Latest Post

जकातचे महत्त्व: इस्लाममध्ये प्रार्थनेपेक्षा म्हणजेच नमाजपेक्षा इतर कोणतेही कृत्य जास्त महत्त्वाचे नाही याबद्दल सविस्तर उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. म्हणून जकात आणि नमाजचे महत्त्व एकसारखेच आहे असे म्हणणे तर्कशुध्द होणार नाही. परंतु आपण कुरआनची याविषयीची संकेतवचने आणि हदीसचा विचार करता चटकन लक्षात येते की नमाजनंतर जकातचे स्थान आहे. दिव्य कुरआन श्रध्देचा उल्लेख करताना अनेकदा दोन धर्माचरणांचा उल्लेख लगेच सोबत देतो. ते म्हणजे नमाज आणि जकात. निष्ठावंत मुस्लिमांची प्रतिमा दिव्य कुरआन खालीलप्रमाणे स्पष्ट करीत आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
वरील संकेतवचन विशेष महत्त्वाचे आहे कारण सच्चा मुस्लिम होण्यासाठी अनेक धर्माचरण आत्मसात करणेसुध्दा आवश्यक आहेत. सच्चा मुस्लिमचे वैशिष्ट्ये सांगताना कुरआन सर्वप्रथम श्रध्देचा उल्लेख करतो. श्रध्देनंतर कुरआन इस्लामच्या इतर आधारस्तंभांचा उल्लेख न करता लगेचच नमाज आणि जकातचा उल्लेख का करीत आहे? इतर चांगल्या गोष्टींचा उल्लेख त्याऐवजी का करीत नाही? असे करण्याला साहजिकच काही महत्त्व आहे. आपण विचारपूर्वक लक्ष दिल्यास हेतु लक्षात येईल. अल्लाह नमाज आणि जकात (गरीबांसाठी द्यावयाचा निधी) या दोघांना श्रध्देच्या व्यावहारिकतेच्या पायाचे दोन दगड समजून अतिमहत्त्व देतो. मनुष्याने ही दोन्ही कृत्ये व्यवस्थित पार पाडली तर धर्म पूर्णपणे पाळण्यासाठीचा व्यावहारिक पुरावाच असा मनुष्य देत असतो. अशा माणसाकडून इतर धर्माचरण श्रध्देच्या मूलतत्त्वानुसार पाळणे सहज शक्य होते. तो येथे हलगर्जीपणा दाखवूच शकत नाही. असे का बरे घडावे? या प्रश्नाचे उत्तर श्रध्देच्या अर्थामध्ये आणि श्रध्देच्या वैशिष्ट्यांमध्ये लपलेले आहे जे नमाज आणि जकातसाठी सारखेच आहेत. आपण जर श्रध्देच्या मूलतत्त्वाचे तर्कशुध्द विभाजन केले तर ते दोन विभागांत होईल.
१) ईशआदेश जे अल्लाहचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
२) ईशआदेश जे मानवतेचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
श्रध्देचे व्यावहारिक रूप म्हणजे मनुष्याने अल्लाहचे हक्क जाणून घेऊन तसेच मानवतेचे हक्क जाणून घेऊन त्यानुसार जीवन कंठत राहाणे होय. आपण हे पाहिलेच आहे की नमाज अल्लाहच्या हक्कासंबंधी अनिवार्य असे मूलतत्त्व आहे तर जकात मानवतेच्या हक्कासाठीची अनिवार्यता आहे. जेव्हा मनुष्य मशिदीत नमाज अदा करतो, तेव्हा तो अल्लाहच्या हक्कासंबंधी जागृत असतो आणि मशिदीबाहेरसुध्दा अल्लाहच्या हक्कासंबंधी सचेत राहतो. अशा परिस्थितीत तो मनुष्य अल्लाहचे हक्क सातत्याने अदा करीत जातो. तसेच मनुष्य जकात आपल्या समाजबांधवांसाठी, शेजाऱ्यांसाठी स्वखुशीने खर्च करतो. असे करताना उपकार न करता फक्त ईशप्रसन्नतेसाठीच इतरांवर खर्च करतो. असाच मनुष्य मानवतेच्या कल्याणासाठी सतत झटत असतो.
या विषयाची आणखी एक बाजू आहे. कुरआन वारंवार जोर देऊन सांगत आहे की श्रध्दा तेव्हाच जिवंत शक्ती म्हणून अस्तित्व धारण करते जेव्हा अल्लाहवरील प्रेम हे इतर सर्वांपेक्षा प्रभुत्वशाली असते. आणि ऐहिक जीवनात मनुष्य आपल्या पारलौकिक जीवनास प्राधान्य देतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी नमाज आणि जकात अत्यंत प्रभावी साधन आहे. नमाज मनुष्याला अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करून देते तर जकात मनुष्याला त्याच्या देशबांधवांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील ठेवते. जर अल्लाहची प्रसन्नताप्राप्ती आणि पारलौकिक जीवनसाफल्य हे एखादा कठीण चढ चढून जाण्यासारखे आहेत, तर त्या रेल्वेचे दोन इंजीन म्हणजे नमाज आणि जकात आहेत. चढ चढताना एक इंजीन (नमाज) ट्रेनला पुढे ओढते तर दुसरे इंजीन (जकात) हे त्या ट्रेनला मागून ढकलत राहते. अशा प्रकारे जीवनाची ही ट्रेन आपल्या ध्येयापर्यंत पोहचते. म्हणून या दोन्ही मूलतत्त्वांना इस्लामचा खरा आधार म्हणतात. कारण इस्लामी व्यावहारिकतेत त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मक्केतील श्रध्दाहीनांविरुध्द जिहाद पुकारण्यासाठी अंतिम आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे की आपल्या तलवारी म्यानात ठेवू नका जोपर्यंत तुम्ही शत्रुंचा नाश करीत नाही अथवा ते इस्लाम कबूल करीत नाहीत. दोन दशके त्यांना इस्लामची शिकवण देण्यात आली होती आणि त्यांना श्रध्दावंत बनण्यासाठी सर्व काही प्रयत्न झाले होते. याप्रसंगी कुरआन काही अटी त्यांच्यासाठी स्पष्ट करीत आहे, ज्यानुसार त्यांनी श्रध्दावंत बनून राहावे आणि त्यांच्याविरुध्द जिहाद समाप्त केला जावा.
कुरआनोक्ती आहे, ‘‘मग जेव्हा निषिध्द महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे. आणि जर अनेकेश्वरवादींपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाहची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या येथपावेतो की त्याने अल्लाहची वाणी ऐकावी. मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवा. हे अशासाठी करावयास पाहिजे की हे असे लोक आहेत ज्यांना ज्ञान नाही.’’ (कुरआन ९: ५-६)
पुढे याच अध्यायात कुरआन स्पष्टोक्ती पुन्हा आहे,
‘‘पण जर त्यांनी पश्चाताप केला व नमाज कायम केली व जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधु आहेत आणि जाणणाऱ्यां लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करीत आहोत.’’ (कुरआन ९: ११)
यावरून हे अगदी स्पष्ट होते की श्रध्देचा (ईमान) स्वीकार जरी झाला असेल तरी इस्लामचा स्वीकार मात्र नमाज कायम करणे आणि जकात देणे या दोन्ही कृत्यांना आत्मसात करण्यावर अवलंबून आहे. मनुष्य जर या दोन्ही कर्तव्यांना पार पाडत नसेल तर त्याची श्रध्दा अस्वीकार्य आहे, निरर्थक आहे. जकात देणे हे कृत्य श्रध्देची पूर्वअट आणि अंगभूत गुण आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘मला आदेश देण्यात आला आहे त्या लोकांविरुध्द लढाई करण्याचा जो पर्यंत ते हे मान्य करतील की ईश्वर कोणी दुसरा नाही. परंतु अल्लाह आणि ते नमाज कायम करतील व जकात देतील. त्यांनी असे केले तर त्यांचे जीव आणि वित्तरक्षणाची जबाबदारी माझी आहे. त्यांची सर्व कार्ये अल्लाहसाठी आहेत.’’ (मुस्लिम)
नवमुस्लिमांसाठी कुरआन जकात देण्याची अट घालत नाही तर हे सर्वांसाठी आहे, यासाठी अपवाद नाही. एखादा मुस्लिम जकात देण्याचे बंद करतो तर त्याच्याविरुध्द इस्लामी शासन त्याला शिक्षा करते. अबु बकर (र.) यांच्या शासनकाळात काही टोळ्यांनी जकात देण्यास नकार दिला होता तेव्हा त्यांनी त्यांच्याविरुध्द युध्द घोषित केले. जेव्हा उमर (र.) यांनी हा आदेश अंमलात आणण्यासाठी दिरंगाई दाखविली तेव्हा अबु बकर (र.) यांनी घोषित केले,
‘‘मी, अल्लाह शपथ त्याच्या विरोधात लढेन ज्यांनी नमाज आणि जकात या दोहोत फरक केला.’’ (कारण दोन्ही कृत्ये कुरआनने एकत्रित करून सांगितली आहेत) (मुस्लिम)
हा वादाचा मुद्दा आदरणीय उमर (र.) यांनीच स्वीकारला नाही तर सर्व सहाबांनी (र.) यांनीसुध्दा स्वीकारला. यावरून आपण या निष्कर्षाप्रत येतो की मुस्लिमांचे जीवित आणि वित्तिय संरक्षण हे त्याच्या नमाज अदा करणे आणि जकात देण्यावर अवलंबून आहे. नमाज अदा करणारा आणि जकात देणारा आदरणीय ठरतो. नमाज अदा तर केली जाते परंतु त्याच्याकडून जकात मात्र दिली जात नाही तर अशा मुस्लिमासाठीसुध्दा सारखीच शिक्षा आहे जी नमाज सोडणाऱ्यासाठी आहे. त्याच्याविरुध्द युध्द पुकारले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘हे पैगम्बर (स.) यांना सांगा,’’ मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा मला दिव्यबोधाद्वारे सांगण्यात येते की तुमचा उपास्य तर केवळ एकच उपास्य आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा, आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेकेश्वरवादींसाठी जे जकात देत नाहीत आणि परलोकांचा इन्कार करणारे आहेत. उरले ते लोक ज्यानी मान्य केले आणि सत्कृत्ये केली, त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही.’’ (कुरआन ४१: ६-८)
‘‘शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो. पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांसाठी लिहीन जे अवज्ञापासून दूर राहतील, जकात देतील व माझ्या संकेतांवर श्रध्दा ठेवतील.’’ (कुरआन ७ : १५६)
हे निदर्शनात येते की पहिल्या आयतमध्ये जकात न देणे म्हणजे श्रध्दाहीनतेचे कृत्य आणि परलोकाला अस्वीकार करण्यासारखे कृत्य आहे तर दुसऱ्या आयतनुसार जकात देणे हे श्रध्दाशीलतेचे प्रभावी लक्षण आहे आणि सदाचार आहे असे म्हटले आहे. या दोन्ही आयतींनुसार जकात देणे ही श्रध्दाशीलतेची अनिवार्यता आहे. जो श्रध्दावंत आहे तो जकात न चुकता देतो.
कुरआनची वरील संकेतवचन आणि हदीस कथनांनुसार जकातचे इस्लाममध्ये असलेले स्थान सिध्द होते. इस्लामची ही इमारत जकातला पूर्ण न्याय दिल्याशिवाय उभीच राहू शकत नाही. आणि म्हणूनच जकातला इस्लाममध्ये श्रध्देचे महत्त्वाचा आधारस्तंभ ठरविले आहे.

- सय्यद अबुल आला मौदूदी

या पॉकेट साईझ पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले.
मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. जेणेकरून संपत्तीची निर्मिती, उपयोग व वितरणाची संपूर्ण व्यवस्था त्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आत घालावी.

आयएमपीटी अ.क्र. 137    -पृष्ठे - 08    मूल्य - 06  आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/154s221gdd46bja3fxx5klemhwumc8r0

मुस्लिमांना आम्ही ज्या गोष्टीकडे बोलावितो ती गोष्ट ही आहे की, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल व ती पूर्ण करण्यासाठी ते तयार होतील. ती जबाबदारी जी की मुस्लिम  होण्याच्या नात्याने त्यांच्यावर येते. तुम्ही फक्त एवढे म्हणून सुटका करून घेऊ शकणार नाहीत की, ’’आम्ही मुस्लिम आहोत आणि आम्ही अल्लाह आणि त्याच्या धर्माला मानलेले  आहे.’’ उलट जेव्हा तुम्ही अल्लाहला आपला ईश मानलेले आहे आणि त्याने जो धर्म तुम्हाला दिलाय त्याचा तुम्ही एक व्यवस्था म्हणून स्वीकार केलेला आहे. तर त्यासोबत काही  जबाबदाऱ्यासुद्धा तुमच्यावर येतात ज्यांची जाणीव तुम्हाला असायला हवी आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची चिंता तुम्हाला असायला हवी. जर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार  नाहीत तर त्याच्या कोपापासून या जीवनात वाचू शकाल ना परलोकात. त्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्या फक्त एवढ्याच नाहीत की तुम्ही अल्लाहवर, त्याच्या दुतांवर, त्याच्या  ग्रंथावर, त्याच्या प्रेषितांवर आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवला. ती जबाबदारी फक्त एवढीही नाही की तुम्ही नमाज अदा केली, रोजे राहिले, हजला गेले आणि जकात दिली.  ती फक्त एवढीही नाही की तुम्ही विवाह, घटस्फोट, वारसाहक्क इत्यादी गोष्टींमध्ये इस्लामने घालून दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली. या सर्वासोबत एक मोठी आणि अवजड  जबाबदारी आपल्यावर ही अनिवार्यरित्या येते की, तुम्ही सगळ्या जगासमोर या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणून उभे रहा. ’मुस्लिम’ या नावाने तुम्हाला एक वेगळा समुदाय  बनविण्यामागचा जो उद्देश्य कुरआनने स्पष्ट केलेला आहे तो हाच आहे की, तुम्ही अल्लाहच्या सर्व बंद्यांसमोर सत्याची साक्ष द्याल. जेणेकरून उद्या ते हे आरोप करू शकणार नाहीत  की त्यांना अंधारात ठेवले गेले.
कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि या प्रमाणे आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट समुह बनविलेला आहे जेणेकरून तुम्ही लोकांसमोर साक्ष द्याल आणि प्रेषित तुमच्यासमोर साक्ष  देतील.’’ (सुरे बकरा आयत नं. 145).
हा मुस्लिम समुदायाला जन्माला घालण्याचा खरा उद्देश आहे. जर का हा उद्देश तुम्ही पूर्ण केला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालविले आहे. सत्याची साक्ष देण्याचे  कर्तव्य अल्लाहने तुमच्यावर टाकलेले आहे. त्याचा आदेश आहे की, ’’हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा बाळगली, अल्लाहसाठी उभे राहणारे आणि ठीक-ठीक सत्याची साक्ष देणारे बना.’’ (सुरे  मायदा आयत नं.6). आणि हा फक्त केवळ आदेशच नाही तर ताकीदवजा आदेश आहे. अल्लाह फरमावितो की, ’’त्या व्यक्तीपेक्षा मोठा अत्याचारी आणखीन दूसरा कोण असेल  ज्याच्याकडे अल्लाहकडून एक साक्ष आलेली आहे आणि त्याने ती लपविली.’’ (सुरे बकरा आयत नं. 140).
त्यानंतर अल्लाहने तुम्हाला हे सुद्धा दाखवून दिले आहे की, या कर्तव्यपूर्तीचा परिणाम काय होणार आहे? तुमच्यापूर्वी या साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये ज्यू लोकांना उभे केले गेले होते.  मात्र त्यांनी काही प्रमाणात सत्याला लपविले आणि काही प्रमाणात सत्याच्या विरूद्ध साक्ष दिली. म्हणून ते सत्याचे नव्हे तर असत्याचे साक्षीदार होऊन गेले. याचा परिणाम हा झाला की  अल्लाहने त्यांना दूर लोटून दिले. त्यांच्यावर अल्लाहचा कोप झाला. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’अपमान आणि दारिद्रय त्यांच्यावर टाकून देण्यात आले आणि त्यांनी आपल्या  डोक्यावर अल्लाहचा कोप ओढवून घेतला.’’ (सुरे बकरा आयत नं.61).
हीच साक्ष ज्याची जबाबदारी आता तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. याचा अर्थ जे सत्य तुमच्याकडे आलेले आहे, जे सत्य तुमच्यावर स्पष्ट करण्यात आलेले आहे, मानवाला  जीवनात आणि मरणोप्रांत जीवनात यशस्वी होण्याचा जो एकमेव मार्ग आहे, तो तुम्हाला दाखविण्यात आलेला आहे. या सर्वांची साक्ष तुम्ही जगासमोर द्यावी व सांगावे की, हाच सत्य  मार्ग आहे. तुमची साक्ष अशी असायला हवी की, सत्य आणि असत्य दोहोंमधील फरक ठळकपणे वेगळा दिसेल आणि जगातील लोक हा तर्क देऊ शकणार नाहीत की, आम्हाला तर  सत्याचा पत्ताच नव्हता. हीच साक्ष घेऊन अनेक प्रेषित पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. हीच साक्ष देणे त्या सर्वांवर अनिवार्य करण्यात आले होते आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद  (सल्ल.) यांच्यानंतर ही साक्ष देण्याची जबाबदारी सामुहिकरित्या मुस्लिम समाजावर टाकण्यात आलेली आहे. जशी की ती पे्रषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर त्यांच्या जीवन काळामध्ये  व्यक्तीगत स्तरावर टाकण्यात आलेली होती.
ही साक्ष किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज याच गोष्टीवरून लावा की, मानवजातीसाठी अल्लाहने विचारपूस आणि बक्षीस आणि शिक्षेचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे याच  साक्षीवर अवलंबून आहे. अल्लाह युक्ती (हिकमतवाला), दया आणि न्याय करणारा आहे. त्याच्या हिकमत आणि दया तसेच न्यायप्रियतेशी ही गोष्ट अजिबात सुसंगत नाही की लोकांना  त्याची मर्जी माहितच नसावी आणि त्याने त्यांना त्याच गोष्टीला जबाबदार धरावे की ते त्याच्या मर्जीच्याविरूद्ध का चालले? लोकांना हे माहितच नसेल की सत्य मार्ग कोणता आहे?  आणि तो (अल्लाह) लोकांची मार्गभ्रष्ट झाले म्हणून पकड करेल. लोकांना या गोष्टीचा थांगपत्ताच नसेल की त्यांना कोणत्या गोष्टींबाबत विचारले जाईल ? आणि त्या अनोळखी  गोष्टीबद्दल त्यांच्याशी विचारपूस केली जाईल. म्हणूनच अल्लाहने जगाची सुरूवातच एका प्रेषिताला पाठवून केली. त्यानंतर वेळोवेळी अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी लोकांसमोर सत्याची  साक्ष दिली व त्यांना समजावून सांगितले की तुमचे व्यवहार कसे असावेत व तुम्हाला जन्माला घालण्याचे कारण काय? तसेच अल्लाहची मर्जी काय आहे?
जीवन जगण्याचा हाच खरा मार्ग आहे. हीच पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालका (अल्लाह)ची मर्जी संपादन करू शकता. हे ते काम आहे जे तुम्ही करायला हवे आणि हे ते  काम आहे ज्यांच्यापासून तुम्हाला लांब रहायचे आहे. ह्या अमुक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबतीत मेल्यानंतर तुमच्याकडे विचारपूस केली जाईल. हीच ती साक्ष आहे जी अल्लाहने आपल्या  प्रेषितांच्या मार्फत लोकांसमोर दिली होती. त्याचा उद्देश्य कुरआनमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की, लोकांना अल्लाहसमोर हा तर्क देण्याची संधी राहू नये की आम्ही अनभिज्ञ होतो  आणि जी गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती त्याला जबाबदार धरून तुम्ही आम्हाला पकडताय. ’’ (हे सारे प्रेषित) आनंद वार्ता देणारे आणि भीती घालणारे बनवून पाठविण्यात आले होते  जेणेकरून हे प्रेषित आल्यानंतर लोकांकडे (आपण निर्दोष) असल्याचा तर्क अल्लाहसमोर कोणी देऊ शकणार नाही. अल्लाह जबरदस्त शक्तीमान आणि हिकमतवाला आहे’’ (सुरे निसा  : 165).’’येणेप्रमाणे अल्लाहने हा तर्क पुढे केला जावू नये म्हणून त्याची जबाबदारी प्रेषितांतवर टाकली आणि त्यांना या महत्वाच्या जबाबदारीवर नेमले की, जर त्यांनी सत्याची साक्ष लोकांसमोर ठीक-ठीक दिली तर मग लोक आपल्या कर्मासाठी स्वतः जबाबदार राहतील. मात्र जर प्रेषितांकडून साक्ष देण्यामध्ये निष्काळजीपणा करण्यात आला आणि त्यामुळे लोक  पथभ्रष्ट झाले तर मात्र प्रेषितांची पकड होईल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रेषितांच्या पदाची ही नजाकत होती की, एक तर त्यांनी सत्याची ठीक- ठीक साक्ष देऊन लोकांना कारण  सांगण्याची संधीच देऊ नये, नाहीतर लोक उलट त्यांच्यावर आरोप लावतील की, ह्यांनी आपल्या पदाचा मान राखत अल्लाहचा संदेश आमच्यापर्यंत ठीक- ठीक पोहोचवलेला नाही. लोक  म्हणतील ऐ अल्लाह! जीवन जगण्याचा जो सरळ मार्ग तुम्ही प्रेषितांना सांगितला होता तो मार्ग तर त्यांनी आम्हाला दाखविलाच नाही. हेच कारण होते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. आपल्यावरील या जबाबदारीच्या ओझ्याच्या जाणीवेसंबंधी अतिशय संवेदनशील होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या तर्फे सत्याची साक्ष देण्यामध्ये कुठलाच निष्काळजीपणा केला नाही  आणि लोकांना त्यांच्यावर आरोप करण्याची संधीच मिळू नये यासाठी आयुष्यभर जीव तोडून प्रयत्न केले.
प्रेषितांच्या मार्फत ज्या लोकांपर्यंत सत्य, ज्ञान आणि उपदेशाचा मार्ग पोहोचला ते एक उम्मत (समुदाय) बनवले गेले आणि त्यांच्या दर्जाला शोभेल अशी ही नाजूक जबाबदारी, जीचे  ओझे प्रेषितांवर टाकले गेले होते आता या उम्मतच्या वाट्याला आलेले आहेत. प्रेषित (सल्ल.) यांचे पायीक आणि वारस होण्याच्या प्रतिष्ठेतून त्यांचा हा मान ठरविला गेला की, त्यांनी  सत्याची साक्ष द्यावी. त्यानंतरही लोक सुधरले नाही तर मग त्यांची पकड केली जाईल. आणि जर यांनी (मुस्लिमांनी) सत्याची साक्ष देण्यामध्ये टाळाटाळ केली किंवा सत्याऐवजी  असत्याची साक्ष दिली तर इतर लोकांच्या अगोदर हे स्वतः पकडले जातील. अगोदर त्यांच्याकडून त्यांच्या कामागिरीबद्दल विचारपूस होईल आणि त्या लोकांच्या कर्माबाबतही विचारपूस  यांच्याचकडून केली जाईल की तुम्ही सत्याची साक्ष न दिल्यामुळे किंवा चुकीची साक्ष दिल्यामुळे हे बाकीचे लोक मार्गभ्रष्ट, दंगेखोर आणि पापी झाले.

(क्रमशः)

१. माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की कर्मांची भिस्त फक्त दृढनिश्चयावर आहे आणि मनुष्याला ते सर्व मिळेल ज्याचा   त्याने निश्चय केला असेल, अल्लाह आणि पैगंबरांसाठी केलेली ‘हिजरत’ उत्तम ‘हिजरत’ होय आणि भौतिक जगासाठी केलेली अथवा एखाद्या महिलेशी विवाह करण्यासाठी असलेली  ‘हिजरत’ या जगासाठी अथवा महिलेसाठीच समजली जाईल. (बुखारी व मुस्लिम)
२. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह तुमचा चेहरामोहरा आणि तुमच्या संपत्तीला पाहणार नाही तर तुमची हृदये आणि  तुमच्या कर्मांना पाहील. (मुस्लिम)
३. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की अंतिम निवाड्याच्या (‘कयामत’च्या) दिवशी सर्वप्रथम एका अशा   मनुष्याच्या बाबतीत निर्णय देण्यात येईल ज्याला हौतात्म्य लाभले असेल, त्याला अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल. मग अल्लाह त्याला आपल्या सर्व देणग्यांची आठवण करून  देईल आणि त्याला त्या सर्व देणग्या आठवतील तेव्हा विचारले जाईल, ‘‘तू माझ्या देणग्या प्राप्त करून कोणते काम केले?’’ तो म्हणेल, ‘‘मी तुझ्या प्रसन्नतेसाठी (तुझ्या जीवनधर्माचा  (‘दीन’चा) विरोध करणाऱ्यांविरूद्ध) युद्ध केले, इतकेच नव्हे तर मी आपले प्राण दिले.’’ अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘तू ही गोष्ट खोटी सांगितली की माझ्यासाठी युद्ध केले, तू फक्त यासाठी  युद्ध केले (आणि शौर्य दाखविले) की लोकांनी तुला शूरवीर म्हणावे. मग जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘त्या हुतात्म्याला तोंडघशी फरफटत घेऊन जा  आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला नरकात टाकले जाईल. मग एक दुसरा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात उभा केला जाईल, तो ‘दीन’ (जीवनधर्म) चा ज्ञानी आणि ‘दीन’  शिकविणारा असेल. त्याला अल्लाह आपल्या देणग्यांची आठवण करून देईल आणि त्याला सर्व देणग्या आठवतील. तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘त्या देणग्या प्राप्त करून तू कोणते   कर्म केले?’’ तो म्हणेल, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्यासाठी तुझ्या ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले आणि तुझ्यासाठी दुसऱ्यांना त्याचे ज्ञान दिले आणि तुझ्यासाठी पवित्र कुरआनचे पठण केले.’’   अल्लाह म्हणेल, ‘‘तू खोटे सांगत आहेस. लोकांनी तुला ‘आलिम’ (विद्वान) म्हणावे यासाठी तू ज्ञान प्राप्त केले, लोकांनी तुला कुरआन जाणणारा म्हणावे यासाठी तू कुरआनचे पठण   केले; तेव्हा जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत घेऊन जा आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला फरफटत नेण्यात आले आणि   नरकात फेकण्यात आले. आणि तिसरा मनुष्य तो असेल ज्याला अल्लाहने जगात ऐशोआराम प्रदान केला होता आणि प्रत्येक प्रकारची संपत्ती दिली होती. या मनुष्यास अल्लाहसच्या  समोर हजर केले जाईल आणि तो आपल्या सर्व देणग्या सांगेल आणि त्याला अल्लाहच्या सर्व देणग्या आठवतील आणि मान्य करील की होय, या सर्व देणग्या त्याला देण्यात आल्या  होत्या. तेव्हा त्याचा पालनकर्ता त्याला विचारील, ‘‘माझ्या देणग्या प्राप्त करून तू कोणते कर्म केले?’’ तो उत्तर देईल, ‘‘जेथे जेथे खर्च करणे तुला पसंत होते तेथे मी तुझी प्रसन्नता  प्राप्त करण्यासाठी खर्च केले.’’ अल्लाह म्हणेल, ‘‘खोटे बोलतोस. तू ही सारी संपत्ती लोकांनी तुला दानशूर म्हणावे यासाठी खर्च केलीस. मग त्याच्या बदला तुला जगात मिळाला.’’  मग  आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत न्या आणि नरकाच्या आगीत फेकून द्या.’’ तद्वत त्याला नेऊन नरकाच्या आगीत फेकून देण्यात येईल.

(हदीस : सही मुस्लिम)

इस्लाम एक नैसर्गिक व्यवस्था आहे. माणसाच्या प्रकृतीशी अनुकूल आहे. जी माणसाची प्रकृती आहे तोच इस्लाम आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’आणि जेव्हा हे त्यांना ऐकवले  जाते तेव्हा ते म्हणतात आम्ही यावर श्रद्धा ठेवली.’’ हे सत्य आहे की, हे आमच्या अल्लाहकडून आहे. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत’’ प्रत्येक चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला  असेच वाटते. जेव्हा इस्लामी मुल्य त्यांच्यासमोर सादर केली जातात तेव्हा त्यांच्या अंतरआत्म्यातून त्याला स्वीकारण्याची आवाज येते. इस्लामकडे परत येणे वास्तविक पाहता आपल्या  मूळ प्रवृत्तीकडे परत येण्यासारखे आहे. जर काही लोकांना इस्लाम विषयी संवेदना वाटत नसेल, त्याच्या संदेशामुळे कोणाला अस्वस्थ वाटत असेल, इस्लाम विषयी घृणेचा भाव उत्पन्न  होत असेल तर त्याचे कारण हे आहे की, त्यांच्या प्रवृत्तीवर काही पडदे पडलेले आहेत. त्या पडद्यांना हटवून इस्लामचा संदेश त्यांच्यासमोर मांडावयाचा आहे. ज्या अडचणी आहेत त्या  दूर कराव्या लागतील. मग प्रश्न असा पडतो की, हे पडदे किंवा अडचणी काय असू शकतात? सर्वात मोठा पडदा तर गैरसमजाचा पडदा आहे. अशा लोकांनी चुकीच्या प्रवृत्तीच्या  मुस्लिमांकडे पाहून इस्लामविषयी आपले मत बनविलेले असते. मुस्लिम समाजात स्थापित झालेल्या चुकीच्या पद्धती, गुन्हेगारी इत्यादीकडे पाहून त्यांनी इस्लामविषयी स्वतःचे मत  बनविलेले आहे. अनावश्यक जातीय प्रतिस्पर्धा, हट्ट आणि जातीय अस्मितेमुळे हट्टीपणा वाढतो. हा सुद्धा एक पडदाच आहे. अशा पद्धतीचे हे जे पडदे आहेत, त्यांना हटवावे लागेल आणि  इस्लामची वास्तविक संकल्पना त्यांच्यासमोर सादर करावी लागेल. असे झाल्यास मानवाची मूळ प्रवृत्ती आपोआप त्याकडे आकर्षित होईल.
अशा परिस्थितीमध्ये करावयाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्याला सामाजिक स्तरावर एक शक्तीशाली आंदोलन चालवावे लागेल. देशबांधवांसमोर व त्यांच्यातील वेगवेगळ्या  गटांशी आपले चांगले संबंध वृद्धींगत करावे लागतील. त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल,  त्यांच्या मनाची दारे ठोठवावी लागतील, त्यांची मने जिंकावी लागतील, त्यांना सांगावे लागेल की  खरा इस्लाम काय आहे? आणि इस्लामचा संदेश काय आहे? तुम्ही त्यांना दाखवून द्या की इस्लाम शांतीचा ध्वजवाहक आहे, इस्लाम आंतरराष्ट्रीय बंधूभावाचे नाव आहे, इस्लाम माणुसकीचे नाव आहे, हा कुठल्या खास गटासाठी नाही तर जगातील सर्व लोकांसाठी आहे. सर्व लोकांना आपसात जोडणे, हा त्याचा उद्देश आहे. मानवाला या जीवनामध्ये आणि  मरणोपरांत जीवन जे की कायम राहणार आहे, दोन्हीमध्ये यशस्वी करण्यामध्ये त्याला रस आहे. हे जगातील सर्वात मोठे सत्य आपल्याला अतिशय प्रेम, सहृदय आणि अत्यंत तडफेने  इथल्या लोकांना सांगावे लागेल.
हे सामाजिक कार्यच जातीयवादाला समाप्त करू शकेल. जातीयवाद नष्ट करण्याचा दूसरा कुठला मार्गच नाही. तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस जातीयवादाचा सामना करत बसाल  तर कितीही शतके झाली तरी जातीयवाद नष्ट होणार नाही. हा जातीयवाद सामाजिक कार्याने समाप्त होईल आणि सामाजिक काम याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आहे. तुम्ही  त्यांच्यापर्यंत पोहचा. त्यांच्या बुद्धी आणि मनावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मी एसआयओमध्ये असतांना माझ्या तरूण मित्रांना नेहमी सांगत होतो आणि सांगतो की, जे  विद्यार्थी महाविद्यालय आणि विद्यापीठात आपल्या सोबत विद्यार्जन करत आहेत तेच उद्या या देशाची सुत्रे सांभाळतील. प्रत्येक विद्यार्थी 11 वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत  कमीत कमी 7 वर्षे तेथे असतो. जर मुस्लिम विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आणि शपथ घेतली की आपल्या सात वर्षाच्या या महाविद्यालयीन कालखंडामध्ये सात विद्यार्थ्यांना  इस्लामचा परिचय करून देऊ आणि इस्लामचा खरा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू, तेव्हा त्यांच्या मनामध्ये इस्लाम विषयी एक ओलावा निर्माण होईल. इस्लामचा संदेश काय आहे हे  आपल्या वाणी आणि वर्तनाने या सात वर्षात सात विद्यार्थ्यांसमोर मांडणे अवघड काम आहे काय? आज भारतातील सर्वच मुस्लिम तरूणांनी हे काम करण्याचा निश्चय केला तर दहा  वर्षानंतर भारत कसा असेल याची कल्पना करा.
आज तुम्ही ज्या मोठ-मोठ्या वृत्तवाहिन्याने हैराण आहात उद्या त्या चॅनलच्या टेबलावर तेच लोक असतील जे आज तुमच्या सोबत शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या मनाला तुम्ही स्वच्छ  केलेले असेल. ज्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश योग्य स्वरूपात पोहोचवलेला असेल. जे लोक उद्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणार आहेत ते हेच लोक असतील ज्यांच्यापर्यंत  तुम्ही इस्लामचा संदेश विद्यार्थी अवस्थेमध्येच पोहोचवलेला असेल. नोकरशाहीमध्ये, पोलिसांमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच लोक असतील ज्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच त्यांच्यापर्यंत  इस्लामचा वास्तविक संदेश पोहोचलेला असेल. घृणेला संपविण्याचा, जातीयवादाशी सामना करण्याचा, वर्गव्यवस्थेला नष्ट करण्याचा, देशात खऱ्या अर्थाने न्यायाची स्थापना करण्याचा  हाच सर्वात सोपा मार्ग आहे. हे सर्व तुम्हा विद्यार्थ्यांच्या हातात आहे. तुम्ही जर निश्चय केला की हे काम करायचेच आहे तर हे काम सहजरित्या होऊ शकेल. अलिगढ विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांना या कामामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. अल्लाहने तुम्हाला एका अशा ठिकाणी आणि अशा स्तरावर ठेवलेले आहे की, पूर्ण देशातील विद्यार्थ्यांवर तुमचा परिणाम होतो.  तुम्हाला याची खात्री करावी लागेल की, तुमच्या विद्यापीठातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी हे काम करेल. इन- शा- अल्लाह. मग देशातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी या कामाकडे  आकर्षित होणे अवघड नाही. देशात हा जो जातीयवाद पसरलेला आहे अशाच पद्धतीने पसरवला गेलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मन आणि बुद्धीला प्रभावित केलेले आहे. म्हणून याची  सफाईसुद्धा याच पद्धतीने करावी लागेल.
इस्लामचा संदेश केवळ मौखिकरित्या देउन उपयोग होणार नाही. असे प्रयत्न परिणामकारक ठरणार नाहीत. आपण भाषण कराल, त्यांना पुस्तकं द्याल आणि मौखिकरित्या सांगाल  की  इस्लाम सर्वश्रेष्ठ जीवन व्यवस्था आहे. पण हे पुरेसे नाही. या सोबत आपल्या वर्तणुकीतून इस्लाम श्रेष्ठ असल्याचा पुरावा त्यांच्यासमोर ठेवावा लागेल. आम्हाला प्रत्यक्षात इस्लाम कसा  आहे, याची साक्ष आपल्याला वर्तनाने द्यावी लागेल. आपले वैयक्ति आणि सामुहिक चारित्र्य सुद्धा दुसऱ्यांना इस्लामकडे आकर्षित करेल असे ठेवावे लागेल.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला इस्लामचे नाव वाढविणाऱ्यांमध्ये केंद्रीय स्थान प्राप्त आहे. लोक येथील वातावरणावरून मुस्लिम समाजाला समजण्याचा प्रयत्न करतात. म्हणून येथील  विद्यार्थ्यांना माझी दूसरी विनंती अशी आहे की, या विद्यापीठाला त्यांनी इस्लामचे केंद्र बनवावे. इस्लाम काय आहे? त्याचा संदेश काय आहे? इस्लामचा संदेश शांती आणि प्रेम कसा आहे? तो समतामूलक कसा आहे? अलिगढ विद्यापीठामध्ये प्रवेश केल्याबरोबर येथील वातावरणातून लोकांना त्याची जाणीव व्हायला हवी. काल मला खूप आनंद झाला जेव्हा माझ्या  मित्रांनी मला कळविले की, येथे मुलींबरोबर जी वर्तणूक ठेवली जाते ती अतिशय चांगली आहे. त्यांना सुरक्षित वातावरण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा जो  सन्मान या ठिकाणी होतो ते पाहून बहुसंख्यांक बंधुसुद्धा आपल्या मुलींना उच्चशिक्षणासाठी या ठिकाणी पाठवून आनंदी होत आहेत. मला हे ही सांगण्यात आले आहे की, अनेक  महत्त्वाच्या पदावर असलेल्या हिंदू बंधूंनी त्यांना सांगितले की, या विद्यापीठामध्ये आपल्या मुलींना पाठवून त्यांना समाधान मिळत आहे. त्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबद्दल  काळजी वाटत नाही. त्याच वेळेस त्यांनी हे ही सांगितले की, देशातल्या कुठल्याच विद्यापीठामध्ये असे वातावरण नाही. हे ऐकूण आपल्याला अंदाज होणार नाही की, मला किती आनंद  झाला. माझी मान गर्वाने उंच झाली. तुमच्यासाठी माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे दुआ निघाली. यासाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये या विद्यापीठाची अशीच  प्रतिमा राहिली तर त्याचा अर्थ असा होईल की इथे इस्लाम प्रत्यक्षात आचरणात आणला जातोय आणि हे विद्यापीठ इस्लामच्या खऱ्या शिक्षणाची साक्ष देण्याचे केंद्र बनून जाईल. हे  वाळवंटातील ओयासिस (मरूद्यान) सारखे केंद्र बनून जाईल की सगळे लोक याच्याकडे आकर्षित होतील. सगळ्या देशाला हे जर कळेल की, अलिगढ विद्यापीठ हे एक असे विद्यापीठ  आहे जेथे रॅगिंग होत नाही. कारण इस्लामला ते मान्य नाही, जेथे मुलींशी छेडछाड केली जात नाही, त्यांना कुठलाच त्रास दिला जात नाही, कारण की इस्लामला ते मान्य नाही. हे एक  असे विद्यापीठ आहे की ज्याच्या वातावरणामध्ये प्रेम, आपुलकी, शांती खच्चून भरलेली आहे. कारण हाच इस्लामचा संदेश आहे.
हे एक असे विद्यापीठ आहे ज्या ठिकाणी जाती आणि धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये कुठलाच भेदभाव केला जात नाही. एका दलित विद्यार्थ्याला भाऊ समजून त्याची गळाभेट घेतली जाते.  त्याचा माणूस म्हणून सन्मान केला जातो. त्याला तेच स्थान मिळते जे कुठल्याही उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थ्याला मिळते. हे भारताचे एकमेव विद्यापीठ आहे जेथे असे सकारात्मक  वातावरण आहे. याचे प्रात्यक्षिक देशभरामध्ये प्रचारित केले गेले तर ती ही वर्तणुकीतून इस्लामची दिलेली साक्ष ठरेल. हे इस्लामचे प्रात्यक्षिक आहे. हे असे एक विद्यापीठ आहे जेथे  गरीब विद्यार्थी प्रवेश घेताच सर्व विद्यार्थी त्याच्या मदतीला धावून येतात. त्याला एक क्षणासाठीही असे वाटत नाही की विद्यापीठाचे अमूक क्षुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत,  पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, बाईक घेण्यासाठी पैसे नाहीत, येणेप्रमाणे त्याला वंचित असल्याचा अनुभव येथील विद्यार्थी येवूच देत नाहीत. सारे विद्यार्थी पुढे येवून त्याला  आपला भाऊ समजून जमेल तशी त्याला मदत करतो. अशी प्रतिमा जर आपण तयार करू शकाल तर ती सुद्धा इस्लामची प्रत्यक्ष साक्ष देण्यासारखे होईल आणि आपली ही वर्तणूक  हजारो भाषणांवर, लाखो पुस्तकांवर, अनेक शिबिरांवर भारी पडेल. मीडियाने पसरविलेले सारे विष निघून जाईल. मग त्यानंतर टेलिव्हिजनवाले कितीही ओरडत राहो इस्लाम आतंकवाद  पसरवितो, म्हणून कितीही म्हणत राहो, महिलांवर अत्याचार करतो म्हणून कितीही ओरडत राहो, मुस्लिम ’असे’ आहेत ’तसे’ आहेत, असे कितीही म्हणो, आपल्या सामुहिक चारित्र्याच्या नमुन्यापुढे हा सारा दुष्प्रचार धाराशाही होऊन जाईल. लोकांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध टेलीव्हिजनच्या व्यर्थ चर्चेपेक्षा श्रेष्ठ असतात. मीडियाचा दुष्प्रचार त्या ठिकाणी यशस्वी होतो ज्या ठिकाणी तुमचे संबंध इतरांशी नसतात. जर का तुम्ही आपल्या वाणी आणि वर्तनातून लोकांना तुमच्याबद्दल खरी माहिती द्याल तर मीडियाच्या चुकीच्या प्रचारावर कोणीही  विश्वास ठेवणार नाही. एखाद्या व्यक्तीबाबत मीडियाने तो चोर आहे म्हणून प्रचार करावयास सुरूवात केली तर ते लोक त्याला चोर समजू शकतात जे त्याला ओळखत नाहीत. मात्र जे  लोक त्या व्यक्तीशी रास्त संपर्कात आहेत, जे त्याच्या चारित्र्याला जाणून आहेत, ते मीडियाच्या दुष्प्रचारावर मुळीच विश्वास ठेवणार नाहीत उलट ते मीडियाच्या या प्रचाराकडे दुर्लक्ष करतील.
प्रिय मित्रांनों ! माझी विनंती ही आहे की, आपण इस्लामचा संदेश देण्याच्या कामाचे ध्वजवाहक बना. दुसरी विनंती अशी की, या विद्यापीठाला इस्लामचे प्रात्यक्षिक केंद्र बनवा, चलता-  फिरता इस्लाम या ठिकाणी इतरांना दिसायला हवा. लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी इस्लामला येथे पहावे. त्यांना येथे येताच या गोष्टीचा अनुभव यावा की इस्लामचे पवित्र वातावरण  कसे असते? इस्लाममुळे कसे लोक घडतात आणि विद्यार्थ्यांचा कसा समाज निर्माण होतो?
मित्रांनों! शेवटची गोष्ट अशी की, याचबरोबर हे सुद्धा आवश्यक आहे की, आपण उच्चशिक्षण ग्रहण करावे, समाजावर परिणाम करण्यासाठी आपण उच्चशिक्षित असणे आवश्यक आहे. उच्च योग्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल आलेले आहेत. जे त्याच्यात यशस्वी झालेले आहेत ते जर येथे उपस्थित असतील तर  किंवा त्यांचे नातेवाईक येथे उपस्थित असतील तर किंवा त्यांचा गुरूजनवर्ग येथे उपस्थित असेल तर मी मनापासून त्या सर्वांचे अभिनंदन करतो. अल्लाह त्यांच्यातील योग्यता आणखीन  वृद्धींगत करो. त्यांना देश आणि देशबांधवांसाठी उपयोगी बनवो. मित्रांनों! प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचे भांडवल आहे. भांडवल बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक इच्छाशक्ती आणि दूसरे दुसऱ्यांसाठीचे प्रेम. तुम्ही सर्व समाजसेवेसाठी संवेदनशील व्हा. देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, याची मनात खूनगाठ बांधा. सर्व मंगल हो.   योग्यता नसेल तर आपण फार छोट्या प्रमाणात काम करू शकतो. मात्र आपण उच्च योग्यता प्राप्त केली असेल तर आपण मोठी सेवा बजावू शकतो.
तुम्ही नोबेल पारितोषिक पटकाविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात वेगवेगळ्या विषयामध्ये नोबेल पारितोषिकाला गवसणी घालावी. आपल्या  विषयामध्ये असाधारण संशोधन करावे. असे झाल्यास त्याचा उपयोग सुद्धा देशाला मोठ्या प्रमाणात होईल. देशासाठी आपण भांडवल बनाल आणि तेव्हा तुम्ही जो संदेश द्याल संपूर्ण देश तो संदेश लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही कॅन्सरवरील औषध शोधून काढा, इतर घातक आजारांवरील औषध शोधून काढा, इतर मोठ्या समस्यांवर उपाय शोधून काढा, तुम्ही आर्थिक आणि  सामाजिक समतेचे नवीन मापदंड शोधून काढा, तेव्हा देश तुमचा संदेश लक्षपूर्वक ऐकेल. अशा प्रकारे तुम्ही देशावर स्वतःची छाप पाडू शकाल. जर आपल्याला आपल्या समाजाला श्रेष्ठ   बनवायचे असेल, समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर उच्चकोटीची योग्यता अंगी बाळगणे आवश्यक आहे. खासकरून विद्यार्थीदशाच ती आदर्श अवस्था आहे जिच्यामध्ये  आपण उच्च योग्यता प्राप्त करू शकू. माझी विनंती राहील की आपण आपले लक्ष उच्च ठेवा. विद्यापीठाची परीक्षा पास करणे त्यात चांगले गुण प्राप्त करणे हा काही मोठा उद्देश्य  नाही. यापेक्षाही मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवा. आपल्या विषयात तुम्ही जगाचे नेतृत्व करण्याइतपत योग्यता मिळविण्याचे लक्ष ठेवा. जर तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल तर  अर्थशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत, जर तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी असाल तर राज्यशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत क्षमता तुमच्यामध्ये हवी आणि ती क्षमता निर्माण करणे हेच  तुमचे ध्येय असायला हवे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती योग्यता मिळविण्यात तुम्ही जर यशस्वी झालात तेव्हा तुम्ही जे म्हणाल त्याचा परिणाम साऱ्या देशावर होईल  आणि तेच सकारात्मक बदलाचे कारण ठरेल.
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. या विद्यापीठाने भूतकाळामध्ये अडचणीच्या वेळेस मुस्लिम समाजाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे नेतृत्व केलेले आहे. त्यांना मार्ग  दाखविलेला आहे. फसलेल्या समाजाला चक्रव्यूवहातून बाहेर काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. मी आशा करतो भूतकाळातील आपल्या भूमिकेशी साधर्म्य राखून  भविष्यातही आपण आपली भूमिका वठवाल. अल्लाह आपल्या सर्वांना आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याची प्रेरणा देवो, मदत करो आणि त्यासाठी आवश्यक ती  योग्यता प्रदान करो. आमीन.

(सदरचे भाषण अमीरे जमात सआदतुल्लाह हुसैनी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थी परिषदेसमोर 21 एप्रिल 2019 रोजी दिलेले होते. उर्दूचे मराठी भाषांतर एम.आय. शेख व बशीर शेख यांनी केले.)

आदरणीय जाबीर (रजी.) कथन करतात की, आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा सगळ्यांच्या (काफीला) पाठीमागे चालत. कृश, कमजोर लोकांना आपल्या  वाहनावरती (उंटावर) बसवून घेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करीत असत. (अबु दाऊद) आदरणीय अनस (रजी.) प्रेषिताविषयी आपला अनुभव सांगतात की, प्रेषित (स.) आजारी  व्यक्तिची विचारपूस करीत. अंत्ययात्रेमध्ये सामिल होत होते. नोकर आणि गुलामांचे निमंत्रण स्विकारीत. (बहकी)
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) चे जीवन सर्व जगातील मानवांसाठी एक आदर्श मॉडेल आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी, चमक देतो. त्याच्या  जीवनातील प्रत्येक क्षण अनुकरणीयच नव्हे तर मानवांसाठी मार्गदर्शन आहे. त्यांचे जीवन एक खुले पुस्तक आहे ज्याच्या प्रत्येक पानावर आम्हाला जीवन जगण्यासाठी प्रकाश आहे जो  जीवनाच्या कठीणतम मार्गात सुद्धा मार्गदर्शन करीत असतो. प्रेषिताचे जीवन राजे महाराजासारखे नव्हते तर समाजातील एकत्र सामान्य माणसाच्या जीवनासारखे होते. असामान्य  व्यक्तिमत्वाचे सामान्य जीवन होते. समाजातील प्रत्येक मागासाबरोबर ते सहजपणे मिसळत, जेणेकरून त्या सामान्य माणसाला प्रेषित आपलेच आहेत असे वाटावे.
आदरणीय जाबीर हे प्रेषितांचे सहयोगी होते. ते आपल्या अनुभव कथन करतात आणि हा अनुभव प्रवासातील आहे. प्रेषित (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा त्यांच्या बरोबर पुष्कळ  लोक असत. ज्याप्रमाणे अरबस्तानात त्याकाळी लोक जत्थ्यांनी प्रवासाला निघत. जेव्हा हे जत्थे निघत तेव्हा जत्त्थाचा प्रमुख सर्वात पुढे असायचा. पण जेव्हा प्रेषित (स.) प्रवासाला  निघत तेव्हा ते जत्थाच्या सर्वात शेवटी राहत. प्रवास करत ह्याला कारण म्हणजे ते सर्व जत्थाधील सर्वांची काळजी घ्यायचे, सर्वांकडे लक्ष द्यायचे, कुणी जत्थ्यामधून सुटला तर नाही  ना? ह्याची देखरेख ते स्वत: करायचे. आजारी, कमजोर, वृद्ध लोकांना आपल्या वाहनावरती बसवून घेऊन जात. म्हणजेच ह्या लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांची आपलुकीने काळजी  घेत. येवढे करून आदरनीय प्रेषित थांबत नसत तर परमदयाळू अल्लाहपाशी त्या सर्व आजारी, वृद्ध लोकांसाठी दुआ (प्रार्थना) करीत. जगात अनेक महापुरुष होऊन गेले पण ह्या  पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणारा विरळाच. म्हणून तर त्यांचे सहकारी त्यांचा अत्यंत आदर करीत, त्यांना जावापलीकडे जपत, त्यांच्या आज्ञा तंतोतंत पाळीत. एकदा  मशीदीत प्रेषित प्रवचन देत होते, समोर काही लोक उभे होते. प्रेषितांना बसण्यास सांगीतले. ते उभे असलेले तर खाली बसले, परंतु ज्यांनी हे ऐकले ते बसले म्हणजेच मशीदीच्या बाहेर  जे लोक होते ते सुद्धा बसले. असे आज्ञापालन व्हायचे. प्रेषितांच्या आदेशाचे ह्याला कारण म्हणजे प्रेषितांचे सर्वाबरोबर प्रेमळ वागणे होय.
दुसऱ्या कथनात प्रेषितांचे दुसरे एक अनुयायी आपला अनुभव कथन करतात. आदरणीय प्रेषित आजारी माणसांची नेहमी विचारपूस करीत. आदरणीय प्रेषित, जेव्हा त्यांना माहीत होई   की, क्ष व्यक्ति आजारी आहे, तेव्हा ते स्वत: त्या आजारी व्यक्तिच्या घरी जात. त्याच्या कपाळावर हात ठेवित. त्याला काही सूचना करीत. त्याला धीर देत आणि परतताना त्याच्या  आरोग्यासाठी अल्लाहपाशी दुआ करीत. आजारी माणसाची विचारपूस करणे हे सत्कृत्य मानले गेले. प्रेषित नेहमी कामात अग्रेसर राहत. जेव्हा जेव्हा कुणाचा मृत्यू होत असे तेव्हा  प्रेषित त्याच्या अंतयात्रेमध्ये स्वत: सामील होत होते. मग तो गरीब असो की श्रीमंत. अंत्ययात्रेत सामील होऊन प्रेषित कबरस्तानापर्यंत जात. मयत व्यक्तिबद्दल अल्लाहशी दुआ करीत  आणि मयताचा दफनविधी होईपर्यंत थांबत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget