Latest Post

मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) याचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या काकांना संबोधन करून सांगितले, ‘‘हे काकावर्य! मी लोकांशी केवळ कलम्याची (अर्थात  एकेश्वरवाद स्विकार करण्याची) मागणी करतो. हा कलमा (धर्मसूत्र) असा आहे की, लोकांना याचा स्विकार केल्यास पूर्ण अरबदेश तुमच्या अधिपत्याखाली येईल आणि अरबेतर लोक  त्यांना जिझिया (नागरीक कर) देतील. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकीत झालेत व म्हणाले, ‘‘तुमच्या पितावर्याची शपथ! असे असल्यास तुमच्या एका नव्हे, तब्बल दहा ‘कलम्यांचा’  आम्ही स्विकार करू. आम्हांला सांगा की तो कलमा कोणता आहे? अबू तालिब (प्रेषितांचे काका) यांनी पण विचारले की, हे पुतण्या! तो कलमा कोणता आहे? यावर प्रेषितांनी (स.)  सांगितले, ‘‘तो कलमा, ‘‘ला-इलाहा इल्लल्लाह आहे.’’ (हदीस : मस्नद अहमद, निसाई)

भावार्थ
कलमा-ए-तौहीद (एकाच ईश्वराच्या उपासनेचे सूत्र) ‘ला इलाहा इल्लल्लाह’ केवळ एक धर्मसूत्र नसून पूर्ण एकेश्वरवादी व्यवस्था आहे, जे माननीय जीवनाच्या संपूर्ण व्यवहारांशी व संपूर्ण बाबींशी संबंधीत आहे. केवळ नमाज व रोजा पर्यंतच मर्यादित नसून, या कलम्याच्या आधारावर राजकीय व्यवस्था प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. जर हे वास्तव नसते तर प्रेषित ह.  मुहम्मद (स.) यांनी याचा हा अर्थ स्पष्ट केलाच नसता की, ‘‘अरब देश तुमच्या अधिपत्याखाली येईल व अरबेतर लोक तुम्हांस जिझिया (कर) देतील, प्रे. मुहम्मद (स.) यांनी अशावेळी  ही चर्चा केली जेव्हा अरबमधील कुरैश कबील्याचे नेतेगण, आपले प्रमूख सरदार ‘अबू तालीब’ (प्रेषितांचे काका) यांच्याकडे, त्यांचे पुतणे ह. मुहम्मद (स.) यांची तक्रार घेऊन आले होते  की, अबू तालीब यांनी आपले वजन वापरून, दबाव घालून प्रेषितांचे इस्लाम प्रचार कार्य थांबवावे. प्रेषितांनी आपले काका, अबू तालीब यांना सांगितले की, हे काकावर्य! माझ्या उजव्या  हातात सूर्य व डाव्या हातात चंद्र आणून दिले तरी मी इस्लामचे प्रचार कार्य बंद करणार नाही. इथपावेतो ईश्वर यास प्रस्थापित करो अथवा याच अवस्थेत मला मृत्यू येवो. इस्लाम  दर्शनाचा वास्तविक अर्थ असाच आहे व दिव्य कुरआनमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा शब्दप्रयोग झाला आहे, तिथे केवळ ‘राजकीय वर्चस्वच’ अभिप्रेत आहे.

ह. अब्बाज (र.) कडून कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इस्लामची गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म (व्यवस्था) मानून, आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून, आनंदीत झाला. (हदीस : बुखारी व मुस्लीम)

भावार्थ
सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञा पालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्रनियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित (स.) यांच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ट आहे. त्याचा फैसला आहे की, मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम  जीवनधर्मावर चालायचे आहे. आणि प्रेषित (स.) यांच्या खेरीज कोणत्याही माणसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन पार पाडायचे नाही. ज्या माणसाची अशी अवस्था होईल तेव्हा समजून घ्या  की त्याने इमानची गोडी प्राप्त केली.

मा. अबु अमाया (र.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘ज्याने अल्लाहकरीता दोस्ती केली आणि अल्लाहकरीता दुश्मनी (शत्रूता) केली आणि अल्लाहकरीता दिले आणि  अल्लाहकरीता रोखून ठेवले, त्याने आपल्या इमानास (श्रद्धेस) परिपूर्ण केले. (हदीस : बुखारी)

भावार्थ
माणसाचे प्रेमभाव अथवा वैरभाव आपल्या व्यक्तिगत गरजेपोटी आणि ऐहीक लाभासाठी नसावे तर केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच असावे. ही अवस्था म्हणजे त्याचे इमान परिपूर्ण झाले.

पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लामच्या प्रगटनाच्या वेळी समाजामधील अनिष्ठ रूढी, परंम्परा, अनेकेश्वरवादी, अंधश्रद्धा, मूर्तिपूजेच्या विरोधात कार्य करीत असताना प्रचंड वाईट  प्रतिक्रिया समाजात व्यक्त होत होत्या आणि त्यावर मात करीत असताना मोठा त्रास पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांना झाला. पण त्यांनी धर्माचे कार्य सोडले नाही. या कार्यात अनेक लोकांनी सहभाग नोंदविला व ते कार्य चालू ठेवले. या कार्यात पुरूषांप्रमाणेच स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. शहीददेखील अनेक झाले. अम्मारची आई सुमैय्या (रजि.) इस्लामच्या  कार्यात शहीद होणाऱ्यांत प्रथमस्थानी होत्या. मागील विवरणावरून हे ध्यानी येते की धार्मिक कार्यात पुरूषांच्या बरोबर स्त्रियांचेही योगदान आहे.
कोणत्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी जसे प्राणवायूची गरज असते तसे धर्माच्या कार्यात उपासनेला स्थान आहे. म्हणजे आपण जसे प्राणवायूशिवाय जिवंत राहू शकत नाही तसे  उपासनेशिवाय धर्माची उभारणी होत नाही आणि धर्म टिकावही धरत नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची आचारसंहिता आणि याच आचारसंहितेचे पालन करणे म्हणजे धर्माची ईश्वराची  उपासना करणे होय. प्रामाणिकपणे ईश्वराची केलेली उपासना ही ईश्वराच्या जवळ नेते. ईश्वराची उपासना जर निष्काळजीपणे खंडितपणे, केव्हातरी (सवडीनुसार) केल्यास ईश्वर आणि  भक्त यांच्यातील संबंध निर्बल होतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सर्वच्या सर्व पत्नी ईश्वराची प्रामाणिकपणे उपासना करणाऱ्यांमध्ये उल्लेखनीय आहेत. प्रत्येक स्त्री व पुरूषाने ईश्वराचे  भय बाळगून त्याची आराधना-उपासना केली पाहिजे. उपासनेत नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. नमाज अदा करताना काही नियम काटेकोरपणे पाळले जावेत. उदा. नमाज  निश्चित वेळेतच पढली जावी. आपली नमाज अवेळी होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तो पुरूष असेल अथवा स्त्री. जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये स्त्रियांनी सामील झालेच  पाहिजे असे बंधन नाही. त्यांनी आपल्या सोयीनुसार घरी नमाज अदा करावी. नमाज सामुदायिक पठणावर जे लाभ होतात, ते एकट्याने नमाज अदा केल्याने होत नाहीत. म्हणून   स्त्रियांना जमाअतसह नमाज अदा करण्यापासून वंचित ठेवलेले नाही म्हणजेच स्त्रिया सामुदायिक नमाजसाठी मस्जिदमध्ये जाऊ शकतात. आज स्त्रियांच्या मस्जिदमध्ये येण्या- जाण्याबाबत प्रचंड संदेह निर्माण झाले आहेत, ते केवळ धार्मिक ज्ञानाच्या अभावाने.
मस्जिदमध्ये जाण्यासाठी जर परिस्थिती अनुकूल असेल व कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल तर स्त्रिया जाऊ शकतात. कोणताही पुरूष मग तो पिता, पती, पुत्र कोणीही असो तो  आपली मुलगी, पत्नी, आई कोणालाही मशिदमध्ये जाण्यास परवानगी मागितली तर तिला मनाई करू शकत नाही म्हणून काही मशिदमध्ये स्त्रियांसाठी काही जागा राखीव ठेवली आहे.  एवढेच नाही तर नमाज संपल्यावर स्त्रियांनी मशिदबाहेर अगोदर पडावे व नंतर पुरूषांनी बाहेर यावे. स्त्रियांना मशिदमध्ये येण्यास काहीही हरकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यांनी  (सवलतीसाठी) नमाज घरीच अदा करणे जास्त उत्तम, असेही कथन आहे. एवढेच नाही तर पैगंबरांनी विशेष नामस्मरणाचादेखील उपदेश केला आहे. उदा. दिवसभर काम-धंदा, नोकरी,  कष्ट, मेहनत, कार्य करून रात्री थकवा आलेला असतो, तेव्हा आपण 33 वेळा ’सुबहानल्ला’, 33 वेळा अलहम्दुलिल्लाह व 34 वेळा अल्लाहु अकबर हा जप जपून नामस्मरण करा.   त्याचबरोबर दैनंदिन जीवन जगताना जेव्हा एखादी सुंदर, चांगली, सुरेख, उत्तम वस्तू वा बाब निदर्शनास आली तर मुखातून ’सुबहानल्लाह’ उच्चारून कृतज्ञता व्यक्त करा. अर्थात हे  सर्व निर्माण करणारा ईश्वर यापेक्षा कितीतरी चांगला आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, कितीतरी चांगली आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, विहंगम  दिसली तर आपण ’अल्लाहु अकबर’ उच्चारून हे सर्व निर्माण करणारा याच्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे की कृतज्ञता व्यक्त करावी, तीही समस्त स्त्री-पुरूषांनी. ईश्वराच्या या उपासनेने  व्यक्तीच्या बळात व कार्यशक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होते व आपल्यामध्ये चांगुलपणा आपोआप निर्माण होतो. या नामस्मरणावर विश्वास ठेवला तर अल्लाह आपले रक्षण करतो,  म्हणून व्यक्तीने मग ईश्वराचे स्तवन कितीही केले तरी ते कमीच आहे.
इस्लाममध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजा म्हणजे केवळ अन्नपाण्याशिवाय विशिष्ठ कालावधीपर्यंत उपाशीपोटी राहणे नाही तर शरीराच्या असंख्य अवयवांचाही रोजा  असतो. उदा. जीभ, डोळे, हात, कान, पाय, नाक अशा अनेक अवयवांचा रोजा असतो. वाईट बोलू नये, कोणाची चहाडी-चुगली करू नये, शिव्या-शाप देऊ नये, हा जिभेचा रोजा आहे.   डोळ्यांनी वाईट कृत्य पाहू नये, तर कानांनी चांगलेच ऐकावे, हाताने परोपकाराचे कार्य करावे, लाचलुचपत घेणे-देणे करू नये. असे अनेक प्रकारचे रोजे आहेत. त्याविषयी आपणास  सविस्तर ज्ञात आहेच. रोजा वर्षाच्या बारापैकी एक पवित्र महिना ’रमजान’मध्ये पकडला जातो. रोजा सर्वांना (स्त्री-पुरूष) अनिवार्य आहे. रोजा केवळ ईश्वराची आराधना म्हणून पकडला  जात नाही तर वर्षातील उर्वरित अकरा महिने (रमजान वगळून) समाजात आपण कसे जगावे याचे प्रशिक्षण आहे. इस्लामने सदाचारी जीवन जगण्यासाठी वर्षातून एकदा एक महिन्याची  रोजारूपी परीक्षा ठेवी आहे. प्रत्येक स्त्री-पुरूष जाणते झाल्यापासून रोजा अनिवार्य आहे. या उपवासात फक्त आणि फक्त गरोदर महिलेस सूट आहे. तसेच एखादी वयस्कर स्त्री असेल  आणि तिच्यात रोजा धरण्याएवढीही ताकद नसेल तर मात्र त्यापासून तिला सूट मिळू शकते. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरूष) जर ऐन रमजान महिना चालू असताना आजारी पडली व  ती रोजे नाही धरू शकली तर तिने ईद झाल्यानंतर आपले चुकलेले रोजे पुन्हा कधीही करायचे, ही अनिवार्यता आहे. रमजानच्या रोजाप्रमाणेच नफील (अतिरिक्त) रोजे ही धरले जातात.  नफील रोजे हे अनिवार्य नाहीत तर ते अनुयायांच्या मर्जीचे आहेत. ते रमजान वगळता उर्वरित अकरा महिन्यांत केव्हाही केले जाऊ शकतात. हे रोजेदेखील रमजानच्या रोजाप्रमाणेच  पवित्र असतात.

इस्लाममध्ये दानधर्म
अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास महत्व दिले आहे. पवित्र कुरआनमध्ये नमाज व रोजानंतर अल्लाहच्या मार्गातील खर्च-जकात (अडीच टक्के) याला महत्व देण्यात आले आहे. जकात  हे इस्लाममधील कायदेशीर तत्व आहे. ज्याप्रमाणे नमाज पढत असताना अनुयायाचे मन, मनगट, मस्तक, मनका, मान, हृदय, तसेच शरीराचे सर्व अवयव अंगप्रत्यांग ईश्वरासमोर  नतमस्तक आहे. त्यांच्यावर ईश्वराचाच अधिकार आहे. कारण ईश्वराने आपणास ते बहाल केले आहे. तसेच आपल्याजवळ असणारी संपत्ती, पैसा, सोने, मौल्यवान वस्तू याचीही  निर्मिती अल्लाहनेच केली आहे. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या मालमत्तेवरील अडीच टक्के रक्कम दानधर्माच्या कार्यात (जकात) खर्च केलीच पाहिजे. त्यामुळे ही मालमत्ता आपली  नाही ती ईश्वराची आहे असा तो अनुयायी समजतो. अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या अनुयायांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे, ’’निःसंशय दानधर्म करणारे  पुरूष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि अशा अनेक बाबींचा विचार करून विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिल्याचे हदीसमध्ये जाणवते.
इस्लाम सांगतो की आपल्याजवळ जे आहे त्यातील उदरनिर्वाहासाठी खर्च करून जे शिल्लक राहते ते गरीबांना वाटा. जे तुम्ही इतरांना वाटाल तेच तुमच्या नावावर शिल्लक राहणार  आहे. याचा दाखला आपणास पुढील प्रसंगातून मिळतो.
माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ’’आम्ही एकदा बकरी कापली आणि वाटून टाकली.’’ पैगंबरांनी विचारणा केली, ’’त्यापैकी काही शिल्लक आहे का?’’ ’’केवळ फरा उरलेला आहे.’’  माननीय आएशा (रजि.) म्हणाल्या. पैगंबर म्हणाले, ’’असे म्हणा, फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’
याचा मतितार्थ, आपल्याजवळील असणारे आपल्या गरजा भागवून उरलेले इतरांसाठी द्या. आपण जे स्वतःसाठी शिल्लक राखून ठेवतो ते आपल्यासाठी राहत नाही तर आपण जे  इतरांसाठी खर्च केले आहे. इतरांना वाटले आहे; तेच आपल्यासाठी पुण्यकर्मात शिल्लक राहते. व्यक्ती जे दानधर्म करते तेच त्याच्यासाठी राहते आणि ते पुण्य वाया जात नाही. वाया  जाते ते जे आपण खाऊन-पिऊन संपवतो. ज्याप्रमाणे श्रीमंत दानधर्म करतात, त्यांच्यासारखे दानधर्म आपण करू शकत नाही ही भावना गरिबांची असते. त्यावेळी त्यांना उद्देशून पैगंबर  उपदेश करतात,
’’दान लहानात लहान वस्तुचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की गरजूची खरी गरज पूर्ण होत नसेल, पण प्रसंगी त्याला आधार मिळू शकतो.’’
माननीय आएशा (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ’’खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे तो उपयोगी पडतो त्याप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’
दान किती लहान आणि किती मोठे याला किंमत नाही, तर दान देऊन दुसऱ्याची गरज भागविण्याचा विचार किंमतीचा. आपल्या नरकयातना थांबवण्यासाठी किंवा नरकापासून दूर   राहण्यासाठी दानधर्म महत्त्वाचा. दानधर्म न करणे ही एक प्रकारची विकृती आहे. समजा, आपण उपाशी असताना जेवण करणे ही ’प्रवृत्ती’, तर आपण पोटभर खाल्लेले असतानाही  पुन्हा खाणे ही ’विकृती’ आहे आणि आपण उपाशी असताना आपल्या भाकरीतील आर्धी भाकरी दुसऱ्याला देणे ही ’संस्कृती’ आहे. म्हणजेच जे आपण खातो ते संपून जाते आणि जे  आपण देतो ते आपल्यामागे शिल्लक राहते. स्त्रियांना उद्देशून पैगंबर सांगतात, ’’याचकाला दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका.’’ घरात काहीही नसेल तर करपलेले अन्न का असेना  त्याला द्या. दानधर्म केल्याने अल्लाहकडून त्याचा दुप्पट मोबदला मिळतो. आपण आपल्या कमाईतील रक्कम जशी बाहेरच्या व्यक्तीवर खर्च करतो तशी घरातील व्यक्तीवर खर्च  केल्यानेही पुण्यप्राप्ती होते. पैगंबर एकेठिकाणी म्हणतात (माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन),
’’ हे मुस्लिम स्त्रियांनो, तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये, जरी शेळीची खुर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’
तात्पर्य असे की प्रत्येक मुस्लिम स्त्रीने आपल्या शक्तीनुरूप आपल्या शेजारणीला मदत केलीच पहिजे. इस्लामने दानधर्म करणे हे धार्मिक कार्य संबोधले आहे. दानमर्ध करून आपण  आपल्या स्वतःसाठी स्वर्गाची दारे खुली करून घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातील दानधर्मातून स्वर्गात प्रवेश करू शकतो. जी स्त्री पाचवेळा नमाज पढते, ईश्वराची आराधननाम  स्मरण करते, आपल्या पतीची आज्ञा पाळते ती स्वर्गाच्या ज्या द्वारातून जाऊ इच्छील तिला प्रवेश मिळेल. इस्लाम ज्या स्तंभावर उभारलेला आहे त्यापैकी एक आधारस्तंभ म्हणजे  हज होय. ’हज’ विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. हजबरोबरच (हज्जच्या वेळेव्यतिरिक्त) ’उमरा’मध्येही जवळजवळ हजसारखेच विधी अदा  करण्यात येतात. हज आणि उमरा याची प्रचंड मोठी महानता आहे. हजयात्रा इस्लामच्या जीवनातील सर्वात शेवटचे व सर्वात उच्च असे धार्मिक कार्य संबोधले आहे. प्रत्येक मुस्लिम  स्त्री-पुरूषाच्या जीवनाचे हजयात्रा एक अत्यंत पवित्र ध्येय समजले आहे. हजची यात्रा म्हणजे जिहाद (धर्मयुद्ध) होय. यावरून माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना  विचारले,’’ आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ पैगंबरांनी सांगितले, ’’तुम्हा स्त्रियांसाठी सर्वात चांगला व सुंदर जिहाद ’हज्जे-मबरूर’ (स्वीकृत हज) आहे.’’  इस्लामने इतर समाजव्यवस्थेप्रमाणे अथवा धर्मव्यवस्थेप्रमाणे स्त्री-पुरूष असा मतभेद करून दोघांसाठी वेगवेगळी आचारसंहिता बनविली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांबरोबर स्त्रियांना मान- सन्मान दिला व जीवन जगण्याची एकच आचारसंहिता बनविली. हजयात्रा जेवढी पुरूषांच्या जीवनात महत्त्वाची सांगितली तेवढीच स्त्रियांनादेखील महत्त्वाची आहे. हजयात्रा अल्लाहच्या  काबागृहाची यात्रा स्त्रियांसाठी सर्वांत सुंदर जिहाद आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी जेव्हा अंतिम हजयात्रा (हज्जतुलविदाअ) केली, तेव्हा त्यांच्याबरोबर दहा हजार सोबतीही होते.  एवढेच नव्हेतर त्या महिला सोबतींमध्ये आजारी, गर्भवती व मुलेबाळे असणाऱ्या महिलांचाही समावेश होता. जी स्त्री आपल्या लहा
न मुलाची हजयात्रा करवून घेईल, तेव्हा त्याचे पुण्य  नक्कीच तिच्या पदरात पडणार आहे. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे याचा आदेश दिला आहे. हजयात्रा स्वतःही करता येते व ती मजबूरी  असेल तर दुसऱ्याकडूनही करवून घेता येते. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, जुहैना टोळीची एक स्त्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाली, ’’माझ्या आईने हजला जाण्यास नवस केला होता, परंतु हजयात्रा करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, तर तिच्या वतीने मी हजयात्रा करू शकते का?’’ यावर पैगंबरानी सांगितले, ’’तिच्यातर्फे तुम्ही हजयात्रा करू शकता. जर तुमच्या आईवर कर्ज असते तर तुम्ही ते अदा केले नसते का? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे. त्याचे कर्ज अदा केले जावे.’’- 

(’इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री’ इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केले आहे. त्यातील हे लेख. ज्या वाचकांना लेखकाशी भेटण्याची इच्छा आहे त्यांनी 8030273038 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.)

- अबुल आला मौदूदी
   
    या पॉकेट साईझ पुस्तकात इस्लाम हाच एकमेव व मार्ग मुक्ती व कल्याणाचा आहे, हे सांगितले गेले आहे. वास्तविकता ही आहे की या जगाच्या सफलते सह किंबहुना यापेक्षा अतिमहत्त्वाचे म्हणजे पारलौकिक जीवन साफल्यप्राप्तीसाठी आणि नरकाग्नीपासून वाचण्यासाठी या जगात सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.
    यासाठी म्हणजेच मनुष्यजीवनाचे कल्याण होण्यासाठी एकमेव मार्ग अल्लाहचा दीन इस्लामला जीवनातील दैनंदिन व्यवहारात पूर्णपणे आचरले जावे.

आयएमपीटी अ.क्र. 128   -पृष्ठे- 08      मूल्य - 10            आवृत्ती - 3 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/x7ynvbm6sa2o3e4buzapvpflcn35j7jj

ह. अब्बास (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘इमानाची (श्रद्धेची) गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून,  इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून आनंदित झाला.’’ (हदीस - बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञापालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्र-नियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित ह.  मुहम्मद (स.) याच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ठ आहे, त्याचा फैसला आहे की मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत  इस्लाम जीवनधर्मावर चालायचे आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही मानसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या माणसाची अशी व्यवस्था   होईल तेव्हा समजून घ्या की त्याने ईमानची गोडी चाखली. माननिय उमर (रजी.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘तुम्ही अल्लाहला, त्याच्या  फरिश्त्यांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, अल्लाहच्या प्रेषितांना आणि आखिरतला (मरणोत्तर जीवनाला) सत्य जाणा आणि सत्य माना आणि या गोष्टीस ही मान्य करा की, जगात जे  काही घडते, ते ईश्वरातर्फे घडत असते. मग ते चांगले असो की वाईट असो.’’ (हदीस - मुस्लिम)

भावार्थ- इमान (श्रद्धा) चा शाब्दिक अर्थ एखाद्यावर भरवसा करणे, मन:पुर्वक विश्वास राखणे आणि त्याचे म्हणणे खरे मानणे. ‘इमान’चा मूळ आत्मा हाच भरवसा व विश्वास आहे.   इमानचे वेगवेगळे संदर्भ व त्याचे स्पष्टीकरण -
१) ‘ईमानबिल्लाह’ अर्थातच अल्लाहवर ईमान राखणे म्हणजे त्याला सृष्टीनिर्माता, रचनाकार व समस्त सृष्टीचा व्यवस्था राखणारा मानणे. मन:पुर्वक हे मान्य केले जावे की या सर्व  बाबीमध्ये अल्लाहचा कोणीही सहभागी नाही. आणि हे मानले जावे की सर्व प्रकारच्या व्यंगदोष, उणीवापासून अल्लाह मुक्त आहे, पवित्र आहे. तो सद्गुणांचा स्वामी आणि चांगुलपणाचा  मूल स्रोत आहे.
२) ‘प्रेषितांवर’ इमान राखणे म्हणजे, समस्त प्रेषितांना सच्चे, खरे मानणे. समस्त प्रेषितांनी किंचितही उणे अधीक न करता, ईश्वराचे आदेश व मार्गदर्शन लोकापर्यंत पोहोचविले. प्रेषित  शृंखलेची अंतीम कडी प्रेषित मुहम्मद (स.) होत. आता प्रलयकाळापर्यंतील मानवांना मुक्ती केवळ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मार्गाचे अनुसरण केल्यानेच लाभेल.
३) फरिश्त्यांवर इमान राखणे म्हणजे त्यांचे अस्तित्व मान्य करणे, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत. सदा सर्वदा अल्लाहच्या उपासनेत व आज्ञापालनात ते मग्न असतात.
४) ग्रंथावर इमान राखणे म्हणजे अल्लाहने प्रेषितांद्वारे वेळोवेळी जे मार्गदर्शक ग्रंथ अवतरिले, त्या सर्व ग्रंथांना सत्य मानावे. त्या ईशग्रंथात अंतीम मार्गदर्शक ग्रंथ ‘पवित्र कुरआन’ आहे.  पूर्वीच्या जनसमुहांनी आपल्या काळातील ईशग्रंथामध्ये फेरबदल करून, त्याचे मूळ स्वरूप बिघडविले. अंतीम ग्रंथ कुरआन कसल्याही व्यंग-दोषापासून मुक्त आहे. तो सर्व प्रकारच्या   बिघाडापासून सुरक्षित आहे. या कुरआनाखेरीज जगात असा कोणताही ग्रंथ नाही. ज्याद्वारे ईश्वराप्रत पोहोचले जाऊ शकते.
५) आखीरतवर इमान म्हणजे, अंतीम न्यायनिवाड्यासंबंधी मान्य करणे. त्या दिवशी मानवाच्या संपूर्ण जीवनाचा हिशेब घेतला जाईल. ज्याचे आचरण ईश्वराच्या नजरेत पसंत ठरेल तो  बक्षिसपात्र ठरेल (जन्नतवासी), ज्याची कर्मे नापसंत तो शिक्षापात्र (नरकवासी) ठरेल. ही शिक्षा अमर्याद असेल आणि बक्षिसही अमर्याद असेल.
६) भाग्यावर इमान राखणे म्हणजे, जगात जे काही होत आहे ते ईश्वराच्या आदेशाने होत आहे. अल्लाहच्या कृतज्ञशील दासांवर जी आपत्ती कोसळते, ज्या अडचणींना त्यांना तोंड   द्यावे लागते, ही सर्व परिस्थिती अल्लाहच्या हुकुमौने आणि आधीपासूनच निर्धारित केलेल्या विधीनियमानुसार येत असते.

जे लोक इस्लामला गतकाळाची गोष्ट समजतात व वर्तमानकाळातील त्याची उपयुक्तता, तसेच आवश्यकता यांचा इन्कार करतात ते वास्तवात इस्लामचे खरे स्वरुप जाणत नाहीत व जीवनातील त्याच्या खऱ्या संदेशासी व ध्येयाशी अनभिज्ञ आहेत. लहानपणी साम्राज्यवाद्यांच्या एजंटांनी नेमलेल्या पाठ्यपुस्तकातून त्यांना जे काही शिकविले गेले तोच शिकविलेला धडा ते आजही गिरवीत आहेत. त्यांच्यामते इस्लामच्या उदयाचा हेतू मानवाला मूर्तीपूजेपासून मुक्त करण्याचा होता. तसेच परस्पराशी वैरभाव बाळगणाऱ्या अरबी टोळ्यांची एकजूट करुन त्यांच्यात बंधुत्व निर्माण करण्याचा होता. तसेच दारु पिणे, जुगार खेळणे, मुलींना जिवंत पुरणे व याप्रकारच्या अनेक नैतिक दोषांपासून मुक्त करण्याचा होता. म्हणून इस्लामने अरबांमधील आपापसातील झगडे व लढाया समाप्त करुन त्यांची शक्ती नष्ट होण्यापासून वाचवली व नंतर जगामध्ये आपल्या संदेशाचा प्रचार करण्याकरिता या शक्तीचा उपयोग केला. या ध्येयासाठी मुस्लिमांना इतर जातीशी अनेक युद्धे करावी लागली. परिणामस्वरुप इस्लामी जग आपल्या वर्तमान मर्यादांसह या विश्वपटला वर उभे राहिले. हा एक असा ऐतिहासिक संदेश व ध्येय आहे ज्याचे कार्य आता पूर्ण झाले आहे. जगात मूर्तिपूजा संपली आहे. अरब टोळ्यांनी आता मोठमोठ्या राष्ट्रांचे रुप धारण केले आहे, म्हणून आता इस्लामची काही गरज उरली नाही. कारण जेथपर्यंत जुगार खेळण्याचा व मदिरा प्राशन करण्याचा संबंध आहे, त्यावर आजच्या संस्कृतीच्या व संस्काराच्या युगात कोणताही पायबंद घालणे शक्य नाही. याचा अर्थ असा की या लोकांमध्ये इस्लाम एका विशेष काळापुरता अतिउचित जीवनव्यवस्था देणारा धर्म होता. पण आज जग इतके पुढे गेले आहे की आज इस्लामच्या मार्गदर्शनाची काही गरज उरली नाही. म्हणून मार्गदर्शन व प्रकाशाकरिता आम्ही त्याच्याकडे पाहू नये. उलट सिद्धान्त व जीवनदर्शनापासून हा प्रकाश व उपदेश घ्यावयास पाहिजे. यातच आमची मुक्ती होऊ शकते व यातच आमचे कल्याण सामावलेले आहे.
पाश्चिमात्यांचे हे पौर्वात्य चेले आपल्या गुरुंच्या वाक्यांचा पुनरुच्चार करुन अनिच्छेने व अज्ञानाने आपल्या संकुचितपणाची जाणीव करुन देतात. हे बिचारे इस्लामला जाणतही नाहीत, तसेच जीवनातील त्याचे वास्तविक उद्देशही त्यांना ठाऊक नाहीत. म्हणून पुढे जाण्यापूर्वी ‘इस्लाम’, त्याचा अर्थ व उद्देश यावर थोडीशी चर्चा आवश्यक आहे.

धर्म आणि फक्त धर्मच जगाला गमावलेली सुख-शांती देऊ शकतो. तो माणसाच्या मनात खऱ्या अर्थाने प्रेम निर्माण करुन त्याला अन्यायाशी सामोरे जाऊन मुकाबला करण्याचे धैर्य प्रधान करतो आणि त्याला दर्शवितो की जर तो आपल्या पालनकर्त्या स्वामीच्या प्रसन्नतेचा इच्छुक आहे, तर त्याने दुष्टपणाचे अधिपत्य करणाऱ्या दैत्यांना नष्ट करून केवळ आपल्या पालनकर्त्याचे शासन स्थापित केले पाहिजे. या मार्गात येणाऱ्या सर्वप्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि केवळ परलोकीय यशावर दृष्टी ठेवली पाहिजे. काय आजच्या जगाला सुख, शांती, समाधान याकरिता धर्माची गरज नाही काय?
धर्माविना जीवनाला आरंभापासून काही अर्थ उरत नाही. परलोकावरील दृढ विश्वास ही धर्माची बहुमोल विशेषता आहे. हा विश्वास प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवन एका नव्या श्रद्धेचे बोट पकडते व त्याच्यासमोर नवनवी क्षितिजे उभी राहतात. परलोकावरील दृढविश्वासाविना मानव नीचतेच्या कष्टदायी अनुभूतीचे लक्ष्य बनतो. मरणोत्तर जीवनाच्या इन्काराचा अर्थ असा होतो की समाजातील एकत्र जीवनाचा, मानवी आयुष्याचा भाग केला जावा व मानवाला आपल्या आंधळ्या व बहिऱ्या वासना, इच्छा, तसेच अंधविश्वास यांच्या दयेवर मोकळे सोडून देण्यात यावे. त्यानंतर माणूस आपल्या इच्छापूर्तीमध्ये स्वतःला हरवून बसतो. जितके अधिक सुख तो मिळवू शकतो, तितके गोळा करावे आणि त्यात इतर कोणालाही वाटेकरी होऊ देऊ नये, हेच त्याच्या सर्व प्रयत्नांचे व पराकष्टेचे ध्येय व लक्ष्य बनते. येथूनच हेवेदावे, झगडे व रक्तरंजित युद्धांचा आरंभ होतो व इच्छादासांनी भरलेल्या या जगामध्ये आपल्यासमोर पसरलेल्या सुखद गोष्टीवर तुटून पडून प्रत्येकजण ते जास्तीतजास्त हस्तगत करु इच्छितो. अधिकाधिक फायदे कमीतकमी वेळात तो एकटा गोळा करु इच्छितो. त्याच्या मनात कोणत्याही उच्चतम सत्तेचे भय असत नाही, कारण त्यांच्यानुसार या जगाचा कोणी ईश्वर नसतो व कोणतीही न्याय व्यवस्था नसते.
पारलौकिक जीवनाच्या इन्कारामुळे माणूस इच्छांच्या खोल गर्तेत बुडून जातो. त्याच्या विचाराची व चितनाची भरारी उदात्ततेपासून वंचित होते आणि त्याचे हेतू व कार्यभाग साधून घेण्याचे मार्ग अधःपतनाचे लक्ष्य बनतात. मानवता आपापसातील झगड्यांचा व लढायांचा आखाडा बनते. त्यानंतर माणसाला इतकी उसंतच मिळत नाही की त्याने उच्च व उदात्त जीवन उद्देशांचा पाठपुरावा करावा. या नवीन जगात प्रेम व सहानुभूतीला काही स्थान नसते. भौतिक सुखाची लालसा व इच्छा वासनांचे अधिपत्य यामुळे जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा व सद्भावांचा आदर करण्याची माणसाची क्षमता लोप पावून असा आदर करण्यापासून तो अक्षम केला जातो.
भौतिक जडवादाचा परिणाम
भौतिकवादी माणसांना काही भौतिक फायदेही मिळून जातात यात शंका नाही, पण भौतिकवादात एक असा शाप आहे की वरपांगी दिसणारे हे फायदेही नाश पावतात. माणूस त्यांच्या लालसेने आंधळा बनून आपल्याच बांधवाशी लढत असतो. इच्छाशक्ती, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, तिरस्कार या कुभावनांवर त्याचा ताबा नसतो आणि तो त्यांच्या बंधनातून कधीही मुक्त होऊ शकत नाही.
ज्या लोकजाती भौतिकतेचा अंगीकार करतात त्यांच्यावर निरंतर एक प्रकारच्या दडपणाचे व गृहकलहाचे वातावरण आच्छादित असते. परिणामस्वरुप समस्त मानवी जीवन अस्तव्यस्त होऊन जाते आणि विज्ञान व त्याची भयानक अस्त्रे मानवी वंशाची सेवा करण्याऐवजी माणसाचा सर्वनाश व संहार करण्यात व्यतीत होऊ लागतात.
संकुचितपणावर उपाय
भौतिकता माणसाच्या संकुचितपणाचे प्रतीक आहे. यातील बिघाडापासून वाचण्याकरिता मानवतेच्या मानसिक क्षितिजांचा विस्तार करण्याची गरज आहे. हा उद्देश केवळ धर्मानेच प्राप्त होऊ शकतो. केवळ तोच मानवतेला नवा विस्तार व नवी उदात्तता प्रदान करु शकतो, कारण धर्माच्या दृष्टीने मानवी जीवन फक्त इहलोकापुरतेच मर्यादित नसून ह्यानंतरचीही परंपरा निरंतर चालू राहत असते. हा विश्वास माणसाच्या मनात एका नवीन आशेची ज्योत प्रफुल्लित करतो, त्याला दुष्टपणा, अत्याचार, तसेच दडपण याविरुद्ध धैर्याने झगडण्याचे साहस प्रदान करतो आणि त्याला हे दाखवून देतो की सारी मानवजात एकमेकांचे बंधू आहेत. प्रेम आपापसांतील सहानुभूती व विश्वबंधुत्व या गोष्टीचे शिक्षण मानवतेला सुखशांती व वास्तविक समृद्धी, तसेच विकास व उन्नती यांनी वैभवसंपन्न करुन टाकतो. अशी वस्तुस्थिती व सत्य असतांना धर्म ही माणसाची अंतिम गरज नाही आणि मानव आजही तिचा गरजवंत नाही, जसा शतकानुशतकापूर्वी होता, असे कोण म्हणू शकतो? जीवनक्षेत्रात धर्म ज्याप्रकारे माणसाला घडवून तयार करतो, त्याप्रकारे दुसरी कोणतीही शक्ती माणसाला घढवू शकत नाही.
दीपस्तंभ
धर्म माणसाला स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगण्याचे शिकवितो, त्याला एक उदात्त व पवित्र लक्ष्य देतो आणि हे लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गांत येणाऱ्या कष्टांचे व संकटाचे, खुल्या मनाने स्वागत करण्याचे शिकवितो. धर्मांने प्रदान केलेल्या त्या ईमान (श्रद्धा) व विश्वास यापासून जर मानव वंचित झाला, तर तो स्वतःखेरजी दुसऱ्या कोठल्याही गोष्टीचा विचार करु शकत नाही. सर्व जीवन स्वार्थ व स्वभक्ती याची प्रतिमा होऊन जाते. त्यांच्यात व जंगली श्वापदात काही अंतर उरत नाही. इतिहासात अशा असंख्य व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी आयुष्यभर न्याय व सत्य याच्या रक्षणार्थ ढालीचे कार्य केले आणि त्यामध्ये आपल्या प्रिय प्राणाचीही आहुती व बलिदान केले. त्यांना आपल्या दीर्घ प्रयत्नाचे व त्यागाचे कसलेही फळ या जगात मिळाले नाही. प्रश्न असा आहे की कोणत्या दृष्टीने या लोकांना असा लढा देण्यास उद्युक्त केले? ज्याचा परिणाम असा निघाला की त्यामध्ये त्यांना कसलेही भौतिक यश प्राप्त झालेच नाही, परंतु जे काही त्यांच्यापाशी होते तेही या लढ्यानंतर त्यांच्या हातून निसटले. याचे उत्तर केवल एकच आहे आणि ते म्हणजे श्रद्धा या पवित्र मानवी जीवांचे अस्तित्व याच श्रद्धेचा एक छोटा चमत्कार आहे. याउलट लोभ, मोह, कपट, द्वेष, स्वार्थ तसेच तिरस्कार हे असे नीचतेचे प्रेरक आहेत की ज्यांच्याद्वारा कसलेही वास्तविक व सुदृढ यश प्राप्त होऊ शकत नाही. त्याचा झगमगाट बाह्यत्कारी व क्षणभर होत असतो. त्यांच्या प्रभावाखाली असलेली माणसे तत्काळ लाभाची इच्छा करतात. त्यामुळे माणसात कधीही स्वास्थ्यपूर्ण चारित्र्य वाढीस लागू शकत नाही. तसेच त्यामध्ये एखाद्या उच्च ध्येयासाठी, जगाचा त्याग करुन सोशिकपणाने, सहनशीलतेने व भक्कमपणे सतत प्रयत्न करीत राहण्याची भावना टिकून ती वाढीस लागू शकत नाही.
तिरस्काराचे भक्त
आम्हाला हे माहीत आहे की काही तथाकथित सुधारक प्रेमाऐवजी द्वेष व तिरस्कारद्वारा जगाची सुधारणा करु इच्छितात. द्वेषातच ते सतत गुरफटलेले असतात. त्यापासूनच ते पोषण व शक्ती प्राप्त करतात व त्याच्याच सहाय्याने, दुःखांनी आणि कष्टांनी वेढलेले असतानासुद्धा भक्कमपणे व साहस करुन आपले सुधारणाअभियान चालू ठेवतात. या लोकांच्या तिरस्काराचे लक्ष्य मानवी वंशाचा एखादा विशेष समूहही होऊ शकतो आणि हेही संभव आहे की सामूहिकरुपाने अखिल मानवजात अथवा तो ऐतिहासिक काल त्याचे लक्ष्य होतो, ज्यामध्ये तिरस्काराच्या भक्तास जाग येते. मानवतेपासून दूर असलेले हे वैफल्यग्रस्त ‘सुधारक’ व त्यांचा समूह, आपले उद्देश प्राप्त करणे निश्चतच संभवनीय आहे. तिरस्काराची आग त्यांच्या दुष्ट स्वभावाशी व उपजत अत्त्याचाराची सवय असल्याने हे लोक आपल्या उद्देशपूर्तीकरिता पूर्ण एकोपाही दाखवू शकतात व सर्व प्रकारच्या उणिवाही व वंचितपणा पसंत करु शकतात. परंतु जी श्रद्धा प्रेमाऐवजी तिरस्कारावर आधारलेली असेल त्यापासून, मानवतेला कसलेही कल्याण व यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यापासून वर्तमान अन्यायाची, तसेच समाजातील प्रचलित वाईट गोष्टीचे परिमार्जन करुन झालेले नुकसान व त्याची भरपाई निसंदेह पुरी केली जाऊ शकते. पण त्याचा हात मानवतेच्या या आजाराच्या रामबाण उपायापासून बिलकूल रिकामा असतो. याच कारणस्तव समाजाचे वर्तमान दोष नष्ट करण्याच्या नावावर केले जाणारे हे सुधारणेचे इलाज व उपाय, त्या दोषांना कमी करुन त्यांना नष्ट करण्याऐवजी, त्यामध्ये अनेक पटीने वृद्धी करतात आणि अशी अवस्था निर्माण होऊन जाते की -
‘जो जो उपाय केला गेला तो तो आजार वाढतच गेला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget