Latest Post

- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी 

    या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फातिहा जो प्रारंभीचा अध्याय आहे, त्यास सुद्धा या अंतिम अध्ययाच्या सुरवातीला घेतले आहे. कारण सूरह अल् फातिहा नमाजमध्ये सतत पठण होणारा अध्याय आहे.
    कुरआनच्या भाग 30 मध्ये जो अध्ययन 78 ते अध्यायन 114 पर्यंतचे आकाराने लहान अध्यायांचा समावेश झालेला आहे. यातील बहुतांश अध्याय मक्का कालीन आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 67   पृष्ठे - 352    मूल्य - 175     आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/13khpzryq1t7xyiupfc46l1b2bk8ggrj

muslims
आंशिक मुस्लिम
एका प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे अल्लाह व प्रेषितांचा स्वीकार करून इस्लामला आपला धर्म म्हणून मान्यता देतात, परंतु आपल्या या धर्माला आपल्या संपूर्ण जीवनाचा केवळ एक अंश आणि एक विभाग म्हणून ठेवतात.
या विशिष्ट अंश व विभागात तर इस्लामवर श्रद्धा असते. उपासना असते. जप जाप्य व मुसल्ला (ज्यावर नमाज पढली जाते ते कापड) असतो, अल्लाहचे नामस्मरण असते, खाण्या-पिण्यात व काही सामाजिक बाबतीत संयम पाळला जात असतो आणि ते सर्वकाही असते ज्याला धार्मिक कार्यप्रणाली म्हणून संबोधले जाते, परंतु या विभागाशिवाय त्यांच्या जीवनातील इतर सर्व बाबी ते मुस्लिम असल्याचे दर्शवीत नाहीत. ते प्रेम करतील तर आपल्या मनासाठी किंवा आपल्या लाभासाठी किंवा आपल्या देश, जात अथवा दुसऱ्या कुणासाठी करतील. ते शत्रुत्व करतील आणि कुणाशी युद्धही करतील तेसुद्धा अशाच एखाद्या भौतिक अथवा मानसिक कारणामुळेच. त्यांचे कारभार, देवाण-घेवाण, त्यांचे जीवनव्यवहार व संबंध, त्यांचा त्यांच्या मुलाबाळांशी, त्यांच्या घराण्याशी, त्यांच्या समाजाशी व ज्यांच्याशी व्यवहार केला जातो अशा लोकांशी त्यांची वागणूक विशेषकरून धर्मापासून मुक्त व भौतिकतेवर अवलंबून असते. एक जमीनदार म्हणून अथवा एक व्यापारी, एक शासक, एक शिपाई, एक धंदेवाईक म्हणून त्यांचा काही दर्जा असू शकेल. परंतु त्यांचा मुस्लिम म्हणून कोणताही दर्जा असत नाही. याशिवाय अशा प्रकारचे लोक एकत्र येऊन सामूहिकरीत्या ज्या सांस्कृतिक, शैक्षणिक व राजनीतिक संस्था स्थापन करतील, त्यासुद्धा मुस्लिमांच्या संस्था म्हणून म्हटल्या जातील अथवा त्यांच्यावर आंशिक इस्लामी प्रभावसुद्धा असेल, परंतु वास्तविकत: त्यांचा इस्लामशी काडीचाही संबंध नसेल.

परिपूर्ण व सच्चे मुस्लिम

दुसऱ्या प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे आपले संपूर्ण व्यक्तित्व व आपले संपूर्ण अस्तित्व इस्लामसाठी समर्पित करतात. त्यांच्या सर्व योग्यता त्यांच्या मुस्लिम असण्याच्या योग्यतेत विलुप्त होतात. ते पिता असतील तर मुस्लिम म्हणून, पती अथवा पत्नी असतील तर मुस्लिम म्हणून, व्यापारी, जमीनदार, मजूर, नोकर अथवा धंदेवाईक असतील तर मुस्लिम म्हणून. त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा, त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार, त्यांची मते, त्यांची घृणा व आवड, त्यांची पसंती-नापसंती, सर्वकाही इस्लामच्या अधीन असेल. त्यांच्या हृदय व बुद्धीवर आणि त्यांच्या शरीर व प्राणावर इस्लामचा पुरेपूर ताबा असेल. त्यांचे प्रेम व शत्रुत्व इस्लामपासून मुक्त नसेल. ज्यांची भेट घेतील ती इस्लामसाठी घेतील आणि ज्यांच्याशी लढतील ते इस्लामसाठी लढतील. एखाद्याला काही देतील तर अशासाठी देतील की इस्लामची मागणी अशीच आहे की त्याला दिले जावे आणि जर एखाद्याला दिले नाही तर ते अशासाठी दिले नाही की इस्लाम असेच म्हणतो की त्याला दिले जाऊ नये. त्यांची ही कार्यपद्धती केवळ व्यक्तीपर्यंत मर्यादित नसते तर त्यांचे सामुदायिक जीवनसुद्धा पूर्णत: इस्लामी जीवनपद्धतीच्या अधीन असते. एक समुदाय म्हणून त्यांचे अस्तित्व केवळ इस्लामसाठी असते आणि त्यांचे संपूर्ण सामुदायिक वर्तन इस्लामी जीवनव्यवस्थेच्या तत्त्वावर आधारित असते.

अल्लाहला अपेक्षित असलेला मुस्लिम

हे दोन प्रकारचे मुस्लिम जरी विधिवत एकाच प्रेषिताचे व धर्माचे अनुयायी (उम्मत) आहेत व दोघासाठी मुस्लिम हा शब्द समान रूपाने लागू होतो, तरीसुद्धा वास्तविकत: ते एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. पहिल्या प्रकारच्या मस्लिमाची कोणतीही कामगिरी इस्लामच्या इतिहासात उल्लेखनीय अथवा अभिमानास्पद नाही. वास्तविकत: त्यांनी कोणतेही असले कृत्य केले नाही की ज्याने जागतिक इतिहासावर इस्लामी जीवपद्धतीची छाप सोडली असेल. पृथ्वीने असल्या मुस्लिमांचे ओझे कधीही सहन केले नाही. इस्लामला जर अवनती प्राप्त झाली असेल तर अशा लोकांमुळेच झाली. अशाच प्रकारच्या मुस्लिमांचे बाहुल्य मुस्लिम समाजात असण्याचा परिणाम असा दिसून आला की जगाच्या जीवनव्यवस्थेची लगाम अनेकेश्वरवादीच्या ताब्यात गेली आणि मुस्लिमांना त्यांच्या अधीन राहून केवळ एका सीमित धार्मिक जीवनाच्या स्वातंत्र्यावर समाधान मानावे लागले. अल्लाहला असले मुस्लिम कदापि अपेक्षित नव्हते. त्याने आपल्या प्रेषितांना जगात अशाकरिता पाठविले नव्हते आणि आपले ग्रंथसुद्धा अशासाठी उतरविले नव्हते की केवळ अशा प्रकारचे नावापुरते मुस्लिम जगात बनविले जावेत, असले नावापुरते मुस्लिम नव्हते तेव्हा मौल्यवान असलेल्या कोणत्याही वस्तूची जगात उणीव नव्हती की जिची पूर्तता करण्यासाठी वही (ईशसंदेश) व प्रेषित्वाचा क्रम सुरू करण्याची अल्लाहला गरज भासली असती.
वास्तविकत: जे मुस्लिम अल्लाहला अपेक्षित आहेत, ज्यांना तयार करण्यासाठी प्रेषितांना पाठविले गेले व ग्रंथ उतरविले गेले आणि ज्यांनी इस्लामी दृष्टिकोनाने कधी एखादे नावाजण्याजोगे कार्य केले आहे अथवा आज करू शकतात; ते केवळ दुसऱ्याच प्रकारचे मुस्लिम आहेत.

उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईशआराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.

मग सत्याचा इन्कार का?
ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला अल्लाहने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न-विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. अल्लाहाच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू-करुणामय सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.

हजरत अबुबकर ’सिद्दीक’ यांचा जन्म इ.स.572 मध्ये मक्का या शहरात झाला. ते प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यापेक्षा दोन वर्षाने लहान होते. त्यांच्या कुळगटाचे नाव ’तैईम’ होते. त्यांची एक मुलगी हजरत आएशा रजि. ह्या प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी होत. हजरत अबुबकर रजि. यांचे मूळ नाव ’अब्दुल काबा’ अर्थात काबागृहाचा सेवक असे होते. ’सिद्दीक’ म्हणजे सत्यवचनी. ही पदवी स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना दिली होती. जेव्हा प्रेषित सल्ल. यांची मेराजच्या रात्री अल्लाहशी भेट झाल्याची घटना घडली व ती त्यांनी लोकांना सांगितली तर इतर लोकांना ती घटना स्वीकारण्यास थोडीशी अडचण वाटत होती. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता हजरत अबुबकर रजि. यांनी त्या घटनेवर विश्‍वास ठेवला होता. ते प्रेषित सल्ल. यांचे खंदे समर्थक होते व त्यांच्यावर जीव ओवाळून टाकण्यास सदैव तत्पर होते. त्यांचा प्रेषित सल्ल. वर एवढा विश्‍वास होता की, प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर मक्केतील पुरूषांमध्ये सर्वप्रथम त्यांनीच विश्‍वास ठेवला होता.
    ते मक्का शहरातील कुरैश कबिल्यांपैकी सर्वात श्रीमंत कबिल्यात जन्मले होते. स्वभावाने सभ्य आणि निर्व्यसनी होते. त्यांना मूर्तीपूजेचे जरासुद्धा आकर्षण नव्हते. इस्लामपूर्व काळात जेव्हा मक्केतील पुरूष इतरांना लुटण्यात, दारू पिण्यात आणि स्वैराचाराने वागण्यात तरबेज होते त्या काळातसुद्धा ह. अबुबकर सिद्दी़क यांनी न्याय व सदाराचाने वागून मक्केमध्ये आपल्या व्यक्तीत्वाचा वेगळाच ठसा उमटविला होता. त्यामुळे त्यांचे नाव आदराने घेतले जात होते.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म इ.स. 570 मध्ये झाला, त्यांना प्रेषित्व इ.स.610 मध्ये मिळाले आणि  इ.स. 622 मध्ये त्यांनी हिजरत केली. या संपूर्ण कालाधीमध्ये अखंडपणे ह. अबुबकर सिद्दीक प्रेषित सल्ल. यांच्याबरोबर सावलीसारखे वावरत होते. ते एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी प्रेषित्वाच्या घोषणेपासून ते प्रेषित यांच्या पर्दा फरमाविण्या (निधन होणे) पर्यंत इमाने इतबारे साथ दिली. इस्लाममध्ये बाकीचे लोक नंतर येत गेले. इस्लाम जसा-जसा मजबूत होत होता तसा-तसा इस्लाममध्ये दाखल होणार्‍यांची संख्या वाढत होती. मात्र हजरत अबुबकर सिद्दीक यांचे वैशिष्ट्ये हे होते की, त्यांनी त्या दिवशी इस्लाम स्विकारला ज्या दिवशी इस्लाम स्विकारणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे असे समीकरण अस्तित्वात होते.
    इस्लाम स्विकारताच ते झपाटल्यासारखे धर्मप्रचाराला लागले. त्यांनी आपली संपत्ती धर्मप्रचारात खर्च करायला सुरूवात केली. अनेक गुलाम खरेदी करून त्यांना मुक्त करून इस्लाम स्विकारण्यास प्रेरित केले. त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना इस्लामची दिक्षा दिली. त्यांची एक पत्नी जिचे नाव कुतेला आणि एक मुलगा ज्याचे नाव अब्दुर्रहमान होते त्यांनी इस्लाम स्विकारण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी दोघांनाही बेदखल करून टाकले. त्यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने इस्लाम स्विकारल्याचे पाहून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी इस्लाम स्विकारला. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या बाबतीत म्हटलेले होते की, हजरत अबुबकर रजि. यांच्या संपत्तीचा इस्लामच्या प्रसार आणि प्रचारासाठी जेवढा उपयोग झाला तेवढा कुणाच्याच संपत्तीचा झाला नाही.
    ते प्रेषित सल्ल. यांचे सर्वात विश्‍वासू सहकारी होते म्हणून इ.स. 622 मध्ये जेव्हा प्रेषितांना मक्का येथून मदिनाकडे हिजरत (प्रस्थान) करण्याचा ईश्‍वरीय आदेश झाला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सोबती म्हणून त्यांचीच निवड केली होती. मदिनेत पोहोचल्यानंतर जेव्हा प्रेषित सल्ल. यांनी मुस्लिमांसाठी एक मस्जिद बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा मस्जिदीसाठी जमीन खरेदी करण्याचा मानही हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनाच मिळाला. आज मदिनामध्ये जी आलिशान -(उर्वरित पान 7 वर)
मस्जिद आहे आणि जिला मस्जिद-ए-नबवी म्हणून ओळखले जाते ती हीच मस्जिद आहे. हिजरत करून मदिनामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी कापडाचा व्यापार सुरू केला व अल्पावधीतच एक प्रामाणिक कापड व्यापारी म्हणून नावारूपाला आले. अल्लाहकडून प्रेषित सल्ल. यांना जेवढे आदेश जिब्राईल अलै. मार्फत येत होते त्यांची अंमलबजावणी वगळता बाकी सर्व व्यवहारांमध्ये प्रेषित सल्ल. हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांच्या सल्याला खूप महत्व देत होते. बदरच्या ऐतिहासिक विजयानंतर जेव्हा कुरैशचे 70 कैदी पकडण्यात आले, तेव्हा हजरत उमरसह अनेकांनी त्यांना ठार मारण्याचा सल्ला दिला. परंतु हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी त्यांना ’फिदिया’ (मोबदला) घेऊन क्षमादान करण्याचा सल्ला दिला, जो की प्रेषित सल्ल. यांनी मान्य केला. त्यांच्या या कृतीमुळे कुरैशमधून इस्लामचे अनेक सहानुभूतीदार उत्पन्न झाले.
    मक्क्याचे कुरैश आणि मदिनाचे मुस्लिम यांच्यात हज करण्यावरून सन 6 हिजरीमध्ये जेव्हा वाद झाला तेव्हा हुदैबिया येथे झालेल्या तहामध्ये अनेक अशा अटींचा समावेश होता ज्या सहाबा रजि. यांना रूचल्या नव्हत्या. पण हजरत अबुबकर सिद्दीक रजि. ठामपणे त्या कराराच्या समर्थनार्थ प्रेषित सल्ल. यांच्या पाठीमागे उभे राहिले व जगाने पाहिले की, त्या तहामुळे अवघ्या दोन वर्षात म्हणजे 8 हिजरीमध्ये मुस्लिमांनी मक्का शहरावर निर्णायक विजय प्राप्त केला होता.
    परदा फरमाविण्यापूर्वी प्रेषित सल्ल. जेव्हा 13 दिवस आजारी पडले तेव्हा मस्जिद-ए-नबवीमध्ये नमाजची इमामत (नेतृत्व) करण्याचा बहुमानही प्रेषित सल्ल. यांनी हजरत अबुबकर रजि. यांनाच दिला होता. नव्हे एकदा तर त्यांच्या इमामतीमध्ये दस्तुरखुद्द प्रेषित सल्ल. यांनी नमाज अदा केली होती. एका प्रेषिताने आपल्या अनुयायाच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्याची ही अभूतपूर्व घटना इस्लामी इतिहासात एकमेवाद्वितीय अशी आहे. पुढे हजरत उमर रजि. व इतर जानकार सहाबा रजि. यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या याच कृतीला प्रमाण माणून हजरत अबुबकर रजि. यांना प्रेषित सल्ल. यांचे वारस घोषित करून मदिनातील इस्लामी रियासतीचे प्रथम खलीफा (राज्य प्रमुख) म्हणून निवड केली.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना मुलगा नव्हता. म्हणून त्यांचे जावाई हजरत अली रजि. जे की एक उमदे व्यक्तीमत्व होते, त्यांना खलीफा करण्यात यावे, असा जोरदार आग्रह मुस्लिमांच्या एका गटाकडून झाला होता. हा आग्रह एवढा तीव्र होता की, तो मान्य न झाल्यामुळे त्या लोकांनी हजरत अबुबकर सिद्दीक रजि.पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला व हाच गट पुढे शिया मुस्लिम म्हणून उदयाला आला. स्वत: हजरत अली रजि. सुद्धा आपल्या समर्थकांच्या इतक्या दबावात होते की, तब्बल सहा महिन्यानंतर त्यांनी हजरत अबुबकर रजि. यांचा खलीफा म्हणून स्वीकार केला व एकनिष्ठतेची शपथ घेतली.
    काही लोकांचा असा समज आहे की, स्वत: हजरत अली रजि., हजरत अबुबकर ऐवजी खलीफा होण्यास उत्सुक होते. पण हे खरे नाही. हां! हे मात्र खरे आहे की, त्यांच्या सुविद्य पत्नी व प्रेषित सल्ल. यांच्या कन्या हजरत फातीमा यांची अशी इच्छा होती की, प्रेषित सल्ल. यांच्यानंतर खलीफा म्हणून हजरत अली रजि. यांची निवड व्हावी. खलीफा निवडीच्या या प्रक्रियेमध्ये एक व्यक्तीचा दूरदर्शीपणा इतका महत्त्वाचा ठरला की, इस्लामी इतिहासात त्याला तोड नाही. ती व्यक्ती म्हणजे हजरत उमर फारूख रजि. होय. त्यांनी तातडीने केलेल्या हालचालीमुळे मदिनापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या ’सुखैफा’ नावाच्या सभागृहामध्ये खलीफा निवडीची प्रक्रिया तात्काळ सुरू होऊन हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांना खलीफा म्हणून निवडले गेले. त्यांनी तातडीने केलेल्या या हालचालींमुळे फार मोठा रक्तपात टळला गेला. हजरत उमर रजि. यांनी खलीफा निवडीच्या प्रक्रियेमध्ये उशीर केला असता तर अंसारच्या एका मोठ्या गटाने हजरत साद रजि. यांनी खलीफा करण्याचा जो घाट घातला होता तो यशस्वी झाला असता व त्यांना सर्वांनी स्वीकारले नसते व प्रेषित सल्ल. यांच्या नंतर लगेच सत्तेसाठी आपसात रक्तपात झाला असता. हजरत उमर रजि. यांच्या दूरदर्शी पुढाकाराने तो टाळला गेला. ही माझ्या दृष्टीने इस्लामी इतिहासातील फार मोठी घटना आहे.
प्रथम खलीफांचे ऐतिहासिक भाषण
    खलीफा म्हणून निवड झाल्यानंतर हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांनी जनतेला उद्देशून जे भाषण केले ते भाषण इस्लामी इतिहासात अजरामर झाले व  इस्लामी लोकशाहीचे संविधान म्हणून गणले गेले. ते म्हणाले, ” लोकहो! मी अल्लाहच्या नावाने शपथ घेऊन सांगतो की, मी क्षणभरही कधी खलीफा होण्याची आकांक्षा धरली नव्हती वा त्याची मला आवडही नव्हती. हे पद मिळावे म्हणून मी अल्लाहकडे उघड वा मनातूनही कधी प्रार्थना केली नव्हती. हे पद मी केवळ एवढ्याचसाठी स्विकारली आहे की, या आणीबाणीच्या वेळी काही उपद्रव निर्माण होऊन इस्लामच्या हिताला धोका निर्माण होऊ नये. खरोखर माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे, की जी अल्लाहच्या मदतीविना व तुमच्या मन:पूर्वक सहकार्याविना पार पाडणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. माझी इच्छा होती की, या पदावर माझ्यापेक्षा सामर्थ्यवान मनुष्य यायला हवा. मी तुमच्यापेक्षा अधिक चांगला नसतानाही तुम्ही माझी या पदासाठी निवड केलेली आहे.”
    ते पुढे म्हणाले,” जर मी सन्मार्गाने जात असेल तर मला मदत करा; जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर मला सन्मार्गावर आणा. सत्य हाच ठेवा आहे; असत्य हा विश्‍वासघात आहे. तुमच्यातील दुबळे हे माझ्या दृष्टीने सबल आहेत, की जोपर्यंत (अल्लाहच्या इच्छेने माझ्याकडून) त्यांच्या हक्कांची पूर्तता होत नाही; आणि तुमच्यातील सबल हे माझ्या दृष्टीने दुर्बल आहेत, की जोपर्यंत त्यांच्याकडून जे येणे योग्य आहे ते मी (अल्लाहच्या इच्छेने) घेतलेले नाही. नीट ऐका ! ज्या लोकांनी अल्लाहच्या कार्यासाठी जिहाद करणे सोडून दिले त्यांच्यावर अल्लाहने कलंक आणलेला आहे; आणि जे लोक दुराचरणी आहेत त्यांच्यावर अल्लाहचा प्रकोप अनिवार्य आहे.”
    ते शेवटी म्हणाले, ” जोपर्यंत मी अल्लाहच्या व त्याच्या प्रेषितांची आज्ञा पाळत आहे तोपर्यंतच माझी आज्ञा पाळा; आणि जेव्हा मी त्यांची आज्ञा पाळणार नाही, तेव्हा माझी आज्ञा पाळू नका. अल्लाह तुमच्यावर दया करो.” (संदर्भ : चार आदर्श खलीफा, लेखक शेषेराव मोरे, पान क्र. 50).    एकंदरित इस्लामी इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. या नंतरचे सर्वोत्कृष्ट व्यक्तीमत्व म्हणून हजरत अबुबकर सिद्दीक रजि. यांना ओळखले जाते. त्यांची कारकिर्द अवघी अडीच वर्षाची होती. त्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यशासनाचे जे आदर्श नियम त्यांनी घालून दिले ते प्रलयाच्या दिवसापर्यंत फक्त इस्लामी लोकशाहीच नव्हे तर आधुनिक लोकशाहीलाही सारखेच उपयोग ठरतील असे आहेत.

- एम.आर.शेख  

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे  म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्टनिश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ किंवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि महिलांनीदेखील ऐकला.

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे  म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्टनिश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ किंवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि महिलांनीदेखील ऐकला.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि समस्त निसर्गावर विचारमंथन करीत नाही तोपर्यंत त्याला सत्यमार्ग सापडणे कठीण आहे. या मंथनातून त्याला का जगावे, कोणासाठी  जगावे की अनंत अडचणीतून मुक्त होण्यासाठी आत्महत्या करावी की करू नये, या प्रश्नाची उत्तरे मिळतात. ईश्वर प्रत्येकाला झेपेल एवढेच ओझे त्याच्यावर लादतो. कोणावरही अधिकचे ओझे टाकत नाही. तसेच मनुष्य स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत येतो. मात्र तो याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. त्याला सतत असे वाटते की, परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे, पण प्रत्यक्षात परिस्थितीवर नियंत्रण अल्लाहचे असते. त्यामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून परिस्थिती अनुकूल असो का प्रतिकूल असो अल्लाहवर विश्वास ठेऊन जीवन जगल्यास आत्महत्येपर्यंत जाण्याची गरजच भासत नाही.
खरे तर प्रत्येक मनुष्य हा खलीफा आहे. त्याला अश्रफुल मख्लुकात म्हटले जाते. म्हणजेच सर्वश्रेष्ठ जीव. मात्र तो स्वतःला ओळखण्यात गफलत करतो. तो ईशमार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करण्याला प्राधान्य देत नाही. ईश्वराच्या मार्गदर्शनाला त्याच्या नियमांना आणि त्याच्या निर्मितीचा योग्य फायदा घेत नाही. तो थोडयाश्या सुखासाठी मोठे गुन्हे करून बसतो. आपल्या चुका सुधारून सत्मार्गाचा अवलंब करण्याकडे डोळेझाक करतो. जो व्यक्ती सत्याचा मार्ग अवलंबवितो तो सत्यात मग्न होतो. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक असतो. वाईट मार्गात जरी त्याला भरपूर फायदा मिळत असला तरी त्याला तो स्वैच्छेने तिलांजली देतो आणि समाधानी राहतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो आपले पाय डगमगू देत नाही. त्या व्यक्तीला निश्चित सत्यमार्ग सापडतो तो ईश्वराच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त होतो आणि ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी ठरतो. मात्र एखाद्याला त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने वारंवार सत्याचा मार्ग लक्षात आणून देखील तो व्यक्ती जर थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा सुखासाठी असत्य मार्ग स्वीकारत असेल तर त्याला त्यामध्ये गुरफटविले जाते. तो इतका त्या असत्य मार्गात तल्लीन होऊन जातो की, त्याला आपला गुन्हा, गुन्हा दिसत नाही तर ते त्याच्या जगण्याचे अंग बनते. आणि त्याला हा मार्ग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. त्याला हे करताना जराही मागच्या पुढच्या जबाबदारीचे भान राहत नाही. मात्र असे नाही की प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःच्या चुकामुळेच आत्महत्या करतो कधी-कधी दुसऱ्याकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाला कंटाळूनही आत्महत्या करतो. मात्र अशा व्यक्तींना धैर्याने काम करायला हवे.
खरे तर मनुष्याने स्वतःच्या अस्तित्वावर विचारमंथन करायला सुरूवात केली तर तो निश्चितच स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून ईश्वरीय मार्गाचा अवलंब करू शकतो. मनुष्याची निर्मिती, निर्मितीनंतर त्याला जे नातलग, समाज आणि निसर्गाचे सानिध्य मिळते ते त्याच्या इच्छेनुसार कमी आणि ईश्वरीय इच्छेनुसार जास्त असते. ईश्वराने त्याला काय हवे यापेक्षा त्याच्या फायद्याचे काय आहे हे देऊन टाकलेले असते किंबहुना त्याच्यासमोर ठेवलेले असते. त्याला जन्म देऊन सोडलेले नसते तर त्याला मार्गदर्शन मिळावे म्हणून ईश्वर, पैगंबर, संत, महात्म्यांचे मार्गदर्शन त्याच्यासमोर असते. फक्त त्याला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याएवढे परिश्रम करावे लागते. या परिश्रमात त्याला सत्याच्या कसोटीवर उतरावे लागते. त्याला काही अधिकार बहाल केलेले असतात. या बहाल केलेल्या अधिकारात जर तो सत्मार्गाने चालला तर त्याच्या नशीबात जे काही लिहिले आहे ते त्याला मिळते, एवढे मात्र नक्की. मात्र जर तो मनुष्य त्याला दिलेल्या अधिकाराचा मनमानी पद्धतीने वापर करत गेला तर त्याचा सगळा दोष त्याच्यावर येतो. त्यामुळे प्रत्येकजण जे जीवन जगत असतो त्यासाठी तो स्वतःच जबाबदार असतो. कारण प्रत्येकाला विशेषाधिकारासोबत ईश्वरीय मार्गदर्शन आत्मसात करण्याचा अधिकार आहे.
जन्म आणि मार्ग...
कितीही मोठा व्यक्ती या एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्मास आला आणि कितीही गरीब व्यक्ती एखाद्या गरीब घरात जन्मास आला तरी त्या दोघांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती सारखीच आहे. त्या दोघांच्या निर्मितीमध्ये ईश्वरीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून काहीच फरक नसतो. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांची पसंद ना पसंद वेगळी असते. मात्र त्या दोघांच्या वाढीसाठी मुलभूत जीवनावश्क वस्तू ह्या सारख्याच असतात. क्वचितच अपवादात्मक फरक असतो. मात्र त्या दोघांची जसजशी वाढ होते. त्यांच्या मेंदूवर कोरले जाणारे जे विचार असतात आणि तो जो समाज बघतो त्यातून त्याची पुढील जडणघडण ठरते. मात्र दोघांना समाजात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी पहावयास मिळतात. त्यासाठीच ईश्वराने प्रत्येकाला एक विवेक दिलेला आहे की तो चांगल्या आणि वाईटातील फरक त्याचा मनाला दाखवून देतो. यामधील जो सत्य मार्गाचा अवलंब करतो भविष्यात तोच नावारूपाला येतो आणि आपली एक ओळख निर्माण करतो. त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. सत्यमार्गावर चालताना कधी-कधी अतीवाईट गोष्टींचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी जो धैर्याने त्या गोष्टींचा सामना करतो तोच यशस्वी ठरतो. जो व्यक्ती सत्य मार्गावर चालतो तो कधीच एकटा नसतो तर त्यासोबत ईश्वराची कृपा असते. त्यामुळे तो कितीही मोठे संकट आले तरी लिलया त्यामधून बाहेर पडतो. असत्याच्या मार्गावर कित्येक लोकांना मोठे होताना आपण पाहतो. ते गुन्हे करतात, लोकांना त्रास देतात तरी त्यांचे नुकसान होत नसल्याचे आपणाला दिसून येते. मात्र त्या लोकांचे अनंतकालीन नुकसान होत राहते. त्यांच्या हातून ज्या लोकांवर अत्याचार होतो त्या पीडितांना ऐहिक जीवनात न्याय नाही मिळाला तरी ईश्वराच्या दरबारात त्यांना निश्चित न्याय मिळणार आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, यासाठीच तर आखिरत (मरणोप्परांत जीवन) आहे.

- बशीर शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget