमानुसार, कुरआन जेव्हा ‘अल्इस्लाम’
हा शब्द वापरतो तेव्हा तो साधारण अर्थाने नव्हे तर तांत्रिक अर्थाने
(पारिभाषिक) वापरला आहे. अल्लाहजवळ खरा आणि स्वीकार्य धर्म हा आहे की
व्यक्तीने अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारावी आणि त्याला पूर्ण शरण
जावे. म्हणून अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आल्यानंतर अल्लाहची पूर्ण
आज्ञाधारकता पूर्ण शरणागती ही आहे की व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.)
यांच्यावर श्रध्दा ठेवावी आणि त्यांचे आज्ञापालन करावे. अल्लाहने
कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व
वैश्विक आणि शाश्वत असे आहे. जर एखाद्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर
श्रध्दा नसेल किवा त्यांना ती व्यक्ती प्रेषित मान्य करीत असेल, परंतु
त्यांचे आज्ञापालन करीत नसेल तर ही अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता होत नाही
आणि असे कृत्य अल्लाहचा उघड उघड विरोध ठरते.
इस्लामची आज्ञाधारकता आवश्यक आहे. याचा पुरावा प्रेषित मुहम्मद (स.)
यांच्या आचरणात मिळतो. हा महत्त्वाचा पुरावा आहे आज्ञाधारकतेचा जी अनिवार्य
आहे अन्यथा अशी व्यक्ती घोर अन्यायी आणि आत्मप्रेमप्रवण असते. ही
संकल्पना की सर्व धर्म दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय’ आहे.
एकीकडे ते इतर प्रेषितांवर श्रध्दा बाळगून अल्लाहवर श्रध्दा ठेवण्याची गरज
पूर्ण करतात आणि दुसरीकडे मुहम्मद (स.) यांना अल्लाहचा प्रेषित अमान्य
करून ते अल्लाहच्या ईशत्वाला आणि स्वामीत्वाला विरोध करतात. ही मानसिकता
‘अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह’ आहे. कारण ही संकल्पना अल्लाह
आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह करण्यासारखे आहे. हे ‘स्व’पुढे लोटांगण
घेण्याससारखे आहे. ग्रंथधारक लोकांच्या या वृत्तीबद्दल कुरआन स्पष्टोक्ती
आहे,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जे काही अवतरले आहे
त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण
करतो जे आमच्याकडे (इस्राईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे
काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात.’’ (कुरआन २: ९१)
ग्रंथधारक लोक इस्लाम स्वीकार करण्याच्या आमंत्रणाला जे उत्तर देतात ते
अधिक लक्ष देऊन पाहिले पाहिजे, हीच ती मानसिकता आहे आणि तत्त्वज्ञान आहे
ज्यावर सर्व धर्म समभावचे तत्त्व आधारित आहे. ते युक्तिवाद करतात की आमचा
धर्मसुध्दा ईशधर्म आहे, मग हे पूरेसे नाही की आम्ही त्याचे पालन करतो आणि
त्यावर आमचा विश्वास आहे? हे असे का आहे की आमच्यावर दुसऱ्याची आज्ञाधारकता
आणि अनुयायित्व लादले जात आहे जे आमच्या धर्मासारखेच सत्य धर्म आहे? अशा
आमच्यासारख्याच धर्मावर आम्हाला श्रध्दा ठेवण्यास सांगितले का जात आहे?
त्यांचे हे तत्त्वज्ञान अल्लाहने खोटे ठरविले, ज्यात त्यांच्या धर्मासारखेच
इतर धर्मांना ते मानतात. अल्लाहने त्यांना (अशा ग्रंथधारकांना) ‘पक्के
अश्रध्दावंत’ म्हणून घोषित केले आहे. ग्रंथधारक लोकांनी इस्लामचा स्वीकार
करण्यास नकार देणे हे कुरआनच्या दृष्टिकोनातून अश्रध्दावंतांसारखे कृत्य
आहे. दोघांचे दुष्परिणाम एकसारखेच आहेत. अल्लाहला त्यांच्या त्या धर्म आणि
श्रध्देला चिकटून राहाणे मान्य नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘मूसा (अ.) जिवंत असते तर त्यांच्यापुढे माझे अनुयायित्व स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.’’ (मिश्कात)
वरील प्रेषितांचे कथन अगदी स्पष्ट आहे. जर इतर प्रेषित हे सर्वजण
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जिवंत असते तर सर्वांनी प्रेषित
मुहम्मद (स.) यांचेच अनुयायित्व पत्करले असते. त्यांना त्यांच्या धर्मांवर
आचरण करण्याचा पर्याय शिल्लक राहिला नसता. अशा स्थितीत सर्वसामान्य
माणसाला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञाधारकतेपासून सूट कशी देता
येईल? प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित इस्लामच्या उपस्थितीत इतर
धर्मांवर आचरण करणे कसे शक्य आहे?
इस्लाम मुक्तीसाठी आवश्यक: दुसरा महत्त्वाचा परिणाम या
वैशिष्टपूर्ण गुणाचा हा आहे की पारलौकिक जीवनातील मुक्ती इस्लामवर अवलंबून
आहे. प्रत्येकावर इस्लामचे आचरण करणे बंधनकारक आहे आणि इतर धर्म हे
अल्लाहजवळ मान्य नाही आणि स्वीकार्यसुद्धा नाहीत. याचाच अर्थ असा आहे की
इस्लाममध्येच मुक्ती आहे. आता आपण पाहू या की अल्लाह त्या लोकांना जे इतर
धर्म पाळतात त्यांना अल्लाह अमान्य करत आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्म जो कोणी अंगिकारत असेल तर तो धर्म कदापि स्वीकारला जाणार नाही.’’ (कुरआन ३: ८५)
‘‘मरणोत्तर जीवनात तो अयशस्वी आणि विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वरील कुरआनोक्तींना स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘अल्लाहची शपथ, ज्याच्या हातात मुहम्मद (स.) यांचा जीव आहे ज्या
कोणाजवळ माझ्या प्रेषित्वाचा संदेश पोहचेल, मग तो यहुदी असो की ख्रिश्चन,
जर त्यांनी माझा संदेश स्वीकार केला नाही तर तो नरकाग्नीचा भक्ष ठरेल.’’
वरील हदीसमध्ये यहुदी आणि ख्रिश्चनांचे नाव उदाहरणाखातर घेण्यात आले
आहे. वरील संदेश समस्त मानवजातीसाठी आहे हे अगदी स्पष्ट आहे. कोणताही समाज,
कोणत्याही देशाला अथवा धार्मिक गटाला या संदेशापासून सुटका नाही.
हा फक्त अनुमान नाही तर स्पष्ट आणि उघड सत्य आहे, ‘‘जो कोणी मानवी
समाजाची व्यक्ती.’’ अर्थातच याचा अर्थ इस्लामकडे आमंत्रिक लोक असा आहे. हा
तो लोकसमुदाय आहे ज्यात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अल्लाहने प्रेषित
म्हणून पाठविले आहे. येथे समस्त मानवजातीचा उल्लेख आला आहे. म्हणून हे
प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा
ठेवावी. प्रत्येकजण मग तो हयात असेल अथवा पुढील पिढ्यांमध्ये जन्माला येत
असेल. म्हणून हा निर्णय इतर सर्वांप्रमाणेच यहुदी आणि ख्रिश्चनांनासुध्दा
सारखाच लागू आहे. जगातील समस्त मानवजातीं पैकी यहुदी आणि ख्रिश्चनांनाच
कुरआनने ‘ग्रंथधारक लोक’ म्हणून संबोधले आहे. त्यांनाच फक्त प्रेषितांचे
अनुयायी आणि ईशधर्माचे अनुयायी म्हणून संबोधले गेले आहे. ज्याप्रमाणे
मुक्तीसाठी ग्रंथधारकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आज्ञाधारक बनणे
आवश्यक आहे. तितकेच इतर लोकांसाठीसुध्दा आवश्यक आहे. म्हणून आज्ञाधारकता ही
इस्लामची अनिवार्यता आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. ज्या माणसाला
इस्लामचा संदेश मिळाला नाही त्यालाच या नियमातून वगळण्यात येईल.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविषयी उल्लेख केला आहे,
‘‘जो कोणी मला ऐकले नसेल.’’
ही व्यवस्था यासाठी आहे की अशा स्थितीत एखादा निरपराध असतो. जोपर्यंत
मनुष्य इस्लामचा संदेश प्राप्त करत नाही तोपर्यंत तो आज्ञाधारकतेपासून
मुक्त असतो. अशा स्थितीत प्रत्येकाला जबाबदार धरणे हा घोर अन्याय आहे.
परंतु ज्याला हा संदेश प्राप्त होऊनसुध्दा त्याने इस्लामवर श्रध्दा ठेवली
नाही तर त्यास तो जबाबदार असेल. अशांना शिक्षेविना सोडून देणे न्यायविरोधी
कृत्य ठरेल, कारण इस्लामची आज्ञाधारकता स्वीकारण्यास नकार देणे ही काही
किरकोळ बाब नाही. सत्य धर्माला स्वीकारण्याला हा त्याचा नकार आहे. हे
अल्लाहच्या सार्वभौमत्वाला नाकारणे आहे. अशा द्रोहींना शिक्षा देणे हे
अन्यायकारक आणि गैरकृत्य ठरविणे हे सत्याचे विडंबन आहे. अशा बादशाहाची आपण
कल्पना करू शकतो की तो आपल्या प्रजेला पूर्ण स्वातंत्र्य देतो की त्याने
आज्ञापालन करू नये, त्याच्या सेनापतिचे ऐकू नये आणि ज्यांना बादशाहने काढून
टाकले अशांचे आज्ञापालन करावे आणि अशा धर्माचे आज्ञापालन करीत जावे जो
राजधर्म नाही? हे अगदी अशक्य आहे. मग हे कसे शक्य आहे की निर्माणकर्त्या
स्वामीने तुम्हाला शिक्षा करू नये जेव्हा तुम्ही प्रेषित मुहम्मद (स.)
यांना नाकारता ज्यास अल्लाहने समस्त मानवतेसाठी पाठविले आहे? त्याचा धर्म
ज्यास त्या ईश्वराने समस्त मानवतेसाठी मान्य केला, त्याला तुम्ही
नाकारल्यानंतर तो ईश्वर तुम्हाला जाब का म्हणून विचारणार नाही? हे किती
हास्यास्पद आहे की अल्लाहने ‘अ’ या व्यक्तीला प्रेषित म्हणून समस्त
मानवजातींसाठी नियुक्त करावे की त्या प्रेषितांने सर्वांना मार्गदर्शन
करावे. परंतु लोकांनी दुसऱ्या कुणाला या कामासाठी स्वतः नियुक्त करावे. हे
किती हास्यास्पद आणि विचित्र आहे. जर कुणाचे हे अज्ञान असेल की त्यास ‘अ’
हे अल्लाहचे अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित आहे हे माहीत नाही. परंतु
ज्यांना हे माहीत आहे की ईश्वराचा अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित कोण आहे
तरी ते आपल्या मनोकामनांचेच बळी ठरतात? त्यांचे हे कृत्य क्षम्य कसे ठरवता
येईल?