Latest Post

शरीअत अर्थात इस्लामी कायद्याने गुन्हेगारीवरील उपायाची तीन स्वरुपे दाखविली आहेत. पहिले स्वरुप हे अपराधाची ‘हद‘ लागू करणे होय. अर्थातच गुन्हेगाराने पूर्ण शर्तीने गुन्हा केलेला असेल तर स्वतः ईश्वराने ही शिक्षा निश्चित केलेली आहे. यात मुळीच बदल करता येत नाही. म्हणूनच या प्रकारच्या शिक्षा-उपायास शरीअतच्या परिभाषेत ‘हद‘ जारी करणे असे म्हणतात. दुसर्या उपायाचे स्वरुप म्हणजे ‘कसास‘ होय. कसास म्हणजे बदल्याची शिक्षा होय. अर्थात गुन्हेगाराने कोणास शारीरिक हानी पोचविली असेल तर जेवढी हानी पोचविली तेवढाच बदला घेण्याची शिक्षा देणे होय. उदाहरणार्थ, हात कापला असेल तर गुन्हेगाराचा हात कापण्यात येईल, डोळा फोडला असेल तर डोळा फोडण्यात येईल, हत्या केली असेल तर गुन्हेगारास मृत्यूदंड देण्यात येईल. या शिक्षेतही मुळीच बदल करता येणार नाही. तिसरा प्रकार हा ‘ताजीर‘चा होय. म्हणजेच ज्या अपराधांवर शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत, मात्र आवश्यक शतर्चिी पूर्तता होत नसेल, तर अशा परिस्थितीत गुन्हेगारास गरजेनुसार ‘ताजीर‘(म्हणजे निश्चित केलेल्या शिक्षेपेक्षा थोडी कमी शिक्षा) करण्यात येईल. या तिन्ही स्वरुपांच्या शिक्षांवर आपण वेगवेगळी चर्चा करु या.
‘हद‘ स्वरुपाची शिक्षा
ही शिक्षा
  1. व्यभिचार,
  2. व्यभिचाराचा आरोप लावणे,
  3. चोरी करणे,
  4. दारू पिणे,
  5. इस्लामचा त्याग करणे,
  6. डकाईती करणे आणि
  7. बंडखोरी करणे या अपराधांवर लागू करण्यात आली आहे.
 
1. व्यभिचार आणि त्याची व्याख्या
व्यभिचार म्हणजे काय? याविषयी इस्लामने अशी व्याख्या केली आहे की, पत्नीव्यतिरिक्त अगर पतीव्यतिरिक्त अनुक्रमे इतर कोणाही स्त्री अगर पुरुषाशी संभोग करणे म्हणजे व्यभिचार होय. हा संभोग करताना वीर्यस्खलन होवो अथवा न होवो, या संभोगाला व्यभिचार असे म्हणतात.
व्यभिचारसिद्धीच्या अटी व शर्ती
‘शरीअत‘ म्हणजेच इस्लामी कायद्याने कोणताही गुन्हा सिद्ध करण्याच्या शर्ती आणि अटी निश्चित केल्या आहेत. याप्रमाणेच व्यभिचाराचा अपराध सिद्ध करण्याच्या वा होण्याच्यासुद्धा अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत. याकरिता तीन पद्धती ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम अशी की, व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराने स्वतःहून इस्लामी न्यायालयात गुन्हा केल्याची कबुली द्यावी. दुसरे असे की, व्यभिचारी व्यक्तीस व्यभिचार करताना पाहिल्याचे साक्षीदार असावेत आणि तिसरे असे की, संकेत आणि परिणामावरुन व्यभिचार केल्याचे सिद्ध व्हावे. याबाबतीत आपण थोडक्यात चर्चा करु या.
पहिली पद्धत
शरीअतमध्ये व्यभिचार केलेल्या गुन्हेगाराकडून गुन्हा केल्याची कबुली विश्वसनीय समजण्यात आली आहे. मात्र यासाठी गुन्हेगाराची मानसिक आणि बौद्धिक परिस्थिती चांगली व ठणठणीत असावी. अर्थातच मानसिक वा बौद्धिक स्वास्थ्य ठणठणीत असावे, शिवाय त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली न्याय-परिषदेत द्यावी. गुन्हेगार प्रौढ असावा.
दुसरी पद्धत
व्यभिचारानंतर संकेत आणि परिणाम स्पष्ट व्हावेत. उदाहरणार्थ, स्त्रीला गर्भधारणा व्हावी, अथवा वैद्यकीय तपासणीतून संभोग झाल्याचे निष्पन्न व्हावे.
तिसरी पद्धत
साक्षीदार असावेत. शरीअतमध्ये सामान्य प्रकरणात दोन साक्षीदार पुरेसे असतात, मात्र व्यभिचार सिद्ध करण्यासाठी कमीतकमी चार साक्षीदारांची आवश्यकता असते. हे साक्षीदारसुद्धा परिपूर्ण आणि प्रौढ व सबळ असावे लागतात. त्यांना व्यभिचाराचा वृत्तान्त सांगण्याचे सामर्थ्य असावे लागते. अर्थात ते मुके आणि बहिरेही नसावेत, मद्यपानाचे व्यसन जडलेलेही नसावेत. ते न्यायप्रिय, सदाचारी व ईशपरायण मुस्लिम असावेत. व्यभिचार करणार्या गुन्हेगारांशी कोणत्याही प्रकारचा तंटा-बखेडा अगर प्रकरण नसावे. कोणत्याही कारणावरून गुन्हेगाराशी वैर नसावे. त्याचप्रमाणे स्त्रीची साक्ष स्वीकारण्यात येणार नाही. हे चारही साक्षीदार एकाच प्रसंगी न्यायपरिषदेत, हजर करण्यात येऊन त्यांच्या साक्षी तपासण्यात येतील.
व्यभिचाराची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचार करण्याच्या तीन प्रकारच्या शिक्षा लागू करण्यात आल्या आहेत.
  1. कोरडे ओढणे
  2. शहारतून तडीपार करणे
  3. दगडाने ठेचून वध करणे
यापैकी व्यभिचारी गुन्हेगार अविवाहित असेल तर शंभर कोरडे मारण्याची आणि शहराबाहेर तडीपार करण्याची शिक्षा देण्यात येईल आणि गुन्हेगार विवाहित असेल तर दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात येईल. कुरआनात म्हटले आहे,
‘‘अविवाहित व्यभिचारी स्त्री आणि अविवाहित व्यभिचारी पुरुषाला प्रत्येकी शंभर कोरडे मारावेत आणि त्यांच्यावर दया करता कामा नये, जर तुम्ही ईश्वर आणि पारलौकिक जीवनावर विश्वास ठेवीत असाल तर त्याचप्रमाणे त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रद्धावंतांचा(अर्थात मुस्लिमांचा) एक समूह तेथे हजर असावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नूर - २)
त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कोणत्याही मुस्लिमाची, जो एकेश्वरवाद आणि परलोकावर विश्वास ठेवतो, हत्या करणे वैध नाही, केवळ ते लोक सोडून की जे विवाहित असून व्यभिचार करतात, ज्याने इतराचा वध केला असेल आणि जो मुस्लिम समुदायाबरोबर पडला(अर्थात धर्मभ्रष्ट झाला) असेल. या तीन प्रकारच्या गुन्हेगारांशिवाय इतर कोणाचाही वध करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या शासनकाळात विवाहित लोकांनी व्यभिचार केल्यास त्यांना ‘रजम‘ म्हणजेच दगडाने ठेचून वध करण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे की,
‘‘अविवाहित तरूण-तरुणींनी व्यभिचार केल्यास त्यांना प्रत्येकी शंभर कोरडे ओढावेत आणि एका वर्षासाठी पुरुषाला शहरातून तडीपार करावे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे
व्यभिचाराचा खोटा आरोप लावणे हे महापाप असून याची शिक्षा लागू करण्याच्या निम्नलिखित अटी व शर्ती ठरविण्यात आल्या आहेत.
  1. खोटा आरोप लावणारा वेडा, वयात न आलेला मद्याच्या नशेत नसलेला असावा.
  2. खोटा आरोप लावणारा हा मुखत्यार असावा म्हणजेच स्वतःच्या मर्जीने व कोणाच्या दबाव अगर आमिषाला बळी पडून खोटा आरोप करणारा नसावा.
  3. खोटा आरोप लावणारा हा पिता नसावा. अर्थात एखाद्या पुरुषाने म्हटले की, तू माझी संतती नाही तर त्या आरोप लावणार्याला शिक्षा देण्यात येणार नाही.
  4. खोटा आरोप लावणार्या आणि ज्यावर आरोप लावण्यात येत आहे त्याच्यात पती-पत्नीचे नाते नसावे. कारण पती-पत्नीसाठी आरोपाचा वेगळा कायदा आहे. त्या कायद्यास शरीअतच्या परिभाषेत ‘लआन‘ चा कायदा असे म्हणतात.
  5. ज्याच्यावर खोटा आरोप लावण्यात येत आहे, तो स्वावलंबी आणि मुखत्यार असावा.
  6. तो मुस्लिम असावा.(अपराधी मुस्लिमेतर नसावा)
  7. खोटा आरोप लावणारा अपराधी स्वतंत्र असावा. अर्थात कोणाचा गुलाम अथवा दास नसावा.
  8. तो सज्जन आणि सुशील असावा. कारण आरोप लावणार्याचा आरोप सिद्ध झाल्यास प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळेल.
  9. ज्यावर आरोप करण्यात आला, त्याच्याविरुद्ध प्रकरण दाखल करणारा असावा. अन्यथा शिक्षा होणार नाही.
  10. खोटा आरोप लावणार्याने स्पष्ट शब्दांत आरोप लावलेला असावा. सांकेतिक पद्धती अगर इशार्याने आरोप लावल्यास दखल घेतली जाणार नाही.
  11. खोटा आरोप लावणार्यास आरोप सिद्ध करण्याकरिता चार साक्षीदार हजर करणे शक्य नसावे.
या अटींवर खोटा आरोप लावणार्या गुन्हेगारास शरीअतनुसार शिक्षा देण्यात येईल.
व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याची शिक्षा
शरीअतमध्ये व्यभिचाराचा खोटा आरोप लावण्याच्या दोन शिक्षा ठरविण्यात आल्या आहेत. प्रथम मूळ शिक्षा आणि दुसरी अतिरिक्त वाढीव शिक्षा. त्या अशा प्रकारे होय.
  1. एशी कोरडे मारणे आणि
  2. नेहमीसाठी त्याची साक्ष स्वीकार न करणे होय. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘जे लोक चारित्र्यवान आणि सुशील स्त्रियांवर व्यभिचाराचा खोटा आरोप लावतात, मग चार साक्षीदारांसमक्ष आरोप सिद्ध करू शकत नाहीत, त्यांना एशी कोरडे मारावेत आणि त्यांचा साक्ष देण्याचा अधिकार नेहमीसाठी हिरावून घेण्यात यावा कारण ते स्वतः गुन्हेगार आणि दुराचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-नूर - ४)
2. इस्लामी कायद्यामध्ये चोरी आणि चोरीचा अपराधसिद्ध होण्याच्या अटी
शरीअत अर्थात इस्लामी कायद्यामध्ये चोरी करण्याच्या अपराधालासुद्धा ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात आली आहे. चोरीचा अपराध सिद्ध होण्याच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
  1. चोर हा वयात आलेला असावा. वयात न आलेल्या, मानसिक संतुलन ठिकाणावर नसलेल्या चोरावर ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
  2. चोर हा विवश नसावा. परिस्थितीने विवश होऊन चोरी करणार्यास ‘हद‘ ची शिक्षा देता येणार नाही.
  3. भुकेने आणि तहानेने तसेच रोगाने व्याकूळ होऊन गरजपूर्तीसाठी चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
  4. मुलाच्या संपत्तीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही.
  5. ‘बैतुल माल‘ अर्थात सरकारी जनकल्याणनिधीमधून चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू होणार नाही. कारण या संपत्तीमध्ये त्याचासुद्धा वाटा आहे.
  6. चोरी करणारा धर्मयुद्धाच्या परिस्थितीत नसावा.
  7. चोरी ही किंमती वस्तु उदाहरणार्थ, सोने, चांदी, पैसा, द्रव्य वगैरेंची असेल तरच ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येईल. दगड-माती व यासारख्या क्षुल्लक वस्तुंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करण्यात येणार नाही.
  8. हराम मालाची अर्थात डुक्कर, दारू, गांजा व यासारख्या मालाची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
  9. लवकर खराब होणार्या व सडणार्या वस्तुंची अर्थात पाले-भाज्या, फळे वगैरेंची चोरी केल्यास ‘हद‘ ची शिक्षा लागू करता येणार नाही.
  10. चोरी करण्यात आलेला माल दुसर्याची मिळकत असावी. स्वतःच्या संपत्तीतून चोरीची शिक्षा नाही.
  11. सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेल्या संपत्तीतून झालेल्या चोरीवरच ‘हद‘ची शिक्षा लागू करण्यात येईल. रस्त्यावर अथवा इतरस्त्र पडलेल्या वस्तुंची चोरी ही चोरीच्या परिभाषेत बसत नाही.
चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे
शरीअतमध्ये चोरीची शिक्षा अर्थात ‘हद‘ जारी करणे म्हणजे चोराचे हात कापणे होय. वरील अटी आणि शर्ती पूर्ण झाल्याशिवाय ही शिक्षा देता येणार नाही. कुरआनात म्हटले आहे,
‘‘चोरी करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो, त्या व्यक्तीस हात कापण्याची शिक्षा द्यावी, हा त्यांच्या कमाईचा बदला आहे आणि ईश्वराकडून बोध घेण्यासारखी शिक्षा आहे. ईश्वराचे प्रभुत्व सर्वांवर आहे आणि तो जाणणारा आणि पाहणारा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ३८)
इस्लामी कायद्यानुसार पहिल्यांदा चोरी केल्यास चोराचा उजवा हात कोपरापर्यंत कापण्यात येईल आणि दुसर्यांदा केल्यास चोराचा डावा पाय घोट्यापर्यंत कापण्यात येईल.
3. इस्लामी कायद्यामध्ये डकाईती अगर दरोडा
चोरी म्हणजे इतरांच्या नजरेआड लपून छपून करण्यात येणारे कर्म असते. मात्र डकाईती अगर दरोडा हा बळाचा वापर करून संपत्ती हिसकावणे वा त्यावर ताबा मिळविणे होय. चोरीचा माल चोराच्या ताब्यात आल्याशिवाय चोराला शिक्षा देता येणार नाही, मात्र दरोडा टाकल्यावर दरोडेखोराच्या ताब्यात संपत्ती आली नसली तरी, त्याला शिक्षा देण्यात येईल असा इस्लामी कायद्याचा नियम आहे. दरोड्याचे प्रामुख्याने चार स्वरुप आहेत.
  1. डकाईत हा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघाला मात्र त्याला संपत्तीही मिळाली नाही आणि त्याच्याकडून कोणाचा खूनही झाला नाही.
  2. दरोडा टाकून संपत्ती लुटली मात्र कोणाचा खून झाला नाही.
  3. दरोडा टाकण्यासाठी निघाला मात्र माल हाती लागला नाही आणि त्याच्या हातून खून झाला.
  4. दरोडा टाकून संपत्ती लुटली आणि खूनही केला.
दरोडेखोरीचा गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी
दरोडा एकट्याने टाको अगर सामूहिकरित्या टाकण्यात येवो, तो दरोड्याच्याच परिभाषेत मोडतो. दरोडेखोर स्त्री असो वा पुरुष, दोघेही समान अपराधी आहेत.
दरोडा टाकण्याची शिक्षा
शरीअतमध्ये दरोड्याच्या चार प्रकारच्या शिक्षा तजवीज करण्यात आल्या आहेत.
  1. दरोडेखोराची हत्या करणे,
  2. फाशी देणे,
  3. हात कापणे आणि
  4. देशाबाहेर काढणे. ईश्वराने म्हटले आहे,
‘‘जे लोक ईश्वर आणि त्यांच्या प्रेषितांशी युद्ध करतात आणि धरतीवर उपद्रव माजवितात, त्यांची शिक्षा ही आहे की त्यांना ठार मारावे, सुळावर चढवावे अथवा परपस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापावेत अथवा देशाबाहेर काढावे. हा अपमान तर या जगात आहेच, शिवाय मरणोत्तर जीवनात यापेक्षाही भयानक शिक्षा आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ३३)
या बाबतीत इस्लामी कायदा असा आहे की या चार स्वरुपाच्या शिक्षा अपराधाच्या गांभीर्याच्या प्रमाणानुसार आहेत. उदाहरणार्थ, ज्याने केवळ दहशथ निर्माण केली, त्यास देशाबाहेर काढण्यात येईल, ज्याने केवळ संपत्ती लुटली, त्याचे हात-पाय विरुद्ध प्रमाणात कापण्यात येतील, ज्याने संपत्ती न लुटता खून केला असेल, त्याची हत्या करण्यात येईल आणि ज्याने संपत्तीही लुटली आणि खूनही केला, त्यास फाशी देण्यात येईल. याशिवाय इस्लामी शासकाला या गोष्टीचा अधिकार आहे की, त्याने या चारपैकी कोणती शिक्षा द्यावी.
4. चोरी-डकाईतीपासून बचावाचा इस्लामी उपाय
अपूर्ण अर्थार्जन, जीवनावश्यक गरजा सहसा पूर्ण न होण्यासारखे कामाचे मानधन देणे, आर्थिक शोषण करणे आणि आपल्या संपत्तीचे व वैभवाचे प्रदर्शन करणे, हेसुद्धा चोरी आणि डकाईतींची मुख्य कारणे होय. म्हणूनच इस्लामने इतरांना त्यांच्या कामाचा पुरेपूर, समाधानकारक व तत्काळ मोबदला देण्याची जबरदस्त ताकीद केली आहे. याशिवाय आपल्या वैभव आणि संपत्तीचेही प्रदर्शन करण्याची सक्तीने मनाई केली आहे. कारण संपत्तीचा व्यर्थ आणि फाजील अभिमान हे सर्व माणसाला करण्यास भाग पडतो. यामुळे इतरांच्या मनात ईर्ष्या आणि वैफल्याच्या भावना निर्माण होतात. यासाठी आपल्या संपत्ती आणि वैभवाचे प्रदर्शन इतर सामान्यजनांसमोर करण्याची प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मनाई केली आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे, ‘‘ईश्वर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्याकडे मुळीच कृपादृष्टी टाकणार नाही, जो गर्व आणि अहंकाराच्या झिंगेत आपली वस्त्रे लोळवित चालत असतो.”(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
शिवाय माणूस स्वतःच्या छोट्याशा इच्छेपायी अगर व्यर्थ कामनेपायी पैशांची स्वैर उधळपट्टी करतो, मात्र गोर-गरीब, गरजवंत आणि दीन-दलितांसाठी पाच पैसे खर्च करण्याची माणुसकी दाखवित नाहीत. या कृत्यामुळेसुद्धा सामान्यजन द्वेषाच्या भावनेने पिसाळून चोरी-डकाईतीसारखे अपराध करतात. म्हणूनच इस्लामने कंजुसी आणि संकूचितपणाचा तीप धिक्कार केला. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘कंजूसपणा आणि संकुचितवृत्तीपासून दूर राहा. कारण यामुळेच तुमच्या पूर्वीचे जनसमुदाय नष्ट झालेत. या कारणामुळेच त्यांनी आपसात रक्तपात केला आणि रक्तसंबंध नष्ट केलेत आणि अन्याय व अत्याचार हे अंतिम निवाड्याच्या दिवशी तिमिर काळोख आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

- मुहम्मद अफजल अहमद
अल्लाहची कृपा सर्वांसाठी आहे हे सत्य कुरआन प्रकाशात या पुस्तिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्लाहच्या प्रति संपूर्ण आत्म समर्पण आणि आज्ञापालन म्हणजेच इस्लाम होय. अल्लाह संपूर्ण सृष्टीचा स्त्रष्टा आहे. तो आपल्या आज्ञाधारक दासांचे रक्षण करतो आणि त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून वाचवितो. तोच त्यांचा शासक आहे.
    या पुस्तिकेत इस्लाम धर्म, कलिमा (पवित्रवचन), कलिमा शहादत, एकेश्वरत्व व प्रेषित्वाची साक्ष इ. विषयावर वर्णन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 184    -पृष्ठे -16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/003g6zfneah7lhgvsk1e6e3acv6857hd


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

पुणे (वकार अहमद अलीम)
भारत एक धर्मप्राधान्य देश आहे. येथे धार्मिक ओळखच प्रमुख आधार आहे, सन्मान आहे. जो इन्सानों को जोडता है, वही धर्म है. छुआ-छूत, नफरत फैलानेवाला धर्म ही नहीं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धार्मिक आस्थेनुसार आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा अधिकार प्रत्येक भारतीयाला संविधानाने दिला आहे. आमच्या विचारप्रणालीमध्ये भिन्नता आहे पण संविधान ने मात्र न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर हक्क आणि अधिकार दिला आहे. याच उदात्त तत्वाला पुढे नेणे गरजेचे आहे. या ठिकाणी वास्तविक भारत दृष्टीस येत आहे. अशाच भारताला आपल्याला पूढे न्यायचे आहे. हाच खराखुरा भारत आहे. इथे सभामंचावर उपस्थित सर्व धर्मीय, जातीय विभिन्न आदरणीय व्यक्तींकडून उपरोक्त प्रत्येक शब्द, जनसामान्यांवर प्रभाव टाकणारा आहे. देशाचा विकास, प्रगती तोपर्यंत होऊच शकत नाही, जोपर्यंत नैतिकतेच्या दृष्टीने  तो उच्चतम होत नाही. नैतिकतेचा र्‍हास हीच देशापुढील सर्वात मोठी चुनौती (आवाहन) आहे. - (उर्वरित पान 7 वर)
यासाठी देशातील समस्त नागरिकांमध्ये परस्पर प्रेम, विश्‍वास, बंधुभाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, पुणे शाखा प्रशंसनेस पात्र आहे. त्यांनी सद्भावना मंचची स्थापना करून, देशापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे, संपूर्ण देशात लवकरच एक हजार सद्भावना मंच निर्माण करून, परस्परांविषयी प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण जगात भारताला एक अनुकरणीय देश बनवावे, अशीच सर्वोच्च अल्लाहकडे दुवा, प्रार्थना करतो, असे अत्यंत तळमळीचे भावनिक आवाहन, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मोहम्मद सलीम शेख, इंजिनिअर यांनी येथे केले.
    रविवार, 15 डिसेंबर रोजी पुणे स्थित आजम कॅम्पस येथील असेम्बली हॉल येथे दुपारी 2 ते 4 दरम्यान, सद्भावना मंच स्थापनेच्या वेळी अध्यक्षीय समारोपात इंजी. मो. सलीम हे बोलत होते. यावेळी सभामंचावर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज, शिरसालीकर, वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध ह.भ.प. रामदास महाराज जाधव पंढरपूर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, एम.आय.टी. पुण्याचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फखरूद्दीन, एमआयटी पुणेचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, मानसरोवर गुरूद्वारा पुणेचे गुरूग्रंथी हशमतसिंगजी पंजबाबी, जिवन विद्या मिशन पुणेचे संतोषदादा तोतरे, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवरे, आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील, लोकायत पुणेचे नीरज जैन, सत्यशोधक समाज श्रीगोंदाचे अ‍ॅड. संभाजी बोरूडे, एस.एम. जोशी फाऊंडेशन पुणेचे सचिव, प्रा. सुभाष वारे, धम्मविनया सामाजिक संस्था पुणेचे डॉ. भिक्खुणी सुमना, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे हभप माणिक महाराज मोरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. बासंती नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    भारतीय समाज विभाग, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे सचिव सद्भावना मंचचे निमंत्रक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित जनसमुहाचे स्वागत केले. सद्भावना मंचाची स्थापना का? याचे स्पष्टीकरण करताना, आपल्या प्रास्ताविकेचे सांगितले की, परस्पर सद्भावनेनेच आपण प्रगती करू शकतो व देशात व समाजात शांती ही नांदू शकते. 1450 वर्षापूर्वी दिव्य कुरआनमध्ये म्हटले आहे, ”या अय्युहन्नासु इन्ना खलकानाकूम मिन् अकरींव्व उन्सा” अर्थात, ” हे मानवानों ! आम्ही तुम्हाला एकाच पुरूष व एकाच स्त्रीपासून निर्माण केले आहे.” म्हणजेच समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे व सर्वजण आपापसात बंधू-भगिनी आहेत.
    400 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ”अवधी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना-भिन्न!
    समस्त मानवजातीत असलेले हे बंधुत्वाचे नाते व समता, आज 21 व्या शतकात विज्ञानानेही सिद्ध केले आहे. आज आपण अखिल मानवजातीमध्ये रक्तदान करणे, अवयवदान करतो आणि हे जीवनदान ठरत आहे. म्हणजेच आधुनिक विज्ञानानेही समस्त मानवजातीमध्ये रक्ताचे नाते असल्याचे सिद्ध केले आहे.
    मात्र, आज समाजात स्वार्थ, परस्पर द्वेष व जातीयवाद, धर्मभेद काहीसा वाढला आहे. काही समाज विघातकशक्ती आपल्या स्वार्थासाठी जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे भारतीय समाजात, परस्पर द्वेष व घृणेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी देशविघातक शक्ती, प्रसारमाध्यमांचा दुरूपयोग, खोटारडा व विकृत इतिहास पसरविणे याचा वापर करीत आहेत.
    अशा गढूळ वातावरणात समाजाला तारण्यासाठी सर्वधर्मीय सूज्ञजनांनी संघटीतपणे व सातत्याने, प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. यासाठीच सद्भावना मंचच्या माध्यमाने आपण हेच उदात्त कार्य हाती घेऊन, समाजाला जोडण्याचा, सद्भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
    आपल्या महाराष्ट्रात सद्भावनेचा महान वारसा लाभला आहे, असे सांगून डॉ. सय्यद म्हणाले, संत तुकाराम महाराज व शेख अनगढशाह फकीर (रहे.), ह. शेख मुहम्मद (रह.), श्रीगोंद्याचे शेख मुहम्मद महाराज यांचे परस्पर प्रेमाचे संबंध व सलोखा आजही टिकून आहे. तुकोबांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करताना दरवर्षी पुण्यात अनगढशाह बाबांच्या दर्गाहमध्ये मुक्काम करते तसेच श्रीगोंदास्थित शेख मुहम्मद बाबा (रहे.) समाधीस्थळ वारकर्‍यांचे व सर्वधर्मीय बांधवांचे तीर्थस्थळ आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी पैगंबरांचे गुणगाण करणारा ”जहाँ मर्द मुहम्मद” हा पोवाडा लिहिला.  सावित्रीबाई फुले बरोबर फातीमा शेख यांनी सहशिक्षिकेचे काम करून, फुले दाम्पत्याला अनमोल सहकार्य केले.
    शिवरायांच्या राज्यातही परस्पर सद्भावना कायम होती. म्हणूनच वामनरावदादा कर्डक म्हणतात, ”शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते, हिंदू - मुसलमान”
    आदरणीय सानेगुरूजींनी पैगंबर ह. मोहम्मद (सल्ल.) यांचे उदात्त चरित्र ”इस्लामी संस्कृती” या ग्रंथाच्या स्वरूपात जगापुढे ठेवले आहे, प्रबोधनकार ठाकरे आपल्या ” हिंदू धर्माचे दिव्य” मध्ये म्हणतात, ” इस्लामचे पैगंबर ह. मुहम्मद (सल्ल.) यांचे आगमन, त्यांची धोरणे कर्तबगारी आणि अल्पावधीत त्यांच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादी गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंतःकरणाला आश्‍चर्याने थक्क करून सोडणारी यासारखी दूसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात मिळणे शक्य नाही.” बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या ”बहिष्कृत भारत” या आपल्या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. कुरआन हा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्यांना समजत नव्हता. कुरआनातील धर्मतत्वांचा अर्थबोध सामान्यासाठी झाला पाहिजे अशी इच्छा बाळगून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे कामही सुरू केले होते. त्यासाठी 25 हजार रूपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती. दुर्दैवाने महाराजांच्या अकाली निधनाने हे काम पूर्ण झाले नाही. (संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मारक ग्रंथ डॉ. जयसिंगराव पवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीतेत म्हणतात, ”मुहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाना, संघटित केले त्याने स्वजना तया काळी,
लोक प्रतिमापूजक नसावे, त्यांनी एका ईश्‍वरासी प्रार्थावे.
हा मुहम्मदांचा उपदेश, नव्हे एकाच देशासाठी.
    शेवटी प्रत्येकाला मृत्यूतर अटळ आहेच. मात्र सद्भावनेचे उदात्तम कार्य करून मरावे की समाजात द्वेष पसरवून मरावे हा निर्णय प्रत्येकाच्या हाती आहे. निश्‍चितच समाज जोडणार्‍यांचा व द्वेष पसरविणार्‍यांचा अंतिम परिणाम एकसारखा कदापी असू शकत नाही.
    म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ” पेरी कडू जीरे, मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केली कैसी येवी .
आणि पैगंबर मुहम्मद (सल्ल.) म्हणतात, ” यह दुनिया आखिरतकी (पारलौकिक जीवन) की खेती है. सद्भावना वृद्धींगत करण्यासाठी देशातील सर्व सद्भावना प्रिय बांधवांनी सामुहिकपणे व सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आजचा हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असेही त्यांनी सांगीतले.
    लोकायत पुण्याचे निरंजन जैन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, देशात सध्या जातीयवादी शक्ती ताकतवान होत आहेत. गंभीर प्रश्‍न उद्भवला आहे,  देशाला विभागण्याच्या दिशेने का नेले जात आहे?” भारतीय संविधानाला गुंडाळणे आहे की हिंदू राष्ट्र स्थापन करणे? किंवा विदेशी राष्ट्रांचा गुलाम करणे आहे?
    सत्यशोधक समाजाचे अ‍ॅड. संभाजी बोरूडे यांनी सांगितले की, जगात भारत एकच असा देश आहे, जिथे जास्त प्रमाणात माणसांमध्ये भेद केला जातो. सद्भावना मंचाअगोदर ” सावित्री फातीमा मंच” सुरू झाला. भारतीय राज्यघटनेला आव्हान म्हणजेच सद्भावनेला आव्हान, प्रतिगामी शक्तींना विरोध करण्यासाठीच सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी त्याग करावा लागेल. डॉ. एस.एम. पठाण म्हणाले, देशात शांतता नसेल तर देश मोठा होणार नाही. जमाअत  इतर धर्मीयांना सोबत घेऊन सद्भावना निर्माण करण्याचे कार्य करते, हे स्तुत्य आहे.
    माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, अडीच हजार लोकांनी देशावर पाच हजार वर्षे राज्य केले. पण माणसा-माणसात भेद करून, न्याय, सत्यासाठी आमच्यासारखे लोक रस्त्यावर मरणांसाठी तयार आहोत, पण सहभागी न होणारे लोक, घरात अमर राहणार आहात काय? मुसलमानांची भिती दाखवून दलितांना तुडविले जाते. छत्रपती शिवाजी महाराज मनुस्मृतीला धक्का देणारे पहिले राजा होते. विद्वेषाचे वातावरण भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून निर्माण केले जाते. एम.आय.टी.चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी धीरगंभीर, अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले, इस्लाम म्हणजे शांतीच प्रतीक. धर्मग्रंथ म्हणजे कसे जगावे, कसे जगू नये, हे शिकविले. कुरआनच्या माध्यमाने प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी हेच शिकविले. प्रेषितांनी सांगितले, स्वर्ग (जन्नत) आईच्या पायाच्या तळव्याखाली आहे, वडील स्वर्गाचा द्वार आहे. अत्यंत सुंदर चिंतन आहे यामध्ये सद्भावना. मन की बात नव्हे तर दिल की बात आहे. ” मन जोडना नहीं, दिल जोडना, यही सद्भावना है.
    धर्म ही प्रगल्भ होणारी संकल्पना आहे, अशी व्याख्या करून धम्मविनया सामाजिक संस्था, पुण्याचे अध्यक्ष भिक्खुणी सुमना म्हणाल्या, भारतातील सध्याच्या घडामोडी, आपल्याला पुन्हा गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे. हा प्रश्‍न एकत्रितपणे लढल्यास स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करू शकतो. एकमेकांच्या धर्मावर टिका न करता, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मौलाना निजामुद्दीन यांनी नफरत की आग में, मुहब्बत के फुल खिलानेवाले सद्भावना के लोगों को मुबारकबाद. सुभाष वारे यांनी सांगितले की, आत्मसन्मानाचा बळी देऊन, सद्भावना निर्माण होऊ शकणार नाही. गंगाधर बनदरे यांनी सांगितले की, ब्राह्मण हिंदू नाहीत पण हिंदूंचे प्रवक्ते आहेत. जीवन विद्याचे संतोषदादा तोतरे म्हणाले, निसर्गाच्या नियमाचे पालन म्हणजे सद्भावना माणसाला बुद्धीचे वरदान ईश्‍वराने दिले, म्हणून विचाराने वागण्याने आनंद दिला पाहिजे.
    राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ’आग लग गई इस देश को, अब बचाही क्या? अशी व्यथा मांडून, बच गए हम तो जला ही क्या ? इन्सान की औलाद है, इन्सान ही रहेगा. देशातील घडामोडीवर हल्लाबोल करताना सांगितले की, मंदीर के आगे मूर्ती, मूर्ती के पीछे खुर्ची, प्रेम की गंगा बहाते चलो, सद्भावना को बढाते चलो.
    जमाअते इस्लामी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जमीर कादरी यांनी सांगितले की, अन्यायाविरूद्ध न्याय प्रस्थापित करणे, त्याशिवाय सद्भावना कायम होऊ शकत नाही. प्रचलित इतिहासाच्या पुर्नलेखनाची आवश्यकता आहे. प्रसिद्धी माध्यमाद्वारे चुकीचा इतिहास शिकविला जात आहे.
    पंढरपूर येथील हभप रामदास महाराज म्हणाले, डॉ. आंबेडकरांची राज्यघटना अतिशय चांगली आहे. त्याची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे झाली पाहिजे. देशात विद्वेषाची आग लागलेली आहे, एकमेकांशी प्रेम करण्याचे प्रयत्न करा, तरच सद्भावना निर्माण होईल.
     सूत्रसंचालन जमाअतचे दापोडी विभागाचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन यांनी केले. शब्बीर अहमद यांनी आभार मानले.     कार्यक्रमास राज्यभरातून सद्भावना प्रेमी, विविध जाती, धर्मांचे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. दुपारी 1 ते 2 दरम्यान, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. पुणे जमाअतच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतोनात प्रयत्न केले. कार्यक्रम संपल्यानंतर आजम कॅम्पस मधील विस्तीर्ण मस्जीदमध्ये मगरीबच्या नमाजच्या वेळी सर्व मान्यवर देशबांधवांना मस्जीद परिचय करून देण्यात आला. विविध धर्मियांची मांदियाळी असूनसुद्धा अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने कार्यक्रम पार पडला.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

Justice
भूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो. याविषयी सविस्तर उल्लेख मागे आपण पाहिलाच आहे. मात्र इस्लामी कायद्याने या अपराधावरसुद्धा त्याचे मूळ शोधून यशस्वी तोडगा काढला आहे. माणसाला भूक लागताच जेवण देणे, तहान लागताच पाणी देणे, तसेच लैंगिक तहान लागताच त्याचे वैध आणि धर्मसंमत साधन पुरविणे याच निसर्गनियमानुसार इस्लामने मुलगा-मुलगी वयात येताच त्यांचे लग्न करून देण्याची शिकवण दिली आहे. कारण लैंगिक भावना ही नैसर्गिक भावना आहे. कोणीही धर्मात्मा असो, महात्मा असो, त्यागी पुरुष असो की साधू-संत असो. त्याने लग्न करून पारिवारिक जवाबदारी पूर्ण करायलाच हवी. अन्यथा त्याचे महात्म्य आणि त्यागाला अगर धर्मात्म्याला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच इस्लामने संन्यास आणि वैराग्य धारण करून समाजाच्या जवाबदार्यांतून पळपुटेपणा करण्यास निषिद्ध ठरविले आहे. अर्थातच संसारत्याग आणि लैंगिक भावनांना दाबून टाकणे हे निसर्गनियमांविरुद्ध बंडखोरी आहे आणि ज्या ज्या वेळी माणूस निसर्गनियमांशी(अर्थातच इस्लामशी) बंडखोरी करतो, तेव्हा अपराध आणि गुन्हेगारीचे तांडव माजते, समाजजीवन विस्कळीत होते. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘हे वयात आलेल्या तरुणांनो(आणि तरुणींनो)! विवाह करा. यामुळे तुम्ही तुमच्या लैंगिक आचरणाचे पावित्र्य अबाधित राखू शकाल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
उपरोक्त प्रेषित विधानावरून हे स्पष्ट होते की वयात आलेल्या तरुण-तरुणींनी लवकरात लवकर लग्न आटोपून घ्यावे. यामुळे निश्चितच लैंगिक अपराधांवर आळा बसेल.
याशिवाय स्त्रियांनी विनाकारण घराबाहेर एकट्या फिरू नये. त्याचप्रमाणे परपुरुषांबरोबर विनाकारण अगर कामानिमित्त वावरू नये. पडदापद्धतीचा अंगीकार करावा. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास एकटी अगर परपुरुषासोबत करू नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वर आणि परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवणार्या स्त्रीसाठी हे वैध अगर धर्मसंमत नाही की तिने एका दिवसाकरिताही ‘गैर महरम‘(परपुरुषाबरोबर) प्रवास करावा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
‘गैर महरम‘ पुरुष म्हणजे कोण? गैर महरम म्हणजे असा पुरुष, ज्याच्याशी विवाह करणे वैध असते. अर्थात मुलगा, पती, पिता, भाऊ, दूधभाऊ, भाचा, पुतन्या, काका, मामा, नातु, सासरा, सावत्र मुलगा, सावत्र पिता सोडून जेवढे पुरुष असतील, ते सर्व पुरुष इस्लामने गैर महरम ठरविले आहेत व यांच्याबरोबर लांब पल्ल्याचा अगर दिवसभराचा प्रवास आणि एकांतातील सहवास इस्लामने निषिद्ध ठरविला आहे.(संदर्भ : सूरह-ए-निसा - २२)
याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संध्याकाळ झाल्यावर मुलांनी जास्त वेळ बाहेर न घालविण्याचीही शिकवण दिली आहे. कारण बरीच कृष्णकृत्ये रात्रीच्या वेळी अगर संध्याकाळच्या अंधारात घडतात.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget