Latest Post

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर ईमान (श्रद्धा,  विश्वास) बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय खुवैलिद बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पारलौकिक जीवनावर ईमान (श्रद्धा,  विश्वास) बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या पाहुण्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. पहिला दिवस पुरस्काराचा असतो, यात पाहुण्याला उत्तमोत्तम जेऊ घातले पाहिजे आणि पाहुणचार तीन दिवसांपर्यंत आहे. (म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या पाहुणचारात नैतिक औपचारिकपणा  दाखविण्याची आवश्यकता नाही.) त्यानंतर जे काही तो करेल त्याच्यासाठी तो दानधर्म असेल. पाहुण्याने आपले आतिथ्य करणाराला संकटात  टाकून त्याच्याबरोबर राहणे अवैध व चुकीचे आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये अतिथी आणि आतिथ्य करणारा या दोघांना उपदेश करण्यात आला आहे. आतिथ्य करणाराला या गोष्टीचा उपदेश करण्यात आला  आहे की त्याने आपल्या अतिथीचा पाहुणचार करावा, त्याचे मन:पूर्वक स्वागत करावे. पाहुणचाराचा अर्थ फक्त जेवण-खाण करण्यापुरताच मर्यादित नसून त्याच्याशी आनंदी मुद्रेने बोलणे, उत्साहाने वागणे हे सर्व आले. पाहुण्याला उपदेश करण्यात आला आहे की जेव्हा एखाद्याकडे पाहुणा बनून   गेल्यानंतर तेथेच ठिय्या मारून राहू नये जेणेकरून आतिथ्य करणारा वैतागला जावा. ‘हदीस मुस्लिम’मधील एका हदीसकथनात या हदीसचे  चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘एखाद्या मुस्लिमाने आपल्या बंधुकडे तो  वैतागून जाईपर्यंत किंवा त्याला संकटात टाकून वास्तव्य करणे एका मुस्लिमाकरिता अवैध आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तो  कशा प्रकारे त्याला संकटात टाकील?’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ते अशाप्रकारे की तो स्वत: त्याच्याकडे पाहुणा बनून आला असेल आणि अधिक  दिवस राहिला असेल तेव्हा त्याच्याकडे आतिथ्य करण्यासाठी काहीही नसेल.’’

शेजाऱ्याचे अधिकार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमान बाळगत नाही  (किंवा मुस्लिम नाही).’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! कोण ईमान बाळगत नाही?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याचा शेजारी त्याच्या  त्रासापासून सुरक्षित नसेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जिब्रिल (अ.) मला शेजाऱ्याशी चांगला व्यवहार करण्यास  वारंवार सांगत राहिले. एक क्षण असा आला की ते शेजाऱ्याला शेजाऱ्याचा वारसच बनवितात की काय असे मला वाटू लागले. (हदीस : मुत्तफक  अलैह) माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले की ‘‘तो मुस्लिम नाही जो   स्वत: पोटभर जेवतो आणि त्याच्या बाजूला राहणारा शेजारी उपाशी राहतो.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू जर (रजि.) यांना पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अबू जर! जेव्हा तू मांसाचा रस्सा शिजवशील तेव्हा त्यात थोडे पाणी अधिक  टाक आणि आपल्या शेजाऱ्यांचीही काळजी घे.’’ (हदीस : मुस्लिम)

इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्त्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
"अल्लाहच्या संकेतांपैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.''     (दिव्य कुरआन,  30 : 21)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
"पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.''    (दिव्य कुरआन, 4 : 34)
कधीकधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सद्वर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
"त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.''    (दिव्य कुरआन, 4 : 19)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
"जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.''    (हदीस : अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
"कोणत्याही ईशभक्ताने (मोमीन) कोणत्याही धर्मपरायण (मोमीना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.''   
    (हदीस : मुस्लिम)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""ईमानधारकांपैकी परिपूर्ण ईमानधारक तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.''     (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
""हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.'    (हदीस : मुस्लिम)

त्या मतांपैकी एक मत असे आहे की, सृष्टीची ही व्यवस्था विनास्वामी तर नाही, परंतु तिचा केवळ एकच स्वामी (अधिपती व पालनकर्ता) आहे असे नाही, तर तिचे अनेक स्वामी (अधिपती व पालनकर्ते) आहेत. सृष्टीच्या निरनिराळ्या शक्ती¨चे निरनिराळे सूत्रधार आहेत, तसेच माणसाचे सुदैव व दुदैव, त्याचे यशापयश आणि त्याची हानी व लाभ अनेक शक्ती¨च्या कृपा व अवकृपेवर अवलंबून आहे. सदरहू मत ज्या लोकांनी स्वीकारले आहे, ज्यांनी मग तर्क लढवून हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की, दैवी शक्ती कोठे कोठे आणि कोणाकोणाच्या हातात आहे. असे करताना ज्या ज्या वस्तूंवर त्यांची दृष्टी जाऊन खिळली त्यांना त्यांनी देव मानले आहे.
या मताच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो त्याची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत -
पहिले असे की, त्यामुळे माणसाचे उभे जीवन भ्रामक कल्पनेचे माहेरघर बनते. माणूस कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्याविना केवळ आपल्या भ्रामक कल्पनेने बऱ्याचशा वस्तूंसंबंधी असे मत निश्चित करतो की, त्या चमत्कारिकरीत्या त्याच्या भाग्यावर इष्ट वा अनिष्ट प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे तो इष्ट प्रभावाच्या भ्रामक आशेत आणि दुष्ट प्रभावाच्या काल्पनिक भीतीत गुरफटला जाऊन आपल्या बऱ्याचशा शक्ती¨ना व्यर्थरीतीने वाया घालवून बसतो, कोठे एखाद्या कबरी व समाधीशी अपेक्षा करतो की, त्या त्याचे कार्य सिद्ध करतील, तर कोठे एखाद्या मूर्तीवर भिस्त ठेवतो की, ती त्याचे भाग्य उजळेल, कोठे एखाद्या काल्पनिक वि¿नहत्र्याला खूश करण्यासाठी धावपळ करतो, तर कोठे अशुभ शकुनामुळे वैफल्यग्रस्त होतो व शुभ शकुनाच्या आधारे कपोलकल्पित किल्ले उभारतो. अशा सर्व गोष्टी त्याचे विचार व प्रयत्नांना स्वाभाविक कृतीच्या मार्गापासून दूर करून एका अगदी अनैसर्गिक मार्गावर टाकतात.
दुसरे असे की, या मतामुळे पूजाअर्चा, नवस व नैवेद्य आणि इतर विधी व रूढींची एक लांबलचक नियमावली तयार होते. त्यात गुरफटून माणसाच्या शक्ती व प्रयत्नांचा मोठा भाग निरर्थक उद्योगांत खर्च होतो.
तिसरे असे की, जे लोक अनेकेश्वरवादी भ्रामक कल्पनेत गुरफटलेले असतात त्यांना मूर्ख बनवून आपल्या जाळ्यात अडकविण्याची चलाख व्यक्ती¨ना चांगलीच संधी मिळते. एखादा राजा होऊन बसतो आणि सूर्य, चंद्र व इतर देवांशी आपला वंशसंबंध जोडून लोकाची अशी खात्री पटवितो की, ""आम्हीसुद्धा देवापैकी आहोत, तुम्ही आमचे दास आहात.'' एखादा पुरोहित अथवा मुजावर होऊन विराजमान होतो आणि म्हणतो की, ""तुमचा लाभ व तुमची हानी ज्यांच्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. तुम्ही आम्हाला माध्यम बनविल्याशिवाय त्यांच्याप्रत पोचू शकत नाही.'' कोणी ताईत, गंडे आणि मंत्र व तंत्र चे सोंग करून लोकांची अशी खात्री पटवितो की, आमच्या या गोष्टी चमत्कारिकरीत्या तुमच्या गरजा भागवतील, मग अशा चाणाक्ष लोकांच्या वंशजांना कायमस्वरूपी घराण्याचे व वर्गाचे रूप येते, मग कालांतराबरोबर त्यांचे हक्क व अधिकार आणि प्रभाव व प्रतिष्ठेत वाढ होत जाऊन त्यांची पाळेमुळे खोलवर रूतली जात असतात. अशा प्रकारे या धारणेद्वारे शाही घराणे, धार्मिक व आध्यात्मिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या ईशत्वाचे जोखड सर्व माणसांच्या मानगुटीवर बसते. हे ढोंगी देव त्यांना अशा प्रकारे आपले सेवक बनवितात की, जणू ते त्यांच्यासाठी दूध देणारे व स्वारी आणि ओझे वाहणारी जनावरे आहेत.
चौथे असे की, हा दृष्टिकोन ज्ञानविज्ञान आणि कला व तंत्राज्ञानासाठी, साहित्य व तत्त्वज्ञानासाठी आणि संस्कृती व राजकारणासाठी कोणताही कायमस्वरूपी पाया उपलब्ध करीत नाही, तसेच या कपोलकल्पित देवांपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही की, ज्याचे नियमितपणे पालन व्हावे. या ढोंगी देवांशी माणसाचा संबंध केवळ या हद्दीत मर्यादित असतो की, माणसाने त्यांची कृपा व साहाæय प्राप्त करण्यासाठी केवळ पूजेच्या काही विधी पूर्ण कराव्यात, उरले जीवनाचे इतर व्यवहार तर त्यांच्यासंबंधी नियम व कायदे करणे, अंमलबजावणीच्या पद्धती ठरविणे माणसाचे स्वत:चे काम आहे.
अशा प्रकारे अनेकेश्वरवादी समाज प्रत्यक्षात त्याच सर्व मार्गांवर चालतो ज्या मार्गांचा उल्लेख निव्वळ अज्ञानासंबंधी आताच मी केला आहे. तीच नीतिमत्ता, तेच आचरण, तीच सांस्कृतिक पद्धत, तीच आर्थिकव्यवस्था आणि तेच शिक्षण व साहित्य, या सर्व दृष्टींनी अनेकेश्वरवादाच्या वर्तनात आणि निव्वळ अज्ञानाच्या वर्तनात कोणताही मौलिक स्वरूपाचा फरक नसतो.

 - डॉ. इल्तिफात अहमद इस्लाही

भाषांतर - प्रा. शेख अब्दुर्रहमान

ईश्वराने आपले अंतिम प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांच्याद्वारे एक ग्रंथ अवतरित केला ज्याचे नाव "कुरआन' आहे, जो मानवाला सरळ आणि सत्यमार्ग दाखविण्यासाठी अवतरित झाला आहे. वास्तविकपणे आमच्या सर्व समस्यांवर उपाय फक्त कुरआन आहे.
या पुस्तिकेत ईश्वराचा ग्रंथ कुरआनसंबंधी या सत्याला प्रमाणित करण्याचा प्रयत्न केला आहे की हा एक ईश्वरी ग्रंथ आहे ना की मानवनिर्मित याविषयी काही शास्त्रीय पुरावेसुध्दा गोळा केले गेले आहेत. आशा आहे ही पुस्तिका भरकटलेल्या मानवतेसाठी एक आधार सिध्द होईल.

आयएमपीटी अ.क्र. 76       पृष्ठे - 48    मूल्य - 20          आवृत्ती - 2 (DEC. 2010)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/woeavwunh56hn3hhhxu1b6wv1fkkitpx







जाणारे कधी परतत नसतात, जाणाऱ्यांची आठवण येत असते. जेव्हा एखादा आमच्यातून निघून जातो तेव्हा त्याची आठवण खूप येते. मौलाना सिराजुल हसन यांच्या निधनाच्या  बातमीमुळे आठवणींच्या शांत समुद्रात जणू एक लाट उसळली. काय लिहावं आणि काय सोडून द्यावं हेच काही समजत नाही. मौलानांचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो. ते म्हणत असत, ‘‘सोडा हे सगळं, कामं करा’’, पण मनाला राहावत नाही. जेव्हा माणसाचं डोकं एकदम सुस्त होते आणि पेनातली शाई सुकून जाते तेंव्हा माणूस काय करू शकतो? काल संध्याकाळपासून माझे मित्र आजम शहाब आग्रह करीत होते की मी काही लिहावं परंतु व्यक्त होण्याची शक्ती नष्ट झाली नाही तर माणूस हतबल होतो. मंचाशिवाय मौलानांना पहिल्यांदा बेंगलुरू मधे जवळून पाहण्याची संधी मिळाली. कर्नाटकात एस.आय.ओ.नं चांगलंच बस्तान बांधलं होतं तर एस.आय.एम.चं कार्य नगण्य होतं. काही विभागांत थोड्याफार  प्रमाणांत असलेला संपर्क दृढ करण्यासाठी मी बेंगलुरूला गेलो तेंव्हा सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षांना (जमात-ए-इस्लामी-हिंद, कर्नाटक) भेटण्यासाठी त्यांच कार्यालय गाठलं.
मौलाना सिराजुल हसन यांच्या भेटीनं माझा उत्साह वाढला. त्यांचा दिलखुलासपणा व विशालहृदयतेनं माझं मन मोहित झालं. त्या काळी लोकांनी एस.आय.एम. ला जमाअतची बंडखोर  व अवज्ञा करणारी संघटना ठरवली होती. परंतु याचा मौलाना सिराजुल हसन यांना लवलेशही नव्हता. त्यांनी प्रदेश कार्यालयात मुक्काम करू देण्याची तयारी दर्शविली.
त्या वेळी कार्यालयात सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत मला घेऊन गेले आणि सर्व सदस्यांची ओळख करून दिली. मौलानांच्या वागणुकीमुळे एस.आय.एम. आणि एस.आय.ओ. दरम्यानची भिंत क्षणार्धात कोसळली. त्यानंतर मौलाना दिल्लीतील केंद्रीय जमाअतमध्ये सचिवपदी विराजमान असताना तेथील वातावरण अतिशय गंभीर होते. त्यांच्या  आगमनानंतर पहिल्यांदाच केंद्रीय जमाअतमध्ये नाष्ट्याच्या वेळी दिल्लीचे पापे आणि मौलानांचे विनोदी चुटके प्रसिद्ध होऊ लागले. वर्षानुवर्षे ये-जा करूनदेखील परकेपणा बाळगणारे लोक  खळखळून हसू बोलू लागले. हे नवीन पिढीला खूपच आवडत होते.
मौलाना सिराजुल हसन यांच्या खांद्यावर जमाअतच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली आणि त्यांनी आमच्यासारख्यांना जमाअतचे सदस्य बनवून घेतले. दरम्यानच्या काळात जमाअतचे  कार्यालय चितली कबरहून अबुल फजल या ठिकाणी हलविण्यात आले होते. त्या वेळी काही कामानिमित्त दिल्लीला जाण्याची संधी मिळत असे तेव्हा मौलानांना भेटण्याची उत्कट इच्छा असायची.
स्वागतानंतर जमाअतच्या अध्यक्षांची भेट होऊ शकते काय? असे विचारणार इतक्यात पाठीमागून एक कुरवाळणारा हात माझ्या खांद्यावर विसावला. मागे वळून पाहतो तर मौलाना सलामसाठी पुढे सरसावले आणि गळाभेट घेतली. एखाद्या संघटनेचा प्रमुख आपल्या नव्या सदस्याशी इतक्या आत्मीयतेने वागू शकतो, ही गोष्ट कल्पनातीत होती. ते माझा हात पकडून आपल्या खोलीत घेऊन गेले. क्षणार्धात अध्यक्ष आणि नवनियुक्त सदस्य यांच्यातील तफावत दूर झाली. अशा नम्रता आणि मनमोकळेपणाची कल्पनाही करवत नाही. वयोवृद्धांच्या  संगतीत आत्मा समृद्ध व सुशोभित होत असतो, हे पुस्तकांमध्ये वाचलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. या भेटीचा सुगंध अंत:करणाच्या कोनाड्यात आजही दरवळतोय.
मुंब्रा येथे सदस्यांचं एक संमेलन माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होतं. मौलानांना आपल्या घरी घेऊन जाण्याबद्दल मी स्थानिक अध्यक्षांना विचारलं, ते म्हणाले की जर ते येऊ इच्छित असतील तर मी नाकारू शकत नाही. मौलानांना मी म्हटलं की चला आमच्या घरी आराम करा, तेव्हा ते म्हणाले की नको इथंच ठीक आहे. विचारलं, का? ते म्हणाले की  तुमच्या घरच्यांना त्रास नको. मी म्हणालो, घरी कोणी असेल तर त्रास होईल! मुलं आपल्या आईबरोबर आपल्या नानानानीकडे  सुट्टी साजरी करताहेत. मौलानांनी होकार दिला. मी  त्यांना शयनागारात आराम करण्यास सांगितलं आणि स्वत: हॉलमध्ये येऊन अंग टाकलं. काही वेळानं ते बाहेर आले आणि मला आत जाऊन झोपण्यास सांगितलं. मी विचारलं, आपण  कुठे आराम करणार? तर म्हणाले, मी इथं बाहेरच्या खोलीत जमिनीवर! तुम्ही आपल्या बिछान्यावर जाऊन झोपा. मी म्हणालो, हे शक्य नाही. ते आग्रह करू लागले तेव्हा मी विचारलं,  मी रात्रभर जागं राहावं अशी आपली अच्छा आहे काय? यावर ते नि:शब्द होऊन आत निघून घेले. यानंतर त्यांना गाढ झोप लागली. परंतु ते आत झोपू शकले की नाही, हे मला ठाऊक  नाही. कुरआनचं मराठीत भाषांतर झालं. त्याचं विमोचन करण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना सिराजुल हसन यांचं मुंबईत आगमन झालं. मुंबईतल्या के. सी. कॉलेजचा हॉल बाल्कनीपर्यंत भरला होता. त्या कार्यक्रमात मराठीचे प्रसिद्ध लेखक यू. म. पठाण, प्रसिद्ध पत्रकार अरुण साधू आणि एका न्यायाधीशांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  काही वक्त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी मी पार पाडली. दरम्यान मगरिब नमाजची वेळ होताच दरम्यानच्या काळात ‘सलीमने ओळख करून देणे थांबवावे,’ असे मौलानांनी  स्थानिक अध्यक्षांकरवी सांगितले. मग यापुढील कार्यक्रमात ओळख करून देण्याचे काम कोणा दुसऱ्याला देण्यात यावे. ते म्हणाले, असे केल्यास मौलाना नाराज होतील. मौलाना  सिराजुल हसन यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मन दुखविणे कोणा निष्ठूर अंत:करणाच्या व्यक्तीला शक्य होतं? विषय तेव्हाच संपला आणि आज त्याची चर्चा. महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्षाची निवड होणार होती. मौलाना केंद्रीय कार्यालयाकडून निरीक्षक म्हणून विराजमान झाले होते. त्या बैठकीत नेहमी अतिशय उत्साही असणारं व्यक्तिमत्त्व खूप गंभीर  असल्याचं दिसत होतं.
दिवसभर चर्चा सुरू होती. अनेकांपैकी काहींनी आपलं मत सावधगिरी बाळगत तर काहींनी बेधडकपणे मांडलं. मौलानांनी अतिशय गंभीर रूप धारण केलं होतं. संपूर्ण कार्यवाहीदरम्यान  त्यांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही. प्रत्येकाला उत्स्फूर्तपणे बोलण्याची संधी दिली आणि स्वत: शांतपणे सर्व काही लिहून घेत राहिले. मौलानांची आवेशपूर्ण भाषणं आणि लहान लहान  विनोदी चुटक्यांचा मजा लुटणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना कोरड्या संघटनात्मक चर्चेतील मौलानांच्या असाधारण रुचीने प्रभावित केलं होतं. ज्या दोन व्यक्तींच्या नावांवर सर्व लोकांनी  चर्चा केली असतानादेखील त्या दोघांनी तिसऱ्या व्यक्तीचे नाव का सादर केले? असा प्रश्न बैठकीनंतर एकांतात मौलानांना विचारण्यात आले. यावर त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत स्मितहास्य करत ज्ञान व युक्तीने परिपूर्ण वक्तव्य केले की खूप अधिक विचार करणे चांगले नसते. अर्थात त्यांना असे म्हणायचे होते की ‘मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करू नका,  पुन्हा पुन्हा उपस्थित केलेल्या शंका अपराध ठरतात.’ मग त्यापुढे प्रश्न करण्याची हिंमत झाली नाही.
मौलाना सिराजुल हसन यांच्या आश्चर्यकारक लोकप्रियतेचा सुगावा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या हदीसमध्ये आढळतो- एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे येऊन विचारणा  केली, ‘हे पैगंबर! मला एक अशी गोष्ट करण्यास सांगा जी केल्याने अल्लाहदेखील माझ्यावर प्रेम करील आणि लोकसुद्धा माझ्यावर प्रेम करतील.’ येथे अल्लाहवरील प्रेमाच्या सामर्थ्याचा  तगादा नसून अल्लाहच्या प्रेमाची आवश्यकता आहे. सृष्टीनिर्मात्याशी प्रेमाचं नातं जुळावं ही सृष्टीतील अस्तित्वात महान सचोटी आहे.
अल्लाहने स्वत: आपल्या दासावर प्रेम करू लागावे. या हकीगतीचा अंदाज प्रेम करणाऱ्या हृदयाव्यतिरिक्त कुणी दुसरा लावू शकत नाही. एखाद्या दासावर अल्लाह किती प्रेम करतो  हेदेखील आम्हाला कळू शकत नाही, परंतु त्याचे दास कुणावर प्रेम करतात याचा अंदाज सहजगत्या लावला जाऊ शकतो. या स्पष्टीकरणानुसार मौलाना सिराजुल हसन अतिशय हेवा  वाटणारे व्यक्तिमत्त्व होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सहकाऱ्याच्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की ‘जगाकडून अभिलाषा बाळगू नकोस, अल्लाह तुझ्यावर प्रेम करील आणि  लोकांकडे जे काही आहे त्यापासून नि:स्पृह राहा, लोक तुझ्यावर प्रेम करतील.’
जागतिक अभिलाषा न बाळगणे आणि लोकांपासून नि:स्पृह राहाणे यावर प्रवचन आणि भाषण देणे अगदी सोपे आहे, परंतु हे सर्व आपल्या नसानसांत वसविणे अतिशय अवघड आहे.  मौलाना  सिराजुल हसन यांनी याचे बोलके उदाहरण कशा प्रकारे सादर केले आहे. पाहा जमाअत- ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षांची निवड होणार होती. चौथ्यांदा मौलाना सिराजुल हसन  यांची निवड होण्याची दाट शक्यता होती. तेव्हा मौलानांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, ‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात जमाअतचा कोणताही निर्णय नाकारलेला नाही. म्हणून  आपण सर्वांनी मला विवश करू नये. मी घरी जाऊन माझ्या मातेची सेवा करू इच्छितो. कृपया करून माझी विनंती मान्य करावी.’
ईश्वरेच्छेपोटी आपले तारुण्य धर्माच्या उद्धारासाठी व्यतीत केलेल्या व्यक्तीचे हे वक्तव्य होते. चाळीस वर्षांपर्यंत जमाअतद्वारा धर्माची सेवा केल्यानंतर ते आपल्या मातेची सेवा करण्यासाठी अत्युच्च नम्रतेनं निरोप घेऊ  इच्छित होते. नि:स्वार्थ आणि ईशसेवेचे महत्तम उदाहरण सादर करून मौलानांनी केंद्रीय कार्यालयाचा मागे वळून न पाहता निरोप घेतला.
हैद्राबादेत जमाअतच्या संमेलनाचा दुसरा दिवस होता. मौलाना सिराजुल हसन आपली तब्बेत ठीक नसतानाही खाली सामान्य सदस्यांच्या दरम्यान येऊन बसले. आमच्यासारख्या काही  लोकांना हे कळताच त्यांच्याभोवती जमा झालो. स्टेजवर विराजमान होण्याची त्यांना विनंती करण्यात आली. मौलाना नकार देत राहिले, ‘माझा कार्यक्रम नाही. मी फक्त उपस्थित  राहाण्यासाठी आलोय. आपल्या सदस्यांना भेटण्यासाठी आलोय.’ लोकांनी काही एक ऐकलं नाही आणि त्यांना स्टेजवर घेऊन गेले. भाषण देण्यास सांगण्यात आले तेव्हा प्रकृती ठीक   नसतानाही थोडक्यात मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ‘कस्रfचत ही आमची शेवटची भेट असेल.’ त्यांचे हे शब्द खरे ठरले आणि आमच्यासारख्या दूरवरच्या निष्ठावंतांना त्यानंतर  मौलानांच्या भेटीचे भाग्य लाभले नाही. अब्दुल्लाह जावेद यांच्याकडून मौलाना हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. विष संपूर्ण शरीरात पसरल्याचे मुहम्मद  सिद्दीक कुरैशी यांनी व्हिडिओसह लिहिल्याचे वाचले तेव्हा ते पाहाण्याची हिंमत झाली नाही. प्रार्थनेने अनुसरण केले आणि काही दिवसांनंतर पुन्हा अब्दुल्लाह जावेद यांनी सांगितले की  मौलानांना आय सी यू मधून सामान्य वार्डात हलविण्यात आले आहे. त्यानंतर घरी परतल्याची देखील बातमी कळाली. आम्ही सर्वांनी अल्लाहचे आभार मानले, मात्र खुशी फार काळ  टिकली नाही आणि थोड्याच दिवसांत दु:खद वार्ता आली की मौलाना सिराजुल हसन आपल्यातून निघून गेले.
मौलाना रजीउल इस्लाम नदवी यांनी दिवा विझल्याचंही लिहिलं परंतु मनाला पटलं नाही. जर हे खरे आहे तर मनाच्या तळघरात हा उजेड का आहे? मौलानाचं शरीर गेल्या शुक्रवारी  दफन करण्यात आलं, परंतु सिराजुल हसन नामवंत अंत:करण व मस्तिष्कात प्रकाशमान आहे व राहील. मौलानांच्या मनमोहक हास्यात लपलेल्या धर्मनिष्ठेची तडफ खालील ओळींच्या  साक्षीने आमच्या बरोबर राहीलजिया हूं उम्र-भर सो़जे निहां में रहा हूं मिस्ले गुल में इस जहां में।

- डॉ. सलीम खान
(अनुवाद- शाहजहान मगदुम)

माननीय खुवैलिद बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या अल्लाह! मी दोन दुर्बल लोकांच्या अधिकारांना श्रेष्ठ समजतो, म्हणजे अनाथ  आणि पत्नीच्या अधिकाराला.’’ (हदीस : निसाई)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सांगण्याचा हा अंदाज अतिशय प्रभावशाली आहे ज्याद्वारे पैगंबरांनी लोकांना असा उपदेश दिला की अनाथ व पत्नींच्या अधिकारांचा आदर करा. इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब जगतात हे दोघे सर्वाधिक अत्याचारपीडित होते. अनाथांशी सामान्यत: वाईट व्यवहार केला जायचा आणि त्यांचा अधिकार हिसकावला जायचा. त्याचप्रमाणे  महिलांनाही कसलेच स्थान नव्हते.

एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी गरजवंत आहे, माझ्याकडे काहीही नाही आणि माझ्या देखरेखीत एक अनाथ आहे (ज्याच्याकडे संपत्ती आहे). तेव्हा मी त्याच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतो काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय. तुम्ही आपल्या अनाथाच्या संपत्तीतून स्वत:चा उदरनिर्वाह करू शकता. मात्र अट अशी की व्यर्थ खर्च करू नका आणि कोणतेही काम घाई-गडबडीत करू नका आणि आपली सपत्ती बनविण्याची चिंता करू नका.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
जर एखाद्या अनाथाचे पालनपोषण करणारा श्रीमंत असेल तर त्याने कुरआनच्या उपदेशानुसार (त्या अनाथाकडून) काहीही घेता कामा नये, परंतु जर तो गरीब असेल आणि अनाथाकडे संपत्ती असेल तर तो त्याच्या संपत्तीचे रक्षण करेल. ती वाढविण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातून स्वत:चा खर्च भागवेल, परंतु तो अनाथ तारुण्यात येण्यापूर्वी त्याची संपत्ती लवकर  लवकर खाऊन टाकणे त्याच्यासाठी अवैध आहे. तसेच तो अनाथाच्या संपत्तीपासून आपली संपत्ती उभी करू शकत नाही. अल्लाहला न भिणारे बेईमान लोक अनाथांची संपत्ती चलाखीने  आपली संपत्ती बनवितात अथवा त्याच्या प्रौढ होण्यापूर्वी त्याची संपूर्ण संपत्ती खाऊन-पिऊन फस्त करतात.
या हदीसमध्ये देण्यात आलेला उपदेश पवित्र कुरआनमधील सूरह निसामध्ये अल्लाहने अनाथांच्या संपत्तीच्या बाबतीत दिला आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘आणि अनाथांची काळजी घेत रहा  इथपावेतो की ते विवाहयोग्य वयात येतील. मग जर तुम्हाला त्यांच्यात योग्यता आढळली तर त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करा. असे कधीही करू नका की न्यायाच्या मर्यादा  ओलांडून या भीतीपोटी त्यांचा माल घाईघाईने गिळंकृत कराल की ते मोठे झाल्यावर आपल्या हक्कांची मागणी करू लागतील. अनाथांचा जो पालक धनवान असेल त्याने ईशपरायणतेने  वागावे व जो गरीब असेल त्याने परिचित पद्धतीने खावे. नंतर जेव्हा त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन करू लागाल तेव्हा लोकांना त्यावर साक्षीदार बनवा आणि हिशेब घेण्यास अल्लाह पुरेसा आहे.’’ (दिव्य कुरआन, ४:६)

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझ्या आश्रयाखाली असलेल्या अनाथाला कोणत्या कारणासाठी मी मार देऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या कारणांसाठी तुम्ही स्वत:च्या मुलांना मार देऊ शकता. खबरदार! आपल्या संपत्तीला वाचविण्यासाठी त्याची संपत्ती नष्ट करू नका आणि त्याच्या संपत्तीद्वारे आपल्या  संपत्तीत वाढ करू नका.’’ (मुअजम तिबरानी)

स्पष्टीकरण
आपल्या मुलाबाळांना शिक्षण व प्रशिक्षणाच्या बाबतीत मार देऊ शकता, त्याचप्रमाणे अनाथालाही धार्मिक आणि शिष्टाचार व सभ्यता शिकविण्याच्या बाबतीत मार दिला जाऊ शकतो.  विनाकारण क्षुल्लक कारणासाठी मुलांना मारहाण करणे पैगंबरांच्या परंपरेच्या विरूद्ध आहे आणि अनाथाला मारणे हे तर फार मोठे पाप आहे.

इस्लाम अल्लाह आणि पैगंबर यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरआनोक्ती आहे,
"आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वत: ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ राहा.''    (दिव्य कुरआन, 31 : 14)
अल्लाहचे आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.)1 यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
पैगंबरांचा आदेश आहे,
"मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो.''     (हदीस : इब्ने माजा)
माननीय अबू हुरैरा (रजि.)2 यांचे कथन आहे की, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
""हे अल्लाहचे पैगंबर (स.)! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने पुन्हा विचारले, ""त्यानंतर कोण?''
पैगंबरांनी सांगितले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण?''
मग पैगंबर म्हणाले, ""तुझे वडील!''    (हदीस : अल-अदबुल मुफद्न)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.''                                                   (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
""आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.''    (हदीस)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget