Latest Post

माननीय अबू राफेअ (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक उंट एका व्यक्तीकडून कर्जस्वरूपात घेतला, मग पैगंबरांजवळ जकातस्वरूपात काही उंट आले तेव्हा  त्यांनी मला आदेश दिला, ‘‘त्या व्यक्तीला तो उंट देऊ?’’ मी म्हणालो, ‘‘या उंटांमध्ये फक्त एकच उंट खूप चांगला आहे आणि सात वर्षांचा आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तोच त्याला द्या,  कारण उत्तमप्रकारे कर्जफेड करणारा मनुष्य उत्तम असतो.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सधन कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यात टाळाटाळ करणे अत्याचार आहे आणि जर कर्जदार  ‘‘अमुक सधन व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या’’ असे म्हटल्यास विनाकारण कर्जदाराच्या डोक्यावर स्वार होता कामा नये, त्याचे हे म्हणणे मान्य करावे आणि ज्याचा त्याने  हवाला दिला आहे त्याच्याकडून कर्जाची परतफेड करून घ्यावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
मनुष्याजवळ कर्जफेड करण्यासाठी काहीही नसेल आणि तो म्हणाला की ‘‘जा अमुक व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या. आमच्यात त्याबाबत बोलणी झालेली आहे. तो कर्जफेड  करण्यास राजी आहे.’’ तेव्हा कर्ज देणाऱ्याने असे म्हणू नये की ‘‘मी तर तुझ्याकडूनच कर्जफेड करून घेईन. मी दुसऱ्या कुणाला ओळखत नाही.’’ इतकेच नव्हे तर त्याच्याशी मृदु स्वरात  बोलावे आणि ज्याचा तो हवाला देत आहे त्याच्याकडून कर्जफेड करून घ्यावी.

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य लोकांचा माल (कर्जाच्या स्वरूपात) घेईल आणि तो त्याच्या परतफेडीची मनोकामना बाळगत  असेल तर अल्लाह त्याच्याकडून त्याची परतफेड करील आणि ज्या मनुष्याने माल कर्जाच्या स्वरूपात घेतला आणि त्याच्या परतफेडीची मनोकामना नसेल तर अल्लाह त्या कारणास्तव  त्या मनुष्याचा विनाश करील.’’ (हदीस : बुखारी)

माननीय शरीद सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कर्ज परतफेड करू शकणाऱ्याचा (न फेडण्यासाठीचा) बहाणा त्याच्या अब्रूला आणि त्याच्या  शिक्षेला वैध ठरवितो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

‘अब्रू’ला वैध ठरविणे म्हणजे जो मनुष्य कर्ज घेतो आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता असूनदेखील परतफेड केली नाही तर त्याचा हा अपराध आहे की समाजाच्या दृष्टिकोनातून  त्याला लज्जित केले जाऊ शकते आणि त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. जर एखाद्या देशात इस्लामी कायदा असेल आणि तेथे एखादा असा मनुष्य आढळला तर इस्लाम कायद्याची  अंमलबजावणी करणारे त्याला शिक्षा देऊ शकतात आणि त्याला अपमानीत करण्याची दुसरी पद्धतदेखील अवलंबिली जाऊ शकते.

आपले जे बंधु राजकीय सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत, त्यांनी चांगले समजून घ्यायला हवे की ते या देशाचे मालक नाहीत. त्या खुर्चीवर निरंतर बसून राहण्याचा त्यांनी ठेका घेतलेला नाही. ते ईश्वराला या देशाचा स्वामी मानत असोत अथवा जनतेला स्वामी मानत असोत, एक दिवस त्यांना ही खुर्ची सोडावी लागणार आहे. त्या खुर्चीचे कर्तव्य त्यांनी कितपत पार पाडले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. ईश्वराला जर ते देशाचा स्वामी मानतात व स्वतःला त्याचा प्रतिनिधी, त्याच्याबद्दलच्या सर्व उत्तरदायित्वाची नीट जाणीव ठेऊन त्याच्या इच्छेनुसार कार्य केले, तर ती वास्तवतेची स्वीकार ठरेल. तुमचे जीवन एक जबाबदार जीवन ठरेल आणि तुमचा सर्व व्यवहार संतुलित असेल. सत्तेच्या त्या मदापासून तुम्ही पूर्णतः अलिप्त असाल, जी भल्याभल्यावर आपला अंमल चढवून त्यांना मदांध व बेहोश करुन सोडते. तुम्ही जनतेला जर, देशाचे स्वामी मानत असतात, तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी या नात्याने काम केले पाहिजे. कसल्या दुष्कृत्याला जनतेने कधी क्षमा दाखविली नाही. तुमच्या प्रत्येक कृतीवर इतिहासकारांची नजर आहे. सद्यस्थितीत दोन्ही गोष्टी तुमच्या आखत्यारीत आहेत. तुम्ही असे कार्यही करु शकता की त्यासाठी अनेक पिढ्या तुमच्या कृत्यांवर अभिमान बाळगतील, इतिहासकार आदरपूर्वक तुमचे नाव उच्चारील. तसेच तुम्ही अशी कृतीही करु शकता, ज्यामुळे तुमच्या नावावर भावी पिढ्या थुंकतील व इतिहासतज्ज्ञ आपल्या कृत्यांना ‘काळी कृत्ये’ म्हणून संबोधतील नीट ध्यानात ठेवा. सत्तेच्या खुर्चीवर असताना तुम्हाला स्वतःची जी छबी दिसते, ती तुमच्या प्रतिमेचे खरे चित्र नव्हे. तुमची खरी प्रतिमा उद्या इतिहासकाराच्या लेखणीतून उतरेल.सत्ता मिळविण्याच्या लालसेने झपाटलेल्या आणि त्यासाठी न्याय, अन्याय, उचित, अनुचित या बाबी धाब्यावर बसवून आटापिटा करणार्यांनीही ही गोष्ट चांगली लक्षात ठेवावी.
 
मुसलमान, देशाची आवश्यकता ठरु शकतात
या समयी भारत देश सैध्दान्तिक व व्यावहारिक गदारोळाच्या वावटळीत आहे. अशी अवस्था कोणत्याही देशात, एक निश्चित दिशा घेण्याआधी होत असते. एका बाजूला युरोपचे भौतिकवादी विचार व दृष्टिकोन आहेत, जे या देशावर लादले जात आहेत आणि याच विचारांवर आधारित व्यावहारिक पध्दती बनल्या आहेत. राजकीय सत्तेच्या बळावर या देशाला त्यांच्या मुशीत ओतले जात आहे. दुसर्या बाजूला देशाची प्राचीन, धार्मिक व नैतिक प्रकृती आहे. या प्रकृतीचे जठर अद्याप नास्तिकवादाची व भौतिकवादाची माशी पचवू शकण्यास पूर्णतः तयार नाही. नंतर धार्मिक स्वभाव असलेल्या जाती, काही कारणास्तव देशासमोर अशी गोष्ट माडण्यात असफल ठरल्या आहेत. ज्याची आवश्यकताही आहे आणि मागणीही आहे. त्या गोष्टीच्या आधारावर एखादी अशी व्यवस्था स्थापित व्हावी, जिच्यामुळे लोकांची भौतिक भूकही भागावी आणि त्यांची नैतिक व आध्यात्मिक तहानही शमली जावी. या गोष्टींच्या अभावाने देशात असंख्य गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करुन सोडल्या आहेत आणि संपूर्ण देश भांबावलेल्या अवस्थेत उभा आहे.
या संधीत पुढे सरसावून ती उणीव भरुन काढणे मुसलमानांचे काम होते, कारण त्यांच्यापाशी ती गोष्ट आहे, जिची देशाला आणि देशबांधवांना अत्यंत आवश्यकता आहे. पण दुःखाची बाब अशी की देशातील गुंतागुंततीच्या समस्या सोडविणारे होण्याऐवजी, मुसलमान स्वतःच एक समस्या बनून राहिले आहेत. मुसलमानांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे सोडून दिले आणि सारा भारत देश काटेरी झुडुपांनी व्यापून गेला आणि सर्वाधिक काटेरी भाग खुद्द त्यांच्या वाट्याला आला आहे.
मुसलमानांच्या वर्तमान स्थितीचे विवेचन करताना एका विचारवंताने त्यांना अगदी सत्य असे सांगितले आहे की ‘तुमचा वर्तमानकाळ वा तुमचा भविष्यकाळ या प्रश्नावर अवलंबून आहे की ईश्वराच्या प्रेषिताकरवी, तुम्हापर्यंत पोचलेल्या ईशमार्गदर्शनाशी तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवहार करीत आहात, ज्या मार्गदर्शनासाठीच तुम्हाला मुसलमान म्हटले जाते? त्या मार्गदर्शनाचे जर तुम्ही अचूक अनुसरण केले आणि तुमच्या सामूहिक जीवनात जर संपूर्ण इस्लामचे प्रतिबिब उमटू लागले, तर तुम्ही जगात विजय प्राप्त कराल, तसेच परलोकात सफलता मिळवाल. भय, अनादर, पराजय व पारतंत्राचे जे काळे ढग तुमच्या डोक्यावर गोळा झाले आहेत ते बघता बघता निघून जातील. तुमच्याकडून न्यायाची आशा केली जाईल, तुमच्या सत्यप्रियतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास टाकला जाईल. तुमचे कथन सत्याचे प्रमाण मानले जाईल. तो काळ आठवण म्हणून इतिहासात एखाद्या कथा-कहाणीच्या स्वरुपात राहील की इस्लामसारख्या विश्वविजयी शक्तीचे अनुयायी कधी काळी इतके मूर्ख बनले होते की ‘मुसा’ (अलै) ची काठी (असा) त्यांच्या हातात असताना ते जादुगारांच्या काठ्यांना आणि दोरांना पाहून भयाने थरथर कापत होते.
उपद्रवातून कल्याण
मुसलमानांच्या सर्व समस्यांचे वास्तविक निराकरण यात आहे. त्यांच्या तात्कालिक आणि प्रासंगिक समस्यांचे तसेच निरंतरच्या जातीयवादाच्या समस्यांचेही हेच निराकरण आहे. निःसंशयपणे देशाच्या समस्यांचा तोडगाही हाच आहे. त्यांच्यावर जी निरनिराळी संकटे येऊन कोसळत आहेत, ती एकीकडे त्यांनी आपले वास्तविक कर्तव्य विसरुन टाकले, या निष्क्रियतेची ती शिक्षा आहे आणि दुसरीकडे त्यांना खडबडून जागृत केले जात आहे. आता तरी सावरून सावध व्हा आणि आपले कर्तव्य पार पाडा नाही तर तुम्हाकडे दुर्लक्ष केले जाईल.
लोकसमूहात जिवंतपणा व चेतना असेल, तर असे हादरे त्यांना जागे करुन सोडतात. अशा दुर्घटनातून लाभ घेण्याची त्यांच्यात क्षमता जर असेल, तर ते जागे होऊन, याच दुर्घटनांना उन्नतीची पायरी (शिडी) करुन टाकतात. भडकणारा अग्नी वार्याच्या झोताने जास्त भडकतो, परंतु मिणमिण जळणारा दीप त्याच वार्याने विझुन जातो. आता तुम्ही भडकणारा अग्नी व्हायचे की मिणमिणणारा व विझणारा दीप व्हायचे हा तुमच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. या उपद्रवामुळे कल्याणाची उत्पत्ती होऊ लागली आहे आणि त्यासाठी ईश्वराचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आता मुसलमान लोक वस्तुस्थितीवर गंभीरपणे विचार-चितन करु लागले आहेत. तिच्या गांभीर्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि झोपेतही ते काही बरळू लागले आहेत.
एका पाठोपाठ एक असे धक्के बसल्याने त्यांचे डोळे उघडले आहेत. ते आपल्या वास्तविक कर्तव्यापासून दूर भरकटले आहेत, ही जाणीवही त्यांच्यात जागृत होऊ लागली आहे. संपूर्ण संघटन करण्याच्या आवश्यकतेची जाणीवही त्यांच्यात उत्पन्न होऊ लागली आहे. त्यांच्या मनात आपल्या अन्न-वस्त्राच्या विवंचनेच्या पुढे जाऊन काही तरी करायला हवे, हा विचारही कधी शिवला नाही, त्यांनाही संघटनेच्या आवश्यकतेची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्यात अनेक अशी माणसे आहेत की एका हाकेवर ओ देण्याची कळकळ त्यांच्या अंतःकरणात आहे, त्यांच्या स्वभावाशी जुळणारी हाक त्यांच्या कानी पडत नाही. आता ‘मुस्लिम समुदाया’च्या ज्येष्ठ व्यक्तींचे हे कर्तव्य आहे की अशा नाजुक प्रसंगी त्यांनी ‘मिल्लत’ला उचित मार्गदर्शन करावे आणि वाईटातून चांगले निघण्याचा जो पैलू समोर येत आहे, उम्मतमध्ये एक प्रकारची तहान निर्माण झाली आहे, तिच्या तृप्तीची तरतूद करावी. देशव्यापी पातळीवर मुस्लिमांना असा कार्यक्रम द्यावा की ते पालापाचोळ्याप्रमाणे उडवून दिले जावू नयेत. त्यांना जीवनशक्तीही प्राप्त व्हावी आणि त्यांनी देशासाठी उपयोगी सिध्द व्हावे.
तात्कालिक व स्थानीय उपाय
वर वर्णन केलेले कार्य, हेच खरे कार्य आहे, परंतु तात्कालिक व स्थानिक पातळीवर करण्याची काही कामे अशी आहेत, ज्यावर सहानुभूती बाळगणार्या लोकांनी लक्ष ठेवायला हवे.
  1. दंगलग्रस्त क्षेत्रात साधारणतः भीतीचे व हालअपेष्टांचे वातावरण बनते आणि भल्याभल्या माणसांची मती कुंठित बनते. त्याचप्रमाणे काही अतिउत्साही माणसे भावनेच्या भरात एखादे अनुचित कृत्य करुन टाकतात. या दोन्ही गोष्टींपासून धोका संभवतो अशी अवस्था दूर करण्याचे ठोस प्रयत्न व्हायला पाहिजेत. या बाबतीत मूळ गोष्ट तर ईश्वरावर भरवसा असला पाहिजे, परंतु त्याचबरोबर अन्य काही गोष्टीही या प्रयत्नात सहाय्यभूत ठरतात. उदाहरणार्थ, ऐकण्यात आलेल्या प्रत्येक अफवेवर विचार केल्याविना विश्वास केला जाऊ नये, आपल्या चुकांवरही लक्ष ठेवणे, विरोधी पक्षाच्या भूमिकेतून दंगलीसंबंधी विचार करणे, चित्राच्या दोन्ही बाजू पाहणे, कृती करणारे हात मूळ नसून, कृती करायला लावणारी मस्तके, मूळ आहे. हे दृष्टीसमोर ठेवायला हवे. अशा प्रकारच्या गोष्टी दृष्टीसमोर ठेवल्याने मानसिक समतोल राहातो आणि समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होते.
  2. विरोधी पक्षाकडे स्वतः होऊन मैत्रीचा हात पुढे करणे फार कठीण काम आहे. एखादा माणूस हातात लाठी घेऊन तुमच्या अंगावर धावून येतो तेव्हा तुम्ही त्याला प्रेमाने आलिगन देण्यासाठी समोर जाणे ही मोठ्या शौर्याची गोष्ट आहे. सत्य असे आहे की त्यापेक्षा अधिक परिणामकारक तलवार अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. असे करण्याचे साहस असेल तर ‘खोडसाळपणात स्पर्धा’ करण्याऐवजी ‘सज्जनपणात स्पर्धा’ करण्याचा आरंभ होऊ शकतो. तथापि ही गोष्ट नीट लक्षात ठेवावी की बरोबरीच्या दर्जाने मैत्रीचा हात पुढे करणे आणि निराशेने शरणागत होणे, यात मोठा फरक आहे. आपले अस्तित्व दुसर्याच्या अधीन करणे, यात सज्जनपणाही नाही किवा औदार्यही नाही.
  3. आपसात सहानुभूतीची व सहाय्य करण्याची भावना वाढविणे, दान करण्यास सदैव तत्पर राहाणे, कोणत्याही आधारशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहाण्याचा दृढ संकल्प करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे अधिकांश वाईट गोष्टींचे जे मूळ आहे, ती स्वार्थपरायणता, हट्टीपणा व दुही आणि फाटाफूट दूर करणे आपले अनिवार्य कर्तव्य ठरते. संघटन व नेतृत्वाचे केंद्र नसल्याची केवळ जाणीव व त्याबद्दल केवळ गार्हाणी करुन अगर तसे केंद्रस्थान स्थापण्याची केवळ अभिलाषा बाळगणे पुरेसे नाही. यासाठी प्रांजळपणे प्रयत्न आवश्यक आहे, हे मनावर चांगल्या रीतीने बिबविले पाहिजे. कोणतेही नेतृत्व आकाशातून पडत नाही. आपल्यातूनच ते उदयाला येईल. त्यासाठी उच्छृंखलपणा सोडून, स्वतःला संघटनेच्या चौकटीत बांधून घेण्याची तयारी ठेवायला हवी.
  4. वरील उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी प्रत्येक मोहल्ल्यात समिती स्थापन होणे आवश्यक आहे. या समितीकडे ‘जकात’ व ‘दान’ यांची सामूहिक रीतीने वसुली करण्याची जबाबदारीही सोपविली जावी. ‘बैतुल-माल’ची स्थापना केली जावी. आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सलोखा राहील व अशांतता व उपद्रव दाबला जाईल, असे जनमत त्यांनी निर्माण करावे. अशा चांगल्या उद्दिष्टांसाठी तयार करणे आणि त्यांनाही सहकार्य देणे गरजेचे आहे. या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हंगामी परिस्थितीत ज्या शांतीसमित्या स्थापन केल्या जातात, त्यात अधिकांश माणसे तीच असतात ज्यांनी दंगलखोरांची पाठराखण केलेली असते. या समित्यांना एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे साधन केले जाते.
    म्हणून अशा शांति-समित्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधरणतः काहीच सहाय्यकारक ठरत नाहीत. अशा समित्यांमध्ये त्याच लोकांना घेतले पाहिजे जे फार प्रख्यात नसू देत, परंतु स्वहित व पक्षहितापासून वर येऊन केवळ सेवाभावाने व निखालस ईशसेवेच्या भावनेने कार्य करण्याचे त्यांच्यात धैर्य असावे. ही गोष्ट तेव्हाच शक्य होईल, जेव्हा भल्याबुर्याची पारख करणारी नीर-क्षीर वृत्तीची ओळख आम जनतेला होईल.
  5. मदत कार्य नियमितपणे केले जावे अथवा सहानुभूती बाळगणार्या स्वयंसेवी लोकांनी ते कार्य करावे. दंगलपीडितांमध्ये आपल्या जातीचे कोण आहेत आणि दुसर्या जातीचे कोण आहेत, या हीन भावनेने हे सेवाभावी कार्य कधीही गलिच्छ करु नये. ज्या कोणावरही जुलूम-अत्याचार झालेला आहे. तो सच्चा मनाच्या व निःपक्षपाती माणसाच्या सहानुभूतीस व मदतीस पात्र आहे. त्याचप्रमाणे धर्म व जातीचा विचार न करता, अत्याचार करणारांनाही मदत केली जावी त्यांची मदत अशी करायची की त्यांना अत्याचार करण्यापासून रोखण्याचे ठोस प्रयत्न करायला हवेत.
  6. साधारणतः दंगलींचा शेवट, पोलिसांनी खटले भरल्यावर होतो. ते टाळणे तर शक्य नाही. सर्वसाधारण पोलीस प्रकरणात ज्या मार्गाचा अवलंब केला जात असतो, ते जातीय दंगलीसंबंधी खटल्यात कदापि वापरले जाऊ नयेत. खोटे बोलणे, बनावट साक्षीदार हजर करणे, अथवा आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यापेक्षा, खरे बोलून शिक्षा भोगणे हजारपटीने चांगले आहे. ज्या माणसात सत्यावर ठामपणे राहण्याची शक्ती असते, तेच मैदान मारु शकतात. काही ताजी उदाहरणे अशी आढळून आली आहेत की काही धैर्यवान माणसांनी सत्य व निःपक्षपाती जबाब देऊन न्यायालयालाही आर्श्चचकित केले आणि विरुध्द पक्षाच्या लोकांच्या माना खाली गेल्या.
हे काही विचार आहेत, ज्यावर सर्वांनी विचार करावा असे आम्हाला वाटते. सामान्य परिस्थितीतही ते विचार करण्यायोग्य आहेत आणि दंगलीच्या तणावग्रस्त अवस्थेत तर ते कार्यान्वित करणे अत्यंत निकडीचे आहे. सामान्य परिस्थितीतच ते कार्यान्वित करण्याचा प्रबंध केला गेला, तर (ईश्वरी इच्छा असल्यास) तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची वेळच येणार नाही. निष्कर्ष अनेक असू शकतात, परंतु सत्य असे आहे की मूळ गोष्ट हे निष्कर्ष नव्हे, हे सोनेरी सिध्दान्त नव्हेत अगर कार्यक्रमही नव्हेत. तर मूळ गोष्ट आहे अंतःकरणाची ओढ, ईमानची तळमळ, सेवाभावना व सत्यावर दृढपणे राहाण्याचे धैर्य. ईश्वरी कृपेने आपल्या समाजात या गुणांची उणीव नाही. उणीव आहे ती केवळ संघटित होऊन कार्याला वाहून घेण्याची!


एखाद्या माणसाला जीवे मारणे हे किती मोठे पाप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. एका माणसाची हत्या करणे म्हणजे समस्त मानवजातीची हत्या करण्यासम असल्याचे कुरआनात म्हटले आहे.(संदर्भ : सूरह-ए-माइदा : ३२) म्हणूनच इस्लामने मानवहत्या करण्याची शिक्षासुद्धा कठोर स्वरुपाची दिली आहे. शिवाय ही शिक्षा ईह आणि पारलौकिक या दोन्ही जीवनात तजवीज करण्यात आली आहे. मानवहत्या करणारी व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीत राहणार. कुरआनात म्हटले आहे,
‘‘जो माणूस एखाद्या श्रद्धावंतांची हत्या करील, त्याची शिक्षा नरकाग्नी आहे, ज्यात तो नेहमीकरिता राहणार. त्याच्यावर ईश्वराचा क्षोभ आणि धिक्कार आहे आणि ईश्वराने त्याच्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा ठेवली आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ९३)

इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा विविध पैलूंनी लागू करण्यात आली आहे.
  1. किसास - अर्थात प्राणाच्या बदल्यात प्राण घेणे, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा देणे.
  2. दैयत - अर्थात खून झालेल्या व्यक्तीच्या वारसांना योग्य खूनभरपाई देणे.
  3. प्रायश्चित्त - यांत गुलाम स्वतंत्र करणे अगर दोन महिने सतत रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे होय.
  4. वारसासंपत्ती हक्कापासून वंचित ठेवणे-जर खुनी हा खून झालेल्या व्यक्तीचा वारसदार असेल तर ही शिक्षा देण्यात येईल.
  5. वारसापत्राच्या हक्कापासून वंचित ठेवणे-जर मयताने आपल्या संपत्तीमधून काही प्रदान करण्याची सूचना केली असेल तर ते विश्वसनीय नसेल.
कुरआनात म्हटले आहे,
‘‘तौरातमध्ये आम्ही यहूदींवर हा आदेश लिहिला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्व जखमांसाठी बरोबरीचा बदला, मग जो किसासचा सदका करेल, त्याच्यासाठी प्रायश्चित आहे, आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)
तसेच,
‘‘कोणत्याही श्रद्धावंताचे हे काम नाही की त्याने इतर श्रद्धावंताची हत्या करावी. केवळ याऐवजी की त्याकडून चूक घडावी आणि जी व्यक्ती एखाद्या श्रद्धावंताची चुकून हत्या करते, त्याचे प्रायश्चित्त हे आहे की, एका श्रद्धावंत गुलामास मुक्त करावे आणि जर मयत व्यक्ती तुमच्या शत्रुपक्षाची असेल तर याचे प्रायश्चित्त हेच आहे की एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा आणि ती मयत व्यक्ती जर मुस्लिमेतर समूहाची सदस्य असेल, ज्याच्याशी तुमचा शांतीकरार असेल तर त्या मयताच्या वारसांना खूनभरपाई देण्यात यावी आणि एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा. मग ज्याला गुलाम मुक्त करण्यासाठी मिळाला नाही, त्याने सतत दोन महिने उपवास ठेवावेत. हे या अपराधाचे प्रायश्चित्त करण्याची पद्धत आहे आणि ईश्वर खूप दयाळू वतत्वज्ञानी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ९२)
हत्येचे प्रकार
शरीअतमध्ये हत्येचे विविध प्रकार वर्णन करण्यात आले असून त्याच प्रकारांनुसार शिक्षा लागू करण्यात आली आहे.
  1. जाणूनबुजून हत्या करणे
    या प्रकारामध्ये खून करणारी व्यक्ती पूर्ण तयारीनिशी आणि जाणूनबुजून माणसाचा प्राण जाईपर्यंत मारते आणि प्राण गेल्यावरच त्याला सोडते. याच्या दोन अटी आहेत. पहिली अशी की मयत जीवंत आणि मानव असावा, अर्थात मृतास ठार करण्यामुळे आणि मयत हा मानव नसेल तर शिक्षा लागू होणार नाही. दुसरी अट अशी की मयत व्यक्तीचे प्राण हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे गेलेले असावे. नसता हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण न जाता इतर कोणत्याही कारणास्तव गेले असेल तर शिक्षा लागू होणार नाही.
  2. विनाहेतु हत्या होणे

  3. खुन्याने हत्या करण्याच्या उद्देशाने मारले नसेल मात्र खून झाला तर यासाठी गुन्हा सिद्ध होण्याच्या तीन अटी आहेत. पहिली अशी की मयत हा खुन्याच्या प्रयत्नातून मेला असावा, दुसरी अट अशी की खुन्याने मयतावर अतिरेक केला असावा आणि तिसरी अट अशी की मृत्यू आणि मृत्यूच्या सबबीमध्ये संबंध असावा. या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या तरच खुन्यास शिक्षा देण्यात येईल.
  4. चुकून झालेली हत्या

  5. उदाहरणार्थ, एखादा माणूस सिंहाची शिकार करीत होता आणि बंदुकीची गोळी चुकून एखाद्या माणसाला लागली, तर याला चुकून झालेली हत्या म्हणता येईल.
यामध्ये पहिल्या प्रकारची हत्या केल्यास खुन्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. अथवा दैयत(खून भरपाई), वारसासंपत्तीचा अधिकार न देणे वगैरेची शिक्षा देण्यात येईल. दुसर्या प्रकारची शिक्षा झाल्यास दैयत(खूनभरपाई) प्रायश्चित्त अथवा दंडविधान अथवा दोन महिन्यांचे रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे, ही शिक्षा लागू होईल. शिवाय अतिरिक्त शिक्षा म्हणून वारसाहक्कापासून वंचित ठेवण्यात येईल. तिसर्या प्रकारची मानवहत्या झाल्यास याची मूळ शिक्षा ही दैयत(खूनभरपाई) आणि प्रायश्चित्त होय. यात अतिरिक्त शिक्षा म्हणून दंड आणि रोजे, तसेच वारसासंपत्तीचा हक्क हिसकावणे होय.
गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी व शर्तीहत्येचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी निम्नलिखित अटी व शर्ती आवश्यक आहेत.
  1. खुनी हा वयात आलेला, मानसिक स्थिती सुदृढ असलेला आणि स्वतंत्र असावा.
  2. मृत व्यक्तीने कोणाचीही हत्या केलेली नसावी अथवा ती सामरिक द्रोही नसावी अर्थात धर्मयुद्धातील शत्रुपक्षाची नसावी, इस्लाम त्यागलेली विवाहित आणि व्यभिचारी नसावी.
  3. मयत व्यक्तीने खुन्यावर हल्ला केलेला नसावा, म्हणजेच खुन्याने आत्मरक्षण करण्यासाठी मयताचा खून केलेला नसावा.
  4. मयत व्यक्ती ही मुस्लिम असो वा मुस्लिमेतर खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.
  5. खुनी आणि मयत व्यक्ती समलिंगी असावी.
या अटी व शर्ती पूर्ण झाल्यावरच खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.

- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी

    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे - 20    मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/9hlr0rshbo1exa9wzr93mvs83p92y59x

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य लोकांना कर्ज देत असे. मग तो आपल्या कर्मचाऱ्याला, ज्याला तो कर्ज वसूल करण्यासाठी पाठवत होता, समजावून सांगत असे की  जर तू एखाद्या गरीब कर्जदाराकडे जाशील तेव्हा त्याला क्षमा कर, कस्रfचत अल्लाह आम्हाला क्षमा करील.’’ पैगंबरांनी पुढे सांगितले, ‘‘जेव्हा हा मनुष्य अल्लाहला भेटला तेव्हा  अल्लाहने त्यास क्षमा केली.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू कतादा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने आपल्याला अंतिम निवाड्याच्या दिवशी दु:ख व यातना देऊ नये असे ज्या मनुष्याला  वाटते त्याने गरीब कर्जदाराला ढील द्यावी अथवा त्याचे कर्ज माफ करावे.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नमाज अदा करण्यासाठी एक ‘प्रेतवस्त्रात गुंडाळलेले शव’ (जनाजा) आणण्यात आले, तेव्हा  पैगंबरांनी विचारले, ‘‘या मयत इसमावर एखादे कर्ज आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘होय! याच्यावर कर्ज आहे.’’ पैगंबरांनी विचारले, ‘‘याने काही संपत्ती मागे सोडली आहे काय   ज्यातून ते कर्ज फेडता येईल?’’ लोक म्हणाले, ‘‘नाही.’’
यावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण याच्या ‘जनाजाची नमाज’ अदा करा (मी अदा करणार नाही).’’ ही उद्भवलेली सद्यस्थिती पाहून माननीय अली (रजि.) यांनी पैगंबरांना  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मी हे कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतो.’’
मग पैगंबर (स.) पुढे आले आणि नमाजचे नेतृत्व केले. मग म्हणाले, (जसे- दुसऱ्या एका हदीसमध्ये आले आहे.) ‘‘हे अली! तू ज्याप्रमाणे आपल्या या मुस्लिम बंधुच्या प्राणास मुक्ती  दिली, त्याप्रमाणे अल्लाह तुझे आगीपासून रक्षण करो आणि तुझ्या प्राणाचे रक्षण करो. कोणीही मुस्लिम मनुष्य असा नाही जो आपल्या मुस्लिम बंधुकडून त्याचे कर्ज फेडील, मात्र  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला मुक्ती देईल.’’ (हदीस : शरहुस्सुन्ना)

स्पष्टीकरण
वर उद्धृत करण्यात आलेल्या दोन्ही हदीसद्वारे कर्जफेड करण्याचे महत्त्व अतिशय सुलभपणे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या मार्गात प्राणार्पण करणाऱ्या मनुष्यावर जर  एखाद्याचे कर्ज असेल आणि फेडून आला नाही तर ते माफ केले जाणार नाही, कारण याचा संबंध भक्तांच्या अधिकाराशी आहे, जोपर्यंत कर्ज देणारा माफ करणार नाही, तोपर्यंत  अल्लाहदेखील माफ करणार नाही. जर एखाद्या मनुष्याची देण्याची मनिषा असेल आणि देऊ न शकला तर अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह कर्ज देणाऱ्याला बोलवून घेईल आणि  कर्जदाराला माफ करण्यास सांगेल आणि त्याबदल्यात त्याला नंदनवनातील (जन्नतमधील) देणग्या प्रदान करण्याचे वचन देईल, तेव्हा कर्ज देणारा आपले कर्ज माफ करील, परंतु जर  एखाद्याकडे कर्जफेडीची क्षमता आहे तरीही त्याने फेडले नाही आणि कर्जदाराला त्याच्या कर्जाची परतफेड केली नाही अथवा जगात त्याच्याकडून कर्जमाफी घेतली नाही तर त्याच्या  माफीस अंतिम निवाड्याच्या दिवशी कसलेही स्थान नाही.

Islamic Law
वर्तमानकाळात ईर्ष्या आणि लालसेने माणूस पार पिसाळून गेला आहे. जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल, यासाठी ना-ना काळ्या-पांढर्या पद्धतींचा तो अवलंब करीत आहे. यामुळेच आज सर्वच भ्रष्टाचार आणि काळ्या बाजाराचा वणवा पेटला आहे. मामुली चपराशापासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वच यात बरबटलेले आहे. जो जितका शासनकर्त्यांच्या जवळचा चमचेगिरी करणारा आहे, तितका जास्त भ्रष्ट आहे. याचे कारण असे आहे की, आज माणूस संपत्ती आणि पैशांनाच जास्त महत्त्व देत आहे. पैसा असला की, वैभव, प्रतिष्ठा, समाजावर वचक, प्रसिद्धी आणि ऐशो- आरामाचे जीवन, असे जणू समीकरणच तयार झाले आहे. यासाठी वाटेल त्याचा गळा चिरायचा, खिशावर डल्ला मारायचा आणि वाटेल ते कृष्णकृत्य करायचे, मात्र पैसा कमवायचाच, अशी सर्वत्र मानसिकता बळावली आहे. याउलट माणूस कितीही चारित्र्यवान असला, विचारवंत असला, ज्ञानी, सभ्य, आणि उच्चशिक्षित असला, मात्र जर त्याच्याकडे पैसाच नसेल, तर त्याच्या जगण्याला जणू काही अर्थच नाही. त्याला कोणी हुंगतही नाही. त्याला सर्वजण मूर्खात काढतात. त्याला कोणी किंमत देत नाही. कुत्रीही भुंकायला तयार होत नाहीत. त्याला तुच्छ आणि हिनतेच्या भावनेने पाहिले जाते. याच मानसिकतेमुळे समाज दिवसेंदिवस पोकळ होत चालला आहे. मात्र समाजास भ्रष्टाचार आणि काळाबाजारीपासून मुक्त करायचे असेल तर ही विचारमूल्ये बदलायलाच हवी, धन-दौलत आणि संपत्तीला महत्त्व देण्याऐवजी इस्लामी विचारसरणी आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. अर्थातच संपत्ती आणि पैशांना महत्त्व देण्याऐवजी चारित्र्य, सभ्यता, ईशपरायणता आणि सदाचाराला महत्त्व देण्याची मानसिकता यावी. ईश्वराने स्पष्टपणे म्हटले आहे की प्रतिष्ठा आणि श्रेष्ठत्वाचा मूळ आधार हा या इहलोकातील धन-संपत्ती आणि वैभवाचा दिखाऊपणा मुळीच नाही.
‘‘वस्तुतः प्रतिष्ठा ही केवळ ईश्वरालाच आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३९)
‘‘वस्तुतः ईश्वराजवळ तुमच्यांपैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित आणि श्रेष्ठ माणूस तो आहे, जो सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे. निश्चितच केवळ ईश्वरालाच सर्वकाही ज्ञान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)
उपरोक्त आयतीवरून हेच स्पष्ट होते की, पैसा आणि संपत्ती नसल्याने माणूस हा तुच्छ आणि हीन मुळीच असू शकत नाही. तर खरी किंमत ही माणसाच्या सभ्यता, सदाचार आणि ईशपरायणतेमध्ये असल्याने आपण अशा व्यक्तीचा आदर करावयास हवे, तरच समाज हा अपराधमुक्त होऊ शकतो. पैशांना अवाजवी महत्त्व न देणारा कधीच भ्रष्ट होत नाही, लाच घेत नाही, इतरांचे शोषण करीत नाही, इतरांच्या कल्याणासाठी आपल्या जवळील संपत्तीसुद्धा खर्च करतो.
आज आपण पाहतो की, शासकीय वा निमशासकीय अधिकारी पैसा मिळविण्यासाठीच शासनाचेच नव्हे तर माणुसकीचे नियमसुद्धा धाब्यावर बसवून मनमुरादपणे आणि जणू आपला जन्मसिद्ध हक्क समजून आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करतात. मात्र इस्लामने अशी शिकवण दिली आहे की सरकारी पद अगर अधिकार आणि हुद्दा हा मुळात एक मोठी जवाबदारी आहे. केवळ ईश्वराप्रतिच नव्हे तर जनतेप्रतिसुद्धा मोठी जवाबदारी आहे. ती मात्र प्रामाणिकपणे पूर्ण करण्यात यावी. प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळातील एक घटना आहे,
‘‘प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इब्ने लतबिया(र.) यांची ‘सलीम‘ कबिल्याच्या लोकांकडून जकात आणि दानाची रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी नेमणूक केली. जेव्हा त्यांनी जकात आणि दानाची रक्कम वसूल करून प्रेषितांसमोर हजर झाले आणि प्रेषितांनी त्यांचा हिशेब घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘हे प्रेषिता! या काही वस्तु माझ्यासाठी लोकांनी भेट म्हणून दिल्या आहेत. आपण मला भेट म्हणून आलेल्या वस्तु स्वीकारण्याची परवानगी द्यावी.‘ यावर प्रेषित मुहम्मद(स.) ताडकन म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरीच बसायचे असते, जेणेकरून या वस्तु भेट म्हणून तुम्हाला स्वीकारता आल्या असत्या.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच ज्यांच्याकडून जकात वसुलीकरिता त्यांना पाठविण्यात आले होते, त्यांच्याकडून सप्रेम भेट म्हणून आलेल्या वस्तुसुद्धा स्वीकारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मुळीच परवानगी दिली नाही. तर मागून घेण्यात येणारी लाच तर आणखीनही गंभीर अपराध आहे आणि इस्लामने यासाठी कठोर शिक्षा नेमली आहे.
हा तर झाला लाचलुचपतीचा प्रकार. याशिवाय आर्थिक शोषणाचे आणखीनही बरेच प्रकार आहेत. पैकी ज्याच्याकडून मेहनत-मजुरीचे काम करून घेण्यात येते, त्याला त्याच्या मेहनत-मजुरीचा योग्य मोबदला देण्यात येत नाही. आज भांडवलदार आणि उद्योगपतीवर्ग मजुरांच्या रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा शोषून घेत आहे, मात्र त्याला खरा आणि योग्य मोबदला देत नाही. कायदासुद्धा मजुराला न्याय मिळवून देण्यात हतबल झालेला दिसतो. तुटपुंजा मजुरीतून तो अर्धपोटी आणि उपासमारीचे खडतर जीवन आज कंठित आहे. मात्र इस्लामी कायद्याने अशी शिकवण दिली आहे की मेहनत-मजुरी आणि कारागिरी वगैरे करणार्यांना त्यांच्या पात्रतेनुसार आर्थिक मोबदला देण्यात यावा आणि तेही त्याची प्रतिष्ठा जोपासून द्यावा. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वराने म्हटले आहे, अंतिम निवाड्याच्या दिवशी तीन प्रकारच्या गुन्हेगारांना मी अवश्य शिक्षा देणार. पैकी पहिला गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने माझी शपथ घेऊन कोणाला अभय दिले असेल आणि मग गद्दारी अगर दगा केला असेल, दुसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोण्या एखाद्या गुलाम नसलेल्या व्यक्तीस गुलाम बनवून विकले आणि त्याची रक्कम गिळली आणि तिसरा गुन्हेगार म्हणजे तो माणूस ज्याने कोणाकडून मजुरी वा शारीरिक कष्टाचे काम करून घेतले, मात्र त्याच्या कामाचा मोबदला दिला नाही.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
त्याचप्रमाणे मजुराचे घाम सुकण्यापूर्वी त्याच्या मजुरीचा पूर्ण मोबदला देण्याची सक्तीने ताकीदसुद्धा इस्लामने केली आहे. यामुळे निश्चितच श्रीमंताविषयी मजुराच्या मनात आदर निर्माण होईल आणि तो चोरी, डकाइती आणि भ्रष्टाचाराकडे वळणार नाही.

Justice
इस्लामने गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यासाठी ‘हद‘, मृत्यूदंड व देहदंड अर्थात ‘किसास‘ चे कलम लागू केले आहे. मात्र हे लागू करण्यासाठी ज्या अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत, त्या कधीकधी पूर्ण होत नाहीत. मग अशा परिस्थितीत गुन्हेगारास मुक्त सोडावे की अपराधानुसार शिक्षा द्यावी? शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये गुन्हेगारास निश्चितच शिक्षा मिळावी, अशी भूमिका आहे. अन्यथा समाज हा उपद्रवमुक्त होणार नाही. याकरिता त्यावर दंडविधान लागू करण्यात आले आहे. म्हणून आपण इस्लामी कायद्याने प्रदाने केलेले दंडविधान आणि त्याचे नियम व पद्धतींचा थोडक्यात अभ्यास करु या. त्याचप्रमाणे इस्लामी दंडविधानाचा वर्तमान दंडविधानाशी तुलणात्मक वेध घेऊ या, जेणेकरून वर्तमान दंडविधानातील त्रुट्या आणि कमतरता दूर करण्याची विवेकबुद्धी मिळावी.
दंडविधानाचे उद्दिष्ट
‘किसास‘ अर्थात शारीरिक क्षती व हानीचा जशास तसा बदला घेण्याच्या शिक्षेचा जो हेतु आणि उद्देश आहे, तोच दंडविधानाचासुद्धा आहे. इस्लामी तत्त्वज्ञ माननीय जीलई म्हणतात की, अपराध अगर गुन्हेगारीची पुनरावृत्ती होऊ नये, गुन्हेगाराने परत तो गुन्हा करू नये आणि इतरांनीही यापासून बोध घ्यावा, हाच दंडविधानाचा मूळ हेतु आहे. शिवाय विनाकारण आणि अतिरिक्त शिक्षा देण्याची इस्लामने मनाई केली आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गुन्हेगारास केवळ तंबी केल्यास परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल अथवा हलका चोप देऊन किंवा दमदाटी करून तो परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर एवढ्यावरच काम भागवावे. अथवा त्यास गुन्हा केल्याची जाणीव करून देण्यासाठी धिक्कारून बोलण्यामुळे अथवा कैद करून ठेवल्याने परत गुन्हा न करण्याची शाश्वती असेल तर अतिरिक्त शिक्षा देणे योग्य नसल्याचे इस्लामी कायद्याने म्हटले आहे.
दंडविधानाचा एक हेतु हा अपराध्याचे मनपरिवर्तन करून त्यात सुधारणा घडविणेसुद्धा आहे. त्याला आपल्या पाप अगर अपराधावर पश्चत्ताप झाला. तर समजा हे त्याच्यात सुधार झाल्याचे चिन्ह होय. जर त्यास कैदेची शिक्षा दिली आणि त्याला आपल्या दुष्कर्मावर पश्चात्ताप झाला आणि त्याने ईश्वरासमोर आपल्या करणीची माफी मागितली तर त्यास कैदमुक्त करण्यात येईल.
दंडविधानाचे आणखीन एक उद्दिष्ट असे की गुन्हेगाराने ज्याच्यावर शारीरिक अत्याचार केला, त्याच्या मनात खदखदणारा गुन्हेगाराविषयीचा संताप थंड व्हावा आणि त्याचे मन-मस्तिष्क गुन्हेगाराविषयी द्वेश आणि वैरमुक्त व्हावे.(संदर्भ : दुर्रे मुख्तार, अल-बहरुर्राइक, फतावा हिन्दिया आलमगीरिया)
दंडविधानाची मर्यादा
शरीअतने विविध अपराधांवर दंडविधान लागू केले असले तरी या बाबतीत खबरदार केले की गरज असेल तेवढेच दंडविधान लागू करण्यात यावे. विनाकारण आणि हकनाक अपराध्यास छळू नये. नसता दंडविधानाचा हेतु नष्ट होईल. म्हणूनच अपराध्याचा एखादा अवयव निकामी होण्याइतपत कठोर मारझोड होता कामा नये.(संदर्भ : अलमुग्नी)
दंडविधानाचे प्रकार
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यात दंडविधानाचे विविध स्वरुप व प्रकार वर्णन करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, शारीरिक शिक्षा, आर्थिक दंड, कैदेची शिक्षा, शहराबाहेर करणे अर्थात तडीपार करणे वगैरे विशेष उल्लेखनीय होय. शारीरिक शिक्षा म्हणजे गुन्हेगारास दंडात्मकरित्या मृत्यूची शिक्षा देणे, कोरडे मारणे ही विशेष शिक्षा होय. पुढे या प्रकारांवर थोडी वर्णनात्मक चर्चा करण्यात येत आहे.
दंडविधानानुसार मृत्यूदंड
इस्लामी कायद्यात ‘किसास‘(बदला घेण्याची शिक्षा) नुसार मृत्यूदंड देता येतो, याव्यतिरिक्त दंडविधानानुसारसुद्धा मृत्यूदंड देण्याची शिक्षा देणे वैध आहे. त्याचप्रमाणे समलिंगी संभोग करणार्यांना मृत्यूदंड देता येईल, चोरी करणार्यांचे हात कापता येतील, धारदार शस्त्रांचा वापर न करता(लाठी, दगडांचा वापर करून) खून करणार्याससुद्धा दंडविधानानुसार मृत्यूदंडाची शिक्षा देता येईल, जादूगिरी करणार्यालासुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय दारू पिणार्यास चौथ्यांदा हा अपराध केला असेल तर त्यासही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. या दंडविधानासाठी प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या या वचनाचा आधार घेण्यात आला आहे,
‘‘माननीय वैलहम हुमैरी(र.) यांनी म्हटले की मी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना विचारले,
‘आम्ही एका थंड प्रदेशात राहतो. तेथे खूप थंडी लागत असल्याने गव्हापासून मदिरा तयार करण्यात येते व ती मदिरा उष्णता व शक्ती प्राप्त करण्यासाठी पिण्यात येते. तेव्हा अशा परिस्थितीत दारू पिणे वैध आहे काय?‘
‘‘त्या दारूमध्ये नशा आहे काय?‘‘ प्रेषितांनी विचारले.
‘‘होय! ती दारू पिल्याने झिंग चढते,‘‘ मी उत्तरलो.
‘‘मग ती दारू पिऊ नये.‘‘ प्रेषित म्हणाले.
‘‘मात्र लोक ऐकणार नाहीत.‘‘ मी म्हणालो.
‘‘तर मग ते दारू सोडेपर्यंत त्यांच्याशी सशस्त्र लढाई करा.‘‘
प्रेषित म्हणाले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - अबू दाऊद)
याशिवाय आणखीन एका प्रेषितवचनाचा या दंडविधानास आधार आहे, तो असा की एकदा प्रेषित मुहम्मद(स.) यानी म्हटले,
‘‘ईश्वर एक आहे, अशी ग्वाही देणार्या कोणत्याही मुस्लिमाची हत्या वैध(हलाल) नाही, मात्र तीन कारणास्तव त्याची हत्या वैध ठरते. प्रथम असे की, विवाहित असूनही व्यभिचार करण्याच्या अपराधास्तव, त्याची हत्या करण्यात येईल. दुसरे असे की, त्याने एखाद्याची हत्या केली असेल तर ‘किसास‘(मृत्यूदंडाच्या शिक्षे) नुसार त्याची हत्या करण्यात येईल आणि तिसरे असे की त्याने इस्लामचा त्याग केला असेल तर त्याची हत्या करण्यात येईल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह-मुस्लिम)
आणखीनही अशा बर्याच प्रेषितवचनांच्या आधारे इस्लामी दंडविधानानुसार मृत्युदंडाची शिक्षा देता येते.
कोरड्यांची शिक्षा
व्यभिचार, दारू पिणे वगैरेची कोरडे मारून शिक्षा देण्याचे प्रमाण कुरआन व प्रेषितवचन शास्त्रात आहे. मात्र दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देण्याचे प्रमाण आहे काय? तर याबाबतीत इस्लामी कायदातज्ञांची भूमिका आहे की, दंडविधानानुसारही अपराध्यास कोरडे मारण्याची शिक्षा देता येते. कारण पत्नीने पतीची अवज्ञा केल्यास हलक्या-फुलक्या पद्धतीने पत्नीस मारण्याची परवानगी कुरआनात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की ‘हद‘च्या शिक्षेव्यतिरिक्त इस्लामी दंडविधानानुसार कोरडे मारण्याची शिक्षा देता येते, मात्र जास्तीतजास्त दहाच कोरडे मारण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परवानगी दिली आहे. इस्लामी विधीशास्त्रज्ञ माननीय कासानी यांनी म्हटले आहे की ज्या अपराधांची ‘हद‘नुसार शिक्षा तजवीज करण्यात आलेली नाही, त्यासंबंधी तत्कालीन शासकाने अथवा न्यायाधीशाने चोप देण्याची, कैद करण्याची, दमदाटी करण्याची शिक्षा अपराधाच्या गांभीर्यानुसार ठरवावी. शिवाय इस्लामी दंडविधानात कोरडे मारण्याची शिक्षा द्यावी.(संदर्भ : बदायुस सनाएअ)
कोरडे मारण्याची मर्यादा
इस्लामी कायद्याची अशी भूमिका आहे की अपराधानुसार जी शिक्षा ‘हद‘च्या प्रमाणात असते, त्यापेक्षा थोडी कमी असावी. उदाहरणार्थ, व्यभिचाराच्या अपराधाची ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा शंभर कोड्याची आहे, मात्र दंडविधानानुसार एंशी कोरडे मारण्यात येतील, व्यभिचाराचा चुकीचा आरोप लावण्याच्या अपराधास्तव ‘हद‘ स्वरुपाची शिक्षा जी काही असेल, त्यापेक्षा दंडविधानात कमी देण्यात येईल. त्याचप्रमाणे दारु पिणे, चोरी करणे वगैरेच्या शिक्षेसंबंधी नियम आहे.
कोरड्यांची किमान मर्यादा
जेवढे कोरडे मारून दंडविधानाच्या शिक्षेचा हेतु पूर्ण होत असेल, तेवढे कोरडे मारावेत. अर्थात कमीतकमी तीन आणि जास्तीतजास्त एकोणचाळीस कोरडे मारता येतील.(संदर्भ : अलमुग्नी)
कैद व बंदीवान बनविण्याची शिक्षा
अर्थातच माणसाचे व्यक्तीगत स्वातंत्र्य हिरावून घेणे म्हणजे कैद करण्याची शिक्षा देणे होय. म्हणजे त्याला आपल्या मर्जीने काहीही करता येऊ नये. अशा रितीने म्हणजेच अपराध्याला कैद करून ठेवण्याची शिक्षा इस्लामी दंड विधानात आहे.(संदर्भ : अलमुग्नी)
इस्लामी कायद्यात असेदेखील आहे की वेळ पडल्यास कैदेबरोबरच गुन्हेगारास कोरड्यांचीही शिक्षा देण्यात येईल. अर्थातच हे अपराधाचे गांभीर्य समोर ठेवूनच निश्चित करण्यात येईल आणि आर्थिक दंडही आकाण्यात येईल.(संदर्भ : अल बहरुराईक)
कैदेच्या शिक्षेचे प्रकार
कैदेचे दोन प्रकार आहेत, एक विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद आणि मुदत निश्चित न केलेली कैद अथवा आजीवन कैद. आजीवन कैद ही अपराध्याच्या सुधारणास्तव असो की इतर कोणत्याही हितासाठी असो, यांचा आपण खाली अभ्यास करणारच आहोत.
विशिष्ट मुदतीपर्यंतची कैद
इस्लामी कायद्याने काही अपराधांची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. उदाहरणार्थ, शिवीगाळ करणे अथवा अभद्र शब्दांचा वापर करण्याची कैदेची शिक्षा देण्याची मुदत निश्चित केली आहे. त्याचप्रमाणे दारू पिणे, व्यापारात दगाबाजी करणे अगर व्याजाचा व्यवहार करण्याची शिक्षा कैदेच्या स्वरुपात निश्चित केली आहे. म्हणजे आपल्या अपराधाचा पश्चात्ताप होऊन ईश्वरासमोर क्षमा-याचना केल्यास ही मुदत पूर्ण होते.
खोटी साक्ष देणार्या गुन्हेगारास एका वर्षाची कैद, इस्लामी शासनाच्या कारभारावर विनाकारण टीका करण्याच्या अपराधास्तव एका महिन्याची कैद ठरविण्यात आली आहे.(संदर्भ : एहकामुस सुलतानिया)
बेमुदत कैदेची शिक्षा
एखाद्या व्यक्तीस बांधून सिंह अगर हिंस्त्र पशुसमोर टाकणे, कडक उन्हात हातपाय बांधून ठेवणे, समलिंगी संभोग करणे वगैरेसारख्या घोर अपराधांवर बेमुदत कैदेची शिक्षा देण्याची दंडविधानात्मक कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला फूस लावून नेणे, तिच्या आईवडिलांविरुद्ध भडकावणे वगैरेसारख्या अपराधांसाठीही बेमुदत कैदेची शिक्षा देण्यात येईल. याशिवाय समाजात अंधश्रद्धा पसरविण्याच्या धर्माचा आधार घेऊन धर्मविरोधी गोष्टी पसरविण्याच्या अपराधास्तव गुन्हेगारास आजीवन कैदेची शिक्षा देण्याची इस्लामी दंडविधानात निश्चित करण्यात आली आहे.
कैदेचे स्वरुप
कारागृह स्वच्छ असावे. लघवी, शौच आणि स्नान करण्याची, कपडे धुण्याची मुबलक व्यवस्था असावी. कैद्याला पोटभरून मात्र अत्यंत साधे जेवण असावे. त्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यात यावी. झोपायला नरम गादी वगैरे न देता अत्यंत साधे बिछाणे व पांघरून द्यावे. थंडी, ऊन्ह, पाऊस वगैरेसारख्या बाबींपासून पूर्ण संरक्षण होण्यासारखी स्वच्छ खोली असावी. कैद्याला जर एखादी कला-कौशल्य येत असेल अथवा काम करण्याची पात्रता त्याच्यात असेल तर त्यानुसार त्याच्याकडून सेवा करून घेतली जाऊ शकते. मात्र त्याला जमातीसह नमाज पढण्याची, जुमाची नमाज पढण्याची, ईदची नमाज पढण्याची, हज करण्याची, एवढेच नव्हे तर कोणाच्या अंत्यविधित सामील होण्याची आणि एखाद्या रोग्याची विचारपूस करण्याची परवानगी नसेल. कारण हे सर्व करण्यासाठी त्याला कैदेच्या बाहेर जावे लागेल.
शहरातून बाहेर काढण्याची शिक्षा
‘हद‘ आणि ‘दंडविधान‘ या दोन्ही प्रकारात शहराबाहेर घालण्याची शिक्षा तजवीज करण्यात आली आहे. ‘हद‘ प्रकारच्या शिक्षेमध्ये अविवाहित असलेल्या व्यभिचारी व्यक्तींना आणि धर्मद्वेशी पक्षाकडून लढणार्यास शहराबाहेर घालवण्याची शिक्षा देण्यात येते. त्याचप्रमाणे व्यभिचार्याला दंडविधानानुसार शहराबाहेर करण्याची शिक्षा देण्यात येईल.(संदर्भ : इब्ने आबेदीन)
शहराबाहेर घालवण्याच्या शिक्षेचे स्वरुप
शहराबाहेर घालवण्याची अगर तडीपार करण्याची अट अशी आहे की, अपराध्यास शहरापासून सत्तर किलोमीटर दूर टाकण्यात यावे. अर्थात शहराच्या चारी दिशांना तो कमीतकमी सत्तर किलोमीटरच्या अंतराबाहेर असावा.(संदर्भ : अलमुग्नी)
आर्थिक दंडाची शिक्षा
दंडविधानानुसार गुन्हेगारास आर्थिक दंड करण्याचा अर्थ असा आहे की, इस्लामी शासक अथवा न्यायाधीश त्याच्या दंडाची रक्कम शासकीय खात्यात जमा करील आणि अपराधी जेव्हा आपल्यात सुधारणा घडवून आणील तेव्हा त्याची जमा करण्यात आलेली संपत्ती परत करण्यात येईल. मात्र तो जर स्वतःची सुधारणा करण्यासाठी तयार नसेल तर त्याची रक्कम त्यास परत न करता शासकीय ताब्यात घेण्यात येईल. अपराध्याकडून घेण्यात आलेल्या संपत्तीचे तीन प्रकार असू शकतात. पहिला प्रकार निधिद्ध संपत्तीचा. उदाहरणार्थ, दारु विक्रीचा पैसा, नाच गाण्याचा आणि मूर्ती विकून मिळविलेला पैसा अगर इतर अवैध मार्गाने मिळविलेली संपत्ती होय. हा पैसा अगर संपत्ती नष्ट करण्यात येईल. दुसर्या प्रकारची संपत्ती ही परिवर्तनीय असू शकते. उदाहरणार्थ, क्रीडा व खेळातून मिळविलेला पैसा वा त्याची साधने आणि आर्थिक चलन वगैरे ही संपत्ती परिवर्तीत करण्यात येईल. तिसरा प्रकार म्हणजे जंगम अगर स्थायी संपत्तीचा होय. उदाहरणार्थ, जमीन-जुमला, घर-इमारत वगैरे या प्रकारच्या संपत्तीवर शासन ताबा मिळवील.(संदर्भ : अल-फतावा हिंदिया)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget