Latest Post

महेका करते हैं फूल काटों की ही हिफाजत में
वर्ना फुलों में महेकने की जुर्रत ना होती
मुलींचे संगोपन हे फुलांच्या संगोपनासारखेच असते. अल्लाहने त्यांच्या आजूबाजूला एक मजबूत सुरक्षा कवच तयार केलेले आहे. लग्नाअगोदर वडिल तिच्या सुरक्षेकडे प्राणपणाने लक्ष देतात आणि लग्नानंतर ही जबाबदारी पतीवर येते. आजकाल लग्नाअगोदर ज्या मुली वाममार्गाला जात आहेत त्यांच्यामध्ये अश्‍लिलता आणि अर्धनग्न राहून आपल्या स्त्रित्वाची ओळख स्वतःहून विसण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुरूषांसारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे बोलणे-वागणे, अपरिचित पुरूषांशी धाडसाने बेधडक संबंध स्थापित करणे, शृंगार करून कमी कपड्यात सार्वजनिक ठिकाणी व पार्ट्यांमध्ये वावरणे, आपल्या नखर्‍याने मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे हा सारा निर्लज्जपणा आज  समाजातील अनेक महिला/तरूणींमध्ये वाढलेला आहे. त्याचा वाईट परिणाम रोज कुठल्या ना कुठल्या वाईट बातमीच्या स्वरूपाने समाजासमोर येत आहे. तरी परंतू बहुतांशी लोक या बातम्यांपासून काही बोध घेत असल्याचे दिसून येत नाही. आपल्या किंवा अन्य जातीच्या मुलांबरोबर मुस्लिम मुलींचे पळून जाण्याचे प्रकार अलिकडे वाढलेले आहेत. हे याचसाठी होत आहे की, संबंधित मुलींचे वडील हे आपल्या मुलींच्या सर्वांगीण सुरक्षिततेबाबत पुरेसे लक्ष देत नाहीयेत. त्यांनीही बदलत्या काळाप्रमाणे आपल्या मुलींना आवश्यकतपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलेले आहे. असेही शक्य आहे की मुलींच्या उच्चशिक्षणाला नजरेसमोर ठेउन त्यांच्याकडून मुलींच्या समजूतदारपणावर विश्‍वास ठेवला जात असेल. असेही शक्य आहे की मुली उच्चशिक्षित झाल्याने त्यांच्यामध्ये पुरेसा आत्मविश्‍वासही निर्माण होतो. स्वतःच्या भविष्याबद्दल त्या स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतात. या भावनेतूनही ते आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची जास्त काळजी करत नसावेत, ती अबला नसून सबला आहे, आधुनिक मुलगी आहे, स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते म्हणून तिच्या सुरक्षिततेबद्दल वडिल फारसे लक्ष देत नसावेत आणि इथेच ही वडिलधारी मंडळी चुकत आहे. त्यांचा निष्काळजीपणा आणि जबाबदारी न उचलण्याची प्रवृत्ती आणि या सर्वांपेक्षा जास्त शरीयतने स्त्रीयांबाबत दिलेल्या आचारसंहितेची अवहेलना करण्याची हिम्मत या सर्व गोष्टींचे एकत्रित परिणाम अनेक मुलींना भोगावे लागत आहेत. सभ्यपणाच्या मुखवट्याआड टपून बसलेल्या लांडग्यांच्या तावडीत अशा बर्‍याच मुली सापडत आहेत. अनेक मुलींचे भौतिक शिक्षण जरी उच्च दर्जाचे होत असले तरी धार्मिक शिक्षण मात्र जेमतेमच असल्यामुळे ज्या गोष्टी लग्नानंतर करावयाचे निर्देष शरियतने दिलेले आहेत, त्याचे पालनही बर्‍याच मुलींकडून केले जात नाही. त्या प्रेमामध्ये आंधळ्या होवून मुलांच्या भूलथापांना बळी पडून शरियतने घालून दिलेल्या मर्यादांचे लग्नापूर्वीच उल्लंघन करीत आहेत.
    समाजात अशाही घटना दृष्टीगोचर होत आहेत की, अनेक तरूण लग्नकरून आपल्या तरूण पत्नीची सुरक्षा करण्याची जबाबदारी विसरून लग्नानंतर काही दिवस सोबत राहून कमाई करण्याच्या नादात विदेशात निघून जात आहेत व तेथून फक्त मोबाईलवर बोलून पत्नीचे समाधान करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पत्नी आपल्या सासुरवाडीतच राहत असेल तर ती आपल्या सासू-सासर्‍यांचे फारसे ऐकत नाही. त्यांच्याशी पटत नसल्याचे कारण सांगून स्वतःच्या माहेरी किंवा स्वतंत्र राहते. नवर्‍याकडून येत असलेला पैसा आणि नको तेवढे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अनेक महिला त्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून वाममार्गाला लागत असल्याचे एकंदरित चित्र आहे. त्यातल्या त्यात धार्मिक शिक्षणाचा जर अभाव असेल तर अशा महिलांचे पाय चुकीच्या मार्गाकडे वळण्याची जास्त शक्यता असते. शिवाय वाममार्गासाठी समाजामध्ये आधिपासूनच पोषक असे वातावरण असल्यामुळे अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. स्पष्ट आहे यात चूक पतीची आहे. लग्न झाल्याबरोबर पत्नीच्या संरक्षणाची सर्वांगीण जबाबदारी आपल्यावर येते, हीच गोष्ट अनेक तरूण विसरतांना दिसून येत आहेत. त्यातूनच अशा चुकीच्या घटना घडत आहेत.
    शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की, या सर्व परिस्थितीचा अंतिमतः वाईट परिणाम स्त्रीवरच होतो. अनेकवेळा गुंतागुंत निर्माण होऊन स्त्रीयांंचा एक तर बळी जातो किंवा त्या आत्महत्या करतात. जी मुलगी फुलासारखी होती. लग्नानंतर केवळ तिचे योग्य संरक्षण न केल्या गेल्यामुळे तिची अवस्था बिना काट्याच्या गुलाबासारखी होवून जाते, जिच्यापर्यंत कोणाचाही हात सहज पोहोचतो. एकंदरित कमाई करण्यासाठी जातांना एकतर लग्न करू नये किंवा केल्यास विदेशात जाण्याचा विचार सोडून आपल्याच देशात जे काही उपजिविका मिळेल त्यावर समाधान मानावे. यातच त्यांचे स्वतःचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि समाजाचे हित निहित आहे.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

’फतवा’ म्हणजे इस्लामी शरीअतचा एक धर्मशास्त्रीय दृष्टीकोन. परंतु काहीजण याला धार्मिक न्यायालयाचा आदेश समजतात. याचे कारण हे आहे की काही हास्यास्पद फतव्यांचा प्रचार केला जातो. ज्यामुळे जनसामान्यात ही धारणा निर्माण झाली की अधिकांश मुसलमान अशा प्रकारचे फतवे मान्य करतात आणि त्यांचे पालनही करतात. वास्तविक सामान्य मुसलमानांपैकी खूप कमी असे आहेत जे मुफ्तीजवळ एखाद्या प्रकरणासंबंधी कायद्याचा सल्ला घेण्यासाठी जातात.
    एखादा फतवा विचित्र आणि न्यायमूल्यांशी विसंगत वाटला तरीसुद्धा. तथापि त्यात असा विवाद निर्माण व्हायला नको, ज्या प्रकारचा विवाद आज दिसून येत आहे. मीडिया (प्रसारमाध्यमे) विलक्षण आणि मुर्खतापूर्ण गोष्टींच्या शोधात असतो आणि याद्वारे तो इस्लामी धार्मिक संस्थांच्या प्रतिमेला गालबोट लावू इच्छितो, म्हणूनच तो अशा प्रकारच्या दस्तावेजांवर तुटून पडतो आणि त्यासंबंधी आरडा ओरड करतो. देशात सहस्त्रावधी मदरसे आहेत आणि या मदरशांमध्ये विवाद मिटविणार्‍या कमेट्यादेखील आहेत, तेव्हा त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खटल्या संदर्भात अनेक प्रकारचे धार्मिक दृष्टीकोन येऊ शकतात. विचित्र बाब ही की मीडिया काही फतव्यांनी उराशी कवटाळून त्याला निर्णायक रूप देतो आणि मग त्याला रूढिवादाचा नमूना म्हणून सादर करतो. याहून क्लेशदायक बाब ही की लोकांच्या मते अधिकांश मुसलमान अशा धार्मिक सल्ला-मसलतींशी अत्याधिक ओढ राखतात. ही गोष्ट योग्य पार्श्‍वभूमीत समजून घेण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की फतवा म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निकाल नव्हे. हा केवळ धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आहे. इंग्रजीचा एक विश्‍वकोष ’ए शॉर्टर इन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम’ फतव्याची व्याख्या अशा प्रकार करतो;(अनुवाद) ”हा मुफ्तीद्वारे दिलेला एक औपचारिक कायदेशीर दृष्टीकोन आहे, जो एखाद्या न्यायाधीशाने किंवा एखाद्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून आहे.”फतवे केवळ दृष्टीकोनाचे स्थान राखतात आणि हे कुणावर बंधनकारक नसतात. यांना मान्यही केले जाऊ शकते आणि अस्विकृतही केले जाऊ शकते. ज्या लोकांकडे या दृष्टिकोनाची विचारणा केली जाते. तेदेखील फतवा मानण्यावर किंवा त्याचे पालन करण्यावर आग्रह धरत नाही. ते स्वतः म्हणतात की तुम्ही वाटेल तसे याला मान्यही करू शकतात आणि अमान्यही करू शकतात. जे लोक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देतात, ते धार्मिक संस्थांकडून धर्मशास्त्रांसबंधीचे मार्गदर्शन घेतात आणि जेव्हा ते यांना स्वभावतः परस्पर विरोधी असल्याचे पाहतात तेव्हा त्यांना नवल वाटत नाही.

माननीय इब्ने अब्बास यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने अल्लाहकडे बोलविणाऱ्या (मुअ़िज़्जन) चा आवाज ऐकला आणि त्याला त्या आवाजाकडे   जाण्यापासून रोखणारा त्याच्याकडे बहाणाही नसेल तर त्याने एकट्याने अदा केलेली ती नमाज (अंतिम निवाड्याच्या दिवशी) मान्य केली जाणार नाही.’’
लोकांनी त्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘बहाण्याचा अर्थ काय? आणि कोणकोणत्या बाबी बहाणा बनू शकतात?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘भय आणि आजारपण.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
प्राण जाण्याचे ‘भय’. एखाद्या शत्रूमुळे अथवा एखादे श्वापद आणि सापामुळे आणि मस्जिदपर्यंत जाता येणे शक्य नाही असे ‘आजारपण’. वादळी वारा, पाऊस आणि नेहमीपेक्षा अधिक  थंडीदेखील बहाणा बनू शकते. परंतु थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा बहाणा केला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्ण विभागांत कधी कधी अधिक थंडी पडते आणि ती त्यांच्या जीवावर  उठण्याची शक्यता असते, अशी थंडी बहाणा बनू शकते. अशाप्रकारे त्या वेळी मनुष्याला कमी-अधिक प्रमाणातील शौच अथवा लघुशंकेची आवश्यकता भासल्यास तेदेखील बहाणा ठरू शकते.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात) आमची स्थिती अशी होती की आजारी व्यक्ती आणि धर्मद्रोही व्यक्तीव्यतिरिक्त  आमच्यापैकी कोणी सामूहिक नमाज चुकवित नव्हता आणि त्या धर्मद्रोही व्यक्तीचे वैमनस्य माहीत होते. तसेच (त्या काळात लोकांची स्थिती अशी होती की) आजारी असूनही काहीजण  दोन माणसांचा आधार घेऊन मस्जिदमध्ये पोहचत होते आणि सामुस्रfयक नमाज अदा करीत होते. अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांनी याबाबतीत सांगितले की, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला ‘सुन्नतुल-हुदा’ शिकविल्या. (‘सुन्नतुलहुदा’ म्हणजे मुस्लिम जनसमुदायाला अनुसरण्यास सांगण्यात आलेल्या आणि कायद्यात्मक दर्जा प्राप्त असलेल्या पैगंबराचरण  पद्धती. या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ज्या मस्जिदीतून अजान दिली जाते त्या मस्जिदीत नमाज अदा करणे होय.) अशीही एक ‘रिवायत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून  ऐकलेली गोष्ट त्यांच्याच शब्दांत इतरांना सांगणे) आहे की त्यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला ही गोष्ट पसंत असेल की त्याची आज्ञापालन करणाऱ्या भक्ताच्या स्वरूपात भविष्यात  अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहशी भेट होईल तेव्हा त्याने त्या पाच नमाजींची देखरेख केली पाहिजे आणि त्या नमाजी मस्जिदमध्ये सामूहिकरीत्या अदा केल्या पाहिजेत कारण  अल्लाहने तुमच्या पैगंबरांना (मुहम्मद (स.) यांना) ‘सुन्नते हुदा’चे प्रशिक्षण दिले आहे आणि या नमाजी ‘सुन्नते हुदा’पैकी आहेत आणि जर तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा कराल,  जसे- हे धर्मद्रोही लोक आपल्या घरांमध्ये नमाज अदा करतात, तर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या (मुहम्मद (स.) यांच्या) आचरण पद्धती सोडून द्याल आणि जर तुम्ही आपल्या  पैगंबरांच्या आचरण पद्धती सोडल्या तर सरळमार्ग विसरून जाल.’’ (हदीस : मुस्लिम)

- सुलतान अहमद इस्लाही
    आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.
    आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तीऋा वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.

आयएमपीटी अ.क्र. 163  -पृष्ठे - 16      मूल्य - 07      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/yjlpftm96q3hcynqtrgagyvnt4xj4rgg

Truth
आम्हीम्ही कधीच हा दावा केलेला नाही आणि आमच्यामध्ये जोपर्यंत थोडीफार समज असेल तोपर्यंत मुळीच हा दावा करू शकणार नाही की, फक्त आमचीच संघटना सत्य मार्गावर आहे आणि जे आमच्या संघटनेमध्ये नाहीत ते सत्यमार्गावर नाहीत. आम्ही कधीच लोकांना आमच्या संघटनेकडे बोलाविलेले नाही. आम्ही तर बोलावतो फक्त त्या कर्तव्याकडे जे कर्तव्य एक मुस्लिम असल्याच्या नात्याने आमच्या आणि तुमच्यावर समानपणे लागू आहेत. जर आपण आधिपासूनच ते कर्तव्य पार पाडत असाल तर आपण सत्य मार्गावर आहात. मग आपण आमच्यासोबत मिळून ते काम करा किंवा स्वतंत्रपणे करा. परंतु ही गोष्ट कुठल्याही पद्धतीने मान्य होण्यासारखी नाही की तुम्ही स्वतःही उठणार नाही आणि जे उठलेले आहेत त्यांचीही साथ देणार नाही. आणि वेगवेगळी कारणे सांगून धर्माच्या स्थापनेपासून आणि लोकांना धर्माची साक्ष देण्याच्या जबाबदारीपासून तोंड लपवाल किंवा आपली शक्ती त्या कामात लावाल ज्यामुळे इस्लामऐवजी दुसरीच कुठलीतरी व्यवस्था स्थापित होत असेल आणि इस्लाम ऐवजी कुठल्या दुसर्‍याच गोष्टीची आपण साक्ष देत असल्याची ग्वाही आपल्या वर्तनामुळे मिळत असेल. हे प्रकरण एखाद्या भौतिक गोष्टीसंबंधी असते तर कदाचित तुमचे हिले-बहाने चालले असते. परंतु हे प्रकरण त्या अल्लाहशी संबंधित आहे जो की तुमच्या मनामधील गोष्टीसुद्धा जाणतो. त्याला कुठल्याही युक्तीने धोका देता येत नाही.
    याबाबतीत कुठलाच संशय नाही की, या एकाच उद्देशासाठी आणि एकाच कामासाठी अनेक संघटना बनविणे सकृतदृष्ट्या चुकीचे वाटत असेल आणि म्हणून या संघटनेमध्ये फूट पडण्याचीही भीती वाटत असेल. परंतु जेव्हा इस्लामी व्यवस्था उध्वस्त झालेली दिसत असेल तर अशा परिस्थितीत प्रश्‍न फक्त त्या व्यवस्थेला चालविण्याचाच नाही तर तिच्या पुनर्स्थापनेचा प्रश्‍न समोर असेल तर हे शक्यच नाही की अगदी सुरवातीलाच अशा प्रकारची एकच संघटना बनू शकेल की जिच्यामध्ये मुस्लिम समाजातील सगळेच लोक सामील होतील, ज्या संघटनेमध्ये सामील होणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य होईल आणि जिच्यापासून विलग राहणार्‍यांना पथभ्रष्ट आणि केवळ संघटनेत न आल्यामुळे धर्मभ्रष्ट मानले जाईल.
    कामाच्या सुरूवातीला याशिवाय कुठला दुसरा मार्ग नाही की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना या कार्यासाठी तयार व्हाव्यात आणि आपापल्या पद्धतीने त्यांनी कामं करावीत. शेवटी या सर्व संघटना एकच होतील, तेव्हा जेव्हा त्या खरोखरच स्वार्थी नसतील आणि खर्‍या मनाने इस्लामच्या पुनर्स्थापनेच्या उद्देशासाठी इस्लामी पद्धतीनेच काम करत असतील. सत्यमार्गावर चलणारे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. सत्य त्यांना एकत्र केल्याशिवाय राहत नाही. कारण सत्याची प्रवृत्तीच अशी आहे की तो आपल्या मानणार्‍यांना एकत्र जोडतो. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना उत्पन्न करतो आणि अशा बेमालुपणे एका रंगात रंगतो की, सगळ्या संघटना शेवटी एक रंग होवून जातात. फूट तर केवळ त्याचवेळेस पडते ज्यावेळेस सत्याच्या सोबत काही ना काही असत्याची भेसळ असते किंवा वरून प्रदर्शन फक्त सत्याचे असते आणि आतून असत्य मार्गाची कास धरलेली असते.
    आता मी थोडक्यात हे ही स्पष्ट करू इच्छितो की, जे लोक आमच्या संघटनेला पसंत करतात आणि तिच्यामध्ये येतात, त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे कुठले काम आहे? आमच्या संघटनेतील सदस्यांकडे आमची मागणी बिल्कुल तीच आहे जी इस्लामची मागणी प्रत्येक मुस्लिमांकडून आहे. आम्ही इस्लामच्या मागणीपासून यत्कींचितही दूसरी कुठली मागणी वाढवू इच्छित नाही किंवा कमी करू इच्छित नाही. आम्ही प्रत्येक व्यक्तीसमोर इस्लामला कुठल्याही प्रकारची काटछाट न करता सादर करतो आणि त्याला सांगतो की, या व्यवस्थेला जाणून-बुजून, समजून -उमजून स्वीकार करा. हा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो त्या योग्य पद्धतीने अदा करा. आपले विचार, आपल्या मनातील गोष्टी आणि आपले कार्य यामधून त्या सर्व गोष्टी काढून फेकून द्या ज्या की, इस्लामी आदेश आणि त्याच्या आत्म्याच्या विरूद्ध असतील, आणि जगाला कळू द्या की तुमचं पूर्ण जीवन मूर्तीमंत इस्लाम आहे. तुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे. बस्स हेच आमच्या संघटनेमध्ये सामील होण्याचे शुल्क आहे आणि हाच आमच्या संघटनेच्या सदस्यत्त्वाचा नियम आहे. आमची संघटना, आमच्या संघटनेचे नियम आणि प्रत्येक ती गोष्ट जिच्याकडे आम्ही दुसर्‍यांना बोलावितो सगळ्यासमोर इतक्या स्पष्ट आहेत की, प्रत्येक व्यक्ती त्याचे विश्‍लेषण करून हे स्वतः हे ठरवू शकतो की, आम्ही खर्‍या इस्लाममध्ये, म्हणजे त्या इस्लाममध्ये ज्याचा पाया कुरआन आणि सुन्नाह आहे, यात काही कमी केलेले नाही आणि यात काही वाढविलेले नाही. आणि आम्ही प्रत्येक क्षणी या गोष्टीसाठी तयार आहोत की कोणी आमच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये अशी कुठलीही गोष्ट दाखवेल जी की कुरआन आणि सुन्नतच्या आदेशांपेक्षा वेगळी असेल तर आम्ही तात्काळ त्या गोष्टीला आमच्यामधून काढून टाकू. आणि ज्या गोष्टीच्या बाबतीत आम्हाला कोणी दाखवून देईल की, अमुक एक गोष्ट कुरआन आणि सुन्नतच्या शिकवणीमध्ये सामील आहे आणि आमच्या संघटनेमध्ये नाही तर कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता आम्ही ती गोष्ट स्विकारू. कारण की आम्ही उठलोच यासाठी की इस्लामला पूर्णपणे, त्यात कुठलीही गोष्ट कमी किंवा जास्त केल्याशिवाय, पुनर्स्थापित करू आणि त्याचीच साक्ष देऊ. जर आम्ही हे करू शकत नसू, तर आमच्यापेक्षा मोठा अत्याचारी आणि पाखंडी कोण असेल?

शदाद बिन औस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याने दाखविण्यासाठी नमाज अदा केली त्याने ‘शिर्क’ केले (अनेकेश्वरत्व अवलंबिले) आणि ज्याने  दाखविण्यासाठी रोजा ठेवला त्याने ‘शिर्क’ केले आणि ज्याने दाखविण्यासाठी ‘सदका’ (दानधर्म) केले त्याने ‘शिर्क’ केले.’’ (हदीस : मुस्नद अहमद)

स्पष्टीकरण
या शिकवणीद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) हे सांगू इच्छितात की प्रत्येक पुण्याईचे कार्य अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असावे. असे कार्य करण्यापूवी असा संकल्प (नियत) असावा की ‘‘हा माझ्या स्वामीचा आदेश आहे आणि मला त्याच्याच प्रसन्नतेची काळजी आहे.’’ दुसऱ्यांच्या दृष्टीने सदाचारी बनण्यासाठी आणि त्यांना खूश करण्यासाठी जे पुण्याचे काम  केले जाईल त्यास कसलेही मूल्य नसते. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच्या संकल्पासह करण्यात आलेल्या कार्यालाच किंमत असते.

सामूहिक नमाज
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे. मूळ हदीसमध्ये ‘फ़ज्ज’ हा शब्द आला आहे, याचा अर्थ आहे ‘अलिप्त राहणे’. सामूहिक (जमाअतसह) नमाजमध्ये सर्व प्रकारचे  मुस्लिम सहभागी असतात. श्रीमंत, गरीब, चांगले कपडे परिधान करणारे आणि फाटके कपडे परिधान करणारेदेखील. ज्या लोकांमध्ये मोठेपणाची घमेंड असते आणि संपत्तीच्या नशेत   धुंद असतात त्यांना त्यांच्याबरोबर दुसरा कोणी उभे राहणे आवडत नाही, म्हणून ते नमाज आपल्या घरात अदा करतात. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या रोगाचा इलास असा सांगितला   आहे, ‘‘सामूहिक नमाज अदा करा, आपल्या घरात अथवा मस्जिदमध्ये एकट्याने नमाज अदा करू नका.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
त्याचप्रमाणे सामान्यत: सामूहिक नमाज अदा करताना ‘शैतानी’ (वाईट) विचार कमी निर्माण होतात आणि मनुष्याचा अल्लाहशी संबंध दृढ होतो. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानुसार सामूहिक नमाज अदा करण्याचा दर्जा २७ पटींनी अधिक असतो. हीच हकीकत पुढील हदीस (५३) मध्ये उद्धृत करण्यात आली आहे.

माननीय अबी बिन कअब यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुसऱ्या मनुष्याबरोबर अदा करणाऱ्या मनुष्याची नमाज, त्याने एकट्याने अदा केलेल्या नमाजच्या  तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याचे कारण बनते. दोन मनुष्यांबरोबर अदा केलेली नमाज, एका मनुष्याबरोबर अदा केलेल्या नमाजच्या तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याची  सबब बनते. तसेच अधिक संख्येत असलेल्या लोकांसह अदा केलेली नमाज अल्लाहला अधिक पसंत आहे. (तितका अधिक अल्लाहशी संबंध दृढ होईल.)’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, ज्या वस्तीत अथवा गावात तीन मुस्लिम असतील आणि तेथे सामूहिक (जमाअतसह) नमाज अदा केली जात नसेल तर त्यांच्यावर  शैतान प्रभुत्व प्राप्त करतो. तेव्हा सामुस्रfयक नमाज अदा करण्याची स्वत:वर सक्ती करा कारण कोल्हा फक्त त्या शेळीला खातो जी आपल्या चरण्याच्या ठिकाणापासून आणि आपल्या  
कळपापासून वेगळी झालेली असते. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये ही हकीकत व्यक्त करण्यात आली आहे की सामूहिक नमाज अदा करणाऱ्यांवर अल्लाहची कृपावृष्टी होते आणि तो त्यांचे रक्षण करतो, परंतु जेथे ‘जमाअत’सह नमाजचे  आयोजन केले जात नाही तेव्हा अल्लाह आपला रक्षण आणि देखरेखीचा हात काढून घेतो आणि ते लोक शैतानाच्या ताब्यात जातात. मग ते शैतानाला पाहिजे तसे बळी पडतात आणि  हव्या त्या मार्गाने नेतो. जसे- शेळ्यांचा कळप आपल्या कुरणाजवळ असतात तेव्हा दोन प्रकारच्या संरक्षणात असतात, एक मालकाच्या संरक्षणातमुळे आणि दुसरे त्या शेळ्या एकत्रित  असल्याकारणाने (एकता). या दोन्ही कारणांमुळे कोल्हा त्यांची शिकार करू शकत नाही. परंतु जर एखादी मूख शेळी आपल्या मालकाच्या इच्छेविरूद्ध कुरणातून बाहेर पडून मागे राहिली  अथवा पुढे गेली तर अतिशय सहजतेने कोल्हा तिची शिकार करतो, कारण आता ती दुर्बलही आहे आणि मालकाच्या संरक्षणापासूनही स्वत:ला वंचित करून घेतले आहे.

- सय्यद हामिद अली
    या पुस्तकात नास्तिक व अनेकेश्वरवादीच्या विचार सरणीवर चर्चा करण्यात आली आहे. या दोन्ही विचार सरणी सृष्टीतील वस्तुंच्या सामर्थ्यांनी प्रभावित होऊन जन्मल्या आहेत. याउलट एकेश्वरत्वाची विचारसरणी मुळात सृष्टीतील प्रत्येक शक्तीचा इन्कार करण्यावर आधारित आहे. ज्ञानविज्ञान व पाश्चात्य इतिहास जाणकारांना चांगले माहित आहे की इस्लामचा एकेश्वरत्व आणि मुस्लिमांच्या ज्ञानविज्ञान व संशोधनामुळेच युरोप आज प्रगत आहे.
    एकेश्वरत्वाने कोणत्याही अजस्त्र वस्तूला देव मानले नाही आणि त्याची पूजा केली नाही ती भीती बाळगली नाही. उलट निर्भयपणे त्यावर संशोधन केले, अंधश्रद्धा नष्ट केल्या आणि विज्ञान व संशोधनात अभूतपूर्व कामगिरी केली. या उलट चित्र दुसरीकडे सापडते.

आयएमपीटी अ.क्र. 162     -पृष्ठे - 32    मूल्य - 18       आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8e3uf39lokpfz484om9jb94eod4aiyoh

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget