Latest Post

एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याने हे सुंदर नंदनवन फुलविण्याकरिता जमिनीची मशागत केली, पाणी देऊन सुपीक बनविली, कष्ट पणाला लावले आणि विविध प्रकारच्या फुलझाडांची कौशल्यपूर्ण पेरणी करून हे अतिसुंदर नंदनवन अस्तित्वात आणले. तसेच एखाद्या सुंदर आणि सुरचित इमारतीस पाहून किवा जगातील सर्वात सुंदर असलेल्या ताजमहालास पाहून आपल्या मनात निश्चितच इमारत तयार करणार्या कुशल कारागिराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपण ताजमहालाबरोबरच ताजमहालासाठी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावणार्या त्या कुशल कारागिराची प्रशंसा करणारच. एखादे यंत्र अथवा संगणक पाहून आपण त्यांच्या निर्मात्याची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. एखादे सुंदर आणि व्यवस्थित वस्तुचे उत्पादन करणार्या मोठ्या कारखान्यास पाहिल्यावर कारखान्याच्या निर्माता व चालक असलेल्याची प्रशंसा केल्याशिवाय मनास शांतीच लाभत नाही.
मात्र या उलट एखाद्या सुंदर आणि रमणीय नंदनवनास पाहून जर कोणी म्हटले की, हे नंदनवन आपोआपच अस्तित्वात आले आणि या नंदनवनाच्या नीटनेटकेपणात कोणत्याही माळ्याची काहीच दखल नाही. तर ही गोष्ट जगातील कोणतीच व्यक्ती मान्य करणार नाही, किवा जर कोणी असा प्रश्न केला की, या नंदनवनाचा निर्माता असलेल्या माळ्यास एखाद्या फुलातून बाहेर काढून दाखवा, तर हा प्रश्नच मूर्खपणाचा अथवा विवेकहीन ठरतो. पौर्णिमेच्या दुधाळ चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या ताजमहालात जाऊन जर कोणी असा प्रश्न केला की, मला तर या अतिसुंदर वास्तुचा निर्माताच दिसत नाही. या संगमरवरी शिलांमधून ताजमहालाचा निर्माता प्रकट करून दाखवा, तर मात्र हे बुद्धीचे दिवाळे निघाल्याचेच लक्षण ठरेल. जर कोणी असा विचार करीत असेल की, या भूगर्भातून अचानक आणि आपोआपच संगमरवरीच्या शिला बाहेर आल्या. एका विशिष्ट मापानुसार आणि विशिष्ट आकारात त्या आपोआप घडल्या गेल्या, आपोआपच त्यावर कलाकुसरीचे आणि नकाशीचे काम झाले, आपोआपच ताजमहालाच्या वास्तुचा भव्य आराखडा त्याच्या आकारानुरूप तयार झाला, मग आपोआपच शिला एकमेकांवर आराखड्यानुसार चढत गेल्या आणि ही भव्य-दिव्य आणि जगातील सर्वांग सुंदर वास्तु उदयास आली. मग असा विचार करून त्याने जर असा प्रश्न उपस्थित केला की, जर ही कौशल्यपूर्ण आणि सर्वांग सुंदर वास्तु आपोआप उदयास आली नसेल, तर मग या वास्तुचा निर्माता याच वास्तुमधून प्रकट होऊन का बरे छाती ठेवून सांगत नाही की, ‘‘होय, मीच आहे या अतिविशाल व भव्य दिव्य वास्तुचा निर्माता!’’ तर असा प्रश्न विचारणार्यास आपण काय उत्तर देणार? तर उलट त्याच्या बुद्धीच्या किवा अकलेच्या स्थितीवरच प्रश्नचिन्ह उभे करू. आपण त्याच्या बुद्धीचे अथवा विचारशक्तीचे दिवाळे निघाले असल्याचेच प्रमाणपत्र देऊ. एखादे उत्पादन तयार होत असलेल्या कारखान्यासंबंधीसुद्धा जर कोणी विचारित असेल की, या कारखान्याचा तर कोणीच निर्माता कारखान्यात दिसत नाही, मला या कारखान्याच्या सुट्या भागात अथवा उत्पादनातच या कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन घ्यावयाचे आहे, तर हे मात्र शक्य नाही. मुळात त्याचा प्रश्न आणि विचारप्रणाली चुकीची आहे. अशा स्वरुपाच्या प्रश्नांविषयी आपणांसर्वांची भूमिका अशी आहे की, कोणतीही सुंदर, कौशल्यपूर्ण, मनोरम, शक्तीशाली व भव्य-दिव्य वास्तु पाहून जर कोणी असा प्रश्न उपस्थित करीत असेल की, मला या भव्य-दिव्य, कौशल्यपूर्ण आणि नियमबद्ध वास्तु अथवा कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन अगदी येथेच घडावे, तर त्याचा प्रश्नच मुळात चुकीचा आणि निराधार आहे. आपणांसर्वांचीच भूमिका अशी असेल की, या प्रश्नकर्त्याची विचारशक्ती नष्ट पावलेली आहे.
नेमका असाच प्रकार एका अत्यंत आणि असामान्य विषयासंबंधी आहे. एखादी व्यक्ती जर हट्ट करीत असेल की, मी ईश्वराचे अस्तित्व अगदी तेव्हाच मान्य करील, जेव्हा तो स्वतःहून माझ्यासमोर प्रकट होईल, अथवा मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहीन किवा माझ्या कानाने त्याचा आवाज ऐकेन अथवा मी त्यास स्पर्श करून पाहीन. तर हे मात्र शक्य नाही. कारण सृष्टीतील प्रत्येक वस्तुला पाहून आपण त्या वस्तुच्या निर्मात्यास ओळखू शकतो. मात्र त्या प्रश्नकर्त्याची मागणी अशी आहे की, मी या सृष्टीतील वस्तूच्या निर्मात्यास याच सृष्टीत पाहून त्याचे अस्तित्व स्वीकार करेन, तर त्याची ही मागणी कोणत्याही प्रकारे योग्य नाही.
उत्पादकाचे दर्शन उत्पादनात घडत नसते
ही बाब स्वाभाविक आहे की, उत्पादनास पाहिल्यावर आपला विचार निश्चितच उत्पादक अथवा निर्मात्याकडे जातो. निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करण्यासाठी फार मोठ्या तत्त्वज्ञानाची अथवा संशोधनाची गरज नसते. ही बाब अतिशय स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. वैज्ञानिक असो, तत्त्वज्ञ असो की साधारण विचारसरणीचा माणूस असो, उत्पादन अथवा निर्मितीस पाहून निर्मात्याचा विचार येणे हे स्वाभाविक आहे. मात्र या उत्पादित वस्तुंमध्ये सूक्ष्मदर्शी यंत्र लावून पाहिल्याने या वस्तुंचा निर्माता मुळीच दिसणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न केवळ निष्फळच नव्हे तर हे संपूर्ण कार्यच मूर्खपणाचे ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की, उत्पादन किवा निर्मिती आणि निर्मात्याचे अस्तित्व अत्यंत भिन्न असते. त्यामुळे निर्मितीमध्ये निर्मात्याचे अस्तित्व शोधणे, हे काही विवेकतेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण नाही, शिवाय हे शक्यसुद्धा नाही. एखादी निर्मिती पाहिल्यावर आपण आपल्या केवळ विचार शक्तीच्या आधारावर हे ठरवू शकतो की, या निर्मितीचा निर्माता अवश्य आहे. आपण या जगात वावरत असताना प्रत्येक निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा मनोमन स्वीकार करतोच.
जर कोणी ईश्वराचे अस्तित्व आपल्या विचारशक्तीच्या आधारावर स्वीकारण्यास तयार नसेल, तसेच पाहिल्याशिवाय, चाखल्याशिवाय, ऐकल्याशिवाय जर कोणी ईश्वराचा अर्थात सृष्टीच्या निर्मात्याचा स्वीकार करण्यास तयार नसेल, तर मग त्याच्यासाठी नाकारण्याचा अथवा अस्वीकृतीचा मार्ग मोकळा आहे. मात्र या अस्वीकृतीबरोबरच अथवा ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याबरोबरच त्याला हेसुद्धा स्वीकारावे लागेल की, ही सृष्टी आणि यातील प्रत्येक वस्तू(अर्थात निर्मिती) आपोआपच अस्तित्वात आली. या सृष्टीचा आणि यातील प्रत्येक वस्तूचा कोणीच निर्माता नाही.
एखाद्या निर्मितीस इंद्रिय-माध्यमाने पाहण्याच्या दोन अनिवार्य अटी आहेत. प्रथम अशी की, निर्मात्यास उद्योगनिर्मितीच्या आत नव्हे तर बाहेर शोधावे आणि द्वितीय अट अशी की, उद्योगनिर्मितीच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण पर्व दृष्टीसमोर असावे. ज्या पेनाचा वापर करून मी लिहित आहे, त्या पेनाचा अगर लेखणीचा निर्माता जर मला पाहावयाचा असेल, तर मला पेनाचा निर्माता पेनाच्याआतमध्ये कधीच सापडणार नाही. उलट त्याचा निर्माता पेनाच्या बाहेरच सापडेल. शिवाय पेन अगर लेखणी निर्माण होण्याचे संपूर्ण पर्व पूर्णपणे पाहिल्यानंतरच हे ठरविता येणे शक्य आहे की, याच्या निर्मितीमध्ये कोणकोणते हात कार्यरत आहेत, याबरोबरच मला हेसुद्धा पाहावे लागेल की, पेन अगर लेखणीच्या निर्मितीचा कारखाना कोणी स्थापन केला? यामध्ये कोणाचे बुद्धीकार्य आणि भांडवल लागले आहे? या सर्व बाबी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरच मी असे छातीठोकपणे सांगू शकतो की, मी पेनाच्या निर्मात्यास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
परंतु मी जर पेनाच्या आत त्याचा निर्माता शोधत असेल किवा ज्या वेळी पेन तयार होऊन माझ्या हातात आला, त्या वेळी मी या पेनाच्या निर्माणकर्त्यास आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा हट्ट धरीत असेन, तर मात्र माझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. पेनाच्या निर्माणकर्त्यास पाहणे केवळ अशाच परिस्थितीत शक्य होईल, जेव्हा पेनाच्या उत्पादनाच्या सर्व प्रक्रिया आपल्या डोळ्यांसमोर घडतील. याशिवाय आपण ज्याला पेनाचा निर्माणकर्ता ठरवू, तर ते प्रयोगाने अथवा अनुभवाने नव्हे तर अंदाजानेच ठरवू. उदाहरणार्थ, पेनावरील शिक्क्यावरून आपण हे ठरवतो की, हा पेन कोणत्या कंपनीने आणि कोणत्या देशात तयार झाला. बर्याच वेळा असे घडते की, एखादे उत्पादन एके ठिकाणी होते आणि त्यावर दुसर्याच कंपनीचा शिक्का मारण्यात येतो. या शिवाय पेनावरील कंपनीचे नाव मिटले, तर आपण त्याच्या बनावटीवरून अंदाज लावू शकतो की, हा पेन कोणी तयार केला किवा कमीतकमी एवढा तरी विचार करतो की, हा पेन कोणा मानवाने तयार केला असेल. एखादी व्यक्ती असादेखील विचार करू शकते की, हा पेन आपोआपच तयार झाला असावा. मात्र या दोन्हीही परिस्थितीत पेन निर्माण करणार्यास पाहिलेले अथवा अनुभवलेले नसते. केवळ अनुमान अथवा कयासानेच ठरविण्यात आलेले असते. तसेच एखाद्या व्यक्तीस जर या पेनाचा निर्माणकर्ता स्वीकारण्यात आले, तर हेसुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून किवा स्वतः अनुभव घेऊन नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर स्वीकारण्यात आलेले असते. अर्थात तुम्ही जर पेन निर्मिताची संपूर्ण कार्यप्रणाली प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता इतर पद्धतीने पेन तयार करणार असाल तर, हे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर नव्हे तर अंदाजावरच करीत आहात आणि हीच परिस्थिती इतर सर्वच उत्पादननिर्मितीची आहे.
निर्माणकर्त्यास आपण विवेकशक्तीने ओळखतो
वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्याला निर्माणकर्ता हा उत्पादननिर्मितीत नव्हे, तर उत्पादननिर्मितीच्या बाहेरच सापडतो. तसेच डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहून नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर आपण निर्मात्यास ओळखतो आणि स्वीकारतो. निर्माणकर्त्यास ओळखण्यासाठी व स्वीकारण्यासाठी इंद्रियांच्या किवा साधनांच्या माध्यमाने माहिती करून घेण्याची अट असेल, तर इतर सर्वच उत्पादननिर्मितीबाबतीत हे मान्य केल्याशिवाय चालणार नाही की, या उत्पादननिर्मितीचा कोणीच निर्माणकर्ता नसून या सर्व वस्तू आपोआपच तयार झाल्या. ही बाब निश्चितच निराधार आणि मूर्खपणाची ठरेल. मात्र या गोष्टीचा विलाज काय आहे की, या अथांग आणि भव्य-दिव्य सृष्टीच्या निर्माणकर्त्यासंबंधी मोठमोठे विचारवंत असण्याचा दावा करणारेसुद्धा नेमका हाच मूर्खपणा करीत आहेत. एकीकडे त्यांची अशी मागणी आहे की, या सृष्टीचा निर्माणकर्ता या सृष्टीतच दिसावा तर दुसरीकडे असा हट्ट आहे की, सृष्टीचा निर्माणकर्ता अर्थात ईश्वर त्यांना डोळ्यांनी दिसावा. एवढ्यावरही त्यांचे भागत नाही. दुसर्या प्रकारच्या मूर्खपणास ते प्रगत विचारधारा आणि विचारशक्तीचे नाव देतात आणि ईश्वराचा स्वीकार करण्यास बौद्धिक पुराव्यांविरुद्ध व प्राचीनवादी असल्याचा दावा करतात.
मात्र कोणी जर असा हट्टच धरीत असेल की, या समस्येचे समाधान इंद्रिय आणि साधनसामग्रीच्याच माध्यमाने करण्यात यावे, तर यासाठीसुद्धा आमची पूर्ण तयारी आहे. परंतु यासाठी आवश्यक अटींची पूर्तता त्याला करावी लागेल. या हट्ट करणार्या व्यक्तीस सृष्टीनिर्माणकर्त्याचा शोध सृष्टीच्या आत नव्हे, तर सृष्टीच्या बाहेर घ्यावा लागेल. मग यासाठी या गोष्टीचीसुद्धा नितांत गरज आहे की, तुम्हाला सृष्टीच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत घडणार्या सर्व प्रक्रिया आपल्या इंद्रियांनी अथवा साधनसामग्रीच्या माध्यमाने किवा आपल्या डोळ्यांनी पाहाव्या लागतील. मात्र जर या आवश्यक अटींची पूर्तता करणे शक्य नसेल,(निश्चितच या अटींची पूर्तता शक्य नाही) तर इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमाने या समस्येचे समाधान शक्य नाही, अर्थात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे शक्य नाही. तुम्ही या सृष्टीचा कोणीतरी निर्माणकर्ता आणि व्यवस्थापक स्वीकार करा अथवा ही संपूर्ण भव्य-दिव्य सृष्टी आपोआप अस्तित्वात आली असल्याचे स्वीकार करा. यापैकी कोणतीही बाब ठरविण्यासाठी इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमांचा वापर शक्य होणारच नाही. याचा योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. मात्र तुम्हाला ही निर्णयप्रणाली आवडत नाही!
आपण ज्या भव्य-दिव्य, अनंत व अथांग सृष्टीत जीवन जगतो, त्या सृष्टीचा प्रारंभ आणि शेवट या दोन्ही बाबतीत आपल्याला काहीही माहीत नाही. कारण या सृष्टीची निर्मिती आपल्या डोळ्यांसमोर झाली नाही, तर उलट ती परिपूर्ण स्वरुपात अगदी तयार परिस्थितीत आयती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आपल्याला अद्यापही नेमके माहीत नाही की, ही सृष्टी निर्माण होऊन किती काळ लोटला आणि किती काळापर्यंत टिकणार आहे. आपण तर या सृष्टीच्या दरम्यानच्या काही मर्यादित काळासाठी जन्माला आलो आहोत. या ठिकाणी एका उर्दू कवीच्या दोन ओळी आठवतात,
‘‘सुनी हिकायतें हस्ती तो दरमियां से सुनी, न इब्तेदा की खबर है, न इन्तिहा मआलूम.’’
अर्थात : ‘‘कहानी ऐकली तर तीसुद्धा मध्यंतरातूनच, ना प्रारंभ माहीत आहे ना शेवट.’’ आपण विज्ञानाच्या क्षेत्रात किती जरी प्रगती केलेली असली, तरी आपण आपल्या इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीचा वापर करून या सृष्टीच्या निर्माणाचे स्त्रोत आणि काळ पाहू शकत नाही, सृष्टीतील सतत घडणार्या प्रक्रियासुद्धा पाहू शकत नाही. या सृष्टीचा अंत कधी होईल, हेसुद्धा माहीत करून घेऊ शकत नाही. या सृष्टीत ज्या प्रक्रिया सतत घडत असतात, त्यांपैकी भविष्यात घडणार्या प्रक्रियांची साधी कल्पना करण्याचेसुद्धा तंत्र आपल्याकडे नाही. या भव्य-दिव्य, अथांग आणि अनंत असणार्या सृष्टीच्या वय आणि क्षेत्रफळापेक्षा आपली ही मानवी विचारशक्ती अथवा विवेकशीलता खूपच क्षुल्लक आणि कमी आहे. केवळ विचार आणि विवेकशीलताच नव्हे तर आपले वय, कार्यक्षमता, इंद्रियक्षमता आणि दृष्य व श्रवणशक्तीसुद्धा अत्यंत किरकोळ आहे. आपले अनुमान, आपले निष्कर्ष आणि शोधबुद्धी वगैरे सर्वच बाबी कुचकामी ठरतात. ज्या सृष्टीच्या केवळ बाह्य दर्शनानेच आपल्या संपूर्ण शक्ती पार थकून जातात आणि संपूर्ण क्षमतांचे अवसान गळून पडते, त्या अथांग आणि अनंत सृष्टीची केवळ लांबी, रूंदी, परिघ, त्रिज्या, क्षेत्रफळ व घनफळ मोजणे शक्यच नाही. याकरिता कोणतेही साहित्य अपुरे पडेल, ज्या अनंत व अथांग सृष्टीच्या सीमासुद्धा ओलांडणे शक्य नाही, तिच्या मर्यादांची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. त्या सृष्टीची निर्मिती आणि तिच्यात घडणार्या प्रक्रिया, तसेच तिच्या व्यवस्थापन व व्यवस्थेविषयी आपण इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीच्या माध्यमाने एखादा निर्णय करण्याचे ठरविले तर हा किती मोठा आणि अतिभव्य, अतिदिव्य, अनंत आणि अथांग मूर्खपणाच ठरेल! ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच नाही की, आपल्या इंद्रियांची शक्ती आणि आपण तयार केलेली साधनसामग्री सृष्टीच्या संपूर्ण शोध प्रक्रियेत कुचकामी ठरतात. यासंबंधी तर आपल्याला आपल्या बुद्धी आणि विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. याच माध्यमाने आपण या मार्गात वाटचाल करावी.
विज्ञानाची सर्वच स्पष्टीकरण बौद्धिक आहेत
सृष्टीच्या बाबतीत तुमची विचारसरणी अशी जरी असली की, तिचे अस्तित्व हे केवळ काल्पनिक आहे किवा ती अनादी काळापासून असून अविनाशी आहे, तसेच तुमची अशी विचारसरणी जरी असली की, ती आपोआप अस्तित्वात आली आणि आपोआप तिचे कार्यचक्र चालू आहे किवा अशी विचारसरणी जरी असली की, एका सार्वभौम आणि सर्वशक्तिमान ईश्वराने तिची निर्मिती केली आहे आणि तोच या सृष्टीचे कार्य चालवीत आहे, तर यांपैकी तुमची कोणतीही विचारसरणी असू द्या, मग ती खरी असो अथवा खोटी असो, या सर्वच विचारसरणी अगर सिद्धान्ताचा आधार हा मुळात बौद्धिक विचारसरणीच आहे. या विचारसरणींशी इंद्रिय आणि प्रायोगिक सामग्रीचा कवडीमात्र संबंध नाही. तुम्ही या सृष्टीला अगदीच अनादी काळापासून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही, शक्यही नाही. तिच्या घडणार्या घटनाक्रमाच्या शृंखलेतील प्रत्येक कडी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी तुमचे कोणतेच इंद्रिय अथवा साहित्यसामग्री कामी आले नाही. तसेच यासाठी कोणतेही प्रयोग करून निष्कर्ष मिळाला नाही आणि शक्यसुद्धा नाही. तर मग खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही कशाच्या आधारे हा सिद्धान्त मांडता किवा असा निर्णय घेता की, ही सृष्टी अनादी काळापासून आणि चीरकालीन आहे. तुम्ही सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी हजर नसूनसुद्धा आणि सृष्टीची संपूर्ण व्यवस्था तुमच्या दृष्टीसीमांच्या आत नसूनसुद्धा तुम्ही इंद्रिय आणि शोध साहित्यांच्या आधारावर हा निर्णय कशासाठी घेऊ शकता की, ही सृष्टी आपोआपच अस्तित्वात आली आणि संपूर्ण कार्यचक्र हे आपोआपच चालू आहे अथवा या उलट असा निर्णयसुद्धा कशासाठी घेऊ शकता की, या सृष्टीचा निर्माणकर्ता आणि संचालक हा सर्वशक्तिमान ईश्वर आहे. एवढेच नव्हे तर तुम्हाला तुमच्या इंद्रियांच्या शक्तीमुळे आणि प्रायोगिक साहित्याच्या माध्यमाने हेसुद्धा समजले नाही की, या सृष्टीचे अस्तित्वच नसून ही केवळ एक कल्पना आहे अथवा केवळ कल्पनांवर आधारित मानवी भ्रम आहे. इंद्रिय आणि साहित्यांच्या माध्यमाने तुम्हाला मिळणारी माहिती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित आहे की, आपण ज्या ठिकाणी जगत आहोत, त्या सृष्टीचे अस्तित्व आहे आणि तिचे कार्यचक्र चालू आहे.. बस, एवढेच! या शिवाय तुम्ही जे काही सादर करता, ते तुमच्या बौद्धिक विचारशक्तीवर आधारलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा संबंध इंद्रियांच्या माध्यमाने मिळणार्या माहितीशी अथवा अनुभव किवा प्रयोगाशी मुळीच नाही.
विज्ञानाकडे ‘का?’ चे उत्तर नाही
ही सृष्टी का निर्माण झाली आणि तिचे हे सतत चालू असलेले कार्यचक्र कशाकरिता सुरू आहे? हिचा प्रारंभ झाला का आणि अंत होईल का? हिचा कोणी निर्माता आणि चालक आहे का अथवा ती आपोआपच अस्तित्वात आली आणि आपोआपच चालू आहे? तर या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीतच. पंचेंद्रियांच्या आणि साहित्यसामग्रीच्या आधारावर या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने शोधून काढली नाहीत. पंचेंद्रियांचा आणि साहित्यांचा वापर करून अर्थात वैज्ञानिक प्रयोगाद्वारेसुद्धा केवळ एखाद्या क्षुल्लक बाबींविषयी जी माहिती अथवा ज्ञान प्राप्त होते, ते केवळ एवढेच की, या बाबीचे अगर पदार्थाचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची घटकात्मक रचना कशी आहे. मात्र हे गुणधर्म का आहेत आणि त्यातील घटकांची रचना अशी का आहे, याच घटकांच्या अशाच स्वरुपाच्या रचनेमुळे हाच पदार्थ का तयार होतो वा अमुकच पदार्थ ‘का’ तयार होतो, तर मात्र विज्ञानाजवळ ‘का’ या प्रश्नाचे उत्तर मुळीच नाही. उदाहरणार्थ, आपल्याला हे माहीत आहे की, हायड्रोजन आणि ऑक्सीजनच्या मिश्रणाने पाणी तयार होते. मात्र या दोन्ही घटकांच्या मिश्रणाने पाणीच का तयार होते, शिवाय पाण्याचा गुणधर्म हा त्याच्या घटकांच्या गुणधर्मापेक्षा इतका विपरित का आहे? अर्थातच हायड्रोजनचा गुणधर्म आहे की, तो स्वतः जळतो आणि ऑक्सीजन जळण्यासाठी मदत करतो. तेव्हा या दोन्हींच्या मिश्रणाने तयार होणारे पाणी हा विझविणारा पदार्थ का तयार झाला? खरे पाहता जळणार्या आणि जळण्यास मदत करणार्या या दोन घटकांच्या मिश्रणाने तयार होणार्या पदार्थाचे गुणधर्म जाळणे अथवा जळणे असावयास हवे होते. अर्थात जळत असलेल्या आगीत पाणी ओतताच तिच्यात आणखी भडका व्हावयास हवा होता. मात्र पाण्याचा गुणधर्म आगीच्या गुणधर्माविरुद्ध आहे. असे का? या ‘का’ चे उत्तर विज्ञानाजवळ नाही. अशा असंख्य उदाहरणांपैकी आणखीन एक उदाहरण आपणास दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरत असलेल्या मिठाचे देता येईल. कारण हेच मीठ सोडियम आणि क्लोरीन या दोन घटकांचे मिश्रण आहे. सोडियमचा गुणधर्म तर विचित्रच आहे. अगदी हाताचा स्पर्श होताच पेट घेणारा पदार्थ म्हणजे सोडियम आणि क्लोरीन म्हणजे एक विषारी गॅस. मात्र या दोन्हींचे मिश्रण होताच मीठ तयार होते आणि मिश्रित घटकांचे दोन्ही गुणधर्म अर्थात ज्वालाग्रही असणे व विषारी असणे मिठातून नष्ट झालेले आहे. मीठ हे स्पर्श होताच जळतही नाही आणि ते विषारीसुद्धा नाही. असे का बरे? तर अशा प्रकारच्या प्रत्येक ‘का’ चे उत्तर पंचेंद्रियांच्या अथवा वैज्ञानिक साहित्यांचा वापर करूनदेखील सापडले नाही. मग ही बाब खरोखरच विचार करण्यासाठी आहे की, या अत्यंत क्षुल्लक ‘का’ चे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही, पंचेंद्रियांच्या आणि वैज्ञानिक साहित्याच्या माध्यमानेसुद्धा हे ‘का’ चे उत्तर सापडत नाही, ‘‘तर ही सृष्टी का निर्माण झाली?’’ या प्रश्नाचे उत्तर कसे सापडेल? या सृष्टीला कोणीतरी निर्माणकर्त्याने निर्माण केले का?’ याचे उत्तर कसे सापडेल की सृष्टी कोणाच्या आदेशावर एवढी व्यवस्थितपणे आणि नियमबद्धरीत्या चालते? याचे उत्तर कसे सापडेल. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, या ‘का’ चे उत्तर पंचेंद्रिये आणि शोध-साहित्यांच्या माध्यमाने कधीच आणि कोणासही सापडणे शक्य नाही. अर्थातच ईश्वराचा ‘स्वीकार’ असो की ‘नकार’ या दोन्ही बाबी विज्ञानाशी संबंधित नसून माणसाच्या बुद्धीशी संबंधित आहेत. वैचारिक पुराव्यांच्याच आधारांवर ईश्वराचा स्वीकार अथवा नकार करता येईल. पंचेंद्रियांच्या आधारावर आणि साधन-सामग्रीच्या नास्तिकताही सिद्ध होत नाही व आस्तिकताही सिद्ध होत नाही.

- डॉ. उमर छाप्रा
    या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल.
    या पुस्तकातील पहिल्या प्रकरणात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे दुसऱ्या प्रकरणात व्याज निषिद्ध असण्याच्या मूळ कारणावर खुलासा आला आहे तर अंतिम प्रकरणात व्याज मुक्त बँकिंग व्यवस्थेच्या काही मूलभूत नियम सांगितले गेले आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 161    -पृष्ठे - 32      मूल्य - 18      आवृत्ती - 2 (2014)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/3uytw1hux2klqash9s0uzyjt6ma747j7

कोल्हापूर (अशफाक पठाण)-
जमाअत ए इस्लामी हिंद, कोल्हापूर शाखेच्या वतीने दि. १३ रोजी ‘मानव सेवा : आपली जवाबदारी व कर्तव्य’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये  करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. या कार्यक्रमला जमाअतचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही हे ओरंगाबाद येथून उपस्थित होते.  त्याचबरोबर मजहर फारूक, सचिव जनसेवा विभाग, महाराष्ट्र, नदीम सिद्दिकी, अन्वर पठाण, इस्माईल शेख हे उपस्थित होते. कोल्हापूर-सांगली या ठिकाणी आलेल्या महापुरात घरांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विभागातील घरांच्या पुनर्वसनकार्यात आयडीयल रिलीफ टीमतर्फे शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात रिलीफचे काम करण्यात  आले. गावात धान्यावाटप, आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली. त्यासोबत शाळेतील विध्याथ्र्यांना बॅग, वह्यांचे वाटप झाले. या सर्व कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला व  शिरोळ तालुक्यातील मौजे कणवाड या गावात ४० घरांचे बांधकाम करण्यात येणार असून ग्रंथालयास पुस्तके देण्यात येणार असल्याची माहिती जमाअतचे जनसेवा विभागाचे सचिव  मझहर फारूक यांनी दिली.
मौलाना इलियास फलाही म्हणाले, मुस्लिम समुदायाची जबाबदारी कुरआनमध्ये स्पष्ट सांगण्यात आली आहे. त्यानुसार आज मुस्लिम समाज वागताना दिसत नाही, त्याला आपल्या  जबाबदारीची जाणीव नाही. त्यासाठी कुरआनशी चांगले संबंध निर्माण करणे, कुरआनच्या शिकवणी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. इस्लाम एकमेव असा  धर्म आहे की ज्यात समाजसेवा किंवा मानवसेवा करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. माणसाच्या जास्तीतजास्त कामी यावे, तरच माणूस म्हणून आपण यशस्वी व्हाल, असे 
त्यांनी सांगितले.
यानंतर जमाअतचे कोल्हापूर शहराध्यक्ष अन्वर पठाण यांनी पुढील महिन्यात प्रेषित जयंतीचे औचित्य साधून ‘प्रेषित मुहम्मद (स.) सर्वांनसाठी’ हे अभियान राबविण्यात येणार  असल्याची माहिती दिली. या अभियानात अंतर्गत मान्यवराच्या भेटी, व्याख्याने, पत्रकार परिषद असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशपाक पठाण  यांनी केले. तर आभार नदीम सिद्दिकी यांनी मानले. या वेळी कोल्हापूर, मिरज व कराड येतील जमाअतचे सदस्य उपस्थित होते.

आता मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की, आपण कुठल्या उद्देशासाठी उठून उभे राहिलेलो आहोत. आपण सर्व त्या लोकांसाठी जे स्वतःला इस्लामचा पाईक मानतात, हा संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी वास्तवमध्ये इस्लामला आपला दीन (धर्म / व्यवस्था) बनवायला हवा. त्याला व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करावयास हवा. त्याच्या इस्लामी तत्वांना आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या सोसायटीमध्ये , आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, आपल्या साहित्य आणि पत्रकारितेमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये, आपल्या सामाजिक संस्थांमध्ये, आपल्या इतर संघटनांमध्ये आणि सामुहिक रितीने आपल्या कौमी पॉलीसी (मुस्लिम समाजाच्या नीती निर्धारणामध्ये) प्रत्यक्षात लागू करावे आणि आपल्या वाणी आणि कृतीने जगापुढे इस्लाम खरा असल्यासंबंधीची खर्‍या अर्थाने साक्ष द्यावी.
    आम्ही त्यांच्यासमोर हे ही स्पष्ट करू इच्छितो की, मुस्लिम होण्याच्या नात्याने धर्माची स्थापना करणे आणि धर्मासंंबंधीची खरी साक्ष देणे हाच तुमच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. यामुळे तुमच्या सार्‍या प्रयत्नांचा केंद्रबिंदू याच गोष्टीवर फोकस व्हायला पाहिजे. तुम्हाला ते प्रत्येक काम सोडून द्यावे लागतील जे या उद्देशाच्या विपरीत असतील आणि इस्लामविषयी चुकीचे प्रतिनिधीत्व करत असतील. इस्लामला केंद्रस्थानी ठेऊन आपल्या पूर्ण जीवनाचा आढावा घ्या. पुन्हा एकदा सर्व गोष्टी तपासून पाहा. जेथे त्रुटी आढळतील त्यांना दूर करा आणि आपले सर्व प्रयत्न याच एका मार्गामध्ये लावून टाका जेणेकरून इस्लाम संपूर्णपणे प्रत्यक्षात प्रत्येकाच्या जीवनात आणि समाजात प्रस्थापित होवून जाईल. या संबंधीची साक्ष व्यवस्थित दिली जाईल, याकडे लक्ष द्या. जेणेकरून कोणालाही असे सांगण्याची संधी मिळू नये की, आम्हाला तर सत्यमार्गाची कल्पनाच नव्हती.
    हा आहे जमाअत-इस्लामीच्या स्थापनेमागचा एकमेव उद्देश्य. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी पद्धत आम्ही अवलंबिलेली आहे ती ही आहे की, सर्वप्रथम मुस्लिमांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. स्पष्ट शब्दात त्यांना सांगावे की इस्लाम काय आहे? आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? मुस्लिम असण्याचा अर्थ काय आहे? आणि मुस्लिम होताच कुठल्या जबाबदार्‍या त्यांच्यावर येतात?
    जेव्हा लोक या गोष्टी समजून घेतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की, इस्लामला अपेक्षित असलेले सर्व काम व्यक्तीगतरित्या साध्य करणे शक्य नाही. त्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. इस्लामचा एक छोटासाच भाग व्यक्तीगत जीवनाशी संबंधी आहे. त्याची स्थापना तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये करूनही घेतली तरी संपूर्ण इस्लामी व्यवस्थेला त्यामुळे समाजात लागू करता येणार नाही किंवा संपूर्ण इस्लाम संबंधीची साक्ष पूर्णपणे देण्याची जबाबदारी पार पाडता येणार नाही. उलट जेव्हा सामुहिक जीवनावर कुफ्र (इन्कार करणार्‍यांची व्यवस्था) कायम असेल. तेव्हा व्यक्तीगत जीवनातील बहुतेक भागांवरही इस्लामी आदेश लागू करता येणार नाहीत आणि सामुहिक व्यवस्थेची पकड दिवसेंदिवस या व्यक्तीगत इस्लामच्या सीमांना कमी-कमी करत जाईल. म्हणून संपूर्ण इस्लामला कायम करण्यासाठी आणि त्याची खरी-खरी साक्ष देण्यासाठी आवश्यक आहे की, ते सारे लोक जे मुस्लिम असल्याच्या नात्याने इस्लामी ज्ञान बाळगून आहेत व प्रामाणिक पणे त्या ज्ञानाला लागू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना संघटित होऊन, संघटित प्रयत्नांद्वारेच इस्लामला प्रत्यक्षात आपल्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनामध्ये प्रस्थापित करता येईल. तेव्हाच ते जगाला आपल्याकडे बोलविण्याचा प्रयत्न करू शकतात. सामुहिकरित्याच ते या कामात येणार्‍या अडचणींवर मात करू शकतात. हेच कारण आहे की ज्यामुळे इस्लाममध्ये सामुहिकतेला अनिवार्य करण्यात आलेले आहे. इस्लामची प्रतिस्थापना करण्यासाठी आणि त्याच्या संदेशाकडे दुसर्‍यांना बोलावण्यासाठी, एक क्रम आणि योजना ठेवली गेलेली आहे. म्हणजेच अगोदर एक जमाअत असावी, मग त्या जमाअतने अल्लाहच्या मार्गामध्ये प्रयत्न करावेत. हेच कारण आहे की, जमाअत शिवाय जे लोक जीवन जगतात त्यांना अज्ञानी जीवन जगणारे असे संबोधले जाते आणि जमाअतपासून वेगळे राहणार्‍यांना इस्लामपासून विभक्त राहणार्‍यांच्या बरोबर असल्याचे भाकीत केले गेलेले आहे.
    जे लोक ही गोष्ट समजतात आणि त्यातून त्यांच्यामध्ये मुस्लिम होण्याच्या नात्याने (त्यांच्यावर) येणार्‍या जबाबदार्‍यांची जाणीव एवढी मजबूत होऊन जाते की, ते आपल्या दीनसाठी आपले वैयक्तिक फायदे आणि अहंकाराचा त्याग करून जमाअतच्या अनुशासन आणि व्यवस्थेचा स्वीकार करतात, अशा लोकांसमोर आम्ही स्पष्ट करतो की, आता तुमच्यासमोर तीन मार्ग उपलब्ध आहेत आणि तुम्ही स्वतंत्र आहात की, या तिन्ही मार्गापैकी कुठलाही एक मार्ग स्वतःसाठी निवडू शकता. जर तुमचे मन साक्ष देत असेल की आमचा संदेश (दावत), श्रद्धा (अकीदा),   उद्देश (मक्सद) आणि जमाअतची व्यवस्था व आमच्या काम करण्याच्या पद्धती सर्व काही शुद्ध इस्लामी आहे आणि आम्ही तेच काम करण्यासाठी उभे ठाकलेलो आहोत जे काम कुरआन आणि हदीसच्या अनुसार मुस्लिम उम्मतचे मुलभूत कार्य आहे तर आमच्यासोबत व्हा. जर काही कारणांमुळे तुम्हाला आमच्यावर व आमच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास होत नसेल व तुमच्या नजरेमध्ये दुसरी एखादी जमाअत अशी असेल की जी इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इस्लामी पद्धतीने कार्य करीत असेल तर तुम्ही त्यात सामील होऊन जा. आम्हाला स्वतःला सुद्धा अशी जमाअत आढळून आली असती तर आम्ही तीत सामील झालो असतो, कारण की आम्हाला स्वतःची दीड विटांची वेगळी मस्जिद बनविण्याची इच्छा नव्हती आणि जर का तुम्हाला ना आमच्यावर विश्‍वास आहे ना कुठली दुसरी जमाअत अशी आढळून येते जी की तुमच्या अनुसार शुद्ध इस्लामी पद्धतीने कार्यरत आहे, तेव्हा तुमच्यावर हे अनिवार्य आहे की आपल्या इस्लामी कर्तव्याच्या पुर्तीसाठी स्वतः उभे रहावे आणि इस्लामच्या मुलभूत शिकवणीवर आधारित एक अशी जमाअत तयार करावी, जीचा उद्देश संपूर्ण दीन (इस्लाम)ची स्थापना करणे आणि वाणी आणि वर्तनाने त्याची साक्ष देणे असेल. या तीन मार्गापैकी जो मार्ग तुम्ही अवलंबाल इन्शाअल्लाह तो सत्यमार्ग असेल.
(मौलाना  अबुल आला मौदूदी, शहादत-ए-हक या पुस्तकातून) (भाग - 6)

मला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची  समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. भारत हा विविध धर्म व परंपरांनी नटलेला देश आहे. सर्व आबालवृद्धांमध्ये सणाच्या दिवशी आनंद व उत्साहाची लहर असते. हा एक भाग  झाला. पण सण साजरे करण्यामागचा खरा उद्देश असतो की त्या सणाशी निगडीत इतिहास जाणून घेणे व त्यामधून मिळणारी शिकवण, बोध आत्मसात करणे.
१. रामाने रावणाचा वध केला. या विजयास्तव दसरा सण साजरा केला जातो. म्हणजेच कुकर्मावर सत्याचा व हक्काचा विजय, हा बोध हा सण साजरा करण्यामागे असतो.
२. मातृइच्छेला मान देऊन बारा वर्षांचा वनवास संपवून, रावणाचा पराजय करून राम स्वदेशी परतले. या आनंदास्तव दिवाळी साजरी केली जाते.
३. श्रीकृष्णाने जुलमी राक्षस नरकासूराचा वध करून आपल्या बंदिवासात असलेल्या सोळा हजारांपेक्षा अधिक स्त्रियांना मुक्त केले. नरक चतुर्थी साजरी करण्यामागचा हा इतिहास आहे.   म्हणजेच कृष्णाने स्त्रीसन्मान व स्त्रीहक्कांसाठी दिलेला लढा हा या सणामधून मिळणारा बोध आहे.
४. कार्तिक आमावस्येच्या दिवशी पांडव बारा वर्षांच्या अज्ञातवासातून परतले होते आणि त्यांच्या स्वागतास्तव दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर महाभारत घडले.
आपल्याच लोकांना युद्धभूमीवर पाहून धनुष्य खाली ठेवलेल्या अर्जुनाला अन्यायाविरूद्ध लढणे का व कसे आवश्यक आहे हे कृष्णाने केलेले प्रबोधन हाच महाभारताचा गाभा आहे.  म्हणजेच हक्कासाठी व सत्य स्थापनेसाठा rलढणे आवश्यक आहे. हा बोध या सणामधून मिळतो.
५. लक्ष्मीपूजन या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून लक्ष्मीला बळी राजाच्या तावडीतून सोडविले होते. म्हणजे स्त्री अस्मितेसाठी तढा देणे हा बोध यामागे आहे.
६. राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक देखील याच दिवसांत झाला होता. विक्रमादित्य हे जनतेची काळजी घेणारे व शत्रूंशी लढणारे शूर राजा होते. म्हणजेच सामान्य जनतेसाठी शत्रूशी  लढणे महान कार्य आहे हा बोध या उत्सवातून आम्हाला मिळाला.
वरील सर्व इतिहास आणि आख्यायिका वाचल्यानंतर आम्हास समजते की दसरा व दिवाळी हे सण साजरे करण्यामागे ‘सत्याचा असत्यावर विजय’ हा मतितार्थ आहे. म्हणजे दसरा,  दिवाळी साजरी करण्यामागचा उद्देश ‘जिहाद’ होता, असे जर का मी म्हटले तर ते कानांना ऐकण्यासाठी खूप जड जाते. पण हे योग्य आहे का अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण  प्रथम ‘जिहाद’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेऊ या. कारण दुर्दैवाने आमच्यासमोर जिहादची खूप चुकीची प्रतिमा उभी करण्यात आली आहे. कुरआनच्या परिभाषेत जिहादचा अर्थ होतो   ‘अन्यायाविदूद्ध लढा देणे, स्वत:मधील व समाजामधील वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.’
जिहाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. म्हणजे नैतिक जिहाद, आध्यात्मिक जिहाद, रक्षणात्मक जिहाद, वंशभेदविरोधी जिहाद, अन्यायाविरूद्ध जिहाद, सेवात्मक जिहाद इ.  स्वत:पुरते मर्यादित न राहता सर्व समाजाचे भले व्हावे यासाठी पुढाकार घेणे याला ‘जिहाद’ म्हणतात.
म्हणजे अन्यायाविरूद्ध लढा देणे हे स्वत: श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तर इस्लामी व्याख्येत तो जिहादच झाला. किंवा परस्त्रीवर हात घालणाऱ्या रावणाचा जेव्हा राम अंत करतो, तर  हाही जिहादच आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविला, दारूला हराम केले, व्याजाला हराम केले, असत्याविरूद्ध युद्धे लढली,  हा सर्व जिहादच होता.
जवळच्या भूतकाळात जायचे झाले तर म. गांधी, मौ. आझाद यांच्यासह इतर भारतीयांनी इंग्रजांविरूद्ध दिलेला स्वातंत्र्य लढा हादेखील जिहादच आहे. सध्याच्या काळातील उदाहरण  द्यायचे झाले तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण, मेधा पाटकर यांचे वंचितांसाठी लढा देणे हा जिहाद आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची केलेली सेवा जिहाद आहे.  दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेला प्रयत्न जिहाद आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे आपणास अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या महान व्यक्तींची देता येतील.

जिहाद समजून घ्या
‘जिहाद’ म्हणजेच  अन्यायाविरूद्ध लढणे ही जर का चांगली गोष्ट आहे तर मग जिहादला तलवार व रक्तपात या व्याखेशी का जोडले गेले आहे? याचे उत्तर आहे कुरआनचे अर्धवट  ज्ञान! म्हणजे बघा कुरआनमध्ये म्हंटले आहे, ‘‘युद्ध करणे जरी तुम्हाला नापसंत असले तरी ते तुमचे कर्तव्य आहे.’ (अध्याय २, श्लोक २१६)
हा श्लोक वाचल्यानंतर वाचकाला शंका येते की शांतीचा संदेश देणाऱ्या कुरआनात लढायची गोष्ट का येते? आणि मग वाचक याचा अभ्यास करण्याऐवजी इस्लाम धर्माला वाईट समजू  लागतो. खरे पाहता कुरआनमध्ये जिहादचा आदेश तेव्हाच येतो जेव्हा सत्य व हक्काला दाबून असत्यावर चालणाऱ्या अत्याचारी लोकांचा बिमोड करणे आवश्यक असते. आता असाच  एक श्लोक महाभारतात आहे, ‘‘कृष्ण अर्जुनाला म्हणतो की- अन्यायाविरूद्ध लढणे, शस्त्र उचलणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे.’’ आता या दोन्ही श्लोकांमध्ये केलेले संबोधन एकच आहे.  म्हणजेच कोणाला उगाचच मारणे वा नुकसान पोहचविणे शंभर टक्के चुकीचे आहे. पण पोलिसांनी चोराला पकडणे, गुन्हेगाराला बंदुकीचा धाक देणे, गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने फाशीची  शिक्षा सुनावणे योग्य आहे की अयोग्य? रस्त्यात एकट्या मुलीला छेडणाऱ्या टोळक्याला शक्तीचा वापर करून पळविणे योग्य की अयोग्य? अर्थातच योग्य आहे. नाही तर वाईट  प्रवृत्तींना समाजात आणखी बळ मिळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण समाजाला भोगावा लागेल. कुरआनमध्ये अशा वाईट गोष्टींना ‘फसाद’ असे संबोधले आहे आणि अशा फसादींना  रोका म्हणजे जिहाद करा, असे सांगितले आहे. यासाठी तुमच्या वाणीचा उपयोग करा, समजवा, कायद्याचा उपयोग करा, तुमच्या हातांनी रोका, असे सांगितले आहे. या तुमच्या सर्व  सामूहिक प्रयत्नांना ‘जिहाद’ असे म्हटले गेले आहे.

गैरसमजांची कारणे-
१, प्रसारमाध्यमे- ‘इस्लाम व मुस्लिमांबद्दल शक्य तितके वाईट दाखवा आणि टी.आर.पी. वाढवा’ हे साधे समीकरण आज झाले आहे. कोणतेही चॅनेल उघडा हाच मुद्दा पुन्हा पुन्हा  चघळून तुमच्यासमोर सादर केला जातो आणि त्या आधारे माध्मयांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत.
२. इस्लामोफोबिया- जगात सर्वाधिक जोमाने पसरणारा धर्म म्हणजे इस्लाम होय. याची पडताळणी आपण कोठेही करू शकता. मग या धर्माला रोखण्यासाठी विरोधकांकडून निर्माण  केलेले वैचारिक षङ्यंत्र म्हणजे इस्लामोफोबिया. यामागे पूर्वग्रहावर आधारलेली इस्लामविषयी असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात ‘इस्लामोफोबिया’  पसरत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ‘फोबिया' या शब्दाचा अर्थ आहे अतिशयोक्त, नीटपणे मांडता न येणारी व तर्कशुद्ध नसणारी भीती. कोणत्याही बुद्धिनिष्ठ, तर्कसुसंगत  कारणाशिवाय एखाद्या गोष्टीविषयी माणसाला सतत भीती वा संशय वाटत राहिला, तर त्याला 'फोबिया' म्हणतात.
३. खनिज तेल साठे- तिसरे कारण म्हणजे मुस्लिम देशांकडे असलेले तेलसाठे. त्यावर कब्जा करण्यासाठी स्वत:ला महापॉवर म्हणविणाऱ्या देशांकडे कारण हवे होते. मग जिहादी टोळ्यांची उपज करून त्यांना जेरीस आणण्याचा बू करून, युद्धे लादून तेलसाठ्यांवर नियंत्रण मिळविणे हा या तथाकथित महाशक्तींनी उद्देश साध्य करून घेतला.

हा जिहाद नव्हे-
दाढी व टोपी धारण केलेल्या दहशतवाद्यांनी सामान्य लोकांवर केलेला गोळीबार.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन गोरक्षेच्या नावाखाली सामान्य माणसांची केलेली हत्या.
श्रीलंकेतील चर्चमध्ये खिश्चन बांधवांवर झालेला भ्याड हल्ला.
न्यूझिलंडच्या मस्जिदीमध्ये नमाजींवर झालेला क्रूर हल्ला.
ही सर्व उदाहरणे जिहाद नव्हे. निरपराधांना मारणे जिहाद होऊच शकत नाही. कुरआनात स्पष्ट सांगितले आहे,
‘‘ज्याने एका निष्पाप व्यक्तीची हत्या केली त्याने पूर्ण मानवजातीची हत्या केली आणि ज्याने एका निष्पाप व्यक्तीला वाचविले, त्याने संपूर्ण मानवजातीचे रक्षण केले. (मग ती व्यक्ती  कोणत्याही जातीधर्माची असो)’’ (अध्याय ५, श्लोक ३२)
जिहाद असा करा
पाचशे रुपयांचे जेवण व दारू मिळेल त्या राजकीय पक्षासाठी मोर्चे काढणे योग्य आहे का? एका नि:शस्त्र माणसाला शंभर-दोनशे जणांच्या जमावाने काठ्यांनी, दगडांनी, लाथाबुक्क्यांनी  जीव जाईपर्यंत मारणे वीरता आहे का? आजच्या तरुणपिढीला सांगावेसे वाटते की जिहाद करायचाच असेल तर खालील बाबतीत करा-

१) व्यसनमुक्त राहा आणि इतरांनाही व्यसनमुक्त करा.
२) शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना मदत करा.
३) अन्यायाविरूद्ध उभे राहा आणि लढा द्या.
४) गरीब, अनाथ, रुग्ण यांची शक्य तितकी मदत करा.
५) सत्यासाठी उभे राहा, मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो.
आज दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘जिहाद’बद्दल असलेले आपले गैरसमज दूर झाले असतील असा मला विश्वास आहे.

- -मिनाज शेख, पुणे

माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि  अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते तेव्हा हा उठतो आणि घाईघाईत चार रकआत पूर्ण करतो (जसे कोंबडी जमिनीवर चोच मारते आणि वर उचलते). असा मनुष्य आपल्या   नमाजमध्ये अल्लाहचे अजिबात स्मरण करीत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारा ईमानधारक आणि धर्मद्रोह्याच्या नमाजमधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. ईमानधारक आपली नमाज वेळेवर अदा करतो, रुकुअ आणि सजदा योग्य पद्धतीने
करतो, त्याचे मन अल्लाहच्या स्मरणात गुंतलेले असते आणि धर्मद्रोह्याची नमाज वेळेवर अदा होत नाही, रुकुअ व सजदा योग्य प्रकारे करीत नाही आणि त्याचे मन अल्लाहसमोर  नसते. खरे  पाहता प्रत्येक नमाज महत्त्वाची आहे, परंतु ‘फजर’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व अधिक आहे. ‘अस्र’ची वेळ गफलतीची असते. सर्वसाधारणपणे सर्व लोक आपापल्या  कामात असतात आणि रात्र होण्यापूर्वी आपला व्यापारउदीम आटोपण्याच्या प्रयत्नात असतात आणि आपल्या विखुरलेल्या कामांना पूर्ण करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून  ईमानधारकाची बुद्धी जागृत नसेल तर ‘अस्र’ची नमाज सुटण्याची शक्यता असते. तसेच सकाळच्या नमाजचे महत्त्व यासाठी आहे की झोपेची वेळ असते. सर्वांना ठाऊक आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरची झोप गाढ व गोड असते. जर मनुष्याच्या मनात ईमान जागृत नसेल तर तो आपल्या प्रिय झोपेला सोडून अल्लाहचे स्मरण करण्यासाठी उठू शकत नाही.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जमिनीची देखरेख करणारे रात्र आणि दिवसाचे ‘फरिश्ते’ (देवदूत) आपल्या कामाच्या वेळा बदलत  असतात आणि ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजमध्ये एकत्र येतात, मग जे फरिश्ते तुमच्यात असतात ते आपल्या पालनकर्त्यासमोर जातात तेव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्या  भक्तांना कोणत्या स्थिती सोडले? तेव्हा ते म्हणतात की जेव्हा आम्ही त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते नमाज अदा करीत होते आणि जेव्हा आम्ही त्यांना सोडले तेव्हा ते नमाज अदा   करीत होते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण 
ही हदीस ‘फज्र’ आणि ‘अस्र’च्या नमाजचे महत्त्व स्पष्ट करीत आहे. ‘फज्र’च्या नमाजमध्ये रात्रीचे ‘फरिश्ते’ (देवदूत) सहभागी होतात आणि ते फरिश्तेदेखील ज्यांना  दिवसा काम करायचे असते. अशाप्रकारे ‘अस्र’च्या नमाजदेखील दोन्ही वेळचे फरिश्ते ईमानधारकांसह नमाजमध्ये सहभागी असतात. ईमानधारकांना फरिश्त्यांचा सहवास लाभावा यापेक्षा  मोठे सुदैव ते कोणते. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सात प्रकारचे लोक अल्लाह आपल्या छायेत जागा देईल, त्या दिवशी  अल्लाहच्या छायेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही छाया नसेल. (१) न्याय करणारा सम्राट, (२) अल्लाहच्या भक्तीत आपले तारुण्य व्यतीत करणारा तरुण, (३) असा मनुष्य ज्याचे मन   मस्जिदशी अडकलेले असते, जेव्हा तो मस्जिदमधून बाहेर पडतो तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा मस्जिदमध्ये प्रविष्ट होण्याची वाट पाहत असतो, (४) ती दोन माणसे ज्यांच्या मैत्रीचा आधार  अल्लाह आणि अल्लाहचा ‘दीन’ (इस्लाम) आहे, त्याच भावनेसह ते एकत्र येतात आणि त्याच भावनेसाठी ते अलिप्त होतात, (५) तो मनुष्य ज्याने एकांतात अल्लाहचे स्मरण केले  आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, (६) तो मनुष्य ज्याला एखाद्या उच्च कुलीन सौंदर्यवतीने दुष्कृत्यासाठी बोलविले आणि त्याने फक्त अल्लाहच्या भयापोटी तिला नकार दिला  आणि (७) तो मनुष्य ज्याने अशाप्रकारे ‘सदका’ (दानधर्म) केला की त्याच्या डाव्या हातालादेखील माहीत नाही की उजव्या हात काय देत आहे.’’
(हदीस : मुत्त़फक अलैहि)

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,
‘‘हे प्रेषित! हा मुलगा ‘नज्जार’ परिवाराचा सुपुत्र असून यास दिव्य कुरआनचा अभ्यास करण्याचा खूप छंद आहे. याने आतापर्यंत कुरआनाच्या एकूण सतरा ‘सूरती’ मुखपाठ केल्या आहेत.’’
विश्वकृपाळू प्रेषित मुहम्मद(स.) हे ऐकून खूप आनंदीत झाले. त्यांनी या मुलास दिव्य कुरआनच्या मुखपाठ असलेल्या सूरती वदन्याचा आदेश दिला. या सुकुमाराने तत्काळ आदेशाचे पालन केले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) खूप प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरविला, हेच बाळ ‘माननीय झैद बिन साबित अन्सारी(र.)होत.
धार्मिक ज्ञानसंपदा आणि शिक्षण-प्रशिक्षणात हाडाचे शिक्षक असलेल्या प्रेषितसोबत्यांपैकी एक असलेले माननीय झैद बिन साबित अन्सारी हे वयाच्या अकराव्या वर्षीच इस्लामचे खंदे समर्थक बनले. त्यांचा जन्म हिजरी सन पूर्व १२ मध्ये झाला. ते ‘अबू सईद’ या टोपणनावानेसुद्धा ओळखले जातात. ते इस्लामी धर्मशास्त्राचे अतिशय महान विद्वान होते. त्यांची वंशपरंपरा अशी,
झैद पिता साबित पिता जहाक पिता झैद पिता लजान पिता अमरु पिता अबद पिता ऑफ पिता गनम पिता मालिक पिता नज्जार.
माननीय झैद बिन साबित(र.)यांचे पिता प्रेषित स्थलांतराच्या पाच वर्षांपूर्वीच वारले होते. लहानपणीच त्यांची पितृछाया हरपल्याने ते माता ‘नवार बिन्त मालिक’ यांच्याच प्रेमळ मायेत वाढले. हिजरी सन पूर्व १ मध्ये इस्लाम धर्माचे प्रचारक व प्रसारक माननीय मुसअब बिन उमैर(र.)हे मदीना शहरी आले, त्याच वेळी त्यांच्या इस्लाम प्रचारकार्यामुळे ‘अवस’ आणि ‘खजरच’च्या घराण्यात इस्लाम धर्मावर चर्चा रंगल्या. याच काळात इस्लाम धर्म स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविणार्यांपैकी माननीय झैद बिन साबित(र.)सुद्धा आहेत. ईश्वराने त्यांना अत्यंत पवित्र आचरण आणि मनमिळाऊ स्वभावाने वरदानित केले होते. इस्लाम स्वीकारताच त्यांनी दिव्य कुरआनचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अभ्यासु वृत्तीमुळे ते सर्व अन्सारी सोबत्यांमध्ये प्रतिष्ठित होते. प्रचंड स्मरणशक्ती असल्याने आणि अभ्यासु वृत्तीमुळे सर्वांचे ते खूप लाडके होते. त्यांनी अगदीच अल्पकाळात अरबी भाषेव्यतिरिक्त इतर बर्याच भाषांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविले होते. त्यांना अरबी, इब्रानी, अॅबिसीनीयन, कब्ती, रोमन, पर्शियन आणि इतर अनेक भाषांतर उत्तम प्रभुत्व मिळविले होते. त्यांचे हस्ताक्षरदेखील अतिशय सुरेख होते. शिवाय कलाकुसरीच्या कामात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. अंकगणित आणि भूमिती शास्त्रात त्यांनी बरेच संशोधन केले होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) त्यांच्यातील या सर्व विषयांच्या प्राविण्यामुळे त्यांचा खूप लाड पुरवीत असत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांवर अवतरित होणारे दिव्य कुरआन लिहिण्याची कामगिरी देखील त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती.(संदर्भ : मुस्नदे अहमद)
‘बदर’च्या रणांगणावरील इस्लाम आणि इस्लामविरोधी शक्तीदरम्यान हिजरी सन २ मधील रमजान महिन्यात झाले. धर्मयुद्धात सहभागी होण्याकरिता वयार्ची पंधरा वर्षे पूर्ण होण्याची अट प्रेषितांनी लावली होती. परंतु धर्मयुद्धाने प्रेरित झालेले माननीय झैद(र.)हे आपल्या सवंगड्यांना घेऊन प्रेषितदरबारी हजर झाले आणि युद्धात सहभागी होण्याची परवानगी देण्याची विनंती केली. परंतु आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ओहदच्या धर्मयुद्धात आपल्या युद्धकौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याबरोबर बर्याच युद्धांत आपले कौशल्य दाखविले. तबूकच्या युद्धात त्यांनी अभूतपूर्व कौशल्य दाखविले. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वयात आदरणीय प्रेषितांनी त्यांना लष्कर प्रमुखपदसुद्धा दिले.
माननीय उमर फारुक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात ते मदीना शहराचे न्यायाधीश होते. एकदा इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)आणि ‘उबै बिनकआब(र.)’ यांच्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले. त्यांचे मतभेद प्रकरण माननीय झैद(र.)यांच्या न्यायालयात दाखल झाले. माननीय उमर फारुक(र.)हे इस्लामी शासक असल्याने माननीय झैद(र.)यांनी त्यांना विशेष आसनाची व्यवस्था केली आणि माननीय उबै बिन कआब(र.)हे सामान्य आसनावर बसले. ही विशेष व्यवस्था पाहून माननीय उमर(र.)खूप नाराज झाले आणि माननीय झैद(र.)यांना म्हणाले, ‘‘न्यायालयात राजा आणि प्रजेदरम्यान असा कोणताच भेद असेलला मी खपवून घेणार नाही आणि ते माननीय उबै बिन कआब(र.)यांच्या बाजूला जाऊन बसले.
माननीय उमर फारुक(र.)यांना माननीय झैद(र.)यांच्या कार्यकौशल्यावर खूप विश्वास होता. ते मक्का शहरी पवित्र हज यात्रेस गेल्यावर माननीय झैद(र.)यांच्यावरच इस्लामी शासनाची जवाबदारी सोपवून गेले होते. शिवाय शासकीय कारभाराचे इस्लामी नियम आणि कायदेकानू तयार करण्यात त्यांनी खूप हातभार लावला. शासकीय वेतनश्रेणी आणि आर्थिक व्यवस्थेचे उत्तम नियम त्यांनी घालून देण्यास मदत केली.
हिजरी सन २४ मध्ये माननीय उमर(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय उस्मान(र.)यांनी इस्लामी शासनाची धुरा सांभाळली, तेव्हासुद्धा त्यांनी इस्लामी राज्यकारभारास भरपूर मदत केली. माननीय उस्मान(र.)सुद्धा त्यांचा खूप आदर करीत असत.
माननीय उस्मान(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय अली(र.)यांनी हाती इस्लामी शासनाची धुरा सांभाळली. त्यांच्या काळातही माननीय झैद बिन साबित(र.)यांनी इस्लामी शासनाची आजीवन सेवा केली.
माननीय झैद(र.)यांना असलेल्या धर्मज्ञानाच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हे स्वतः म्हणत की, इस्लामच्या अनिवार्य कर्माचे सर्वांत जास्त ज्ञान झैद(र.)यांना आहे. वारसाहक्क विधीतील अतिशय कठीण ज्ञानावर त्यांना कमालीचे प्रभुत्व होते. प्रेषितांच्या काळातसुद्धा ते धर्मविधीच्या विविध विषयांवर फतवे देत असत. माननीय उमर फारुक(र.)यांनी मदीना शहरात त्यांची उपस्थिती अगदी अनिवार्य समजली होती. त्याचप्रमाणे माननीय झैद(र.)यांना दिव्य कुरआन, प्रेषितवचने आणि धर्माविधी तत्त्वज्ञानातही पारंगत होते. एवढेच नव्हे तर कुरआनच्या पठनातील उच्चारशास्त्रातही ते कुशल हते. त्यांच्याकडून एकूण ९२ प्रेषितवचने कथन करण्यात आली आहेत.
माननीय झैद(र.)शुद्ध आचरणाचे व्यक्ती होते. त्यांच्या नीतिमत्ता ग्रंथाच्या पानावर इस्लाम स्वीकारण्यातील पुढाकार, ज्ञानार्जनाचा छंद, प्रेषितावरील अपार प्रेम, प्रेषित जीवनचरित्राचे अनुकरण, सत्यवचन आणि नम्रता हे विशेष गुणधर्म स्पष्टपणे आढळतात. त्यांनी जीवनाचा अधिकांश काळ प्रेषितांच्या सोबत व्यतीत केला. सकाळी उठून ते प्रेषितांकडे जात असत. आदरणीय प्रेषितसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करीत असत. त्यांना आपल्याजवळ बसवीत असत. ‘ज्यू’ लोकांकडून होणारा इब्रानी भाषेतील पत्रव्यवहार तेच हाताळत असत. आदरणीय प्रेषितांच्या आदेशामुळेच त्यांनी इब्रानीसह अनेक भाषा अवगत केल्या होत्या.
प्रेषित जीवनाच्या नियमांचा माननीय झैद(र.)अगदी काटेकोरपणे अनुकरण करीत आणि इतरांनाही याचे नियम शिकवीत असत. प्रेषित जीवनाच्या नियमांविरुद्ध कोणाचेही कर्म ते मुळीच खपवून घेत नसत. एके दिवशी आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तीन गोष्टी मुस्लिम माणसाच्या अंतःकरणास चैतन्य प्रदान करतात. प्रथम हे की, प्रत्येक कार्य ईशप्रसन्नतेखातरच करावे. द्वितीय हे की, शासकांना सत्यनिष्ठेचा आग्रह करावा, तृतीय हे की, संघटित राहावे.
माननीय झैद(र.)यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ते सर्वांनाच मोठ्या आनंदाने, प्रेमपूर्वक व आस्थेने भेटत असत. कोणत्याही लहान-मोठ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत असत. आपल्या ज्ञानावर कधीच गर्व करीत नसत. विद्येबरोबरच त्यांच्यात विनयशीलता होती. अशा या अत्यंत महान आणि सूज्ञ इस्लामी विद्वानाचे जीवनचरित्र आपल्यासाठी मोठाच बोधात्मक उपदेश आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी हिजरी सन ४६ मध्ये हे महान विद्वत्ता, ज्ञान-विज्ञानाचा अभूतपूर्व खजिना संपूर्ण मानवजातीस देऊन परलोकी प्रवासास निघाला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget