Latest Post

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणी ‘इमामत’ (नमाजचे नेतृत्व) करील तेव्हा (परिस्थितीचा अंदाज घेऊन  आणि नमाजींचा विचार करून) नमाज आटोपती घ्यावी कारण तुमच्या मागे दुर्बलही असतील, आजारी आणि वृद्ध लोकदेखील. परंतु जेव्हा तुमच्यापैकी एखादा एकट्याने आपली नमाज  अदा करीतअसेल तर तो नमाजकरिता हवा तेवढा अवधी अधिक देऊ शकतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू मसऊद अन्सारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘अमुक इमाम फङ्काची नमाज दीर्घकाळ पढवितो  त्यामुळे सकाळच्या सामुदायिक नमाजमध्ये मी उशिरा पोहचतो.’’ (अबू मसऊद म्हणतात,) मी यापूर्वी एखाद्या प्रवचनात अथवा भाषणात पैगंबर मुहम्मद (स.) यांना एवढा राग आलेला   पाहिला नाही जेवढा त्या दिवशीच्या भाषणात पाहिला. पैगंबर म्हणाले, ‘‘हे लोकहो! तुमच्यापैकी काही नमाजचे नेतृत्व करणारे अल्लाहच्या भक्तांना अल्लाहची उपासना करण्यापासून  भटकवितात. (खबरदार!) तुमच्यापैकी जो कोणी नमाजचे नेतृत्व करतील त्यांनी नमाज संक्षिप्त करावी, कारण त्यांच्या मागे वृद्धही असतील, मुलेही असतील आणि कामधंद्यासाठी  निघणारे गरजवंतदेखील.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैह)

स्पष्टीकरण
‘नमाज संक्षिप्त करावी’ म्हणजे उलटसुलट, घाईघाईत नमाज अदा करणे अथवा पढविणे आणि चार रकअत नमाज दीड मिनिटांत पूर्ण करणे ही इस्लामची नमाज नाही. निश्चितच  नमाजींचा आणि काळ व स्थितीचा अवश्य मर्यादित आदर केला गेला पाहिजे.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मुआज बिन जबल (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर (‘मस्जिद-एनबवी’मध्ये ‘नफ्ल’ (अनिवार्य नसलेली– ऐच्छिक) नमाज अदा करीत आणि मग आपल्या समुदायाची इमामत करीत असत. त्यांनी एके रात्री इशाची नमाज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासह अदा केली आणि मग आपल्या समुदायाची इमामत केली  आणि ‘सूरह बकरा’चे पठण सुरू केले तेव्हा एका मनुष्याने नमाज समाप्त केली आणि वेगळी आपली नमाज अदा करून घरी गेला. दुसऱ्या नमाजींनी (नमाज अदा केल्यानंतर) त्याला  म्हटले, ‘‘तू विद्रोहाचे काम केले.’’ तो म्हणाला, ‘‘नाही. मी धर्मद्रोहाचे काम केलेले नाही. अल्लाहची शपथ! मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे जाईन. (आणि मुआज यांच्या दीर्घ  नमाजची गोष्ट सांगेन.)’’ मग तो पैगंबरांकडे येऊन म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही उंटांद्वारे शेताला पाणी देण्याचे काम करतो (मजुरीवर लोकांच्या बागा आणि शेतीच्या  सिंचनाचे काम करतो). दिवसभर आमच्या कामात व्यस्त असतो आणि मुआज यांची स्थिती अशी आहे की इशाची नमाज पैगंबरांसमवेत अदा करून गेले आणि सूरह बकराचे पठण सुरू  केले (आम्ही दिवसभर कंटाळलेलो असल्याकारणाने इतका वेळ कसे उभे राहू शकतो)?’’ हे सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ऐकल्यानंतर मुआजकडे वळले आणि म्हणाले, ‘‘हे मुआज!   तुम्ही लोकांमध्ये भांडणे लावू इच्छिता काय? ‘वश्शमसि व जुहाहा’चे पठण करा, ‘वल्ललि इ़जा य़गशा’चे पठण करा, ‘सब्बिहिस्मा रब्बिकल अअला’चे पठण करा.’’

हदीस : बुखारी व   मुस्लिम

- मु. अजहरूद्दीन सिद्धिकी
    समाजातील प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या विकासातील सर्वात मोठा अडसर कृत्रिम विषमता आहे आणि ही समाज विकासात विषाचे काम करते. सत्याचा प्रसार आणि असत्याला प्रतिबंध घालणे या महान कार्यात पुरुषाबरोबर स्त्रीला सुद्धा इस्लाम समान दर्जात्मक कार्य करण्याची शिकवण देतो. समाज नव-निर्माण कार्यात पुरुषाबरोबर स्त्रियां कार्यरत आहेत. इस्लामने स्त्रियांना चार भींतीच्या आत कोंडून ठेवले नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत आणि समान अधिकार बहाल केले आहेत. या विषयीची चर्चा या पुस्तकात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 165       -पृष्ठे - 12   मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2014)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/9k5o900hacdmea5uz20evhfhfhsibvcm

महेका करते हैं फूल काटों की ही हिफाजत में
वर्ना फुलों में महेकने की जुर्रत ना होती
मुलींचे संगोपन हे फुलांच्या संगोपनासारखेच असते. अल्लाहने त्यांच्या आजूबाजूला एक मजबूत सुरक्षा कवच तयार केलेले आहे. लग्नाअगोदर वडिल तिच्या सुरक्षेकडे प्राणपणाने लक्ष देतात आणि लग्नानंतर ही जबाबदारी पतीवर येते. आजकाल लग्नाअगोदर ज्या मुली वाममार्गाला जात आहेत त्यांच्यामध्ये अश्‍लिलता आणि अर्धनग्न राहून आपल्या स्त्रित्वाची ओळख स्वतःहून विसण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुरूषांसारखे कपडे घालणे, त्यांच्यासारखे बोलणे-वागणे, अपरिचित पुरूषांशी धाडसाने बेधडक संबंध स्थापित करणे, शृंगार करून कमी कपड्यात सार्वजनिक ठिकाणी व पार्ट्यांमध्ये वावरणे, आपल्या नखर्‍याने मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे हा सारा निर्लज्जपणा आज  समाजातील अनेक महिला/तरूणींमध्ये वाढलेला आहे. त्याचा वाईट परिणाम रोज कुठल्या ना कुठल्या वाईट बातमीच्या स्वरूपाने समाजासमोर येत आहे. तरी परंतू बहुतांशी लोक या बातम्यांपासून काही बोध घेत असल्याचे दिसून येत नाही. आपल्या किंवा अन्य जातीच्या मुलांबरोबर मुस्लिम मुलींचे पळून जाण्याचे प्रकार अलिकडे वाढलेले आहेत. हे याचसाठी होत आहे की, संबंधित मुलींचे वडील हे आपल्या मुलींच्या सर्वांगीण सुरक्षिततेबाबत पुरेसे लक्ष देत नाहीयेत. त्यांनीही बदलत्या काळाप्रमाणे आपल्या मुलींना आवश्यकतपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिलेले आहे. असेही शक्य आहे की मुलींच्या उच्चशिक्षणाला नजरेसमोर ठेउन त्यांच्याकडून मुलींच्या समजूतदारपणावर विश्‍वास ठेवला जात असेल. असेही शक्य आहे की मुली उच्चशिक्षित झाल्याने त्यांच्यामध्ये पुरेसा आत्मविश्‍वासही निर्माण होतो. स्वतःच्या भविष्याबद्दल त्या स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतात. या भावनेतूनही ते आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची जास्त काळजी करत नसावेत, ती अबला नसून सबला आहे, आधुनिक मुलगी आहे, स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते म्हणून तिच्या सुरक्षिततेबद्दल वडिल फारसे लक्ष देत नसावेत आणि इथेच ही वडिलधारी मंडळी चुकत आहे. त्यांचा निष्काळजीपणा आणि जबाबदारी न उचलण्याची प्रवृत्ती आणि या सर्वांपेक्षा जास्त शरीयतने स्त्रीयांबाबत दिलेल्या आचारसंहितेची अवहेलना करण्याची हिम्मत या सर्व गोष्टींचे एकत्रित परिणाम अनेक मुलींना भोगावे लागत आहेत. सभ्यपणाच्या मुखवट्याआड टपून बसलेल्या लांडग्यांच्या तावडीत अशा बर्‍याच मुली सापडत आहेत. अनेक मुलींचे भौतिक शिक्षण जरी उच्च दर्जाचे होत असले तरी धार्मिक शिक्षण मात्र जेमतेमच असल्यामुळे ज्या गोष्टी लग्नानंतर करावयाचे निर्देष शरियतने दिलेले आहेत, त्याचे पालनही बर्‍याच मुलींकडून केले जात नाही. त्या प्रेमामध्ये आंधळ्या होवून मुलांच्या भूलथापांना बळी पडून शरियतने घालून दिलेल्या मर्यादांचे लग्नापूर्वीच उल्लंघन करीत आहेत.
    समाजात अशाही घटना दृष्टीगोचर होत आहेत की, अनेक तरूण लग्नकरून आपल्या तरूण पत्नीची सुरक्षा करण्याची जबाबदारी विसरून लग्नानंतर काही दिवस सोबत राहून कमाई करण्याच्या नादात विदेशात निघून जात आहेत व तेथून फक्त मोबाईलवर बोलून पत्नीचे समाधान करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत पत्नी आपल्या सासुरवाडीतच राहत असेल तर ती आपल्या सासू-सासर्‍यांचे फारसे ऐकत नाही. त्यांच्याशी पटत नसल्याचे कारण सांगून स्वतःच्या माहेरी किंवा स्वतंत्र राहते. नवर्‍याकडून येत असलेला पैसा आणि नको तेवढे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे अनेक महिला त्या स्वातंत्र्याचा दुरूपयोग करून वाममार्गाला लागत असल्याचे एकंदरित चित्र आहे. त्यातल्या त्यात धार्मिक शिक्षणाचा जर अभाव असेल तर अशा महिलांचे पाय चुकीच्या मार्गाकडे वळण्याची जास्त शक्यता असते. शिवाय वाममार्गासाठी समाजामध्ये आधिपासूनच पोषक असे वातावरण असल्यामुळे अशा घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. स्पष्ट आहे यात चूक पतीची आहे. लग्न झाल्याबरोबर पत्नीच्या संरक्षणाची सर्वांगीण जबाबदारी आपल्यावर येते, हीच गोष्ट अनेक तरूण विसरतांना दिसून येत आहेत. त्यातूनच अशा चुकीच्या घटना घडत आहेत.
    शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की, या सर्व परिस्थितीचा अंतिमतः वाईट परिणाम स्त्रीवरच होतो. अनेकवेळा गुंतागुंत निर्माण होऊन स्त्रीयांंचा एक तर बळी जातो किंवा त्या आत्महत्या करतात. जी मुलगी फुलासारखी होती. लग्नानंतर केवळ तिचे योग्य संरक्षण न केल्या गेल्यामुळे तिची अवस्था बिना काट्याच्या गुलाबासारखी होवून जाते, जिच्यापर्यंत कोणाचाही हात सहज पोहोचतो. एकंदरित कमाई करण्यासाठी जातांना एकतर लग्न करू नये किंवा केल्यास विदेशात जाण्याचा विचार सोडून आपल्याच देशात जे काही उपजिविका मिळेल त्यावर समाधान मानावे. यातच त्यांचे स्वतःचे, त्यांच्या कुटुंबाचे आणि समाजाचे हित निहित आहे.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

’फतवा’ म्हणजे इस्लामी शरीअतचा एक धर्मशास्त्रीय दृष्टीकोन. परंतु काहीजण याला धार्मिक न्यायालयाचा आदेश समजतात. याचे कारण हे आहे की काही हास्यास्पद फतव्यांचा प्रचार केला जातो. ज्यामुळे जनसामान्यात ही धारणा निर्माण झाली की अधिकांश मुसलमान अशा प्रकारचे फतवे मान्य करतात आणि त्यांचे पालनही करतात. वास्तविक सामान्य मुसलमानांपैकी खूप कमी असे आहेत जे मुफ्तीजवळ एखाद्या प्रकरणासंबंधी कायद्याचा सल्ला घेण्यासाठी जातात.
    एखादा फतवा विचित्र आणि न्यायमूल्यांशी विसंगत वाटला तरीसुद्धा. तथापि त्यात असा विवाद निर्माण व्हायला नको, ज्या प्रकारचा विवाद आज दिसून येत आहे. मीडिया (प्रसारमाध्यमे) विलक्षण आणि मुर्खतापूर्ण गोष्टींच्या शोधात असतो आणि याद्वारे तो इस्लामी धार्मिक संस्थांच्या प्रतिमेला गालबोट लावू इच्छितो, म्हणूनच तो अशा प्रकारच्या दस्तावेजांवर तुटून पडतो आणि त्यासंबंधी आरडा ओरड करतो. देशात सहस्त्रावधी मदरसे आहेत आणि या मदरशांमध्ये विवाद मिटविणार्‍या कमेट्यादेखील आहेत, तेव्हा त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खटल्या संदर्भात अनेक प्रकारचे धार्मिक दृष्टीकोन येऊ शकतात. विचित्र बाब ही की मीडिया काही फतव्यांनी उराशी कवटाळून त्याला निर्णायक रूप देतो आणि मग त्याला रूढिवादाचा नमूना म्हणून सादर करतो. याहून क्लेशदायक बाब ही की लोकांच्या मते अधिकांश मुसलमान अशा धार्मिक सल्ला-मसलतींशी अत्याधिक ओढ राखतात. ही गोष्ट योग्य पार्श्‍वभूमीत समजून घेण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की फतवा म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निकाल नव्हे. हा केवळ धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आहे. इंग्रजीचा एक विश्‍वकोष ’ए शॉर्टर इन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम’ फतव्याची व्याख्या अशा प्रकार करतो;(अनुवाद) ”हा मुफ्तीद्वारे दिलेला एक औपचारिक कायदेशीर दृष्टीकोन आहे, जो एखाद्या न्यायाधीशाने किंवा एखाद्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून आहे.”फतवे केवळ दृष्टीकोनाचे स्थान राखतात आणि हे कुणावर बंधनकारक नसतात. यांना मान्यही केले जाऊ शकते आणि अस्विकृतही केले जाऊ शकते. ज्या लोकांकडे या दृष्टिकोनाची विचारणा केली जाते. तेदेखील फतवा मानण्यावर किंवा त्याचे पालन करण्यावर आग्रह धरत नाही. ते स्वतः म्हणतात की तुम्ही वाटेल तसे याला मान्यही करू शकतात आणि अमान्यही करू शकतात. जे लोक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देतात, ते धार्मिक संस्थांकडून धर्मशास्त्रांसबंधीचे मार्गदर्शन घेतात आणि जेव्हा ते यांना स्वभावतः परस्पर विरोधी असल्याचे पाहतात तेव्हा त्यांना नवल वाटत नाही.

माननीय इब्ने अब्बास यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने अल्लाहकडे बोलविणाऱ्या (मुअ़िज़्जन) चा आवाज ऐकला आणि त्याला त्या आवाजाकडे   जाण्यापासून रोखणारा त्याच्याकडे बहाणाही नसेल तर त्याने एकट्याने अदा केलेली ती नमाज (अंतिम निवाड्याच्या दिवशी) मान्य केली जाणार नाही.’’
लोकांनी त्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘बहाण्याचा अर्थ काय? आणि कोणकोणत्या बाबी बहाणा बनू शकतात?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘भय आणि आजारपण.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
प्राण जाण्याचे ‘भय’. एखाद्या शत्रूमुळे अथवा एखादे श्वापद आणि सापामुळे आणि मस्जिदपर्यंत जाता येणे शक्य नाही असे ‘आजारपण’. वादळी वारा, पाऊस आणि नेहमीपेक्षा अधिक  थंडीदेखील बहाणा बनू शकते. परंतु थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा बहाणा केला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्ण विभागांत कधी कधी अधिक थंडी पडते आणि ती त्यांच्या जीवावर  उठण्याची शक्यता असते, अशी थंडी बहाणा बनू शकते. अशाप्रकारे त्या वेळी मनुष्याला कमी-अधिक प्रमाणातील शौच अथवा लघुशंकेची आवश्यकता भासल्यास तेदेखील बहाणा ठरू शकते.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात) आमची स्थिती अशी होती की आजारी व्यक्ती आणि धर्मद्रोही व्यक्तीव्यतिरिक्त  आमच्यापैकी कोणी सामूहिक नमाज चुकवित नव्हता आणि त्या धर्मद्रोही व्यक्तीचे वैमनस्य माहीत होते. तसेच (त्या काळात लोकांची स्थिती अशी होती की) आजारी असूनही काहीजण  दोन माणसांचा आधार घेऊन मस्जिदमध्ये पोहचत होते आणि सामुस्रfयक नमाज अदा करीत होते. अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांनी याबाबतीत सांगितले की, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला ‘सुन्नतुल-हुदा’ शिकविल्या. (‘सुन्नतुलहुदा’ म्हणजे मुस्लिम जनसमुदायाला अनुसरण्यास सांगण्यात आलेल्या आणि कायद्यात्मक दर्जा प्राप्त असलेल्या पैगंबराचरण  पद्धती. या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ज्या मस्जिदीतून अजान दिली जाते त्या मस्जिदीत नमाज अदा करणे होय.) अशीही एक ‘रिवायत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून  ऐकलेली गोष्ट त्यांच्याच शब्दांत इतरांना सांगणे) आहे की त्यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला ही गोष्ट पसंत असेल की त्याची आज्ञापालन करणाऱ्या भक्ताच्या स्वरूपात भविष्यात  अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहशी भेट होईल तेव्हा त्याने त्या पाच नमाजींची देखरेख केली पाहिजे आणि त्या नमाजी मस्जिदमध्ये सामूहिकरीत्या अदा केल्या पाहिजेत कारण  अल्लाहने तुमच्या पैगंबरांना (मुहम्मद (स.) यांना) ‘सुन्नते हुदा’चे प्रशिक्षण दिले आहे आणि या नमाजी ‘सुन्नते हुदा’पैकी आहेत आणि जर तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा कराल,  जसे- हे धर्मद्रोही लोक आपल्या घरांमध्ये नमाज अदा करतात, तर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या (मुहम्मद (स.) यांच्या) आचरण पद्धती सोडून द्याल आणि जर तुम्ही आपल्या  पैगंबरांच्या आचरण पद्धती सोडल्या तर सरळमार्ग विसरून जाल.’’ (हदीस : मुस्लिम)

- सुलतान अहमद इस्लाही
    आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लाम शासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे.
    आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहावयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजूरी' आहे. बालमजूरीच्या या तीऋा वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमजतात.

आयएमपीटी अ.क्र. 163  -पृष्ठे - 16      मूल्य - 07      आवृत्ती - 1 (2009)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/yjlpftm96q3hcynqtrgagyvnt4xj4rgg

Truth
आम्हीम्ही कधीच हा दावा केलेला नाही आणि आमच्यामध्ये जोपर्यंत थोडीफार समज असेल तोपर्यंत मुळीच हा दावा करू शकणार नाही की, फक्त आमचीच संघटना सत्य मार्गावर आहे आणि जे आमच्या संघटनेमध्ये नाहीत ते सत्यमार्गावर नाहीत. आम्ही कधीच लोकांना आमच्या संघटनेकडे बोलाविलेले नाही. आम्ही तर बोलावतो फक्त त्या कर्तव्याकडे जे कर्तव्य एक मुस्लिम असल्याच्या नात्याने आमच्या आणि तुमच्यावर समानपणे लागू आहेत. जर आपण आधिपासूनच ते कर्तव्य पार पाडत असाल तर आपण सत्य मार्गावर आहात. मग आपण आमच्यासोबत मिळून ते काम करा किंवा स्वतंत्रपणे करा. परंतु ही गोष्ट कुठल्याही पद्धतीने मान्य होण्यासारखी नाही की तुम्ही स्वतःही उठणार नाही आणि जे उठलेले आहेत त्यांचीही साथ देणार नाही. आणि वेगवेगळी कारणे सांगून धर्माच्या स्थापनेपासून आणि लोकांना धर्माची साक्ष देण्याच्या जबाबदारीपासून तोंड लपवाल किंवा आपली शक्ती त्या कामात लावाल ज्यामुळे इस्लामऐवजी दुसरीच कुठलीतरी व्यवस्था स्थापित होत असेल आणि इस्लाम ऐवजी कुठल्या दुसर्‍याच गोष्टीची आपण साक्ष देत असल्याची ग्वाही आपल्या वर्तनामुळे मिळत असेल. हे प्रकरण एखाद्या भौतिक गोष्टीसंबंधी असते तर कदाचित तुमचे हिले-बहाने चालले असते. परंतु हे प्रकरण त्या अल्लाहशी संबंधित आहे जो की तुमच्या मनामधील गोष्टीसुद्धा जाणतो. त्याला कुठल्याही युक्तीने धोका देता येत नाही.
    याबाबतीत कुठलाच संशय नाही की, या एकाच उद्देशासाठी आणि एकाच कामासाठी अनेक संघटना बनविणे सकृतदृष्ट्या चुकीचे वाटत असेल आणि म्हणून या संघटनेमध्ये फूट पडण्याचीही भीती वाटत असेल. परंतु जेव्हा इस्लामी व्यवस्था उध्वस्त झालेली दिसत असेल तर अशा परिस्थितीत प्रश्‍न फक्त त्या व्यवस्थेला चालविण्याचाच नाही तर तिच्या पुनर्स्थापनेचा प्रश्‍न समोर असेल तर हे शक्यच नाही की अगदी सुरवातीलाच अशा प्रकारची एकच संघटना बनू शकेल की जिच्यामध्ये मुस्लिम समाजातील सगळेच लोक सामील होतील, ज्या संघटनेमध्ये सामील होणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य होईल आणि जिच्यापासून विलग राहणार्‍यांना पथभ्रष्ट आणि केवळ संघटनेत न आल्यामुळे धर्मभ्रष्ट मानले जाईल.
    कामाच्या सुरूवातीला याशिवाय कुठला दुसरा मार्ग नाही की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना या कार्यासाठी तयार व्हाव्यात आणि आपापल्या पद्धतीने त्यांनी कामं करावीत. शेवटी या सर्व संघटना एकच होतील, तेव्हा जेव्हा त्या खरोखरच स्वार्थी नसतील आणि खर्‍या मनाने इस्लामच्या पुनर्स्थापनेच्या उद्देशासाठी इस्लामी पद्धतीनेच काम करत असतील. सत्यमार्गावर चलणारे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. सत्य त्यांना एकत्र केल्याशिवाय राहत नाही. कारण सत्याची प्रवृत्तीच अशी आहे की तो आपल्या मानणार्‍यांना एकत्र जोडतो. एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना उत्पन्न करतो आणि अशा बेमालुपणे एका रंगात रंगतो की, सगळ्या संघटना शेवटी एक रंग होवून जातात. फूट तर केवळ त्याचवेळेस पडते ज्यावेळेस सत्याच्या सोबत काही ना काही असत्याची भेसळ असते किंवा वरून प्रदर्शन फक्त सत्याचे असते आणि आतून असत्य मार्गाची कास धरलेली असते.
    आता मी थोडक्यात हे ही स्पष्ट करू इच्छितो की, जे लोक आमच्या संघटनेला पसंत करतात आणि तिच्यामध्ये येतात, त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे कुठले काम आहे? आमच्या संघटनेतील सदस्यांकडे आमची मागणी बिल्कुल तीच आहे जी इस्लामची मागणी प्रत्येक मुस्लिमांकडून आहे. आम्ही इस्लामच्या मागणीपासून यत्कींचितही दूसरी कुठली मागणी वाढवू इच्छित नाही किंवा कमी करू इच्छित नाही. आम्ही प्रत्येक व्यक्तीसमोर इस्लामला कुठल्याही प्रकारची काटछाट न करता सादर करतो आणि त्याला सांगतो की, या व्यवस्थेला जाणून-बुजून, समजून -उमजून स्वीकार करा. हा तुमच्याकडून काय अपेक्षा करतो त्या योग्य पद्धतीने अदा करा. आपले विचार, आपल्या मनातील गोष्टी आणि आपले कार्य यामधून त्या सर्व गोष्टी काढून फेकून द्या ज्या की, इस्लामी आदेश आणि त्याच्या आत्म्याच्या विरूद्ध असतील, आणि जगाला कळू द्या की तुमचं पूर्ण जीवन मूर्तीमंत इस्लाम आहे. तुमचं जीवन हेच इस्लामची साक्ष बनली पाहिजे. बस्स हेच आमच्या संघटनेमध्ये सामील होण्याचे शुल्क आहे आणि हाच आमच्या संघटनेच्या सदस्यत्त्वाचा नियम आहे. आमची संघटना, आमच्या संघटनेचे नियम आणि प्रत्येक ती गोष्ट जिच्याकडे आम्ही दुसर्‍यांना बोलावितो सगळ्यासमोर इतक्या स्पष्ट आहेत की, प्रत्येक व्यक्ती त्याचे विश्‍लेषण करून हे स्वतः हे ठरवू शकतो की, आम्ही खर्‍या इस्लाममध्ये, म्हणजे त्या इस्लाममध्ये ज्याचा पाया कुरआन आणि सुन्नाह आहे, यात काही कमी केलेले नाही आणि यात काही वाढविलेले नाही. आणि आम्ही प्रत्येक क्षणी या गोष्टीसाठी तयार आहोत की कोणी आमच्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये अशी कुठलीही गोष्ट दाखवेल जी की कुरआन आणि सुन्नतच्या आदेशांपेक्षा वेगळी असेल तर आम्ही तात्काळ त्या गोष्टीला आमच्यामधून काढून टाकू. आणि ज्या गोष्टीच्या बाबतीत आम्हाला कोणी दाखवून देईल की, अमुक एक गोष्ट कुरआन आणि सुन्नतच्या शिकवणीमध्ये सामील आहे आणि आमच्या संघटनेमध्ये नाही तर कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता आम्ही ती गोष्ट स्विकारू. कारण की आम्ही उठलोच यासाठी की इस्लामला पूर्णपणे, त्यात कुठलीही गोष्ट कमी किंवा जास्त केल्याशिवाय, पुनर्स्थापित करू आणि त्याचीच साक्ष देऊ. जर आम्ही हे करू शकत नसू, तर आमच्यापेक्षा मोठा अत्याचारी आणि पाखंडी कोण असेल?

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget