Latest Post

दापोडी (वकारअहमद अलीम)-
इस्लामचे अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) हे समस्त जगवासियांचे आदर्श आहेत. त्यांचे आचार, विचार व मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे ‘दीन’ (इस्लामी जीवनपद्धत) चा ठोस  पाया आहे. आधुनिक शिक्षणाने तुम्ही डॉक्टर, इंजीनियर वा इतर उच्चपदावर जाऊ शकता. परंतु त्या अगदोर तुम्ही सर्वोत्तम मुसलमान बना. यामुळेच भौतिक जगात व पारलौकिक  जगात तुम्ही यशस्वी व्हाल, असे भावपूर्ण उद्गार प्रा. अझहरअली वारसी यांनी येथे व्यक्त केले. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील  ‘इकरा इंग्लिश मेडियम स्कूल’ येथे जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र अंतर्गत येथे नवीन विभाग सुरू करण्यात आला, त्याच्या शुभारंभानिमित्त येथे ‘स्टडी सर्कल’ (चिल्ड्रन सर्कल) चे  आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूना कॉलेजचे रसायनशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. वारसी हे  बोलत होते.
इकरा इंग्लीश स्कूलचे चेअरमन मौलाना उबेर काझी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पुण्याचे अध्यक्ष रिझवान खान, जमाअतचे  पिंपरीचे स्थानिक अध्यक्ष फेरोज खान, जमाअतचे पुणे विभागाचे सचिव तजम्मुल खान, पूना कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख, जमाअतच्या आकुर्डी शाखेचे सदस्य म. सलीम मुजावर   आणि इकरा स्कूलचे सचिव म. सलीम शेख, मौलाना अब्दुल मजीद आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
जमाअतच्या नवनिर्मित दापोडी शाखेचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की वय १४ पर्यंतच्या मुलांमध्ये इस्लामी  जीवनपद्धतीसंबंधी जागृती निर्माण करणे,शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, अंतिम प्रेषितांचा ज्ञानार्जनासंबंधीचा दृष्टिकोन विद्याथ्र्यांमध्ये आणणे हेच स्टडी सर्कलचे उद्दिष्ट आहे. याद्वारे आईवडिलांची आज्ञाधारकता, शारीरिक व सार्वजनिक स्वच्छता, अपायकारक वस्तूंपासून दूर राहाणे, आदि आदर्श मूल्यांची जोपासना मुलांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच  शालेय स्पर्धा, खेळ इत्यादींमध्ये सहभागी होणे आणि त्याद्वारे निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तयारी करवून घेणे, नमाज वेळेवर अदा करणे, उच्च चारित्र्य निर्माण करण्याचा  उद्देश असून दर रविवारी केवळ इकरा स्कूलचेच नव्हे तर सबंध दापोडी परिसरातील १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन जमाअतच्या स्थानिक शाखेतर्फे करण्यात
येणार असल्याची माहिती अजीमोद्दीन शेख यांनी या वेळी दिली.
इकरा इंग्लीश स्कूलचे सचिव म. सलीम शेख यांनी ‘स्टडी सर्कल’ उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले की स्टडीमुळे मुलांमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. आमच्या शाळेतील उपस्थित विद्याथ्र्यांमधील नैतिक, चारित्र्यात्मक बदल पाहून परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्टडी सर्कलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील, असा   आशावादही शेख यांनी व्यक्त केला.
लहान मुलांना समजेल व उमजेल अशा अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत मार्गदर्शन करताना प्रा. वारसी यांनी थेट संवाद साधला. ह. मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून प्रेषित्वाची  शुभसूचना मिळाली. प्रेषितांनी आपल्या घराण्यातील सर्वांना एकत्रित करून याची उद्घोषणा केली. पण एकानेही प्रेषितांचे म्हणणे मान्य केले नाही. पण प्रेषितांच्या काकांचा ११ वर्षांचा  मुलाग उठून उभा राहिला. वडीलधाऱ्यांसमोर उभारताना त्याचे पाय लटपटू लागले. पण... निश्चय पर्वतासमान. त्याने निर्भीडपणे सांगितले, हे प्रेषिता! आपण अल्लाहचे सच्चे प्रेषित आहात. मी त्यावर श्रद्धा ठेवतो. मी इस्लाम स्वीकारून माझे आचरण आपल्या आदेशानुसार करीन. इतिहासात त्या मुलाचे नाव अजरामर झाले. तेच इस्लामचे चौथे खलीफा ह. अली  (रजि.) होत. प्रेषितांचे ते जावईही झाले.
ही दृढनिश्चयता स्टडी सर्कलद्वारे जमाअत मुलांमध्ये आणू इच्छिते. त्यासाठी प्रत्येक रविवारी विविध विभागांतील तज्ज्ञ मंडळी येतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या  काळात समाजाचे नेतृत्व यामधूनच फुलू लागेल, असा विश्वासही प्रा. वारसी यांनी व्यक्त केला.
एस.आय.ओ.चे अध्यक्ष रिझवान खान यांनीही आपले विचार व्यक्त केले. मौ. उबेर काझी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर वकारअहमद अलीम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात सुश्राव्य कुरआन पठणाने झाली. अजीमोद्दीन शेख यांनी अत्यंत सूचकतेने सूत्रसंचालन केले. शेवटी मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनंदिन जीवनात कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांचे दोन परिणामही डोळ्यांसमोर दिसू लागतात. हे  करावे की ते करावे? असा प्रश्न पडतो. अशा वेळी इतरांशीही सल्लामसलत करावी लागते. यातून कितीतरी पर्याय सुचवले जातात. पण प्रश्न नेमका सुटेल याची शाश्वती नसते.
माणसाच्या निर्माणकर्त्याने बरे-वाईट पारखण्याकरिता बुद्धी दिली आहे, जिच्या जोरावर आज झालेली भौतिक प्रगती आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. तरीही आपण आपल्या  प्रश्नांवर नेमका तोडगा काढण्यात का अपयशी ठरतो?
अशी अडचणीची वेळ फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसून सामाजिक स्तरावरही सर्वत्र दिसून येते. सामाजिक जीवनातीलही कित्येक प्रश्नांवर असंतोषाचा भडका उडताना जगभर दिसून  येतो. नवरा-बायकोचे अधिकार व कर्तव्ये यामध्ये समतोल साधता न आल्यामुळे उडणारे खटके, मालकवर्ग आणि कामगारबंधू यांच्या दरम्यान होणारे संघर्ष, व्यक्तीस्वातंत्र्य आणि  समाजहीत यातून निर्माण होणारे वाद इत्यादी बोलकी उदाहरणे आहेत.
जगामध्ये आजपर्यंत जितके वाद, तंटे उद्भवले आणि आजही बघायला मिळतात, त्याचे कारण हेच आहे की तथाकथित बुद्धिजीवींनी अशा समस्यांकडे एकतर्फी नजरेने बघितले आणि  तोडगा म्हणून असमतोल उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत असो वा सामाजिक प्रत्येक स्तरावर शांतता भंग होण्याचे मूळ कारण हेच आहे.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धीची माणसे या जगामध्ये पूर्वीही होती आणि आजही आहेत. अशा लोकांनी नेहमीच हे मान्य केले की जीवनरूपी प्रवासात फक्त आपली बुद्धीच आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही तर ज्याने आपल्याला प्रवासाला धाडले आहे त्याची मार्गदर्शिका आपल्या सोबत असणे अत्यंत जरुरी आहे नाही तर प्रवासात खूप अडचणी निर्माण  होतील. विचाराअंती ही माणसे दोन निर्णयांप्रत पोहोचली, एक हा की, ही सृष्टी काही आपोआप निर्माण झालेली नाही तर या सृष्टीचा एक निर्माणकर्ता आहे. दुसरा असा की माणसाचे  जीवन हे फक्त या जगापुरतेच मर्यादित नाही तर पुढे आणखी एक जीवन आहे, ज्यामध्ये जीवनभर केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांचे परिणाम प्रत्येकासमोर येतील. त्यांनी निरीक्षण केले की  या जगामध्ये कर्मांचे परिणाम साधारणत: निघत नाहीत. येथे तर सदाचारी लोकांच्या नशिबी दु:ख, यातना, कष्ट येतात आणि दुराचारी लोक ऐश व आरामाचे जीवन व्यतीत करतात.  पण सृष्टीचा निर्माणकर्ता न्यायी आहे. तो जरूर प्रत्येकाचा हिशोब घेईल.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धी असल्यामुळे या विचारांप्रत पोहोचल्यावर त्याच्या अंतर्मनाची हीच प्रार्थना होती की हे पालनकर्ता आम्हांस थेट तुझ्यापर्यंत पोहोचणारा मार्ग दाखव  आणि आम्हाला सरळमार्गी बनव. आम्हाला भीती वाटते की सरळमार्गावरून प्रवास करता करता एखाद्या आडवाटेवर आम्ही वळलो तर कदाचित ती वाट आम्हाला भटकवणारी किंवा विनाशाच्या खाईत लोटणारी ठरू शकते.
याच मार्गदर्शनासाठी म्हणजे लोकांचा जीवनप्रवास सुखाचा व्हावा आणि मरणोत्तर जीवनातही ते सफल व्हावेत म्हणून अल्लाहाने जवळपास आपले सव्वा लाख पैगंबर या जगामध्ये  पाठविले आणि त्यांच्यामार्फत आपला संदेश, आपले मार्गदर्शन पोहोचविले. जगामध्ये आलेल्या अनेक पैगंबरांपैकी अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो)  आहेत आणि अवतरित झालेल्या अनेक संदेशांपैकी अंतिम संदेश कुरआन आहे.
कुरआनच्या सुरुवातीला सूरह फातिहा हा अध्याय आहे. हा अध्याय एक प्रार्थना आहे, याचना आहे. ही प्रार्थना कुरआनच्या सुरुवातीला निश्चित करण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही या  ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर प्रथम अल्लाहकडे अशा प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना कशी करावी? हेही मार्गदर्शन केले गेले आहे.

‘अल्लाहच्या नावाने जो अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी यापेक्षा अधिक योग्य व चांगल्या शब्दांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या शब्दांमध्ये अल्लाहचा परिचय करून देण्यात आला   आहे आणि त्याच्या गुणांचा उल्लेख आहे. ‘रहमान’, ‘रहीम’ हे शब्द ‘र ह म’ या धातूपासून बनलेले आहेत. ‘रहमान’ ही शब्दरचना जोरदार आणि जोशपूर्ण कैफियत दर्शवणारी आहे तर  ‘रहीम’ या शब्दरचनेत निरंतरता, सदैवपणाची कैफियत आहे; म्हणजे अल्लाहची दया, कृपा बरसणारी आहे आणि ही जोरदार कृपावृष्टी कधीही थांबणारी नाही तर निरंतर होत राहणारी  आहे. कोणत्याही काळापुरती मर्यादित नाही तर ही कृपावृष्टी पूर्वीही होती, आजही होत आहे आणि पुढेही होत राहणार. जसे समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटा आणि निरंतर वाहणाऱ्या  नदीचा प्रवाह यांची एकत्र कल्पना करणे अवघड आहे तसेच अल्लाहाच्या या गुणवैशिष्ट्यांची एकत्र कल्पना करणे आपल्याला शक्य नाही.

‘सर्व स्तुती, कृतज्ञता अल्लाहसाठी आहे जो साऱ्या विश्वांचा स्वामी, पालनकर्ता आहे.’

जगात कुठेही व कोणत्याही स्वरूपात जे सौंदर्य दिसून येते, वैभव-समृद्धी दिसून येते, ज्या ज्या सामथ्र्यांचा आपणास अनुभव होतो त्या सर्वांचा मूळ स्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रत्येक  स्तुती, प्रशंसा याला पात्रही फक्त तोच निर्माणकर्ता आहे. तोच साऱ्या विश्वांचा स्वामी आहे आणि तोच अल्लाह साऱ्या विश्वांचा पालनकर्ताही आहे. त्याने माणसाला असंख्य देणग्यांनी उपकृत केले आहे, हे मान्य करून फक्त त्याचेच कृतज्ञ व आभारी बनून जगले पाहिजे. भूक लागल्यावर आपण जेवण करतो जेवणानंतर त्याचे आभार प्रकट करताना म्हणावे की,
‘‘हे पालनकर्ता! आम्ही तुझे आभारी आहोत, आमच्या
पोटाची आग विझवण्यासाठी तू काय काय निर्माण केले!’’
दिवसभर काम केल्यानंतर माणूस पार थकून जातो व त्याला आपोआप झोप लागते. सकाळी उठल्यावर जेव्हा सारा थकवा निघून जातो तेव्हा माणसाने हे बोलले पाहिजे की, ‘‘हे   अल्लाह काय छान व्यवस्था आहे तुझी! रात्री अंधार झाला म्हणून सर्वत्र शांतता पसरली आणि मला सुखाची झोप लागली ज्यामुळे सारा थकवा दूर झाला, मी तर मेल्यागत झालो होतो.’’
सकाळी उठल्याबरोबर शौचालयाकडे जाणे हा जीवनाचा भाग आहे. तेथून आल्यानंतरही माणसाने हेच म्हणावे की प्रत्येक आभार, धन्यवाद अल्लाहसाठीच आहे, ज्याने शरीरव्यवस्था  अशी बनवली की त्रासदायक वस्तू दूर होऊन तब्येत फ्रेश झाली. यासारख्या आंतरिक व बाह्य कितीतरी देणग्या माणसाला मिळालेल्या आहेत म्हणून ज्याने दिल्या त्याचाच कृतज्ञ व  आभारी बनून राहिले पाहिजे.

‘अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
त्याची, दया, कृपा अनंत आहे. त्याला सीमा नाही. त्याचा दयाळूपणा कायमचा आहे, निरंतर, सदैव आहे. ‘निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा आहे.’ तो फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो  न्यायीसुद्धा आहे. कयामत म्हणजे न्यायनिवाड्याच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला पुन्हा जिवंत केले जाईल आणि प्रत्येकाच्या जीवनकार्याचा तपास होईल. सदाचारी लोकांना  त्यांच्या सदाचाराचे भरपूर फळ मिळेल आणि दुराचारी लोकांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा भोगावी लागेल. जीवनाच्या परीक्षेत कोण सफल झाला आणि कोण असफल ठरला या  निकालाचा तो दिवस असेल. त्या निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा फक्त अल्लाह आहे. न्यायनिवड्याचे सर्वाधिकार फक्त त्याच्याच हातात असतील. शिक्षेपासून सुटण्यासाठी तेथे कसलीही  धनसंपत्ती कामी येणार नाही. नातेवाईक, मित्रमंडळी कोणीही मदतीला येणार नाहीत. राजा असो वा रंक कोणीही कुणासाठीही काहीच करू शकणार नाही, कारण प्रत्येकाला फक्त  स्वत:ची चिंता लागलेली असेल. त्या दिवशी सर्वांना ऐकू येईल की, ‘‘आज सत्ता कुणाची आहे?’’ म्हणजे आज राजाधिराज कोण आहे, वास्तविक साम्राज्य कुणाचं आहे? उत्तर दिले  जाईल, ‘‘एकमेव सामथ्र्यशाली अल्लाहचं.’’ ‘आम्ही फक्त तुझीच भक्ती करतो.’
हे अल्लाह आमच्यावर तुझी अनंत कृपा आहे. तू अत्यंत कृपाळू, दयाळू आहेस आणि तू न्यायीसुद्धा आहेस. तूच आमचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आहेस. म्हणूनच आम्ही हे  मान्य करतो की आम्ही फक्त तुझेच भक्त, गुलाम, दास आहोत. आम्ही फक्त तुझीच भक्ती, उपासना करतो आणि करत राहणार. फक्त तुझीच आज्ञापालन करतो आणि करत  राहणार.

‘आणि आम्ही फक्त तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.’
खरा साहाय्यक तूच आहेस. फक्त तुझ्याच मदतीवर आमचा विश्वास आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणत्याही पैगंबरांची, संताची, देवदूतांची किंवा तू निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही  वस्तूची आम्ही भक्तीही करत नाही व त्यांच्याकडे मदतीची याचनाही करत नाही. तू दिलेल्या सद्सद्विवेकबुद्धीमुळे आम्ही तुला ओळखू शकलो. आम्ही न मागताही तू आम्हांला भरपूर  दिले. आता आमची गरज एवढीच आहे की,

‘आम्हाला सन्मार्गी चालव.’

आम्हाला तो सन्मार्ग, सरळमार्ग दाखव आणि त्यावर चालण्याची शक्ती दे जो मार्ग थेट तुझ्यापर्यंत पोहोचतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचारविचार, वागणुकीमध्ये आम्हाला तो मार्ग  दाखव जो सत्य आहे, जो या जीवनातही खऱ्या उन्नतीचा, प्रगतीचा जामीन आहे आणि ज्यामध्ये मरणोत्तर जीवनातही कल्याणाची शाश्वती आहे.

‘त्या लोकांचा मार्ग ज्यांच्यावर तू कृपा केलीस.’
तो सन्मार्ग, सरळमार्ग जो तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला. जगात आलेल्या सर्व पैगंबरांचा मार्ग, त्यांच्या सर्व सत्यनिष्ठ अनुयायींचा मार्ग, अशा मार्गावर चालताना जे शहीद झाले आणि  या सर्वांच्या पावलांवर पावले टाकीत जगणाऱ्या सदाचारी व चारित्र्यवान लोकांचा मार्ग, जे सर्व तुझ्या प्रसन्नतेचे पात्र ठरले.

‘जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.’
अल्लाहचा प्रकोप त्या लोकांवर प्रकटला ज्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा, जीवनपद्धतीचा मनापासून स्वीकार केला नाही. फक्त काही रूढी-परंपरांचा त्यांनी स्वीकार केला. ईशआदेशाच्या  विरुद्ध आपली मनमानी केली, अन्याय अत्याचाराचा मार्ग धरला, अशा सर्व लोकांना सुधरण्यासाठी भरपूर वेळ दिली गेली पण एका ठराविक वेळेनंतर त्यांना या जगातही शिक्षा मिळाली  आणि मरणोत्तर जीवनात अजून हिशोब व्हायचा बाकी आहे.
मार्गभ्रष्ट ते लोक आहेत ज्यांना उत्तम मार्गदर्शन केले गेले पण भावनेच्या भरात त्यांनी धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध अवास्तव श्रद्धा बाळगल्या. पैगंबराला अल्लाहचा पुत्र  मानण्याचे महापाप केले. धर्मशास्त्रात निर्देश नसतानाही संसारत्याग करण्यासारख्या नवीन प्रथा सुरू केल्या आणि प्रकृतीच्या विरुद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात सरळ मार्गापासून ते खूप  दूर निघून गेले.

‘हे अल्लाह आमची प्रार्थना स्वीकार कर!’
सूरह फातिहा भक्तांनी मार्गदर्शनासाठी केलेली एक याचना आहे. अल्लाह त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून संपूर्ण कुरआन त्यांच्या समोर ठेवता आणि सांगतो की हाच तो सरळमार्ग आहे  ज्याची तुम्हास तळमळ लागली आहे. हा ग्रंथ तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग दाखवेल आणि तुमच्या जीवनातील असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये योग्य दृष्टिकोन   ठेवण्यास मदत करेल. या अध्यायाद्वारे आपणास काही गोष्टींचा बोध होतो. एक हा की, आपल्या जीवनात व्यक्तिगत स्तरावर जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या  वेळी आपण आपल्या निर्माणकर्त्याला, पालनकर्त्याला हाक मारावी आणि फक्त त्याच्याचकडे मदतीची याचना करावी. संबंधित विषयावर त्याने काय मार्गदर्शन केले हे जाणून घेण्याचा  प्रयत्न करावा. कारण माणसाला जीवनातील टप्प्या टप्प्यावर, पावला पावलावर याची गरज भासते.
दुसरा हा की बुद्धिमत्ता ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे आणि त्याचा वापर केव्हा व कसा करावा याबाबतीत ही कुरआनमध्ये भरपूर मार्गदर्शन आहे, पण सामाजिक  स्तरावरील काही मुख्य प्रश्नांवर आपण हे मान्य केलेच पाहिजे की फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण त्यांना सोडवू शकत नाही.
कौटुंबिक वाद निर्माण होण्यास कारणीभूत असणारी समस्या ही आहे की, पती-पत्नीमध्ये अधिकार आणि कर्तव्याबाबतीत कोणते संतुलित नियम असावेत? हे निश्चित करणे मानवाला  शक्य नाही. कारण मानव एक तर स्त्री आहे किंवा पुरुष. या विषयावर जेव्हा स्त्री विचार करेल तेव्हा ती आपली भावना, आपल्या संवेदना यावर लक्ष देईल. पुरुषांच्या भावना, त्यांच्या   जाणिवांची कल्पनाही करणे तिला शक्य होणार नाही. अधिकार व कर्तव्यासंबंधी जेव्हा पुरुष विचार करेल तेव्हा त्याला स्वत:च्या जाणिवा तर माहीतच असणार पण स्त्रीच्या भावना,  संवेदना त्याला काय कळणार? शेवटी तो जे काही नियम बनवेल त्यामध्ये नक्कीच आपले वर्चस्व ठेवणार. फक्त एकच अस्तित्व असे आहे जो दोघांचा निर्माणकर्ता आहे. तो अल्लाह  आहे, जो दोघांवरही प्रेम करतो. तो दोघांचा शुभचिंतक आहे म्हणून या बाबतीत त्याचे मार्गदर्शन घेणे अत्यंत जरुरी आहे.
दुसरे; व्यक्ती आणि सामाजिक संबंधांमध्ये संतुलन कसे राखता येईल? पालकांना, वडीलधाऱ्या माणसांना वाटते की आम्ही जो हुकूम देऊ मुलांनी तो नेहमी मुकाटपणे मान्य करायलाच  हवा. मुलं म्हणतात, आम्हाला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. शासन व्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना वाटते की आम्ही जे जे निर्णय घेऊ जनतेने त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. नागरिक  म्हणतात आमच्या स्वातंत्र्यावर का गदा आणता? जगभरात स्वातंत्र्य, फ्रीडम हा नारा किती लोकप्रिय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. होय! व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य, पण  आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देण्याइतपत व्यक्तीस्वातंत्र्य दिले जावे का? सार्वजनिक ठिकाणी कसलेही चाळे करण्याची खुली मुभा असावी का? कायदेकानू आणि नैतिकतेचा विचार  व्हायला नको? हजारो लोकांचे नुकसान करून एखाद्याने स्वत:चा फायदा करून घेणे हे कसले व्यक्तीस्वातंत्र्य? याच प्रश्नांवर गरज भासते अशा संतुलित नियमांची ज्यामध्ये व्यक्तीही  मोकाट होऊन समाज विघातक बनू नये आणि समाजव्यवस्थाही बेछूट होऊन इतकी सशक्त होऊ नये की व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाईल. म्हणूनच या प्रश्नावरही आपण आपल्या  निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे जरुरी आहे.
तिसरी मोठी समस्या भांडवलदार आणि श्रमिक वर्गाची आहे. एकीकडे भांडवलदारांचे उत्पन्न अवाढव्य वाढतच आहे तर दुसरीकडे श्रमिकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशी होत  असल्याचे सामाजिक चित्र आपणासमोर आहे. एकीकडे पैशाची उधळपट्टी तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणाची गैरसोय. ही विषमता असलेल्या समाजामध्ये भौतिक प्रगतीच्या आणि  विकासाच्या गप्पा मारणे योग्य नाही.
दुसरी बाजू अशी की श्रमिकांना त्यांच्या हक्कांपेक्षा जास्त दिल्यास भांडवल नुकसानीत येण्याचा धोका असतो. ही भीती असेल तर भांडवल व भांडवलदार मैदानात का व कसे टिकेल?  असे कित्येक प्रश्न व समस्या आहेत ज्यामुळे आज जगभरात अशांतता पसरलेली दिसून येते. म्हणूनच जीवन प्रवास सुखात, शांततेत पूर्ण व्हावा आणि या जगातही आणि मरणोत्तर  जीवनातही संपूर्ण मानवजात सफल व्हावी याकरिता सर्वांनी ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे सर्वांच्या भलाईचे आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, (जेव्हा ‘सूरह शुअरा’ची आयत ‘वऩिजर अशीरतकल अ़करबीन’ (आपल्या जवळच्या नातेवाईकांना भय दाखवा) चे अवतरण झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरैशांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, ‘‘हे कुरैशच्या लोकांनो! स्वत:ला नरकाच्या आगीपासून वाचविण्याची चिंता करा, मी अल्लाहच्या कोपाला  तुमच्यापासून जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्दे मनाफच्या वंशजांनो! मी तुमच्यावरील अल्लाहच्या कोपाला जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब! (पैगंबरांचे  काका) मी अल्लाहच्या प्रकोपाला तुमच्यापासून जरादेखील हटवू शकत नाही. हे सफिया! (पैगंबरांची आत्या) मी तुमच्यावरील अल्लाहच्या प्रकोपाला जरादेखील हटवू शकत नाही. हे  माझ्या कन्ये, फातिमा! (रजि.) तू माझ्या संपत्तीतील जेवढे काही मागशील ते मी देऊ शकतो, परंतु अल्लाहच्या प्रकोपाला तुझ्यावरून हटवू शकत नाही (तेव्हा स्वत:ला वाचविण्याची  चिंता करा, ईमान आणि अनुसरणच तेथे कामी येईल).’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्या दरम्यान प्रवचन दिले. त्यात त्यांनी ‘माले गनिमत’ (युद्धात सापडलेली संपत्ती) च्या   चोरीची घटना अतिशय महत्त्वपूर्णरित्या सादर केली. मग पैगंबर म्हणाले, ‘‘मला तुमच्यापैकी कोणी अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती आढळू नये की त्याच्या मानेवर जोरजोरात   ओरडणारा उंट आहे आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा (या पापाच्या संकटापासून वाचवा)! तेव्हा मी म्हणेन, मी तुझी काहीही मदत करू शकत  नाही, मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी या स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादा घोडा खिदळत आहे  आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! धावा! मला मदत करा. तेव्हा मी म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली  होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादी शेळी बसली आहे आणि ती ओरडत आहे आणि तो मनुष्य म्हणत   आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा. तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्याकरिता काहीही करू शकत नाही, मी तुला जगात आज्ञा पोहोचविल्या होत्या; मी  तुमच्यापैकी कोणाला अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर एखादा मनुष्य बसला आहे आणि तो ओरडत आहे आणि ज्याच्या खांद्यावर  बसलेला आहे तो मनुष्य म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! या, मला मदत करा! तेव्हा मी त्यांच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात  ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणास अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर कपड्यांच्या चिंध्या लटकत आहेत आणि तो  म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा, तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणासही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती पाहू इच्छित नाही त्याच्या मानेवर सोने-चांदीचे ढीग आहेत आणि तो म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत  करा! तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्या पापाच्या शिक्षेला जरादेखील कमी करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
जनावरांचे ओरडणे आणि कपड्यांचे लटकण्याचा असा अर्थ आहे की ‘माले गनिमत’ (युद्धात आढळलेली संपत्ती) च्या या चोऱ्या अंतिम निवाड्याच्या दिवशी लपविता येणार नाहीत. प्रत्येक पाप ओरडून ओरडून सांगेल आणि तो पापी असल्याचे जाहीर करील. माहीत असावे की हे फक्त ‘माले गनिमत’च्या चोरीबाबतच विशिष्ट आहे असे नाही, प्रत्येक मोठ्या पापाची  हीच स्थिती असेल. अल्लाह त्या वाईट शिक्षेपासून प्रत्येक मुस्लिमाला वाचवो आणि वाईट स्थिती येण्याअगोदर पश्चात्तापाची ईशकृपा लाभो.

आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची लेकरे : सलमान अहमद


लातूर (शादाब शेख)
जगातील सर्व मानवजातीचा निमार्ताही एकच आहे आणि मानवजातीची सुरूवातही एकाच आई- वडीलांपासून झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व देशवासी एकमेकांचे बांधव आहोत, एकाच  कुटुंबातील आहोत. हा धागा आम्हाला एका नात्यात गुंफतो. एकमेकांचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवितो, असे प्रतिपादन एस.आय. ओ. चे प्रदेशाध्यक्ष सलमान अहमद यांनी  केले. लातूर येथील खोरी गल्ली स्थित स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते ‘एक ईश्वर , एक मानव कुटुंब’ या अभियानादरम्यान ते बोलत  होते. यावेळी प्रदेश सचिव उजेर अहमद रंगरेज, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमैर अहमद सिद्दीकी, खिजर शिबीबी, शहराध्यक्ष अली हैदर पटेल, शहर सचिव अब्दुल्लाह मनियार,  इंजिनिअर शादाब शेख उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सर्व स्तरांतील, वर्गातील, व्यवस्थेतील लोकांचा ईश्वर एकच आहे. सध्या समाजात आपसात मनभेद वाढलेले असल्याचे दिसत  आहेत. ज्या देशातील लोकांमध्ये जात, पात, धर्म आदींबद्दल मनभेद असतील त्या देशाची प्रगती खुंटते. विद्यार्थ्यांमध्ये ही दिवसेंदिवस वैमनस्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे.  इस्लामबद्दल जाणून बुजून पसरविल्या गेलेल्या गैरसमजामुळे मानवकल्याणाला एका नात्यात गुंफणाऱ्या तत्वापासून लोक दूर आहेत. लोकांची मने यामुळे दुभंगलेली आहेत. एसआयओ  ‘एक ईश्वर एक कुटूंब’ या अभियानाद्वारे सर्व मनभेद, गैरसमज दूर करून सर्व स्तरातील, व्यवस्थेतील, वर्गातील लोकांना मानवतेच्या एका सूत्राचा संदेश समाजाच्या सर्व स्तरात   पोहचवून देशाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, वैयक्तिक भेटीगाठींद्वारे एकात्मतेचा, एक ईश्वराचा, एक कुटुंबाचा समतेचा, न्यायाचा संदेश  जवळपास साठ लाख लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अभियानादरम्यान एसआयओने एक कारवां (शिष्टमंडळ) बनवून दक्षिण महाराष्ट्राच्या 13 जिल्ह्यांतून तब्बल दोन हजार  किमीचा प्रवास केला. हा कारवां मूंबई, ठाणे, पालघर, पूणे, पिंपरी चिंचवड , कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद मार्गे दक्षिण महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांतून तब्बल 1500 किमी चा  प्रवास करत लातूरला पोहचला होता. येथून पुढे उदगीर, नांदेड,परभणी, जालना असा प्रवास करत औरंगाबादला याचा समारोप झाला. लातूर येथे पत्रकार परिषद, स्ट्रीट दावत वर्क,  विद्यार्थी संवाद कार्यक्रम, मस्जिद परिचय कार्यक्रम, मानवी साखळी आदी उपक्रमाद्वारे विद्यार्थी व लोकांपर्यत पोहचवून मानवतेला जोडण्याचे काम करण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही  सर्व एका ईश्वराचे अनुयायी एकाच कुटुंबातील बंधू आहोत. आमच्या मुलभूत प्रश्न आणि गरजा एकच आहेत. आमचे विचार जेव्हा एका सुत्रांत बांधले जातील तर निश्चितच भेदभाव  संपून प्रगतीकडे वाटचाल होईल.
मानवकल्याणाचे हित डोळ्यासमोर ठेऊन,  हा कारवां पुढेही काम करील. या अभियानात हजारो कार्यकर्त्यांनी काम केले. अभियान यशस्वी करण्यासाठी एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी मी अल्लाहकडे या अभियानाच्या यशस्वीतेकरीता तसेच समाजात, देशात समता, न्याय, एकात्मता व अखंडतेकरीता प्रार्थना  करत असल्याचे यावेळी इंजि. सलमान अहमद म्हणाले

अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत. स्त्रियांसुद्धा कवनशास्त्रात खूप तरबेज होत्या. अरबांना आपल्या काव्यशक्तीचा एवढा अभिमान होता की, बिगर अरबांना ते ‘अजमी’(अर्थात बोलता न येणारा) या नावाने संबोधत असत. तसे पाहता ‘अरब’ या शब्दाचाच अर्थ ‘वक्तृत्व कलेत पारंगत असलेला’ असा होतो. आणि त्यांच्या वक्तृत्व प्राविण्यामुळेच ते जगभर ‘अरब’ या नावाने प्रसिद्ध होते.
हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने सर्वांनाच प्रभावित करीत असत. वैयक्तिक आवडीशिवाय हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने आणि काव्याने राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बदलून टाकीत असत. अगदी युद्धाच्या वेळी योद्ध्यांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सर्वांत जास्त प्रभावी माध्यम वक्तृत्वशास्त्रच होते. एखाद्याचा विरोध करण्यासाठीसुद्धा सर्वांत प्रभावी माध्यम कवनशास्त्रच होते. ‘तलवारीपेक्षाही जास्त तीक्ष्ण असलेले प्रभावी हत्यार म्हणजे कवनशास्त्र’, असेच त्या काळी समीकरण होते. कवनशास्त्राने त्या काळी मोठमोठे शूरवीर आणि योद्धे तयार केले. युद्धातील जय-पराजयाची पूर्ण परिस्थिती आणि सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलून टाकण्याची अफाट शक्ती त्यांच्या कवनशास्त्रात होती.
अशा काळात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी प्रेषित्वाची घोषणा करताच संपूर्ण अरबस्थान त्यांच्या विरोधात पेटून उठला. त्यांच्या विरोधात या समाजाने तलवार आणि भाल्यासह कवनशास्त्राच्या अतिप्रभावी हत्याराचासुद्धा भरपूर वापर केला. आदरणीय प्रेषितांनी मायभूमीचा त्याग केल्यावरसुद्धा हा विरोध थंडावण्याचे नाव घेत नव्हता. इस्लामद्रोह्यांनी इस्लाम व प्रेषितांविरुद्ध कवितांचा पर्वत रचून संपूर्ण अरब जगतात आणि अरब समाजाच्या प्रत्येक व्यक्तीत इस्लामविरोधी प्रेरणात्मक चळवळ उभी केली होती. इस्लामविरोधी कविता काही दिवसांतच कित्येक मैल दूरवर आपला प्रभाव टाकत होत्या. इस्लामसमर्थकांना रात्रंदिवस अशा काव्यांचा सामना करणे भाग होते. या मानसिक त्रासातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रेषितसोबत्यांनी माननीय अली(र.)यांना विनंती केली की, ‘‘आपण इस्लामद्रोह्यांच्या इस्लामविरोधी काव्यांचे सडेतोड आणि प्रभावी उत्तर देणार्या कविता रचाव्यात’ माननीय अली(र.)यांनी यासाठी आदरणीय प्रेषितांची परवानगी घेण्याची अट घातली. प्रेषितसोबत्यांनी ही विनंती प्रेषितांना केली, तेव्हा प्रेषितांनी या कामाची जबाबदारी माननीय अली(र.)यांच्यावर टाकण्याऐवजी मदीना शहरातील मुस्लिमांची सभा बोलावून आवाहन केले,
‘‘ज्या लोकांनी तलवारीने माझे समर्थन केले, त्यांच्यापैकी कोण आहे जो या इस्लामविरोधी काव्यास तोंड देऊन इस्लामचे समर्थन करील?’’ एवढ्यात एक अन्सारी सोबती उठून उभे राहून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी यासाठी तयार आहे.’’
‘‘तुम्ही त्यांच्या काव्याचा सामना कसा कराल? प्रेषितांनी विचारले,
‘‘हे प्रेषित! मी आपले काव्य इस्लामचे समर्थन आणि इस्लामद्रोह्यांच्या विरोधात तयार करेन.’’
आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली. इस्लामसमर्थक कविता रचणारे हे महान कविवर्य म्हणजेच - ‘माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.)’ होत.
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांनी इस्लामसमर्थनार्थ आपल्या सर्व काव्यशक्ती पणाला लावून संपूर्ण अरब जगतात इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर दिले आणि इस्लामची भरपूर सेवा केली. माननीय हस्सान बिन साबित(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘नज्जार’ या प्रतिष्ठित शाखेचे सुपुत्र होत. त्यांची वंश शृंखला अशी आहे.
‘हस्सान’ पिता साबित पिता मंझर पिता हराम पिता अमरु पिता झैद मनात पिता अदी पिता अमरु पिता मालिक पिता नज्जार पिता सआलबा पिता अमरू पिता खजरज.’’ त्यांचे प्रसिद्ध टोपण नाव ‘अबू वलीद’ असे होते. परंतु त्यांना ‘शायर-ए-रसूल’ अर्थात ‘प्रेषितांचे कवि’ या नावानेच जास्त संबोधण्यात येते. त्यांच्या मातेचे नाव ‘फरिआ बिन्त खालिद’ असे होते. त्या ‘खजरज’ परिवाराच्या ‘साअदा’ या शाखेच्या गर्भश्रीमंत असलेल्या ‘माननीय साअद बिन उबादा(र.)’ यांची पुतनी होत. त्यांनासुद्धा इस्लाम स्वीकृतीचे सौभाग्य लाभले होते.
माननीय हस्सान(र.)यांनी एका अशा परिवारात जन्म घेतला, जो पहिल्यापासूनच काव्यशास्त्रात अरब समाजात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित होता. काव्यशास्त्राची या परिवारात परंपरागत आवड होती. त्यांनी आपल्या प्राचीन वाडवडिलांचा हा वारसा मोठ्या कौशल्याने जपला होता. तसेच या परिवाराने अरबी भाषेतील काव्यशास्त्रात नवनवीन संशोधनसुद्धा केले. म्हणून हा परिवार संपूर्ण अरबजगतात नावाजलेला आणि प्रसिद्ध होता.
माननीय हस्सान(र.)यांनी काही दिवसातच इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. ते हिजरी सन पूर्व ६५ वर्षांपूर्वी जन्मले आणि वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपल्या कवन कौशल्याच्या माध्यमाने इस्लामची अभूतपूर्व सेवा केली. इस्लाम स्वीकारण्यापूर्वीही ते अरब जगतात क्रमांक एकचे कवि होते आणि अरब जगातील प्रत्येक व्यक्तीचे ते पहिल्या पसंतीचे नावाजलेले आणि आवडते कवि हते.
इस्लाम स्वीकृतीपूर्वी त्यांचे दिवस-रात्र याच कार्यात व्यतीत होत असे. कबिल्याच्या आपसांतील लढायांमध्ये ते योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी आवेशपूर्ण कवन करून त्यांची थैर्यशक्ती वाढवीत असत. युद्धभावना भडकाविण्यासाठी त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या.
इस्लामस्वीकृतीच्या वेळी ते वयोवृद्ध होते. परंतु इस्लाम स्वीकृतीमुळे त्यांच्या काव्यात तारुण्य व नवचैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांच्या काव्यशैलीतसुद्धा कमालीचा बदल झाला होता. प्रेषितकाळामध्ये त्यांनी सर्वांत मोठे ‘जिहाद बिल लिसान’ अर्थात मौखिल धर्मयुद्ध केले. एकीकडे त्यांनी इस्लामद्रोही कविंची आपल्या काव्यशक्तीने सडेतोड उत्तर देऊन तोंडे बंद केली तर दुसरीकडे त्यांनी इस्लामसमर्थनार्थ आणि प्रेषितत्वाच्या समर्थनार्थ सुद्धा प्रभावी काव्यरचना केली. या काव्यामुळे इस्लामसमर्थक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले.
माननीय हस्सान(र.)हे अतिशय हळव्या स्वभावाचे होते. म्हणून त्यांना युद्धात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. इब्ने यसीर(र.)या इतिहासकाराने लिहिले की, ‘एहजाब’ च्या युद्धामध्ये(हिजरीसन ‘५‘) माननीय हस्सान(र.)यांच्या बाबतीत एक अतिशय विचित्र घटना घडली. या युद्धात सर्व इस्लामद्रोही लोकांनी आणि ‘ज्यू’ लोकांनी संघटित होऊन मदीना शहरावर हल्ला चढविण्याचा निश्चय केला. या कटकारस्थानाची वार्ता प्रेषितांना मिळाली. त्यांनी मुस्लिमांना एका किल्ल्यात थांबविले. कारण या ठिकाणी मुस्लिमांचा लष्करी दस्ता उपलब्ध नव्हता. या किल्ल्यात माननीय हस्सानसुद्धा इतर आबालवृद्धांसमवेत होते. याच काळात एक ‘ज्यू’ किल्ल्याजवळ येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ लागला. आदरणीय प्रेषितांच्या आत्या सन्माननीय सफया बिन्त अब्दुल मुतल्लिब(र.)त्या ‘ज्यू’ माणसास पाहून हस्सान बिन साबित(र.)यांना म्हणाल्या, ‘त्या ‘ज्यू’ ला जाऊन ठार करा.’ परंतु माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे धैर्य झाले नाही आणि माननीय सफया(र.)यांनी एक लाकडी दांडा त्या शत्रूच्या डोक्यात इतक्या जोरात मारला की तो जागीच कोसळला. आता माननीय सफया(र.)म्हणाल्या, ‘‘आता तरी जाऊन त्याचे शीर धडा वेगळे करा!’’ परंतु माननीय हस्सान(र.)म्हणाले, ‘‘हे अब्दुल मुतल्लिबच्या कन्ये! त्याचे मुंडके कापण्याचे धैर्य माझ्यात नाही.’’
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे बरेच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. शिवाय त्यांचे काव्यसंग्रह भारत, ट्यूनेशिया, ब्रिटेन आणि इतर देशांत प्रकाशित झाले असून बर्याच भाषांमध्ये त्यांचे भाषांतरसुद्धा झाले आहे.

one message
‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची घटिका आणि तरीसुध्दा ते गाफीलच आहेत. त्यांच्याजवळ जो उपदेश त्यांच्या पालनकर्त्याकडून येतो, त्याला संकोचाने ऐकतात आणि दुर्लक्ष करतात. त्यांचे मन जगाच्या खेळ-तमाशात दंग आहे. अत्याचारी आपापसात कानगोष्टी करतात की, ‘हा इसम खरे तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे. मग तुम्ही डोळ्यादेखत जादूच्या फंद्यात अडकणार काय?’ प्रेषितांनी उत्तरादाखल सांगितले, माझा पालनकर्ता ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत आहे. तो ऐकणारा व जाणणारा आहे.’’(कुरआन २१:१-४)
ह्या कुरआनच्या सुरह क्र.२१(अंबिया) च्या प्रारंभिक पंक्ती आहेत. यातील पहिलेच वाक्य ‘‘अत्यंत जवळ येऊन ठेपली आहे लोकांच्या हिशोबाची वेळ’’ आश्चर्यचकीत करणारे आहे. प्रत्येक मुस्लिमाचा परलोकावर विश्वास असतो. मरणोत्तर जीवनावर विश्वास इस्लामची एक बंधनकारक अट आहे. त्याशिवाय मनुष्य मुस्लिम होऊ शकत नाही. परलोकाचा अर्थ असा आहे की, हे जग एकेदिवशी संपुष्टात येऊन नवीन जग अस्तित्वात येईल. तेथे प्रारंभापासून तर शेवटपर्यंत सर्व मानवजात अल्लाहसमोर हजर होईल. मानवांच्या संपूर्ण आयुष्याचे लेखापरीक्षण होईल. त्यानुसार त्यांना योग्य मोबदला किवा शिक्षा मिळेल. दोन्ही कायमस्वरूपी राहतील. ज्या दिवशी ह्या जगाचा अंत होईल व परलोकाचे जग अस्तित्वात येईल तो दिवस अंतिम निवाड्याचा दिन असेल.
परलोकावरील श्रद्धेचा ईश्वरावरील श्रद्धेशी धनिष्ठ संबंध आहे. ईश्वर आहे म्हणजेच परलोक आहे. परलोकाचा नकार तोच करेल जो ईश्वराच्या अस्तित्वाला नकार देतो. कोणी ईश्वरास मान्य करावे व परलोकास अमान्य करावे हे असंभव आहे. बुद्धी याचा स्वीकार करत नाही. ईश्वर असेल तर एक दिवस असा यावयास पाहिजे की, ज्या दिवशी हे पाहिले जाईल की, कोणी ईश्वरास मान्य केले व कोणी अमान्य? ज्याने ईश्वरास मान्य केले त्याने त्याचे आज्ञापालन केले किवा नाही? ज्याने त्यास नकार दिला तर तो का दिला व आयुष्यभर त्याच मार्गावर मार्गक्रमण का केले? यावरच ही गोष्ट समाप्त होऊ नये, तर ही गोष्टही बुद्धीसंगत आहे की, पृथ्वी व आकाशांचा निर्माता व समस्त जगाचा सम्राट याच्या आदेशाचे ज्याने आज्ञापालन केले व त्यासाठी सर्व प्रकारचा त्रास सहन केला, तर त्याला ऐश्वर्य व पुरस्काराने सन्मानित केले जावे. हा पुरस्कार त्याच्याकडून असावा व त्याच्या महान प्रतिमेस साजेसा असावा ज्याच्या आदेशाचे मानवाने पालन केले व ज्याच्या आदेशाच्या उल्लंघनापासून स्वतःस सुरक्षित ठेवले. त्याचप्रकारे ज्याने ईश्वरास नाकारले आणि संपूर्ण आयुष्य त्याच्या आदेशाविरुद्ध कार्य केले, त्याची चौकशी होऊन त्यास त्याच्या गुन्ह्याच्या स्वरुपाने शिक्षा मिळणे बुद्धिसंगत आहे.
परलोकावरील श्रद्धेचा आमच्या जीवनाशी धनिष्ठ संबंध आहे आणि ती जीवनाच्या सर्व अंगांना प्रभावित करते. परलोकावरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धेस बळकट करते आणि त्यास एक शाश्वत सत्य बनवते. ती मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा मनुष्याला ईश्वराच्या अधिक निकट करते व ह्यामुळे एकीकडे ईश्वराविषयी मनात प्रेम निर्माण होते, तर दुसरीकडे ईशकोपाविषयी मनात भय निर्माण होते. परलोकध्यास, ईश्वराची शिक्षा, बक्षीस, दया, कृपा व त्याचा कोप याची सतत आठवण करून देतो. ही श्रद्धा त्याला कुकर्माच्या मार्गापासून रोखून धरते व त्यास ईश्वराच्या आज्ञापालनास बाध्य करते. ही परलोक श्रद्धा माणसात अल्लाहच्या बक्षिसांची ओढ निर्माण करते. ही श्रद्धा त्याच्या यातनांपासून निर्भय होऊ देत नाही. ही श्रद्धा आठवणीने मनास सदैव टवटवीत ठेवते.
परलोकावरील श्रद्धा ही काही निर्जीव बाब नाही. ही श्रद्धा अंतःकरणामध्ये अत्यंत शक्तिशाली व क्रांतिकारी बदल घडवत आहे. तसेच ही श्रद्धा हृदय व मस्तिष्क यामध्ये स्थान प्राप्त केल्यानंतर मनुष्याचा संपूर्ण कायापालट करून टाकते. त्याच्या जीवनास व चारित्र्यास पवित्रता तथा सन्मार्ग प्रदान करते आणि मनुष्य चांगल्या गोष्टींचा ध्वजवाहक बनतो, तसेच वाईट गोष्टींविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करतो. परलोकध्यास पुण्य आणि ईशपरायणतेचा आत्मा निर्माण करतो आणि कुकर्म व पाप याविषयी घृणा निर्माण करतो. ही श्रध्दा भोगवादी माणसात संयम, जबाबदारी व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करुन त्याचे लक्ष सतत मृत्युपश्चातच्या जीवनावर केंद्रीत करते. मनुष्यास अल्लाहच्या आदेशाचा अनुपालक त्याच्या मार्गदर्शनावर मार्गक्रमण करणारा व सत्यधर्माचा ध्वजवाहक बनवते. या श्रद्धेमुळे मनुष्य सन्मार्गाचा संरक्षक व त्याचा निमंत्रक बनतो. ही श्रद्धा मनुष्यामध्ये सत्याचा आदर व त्याची सेवा करण्याची भावना निर्माण करते व त्यासाठी आपले सर्वस्व पणास लावण्याची भावना निर्माण करते. यामुळे असा मनुष्य अस्तित्वात येतो ज्याचे चित्र कुरआनमध्ये अशा प्रकारे रेखाटले आहे की,
‘‘वास्तविकता जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या आयतीवर(ईशग्रंथ) श्रद्धा ठेवतात. जे आपल्या पालनकर्त्याबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात, जे काही देतात आणि त्यांच्या हृदयाचा या विचाराने थरकांप होत असतो की, आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि सरशी करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. आम्ही कोणत्याही इसमावर त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त ओझे लादत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो(प्रत्येकाची स्थिती) यथायोग्य दाखविणारा आहे.’’(कुरआन २३ : ५७-६२)
जरा विचार करा! जर कोणास या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे व हा विश्वास त्याच्या अंतरंगामध्ये भिनला असेल की, मरणोपरांत एकेदिवशी त्याची विचारपूस होईल. एक-दोन दिवस किवा महिने दोन महिने नव्हे तर जेव्हापासून तो सज्ञान झाला तेव्हापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या संपूर्ण जीवनाच्या एक एक क्षणाचा हिशोब होईल. तर मग तो अंतिम दिवसासारख्या भयावह दिवसास कसा विसरेल? त्यास विसरुन कसे आयुष्य व्यतीत करेल? एखाद्या व्यापार्यास जर थोडीशी पूर्वसूचना मिळाली की, आयकर अधिकारी येणार आहे, तर तो घाबरून आपले लेखाविवरण अद्ययावत करून घेतो. यावरुन आपण विचार करू शकतो की, ज्या व्यक्तीला याचा पूर्ण विश्वास आहे की, त्याचे कोणतेही कृत्य अल्लाहपासून लपलेले नाही. तो त्याच्या प्रत्येक कृत्यावर नजर ठेऊन आहे. त्याच्या व अल्लाहच्या दरम्यान अंतरपाट नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यावर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. तो सर्व जाणणारा आणि प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणारा आहे. अंतिम दिवशी तो क्षणा-क्षणाचा हिशोब घेईल आणि मनुष्याच्या लहान-मोठ्या कृत्याचा त्यास मोबदला देईल, तर सांगा की, त्याचे आयुष्य बेफिकीर व बेसावध कसे व्यतीत होईल? त्यावर बेसावधगिरी व बेफिकिरी तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा तो अंतिम दिवसावर विश्वास ठेवणार नाही. ह्याची संभावना आहे की, अंतिम दिवसावर विश्वास असल्याचे तोंडी अभिवचन दिले जावे, मात्र त्याचे मन या विश्वासापासून रिक्त असावे, तर मग तो अंतिम दिवसाचा दावेदार असूनही अल्लाहपासून भयभीत होणार नाही. खर्या अर्थाने अंतिम दिवसाचे भय ज्याच्या मनी असेल त्याच्याबाबतीत असा विचार केला जाऊ शकत नाही की, तो अल्लाह व अंतिम दिवस विसरला असेल आणि त्याचे जीवन पाप व वाईट कृत्यामुळे कलंकित झाले असेल. तो या जगाच्या सर्व अडचणी, व्यस्तता यामध्येसुद्धा त्या दिवसाच्या भयाने भयभीत होईल. कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘(अल्लाहच्या या घरांत) असे लोक आहेत, ज्यांना व्यापार आणि खरेदी-विक्री अल्लाहच्या स्मरणापासून, नमाज प्रस्थापित करण्यापासून व जकात देण्यापासून बेसावध ठेवीत नाही. ते त्या दिवसाची भीती बाळगतात ज्या दिवशी हृदयात खळबळ माजण्याची व डोळे स्थिरावण्याची पाळी येईल.’’(कुरआन २४:३७)
अंतिम दिवसाची वेळ निश्चित आहे त्यास टाळले जाऊ शकत नाही. पृथ्वी, आकाश व संपूर्ण सृष्टी त्या दिवसाची प्रतीक्षा करीत आहे. जो दिवस व्यतीत होत आहे तो प्रलयाच्या घटकेला जवळ जवळ करीत आहे. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य स्पष्ट करत आहे की, त्याच्या कालावधीतून एक दिवसाची कपात झाली आहे, परंतु आश्चर्य आहे की, मनुष्य तरीसुद्धा बेसावध, निश्चिंत आहे. जेव्हा त्याला याची आठवण करून दिली जाते तेव्हा तो त्यास अत्यंत निष्काळजीपणाने ऐकतो जसे त्याचे काही महत्त्वच नाही. याकडे जर त्याचे लक्ष असते व आपल्या अवस्थेची त्यास चिता असती तर तो बेसावध राहिला नसता. तो जागरूक राहिला असता व आपला एक एक पाय फुंकून ठेवला असता. अल्लाहच्या कोपाची त्यास भीती वाटली असती व अल्लाहच्या कृपेच्या शोधात तो राहिला असता. परंतु या जगाने त्यास आपल्या कवेत घेतले आहे व अंतिम दिवसाचा विचार त्याच्या नजरेपासून दूर गेला आहे. परंतु ती वेळ तीव्र गतीने येत आहे व त्यास जास्त वेळ नाही जेव्हा या बेसावधपणाचे परिणाम त्याच्या समोर असतील व त्यास भोगण्यासाठी तो विवश असेल. जर त्यास माहीत असते की, त्यावेळी तो किती तोट्यात असेल आणि किती अपयश त्याच्या पदरी येईल, तर खचितच तो असा बेसावध राहिला नसता.
‘‘निःशंक ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे ऐहिक जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या आयतींपासून बेसावध आहेत, त्यांचे अंतिम ठिकाण नरकाग्नी असेल त्या दुष्कृत्यांपायी जे ते करीत राहिले.’’(कुरआन १०: ७-८)
याचविषयी आणखी एक कुरआन स्पष्टोक्ती आहे की,
‘‘वस्तुस्थिती अशी आहे की, जे लोक मरणोत्तर जीवन मानीत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनविले आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी भयानक शिक्षा आहे आणि मरणोत्तर जीवनात हेच सर्वांत जास्त तोट्यात राहणारे आहेत.’’(कुरआन २७ : ४-५)
पवित्र कुरआन या वास्तविकतेला विविध रूपाने व शैलीने समजावून सांगतो की, अंतिम दिवस येणारच आहे व मनुष्य आपल्या कार्याचे फळ प्राप्त करील. हा अल्लाहचा निर्णय आहे. कोणातही ही शक्ती नाही की, तो त्याच्या निर्णयास बदलू शकेल किवा त्यास लागू होण्यापासून रोखू शकेल. परंतु दुःखद बाब! मनुष्य त्यास अशक्य बाब समजून नाकारून देतो आणि त्याकडे अशा दृष्टीने पाहतो की, जसे ही बाब त्यास शक्य नाही तशीच ईश्वरासाठी शक्य नाही. जर त्यास हे उमगले असते की, ईश्वरास कोणतीही बाब अशक्य नाही! तो अगाध शक्तिशाली आहे. तो जेव्हा व जे इच्छितो ते होते. ज्या ईश्वराने हे विशाल जग निर्माण केले, त्याची एक व्यवस्था निश्चित केली. ही व्यवस्था भंग करून एक दुसरी व्यवस्था नवीन सिद्धांत व नियमांच्या अंतर्गत निर्माण करणे त्यास कसे अशक्य आहे?
‘‘आणि काय या लोकांना हे उमगत नाही की, ज्या अल्लाहने ही पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केले व त्यांना निर्माण करतांना तो थकला नाही, तो खचितच याला समर्थ आहे की, मृतांना जिवंत करील? का नाही. निश्चितच तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे.’’(कुरआन ४६ : ३३)
ह्याची एक बाजू अशी आहे की, या सत्यतेस दर्शविणारा, समजावून सांगणारा कोणी सामान्य व्यक्ती नसून स्वतः ईश्वराचा प्रेषित आहे. ते व्यक्तिमत्त्व आहे ज्याचे सद्आचरण सत्य आणि श्रद्धावंत मित्रच नव्हे तर शत्रुही स्वीकारतात, जो स्वतःच्या जातीसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व्याकूळ राहत असे. जो रात्रंदिवस तडफडत असे की, ही मानवजात ईश्वराच्या कोपाची बळी ठरू नये. तो आपल्या मनाने, संकल्पनेने किवा परंपरेने नव्हे तर ईश्वराकडून सांगत होता की, अंतिम दिवस येईलच. याला खेळ किवा तमाशा समजू नका. ही एखाद्या स्पर्धेच्या निर्णयाची बातमी किवा व्यापारातील उतार-चढावाची सूचना नव्हती, तर ती अशा दिवसाची बातमी होती ज्या दिवशी मनुष्याच्या भविष्याचा निर्णय होईल व तो कायमस्वरुपी असेल. त्यानंतर एक तर स्वर्ग असेल किवा नरकाग्नी. कुरआन दुःखाने सांगतो की, नेहमी सत्य बोलणार्या प्रेषित मुहम्मद(स) यांची इतकी महत्त्वपूर्ण बातमी ऐकल्यानंतरही हे अत्याचारी यास सहजतेने घेत आहेत. आपसात कानगोष्टी करत आहेत की, ही सुद्धा आमच्यासारखीच व्यक्ती आहे. याच्यात असे कोणते वैशिष्ट्य आहे की, आम्ही यास प्रेषित मानून याच्यावर विश्वास करावा? याच्याकडे कोणते धन, ऐश्वर्य, पद किवा अधिकार आहेत? कोणती बाब आहे जी त्यास सरदार किवा नेतृत्वयोग्य बनवते? शेवटी हा कसा ईशदूत बनला व अल्लाहकडून बोलू लागला? हा ईशदूत आणि त्यांच्या सत्यतेविरुद्ध काही तर्क नव्हता. यामुळे त्याच्या सत्यतेचे खंडण होत नव्हते. ही अंधश्रद्धा, अनुचित पक्षपात, परंपरा याचे अंधानुकरण होते, जे एका सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक ठेवीदाराच्या विरोधास प्रोत्साहित करत होते आणि त्याच्या लौकिक आणि परलौकिक दुष्परिणामास पाहू देत नव्हते. हे सर्वकाही होत होते. याव्यतिरिक्त प्रेषित मुहम्मद(स) यांच्या गोष्टी लोकमनावर परिणाम करत होत्या आणि शत्रूपक्षातील जीवनाच्या प्रती गंभीर आणि पुण्यवान लोक सत्य व वास्तविकता याचा मनोभावे स्वीकार करत होते. विरोधक हे पाहून आश्चर्यचकित होत होते. ते म्हणायचे ‘‘हा तर जादूगार आहे, जादू करत आहे. याच्यापासून दूर राहण्यामध्येच आपला फायदा आहे. ही काही बुद्धिमत्ता नाही की आम्ही जाणूनबुजून एखाद्या जादूगारचे अनुकरण करावे.’’ कुरआनने त्यांच्या या अशिक्षित व अप्रगल्भतेचे काहीही उत्तर दिले नाही. त्याने सांगितले की, तुमच्या गोष्टी, तुमच्या कानगोष्टी आणि तुमच्या योजना, त्या मग जग किवा आकाशाच्या कोणत्याही कोपर्यात असू दे, अल्लाह त्यांच्याशी चांगला परिचित आहे. तोच त्यांचा हिशोब घेईल.
‘‘तुम्हा सर्वांना अल्लाहकडे परतावयाचे आहे आणि तो सर्वकाही करू शकतो. पहा, हे लोक आपली छाती वळवितात की जेणेकरून त्याच्यापासून लपावे. खबरदार, जेव्हा हे वस्त्रांनी स्वतःला झाकतात. अल्लाह त्यांच्या गुपितांना जाणतो व प्रकट गोष्टींनादेखील. त्याला तर रहस्याचेदेखील ज्ञान आहे जे मनात आहे.’’(कुरआन ११ : ४-५)
पुन्हा एके ठिकाणी ही गोष्ट अधिक स्पष्ट करण्यात आली की,
‘‘ते म्हणतात की, हे वचन केव्हा साकार होईल तर तुम्ही खरे असाल? सांगा, यात काय नवल की, ज्या कोपासाठी तुम्ही घाई करीत आहात त्याचा एक भाग तुमच्याजवळ येऊन ठेपला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, तुझा पालनकर्ता तर लोकांवर फार मेहेरबानी करणारा आहे. परंतु बहुतेक लोक कृतज्ञता दर्शवीत नाहीत. निःसंशय तुझा पालनकर्ता चांगल्याच प्रकारे जाणतो जे काही त्यांच्या मनामध्ये दडलेले आहे आणि जे काही ते व्यक्त करतात. आकाश व पृथ्वीची कोणतीही गोष्ट अशी नाही, जी एका स्पष्ट ग्रंथात नमूद असलेली नाही.’’(कुरआन २७:७१-७५)
अंतिम दिवस अवश्य येईल. जेव्हा येईल तेव्हा या जगाची उलथापालथ होऊन त्याच्या जागी जे नवीन जग अस्तित्वात येईल त्याची अवस्था कुरआनमध्ये विविध ठिकाणी आलेली आहे.
याविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा सूर्य गुंडाळून टाकला जाईल आणि जेव्हा तारे निखळून पडतील आणि जेव्हा पर्वत चालविले जातील आणि जेव्हा दहा महिन्यांच्या गर्भिली उंटिणी आपल्या दशेत सोडून दिल्या जातील आणि जेव्हा वन्य पशु समेटून एकत्र केले जातील आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील आणि जेव्हा प्राण(शरीरांशी) जोडले जातील आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली? आणि जेव्हा कर्मनोंदी उघडल्या जातील आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरक भडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे.’’(कुरआन ८१ : १-१४)
कुरआनमध्ये दुसर्या एका ठिकाणी आहे की,
‘‘जेव्हा आकाश फाटेल आणि जेव्हा तारे विस्कळून पडतील आणि समुद्र फाडून टाकले जातील आणि कबरी उघडल्या जातील, त्यावेळी प्रत्येक माणसाला त्याने पुढचे मागचे केले सवरलेले सर्व कळेल.’’(कुरआन ८२ : १-५)
किती भीतीदायक दृश्य आहे. काय अवस्था असेल जेव्हा ही सर्व जगाची व्यवस्था अस्ताव्यस्त असेल. धरती आणि आकाश टूट-फूटमुळे प्रभावित असतील. सूर्य, चंद्र आणि तारे प्रकाशहीन होतील. ग्रह आणि तारे स्वतःची आकर्षण शक्ती गमावून आपसांत धडकतील. समुद्रांमध्ये अग्नी भडकेल. पर्वत भुगा होऊन पडू लागतील. जंगलातील हिसक प्राणी आपली हिसा आणि पशुता विसरतील. मौल्यवान पाळीव प्राणी, दुभती जनावरे यांना कोणी विचारणार नाही. थडगी उकरून फेकली जातील आणि मनुष्याच्या समोर स्वर्ग आणि नरक असतील. एकीकडे सर्व सुविधायुक्त स्वर्ग तर दुसरीकडे आपल्या रौद्ररूपात नरक असेल.
त्यावेळी आमच्या धरणीची काय अवस्था असेल त्याविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘जेव्हा पृथ्वी आपल्या संपूर्ण आवेशानिशी हलवून सोडली जाईल आणि पृथ्वी आपल्या आतील सर्व ओझे बाहेर टाकील आणि मानव म्हणेल की, हिला हे काय होत आहे? त्यादिवशी ती आपले अहवाल निवेदन करील, कारण तुझ्या पालनकर्त्याने तिला आज्ञा दिलेली असेल, त्या दिवशी लोक विभिन्न स्थितीत परततील जेणेकरून त्यांची कृत्ये त्यांना दाखविली जातील. मग ज्याने तिळमात्र पुण्य केले असेल ते तो पाहील आणि ज्याने तिळमात्र पाप केले असेल तेही तो पाहील.’’(कुरआन ९९ : १-८)
याचाच अर्थ असा की, या संपूर्ण सृष्टीला एक प्रलय अस्ताव्यस्त करून टाकील. पृथ्वी आपल्यातील संपत्ती, खनिज पदार्थ बाहेर टाकून देईल. पृथ्वीवर दुष्कर्मी आणि सुकर्मी गमन करीत आहेत. सर्वांसाठी ती प्रशस्त आहे. इतकेच नव्हे तर अनेक दुष्कर्म तिने झाकून ठेवली आहेत. त्या दिवशी ती ह्या सर्व गुपित गोष्टी स्पष्ट करील आणि आपल्यावरील कर्माची गोष्ट स्पष्ट करील. मनुष्याचे पाऊल ज्या भूभागावर पडले असेल तो भूभाग स्पष्ट करील हे पाऊल सतकृत्यासाठी की वाईट कृत्यासाठी पडले होते. समस्त मानवजात इकडून तिकडे फिरत राहील. समविचारी लोकांचे समुह बनतील. प्रत्येकाच्या समोर त्याच्याकडून घडलेले छोटेसे पाप किवा पुण्य परिणामासह येतील.
अंतिम दिवशी मनुष्याच्या अवस्थेविषयी कुरआनोक्ती आहे,
‘‘लोकहो, आपल्या पालनकर्त्याच्या कोपापासून स्वतःला वाचवा, वस्तुस्थिती अशी आहे की, पुनरुत्थानाचा हादरा महा(भयंकर) गोष्ट आहे. ज्या दिवशी तुम्ही पहाल, की प्रत्येक दूध पाजणारीला आपल्या दूध पिणार्या बाळाचा विसर पडेल. प्रत्येक गर्भवतीचा गर्भपात होईल आणि लोक तुम्हाला नशेत दिसतील. वास्तविक पाहता त्यांनी नशा केली नसेल तर तो अल्लाहचा भयंकर कोपच असेल.’’(कुरआन २२ : १-२)
समस्त मानवजातीस आव्हान करण्यात आले आहे की, अल्लाहची भीती बाळगा, कारण अंतिम दिवस येणार आहे. त्याची उलथापालथ भयानक असेल, त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आत्ताच गुजरातमध्ये भूकंप आला. हे सर्व जगामध्ये किवा संपूर्ण भारतात नव्हे तर भारतातील एका भागात आला. यामुळे जो भय, आतंक निर्माण झाला होता, लोक आपले घर व्यापार सोडून पळाले होते. हे सर्व आमच्या ताज्या आठवणी आहेत. भूकंपानंतरही लोकांच्या मनात एवढी दहशत होती की, लोक आपल्या मोडक्या तोडक्या घरात जाऊन त्यास पुन्हा पुनर्जीवित करण्यास तयार नव्हते. त्यांच्या मनात भीती होती की, न जाणो केव्हा काय होईल? अंतिम दिवसाच्या अस्ताव्यस्ततेसमोर तर याची काहीच तुलना नाही. जसे कणासमोर पर्वत आहे. अंतिम दिवसाची अवस्था अशी असेल की, अंगावर दूध पाजणारी आई आपल्या मुलाला विसरून जाईल. भीती व आतंक याची ही अवस्था असेल की, मूल आईच्या कुशीत असतांना तिला त्याचे भान नसेल. तिला याचेसुद्धा भान नसेल की, तो दूध पीत आहे किवा नाही. असे आवाज व स्फोट होतील की, लोक आपली मती गमावून बसतील. ही अवस्था काही गुंगी आणणार्या पदार्थांपासून नव्हे तर ती ईश्वराच्या यातनांमुळे होईल.
ही बाब कुरआनात एके ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘सरतेशेवटी जेव्हा तो कान बधीर करणारा आवाज दुमदुमेल त्या दिवशी माणूस आपला भाऊ आणि आपली आई आणि आपले वडील आणि आपली पत्नी व आपल्या संततीपासून दूर पळेल. त्यांच्यापैकी प्रत्येक माणसावर त्या दिवशी अशी वेळ येऊन ठेपेल की, त्याला आपल्या खेरीज कुणाचेही भान राहणार नाही. काही चेहरे त्या दिवशी चमकत असतील आणि काही चेहर्यांवर त्या दिवशी धूळ उडत असेल आणि काळिमा पसरलेला असेल. हेच अश्रध्दावंत व दुराचारी लोक असतील.’’(कुरआन ८० : ३३-४२)
हीच बाब अन्य ठिकाणी स्पष्ट केली आहे,
‘‘हे लोक त्याला दूर समजतात आणि आम्ही त्याला जवळ पाहत आहोत. ज्या दिवशी आकाश वितळलेल्या चांदीसमान होईल आणि पर्वत रंगीबेरंगी पिजलेल्या लोकरीसमान होतील आणि कोणी जिवलग दोस्त आपल्या जिवलग दोस्ताला विचारणार नाही. वस्तुतः ते एकमेकाला दाखविले जातील. अपराधी इच्छिल की, त्या दिवसाच्या कोपापासून वाचण्यासाठी आपल्या संततीला, आपल्या पत्नीला आपल्या भावाला आणि आपल्या निकटतम कुटुंबाला जे त्याला आश्रय देणारे होते आणि पृथ्वीतलावरील सर्व लोकांना, मोबदला म्हणून तो देईल आणि या व्यक्तीमुळे त्याला मुक्ती मिळेल. कदापि नाही, ती तर भडकत्या अग्नीची ज्वाला असेल, जी मांस व कातडीला चाटून टाकील. हाका मारून-मारून आपल्याकडे बोलाविल त्या प्रत्येक माणसाला जो सत्यापासून विमुख झाला आणि ज्याने पाठ फिरविली आणि संपत्ती संचित केली आणि जपून जपून ठेवली.’’(कुरआन ७० : ६ - १८)
त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीच्या हातात त्याचे कार्यविवरण पत्र असेल. त्यामध्ये त्याच्या प्रत्येक सुकर्म व कुकर्म तसेच प्रत्येक लहान-मोठ्या पाप व पुण्यांची नोंद असेल. दुष्कर्मी व दुराचारी लोकांचे कार्यविवरण पत्र त्यांच्या डाव्या हातात दिले जाईल. ते लोक किती भाग्यशाली असतील, ज्यांच्या उजव्या हातात त्यांचे विवरणपत्र असेल; तर दुर्भागी असतील ते ज्यांच्या डाव्या हातात त्यांचे कार्यविवरण पत्र असतील. कुरआनच्या आरशात त्यांची प्रतिमा पाहा,
‘‘तो दिवस असेल जेव्हा तुम्ही हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही. त्यावेळी ज्याच्या कर्मांची नोंद त्याच्या उजव्या हातात दिली जाईल तो म्हणेल, ‘‘घ्या, पाहा वाचा माझी कर्मनोंद. मला वाटत होते की, जरूर माझा हिशोब मला मिळणार आहे.’’ तर तो मनपसंत ऐश्वर्यात असेल. उच्चस्थानी स्वर्गात ज्याच्या फळांचे घड झुकले जात असतील. अशा लोकांना सांगितले जाईल, मजेत खा आणि आपल्या त्या कृत्यांच्या मोबदल्यात जी तुम्ही गत दिवसांत केली आहेत आणि ज्यांची कर्मनोंद त्यांच्या डाव्या हातात दिली जाईल तो म्हणेल. ‘‘हाय हाय माझी कर्मनोंद मला दिली गेली नसती आणि मी जाणले नसते की माझा हिशेब काय आहे, माझा तोच मृत्यू(जो जगात आला होता) निर्णायक ठरला असता. आज माझी संपत्ती माझ्या काहीच उपयोगी पडली नाही. माझी सर्व सत्ता संपुष्टात आली.’’(आज्ञा होईल) धरा याला आणि याच्या मानेत जोखड घाला, मग याला नरकामध्ये झोकून द्या. मग याला सत्तर हात लांब साखळीत जखडा. हा श्रेष्ठ व उच्चतर अल्लाहवर श्रध्दाही ठेवीत नव्हता व गरिबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता. म्हणून आज येथे याचा ना कोणी दुःखाचा वाटेकरी मित्र आहे ना जखमांच्या पूशिवाय त्याच्यासाठी कोणते जेवण, ज्यास अपराध्याशिवाय कोणीही खात नाही.’’(कुरआन ६९ : १८-३७)
अंतिम दिवसाच्या बक्षीस व दंडाचे वर्णन कुरआनमध्ये अन्य अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. याचे चित्र सुरह - ८८(गाशिया) मध्ये असे रेखाटलेले आहे,
‘‘काय तुम्हाला त्या व्यापून टाकणार्या आपत्ती(म्हणजे पुनरुत्थानाची) बातमी पोहचली आहे? काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील. कठोर परिश्रम करीत असतील. थकून जात असतील. तीव्र आगीत होरपळून निघत असतील. उकळत्या झर्याचे पाणी त्यांना पिण्यास दिले जाईल. काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतेही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जे ना पुष्ट करील, जे ना भूक शमवील. काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लीत असतील. आपल्या कामगिरीवर आनंदीत असतील. उच्चकोटीच्या स्वर्गामध्ये असतील. तेथे कोणतीही व्यर्थ गोष्ट ते ऐकणार नाहीत, त्यात झरे प्रवाहीत असतील. त्याच्यात उच्च आसने असतील, लोडांच्या रांगा लावलेल्या असतील आणि उत्कृष्ट बिछाने अंथरलेले असतील.’’(कुरआन ८८ : १-१६)

आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
इस्लाममध्ये दहशतवादाला कसलाही वादच नाही. इस्लाम शांततेचा धर्म आहे आणि शांतिच त्याला पसंत आहे. तो माणसाच्या प्राणांचा व त्याच्या मालमत्तेचा आदर करण्यास शिकवितो. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी उचित साधनांचा वापर करण्यास पाठिबा देतो.
धरणीवर बिघाड निर्माण करू नका.- सूरह : बकरा - १९ आणि जमिनीवर सुधारणा घडून आल्यानंतर तेथे बिघाड निर्माण होईल असा प्रसार करू नका, तसेच भयाने किवा लालसेने त्याला(बिघाडाला) बोलावू नका.- सूरह : आराप-५६
धरणीवर ज्या कोणी एखाद्याच्या खुनाचा बदला घेण्याखेरीज अथवा दंगल पसरविणार्याची हत्या करण्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या माणसाची हत्या केली, तर त्याने अखिल मानवजातीची हत्या करून टाकली आणि जर एखाद्या माणसाचा प्राण कोणी वाचविला तर त्याने सर्व माणसांना जिवदान दिले.’’- सूरह : माइदा - ३२

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget