Latest Post

सामान्यपणे आम्हाला अशाच प्रकारची पुस्तके वाचण्याची सवय आहे ज्यांच्यात एखाद्या विशिष्ट विषयावरील माहिती असते, त्यासंबंधीचे विचार व युक्तिवादांना एका विशिष्ट लेखनात्मक मांडणीनिशी निरंतरपणे सांगितलेले असते. याच कारणाने असा मनुष्य जो कुरआनशी अपरिचित आहे तो जेव्हा पहिल्यांदाच हा ग्रंथ वाचण्याचा विचार करतो तेव्हा तो अशी अपेक्षा धरूनच वाचू लागतो की ‘पुस्तक’ म्हणून या ग्रंथातही इतर पुस्तकांप्रमाणे प्रथम विषय निश्चित केलेला असेल. नंतर त्यातील मूळ निबंधाला अनेक प्रकरणात आणि पोटभागांत विभागून क्रमवार एकेका प्रश्नावर चर्चा केलेली असेल. त्याचप्रकारे जीवनाच्या एकेका क्षेत्रालाही वेगवेगळे करून त्यासंबंधीच्या सूचना व आज्ञा क्रमवार लिहिलेल्या असतील. परंतु जेव्हा वाचकाला पूर्णपणे अपरिचित अशी एक वेगळीच वर्णनशैली प्रत्ययास येते. येथे तो पाहतो की श्रद्धात्मक नियम, नैतिक आदेश, शास्त्रीय आज्ञा, आवाहन, उपदेश, धडा, टीका, निर्भत्र्सना, भीती, शुभवार्ता, सांत्वन, युक्तिवाद, पुरावे व प्रमाण, ऐतिहासिक कथा, सृष्टी-चिन्हांकडे संकेत, असे सर्वच विषय पुन्हा पुन्हा एकमेकानंतर येत आहेत.
एकच विषय निरनिराळ्या पद्धतीने व वेगवेगळ्या शब्दांत पुन्हा पुन्हा उच्चारला जात आहे. तो पाहतो की एका विषयानंतर दुसरा व दुसऱ्यानंतर तिसरा अकस्मातपणे सुरू होत आहे. विंâबहुना एका विषयामध्येच दुसरा विषय अचानक येत आहे. वाचक पाहतो की संबोधक आणि संबोधित वरचेवर बदलत असून संबोधण्याचा रोख राहूनराहून विभिन्न दिशांत वळत आहे. निबंधाची विविध प्रकरणांत आणि पोटभागांत विभागणीचे कोठेही नावनिशाण आढळत नाही. तो पाहतो की इतिहास असला तरी ऐतिहासिक पद्धतीने सांगितलेला नाही. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म असले तरी तर्वâशास्त्र आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेत ते मांडलेले नाहीत. मानव आणि विश्वसृष्टीचा उल्लेख असला तरी भौतिकशास्त्राच्या पद्धतीने ते सांगितलेले नाही. वाचक पाहतो की या ग्रंथात संस्कृती, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावरील संवाद असला तरी जीवनशास्त्राच्या शैलीत तो सांगितलेला नाही. त्यात कायद्यात्मक नियम आणि आज्ञा सांगितलेल्या असल्या तरी कायदे रचणाऱ्यांच्या पद्धतीशी त्या पूर्णपणे विभिन्न आहेत. त्यात नैतिक शिकवण सांगितली आहे तरी तिची शैली नैतिकशास्त्राच्या सबंध वाङ्मयापेक्षा वेगळ्या स्वरूपाची आहे. अशा सर्व गोष्टी पुस्तकासंबंधीच्या आपल्या पूर्वीच्या कल्पनेच्या अगदी विरूद्ध असल्याचे पाहून मनुष्य गोंधळात सापडतो. त्याला असे वाटू लागते की हे तर एक असंपादित, असमन्वयीत आणि विस्कळीत स्वरूपाचे साहित्य आहे. त्यात प्रारंभापासून ते शेवटपर्यंत असंख्य लहानमोठ्या विविध प्रकारच्या पुâटकळ स्वरूपाच्या लेखांचा समावेश केलेला आहे. तथापि निरंतर मजकुराच्या स्वरूपात ते सर्व लिहिलेले आहेत. विरोधात्मक दृष्टिकोनातून पाहणारा याच आधारावर अनेक प्रकारचे आक्षेप घेऊ लागतो. त्याच्याशी अनुकूल दृष्टिकोन बाळगणारा कधी तर अर्थाकडे डोळेझांक करून आपल्या शंकांना बगल देण्याचा प्रयत्न करतो, तर कधी सदरहू विस्कळीतपणाचा सोयीस्कर अर्थ लावून आपल्या मनाची समजूत घालू लागतो. कधी तो अस्वाभाविक पद्धतीने त्यांच्यातील समन्वय शोधून विचित्र प्रकारचे निष्कर्ष काढतो. तर अनुकूल दृष्टिकोन बाळगणारा हा वाचक कधी कुरआन म्हणजे पुâटकळ लेखांचा संग्रह, असे मत स्वीकारतो. त्यामुळे त्यातील प्रत्येक ‘आयत’ तिच्या मागील व पुढील संदर्भापासून वेगळी होऊन अर्थाचे अनर्थ करण्याचे लक्ष्यस्थान बनते व तसले सर्व अर्थ मूळ सांगणाऱ्याच्या पूर्णपणे हेतूविरूद्ध असतात.

माणसाच्या आर्थिक व्यवहाराला न्याय व सचोटीवर कायम ठेवण्यासाठी इस्लामने काही तत्वे व काही मर्यादा ठरविलेल्या आहेत. संपत्तीचे उत्पादन, तिचा विनियोग व तिचे चलन यांची सारी व्यवस्था या तत्वांद्वारे व याच मर्यादेत झाली पाहिजे. संपत्तीच्या उत्पादनाच्या पद्धती आणि तिच्या चलनाचे स्वरूप काय असावे यासंबंधी इस्लामचा काही आग्रह नाही. या गोष्टी तर निरनिराळ्या काळात संस्कृतीच्या विकासाबरोबरच बनत व बदलत असतात. परिस्थिती व गरजेनुसार त्यांची निश्चिती आपोआप होत असचे. इस्लाम यासंबंधी फक्त ही गोष्ट इच्छितो की सर्व काळात व सर्व परिस्थितीत माणसाच्या आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काही का असेना, ही तत्वे सतत कायम राहावीत आणि या मर्यादांचे पालन केले जावे.
इस्लामचा दृष्टिकोन हा आहे की ही पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू अल्लाहने मानव जातीसाठी बनविल्या आहेत आणि प्रत्येक माणसाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे की त्याने पृथ्वीपासून आपली उपजीविका प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. या हक्कांत सर्व मानव समान भागीदार आहेत. कोणासही या हक्कापासून वंचित केले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत एकास दुसऱ्यावर प्राधान्य दिले जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती वंश किंवा वर्गावर शरियतीनुसार असा कोणताही प्रतिबंध केला जाऊ शकत नाही की तो उपजीविकेच्या साधनापैकी काही साधने अवलंबण्याचा हकदार नाही अथवा काही धंद्याची दारे त्याच्यासाठी बंद आहेत. त्याचप्रमाणे शरियतनुसार असा भेदभावही केला जाऊ शकत नाही की एखादे अर्थार्जनाचे किंवा उपजीविकेचे साधन ठराविक वर्ग, वंश वा घराण्याची मिरासदारी बनून राहावे. अल्लाहच्या जमिनीवर त्याने निर्माण केलेल्या उपजीविकेच्या साधनांमधून आपला हिस्सा प्राप्त करण्याचा सर्व मानवांना समान हक्क आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची संधी सर्वांना सारखी मिळाली पाहिजे.
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या सर्व देणग्या जर उपयुक्त बनविण्यामध्ये वा तयार करण्यामध्ये कोणाच्या मेहनतीचा वा कुशलतेचा संबंध नसेल तर त्या सर्वांसाठी मुक्त आहेत. प्रत्येक माणसाला हा हक्क आहे की त्याने आपल्या गरजेनुसार त्यांचा वापर करावा. नद्या, विहिरी व झऱ्यांचे पाणी, जंगलातील लाकूड, नैसर्गिक झाडांची फळे, आपोआप येणारे गवत व चारा हवा व पाणी, जंगलातील जनावरे, जमिनीच्या पुष्ठभागावर निघालेल्या खाणी- अशाप्रकारच्या वस्तूवर न कोणाची मिरासदारी कायम होऊ शकते न त्यांच्यावर असा प्रतिबंध लावला जाऊ शकतो की, ईश्वराच्या प्रजेने काही दिल्याशिवाय त्याचा उपयोग घेऊ नये. पण जे लोक व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर करू इच्छित असतील तर त्यांच्यावर कर बसविता येईल.
अल्लाहने माणसाच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी बनविल्या आहेत त्यांना ताब्यात घेऊन निष्कारण साठवून ठेवणे बेकायदेशीर. एक तर त्याचा स्वत: लाभ घ्या नाहीपेक्षा त्या सोडून द्या. म्हणजे निदान इतर लोक तरी त्याचा फायदा घेतील. याच तत्वांधारे कायदा हा निर्णय देतो की तीन वर्षांपेक्षा अधिक कालापर्यंत तुम्ही तुमची जमीन पडीक ठेवू शकत नाही. तिचा उपयोग शेतीसाठी, इमारतीसाठी व दुसऱ्या इतर कोणत्याही कामासाठी न कराल तर तीन वर्षानंतर ती जमीन तुम्ही सोडून दिलेली जमीन समजली जाईल आणि दुसरा कोणी तिचा वापर केला तर त्याविरूद्ध दावा चालणार नाही आणि इस्लामी शासनाला ही जमीन दुसऱ्या कोणासही देण्याचा अधिकार राहील.
जो माणूस प्रत्यक्षरीत्या निसर्गाच्या खजिन्यामधून एखादी वस्तू घेईल आणि आपल्या कष्टाने व कौशल्याने त्या वस्तूला उपयुक्त बनवील तर तो अशा वस्तूचा धनी आहे. उदा. एखादी पडीक जमीन जिच्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही, ताब्यात घेऊन तिचा एखाद्या चांगल्या कामासाठी वापर केला तर अशा जमिनीवरून त्याला हकलले जाऊ शकत नाही. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामधील सर्व मालकी हक्काची सुरुवात अशाचप्रकारे झालेली आहे. सुरूवातीला जेव्हा जमिनीवर माणसाची वस्ती होऊ लागली तेव्हा सर्व वस्तू सर्वांच्यासाठी खुल्या होत्या. नंतर जेव्हा एखाद्याने एखाद्या खुल्या वस्तूला ताब्यात घेऊन तिला उपयुक्त बनविले तेव्हा तो तिचा मालक झाला म्हणजे त्याला हा हक्क प्राप्त झाला की त्याचा वापर त्याने निव्वळ स्वत:साठी करावा आणि इतर तिचा वापर करू इच्छित असतील तर त्यांचेकडून त्याने मोबदला घ्यावा. ही गोष्ट माणसाच्या साऱ्या आर्थिक व्यवहाराची स्वाभाविक अशी आधारशीला आहे आणि या आधारशीलेला आपल्या स्थानी कायम ठेवले पाहिजे. योग्य वैधानिक पद्धतीने जगामध्ये एखाद्याला जे मालकी हक्क प्राप्त होतात ते आदरास पात्र आहेत. प्रश्न होऊ शकतो तो फक्त या बाबतीत होऊ शकतो की एखादी मालकी वैधानिकरित्या योग्य आहे किंवा नाही? जी मालकी वैधानिकदृष्ट्या अनुचित असेल तिला नि:संशय रद्द केले गेले पाहिजे परंतु ती मालकी वैधानिकरीत्या योग्य व उचित असेल, तिला ताब्यात घेण्याचा किंवा त्यांच्या मालकांच्या वैधानिक हक्कांमध्ये कमीजास्त करण्याचा कोणत्याही शासनास किंवा कोणत्याही विधीमंडळास हक्क नाही. सार्वजनिक हिताचे नाव घेऊन एखादी अशी व्यवस्था प्रस्थापित केली जाऊ शकत नाही जी शरियतने दिलेल्या हक्कांना पायदळी तुडवते, समाजाच्या फायद्यासाठी व्यक्तीच्या मालकीवर जे प्रतिबंध शरियतने स्वत:च लावलेले आहेत त्यामध्ये कमी करणे हा जितका मोठा अत्याचार आहे तितकाच मोठा अत्याचार त्याच्यामध्ये वाढ करणे हा आहे. इस्लामी शासनाच्या कर्तव्यामध्ये हे आहे की त्याने व्यक्तीच्या वैधानिक हक्कांचे संरक्षण करावे आणि त्याच्याकडून समाजाचे ते हक्क प्राप्त करावेत ज्यांची जबाबदारी शरियतने त्यांच्यावर टाकलेली आहे.
अल्लाहने आपल्या देणग्यांच्या विभागणीमध्ये समानता अवलंबिलेली नाही परंतु बुद्धिमत्तेच्या आधारावर काही माणसांना दुसऱ्या काही माणसांच्यावर प्राधान्य दिलेले आहे. सौदर्य, चांगला आवाज, आरोग्य शारीरिक सामथ्र्य, बौद्धिक पात्रता, जन्मजात परिस्थिती आणि अशाचप्रकारच्या इतर गोष्टी साऱ्या माणसांना सारख्या लाभत नसतात. असाच प्रकार उपजीविकेचासुद्धा आहे. अल्लाहने बनविलेल्या प्रकृतीची ही निकड आहे की माणसांच्यामध्ये उपजीविकेबाबतीत फरक असावा आणि म्हणून त्या सर्व उपाययोजना इस्लामी दृष्टिकोनानुसार उद्दिष्ट व सिद्धान्त या दोहोबाबतीत चुकीच्या आहेत. या माणसामध्ये एक कृत्रिम समानता प्रस्थापित करण्यासाठी अवलंबिल्या जातात. इस्लाम जी समानता इच्छितो ती आजीविकेची समानता नव्हे तर आजीविका प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी. तो इच्छितो की समाजामध्ये असा कायद्यांचे वा रूढींचे बंधन असू नये ज्यांच्या आधारावर एखादा माणूस आपली शक्ती व सामथ्र्यानुसार आर्थिक प्रयत्न करू शकत नाही आणि असा भेदभावही कायम राहू नये जो काही वर्गांना वांशिक आणि कौटुंबिक जन्मजात सुदैवाला कायमच्या कायदेशीर संरक्षणामध्ये बदलतो. या दोन्हीही पद्धती नैसर्गिक असमानतेच्या जागी जबरदस्तीने एक कृत्रिम समानता प्रस्थापित करतात आणि म्हणून इस्लाम त्यांना मिटवून समाजाच्या आर्थिक व्यवस्थेला अशा स्वाभाविक स्थितीवर आणून सोडू इच्छितो ज्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रयत्नांची दारे खुली असतील. पण जे लोक इच्छितात की प्रयत्नांची साधने व परिणाम या बाबतीतदेखील सर्व लोकांना सक्तीने सारखे केले जावे, त्यांच्याशी इस्लाम सहमत नाही कारण ते स्वाभाविक असमानतेला कृत्रिम समानतेमध्ये बदलू इच्छितात. मानवी स्वभावाशी तीच व्यवस्था अधिक जवळची होऊ शकते ज्यामध्ये प्रत्येकजण आजीविकेच्या मैदानात आपल्या प्रयत्नांची सुरवात त्याच स्थानावरून आणि त्याच स्थितीमध्ये करील ज्यामध्ये अल्लाहने त्याला जन्मास घातले आहे. जो मोटार घेऊन आलेला आहे तो मोटारमधून जाईल. जो फक्त दोन पाय घेऊन आलेला आहे तो पायीच जाईल आणि जो लंगडा जन्मलेला आहे तो लंगडतच चालावयास सुरवात करील. समाजाचा कायदा ना असा झाला पाहिजे की मोटारवाल्याची मोटारीची कायमची मिरासदारी व्हावी आणि लंगडयासाठी मोटार प्राप्त करणे दुरापास्त व्हावे आणि ना तो असा असावा की सर्वांची दौड सक्तीने एका स्थानावरून व एका स्थितीत सुरू व्हावी आणि पुढे पावेतो त्यांना अनिवार्यपणे एक दुसऱ्याबरोबर जखडूनच जावे लागेल. याउलट कायदा असा असला पाहिजे की ज्यामध्ये या गोष्टीची उघड शक्यता असावी की ज्याने आपली दौड लंगडत सुरू केली होती तो आपल्या प्रयत्नाने व पात्रतेने मोटार मिळवू शकत असेल तर त्याला ती जरूर मिळावी आणि जो सुरूवातीस मोटारीमधून चालला होता तो नंतर आपल्या अपात्रतेमुळे लंगडा होऊन राहील तर राहील.
इस्लाम फक्त इतकेच इच्छित नाही की सामूहिक जीवनामध्ये ही आर्थिक संघर्ष खुली व निरंकुश असावा तर तो हेही इच्छितो की या मैदानामध्ये संघर्ष करणारे एक-दुसऱ्या बरोबर निर्दय व निष्ठुर असू नयेत. त्यांनी एक दुसऱ्याबरोबर सहानुभूती बाळगावी व एक दुसऱ्याचे साहाय्य करावे. तो एकीकडे आपल्या नैतिक शिकवणीने लोकांमध्ये ही विचारसरणी निर्माण करतो की आपल्या निराधार व लाचार बांधवांना आसरा द्यावा तर दुसरीकडे त्याची निकड ही आहे की समाजामध्ये कायम स्वरूपाची अशी एक संस्था असावी जी समर्थ व निराधार लोकांचे आश्रयस्थान राहील, जे लोक आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास असमर्थ असतील ते या संस्थेचा फायदा घेतील. जे लोक काळाच्या दुर्घटनेमुळे या स्पर्धेत पडतील त्यांना या संस्थेने उठवून पुन्हा चालण्यास समर्थ केले पाहिजे आणि ज्या लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आधाराची गरज असेल त्यांना या संस्थेकडून आधार मिळावा. या उद्दिष्टासाठी इस्लामने कायद्याने हे ठरविले आहे की देशातील सर्व एकत्रित मिळकतीवर वार्षिक अडीच टक्के आणि याचप्रकारे साऱ्या व्यापारी भांडवलावरसुद्धा वार्षिक अडीच टक्के जकात वसूल केला जावा. साऱ्या पिकाऊ शेतीच्या पिकावर दहा टक्के किंवा पाच टक्के हिस्सा घेतला जावा. गुराढोरांच्या एका विशिष्ट संख्येवर ठराविक प्रमाणात वार्षिक जकात घेतली जावी आणि ही सर्व धनदौलत गरीब, अनाथ आणि गरजवंताच्या साहाय्यासाठी वापरली जावी. हा एक असा सार्वजनिक विमा आहे ज्याच्या उपस्थितीत इस्लामी समाजामध्ये कोणीही व्यक्ती जीवनासाठी अत्यावश्यक अशा गरजांच्या बाबतीत कधीही वंचित राहू शकत नाही कोणी कष्ट करणारी व्यक्ती कधी इतकी विवश होऊ शकत नाही की उपासमारीच्या भयाने नोकरीच्या त्या अटी मंजूर करील ज्या कारखानदार व जामिनदार घालू इच्छित असेल. कोणत्याही व्यक्तीची शक्ती किमान पातळीच्या खाली येऊ शकत नाही जी आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक आहे.
व्यक्ती आणि समाजामध्ये इस्लाम असा समन्वय प्रस्थापित करू इच्छितो की ज्यामध्ये व्यक्तीचे आणि तिचे स्वातंÍय अबाधित राहावे आणि सार्वजनिक हितासाठी त्यांचे स्वतंÍय हानीकारक न ठरता ते एकमेकांना पूरक ठरावेत. इस्लाम अशा कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक संघटनेला पसंत करत नाही जी व्यक्तिला समाजामध्ये मिसळवून टाकते आणि तिच्यासाठी ती स्वतंत्रता ठेवीत नाही जी तिच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहे. एखाद्या देशाच्या उत्पादनाच्या सर्व साधनांचे राष्ट्रीयीकरण करणे याचा अनिवार्य परिणाम हा होतो की देशातील सर्वजण समाजाच्या तावडीत सापडतात अशा स्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संरक्षण करणे व ते कायम राखणे अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्य आहे. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे राजकीय व सामाजिक स्वातंÍय आवश्यक आहे त्याप्रमाणे आर्थिक स्वातंÍयही फार मोठ्या मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. आम्ही जर व्यक्तित्वाचे अगदी समूळ उच्चाटन करू इच्छित नसलो तर आमच्या सार्वजनिक जीवनात इतकी मोकळीक अवश्य असली पाहिजे की अल्लाहच्या कोणाही दासाला आपली आजीविका स्वतंत्रपणे प्राप्त करून आपल्या सद्‌सद्‌विवेक बुद्धीला स्थिर राखता आले पाहिजे आणि आपल्या मानसिक व नैतिक शक्ती¨चा आपल्या प्रवृत्तीनुसार विकास घडवून आणता आला पाहिजे. ठराविक प्रमाणात दिले जाणारे अन्न जरी ते भरपूर असले तरी जर त्याच्या किल्ल्या दुसऱ्याच्या हाती असतील तर ते अन्न उचित नाही कारण त्यामुळे उÈाणाला जी गवसणी बसते त्याची भरपाई शारीरिक लÇपणा कधीही करू शकत नाही.

- शेख मुहम्मद करकुन्नू

भाषांतर
- एल. पुणेकर

माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नातेसंबंध यांचादेखील विचार करीत नाही. त्यांना असे वाटते की आपल्यामुळे जगातील आनंदाचा क्षण आपल्या या लोकांना मिळाला हा आपण केवढा मोठा त्याग केला. हे सर्व कशामुळे घडते तर आपण आपली नम्रता, दया, माणुसकी हे गुण हरवले आहेत, ज्या गुणामुळे जगण्यातला खरा आनंद मिळतो.
आजच्या आधुनिक भांडवलशाहीतून टाळता न आलेले हे अयोग्य बदल असून ते आमच्या संस्कृतीस हानिकारक आहेत. विशेष म्हणजे प्रसारमाध्यमातून (टी.व्ही., इंटरनेट इ.) याचा झपाट्याने प्रसार होत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 193      पृष्ठे - 48    मूल्य - 22           आवृत्ती - 3 (January 2016)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/ik1wsonnc58y1oo1q9ubv4c1b7oq3j3k

जेव्हा-जेव्हा लाज शरमेच्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा-तेव्हा लोकांच्या मनामध्ये फक्त महिलांचाच विचार येतो. मात्र इस्लाममध्ये लज्जेच्या बाबतीत  स्त्री-पुरूष असा भेद केलेला नाही. दोघांनाही समान आदेश देण्यात आलेला आहे. उलट पहिला आदेश पुरूषांसाठी अवतरित झालेला आहे. त्यांना सभ्य वस्त्र परिधान करण्याचा, आपल्या नजरा परस्त्रीवर पडणार नाहीत याची काळजी घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आजही अरबस्थानामधील पुरूष जे कपडे परिधान करतात त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिले असता ते बुरख्यासारखेच असतात. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, स्त्री-पुरूषांमध्ये कपड्यांवरून कुठलाही भेदभाव केला गेलेला नाही. हे जरी खरे असले की महिलांना लाज, लज्जेची देणगी ही निसर्गदत्त मिळालेली आहे. त्यामुळे त्या अधिक लज्जावान व शिलवंत असतात. परंतु अलिकडच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या नावाखाली जे काही दाखवले जात आहे त्यातून प्रेरणा घेऊन मोठ्या संख्येने महिला असा पोशाख आणि वर्तन करू लागलेल्या आहेत की, ज्यामुळे पुरूष त्यांच्याकडे आकर्षित होतील. काही महिलांनी तर लाज-लज्जेचा इतका त्याग केलेला आहे की त्यांच्याकडे पाहून सैतानलाही लज्जा येईल. या सर्व खुल्या वातावरणाचा परिणाम दिवसेंदिवस वाढणार्‍या महिलांवरील अत्याचार विशेषत: बलात्काराच्या घटनांच्या स्वरूपात पुढे येत आहेत. पुरूषांवरील चांगले संस्कार हे दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे ते सुद्धा पशुतुल्य वागत आहेत.
    समाज माध्यमावर आजकाल अनेक पुरूष महिलांच्या बाबतीत अशा पद्धतीने आपले विचार व्यक्त करतात जणू त्यांच्या कुटुंबामध्ये एकही महिला नाही. अनेक पुरूष असे आहेत जे महिलांना अश्‍लिल विनोद, फोटो, क्लिप्स पाठवून देतात. यासंबंधी अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत. अनेक महिला आपल्या स्वाभाविक लज्जाशील स्वभावामुळे या संदर्भात तक्रार करत नाहीत. मात्र त्यांच्या मनाला झालेल्या जखमा इतक्या खोल असतात की त्यांच्या तोंडातून अशा पुरूषांसाठी शापवाणी सुद्धा निघते.
    याच प्रमाणे अलिकडच्या काळात काही स्त्रियांनी सुद्धा आपली स्वाभाविक लज्जा सोडलेली आहे. अश्‍लिलतेमध्ये त्यांनी सैतानालासुद्धा मात दिलेली आहे. कधी-कधी तर अश्‍लिलतेमध्ये लिप्त असलेल्या या महिलांकडे पाहून असे वाटते की, सैतानसुद्धा त्यांच्याकडे पाहून आश्‍चर्यचकित होऊन स्वत:शीच मनात म्हणत असेल की, ”मी तर यांना एवढी नीचता शिकविलेली नव्हती या तर माझ्या विचारांच्याही पलिकडे गेलेल्या आहेत.”
    बलात्कारांच्या ज्या घृणास्पद आणि भयानक घटना अलिकडे घडत आहेत त्या संदर्भातल्या बातम्या वाचून महिलांच्या मनाचा थरकाप उडतो. अनेक महिलांना कदाचित माझे हे विचार प्रतिगामी वाटतील. परंतु महिलांचे तोकडे आणि तंग कपडे हे सुद्धा पुरूषांच्या भावना चाळविण्यासाठी एक कारण आहेत, हे अनेकवेळा घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांधून सिद्ध झालेले आहे. अशा कपड्यातील महिलांना पाहून इतर महिलांनाच लाज वाटावी, अशी एकंदरित परिस्थिती आहे. आश्‍चर्य म्हणजे पुरूष हे अंगभर कपडे घालून समाजात वावरत असतांना त्यांच्यासोबत वावरणार्‍या महिला मात्र तोकड्या कपड्यात असतात, यापेक्षा मोठे आश्‍चर्य ते कोणते? अशा महिलांचे म्हणणे असे आहे की, माय बॉडी माय चॉईस. मी माझ्या इच्छेप्रमाणे कपडे घालेन. कुणालाही मी कपडे कसे घालावेत, हे सांगण्याचा अधिकार नाही. पुरूषांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावं. त्यांनी याबाबतीत आम्हाला काही शिकवू नये. असे ज्यांचे विचार आहेत त्या भगिनींना मी एक प्रश्‍न विचारू इच्छिते की तुम्ही जे तोकडे आणि तंग कपडे घालता त्या पाठीमागे तुमचा उद्देश्य काय असतो? निश्‍चितपणे मनुष्यप्राणी कोणतेही काम उद्देशाशिवाय करत नाही. मग हे तोकडे कपडे घालण्यामागे तुमचा कोणता उद्देश आहे?
    दूसरा महत्त्वाचा प्रश्‍न असा की, आज समाज माध्यमांवर उदा. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर संकेत स्थळांवर महिला सुंदर पोज घेऊन आपले फोटो टाकत असतात. त्या फोटोखाली जे हजारो कॉमेंट्स येतात त्यात मोठ्या प्रमाणात परपुरूष असतात आणि ते ’ब्युटीफुल’, ’हॉट’ आणि यापेक्षा जास्त येथे नमूद न करण्यासारखे कॉमेंटस् करतात. त्या वाचून असे फोटो टाकणार्‍या महिला आनंदीत होतात की नाही? अनेक महिला तर त्या कॉमेंटस्वर धन्यवादच्या प्रतीकॉमेंटस् सुद्धा टाकतात. हे कशाचे द्योतक आहे? अशा महिलांना स्वत:च्या इब्रतीची थोडी तरी काळजी वाटत असावी काय? आपल्या तोकड्या कपड्यावरील फोटोंवर परपुरूषांनी केलेल्या आक्षेपार्ह कॉमेंट वाचून ज्या महिलांना आनंद होतो त्यांच्या बुद्धीची जेवढी कीव करावी तेवढी कमी. आणि अशा कॉमेंटस् करणार्‍या पुरूषांच्या बुद्धीचीही कीव करावी तेवढी कमी. असे वाटते की त्यांच्या घरच्या महिलाच नसाव्यात. ज्यांच्या घरी महिला आहेत त्यांच्यावर परपुरूषांनी अशा कॉमेंट केल्या तर त्यांना वाईट कसे वाटत नाही. याचेच नवल वाटते. या गोष्टी कायदा करून थांबविता येण्यासारख्या नाहीत. यांना थांबविण्यासाठी स्वयंशिस्तीशिवाय दूसरा उपाय नाही असे माझे स्पष्ट मत आहे. दुर्दैवाने असे फोटो आणि असे कॉमेंटस् टाकणार्‍या आणि त्यावर आक्षेपार्ह कॉमेंटस् करण्यामध्ये कमी प्रमाणात का असेना अनेक मुस्लिम स्त्री पुरूषांचाही सहभाग आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ” प्रत्येक धर्माचे एक वैशिष्टये असते आणि इस्लामचे वैशिष्ट्ये लज्जा आहे” (संदर्भ : सनन इब्ने माजा हदीस क्र. 4181) ही हदीस फक्त महिलांसाठी नाही तर ती महिला आणि पुरूष दोघांसाठी आहे. स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. हे अत्यंत लज्जाशील पुरूष होते. ही हदीस अतिशय लोकप्रिय अशी हदीस आहे. शिवाय, कुरआनमध्ये स्त्री- पुरूषांना समाजामध्ये कसे वावरावे या संबंधीची जी आचारसंहिता दिलेली आहे ती सर्व विदित आहे. असे असतांना आपले अर्धनग्न फोटो समाजमाध्यमांवर टाकणार्‍या मुस्लिम महिला आणि त्यावर कॉमेंट करणारे मुस्लिम पुरूष हे इस्लामचे नव्हे तर सैतानाचे प्रतिनिधीत्व करतात, असे माझे ठाम मत आहे. त्यांची धार्मिक शिक्षा एकतर झाली नसावी किंवा ती व्यवस्थित झाली नसावी किंवा त्यांच्या मानसिकतेवर सैतानाने ताबा मिळविलेला असावा. याशिवाय, अशा गोष्टी घडनेच शक्य नाही. इस्लाम फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीसाठी सभ्यतेचा धडा देतो. स्त्री पुरूषांनी समाजामध्ये वावरताना एकमेकांचा सम्मान करावा, फक्त एवढे सांगून इस्लाम थांबत नाही तर तो कसा करावा? याचे सविस्तर मार्गदर्शनही कुरआनमधून करतो.
    प्रत्येक श्रद्धावान मुस्लिम व्यक्तीचा हा विश्‍वास आहे की, ”अल्लाह सर्व काही पाहत आहे” निर्विवादपणे ही आचारसंहिता आणि अल्लाह विषयीची ही भावना की तो सर्वकाही पाहत आहे, माणसाला वाममार्गाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पुरेशी आहे. हेच खरे मुस्लिम असण्याचे चिन्ह आहे. ज्या मुस्लिमांचे ईमान (श्रद्धा) जेवढे मुस्तहेकम (मजबूत) तेवढे ते वाममार्गापासून दूर राहू शकतात. मग ते स्त्री असो का पुरूष. आज मुस्लिमांमध्ये लज्जा आणि सभ्यता निर्माण करण्यासाठी कुठला वेगळा कायदा करण्याची किंवा वेगळे सामाजिक आंदोलन सुरू करण्याची आवश्यकता नाही. या सर्व गोष्टी कुरआन आणि हदीसमध्ये 1441 वर्षापूर्वी नमूद केलेल्या आहेत. गरज फक्त त्यांना समजून आचरणामध्ये आणण्याची आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करते की, सर्व मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वांनाच अल्लाहने दिलेली ही स्त्री-पुरूष वर्तणुकीची आचारसंहिता समजण्याची व त्यानुसार सभ्य आचरण करण्याची समज आणि शक्ती देवो आमीन.

- फेरोजा तस्बीह

जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा

नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
आज मुस्लिम महिला आपल्या परंपरांना तोडून ज्या शक्तीने एकत्र होऊन क्रांती घडविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर येत आहेत हे पाहता असे लक्षात येते की याद्वारे मुस्लिम स्त्रिया  खूप मोठा बदल घडवून आणित आहेत. परंतु मुस्लिम स्त्रियांनी अशा प्रकारे क्रांती आताच घडविली नाही तर आजपासून १४५० वर्षापूर्वीच त्यांनी या क्रांतीची सुरूवात केली आहे, ८ मार्च  रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. साहिबा खान यांनी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम अंजुमन पॉलिटेक्निक  सभागृहामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाचा विषय होता ‘क्रांतीची मूर्ती आहे स्त्री’. डॉ. साहिबा खान पुढे म्हणाल्या की पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या काळात महिला सफल उद्योजक,  प्रख्यात पंडित, विचारवंत होत्या. आज आम्ही बाहेर आलो आहोत तर स्वत:साठी नाही, तर आपल्या देशाला आणि संविधानाला वाचविण्यासाठी. लोकांच्या घृणेचा सामना आम्ही  आमच्या देशात करीत आहोत, हे आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे. आम्हाला बुरख्यामध्ये पाहून लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात. अशा वेळी आमच्या मुलींना परीक्षा केंद्रावर संशयाच्या दृष्टीने पहिला जाते. आमच्या तरुण पिढीला लोकांनसमोर मारले जाते. आमची संपत्ती, आमची घरे हे सर्व आगीत भस्म करून टाकल्या जाते. ते म्हणतात की  आम्हाला आर्थिक व शारीरिकरित्या सक्षम केल्या जात आहे, पण आज आम्ही जागृत होऊन घराबाहेर आलो आहोत. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही. आम्ही मरण पत्करू, नष्ट  होऊ मात्र आम्ही आपल्या मातृभूमीला सोडून कुठेही जाणार नाही.
अरूणा सबाने यांनी सांगितले की जसे स्वातंत्र्य पुरुष मंडळी व मुलांना आहे तसे स्त्रियांना आणि मुलींना नाही. घरी आणि बाहेर सर्वत्र मुली व स्त्रिया अत्याचार सहन करीत आहेत.  स्त्रियांनी शक्तिशाली बनणे गरजेचे आहे. आम्ही मुलांना अशी शिकवण दिली पाहिजे की ज्यामुळे त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. पत्नीवर पतीच्या अत्याचारात वाढ होत आहे.  स्त्रियांना माहीत आहे की त्यांनी आपला भाऊ, वडील आणि पतीचा किती सन्मान केला पाहिजे, ती सर्वांचा सन्मान करते, तरीसुद्धा त्यांच्यावर होणारा अत्याचार थांबत नाही.
छाया खोबरागडे यांनी ‘नारी शक्ती विकसित समाज’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, आजपर्यंत आम्ही असे समजत होतो की मुस्लिम महिला खूप भित्र्या आहे.  फक्त आपल्या घरातच त्या राहतात. त्यांना डांबून ठेवण्यात येते. परंतु आज मुस्लिम स्त्रियांनी हे सिद्ध केले आहे की असे अजिबात नाही. आज शाहीन बागच नव्हे तर संपूर्ण भारत  देशात त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आज गरज आहे की आम्ही सर्वांनी मिळून समोर आले पाहिजे. आम्हाला संविधानाच्या आधारावर भारताला विकसित करायचे आहे. आम्ही काळ्या  कायद्याचा जोरदार विरोध करीत आहोत.
जेबा खान यांनी ‘नारी शक्ती की उड़ान कितना पैâला आसमान’ या विषयावर मत व्यक्त करताना म्हटले की हजरत मरियम अलैहिस्सलाम या अत्यंत निसर्गसेविका होत्या. बीबी  हाजरा यांनी खाना ए काबाच्या निर्मितीत आपले अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. सहाबियात रजि. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या संरक्षणार्थ आपल्या जीवांची पर्वा करीत नव्हत्या.  राहिला कौसर यांनी म्हटले की स्त्री ही कुटुंबांची मुख्य सदस्य असते. ती महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था सांभाळणारी अर्थतज्ज्ञ असते. बजेट लक्षात घेत आपले घर व्यवस्थितरित्या चालवीत  असते. देशात मुस्लिम महिलांनी संविधान वाचविण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितत काळ्या कायद्याच्या विरोधात लक्षावधी शाहीनबाग बनवून आपल्या पराक्रमाची छाप सोडली  आहे. आपली छबी समाजासमोर प्रकट केली आहे.
सना यास्मीन यांनी ‘वर्तमान परिस्थितीत मुस्लिम मुलींची भूमिका’ या विषयावरील आपल्या भाषणात मुलींचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. जी आई ओ द्वारे  मुलींचे चारित्र्य निर्माण, त्यांचे व्यक्तित्व साकारणे, त्यांना स्वत्वाची जाणीव करून देणे, त्यांना उच्च शिक्षणातसुद्धा बुरखा परिधान करण्याचे प्रोत्साहन मिळते. प्रज्वला तत्ते आणि  जुल्फी शेख यांना ‘शाहीनबाग पारितोषिक’ देण्यात आले. शाहीन नावाचा एक पक्षी आहे जो शायर अल्लामा इकबाल यांच्या साहित्यातील नायक आहे. हा पक्षी खूप उंच भरारी घेतो.  तो  कुणी मारलेली शिकार खात नाही. तो स्वत: आपली शिकार करतो. जीवनाच्या शेवटच्या वेळी तो बसून खातो. तिथे त्याची नखे आणि त्याची त्वचा निघून पडते, तत्पश्चात त्याचे  विचार व नखे त्याला पूणर्जाrवित करतात आणि तो पुन्हा उंच भरारी घेतो.
तत्पश्चात स्त्रीत्व आणि मानवतावाद या विषयावर वाद-विवाद ठेवण्यात आला. प्रज्वला तत्ते, सुनिता जिचकार, सरोज आगलवे, रुमाना कौसर, डॉ साहिबा खान यांनी या वाद-विवादात  भाग घेतला. संपूर्ण शहरात तीन दिवसीय महिला दिनावर कार्यक्रम घेण्यात आले. या वादविवादाचे सूत्र संचालन बेनजीर खान यांनी केले. इरफाना कुलसुम यांनी जमाअत ए इस्लामी  हिंद नागपूरच्या कार्याचा आढावा घातला तर राहिला कौसर यांनी मुस्लिम मुलींच्या संघटनेचा परिचय करून दिला. पवित्र कुरआनमधील सूरह अहजाबच्या ३५व्या ओळीच्या पठणाने  मध्यवर्ती स्थानिक अध्यक्षा जाहिदा अंसारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. आभार प्रदर्शन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा शबनम परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा  सहभाग होता. मंच संचालन सुमय्या खान यांनी केले.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याचे कर्म समाप्त होतात, परंतु तीन प्रकारचे कर्म असे आहेत   ज्यांचे पुण्य मृत्यूनंतरही मिळत राहते. एक त्याने ‘सदक-ए-जारिया’ केला असेल अथवा असे ज्ञान मागे सोडले असावे ज्यामुळे लोकांना लाभ व्हावा तिसरे कर्म म्हणजे त्याच्याकरिता  ‘दुआ’ (प्रार्थना) करीत राहणारा सदाचारी पुत्र.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
‘सदक-ए-जारिया’ म्हणजे असे दान ज्याद्वारे अधिक काळपर्यंत लाभ घेतला जावा. जसे- कालवा खोदण्यात यावा अथवा विहीर खोदली जावी अथवा प्रवाशांकरिता पथिकाश्रम बनविले  जावे अथवा रस्त्याच्या कडेला झाडे लावली जावीत अथवा काही धार्मिक मदरसांमध्ये पुस्तके दान दिली जावीत वगैरे. म्हणजे जोपर्यंत त्या कर्मापासून लोक लाभ घेत राहतील पुण्य  मिळत राहील. अशाप्रकारे त्याने एखाद्याचे अध्यापन केले असेल अथवा धार्मिक पुस्तके लिहिली असतील तर त्याचे पुण्यदेखील त्याला मिळत राहील. निरंतर पुण्य मिळत राहील असे  तिसरे कर्म म्हणजे त्याचा पुत्र, ज्याला त्याने सुरूवातीपासूनच उत्तम शिक्षण-प्रशिक्षण दिले असेल आणि या प्रयत्नांच्या परिणामस्वरूप तो पुत्र सदाचारी आणि संयमी बनला आहे.  जोपर्यंत हा मुलगा जगात जिवंत राहील त्याच्या पुण्यकर्मांचे फळ त्याच्या पित्याला मिळत राहील आणि तो सदाचारी आहे म्हणून तो आपल्या आईवडिलांकरिता दुआ करील.

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने एखाद्या अनाथाला आपल्याबरोबर घेतले आणि त्याला जेवू घातले  तर निश्चितच अल्लाहने त्याच्याकरिता ‘जन्नत’ (नंदनवन) निश्चित केली. मात्र त्याने एखादा अक्षम्य गुन्हा केलेला नसावा. ज्या मनुष्याने तीन मुलींचे अथवा तीन बहिणींचे  पालनपोषण केले आणि त्यांना शिक्षणप्रशिक्षण दिले आणि त्यांच्याशी दयेने वागला, इतकेच काय अल्लाहने त्यांना बेपर्वा केले, तर अशा मनुष्यासाठी अल्लाहने ‘जन्नत’ निश्चित  केली.’’ यावर एका व्यक्तीने विचारले, ‘‘जर दोनच असतील तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘दोन मुलींच्या पालनपोषणासाठीदेखील हाच पुण्यफळ मिळेल.’’ इब्ने अब्बास म्हणतात, जर लोकांनी   एका मुलीच्या बाबतीत विचारले असते तरी पैगंबरांनी एकाच्या बाबतीतदेखील हीच शुभवार्ता दिली असती. पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘आणि ज्या मनुष्याला अल्लाहने त्याच्या दोन उत्तम  वस्तू घेतल्या तर त्याच्यासाठी ‘जन्नत’ निश्चित झाली.’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दोन उत्तम वस्तू कोणत्या आहेत?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे दोन्ही डोळे.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये सांगण्यात आलेली एक गोष्ट अशी की जर एखाद्याला मुलीच मुली असतील तर त्यांच्याशी वाईट वर्तन न करता त्यांचे पूर्णत: संगोपन केले पाहिजे. त्यांना धार्मिक व  नैतिक शिक्षण-प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांचे लग्न होईपर्यंत त्यांच्याशी करुणेने व प्रेमाने वागावे. जी व्यक्ती असे करेल त्याला पैगंबर मुहम्मद (स.) स्वर्गाची शुभवार्ता देतात.  अशाचप्रकारे एक भाऊ आहे. त्याला लहान-लहान बहिणी आहेत. त्यानेदेखील या बहिणींना आपल्यावर भार न समजता त्यांचा पूर्ण खर्च सहन केला पाहिजे आणि त्यांना शिक्षण- प्रशिक्षण व धार्मिक नीतीमत्तेच्या अलंकाराने सजविले पाहिजे आणि लग्न होईपर्यंत दया केली पाहिजे. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले, ‘‘ज्या मनुष्याच्या घरात एक मुलगी जन्माला आली आणि त्याने अज्ञानकाळातील पद्धतीने जिवंत दफन केले नाही आणि तिला तुच्छ लेखले नाही आणि मुलांना तिच्या  तुलनेत श्रेष्ठत्व दिले नाही, तेव्हा अल्लाह अशा लोकांना स्वर्गात दाखल करील.’’ (हदीस : अबू दाऊद)

Quran
कुरआन कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? कुरआनची अवतरणस्थिती आणि त्याची रचना कशा प्रकारची आहे? कुरआनात चर्चेचा विषय कोणता आहे? त्यातील एकूण संवाद कोणत्या उद्देशांसाठी आहेत? कुरआनातील असंख्य व विभिन्न प्रकारचे विषय कोणत्या मध्यवर्ती कल्पनेशी संलग्न आहेत? उद्दिष्टपूर्तीसाठी कुरआनात कोणती युक्तिवादशैली व वर्णनशैली अवलंबिलेली आहे? हे सर्व आणि अशाच प्रकारच्या इतरही काही आवश्यक प्रश्नांची उत्तरे प्रारंभीच सुस्पष्ट आणि सरळपद्धतीने मिळाली तर वाचक बराचसा धोक्यापासून वाचू शकतो. त्याच्यासाठी कुरआनच्या आकलनाचे व अध्ययनाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. मनुष्य जेव्हा कुरआनात लेखनात्मक रचना शोधू लागतो व तेथे ती न आढळल्यास तो ग्रंथाच्या पृष्ठांवर भरकटू लागतो. त्याचे गोंधळात येण्याचे खरे कारण हेच आहे की कुरआन वाचनासंबंधीची मौलिकता त्याला माहीत नसते. तो प्रारंभी कल्पना करून असतो की ‘धार्मिक विषयावरील एक ग्रंथ’ वाचण्यासाठी तो निघालेला आहे. ‘धार्मिक विषय’ आणि ‘ग्रंथ’ या दोन्ही गोष्टींसंबंधी त्याची कल्पनाही तीच असते जी सामान्यत: ‘धर्म’ आणि ‘ग्रंथा’संबंधी जनमनात आढळते. परंतु वाचकाला जेव्हा त्याच्या कल्पनेपेक्षा अगदी वेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते तेव्हा तो स्वत:ला समरस करून घेऊ शकत नाही. लेखनाचा हेतू त्याला न गवसल्यामुळे कुरआनच्या पृष्ठावरील ओळींमध्येच तो भरकटू लागतो जसा एखादा नवखा प्रवासी एखाद्या अपरिचित शहराच्या गल्लीबोळात हरवला जातो. अशा प्रकारच्या हरवण्यापासून तो वाचू शकतो जर त्याला अगोदरच कल्पना दिली गेली की जो ग्रंथ वाचण्यास तुम्ही निघाला आहात तो ग्रंथ सर्व जगाच्या साहित्यातील आपल्या शैलीचा एकमेव ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे संपादन व लेखन जगातील इतर सर्व ग्रंथांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारे झालेले आहे. आपला विषय व उद्देश, आपला संवाद व आपली रचना या दृष्टीनेदेखील तो ग्रंथ एक आगळीच वस्तू आहे. म्हणून आतापर्यंतच्या पुस्तकांच्या वाचनामुळे तुमच्या मनात जो पुस्तकी साचा तयार झालेला आहे तो साचा ‘कुरआन’ला समजण्यासाठी तुमच्या उपयोगी पडणार नाही. विंâबहुना तो साचा तर मार्गातील अडथळाच ठरेल. कुरआनाला समजण्याची इच्छा असेल तर वाचनसंबंधीच्या आपल्या पूर्वकल्पना प्रथम मनातून काढून टाकल्या पाहिजेत व मग कुरआनच्या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांशी परिचित झाले पाहिजे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget