Latest Post

रमजान पर्वाच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा...! रमजान तो पवित्र महिना आहे ज्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आहे. हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि  कसोटी आहे सत्य आणि असत्यातील. कुरआन मानवनिर्मित नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे कुरआनचे लेखक नाहीत. कुरआन साक्षात ईशवाणी आहे. कुरआनचा मध्यवर्ती विषय मनुष्य  आहे. कुरआनची भूमिका व त्याचे मार्गदर्शन समस्त मानवजातीसाठी आहे. रमजान या महिन्याला दोन महत्त्वाच्या कारणांमुळे पावित्र्य प्राप्त आहे. एक म्हणजे रोजा आणि दुसरे  म्हणजे पवित्र कुरआनचे अवतरण. हाच तो महिना आहे ज्यात सृष्टीनिर्मात्या अल्लाहने कुरआनद्वारा मानवतेसाठी परिपूर्ण आणि शोशत असे मार्गदर्शन उपलब्ध करून संपूर्ण  मानवतेवर कृपा केली. म्हणूनच जगभरातील श्रद्धावंत या महिन्यात रोजा ठेवतात. रोजाविषयी पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट उल्लेख आला आहे. की, ’’हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर रमजान  महिन्याचे रोजे (उपवास) अनिवार्य केले आहेत, जसे पूर्वीच्या लोकांवर केले गेले होते. अपेक्षा आहे की तुम्ही ईशपरायणता धारण कराल.’’
या आयातीवरून स्पष्ट होते की रोजा हे काही कर्मकांड नाही की रुढी-परंपरा नाही. तर रोजा एका महान उद्देशप्राप्तीसाठी आहे. माणसाला माणुसपण देण्याचे, त्याला चारित्र्यवान  बनविण्याचे तसेच त्याचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे महान कार्य रोजा दरवर्षी करतो. नीतीमत्ता ही आपल्या देशाची निकड बनली आहे. एक भयानक पोकळी मानवाच्या जीवनात  निर्माण झाली आहे. हा रोजा या पोकळीला भरून काढण्याचे सामर्थ्य राखून आहे. पवित्र कुरआनचे अवतरण समस्त मानवांसाठी आहे. स्त्री असो की पुरुष, कोणा विशिष्ट  लोकसमुदायासाठी किंवा एका वर्गासाठी नव्हे किंवा राष्ट्रासाठी नव्हे, तर हे अखिल मानवजातीसाठी अवतरण केले गेले. तसेच यातील शिकवण केवळ उपासना, नमाज, रोजा अशा  धार्मिक विधींपर्यंतच मर्यादित नसून त्यात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्राविषयीच्या बाबी, आचारविचार, वागणूक, आपसातील व्यवहार, युद्ध, शांतता, शासन, प्रशासन, राज्यव्यवस्था,  आर्थिक जीवन, सामाजिक जीवन, वगैरे सर्वांविषयी शिकवण आहे. पवित्र कुरआन हा अल्लाहने आपले संदेशवाहक जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.)  यांच्यावर अवतरित केले. त्याची सुरूवात इ. स. 610 मध्ये मक्का शहरापासून दूर एका गुहेत झाली. सर्वांत पहिली वही (आयात) सुरह अलक च्या काही आयती होत्या. ’’वाचा (हे  पैगंबर स.) आपल्या पालनकर्त्याच्या नावासहीत ज्याने गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा आणि तुमचा पालनकर्ता मोठा वैभवशाली आहे.’’ (कुरआन,  96:1-3)
कुरआनचे अवतरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर एकाच वेळी झालेले नाही. ते गरजेनुसार एकूण 22 वर्षे 5 महिने 40 दिवसांत पूर्ण झाले. कुरआनात 114 अध्याय (सूरह) मिळून 30 भाग (पारे) पाडण्यात आले आहेत. यात 540 रुकुअ (विसावे) आहेत. कुरआनचे पठण (ऐकताना किंवा करताना) यातील 14 ठिकाणी सजदा करणे म्हणजे ईेशरासमोर नतमस्तक होणे अनिवार्य आहे. संपूर्ण कुरआनात 77234 शब्द व 333760 अक्षरे आहेत. 6666 आयती आहेत. पवित्र कुरआनच्या बाबतीत स्वत: ईेशर (अल्लाह) सांगतो,’’आम्ही यास कद्रच्या  रात्री पाठविले आणि तुम्हाला काय माहीत कद्रची रात्र काय आहे? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानुसार ही रात्र रमजान महिन्याच्या  शेवटच्या दहा दिवसांपैकी एक रात्र आहे. जसे बारा महिन्यांत रमजान हा पवित्र महिना मानला जातो तसे रमजान महिन्यातील शेवटच्या दहा रात्रींमधून एक पवित्र रात्र आहे. कुरआन  ईेशराचा दोर आहे अर्थात जे याच्या नियमाला धरून जीवन व्यतीत करतील ते जग व परलोकात यशस्वी होतील. या संदर्भात तिबरानींची एक हदीस (प्रेषित वाणी) आहे की एकेदिवशी  प्रेषित मुहम्मद (स.) एका मस्जिदमध्ये गेले. त्यांनी पाहिले की काही सहाबी (प्रेषितांचे साथीदार) मस्जिदमध्ये एका कोपऱ्यात बसून एकमेकांना कुरआन समजावून सांगत होते. हे  पाहून प्रेषितांचा चेहरा आनंदी झाला. प्रेषित त्यांच्या जवळ गेले आणि विचारले की ’’तुम्ही म्हणता की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही, मी अल्लाहचा प्रेषित आहे आणि  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे?’’ साहबांनी उत्तर दिले, ’’हे प्रेषित! होय, आम्ही ग्वाही देतो की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही आणि तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात व  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे.’’ मग प्रेषित म्हणाले, ’’तुमच्यावर कृपा असो अल्लाहची. मी असा विेशास देतो की कुरआन अल्लाहचा दोर आहे. ज्याला धरून तुम्ही स्वर्गापर्यंत पोहचाल,  ज्याचे एक टोक धरतीवर तुमच्याजवळ आणि दुसरे टोक आकाशात अल्लाहजवळ आहे.’’

- नाजीम खान
9763869930

रोजा हे अनेक कारणामुळे इस्लामच्या खऱ्या स्वरुपाचे द्योतक आहे. कुरआनने धर्माची स्पष्ट केलेली कल्पना ही रोजा मध्ये सर्वांगांने स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणींच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देते. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. याबद्दलचे स्पष्टीकरण खालील प्रेषितकथनाने अधिक स्पष्ट होते.
‘‘जी व्यक्ती आयुष्यभर रोजे ठेवते अशा व्यक्तीचे रोजे निरर्थक आहेत.’’ (बुखारी)
‘‘तुम्हाला दोन किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे सततचे रोजे ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’ (मुस्लिम)
एकदा प्रवासात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी लोकांची गर्दी एका व्यक्तीभोवती पाहिली. विचारपूस केल्यानंतर कळले की तो प्रवासी रोजादार आहे. प्रेषित म्हणाले, ‘‘प्रवासात रोजा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अपरिमित कष्ट झेलावे लागतात.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा सोबती (र.) जो मदिनाबाहेर राहत होता तो एकदा त्यांच्याजवळ आला आणि भेट झाल्यानंतर निघून गेला. एक वर्षानंतर तो पुन्हा आला या वेळी तो फार दुबळा झाला होता. तो ओळखूसुध्दा आला नाही. प्रेषितांनी त्याला विचारले, ‘‘काय झाले आहे, मागील वर्षी तू चांगला सदृढ होता.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मी वर्षभर दिवसातून एकदाच जेवण घेत असे (रोजा ठेवत असे).’’ हे ऐकल्यानंतर प्रेषित म्हणाले, ‘‘तू स्वतः ला का कष्ट दिले?’’ (अबू दाऊद)
आपण वरील प्रेषितकथनांचा विचार केला तर हे सिध्द होते की रोजामुळे ईशपरायणतेचा क्रांतीकारक अर्थ निघत आहे. ईशपरायणता रोजाचा मूळ हेतु आहे. रोजामध्ये ‘स्व’चा नाश होत नाही. तर ‘स्व’वर नियंत्रण राहते. दुसऱ्या शब्दांत ईशपरायणतेबरोबर त्याची मौलिकता आणि महत्त्वसुध्दा रोजादार जाणून घेतो. समजून उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच ‘स्व’च्या मागणीला रोखून धरणे म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येते. ती ‘स्व’च्या मागणीचा अतिरेकसुध्दा होऊ देत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४१)
ईशपरायणता मनाला स्वैर सोडून कधीच प्राप्त होत नाही. रोजा दिव्य अवतरणानुसार त्या ‘स्व’वर नियंत्रण ठेवतो व त्याला सैरावैरा पळू देत नाही. याचा अर्थ ‘स्व’ला मारून टाकणे असा मुळीच नाही. दुसऱ्या धर्मात ‘स्व’ला अतिकष्ट देऊन आणि मनोकामनांचे दमन करून नष्ट करणे अतिउच्च दर्जाचे पुण्य समजले जाते. इस्लामला हा अतिरेक मुळीच मान्य नाही. इस्लामनुसार हे पुण्य नाही तर पाप आणि अत्याचार आहे. रोजा तुम्हाला या सत्यतेची आठवण नेहमी करून देतो. काही संबंधित प्रेषितकथने आपण येथे पाहू या.
1. ‘‘पहाटे सहेरी (जेवण) करा रोजा सुरू करण्यापूर्वी हे एक लाभकारक कृत्य आहे. - मुस्लिम
2. लोक रोजा सोडण्यासाठी वेळेत घाई करतील तेवढे त्यांना पुण्य लाभेल.’’ - मुस्लिम
3. ‘‘लोक जोपर्यंत रोजा सोडण्यात वेळेवर घाई करत राहतील तोपर्यंत हा धर्म वर्चस्व स्थापित करून राहील.’’ - अबू दाऊद
4. ‘‘अल्लाह स्पष्ट करतो की माझा प्रिय दास तो आहे जो वेळेत रोजा सोडण्यासाठी घाई करतो.’’ -तिरमिजी
अशा प्रकारे वरील प्रेषितकथनानुसार रोजाचे महत्त्व स्पष्ट होते. ईशपरायणता म्हणजे ‘स्व’चे दमन अथवा नाश नव्हे तर स्वयंनियंत्रण होय. हे स्वयंनियंत्रण दृष्टिकोनाची शिस्तबध्दता आणि आवडीनिवडीची शिस्तबध्दता दर्शविते. ‘स्व’ला दिव्यप्रकटन अथवा ईश्वरेच्छेला प्रत्यक्ष व्यवहारात कार्यान्वित करणे. असे करताना स्वतःच्या आवडीनिवडींना, इच्छांना कुठेही थारा न देणे ईशपरायणतेला अपेक्षित आहे. अल्लाहची प्रसन्नताप्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणे पुरेशे नाहीत तर त्याबरोबर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वतःच्या इच्छेनुसार न वागणे आवश्यक आहे. अल्लाहची उपासना- इबादत करणे म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकथित ईश्वरांना नाकारणे आणि अल्लाहचे एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणे या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणे आणि ईशपरायण जीवन जगणे म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. ज्यांना न करण्याचा आदेश दिला आहे त्यांना नाकारणे आणि ज्यांच्यासाठी परवानगी दिली आहे त्या गोष्टी आचरणात आणणे हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करुन देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वतःची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन कंठत राहणे ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृध्दिगंत करणे आहे. एकीकडे रोजा ठेवण्याच्या व्यक्तीला पहाटे जेवण सेहरी करण्याची कडक ताकीद दिली आहे. सेहरी न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करु शकत नाही, तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधीसुध्दा कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब याला श्रध्देत कमतरता म्हटले गेले आहे. ही दोन्ही कृत्ये ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. ‘स्व’वर नियंत्रण अशा कृत्यामुळे होते. यामुळे रोजाचा हेतूसुध्दा साध्य होण्यास मदतच होते. ही दोन्ही प्रकारची ताकीद स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा मार्ग बंद करते. स्वतःच्या इच्छेनुसार आवडीनुसार तर रोजाचे योग्यरित्या पालन होऊच शकत नाही. रोजा ठेवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ न पाळता आपल्या मनाप्रमाणे करणे हे स्वार्थी वृत्तीचे लक्षण आहे. हे तर खरे धर्मात स्वतःची ढवळाढवळ करण्यासारखे आहे. असे जर असेल तर रोजामुळे स्वयंनियत्रंण होते हे म्हणणेच चुकीचे ठरते. मर्यादांचे उल्लंघन करणे याचसाठी निषिध्द आहे. या सर्व बाबींचा आपण विचार केला तर कळून येते की रोजाला इस्लामचा आधारस्तंभ का म्हणून संबोधले आहे आणि इस्लामची इमारत या अधारस्तंभाअभावी का म्हणून अपूर्ण राहते हेसुध्दा आपणास कळून येते.

- मुहम्मद फारूक खान
    इस्लाम एक गंभीर विषय आहे मात्र तो मानवतेच्या दृष्टीने अत्यंत सरळ व सुलभ विचार आहे. या पुस्तिकेत इस्लामचे वास्तविक स्वरूप देशवासीयांसमोर माडण्याचा प्रयत्न केला आहे.
    भारतीय धर्म ग्रंथात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा उल्लेख अल्लाहसंबंधी उपनिषदाचे भविष्य कथन, महात्मा बुद्धाचे भविष्य कथन, पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली पुस्तके आणि पवित्र कुरआन सेवेत भारतातील मुस्लिमेतर विद्वानांचा सहभाग इ. विषयावर विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 111   -पृष्ठे - 20     मूल्य - 08           आवृत्ती - 2 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2nctzdwtp5h7w30838duqkewkstf05jv

इस्लाम एकमेव धर्म आहे ज्याला आचरणात आणले जावे. आता इस्लाम हाच एकमेव धर्म आहे ज्याला अल्लाहने मान्यता दिली आहे. अल्लाहने इतर सर्व धर्म रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे सर्व युगांतील, देशांतील लोकांनी इस्लामला आचरणात आणावे. कारण हा धर्म आणि त्याचे प्रेषित समस्त मानवजातीसाठी आहेत. इतर प्रेषितांचे धर्म संपुष्टात आले आहेत. प्रेषित या पृथ्वीवर पाठविण्यात आले याचसाठी की त्यांना ईशप्रेषित मान्य करून त्यांचे आज्ञापालन विनाअट व्हावे. हे सर्वसमक्ष आहे,
‘‘आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे याकरिताच की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.’’ (कुरआन ४: ६४)
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यास अपवाद नाही. वरील तत्त्व सर्व प्रेषितांसाठी आहे. प्रेषित मुहम्मद (स.) हे समस्त मानवजातीसाठी प्रेषित आणि तेसुध्दा अंतिम प्रेषित आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व मानवांची श्रध्दा त्यांच्यावर आहे आणि त्यांचे सर्व अनुयायी आहेत. कोणी त्यांचे प्रेषित्व स्वीकारित नसेल आणि त्यांचे आज्ञापालन (इस्लामचे) करत नसेल तर ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशीच द्रोह करीत नाही तर विश्वनिर्मात्याशी द्रोह करते, ज्याने मुहम्मद (स.) यांना संपूर्ण जगासाठी त्याचा अंतिम प्रेषित आणि मार्गदर्शक म्हणून पाठविले.
कुरआनव्यतिरिक्त आज कोणताही दुसरा ईशग्रंथ सुरक्षित नाही किवा त्याची मूळ भाषा जिवंत भाषा म्हणून आज अस्तित्वात नाही. मग दुसऱ्या ग्रंथाचा विश्वासपूर्वक स्वीकार कसा कराल? ही स्थिती इतर ईशग्रंथ आणि धर्मांना त्याज्य करण्यास बळकटी देते कारण आज ते मूळ स्थितीत नाहीत आणि ते कालबाह्य झालेले आहेत. वरील सर्व विवेचन हे न्यायसंगत आणि सुबुध्दीने घेतलेला निर्णय आहे. आता इस्लामचा स्वतःचा निर्णय काय आहे ते पाहू या.
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
‘‘इस्लामशिवाय जो कोणी अन्य एखादा धर्म (जीवनपध्दती) अंगिकारत असेल, त्याची ती पध्दत कदापि स्वीकारली जाणार नाही व मरणोत्तर जीवनामध्ये तो अयशस्वी व विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
वरील दोन्ही आयतींचे शब्द अगदी स्पष्ट आहेत आणि सर्वकाही स्पष्ट करतात. पहिल्या आयतीचा निर्णय ‘‘धर्म अल्लाहजवळ केवळ इस्लाम आहे.’’ हे अगदी स्पष्ट आहे तर दुसऱ्या आयतीचा निर्णय आहे की इस्लामव्यतिरिक्त दुसरा धर्म जर कोणी अंगिकारत असेल तर त्याचा तो धर्म स्वीकृत होणार नाही आणि त्यास अल्लाहची भक्ती म्हणता येणार नाही. यापेक्षा अधिक स्पष्ट निर्णय दुसरा कोणता असू शकतो?
असे समजणे की या दोन आयतींमध्ये इस्लाम हा शब्द साधारण अर्थाने वापरला आहे आणि तो तांत्रिक अर्थाने वापरलेला नाही हे अगदी चुकीचे आहे. साधारण अर्थ म्हणजे सर्व ईशधर्म आणि त्यांचे आज्ञापालन करणे. परंतु हे चूक आहे, कारण कुरआनमध्ये वरील आयतीत (कुरआनवचन) ‘इस्लाम’ नव्हे तर ‘अल्इस्लाम’ हा शब्दप्रयोग आला आहे. अरबी भाषेच्या नियमानुसार, कुरआन जेव्हा ‘अल्इस्लाम’ हा शब्द वापरतो तेव्हा तो साधारण अर्थाने नव्हे तर तांत्रिक अर्थाने (पारिभाषिक) वापरला आहे. अल्लाहजवळ खरा आणि स्वीकार्य धर्म हा आहे की व्यक्तीने अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता स्वीकारावी आणि त्याला पूर्ण शरण जावे. म्हणून अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आल्यानंतर अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता पूर्ण शरणागती ही आहे की व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी आणि त्यांचे आज्ञापालन करावे. अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व वैश्विक आणि शाश्वत असे आहे. जर एखाद्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा नसेल किवा त्यांना ती व्यक्ती प्रेषित मान्य करीत असेल, परंतु त्यांचे आज्ञापालन करीत नसेल तर ही अल्लाहची पूर्ण आज्ञाधारकता होत नाही आणि असे कृत्य अल्लाहचा उघड उघड विरोध ठरते.
इस्लामची आज्ञाधारकता आवश्यक आहे. याचा पुरावा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचरणात मिळतो. हा महत्त्वाचा पुरावा आहे आज्ञाधारकतेचा जी अनिवार्य आहे अन्यथा अशी व्यक्ती घोर अन्यायी आणि आत्मप्रेमप्रवण असते. ही संकल्पना की सर्व धर्म दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय’ आहे. एकीकडे ते इतर प्रेषितांवर श्रध्दा बाळगून अल्लाहवर श्रध्दा ठेवण्याची गरज पूर्ण करतात आणि दुसरीकडे मुहम्मद (स.) यांना अल्लाहचा प्रेषित अमान्य करून ते अल्लाहच्या ईशत्वाला आणि स्वामीत्वाला विरोध करतात. ही मानसिकता ‘अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह’ आहे. कारण ही संकल्पना अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांशी द्रोह करण्यासारखे आहे. हे ‘स्व’पुढे लोटांगण घेण्याससारखे आहे. ग्रंथधारक लोकांच्या या वृत्तीबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जे काही अवतरले आहे त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात, आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण करतो जे आमच्याकडे (इस्राईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात.’’ (कुरआन २: ९१)
ग्रंथधारक लोक इस्लाम स्वीकार करण्याच्या आमंत्रणाला जे उत्तर देतात ते अधिक लक्ष देऊन पाहिले पाहिजे, हीच ती मानसिकता आहे आणि तत्त्वज्ञान आहे ज्यावर सर्व धर्म समभावचे तत्त्व आधारित आहे. ते युक्तिवाद करतात की आमचा धर्मसुध्दा ईशधर्म आहे, मग हे पूरेसे नाही की आम्ही त्याचे पालन करतो आणि त्यावर आमचा विश्वास आहे? हे असे का आहे की आमच्यावर दुसऱ्याची आज्ञाधारकता आणि अनुयायित्व लादले जात आहे जे आमच्या धर्मासारखेच सत्य धर्म आहे? अशा आमच्यासारख्याच धर्मावर आम्हाला श्रध्दा ठेवण्यास सांगितले का जात आहे? त्यांचे हे तत्त्वज्ञान अल्लाहने खोटे ठरविले, ज्यात त्यांच्या धर्मासारखेच इतर धर्मांना ते मानतात. अल्लाहने त्यांना (अशा ग्रंथधारकांना) ‘पक्के अश्रध्दावंत’ म्हणून घोषित केले आहे. ग्रंथधारक लोकांनी इस्लामचा स्वीकार करण्यास नकार देणे हे कुरआनच्या दृष्टिकोनातून अश्रध्दावंतांसारखे कृत्य आहे. दोघांचे दुष्परिणाम एकसारखेच आहेत. अल्लाहला त्यांच्या त्या धर्म आणि श्रध्देला चिकटून राहाणे मान्य नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘मूसा (अ.) जिवंत असते तर त्यांच्यापुढे माझे अनुयायित्व स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.’’ (मिश्कात)
वरील प्रेषितांचे कथन अगदी स्पष्ट आहे. जर इतर प्रेषित हे सर्वजण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जिवंत असते तर सर्वांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचेच अनुयायित्व पत्करले असते. त्यांना त्यांच्या धर्मांवर आचरण करण्याचा पर्याय शिल्लक राहिला नसता. अशा स्थितीत सर्वसामान्य माणसाला प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञाधारकतेपासून सूट कशी देता येईल? प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित इस्लामच्या उपस्थितीत इतर धर्मांवर आचरण करणे कसे शक्य आहे?
इस्लाम मुक्तीसाठी आवश्यक: दुसरा महत्त्वाचा परिणाम या वैशिष्टपूर्ण गुणाचा हा आहे की पारलौकिक जीवनातील मुक्ती इस्लामवर अवलंबून आहे. प्रत्येकावर इस्लामचे आचरण करणे बंधनकारक आहे आणि इतर धर्म हे अल्लाहजवळ मान्य नाही आणि स्वीकार्यसुद्धा नाहीत. याचाच अर्थ असा आहे की इस्लाममध्येच मुक्ती आहे. आता आपण पाहू या की अल्लाह त्या लोकांना जे इतर धर्म पाळतात त्यांना अल्लाह अमान्य करत आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इस्लामव्यतिरिक्त अन्य धर्म जो कोणी अंगिकारत असेल तर तो धर्म कदापि स्वीकारला जाणार नाही.’’ (कुरआन ३: ८५)
‘‘मरणोत्तर जीवनात तो अयशस्वी आणि विफल होईल.’’ (कुरआन ३: ८५)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वरील कुरआनोक्तींना स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘अल्लाहची शपथ, ज्याच्या हातात मुहम्मद (स.) यांचा जीव आहे ज्या कोणाजवळ माझ्या प्रेषित्वाचा संदेश पोहचेल, मग तो यहुदी असो की ख्रिश्चन, जर त्यांनी माझा संदेश स्वीकार केला नाही तर तो नरकाग्नीचा भक्ष ठरेल.’’
वरील हदीसमध्ये यहुदी आणि ख्रिश्चनांचे नाव उदाहरणाखातर घेण्यात आले आहे. वरील संदेश समस्त मानवजातीसाठी आहे हे अगदी स्पष्ट आहे. कोणताही समाज, कोणत्याही देशाला अथवा धार्मिक गटाला या संदेशापासून सुटका नाही.
हा फक्त अनुमान नाही तर स्पष्ट आणि उघड सत्य आहे, ‘‘जो कोणी मानवी समाजाची व्यक्ती.’’ अर्थातच याचा अर्थ इस्लामकडे आमंत्रिक लोक असा आहे. हा तो लोकसमुदाय आहे ज्यात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अल्लाहने प्रेषित म्हणून पाठविले आहे. येथे समस्त मानवजातीचा उल्लेख आला आहे. म्हणून हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर श्रध्दा ठेवावी. प्रत्येकजण मग तो हयात असेल अथवा पुढील पिढ्यांमध्ये जन्माला येत असेल. म्हणून हा निर्णय इतर सर्वांप्रमाणेच यहुदी आणि ख्रिश्चनांनासुध्दा सारखाच लागू आहे. जगातील समस्त मानवजातीं पैकी यहुदी आणि ख्रिश्चनांनाच कुरआनने ‘ग्रंथधारक लोक’ म्हणून संबोधले आहे. त्यांनाच फक्त प्रेषितांचे अनुयायी आणि ईशधर्माचे अनुयायी म्हणून संबोधले गेले आहे. ज्याप्रमाणे मुक्तीसाठी ग्रंथधारकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आज्ञाधारक बनणे आवश्यक आहे. तितकेच इतर लोकांसाठीसुध्दा आवश्यक आहे. म्हणून आज्ञाधारकता ही इस्लामची अनिवार्यता आहे मुक्ती प्राप्त करण्यासाठी. ज्या माणसाला इस्लामचा संदेश मिळाला नाही त्यालाच या नियमातून वगळण्यात येईल.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविषयी उल्लेख केला आहे, ‘‘जो कोणी मला ऐकले नसेल.’’
ही व्यवस्था यासाठी आहे की अशा स्थितीत एखादा निरपराध असतो. जोपर्यंत मनुष्य इस्लामचा संदेश प्राप्त करत नाही तोपर्यंत तो आज्ञाधारकतेपासून मुक्त असतो. अशा स्थितीत प्रत्येकाला जबाबदार धरणे हा घोर अन्याय आहे. परंतु ज्याला हा संदेश प्राप्त होऊनसुध्दा त्याने इस्लामवर श्रध्दा ठेवली नाही तर त्यास तो जबाबदार असेल. अशांना शिक्षेविना सोडून देणे न्यायविरोधी कृत्य ठरेल, कारण इस्लामची आज्ञाधारकता स्वीकारण्यास नकार देणे ही काही किरकोळ बाब नाही. सत्य धर्माला स्वीकारण्याला हा त्याचा नकार आहे. हे अल्लाहच्या सार्वभौमत्वाला नाकारणे आहे. अशा द्रोहींना शिक्षा देणे हे अन्यायकारक आणि गैरकृत्य ठरविणे हे सत्याचे विडंबन आहे. अशा बादशाहाची आपण कल्पना करू शकतो की तो आपल्या प्रजेला पूर्ण स्वातंत्र्य देतो की त्याने आज्ञापालन करू नये, त्याच्या सेनापतिचे ऐकू नये आणि ज्यांना बादशाहने काढून टाकले अशांचे आज्ञापालन करावे आणि अशा धर्माचे आज्ञापालन करीत जावे जो राजधर्म नाही? हे अगदी अशक्य आहे. मग हे कसे शक्य आहे की निर्माणकर्त्या स्वामीने तुम्हाला शिक्षा करू नये जेव्हा तुम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांना नाकारता ज्यास अल्लाहने समस्त मानवतेसाठी पाठविले आहे? त्याचा धर्म ज्यास त्या ईश्वराने समस्त मानवतेसाठी मान्य केला, त्याला तुम्ही नाकारल्यानंतर तो ईश्वर तुम्हाला जाब का म्हणून विचारणार नाही? हे किती हास्यास्पद आहे की अल्लाहने ‘अ’ या व्यक्तीला प्रेषित म्हणून समस्त मानवजातींसाठी नियुक्त करावे की त्या प्रेषितांने सर्वांना मार्गदर्शन करावे. परंतु लोकांनी दुसऱ्या कुणाला या कामासाठी स्वतः नियुक्त करावे. हे किती हास्यास्पद आणि विचित्र आहे. जर कुणाचे हे अज्ञान असेल की त्यास ‘अ’ हे अल्लाहचे अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित आहे हे माहीत नाही. परंतु ज्यांना हे माहीत आहे की ईश्वराचा अधिकृत प्रतिनिधी आणि प्रेषित कोण आहे तरी ते आपल्या मनोकामनांचेच बळी ठरतात? त्यांचे हे कृत्य क्षम्य कसे ठरवता येईल?

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget