Latest Post

इस्लामच्या सामाजिक व्यवस्थेची आधारशीला "जगाचे सर्व लोक हे एका मातापित्याची संतान आहेत' हे तत्व आहे. अल्लाहने सर्वप्रथम एक मानवी जोडपे जन्मास घातले, या जोडप्यापासून ते सर्व लोक जन्मास आले जे जगामध्ये वसलेले आहेत. सुरवातीस काही काळापर्यंत या जोडप्याच्या संततीचा एकच समाज होता, त्यांचा धर्म एक होता, त्यांची भाषा एक होती, त्यांच्यामध्ये कसलाही मतभेद नव्‌हता, परंतु जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, ते जमिनीवर पसरत गेले आणि या फैलावामुळे स्वाभाविकरीत्या निरनिराळे वंश, राष्ट्रे व जातीजमातीमध्ये त्यांची विभागणी झाली. त्यांच्या भाषा वेगळ्या झाल्या, त्यांचे पोशाख वेगळे झाले, त्यांची राहणी - सरणी वेगळी झाली आणि ठिकठिकाणच्या हवामानामुळे त्यांचे रंगरूप व आकार बदलले गेले. ही सर्व विविधता स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि म्हणून इस्लाम तिचा एक सत्य म्हणून स्वीकार करतो. तो तिला मिटवू इच्छित नाही याउलट तो तिची उपयुक्तता मान्य करतो. एक दुसऱ्याशी परिचय व सहकार्य यामुळेच शक्य आहे. परंतु या विविधतेच्या आधारावर रंग, भाषा, राष्ट्रीयत्व व नागरिकत्व वगैरे जे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत त्या सर्वांना इस्लाम चुकीचे ठरवितो. माणसामाणसामध्ये उच्चनीचता, पुनीत व पतीत, स्वकीय व परकीय वगैरे जे भेदभाव जन्माच्या आधारावर केले गेले आहेत ते सर्व इस्लामच्या दृष्टीने अज्ञानमूलक आहेत. इस्लाम जगातील साऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात, एक दुसऱ्याचे भाऊभाऊ आहात आणि माणसाच्या नात्याने समान आहात.
मानवतेबद्दलच्या या एकत्व विचाराचा स्वीकार केल्यानंतर इस्लाम सांगतो की माणसामाणसामध्ये खरा फरक जर कोणता होऊ शकतो तर तो वर्ण, वंश, राष्ट­, भाषेचा नव्हे तर विचार, आचार व तत्वांचा होऊ शकतो. एका आईची दोन मुले घराण्याच्या दृष्टीने एकच असली तरी त्यांचे आचार व विचार एकदुसऱ्याहून भिन्न असतील तर त्यांचे जीवनाचे मार्गही वेगवेगळे होतील. याउलट एक पूर्वेला व एक पश्चिमेला अशा दूरच्या अंतरावर राहणारी दोन माणसे जाहिरपणे एक दुसऱ्यापासून कितीही दूर असली तरी त्यांचे विचार एक व आचार मिळतेजुळते असतील तर त्यांच्या जीवनाचा मार्ग एक असेल. या दृष्टिकोनाच्या आधारावर इस्लाम जगातील सर्व वंश, जन्मभूमी आणि राष्ट्राच्या आधारावरील समाजाच्या ऐवजी एक वैचारिक, कृतीशील, तात्विक समाजाची उभारणी करतो, ज्यामध्ये माणूस माणसाला आपल्या जन्माच्या आधारावर भेटत नाही तर तो एक लक्ष्य व एक वैचारिक पद्धतीमुळे एक दुसऱ्यात मिसळतो. ती प्रत्येक व्यक्ती जी अल्लाहला आपला स्वामी व उपास्य मानते आणि पैगंबरांनी आणलेल्या शिकवणीला आपल्या जीवनाची नियमावली म्हणून मान्य करते ती या समाजामध्ये सामील होऊ शकते मग ती आफ्रिकेची राहणारी असो वा अमेरिकेची, सामी वंशाची असो वा आर्य वंशाची, मग ती काळी असो वा गोरी, मग ती हिंदी बोलणारी असो वा अरबी. जे लोक या समाजामध्ये सामील होतील त्या सर्वांचे हक्क व सामाजिक दर्जा समान असेल त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वांशिक, राष्ट्रीय वा वर्गय भेदभाव असणार नाहीत, कोणी उच्च-नीच असणार नाही, कसलीही अस्पृश्यता त्यांच्यामध्ये नसेल, एखाद्याचा हात लागला की कोणी अशुद्ध होणार नाही.
रोटीबेटी व्यवहार व परस्पर भेटीगाठीमध्ये त्यांच्या दरम्यान कसलीही अडचण राहणार नाही. व्यवसाय व जन्माच्या आधारावर कोणाला शूद्र व नीच समजले जाणार नाही. जातपात, कुलीनता व घराण्याच्या आधारावर कोणास खास हक्क प्राप्त होणार नाहीत. माणसाची श्रेष्ठता ही त्याच्या घराण्यावर वा त्याच्या संपत्तीवर अवलंबून असणार नाही तर ती फक्त त्याचे आचरण किती चांगले आहे व तो ईशभीरूतेत इतराहून किती पुढे आहे यावर अवलंबून राहील.
हा असा समाज आहे जो वंश, वर्ण आणि भाषा यांच्या तटबंदीला व भौगोलिक मर्यादांना तोडून पृथ्वीच्या पाठीवरील सर्व विभागांमध्ये अस्तित्वात येऊ शकतो आणि याच्या आधारावर लोकांमध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित होऊ शकते. वांशिक आणि राष्ट्रीय समाजामध्ये तर निव्वळ ते लोक सामील होऊ शकतात जे त्या वंशात अगर राष्ट्रात जन्मलेले आहेत. त्या बाहेरील लोकांना या समाजाची दारे बंद असतात. परंतु इस्लामच्या या वैचारिक व सैद्धान्तिक समाजामध्ये ती प्रत्येक व्यक्ती समान हक्कासह सामील होऊ शकते, जी एका निष्ठेचा व नैतिक व्यवस्थेचा स्वीकार करते. राहिले ते लोक जे या निष्ठेला आणि व्यवस्थेला मानत नाहीत, अशा लोकांना हा समाज आपल्यामध्ये सामील करून घेत नाही. परंतु मानवी बंधुभावाचा संबंध त्यांच्याबरोबर प्रस्थापित करण्यास आणि त्यांना मानवतेचे हक्क देण्यास तयार असतो. स्पष्ट आहे की, एका मातेच्या दोन मुलांचे विचार जर वेगवेगळे असतील तर साहजिकच त्यांचे जीवनमार्ग वेगवेगळे होतील. परंतु याचा हा अर्थ नव्हे की ते एक दुसऱ्याचे भाऊ राहिले नाहीत. अगदी याचप्रमाणे मानवी वंशाचे दोन गट निष्ठा व विचारामध्ये विरोध बाळगत असतील तर त्यांचे समाज खात्रीने वेगवेगळे असतील. परंतु मानवतेच्या नात्याने ते समानच असतील. या समान मानवतेच्या आधारावर अधिकाधिक हक्काची जी कल्पना केली जाऊ शकते ते सर्व हक्क इस्लामी समाजाने गैर इस्लामी समाजासाठी मान्य केलेले आहेत.
इस्लामी सामाजिक व्यवस्थेच्या आधारमूल्यांना समजावून घेतल्यानंतर आता आपण हे पाहू की ती कोणती तत्वे व त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या इस्लामने माणसाच्या परस्पर संबंधाच्या निरनिराळ्या पद्धतीसाठी निश्चित केल्या आहेत.
कुटुंब ही मानवी समाजाची सर्वप्रथम पायाभूत संस्था आहे. एक पुरुष व एक स्त्री यांच्या संयोगाने कुटुंब अस्तित्वात येते या संयोगामुळे एक नवा वंश अस्तित्वात येतो. त्याच्यापासून आप्त संबंध, घराणी, बंधुभाव वगैरे दुसरे संबंध प्रस्थापित होतात आणि सरतेशेवटी ही गोष्ट पसरत पसरत एका समाजापर्यंत पोहोचते. कुटुंब हीच ती संस्था आहे ज्यामध्ये एक पिढी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला मानवी संस्कृतीची व्यापक जबाबदारी सांभाळण्यासाठी अत्यंत प्रेमाने, त्यागाने, कळकळीने व सद्‌भावनेने तयार करीत असते. ही संस्था मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निव्वळ बाजारबुणग्यांचीच भरती करत नाही तर तिचे कार्यकर्ते मनापासून या गोष्टीची इच्छा बाळगून असतात की त्यांची जागा घेणारे लोक त्यांच्यापेक्षा अधिक चांगले असावेत. या आधारावर ही एक वस्तुस्थिती आहे की कुटुंबच मानवी संस्कृतीचे मूळ आहे. या मूळाच्या स्वास्थ्य व शक्तीवरच संस्कृतीचे स्वास्थ्य व शक्ती अवलंबून आहे. इस्लाम सामाजिक प्रश्नात सर्वप्रथम  या प्रश्नाकडे लक्ष देतो की कुटुंबसंस्थेला अत्यंत योग्य व अत्यंत दृढ अशा पायावर प्रस्थापित केले जावे.
इस्लामजवळ स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे स्वरूप फक्त हे आहे की या संबंधाबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्यांचासुद्धा स्वीकार केला जावा आणि ज्याच्या परिणामस्वरूप एका कुटुंबाची स्थापना व्हावी. स्वैर आणि बेजबाबदारीच्या संबंधांना तो निव्वळ एक निरागस मौज किंवा एक साधारणशी गैतवर्तणुक समजून त्याची उपेक्षा करीत नाही तर त्याच्या दृष्टीने ही गोष्ट मानवी संस्कृतीचे मूळ कापणारी आहे आणि म्हणून अशा संबंधाला तो हराम व कायदेशीर गुन्हा ठरवितो, त्याला कठोर शिक्षेची तरतूद करतो. हेतू हा की समाजामध्ये असे बेजबाबदारीच्या संबंधाना प्रवृत्त करणाऱ्या अथवा त्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या कारणांचे उच्चाटन करून समाजजीवन शुद्ध करावे. पडद्याचे आदेश, स्त्री-पुरुषांच्या मुक्त संबंधांना मनाई आणि संगीत व बीभस्त चित्रावर प्रतिबंध, अश्लीलतेच्या प्रसाराला बंदी हे सर्व उपाय ती गोष्ट थांबविण्यासाठीच आहे आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट कुटुंब संस्थेला सुरक्षित व मजबूत करणे हे आहे. दुसरीकडे जबाबदारीचा संबंध म्हणजे विवाहाला इस्लाम केवळ एक उचितच नव्हे तर त्याला एक सदाचार, एक सत्कृत्य व एक इबादत (उपासना) ठरवितो. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी अविवाहित राहणे ही गोष्ट त्याला अप्रिय आहे. तो प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन देतो की संस्कृतीच्या ज्या जबाबदारीचा भाग त्याच्या मातापित्यांनी वाहिला होता तो भाग त्यानेही आपला क्रम येताच वाहावा. इस्लाम वैराग्याला सदाचार समजत नाही. याउलट तो त्याला ईशप्रवृत्तीविरुद्ध एक अनिष्ट रूढी ठरवितो. तो त्या सर्व रीतीरिवाजांनासुद्धा नापसंत करतो ज्यामुळे विवाह ही एक मोठी व कठीण समस्या बनते. समाजामध्ये विवाह ही एक अत्यंत सोपी गोष्ट व्हावी हा त्याचा हेतू आहे. विवाह करणे अवघड व्हावे व व्यभिचार सोपा असावा हा त्याचा हेतू नाही आणि यासाठी त्याने काही आप्तसंबंधांना हराम ठरविल्यानंतर सर्व दूरच्या व जवळच्या नातलगांमध्ये विवाह संबंधांना उचित ठरविले आहे. जातपाताच्या भेदभावांना मिटवून सर्व मुस्लिमांमध्ये आपसात विवाहाला मुक्त परवानगी दिली आहे. "मेहर' व "जहेज' इतका थोडा असण्याबद्दल आदेश आहेत की संबंधित व्यक्तीना ते देणे सोपे जावे आणि विवाहसंपन्न करण्यासाठी एखाद्या काजी, पंडित व पुरोहित किंवा नोंदवहीची काही आवश्यकता नाही. पण प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने विवाहसंबंधांची नोंद ठेवणे उचित आहे. इस्लामी समाजातील विवाह ही एक अशी साधी प्रथा आहे जी दोन साक्षीदारांसमोर वयात आलेल्या वधुवरांच्या "संमती व स्वीकृती' ने अंमलात येते पण हे मात्र आवश्यक आहे की ही "संमती स्वीकृती' गुप्त नसावी तर मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये व समाजामध्ये त्या बद्दल घोषणा व्हावी.
कुटुंबामध्ये इस्लामने पुरुषाला त्याने आपल्या घरात शिस्त राखावी म्हणून व्यवस्थापकाचे स्थान दिले आहे. पत्नीला पतीचे आणि मुलांना आईवडिलांचे आज्ञापालन व सेवेचा हुकूम देण्यात आलेला आहे. इस्लाम अशा ढिल्या कुटुंबव्यवस्थेस मान्य करत नाही, ज्यामध्ये शिस्त नसते आणि घरातील लोकांचे आचार व व्यवहाराचे योग्य नियंत्रणाला कोणी जबाबदार नसतो. शिस्त ही तर एका जबाबदार व्यवस्थापकामुळेच प्रस्थापित होऊ शकते आणि इस्लामच्या दृष्टीने या जबाबदारीसाठी कुटुंबाचा प्रमुख स्वाभाविकत: पुरुषच होऊ शकतो. परंतु याचा अर्थ हा नव्हे की पुरुषाला घराचा एक जुलमी व रागीट शासक बनविला गेला आहे. आणि स्त्रीला एक असाहाय्य दासी बनवून त्याच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. इस्लामजवळ वैवाहिक जीवनाचा खरा अर्थ दया व माया हा आहे. पतीचे आज्ञापालन हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि पतीचेही हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या सुधारणेसाठी करावा. इस्लाम वैवाहिक संबंधाना तोपर्यंत चालू ठेवू इच्छितो जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा किंवा कमीतकमी स्नेहाची भावना शक्य असते. ही शक्यता नाहीशी झाल्यास इस्लाम पुरूषाला "तलाक' व स्त्रीला "खुलाअ' ची परवानगी देतो आणि काही बाबतीत इस्लामी न्याय संस्थेला हे अधिकार देतो की त्याने अशा विवाहांना रद्द करावे जे सुखाऐवजी दु:खास कारणीभूत होतात.
कुटुंबाच्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर-जवळची सरहद्द नातलगांची आहे. याचे क्षेत्र फार व्यापक असते. जे लोक आई-बाप अगर भाऊ-बहीण यांच्या संबंधामुळे वा सासरकडील संबंधामुळे एक दुसऱ्याचे नातलग असतात, त्या सर्वांना इस्लाम एक दुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व एक दुसऱ्याबद्दल सहानुभूती व प्रेम बाळगणारे पाहू इच्छितो. पवित्र कुरआनमध्ये जागोजागी ""जिल्‌कुर्बा'' म्हणजे नातलगांच्या बरोबर चांगली वागणूनक ठेवा अशी आज्ञा दिली गेली आहे. हदीसमध्ये आप्तजनाबरोबर प्रेम व त्यांचे साहाय्य करण्याबद्दल वरचेवर ताकीद दिली गेली आहे आणि त्याला मोठे सत्कृत्य म्हणून संबोधिले गेले आहे. ती व्यक्ती इस्लामच्या दृष्टीने अत्यंत नावडती आहे जी नातेवाईकाकडे कानाडोळा व दुर्लक्ष करते. त्याचप्रमाणे नातेवाईकाबद्दल पक्षपाताला इस्लाममध्ये स्थान नाही. आपल्या कुटुंबाचे व घराण्याचे अन्यायी समर्थन इस्लामच्या दृष्टीने रानटीपणा आहे. त्याचप्रमाणे शासनाचा एखादा अधिकारी सरकारी खर्चाने नातलगांना पोसू लागला किंवा न्याय निर्णयामध्ये आपल्या जवळच्या लोकांबद्दल पक्षपात करू लागला तर ते काही इस्लामी कार्य नव्हे- ते सैतानी कार्य आहे. इस्लाम ज्या आप्तजनांबद्दल प्रेम व साहाय्याची आज्ञा करतो ते स्वहस्ते व स्वत:कडून झाले पाहिजे आणि ते सत्य व न्यायाच्या मर्यादेत झाले पाहिजे.
नातलगांबरोबरच्या संबंधानंतर दुसरा जवळचा संबंध शेजाऱ्याशी येतो. पवित्र कुरआनच्या दृष्टीने शेजाऱ्यांचे तीन प्रकार आहेत. एक नातलग शेजारी, दुसरा परका शेजारी, तिसरा तो तात्पुरता शेजारी ज्याच्याबरोबर बसण्याचा व जगण्याचा योग आला असेल. हे सर्व शेजारी इस्लामी आदेशानुसार स्नेह, सहानुभूती सद्‌वर्तनास पात्र आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे.
""मला शेजाऱ्यांच्या हक्काबद्दल इतकी ताकीद केली गेली की मला वाटू लागले की त्यांना कदाचित वारसा हक्कसुद्धा दिले जाईल.''
दुसऱ्या एका ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले,
""तो माणूस मोमिन नाही ज्याच्या कटकटीपासून त्याचा शेजारी सुरक्षित नाही.''
एका दुसऱ्या हदीसमध्ये आले आहे,
""तो माणूस ईमान बाळगत नाही जो स्वत: पोटभर जेवतो पण त्याचा निकटचा शेजारी उपाशी असतो.''
एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
""एक स्त्री पुष्कळ नमाज पढते, नेहमी रोजे करते आणि पुष्कळसा दानधर्मही करते परंतु तिच्या फटकळपणाने तिचे शेजारी त्रस्त झालेले आहेत.'' ""ती स्त्री दोजखी आहे, ती नरकात जाईल.''
लोकांनी सांगितले, ""दुसरी एक स्त्री आहे. तिच्यामध्ये पहिल्या स्त्रीचे हे सर्व गुण नाहीत (मात्र ती अनिवार्य उपासना करते) परंतु ती कधी शेजाऱ्यांना त्रास देत नाही.''
त्यावर पैगंबरांनी सांगितले,
""ही स्त्री जन्नती आहे, ती स्वर्गात जाईल.''
पैगंबरांनी लोकांना इथपावेतो ताकीद दिली होती की,""आपल्या मुलांच्यासाठी फळफळावळ आणाल तर शेजाऱ्यासाठीही आणा. नसता फळांच्या साली बाहेर फेकू नका. तुमचे गरीब शेजारी दु:खी होता कामा नये.''
एके प्रसंगी पैगंबरांनी सांगितले,
"तुझे शेजारी तुला चांगला म्हणत असतील तरच तू खरोखर चांगला आहेस आणि त्यांचे मत तुझ्या बाबतीत वाईट असेल तर तू वाईट आहेस.''
थोडक्यात हे की इस्लाम, त्या सर्व लोकांना जे एकदुसऱ्याचे शेजारी आहेत, आपसात एकदुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व सुख-दु:खाचे वाटेकरी बघू इच्छितो, त्या सर्वामध्ये अशाप्रकारचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो की विश्वास ठेवावा आणि एकदुसऱ्याजवळ आपले प्राण, आपली धनदौलत व आपले शील सुरक्षित समजावे आणि ते समाज जीवन ज्यामध्ये फक्त एका भिंतीच्या आड वर्षानुवर्ष राहणारी दोन माणसे एकमेकाशी अपरिचित असतात त्याचप्रमाणे एका मोहल्ल्यात व पेठेत राहणाऱ्या लोकांमध्ये स्नेह, जिव्हाळा, सहानुभूती व विश्वास नसतो, असे समाज जीवन कदापिही इस्लामी समाज जीवन होऊच शकत नाही.
या जवळच्या संबंधानंतर संबंधाचे ते व्यापक क्षेत्र आहे जे साऱ्या समाजापर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रामध्ये इस्लाम आमच्या सामूहिक जीवनाला ज्या मोठमोठ्या तत्वांवर प्रस्थापित करतो ती थोडक्यात अशी,
1) सदाचाराच्या व संयमनाच्या कार्यामध्ये एकमेकांशी सहकार्य करा आणि दुराचाराच्या व अत्याचाराच्या कामामध्ये कोणास साथ देऊ नका.     (दिव्य कुरआन, 5:2)
2) तुमची मैत्री व तुमचे शत्रुत्व अल्लाहसाठी असले पाहिजे. जे काही द्याल ते अशासाठी द्या की ते देणे अल्लाहला पसंत आहे आणि जे काही रोखाल ते अशासाठी रोखा की ते देणे अल्लाहला पसंत नाही.             (हदीस)
3) तुम्ही तो उत्कृष्ट जनसमूदाय आहात ज्याला लोकांच्या भलाईसाठी निर्माण केले आहे. तुमचे कर्तव्य सदाचाराची आज्ञा देणे व दुराचारापासून रोखणे हे आहे.                   (दिव्य कुरआन, 3:110)
4) आपसात गैरसमज करून घेऊ नका. एकदुसऱ्याच्या व्यवहारांचा छडा लावण्याचा प्रयत्न करू नका. एकाविरुद्ध दुसऱ्याला भडकवू नका. हेव्यादाव्यापासून अलिप्त राहा. एकदुसऱ्याला खजिल करून नका. अल्लाहचे दास आणि आपसात भाऊ बनून राहा.                     (हदीस)
5) एखादा अत्याचारी आहे हे माहीत असता त्याचे साहाय्य करू नका.     (हदीस)
6) अन्यायाच्या कामी आपल्या समूहाचे समर्थन करणे म्हणजे विहिरीत पडत असलेल्या उंटाच्या शेपटीला धरून स्वत:ही विहिरीत पडणे होय.            (हदीस)
7) दुसऱ्यासाठी तेच पसंत करा जे तुम्ही स्वत:साठी पसंत कराल     (हदीस)

- स्वामी लक्ष्मी शंकाराचार्य

भाषांतर
- सय्यद ज़ाकिर अली

खरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?
सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन  अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३ वर्षांपर्यंत त्यांनी जे काही केले, ते अगदी कुरआननुसारच केले.  दुसऱ्या शब्दांत  सांगायचे झाल्यास मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन कुरआनचेच अर्थात इस्लामचेच प्रात्यक्षिक अगर व्यावहारिक रूप आहे. म्हणून  कुरआन व इस्लामला जाणून घेण्याचा सर्वांत महत्त्वपूर्ण व सोपा मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे  आहे, मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र  आणि कुरआन वाचून आपण स्वत: निर्णय घेऊ शकता की ‘इस्लाम एक आतंक आहे की आदर्श!’

आयएमपीटी अ.क्र. 192      -पृष्ठे - 84    मूल्य - 35                आवृत्ती - 4 (March 2015)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/c1md1yvj4u0kbyrescezeujdt8c661ct

पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे, म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या  कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात  यशस्वी व्हा ! महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती !

स्तंभ म्हणजे काय? स्तंभ या शब्दाच्या 15 व्याख्या आहेत. प्रामुख्याने स्तंभ म्हणजे आधार देणारी वस्तू. स्तंभ म्हटले की डोळ्यासमोर येतो तो आपल्या लाडक्या तिरंग्यातील अशोक  स्तंभ, दिल्लीतील कुतूब मिनार, भीमा कोरेगावचा विजय स्तंभ, पण स्त्री समाजाचा स्तंभ कशी होऊ शकते? स्त्री आणि स्तंभामध्ये अशा कोणत्या समान गोष्टी आहेत ज्यामुळे तिला  स्तंभ म्हटले जाते? स्तंभ हा मजबूत असतो, तशी स्त्री सुद्धा मजबूत असते. म्हणायला स्त्रीला अबला नारी म्हणून कमकुवत समजण्यात येते. मात्र दिसतं तस नसतं. स्त्री दिसायला  जरी कमकुवत दिसली तरी तिच्या व्यक्तीमत्वात अनेक शक्ती लपलेल्या असतात. उदा. आपल्या मर्जीविरूद्ध केवळ आई-वडिलांच्या समाधानासाठी ते सांगतील त्या व्यक्तीबरोबर लग्न  करण्याचीच नव्हे तर ते निभाऊन दाखविण्याची शक्ती, आपल्या मनाविरूद्ध जावून पतील खुश ठेवण्याची शक्ती, आजकालच्या जिद्दी मुलांना सांभाळण्याची शक्ती, घरचे सगळे काम  करून परत ऑफिसचे काम करण्याची शक्ती, ऑफिसमधील आपले सहकारी आणि अधिकारी यांना तोंड देण्याची शक्ती, सासरच्या मंडळींचे मन जिंकण्याची शक्ती, अनाहुतपणे न  सांगता घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची शक्ती, शेजाऱ्याची काळजी घेण्याची शक्ती, मैत्रिणींसाठी वेळ काढण्याची शक्ती, विविध पाककला आत्मसात करून प्रत्यक्षात त्या  तयार करून घरच्या मंडळींना खाऊ घालण्याची शक्ती, काटकसरीने शॉपिंग करण्याची शक्ती, मुले नालायक निघाली तर आई-वडिलांचा सांभाळ करण्याची शक्ती, न कमाविणाऱ्या किंवा  दारूड्या पतीसोबत संसार करण्याची शक्ती, माणसे जोडण्याची शक्ती. एवढे सर्व करत असताना स्वत:कडे दुर्लक्ष करण्याची शक्ती. ह्या एक ना अनेक शक्तींचा समुचय म्हणजे स्त्री. जी की एका कुटुंबामध्ये एका स्तंभासारखी उभी असते.

स्तंभ आणि स्त्री मधले दूसरे साम्य
म्हणजे स्तंभ, ज्या प्रमाणे अनेक धातूंचा समुच्चय करून बांधण्यात येतो तसेच परमेश्वरांनी स्त्री नावाच्या या स्तंभाला अनेक धातू उदा. माया, करूणा, क्षमा, सहनशिलता यांच्या समुच्चयाने तयार केलेले आहे. स्तंभ आणि स्त्रीमध्ये तिसरे साम्य म्हणजे स्तंभ हे विजयाचे चिन्ह मानले जाते. स्त्री सुद्धा सगळ्या अडचणींवर मात करून स्वत:च नव्हे तर कुटुंबाला  सुद्धा विजयापर्यंत नेते. म्हणून स्त्री ही कुटुंबाचाच नव्हे तर देशाचा स्तंभ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
स्तंभाचे खूप प्रकार असतात. उदा. श्रद्धा स्तंभ. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नी ज्यांना उमहातूल मोमिनात (मुस्लिम समाजाची माता) म्हटले जाते आणि त्यांच्या सोबत काम  करणाऱ्या महिला ज्यांना सहाबियात म्हटले जाते, ते आणि त्यांची जीवन शैली हे आमचे श्रद्धास्तंभ होत. शिक्षणाचे स्तंभ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख यांचा आदर्श  आपल्या सर्वासमोर आहेत. करूणा स्तंभ म्हणून मदर तेरेसांचे उदाहरण ठळकपणे समोर येते. शौर्यस्तंभ म्हणून राणी लक्ष्मीबाई, नगरवाली राणी चाँदबीबी, रजिया सुलताना, चित्तोडची  पद्मावती यांना कसे बरे विसरता येईल. आंतरिक्षातील स्तंभ म्हणून कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स् यांचे उदाहरण जगासमोर आहे. धैर्याचे स्तंभ म्हणून श्रीमती इंदिरा गांधी  आणि किरण बेदी यांच्याकडे पाहता येईल. क्रिडा क्षेत्रातील स्तंभ म्हणून मेरी कॉम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी.सिंधू यांना दृष्टीआड करता येत नाही. आज आएएएसमध्ये  अन्ना मलहोत्रा व नेत्रहीन आयएएस प्रांजल पाटील यांच्यासारख्या अनेक महिलांनी देशाच्या प्रशासनामध्ये आपण प्रशासकीय स्तंभ आहोत, हे ही दाखवून दिलेले आहे. बोईंग सारखे  विमान चालवून एक यशस्वी कमर्शियल पायलट सरला ठकराल यांच्याकडे धाडसाचे स्तंभ म्हणून पाहता येईल. ही काही उदाहरणं झाली. विविध क्षेत्रामध्ये स्तंभाप्रमाणे पाय रोवून  आपल्या कार्याने जगाला सांभाळणाऱ्या ह्या स्त्रिया खरोखरच्याच स्तंभ आहेत की काय? असे वाटावे इतपत दृढता त्यांच्यात आहे. विशेष म्हणजे हे स्तंभ समाजाकडून काय मागतात?  दूसरं काही नाही. फक्त प्रेम, विश्वास आणि त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक. आपण असे झाड पाहिले आहे काय की जे 20 ते 25 वर्षे एका जागी उभा राहते व नंतर त्याला दूसरीकडे  लावलं जातं तरीही ते छान वाढते, फुलं आणि फळं देते. नाही ना ! आपला अंदाज चुकीचा आहे. असा एक वृक्ष आहे ज्याचे नाव ’स्त्री वृक्ष’ आहे. परंतु दुर्दैवाने या वृक्षाला आजकाल  ’मनी प्लांट’ची वेल समजले जात आहे, जी की घरात शोभलीही पाहिजे आणि पैसेही देत राहिली पाहिजे. स्त्री ही समाजाचा अर्धा भाग आहे. जर का स्त्री भ्रुणहत्या नाही झाल्या तर   त्यांची संख्या पुरूषांपेक्षा जास्त होईल. अशा या अर्ध्या समाजाच्या गरजा आपल्याला जाणून घेता आल्या पाहिजेत. त्यांची पहिली गरज जन्माचा अधिकार. दूसरी गरज जगण्याचा  अधिकार. तिसरी गरज चांगलं पालन पोषणाचा अधिकार, चौथी गरज शिक्षणाचा अधिकार, पाचवी गरज तिच्या सन्मानाचा आणि अब्रुच्या रक्षणाचा अधिकार, सहावी गरज  हुंडाबळीपासून मुक्तीचा अधिकार. अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अगोदर नवजात मुलींना जीवंत गाडण्याची प्रथा होती. ती प्रेषित सल्ल. यांनी बंद पाडली आणि तिला  जगण्याचा अधिकार दिला. तिच्या चांगल्या पालन पोषणासाठी लोकांना प्रवृत्त केले आणि तिचे हक्क जे अल्लाहने तिला दिले ते अदा करण्याचे फरमान जाहीर केले. आज बहुतकरून  जगभरातील महिला निर्धोकपणे जन्म घेतात, शिक्षण घेतात आणि आपल्या समाजाला आधार देतात.
प्रेषितांच्या काळात एकटी स्त्री अंगभर सोने घेऊन रस्त्यावरून जात असे. तिला कोणाची भीती नसायची. बलात्कारासारखा प्रकार त्या काळात नावाला नव्हता. दारूला हराम करून स्त्रीयांना दारूड्या नवऱ्यापासून कायमची मुक्ती प्रेषित सल्ल. यांनी मिळवून दिली होती. पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे. म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती  तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या कुटुंबातील स्त्री ही आपल्या कुटुंबाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी आपल्या पाठीशी आहे. तरी घाबरू  नका ! तिचा आधार घ्या आणि तिला आधार द्या (आधार कार्ड नव्हे) आणि जीवनात यशस्वी व्हा. महिला दिनानिमित हीच सर्व पुरूष मंडळींना विनंती.

- डॉ. सीमीन शेख, लातूर
8788327935

वजूदे ज़न से है तस्वीर-ए-कायनात मे रंग
इसी के साज से है जिंदगी का सोज-ए-दरूं
पा श्‍चिमात्य पुरूष फार चलाखअसतात, त्यांना ज्यांच्यावर वर्षभर अत्याचार करावयाचे असतात त्यांचा वर्षातून एक दिवस साजरा करतात. 8 मार्च त्याच दिवसांपैकी एक दिवस. हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही पोलीस स्टेशन, काही उड्डाने आणि काही कार्पोरेट कार्यालये संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित केले जातात, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, महिलांच्या कामाचे गोडवे गायले जाते, त्यातही कॉमर्स पाहिले जाते, महिला दिनाचे महात्म्य सांगणार्‍या सुविचारांची कार्ड विकली जातात, कर्तृत्वान महिलांना बक्षीसे दिली जातात आणि महिला दिवस साजरा केल्याचे समाधान मानले जाते.
    या सर्व उत्साही वातावरणात एक कटू सत्य विसरले जाते ते म्हणजे महिला कितीही कष्टाळू का असेनात, बुद्धीमान, धाडसी, संयमी, दयावान, त्यागी का असेनात शेवटी त्यांचे मुल्यांकन त्यांच्या सौंदर्यावरूनच केले जाते. एकीकडे त्यांना देवी म्हणून महिमामंडित केले जाते तर दुसरीकडे त्या जन्मालाच येऊ नये, याचीही दक्षता घेतली जाते. समाज प्रतिगामी असो का आधुनिक, दोन्हीमध्ये महिलांचे शोषण केले जाते. महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा लादला जातो, पुन्हा-पुन्हा आई बनण्याच्या त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून त्यांना वंचित केले जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 8 मार्चला मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने समाजात महिलांचे नक्की स्थान कोणते? आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच कसे शक्य आहे? या संबंधी थोडेसे विवेचन या आठवड्यात केल्यास ते अनाठायी ठरणार नाही, अशी खात्री असल्याने हा लेखन प्रपंच.
    समाजातील महिलांचे स्थान
    समाजात महिलांचे नक्की स्थान ठरविताना इस्लामखेरीज सर्व मानवी सभ्यतांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. प्राचीन ग्रीक सभ्यतेमध्ये महिलेला ’पेंडोरा’ म्हणजेच वाईट गोष्टींची जननी समजले गेले तर रोमन संस्कृतीमध्ये त्यांना पतीची मिळकत समजण्याचा प्रघात होता. विशिष्ट अशा चुका केल्यास पतीला प्रसंगी आपल्या पत्नीची हत्या करण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार होता. सुरूवातीला ख्रिश्‍चन संस्कृतीमध्ये सुद्धा महिलांसंबंधी अतिशय नकारात्मक विचार प्रचलित होते. टुट्रिलियन नावाच्या ख्रिश्‍चन धर्मगुरूचे स्त्रियांसंंबंधी मत पुढील प्रमाणे होते, ”ती सैतानाचे प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे घेऊन जाणारी आहे. ईश्‍वराचा कायदा मोडणारी आहे. ईश्‍वराच्या संकल्पनेपासून पुरूषाला दूर घेऊन जाणारी आहे.” या ठिकाणी वर्जित वृक्ष म्हणजे स्वर्गातील ते वृक्ष ज्याच्या जवळ सुद्धा फटकू नका, असा आदेश अल्लाहने आदम अलै. आणि हव्वा अलै. यांना दिला होता. आणि सैतानाने आई हव्वा अलै. यांना अमरत्वाचे आमिष दाखवून त्या झाडाची फळं चाखण्यासाठी आदम अलै. यांना प्रेरित केले होते. हा प्रसंग बायबल आणि कुरआन या दोन्ही ईश्‍वरीय ग्रंथांमध्ये आलेला आहे.           
    महिलांविषयी क्राईसोस्टम हा ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणतो की, ”एक आवश्यक अशी वाईट बाब, एक जन्मजात अस्वस्थता, एक आवडणारे संकट, एक कौटुंबिक संकट, एक उध्वस्त करणारे प्रेम, एक नटलेली आफत” महिलांबाबतचे हे दोन दृष्टीकोन ख्रिश्‍चन धर्माला मानणार्‍यांमध्ये सुरूवातीच्या काळात होते. मात्र औद्योगिक क्रांती व विज्ञानाच्या प्रगतीबरोबर चर्चची सत्ता कमी-कमी होत गेली व आज अशी परिस्थिती आहे की, आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांना फक्त एक लैंगिक वस्तू समजले जात आहे. पॉर्न  सारख्या समाजघातक उद्योगाला इतकी समाजमान्यता मिळालेली आहे की, डायनासोर व आधारित ’ज्युरासिक पार्क’ चित्रपटांची निर्मिती करणारा हॉलीवुडचा जागतिक किर्तीचा दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग याची मुलगी निकोला हिने मागच्याच आठवड्यात पॉर्न स्टार म्हणून करिअर करण्याची घोषणा केलेली आहे. एकूणच महिलांचे स्थान समाजामध्ये काय असावे, हे आज 21 व्या शतकातसुद्धा जगाला ठरविता आलेले नाही, याला अपवाद फक्त इस्लामचा.
इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार
    इस्लाममध्ये महिलांचे समाजामधील स्थान नक्की कसे असावे? याबद्दल कुरआनमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. विस्तार भयामुळे त्या संदर्भात एवढेच नमूद करणे पुरेसे आहे की, मुळात त्यांच्यावर घराचे व्यवस्थापन, मानव वंश वृद्धी आणि संस्कारिक नागरिकांचा देशाला अखंड पुरवठा करण्याची जबाबदारी दिलेली आहे व ही जबाबदारी जगातील सर्वश्रेष्ठ जबाबदारी आहे.
    इस्लाममध्ये महिलांना मिळालेल्या अधिकारांचे ढोबळ वर्गीकरण दोन भागांमध्ये करता येईल. एक-आर्थिक अधिकार, दोन- सामाजिक अधिकार. इस्लाम वगळता बाकी सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये एकतर महिलांना आर्थिक अधिकार दिलेले नाहीत जे अधिकार दिलेले आहेत ते कायद्याने दिलेले आहेत व्यवस्थेने नव्हे. त्यातही प्रत्यक्षात त्या अधिकारांचा त्यांना स्वत:साठी उपयोग करता येणार नाही, अशी व्यवस्था पुरूषांनी जागतिक पातळीवर करून ठेवलेली आहे. आजच्या आधुनिक काळातही अनेक कामकाजी महिलांचे एटीएम त्यांच्या नवर्‍याच्या ताब्यात असतात. महिन्याला मोजून मापून नवरा त्यांना स्वत:च्या खर्चासाठी पैसे देत असतो. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र करण्याची चळवळ 18 व्या शतकात युरोपमधून सुरू झाली आणि आजमितीला ती सर्वत्र पसरलेली आहे. या चळवळीचा परिणाम असा झालेला आहे की, आता महिलांचे कमविणार्‍या जीवशास्त्रीय यंत्रामध्ये रूपांतर झालेले आहे. धर्माने जरी नाकारले असले तरी आज कायद्याने महिलांना वारसा हक्काचे व्यापक अधिकार मिळालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना हे अधिकार एक तर मिळत नाहीत किंवा मिळाले तरी त्यांचा त्यांना उपभोग घेऊ दिला जात नाही. या उलट इस्लाममध्ये महिलांवर थोडीशी बंधने घालून कुरआनने त्यांना अर्थप्राप्ती करण्याची परवानगी तर दिलेलीच आहे व त्या मिळकतीवर पतीचा कुठलाही अधिकार नाही, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. पत्नी कितीही कमाविणारी असो तिच्या आणि घराच्या खर्चाची जबाबदारी पतीवर टाकलेली आहे. याशिवाय, महेर आणि वारसा हक्काने संपत्ती मिळविण्याचा अधिकार 1441 वर्षापूर्वी बहाल केलेला आहे.
    सामाजिक अधिकारांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा प्रत्येक मुस्लिम मुलीला आपला पती निवडण्याचा संपूर्ण अधिकार दिलेला आहे. तिच्या मर्जीविरूद्ध तिचा विवाह तिच्या आई-वडिलांना सुद्धा करता येत नाही. एवढेच नव्हे तर तिला विशिष्ट परिस्थितीमध्ये पतीपासून घटस्फोट (खुला) घेण्याचा अधिकारही इस्लामने दिलेला आहे. महिलांचे समाजामध्ये स्थान निश्‍चित करतांना कुरआनने खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
    ”1. पत्नीबरोबर उत्तम व्यवहार करा.” (सुने निसा आयत क्र. 19). 2. ”एकमेकांच्या संंबंधांमध्ये उदारतेला विसरू नका.” (सुरे बकरा आयत नं. 237).
    यात पतीला विशेष करून उदारतेचे पालन करण्यासंबंधीचे निर्देश दिलेले आहेत. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी एक प्रसिद्ध हदीस या ठिकाणी नमूद करण्याचा मोह सोडवत नाहीये. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी म्हटले आहे की, ”तुमच्यापैकी चांगले पुरूष ते आहेत जे आपल्या पत्नींसोबत चांगला व्यवहार करणारे आणि आपल्या आपत्यांबरोबर उदारतेने वागणारे आहेत.”
    वर नमूद अधिकार हे, फक्त नावापुरतेच नसून जर कोणी ते नाकारत असेल तर ते हस्तगत करण्यासाठी महिलेला इस्लामी न्यायालयात संबंधितांविरूद्ध दाद मागण्याचाही अधिकार कुरआनने दिलेला आहे. याशिवाय विधवा आणि घटस्फोटीत महिलांना पुनर्विवाहाचा केवळ अधिकारच बहाल करण्यात आलेला नाही तर असे विवाह करण्यासाठी समाजाला उत्तेजन सुद्धा देण्यात आलेले आहे. पुनर्विवाहनंतर पूर्वीच्या पतीचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा कुठलाही अधिकार महिलेवर राहणार नाही, याचीही व्यवस्था केली गेलेली आहे. दिवाणी आणि फौजदारी कायद्यामध्ये केवळ साक्षीमध्ये अपवाद वगळता कुठलाही भेदभाव केलेला नाही. एक पुरूषाच्या साक्षी बरोबर दोन महिलांची साक्ष हा भेदभाव नसून त्यामागे निश्‍चित असे कारण आहे. ते काय आहे? या संबंधीचे विवेचन पुन्हा कधी तरी करूया.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना धार्मिक तसेच भौतिक शिक्षण घेण्याचा पुरूषांएवढाच अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र शिक्षणाच्या स्वरूपामध्ये थोडेसे अंतर जरूर केलेले आहे. या संबंधी जमाते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) असे म्हणतात की, ”जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली ़जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं.” (संदर्भ : परदा, पान क्र.197).
    इस्लाम ने महिलांना जरी आर्थिक आणि सामाजिक अधिकार दिलेले असले तरी भारतीय उपमहाद्विपामध्ये या संदर्भात मुस्लिमेत्तरच काय स्वत: मुस्लिम स्त्री-पुरूषांमध्ये सुद्धा या अधिकारासंबंधीच्या जाणीवेची वाणवा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महिलांना अनेक अधिकार नाकारले जातात. मुलीच्या लग्नामध्ये जो केेलेला अनाठायी खर्च असतो त्यावरच तिची बोळवण केली जाते व त्या खर्चालाच तिच्या वारसा हक्काच्या संपत्तीचा खर्च मानला जातो. या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्याची खुद्द मुस्लिम समाजामध्येच आवश्यकता आहे.
    महिलांचा खरा उद्धार
    महिलांचा खरा उद्धार कसा होईल? यासंदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, ”सिर्फ अधिकार ही नहीं इस्लामने औरतों पर इससे बडा जो एहसान किया है उसका तो अंदाजा नहीं किया जा सकता. मानव समाज का पूरा इतिहास इस बात पर गवाह है के, औरत का अस्तित्व दुनिया में जिल्लत (अपमानास्पद), शर्म (लज्जास्पद) और गुनाह का वजूद था. बेटी की पैदाईश बाप के लिए बडा ऐब और अपमान का कारण समझी जाती थी. ससुराली रिश्ते रूसवाई के रिश्ते समझे जाते थे. यहां तक की ’ससूर’ और ’साले’ जैसे शब्द इसी अज्ञानता के विचारों के तहेत आज भी गाली की तरह उपयोग में लाये जाते हैं. बहोतसी कौमों में इस रूसवाई से बचने के लिए लडकीयों को पैदा होते ही ़कत्ल कर देने का रिवाज आम हो गया था. आम लोगों को तो छोडिए धर्मगुरूओं तक में प्राचीन काल में मुद्दतों तक इस प्रश्‍न पर बहेस छिडी रही के, औरत इन्सान है भी के नहीं? और खुदा ने उसे आत्मा बक्षी है के नहीं? सदीयों के उत्पीड़न, अधिनता और विश्‍वव्यापी अपमान के बरताव ने खुद महिलाओं के ़जहेन (सोंच) में भी अपनी इज्जत की संवेदना मिटा दी थी. वो खुद भी इस बात को भूल गई थीं के, उनके लिए भी इ़ज्जत की कोई जगह है. पुरूष उन पर ़जुल्म करना अपना अधिकार समझता था तो वो उसके ़जुल्म को सहेना अपना कर्तव्य समझती थी. गुलामी की जहेनियत इस हद तक उसमें पैदा कर दी गई थी के, वो गर्व के साथ अपने आपको अपने पती की दासी कहेती थी.” (संदर्भ : परदा, पान क्र. 198)
    आपल्या देशातच नव्हे तर अनेक देशात आजही या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. अगदी अलिकडेच कन्या भ्रुण हत्येसंबंधी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी ’सम-विषम’ या अर्थाने सूचक विधान केले होते. ग्रामीण भागामध्ये आजही महिला आपल्या  पतीला ’मालक’ म्हणतात. एकीकडे आधुनिकतेच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते तर दूसरीकडे पारंपारिक जीवन पद्धतीमध्ये संस्कृतीच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते.
स्त्रीच्या अस्तित्वाचा उद्देश्य
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आणि त्याच्या (अल्लाहच्या) संकेतचिन्हांपैकी (एक संकेतचिन्ह) हे आहे की त्याने (अल्लाहने) तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्‍चितपणे यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात. (कुरआन: सुरे रोम, आयत नं. 21)
    लैंगिक संतोष ही मानवासाठी ईश्‍वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. या एका संतुष्टीमधून ईश्‍वराने अनेक उद्देश्य साध्य केलेले आहेत. पहिला उद्देश्य स्त्री आणि पुरूषांच्या जीवनामध्ये संतोष आणणे, दूसरा उद्देश्य त्यांच्यापासून संतती निर्माण करून मानववंश पुढे चालविणे. ही दोन्ही उद्दीष्टे लग्न न करताही प्राप्त करता येतात. आजकाल पाश्‍चिमात्य देशातच नव्हे तर आपल्या देशातही लग्न न करताच ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या जोडप्यांची संख्या कमी नाही. मात्र इस्लाम विवाहाला एवढे जास्त महत्त्व देतो की, विवाह व्यतिरिक्त या दोन्ही उद्दिष्टांना प्राप्त करण्यास निषिद्ध ठरवितो. एवढेच नव्हे तर विवाह व्यतिरिक्त ही उद्दीष्टे प्राप्त करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्या भयंकर परिणामांची चेतावनी देतो व अशा लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावितो. विवाहाशिवाय ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या देशांमधील सामाजिक परिस्थिती किती वाईट झालेली आहे हे आपल्याला माहितच आहे. या संदर्भात विस्तार भयामुळे जास्त लिहिण्याचे टाळले आहे. या संदर्भात केवळ एकच गोष्ट नमूद करणे पुरेसे आहे की, अशा विवाहमुक्त संबंधातून जन्माला येणारी पीढि ही देशाच्याही उपयोगाची नाही आणि मानवतेच्याही उपयोगाची नाही. गुन्हेगारीचा जो आगडोंब आज जागतिक पातळीवर उसळलेला आहे तो विवाहशिवाय निर्माण होणार्‍या संस्कारहीन पीढिमुळे उसळलेला आहे, असे म्हटले तरीही चुकीचे ठरणार नाही.
    महिला आणि पुरूष दोहोंना लैंगिक संतुष्टी विवाहाच्या चौकटी बाहेर मिळविण्यासाठी अनेक गुन्हे करावे लागतात व अशा संबंधातून उदयास आलेली पीढि संस्कारहीन निपजते. हीच संतुष्टी जर विवाहाच्या चौकटीत मिळत असेल तर त्यातून निर्माण होणारी संतती ही संस्कारी, लोकहितकारीच नव्हे तर देशालाही उत्तम दर्जाचे नागरिक पुरविणारी ठरते. महिलांनी पादत्राणे निर्मितीच्या कारखान्यात जॉब करण्यापेक्षा घरात राहून आदर्श पीढिच्या निर्मितीच्या जॉबसाठी वाहून घेतले तर या ऐवढे दुसरे उपकार मानवतेवर दुसरे कुठलेच होणार नाही. हे विचार अनेकांना रूचणार नाही. प्रतिगामी आणि संकीर्ण वाटतील. मात्र कोणी मान्य करो अथवा न करो, सत्य हेच आहे. आज अमेरिकेसह जगभरात भारतीय तरूण आपल्या यशाची जी पताका फडकवत आहेत, त्यात त्यांच्या जुन्या पीढितील आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा आहे. मागील काही वर्षांपासून जी संस्कार विहीन पीढि निर्माण होत आहे व त्यातून महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी बोकाळली आहे, त्याचे हेच कारण आहे की, अलिकडच्या पीढितील जोडप्यांनी पारंपारिक वैवाहिक बंधने एक तर झुगारून दिलेली आहेत किंवा ती सैल केेलेली आहेत.
    शेवटी महिला दिनानिमित्त इस्लाममध्ये महिलांचे नेमके काय स्थान आहे? हे समजून घेण्यासाठी सय्यद अबुल आला मौदूदी यांचे परदा नावाचे अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले पुस्तक जे की हिंदीमध्ये ’परदा’ आणि मराठीमध्ये ’गोशा’ नावाने सुद्धा उपलब्ध आहे ते जरूर वाचावे. जमाते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयामधून ते सहज मिळविता येते. ते मिळवून पूर्वगृह बाजूला ठेऊन प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचावे, असे हे पुस्तक आहे. मला विश्‍वासच नव्हे तर खात्री आहे की, हे पुस्तक वाचणार्‍याच्या मनामध्ये महिलांच्या समाजातील नक्की स्थानाबद्दल खरी जाणीव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुस्तक जरी महिलांविषयी असले तरी ते पुरूषांनी वाचावे असे आहे. नि:संशय महिलांनाही स्वत:ची नव्याने ओळख करून घ्यावयाची असल्यास त्यांनीही हे पुस्तक नक्कीच वाचावे. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

- एम.आय.शेख

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रवासात होतो. इतक्यात पैगंबरांवर ‘‘वल्ल़जीना यकनि़जूऩज़्जहबा वल-फ़िज़्ज़ता.’’ ही आयत   अवतरित झाली, तेव्हा आमच्यापैकी काहींनी म्हटले, ‘‘सोन्या-चांदीचा साठा करण्याच्या बाबतीत ही आयत अवतरित झाली. यावरून ज्ञात होते की ते गोळा करणे चांगली गोष्ट नाही.  कोणती साधन-संपत्ती गोळा करणे योग्य आहे हे जर आम्हाला माहीत पडले असते तर आम्ही ती गोळा करून ठेवली असती.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांत उत्तम खजिना अल्लाहचे  नामस्मरण करणारी जिव्हा आणि अल्लाहच्या कृतज्ञतेने भरलेले हृदय आणि सदाचारी पत्नी आहे जी ‘दीन’च्या मार्गावर चालण्यात पतीची साहाय्यक बनते.’’ (तिर्मिजी)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे माहीत होते की मुखाने अल्लाहचे नामस्मरण करणे आणि नामस्मरण म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेसह केले जाणारे ईशनामस्मरण आणि हेदेखील माहीत झाले की आपल्या  धर्मश्रद्धाळू (दीनदार) पतीच्या संकटे व अडचणींमध्ये संयमाने राहणारी पत्नी धर्माच्या मार्गात आधार बनते. मार्गातील अडथळा बनत नाही, म्हणून खरोखरच अशी पत्नी अल्लाहची फार  मोठी कृपा आहे.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण निरीक्षक व संरक्षक आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारले जाईल  त्या लोकांच्या बाबतीत जे तुमच्या देखरेखीखाली असतील. शासकदेखील संरक्षक आहे आणि त्यालाही त्याच्या प्रजेलाविषयी विचारणा होईल आणि पती आपल्या कुटुंबियांचा संरक्षक आहे  आणि पत्नी आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे आणि सेवक आपल्या मालकाच्या संपत्तीचा संरक्षक आहे, तर मग तुमच्यापैकी प्रत्येकजण संरक्षक आहे आणि  तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या लोकांच्या बाबतीत विचारले जाईल जे त्याच्या संरक्षणात होते.’’ (मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
या हदीसचा हा भाग विशेष लक्ष देण्यायोग्य आहे कारण स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे. या हदीसवरून स्पष्ट होते की पती आपल्या पत्नीला फक्त  खाऊपिऊ घालण्यापुरताच जबाबदार नाही तर तिचा धर्म व नैतिकतेचे रक्षण व संरक्षण करणे त्याचीच जबाबदारी आहे. पत्नीची जबाबदारी दुप्पट आहे. ती पतीचे घर व संपत्तीची  संरक्षक असण्याबरोबरच त्याच्या मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची विशिष्ट जबाबदारीदेखील तिच्यावर आहे, कारण पती उपजीविका प्राप्त करण्यासाठी अधिकांश घराबाहेर राहतो आणि  घरात मुले आपल्या मातांकडेच असतात, म्हणून मुलांचे संरक्षण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची आणखी एक जबाबदारी त्यांच्या आईवर पडते.

मुलाबाळांचे अधिकार
सईद बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पिता आपल्या मुलाबाळांना जे काही देतो त्यापैकी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याचे चांगले शिक्षण   व प्रशिक्षण होय.’’ (हदीस : जामिउल उसूल, मिश्कात) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपली मुलेबाळे सात वर्षांची झाल्यास त्यांना नमाज अदा करण्याचा आदेश द्या आणि  जेव्हा ते दहा वर्षांचे होतील तेव्हा त्यांना नमाजकरिता मार द्या आणि या वयाचे झाल्यानंतर त्यांचे अंथरुण वेगळे करा.’’ (हदीस)

स्पष्टीकरण
या हदीसवरून स्पष्ट होते की मुले जेव्हा सात वर्षांची होतात तेव्हा त्यांना नमाजची पद्धत शिकविले आणि नमाज अदा करण्यास सांगितले पाहिजे आणि जेव्हा ते दहा वर्षांची होतील  आणि नमाज अदा करीत नसतील तर त्यांना मारदेखील दिला जाऊ शकतो. त्यांना हे समजाविले पाहिजे की तुमचे नमाज अदा न करणे आमच्या नाराजीचे कारण बनेल. या वयाला  पोहोचल्यानंतर मुलांचे अंथरुण वेगळे केले पाहिजे, अनेक मुलांनी एकाच बेडवर झोपू नये.

कुरआनची वर्णनशैली, त्याची रचना व त्यातील बऱ्याचशा विषयांना मनुष्य चांगल्या प्रकारे समजू शकत नाही जोपर्यंत तो त्याच्या अवतरणस्थितीला चांगल्या प्रकारे समजून घेत नाही.
कुरआन काही अशा स्वरूपाचा ग्रंथ नाही की सर्वोच्च अल्लाहने एकाचवेळी तो लिहून पैगंबर मुहम्मद (स.) यांना देऊन टाकला असावा त्यांना सांगितले असावे की याला प्रकाशित करून लोकांना एका विशिष्ट जीवनपद्धतीकडे बोलवा. तसेच हा कुरआन काही अशा स्वरूपाचा ग्रंथही नाही की लेखनात्मक पद्धतीने ग्रंथाचा विषय व त्याच्या मध्यवर्ती कल्पनेवर त्यात चर्चा केलेली असावी. याच कारणामुळे त्यात लेखनात्मक क्रमबद्धताही आढळत नाही व पुस्तकी शैलीही आढळत नाही. वास्तविकपणे कुरआनचे खरे स्वरूप असे आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने अरबस्तानातील मक्का शहरातून आपल्या एका दासाला पैगंबरत्वाच्या सेवेसाठी निवडले. त्याला हुकूम दिला की आपल्या शहरापासून व आपल्या घराण्या (कुरैश) पासून आवाहनाला प्रारंभ करा. हे कार्य सुरू करण्यासाठी प्रारंभी ज्या आदेशांची व सूचनांची गरज होती केवळ त्याच प्रथम दिल्या गेल्या. त्यांच्यात जास्त करून तीन विषयांचा समावेश होता.
त्यापैकी एक विषय असा की पैगंबर मुहम्मद (स.) यांना शिकवण देणे की त्यांनी पैगंबरत्वाच्या वैभवशाली कार्यासाठी स्वत:ला कशा प्रकारे तयार करावे आणि कोणत्या पद्धतीने काम करावे.
दुसरा विषय असा की सर्वमान्य सत्यासंबंधी प्राथमिक स्वरूपाची माहिती देणे. सत्यासंबंधी सभोवतालच्या लोकांमध्ये गैरसमजुती पसरलेल्या होत्या त्यामुळे लोकांचे वर्तन चुकीचे बनले होते, त्यांचे ढोबळपद्धतीने खंडन करणे.
तिसरा विषय असा की योग्य वर्तनाचे आवाहन देणे आणि ईशमार्गदर्शनाच्या त्या नैतिक मूलतत्त्वांना स्पष्ट करून सांगणे की ज्यांच्या अनुसरणात माणसाचे कल्याण व त्याचे सुदैव दडले आहे.
सुरवातीच्या काळातील हे संदेश प्राथमिक आवाहनाच्या अनुषंगाने काही लहान लहान संक्षिप्त बोलांचा समावेश असलेले असायचे. त्या बोलांची भाषा अत्यंत शुद्ध, अत्यंत गोड, अत्यंत प्रभावी आणि संबोधित समाजाच्या रसिकतेनुसार उत्तम साहित्यिक सौदर्य बाळगणारी होती. जेणेकरून ते बोल त्यांच्या हृदयात तीरासमान रूतून बसतील. त्यांच्यातील लयमाधुर्यामुळे कर्ण आपोआप त्यांच्याकडे आकर्षिले जातील आणि त्यांच्यातील प्रमाणबद्ध सौंदर्यामुळे जिव्हा उत्स्पूâर्तपणे त्यांचे उच्चारण करू लागतील. शिवाय त्या वाणीवर स्थानिक रंगाची छाप अधिक होती. यद्यपि सांगितले तर जात होते विश्वव्यापी सत्य परंतु त्याच्यासाठी प्रमाण व पुरावे आणि उदाहरणे मात्र त्याच निकटवर्ती परिसरातून घेतलेले होते, ज्यांच्याशी संबोधित लोक चांगल्या प्रकारे परिचित होते. त्याच लोकांचा इतिहास, त्यांचीच परंपरा, त्यांच्याच दैनंदिन निरीक्षणात येणारे भग्नावशेष आणि त्यांच्याच सर्व श्रद्धात्मक व नैतिक आणि सामूहिक स्वरूपाच्या बिघाडासंबंधी एवूâण चर्चा केली जात होती. म्हणजे त्या लोकांसाठी ती वाणी परिणामकारक ठरेल.
अशा प्रकारे ‘आवाहना’चा हा प्राथमिक टप्पा चार-पाच वर्षांपर्यंत चालत राहिला. या कालावधीत पैगंबर मुहम्मद (स.) त्या लोकांत करीत असलेल्या प्रचाराची प्रतिक्रिया तीन प्रकारात उमटली.
(१) पैगंबरांचे सदरहू आवाहन स्वीकारून काही सदाचारी माणसे मुस्लिम (उम्मत) बनण्यासाठी तयार झालीत.
(२) एक मोठी संख्या अज्ञानामुळे अथवा स्वार्थापोटी विंâवा वडिलोपार्जित पद्धतीच्या प्रेमामुळे विरोधास तयार झाली.
(३) मक्का शहर आणि कुरैशांच्या सीमेपलीकडे जाऊन सदरहू नूतन आवाहनाचा आवाज तुलनात्मकरीत्या अधिक विस्तृत क्षेत्रात पोहोचू लागला.
आवाहनाचा दुसरा टप्पा
त्यानंतर येथून आता त्या आवाहनाचा दुसरा टप्पा सुरू होतो. या कालखंडात इस्लामी चळवळीत आणि अज्ञानमूलक व्यवस्थेमध्ये भयंकर जीवघेणे संघर्ष पेटून ते सतत आठ-नऊ वर्षांपर्यंत चालत राहिले. केवळ मक्का शहरातच नव्हे, तसेच केवळ कुरैश लोकांतच नव्हे, तर अरबस्तानाच्या बव्हंशी विभागातदेखील जे लोक जुन्या अज्ञानमूलक व्यवस्थेला कायम ठेवू इच्छित होते ते लोक सदरहू चळवळीला हिंसेच्या मार्गाने नष्ट करण्यास तत्पर बनले, त्यांनी ती चळवळ चिरडून टाकण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच योजून पाहिले. खोटा प्रचार केला, शंकाकुशंका पसरविल्या आणि आरोप व आक्षेपांची सरबत्ती केली. सामान्यजनांच्या मनात नाना तNहेचे वसवसे घातले. माहिती नसलेल्या लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांचे म्हणणे ऐकण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले. इस्लाम स्वीकारणाऱ्यांवर अत्यंत व्रूâरपणे जुलूम व अत्याचार केले. त्यांच्यावर आर्थिक व सामाजिक बहिष्कार टाकले त्यांचा इतका छळ केला की त्यांच्यापैकी पुष्कळ लोकांना दोनदा घरादारांचा त्याग करून हब्श देशाकडे ‘हिजरत’ (स्थलांतर) करणे भाग पडले. सरतेशेवटी तिसऱ्यांदा सर्वच नवमुस्लिमांना मदीनेकडे ‘हिजरत’ (स्थलांतर) करावी लागली. परंतु असा भयंकर आणि प्रतिदिन वाढत असलेला प्रतिकार होत असतानादेखील इस्लामी चळवळ पैâलावतच होती. मक्का शहरातील एकही घर विंâवा कुटुंब असे उरले नव्हते की ज्यातील कोणत्या न कोणत्या व्यक्तीने इस्लाम स्वीकारलेला नसेल. बहुतेक विरोधकांच्या शत्रुत्वाची तीव्रता व त्याच्या कडवटपणाचे कारण हेच होते की स्वत: त्यांचे भाऊ, पुतणे, मुले, मुली, बहिणी आणि मेव्हणे इस्लामी आवाहनाचे केवळ अनुयायीच बनले नव्हते तर त्यासाठी प्राणार्पण करणारे सहायकही बनले होते. अशा प्रकारे विरोधकांचे प्रिय आप्तेष्टच त्यांच्याशी झुंज देण्यासाठी उभे ठाकले होते. याउपरही ते लोक त्याअगोदरही त्यांच्या समाजात उत्तम लोक म्हणून गणले जात असत आणि इस्लामी चळवळीत सामील झाल्यानंतर तर ते इतके सत्यनिष्ठ व इतक्या शुद्ध आचरणाची माणसे बनत असत. जगाला त्या आवाहनाच्या श्रेष्ठत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहू शकत नव्हती. ते आवाहन लोकांना आकर्षित करीत होते व त्यांना अशा प्रकारे घडवीत होते.
अशा प्रकारच्या प्रदीर्घ व तीव्र संघर्षाच्या काळात सर्वोच्च अल्लाह प्रसंगानुसार व गरजेनुसार आपल्या पैगंबरावर असे चैतन्यमय दिव्य प्रकटन अवतरित होता की ज्याचा ओघ नदीच्या प्रवाहासारखा व ज्याची शक्ती महापुरासमान आणि ज्याचा प्रभाव खवळलेल्या उग्र अग्नीसमान होता. त्या दिव्य प्रकटनात एकीकडे इमानधारकांना त्यांची प्राथमिक कर्तव्ये सांगितली जायची, त्यांच्यात संघटनात्मक जाण उत्पन्न केली जायची, त्या इमानधारकांना ईशपरायणता, पापभीरुता आणि श्रेष्ठ आचरण व शुद्ध चारित्र्याची शिकवण दिली जायची. त्यांना सत्यधर्माच्या प्रचाराच्या पद्धती सांगितल्या जायच्या. यशस्वी ठरण्याची अभिवचने व जन्नत-स्वर्गप्राप्तीच्या आनंदवार्तेने त्यांचे धैर्य उंचावले जायचे. संयम व सहनशीलता आणि धैर्यशीलतेने अल्लाहच्या मार्गात झटण्याचा उत्साह त्यांच्यात निर्माण केला जायचा. अशा प्रकारे प्राणार्पणाचा इतका जबरदस्त जोश आणि इतका दांडगा उत्साह त्यांच्यात उत्पन्न केला गेला की येणारी सर्व संकटे सहन करण्यासाठी व विरोधाच्या प्रचंड वादळाचाही मुकाबला करण्यासाठी ते तयार झाले होते. दुसरीकडे त्या चैतन्यमय दिव्य प्रकटनात विरोध करणाऱ्यांना व सरळमार्गापासून तोंड फिरविणाऱ्यांना आणि गफलतीची साखरझोप घेणाऱ्या लोकांना त्या समाजांच्या विनाशकारी शेवटाचे भय दाखविले गेले, ज्यांचा इतिहास त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होता. त्या राष्ट्रांच्या उद्ध्वस्त वस्त्यांच्या भग्नावशेषापासून त्यांना धडा दिला गेला. ज्या भग्नावशेषांवरून ते प्रवासाच्या हेतूने रात्रन् दिवस ये-जा करीत असत. त्या लोकांना एकेश्वरत्व आणि परलोकाचे प्रमाण व पुरावे त्या उघड निशाण्यांद्वारे दिले गेले; ज्या रात्रन् दिवस पृथ्वी व आकाशांत त्यांच्या डोळ्यांसमोर प्रकटावस्थेत होत्या. ज्यांना ते स्वत:ही आपल्या जीवनात सदोदित दिसत होत्या व जाणवत होत्या. त्या लोकांवर त्यांच्या अनेकेश्वरत्वाचे दोष, जीवनात अनिर्बंध असण्याच्या त्याच्या दाव्याचे व परलोकाच्या इन्काराचे दोष दाखविले. वाडवडिलांचे अंधानुकरण करण्याचे दोष अशा स्पष्ट प्रमाणाद्वारे व पुराव्यानिशी उघड केले गेले जे अंत:करणात भिडणारे आणि बुद्धीला पटणारे होते. याशिवाय त्यांच्या एक अन् एक शंकेचे निरसन केले गेले. त्यांच्या प्रत्येक आक्षेपाचे योग्य उत्तर दिले गेले. त्या लोकांचा प्रत्येक गुंता व पेच ज्यात ते स्वत:ही गुंतलेले होते आणि इतरांनाही त्यात अडकविण्याचा ते प्रयत्न करीत होते त्याची उकल केली गेली. सर्व बाजूंनी वेढून अज्ञानमूलक व्यवस्थेला असे घट्ट आवळले गेले की बुद्धीच्या व शहाणपणाच्या जगात तिला कोठेही थारा उरला नाही. त्याचबरोबर त्यांना ईश्वराचा कोप, ‘कयामत’चे महाभयंकर प्रसंग आणि जहन्नम-नरकाच्या यातनेचे भय दाखविले गेले. त्या लोकांची, त्यांच्या दुराचारासंबंधी, त्यांच्या चुकीच्या जीवनवर्तनासंबंधी, अज्ञानमूलक रूढी व सत्याच्या शतृत्वासंबंधी तसेच इमानधारकांच्या छळणूकीसंबंधी निर्भत्र्सना केली गेली. नीतिमत्ता व संस्कृतीची ती महान मूलतत्त्वे त्यांच्या समोर प्रस्तुत केली गेली ज्यांच्या आधारावर सदैव ईश्वरप्रणीत सुसंस्कृतीची उभारणी होत आली आहे.
हा दुसरा टप्पा आपल्या जागी स्वत:च अनेक मजलांचा अंतर्भाव असलेला होता. त्यापैकी प्रत्येक टप्प्यामध्ये आवाहन अधिक विस्तृत होत गेले. आवाहनासाठी होणारे प्रयत्नही तीव्र होत गेले व त्यांचा प्रतिकारही अधिकाधिक प्रखर बनत गेला. निरनिराळ्या प्रकारच्या श्रद्धा आणि निरनिराळ्या प्रकारच्या कार्यपद्धती असलेल्या समूहांशी गाठ पडत गेली व अशा प्रकारच्या स्थित्यंतरानुसारच अल्लाहकडून येणाऱ्या संदेशात विषयांची विविधताही वाढत गेली.... अशी आहे महान कुरआनच्या मक्केत अवतरलेल्या सूरतींची (कुरआनोक्तींची) पाश्र्वभूमी.

इस्लामच्या राजकीय व्यवस्थेचा पाया तीन तत्वांवर आधारलेला आहे.   
 1) तौहीद-एकेश्वरत्व 
2) रिसालत-पैगंबरत्व 
3) खिलाफत- प्रतिनिधित्व. 

या तत्वांना चांगल्या प्रकारे समजावून घेतल्याशिवाय इस्लामची संपूर्ण राजकीय व्यवस्था समजणे कठीण आहे. आणि म्हणून या तत्वांचा संक्षिप्त असा खुलासा करीत आहे.
""तौहीद'' चा अर्थ हा आहे की अल्लाह या जगाचा आणि या जगामध्ये राहणाऱ्या सर्वांचा निर्माता आहे, पालनकर्ता व स्वामी आहे. शासन व अधिकार त्याचाच आहे. तोच आज्ञा देण्याचा व मनाई करण्याचा अधिकार बाळगतो, आणि आज्ञापालन व गुलामी फक्त त्याचीच, त्यामध्ये इतर कोणीही भागीदार नाही. आपले हे अस्तित्व, आपली इंद्रिये व शक्ती ज्यांचा आपण उपयोग करतो आणि आपले ते अधिकार जे आपल्याला जगातील वस्तूंवर प्राप्त आहेत आणि त्या वस्तू ज्यांच्यावर आपण आपल्या अधिकाराचा वापर करतो- त्यापैकी कोणतीही गोष्ट आपण निर्माण केलेली व प्राप्त केलेली नाही. या गोष्टी आपल्याला बक्षिसादाखल देण्यामध्ये अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सहभागी नाही आणि म्हणून आमच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट, आपल्या शक्तीचा वापर आणि आपल्या अधिकाराच्या मर्यादा निश्चित करणे हे न आमचे काम आहे न दुसऱ्या कोणाला या प्रश्नात दखल देण्याचा अधिकार आहे. हे फक्त त्या अल्लाहचे काम आहे, ज्याने आपल्याला त्या शक्ती व अधिकारांसह निर्माण केले आणि पुष्कळशा गोष्टी आपल्या उपभोगासाठी दिल्या. एकेश्वरत्वाचे हे तत्व मानवी अधिकारशाहीचा मूळापासून इन्कार करते. एक व्यक्ती असो वा एक कुटुंब, एक वर्ग असो वा एक गट, एखादा समाज असो वा सामूहिकरीत्या साऱ्या जगाचे लोक असोत, अधिकारशाहीचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत कोणासही पोहचत नाही. सत्ताधीश फक्त अल्लाह आहे आणि त्याची आज्ञा हाच कायदा आहे.
अल्लाहचा कायदा ज्या साधनाद्वारे मानवापर्यंत पोहोचला आहे त्याचे नाव "रिसालत' म्हणजे पैगंबरत्व आहे. याद्वारे आपल्याला दोन गोष्टी मिळतात. एक "ग्रंथ' ज्यामध्ये स्वत: अल्लाहने आपला कायदा निवेदन केलेला आहे. दुसरी ग्रंथाचे प्रमाणभूत स्पष्टीकरण जे पैगंबरांनी अल्लाहचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या उक्ती व कृतीद्वारे केलेले आहे. अल्लाहच्या ग्रंथात ती सर्व तत्वे निवेदन केली गेली आहेत, ज्याच्यावर मानवी जीवनाची व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे आणि पैगंबरांनी ग्रंथाच्या या मनिषेनुसार प्रत्यक्षात एक जीवनव्यवस्था तयार करून ती अंमलात आणली आणि तिचा आवश्यक तो खुलासा करून आपल्यासाठी एक आदर्श कायम केला आहे. या दोन्ही गोष्टीचे एकत्रित नाव इस्लामी परिभाषेत "शरियत' आहे आणि हीच ती मूलभूत घटना आहे जिच्यावर इस्लामी राज्य कायम होते.
आता "खिलाफत' चा विचार करू. अरबीमध्ये हा शब्द प्रतिनिधीत्वाबद्दल बोलला जातो. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामध्ये माणूस जमिनीवर अल्लाहचा प्रतिनिधी आहे. म्हणजे अल्लाहच्या राज्यात अल्लाहनेच दिलेल्या अधिकारांचा माणूस वापर करतो. आपण जेव्हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था एखाद्या माणसाकडे सोपवितो तेव्हा आपल्यासमोर चार गोष्टी अवश्य असतात. एक ही की मालमत्तेचे खरे मालक आपण स्वत: आहोत, तो माणूस नव्हे. दुसरी ही की आपल्या मालमत्तेसंबंधी आपण दिलेल्या सूचनांनुसारच त्या माणसाला काम करावयाचे आहे. तिसरी गोष्ट ही की त्या माणसाला आपल्या अधिकारांचा वापर त्या मर्यादामध्येच करावयाचा आहे ज्या तुम्ही त्याला घालून दिल्या आहेत. चौथी गोष्ट ही की आपल्या मालमत्तेमध्ये आपल्या इच्छेला त्याने पुरे करावयाचे आहे, त्याच्या स्वत:च्या इच्छेला नव्हे. या चार अटी प्रतिनिधीचा शब्द उच्चारताच आपोआप माणसाच्या मनात येतात. एखादा प्रतिनिधी या चार अटींना जर पूर्ण करीत नाही तर आपण म्हणाल की त्याने प्रतिनिधीत्वाच्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही आणि त्याने तो करार मोडला, ज्याचा प्रतिनिधीत्वाच्या अर्थात समावेश आहे. ठीक याच अर्थ इस्लाम माणसाला अल्लाहचा प्रतिनिधी ठरवतो आणि खिलाफतीच्या कल्पनेमध्ये याच चार अटींचा समावेश आहे. या राजकीय दृष्टिकोनानुसार जी राज्यसत्ता प्रस्थापित होईल ती वस्तुत: अल्लाहच्या अधिपत्याखालील मानवी प्रतिनिधित्व असेल, ज्याला अल्लाहच्या राज्यात त्याने दिलेल्या आदेशानुसार आणि त्याने ठरविलेल्या मर्यादेत कार्य करून त्याची इच्छा पूर्ण करावयाची आहे.
खिलाफतीबद्दलच्या या खुलाशासंबंधी एवढी गोष्ट आणखीन समजून घेतली पाहिजे की इस्लामचा राजकीय दृष्टिकोन कोणा एका व्यक्तीला अगर कुटुंबाला अगर वर्गाला प्रतिनिधी ठरवित नाही. तर त्या सर्व समाजाकडे प्रतिनिधीत्वाचा अधिकार सोपवितो जो "तौहीद'(एकेश्वरत्व) व "रिसालत' (प्रेषित्व) च्या मूलभूत तत्वांचा स्वीकार करून प्रतिनिधीत्वाच्या अटी पुऱ्या करण्यास तयार व पात्र असतो. असा समाज, सामूहिकरीत्या प्रतिनिधीत्वाची जबाबदारी पत्करण्यास पात्र आहे आणि हे प्रतिनिधित्व त्या समाजातील प्रत्येक व्यक्तिप्रत पोहचते. याच बिंदूपासून इस्लाममध्ये "लोकशाही' ची सुरुवात होते. इस्लामी समाजाचा प्रत्येक घटक प्रतिनिधीत्वाचा हक्क व अधिकार बाळगतो आणि या हक्क व अधिकारामध्ये सर्व लोक समान भागीदार आहेत. कोणाचे कोणावर वर्चस्व नाही आणि ना कोणाला हा अधिकार आहे की त्याने दुसऱ्या कोणास या हक्क व अधिकारापासून वंचित करावे. राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी शासन बनविले जाईल ते या सर्व लोकांच्या मर्जनुसार बनविले जाईल. हेच लोक आपल्या प्रतिनिधीत्वाच्या अधिकारांचा एक भाग या शासनाकडे सोपवतील. या शासनाची उभारणी त्याच्या मतानुसार होईल आणि त्यांच्या सल्ल्याने ते चालेल. जी व्यक्ती त्यांचा विश्वास संपादन करील ती त्यांच्यातर्फे खिलाफतीची कर्तव्ये पार पाडील आणि जी त्यांचा विश्वास गमावून बसेल तिला सत्तेच्या अधिकार पदावरून दूर व्हावे लागले. या दृष्टीने इस्लामी लोकशाही ही एक परिपूर्ण लोकशाही आहे. तितकीच परिपूर्ण जितकी परिपूर्ण एखादी लोकशाही होऊ शकते. परंतु जी गोष्ट इस्लामी लोकशाहीला पाश्चिमात्य लोकशाहीतून वेगळी करते ती ही आहे की पश्चिमेचा राजकीय दृष्टिकोन ""सार्वभौम लोकशाही'' चा आहे तर इस्लामचा ""लोकतांत्रिक खिलाफत'' चा आहे. तेथे लोक स्वत: सत्ताधीश आहेत तर येथे सत्ताधीश अल्लाह आहे आणि लोक त्याचे प्रतिनिधी आहेत. तेथे आपले राज्यशास्त्र (शरियत) स्वत: लोक तयार करतात, येथे त्यांना त्या शरियतचे पालन करावे लागते जी त्यांना त्यांच्या अल्लाहने पैगंबरामार्फत दिलेली आहे. तेथे शासनाचे काम लोकांच्या मनिषा पूर्ण करणे हे असते. येथे शासन व ते निवडणारे लोक या सर्वांचे कार्य अल्लाहची मनिषा पूर्ण करणे हे असते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पाश्चिमात्य लोकशाही म्हणजे अनियंत्रित अशी एक लोकसत्ता आहे जी आपल्या अधिकाराचा वापर अनिर्बंधपणे करते. याउलट इस्लामी लोकशाही कायद्याने नियंत्रित असे आज्ञापालन आहे, जेथे आपले अधिकार अल्लाहने दिलेल्या आदेशानुसार त्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत वापरले जातात. आता मी आपल्यासमोर त्या राज्याची संक्षिप्त पण स्पष्ट अशी रूपरेखा मांडतो जी  "तौहीद' (एकश्वरत्व), "रिसालत' (प्रेषित्व) व "खिलाफत' (प्रतिनिधित्व)च्या तत्वावर आधारलेली आहे.
या राज्यसत्तेचा उद्देश पवित्र कुरआनमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. अल्लाह मानवी जीवनाला ज्या सद्‌गुणांनी अलंकृत पाहू इच्छितो ते सद्‌गुण प्रस्थापित करणे, त्यांची बुद्धी व उत्कर्ष घडवून आणणे हे त्या राज्यसत्तेचे उद्दिष्ट राहील. याबरोबरच अल्लाहला मानवी जीवनात जे दुर्गुण असणे पसंत नाही त्या दुर्गुणांना रोखणे व मिटविणे हेसुद्धा तिचे उद्दिष्ट राहील. इस्लाममध्ये राज्यसत्तेचे उद्दिष्ट केवळ देशाचा कारभार पाहणे आणि एखाद्या विशिष्ट समाजाच्या सामूहिक इच्छांची पूर्त करणे हे नाही, याऐवजी इस्लाम, राज्यसत्तेसमोर हे ध्येयधोरण ठेवितो जे प्राप्त करण्यासाठी तिला आपल्या सर्व साधनांचा, मार्गाचा व शक्तीचा वापर केला पाहिजे. आणि ते ध्येयधोरण हे आहे की अल्लाह आपल्या जमिनीवर आपल्या दासांच्या जीवनामध्ये जी निर्मळता, जे सौंदर्य, जी खुशाली, जी सुधारणा व प्रगती व जी सफलता पाहू इच्छितो ती त्यामध्ये दृग्गोचर व्हावी आणि बिघाडाच्या त्या सर्व प्रकारांचे उच्चाटन व्हावे जे अल्लाहजवळ त्याच्या जमिनीला उद्‌ध्वस्त करणारे आणि त्याच्या दासांचे जीवन खराब करणारे आहेत. या ध्येयधोरणाबरोबरच इस्लाम आपल्यासमोर चांगल्या व वाईटाची एक स्पष्ट अशी कल्पना ठेवितो, ज्यामध्ये अपेक्षित सद्‌गुणांना व अप्रिय अशा दुर्गुणांना स्पष्ट केले गेले आहे. या कल्पनेला दृष्टिसमोर ठेवून इस्लामी राज्यसत्ता प्रत्येक काळात व प्रत्येक परिस्थितीत आपल्या सुधारणेचा कार्यक्रम आखू शकते.
इस्लामची स्थायी निकड ही आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक तत्वांचे पालन केले जावे आणि म्हणून तो आपल्या राज्यसत्तेसाठीसुद्धा हे निश्चित धोरण ठरवितो की तिचे राजकारण नि:स्पृह न्याय, अकलंकित सत्य आणि खरा प्रामाणिकपणा यांच्यावर प्रस्थापित व्हावे. तो देशाच्या राज्यकारभाराच्या किंवा राष्ट्राच्या हितसंबंधासाठी खोटेपणा, धोकेबाजी आणि अन्याय यांना कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यास तयार नाही. देशामधील राजा व प्रजा यांचे संबंध असोत वा देशाबाहेरील दुसऱ्या राष्ट्रांबरोबरचे संबंध असोत, दोहोमध्ये तो सत्य, प्रामाणिकपणा व न्याय यांना हेतू व उद्दिष्टांवर प्राधान्य देतो. मुस्लिम व्यक्तिप्रमाणेच मुस्लिम राज्य सत्तेवरही तो निर्बंध घालतो की करार कराल तर तो पुरा करा देवघेवीची परिमाणे सारखी ठेवा, उक्तीप्रमाणे कृती करा आणि जशी कृती कराल तशीच उक्ती ठेवा. आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवा आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याबरोबर त्यांच्या हक्कांना विसरू नका. सामथ्र्याला, अत्याचाराऐवजी न्यायाच्या प्रस्थापनेचे साधन बनवा. हक्काला जाणा व तो अदा करा कारण या अमानतींचा तुम्हाला तुमच्या अल्लाहसमोर पुरा हिशेब द्यावयाचा आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget