Latest Post

मुस्लिम व्यक्तिगत कायदे मुस्लिमांच्या सामुदायिक व्यक्तिमत्वासाठी तितकेच आवश्यक आहेत, जितके एखाद्या जीवंत शरीरासाठी त्याच्या सर्व अवयवाची आवश्यकता असते. याचे कारण किवा त्याच्या घटकांची सत्यता आकलन करून घेण्यासाठी एखाद्या सामुदायिक आणि सांस्कृतिक गटाच्या रचनेची बारकाईने निरिक्षण करा आणि पहा तो कसा बनला आहे? ती कोणती विशेष तत्वे असतात ज्या योगे एक जनसमूह, दूसर्या जनसमूह आणि गटाहून वेगळे व्यक्तिमत्व राखणारा आणि चिरस्थायी समुदायाची योग्यता दाखवितो.
असा विचार केल्यानंतर लक्षात येते की या प्रकरणात प्रथम महत्व पायाभूत श्रद्धा आणि धारणांना आहे. आणि तेच या समुदायाच्या वैशिष्टयांचे वास्तविक उगमस्थान आहे. परंतु त्याबरोबरच ते आदेश आणि कायदे अमलात आणण्यालाही कमी महत्व असत नाही. या कायद्याच्या अमलाखाली समुदायाच्या व्यक्तिची संपूर्ण आयुष्ये व्यतीत होत असतात. श्रद्धा आणि विचार डोळ्यांना दिसणार्या बाबी नसल्यामुळे ते कोणत्याही समुदायाच्या व्यक्तित्वाचे सूचक किवा चिन्हे बनू शकत नाही. व्यावहारिक दृष्टीने समुदायाची ओळख त्याच्या वैशिष्टयाची दर्शक चिन्हे त्यांच्या वागण्याच्या दृश्य पद्धति आणि ते कायदे व सिद्धान्त असतात. ते पायाभूत श्रद्धेनी आणि धारणानी स्वीकारलेली असतात आणि त्यावर हुकूम त्यांच्या आयुष्याचे व्यवहार होत असतात. समाजाने अमलात आणण्याच्या दृष्टीने आणि सर्वसाधारण आयुष्याच्या व्यावहारिक संपर्काच्या दृष्टीने हे कायदे आणि सिद्धांत समान असत नाहीत म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या रचनेत सुद्धा त्यांची अमलबजावणी दखल घेण्यायोग्य असू शकत नाही.
ज्या कायद्याचा संफ समाजातील लोकांच्या जीवनाशी अधिक असेल त्या समाजाच्या रचनेत त्या कायद्याच्या अंमलबजावणीची दखल तेवढी अधिक असेल. या दृष्टीने व्यक्तिगत कायद्याला विशेष स्थान आहे. विवाह विधी(निकाह), पत्नी व मुलांच्या अन्न वस्त्राची व्यवस्था(नफका), नवर्या मुलाने वधूस भेटी दाखल द्यावयाची रक्कम(महर), पतीकडून घटस्फोट(तलाक), पत्नीकडून घटस्फोट(खुलअ), विवाह विच्छेदन(फस्ख निकाह), दामपत्य अधिकार आणि कर्तव्य, वारसाहक्क, मृत्यूपत्र, रजाअत, हजानत, किफालत इत्यादि बाबींचा आणि प्रकरणांचा व्यावहारिक संबंध समाजातील सर्व लोकांशी असतो आणि याबाबतच्या समस्यांनी समाजातील जवळजवळ सर्व व्यक्ति ग्रासलेल्या असतात. आयुष्यातील याशिवाय दुसर्या समस्या तुलनात्मक दृष्टया कमी किवा मर्यादित प्रमाणात असतात म्हणून आयुष्यातील व्यवहार व्यवस्थित पार पाडण्यासाठी असलेल्या कायद्याचे सामुदायिक महत्व खूप जास्त आणि अधिक नैसर्गिक असते आणि समुदायाच्या वैशिष्टयाचे आणि मुख्य व्यक्तिमत्वाचा आधार या कायद्यावर जितका असतो तितका दुसर्या कायद्यावर कधीही नसतो.
सर्वसाधारण परिस्थितीत हेच कायदे समाजाच्या वैशिष्टयाचा आणि खास व्यक्तित्वाचा आरसा असतो, असे म्हणणे वावगे होणार नाही. याच कायद्यांच्या रचनेमध्ये व्यक्तित्वाचे दर्शन घडणे शक्य आहे.

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -
‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)
माननीय आयेशा (र) म्हणतात -
‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)
एका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -
‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)
नमाजचा इतमाम
उपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.
माननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई ! नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)
यावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.
मैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)
जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे
स्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -
‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)
आणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,
‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)
ही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.
‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
यावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -
  1. माननीय आयेशा (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)
  2. माननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -
    ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)
  3. माननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)
  4. एकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)
    जैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
    ‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)
या कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,
‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७

- मौ. अबुल आला मौदूदी (रह.)
   
    या पुस्तिकेत सांगितले गेले की मुस्लिम समाजाचे अस्तित्व कल्याण व उपकाराचे मूर्तीमंत उदाहरण आहे. हा समुह सदाचाराचा विस्तार व दुराचाराचा बिमोड करण्यासाठी आहे.
    आवश्यकता आहे की आम्ही मुस्लिमेतरांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून घ्यावी ज्यामुळे असा कोणताही प्रकार घडता कामा नये की ज्यामुळे इस्लामबद्दल चुकीची धारणा निर्माण होईल. या पुस्तिकेत या संदर्भातच चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 141     -पृष्ठे - 16    मूल्य - 10               आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/gbkblnolpmd3o3dhxyflrzl8uxrni3bj

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे माननीय उमर (रजि.) आले आणि म्हणाले, ‘‘आम्हाला यहुद्यांच्या (ज्यूंच्या) काही गोष्टी योग्य वाटतात,  यावर आपले काय मत आहे? त्यापैकी काही गोष्टी आम्ही लिहून घ्याव्यात काय?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जसे ज्यू आणि खिश्चन लोक आपले ग्रंथ सोडून खड्ड्यात पडले  तसे तुम्हीदेखील मार्गभ्रष्टतेच्या खड्ड्यात पडू इच्छिता? मी तुमच्याजवळ तो धार्मिक कायदा आणला आहे जो सूर्यासम प्रकाशमान आणि आरशासम स्पष्ट आहे आणि जर आज मूसा  (अ.) जिवंत असते तर त्यांनादेखील माझे आज्ञापालन करावे लागले असते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान बाळगल्यानंतर आवश्यक आहे की मनुष्याने आपली इच्छा, आपली आकांक्षा आणि आपल्या मनोकामनांना पैगंबरांनी आणलेल्या उपदेशाच्या अधीन करावी, पवित्र कुरआनच्या हातात आपल्या इच्छेची लगाम द्यावी, असे न केल्यास पैगंबरांवर ईमान बाळगण्यास काहीही अर्थ उरत नाही.

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य मोमिन (ईमानधारक) होऊ शकत नाही जोपर्यंत मी त्याच्या दृष्टीने  त्याचा पिता, त्याचा पुत्र आणि सर्व मानवांपेक्षा अधिक प्रिय होत नाही.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की मनुष्य मोमिन तेव्हाच बनतो जेव्हा पैगंबर आणि त्यांनी आणलेल्या ‘दीन’ (जीवनधर्म) वरील आस्था इतर सर्व आस्थांपेक्षा  अधिक असेल. पुत्राचे प्रेम वेगळ्याच मार्गावर जाण्यास सांगते, पित्याचे प्रेम वेगळ्या मार्गावर जाण्यास सांगते आणि पैगंबर मुहम्मद (स.) दुसऱ्या मार्गावर चालण्यास सांगतात. मग  जेव्हा मनुष्य सर्व आस्थांना अमान्य करून फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यास तयार होतो तेव्हा समजा की तो सच्चा मोमिन (ईमानधारक) आहे, पैगंबरांवर प्रेम करणारा  आहे. असाच मनुष्य इस्लामला हवा आहे आणि असेच लोक जगाचा इतिहास घडवितात. अपूर्ण ईमान पत्नी व मुले आणि पिता व भावाच्या प्रेमांवर कात्री कशी चालवू शकेल!

माननीय अब्दुर्रहमान बिन अबू किराद (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वुजू केली (हात-पाय-तोंड धुवून शुचिर्भूत होणे) तेव्हा पैगंबरांचे काही सहकारी  पैगंबरांच्या वुजूचे पाणी घेऊन आपल्या चेहऱ्यावरून फिरवू लागले, तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही असे करण्यास उद्युक्त झालात?’’ लोकांनी म्हटले, ‘‘अल्लाह  आणि त्याच्या पैगंबरावरील प्रेम.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर प्रेम करण्याने जे खूश होतात त्या लोकांनी सत्य बोलावे आणि जेव्हा त्यांच्या ठेवण्यात आलेली  ठेव सुरक्षितपणे तिच्या मालकाला परत करावी आणि शेजाऱ्यांशी सद्व्यवहार करावा.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वुजूचे पाणी घेऊन पवित्रतेसाठी आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर मळणे पैगंबरांवरील प्रेमापोटी होते. हे काही वाईट कृत्य नसल्यामुळे पैगंबरांनी त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच नाही. पैगंबरांनी त्यांना सांगितले की प्रेमाचे श्रेष्ठत्व यात आहे की अल्लाह आणि पैगंबरांनी जे आदेश दिले आहेत त्यांच्या अवलंब करावा. पैगंबरांनी जो जीवनधर्म  सांगितला आहे त्यास आपल्या जीवनाचा धर्म बनवावा. पैगंबरांचे आज्ञापालन करणे पैगंबरांवरील प्रेमाचे सर्वांत उच्च स्थान आहे, अट एवढीच की ते पैगंबरांशी अतीव आसक्तीसह करावे.

एकाच अल्लाहवर, प्रेषित आणि पारलौकिक जीवनावर विश्वास, श्रद्धा ही मुक्तीची गुरुकिल्ली आणि इस्लामच्या भक्कम इमारतीचा पाया आहे. यानंतर पाच बाबी अशा आहेत की, त्या मूलभूत आधारस्तंभ बनतात, ज्यावर इस्लामची इमारत उभी आहे.
या पाच बाबी (स्तंभ) म्हणजे
    • एकेश्वरत्व आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे,
    • नमाज प्रस्थापित करणे,
    • जकात अदा करणे,
    • रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे,
    • काबागृहाची पवित्र यात्रा/हज करणे
एकेश्वरतत्व व प्रेषितत्व: यांची साक्ष देणे म्हणजे जाणीवपूर्वक, श्रद्धेने, विश्वासपूर्वक पवित्र कलिम्याची (इस्लामी धर्मसुत्राची) कृतीमध्ये अंमलबजावणी करणे. अल्लाहची गुलामी, भक्ती, प्रसन्नताप्राप्ती व प्रेषितांचे आज्ञापालन हे जीवनामध्ये उन्नती, उत्कर्ष व कायमस्वरुपी पवित्र क्रांती घडवून आणणे आणि ही क्रांती वरील गोष्टींशिवाय शक्य नाही. याकरिता त्यांची अंमलबजावणी, एवढेच नव्हे तर नमाजसुद्धा एक पुढचे पाऊल आहे.

नमाज: प्रस्थापित करण्याचा उद्देशच हा आहे, की मानवाला जाणीवपूर्वक, श्रद्धेने आणि विश्वासाने अल्लाहचे स्मरण व्हावे. गुलामी व आज्ञाधारकता यांची वचनपूर्ती अल्लाहप्रती व्हावी. आंतरबाह्य गोष्टींची पूर्तता करुन अल्लाहसमोर असहायतेने, लाचारीने, अजीजीने मान तुकवावी. नमाज दिवसातून पाच वेळा अनिवार्य आहे. नमाज मानवाला अल्लाहचा सच्चा दास बनविते. त्याला ईश्वरी कोपापासून व अवज्ञेपासून वाचविते. त्याला एक उत्तम आदर्श मानव बनविते. नमाजमुळे ईश्वराशी जवळीक साधली जाते. त्याची भक्ती व उपासना करण्यासाठी इतर कोणत्याही माध्यमाची जरुरी नाही. नमाज अदा करणारी प्रत्येक व्यक्ती ईश्वराच्या प्रेषिताने दाखविलेल्या मार्गाने स्वतः सन्मार्गामार्फत थेट संबंध प्रस्थापित करू शकते. सामूहिक नमाज (सर्व समावेशकपणे) श्रद्धाळू दासांकरिता सामूहिक बल, शिस्त आणि बंधुत्व निर्माण करण्याकरिता आहे. नमाजकरिता जागेची कोणतीही अट नाही, परंतु ती जागा स्वच्छ, पवित्र असली पाहिजे. मस्जिद ही शिस्त व सामूहिकता निर्माण करण्याकरिता आणि मंगल व कर्तव्यपरायणतेचे वातावरण निर्माण करण्याकरिता आहे. सुन्नत व नवाफल नमाज (प्रेषितांच्या आचरण पद्धतीनुसार व अतिरिक्त नमाज) सामायिक पद्धतीने अदा न करता स्वतंत्र व्यक्तिशः अदा करतात. इस्लामची शिकवण आहे की, मुस्लिमाने अल्लाहची स्तुति, आठवण, स्मरण, कुरआनचे पठन आणि इतर अधिक नमाजच्या सहाय्याने आपल्या घराचे वातावरण पवित्र व मंगलमय करावे. नमाज प्रत्येक स्त्री-पुरूषाला अनिवार्य आहे. तथापि स्त्रियांनी घरी नमाज अदा करणे श्रेयस्कर आहे.

मस्जिद व्यक्तिगत मालकीची किंवा खानदानी मिळकत नसते. अल्लाहच्या (ईश्वराच्या) उपासनेचे ते प्रार्थनाघर आहे. मस्जिदमध्ये श्रीमंत-गरीब, राजा-प्रजा, ज्ञानी-अडाणी, शहरी-खेडूत, भांडवलदार-मजूर, काळा-गोरा सर्व एकाच ओळीमध्ये उभे राहून, खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात. याप्रमाणे नमाज अल्लाहच्या गुलामीबरोबरच शिस्तबद्धता, उपासना, बंधुत्व, समानता, उत्तमोत्तम आचरण, कर्तव्यपरायणता यांची शिकवण देते. इस्लाम धर्माचे उत्तम ज्ञान असणारा आणि बहुसंख्याकांचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र असणारा नमाजचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिकार बाळगतो. नेतृत्वाकरिता कोण्या वंशाची किंवा खानदानाची अट नाही. प्रत्येक मुस्लिम इमाम (नेता) बनू शकतो. नमाज अरबी भाषेत होते. कारण वेगवेगळी भाषा बोलणारे मनुष्य, उपासनेची एक भाषा बोलणारे असणे आवश्यक आहे आणि म्हणून साऱ्या विविधतेच्या व फरकांच्या दलदलीतून निघून समानतेच्या व बंधुत्वाच्या कडीमध्ये एकत्र गुंफले जावेत ही यामागची भावना आहे. नमाज ही अल्लाहचे प्राचीन उपासनाघर ‘काबागृह’कडे तोंड करुनच अदा केली जाते, जेणेकरून श्रद्धाळू व भक्तांमध्ये विश्वबंधुत्व व समानता निर्माण व्हावी आणि ते पूर्णतः इस्लामी एकतेच्या केंद्रबिदूत सामावले जावेत.

जकात: अदा करणे ज्याच्याजवळ साडेबावन तोळे चांदी किंवा त्या किमतीएवढी अतिरिक्त रोख रक्कम किंवा धंद्याचा माल आहे, अशा प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुषाने वर्षातून एकदा अडीच टक्के (२.५%) माल किंवा किमत वेगळी करुन अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी गरिबाला मदत म्हणून दान केली पाहिजे. पूर्ण जकात गोळा करुन सामूहिकरितीने लाचार, मजूर आणि गरीब लोकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरली पाहिजे. हे तरी किमान केलेच पाहिजे. एका सच्च्या मुस्लिमाला धर्मप्रचार व प्रसार, उन्नती व प्रगतीकरिता, गरीब, लाचार व असहाय यांच्या मदतीकरिता आपल्या संपत्तीमधला जास्तीत जास्त वाटा खर्च करण्याचा उद्देश हा आहे. संपत्ती व ऐहिक सुख, भौतिक प्रेमजे साऱ्या वाईटाचे, दुष्कर्मांचे मूळ आहे, ते आपल्या मनातून, हृदयातून निघून जावे आणि अल्लाह व ईशधर्म-इस्लाम आणि पारलौकिक जीवनाविषयी ओढ व प्रेम सर्व सत्कर्म व सन्मार्गाचे उगमस्थान असलेल्या हृदयामध्ये वसावे. जे लोक अल्लाहच्या मार्गामध्ये आपली संपत्ती खर्च करतील त्यांना पारलौकिक-मरणोत्तर जीवनामध्ये त्याचा मोबदला अनंत पटीने मिळेल आणि ऐहिक जगामध्येसुद्धा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या देणग्यांनी व उपकारांनी त्यांना प्रसन्न करेल.

इस्लाम धर्माच्या शिकवणूकीचे क्षेत्र कौटुंबिक आणि सामाजिक समस्यापर्यंत विस्तारित पावले आहे. ही धारणा ज्या गोष्टींच्या परिणामस्वरूप निर्माण झाली आहे त्याची कारणे समजून घेणे प्रथम आवश्यक आहे. ही कारणे पवित्र कुरआनमधील मौलिक धारणामध्ये दिसून येतात. पवित्र कुरआनमध्ये, अल्लाह, धर्म आणि उपासनेसंबंधी विवेचन करण्यात आले आहे. यातील धारणाशिवाय प्रत्येक धारणा चूकीची किवा अज्ञानमूलक किवा असत्य आहे. त्यासंबंधी आवश्यक स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे.
अल्लाहने सर्व सृष्टीला निर्माण केले आहे. तो सर्व सजीवांचा पालनकर्ता, ईश्वरी गुणानी युक्त, न्याय करण्याची क्षमता, बुद्धीमत्ता, दया, शक्ती ज्ञान इत्यादि वैशिष्ठयानी परिपूर्ण आहे. तो जसा सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता तसाच त्याचा व्यवस्थापकही आहे. तो मालक आणि ईश्वर सुद्धा आहे. तो स्वामी आणि शासकही आहे. तो कायदा देणारा सुद्धा आणि कायदा बनविणारा सुध्दा आहे. तो उपास्य आणि रक्षकही आहे. त्याच्या या वैशिष्टयांमध्ये, या योग्यतामध्ये आणि त्याच्या या अधिकारामध्ये कोणीही सहभागी नाही. म्हणून आराधना योग्य फक्त तोच आहे आणि आज्ञा पालनाचा खरा अधिकारी सुद्धा तोच आहे.
अल्लाहच्या या उपदेशांचा, आदेशांचा आणि कायद्याच्या संग्रहाचे नाव धर्म(इस्लाम) आहे. सरळ मार्ग दाखविण्यासाठी, सत्त्याच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि खरी सफलता मिळवून देण्यासाठी आणि ठरलेल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा धर्म अल्लाहने मानवास प्रदान केला आहे. अल्लाह न्यायी, शासक, पालक आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे त्याने मानवाला नैतिक, आध्यात्मिक आणि भौतिक जीवनासाठी सर्वकाही उपलब्ध करून दिले आहे.
अन्यथा त्याची बुद्धीमत्ता, शासन व्यर्थ सिद्ध झाले असते, ईश्वर म्हणवून घेण्याचा हक्क त्याला राहिला नसता. आपल्या जीवनाचा उद्देश्य आणि त्या उद्देश्याच्या प्राप्तिसाठी, यथार्थ मार्गासाठी सावधान करण्याची मानवास अत्यंत आवश्यकता होती जेणेकरून भ्रम, दुष्ट बुध्दी आणि भावनांच्या काळोखात भरकटत न जाता जीवनाच्या उद्देश्यपूर्तीसाठी सरळ मार्ग उपलब्ध व्हावा. धर्माचा(इस्लामचा) उद्देश्य आणि हेतुही हाच होता की ते मानवाच्या पूर्ण नैतिक जीवनाचे अधिष्ठान व्हावे शासक आणि सर्व मानवजातीचा ईश्वर असण्यासाठी त्याने मानवी जीवनाचे सर्व पैलू व्यापून टाकले आहेत. कोणताही पैलू त्याच्या आवाक्या बाहेर नाही. मानवी जीवनातील कोणत्याही बाबी किवा व्यवहाराच्या नैतिक बाजू संबंधी चांगल्या व वाईट गोष्टींची चर्चा उद्भवू शकते. म्हणून अल्लाहकडून कोणत्याही बाबतीसंबंधी उपदेश आणि मार्गदर्शनास मानव वंचित राहता कामा नये. म्हणून अल्लाहचा हा अंतिम धर्म म्हणजे इस्लाम एक एक करून सर्व समस्यावर चर्चा करतो. उपासना गृहापासून सामुदायिक जीवनाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक बाबीसंबंधी उपदेश करतो. या सर्व उपदेशांच्या सर्व समावेशक संग्रहाचे नांव इस्लाम धर्म(परिपूर्ण जीवनपद्धती) आहे आणि त्याची प्रत्येक बाब धर्माचा अंश असते.
इस्लामच्या दृष्टीने पूजा, उपासना, आराधना आणि तपस्या यांच्या पेक्षा ‘‘इबादत’’ खूप विकसित आहे. ईश्वराची आराधना आणि त्याचे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे, परंतु परिपूर्ण भक्ती नाही. इस्लामनुसार, अल्लाहने दिलेल्या संपूर्ण आदेशांचे पालन करणे ही परिपूर्ण भक्ती आहे. कोणत्याही भेदभाव आणि विभाजना शिवाय पूर्ण निष्ठेने आणि खर्या भक्ती भावाने आणि मनःपूर्वक आज्ञापालनासह केलेली भक्ती ही ‘‘इबादत’’ आहे. अल्लाहने पाठविलेला हा धर्म सर्वसमावेशक उपदेशांचा आणि आदेशांचा संग्रह आहे, हा धर्म समस्त मानवजातीसाठी आहे, हे लक्षात ठेवून इस्लामच्या संपूर्ण शिकवणीतील प्रत्येक लहान सहान बाबीसह सर्व अमंलात आणून संपूर्ण जीवनाला समर्पित केल्याशिवाय ‘‘इबादत’’ परिपूर्ण होत नाही.
इस्लाम आणि पवित्र कुरआननुसार परमेश्वर, धर्म आणि भक्ती यांच्या जर या व्याख्या असतील तर माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधीत गोष्टीबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. चर्चा केली गेली तरी ती इस्लाम धर्म, ईश्वर भक्ती यात त्याचा समावेश होणार नाही, कौटुंबिक आणि सामाजिक बाबी या सुद्धा मानवी जीवनाचाच एक भाग आहे. मग परमेश्वरी धर्म या बाबीना दृष्टीआड कसा करू शकेल? याबाबतीत उपदेश किवा आदेश कसा न देईल? सत्य आणि न्याय यांची आवश्यकता कशी नसेल? जे आदेश किवा उपदेश याबाबतीत दिले असतील त्याना धार्मिक महत्व कां नाही? त्यांचे पालन करणे सक्ती केले असते काय? त्यांचे अमलात आणणे किवा न आणणे याचा मुस्लिम असणे किवा नसणे यावर काहीच परिणाम झाला नसता काय?
ईश्वर, धर्म आणि उपासना याबाबतच्या काही लोकांच्या धारणा वेगळ्या असू शकतात. नव्हे तर अधिकांश लोकांच्या या धारणा वेगळ्याच आहेत. अशा लोकांना इस्लामी व्यक्तिगत कायद्याच्या धार्मिक प्रतिष्ठेचे आकलन होणे आणि त्यांची योग्यायोग्यता ठरविणे फारच कठीण आहे. परंतु येथे योग्यायोग्यतेचा ही प्रश्न उद्भवत नाही. तथापि मूळ प्रश्न वास्तवतेचा आहे आणि वास्तवता ही आहे की हे कायदे धार्मिक प्रतिष्ठेचे असून ते धर्माचाच एक अविभाज्य भाग आहेत, यास कोणत्याही प्रकारे नाकारता येत नाही. पवित्र कुरआनची शिकवणुक, इस्लामची धर्मविषयक आणि ईश्वर विषयक धारणेशी सुसंगत असून इस्लामचे व्यक्तिगत कायदे इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे.
सामुदायिक आणि सांस्कृतिक महत्व
मुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या प्रतिष्ठेची योग्यता आणि मौलिक महत्व उपरोक्त विवेचनावरून स्पष्ट झाले आहे. त्या विषयी अधिक खुलासा करण्याची आवश्यकता दिसत नाही. परंतु प्राप्त परिस्थितीच्या आवश्यकते नुसार, या कायद्याची धार्मिक प्रतिष्ठा तात्पुरती बाजुला ठेवून त्या कायद्याच्या केवळ सांस्कृतिक व सामुदायिक दृष्टीकोनातून त्याच्या महत्वाच्या बाबतीत परिक्षण करू. या जेणे करून कोणत्याही कारणाने त्यांची धार्मिक प्रतिष्ठा समजण्यास जे असमर्थ असतील, त्यांच्याही हे लक्षात यावे की मुस्लिम आपल्या व्यक्तिगत कायद्यांना का कवटाळून बसले आहेत आणि त्याना तसे करणे का अपरिहार्य आहे?

इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.
हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))
एक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये?’’ प्रेषित उत्तरले,
‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))
अबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)
माननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ५५)
हज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.
जबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).
माननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
एक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)
आणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद - २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : ९९)
अशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
स्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय ? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का ? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’
माननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,
‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ?’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
धर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
हजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय? त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,
जो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget