Latest Post

माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ‘सूरह निसा’च्या ज्या आयतचा संदर्भ दिला आहे त्यापूर्वी अल्लाहने सांगितले आहे, ‘‘तुमच्यापूर्वी बनीइस्राईलना आम्ही आपली ठेव सोपविली होती, परंतु त्यांनी त्यात अफरातफर व बेईमानी केल्यामुळे अल्लाहचा कोप त्यांच्यावर कोसळला. जनसमुदायाच्या नेतृत्वाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्या काळात अनेकेश्वरत्वाचा अवलंब करणाऱ्यांची गुलामी त्यांच्या वाट्याला आली. आता तुम्हाला त्यांची जागा दिली जात आहे. तुम्हाला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आणि मोठी शासनव्यवस्था देण्यात आली आहे. खबरदार! बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो! न्याय व निवाड्याच्या या ईशव्यवस्थेचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करा.’’
    हाच विषय शब्दांच्या थोड्याफार फरकासह ‘सूरह माइदा’ मध्येदेखील पुन्हा एकदा सांगितला गेला आहे. ‘सूरह माइदा’ अंतिम आदेशात्मक सूरह आहे. यात कायदा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर कोणताही आदेशात्मक सूरह अवतरित झाला नाही. हा सूरह अरफातमध्ये अवतरित झाला. याचे वर्णन असे आहे की जणू सरतेशेवटी जनसमुदायाकडून या मैदानात वचन घेतला जात आहे की ‘‘पाहा, ईशदेणगी पूर्ण करण्यात आली आहे. एक मोठी शासनव्यवस्था तुमच्या सुपूर्द करण्यात आली आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की आम्हाला दिलेल्या वचनावर दृढ राहा अन्यथा लक्षात ठेवा, बनीइस्राईलचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्यांनी वचनभंग केले तेव्हा कसे अपमानित व बदनाम झाले.’’
    ही आहे धर्मव्यवस्था आणि तिचा आदर, किमंत व महत्त्वावर दु:ख वाटते की मुस्लिम जनसमुदायाने ही व्यवस्था हातची जाऊ दिली आणि वाईट या गोष्टीचे वाटते की हा जनसमुदाय गाढ झोपेत आहे–
‘‘वाए नाकामी मता-ए-कारवाँ जाता रहा, कारवाँ के दिल से एहसास-ए-जियाँ जाता रहा.’’
जमाअत बनविणे
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तीन मनुष्य प्रवासाला निघाले तर त्यांनी आपल्यापैकी एकाला ‘अमीर’ (नेता) बनवावे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : इस्लामी धर्मगुरू इब्ने तैमिया (रह.) म्हणतात की प्रवासादरम्यान लोकांवर जमाअत (गट, समुदाय, संघटना) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे ही गोष्ट आणखीनच आवश्यक आहे की ईमानधारकांनी एक ‘जमाअत’ बनवावी, कारण त्यांची जमाअती व्यवस्था बिघडली आहे. मुस्लिमांनांसाठी एकट्याने जीवन व्यतीत करणे निषिद्ध आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जंगलात राहणारे तीन माणसांनी एकेकटे राहणे अवैध आहे. त्यांनी आपल्यापैकी एकाला आपला ‘अमीर’ (नेता) बनवावा.’’ (हदीस : मुन्तका)
    माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांचा शत्रू कोल्हा आहे आणि आपल्या कळपातून वेगळी होणाऱ्या शेळ्यांची तो सहजतेने शिकार करतो, त्याचप्रमाणे शैतान मानवाचा कोल्हा आहे. जर लोक जमाअत बनवून राहिले नाहीत तर तो त्यांना एकेकाला गाठून त्यांची सहजतेने शिकार करतो.’’ (हदीस : मुस्नद अहमद, मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘‘हे लोकहो! एकएकटे राहू नका, तुमच्यासाठी आवश्यक आहे की जमाअत व सामान्य मुस्लिमांसह वास्तव्य करा.’’
    ‘‘जमाअतसह राहा’’ हा त्यावेळचा आदेश आहे जेव्हा मुस्लिमांची ‘अल-जमाअत’ अस्तित्वात असेल आणि अस्तित्वात नसेल तर काय? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे जमाअत बनवा जेणेकरून ‘अल-जमाअत’ अस्तित्वात यावी.


लेखक : इरफान खलीली

मराठी भाषांतर: झाहिद इब्ने आबिद खान

या पुस्तिकेत केवळ काल्पनिक कथा दिलेल्या नाहीत तर सर्व अमर व उज्वल सत्य घटना आहेत ज्या याच पृथ्वीवर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवन काळात घडलेल्या आहेत.

या दहा सत्य घटनांमध्ये प्रेषित्वाची सत्यता, ईशवाणीचे आकर्षण, सत्यशोध व प्रेमवेदनांचा समावेश आहे.

लेखक इरफान खलीली यांनी लिहिलेल्या या कथानकांच्या अध्ययनाने वाचक निश्चितच लाभान्वित होईल आणि त्याच्या हृदयात जाज्वल्य ईमान (श्रद्धा) निर्माण होईल.

आयएमपीटी अ.क्र. 213  -पृष्ठे - 64   मूल्य - 30  आवृत्ती - 1 (2014)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/d0a64pcwh9ldffzllgvz2h2rsfg9iq17




-अब्दुल कय्यूम शेख अहमद
असंवेदनशीलता
       आत्महत्येचे प्रयत्न रोखले जाऊ शकतात, गरज आहे आपापल्या परीने प्रयत्न करणाऱ्यांची. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाही हे सर्वमान्य असूनही वारंवार घडणाऱ्या अशा दु:खद घटनांवर योग्य विचार केला जात नाही. शेजारी लागलेली आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार नाही या भ्रमात राहून प्रत्येक माणूस यंत्राप्रमाणे धावत आहे. म्हणूनच आज जगभरातील प्रत्येक वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वीच एका मागोमाग एक जीवन संपविण्याचे निर्णय घेतले जात असताना ठोस उपाययोजना अंमलात न येणे हे समाजमन असंवेदनशील बनत चालल्याचे दर्शविते.
व्यक्ति आणि समाजव्यवस्था दोन्हीही दोषी
    आर्थिक चणचण, बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, शैक्षणिक प्रश्न इ. कारणांची चर्चा करून सर्वच मोकळे होतात आणि घटनेला जबाबदार असणाऱ्या दुसऱ्या बाजूकडे डोळेझाक होते.
    व्याजावर आधारित निर्दयी कर्जव्यवस्था व्यसनांना चालना देणारे उद्योगधंदे, बाजारपेठ बनलेली शिक्षण व्यवस्था, घर किंवा घराबाहेरील कार्यक्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या व्यवस्थापनातील त्रुटी, लग्नकार्यात बाधा बनलेल्या वाईट प्रथा, जागोजागी होणारे अन्याय व अत्याचार आणि वैध मार्गाने रोजगार शोधण्यात दारोदारी वाया जाणारी युवाशक्ती. ही सर्व बोलकी उदाहरणे आहेत आणि ही सर्व प्रगतीची चिन्हे नाहीतच तर समाजाला अधोगतीकडे नेणारी आहेत.
    हे मुद्दे माणसांचे जीवन सुलभ व्हावेत या हेतूने येथे प्रस्तुत केले आहेत अन्यथा आपले जीवन सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी प्रथमत: व्यक्तीचीच आहे. गंभीर किंवा दीर्घकालीन आजारामुळे धैर्य सुटणे, जीवनव्यवहारात मिळालेल्या अपयशामुळे निराश होणे, अवास्तव चिंता, निरनिराळ्या प्रकारचे काल्पनिक भय, राग, लोभ इ. सर्वांना मनात जागा देऊन आपण स्वत:च आपले मन कमकुवत करतो.
    सत्य हेच आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाच्या आवाक्याबाहेर नसते. सृष्टीच्या निर्माणकत्र्याने कोणत्याही जीवावर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचा भार ठेवला नाही. प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता व प्रत्येक दु:ख झेलण्याची शक्ती माणसामध्ये आहे. पण तो जरा विसराळूसुद्धा आहे. रात्र आली तर भयभीत होतो. पहाट होईपर्यंत धीर धरत नाही. रात्र ही ठराविक काळापुरतीच असते. कुणी संयम ठेवो अथवा न ठेवो दिवस उजाडण्यासाठी वेळ लागतो. पण एकदा सूर्य उगवला की कृतज्ञ राहणे आपले कर्तव्य आहे हे माणूस विसरतो.
ही वेळ आहे ‘आपली माणसं' जपण्याची
    जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर निराशा व्यक्त करते. आपले अपयश, आपल्यावर असलेला दबाव, होणाऱ्या छळाबद्दल काही बोलून दाखवते, आपली भावनिक व मानसिक अस्थिरता दर्शविते, तेव्हा कृपया तिला वेळ द्या. तिला गंभीर न घेणे हा आपला दोष ठरू शकतो. तिला मार्गदर्शन देणे, तिच्या समस्येवर योग्य उपाययोजना करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. एकमेकांना धीर देणे, एकमेकांशी सहानुभूती बाळगणे यामध्ये मिळणाऱ्या आनंदाला व सुखाला शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. भौतिक सुख व साधनसंपत्तीला आपला देव मानून जगणाऱ्या चंगळवाद्यांनी हा अनुभव जरूर घ्यावा.
अनुचित घडू नये यासाठी काय करावे?
    एखादी व्यक्ती आत्महत्या करणार असल्याचे कळले तर करण्यासारखी बऱ्याच गोष्टी असतात, पण सर्व त्यामध्ये प्रशिक्षित नसतात. मुळात त्या क्षणी व्यक्तीला बोलते करणे आणि तिच्या भावनांचा निचरा होऊ देणे गरजेचे असते. नाजुक अवस्था असेल, व्यक्ती चिडलेली, भावनाविवशतेत असेल तर प्रतिक्रिया देणे टाळावे. हेल्पलाइनची मदद घ्यावी.
    सरकारी हेल्पलाईन १०४ आहे. या नंबरवर फोन लावून तेथील समूपदेशक व प्रशिक्षित व्यक्तींशी संपर्वâ साधून मदद घेता येते. इंटरनेटच्या माध्यमातून स्प्ूाम्प्.ग्ह च्या मदतीने इतर हेल्पलाईनशी संपर्वâ होऊ शकतो.
    आपणा सर्वांना एक विनंती आहे, माणसांच्या कल्याणासाठी कुरआनमध्ये सांगितलेल्या आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा एकदा आपल्या बुद्धी विवेकाने आढावा घ्यावा. एक खरा एकेश्वरवादी जो आपले आचरण आपल्या विचारांच्या अधीन ठेवतो तो दु:खांना, संकटांना कसे सामोरे जातो हे जरूर तपासून पाहा.
एकेश्वरवादीचे मन आत्महत्येच्या विचाराला धुडकावून लावते
    कुरआनमध्ये ( सूरह बलद -९०/४) नुसार हे स्पष्ट करण्यात आले आहे की वर्तमान जीवन हे मनोरंजन किंवा ऐश व आरामासाठी नसून काबाडकष्ट करण्याचे व यातना सहन करण्याचे ठिकाण आहे आणि यातच माणसाची परीक्षा आहे. याचा भक्कम पुरावा माणसाची जन्माची वेळ आणि ती परिस्थिती आहे. ती घटना व ती वेळ आईसाठी किती कठीण व यातनामय असते आणि रडत येणारे बाळसुद्धा अडचणीत वेढलेला असते. यावरून स्पष्ट होते की पुढेही अडचणी व कष्टांना तोंड देत जीवनाची परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच परीक्षेचा निकालही लागेल आणि त्यामध्ये यश किंवा अपयश मिळणे हेही निश्चित आहे.
    दुसरे कष्ट आणि यातनामय परिस्थितीतच माणसाचे कर्तृत्व व मोठेपण कसाला लागते. बिकट परिस्थितीतच माणसाचे सद्गुण बहरतात आणि तो मानवतेच्या उच्च शिखरावर पोहोचतो. कष्ट व यातना माणसाला त्रास देण्यासाठी नव्हे तर त्याचे स्थान उंचावण्यासाठी असतात.
    माणसाचे धैर्य सोडण्याचे कारण हेच आहे की तो वर्तमान जीवनालाच सुखसमृद्धी व मौजमजा किंवा ऐश व आराम करण्याचे स्थान समजतो व हीच अपेक्षा बाळगतो.
    एकेश्वरवादी हा विचार करतो की जीवन अमानत आहे. जीवन देणारा मालक सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. या सृष्टीमध्ये माझे स्थान केवळ एखाद्या टृस्टीसारखे आहे. मालकाच्या इच्छेविरुद्ध कारभारात आपल्या मर्जीने मी ढवळाढवळ करु शकत नाही. मृत्यूची वेळ ठरलेली आहे. ठरलेल्या वेळी नैसर्गिक मृत्यूने न मरता आत्महत्येच्या प्रयत्नात मेलो तर अधिकार नसलेल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याची शिक्षा मिळेल. संसारातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न मरणोत्तर जीवनात महाग पडेल आणि स्वत:च्या उणिवा, दोष व कमतरतेची शिक्षा त्यांना का द्यावी ज्यांनी माझ्यासाठी कित्येक बलिदान दिले. माझ्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. जे माझ्या सुखदु:खात सहभागी बनले. इतरांनी घेतलेल्या एवूâण कष्टापुढे माझ्या कष्टाची किंमत काय? मी आत्महत्येची पळवाट का स्वीकारावी?
    एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण ईश्वराखेरीज अन्य कोणीही करूच शकत नाही. म्हणून तो संकट आणि त्रासासमोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो.
    एकेश्वरवादी केवळ अल्लाहचेच भय बाळगतो. त्यामुळेच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय लोप पावतात. तोच एकमेव ईश्वर सर्वाचा रक्षणकर्ता आहे म्हणून फक्त त्यालाच संकट व अडचणीत हाक मारतो. तोच सर्वशक्तिशाली आहे म्हणून फक्त त्याच्या समोर आपली गाऱ्हाणी ठेवून प्रार्थना करतो.
    लाभ व हानीचा स्वामी फक्त एकच ईश्वर आहे व सर्व काही त्याच्याच हाती आहे. म्हणून मी इतर कोणाचीही अपेक्षा बाळगणार नाही. कितीही संकटे आली तरी मला विश्वास आहे की त्या एकमेव ईश्वराची साथ मला सोडणार नाही.
    भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा एकेश्वरवादी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परंतु अपयश आल्यास तो हा विचार करतो की जे काही घडले ते अल्लाहने निर्धारीत केलेल्या भाग्यानुसार घडले. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. निश्चितच यामध्ये कोणता तरी भलाईचा पैलू असेल आणि भविष्यकाळातही अल्लाहचा प्रत्येक निर्णय माझ्या भलाईसाठीच असेल. मी पुन्हा प्रयत्न करणार, हातपाय हलविणार पण खचून जाणार नाही आणि नाउमेद होणार नाही.
    एकेश्वरवादीचा हा विश्वास, अल्लाहशी असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मोठमोठ्या संकटातून, दु:खांच्या आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला सापडतात. हेच मार्गदर्शन प्रत्येक काळात प्रत्येक समाजात प्रेषितांनी केले. एकेश्वरवादाकडे लोकांना बोलविले.
    माणसाला जीवन का देण्यात आले? सृष्टी का निर्माण करण्यात आली? सृष्टीमध्ये माणसाचे स्थान काय आहे? माणसाने आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात कसे वागावे? याचा अभ्यास करण्यासाठी कुरआन आणि  आदरणीय मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा जरूर अभ्यास करावा. कारण आज मार्गदर्शनाचे विश्वसनीय, प्रामाणिक आणि परिपूर्ण साधन हेच आहे.

माननीय अबू हुरैरह (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"जो माणूस 'हज' अगर 'उमरा' अगर 'जिहाद' करण्याच्या इराद्याने घरातून निघाला आणि वाटेत त्याला मृत्यू आला तर सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून त्याला तेच पुण्य व फळ लाभेल, जे हाजी, गाजी व उमरा करणाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे."
(मिश्कात)

माननीय अबू दर्दा (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“जो माणूस तहज्जुद' ची नमाज अदा करण्याचा संकल्प करून झोपला, परंतु त्याला गाढ झोप लागली व पहाट झाली तरी तो उठू शकला नाही. अशा माणसाच्या कर्मपत्रामध्ये त्या रात्रीची तहज्जुदची नमाज लिहिली जाईल आणि त्याला लागलेली झोप ही त्याला त्याच्या पालनकर्त्याकडून लाभलेली देणगी समजली जाईल."
(इब्ने माजा, नसाई) पवित्र कुरआनचे स्मरण ताजे ठेवा ___ माननीय उबैदा मुलैकिई (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“हे कुरआनला मानणाऱ्या लोकांनो! कुरआनला उशी बनवू नका. रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा. त्याच्या अध्ययन, अध्यापन नियमीत करा त्याच्या शब्दांना योग्य प्रकारे वाचा. जे काही कुरआनमध्ये निवेदन केले गेले आहे त्यावर मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने चिंतन व मनन करा, म्हणजे तुम्हाला यश लाभू शकेल आणि त्याचे पठन ऐहिक जीवनासाठी नव्हे तर अल्लाहची प्रसन्नता लाभावी म्हणून करा.” (मिश्कात)
कुरआनला उशी बनवू नका. म्हणजे कुरआनबद्दल निष्काळजी राहू नका. पवित्र कुरआन हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ, कुरआनला मानणारे लोक म्हणजे मुस्लिम. मुस्लिमांनी नेहमी पवित्र कुरआनचे पठण केले पाहिजे. पवित्र कुरआनची शिकवण समजावून घेणे, ती दुसऱ्याना समजावून सांगणे व त्या शिकवणीनुसार स्वत: आचरण करणे व दुसऱ्याना त्यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहन देणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. हे सर्व अल्लाहची प्रसन्नता लाभावी या एकमेव उद्देशाने झाले पाहिजे.
सदाचाराची व्याप्ती माननीय अबू हुरैरह (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“दोघांमध्ये समझोता घडवून आणा. हा सदाचार आहे. तुम्ही तुमच्या वाहनावर कोणाला बसवून घेतले वा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवून घेतले तर तोही सदाचार आहे. चांगली गोष्ट सांगणे हाही सदाचार आहे. तुमचे प्रत्येक पाऊल जे नमाजासाठी उठते, तो सदाचार आहे. रस्त्यामधून दगड, काटे दूर करणे हासुद्धा सदाचार आहे." १ तहज्जुद-रात्रीच्या शेवटच्या प्रहरी प्रात:कालापूर्वी एकांतवासात अदा केली जाणारी नमाज. हिचे महत्त्व फार आहे व फळही मोठे आहे.

- मिर्जारफीउद्दीन अहमद

    या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांच्या द्वारा जी क्रांती अल्पकाळात घडली तिचे उदाहरण या जगात सापडणे अशक्य आहे, हे नमूद केले आहे. पुस्तिकेत पुढे वर्णन आहे,
    इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. इस्लामी आंदोलनाने केवळ मानसिकताच बदलली नाही तर समाजाच्या आर्थिक नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेत पूर्णत: क्रांती घडली.

आयएमपीटी अ.क्र. 203    -पृष्ठे - 24   मूल्य - 10      आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2yyc8u2qfh09guomhscqv49cqzvvn4qy





Madina
मुहम्मद (स.) समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेने, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुद्धीने बंड करावे म्हणून तो इशारा होता. त्या वेळेस जुलमी संस्था व भांडकुदळ पंथ यांचा बुजबुजाट झाला होता. दुर्बोध चर्चांत मानवी आत्मा गुदमरत होता आणि मानवी शरीर वतनदारांच्या वर्चस्वाखाली तुडविले जात होते; परंतु पैगंबर आले. त्यांनी ही मिरासदारीची भिंताडे साफ पाडली. विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. स्वार्थी लोकांनी ईश्वराकडे जावयाच्या रस्त्यावर जी जाळी विणून ठेवली होती. ती पैगंबरांनी आपल्या जोरदार पुंâकरीने नष्टकेली. रस्ता साफ मोकळा झाला. ‘‘अल्लाहजवळ तुम्ही सारे निर्धास्तपणे जा. तेथे सारे समान. तेथे कोणाला जादा अधिकार नाहीत.’’ पैगंबर स्वत: पंडित नव्हते; परंतु ज्ञान-विज्ञानाची महती त्यांनी गायिली आहे. मानवी इतिहास लेखणीने लिहिला जातो. लेखणीने मानवाचा निवाडा केला जातो, न्याय दिला जातो. मानवी कृत्यांची छाननी करणारे, अल्लाहच्या दृष्टीने छाननी करणारे साधन म्हणजे लेखणी, लेखणी म्हणजेज्ञान, ज्ञानाशिवाय सारे फोल आहे. ‘‘शिका, वाचा, पाहा.’’ असे मुहम्मद (स.) सांगतात.
ते बुद्धीवर फार जोर देत. आश्चर्ये, चमत्कार असल्या प्रकारांना ते कधीही उत्तेजन देत नसत. भोळसटपणा व बावळटपणा त्यांना पसंत नव्हता. ईश्वरी शासनाविषयीची जी त्यांची कल्पना होती ती सर्वांना समान प्रवेश देणारी होती. पैगंबरांचा ईश्वर लोकशाहीचा भोक्ता आहे. तो कोणी हुकूमशहा नाही.
मुहम्मद (स.) यांचे धार्मिक ध्येय व्यापक आहे. त्यांची मानवता साधी व सरळ आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे मुहम्मद (स.) यांचे पूर्वीच्या धर्माचार्यांपेक्षा विशिष्टत्व दिसते. ते जणू अर्वाचीन महर्षी आहेत, असे वाटते. त्यांचे जीवनकार्य उघडे आहे. स्पष्ट समोर जगाच्या पुढे आहे. त्यात गूढता नाही. अस्पष्टततेत ते लपलेले नाही. त्यांच्या व्यक्तित्वाभोवती पुराणे रचली गेली नाहीत. दंतकथा गुंफिल्या गेल्या नाहीत.
अरबस्तानातील जमातीपाठीमागून जमाती नवधर्माच्या स्वीकारार्थ जसजशा येऊ लागल्या तसे मुहम्मद (स.) यांना वाटू लागले की आपले कार्यही समाप्त होण्याची वेळ आली. मक्केची शेवटची यात्रा करून यावे असे त्याच्या मनात आले. इ. स. ६३२ च्या फेब्रुवारीच्या २३ तारखेस ते निघाले. त्याच्या बरोबर लाख दीड लाख यात्रेकरू होते. ‘हज्जतुल विदा’ म्हणजे पैगंबरांची अंतिम हज यात्रा किंवा इस्लामी यात्रा. मीनाच्या दरीत यात्रेचे सारे विधी त्यांनी केले. हे विधी उरकण्यापूर्वी ७ मार्च रोजी जबल-उल-अरफात या टेकडीवरून हजारो मुस्लिमांसमोर त्यांनी शेवटचे प्रवचन दिले. मुहम्मद (स.) एक वाक्य उच्चारीत. ते वाक्य खालच्या लोकांत असलेला पुन्हा उच्चारी. त्या वेळेस ध्वनिक्षेपक नव्हते. सर्वांना ऐकू जावे म्हणून जिवंत ध्वनिक्षेपक उभे केले होते. ते साधे सरळ प्रवचन होते.
‘‘बंधुंनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी पुन्हा तुमच्यात मी दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणे सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमाने व बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करू. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधीही विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा हिशेब द्यावा लागेल.
‘‘मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने वागवा. कठोर नका होऊ, दयाळू राहा. तुम्ही ईश्वराला साक्षी मानून आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? ईश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
‘‘तसेच तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा, पाप टाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वज्र्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे, व्याज देऊ नये, मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील.
‘‘आणि प्राचीन काळापासून तुम्ही जाहिलियत मानीत आलात. रक्ताचा सूड घेत आलात. खुनाचा बदला घेत आलात; परंतु आजपासून ते बंद होत आहे. ही गोष्ट निषिद्ध आहे. इस्लाममान्य नाही. आजपासून सारी सुडाची भांडणे रद्द झाली. हारीसाचा मुलगा रबिया यांचा खून झाला; परंतु त्याचा सूड घेण्यात येणार नाही. माझ्याच आप्तेष्टांपासून हा नवीन नियम सुरू करू या. इब्न रबियाच्या या उदाहरणाने आपण नवीन आरंभ करू या. (इब्ने रबिया लहान असताना दुसऱ्या जमातीच्या ताब्यात संरक्षणार्थ देण्यात आला होता; परंतु हुझैल जातीने त्याचा व्रूâरपणे वध केला होता. पैगंबर मुहम्मद ( स.) यांचा हा चुलत भाऊ होता.)
‘‘आणि तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षात ठेवा की, कसेही झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने  वागवता कामा नाये. मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. तुमचे सर्वांचे एक जणू भ्रातृमंडळ, एक तुमचा महान भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर राहा, सावध राहा. जे येथे आज हजर आहेत त्यांनी हे सारे गैरहजर असणाऱ्यांस सांगावे. येथे ऐकणाऱ्यांपेक्षाही ज्याला सांगितले जाईल तो कदाचित ते अधिकच लक्षात ठेवण्याचा संभव आहे.’’
असे हे प्रवचन बराच वेळ चालले होते. साधे, सरळ, कळकळीचे, वक्तृत्वपूर्ण असे ते प्रवचन होते. भावनाप्रधान श्रोत्यांची अंत:करणे उचंबळत होती, थरारत होती आणि प्रवचन संपल्यावर पैगंबरांनी पुढील शब्दांनी शेवट केला : ‘‘हे अल्लाह, मी तुझा संदेश दिला. मी माझे कार्य पुरे केले आहे.’’
त्याचबरोबर सभा गर्जती झाली, ‘‘खरोखरच तुम्ही आपले कार्य पुरे केले आहे.’’ पैगंबर पुन्हा अखेर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! माझ्या कामाला तुझीच साक्ष. दुसरे मी काय सांगू? हीच माझी प्रार्थना.’’
खिस्ताचे पर्वतावरील प्रवचन अधिक काव्यमय वाटते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे हे पर्वतोपनिषद साधे आहे. त्यात गूढ गहन काही नाही. साध्या गोष्टी; परंतु रोजच्या जीवनातील. घरीदारी कसे वागावे, संसारच सुंदर व सारमय कसा करावा, ते त्यांनी सांगितले. सर्वसामान्य लोकांना नैतिक मार्गदर्शनार्थ स्पष्ट व सुबोध दिशा हवी असते, ती स्पष्ट दिशा या प्रवचनात होती.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी रानटी लोकांतून नवी संस्फूर्त असे संघटित राष्ट्र निर्माण केले. त्यांना ईशज्ञान देऊन कृतार्थ केले, पवित्र केले. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातात रंगणारे असे अरब होते. त्यांना ‘तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय ईशपूजा’ असे ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनी एकत्र केले. विभक्त झालेल्या अरबांना त्यांनी जोडले. बंधुभावाने बांधले. संघटित केले. अनादिकाळापासून हे द्वीपकल्प अंधारात गुडुप होते. आध्यात्मिक जीवनाचे नावही नव्हते. ज्यूंच्या वा खिस्तांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रुढी, दृष्टता, दुर्गुण यांच्या घाणीत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत! मोठा मुलगा स्वत:च्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत, त्यांना स्वत:च्या बायका करी.
थोड्या वर्षांपूर्वी असा हा अरबस्तान होता. परंतु मुहम्मद (स.) यांनी केवढे स्थित्यंतर केले! जणू स्वर्गातील देवदूत खाली वावरायला आला. ज्यांची मने अर्धवट जंगली होती, अशांची मने भ्रातृभाव व प्रेम यांनी भरून गेली. अरबस्तान नैतिकदृष्ट्याही ओसाड वाळवंट होते. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथे पायमल्ली होत होती; परंतु मुहम्मद (स.) यांनी तेथे नैतिक नंदनवन फुलविले. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाची फुले फुलविली. मूर्तिपूजा व तद्नुषंगिक इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केले.
जो अल्लाह स्वत:च्या सामर्थ्यने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या एकमेव अल्लाहची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहम्मद (स.) यांनीच करून दाखविला. इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुन्हा आली नाही आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांची वाणी अत्यंत प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. अल्लाहचे अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणे, तीव्रपणे क्वचितच कोठे उपदेशिले गेले असेल, उद्घोषिले गेले असेल. अरब अत:पर केवळ ऐहिकदृष्टीचे राहिले नाहीत. मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असे जीवन असते. त्या पारलौकिक जीवनासाठी या जीवनात दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनात दाखविली पाहिजेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शिकविले.
हा जो अमूर्त ईश्वर तो अनाद्यनन्त आहे तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान, प्रेमसिंधू व दयासागर आहे. ही जी नवजागृती आली त्याचे मुहम्मद (स.) स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणू नवप्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यातून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वाहत होते आणि म्हणून मुहम्मद (स.) यांच्याविषयी भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणू आता एकच इच्छा झाली की त्या अल्लाहची सत्याने व पावित्र्याने सेवा करावी. अल्लाहची आज्ञा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जे जे सांगितले, जी जी वचने उच्चारिली, जे जे मार्गदर्शन केले, जी सत्ये दिली, ते सारे अरबांच्या हृदयात जणू कोरल्यासारखे झाले होते. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीती यांचे ऐक्य झाले. सद्सद्विवेकबुद्धीसाठी आनंदाने बलिदाने करणारे दिसू लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभू लागले. जगाला एवढी मोठी जागृती इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल.
मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत आपले कार्य पुरे केले. बुद्धाचे काम अशोकाने पुरे केले. खिस्ताचे कॉन्स्टंटाईनने, झरतुष्ट्राचे उरायसने, बनीइस्राईलांचे जोशुआने. परंतु मुहम्मद (स.) एक असे झाले ज्यांनी स्वत:चे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेही कार्य पुरे केले. जणू सारे काम अल्लाहच करवीत होता, मुहम्मद (स.) निमित्तमात्र होते, असे मुस्लिमांनी म्हटले तर त्यात काय आश्चर्य?
ज्याला कालपरवापर्यंत दगड फेकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधित आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्त्रप्रणाम, त्या महापुरुषाला.
मुहम्मद (स.) यांचे जीवन उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मांनी खच्चून भरलेले असे हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनी चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांना त्यांनी एक केले. अमर जीवनाच्या आशेने कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्तत: पडलेले किरण वेंâद्रिभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणे नाही. तडजोडीस वाव नाही.
अप्रतिहत धैर्याने हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधीच बाळगिली नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वत:च्या जणू संपूर्ण विसर त्यांना पडला होता. खिस्ताने निराकार प्रभूचा धर्म दिला; परंतु त्या धर्मात मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेत चुस्त गढून गेलेल्या अरबांना या न पढलेल्या फकीराने इतक्या प्रखरतेने ईश्वराची एकता पटविली की ती वज्रलेप झाली. ज्यांनी ज्यांनी म्हणून पैगंबरांची वाणी एकदा ऐकली, त्यांच्या मनावर ईश्वराचे अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय राहत नसे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget