Latest Post

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

Justice
भूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो. याविषयी सविस्तर उल्लेख मागे आपण पाहिलाच आहे. मात्र इस्लामी कायद्याने या अपराधावरसुद्धा त्याचे मूळ शोधून यशस्वी तोडगा काढला आहे. माणसाला भूक लागताच जेवण देणे, तहान लागताच पाणी देणे, तसेच लैंगिक तहान लागताच त्याचे वैध आणि धर्मसंमत साधन पुरविणे याच निसर्गनियमानुसार इस्लामने मुलगा-मुलगी वयात येताच त्यांचे लग्न करून देण्याची शिकवण दिली आहे. कारण लैंगिक भावना ही नैसर्गिक भावना आहे. कोणीही धर्मात्मा असो, महात्मा असो, त्यागी पुरुष असो की साधू-संत असो. त्याने लग्न करून पारिवारिक जवाबदारी पूर्ण करायलाच हवी. अन्यथा त्याचे महात्म्य आणि त्यागाला अगर धर्मात्म्याला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच इस्लामने संन्यास आणि वैराग्य धारण करून समाजाच्या जवाबदार्यांतून पळपुटेपणा करण्यास निषिद्ध ठरविले आहे. अर्थातच संसारत्याग आणि लैंगिक भावनांना दाबून टाकणे हे निसर्गनियमांविरुद्ध बंडखोरी आहे आणि ज्या ज्या वेळी माणूस निसर्गनियमांशी(अर्थातच इस्लामशी) बंडखोरी करतो, तेव्हा अपराध आणि गुन्हेगारीचे तांडव माजते, समाजजीवन विस्कळीत होते. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘हे वयात आलेल्या तरुणांनो(आणि तरुणींनो)! विवाह करा. यामुळे तुम्ही तुमच्या लैंगिक आचरणाचे पावित्र्य अबाधित राखू शकाल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
उपरोक्त प्रेषित विधानावरून हे स्पष्ट होते की वयात आलेल्या तरुण-तरुणींनी लवकरात लवकर लग्न आटोपून घ्यावे. यामुळे निश्चितच लैंगिक अपराधांवर आळा बसेल.
याशिवाय स्त्रियांनी विनाकारण घराबाहेर एकट्या फिरू नये. त्याचप्रमाणे परपुरुषांबरोबर विनाकारण अगर कामानिमित्त वावरू नये. पडदापद्धतीचा अंगीकार करावा. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास एकटी अगर परपुरुषासोबत करू नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वर आणि परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवणार्या स्त्रीसाठी हे वैध अगर धर्मसंमत नाही की तिने एका दिवसाकरिताही ‘गैर महरम‘(परपुरुषाबरोबर) प्रवास करावा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
‘गैर महरम‘ पुरुष म्हणजे कोण? गैर महरम म्हणजे असा पुरुष, ज्याच्याशी विवाह करणे वैध असते. अर्थात मुलगा, पती, पिता, भाऊ, दूधभाऊ, भाचा, पुतन्या, काका, मामा, नातु, सासरा, सावत्र मुलगा, सावत्र पिता सोडून जेवढे पुरुष असतील, ते सर्व पुरुष इस्लामने गैर महरम ठरविले आहेत व यांच्याबरोबर लांब पल्ल्याचा अगर दिवसभराचा प्रवास आणि एकांतातील सहवास इस्लामने निषिद्ध ठरविला आहे.(संदर्भ : सूरह-ए-निसा - २२)
याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संध्याकाळ झाल्यावर मुलांनी जास्त वेळ बाहेर न घालविण्याचीही शिकवण दिली आहे. कारण बरीच कृष्णकृत्ये रात्रीच्या वेळी अगर संध्याकाळच्या अंधारात घडतात.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)


- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी
    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे - 20    मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2013)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/1nrt0yimvf3impxvylt75y1ok5s9obed

cuffs
शासन, सत्ता आणि अधिकार हाती आले की राजकारण्यांना अपराध आणि गुन्हेगारीचे रान मोकळे झाले समजा. कारण त्यांच्या हाती सत्ता असते. शिवाय त्यांच्यापैकी बरेचजण गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे शिक्षण नसताना आणि कोणतीही योग्यता व पात्रता नसताना भविष्य बनविण्याचा सर्वांत सोपा आणि सरळ उपाय म्हणजे राजकारणच. गुंडगिरी, दादागिरी करणारे, समाजासाठी उपद्रवी ठरलेले आणि जनतेचे आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण केलेले लोक, त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात शिक्षण नसल्याने काहीही करता येत नसलेले लोकच राज्याची खुर्ची बळकावलेले असल्याचे सध्या पाहायला मिळते. चौथी-पाचवी पास-नापास असलेले लोक थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होत असल्याचा किळसवाणा इतिहासही या गोष्टीची साक्ष देतो. यामुळे याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीलाच भोगावे लागत आहेत.
मात्र इस्लामची अशी शिकवण आहे की अपात्र आणि दुराचारींना मुळीच शासकीय हुद्दा देता कामा नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांना एकदा विचारण्यात आले की, ‘‘हे जग कधी नष्ट होईल?‘‘
यावर प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले की, ‘‘जेव्हा अनामत नष्ट करण्यात येईल तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा.‘‘
लोकांनी विचारले की, ‘‘अनामत नष्ट होणे म्हणजे काय?‘‘
‘‘जेव्हा देशाचे शासन नालायक आणि अपात्र लोकांच्या हाती येईल, तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा!‘‘ प्रेषित मुहम्मद(स.) उत्तरले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
या प्रेषितवचनांवरून हे लक्षात येते की हे केवळ जग नष्ट होण्याचे संकेत अर्थात महाप्रलयाचे भयानक चित्र आहे. अर्थातच जेव्हा एखाद्या अपात्र आणि नालायक व्यक्तीच्या हाती अधिकार अगर शासनव्यवस्था येते, तेव्हा ती व्यक्ती जनतेला सळो की पळो करून सोडते. सर्वत्र अंधेर नगरी आणि चौपट राजा याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यांना पाहण्याचे दुर्दैव ओढावते. जनता इतकी वैतागून जाते की, या लाजिरवाण्या जगण्यापेक्षा मेलेले बरे, असे वाटू लागते. म्हणूनच जनतेचे सर्वप्रथम कर्तव्य हेच आहे की, निवडणुकांच्या वेळी राजकारण्यांच्या गुंडगिरीला न घाबरता आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धीचा वापर करूनच मतदान करावे.
चारित्र्यवान संघटित समाजाची आवश्यकता
समाज सुसंघटित नसला आणि त्यातून नीतिमत्ता आणि चारित्र्यशीलता संपली की, गुन्हेगारी बोकाळत असते. एक काळ असा होता की, माणूस आपले चारित्र्य जपत होता, त्याच्यावर समाजाचा वचक होता. गुन्हेगारी करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या ध्यानीमनी येत नसे. मात्र आज समाज हा विखुरलेला, आपली वचक आणि धाक हरवून बसलेला आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्याच्या झिंगेत सर्व काही करायला मोकळा झाला आहे. त्याला समाजाला जाब देण्याची जाणीव तर संपलीच शिवाय सामाजिक बांधिलकीसुद्धा नष्ट पावली आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्यांची ऐशी-तैशी झाली आहे. यामुळे समाजविघातक प्रवृत्तींना बळ मिळत आहे. अशा या बिकट आणि संकटमय परिस्थितीत मात्र समाजबांधणीचे आणि सकारात्मक व नैतिक मूल्ये जोपासण्यासाठीचे कार्य करणे गरजेचे झाले आहे. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी वारंवार ताकीद केली आहे की सामूहिकता हा मानवतेचा प्राण आहे. सामाजिकतेपासून विभक्त होता कामा नये. जो माणूस स्वतःला समाजापासून विभक्त करतो, त्याचा नाश उपस्थित आहे. प्रेषितांनी हेच तत्त्व या शब्दांत स्पष्ट केले आहे,
‘‘सैतान हा मानवांसाठी लांडगा आहे.(अर्थात शत्रु आहे) लांडगा हा कळपातून एकाकी पडलेल्या शेळीचा फडशा पाडतो, त्याचप्रमाणे समाजविभक्त माणसाची स्थिती असते. म्हणून तुम्ही आपसात गटबाजी करू नका, जमात अगर समाज आणि मस्जिद ह्या तुमच्या संघटिततेसाठी अत्यावश्यक बाबी आहेत.‘‘ (संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद)
इस्लामी विचारवंतांनी म्हटले आहे की, ‘‘समाजातील उपद्रवी घटक नष्ट करायचे असतील आणि गुन्हेगारीचे निर्मूलन करायचे असेल तर चारित्र्यवान सुसंघटित समाज असल्याशिवाय हे शक्य नाही.”(संदर्भ : प्रस्तावना, इब्ने अब्दुल बर, २१/२७५)
इस्लामचे थोर विचारवंत ‘इब्ने तैमिया‘ यांनी म्हटले आहे की,
‘‘सामाजिकता आणि सहकाराशिवाय मानवी गरजांपूर्ण होऊ शकत नाहीत. मानवी गरजांची पूर्तता दोन गोष्टींवर अवलंबून आहे, प्रथम हितांची जोपासना आणि उपद्रवांचा खातमा. त्याचप्रमाणे यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे की, लोकांनी समाजाच्या नैतिक बंधनात राहावे, सुसंगठित राहावे. मात्र याबरोबरच समाज चालविण्यासाठी एका सुनियोजित व्यवस्थेची नितांत गरज असते आणि ही समाजव्यवस्था अगदी स्पष्ट नियम व तत्त्वावरच शक्य असते. या ठिकाणी हे मात्र विसरता कामा नये की, हे स्पष्ट नियम केवळ इस्लामनेच प्रदान केले आहेत. म्हणून गुन्हेगारीचे समूळ निर्मूलन हे इस्लामी समाजव्यवस्थेतच शक्य आहे. ईश्वराने म्हटले आहे की, ‘‘आम्ही(ईश्वराने) प्रेषितांना स्पष्ट संकेत आणि मार्गदर्शनासह पाठविले आहे आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि प्रमाण पाठविले, जेणेकरून लोक न्यायावर कायम राहावेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हदीद - २५)
सुसंघटित आणि सदाचारी समाज उभा करण्यासाठी केवळ लोकांचा बाजार गोळा करून चालत नाही, अथवा एखाद्या क्षणिक गरजेपुरते, केवळ ऐहिक आणि भौतिक गरजेपोटी समाजास संघटित करून चालणार नाही. तर यासाठी मजबूत नैतिक आधार आणि मूल्यांची गरज आहे. इस्लामी सामुदायिकतेचा आधारसुद्धा तोच आहे, जो प्रेषितत्त्वाचा उद्देश आहे. अर्थातच मानवजातीसाठी सौभाग्यप्राप्ती आणि हितांची जोपासना करणे होय. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे प्रेषिता! आम्ही(स्वयं ईश्वराने) तुम्हाला समस्त जगवासीयांसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे.‘‘ (संदर्भ : सूरह-ए-अंबिया - १०७)
सारांश
उपरोक्त स्पष्टीकरणावरून हे लक्षात येते की इस्लामने गुन्हेगारी निर्मूलनाचे जे उपाय योजिले आहेत, ते क्षणिक आणि अस्थायी स्वरुपाचे नसून अर्थपूर्ण आणि स्थायी आहेत. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी निर्मूलनासाठी इस्लामशिवाय पर्यायच नाही. शिवाय इस्लाममुळे केवळ गुन्हेगारीचे निर्मूलनच होत नाही, तर माणसाच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सार्थक होऊन दोन्ही लोकी सुख, समाधान, शांती आणि वास्तविक यश प्राप्त होते आणि हेच इस्लामचे प्रमुख उद्दिष्ट होय. कारण माणूस जोपर्यंत गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवीत नाही, अन्याय व अत्याचार आणि दुष्कर्म सोडून सत्य, न्याय आणि सदाचाराचा मार्ग अवलंबत नाही, अर्थात इस्लामी मार्गावर आपले जीवन व्यतीत करीत नाही, तोपर्यंत ईश्वर प्रसन्न होत नाही आणि जर ईशप्रसन्नतेची आसच नसेल, तर तो कोणत्या अर्थाने मुस्लिम होऊ शकेल? हीच बाब कुरआनात अशा शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे,
‘‘बरे हे कसे शक्य आहे की, जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे, तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील, जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे अंतिम ठिकाण नरक आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १६२)
म्हणजेच ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्याची तीप आस आणि कामना ही सर्वच गुन्हेगारी निर्मूलनाचे आणि सदाचारी, सुख-समाधानी तसेच यशस्वी जीवनाचे मूळ आहे.
दुसरी लक्षणीय गोष्ट अशी की, इस्लामी शिकवणीचा लाभ हा त्यावर आचरण केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. केवळ इस्लामी नियम अगर विधानाचे प्रगल्भ ज्ञान आत्मसात केले आणि कृतीच मात्र केली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही. डॉक्टरने कितीही प्रभावी औषध दिले आणि त्या औषधांची व उपचारपद्धतींची केवळ माहितीच ठेवली आणि त्याच्या उपचारपद्धतीनुसार औषध घेतलेच नाही तर आजार बरा होण्याची आशा बाळगणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. असेच हे देखील आहे. गुन्हेगारी निर्मूलनाचे इस्लामी उपाय अमलात आणल्याशिवाय काहीही शक्य नाही.

Justice hammer
इस्लामने ज्याप्रमाणे इतरांचे प्राण घेण्याची शिक्षा तजवीज केली आहे, त्याचप्रमाणे शारीरिक क्षती पोचविण्याची, अवयव कापण्याची वा इतर प्रकारची शारीरिक पीडा देण्याचीसुद्धा शिक्षा लागू केली आहे. अर्थातच या शिक्षेस ‘किसास‘(बदला घेण्याची) शिक्षा, ‘दैयत‘(खून वा क्षतीभरपाईची) शिक्षा म्हटले गेले आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,‘‘आणि तौरातमध्ये यहुद्यांवर हा आदेश लिहिण्यात आला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्वच जखमांसाठी बरोबरीचा बदला होय. मग जो ‘किसास‘चा सदका करील. ते त्याच्याकरीता प्रायश्चित्त आहे आणि जे ईश्वराच्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)
जखम व तिचे प्रकार
इस्लामी कायद्यात जखमांचे विविध प्रकार वर्णन करण्यात आलेले असून त्यांचा दर्जा ठरविण्यात आला आहे.
  1. एखादा अवयव शरीरापासून विभक्त करणे, उदाहरणार्थ, हात कापणे, डोळा फोडणे वगैरे.
  2. शरीराचा एखादा अवयव निकामी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या अवयवास अशाप्रकारे क्षती पोचविणे की, तो निकामी व्हावा. म्हणजेच ऐकू न येणे, हाताने पकडता न येणे, पायाने चालता न येणे, डोळ्याने न दिसणे, कानाने ऐकू न येणे, समागम करता न येणे, बोटांनी पकडता न येणे वगैरे.
  3. शरीराच्या वरच्या भागावर अथवा चेहर्यावर जखम करणे. यात रक्त वाहणे, मांसाचा लचका तोडणे वगैरे सामील आहे.
  4. डोक्याच्या खाली जखम करणे. उदाहरणार्थ छाती व पोट फाडणे, क्षती पोचविणे वगैरे.
  5. मामुली चोप देणे वगैरे.
शारीरिक जखमांवर लागू करण्यात आलेली शिक्षाहत्येप्रमाणेच शारीरिक क्षती पोचविण्याच्या शिक्षेसाठी अटी व शर्ती लागू आहेत. यामध्येसुद्धा जाणूनबुजून, चुकून व नकळत होणार्या हत्येच्या अपराधांप्रमाणेच शिक्षा लागू करण्यात आली आहे.
जखम पोचविण्याची शिक्षा ‘किसास‘ होय
अर्थातच ‘किसास‘ म्हणजे बदला आणि तोही तंतोतंत. जेवढ्या प्रमाणात जखम करण्यात आली असेल, अगदी त्याच प्रमाणात अपराध्यास जखम करून शिक्षा देण्यात येईल, किंवा क्षतीग्रस्ताने संमती दिल्यास ‘दैयत‘ म्हणजेच जखमेची आर्थिक भरपाई देण्यात येईल अथवा क्षतीग्रस्ताने माफ केल्यास अपराध्यास माफ करण्यात येईल.

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wxs34ou4l1pxmhlfsy1vi579i9usag2m

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget