Latest Post

सुमारे शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगची माहिती बालपणी ऐकताना भीती वाटत असे. कोरोना प्रत्यक्ष अनुभवताना जीवनच भेसूर होऊन बसले आहे. एका बाजूने जीवित हानी तर दुसऱ्या बाजुने वित्तहानी अशा दुहेरी संकटात सकल जग सापडले आहे. कोरोना विषाणू आहे असे मानले जात आहे. मात्र याची उत्पत्ती व त्यावरील उपाय काय याचा अद्याप तपास लागलेला नाही. अशातच तो स्थलपरत्वे कमी-अधिक होत आहे. तर काही ठिकाणी तो संपला असल्याचीही बातमी कानी पडत आहे. त्यातच हा लोक मानवनिर्मित की दैवी अशी चर्चाही ठिकठिकाणी होत आहे. अशा स्थितीत तो मानवनिर्मित नाही असे अनुमान उचित वाटते. कारण यावर अद्याप औषधच नाही.
उगवतो तो मावळण्यासाठी. तसेच येतो तो जाण्यासाठी या नियमास अनुसरून कोरोना केव्हा तरी जाणार तर आहेच. कारण तो आलेला आहे. मात्र त्याने आर्थिक संकट निर्माण केले आहे ते आम्हालाच घालवून लावावे लागणार आहे. हे संकट महाकाय असून ते महाकाळ टिकणारेही आहे. कोरोनाने कित्येक कुटुंबे बळी घेतली. अशातच अशा कुटुंबांतील निराधार, अनाथ, विधवा स्त्रिया, निराश्रित अशा सर्वांप्रती प्रत्येकाच्या मनी सहानुभूती आहेच. मात्र प्रत्येक जण या आर्थिक संकटाने चिंतातूर होऊन बसला आहे.
तूर्तास आपल्या शासनाने लोकांचे जीव कसे वाचतील इकडे लक्ष वेंâद्रित केले आहे आणि ते योग्यच आहे. याकरिता पुढील मार्गदर्शन केले आहे-
१) स्वच्छता राखा, २) शिस्त पाळा (नियम पाळा), ३) संयम राखा आणि ४) सहकार्य करा.
शासनाच्या या मार्गदर्शनाचा विचार करू लागलो तेव्हा यात काही अवघड आहे असे वाटले नाही. कारण या मार्गदर्शनाची महती इस्लामने १४५० वर्षांपूर्वीच जगाला विहीत केली आहे, ती अशी-

स्वच्छता
पाच वेळच्या नमाजच्या वेळी करावी लागणारी वुजू. लघुशंकेनंतर केला जाणारा पाण्याचा वापर तसेच लघुशंका बसून करण्याचे मार्गदर्शन जेणेकरून त्याचा एक थेंबही शरीरावर राहू नये वा कपड्यांवर पडू नये.

शिस्तपालन (नियमांचे पालन)
रोजाची सहरी आणि इफ्तारी या दोहोंची वेळ सूर्यास्तानुसार निश्चित ठरलेली असते. यात फरक केल्यास रोजा अपूर्ण किंवा निरर्थक ठरतो. तसेच सामूहिक नमाज इमामच्या सूचनांनुसार अदा न केल्यास ती अपूर्ण किंवा निरर्थक ठरते. यातून नियम पाळण्याचे मार्गदर्शन आहे.

संयम
रमजान मास उन्हाळ्यात आल्यास रोजे १६/१६ तासांचे किंवा स्थलपरत्वे अधिक तासांचे असतात. अशा वेळी भूक-तहान सहन करावी लागते आणि ती सहन करण्याकरिता मनावर ताबा केवळ संयमानेच मिळवता येतो. अशा तNहेने संकटसमयी संयम पाळता यावा म्हणून हे एक प्रकारचे प्रशिक्षण होय. हजयात्रेच्या वेळीदेखील आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहण्यासाठी अशाच संयमाची गरज असते.

सहकार्य
जकात आणि सदका याद्वारे सहकार्याचे मार्गदर्शन आहे. शिवाय या दोहोंद्वारे आर्थिक नियोजनाचेही मार्गदर्शन केलेले आहे.
कोरोना जाईल, त्यानंतर मात्र यक्षप्रश्न उभा ठाकलेला असेल तो आर्थिक संकटाचा. अशा वेळी शिस्तपालन, संयम आणि सहकार्य याबाबींची नितांत गरज असेल. शिवाय स्वीकारलेला पाश्चिमात्य अमर्याद आणि बेलगाम भौतिकवाद, चंगळवाद यास तत्वर कायमस्वरूपी घालवून लावणेही खरे तर काळाची गरज आहे.याचे एखादे उदाहरण विचारात घ्यायचे म्हटले तर लग्नकार्यातील पत्रिका. लग्नाच्या या आमंत्रणपत्रिकेसाठी शेकडो रुपये खर्च केले जातात. भरीला अहमत असतोच.
कुरआनने अनाठायी व अनावश्यक खर्चास मनाई तर केलीच आहे, शिवाय अहमला इस्लाममध्ये कोठे स्थानच दिलेले नाही. कारण अहम आणि सैतान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे मानवास सजदा करण्याच्या अल्लाहच्या आदेशासमयी दिसून आले आहे.
या महाकाय आणि महाकाळ टिकणाNया आर्थिक संकटास सामोरे जायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळण्याबरोबरच निकडीच्या गरजांवर खर्च होईल हे कटाक्षाने पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच काही वर्षांपूर्वी अन्नधान्याच्या दुष्काळाला सामोरे जाता यावे म्हणून शासनाकडून आलेच तर देशाचा विचार करून शासनास सहकार्य करणे मोलाचे ठरेल तेव्हाच हळूहळू का होईना या आर्थिक संकटातून पार पडणे शक्य होईल. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच. तसेच पवित्र रमजानमध्ये प्राप्त असलेल्या शबे कद्रची सुवर्णसंधी साधून अल्लाहकडे या महामारीव आर्थिक संकटातून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दुआ करणे उपयुक्त ठरेल.
कोरोना व त्याने उभे केलेले आर्थिक संकट या दोहोंच्या कात्रीत सापडले असताना रमजान मासाचे आगमन नेहमीप्रमाणे आनंदाबरोबरच दिसाला देणारेही आहे. कारण रमजानने जगाला जे दिले आहे ते अनमोल आणि अतुलनीय आहे.
सर्वश्रुत पवित्र महिन्याभराचे रोजे दिले. याच महिन्याभराच्या रोजांमुळे आरोग्य लाभते, भूक-तहान सहन करण्यासाठी आवश्यक असलेला संयम लाभतो. हाच संयम कोणत्याही संकटसमयी उपयुक्त ठरतो. रोजाद्वारे इतरांच्या उपाशी असण्याच्या स्थितीची जाणीव होऊन मदत, सहकार्य अशा मानवतावादी भावनांना उत्तेजन मिळते. इतरांची गरिबी दूर करण्यासाठी स्वत:चे आर्थिक नियोजन याच पवित्र महिन्यातील जकात व सदका यांची मदत होत असते. रोजासाठी सहरी व इफ्तारीद्वारे जे आदानप्रदान होत असते त्याद्वारे प्रेम व बंधुभाववाढीस मदत होते. अल्लाहला प्रिय असलेले चारित्र रोजाद्वारे प्राप्त होत असते ते त्यातील तकवामुळे. (तकवा म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे आणि हजरत मुहम्मद (स.) हे त्याचे पैगंबर व रसूल आहेत. हे ईमान आणि त्याचबरोबर सकल सृष्टीचा निर्माता, पालक व चालक, नियंता अल्लाहच. तो सृष्टीतील प्रत्येक घडामोड घडवीत असतो. प्रत्येक घडामोडीची त्याला माहिती असते आणि त्यानुसार त्याचा निवाडा अंतिम निवाड्याच्या दिवशी असेल. थोडक्यात त्याच्याप्रती प्रेम व भय हाच तकवा होय.)
रमजानने कुरआन हा अल्लाहचा अंतिम धर्मग्रंथ दिला ज्याने वर उल्लेखित मौल्यवान मार्गदर्शन केले. अल्लाहबाबतच्या ज्या अयोग्य कल्पना प्रचलित होत्या त्या दूर करून त्याचे वास्तव रूप सूरह इख्लासमध्ये तर आपल्याला सन्मार्ग  मिळावा म्हणून सूरह फातिहाद्वारे दुआ मिळाली. हे सर्व कुरआनमुळेच, ज्याचे अवतरण पवित्र रमजानमध्ये झाले. कुरआन प्रस्तुत होण्यास सुरूवात झाली रमजानमध्येच. अशी सुरूवात करणारे मुहम्मद बनि अब्दुल्ला अर्थात हजरत मुहम्मद (स.) पैगंबर दिले ते रमजानने. त्यांची गणना पहिल्या १०० महान व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष!
इस्लामी वर्षातील सर्वोत्तम रात्र बहाल करणारा रमजान आणि लोकांनी ज्या प्रेमानने या रमजान मासाचे स्वागत केले, संयमी रोजे ठेवले त्याचा आनंदही ईदे रमजान.
अशा या महान रमजानप्रती-
‘‘सबसे अच्छा मेहमान हमारा तू ऐ माहे रमजान
तूने दिया हमें कुरआन, बनाया जिसने हमें इन्सान
कितने व वैâसे अदा, हम करे तेरे अहसान,
हो सभीं को तू मुबारक, यही एक अरमान।’’

-बशीर अमीन मोडक, रत्नागिरी, मो.: ९९३०९८६९६४

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी तुला जेवण मागितले होते परंतु तू मला जेऊ  घातले नाही.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तू सर्व लोकांचा पालनहार आहेस, तर मग मी तुला कसे बरे जेऊ घालीन?’’ अल्लाह म्हणेल, ‘‘तुला माझ्या अमुक दासाने जेवण मागितले  होते परंतु तू त्याला जेऊ घातले नाही, हे तुला माहीत नाही काय? जर त्याला जेऊ घातले असतेस तर जेऊ घातलेले अन्न तुमा माझ्यापाशी आढळले असते, हे तुला माहीत नव्हते काय?’’ अल्लाह  म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी तुला पाणी मागितले होते, परंतु तू मला पाणी पाजले नाहीस.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तू स्वत: जगाचा पालनकर्ता आहेस, तर मग मी तुला कसे  पाणी पाजू शकतो?’’ अल्लाह म्हणेल, ‘‘माझ्या अमुक दासाने तुला पाणी मागितले होते, परंतु तू त्याला पाणी पाजले नाहीस. जर तू त्याला पाणी पाजले असते तर ते पाणी तुला माझ्यापाशी आढळले असते.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
भुकेल्याला जेऊ घालणे आणि तहानलेल्याला पाणी पाजणे मोठे पुण्याचे काम आहे आणि यामुळे अल्लाहचे सान्निध्य लाभते.

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही एखाद्याला पोटभर जेऊ घालणे हे उत्तम दान आहे.’’ (हदीस : मिश्कात)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मागणाऱ्याला काही देऊन परतवून लावा, मग ते जळालेले खूर का असेना.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
गरीब, गरजवंत जर तुमच्या दरवाजात आला तर त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नका. काही न काही त्याला द्या, मग ती अतिशय क्षुल्लक वस्तू का असेना.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले, ‘‘लोकांच्या दरवाजात चकरा मारणारा आणि अन्नाचे एक-दोन घास आणि एक-दोन खजूर घेऊन परतणाराच गरीब असतो असे नाही तर ज्याच्याकडे आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण  करण्याइतकी धन-संपत्ती नसेल तोदेखील गरीब आहे आणि त्याला दान देण्याइतपत त्याची गरिबी लोकांच्या लक्षात येत नाही आणि तो लोकांसमोर उभे राहून हात पसरतदेखील नाही. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे लोकांना उपदेश देण्यात आला आहे की तुम्ही सर्वाधिक अशा गरिबांचा शोध घ्यायला हवा जे गरीब आहेत परंतु ते लाजेने व सज्जनतेमुळे आपली स्थिती लोकांना माहीत पडू देत  नाहीत आणि गरिबांसारखा चेहरा करून फिरत नाहीत आणि दुसऱ्यांसमोर हातदेखील पसरत नाहीत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना मदत करणे मोठे पुण्याचे काम आहे. माननीय अबू हुरैरा  (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘विधवा व गरिबांसाठी धावपळ करणारा ज्या मनुष्यासमान आहे जो अल्लाहच्या मार्गात युद्ध करतो आणि त्या मनुष्यासमान आहे  जो रात्रभर अल्लाहपुढे उभा राहतो, थकत नाही आणि त्या रोजेदारासमान आहे जो दिवसा न खाता रोजे करतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

जर इस्लामी शिकवणींचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे खालील अधिकार आढळून येतात.

1) एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे.
    अरबांच्या काही जमातीतील लोक आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. कुरआनने त्या मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला आणि म्हटले की, जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल. कुरआनोक्ती आहे,
    "तो क्षण आठवा, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली?''    (दिव्य कुरआन, 81 : 8-9)
2)    इस्लामनुसार प्रत्येक मुलास त्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला जाऊ नये, या नैतिक व वैधानिक अधिकारांसह तो जन्म घेत असतो. पवित्र कुरआनचा असा आदेश आहे,
    "ज्या मातापित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपानकाल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पध्दतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.''    (दिव्य कुरआन, 2 : 233)
3)    इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभसूचना दिली आहे.
4)    इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास व संरक्षकास निश्चितच महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की विवाह त्या मुलींच्या परवानगीनेच होईल. जर महिला विधवा वा घटस्फोटिता असेल तर स्पष्टपणे आपली मान्यता व्यक्त करील आणि कुमारिका असेल तर तिच्या मौनास मूक संमती समजली जाईल. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
    "जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारिकेची अनुमती घेतल्याशिवाय तिचा विवाह होणार नाही.''    (हदीस)
5)    इस्लामने "महर' (लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची कबूल केलेली रक्कम) ला महिलेचा अधिकार म्हटले आहे आणि पुरुषास असा आदेश दिला आहे की,
ज्या महिलेशी त्याचा विवाह होईल, त्याने कोणत्याही परिस्थितीत "महर'ची रक्कम तिला देणे अनिवार्य राहील. "महर'विना विवाह वैध नसेल. कुरआनने स्पष्ट शब्दांत घोषणा केली आहे,
    "स्त्रियांना "महर' (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा.''            (दिव्य कुरआन, 4 : 4)
    विवाहप्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने वा संपत्ती इ. देणे अनिवार्य आहे, ज्यास "महर' म्हटले जाते. "महर' उधारदेखील असू शकतो. परंतु तो निश्चित करणे अनिवार्य असते. "महर' स्त्रीची स्वत:ची संपत्ती आहे, तिला त्यावर पूर्ण अधिकार आहे. तिच्या संरक्षकाचा त्यामध्ये कसलाही अधिकार नाही.
6)    इस्लाम स्त्रीचे पालनपोषण करण्याचा अधिकार मान्य करतो. विवाहापूर्व मुलींच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी तिच्या पित्यावर असते आणि विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी तिच्या पतीवर येते. जर महिला श्रीमंत असेल तर तिच्याकरिता पती नोकरसुध्दा ठेवील. जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित नसेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते. हा तिचा वैधानिक अधिकार आहे आणि पतीने तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
7)    इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग-धंद्याचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तिला व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व कारागिरी, नोकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता व लेखनकार्य- सर्व वैध कार्य करण्याची अनुमती आहे. त्यासाठी ती घराच्या बाहेरदेखील पडू शकते, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कसलाही बिघाड वा बाधा निर्माण होऊ नये आणि तिच्या स्थिरतेत विघ्न निर्माण होऊ नये, याकरिता तो (इस्लाम) तिच्यावर काही बंधने अवश्य लावतो.
8)    इस्लामने धन-संपत्तीत स्त्रीच्या मान्यतेसंबंधीच्या अधिकारास मान्य केले आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास अनुचित व अवैध ठरविले आहे. ज्याप्रमाणे मिळकतीचा हक्क पुरुषाला आहे अगदी तसाच अधिकार स्त्रीलादेखील आहे. कुरआनचा आदेश आहे,
    "जे काही पुरुषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे स्त्रियांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.''     (दिव्य कुरआन, 4 : 32)
    वारसाहक्काबाबत कुरआन म्हणतो,
    "पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे.''        (दिव्य कुरआन, 4 : 7)
9)    इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मोठी मौल्यवान संपत्ती आहे. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. एखाद्या स्त्रीच्या सतीत्वावर आक्षेप घेणे आणि तिच्यावर व्यभिचार व चरित्रहीनतेचा आरोप करणे इस्लामच्या दृष्टिकोनातून हे सर्व मोठे अपराध व गंभीर गुन्हे आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माणसाला नष्ट करणाऱ्या सात गुन्ह्यांपैकी एकाचा उल्लेख असा केला आहे.
    "उत्तम चारित्र्यवान, श्रध्दावंत, भोळ्या-भाबड्या स्त्रियांवर मिथ्या आरोप करणे.''
    इस्लामने कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या निर्दोष स्त्रीवर व्यभिचार व चरित्रहीनतेचा मिथ्या आरोप करील त्याला ऐंशी फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये.
10) इस्लाम स्त्रीस समीक्षा व आपले मत व्यक्त करण्याचादेखील अधिकार प्रदान करतो. कुरआनने पुरुष व स्त्री दोघांना चांगुलपणाचा आदेश देण्याचा आणि कुकृत्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. कुरआनोक्ती आहे,
    "ईमानधारक पुरुष व ईमानधारक स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.''            (दिव्य कुरआन, 9 : 71)
यामध्ये धर्माचा प्रसार-प्रचाराचे, समाजाच्या विकासाचे कार्य, वैचारिक व प्रशासकीय विद्वान आणि अधिकाऱ्यांचे समीक्षा, टीका-टिप्पणी सर्व काही येते. स्त्रीने आपल्या मर्यादेत राहून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे तिचे कर्तव्य आहे.

लेखक    :    डॉ. फजर्लुरहमान फरीदी
अनुवाद    :    प्रा. अब्दुर्रहमान शेख


मुस्लिमांचा हा दृढविश्वास आहे की इस्लाम हा प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करतो. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु दुर्देवाने योग्य दृष्टीकोनाचा अभाव आहे. मुस्लिम हे अशा स्थितीत वागण्याबद्दलचे मार्गदर्शन नीटपणे समजून घेण्यास उत्सुक दिसत नाही. परिणामत: फक्त मुस्लिम समाजाचीच हानी होत नाही तर इस्लामची प्रतिमा मलिन होते आणि प्रमुख हेतुला मोठी हानी पोहचते.
वैविध्यपूर्ण समाजातील आज्ञाधारक जीवन व्यवहार पार पाडणे सामान्य मुस्लिमांना अधिक जड जाते. मुस्लिम व्यक्तीला सतर्क राहावे लागते कारण त्याच्या प्रत्येक जीवन व्यवहाराने एक संदेश जातो. त्याने आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारात इस्लामी शिकवणींचा अवलंब केला तर तो इस्लामचे योग्य चित्र इतरांपुढे ठेवत जातो. नाहीतर त्याच्या द्वारे इस्लाम बद्दल एक चुकीचा संदेश इतरांना पोहचतो. ह्यापेक्षा अधिक वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.
ह्या विद्वत्ता पूर्ण ग्रंथाद्वारे सुशिक्षित मुस्लिम व्यक्तीला काय करावे आणि काय करू नये याचे ज्ञान होते आणि सर्वसामान्य मुस्लिमांसाठी सुध्दा ते उपयुक्त ठरते.

आयएमपीटी अ.क्र. 109       पृष्ठे - 80    मूल्य - 20          आवृत्ती - 1 (2004)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/mioryvqvbgnduxfxnyh5hws6gf1435yw


पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. जगभरातील तब्बल १८० कोटी मुस्लिम बांधवांना इतिहासात प्रथमच एक अनोखा रमजान साजरा करण्याचे खडतर आव्हान असणार आहे.
एक मात्र खरे की बहुतांशी सर्व मुस्लिम राष्ट्रे तसेच युरोपमधील ब्रिटन, तुर्कस्थान असो की सौदी अरेबिया, इराण, इजिप्त तसेच मलेशिया, इंडोनेशिया ह्यांनी एकमताने कोरोनामुळे होणाऱ्या धार्मिक रूढी, परंपरांमध्ये बदल स्वीकार केला असून लागलीच कार्यवाहीदेखील अमलात आणली आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.
रमजान म्हणजे खरे तर शांतीचा संदेश देणारा महिना. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने जे जगभर थैमान घातले आहे त्यामुळे सर्व जगात लॉकडाउन आहे. जगातील मक्का, मदीनासह ब्रिटन, टर्की, मलेशिया, इंडोनेशिया राष्ट्रातील सर्व मस्जिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
रोजच्या नमाजबरोबर पवित्र रमजान महिन्यातील तरावीहची विशिष्ट नमाज कुठे अदा करावी? याबाबत भारतातील मुस्लिम विशेषता खेड्यापाड्यांतील अशिक्षित मुस्लिम बांधव मात्र संभ्रमात आहेत. यापूर्वी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कर्नाटकातील मुस्लिम बांधवांना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले, तेही मस्जिदीमध्ये. याहून आमच्या समाजाचे दुर्भाग्य ते काय असू शकते? आम्हीदेखील या घटनेला जबाबदार आहोत. अशा घटना केवळ पाहून चालणार नाही. या रमजान महिन्यात अशी एकही घटना घडणार नाही यासाठी मात्र सर्वांनी सतर्क राहाण्याची आणि एकमेकांना आधार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्व मुस्लिमांनी तरावीह नमाज घरातच अदा करावी, असे स्पष्ट संकेत "FIQH RULING SPERTAINING TO PERFORMING THE TARAWIH PRAYER IN OUR HOMES" या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल शेख सुलेमान अर् रूहाली जे इस्लामिक विद्यापीठ, मदीनाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि काबा मस्जिद, मदीनाचे इमाम म्हणून कार्यरत आहेत.
काय म्हटले आहे या अहवाल मध्ये?
१- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये तरावीह नमाज अदा केली होती आणि यावर्षी कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
२- गत वर्षी ज्यांनी मस्जिदीमध्ये काही कारणास्तव तरावीह नमाज अदा केली नव्हती आणि या वर्षी मस्जिदीमध्ये तरावीह नमाजसाठी निश्चय केला असेल परंतु कोरोनामुळे मस्जिदीमध्ये जाणे शक्य नाही, असे असले तरी या वर्षी घरात नमाज अदा केल्यास तेवढेच पुण्य अल्लाह त्यांच्या पदरी देणार आहे.
३- घरात अदा केलेली तरावीह नमाजलादेखील सुन्नह म्हणून गृहीत धरले जाईल.
४- एकाच कुटुंबातील व्यक्तींनी घरामध्ये सोशल डिस्टन्सिंगनुसार सामूहिक नमाज अदा करावी.
५-एकट्यानेदेखील तरावीह नमाजला मान्यता आहे, परंतु घरातील सर्वांनी त्यात सामील होताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास त्यास अधिक प्राधान्य असेल.
या काळात बुद्धिजीवी मुस्लिमवर्ग, वैचारिक संघटना, सेवाभावी संस्थांनी प्रामुख्याने पुढे येऊन सामान्य मुस्लिम बांधवांचे प्रबोधन करण्याची अत्यंत गरज आहे.
या रमजानच्या काळात मुस्लिमांना खालील जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ज्या महाराष्ट्र शासनाने बंधनकारक ठरविल्या असून तसे आदेश दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहेत.
१- कोणत्याही परिस्थित मस्जिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी हजर राहू नये.
२- घरच्या /इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
३- मोकळ्या मैदानावर /ईदगाह येथे एकत्र जमून नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
४- घरातच नमाज, तरावीह आणि इफ्तार कार्यक्रम पार पाडावेत.
खरे तर कोरोनाचे आव्हान आम्ही सकारात्मक स्वीकारले तर अनेक बाबी उलघडू लागतात. या रमजानचा विचार केल्यास ‘वर्क फ्रॉम होम’प्रमाणे ‘नमाज फ्रॉम होम’ हे सर्व जण स्वीकारत आहेत. त्याचबरोबर कुरआनचे पठण यापूर्वी वेळ नसलेल्यांना लॉकडाऊनमधील फावला वेळ सत्कारणी लावता येणार आहे. हा रमजान म्हणजे न भूतो न भविष्यती असाच असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनातील हा पहिलाच अकल्पित असा प्रसंग अनुभवावा लागणार आहे. रोजा स्वत: उपाशीपोटी राहून इतरांची भावना ओळखण्याबरोबर निराधार, गरीब मजूर यांच्या पोटासाठी धावून जाणे शिकवत आहे. या कोरोनाने आमचे रियल हिरो हे चित्रपटातील कलाकार, खेळांमधील आंतरराष्ट्रीय नावाजलेले खेळाडू नसून आजमितीला आमच्या जीविताचे रक्षण करणारे हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स असो की पोलीस कर्मचारी किंवा शेतात राबणारे शेतकरी हेच आमचे देवदूत असणार आहेत हे सिद्ध होते.
कोरोनामुळे रमजान दैनदिनीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. जगभरातील बहुतांशी मस्जिदींतील समित्यांनी गरजूंच्या सेवेसाठी  वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. या काळात अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी, इफ्तारच्या माध्यमातून अन्न पदार्थांचे पॅकेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची योजना आखली आहे. भारतामध्येदेखील जमाअत-ए-इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी गरीब, निराधार व गरजूंपर्यंत रमजानच्या काळात अन्नपदार्थ व जीवनावश्यक वस्तू पोहोचवत असतेच. आता मात्र प्रत्येक गावागावांमधील मस्जिदींच्या समित्या असतील, मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीने, सेवाभावी संस्थांनी रस्त्यावरील गरीब, मजूर, निराधार यांच्यापर्यंत अन्नदान आपआपल्या परीने नियोजनबद्धरीत्या पोहोचवले पाहिजे. त्याचबरोबर अहोरात्र सेवेसाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांनाही लाभ देण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच...!
या कामी कॉर्पोरेट व्यवस्थापनासारखे तंत्र अवलंबणे महत्त्वाचे ठरेल. कालानुरूप सर्वांना बदलावे लागणार आहे. उदा. मस्जिदीच्या परिघात किती मुस्लिम कुटुंब राहातात त्यांची यादी कुटुंबप्रमुख, कुटुंबातील एकूण लोकांची संख्या, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यासह समाज सुधारणेसाठी ते कुटुंब काय योगदान देऊ शकते? याचा आढावा घेतला पाहिजे. या सूचीवरुन नेमके गरजू शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होईल. केवळ पैसाच नव्हे तर एखाद्या मुस्लिम मानसोपचारतजज्ञाचा समुपदेशांनासाठीदेखील मोठा उपयोग होईल. एखाद्या तरुणाचा त्याच्या क्षमतेचा उपयोग दुसऱ्याच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी होऊ शकेल.
कोरोनामुळे अनेक बुद्धिजीवी वर्गातील घटक एकत्र येऊ लागले आहेत. सर्वप्रथम मुस्लिम पत्रकारांना एकत्र येऊन सध्याचा काळात मुस्लिमांवर लागणारे दोषारोप कसे दूर करता येतील यासाठी पुढाकार घेऊन काम करावे लागणार आहे. मुस्लिम समाजात हळू हळू बदल घडू लागले आहेत, ही जमेची बाजू असली तरी सर्व बुद्धिजीवी घटकांनी मोठ्या प्रमाणात पुढे येणे काळाची गरज ठरणार आहे. पत्रकारांसोबत डॉक्टर्स, प्राध्यापक, इंजीनियर्स, शासकीय सेवेतील अधिकारी यांचे स्वतंत्र ग्रूप तयार होऊन प्राथमिक स्वरुपात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर महाराष्ट्र असे सुरू करावेत. तीन महिन्यांतून या सर्व ग्रुपनी एकत्र जमा होऊन विचारांची देवाणघेवाण अर्थात ‘थिंक-टँक’ बनवावेत. समाजातील उपेक्षित जे घटक आहेत ज्यांना पैशाची, कर्जाची गरज भासते, तसेच शिक्षणासाठी गुणवत्ता असूनदेखील प्रवेशाला मुकावे लागते, अशांसाठीही इस्लामिक बँक प्रणाली महत्त्वपूर्ण ठरू शकते. या कामी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आणि निवृत्त शिक्षित मुस्लिमांचा मोठा हातभार लाभू शकतो. गावागावांतील सर्वांनीच एकजुटीने समाज सुधारणेसाठी (टीमवर्कने) काम करणे अपेक्षित आहे. या कामी धर्मगुरू, उलेमा, जमाअतचे सहकार्यदेखील मोठी दिशा देऊ शकते.
रमजानच्या निमित्ताने दरवर्षी नित्यनियमाप्रमाणे इफ्तार पार्टी, त्यासाठी लाजवाब पदार्थ हे सर्वत्र पाहावयास मिळतात. परदेशीच काय पण भारतामध्ये शहरांमधून सर्रास स्टॉल लावले जातात. मुस्लिमच नव्हे तर इतर धर्मीयदेखील या खाद्य पदार्थांचा मोठ्या आनंदाने आस्वाद घेत असतात. या वर्षी मात्र या सर्व बाबींना मुकावे लागणार आहे.
परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मुस्लिम राष्ट्रांमधून तसेच मलेशिया, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्समध्ये रमजान इफ्तार स्टॉल्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. उद्देश सोशल डिस्टन्सिंग हाच होय. यामुळे मात्र केटरिंग व्यवसाय धोक्यात आला असून वर्षभरातील ३० ते ४५ टक्के रमजानमध्ये होणारा व्यवसाय लयास गेला आहे.
या रमजानमध्ये खरे गरजू शोधून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता आले पाहिजे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने किमान एका व्यक्तीसाठी दोन वेळचे पोटभर जेवण देण्याचे सत्कर्म जरी घडवून आणले तरी हजचे पुण्य पदरी पडल्याचे भाग्य मिळू शकेल.
नमाजपूर्वी अजान देण्याच्या माध्यमातून मस्जिदीत प्रार्थनेकरिता येण्याचे आवाहन करण्यात येते. आता मात्र या कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी अजानमधून ‘घरातच नमाज अदा करा’ किंवा ‘जिथे असाल तिथेच नमाज अदा करा’ असे बदलाचे सुतोवाच संपूर्ण जगभरातून विशेषता मुस्लिम राष्ट्रांत स्वीकारण्यात आले आहे. ही खरोखरच इस्लामध्ये धार्मिक विधींबाबत विशिष्ट प्रसंगी सवलतीची पोचपावती म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
मुस्लिमांना मानवसेवा करण्याची इतिहासातील ही अनोखी संधी कोरोना अर्थात रमजानच्या निमित्ताने चालून आली आहे, तिचा सकारात्मकदृष्ट्या स्वीकार हा करावाच लागेल!

- अस्लम जमादार

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget