Latest Post

Quran
अल्लाह आपल्या पवित्र ग्रंथात आदेश देतो,
“सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व मरण, सर्वकाही समस्त विश्वांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे. ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकविणारा मीच आहे."
(कुरआन-६:१६२-१६३) या आयतीचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते,
“ज्याने एखाद्याशी मैत्री व प्रेम केले तर ते अल्लाहसाठी आणि वैर केले तर अल्लाहसाठी आणि कुणाला दिले तर ते अल्लाहसाठी व एखाद्याला नकार दिला तर ते अल्लाहसाठी. अशा प्रकारे त्याने आपला ईमान पक्का केला म्हणजे तो पूर्णपणे मुस्लिम झाला."
जी आयत मी आपल्यासमोर प्रस्तुत केली त्यावरून असे कळते की इस्लामची अशी अपेक्षा आहे की माणसाने आपली उपासना आणि आपल्या जीवन व मृत्यूला केवळ अल्लाहसाठी विशिष्ट करावे आणि अल्लाहशिवाय कोणासही त्यात सहभागी करू नये, म्हणजे उपासना व त्याचे जीवन व त्याचे मरणे अल्लाहशिवाय अन्य कोणासाठी असू नये.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वाणीचे जे स्पष्टीकरण मी आपणास ऐकविले त्यावरून असे समजते की माणसाचे प्रेम व शत्रुत्व आणि आपल्या ऐहिक जीवनातील व्यवहारात त्याची देवाण-घेवाण केवळ अल्लाहसाठीच असणे ही ईमानची निकड आहे. त्याशिवाय ईमानला पूर्णत्व प्राप्त होत नाही, मग उच्च दर्जा प्राप्त होण्याची कवाडे खुली होण्याची गोष्टच कशाला? जितकी कमतरता यात या बाबतीत होईल तितकीच उणीव माणसाच्या ईमानमध्ये असेल. आणि जेव्हा अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे अल्लाहचा होईल तेव्हा कुठे जाऊन त्याचा ईमान पूर्ण होईल.
काही लोकांचा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टी केवळ श्रेष्ठ दर्जाचे द्वार उघडे करतात, नाहीतर ईमान व इस्लामसाठी माणसात ही स्थिती उत्पन्न होण्याची अट नाही. अन्य शब्दांत याचा अर्थ असा की या स्थितीशिवायदेखील मनुष्य मुस्लिम असू शकतो. परंतु हा चुकीचा समज आहे व हा चुकीचा समज उत्पन्न होण्याचे कारण असे आहे की सामान्यत: लोक (इस्लामी) धर्म शास्त्रीय व कायदेशीर इस्लाम आणि त्या वास्तविक इस्लाममध्ये जो अल्लाहच्या दृष्टीने विश्वसनीय आहे, फरक करीत नाहीत.

माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमासाठी इमारतीसमान आहे जिचा एक भाग दुसऱ्या भागाला शक्ती प्रदान करतो.’’ मग पैगंबरांनी आपल्या एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून दाखविले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसमध्ये मुस्लिम समाजाला इमारतीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे त्या इमारतीच्या विटा एकमेकांशी जुळलेल्या असतात त्याप्रमाणे मुस्लिमांना आपसांत जुळून राहिले पाहिजे आणि मग ज्याप्रकारे विटा एकमेकांना शक्ती व आधार देतात त्याप्रकारे त्यांनीदेखील एकमेकांना आधार दिला पाहिजे. ज्याप्रमाणे विस्कटलेल्या विटा एकमेकांना जुळून मजबूत इमारतीचे स्वरूप साकारतात त्याप्रमाणे मुस्लिमांच्या शक्तीचे रहस्य त्यांच्या आपसांत जुळण्यात आहे. जर त्या विस्कटलेल्या विटांसारखे राहिले तर त्यांना वाऱ्याची प्रत्येक झुळूक उडवून घेऊन जाईल आणि पाण्याची प्रत्येक लाट वाहून नेऊ शकते. शेवटी ही हकीकत एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून स्पष्ट करून सांगितले.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा आरसा आहे आणि मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याला विनाशापासून वाचवितो आणि पाठीमागून त्याचे संरक्षण करतो.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण

‘एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमसाठी आरसा आहे.’ म्हणजे त्याच्या त्रासाला आपला त्रास समजतो. ज्याप्रमाणे तो आपल्या त्रासामुळे तडफडतो तसाच हादेखील तडफडेल आणि तो त्रास कमी करण्यासाठी बेचैन होईल.

‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या बंधुचा आरसा आहे. जर तो संकटात असेल तर त्याचे संकट दूर करील.’’

स्पष्टीकरण
अशा प्रकारे जर त्याच्यात एखादी दुर्बलता पाहतो तेव्हा त्याला आपली दुर्बलता समजून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुची मदत कर, मग तो अत्याचारी असो की अत्याचारपीडित.’’ तेव्हा एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अत्याचारपीडित असेल तर मी त्याची मदत करीन, परंतु तो अत्याचारी असेल तर मी त्याची कशाप्रकारे मदत करू शकेन?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुझे त्याला अत्याचार करण्यापासून रोखणे हेच त्याला मदत होईल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याच्यावर अत्याचार करीत नाही आणि त्याला एकटे सोडत नाही आणि आपल्या भावाची आवश्यकता पूर्ण करील, अल्लाह त्याची आवश्यकता पूर्ण करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमाची अडचण दूर करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याची अडचण दूर करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमचे दोष लपवील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचे दोष लपवील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीरकण : हदीसचे शेवटचे शब्दांचा अर्थ असा आहे की जर सदाचारी मुस्लिमकडून एखादी चूक घडली तर त्याला लोकांच्या नजेतून उतरविण्यासाठी ठिकठिकाणी सांगत फिरण्याऐवजी त्याच्या दोषांवर पडदा घाला, त्या मनुष्याच्या विपरीत जो उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो, तेव्हा त्याच्या दोषांना लपविण्याऐवजी त्याला उघडे पाडण्याचा पैगंबरांनी आदेश दिला आहे.

लोक समजतात अल्लाहव्यतिरिक्त इतरही शक्ती अन्नपुरवठा करतात, पालनपोषण करतात, आरोग्य व सुदृढ देहयष्टी देतात, म्हणून ते त्यांची उपासना करू लागलेत. मानवाने पालनकर्त्या अल्लाहचे पालनपोषणाचे श्रेय इतरांशी निगडीत केले, कारण ते त्यांना अनन्यसाधारण शक्ती व सामर्थ्यांचे धनी वाटतात. काही लोकांना देवदूत तर काहींना माणसे, काहींना ग्रह तर काहींना नक्षत्रे, जनावरे, वृक्ष मानवाचे हितकर्ते व मानवाच्या गरजा पुरविणारे वाटतात. काही तर माणसांनाच माणसाचे पालनकर्ते मानतात. सम्राट नमरुद इराकचा शासक होता, सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. म्हणून तो स्वत:ला तेथील जनतेचा पालनकर्ता समजू लागला. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी त्यास म्हटले की, माझा पालनकर्ता जीवनदाता आहे व जीवनाचा अंतही करणारा आहे. नमरुद उत्तरला, “मीही ज्याला हवे त्याला जीवित ठेवतो व नको असेल त्याला मारून टाकतो." मग इब्राहीम (अ.) यांनी सांगितले, “माझा अल्लाह पूर्वेकडून सूर्याचा उदय करतो, तू असे कर की सूर्योदय पश्चिमेकडून करून दाखव." नकारवादी नमरुद निरुत्तर झाला. त्याला ठाऊक होते की, तो स्वत: जगाचा पालनकर्ता नाही. तरीही त्याने लोकांचा पालनकर्ता असण्याचा हट्ट सोडला नाही.
याचप्रमाणे किंग फारोह (फिरऔन) ची कथा आहे. फारोहने जाहीर केले होते की, तो सर्वांत मोठा पालनकर्ता आहे. कारण त्याचे संपूर्ण इजिप्तवर वर्चस्व होते. मात्र एकेश्वरत्वात पालनकर्त्यांचा सहकारी किंवा भागीदार नसतो, म्हणून कुरआनात अल्लाहस बऱ्याच ठिकाणी 'पालनकर्ता' संबोधिले गेले आहे. उद्देश हाच की, मानवाच्या मनावर ही बाब खोलवर रुजविली जावी की, अल्लाहच सर्वांचा पालनकर्ता व आराध्य आहे व त्याच्याव्यतिरिक्त साऱ्या मानवजातीचा इतर कोणीही पालनकर्ता नाही व आराधनेस पात्रही नाही. निश्चितच याच दृढ श्रद्धाभावनेने संपूर्ण मानवजातीचे कल्याण व उत्कर्ष साधता येईल.

मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

मिस्टर कारलायल लिहितात -
"प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत कदापि असा विचार करू शकत नाही ते केवळ एक लबाड व आत्महीन व्यक्ती होते आणि आम्ही त्यांच्यासंबंधी असेही सांगू शकत नाही की ते एक नीच, अधिकारलोभी व हेतूपुरस्सर उद्देश गाठणारे होते, त्यांनी जगाला जो कठोर संदेश दिलेला आहे तो पूर्णपणे एक सत्य व वास्तविक संदेश होता आणि जरी ते एक क्रमहीन कथन होता तरीसुद्धा त्याचा उगम तेच व्यक्तित्व (ईश्वर) होते, ज्याचा ठाव कोणासही मिळाला नाही. त्या व्यक्तीचे (प्रेषित मुहम्मद (स.)) कथन व कार्यही असत्य नव्हते आणि ते सत्यापासून रिक्त व कोणाची नक्कल व अनुसरणही नव्हते. वास्तविकत: ते अविनाशी जीवनाचे एक दैदिप्यमान व्यक्तित्व होते जे निसर्गाच्या विस्तृत वक्षस्थलावरून जगाला प्रकाशित करण्यासाठी निघाले होते आणि नि:संदेह त्याच्याकरिता ईश्वराला असाच आदेश होता.”
-- एजाजुत्तंजील, पृ. ५९, बहवाला हीरोज अँड हीरो वर्शिप', द्वितीय व्याख्यान, पृ. ४३

लेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी

भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली


 एक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा' म्हणजेच 'बकरईद'च्या प्रसंगी करण्यात येणारी 'कुरबानी' (अर्थात पशुबळी) च्या सार्थकता आमि औचित्यासंबंध निर्माण झालेला अथवा करण्यात आलेला आहे. आपल्या मुस्लिमेतर बांधवांच्या मनात याविषयी असा प्रश्न निर्माण झालेला आहे की,
“ज्याअर्थी इस्लामने दया आणि प्रेमभावाची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या प्राण्यांवर निर्दयतेचा सुरा का ठेवण्यात येतो? ज्याअर्थी इस्लामने आपल्या अनुयायांना प्रत्येक कार्य 'असीम दयावान व कृपावान अल्लाह'चे नाव घेऊनच सुरुवात करण्याची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या आणि निरपराध प्राण्यांचा निष्ठूरपणे वध करण्याची परवानगी कसापोटी दिली? ज्याअर्थी स्वयं कुरआनानेच आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना अशी उपाधी दिली की ते समस्त सृष्टीकरिता साक्षात दया व कृपा आहेत, तर या
सृष्टीतील निष्पाप मुके पशुपक्षी दया व कृपा असलेल्या पैगंबरांच्या दया व कृपेला पात्र नाहीत काय? कारण स्वत: प्रेषितांनीच याची परवानगी दिली आणि स्वत:देखील कुरबानी केली. एवढेच नव्हे तर 'बकरईद'च्या महत्त्वपूर्ण सणाला अल्लाह आणि प्रेषित __मुहम्मद (स.) यांनी प्राण्यांच्या कुरबानीस (पशुबळीस) धार्मिक मान्यता देऊन टाकली. अल्लाहचे नाव घेऊन करण्यात येणारे कोणतेही वाईट कर्म हे चांगले कर्म ठरते काय?"
अशा प्रकारचे प्रश्न अथवा गैरसमज आपल्या देशबांधवांना त्रस्त करून सोडतात. त्यांचा मुस्लिम समुदायावर या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्यांच्या शंका-कुशंका आणि गैरसमज दूर करण्याचा मुस्लिम समुदायाने पूर्ण प्रयत्न करावा. ही छोटीशी पुस्तिका याच अधिकारपूर्तीचा एक बाग आहे. शिवाय वाचकांचेसुद्धा हे कर्तव्य आहे की ही पुस्तिका पूर्वग्रहरहित होऊन वाचावी.

आयएमपीटी अ.क्र. 27  पृष्ठे - 15     मूल्य - 06          आवृत्ती - Oct. 2010

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/a5810k8hkg33zmm489wcv2saha482490

पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे,
"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वत:ला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

मद्याचा त्याग
तुम्ही ऐकले असेल की अरबस्थानात मद्यपानाचा किती जोर होता. स्त्री व पुरुष, तरुण व म्हातारे सर्वांनाच दारूचे वेड होते. वास्तविकतः मदिरेवर त्यांचे प्रेम होते. तिच्या प्रशंसेचे ते गीत गात असत आणि तिच्यावर प्राण देत होते. हेदेखील तुम्हाला ज्ञात असेल की दारूची सवय लागल्यावर ती सुटणे किती दुष्कर आहे. मनुष्य प्राण द्यावयास तयार होतो पण दारू सोडण्याची त्याची तयारी नसते. जर दारूड्याला दारू मिळाली नाही तर त्याची स्थिती आजारी माणसापेक्षा अधिक वाईट होते. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे का की जेव्हा पवित्र कुरआनमध्ये ती निषिद्ध केल्याची आज्ञा आली तेव्हा काय घडले? तेच अरब लोक जे दारूवर प्राण देत होते. ही आज्ञा ऐकताच त्यांनी स्वत:च्या हाताने दारूचे माठ फोडून टाकले. मदीना शहराच्या गल्ल्यांमधून दारू अशी वाहत होती जणू पावसाचे पाणी वाहत आहे. एका मैफिलीत काही लोक बसून दारू पीत होते, जेव्हा प्रेषित (मुहम्मद स.) यांच्याकडून दिली गेलेली दवंडी ऐकली की दारू निषिद्ध ठरविली गेली आहे, तेव्हा ज्याचा हात जेथे होता तेथेच राहिला. ज्याने तोंडाला पेला लावला होता त्याने लगेच तो दूर केला आणि त्यानंतर एक घोटसुद्धा घशात जाऊ दिला नाही. असा आहे वैभवशाली ईमान! यालाच म्हणतात अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या आज्ञेचे पालन!

अपराधाची कबुली

काय तुम्हाला कल्पना आहे की व्यभिचाराची शिक्षा किती कठोर ठेवली गेली आहे? उघड्या पाठीवर शंभर कोडे, ज्यांची कल्पना केल्यास माणसाच्या अंगावर शहारे यावेत आणि जर व्यभिचारी विवाहित असेल तर दगडांचा वर्षाव करून ठार करण्याची शिक्षा आहे. अशा कठोर शिक्षेचे नाव ऐकूनच माणसाचा थरकाप होईल. परंतु तुम्हालाही कल्पना तरी आहे का की ज्यांच्या हृदयात ईमान होते त्यांची स्थिती कशी होती? एका माणसाकडून व्यभिचाराचे कृत्य घडले. कोणीही न्यायालयापर्यंत पकडून नेणारा नव्हता. पोलिसांना बातमी देण्यास कोणीही नव्हता. केवळ हृदयात ईमान (विश्वास) होते की ज्याने त्या माणसाला सांगितले, “जर तू अल्लाहच्या कायद्याविरूद्ध स्वत:च्या मनाची वासना पूर्ण केली आहेस तर आता जी शिक्षा अल्लाहने त्यासाठी ठरविली आहे ती भोगण्यास तयार हो.” नंतर तो मनुष्य स्वतः प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या सेवेत हजर झाला आणि म्हणाला, “हे प्रेषित (मुहम्मद स.)! मी व्यभिचार केला आहे. मला शिक्षा द्या.” प्रेषितांनी तोंड फिरवून घेतले तेव्हा दुसऱ्या बाजूला येऊन त्याने तीच गोष्ट सांगितली. प्रेषितांनी पुन्हा तोंड फिरवले तेव्हा त्याने पुन्हा समोर येऊन शिक्षेची याचना केली, “जे पाप मी केले आहे त्याची मला शिक्षा द्या." याला म्हणतात ईमान! ज्याच्या हृदयात ईमान आहे त्याच्यासाठी उघड्या पाठीवर शंभर कोरडे सहन करणेच नव्हे तर दगडांच्या वर्षावात मृत्यु स्वीकारणेसुद्धा सोपी गोष्ट आहे परंतु अवज्ञाकारी म्हणून अल्लाहसमोर हजर होणे कठीण आहे.
तुम्हाला माहीत आहे की माणसाला आपल्या नातेवाईकांपेक्षा कोणीही अधिक प्रिय नसतो. विशेषत: वडील, भाऊ, मुले तर इतके प्रिय असतात की त्यांच्यावरून सर्वकाही ओवाळून टाकण्यात मनुष्य धन्यता मानतो. परंतु आपण बद्र व उहुदच्या युद्धांचा थोडा विचार करा की त्यात कोण कोणाच्या विरूद्ध लढला होता. बाप मुस्लिमांच्या सेनेत आहे तर मुलगा अनेकेश्वरवाद्यांच्या सैन्यात. किंवा मुलगा इकडे आहे तर बाप दुसरीकडे. एक भाऊ इकडे आहे तर दुसरा भाऊ तिकडे. अगदी जवळचे आप्तेष्ट एकमेकांविरूद्ध युद्धात आले आणि अशा प्रकारे लढले की जणू हे एकमेकाला ओळखतसुद्धा नाहीत. त्यांच्यातील हा जोश काही रुपये-पैसे अथवा जमिनीसाठी भडकलेला नव्हता, काही वैयक्तिक शत्रुत्वसुद्धा नव्हते, तर केवळ या कारणासाठी ते स्वत:च्या रक्त-मांसाविरूद्ध लढले की ते अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यासाठी बाप, मुलगा, भाऊ व संपूर्ण कुटुंबाला त्यागण्याचे अथवा बळी देण्याचे सामर्थ्य बाळगत होते.

जुनाट रुढी-परंपरांना मूठमाती

आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की अरबस्थानात जितक्या जुनाट रुढी-परंपरा होत्या, इस्लामने जवळजवळ त्या सर्वांचाच बीमोड केला. सर्वांत मोठी प्रथा म्हणजे मूर्तीपूजा होती. ही प्रथा शेकडो वर्षांपासून होती. इस्लामने सांगितले की या मूर्तीना सोडून द्या. दारू, व्यभिचार, जुगार, चोरी आणि वाटमारीची अरबस्थानात सर्रास प्रथा होती. इस्लामने या सर्वांचा त्याग करण्यास सांगितले. स्त्रिया उघड्या फिरत असत. इस्लामने आज्ञा दिली की पडदा पद्धतीचा अवलंब करा. स्त्रियांना वारसाहक्क दिला जात नसे. इस्लामने सांगितले की वारसा संपत्तीत त्यांचादेखील हिस्सा आहे. दत्तकपुत्राला तोच दर्जा दिला जात असे जो औरस पुत्राला असतो. इस्लामने सांगितले की तो सख्ख्या पुत्राप्रमाणे नाही तर जर दत्तक पुत्राने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्याशी विवाह केला जाऊ शकतो. थोडक्यात कोणतीही अशी जुनी पद्धत नव्हती की जी मोडण्याची आज्ञा इस्लामने दिली नसेल.
परंतु तुम्हाला कल्पना आहे की ज्यांनी अल्लाह व प्रेषितांवर ईमान धारण केले होते त्यांची कार्यपद्धती कशी होती? शेकडो वर्षांपासून ज्या मूर्तीची ते आणि त्यांचे वाडवडील पूजा-अर्चना व नवस करीत असत त्यांना या ईमानधारकांनी आपल्या हाताने फोडले. शेकडो वर्षांपासून घराण्याच्या ज्या प्रथा चालत आल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पूर्णत: नष्ट केले. ज्या वस्तूंना ते पवित्र मानीत असत त्यांना अल्लाहची आज्ञा आल्यावर पायाखाली तुडवून टाकले. ज्या गोष्टींना ते घाणेरड्या मानीत असत अल्लाहची आज्ञा येताच त्यांना धर्मानुकूल समजू लागले. ज्या वस्तु शेकडो वर्षांपासून शुद्ध समजल्या जात असत त्या अकस्मात अशुद्ध ठरल्या आणि ज्या अशुद्ध समजल्या जात असत त्या एकाएकी शुद्ध झाल्या. अनेकेश्वरत्वाच्या ज्या पद्धतीत आमोद-प्रमोद व लाभाची सामुग्री होती अल्लाहची आज्ञा येताच तिचा त्याग केला आणि इस्लामच्या ज्या आज्ञांचे पालन माणसाला दुष्कर वाटते त्या सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. याचे नाव आहे ईमान व याला म्हणतात इस्लाम. त्या वेळी जर अरब लोकांनी असे सांगितले असते की अमुक गोष्ट आम्ही मान्य करीत नाही, कारण त्यात आमचे नुकसान आहे आणि अमुक गोष्ट आम्ही अशासाठी सोडत नाही की त्यात आमचा फायदा आहे; अमुक काम आम्ही अवश्य करू कारण वाडवडिलांपासून हेच होत राहिले आहे, रोमन लोकांच्या अमुक गोष्टी आम्हाला पसंत आहेत आणि इराणी लोकांच्या अमुक गोष्टी आवडतात. अरबस्तानातील लोकांनी अशाच प्रकारे इस्लामची एक-एक गोष्ट रद्द केली असती तर आपण कल्पना करू शकता की आज एकसुद्धा मुस्लिम जगात आढळला नसता. 

अल्लाहच्या प्रसन्नतेचा मार्ग
बंधुनो, पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे, __"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget