Latest Post

माणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक संवेदना आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे. स्वार्थ, निष्ठुरता, कंजूषपणा, संकुचित दृष्टी यांना कधीही मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही. धैर्य व सहनशीलता, दृढनिश्चय, गंभीरता, धाडस व हिंमत व शौर्य हे ते गुण आहेत, ज्यांना सदैव प्रशंसा लाभली आहे. उतावळेपणा, पोरकटपणा, चंचलता, उत्साहीनता व भ्याडपणा यांना कधीही चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. आत्मसंयम, स्वाभिमान, सौजन्य व मनमिळाऊपणा यांची गणना सद्‌गुणात होत आली आहे. विकारादीनता, क्षुद्रपणा, असभ्यता व उद्धटपणा यांचा कधीही चांगल्या गुणांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. कर्तव्यतत्परता, एकनिष्ठता, दक्षता आणि जबाबदारपणा यांचा नेहमी आदर केला गेला. कर्तव्य पराड्‌मुख, अप्रामाणिक, कामचुकार व बेजबाबदार यांना कधी चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. याचप्रमाणे सामूहिक जीवनाच्या चांगल्या व वाईट गुणांच्या बाबतीतसुद्धा मानवतेचा निर्णय एकमुखीच झालेला आहे.
ज्यामध्ये शिस्त व नियमबद्धता असते, परस्पर सहकार्य व सहयोग असतो, आपापसात प्रेम व सद्‌भाव असतो, सामूहिक न्याय व सामाजिक समता असत, प्रशंसेस पात्र नेहमी तो समाज झाला आहे. भेदभाव, गोंधळ बेशिस्त, अव्यवस्था, दुही, परस्पराबद्दल दुर्भाव, अत्याचार, असभ्यता यांची सामूहिक जीवनाच्या कल्याणकारक गोष्टीमध्ये कधी गणना झालेली नाही. असाच प्रकार चारिÍयाच्या सदाचार व दुराचाराबद्दलसुद्धा आहे. चोरी, व्यभिचार, खून, दरोडा, फसवेगिरी, लाच लुचपत यांना कधी चांगले आचरण मानले गेले नाही. शिवीगाळ, अत्याचार, कुचाळी, चहाडी, हेवा, मत्सर, आळ, बदनामी, दंगेखोरी यांना कधी सदाचार मानला गेला नाही. लबाड, अहंकारी, दंगलबाज, ढोंगी, हटधर्म व आधाशी लोकांचा कधी चांगल्या लोकांमध्ये समावेश करण्यात आला नाही. याउलट आईवडिलांची सेवा, नातलगांचे साहाय्य, शेजारपाजाऱ्यांशी चांगली वागणूक, मित्रांच्याबरोबर निष्ठा, दुर्बलांचे समर्थन, अनाथ व निराधारांची देखभाल, रोग्यांची शुश्रूषा आणि आपदग्रस्त लोकांचे साहाय्य यांना नेहमी सदाचार मानला गेला आहे. सुशील मधुरभाषी, सौम्य वृत्तीच्या व शुभचिंतक लोकांना नेहमी आदराने पाहिले गेले आहे. सरळमार्ग व शुभचिंतक लोकांनाच मानवता आपला चांगला घटक मानत आलेली आहे. प्रत्येक बाबतीत ज्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, ज्यांचे बाह्यरूप व अंतरंग सारखे आहे, ज्यांच्या उक्ती व कृतीमध्ये मेळ व सुसंगती आहे, जे आपल्या हक्काच्या बाबतीत अल्पसंतुष्ट व इतरांच्या हक्काच्या बाबतीत उदार आहेत, जे स्वत: शांततेचे जीवन जगतात व इतरांना शांततामय जीवन जगू देतात, ज्यांच्याकडून प्रत्येकजण चांगल्याची आशा करतो व कोणालाही त्यांच्याकडून वाईट होण्याचे भय नसते, अशा लोकांचासुद्धा मानवतेने आपल्या चांगल्या घटकात समावेश केलेला आहे.
यावरून स्पष्ट होते की मानवी नैतिक तत्वे वस्तुत: अशी जागतिक सत्ये आहेत ज्यांना सर्व लोक नेहमी परिचित झालेले आहेत. सदाचार व दुराचार यांना शोधण्याची आवश्यकता नाही. त्या काही लपलेल्या गोष्टी नसून मानवाच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. यांची जाणीव माणसाला स्वाभाविकरीत्या व्हावी अशी योजना केली गेली आहे आणि म्हणूनच पवित्र कुरआन आपल्या भाषेत सदाचाराला ""मअरुफ'' (चांगले) व दुराचाला "मुनकर'' (वाईट) या शब्दांनी संबोधितो, म्हणजे सदाचार तो आहे जो सर्वांना आवडतो आणि दुराचार तो ज्याला कोणीही पसंत करीत नाही. याच वस्तुस्थितीला पवित्र कुरआनने माणसाला अल्लाहने चांगले व वाईट ओळखण्याचे ज्ञान व विवेकशक्ती अंत:प्रेरणेने दिले आहे, असे म्हटले आहे.
प्रश्न हा आहे की नीतीचा चांगला व वाईटपणा सुपरिचित असताना आणि गुण सद्‌गुण व काही दुर्गुण असल्याबद्दल लोकांचे नेहमी एकमत असताना जगामध्ये निरनिराळ्या नैतिक व्यवस्था का अस्तित्वात आहेत? त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कोणत्या आधारावर आहे? आणि आम्ही जेव्हा इस्लामची स्वतंत्र अशी एक जीवन व्यवस्था आहे असे म्हणतो ते कोणत्या आधारावर आणि नीतीच्या प्रश्नात इस्लामची ती खास वैशिष्टयपूर्ण देणगी कोणती?
हा प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण जेव्हा जगातील निरनिराळ्या नैतिक व्यवस्थेची पाहणी करतो तेव्हा प्रथम नजरेस एक फरक आपल्याला आढळून येतो. निरनिराळ्या नैतिक गुणांना जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आणि त्यांची मर्यादा, त्यांचे स्थान व त्यांचे कार्य ठरविणे आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता कायम करणे या बाबीमध्ये या सर्व व्यवस्था एकदुसऱ्याहून भिन्न आहेत. अधिक विचार केल्यास या फरकाचे कारणही स्पष्ट होते. वस्तुत: नैतिक उच्चनीचतेचे प्रमाण ठरविणे आणि चांगल्या व वाईटाच्या ज्ञानाचे साधन निश्चित करणे याबाबतीत त्याच्यामधील विभिन्नता हे त्या फरकाचे कारण आहे आणि त्यांच्यामध्ये या बाबतीतही मतभेद आहेत की नैतिक कायद्याच्या मागे अंमलबजावणीची शक्ती कोणती असावी की जिच्या सामथ्र्याद्वारे त्याची अंमलबजावणी व्हावी? आणि माणसाला या कायद्यानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? परंतु जेव्हा आपण या मतभेदाच्या कारणाचा शोध घेतो तेव्हा शेवटी ही वस्तुस्थिती उघड होते की या सर्व नैतिक व्यवस्थेचे मार्ग ज्या मूळ गोष्टीने वेगवेगळे केले आहेत ती ही आहे की त्याच्यामध्ये विश्वाची कल्पना, विश्वामधील माणसाचे स्थान व मानवी जीवनाचा उद्देश याबद्दल मतभेद आहेत आणि याच मतभेदाचे अथपासून इतिपर्यंत त्यांचा आत्मा, त्यांची वृत्ती व त्यांचे स्वरूप यांना एक दुसऱ्यापासून अगदी भिन्न करून टाकले आहे.
मानवी जीवनात खरे निर्णयात्मक प्रश्न हे आहेत की या विश्वाचा कोणी ईश्वर आहे किंवा नाही? आहे तर मग तो एक आहे की अनेक? ज्याचे ईशत्व मानावयाचे त्याचे गुण काय आहेत? मनुष्याशी त्याचा संबंध काय आहे? त्याने मनुष्याच्या मार्गदर्शनाची काही व्यवस्था केली आहे किंवा कसे? मनुष्य त्यांच्यासमोर उत्तरदायी आहोत किंवा नाही? उत्तरदायी आहे तर कोणत्या प्रकारचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे? आणि ज्याला समोर ठेवून आपण कार्य करतो तो आमच्या जीवनाचा उद्देश व शेवट काय आहे? या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप जसे असेल त्यानुसारच जीवनाची व्यवस्था ठरेल आणि त्याला अनुरूप अशी नैतिक व्यवस्था तयार होईल.
या छोट्याशा भाषणात जगातील निरनिराळ्या जीवनव्यवस्थेचा परामर्श घेऊन कोणत्या व्यवस्थेने या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचा, त्याचे स्वरूप व मार्गाच्या निश्चितीवर काय प्रभाव पडला आहे हे दाखवून देणे कठीण आहे. येथे फक्त इस्लामसंबंधी निवेदन आहे की तो या प्रश्नांचे काय उत्तर देतो आणि त्या आधारावर कोणत्या विशिष्ट प्रकारची नैतिक व्यवस्था अस्तित्वात येते.
इस्लामचे उत्तर हे आहे की या विश्वाचा स्वामी अल्लाह आहे आणि तो अल्लाह एकटाच आहे. त्यानेच या विश्वाला निर्माण केले आहे. तोच याचा एकमात्र स्वामी, शासक व पालनकर्ता आहे आणि त्याच्या आज्ञापालनावरच ही सारी व्यवस्था कार्य करत आहे. तो बुद्धिमान आहे, सर्व शक्तिमान आहे, दृश्य व अदृश्य गोष्टी जाणणारा आहे, तो सर्व दोषापासून व सर्व वैगुण्यापासून पवित्र आहे आणि त्याचे ईशत्व अशा पद्धतीवर कायम आहे ज्यामध्ये कसलीही वक्रता अगर गोंधळ नाही. माणूस त्याचा जन्मजात गुलाम आहे. त्याचे काम हेच आहे की त्याने आपल्या निर्मात्याची गुलामी व आज्ञापालन करावे. त्याचे जीवन म्हणजे अल्लाहची संपूर्ण गुलामी दुसरी कोणतीही पद्धत त्याच्यासाठी योग्य नाही आणि या गुलामीची - आज्ञापालनाची - पद्धत ठरविणे हे माणसाचे काम नसून तो ज्याचा गुलाम आहे त्या अल्लाहचे काम आहे. अल्लाहने त्याच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठविले आहेत आणि ग्रंथ उतरविले आहेत. माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या जीवनाची व्यवस्था याच मूळ शिकवणीच्या आधारावर बनवावी. माणूस आपल्या जीवनाच्या सर्व कामाबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे आणि हे उत्तरदायित्व त्याला या जगात नव्हे तर आखिरतमध्ये करावयाचे आहे. जगातील सध्याचे जीवन हा परीक्षेचा अवधी आहे आणि येथे माणसाची सारी धावपळ या ध्येयावर केंद्रित झाली पाहिजे की परलोकाच्या उत्तरदायित्वात अल्लाहसमोर त्याने यशस्वी व्हावे. या परीक्षेत माणूस आपल्या संपूर्ण अस्तित्वासह सामील आहे. त्याच्या सर्व शक्तीची व योग्यतेची परीक्षा आहे. माणसाचा साऱ्या विश्वात ज्या ज्या वस्तूशी जसा जसा संबंध येतो, त्याची निस्पृह चौकशी केली जाईल की त्याने त्यांच्याशी कसा कसा व्यवहार केला आणि ही चौकशी ती शक्ती करणार आहे. तिने जमिनीचा कणन्‌-कण, हवा, पाणी, सृष्टीच्या लहरी आणि खुद्द माणसाचे अंत:करण व मेंदू आणि त्याचे हात व पाय यावरील त्याच्या हालचाली व स्तब्धता यांनाच नव्हे तर त्याच्या विचारांचा व संकल्पांचा खराखुरा पुरावा तयार ठेविला आहे.
हे ते उत्तर आहे जे इस्लामने जीवनाच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी दिलेले आहे. ही विश्वाबद्दलची व मानवाबद्दची कल्पना त्या खऱ्या व परम कल्याणाला निश्चित करते, ज्यापर्यंत पोहोचणे हा माणसाच्या आचरणाचा, प्रयत्नांचा व त्याच्या धावपळीचा उद्देश असला पाहिजे आणि हे कल्याण म्हणजे ईशप्रसन्नता. इस्लामच्या नैतिक व्यवस्थेत याच प्रमाणाधारे एखाद्या आचरण पद्धतीची पारख करून हा निर्णय केला जातो की ही पद्धत चांगली आहे की वाईट. हे ठरविल्याने नीतीला तो कणा प्राप्त होतो ज्याच्याभोवती नैतिक जीवन फिरत असते आणि त्याची स्थिती नांगर नसलेल्या, जोराच्या वाऱ्यांनी, समुद्राच्या लाटांनी सैरावैरा हिंदोकळणाऱ्या जहाजासारखी होत नाही. ही निश्चिती एक केंद्रिय उद्देश समोर ठेविते. त्यानुसार जीवनामधील साऱ्या नैतिक गुणाची योग्य मर्यादा, योग्य स्थान व योग्य व्यावहारिक स्वरूप ठरविले जाते आणि आपल्याला ती कायमस्वरूपाची नैतिक मूल्ये लाभतात जी बदलत्या परिस्थितीतदेखील आपल्या जागी स्थिर व कायम राहू शकतात आणि सर्वांत मोठी गोष्ट ही आहे की ईशप्रसन्नता हे उद्दिष्ट ठरल्यानंतर नीतीला एक उच्चतम उद्देश प्राप्त होतो, ज्याआधारे नैतिक उन्नतीच्या संभावना अनंत होऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या स्वार्थपणाच्या घाणीने मलीन होत नाहीत.
प्रमाणाबरोबरच इस्लाम आपल्या विश्वाबद्दलच्या व माणसाबद्दलच्या दृष्टिकोनाद्वारे नैतिक उच्चनीचतेच्या ज्ञानाचे एक कायमचे साधनसुद्धा उपलब्ध करून देतो. त्याने आपल्या नैतिक ज्ञानाला निव्वळ बुद्धी, इच्छा, अनुभव वा मानवी विद्येवर अवलंबून ठेवलेले नाही. तसे असते तर, त्याच्या सतत बदलणाऱ्या निर्णयाने आपले नैतिक आदेशसुद्धा बदलत गेले असते व त्यांना कधीच स्थिरता लाभली नसती. याउलट त्याने आपल्या एक निश्चित ज्ञानाचा झरा दिलेला आहे, म्हणजे ईशग्रंथ आणि त्याच्या पैगंबराची सुन्नत (पद्धत), याद्वारे आम्हाला प्रत्येक काळात नैतिक शिकवण लाभते आणि ही शिकवण वैयक्तिक जीवनाला लहान सहान प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मोठमोठ्या समस्यांपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व पैलूमध्ये आमचे मार्गदर्शन करते. त्यांच्यामध्ये जीवनाच्या व्यवहारावर नैतिक तत्वांचा अतिव्यापक असा वापर केला गेल्याचे आढळून येते. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता भासत नाही.
विश्वाबद्दलच्या व मानवाबद्दच्या इस्लामच्या याच कल्पनेमध्ये ती अंमलबजावणीची शक्तीसुद्धा आहे जी नैतिक कायद्याच्या पाठीशी असणे आवश्यक असते आणि ती शक्ती म्हणजे अल्लाहचे भय. आखिरतच्या (पारलौकिक) चौकशीची काळजी आणि कायमचे भवितव्य खराब होण्याचा धोका. इस्लाम जरी अशी एक शक्ती व लोकमत तयार करू इच्छितो जी सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्ती¨ना व गटांना नीतीनियमाचे पालन करण्यावर विवश करणारी असेल आणि इस्लाम अशी एक राजकीय व्यवस्थादेखील प्रस्थापित करू इच्छितो जिच्या शासनाद्वारे नैतिक कायद्याला सक्तीने लागू केले जाईल, परंतु त्याचा खरा विश्वास या बाह्य दबावावर नाही तर त्या आंतरिक दबावावर आहे, ज्याचा अल्लाहवरील व आखिरतवरील (परलोकावरील) ईमान(श्रद्धा) मध्ये समावेश आहे. नैतिक आदेश देण्यापूर्व इस्लाम माणसाच्या मनात ही गोष्ट वसवितो की, तुझा व्यवहार "वस्तुत: त्या अल्लाहबरोबर आहे, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागी तुला पाहात आहे. तू साऱ्या जगापासून स्वत:स लपवू शकतोस, परंतु त्याच्यापासून स्वत:स लपवू शकत नाहीस. साऱ्या जगाला धोका देऊ शकतोस, परंतु त्याला धोका देऊ शकत नाहीस. जगापासून पळून जाऊ शकतोस, परंतु त्याच्या पकडीपासून वाचून कोठे जाऊ शकत नाहीस. जग फक्त तुझ्या बाह्य रूपाला पाहू शकते, परंतु अल्लाह तुझ्या संकल्पांना व तुझ्या हेतूंनासुद्धा जाणतो. जगामधील या अल्पशा जीवनात तू जे वाटेल ते कर. परंतु तुला शेवटी एके दिवशी मरावयाचे आहे आणि त्या न्यायालयात तुला हजर व्हावयाचे आहे जेथे वकिली, लाचलुचपत, शिफारस, खोटी साक्ष, धोकेबाजी व फसवेगिरी हे काही चालू शकणार नाही आणि तुझ्या भविष्याचा निस्पृह निवाडा केला जाईल.'' ही निष्ठा निर्माण करून इस्लाम प्रत्येक माणसाच्या मनात एक पोलिस चौकीच बसवित आहे, जी आतून त्याला आदेशांचे पालन करण्यास विवश करीत असते, मग बाहेरून या आदेशांचे पालन करावयास लावणारे एखादे फौजदारी न्यायालय वा तुरूंग असो वा नसो. इस्लामच्या नैतिक कायद्यामागे खरी शक्ती हीच आहे जी त्याला अंमलात आणते. लोकमत व शासनाची शक्ती याच्या समर्थनार्थ असल्यास दुधात साखरच. नाहीपेक्षा फक्त ही श्रद्धा मुस्लिम व्यक्ती¨ना व मुस्लिम समाजाला सरळमार्ग लावू शकते, फक्त ही श्रद्धा माणसाच्या मनात रूजणे आवश्यक आहे.

- मुहम्मद फारूक खान

भाषांतर
- सय्यद ज़ाकिर अली


ईशअस्तित्वाची खरी संकल्पना काय आहे? त्यावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ आणि हेतू काय आहे? व्यावहारिक दृष्टिकोनानुसार ईश्वराशी आपला संबंध काय आहे? वगैरे प्रश्नांवर या छोट्याशा पुस्तिकेत मानवाच्या निसर्गस्वभावाशी सुसंगत चर्चा करण्यात आली आहे. मानव आणि सृष्टीचा निर्माता ईश्वराशी आशा आहे की तो वाचकवर्गास लाभ प्रदान करील, तसेच आम्ही ईश्वराचे अत्यंत आभारी आहोत की त्याने विशेष कृपा करून आम्हास हे सत्कार्य करण्याची सुबुद्धी आणि सामर्थ्य प्रदान केले.
   
आयएमपीटी अ.क्र. 190      -पृष्ठे - 65    मूल्य - 22                आवृत्ती - 1 (December 2010)


डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/culr719h2pvvsmgpormz0emiqyn156ol

Book BSS
इस्लाम प्रत्येक स्तरावर न्यायाचा कैवारी आहे. त्याचे सिद्धान्त, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अन्याय आणि शोषणाला मुळातून उखडून टाकतात. इस्लामी धर्मशास्त्रामध्ये महिलांसंबंधीचे सिद्धान्तसुद्धा समानता आणि न्यायाचे द्योतक आहेत आणि त्यामुळे भांडवलशाहीवर्गाचे स्त्रियांच्या शोषणाचे सर्व मार्ग बंद केले जातात. इस्लाम स्त्रियांचे ’स्त्रीत्व’ आणि त्यांच्या ’अस्मिते’चे रक्षण आणि प्रतिष्ठा प्रदान करतो. स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार, त्यांचे नारी-व्यक्तीत्व, त्यांची अस्मिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन दिले जातात. अशा प्रकारे मुस्लिम स्त्रीला इस्लाममध्ये खरी लैंगिक समानता मिळत असल्यामुळे भांडवलशाहीमार्फत बेंबीच्या देठापासून ओरडून दिल्या जाणार्‍या तथाकथित लैंगिक समानतेच्या फसव्या घोषणांमुळे ती धोका खात नाही.
    व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेसंबंधी इस्लामचा दृष्टीकोन - इस्लामने स्त्रीला तिचे शिक्षण आणि योग्यतेनुसार समाज आणि संस्कृतीची सेवा करण्याची अनुमती दिली आहे. अल्लाहचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्या काळात बर्‍याचशा स्त्रिया निरनिराळी आर्थिक कार्ये तडीस नेत असत. आमच्या विद्वानांनी आर्थिक आवश्यकते व्यतिरिक्त आपला वेळ आणि आपल्या योग्यतेचा उत्कृष्ट उपयोग समाज आणि संस्कृतीची सेवा, उत्पन्नात वाढ आणि ईशमार्गात खर्च करण्यासाठी स्त्रियांना काम करण्याची अनुमती दिली आहे. (मौलाना जलालुद्दीन उमरी यांचे पुस्तक ’कुटुंब व्यवस्था’, पृ. 117-121, आवृत्ती 2008).
    स्त्रीयांवर कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही
    भांडवलशाही धारणेनुसार आपल्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक बाबीसाठी स्त्रीला स्वत:वर अवलंबून राहण्याचे स्वप्न दाखविले आहे. याचे कारण असे सांगितले आहे की स्वातंत्र्य तिला शक्तीमान (एम्पॉवर्ड) बनविते. इस्लामच्या दृष्टीने हा विचार चुकीचा आहे. इस्लामने आपापसातील सहयोग, भागीदारी आणि प्रेम हा कुटुंबाचा पाया ठरविला आहे. घरच्या जबाबदार्‍यांमध्ये कामाच्या विभागणीला कुटुंबाचा पाया ठरविला आहे. त्यानुसार स्त्रीया कुटुंबाची देखरेख आणि काळजीवाहक बनविले. आर्थिक काम करण्यास स्त्रीला फक्त परवानगी दिली आहे. तिच्यावर कोणतीही आर्थिक जबाबदारी टाकलेली नाही. घरच्या आर्थिक व्यवहाराची पूर्ण जबाबदारी फक्त पुरूषावर आहे. पत्नीच्या सर्व खर्चाची जबाबदारी ही पतीवर आहे.
    ” पुरूष स्त्रियांवर विश्‍वस्त आहेत, या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसर्‍यावर श्रेष्ठत्व दिले आहे. आणि या आधारावर की पुरूष आपली संपत्ती खर्च करतात. (दिव्य कुरआन, 4:34).
” अशा अवस्थेत मुलांच्या पित्याने परिचित पद्धतीनुसार, जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.” (दिव्य कुरआन, 2:233).
    अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ”स्त्रियांचा तुमच्यावर हक्क आहे की तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने खाऊ-पिऊ द्यावे आणि कपडे द्यावेत.” (हदीस : मुस्लिम).
    जर पती नसेल (म्हणजे स्त्री विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल) तर इस्लाम स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या पित्यावर टाकतो आणि जर पालनपोषण करणारा कोणीच नसेल तर तिच्या पालनपोषणाची जबाबदारी इस्लामी राज्याची असते. पत्नी जरी कमावती असली तरी तिच्या पूर्ण कमाईवर फक्त     -(आतील पान 7 वर)
तिचाच अधिकार असतो. पती आणि सासुरवाडीचे नातेवाईक स्त्रीला नोकरी करण्यास भाग पाडू शकत नाही आणि नोकरी करणार्‍या स्त्रीस आपली कमाई देण्याससुद्धा भाग पाडू शकत नाहीत आणि कमाविणार्‍या स्त्रीच्या सर्व उदरनिर्वाहाच्या खर्चाचीसुद्धा जबाबदारी पतीवरच असते.
    ”आणि जे काही अल्लाहने तुमच्यापैकी एखाद्याला दुसर्‍याच्या तुलनेत अधिक दिले आहे. त्याची अभिलाषा धरू नका, जे काही पुरूषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमविले आहे. त्यानुसार त्यांचा वाटा होय, अल्लाहजवळ त्याच्या कृपेची प्रार्थना करीत राहा, नि:संशय अल्लाहला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.” (दिव्य कुरआर, 4:32).
    इस्लामचा हा सिद्धान्त स्त्रीसाठी नोकरी किंवा आर्थिक व्यवहाराला फक्त तिची आवड किंवा सांस्कृतिक सेवा इथपर्यंत मर्यादित करतो. सामान्य परिस्थितीमध्ये स्त्री एकतर स्वत:ला कामात मग्न ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार आणि नोकरी करू शकते किंवा आपले ज्ञान आणि कला यांचा उपयोग करण्यासाठी किंवा कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक किंवा सामाजिक आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी हे काम तिच्या जबाबदारीमध्ये सामील नाही, म्हणून या कामासाठी तिला तणावात राहण्याची आवश्यकता नाही किंवा कोणताही त्रास घेण्याचीही आवश्यकता नाही. जर तिची परिस्थिती किंवा कामाच्या जागेची अवस्था आणि काम करण्याची जागा अनुकूल असेल (म्हणजे) हे काम किंवा कार्यमग्नता तिच्यासाठी सुखद अनुभव आहे) आणि याबराबरच तिची कौटुंबिक जबाबदारी आणि धार्मिक अपेक्षांची पूर्तता सहज शक्य असल्यास ती स्वत: आपल्या निर्णयानुासर आणि पतीच्या परवानगीने असे काम करू शकते. यामुळे मिळणार्‍या कमाईतून स्वत:वर, आई-वडिलांवर किंवा नातेवाईकांवर, गरीबांवर आणि अल्लाहच्या मार्गात किंवा ती इच्छित असेल तर आपल्या मर्जीप्रमाणे पती आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करू शकते. परंतु, हे सर्व काही तिच्या मर्जीवर आणि खुशीवर अवलंबून आहे. याप्रमाणे स्त्रीसाठी आर्थिक कार्य स्वेच्छिक काम होउन जाते. ती जेव्हा इच्छिल तेव्हा ते करील आणि तिचा आपल्या मूळ जबाबदारीच्या आडवे काम येत आहे असे वाटेल तर किंवा आपले आरोग्य, मनाची शांती किंवा कौटुंबिक जीवनासाठी हानिकारक वाटत असेल तर ती ते काम सोडू शकते. इस्लामचा हा संतुलित दृष्टिकोन स्त्रीला पारंपरिक समाजाप्रमाणे घरामध्ये बंदिस्त करून तिच्या योग्यतेस नष्ट करण्याचे कारणही बनत नाही किंवा आधुनिक आणि तथाकथित विकासशील समाजाप्रमाणे दुप्पट जबाबदारी टाकून तिचे आरोग्य आणि सुख-शांतीही नष्ट करण्याचे माध्यम बनत नाही.
स्त्रीची खरी जबाबदारी घर आहे
इस्लाम हे सुद्धा सांगतो की स्त्रीची खरी जबाबदारी, जिच्यासंबंधी ती अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. तिचे घर आहे. तिने पहिले प्राधान्य घराला द्यावयाचे आहे कारण ते तिच्या जबाबदारीत सामील आहे. ते तिच्या पतीच्या सुख-शांतीस कारणीभूत आहे, ” आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या. जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.” (दिव्य कुरआन, 30:21).
पती, त्याचे घर आणि मुलांच्या बाबतीत अल्लाहसमोर जबाबदार आहे,” तुमच्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्यांच्या बाबतीत जबाबदार आहे. स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याची मुले यांच्या बाबतीत उत्तरदायी आणि रक्षक आहे.” (हदीस : बुखारी)
    ”उंटावर स्वार होणार्‍या (अरबांच्या) स्त्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट कुरैशांच्या (स्त्रिया) प्रामाणिक आणि संयमी असतात, ज्या आपल्या छोट्या मुलांच्या बाबतीत दयाळू आणि पतीच्या व्यवहारांची रक्षण करणार्‍या असतात.” (हदीस : बुखारी).

अमर बिन अहवस जुशमी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना ‘हज्जतुल-विदाअ’ (पैगंबरांच्या जीवनातील शेवटाच हज) मध्ये सांगताना ऐकले, सुरूवातीला पैगंबरांनी ‘हम्द’ (अल्लाहची स्तुती) व ‘सना’ (गुणगान) म्हटले आणि मग इतर गोष्टीचे उपदेश केले आणि म्हणाले, ‘‘लोकहो ऐका! महिलांशी चांगला व्यवहार करा कारण त्या   तुमच्याजवळ कैद्यासम आहेत. त्यांच्यावर सक्ती फक्त तेव्हाच केली जाऊ शकते जेव्हा त्यांच्याकडून उघड अवज्ञा प्रकट होत असेल, जर त्यांनी अशी वर्तणूक केली तर त्यांच्याशी   त्यांच्या शयनगृहातील संबंध तोडून टाका आणि त्यांना इतका मार देऊ शकता जो जखमी करणारा नसावा. मग जर त्यांनी तुमचे म्हणणे ऐकले तर त्यांना त्रास देण्याकरिता मार्ग शोधू  नका. ऐका! काही अधिकार तुमच्या पत्नींचे तुमच्यावर आहेत आणि काही तुमचे अधिकार त्यांच्यावर आहेत. तुमचा अधिकार त्यांच्यावर हा आहे की तुम्हाला पसंत नसलेल्या व्यक्तीला त्यांनी आपल्या घरात प्रवेश देऊ नये आणि तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तींना त्यांनी घरात येण्याची परवानगी देऊ नये. ऐका! आणि त्यांचा अधिकार तुमच्यावर हा आहे की  तुम्ही त्यांचा योग्यप्रकारे सांभाळ करावा.’’

माननीय अबू मसऊद बदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य आपल्या कुटुंबियांवर परलोकात मोबदला मिळण्याच्या उद्देशाने खर्च करतो   तेव्हा तो त्याच्यासाठी ‘सदका’ (दान) बनतो.’’ (हदीस : मुत्तफ अलैहि)

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याला अपराधी बनविण्याकरिता तो जेवू घालत असलेल्या लोकांना खराब करणे  पुरेसे आहे. (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्याला दोन पत्नी असतील आणि त्याने त्यांच्या अधिकारांमध्ये न्याय व समानता  राखली नसेल तर अंतिम निवाड्याच्या दिवशी तो अर्धे शरीर नष्ट झालेल्या स्थितीत येईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
तो अर्ध्या शरीरासह याकरिता येईल की ज्या पत्नीचे अधिकार त्याने प्रदान केले नसतील ती त्याच्या शरीराचाच एक भाग होती. आपल्या शरीराच्या अर्धा भाग त्याने जगात कापून टाकला होता, मग अंतिम न्याय-निवाड्याच्या दिवशी त्याच्याजवळ पूर्ण शरीर कुठून येईल!

पतीचे अधिकार
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जी स्त्री पाच वेळची नमाज अदा करते आणि रमजानचे रोजे पाळते आणि आपल्या लज्जास्थानाचे  रक्षण करते आणि आपल्या पतीची सेवा व आज्ञापालन करते ती स्वर्गाच्या द्वारांपैकी हव्या त्या द्वारातून प्रवेश करील.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले, ‘‘कोणती पत्नी सर्वांत चांगली आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ती पत्नी जी आपल्या पतीला   आनंदी ठेवते, जेव्हा तो तिच्याकडे पाहील तेव्हा तिने आपला सेवाभाव सादर करावा आणि आपल्या संपत्तीबाबत कोणतीही अशी गोष्ट करू नये जी पतीला पसंत नसेल.’’ (हदीस :  निसई)

स्पष्टीकरण
आपली संपत्ती म्हणजे जी पतीने घराची मालकीन म्हणून आपल्या पत्नीच्या हवाली केलेली असते.

हकीम बिन मुआविया आपले वडील मुआविया यांच्याद्वारे कथन करतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘एखाद्या पतीच्या पत्नीचा त्याच्यावर काय अधिकार आहे?’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘तिचा अधिकार हा आहे की जेव्हा तुम्ही जेवण कराल तेव्हा तिलाही जेवण द्यावे आणि जेव्हा तुम्ही परिधान कराल तेव्हा तिलाही परिधान करण्यास द्यावे आणि तिच्या   चेहऱ्यावर मारू नये आणि तिला शिव्याशाप देऊ नये आणि जर तिच्याशी संबंधविच्छेद करायचा असेल तर फक्त घरातच दुरावा बाळगावा.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
जसे तुम्ही खाता तसेच आपल्या पत्नीलाही खायला द्या आणि ज्या प्रकारचे कपडे तुम्ही परिधान कराल त्याच दर्जाचे कपडे तिलाही परिधान करण्यास द्या. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की जर पत्नीद्वारे अवज्ञा व दुष्टपणा झाला तर कुरआनच्या उपदेशानुसार अगोदर तिची समजूत घालावी, जर त्यानेही तिच्यात बदल झाला नाही तर घरात अंथरूण वेगळे करा आणि  ही गोष्ट घराबाहेर माहीत होता कामा नये, कारण हे सज्जनतेविरूद्ध आहे, तरीही तिच्यात बदल झाला नाही तर मग तिला मार दिला जाऊ शकतो, परंतु तोंडावर न मारता शरीराच्या  इतर भागावर. त्यातही उपदेश आहे की हाडाला दुखापत पोहचणारा अथवा जखमी करणारा मार देता कामा नये.

लकीत बिन सबरा यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘माझी पत्नी अर्वाच्च बोलत असते.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तिला तलाक द्या.’’ मी म्हणालो, ‘‘तिच्यापासून   मला मुले आहेत, अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र राहत आहोत.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तिला समजवा जर तिच्यात चांगुलपणा स्वीकार करण्याची योग्यता असेल तर ती तुमचे म्हणणे  मान्य करील. आणि खबरदार! तुम्ही तुमच्या सेविकेला मारता तसे आपल्या पत्नीला मारू नका.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
सेविकांना खूप मार द्या आणि पत्नींना मारू नका असा या हदीसच्या शेवटच्या भागाचा असा अर्थ नसून ज्याप्रकारे लोक आपल्या सेविकांशी वागतात तशा पद्धतीने आपल्या पत्नीशी वर्तणूक करता कामा नये.

माननीय अयास बिन अब्दुल्लाह यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे लोकहो! अल्लाहच्या दासींना (म्हणजे आपल्या पत्नींना) मारू नका.’’ यानंतर माननीय  उमर (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ आले आणि म्हणाले, ‘‘पैगंबरांच्या या उपदेशामुळे पतींनी मारणे सोडून दिले तेव्हा महिला आपल्या पतींच्या डोक्यावर चढल्या आणि  धाडसी बनल्या.’’ तेव्हा पैगंबरांनी त्यांना मारण्याची परवानगी दिली. यानंतर पैगंबरांच्या पत्नींकडे अनेक महिला आल्या आणि त्यांनी आपल्या पतींच्या मारहाणीची तक्रार केली तेव्हा  पैगंबर म्हणाले, ‘‘माझ्या पत्नींकडे अनेक महिला आपल्या पतींची तक्रार घेऊन आल्या, असे लोक (पत्नींना मारहाण करणारे) तुमच्यापैकी चांगले लोक नाहीत.’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्या मोमिन पतीने आपल्या मोमिन पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एक सवय पसंत  आली नाही तरी दुसरी सवय पसंत पडेल.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
पत्नी जर सुंदर नसेल अथवा दुसरी एखादी कमतरता तिच्यात आढळून येत असेल तर त्या कारणास्तव लगेच तिच्याशी संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेऊ नका. एका महिलेत  एखाद्या प्रकारची कमतरता असेल तर तिच्यात अनेक अशी चांगली गुणवैशिष्ट्येदेखील असतात ज्यांच्यामुळे ती पतीचा मनावर ताबा मिळविते. मात्र तिला तशी संधी देण्यात यावी  आणि फक्त तिच्या एका अजाणतेपणी झालेल्या चुकीमुळे कायमची मनात द्वेष बाळगता कामा नये. (हदीस : तिर्मिजी)

भांडवलशाही साम्राज्याने उपभोक्तावाद (कन्झुमरिझम) आणि भोग-विलासाची जी मानसिकता तयार केली, तिचा सर्वात अधिक परिणामसुद्धा स्त्रियांवरच होतो.
जाहिराती सर्वात जास्त स्त्रिया (आणि मुले) यांनाच उद्देशून तयार केल्या जातात. जीवनस्तराची स्पर्धा मानसशास्त्रीय स्वरूपात स्त्रियांमध्येच जास्त असते. जेव्हा जाहिरातींद्वारा कृत्रिम स्वरूपात जीवनस्तराला उंचावण्याची विचारसरणी निर्माण केली जाते आणि उपभोक्तावादाचे दडपण सातत्याने निर्माण केले जाते, तेव्हा त्यांचा नुकसानकारक प्रभाव सर्वात जास्त स्त्रिया ग्रहण करतात.
उपभोक्तावाद आणि उधळपट्टीची प्रवृत्ती वाढून मानसिक रोगाच्या स्वरूपात ग्रहण होते. मानसिक रोगाच्या विशेषज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे, हळूहळू मनुष्यास खरेदी आणि खर्च करण्याचे व्यसन तसेच लागते जसे नशेचे व्यसन. मुंबईचे एक मानसशास्त्रज्ञ डॉ. असीत सेठ यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराच्या रोग्याचा मेंदू वस्तूंची खरेदी केल्यामुळे एक प्रकारचा रासायनिक पदार्थ उत्सजित करतो. त्या पदार्थाचे नाव एन्डोर्फिन्स आहे. या पदार्थामुळे माणसाला हळूहळू खरेदी करण्याचे व्यसन लागते. आवश्यक असो वा नसो शॉपिंग मॉलमध्ये जाऊन बेहिशोब खरेदी केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. पैसे नसतील तर तो कर्ज घेऊन खरेदीसाठी जात असतो आणि अगदी दारूड्यांप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत तो आपले व्यसन पूर्ण करतो. म्हणून जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation W.H.O.) आणि डॉक्टर या रोगाला पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर (Pathological Disorder) असे नाव देतात. या रोगाला स्त्रिया अधिक बळी पडतात.
    मागील काही वर्षापासून आपल्या देशात खुशाल आणि शिकल्यासवरलेल्या स्त्रियांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती वाढली आहे. विशेषज्ञ या प्रवृत्तीलासुद्धा उपभोक्तावाद आणि उच्च जीवनस्तराचे दडपण आणि त्याशी संबंधित तणाव यांच्याशी कारणीभूत असल्याचे सांगतात. उपभोक्तावाद व भोग-विलासपूणर्ण चंगळवादी जीवनशैली यामुळे मोटार गाड्या, फ्लॅट्स आणि ब्रँडेड कपडे आणि पादत्राणे यांच्या प्रतिस्पर्धेचे असे व्यसन लागले आहे की या स्पर्धेत उतरून सुख-चैन हरवून बसले आहेत.
    सहा महिन्यांचे गरोदर, 24 वर्षाची सुजाता फास लावून आत्महत्या करते. त्याचे कारण हा विचार होता की तिचा पती एम.एन.सी. (M.N.C.) मध्ये मॅनेजर असून त्याची आर्थिक स्थिती इतकी सुधारली नव्हती की तिचे होणारे बाळ चांगले आयुष्य जगू शकले नसते. 25 वर्षाच्या संगतीच्या आत्महत्येचे कारण हे होते की तिच्या सर्व मैत्रिणींमध्ये तीच अशी एकटी होती की तिच्याजवळ स्वतःचा फ्लॅट नव्हता.
    आकडेवारीवरून समजते की संपूर्ण जगामध्ये शिकल्यासवरलेल्या तरूण स्त्रियांच्या आत्महत्येची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जेव्हा एक स्त्री आत्महत्या करते तेव्हा 20 स्त्रिया आत्महत्येचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनाचे (World Health Organisation W.H.O.) चे म्हणणे आहे की पुढील दशकात डिप्रेशन (नैराश्य) स्त्रियांचा सर्वात मोठा मारेकरी असेल. इ.सन 2001 च्या रिपोर्टनुसार जगभराच्या शहरी तरूण स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य रोग यु.डी.डी. (युनिपोलार डिप्रेशन डिसऑर्डर) अर्थात निरंतर थकवा आणि घाबरटपणाची स्थिती असेल. मानसशास्त्रज्ञ या रोगाचे मोठे कारण लोभ, भोगविलास आणि उपभोक्तावाद सांगतात. या रोगाने जगामध्ये 1.86 टक्के स्त्रिया प्रभावित होऊन लाचार होतात.
    ही संख्या हार्ट अ‍ॅटॅक आणि कॅन्सरपेक्षा अधिक आहे. मुंबईच्या डॉक्टरचे म्हणणे आहे की सुखसंपन्न घरातील स्त्रिया आणि नोकरी करणार्‍या महिला दिवस पूर्ण करण्यासाठी ’अल्पराजोलाम’ सारख्या तणाव प्रतिबंधक गोळ्या (अ‍ॅन्टी अ‍ॅन्झायटी ड्रग्ज) वर अवलंबून असतात. या स्त्रिया गोळ्या पाण्याप्रमाणे घेतात. 30 वर्षाची सुजाता द्विेवदी एका वेळी 30-30 गोळ्या खात असते. एके दिवशी निद्रानाशाला कंटाळून तिने 200 गोळ्या खाल्ल्या आणि हॉस्पिटलमध्ये ती जागा झाली.
    या उपभोक्तावाद आणि जीवनस्तराच्या (स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग) स्पर्धेमुळे हुंड्यासारख्या शापाचा जन्म झाला. आता नववधूला जाळण्याचे अमानवी कर्म परंपराप्रिय अशिक्षित घराण्यापर्यंतच मर्यादित राहिलेले नाही, तर इंग्रजी बोलणार्‍या सुशिक्षित आणि सुखवस्तू घराण्यातल्या पत्नी जाळल्या जात आहेत. आय.ए.एस. अधिकार्‍याची आय.ए.एस. पत्नीसुद्धा हुंड्यासाठी छळाला बळी पडते. दिल्ली महिला आयोगानुसार त्यांच्याकडे येणार्‍या तक्रारींमध्ये 10 टक्क्यांचा संबंध समाजाच्या अत्यंत सुखसंपन्न आणि सभ्य वर्गाशी असतो.
    या उपभोक्तावादाने (चंगळवादाने) निर्माण केलेल्या अमर्याद चैनीच्या जबर इच्छेमुळे मनुष्य वस्तू आणि रूपया - पैशाच्या मागे वेडा होतो. हे कधी भ्रष्टाचाराच्या रूपात प्रकट होते तर कधी हुंड्यासारख्या हिंसक मागण्यांच्या स्वरूपात प्रकट होऊन, सर्व काही असतांनासुद्धा आणखी अधिक भुकेमुळे सुनांना जाळून टाकले जाते.

अबू उसैद (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे बसलो होतो. बनू सलमाचा एक मनुष्य पैगंबरांपाशी आला, आणि म्हटले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणता हक्क बाकी राहतो जो मी पूर्ण करावा?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘होय! त्यांच्यासाठी अल्लाहपाशी दुआ करा आणि त्यांच्या मुक्तीसाठी  प्रार्थना  करा. आणि जे (वैध) मृत्यूपत्र करून गेले आहेत त्यास पूर्ण करा आणि आईवडिलांशी ज्या लोकांचा नातेसंबंध आहे त्यांच्यावर प्रेम करा आणि यथाशक्ती त्यांना मदत करा आणि आईवडिलांच्या मित्र-मैत्रिणींचा आदर-सन्मान व पाहुणचार करा.’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबूत्तुफैल यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना जिइर्राना या ठिकाणी मांस वितरीत करताना पाहिले. तेवढ्यात एक महिला आली आणि पैगंबरांच्या जवळ गेली  तेव्हा त्यांनी आपली चादर अंथरली, त्यावर ती महिला बसली. मी विचारले, ‘‘ही कोण आहे?’’ लोकांनी मला सांगितले, ‘‘ही पैगंबरांची आई आहे ज्यांनी त्यांना दूध पाजले आहे.’’ (हदीस  : अबू दाऊद)

माननीय अबू बकर (रजि.) यांची कन्या माननीय असमा (रजि.) यांच्या कथनानुसार, कुरैश आणि मुस्लिमांदरम्यान (हुदैबियाचा तह) तह झाला होता त्या काळात माझी आई (माता  रजाई) माझ्याजवळ आली आणि तिने अजून इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता म्हणजेच अनेकेश्वरवादी होती. मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई माझ्याजवळ  आली आहे आणि मी तिला काहीतरी द्यावे असे तिला वाते. तर मग मी तिला काही देऊ शकते काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अवश्य. तुम्ही तिच्याशी दयाद्रतेने वागा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) याच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नातेवाईकांशी प्रतिनातेसंबंध प्रस्थापित करणारा मनुष्य पूर्ण दर्जाचा शिष्टाचारी नाही. दुसऱ्या  नातेवाईकाने एखाद्या मनुष्याशी संबंधविच्छेद केला तेव्हा तो त्या नातेवाईकाशी आपला संबंध प्रस्थापित करतो आणि त्यांचा आदर-सन्मान करतो, तोच मनुष्य पूर्ण दर्जाचा शिष्टाचारी
होय. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
नातेवाईकांच्या आदरातिथ्याच्या बदल्यात आदरातिथ्य करणे हा कमाल दर्जाचा शिष्टाचार नव्हे. नातेवाईकांनी एखाद्या मनुष्याशी संबंधविच्छेद करतात आणि तो मनुष्य त्यांच्याशी  संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. ते याचे कसलेही हक्काधिकार देऊ इच्छित नसले तरी हा त्यांचे सर्व हक्काधिकार प्रदान करण्यास तयार असतो, हाच मनुष्य खरा शिष्टाचारी  आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी कमाल दर्जाच्या संयमाशिवाय शक्य नाही. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाला, ‘‘हे  अल्लाहचे पैगंबर! माझे काही नातेवाईक आहेत त्यांचे हक्काधिकार मी अदा करीत आहे आणि ते माझ्या हक्काधिकार अदा करीत नाहीत. मी त्यांच्याशी शिष्टाचाराने वागतो आणि ते  माझ्याशी वाईट वर्तणूक करतात. मी त्यांच्याशी सहिष्णुता व सहनशीलतेने वागतो आणि ते माझ्याशी असभ्यतेने वागतात.’’पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर तू असाच आहे जसा तू   म्हणत आहेस तर तू त्यांच्या चेहऱ्यावर शाई लावत आहेस आणि जोपर्यंत तू या स्थितीत असशील अल्लाह त्यांच्या तुलनेत नेहमी तुझा साहाय्यक राहील.’’ (हदीस : मुस्लिम)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget