Latest Post

ताख़ीर का मौका ना तजबजुब का अमल है
ये वक्ते अमल वक्ते अमल वक्ते अमल है
    आजपासून 1441 वर्षापूर्वी जेव्हा जगातील बहुतेक लोक मागासलेले होते त्यावेळी इस्लामने जगाला ’नफ्सीयात’ अर्थात मानसशास्त्राचा परिचय करून दिला. या व्यापक शास्त्रातील एक छोटासा अंश ’एकमेकांना भेटण्याचे शिष्टाचार’ याबद्दल आज आपण थोडीसी माहिती घेऊ. विषय थोडासा वेगळा आहे मात्र उपयोगी आहे. वाचकांना कदाचित वाटेल की, एकमेकांना भेटण्यामधील शिष्टाचारामध्ये असे काय असामान्य आहे की त्याची चर्चा करण्याची गरज भासावी? तर त्यांना मी सांगू इच्छितो की, कधी-कधी सामान्य गोष्टीमधूनच एखादी अशी असामान्य गोष्ट पुढे येते की माणसाच्या जीवनाला कलाटणी मिळून जाते.
लक्षात ठेवा मित्रांनों ! कोणालाही भेटताना आपण भेटणार्‍या व्यक्तिशी काय बोलतोय यापेक्षा अधिक महत्त्व आपण त्याच्याशी बोलताना कसे वागतो याला आहे. या संबंधीची जी शिकवण इस्लाम आपल्याला देतो ती अशी की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीसमोर तुमची देहबोली अशी असावी की, त्या  व्यक्तिला या गोष्टीची जाणीव व्हावी की त्याला भेटताना तुम्हाला कोण आनंद झालेला आहे. तुमचा चेहरा भेटी दरम्यान प्रफुल्लित असावयास हवा. यासाठी अभिनय करण्याची गरज तुम्हाला भासू नये. आपण स्वतःमध्ये अशी सवय रूजवावी की, प्रत्येक भेटणार्‍याला वाटावे की, आपल्या भेटीमुळे ही व्यक्ती खूपच आनंदीत झालेली आहे. असे करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचा कुरआनच्या खालील आयातींवर आणि प्रेषितांच्या हदीसवर विश्‍वास असेल.
    ”लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्‍चित अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’ (संदर्भ ः कुरआन-अल्हुजरात आयत नं. 13).
    या आयाती शिवाय प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांची एक हदीस अतिशय महत्त्वाची जी या संदर्भात नोंद घेण्यासारखी आहे. ते फरमावतात, ”जगातील लोक हे अल्लाहचा कुंबा (कुटुंब) आहे. या कुटुंबामध्ये अल्लाहला सर्वात प्रिय तो आहे जो या कुटुंबाशी चांगली वर्तणूक ठेवेल.”
    साधारणपणे आपण प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तिला सारख्याच उत्साहाने प्रतिसाद देत नाहीत. श्रीमंत, मोठ्या हुद्यावरील लोकांव्यतिरिक्त आपण सामान्य लोकांना भेटताना एक तर तिरके बसतो, त्यांच्याकडे चेहरा करत नाही, लक्ष दूसरीकडेच कुठेतरी असते, आता तर सर्वात वाईट गोष्टी अशी सुरू झालेली आहे की, समोरील व्यक्ति बोलत असताना अनेक लोक हे व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकमध्ये व्यस्त असतात. भेटायला आलेल्या व्यक्तीचा यापेक्षा मोठा अपमान तो कोणता? असे नाही की समोरच्याला तुमचे हे वर्तन कळत नाही. त्याला तुमच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते. आपल्याकडून असे वर्तन घडल्यास तो मनोमन स्वतःला दोष देत काही न बोलता निघून जातो. मात्र तुम्ही केलेला आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि संधी मिळेल तेव्हा वचपा काढल्याशिवाय राहत नाही.
    आजकाल ज्याच्याकडे काम असेल, जो श्रीमंत असेल, मोठ्या पदावर असेल किंवा भविष्यात ज्याची गरज पडू शकेल,अशाच लोकांशी बोलतांना लक्षपूर्वक वार्तालाप करण्याची, देहबोली नम्र ठेवण्याची आपल्याला सवय जडलेली आहे. परंतु इस्लाम ठीक याच्या उलट आपल्याला निर्देश देतो की, प्रत्येक व्यक्तीशी बोलताना त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐका, देहबोली नम्र ठेवा, चेहरा प्रफुल्लित ठेवा, आज एवढे जरी करण्याचा आपण निश्‍चय केला तरी अल्पावधीतच आपण लोकप्रिय व्हाल, समाजामध्ये तुमचा सन्मान वाढेल.
    तुमच्याकडे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा हेतू प्रत्येक वेळेस साध्य होईलच असे नाही. मात्र तुम्ही त्याला दिलेली वागणूक तो कधीच विसरणार नाही. तुमची भेट घेऊनही त्याचे काम न झाल्याचे दुःख तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे सुसह्य होईल. त्यातच जर का तुम्ही त्याला सहानुभूतीपूर्वक हे समजावण्यामध्ये यशस्वी झालात की त्याचे काम करणे तुमच्या अखत्यारित नाही तेव्हा तर त्याचे दुःख आणखीन कमी होईल.
    आज अनेक लोक हा साधा शिष्टाचार पाळताना दिसत नाहीत. किमान मुस्लिमांनी तरी या इस्लामी शिष्टाचाराचे कटाक्षाने पालन करावे, जेणेकरून आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊन जाईल. लक्षात ठेवा मित्रानों ! शब्दापेक्षा तुमची देहबोली आणि तुमच्या चेहर्‍यावरील भाव यावरून भेटायला आलेली व्यक्ती चटकन ओळखते की तुम्ही त्याला किती महत्त्व देत आहात ते. म्हणून जोपर्यंत वर नमूद आयात आणि हदीसवर तुमची गाढी श्रद्धा असणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाला समान महत्व देऊन भेटू शकणार नाही.
    दूसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तिशी नम्रपणे बोलून, ”नेकी” अर्थात पुण्य कमाविण्याची संधी तुमच्याकडे स्वतः होऊन चालत आलेली आहे, याची जाणीव ठेवणे हा आहे. यासंदर्भात एक हदीस खूपच मार्गदर्शक आहे. सय्यदना हजरत अबुजर रजि. यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”नेकी के एक छोटेसे काम को भी हकीर (तुच्छ) न जानो अगरचे ये नेकी का काम सिर्फ अपने भाईसे खंदा पेशानी (प्रफुल्लितपणे) से मिलना ही क्यूं न हो.” (मुस्लिम).
    अनेक सहाबी रजि. यांनी सांगितलेले आहे की, ”प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हम सबसे ज्यादा मुस्कुरानेवाले थे.” याचाच अर्थ प्रत्येक भेटणार्‍या व्यक्तीचे मग त्याची ओळख असो की नसो स्वागत प्रेषित सल्ल. स्मितहास्याने करत. ही गोष्ट छोटी आहे मात्र याचे महत्व फार मोठे आहे. सय्यदना अबुजर (रजि.) यांनी म्हटलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ”अपने भाई की तरफ मुस्कुराकर देखना तेरे लिए सदका (दान) है, नेक काम का हुक्म और बुरे काम से रोकना भी सदका है, भटके हुए को रास्ता दिखाना सदका है, रास्ते से पत्थर, कांटा और ऐसीही नुकसान देह चीज हटाना सदका है, अपने बरतन से अपने भाई के बरतन में पाणी डालना भी तेरे लिए सदका है.”
    या हदीसमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. रस्त्यात पडलेल्या नुकसानदायक वस्तू हटविणे, विहिरीतून उपसलेले पाणी दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे, एखादी व्यक्ती वाईट गोष्ट करीत असेल तर त्यापासून त्याला परावृत्त करणे या सगळ्या गोष्टी प्रेषितांनी पुण्य कर्म असल्याचे म्हटलेले आहे.
    आजकाल आपण नेमकी याउलट परिस्थिती पाहतो. रस्त्यामधील पिडादायक वस्तू हटविणे तर दूर, रस्त्यात कचरा टाकणे, चालता चालता पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकणे, केळी खाऊन त्याच्या साली फेकणे, सार्वजनिक उत्सवासाठी रस्त्यात खड्डे करणे, वाईट गोष्टी आपल्या डोळ्यादेखत घडत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे या सामान्य बाबी झालेल्या आहेत. विहिरीतून पाणी उपसून दुसर्‍याच्या भांड्यामध्ये ओतणे याचा तर आता विचारसुद्धा करता येत नाही, कारण पाण्यासारखी गरजेची वस्तू विकण्यापर्यंत आपण भौतिक प्रगती केेेलेली आहे.
    मित्रांनों ! या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला पूर्वीपासूनच माहिती होत्या. परंतु, ”दुनिया की चमक दमक”मुळे या गोष्टी विस्मृतीमध्ये गेलेल्या आहेत. मला आनंद होईल, माझा हा लेख वाचून आपण इस्लामच्या या  शिष्टाचाराचा अवलंब करण्याचा निश्‍चय केला तर. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ”ऐ अल्लाह! एकमेकांना भेटताना आम्हाला या शिष्टाचारांच्या अंमलबजावणीची समज प्रदान कर.” आमीन.

- एम आय शेख
9764000737

येथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की इस्लामची ही स्पष्ट जीवनपद्धती कुठल्याही आर्थिक कारणांचा अथवा परिस्थितीचा परिणाम नाही. तसेच त्याचे अस्तित्व भिन्न वर्गांच्या स्वार्थांनी बरबटलेल्या संघर्ष व कलहापासून उपजले नाही. ती एक ईश्वरनिर्मित आदर्श व्यवस्था आहे. ती अशा एका युगात मानवाला प्राप्त झाली, जेव्हा त्याच्या जीवनात आर्थिक बाबींना काही विशेष महत्त्व नव्हते. तसेच त्याला सामाजिक न्यायाचे वर्तमान अर्थ ठाऊक नव्हते. म्हणून माणसाच्या सामाजिक व आर्थिक बाबतीतील सुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर इस्लामच्या तुलनेत कम्युनिझम तसेच भांडवलशाही हे दोन्ही फार नंतरच्या काळात निर्माण झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून इस्लामला या दोहोंच्या तुलनेत प्रथमस्थान प्राप्त आहे.
जीवनातील मौलिक गरजा
उदाहरण म्हणून माणसाच्या जीवनातील मौलिक गरजाच घ्या. सामान्यपणे असे म्हटले जाते की कार्ल माक्र्सच पहिला माणूस होता ज्याने अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मौलिक गरजा आहेत असे म्हटले आणि सरकारचे हे अनिवार्य व बंधनकारक कर्तव्य म्हणून दाखविले की त्याने राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या गरजा एकत्र करुन त्यांची पूर्तता करावी. कार्ल माक्र्सच्या या विधानाला मानवी विचारामध्ये फार क्रांतिकारी समजले जाते. पण सत्य हे आहे की कार्ल माक्र्सच्या जन्माच्या १४ शतके आधी इस्लामद्वारा हे जग या क्रांतिपूर्ण विधानाशी चांगल्या तऱ्हेने परिचित होऊन चुकले होते. म्हणून या संदर्भात इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे उल्लेखित केले आहे की,
‘‘ज्या व्यक्ती आमचे (इस्लामी राज्याचे) कर्मचारी म्हणून कार्य करीत आहेत व त्यांना पत्नी नसेल तर त्यांचा विवाह केला जाईल, जर त्यांचे स्वतःचे घर नसेल तर त्यांना राहण्यासाठी घर दिले जाईल, जर चाकर नसतील तर त्यांना चाकर प्राप्त करुन दिले जातील व जर त्यांच्याकडे प्रवासाचे साधन म्हणून एखादे जनावर नसेल तर त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जाईल.’’
त्यांच्या या ऐतिहासिक जाहीरनाम्यात केवळ सर्व मानवी मूळ अधिकारच आहेत असे नाही, ज्यांचे जाहीर निवेदन कार्ल माक्र्सने नंतरच्या काळात केले. अन्य बरेच काही त्यात सामील आहे. पण कम्युनिझमप्रमाणे इस्लाम त्याचे फळ, वर्गकलह, वर्गद्वेश व रक्तमय क्रांती आणि सर्व उच्च जीवनमूल्यांचा इन्कार करुन वसूल करीत नाहीत. ते अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मर्यादित क्षेत्रात कधीही बांधले जाऊ शकत नाही.
चिरकाल टिकणारी जीवनपद्धती
इस्लामी जीवनपद्धतीचे असे काही ठळक गुण आहेत. यावरुन ही गोष्ट चांगल्यारितीने स्पष्ट होते की धर्म म्हणून इस्लामला एका अशा विशाल, व्यापक व तर्कशुद्ध नियमांचे आणि सिद्धान्तांचे नामाभिदान दिले जाऊ शकते की मानवी जीवन आपल्या झगमगाटात व सुखवैभवात असूनसुद्धा त्याच्या स्पष्ट मर्यादा नजरेस पडतात व त्याचा कुठलाही भाग मग तो भावनेच्या जगाशी असो वा विचारांशी, कर्माशी, भक्तीशी, आर्थिक बाबी व सामाजिक सबंधाशी, नैसर्गिक प्रेरणांशी अथवा आध्यात्मिक आंदोलनाशी असो, त्याच्या पकडीपासून सुटत नाहीत. या अनेकविध पैलूंमध्ये समन्वय निर्माण करुन इस्लाम त्याला एक सुंदर, समतोल तसेच वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धतीचे रुप प्रदान करतो. अशा प्रकारची सर्वव्यापी समतोल अथवा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, कोणत्याही काळात आपली उपयुक्तता हरवून, गमावून बसू शकते काय? माणूस खऱ्या अर्थाने याकडे दुर्लक्ष करु शकतो काय? कारण आपल्या उद्देशांच्या अथवा लक्ष्याच्या दृष्टीने हे स्वतःच जीवनपर्याय आहेत किबहुना स्वयंजीवनच आहे. म्हणून जोवर या धरतीवर जीवमात्र आढळेल तोवर ही पद्धतीही अस्तित्वात असेल व टिकून राहील आणि सतत आढळणारे त्याचे अक्षय ठसे कधीही पुसले जाऊ शकत नाहीत.
आजच्या युगाची गरज
आज जी अवस्था आढळते व या वेळी ज्या ज्या समस्या आहेत ते पाहिल्यानंतर कोणताही बुद्धिमान माणूस असे माणने कठीण आहे की आजचा माणूस एखाद्या बौद्धिक आधारावर इस्लामशी विन्मुख होऊ शकतो व त्याने सादर केलेल्या जीवनपद्धतीशी दुर्लक्ष करुन तिची उपेक्षा करु शकतो. आज २१ व्या शतकातही मानवता तशाच प्रकारच्या सर्व दोषांमध्ये बरबटलेली आहे जशी ती मानवाच्या रानटी अवस्थेमध्ये होती. प्रगतीचा, प्रकाशाचा ध्यास ठरलेल्या या युगामध्ये मानवता, वंशद्वेष, वर्णद्वेष याच्या अत्यंत तिरस्करणीय अवस्थेत आहे. उदाहरण पाहिजे असेल तर अमेरिका व दक्षिण आफ्रिका या देशांवरच एक दृष्टी टाका. नैतिक, सदाचार, सुसंस्कार व मानवतेच्या बाबतीत या २१ व्या शतकातील माणसाला, अजून इस्लामपासून फार काही शिकण्यासारखे आहे. इस्लामने मानवतेला सर्व प्रकारच्या वांशिक संकुचित दृष्टिकोनातून मुक्त केले, त्याला आज बराच काळ लोटला आहे. आजसुद्धा इस्लामच जगाला या द्वेष व तिरस्काररुपी दलदलीतून बाहेर काढू शकतो. कारण इस्लाम मानवाच्या समानतेची एक सुंदर प्रतिमाच सादर करीत नाही तर व्यवहारी जगातही तो एक अशी समानता निर्माण करु दाखवून चुकला आहे, ज्यासारखे जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेही उदाहरण आढळत नाही. इस्लामच्या या आदर्शकाळांत कोणत्याही काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर, वर्ण अथवा वंशाच्या आधारावर कसलेही प्रभुत्व नव्हते. इस्लाम जवळ प्रमुखता व श्रेष्ठत्व यांचे एकमात्र साधन म्हणजे मानवाचा चांगुलपणा व त्याचा सदाचार आहे. म्हणूनच इस्लामने गुलामांना गुलामीच्या दैन्यावस्थेपासून मुक्ती प्राप्त करून दिली व त्यांना प्रगती व सुखांचा व्यापक संभवांची सूचनाही देऊन टाकली, येथपर्यंत की गुलामांना राष्ट्राध्यक्षपदावर बसविण्याचे अधिकारही स्वीकारण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘आपल्या अमीराचे (अध्यक्षाचे) म्हणणे ऐकून घ्या व त्यांचे आज्ञापालन करा. मग हा अमीर निग्रो गुलाम जरी असला तरी त्याच्या आज्ञेचे पालन करा जोवर तो तुम्हाला ‘अल्लाह’च्या शरीअतीनुसार नेत आहे.’
नागरी स्वातंत्र्याचा आदर
आणखी एका दृष्टिकोनातूनही इस्लामच्या गरजेकडे आजचे जग अनास्था दाखवू शकत नाही, साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या हाताने आजची मानवता जे कष्ट, क्लेश व दुःख भोगीत आहे ज्या रानटीपणाचे व क्रोर्याचे भक्ष्य बनले आहे त्या पासून वाचण्याचा, सुटकेचा, इस्लामखेरीज दूसरा कुठलाही मार्ग दृष्टीस पडत नाही. इस्लामच मानवतेला साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या शापापासून सुटका करून देऊ शकतो, कारण तो साम्राज्यवाद व साम्राज्यवादी शोषणांचा अत्यंत विरोध करणारा आहे. आपल्या उत्कर्षकालामध्ये मुस्लिमांचे इतर राष्ट्रांशी व्यवहार इतके औदार्यपूर्ण, श्रेष्ठ व सभ्यतापूर्ण होते की आजच्या युरोपाची संकुचित दृष्टीसुद्धा त्याची उंच भरारी पाहू शकते.
या संदर्भात आदरणीय उमर बिन खत्ताब (र) यांनी न्यायदानात केलेल्या एका सुप्रसिद्ध निवाड्याचे उदाहरण सादर केले जाऊ शकते. या प्रकरणात एका इजिप्शियन आदिवासीला विनाकारण मारहाण करण्याच्या व छळ करण्याच्या आरोपावरुन ज्याने इजिप्त जिकले होते, तो प्रसिद्ध विजेता व प्रतिष्ठित गव्हर्नर आदरणीय अमर बिन आस (र) यांच्या चिरंजीवाला फटक्यांची शिक्षा दिली होती, किबहूना त्याच्या बापालाही अशी शिक्षा देण्यास तयार झाले होते. या एका उदाहरणावरुन हे सहज अनुमान केले जाऊ शकते की इस्लामी राज्यात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात नागरी स्वातंत्र्य होते.
आज भांडवलशाही पद्धतीचा जो शाप जगावर पसलरेला आहे, ज्यामुळे सारे जीवन विषारी बनले आहे; त्यापासून सुटकेचा मार्गही इस्लामखेरीज अन्य कुठलाही नाही. व्याज घेणे, नफाखोरी हा भांडवलशाही पद्धतीचा पाया असून इस्लाम या दोहोंचा अत्यंत तीव्र विरोध करतो व त्यांना वर्ज्य घोषित करतो. दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ असा की आजच्या जगात भांडवलशाहीने निर्माण केलेले अनुभव व दोष फक्त इस्लामच दूर करु शकतो.
याचप्रमाणे भौतिकवादी व नास्तिकवादी साम्यवादाचे उच्छेदनही केवळ इस्लामच्या हस्तेच संभवनीय आहे. कारण इस्लाम केवळ पूर्ण सामाजिक न्याय स्थापन करुन त्याला टिकवून धरतो, तेवढेच तो उच्च मानवी तसेच आध्यात्मिक मूल्यांचे रक्षणही करतो. कारण तो साम्यवादाप्रमाणे कसल्याही प्रकारच्या संकुचित दृष्टीस बळी बनलेला नाही व त्याचे जग ज्ञानेंद्रियांनी जाणवणाऱ्या वस्तूपर्यंतच मर्यादित नाही. आपल्यात हे सर्व गुण असूनसुद्धा, इस्लाम आपली कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादून त्याला ती मानण्यास भाग पाडीत नाही. कारण धर्माच्या व श्रद्धेच्या बाबतीत तो आरंभीपासूनच कसल्याही जबरदस्तीशी सहमत नाही व मानत नाही. याबाबतीत त्याचा नियम असा आहे की -
‘‘धर्माच्या बाबतीत कसलीही जुलूम-जबरदस्ती नाही. सत्य गोष्ट चुकीच्या विचारापासून वेगळी काढून ठेवली गेली आहे.’’ (२:२५६)
या वेळी जगावर तिसऱ्या विश्वयुद्धाचे अंधकारपूर्ण ढग पसरलेले आहेत, ते दूर होण्यासाठीही इस्लामरुपी सूर्योदय होण्याखेरीज अन्य कुठलाही मार्ग दिसत नाही. पण हे त्याचवेळी शक्य आहे जेव्हा मानवजात इस्लामला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवून खऱ्या सुखशांतीच्या या मार्गाचा अंगीकार करण्यास तयार होईल.
तात्पर्य असे की इस्लामचा काळ संपलेला नसून तो आता सुरु झाला आहे. हा कुठलाही मृत दृष्टिकोन नसून ही क्रांतीपूर्ण जीवनपद्धती आहे. याचा भविष्यकाल तेवढाच उज्वल आहे जितका त्याचा भूतकाल वैभवशाली होता व युरोप त्या वेळी इतिहासाच्या काळोखात कालखंडात धडपडत, चाचपडत होता.

- सय्यद उलालुद्दीन उमरी
    या पुस्तिकेत मानव सेवेचे महत्त्व विशद केले आहे. इस्लामने मानव सेवेला खूप महत्त्व दिले आहे. त्याने जनसेवा ईश्वर सेवा असत्याचा खुलासा केला आहे.
    उपासनेची कमतरता मानव सेवेने भरून निघते, ह्या विषयीचे वर्णन झाले आहे. तसेच मानव सेवेच्या भिन्न पद्धती सांगितल्या गेल्या आणिमानव सेवेचा व्यापक उद्देश सांगितला गेला. इस्लाममध्ये मानवी सेवेत कोणताही भेदभाव नाही. हे स्पष्ट करून मानवी सेवेची काही पैलू सांगितले गेले आहेत.
   
आयएमपीटी अ.क्र. 147     -पृष्ठे - 32    मूल्य - 16       आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xj96vlmu6caxv4ty7jy5y6vwgqp3xlna


कायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिल्लक राहू शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे ‘समाजामध्ये’ रूपांतरण होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामुहिक जीवनास शक्ति प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणार्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदा विषयक संस्थांची स्थापना ह्या समाजाची अपरिहार्यता आहेत.
चांगल्या कायद्याची मौलिक वैशिष्ठये
चांगल्या कायद्यासाठी दोन वैशिष्ठयांची जरूरी असते:
  1. ज्या समाजासाठी कायद्याची निर्मिती झाली आहे आणि ज्या कायद्याची बंधने समाजाने स्वीकारली आहेत, तो कायदा समाजाच्या प्रगतिचे आणि यशाचे खरे साधन बनले पाहिजे. कायद्याचा हा उद्देश्य सफल न करणारा एखादा कायदा एखाद्या समाजावर लागू केल्यास समाजाचा त्याग व्यर्थ जाईल आणि तथाकथित कायदा अमलात आणण्याचे कोणते ही कारण शिल्लक राहणार नाही आणि अशा कायद्याला समाजासाठी योग्य समजले जाऊ नये.
  2. समाजाच्या मौलिक विचारांशी आणि धारणांशी अशा कायद्यात फारकत घेतलेली नसावी. समाजाच्या भावना आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्तुत कायद्यात प्रतिबिबीत झाली पाहिजेत. ज्या समाजावर एखादा कायदा लागू केला जाईल तो कायदा त्या समाजास मानसिकरित्या स्वीकारार्ह असला पाहिजे. त्या कायद्यात समाजाच्या सन्मानाची भावना असावी आणि अशा कायद्याची बंधने आनंदाने स्वीकारण्यास तो समाज तयार असावा. कायद्यास नापसंत ओझे समजले जाऊ नये, त्याला डोक्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. कायद्यातुन सुटण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. तर्क आणि अनुभवानुसार कायद्याचे हे वैशिष्टय तेव्हांच निर्माण होऊ शकते, आणि समाजात त्यास तेव्हांच व्यावहारिक स्थान प्राप्त होऊ शकते, जेव्हां त्या कायद्यात सामाजिक सिद्धान्त आणि मूल्यांचा आत्मा समाविष्ट झालेला असेल आणि त्या कायद्याची मुळे त्या समाजाच्या विचारांशी आणि भावनांशी जुळलेली असतील.
उपरोल्लेखीत पहिल्या वैशिष्टयापेक्षा दुसरे वैशिष्टय अधिक महत्वपूर्ण आणि योग्यच नव्हे, तर तोच त्याचा पाया सुद्धा आहे असे विचारान्ती दिसून येईल. कारण कोणताही कायदा, साफल्य आणि प्रगतिचे खरे साधन तो पर्यंत कदापि सिद्ध होऊ शकत नाही, जो पर्यंत तो कायदा समाजाची जीवन मूल्ये आणि सिद्धान्त, विचार धारा आणि भावना विचारात घेऊन केलेला नसेल. समाजाची जीवनमूल्ये आणि सिद्धान्त यावर कायद्याचा पाया रचण्याची कायद्याची पहिली आणि अंतिम आवश्यकता असते. त्याशिवाय तो एक चांगला आणि यशस्वी कायदा होऊ शकत नाही. अशा कायद्याने समाजाचे कल्याण होत नाही किवा समाज यशस्वी होत नाही. आणि जेव्हां हे सर्व काही होऊ शकत नाही तर अशा कायद्यास लोकांच्या माथी मारण्याचा कोणताही अधिकार कोणाला पोहचत नाही. असा तथाकथित कायदा एखाद्या समाजाने स्वतःहून बनविला तर वास्तविकता त्या समाजाची सांस्कृतिक आत्महत्या होईल आणि दुसर्या एखाद्या शक्तीने असा कायदा समाजाच्या माथी मारला तर त्या समाजाची सांस्कृतिक हत्या होईल.

अरबस्थानच्या जवळपास 1 लाखाच्या मुस्लिम अल्पसंख्यांकांना पक्षपाती व अत्याचारी बहुसंख्यांक कुरैशनी संपविण्याचा विडा उचललेला होता. मात्र त्या मुठभर मुस्लिमांनी इस्लामची खरी साक्ष दिल्याने दहा वर्षाच्या आत ते अल्पसंख्यांक न राहता शंभर टक्के बहुसंख्यांक बनवून गेले. मग जेव्हा हे इस्लामचे खरे साक्षीदार अरबस्थानच्या बाहेर निघाले तेव्हा 25 वर्षाच्या आत तुर्कस्थान ते मोरक्को पर्यंत राहणारे लोक त्यांच्या या साक्षीवर श्रद्धा ठेवत गेले आणि जेथे 100 टक्के अग्नीपूजक, मूर्तीपूजक आणि ख्रिश्‍चन राहत होते त्यांचे रूपांतर 100 टक्के मुस्लिमांमध्ये  झाले. कोणताच पक्षपात, कोणताच हट्ट , कोणतीच धार्मिक संकिर्णता एवढी मजबूत ठरू शकली नाही की जी इस्लामच्या जीवंत आणि खर्‍या साक्षी देणार्‍यांच्या समोर टिकू शकेल. आज तुम्ही जेव्हा परास्त होत आहात आणि पुढे यापेक्षा जास्त परास्त होण्याची भीती बाळगून आहात तर त्याचे एकमेव कारण इस्लामची सत्याची साक्ष लपवून खोटी साक्ष देण्याशिवाय दूसरे कोणते कारण असू शकेल?
    खरे पाहता ही तर गुन्ह्याची शिक्षा आहे, जी तुम्हाला या जगात मिळत आहे. आखिरतमध्ये तर यापेक्षा जास्त शिक्षा होण्याची आशंका आहे. जोपर्यंत तुम्ही सत्याचे साक्षीदार या नात्याने आपल्या कर्तव्याचे निर्वाहन करणार नाही तोपर्यंत जगात जी काही पथभ्रष्टता पसरेल, जे अत्याचार होतील, जे दंगे होतील, ज्या वाईट गोष्टी वाढतील आणि जी चरित्रहिनता वाढेल त्या सर्वांचे जबाबदार तुम्ही सुद्धा असाल. जरी तुम्ही या वाईट कृत्यांना जन्म देण्यासाठी जबाबदार नसलात तरी त्यांच्या जन्मासाठी अनुकूल अशी साधणे शिल्लक ठेवणे आणि त्यांचा प्रसार होऊ देण्यासाठी तुम्ही नक्कीच जबाबदार आहात.
    बंधूनों ! जे काही मी आपल्यासमोर नमूद केलेले आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलेच असेलच की मुस्लिम असण्याच्या नात्याने आपल्याला काय करायला हवे होते आणि आप काय करत आहोत? आणि जे काही आपण करत आहोत त्याचेच तर फळ आपण भोगत आहोत. या दृष्टीकोणातून जर का आपण या सगळ्या वस्तूस्थितीवर नजर टाकली तर एक गोष्ट ठळकपणे उघडकीस येईल की, मुस्लिमांनी भारत आणि जगामध्ये ज्या काही समस्यांना आपल्या खर्‍या समस्या समजून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या निवारणासाठी ते जे काही आपल्या बुद्धीने तयार करून त्या उपायांवर अंमलबजावणी करीत आहेत ते उपाय सुद्धा त्यांनी दुसर्‍यांनी तयार केलेल्या उपायांना पाहून तयार केलेले आहेत आणि त्याच उपायांना लागू करण्यासाठी आपणही आपली सगळी शक्ती पणाला लावत आहात. वास्तविक पाहता या समस्या मुस्लिमांच्या खर्‍या समस्या नाहीतच आणि त्यांचे उपाय करण्यामध्ये जो वेळ, शक्ती आणि संपत्ती खर्च होत आहे तो केवळ नुकसानच नुकसान आहे. आता एक प्रश्‍न असा विचारला जाऊ शकतो की, एखादा अल्पसंख्यांक समाज मोठ्या बहुसंख्य समाजामध्ये राहून आपले अस्तित्व, हित आणि अधिकारांना कसे सुरक्षित ठेऊ शकेल ?आणि कोणताही बहुसंख्य समाज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ती शक्ती कशी प्राप्त करू शकेल जी बहुसंख्य असण्याच्या नात्याने त्यांना मिळायला हवी आणि एक अल्पसंख्यांक समाज कोणत्याही वर्चस्व असलेल्या बहुसंख्य समाजाच्या ताब्यात कसा काय सुरक्षित राहू शकेल आणि एक कमकुवत समाज कशा प्रकारे शक्तीशाली समाजाच्या हाताने नष्ट होण्यापासून स्वतःला वाचवू शकेल? एवढेच नव्हे तर दलित आणि मागासवर्गीय समाज आपला विकास कसा करू शकेल? आपल्या समाजामध्ये सुख आणि शक्ती कशा प्रकारे प्राप्त करू शकेल? त्या शक्ती ज्या की जगातील इतर शक्तीशाली समाजांना प्राप्त आहेत? ह्या आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या बिगर मुसलमानांसाठी तर महत्त्वाच्या असू शकतात, ज्यांना प्राधान्यांने सोडविण्यासाठी ते समाज आपली सर्व शक्ती पणाला लावू शकतील. परंतु मुस्लिमांसाठी ह्या काही स्थायी समस्या नाहीत. ह्या तर त्या गफलतीचा परिणाम आहे जी आपण आपल्या मूळ कर्तव्याच्या प्रती करत आहोत. जर आपण ते काम (सत्याची साक्ष) केले असते तर एवढ्या जटील आणि तापदायक समस्या उत्पन्नच झाल्या नसत्या आणि आजही जर आपण या समस्यांच्या जंगलाला साफ करण्यामध्ये आपली शक्ती लावण्याऐवजी याच कामावर लक्ष केंद्रीत केले आणि तन, मन, धन लावून इस्लामची साक्ष दिली तर आपल्या देशात नव्हे तर जगात अस्तित्वात असलेले तापदायक समस्यांचे हे जंगल स्वतःच साफ होवून जाईल. कारण  जगाच्या सफाई आणि सुधारणेची जबाबदारी आमच्यावर होती. आपण आपले कर्तव्य विसरून गेलो त्यामुळे जग काटेरी जंगलाने व्यापले आहे आणि त्यातील सर्वात जास्त काटेरी भाग आपल्या वाट्याला आलेला आहे.
    मला या गोष्टीचे दुःख आहे की, मुस्लिमांचे धर्मगुरू आणि राजकीय नेते या खर्‍या समस्येला समजण्याचे प्रयत्नच करत नाहीत. प्रत्येक ठिकाणी लोकांना विश्‍वास दिला जात आहे की, तुमच्या खर्‍या समस्या ह्या अल्पसंख्यांक विरूद्ध बहुसंख्यांक, आपल्या समाजाची सुरक्षितता तसेच भौतिक प्रगतीच्या समस्या आहेत. आणि परत हे लोक या समस्यांच्या निराकरणाचे उपायही मुस्लिमांना तेच सुचवित आहेत जे त्यांनी बिगर मुस्लिमांकडून शिकून घेतलेले आहेत. मात्र माझा जेवढा अल्लाहवर विश्‍वास आहे तेवढाच या गोष्टीवरही विश्‍वास आहे की तुमचे नेते आणि धर्मगुरू तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवित आहेत. आणि ते दाखवत असलेल्या मार्गावर चालून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

मदरसों, मस्जिदों, मुहल्लों से निकलकर आओ
राह-ए-दावत बडी मुश्किल है संभलकर आओ
कब तक रहोगे महेसूर अपनी ही ख़ौल में
अहले वतन से भी जरा मिलकर आओ

उर्दू साहित्य एक समृद्ध साहित्य आहे. अलिकडेच त्यातील एक कथा वाचण्यात आली. ती अशी की, लंडन शहरातील एका अरबी रेस्टॉरंटमध्ये 2007 मध्ये काही मित्र जेवणासाठी जमा झालेले होते आणि त्यांच्यात झालेला संवाद हा या कथेचा मूळ गाभा आहे. त्यांच्यापैकी एक डॉक्टर मगरीबच्या (संध्याकाळ) नमाजला जावून आल्यामुळे इतर मित्र जेवणासाठी त्याची वाट पाहत असतात. तो डॉक्टर परत येताच त्याला एक मित्र विचारतो, ”कुठे गेला होतात?” त्यावर डॉक्टर उत्तर देतात, ”नमाजला गेलो होतो.” तेव्हा प्रश्‍नकर्ता परत विचारतो. ”किती वर्षापासून नमाज अदा करता?” त्यावर डॉक्टर म्हणतात, ”समजत असल्यापासून.” तेव्हा प्रश्‍नकर्ता पुन्हा प्रश्‍न करतो, ”क्षमा करा डॉक्टरसाहेब तुम्ही पुरानमतवादी आहात. जग एवढे पुढे गेले आहे तरी तुम्ही अजूनही नमाज अदा करण्यामध्येच वेळ घालवता. मला या संबंधित तुमच्याशी वाद-विवाद करावयाचा आहे अर्थात तुम्ही तयार असाल तर.” त्यावर डॉक्टरनी उत्तर दिले की, ”जरूर मला आनंद होईल.”
तेव्हा प्रश्‍नकर्त्या मित्राने प्रश्‍न केला की,
    प्रश्‍न - समजा मरणोपरांत तुम्हाला समजले की, न स्वर्ग आहे ना नर्क. या दोन्ही संकल्पना खोट्या आहेत. कुठलाही हिशोब घेतला जाणार नाही. कुठलेही बक्षीस किंवा शिक्षा दिली जाणार नाही. तेव्हा तुम्ही काय कराल?
    उत्तर (डॉक्टर) - मरणोपरांत जर अशी स्थिती आली तर मी स्वतःच्या मनाचे हजरत अली रजि. यांच्या म्हणण्याप्रमाणे सांत्वन करून घेईन की, ”मी स्वर्गाच्या लालसेने किंवा नर्काच्या भितीने ऐ अल्लाह ! तुझी इबादत करत नसून, यासाठी उपासना करतो की तू एकमेव उपासना करण्याच्या लायकीचा आहेस. ” त्यावर प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न केला की,
प्रश्‍न - आणि त्या तुमच्या नमाजचे काय?
    जे आयुष्यभर तुम्ही बिनचुकपणे कष्ट उपसून वेळेवर अदा करता? जेव्हा तुम्हाला कळेल की नमाजी आणि बेनमाजी दोघेही समान आहेत तर या उपसलेल्या कष्टाचे काय?
उत्तर (डॉक्टर)- यावरही मला काही वाईट वाटणार नाही. कारण नमाज अदा करण्यासाठी फक्त काही    - (उर्वरित पान 2 वर)
मिनिटांचा अवधी लागतो. मी त्या नमाज अदा करण्याच्या प्रक्रियेला व्यायाम समजून समाधान मानेन.
    प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न विचारला.
प्रश्‍न - आणि त्या रोजांचे (रमजानचे उपवास) काय, विशेषत लंडनमध्ये जे की 18 तासाचे असतात?
उत्तर (डॉक्टर) - ”त्या रोजांना मी माझ्या आत्म्याच्या शुद्धीसाठी केलेल्या व्यायाम समजेन. नाहीतरी आजकाल आधुनिक विज्ञानाने उपाशी राहण्याचे अनेक फायदे असल्याचे स्पष्ट केलेले आहे. मला ते फायदे प्राप्त झाले, यातच मी समाधान मानून घेईन”.
    प्रश्‍न - दारू हराम असल्यामुळे तुम्ही ती सेवन करत नाही. वास्तविक पाहता दारू आणि तिच्यापासून येणारी नशा याची लज्जत ब्रिटनच नव्हे तर जगातील अब्जावधी लोक घेतात. तुम्ही मात्र त्या लज्जतीपासून वंचित आहात. यावर काय म्हणाल?
    उत्तर - (त्यावर डॉक्टर उत्तरले) मी स्वतः डॉक्टर आहे. मला माहित आहे की, दारूमुळे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत. अनेक लोक दारू सेवनामुळे लिव्हर सडून मरण पावलेले आहेत. दारूच्या नशेमुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. मी दारू सेवन न केल्यामुळे थोड्याश्या लज्जतीपासून वंचित जरूर राहीन परंतु, त्या बदल्यात मला शारीरिक तंदुरूस्ती आणि कुटुंबाचे सौख्य मोठ्या प्रमाणात मिळेल, त्यात मी आनंद मानेन.
    प्रश्‍नकर्त्याने पुन्हा प्रश्‍न केला की,
प्रश्‍न -    त्या हज आणि उमराहचे काय? जे करण्यासाठी तुम्ही प्रवास आणि लाखो लोकांच्यामध्ये राहून यातना सहन केलेल्या आहेत.
उत्तर -    (त्यावर डॉक्टर उत्तरले) हज आणि उमराहचा प्रवास एक नित्तांत सुंदर अनुभव असतो, जेथे जगातल्या कानाकोपर्‍यातून आलेल्या लोकांशी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळते आणि आपण किती मोठ्या समुहाशी निगडीत आहोत., याचा अभिमान वाटतो. त्या प्रवासाच्या थकव्यापेक्षा लोकांना भेटण्यामध्ये आणि हज आणि उमराहच्या दरम्यान केलेल्या उपासनेमुळे माझ्या मनाला जी शांती मिळाली त्यात मी समाधान मानून घेईन.
    प्रश्‍नकर्त्याने शेवटी सांगितले की, माझे प्रश्‍न संपले तुम्ही माझ्या प्रश्‍नाला शांतपणे उत्तरे दिली, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. मी तुमच्या उत्तरांनी समाधानी आहे आणि वादविवादात स्वतःचा पराजय स्विकार करतो. तुम्हाला मला वाद विवादामध्ये पराजित केल्याचा आनंद होत असेल?
    त्यावर डॉक्टरनी उत्तर दिले. मुळीच नाही. मी तर तुमच्या प्रश्‍नांची तर्कसंगत उत्तरे दिली. त्याबद्दल मला समाधान आहे. परंतु तुमच्या बौद्धिकतेची मला कीव करावीशी वाटते. तुमचे प्रश्‍न संपलेत. तुम्ही अनेक प्रश्‍न केलेत. पण तुमची परवानगी असेल तर मी फक्त एक प्रती प्रश्‍न करू इच्छितो. तुम्ही उत्तर द्यायला तयार आहात का? डॉक्टरच्या या म्हणण्यावर प्रश्‍नकर्ता चकीत झाला. आणि उत्तरला. हो...हो...जरूर विचारा ! तुम्हाला काय विचारायचे आहे ते.
    त्यावर डॉक्टरनी प्रश्‍न केला की, ”समजा मरणोपरांत तुमच्या या सगळ्या शंका खोट्या ठरल्या आणि तुमच्या लक्षात आले की, अल्लाह अस्तित्वात आहे, प्रलयाचा दिवसही झालेला आहे, स्वर्गही आहे, नर्कही आहे, प्रत्येकाचा हिशोबही घेतला जात आहे. तेव्हा तुम्ही काय कराल?
    तेव्हा प्रश्‍नकर्ता अवाक् होऊन काहीच न बोलता डॉक्टरांकडे पाहत राहिला व स्वतःला सावरत म्हणाला, ”मला थोडा काळ विचार करू द्या त्यानंतर मी उत्तर देईन. ”
    त्यावर डॉक्टरनी त्याला पाहिजे तेवढा अवधी घ्या असे सांगितले व जेवण संपल्यावर दोघेही आपापल्या मार्गी निघून गेले. बरोबर एक महिन्यानंतर प्रश्‍नकर्त्याने डॉक्टरांना फोन करून त्याच रेस्टॉरंटमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टर जेव्हा पोहोचले तेव्हा प्रश्‍नकर्ता पहिल्यापासून तेथे उपस्थित होता. डॉक्टरांना पाहताच तो चटकन् आपल्या आसनावरून उठला आणि डॉक्टरांच्या गळ्याला पडून रडू लागला. थोडा शांत झाल्यावर उत्तरला, ”तुम्ही माझ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे शांतपणे दिली पण एकच असा प्रतीप्रश्‍न केला की माझे भावविश्‍व उध्वस्त झाले. गेल्या अनेक वर्षांपासून मी नमाज सोडलेली होती. तुमच्या प्रश्‍नानंतर खोलवर विचार केल्यानंतर मी गेल्या काही दिवसांपासून नमाज परत सुरू केलेली आहे. तुमचे धन्यवाद ! आखिरतबद्दल जुगार खेळण्याचे जोखीम मीच काय कोणीच पत्करू शकत नाही. मी तुम्हाला आश्‍वासन देतो यापुढे भविष्यात मी इस्लामच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीन.”
    वरील कथेमधील बोध वाचकांच्या लक्षात आलेलाच असेल. यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मात्र एवढे नक्की वाटते की, देशबांधवांसमोर वर नमूद कथे प्रमाणे इस्लामची तर्कसंगत मांडणी करण्यामध्ये भारतीय मुस्लिम कमी पडलेले आहेत.
    भारतीय मुस्लिमांची साधारपणे चार गटात वर्गवारी करता येते. पहिला गट अशा लोकांचा जे सुफी पद्धतीच्या इस्लामी विचारधारेमध्ये विश्‍वास ठेवतात, दर्ग्याला मानतात, त्या ठिकाणी ऊर्स, कव्वाली, मुशायरे भरवतात. त्यांच्या ताब्यात असलेल्या दर्ग्यामध्ये अनेक देशबांधव नियमितपणे येतात. परंतु इस्लामचा खरा संदेश पोहोचविण्याची कुठलीच व्यवस्था दर्ग्याच्या या खादीम लोकांनी केेलेली नसते.
    दूसर्‍या प्रकारचे लोक ते आहेत जे देशातील अनेक मदरश्यांमधून धार्मिक शिक्षण घेऊन बाहेर पडतात. याच लोकांच्या ताब्यात बहुतेक मशिदी असतात. या लोकांनी उच्चकोटीचे इस्लामी ज्ञान प्राप्त केलेले असते. मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात यांचेच म्हणणे ऐकतो. बोली भाषेमध्ये यांना उलेमा असे म्हणतात. समाजात यांची खूप प्रतिष्ठा आहे. हे प्रत्येक शुक्रवारच्या विशेष प्रार्थनेपूर्वी खुत्बा (विशेष संबोधन) मधून समाजाला मार्गदर्शन करत असतात. हे समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ रूढींवर बोलतात. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतात. लोकांना इबादतीकडे बोलवतात, मात्र देशबंधूंपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याची कुठलीही व्यवस्था या उलेमांनी केलेली नाही.
    तिसरा गट अशा लोकांचा आहे जे मोठमोठ्या शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातून भौतिक शिक्षण घेतात. मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब करतात. यांच्यातील काही लोक शासनामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करतात. काही उच्च पदावर सुद्धा असतात. यांच्यावर पाश्‍चीमात्य जीवनशैलीचा प्रचंड पगडा असतो. ते स्वतःचे जीवनमान उंचावण्यसाठी सतत प्रयत्नशील असतात. स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करतात. सामान्य मुस्लिमांपासून फटकून वागतात. इस्लामचा यांच्याशी फार कमी संबंध असतो. फार तर शुक्रवारची व ईदच्या नमाजला जातात. इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविणे तर दूर हे स्वतःच इस्लामपासून शक्य तेवढे अंतर ठेऊन असतात. 
    चौथा गट अशा लोकांचा आहे की जे जमाअते इस्लामी हिंद नावाच्या संघटनेशी संलग्न आहेत. यांनी मात्र देशबांधवांपर्यंत त्यांच्या भाषेत इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न गेल्या 77 वर्षांपासून चालू ठेवलेला आहे. या संघटनेच्या अनेक प्रकाशन संस्था आहेत. प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेमध्ये यांनी कुरआनचे भाषांतर केलेले असून, हदीससह इस्लामची शिकवण देणारे साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित केलेले आहे. हे आपल्या विविध उपक्रमांमधून देशबांधवांपर्यंत स्वतः पोहोचतात व त्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतात.
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आम्ही तुम्हाला उत्तम समाज बनविले आहे. जेणेकरून जगातील लोकांवर तुम्ही साक्ष व्हा आणि प्रेषित तुमच्यावर साक्ष असतील.” (संदर्भ ः सुरे बकरा आयत नं.143) या आयातीप्रमाणे मुस्लिमांचे हे धार्मिक कर्तव्य आहे की, त्यांनी स्वतः उत्तम समाज बनणे आणि देशबांधवांसमोर त्याचे उदाहरण ठेवणे व त्यांना उत्तम समाज घडविण्याचा संदेश देणे.
    आज भारतामध्ये कुठलेही क्षेत्र असे राहिलेले नाही ज्यात भ्रष्टाचार नाही. व्याजाधारित अर्थव्यवस्थेने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. टीव्ही उद्योगापासून पॉर्न उद्योगापर्यंत महिलांची प्रचंड पिळवणूक होत आहे. दोन वर्षाच्या चिमुकलीपासून 70 वर्षाच्या वृद्धेपर्यंत सर्व महिला या काही लिंगपिसाटांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. एक लिंग पिसाट पुरूष प्रधान समाज निर्माण झालेला आहे. खोटे बोलणे, विश्‍वासघात करणे सामान्य बाब झालेली आहे. आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा श्रीमंतांच्या मनाला पाझर फुटत नाही. दारू आणि ड्रग्जची पोहच विद्यार्थ्यापर्यंत झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. या वाईट गोष्टी करण्यामध्ये जरी मुस्लिमांचा रास्त सहभाग फार कमी असला तरी या वाईट प्रवृत्तींना रोखण्याची जी धार्मिक जबाबदारी मुस्लिमांनी स्विकारायला हवी होती ती स्विकारलेली दिसत नाही. त्यामुळे वाईट प्रवृत्तींना मोकळे रान मिळालेले आहे. एवढेच नव्हे स्वतः मुस्लिमांनासुद्धा या वाईट प्रवृत्तींचा फटका बसत आहे. त्यांची स्वतःची तरूण पिढी या वाईट गोष्टींच्या प्रभावातून सुटलेली नाही.
    मानवतेच्या सर्व प्रश्‍नांचे उत्तर ज्या व्यवस्थेमध्ये आहे त्या व्यवस्थेचे वारस असतांनासुद्धा त्या व्यवस्थेबद्दल देशबांधवांना अवगत न करण्याचे पाप बहुतेक मुस्लिमांनी केलेले आहे. इस्लामचा संदेश दोन प्रकारे पोहोचवता येतो. एक मीडियाद्वारे दूसरा स्वतःच्या वर्तनाद्वारे. या दोन्ही बाबतीत मुठभर लोक वगळता बाकीचा समाज नामानिराळा राहिलेला आहे. उलट त्यांनी आपल्या वर्तनातून इस्लामच्याविरूद्ध असल्याचे सिद्ध केलेले आहे.
    शेवटी एकच गोष्ट सांगून हा लेखन प्रपंच थांबवितो की, जोपर्यंत इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मुस्लिम समाज गंभीरपणे स्विकारणार नाही  तोपर्यंत देशामध्ये वाईट प्रवृत्तींची वाढ होतच राहणार व त्याचे नुकसान इतरांसोबत मुस्लिमांनाही भोगावे लागणार. जेव्हा माणसाच्या जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान इस्लाममध्ये आहे असा मुस्लिमांचा दावा आहे तेव्हा तो दावा खरा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. केवळ जमाअते इस्लामी हिंद व मौलाना कलीमुद्दीन सिद्दीकी, संदेश लायब्ररी पुणे, सलाम सेंटर बेंगलुरू इत्यादींची ही जबाबदारी नसून समग्र मुस्लिम समाजाची ही जबाबदारी आहे. जोपर्यंत या जबाबदारीचे भान आपल्याला येणार नाही आपण सुखाने राहू शकणार नाही. लक्षात ठेवा मित्रानों ! ही आपली धार्मिक आणि राष्ट्रीय अशी दुहेरी जबाबदारी आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या जबाबदारी जाणीव आणि ती पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळो. (आमीन.)

- एम.आय.शेख
9764000737

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाची उपासना करेल तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात त्याच्या वाट्याला वंचितता  येईल.’’ मग त्यांनी या आयतीचे पठण केले, ‘‘जो मनुष्य माझ्या आदेशपत्राचे आज्ञापालन करील तो न या जगात मार्गभ्रष्ट होईल आणि न परलोकात दुर्भागी असेल.’’ (हदीस :   मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पवित्र कुरआनमध्ये पाच गोष्टी आहेत. ‘हलाल’, ‘हराम’, ‘मुहकम’, ‘मुतशाबेह’ आणि ‘इमसाल’.  ‘हलाल’ (वैध) ला वैध समजा, ‘हराम’ (अवैध) ला अवैध माना, ‘मुहकम’ (पवित्र कुरआनचा तो भाग ज्यात धर्मनिष्ठा आणि कायदा वगैरेची शिकवण दिली गेली आहे) चे अनुसरण  करा, ‘मुतशाबेह’ (कुरआनचा तो भाग ज्यात परोक्षाच्या गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे जसे- ‘जन्नत’ (नंदनवन), ‘दोजख’ (नरक), ‘अर्श’ (सिंहासन), ‘कुर्सी’ (खुर्ची) वगैरे) वर ईमान  बाळगा (आणि त्याची अवहेलना करू नका) आणि ‘इमसाल’ (लोकसमुदायांच्या विध्वंसाच्या धडा शिकविणाऱ्या कथा) पासून उपदेश प्राप्त करा. ` (हदीस : मिश्कात)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध  केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ नका. (हदीस : मिश्कात)
माननीय जियाद बिन लबीद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्ट सांगितली आणि मग म्हणाले, ‘‘असे तेव्हा घडेल जेव्हा ‘दीन’ (जीवनधर्मा) चे ज्ञान  संपुष्टात येईल.’’ यावर मी म्हणालो, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही पवित्र कुरआनचे पठण करतो आणि आमच्या अपत्यांना पठण करण्यास शिकवितो आणि आमची मुले त्यांच्या  अपत्यांना पठण करण्यास शिकवतील; तर मग ज्ञान कसे नष्ट होईल?’’
पैगंबरांनी सांगितले, ‘‘अति उत्तम! मी तुम्हाला मदीनेतील सर्वांत समजदार मनुष्य समजत होतो. ज्यू व खिश्चन तौरात आणि इंजीलचे किती अधिक प्रमाणात पठण करतात, परंतु   त्यांच्या शिकवणींचे जरादेखील अनुसरण करीत नाहीत, हे तुम्ही पाहात नाही काय?’’ (हदीस : इब्ने माजा)

भाग्यावर ईमान
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीचे स्वर्ग आणि नरक लिहिले गेलेले आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे  पैगंबर! मग आम्ही आमच्या लिहिलेल्याचा का लाभ घेऊ नये आणि कर्म सोडून द्यावे?’’ पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही, कर्म करा, कारण प्रत्येक व्यक्तीला तीच ईशकृपा लाभते ज्यासाठी  त्यास जन्माला घालण्यात आले आहे, जो दैववान आहे त्याला स्वर्गातील कामांची ईशकृपा मिळते आणि जो दुर्दैवी (नरकवासी) आहे त्याला नरकातील कामांची ईशकृपा मिळते.’’
यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह अल-लैल’च्या या दोन आयतींचे पठण केले (ज्या वरील हदीसमध्ये लिहिलेल्या आहेत, त्यांचा अर्थ असा की) ज्याने संपत्ती खर्च केली आणि  ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब केला आणि उत्कृष्ट गोष्टीचा स्वीकार केला (म्हणजे इस्लामचे अनुसरण केले) तर आम्ही त्याला उत्तम जीवन म्हणजे स्वर्गाची ईशकृपा देऊन आणि  ज्याने  आपली संपत्ती खर्च करण्यात वंâजूषपणा दाखविला आणि (अल्लाहशी) अनभिज्ञ आणि उत्तम जीवनास खोटे ठरविले तर आम्ही त्याला त्रासदायक जीवनाची (नरक) ईशकृपा देऊ.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget