Latest Post

माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘आजाऱ्याजवळ विचारपूस करण्याच्या बाबतीत गोंधळ घालू नये आणि अल्पकाळ बसणे ‘सुन्नत’ (पैगंबर मुहम्मद (स.)  यांची परंपरा) आहे.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
हा उपदेश सामान्य आजाऱ्यांसाठी आहे परंतु जर  एखाद्याचा जीवाभावाचा (संकोच न बाळगणारा) मित्र आजार पडला आणि त्याला असा अंदाज वाटत असेल की तो बसला तर त्याला  आवडेल तेव्हा तो बसून राहू शकतो.

मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या शेवटच्या हजप्रसंगी (यानंतर ते जगातून निघून गेले.) लोकसमुदायाला उद्देशून म्हटले, ‘‘ऐका!  अल्लाहने तुमचे रक्त, संपत्ती व अब्रू प्रतिष्ठित बनविली आहे. ज्याप्रकारे तुमचा हा दिवस, हा महिना आणि हे शहर प्रतिष्ठित आहे. ऐका, मी तुमच्यापर्यंत पोहोचविला?’’ लोकांनी  उत्तर दिले, ‘‘होय, पैगंबरांनी पोहोचविले.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह, तू साक्षी राहा की मी लोकसमुदायापर्यंत तुझा संदेश पोहोचविला.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीन वेळा उच्चारले. मग  म्हणाले, ‘‘ऐका! पाहा, माझ्यानंतर तुम्ही आपसांत मुस्लिम असूनदेखील एकमेकांच्या माना कापण्याइतपत सत्य नाकारणारे बनू नका.’’ (हदीस : बुखारी)

माननीय जरीर बिन अब्दुल्लाह (रजि.) यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातावर वचन दिले (बैअत केली) की नियमानुसार नमाज अदा करीन, जकात अदा करीन आणि प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशी चांगुलपणाने वागेन.’’ (हदीस  : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘बैअत’चा मूळ अर्थ आहे विक्री करणे. म्हणजे मनुष्य ज्याच्या हातावर ‘बैअत’ करतो मुळात तो या गोष्टीचे वचन देतो की मी जीवनभर हे वचन पाळीन. माननीय जरीर (रजि.) यांनी  पैगंबर मुहम्मद (स.) यांना तीन गोष्टींचे वचन दिले, नमाजला तिच्या सर्व अटींनुसार अदा करणे, जकात देणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुस्लिम बंधुंशी कोणताही धोक्याचा  व्यवहार न करणे, त्यांच्याशी कृपेने, सहानुभूतीने आणि दयेने वर्तणूक करणे. या हदीसवरून माहीत होते की मुस्लिमांनी आपसांत कशाप्रकारे राहिले पाहिजे. माननीय नुअमान बिन  बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू मुस्लिमांना आपसांत सहानुभूतीने वागताना, प्रेम करताना आणि एकमेकांकडे झुकताना पाहशील, जशी  शरीराची स्थिती होते जेव्हा एका अवयवाला रोग होतो तेव्हा शरीराचे इतर अवयव सुंध होतात आणि तापाबरोबर त्याची साथ देतात.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शरीराचे उदाहरण देऊन मुस्लिमांनी शरीराच्या अवयवांसारखे असायला हवे असे न सांगता मुस्लिमांच्या एका निरंतर राहणाऱ्या गुणवैशिष्ट्यादाखल सांगतात  की जेव्हा जेव्हा तू त्यांना पाहशील तेव्हा ते एकमेकांशी कृपा व सहानुभूती बाळगणारेच आढळून येतील.

Makkah
मुस्लिमांना हे सांगितले जात आहे की, एकेश्वरत्व काय आहे आणि त्यांना समजून घ्यावे लागत आहे की एकेश्वरत्व हा आहे. तसे पाहिले असता स्वत:ची सामान्य स्थिती पाहता मी सांगू शकतो की मी मुस्लिम आहे. मी मुस्लिम मातापित्याच्या घरी जन्मलो. माझे आई-वडील मुस्लिम होते. माझ्या कानातसुद्धा 'ला इलाहा इल्लल्लाहु' (अर्थात-अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही.) चा ध्वनी पोचला. मला एकेश्वरत्व मान्य आहे कारण एकच अल्लाहला मी मानतो. व्यवहाराची गोष्ट मी करीत नाही, धार्मिक जीवनात माझ्यात व त्या व्यक्तीच्या दरम्यान उल्लेखनीय फरक आहे, जी एकेश्वरत्वाला मानीत नाही. ती आपल्या देवी-देवतांची पूजा करते आणि मी अल्लाहचे नाव घेतो, जेव्हा ईश कृपा होते, तेव्हा मी पवित्र कुरआनचेच पठन करतो आणि गीता अथवा बायबल अथवा तौरेतचे करीत नाही. या पवित्र कुरआनमध्ये काय लिहिलेले आहे? हे तर धर्मपंडितच जाणतात. मी तर याचे पठन करतो. जेव्हा शपथ घेण्याचा प्रसंग ओढवतो तेव्हा मी अल्लाहची आणि पवित्र कुरआनचीच शपथ घेतो, दुसऱ्या कुणाची नाही कारण मी मुस्लिम आहे, एकेश्वरवादी आहे. जेव्हा एखादे नवस करतो तेव्हा कोणत्याही देवी अथवा देवताच्या स्थानावर नाही, मुस्लिम संतांच्या समाधीवर जातो. याच प्रकारच्या वारसाने मिळालेल्या इस्लामने हा प्रश्न उभा केला आहे की, एकेश्वरत्व काय आहे? आणि कदाचित याच इस्लामला पाहून कवि हालीने म्हटले होते -
करे गैर गर बुत की पूजा तो काफिर, जो ठहराए बेटा खुदा का तो काफिर।
झुके आगपर बहर सजदा तो काफिर, कवाकिब में माने करिश्मा तो काफिर॥
मगर मोमिनोंपर कुशादा हैं रहे परस्तिश करे शौक से जिसकी चाहे।


अर्थात - इतर कुणी मूर्तीपूजा केली तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. जसे हिंदू, जर कुणी एखाद्याला (येथे संदर्भ येशू ख्रिस्त) ईश्वराचा पुत्र मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा. जर कोणी (येथे संदर्भ अहुरमज्दला मानणारा अग्निपूजक पारशी समाज) अग्नीसमोर नतमस्तक झाला तर तो अल्लाहचा इन्कार करणारा मानला जातो. तर एखाद्याने तेजस्वी ताऱ्यामध्ये चमत्कार असल्याचे मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. परंतु श्रद्धावंतांसाठी (मुस्लिमांसाठी) सर्व मार्ग मोकळे आहेत. त्यांनी आपल्या इच्छेनुसार कोणतीही पूजा करावी.
याच्या पुढे जाऊन एकेश्वरत्व असा आहे की, आराधना आणि अर्चना अल्लाहची करा आणि आज्ञापालन त्या शक्तीचे करा, ज्याची आज्ञा काळावर चालत असेल. याशिवाय त्याचे आज्ञापालन कराल तर अल्लाहचे भय बाळगून करा. अल्लाहच्या भीतीसारख्या स्थितीत सेवा, सैतानाच्या आज्ञेचे पालन अथवा त्या शक्तीच्या आज्ञेचे पालन करा जी काळावर आपला हुकूम चालवीत आहे. जर तिला भिऊन तिची सेवा कराल तर या गोष्टीचा मेळ एकेश्वरत्वाशी बसत नाही. असे नव्हे तर अल्लाह ज्याची आज्ञा पूर्णपणे पाळली जाते, असे मानून अल्लाहच्याच भयाने थरथरत त्याच्या द्रोहींची सेवा व आज्ञापालन करू नका, कारण तुम्ही एकेश्वरवादी आहात. एकेश्वरत्वाच्या विरुद्ध त्या गोष्टीपासून तरी स्वत:ला वाचवा ज्या पुरातन काळापासून अनेकेश्वरत्व म्हणून ओळखल्या जातात. परंतु जे अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान आहेत, ज्यांना सामान्यत: अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान नाही तर शासक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचे जग वेगळे आहे आणि आमचे वेगळे. जर असे कराल तर ही ऐहिकता ठरेल जी धार्मिकतेच्या विरुद्ध आहे.

जगाच्या प्रत्येक धर्मात ईश्वराची कल्पना आहे. उपासनेची कल्पना आहे. शुद्धतेचे काही समान असलेले प्रकार प्रत्येक धर्मात आढळतात. प्रत्येक धर्मात आपल्या मानलेल्या उपास्यांसमोर नमले जाते, मस्तक टेकले जाते, त्याच्याच नावे बळी दिला जातो, त्याच्याचसाठी उपाशी राहिले जाते, नजराणे दिले जातात. इस्लाम या सर्व प्रकारांना एका ईश्वरासाठी निश्चित करतो. तो म्हणतो “हे पर्वत, या नद्या, हे चंद्र, हा सूर्य, ही दूध देणारी जनावरे, हे चावणारे सर्प, विंचू, हे सर्व तुमच्यापेक्षा निम्नतर आहेत. त्यांना तुमच्या सेवेसाठी निर्मिले आहे. त्यांच्यापैकी कोणासमोर तुमचे हात पसरणे, तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाचे नमणे; तुमच्या मस्तकाचा अपमान आहे, कृतघ्नता आहे, नीचपणा आहे, अनेकेश्वरत्व आहे. तुमच्यासमोर फरिश्त्यांना (देवदूतांना) नतमस्तक करविले गेले. तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाला ही गोष्ट शोभा देते की, त्याने कुणासमोर कदापि नमू नये आणि आपल्या निर्मात्या व स्वामीसमोर अवश्य नमावे. जर तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आपल्या एकमेव ईश्वर ज्याचा कोणीही सहभागी नाही. अशा अल्लाहच्या समोर नम्र राहाल तर त्याच अर्थाने स्वत:देखील अद्वितीय व्हाल."
या दृष्टिकोनाने म्हणजे ईमान (श्रद्धा) व उपासनेच्या वर्तुळात मुस्लिमांची फार मोठी संख्या एकेश्वरत्वाच्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. ते संतुष्ट आहेत आणि समजतात की, “आम्ही एकेश्वरत्वाच्या निकडी पूर्ण करीत आहोत." तर खात्रीने या वर्तुळाच्या सीमेपर्यंत त्यांचा संतोष अगदी बरोबर आहे. यात कोणतीही मतभिन्नता नाही. निश्चितपणे या दृष्टिकोनाने म्हणजे श्रद्धा व उपासनेत ते एकेश्वरत्वाच्या निकडी श्रद्धापूर्वक पूर्ण करीत आहेत. वाणीने व कृतीनेसुद्धा. परंतु जसे प्रारंभीच सांगितले आहे मानवाच्या अस्तित्वाचा आणखी एक दृष्टिकोन आहे.
मानव हा एका समुदायाचा अंश, एक सामाजिक अस्तित्व आहे. तो एकटा जन्माला तर आला आहे; परंतु एकटा राहत नाही आणि राहूही शकत नाही. जेथे एकाचे दोन झाले की समाजरचना सुरू झाली आणि सामूहिकतेच्या निकडीसमोर येऊ लागल्या. आपापसातील प्रेम, दयाभाव, समदुःखीभाव, ऐक्य व प्रेम, सहानुभूती व दुःख, विमोचन, त्याग व निष्ठा, यासारखे गुण एका चारित्र्यसंपन्न समाजासाठी आवश्यक व उत्तम गोष्टी होत. परंतु आणखी एक गोष्ट सामूहिकतेसाठी आवश्यक आहे आणि ती म्हणजे अत्याचार! मानवाची खुद्द आपली सामूहिक आवश्यकता आहे की, एखादी शक्ती अशी असावी जिने मानवाच्या हक्क व सीमांची निश्चिती करावी आणि त्यांना सामर्थ्य व शक्तीनिशी ठरवलेल्या सीमांचे पालन करणारे ठेवावे. जर अशी एखादी शक्ती विद्यमान नसेल तर मानवाचा अजाणपणा, त्याची इच्छा आणि त्याचा स्वार्थ दुसऱ्यांच्या सीमेवर अतिक्रमण करील. जी व्यक्ती तुलनेने अधिक शक्तिमान असेल ती विनावेसणीच्या बैलाप्रमाणे ज्या हिरव्या शेतात इच्छिल त्यात तो घुसेल आणि त्याला रोखणारा कुणीच असणार नाही. लोकांची न अब्रू सुरक्षित राहील, न प्राण न वित्त, यालाच अराजकता असे म्हणतात. इतिहासात एखादासुद्धा दिवस असा आढळत नाही की, एखादा मानवी समाज अशा अराजकतेच्या अवस्थेत राहिला असेल. प्रत्येक काळात सुसंस्कृत मनुष्य कोणा न कोणा शक्तीच्या आधीन राहिलेला आहे. कोणती न कोणती शासक शक्ती त्याला सामर्थ्य व शक्तीनिशी ठरलेल्या सीमेच्या बंधनांत ठेवणारी राहिली आहे. मग ती शासक शक्ती एखाद्या मानवी समाजातून वर आलेली असो अथवा कुठून बाहेरून येऊन आच्छादली असो. यापेक्षा वेगळी स्थिती अर्थात अराजकता अव्यवहार्यच नव्हे तर अकल्पनीय आहे. साम्यवादी तत्त्वज्ञानात अवश्य एका अशा स्थितीचे स्वप्न पाहिले अथवा दाखविले गेले आहे की, जेव्हा शक्तीने आर्थिक समानता आणली जाईल तेव्हा मानवी मूल्ये बदलतील आणि स्वार्थ व चुकीच्या इच्छांना मूठमाती मिळेल. त्यानंतर मनुष्याला याची गरज भासणार नाही, की एखाद्या शक्तीने त्याला बळजबरीने आपल्या सीमेत ठेवावे आणि ही शक्ती जिचे दुसरे नाव शासन आहे, वाळलेल्या पानाप्रमाणे गळून पडेल. परंत ही एक काल्पनिक गोष्ट आहे व मी या अर्थाने तिला साम्यवादी तत्त्वज्ञान म्हटले आहे की ही कल्पना जगतातील एक कल्पनेची भरारी आहे. व्यावहारिक जगताशी याचा काडीमात्र संबंध नाही. एवढेच नव्हे, तर साम्यवादी व्यवस्थेने तर आणखीनच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, मनात स्वत: आपल्या नैसर्गिकतेच्या दृष्टीने या गोष्टीचा मोताद आहे की, त्याचे एखादे आश्रय स्थान असावे, ज्याप्रमाणे स्त्रीच्या नैसर्गिकतेची गरज आहे की तिला एक छत्रछाया असावी, एक पांघरून असावे की, ज्याच्या छायेत राहून तिने शांतता प्राप्त करावी. याच झाकणाला ‘पती' म्हणून संबोधतात. अगदी याचप्रमाणे मानवी समाजाची आवश्यकता, त्याच्या स्वभावाला एका पतीची आवश्यकता आहे, ज्याच्या छायेत त्याने निश्चिंत होऊन राहावे, ज्याचे आज्ञापालन करावे. एवढेच नव्हे तर महिलांमध्ये अशी उदाहरणे सापडतात की, एखाद्या मागासलेल्या अथवा प्रगत महिलेने कोणत्या न कोणत्या प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य पतिविना व्यतीत करावे. परंतु मानवी समाज एखाद्या शासक शक्तीविना एक दिवससुद्धा जीवित राहू शकत नाही. असे एखादे उदाहरण वर्तमान काळात मिळत नाही, न इतिहासात, न मानवी बुद्धी अशा स्थितीची कल्पना करू शकते. मानवी समूहाची ही आवश्यकता विविध काळांत आणि विविध प्रदेशांत विविध पद्धतींनी पूर्ण होत राहिली आहे.

लेखक - डॉ. युसुफ़ करज़ावी


भाषांतर - नौशाद उस्मान


हे पुस्तक दोन भागात संकलित आहे. पहिल्या भागात भारताशी संबंधित माहिती दिली गेली आहे आणि येथील मुस्लिम शासकांच्या इतर देशबांधवाप्रती व्यवहारासंबंधी वर्णन केलेले आहे. संपुर्ण माहिती अल्लामा (आचार्य) शिबली नोमानी (रह.) चा संग्रह “मकालाते शिबली" आणि "औरंगज़ेब आलमगीर पर एक नज़र", अल्लामा (आचार्य) सैयद सुलैमान नदवी यांचा संग्रह “मकालाते सुलैमानी", सैयद सबाहुद्दीन अब्दुर्रहमान यांचे पुस्तक 'हिंदुस्तान के सलातीन उलमा और मशाएख पर एक नज़र' आणि 'बाबरी मस्जिद', सैयद मुहम्मद मियाँ यांचे पुस्तक 'उलमा-ए-हिंद का शानदार अतीत' आणि उडीसाचे माजी राज्यपाल श्री. बी. एन. पांडे यांचे 'खुदाबख्श ओरियंटल पब्लिक लाइब्रेरी' चे प्रसिध्द वार्षिक अभिभाषण "इस्लाम और इंडियन कल्चर" या पुस्तकांतून घेतलेली आहे.
सदर पुस्तकाचा दुसरा भाग इस्लामी जगताचे प्रसिध्द लेखक अल्लामा युसूफ करज़ावी, यांचे अरबी भाषेतील पुस्तक 'गौरूल मुस्लिमीन फ़िल मुज्नमईल-इस्लामी' चे भाषांतर आहे. या पुस्तकात लेखकांनी कुरआन हदीस (पैगंबर साहेबांची वचने) व प्रामाणिकधर्मशास्त्रीय मीमांसा यांच्या दाखल्यांसहीत सिध्द करण्याचा प्रयत्न केलाआहे. इस्लामी समाजात देशबांधवांना (अन्य धर्मियांना) किती आणि कोण-कोणते हक्क प्राप्त आहेत, त्या हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी (हक्कांना प्राप्त करण्यासाठी) काय - काय कर्तव्ये आहेत, त्यांच्यावर कोण-कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. इस्लामने किती महान सहिष्णुतेची शिकवण दिली आहे, इतर धर्म-समुदायांसोबत इस्लामचा तुलनात्मक अभ्यास काय सिध्द करतो आणि इतिहासकाय साक्ष देतो?
या गैरसमजूतीच्या वातावरणात हे पुस्तक लोकांसमोर वास्तविकता प्रगट करण्यात यशस्वी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! हाच या पुस्तकाचा मुख्य उद्देश्य आहे.
 



आयएमपीटी अ.क्र. 87   पृष्ठे - 145      मूल्य - 30      आवृत्ती - August 2004

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/8gyrqnz0z7286tkjgwrz5ij4joc9lnbx

माननीय मुआज (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर एका ‘गजवा’ (इस्लामसाठी केलेले युद्ध - जिहाद) मध्ये गेलो. लोकांनी राहण्याची जागा कमी  केली आणि मार्ग बंद केला. पैगंबरांनी एका मनुष्याला पाठवून उद्घोषणा केली, ‘‘जो कोणी राहण्याची  जागा अडवील अथवा मार्ग बंद करील त्याला ‘जिहाद’चे पुण्य लाभणार नाही.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
लोकांनी आपली राहण्याची जागा लांब-रूंद आणि विस्तृत केली होती आणि आणखीन पसरून राहात होते. परिणामस्वरूप चालणाऱ्यांना त्रास होऊ शकत होता. म्हणून पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी असे जाहीर करविले की, ‘‘जे लोक प्रवासात निघाले आहेत आमि त्यांचा हा प्रवास पुण्याईचा प्रवास ठरो यासाठी त्यांनी पसरून न राहता आवश्यकत तेवढ्याच जागेत राहावे,  जेणेकरून दुसऱ्या साथीदारांना राहाण्यासाठी जागा मिळावी अथवा ये-जा करण्यात त्यांना त्यास होऊ नये.

आजाऱ्याची विचारपूस
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, ‘‘हे आदमपुत्रा! मी आजारी होतो तेव्हा तू माझी  विचारपूस करण्यासाठी आला नाहीस.’’ तेव्हा तो म्हणेल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझी विचारपूस कशी करणार, तू तर संपूर्ण जगाचा पालनकर्ता आहेस?’’ तेव्हा अल्लाह म्हणेल,  ‘‘तुला हे माहीत नव्हते काय की माझा अमुक दास आजारी पडला होता तेव्हा तू त्याची विचारपूस करण्यासाठी गेला नाहीस. तुला हे माहीत नव्हते काय की जर तू त्याची विचारपूस  केली असतीस तर त्याच्याजवळ तुला माझे सान्निध्य आढळले असते? (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
आजाऱ्याची विचारपूस करणे म्हणजे फक्त एखाद्या आजारी माणसाच्या घरी जाणे आणि त्याची स्थिती कशी आहे हे विचारणे एवढेच नसून आजाऱ्याची वास्तविक आणि खरी विचारपूस  म्हणजे जर तो गरीब असेल तर त्याच्या औषधपाण्याची व्यवस्था करणे अथवा गरीब नसेल मात्र कोणी वेळेवर औषध आणणारा व पाजणारा नसेल तर त्याची काळजी घेणे. माननीय  अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आजाऱ्याची विचारपूस करा आणि भुकेल्याला जेऊ घाला आणि कैद्याच्या सोडवणुकीची व्यवस्था करा.’’  (हदीस : बुखारी)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, एक ज्यू मुलगा पैगंबर मुहम्मद (स.) यांची सेवा करीत होता. तो आजारी पडला तेव्हा पैगंबर त्याची विचारपूस करण्यासाठी गेले. त्याच्या  उशीजवळ बसले आणि त्याला म्हणाले, ‘‘तू इस्लामचा स्वीकार कर.’’ त्याने आपल्या जवळच बसलेल्या वडिलांकडे पाहिले. ते (मुलाचे वडील) म्हणाले, ‘‘तू पैगंबर मुहम्मद (स.) यांचे  म्हणणे मान्य कर.’’ तेव्हा त्या मुलाने इस्लामचा स्वीकार केला. त्यानंतर पैगंबर त्याच्या घरातून असे म्हणत निघाले, ‘‘अल्लाहची कृपा आहे ज्याने नरकापासून त्याला वाचविले.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन मित्र आणि शत्रू सर्वांना ठाऊक होते आणि सर्व ज्यू लोक पैगंबरांचे शत्रू नव्हते. या ज्यूचा पैगंबरांशी वैयक्तिक संबंध होता म्हणून त्याने  आपल्या मुलाला पैगंबरांची सेवा करण्यासाठी पाठविले होते.

रमजान महिना खर्‍या अर्थाने जगण्याचा मार्ग दाखवितो. याच महिन्यात कुरआनचे अवतरण झाले आणि रोजे अनिवार्य केले गेले. कुरआन ईमानधारकांसाठी अशी देणगी आहे, जी सत्याचा मार्ग दाखवितेे आणि खर्‍या यशस्वीतेकडे घेउन जाते. मानवकल्याणाचा हा उपहार आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचन केले तर आयुष्यात सर्वांगीण समृद्धी आल्याशिवाय राहत नाही.
इस्लाम धर्माची ईमान, नमाज, रोजा, हज आणि जकात ही प्रमुख पंचतत्वे आहेत. यापैकी रमजानचे रोजे करून गोरगरीबांना जकातचे वाटप करणे, गरजूंची आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करणे आवश्यक आहे. रमजानचा महिना शांततेतचा, मिळकतीचा व बरकतचा (भरभराट) महिना म्हणून प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे बंधुभाव, मांगल्य व मानवतेचा संदेशवाहक म्हणूनही पवित्र रमजानकडे पाहिले जाते. ईतर महिन्यांच्या तुलनेत रमजानमध्ये प्रत्येक सत्कर्माचे फळ सत्तर पटीने वाढवून दिले जाते. म्हणूनच जकातचे वाटप रमजानमध्येच आवर्जून केले जाते. समाजात आर्थिक समता, स्थैर्य रहावे व धनिकांना, श्रीमंतांना गरीबांविषयी आपुलकी निर्माण होऊन त्यांच्या दु:खाची सदैव जाणीव रहावी हा जकात अनिवार्य असण्यामागील मुख्य उद्देश आहे.
रमजानचे तीन भाग - कृपा, क्षमा आणि मोक्ष. या महिन्यात अल्लाहच्या कृपेचा व क्षमेचा झरा ओसंडून वाहतो. रमजानचे रोजे अनिवार्य आहेत. कुरआनमध्ये अल्लाह आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणतो की, ” हे ईमानधारकानों!, विहित केले तुमच्यावर उपवार जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.” (कुरआन : सुरह बकरा 183).
रमजानमध्ये ईशआराधनेत व्यत्यय आणणार्‍या उपद्वव्यापी सैतानास कैद केले जाते. रोजा या आराधनेला धार्मिक महत्व असण्यासोबतच वैज्ञानिक महत्वदेखील प्राप्त आहे. म्हणूनच तरूण वर्ग देखील रमजानच्या रोजांचे पालन हिररीने करतात. काही ठिकाणी तर शारीरिक समतोल राखण्यासाठी मुस्लिमेत्तर बांधवदेखील रोजाचे पालन काटेकोरपणे करतात.
कोणतेही आदेश मग तो शासकीय असो वा धार्मिक जोपर्यंत त्याविषयी आवश्यक असणारी माहिती आपणांस मिळत नाही तोपर्यंत आपण त्या आदेशाची अचुकपणे अंमलबजावणी करू शकत नाही. तर मग रमजानच्या रोजांचे अचुकपणे पालन करण्यासाठी -(उर्वरित आतील पान 7 वर)
काही मुख्य गोष्टी जाणून घेऊया. रोजा कसा करावा : सर्वप्रथम सुर्योदयापूर्वी जेवण (सहरी) करून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी वर्ज्य करावे. दैनंदिन कामे सांभाळून नेहमींसारखे पाच वेळेची नमाज पठण करावी. सायंकाळी सूर्यास्तावेळी अल्लाहचे स्तुतीपठण (ईशस्तुती) करून खजूर खाऊन रोजाची सांगता करावी. रोजादरम्यान अन्नपाणी वर्ज्य करण्यास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्व वाईट सवई व व्यसनं कटाक्षाने टाळण्याला आहे. शिवराळ भाषा न वापरणे व आपल्या तोंडून शत्रूंबद्दलही अपशब्द येऊ न देणे याला फार महत्व आहे. एरव्ही गप्पांच्या ओघात सहज तिसर्‍या व्यक्तींविषयी कुचाळक्या सुरू होतात. या सर्व वाईट सवयी निश्‍चितच रमजानमध्ये निषिद्ध आहेत. पण एरव्ही आयुष्यात या वाईट सवई टाळल्या गेल्या तर आयुष्य सुकर व शांततामय होईल. 
जाणीवपूर्वक काही खाल्याने, प्यायल्याने रोजा भंग होतो. रोजाची पूर्तता करण्यासाठी कोणाला सुट आहे - गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री, गंभीर आजारी असणारे व्यक्ती, वेडसर व्यक्ती, वृद्धत्वास पोहोचलेले, लांबचा प्रवास करणारे. यांच्यासाठी सवलत आहे. प्रवासी व आजारी लोकांना सवड मिळाल्यानंतर ते रोजे पूर्ण करावयाचे आहेत. याला कजा रोजे भरपाई म्हटले जाते. हाच नियम गरोदर व स्तनपान करणार्‍या स्त्रियांसाठीही आहे. अतिशय निग्रहाने हे कजा रोजे करणे आवश्यक आहे. पण असे वृद्ध व्यक्ती ज्यांना दीर्घ वयोमानानुसार खूप थकवा, कमजोरी जाणवत असेल व यामुळे भविष्यातही त्यांना कधी सुदृढ स्वास्थ्य प्राप्त होणे शक्य नसेल अशांसाठी इस्लामने खूप सुंदर मार्ग दाखवला आहे. म्हणजेच अशा वयोवृद्धांतर्फे एक रोजाच्या बदल्यात एक गरीब, गरजुला 2 वेळेचे भरपेट जेवण देणे. किती सोपा व सुंदर मार्ग आहे. जेणेकरून गरीबास 2 वेळेचे पोटभर जेवणही मिळेल व वयोवृद्धांना रोजा करून पुण्यप्राप्तीचे समाधानही मिळेल.
रमजानचे आगमन दरवर्षी होते व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्याचे स्वागतही केले जाते. परंतु यावर्षी परिस्थिती नेहमीसारखी नाही. कोरोनारूपी विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळेच रमजान व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. पवित्र रमजानमध्ये तरावीहची नमाज रोज रात्री पठण केली जाते. ते ही मशीदीमध्ये सामुहिकरित्या. पण कोरोनामुळे रमजानपूर्वीच सर्वधर्मी प्रार्थनास्थळे प्रशासनाने बंद केली आहेत. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग टाळला जाईल. महामारीच्या वेळेस प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले, जर एखाद्या शहराविषयी, देशाविषयी तुम्हास माहिती प्राप्त झाली की, तिथे ’ताऊन’ (संसर्गजन्य साथीचा रोग) पसरला आहे. तर त्या शहरात, देशात अजिबात प्रवेश करू नका. जर का तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात, परिसरात ताऊन पसरला असेल तर मग अजिबात बाहेर जाऊ नका. जिथे आहात तिथेच रहा. जेणकरून एकमेकांना होणार्‍या संसर्गाचा धोका टळेल’ (सही बुखारी, बाबे ताऊन). यावरून आमच्या लक्षात येते की, प्रेषित सल्ल. यांनी 1441 वर्षांपूर्वीच महामारीशी कशी लढावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.
या पवित्र रमजान महिन्यातच कुरआनचे अवतरण झाले आहे. यामध्ये बुद्धिवंतांसाठी अनन्यसाधारण मार्गदर्शन आहे. जीवनाचा खरा मार्ग कोणाला शोधायचा असेल तर त्याने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचले पाहिजे. बंधूनों, आम्ही ऐहिक सुखासाठी रात्रंदिवस मरमर करतो. स्वत:च्या अस्तित्वाला जाणून घेण्यासाठी, अल्लाहने आम्हाला पृथ्वीवर कशासाठी पाठविले आहे, याचा कधी विचारही करीत नाही. जीवन जगण्यात एवढे धूंद होतो की, ईश्‍वरीय मार्गदर्शन जाणून घेण्याकडे आम्ही पाठ फिरवितो. त्याला आम्ही अधिक महत्व देत नाही. मात्र आयुष्याच्या भल्याचे सर्वस्वी मार्गदर्शन हे कुरआनमध्ये लिखित स्वरूपात आहे. रमजानमध्ये प्रत्येक ईमानधारकांनी कुरआनचे पठण केलेच पाहिजे. समजून घेतलेच पाहिजे. शेवटी रमजानच्या पावनप्रसंगी अल्लाहदरबारी प्रार्थना करते की, कोरोनाची ही महामारी नष्ट होवो. संबंध जगात सुख, शांती, समृद्धीची नांदो. (आमीन.)
ईद-ऊल-फित्रच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा.

- रिजवाना अतहर जागीरदार
नळदूर्ग
9972469224

रोजा एक प्रार्थना आहे, जी अल्लाह ने आपल्या अनुयायांवर अनिवार्य केली आहे. त्या अनुयांयावर जे सदृढ आहेत. कुठल्याही गंभीर आजारात ग्रस्त नाहीत. कुठल्याही व्यसनाच्या आहारी नाहीत. आजारी, स्तनदा माता, गरोदर माता व थकलेल्या वृद्धांना यातून सूट आहे. पहाटेच्या प्रहरापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत याचा कालावधी आहे. पहाटेच्या वेळेस सहेर करायची असते तर सूर्यास्तानंतर इफ्तार म्हणजे उपवास सोडण्याची वेळ. रोजा एक अशी इबादत आहे जी शरीरासोबत सर्वांगीण जीवनाची शुद्धी करते. मानसिक बळ देते, ईश्‍वराच्या आदेशाची शिकवण देते, स्वत:च्या मनावर ताबा मिळविते. कुरआनमध्ये म्हटले आहे की, तुमच्यावर रोजे अनिवार्य केले गेले आहेत, ज्याप्रमाणे तुमच्या अगोदरच्या उम्मतींवरही केले गेले होते. जेणेकरून तुम्ही ईशपरायन बनाल.’ (कुरआन 2:183)
रोजा एक महिन्याची खडतर ट्रेनिंग आहे. यात उपवासासहीत पाच वेळेसची नमाज, रात्रीची विशेष तरावीहच्या नमाजचा समावेश आहे. एक प्रकारे ही ईमानधारकांच्या संयमाची कसोटी आहे.
विज्ञानाच्या नजरेत रोजा एक महत्त्वपूर्ण विधी आहे, जी की मनुष्याला सदृढ ठेवते. मानवी शरीरात पोट एक असे कोमल अंग आहे, ज्याची काळजी नाही घेतली तर विभिन्न आजारांना सामोरे जावे लागते. रोजा पोटासाठी एक उत्तम औषधी आहे. कारण एक मशीन दिवसभर चालत राहते, तिला विश्रांती नाही दिली तर ती कधीपण खराब होऊ शकते. रोजाच्या काळात पोटाला 8 तासापेक्षा अधिक विश्रांती लाभते.
रोजाचे लाभ - आज प्रत्येकजण खाण्यासाठी कमावण्याच्या नादात धावपळ करत राहतो. तान, तणावामुळे शरीरावर याचा विपरित परिणाम पडतो. लठ्ठपणासारखा गंभीर आजार येतो. ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, अस्थमा सारखे आजार जडतात. याला रोखण्यासाठी रोजा महत्वपूर्ण भूमिका निभावतो.
रोजामुळे शरिरातील कोलेस्टेरॉल कमी होतेे. चर्बीही घटते. शारीरिक क्रीया व्यवस्थित चालते. तसेच वाईट सवईपासून मुक्तता मिळते.
जेव्हा आपण रोजा ठेवतो तेव्हा रक्ताची वाढ कमी होत जाते. याचा अधिक फायदा हृदयाला पोहोचतो. रोजामुळे डायास्टॉलिक प्रेशर कमी राहते. त्यामुळे हृदय नैसर्गिक गतीत चालते. जे लोक हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी रोजा तर ढालच आहे. रोजाचा अधिक परिणाम रक्तावर पडतो. ज्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. आम्ही दैनंदिन जीवनात एवढे खात राहतो की, रक्तनलिकांना विश्रांती भेटत नाही. त्यामुळे त्यात विविध प्रकारचे कण जमा होऊन ब्लॉकेज तयार होतात. मात्र रोजामुळे रक्ताची गती नैसर्गिक लेवलमध्ये चालते, त्यात चर्बीयुक्त पदार्थ जमत नाहीत आणि रक्तवाहिन्या व्यवस्थित चालतात. कोलेस्ट्रॉललाही जमा होण्यास संधी मिळत नाही. रक्त शुद्ध होते. रोजामुळे हृदयविकारही होत नाहीत. शरिराच्या प्रत्येक अवयवाला रोजामुळे मजबुती येते. आरोग्य चांगले राहते.
तसेच रोजामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मनुष्य ताजातवाणा होतो. त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. एक तर आत्मीक समाधान मिळते दूसरे शरीर सदृढतेचे. तीसरे त्याची प्रार्थना आणि ईश्‍वराशी जवळीक वाढते.

- आदिबा रियाज शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget