Latest Post

- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी

    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे - 20    मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/9hlr0rshbo1exa9wzr93mvs83p92y59x

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे. मग तो आपल्या कर्मचाऱ्याला, ज्याला तो कर्ज वसूल करण्यासाठी पाठवत होता, समजावून सांगत असे की  जर तू एखाद्या गरीब कर्जदाराकडे जाशील तेव्हा त्याला क्षमा कर, कस्रfचत अल्लाह आम्हाला क्षमा करील.’’ पैगंबरांनी पुढे सांगितले, ‘‘जेव्हा हा मनुष्य अल्लाहला भेटला तेव्हा  अल्लाहने त्यास क्षमा केली.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू कतादा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने आपल्याला अंतिम निवाड्याच्या दिवशी दु:ख व यातना देऊ नये असे ज्या मनुष्याला  वाटते त्याने गरीब कर्जदाराला ढील द्यावी अथवा त्याचे कर्ज माफ करावे.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नमाज अदा करण्यासाठी एक ‘प्रेतवस्त्रात गुंडाळलेले शव’ (जनाजा) आणण्यात आले, तेव्हा  पैगंबरांनी विचारले, ‘‘या मयत इसमावर एखादे कर्ज आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय! याच्यावर कर्ज आहे.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘याने काही संपत्ती मागे सोडली आहे काय   ज्यातून ते कर्ज फेडता येईल?’’ लोक म्हणाले, ‘‘नाही.’’
यावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण याच्या ‘जनाजाची नमाज’ अदा करा (मी अदा करणार नाही).’’ ही उद्भवलेली सद्यस्थिती पाहून माननीय अली (रजि.) यांनी पैगंबरांना  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मी हे कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतो.’’
मग पैगंबर (स.) पुढे आले आणि नमाजचे नेतृत्व केले. मग म्हणाले, (जसे- दुसऱ्या एका हदीसमध्ये आले आहे.) ‘‘हे अली! तू ज्याप्रमाणे आपल्या या मुस्लिम बंधुच्या प्राणास मुक्ती  दिली, त्याप्रमाणे अल्लाह तुझे आगीपासून रक्षण करो आणि तुझ्या प्राणाचे रक्षण करो. कोणीही मुस्लिम मनुष्य असा नाही जो आपल्या मुस्लिम बंधुकडून त्याचे कर्ज फेडील, मात्र  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला मुक्ती देईल.’’ (हदीस : शरहुस्सुन्ना)

स्पष्टीकरण
वर उद्धृत करण्यात आलेल्या दोन्ही हदीसद्वारे कर्जफेड करण्याचे महत्त्व अतिशय सुलभपणे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करणाऱ्या मनुष्यावर जर  एखाद्याचे कर्ज असेल आणि फेडून आला नाही तर ते माफ केले जाणार नाही, कारण याचा संबंध भक्तांच्या अधिकाराशी आहे, जोपर्यंत कर्ज देणारा माफ करणार नाही, तोपर्यंत  अल्लाहदेखील माफ करणार नाही. जर एखाद्या मनुष्याची देण्याची मनिषा असेल आणि देऊ न शकला तर अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह कर्ज देणाऱ्याला बोलवून घेईल आणि  कर्जदाराला माफ करण्यास सांगेल आणि त्याबदल्यात त्याला नंदनवनातील (जन्नतमधील) देणग्या प्रदान करण्याचे वचन देईल, तेव्हा कर्ज देणारा आपले कर्ज माफ करील, परंतु जर  एखाद्याकडे कर्जफेडीची क्षमता आहे तरीही त्याने फेडले नाही आणि कर्जदाराला त्याच्या कर्जाची परतफेड केली नाही अथवा जगात त्याच्याकडून कर्जमाफी घेतली नाही तर त्याच्या  माफीस अंतिम निवाड्याच्या दिवशी कसलेही स्थान नाही.

Islamic Law
वर्तमानकाळात ईर्ष्या आणि लालसेने माणूस पार पिसाळून गेला आहे. जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल, यासाठी ना-ना काळ्या-पांढर्या पद्धतींचा तो अवलंब करीत आहे. यामुळेच आज सर्वच भ्रष्टाचार आणि काळ्या बाजाराचा वणवा पेटला आहे. मामुली चपराशापासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वच यात बरबटलेले आहे. जो जितका शासनकर्त्यांच्या जवळचा चमचेगिरी करणारा आहे, तितका जास्त भ्रष्ट आहे. याचे कारण असे आहे की, आज माणूस संपत्ती आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत आहे. पैसा असला की, वैभव, प्रतिष्ठा, समाजावर वचक, प्रसिद्धी आणि ऐशो- आरामाचे जीवन, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. यासाठी वाटेल त्याचा गळा चिरायचा, खिशावर डल्ला मारायचा आणि वाटेल ते कृष्णकृत्य करायचे, मात्र पैसा कमवायचाच, अशी सर्वत्र मानसिकता बळावली आहे. याउलट माणूस कितीही चारित्र्यवान असला, विचारवंत असला, ज्ञानी, सभ्य, आणि उच्चशिक्षित असला, मात्र जर त्याच्याकडे पैसाच नसेल, तर त्याच्या जगण्याला जणू काही अर्थच नाही. त्याला कोणी हुंगतही नाही. त्याला सर्वजण मूर्खात काढतात. त्याला कोणी किंमत देत नाही. कुत्रीही भुंकायला तयार होत नाहीत. त्याला तुच्छ आणि हिनतेच्या भावनेने पाहिले जाते. याच मानसिकतेमुळे समाज दिवसेंदिवस पोकळ होत चालला आहे. मात्र समाजास भ्रष्टाचार आणि काळाबाजारीपासून मुक्त करायचे असेल तर ही विचारमूल्ये बदलायलाच हवी, धन-दौलत आणि संपत्तीला महत्त्व देण्याऐवजी इस्लामी विचारसरणी आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच संपत्ती आणि पैशांना महत्त्व देण्याऐवजी चारित्र्य, सभ्यता, ईशपरायणता आणि सदाचाराला महत्त्व देण्याची मानसिकता यावी. ईश्वराने स्पष्टपणे म्हटले आहे की प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्वाचा मूळ आधार हा या इहलोकातील धन-संपत्ती आणि वैभवाचा दिखाऊपणा मुळीच नाही.
‘‘वस्तुतः प्रतिष्ठा ही केवळ ईश्वरालाच आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३९)
‘‘वस्तुतः ईश्वराजवळ तुमच्यांपैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित आणि श्रेष्ठ माणूस तो आहे, जो सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे. निश्चितच केवळ ईश्वरालाच सर्वकाही ज्ञान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)
उपरोक्त आयतीवरून हेच स्पष्ट होते की, पैसा आणि संपत्ती नसल्याने माणूस हा तुच्छ आणि हीन मुळीच असू शकत नाही. तर खरी किंमत ही माणसाच्या सभ्यता, सदाचार आणि ईशपरायणतेमध्ये असल्याने आपण अशा व्यक्तीचा आदर करावयास हवे, तरच समाज हा अपराधमुक्त होऊ शकतो. पैशांना अवाजवी महत्त्व न देणारा कधीच भ्रष्ट होत नाही, लाच घेत नाही, इतरांचे शोषण करीत नाही, इतरांच्या कल्याणासाठी आपल्या जवळील संपत्तीसुद्धा खर्च करतो.
आज आपण पाहतो की, शासकीय वा निमशासकीय अधिकारी पैसा मिळविण्यासाठीच शासनाचेच नव्हे तर माणुसकीचे नियमसुद्धा धाब्यावर बसवून मनमुरादपणे आणि जणू आपला जन्मसिद्ध हक्क समजून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करतात. मात्र इस्लामने अशी शिकवण दिली आहे की सरकारी पद अगर अधिकार आणि हुद्दा हा मुळात एक मोठी जवाबदारी आहे. केवळ ईश्वराप्रतिच नव्हे तर जनतेप्रतिसुद्धा मोठी जवाबदारी आहे. ती मात्र प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात यावी. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळातील एक घटना आहे,
‘‘प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इब्ने लतबिया(र.) यांची ‘सलीम‘ कबिल्याच्या लोकांकडून जकात आणि दानाची रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी नेमणूक केली. जेव्हा त्यांनी जकात आणि दानाची रक्कम वसूल करून प्रेषितांसमोर हजर झाले आणि प्रेषितांनी त्यांचा हिशेब घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘हे प्रेषिता! या काही वस्तु माझ्यासाठी लोकांनी भेट म्हणून दिल्या आहेत. आपण मला भेट म्हणून आलेल्या वस्तु स्वीकारण्याची परवानगी द्यावी.‘ यावर प्रेषित मुहम्मद(स.) ताडकन म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरीच बसायचे असते, जेणेकरून या वस्तु भेट म्हणून तुम्हाला स्वीकारता आल्या असत्या.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच ज्यांच्याकडून जकात वसुलीकरिता त्यांना पाठविण्यात आले होते, त्यांच्याकडून सप्रेम भेट म्हणून आलेल्या वस्तुसुद्धा स्वीकारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मुळीच परवानगी दिली नाही. तर मागून घेण्यात येणारी लाच तर आणखीनही गंभीर अपराध आहे आणि इस्लामने यासाठी कठोर शिक्षा नेमली आहे.
हा तर झाला लाचलुचपतीचा प्रकार. याशिवाय आर्थिक शोषणाचे आणखीनही बरेच प्रकार आहेत. पैकी ज्याच्याकडून मेहनत-मजुरीचे काम करून घेण्यात येते, त्याला त्याच्या मेहनत-मजुरीचा योग्य मोबदला देण्यात येत नाही. आज भांडवलदार आणि उद्योगपतीवर्ग मजुरांच्या रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा शोषून घेत आहे, मात्र त्याला खरा आणि योग्य मोबदला देत नाही. कायदासुद्धा मजुराला न्याय मिळवून देण्यात हतबल झालेला दिसतो. तुटपुंजा मजुरीतून तो अर्धपोटी आणि उपासमारीचे खडतर जीवन आज कंठित आहे. मात्र इस्लामी कायद्याने अशी शिकवण दिली आहे की मेहनत-मजुरी आणि कारागिरी वगैरे करणार्यांना त्यांच्या पात्रतेनुसार आर्थिक मोबदला देण्यात यावा आणि तेही त्याची प्रतिष्ठा जोपासून द्यावा. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वराने म्हटले आहे, अंतिम निवाड्याच्या दिवशी तीन प्रकारच्या गुन्हेगारांना मी अवश्य शिक्षा देणार. पैकी पहिला गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने माझी शपथ घेऊन कोणाला अभय दिले असेल आणि मग गद्दारी अगर दगा केला असेल, दुसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोण्या एखाद्या गुलाम नसलेल्या व्यक्तीस गुलाम बनवून विकले आणि त्याची रक्कम गिळली आणि तिसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोणाकडून मजुरी वा शारीरिक कष्टाचे काम करून घेतले, मात्र त्याच्या कामाचा मोबदला दिला नाही.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
त्याचप्रमाणे मजुराचे घाम सुकण्यापूर्वी त्याच्या मजुरीचा पूर्ण मोबदला देण्याची सक्तीने ताकीदसुद्धा इस्लामने केली आहे. यामुळे निश्चितच श्रीमंताविषयी मजुराच्या मनात आदर निर्माण होईल आणि तो चोरी, डकाइती आणि भ्रष्टाचाराकडे वळणार नाही.

Justice
इस्लामने गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यासाठी ‘हद‘, मृत्यूदंड व देहदंड अर्थात ‘किसास‘ चे कलम लागू केले आहे. मात्र हे लागू करण्यासाठी ज्या अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत, त्या कधीकधी पूर्ण होत नाहीत. मग अशा परिस्थितीत गुन्हेगारास मुक्त सोडावे की अपराधानुसार शिक्षा द्यावी? शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये गुन्हेगारास निश्चितच शिक्षा मिळावी, अशी भूमिका आहे. अन्यथा समाज हा उपद्रवमुक्त होणार नाही. याकरिता त्यावर दंडविधान लागू करण्यात आले आहे. म्हणून आपण इस्लामी कायद्याने प्रदाने केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धतींचा थोडक्यात अभ्यास करु या. त्याचप्रमाणे इस्लामी दंडविधानाचा वर्तमान दंडविधानाशी तुलणात्मक वेध घेऊ या, जेणेकरून वर्तमान दंडविधानातील त्रुट्या आणि कमतरता दूर करण्याची विवेकबुद्धी मिळावी.
दंडविधानाचे उद्दिष्ट
‘किसास‘ अर्थात शारीरिक क्षती व हानीचा जशास तसा बदला घेण्याच्या शिक्षेचा जो हेतु आणि उद्देश आहे, तोच दंडविधानाचासुद्धा आहे. इस्लामी तत्त्वज्ञ माननीय जीलई म्हणतात की, अपराध अगर गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये, गुन्हेगाराने परत तो गुन्हा करू नये आणि इतरांनीही यापासून बोध घ्यावा, हाच दंडविधानाचा मूळ हेतु आहे. शिवाय विनाकारण आणि अतिरिक्त शिक्षा देण्याची इस्लामने मनाई केली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगारास केवळ तंबी केल्यास परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल अथवा हलका चोप देऊन किंवा दमदाटी करून तो परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर एवढ्यावरच काम भागवावे. अथवा त्यास गुन्हा केल्याची जाणीव करून देण्यासाठी धिक्कारून बोलण्यामुळे अथवा कैद करून ठेवल्याने परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर अतिरिक्त शिक्षा देणे योग्य नसल्याचे इस्लामी कायद्याने म्हटले आहे.
दंडविधानाचा एक हेतु हा अपराध्याचे मनपरिवर्तन करून त्यात सुधारणा घडविणेसुद्धा आहे. त्याला आपल्या पाप अगर अपराधावर पश्चत्ताप झाला. तर समजा हे त्याच्यात सुधार झाल्याचे चिन्ह होय. जर त्यास कैदेची शिक्षा दिली आणि त्याला आपल्या दुष्कर्मावर पश्चात्ताप झाला आणि त्याने ईश्वरासमोर आपल्या करणीची माफी मागितली तर त्यास कैदमुक्त करण्यात येईल.
दंडविधानाचे आणखीन एक उद्दिष्ट असे की गुन्हेगाराने ज्याच्यावर शारीरिक अत्याचार केला, त्याच्या मनात खदखदणारा गुन्हेगाराविषयीचा संताप थंड व्हावा आणि त्याचे मन-मस्तिष्क गुन्हेगाराविषयी द्वेश आणि वैरमुक्त व्हावे.(संदर्भ : दुर्रे मुख्तार, अल-बहरुर्राइक, फतावा हिन्दिया आलमगीरिया)
दंडविधानाची मर्यादा
शरीअतने विविध अपराधांवर दंडविधान लागू केले असले तरी या बाबतीत खबरदार केले की गरज असेल तेवढेच दंडविधान लागू करण्यात यावे. विनाकारण आणि हकनाक अपराध्यास छळू नये. नसता दंडविधानाचा हेतु नष्ट होईल. म्हणूनच अपराध्याचा एखादा अवयव निकामी होण्याइतपत कठोर मारझोड होता कामा नये.(संदर्भ : अलमुग्नी)
दंडविधानाचे प्रकार
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यात दंडविधानाचे विविध स्वरुप व प्रकार वर्णन करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, शारीरिक शिक्षा, आर्थिक दंड, कैदेची शिक्षा, शहराबाहेर करणे अर्थात तडीपार करणे वगैरे विशेष उल्लेखनीय होय. शारीरिक शिक्षा म्हणजे गुन्हेगारास दंडात्मकरित्या मृत्यूची शिक्षा देणे, कोरडे मारणे ही विशेष शिक्षा होय. पुढे या प्रकारांवर थोडी वर्णनात्मक चर्चा करण्यात येत आहे.
दंडविधानानुसार मृत्यूदंड
इस्लामी कायद्यात ‘किसास‘(बदला घेण्याची शिक्षा) नुसार मृत्यूदंड देता येतो, याव्यतिरिक्त दंडविधानानुसारसुद्धा मृत्यूदंड देण्याची शिक्षा देणे वैध आहे. त्याचप्रमाणे समलिंगी संभोग करणार्यांना मृत्यूदंड देता येईल, चोरी करणार्यांचे हात कापता येतील, धारदार शस्त्रांचा वापर न करता(लाठी, दगडांचा वापर करून) खून करणार्याससुद्धा दंडविधानानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देता येईल, जादूगिरी करणार्यालासुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय दारू पिणार्यास चौथ्यांदा हा अपराध केला असेल तर त्यासही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. या दंडविधानासाठी प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या या वचनाचा आधार घेण्यात आला आहे,
‘‘माननीय वैलहम हुमैरी(र.) यांनी म्हटले की मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना विचारले,
‘आम्ही एका थंड प्रदेशात राहतो. तेथे खूप थंडी लागत असल्याने गव्हापासून मदिरा तयार करण्यात येते व ती मदिरा उष्णता व शक्ती प्राप्त करण्यासाठी पिण्यात येते. तेव्हा अशा परिस्थितीत दारू पिणे वैध आहे काय?‘
‘‘त्या दारूमध्ये नशा आहे काय?‘‘ प्रेषितांनी विचारले.
‘‘होय! ती दारू पिल्याने झिंग चढते,‘‘ मी उत्तरलो.
‘‘मग ती दारू पिऊ नये.‘‘ प्रेषित म्हणाले.
‘‘मात्र लोक ऐकणार नाहीत.‘‘ मी म्हणालो.
‘‘तर मग ते दारू सोडेपर्यंत त्यांच्याशी सशस्त्र लढाई करा.‘‘
प्रेषित म्हणाले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अबू दाऊद)
याशिवाय आणखीन एका प्रेषितवचनाचा या दंडविधानास आधार आहे, तो असा की एकदा प्रेषित मुहम्मद(स.) यानी म्हटले,
‘‘ईश्वर एक आहे, अशी ग्वाही देणार्या कोणत्याही मुस्लिमाची हत्या वैध(हलाल) नाही, मात्र तीन कारणास्तव त्याची हत्या वैध ठरते. प्रथम असे की, विवाहित असूनही व्यभिचार करण्याच्या अपराधास्तव, त्याची हत्या करण्यात येईल. दुसरे असे की, त्याने एखाद्याची हत्या केली असेल तर ‘किसास‘(मृत्यूदंडाच्या शिक्षे) नुसार त्याची हत्या करण्यात येईल आणि तिसरे असे की त्याने इस्लामचा त्याग केला असेल तर त्याची हत्या करण्यात येईल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह-मुस्लिम)
आणखीनही अशा बर्याच प्रेषितवचनांच्या आधारे इस्लामी दंडविधानानुसार मृत्युदंडाची शिक्षा देता येते.
कोरड्यांची शिक्षा
व्यभिचार, दारू पिणे वगैरेची कोरडे मारून शिक्षा देण्याचे प्रमाण कुरआन व प्रेषितवचन शास्त्रात आहे. मात्र दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देण्याचे प्रमाण आहे काय? तर याबाबतीत इस्लामी कायदातज्ञांची भूमिका आहे की, दंडविधानानुसारही अपराध्यास कोरडे मारण्याची शिक्षा देता येते. कारण पत्नीने पतीची अवज्ञा केल्यास हलक्या-फुलक्या पद्धतीने पत्नीस मारण्याची परवानगी कुरआनात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की ‘हद‘च्या शिक्षेव्यतिरिक्त इस्लामी दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देता येते, मात्र जास्तीतजास्त दहाच कोरडे मारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परवानगी दिली आहे. इस्लामी विधीशास्त्रज्ञ माननीय कासानी यांनी म्हटले आहे की ज्या अपराधांची ‘हद‘नुसार शिक्षा तजवीज करण्यात आलेली नाही, त्यासंबंधी तत्कालीन शासकाने अथवा न्यायाधीशाने चोप देण्याची, कैद करण्याची, दमदाटी करण्याची शिक्षा अपराधाच्या गांभीर्यानुसार ठरवावी. शिवाय इस्लामी दंडविधानात कोरडे मारण्याची शिक्षा द्यावी.(संदर्भ : बदायुस सनाएअ)
कोरडे मारण्याची मर्यादा
इस्लामी कायद्याची अशी भूमिका आहे की अपराधानुसार जी शिक्षा ‘हद‘च्या प्रमाणात असते, त्यापेक्षा थोडी कमी असावी. उदाहरणार्थ, व्यभिचाराच्या अपराधाची ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा शंभर कोड्याची आहे, मात्र दंडविधानानुसार एंशी कोरडे मारण्यात येतील, व्यभिचाराचा चुकीचा आरोप लावण्याच्या अपराधास्तव ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा जी काही असेल, त्यापेक्षा दंडविधानात कमी देण्यात येईल. त्याचप्रमाणे दारु पिणे, चोरी करणे वगैरेच्या शिक्षेसंबंधी नियम आहे.
कोरड्यांची किमान मर्यादा
जेवढे कोरडे मारून दंडविधानाच्या शिक्षेचा हेतु पूर्ण होत असेल, तेवढे कोरडे मारावेत. अर्थात कमीतकमी तीन आणि जास्तीतजास्त एकोणचाळीस कोरडे मारता येतील.(संदर्भ : अलमुग्नी)
कैद व बंदीवान बनविण्याची शिक्षा
अर्थातच माणसाचे व्यक्तीगत स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे कैद करण्याची शिक्षा देणे होय. म्हणजे त्याला आपल्या मर्जीने काहीही करता येऊ नये. अशा रितीने म्हणजेच अपराध्याला कैद करून ठेवण्याची शिक्षा इस्लामी दंड विधानात आहे.(संदर्भ : अलमुग्नी)
इस्लामी कायद्यात असेदेखील आहे की वेळ पडल्यास कैदेबरोबरच गुन्हेगारास कोरड्यांचीही शिक्षा देण्यात येईल. अर्थातच हे अपराधाचे गांभीर्य समोर ठेवूनच निश्चित करण्यात येईल आणि आर्थिक दंडही आकाण्यात येईल.(संदर्भ : अल बहरुराईक)
कैदेच्या शिक्षेचे प्रकार
कैदेचे दोन प्रकार आहेत, एक विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद आणि मुदत निश्चित न केलेली कैद अथवा आजीवन कैद. आजीवन कैद ही अपराध्याच्या सुधारणास्तव असो की इतर कोणत्याही हितासाठी असो, यांचा आपण खाली अभ्यास करणारच आहोत.
विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद
इस्लामी कायद्याने काही अपराधांची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. उदाहरणार्थ, शिवीगाळ करणे अथवा अभद्र शब्दांचा वापर करण्याची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे दारू पिणे, व्यापारात दगाबाजी करणे अगर व्याजाचा व्यवहार करण्याची शिक्षा कैदेच्या स्वरुपात निश्चित केली आहे. म्हणजे आपल्या अपराधाचा पश्चात्ताप होऊन ईश्वरासमोर क्षमा-याचना केल्यास ही मुदत पूर्ण होते.
खोटी साक्ष देणार्या गुन्हेगारास एका वर्षाची कैद, इस्लामी शासनाच्या कारभारावर विनाकारण टीका करण्याच्या अपराधास्तव एका महिन्याची कैद ठरविण्यात आली आहे.(संदर्भ : एहकामुस सुलतानिया)
बेमुदत कैदेची शिक्षा
एखाद्या व्यक्तीस बांधून सिंह अगर हिंस्त्र पशुसमोर टाकणे, कडक उन्हात हातपाय बांधून ठेवणे, समलिंगी संभोग करणे वगैरेसारख्या घोर अपराधांवर बेमुदत कैदेची शिक्षा देण्याची दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला फूस लावून नेणे, तिच्या आईवडिलांविरुद्ध भडकावणे वगैरेसारख्या अपराधांसाठीही बेमुदत कैदेची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच्या धर्माचा आधार घेऊन धर्मविरोधी गोष्टी पसरविण्याच्या अपराधास्तव गुन्हेगारास आजीवन कैदेची शिक्षा देण्याची इस्लामी दंडविधानात निश्चित करण्यात आली आहे.
कैदेचे स्वरुप
कारागृह स्वच्छ असावे. लघवी, शौच आणि स्नान करण्याची, कपडे धुण्याची मुबलक व्यवस्था असावी. कैद्याला पोटभरून मात्र अत्यंत साधे जेवण असावे. त्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात यावी. झोपायला नरम गादी वगैरे न देता अत्यंत साधे बिछाणे व पांघरून द्यावे. थंडी, ऊन्ह, पाऊस वगैरेसारख्या बाबींपासून पूर्ण संरक्षण होण्यासारखी स्वच्छ खोली असावी. कैद्याला जर एखादी कला-कौशल्य येत असेल अथवा काम करण्याची पात्रता त्याच्यात असेल तर त्यानुसार त्याच्याकडून सेवा करून घेतली जाऊ शकते. मात्र त्याला जमातीसह नमाज पढण्याची, जुमाची नमाज पढण्याची, ईदची नमाज पढण्याची, हज करण्याची, एवढेच नव्हे तर कोणाच्या अंत्यविधित सामील होण्याची आणि एखाद्या रोग्याची विचारपूस करण्याची परवानगी नसेल. कारण हे सर्व करण्यासाठी त्याला कैदेच्या बाहेर जावे लागेल.
शहरातून बाहेर काढण्याची शिक्षा
‘हद‘ आणि ‘दंडविधान‘ या दोन्ही प्रकारात शहराबाहेर घालण्याची शिक्षा तजवीज करण्यात आली आहे. ‘हद‘ प्रकारच्या शिक्षेमध्ये अविवाहित असलेल्या व्यभिचारी व्यक्तींना आणि धर्मद्वेशी पक्षाकडून लढणार्यास शहराबाहेर घालवण्याची शिक्षा देण्यात येते. त्याचप्रमाणे व्यभिचार्याला दंडविधानानुसार शहराबाहेर करण्याची शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : इब्ने आबेदीन)
शहराबाहेर घालवण्याच्या शिक्षेचे स्वरुप
शहराबाहेर घालवण्याची अगर तडीपार करण्याची अट अशी आहे की, अपराध्यास शहरापासून सत्तर किलोमीटर दूर टाकण्यात यावे. अर्थात शहराच्या चारी दिशांना तो कमीतकमी सत्तर किलोमीटरच्या अंतराबाहेर असावा.(संदर्भ : अलमुग्नी)
आर्थिक दंडाची शिक्षा
दंडविधानानुसार गुन्हेगारास आर्थिक दंड करण्याचा अर्थ असा आहे की, इस्लामी शासक अथवा न्यायाधीश त्याच्या दंडाची रक्कम शासकीय खात्यात जमा करील आणि अपराधी जेव्हा आपल्यात सुधारणा घडवून आणील तेव्हा त्याची जमा करण्यात आलेली संपत्ती परत करण्यात येईल. मात्र तो जर स्वतःची सुधारणा करण्यासाठी तयार नसेल तर त्याची रक्कम त्यास परत न करता शासकीय ताब्यात घेण्यात येईल. अपराध्याकडून घेण्यात आलेल्या संपत्तीचे तीन प्रकार असू शकतात. पहिला प्रकार निधिद्ध संपत्तीचा. उदाहरणार्थ, दारु विक्रीचा पैसा, नाच गाण्याचा आणि मूर्ती विकून मिळविलेला पैसा अगर इतर अवैध मार्गाने मिळविलेली संपत्ती होय. हा पैसा अगर संपत्ती नष्ट करण्यात येईल. दुसर्या प्रकारची संपत्ती ही परिवर्तनीय असू शकते. उदाहरणार्थ, क्रीडा व खेळातून मिळविलेला पैसा वा त्याची साधने आणि आर्थिक चलन वगैरे ही संपत्ती परिवर्तीत करण्यात येईल. तिसरा प्रकार म्हणजे जंगम अगर स्थायी संपत्तीचा होय. उदाहरणार्थ, जमीन-जुमला, घर-इमारत वगैरे या प्रकारच्या संपत्तीवर शासन ताबा मिळवील.(संदर्भ : अल-फतावा हिंदिया)

संकलन - बी. एस. कांबळे
   
    जोतीराव अस्पृश्य गणल्या गेलेल्या पद्दलितांचे पहिले उध्दारक, पहिले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे आणि हक्कांचे उद्गाते, दारिद्र्य निर्मूलन, चातुर्वर्ण्य व जातिभेद निर्मूलन करणारे आणि मानवी समानतेची घोषणा करणारे पहिले लोकनेते होते.
    आधुनिक भारताचे ते पहिले महात्मा आणि `सत्यमेव जयते' या दिव्यतेजाने भारलेले पहिले सत्यशोधक होते. मला जे अधिकार आहेत, ते माझ्या अन्य देशबांधवांनाही असलेच पाहिजेत, असे जेव्हा भारतीय जनसमूह म्हणू लागेल, तेव्हाच जोतीरांवाचे स्वप्न साकारेल.

आयएमपीटी अ.क्र. 178     -पृष्ठे - 40     मूल्य - 20                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/orntyzfmrpg64umsdrmbp3xcj9i6snx8

जगामध्ये अनेकजण ज्ञानाचा उपयोग हत्यारासारखा करतात. आपल्याला नशीबाने प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या बळावर अज्ञानी लोकांचे शोषण करतात. त्यात त्यांना वाईटही वाटत नाही. ज्यांना ज्ञान नाही त्यांना तुच्छ लेखतात. स्वतः ज्ञानी असल्याचा गर्व बाळगतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अशा प्रवृत्तीवर सक्त नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी अज्ञानी समुहांना आपल्याला प्राप्त असलेले ज्ञान मोफत देण्याचे आदेश दिलेले आहेत. आज कोट्यावधी रूपये घेऊन जे ज्ञान देण्यात येते चुकीचे असून, ज्ञानावर सर्वांचाच अधिकार आहे ते मोफत असायला हवे. एवढेच नव्हे तर ते छोटे-छोटे सामाजिक गट मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांचा उत्साह वाढविण्याचेही आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिलेले आहेत. आपल्या सर्वांना त्यांच्या या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
    कल्पना करा की, आपण मोठे आहात, लहान भाऊ, बहिणींना उपदेश देण्याचा हक्क आपला आहे. तसेच त्यांची काळजी वाहण्याचे कर्तव्यही आपले आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाला शक्ती समजून त्या शक्तीच्या बळावर दुसर्‍यांना रोखणे, त्यांचा पाणउतारा करणे हे सभ्यपणाचे लक्षण नव्हे. उलट अशी कृती करणे इस्लामच्या दृष्टीने गुन्हा आहे. ज्ञान शक्ती जरूर आहे मात्र बोलतांना आणि दुसर्‍यांच्या चुका दुरूस्त करतांना विनयशीलता आवश्यक आहे. प्रेषित सल्ल. यांची कृती अशी आहे की, ते ज्यांना संबोधित करत किंवा ज्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत तेव्हा त्यांच्याशी अतिशय प्रेमाने आणि विनयशिलतेने बोलत. त्यांनी कधीच अशा लोकांना कमी लेखलेले नाही किंवा त्यांचा उपमर्द केलेला नाही. त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणताना जे ज्ञान प्रेषितांनी त्यांना दिले ते अतिशय प्रेमभावनेने दिले. त्यामागे त्या लोकांचे उत्कर्ष घडवून आणणे हाच एकमेव हेतू होता.
    खरा ज्ञानी तोच असतो जो ज्ञानदान करत असतांना ज्ञान ग्रहण करणार्‍यावर आपले मोठेपण लादत नाही. डोळे वटारून दिले गेलेले ज्ञान ज्ञानार्जन करणार्‍याच्या मनामध्ये ज्ञान देणार्‍याच्या विषयी कलुषित भावना उत्पन्न करते. ज्ञानाचे अवास्तव प्रदर्शन करणार्‍याला अल्लाह कधीच पसंत करत नाही. इस्लाममध्ये स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी हस्तगत केलेल्या  ज्ञानाला चांगले समजले गेलेले नाही. खरा ज्ञानी तोच जो आपल्या वडिलधार्‍यांच्या अनुभवाचीही कदर करतो.
    अल्लाहच्या कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाला हत्यार बनविण्यापेक्षा त्याची विजेरी बनवा आणि प्रेषित सल्ल. यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या विजेरीचा उपयोग करून लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करा. तेव्हा पहा लोक तुमच्याशी जोडले जातील. तुमच्या सोबत बसण्यामध्ये लोकांना आनंद मिळेल. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांशी प्रेमाने वागा. तुमचं प्रेम आणि करूणा त्यांना जाणवेल इतपत स्पष्ट असावी. तुम्ही जर कठोरपणे वागाल तर त्यांच्यामध्ये तुमच्यापासून दूर जाण्याची भावना निर्माण होईल आणि ते दूर जातील. त्यामुळे ते ज्ञानापासून वंचित राहतील. त्यांच्या काही चुका असतील तर त्यांना त्या अशा सकारात्मक पद्धतीने निदर्शनास आणून द्या की त्याचे त्यांना वाईट वाटणार नाही. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या उणीवांची कुठेच चर्चा करू नका.
    स्वतःविषयी अहंकार बाळगणे अतिशय वाईट आहे. इस्लाममध्ये तर तो गुन्हाच आहे. ही बाब श्रद्धा कमकुवत असल्याची निशाणी आहे. निर्विवादपणे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवूनच आपल्याला आयुष्याची वाटचाल करावी लागेल. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. हाच दृष्टीकोन माणसाला आपण कायम अपूर्ण असल्याची जाणीव करून देत राहतो व त्यातून माणसात अहंकार निर्माण होत नाही. शेवटी एवढेच म्हणावेशे वाटते की ज्ञानाला हत्यार बनवून दुसर्‍यांचे शोषण करण्यापेक्षा त्याची विजेरी बनवून दुसर्‍यांचे आयुष्य प्रकाशमान करा. हीच यशाची गुरूकिल्ली आहे.

- फेरोजा तस्बीह -9764210789

माननीय अबू कतादा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी (व्यापाऱ्यांना सावधान करताना) सांगितले, ‘‘आपल्या मालाची विक्री करताना अधिक शपथा घेऊ नका, ही गोष्ट  व्यवसायात (तात्पुरती) वाढ करते, परंतु शेवटी समृद्धी नष्ट करते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
व्यापाऱ्याने गिऱ्हाईकाला किंमत वगैरेच्या बाबतीत शपथेद्वारे पटवून सांगणे की त्याची किंमत अमूक आहे आणि हा माल खूप चांगला आहे, तेव्हा तात्पुरते कस्रfचत काही गिऱ्हाईक  धोक्याने मान्यही करतील आणि तो माल खरेदी करतील, परंतु जेव्हा त्यांना सत्य लक्षात येईल तेव्हा ते पुन्हा कधी त्याच्या दुकानात येणार नाहीत आणि अशाप्रकारे या व्यापाऱ्याचा  व्यवसाय डबघाईला येईल.

माननीय अबू ज़र ग़फ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक असे आहेत की ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी  बोलणार नाही, त्यांच्याकडे पाहणार नाही आणि त्यांना पवित्र करून नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल न करता त्यांना शिक्षा देईल.’’
माननीय अबू ज्ज़र ग़फ्फारी (रजि.) यांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हे अपयशी आणि दुर्दैवी लोक कोण आहेत?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘एक घमेंड आणि अहंकारामुळे आपली  विजार (किंवा लुंगी) पायाच्या घोट्याच्या खाली लटकविणारा मनुष्य, दुसरा उपकाराची जाणीव करून देणारा मनुष्य आणि तिसरा खोटी शपथ घेऊन आपल्या व्यवसायात वृद्धी करणारा  मनुष्य.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

न बोलणे आणि न पाहण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह त्याच्यावर निराश (क्रोधित) होईल, त्याच्याशी प्रेम व दया करणार नाही. तुम्हीदेखील एखाद्यावर नाराज होता तेव्हा त्याच्याकडे पाहात नाही की त्याच्याशी बोलत नाही. विजार किंवा लुंगी पायाच्या घोट्याच्या खाली लटकविण्याची ही ताकीद त्या मनुष्यासाठी आहे जो घमेंड आणि अहंकारामुळे असे  करतो. पायाच्या घोट्याखाली विजार किंवा लुंगी परिधान करतो परंतु त्याला मोठेपणाचा गर्व नाही, अशा मनुष्याचे हे कामदेखील गुन्हा ठरतो कारण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  ईमानधारकांना (कमरेखालील वस्त्र) घोट्याच्या खाली परिधान करण्यास मनाई केली आहे. म्हणून तो मनुष्यदेखील गुन्हेगार ठरतो. खरे तर ईमानधारक कोणत्याही अपराधाला क्षुल्लक  समजत नाही. प्रामाणिक गुलामासाठी मालकाची क्षुल्लक नाराजीदेखील कयामतपेक्षा कमी नसते.

माननीय कैस (रजि.) अबू ग़रजा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात आम्हा व्यापाऱ्यांना ‘समासिरा’ म्हटले जात होते. पैगंबर जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा  त्यांनी त्या नावापेक्षा उत्तम नाव दिले. पैगंबर म्हणाले, ‘‘हे व्यापाऱ्यांच्या समूहा! माल विकताना वाईट गोष्ट बोलण्याचे आणि खोटी शपथ घेण्याचे अतिशय भय असते, तेव्हा तुम्ही  आपल्या व्यवसायात ‘सदका’चा समावेश करा.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की व्यवसायात अधिकांश असे घडत असते की मनुष्य नकळतदेखील चुकीचे काम करतो आणि खोटी शपथ घेतो; म्हणून  व्यापाऱ्यांनी विशेषत: अल्लाहच्या मार्गात दानधर्म (सदका) द्यावा जेणेकरून या सत्कर्मामुळे त्यांच्या चुका आणि त्रुटींचे प्रायश्चित्त होईल.

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोजमाप करणाऱ्या व्यापाऱ्यांना उद्देशून सांगितले, ‘‘तुम्हाला दोन अशा कामांबाबत जबाबदार धरले जाईल  ज्यांच्यामुळे तुमच्या पूर्वी होऊन गेलेले जनसमुदाय नष्ट व विनाश पावले.’’ (हदीस : तिर्मिजी)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget