Latest Post

दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे.
‘‘मी ‘मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासनेकरिताच निर्माण केले!’’ (दिव्य कुरआन)
ईश्वराने जगात जेवढे प्रेषित पाठविले ते केवळ याच उद्देशांसाठी की, मानवास ईश्वराच्या उपासनेची शिकवण द्यावी.
‘‘अल्लाहचीच उपासना करा आणि सैतानापासून दूर राहा.’’ (दिव्य कुरआन) 
आता आपणा सर्वांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की, उपासना म्हणजे नेमके काय? तसेच इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देश पूर्ण होणे शक्यच नाही.
उपासनेची अज्ञानी कल्पना
इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ केवळ भक्ती (Worship) नसून तो ‘दासत्व’ (Obediance) या अर्थात व्यापलेला आहे. उपासनेचा अर्थ केवळ भक्तीपुरता मर्यादित ठेवणे ही अज्ञानी कल्पना आहे. अज्ञानी समुदायाचे लोक असे समजत असतात की, ज्याप्रमाणे मोठी माणसे सरदार, प्रमुख अथवा राजे-महाराजे स्तुती केल्याने प्रसन्न होतात, भेटवस्तू दिल्याने मेहेरबान होतात, त्यांच्यासमोर हात जोडल्याने व नतमस्तक होण्यामुळे ते आपल्यावर कृपा करतात, तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्याकडून आपली कामे करून घ्यावीत, नेमक्या अशाच तऱ्हेने त्यांच्या उपास्याची आपल्या उपासकांकडून अपेक्षा व मागणी असते. आपल्या उपासकाचीसुद्धा दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन व अजीजी करून त्यास प्रसन्न करावे आणि आपली मागणी पूर्ण करून घ्यावी. याच कल्पनेच्या आधारावर अज्ञानी धर्मांमध्ये काहीं विशेष पूजापाठ व कर्मकांडांना ‘उपासना’ असे नाव देण्यात आले आहे.
उपासनेची वैराग्यात्मक कल्पना
त्याचप्रमाणे इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ असासुद्धा नाही की, मानवाने व्यावहारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यावा आणि केवळ ईशभक्तीत रममान व्हावे, ध्यानस्थ वा समाधिस्थ (Madiation) व्हावे, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांना दाबून ठेवावे (Self Annihilation) व घोर तपश्चर्या करून (Spritual Exersises) आपली आत्मिक शक्ती वाढवावी अथवा साक्षात्कार आणि चमत्कारांची शक्ती आपल्यात निर्माण करावी. तसेच या व्यावहारिक जीवनाचा अर्थात संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी. उपासनेची ही कल्पना संन्यासी अथवा वैराग्य दृष्टिकोनावर आधारित आहे. या प्रकारात धर्म आणि सामाजिक जबाबदाऱ्या व व्यावहारिक जीवन हे आपसांत अगदी परस्पर विरुद्ध बाबी ठरतात. संसाराच्या जवाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग शोधणे अथवा पळ काढणे म्हणजे उपासना असा हा विचित्र दृष्टिकोन आहे. कारण या दृष्टिकोनामध्ये आत्मिक विकासाकरिता भौतिकतेतून मुक्त होणे वा सन्यास घेणे अनिवार्य आहे.
उपासनेची इस्लामी कल्पना
इस्लामच्या दृष्टिकोनात उपासनेची कल्पना उपरोक्त दोन्ही कल्पनांपेक्षा अगदीच भिन्न आहे. इस्लामचा दृष्टिकोन आहे की, मानव हा एकमेव ईश्वराचा दास आहे. मानवाचा निर्माता, पालनकर्ता आणि स्वामी केवळ एकमेव ईश्वरच आहे. ईश्वराने मानवास या भूतलावर आपला प्रतिनिधी नेमला आहे. त्याला काही जवाबदाऱ्या, अधिकार व महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या आहेत. मानवाचे कर्तृत्व म्हणजे आपला स्वामी अर्थात एकमेव ईश्वराचा उद्देश पूर्ण करणे, आणि आपल्या जवाबदाऱ्यांची जाण ठेवून कर्तव्य पूर्ण करणे, तसेच आपली शक्ती व अधिकार आपल्या वास्तविक स्वामीच्या कायद्यांनुसार आणि मजीनुसार वापरणे होय. मानवाच्या यशाचे रहस्य हे या गोष्टीत दडले आहे की, त्याने या ऐहिक जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा करून व प्राण पणाला लावून आपले कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि इमानेइतबारे आपल्या एकमेव स्वामी असलेल्या ईश्वराच्या आदेश व कायद्यांचे पालन करावे. आपल्या कर्तव्यपूर्तीची मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा तो आपल्या एकमेव स्वामी ईश्वरासमोर आपल्या कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठी उभा राहील, तेव्हा त्याच्या जीवनकार्यावरून हे सिद्ध होईल की, तो कर्तव्याची जाण असलेला आणि ईश्वराचा आज्ञाधारक एक दास होता. इस्लामच्या या स्पष्ट दृष्टिकोनानुसार उपासनेची हीच वास्तविकता आहे. उपासनेच्या उपरोक्त दोन्ही कल्पनांशी इस्लामी उपासनेचा कवडीमात्र संबंध नाही. जो माणूस थोडासा वेळ काढून भक्ती केल्यानंतर असे समजतो की, मी आपल्या उपास्याचा हक्क पूर्ण केला आणि मोकळा झालो, आता आपल्या व्यावहारिक जीवनात वाटेल तसे वागण्यास मुक्त आहे. त्याचे उदाहरण असे आहे, जणू एखादा असा कर्मचारी ज्याला तुम्ही चोवीस तासांकरिता चाकरीवर ठेवले आणि पूर्ण पगार देऊन त्याचे पालनपोषण करीत आहात, परंतु तो कर्मचारी केवळ सकाळी व संध्याकाळी येऊन तुम्हास साष्टांग नमस्कार घालून जातो, तुमच्या चरणात फुले वाहून जातो आणि मग इतर वेळेत टवाळक्या करीत फिरतो अथवा दुसऱ्याची चाकरी करीत राहतो. याचप्रमाणे जो माणूस जगामध्ये व्यावहारिक जीवनातून व जवाबदाऱ्यांतून पळ काढतो आणि सांसारिक जवाबदाऱ्या सोडून एकांतात जाऊन आपला पूर्ण वेळ नमाज पढण्यात व ईश्वराचे नामस्मरण करण्यात घालवतो, त्याचे उदाहरण असे आहे की, जणू एखाद्या माणसास तुम्ही आपल्या बागेच्या रखवलीकरिता नियुक्त केले, परंतु तो बागेची राखण न करता व तेथील कामकाज न करता सकाळ ते संध्याकाळ व संध्याकाळ ते सकाळपर्यंत तुमच्या समोर हात बांधून उभा आहे व तुमच्या स्तुतिगाणात चोवीस तास तल्लीन आहे आणि बागेसंबंधी तुम्ही त्यास जी कामे सोपविली होती, त्या कामांची रुपरेखा मोठ्या आनंदाने तुमच्यासमोर केवळ पठण करीत आहे आणि त्या आदेशांनुसार मुळीच कोणतेही काम करीत नाही, अशा माणसाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटेल ? अर्थात तुम्हाला जे वाटेल, तीच भूमिका व दृष्टिकोन इस्लामचा आहे. अशा कर्मचाऱ्यांशी तुम्ही जे वर्तन कराल, तेच वर्तन अशा चुकीच्या कल्पनेनुसार उपासना करणाऱ्यांशी ईश्वर करील.
इस्लामचा उपासनेविषयी दृष्टिकोन असा आहे की, मानवाचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या दासत्वात ((Whole time Servant)वा त्याच्या आदेशपालनात व्यतीत व्हावे. त्याने स्वतःस कायमस्वरुपी आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे दासत्व करायला हवे. अर्थात या जगामध्ये प्रत्येक बाब, प्रत्येक कार्य व प्रत्येक कृती ईश्वराने प्रदान केलेल्या कायद्यानुसार करावे. आपले झोपणे-जागणे, खाणे-पिणे, चालणे-फिरणे, अशाप्रकारे सर्वकाही ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार असावे. ईश्वराने ज्या संबंधात मानवास बांधले आहे, त्या सर्वांत तो बांधील असून हे संबंधसुद्धा ईश्वराच्याच मर्जी व कायद्यानुसार असावेत. ईश्वराने ज्या सेवा आणि कर्तव्य मानवास सोपविले आणि व्यावहारिक जीवनात ज्या जवाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या आहेत त्या ईश्वराच्या कायद्यानुसार स्वखुषीने पार पाडाव्यात. ईश्वराचा हा कायदा त्याने प्रेषितांच्या माध्यमाने मानवास प्रदान केला. मानवाने प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्य व कृतीस ईश्वराप्रती आपली जवाबदारी समजावी आणि याची पूर्णतः जाणीव ठेवावी की, आपल्या प्रत्येक कृती वा कार्याचा आपणास ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. आपल्या घरी पत्नी व मुलाबाळांशी, गल्ली वा मोहल्ल्यात आपल्या शेजार-पाजाऱ्यांशी, आपल्या सोसायटीत वा समाजात मित्र-मंडळींशी, आपल्या व्यवहारात संबंधितांशी वर्तन करतेवेळेस प्रत्येक बाबीत आणि प्रत्येक कामात ईश्वराने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. जेव्हा आपण रात्रीच्या काळोखात असू आणि आपल्याला पाहणारा पण कोणीच नसेल, अगदी अशा वेळीसुद्धा कोणतेही वाईट कर्म करताना याची प्रखर जाण असावयास हवी की, ईश्वर आपल्याला पाहात आहे. जेव्हा आपण एखाद्या जंगल अथवा अरण्यातही असू आणि ईश्वरीय अवज्ञा किवा अपराध करण्याची पुरेपूर संधी प्राप्त असेल, तसेच त्या ठिकाणी आपल्या अपराधाची साक्ष देणारासुद्धा कोणीच नसेल व कोणी अटक करणारा पोलीससुद्धा नसेल, अशा वेळीसुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव असावी की, आपल्या अपराधाची कोणी साक्ष देवो अथवा न देवो, पोलीस अटक करो अथवा न करो, ईश्वर मात्र आपले कर्म पाहात आहे आणि आपल्या या पापी कर्माचा ईश्वरास जाब द्यावा लागणार आहे. अशा प्रकारच्या ईशभयामुळे निश्चितच आपल्याकडून पातक कर्म घडण्याचे टळेल. अशा ईशभय अथवा ईशपरायणता किवा ईश्वराच्या नाराजीमुळे माणूस आपला मोठ्यात मोठा लाभसुद्धा सोडून देऊ शकतो. ज्या वेळी सत्य आणि इमानदारीमध्ये आपल्याला नुकसान उचलावे लागते, तेव्हा आपल्याला दुःख होण्याऐवजी या गोष्टीमुळे समाधान व शांती प्राप्त होते की, माझ्या सत्य व इमानदारीमुळे माझा ईश्वर माझ्यावर प्रसन्न होत आहे.
सांसारिक जीवन, व्यावहारिक जवाबदाऱ्या, मुलेबाळे सोडून एकांतात जाऊन बसणे, संन्यास व वैराग्य पत्करणे आणि ईश्वराच्या नावाचा जप करीत बसणे, ही मुळी उपासनाच नव्हे. उलट व्यावहारिक जीवनाच्या जवाबदाऱ्या आणि घर-परिवार ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार सांभाळणे हीच मुळात उपासना होय. ईशस्मरण म्हणजे जगातील ज्या बाबी माणसाला ईशस्मरणापासून गाफील करतात त्यांतच रहावे आणि ईश्वराच्या ध्यान आणि स्मरणापासून गाफील होता कामा नये. ऐहिक जीवनामध्ये ईश्वरीय कायदा मोडून अर्थात बेईमानी करून वा बट्टेबाजी आणि लबाडी करून अमाप संपत्ती कमविण्याच्या संधी असतात. अन्याय व अत्याचार करून भौतिक सुख मिळविता येते. तसेच ईश्वरीय मर्जी आणि कायदा पाळल्यामुळे मोठमोठ्या फायद्यांच्या संधी गमावून बसावे लागते. अशा प्रसंगी ऐहिक सुखाच्या लाभास बळी न पडता मोठमोठ्या संधी ईश्वराच्या मर्जीवर बळी चढविणे हेच ईश्वराचे वास्तविक स्मरण करणे होय. अशा प्रकारच्या व्यवहारात ईश्वराचे अशा प्रकारे स्मरण करावे. सत्ता हाती आली तरी हे विसरता कामा नये की, मी मानवांचा स्वामी अथवा उपास्य अगर ईश्वर नसून त्या सर्वशक्तिमान ईश्वराचा केवळ दास आणि सेवक आहे. न्यायदानाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यास एखाद्यावर अन्याय करण्याची शक्ती हाती आली असली तरी, हे विसरता कामा नये की, ईश्वराने माझ्यावर न्याय करण्याची जवाबदारी सोपविली आहे. या भूतलावरील अफाट भौतिक संपत्ती आणि भौतिक शक्ती हाती आली तरी, ही वास्तविकता विसरता कामा नये की, मी या संपत्ती आणि शक्तीचा मूळ मालक नसून केवळ रक्षक व अनामतदार आहे व मला एक-एक पैशाचा ईश्वरास हिशेब द्यावा लागणार आहे. कारण भूतलावरील समस्त संपत्तीचा वास्तविक स्वामी हा एकमेव ईश्वरच आहे. लष्कराचे प्रमुख असले तरी, ईश्वरासमोर जाब देण्याची जाणीव तुम्हाला शक्तीच्या तंद्रीत वा मस्तीत येऊन दुर्बलांवर अन्याय करण्यापासून परावृत्त ठेवील. राज्यकारभाराचे कठीण कार्य हाती आल्यावरसुद्धा सत्य, न्याय आणि सत्यसमर्थनाच्या कायमस्वरूपी ईश्वरीय नियमांच्या खडतर मार्गावर चालून दाखवावे. व्यवसाय, वित्त आणि उद्योगधंद्यात खुशाल प्रगती करावी, परंतु या प्रगतीच्या माध्यमांत पवित्र आणि अपवित्र अथवा वैध आणि अवैध बाबीमध्ये फरक ओळखून वैध मार्गाचाच अवलंब करावा. तुमच्या जीवनमार्गात प्रत्येक पावलावर निषिद्ध कमाई किवा अवैध बाबी अत्यंत सुंदर आणि मोहक स्वरुपात तुम्हास मोहिनी घालतील, परंतु तुम्ही त्या मोहिनीच्या आहारी जाता कामा नये, तुमची पावले डगमगता कामा नये. चोहीकडे अन्याय, अत्याचार, धोकेबाजी आणि व्यभिचाराचे मार्ग तुम्हास अगदी मोहक स्वरुपात आकर्षित करतील, ऐहिक आणि भौतिक सुखवस्तू यशाच्या स्वरुपात तुमच्यासमोर लोटांगण **घालतील, व्यभिचार आणि स्वैराचार आधुनिक प्रगतीचे रूप व सोंग घेऊन तुमच्यावर भुरळ टाकतील, परंतु तुमच्या अंतःकरणात ईश्वराचे स्मरण आणि त्याच्या समोर जाब देण्याच्या जाणिवेने तुम्ही या संपूर्ण अवैध बाबींचा त्याग कराल. ईश्वरीय कायदा स्थापन करण्याच्या मार्गात अगणित संकटे आणि समस्या दिसू लागतील, सत्याची कास धरण्यात आणि न्याय व सत्यावर तटस्थपणे कायम राहण्यात प्राण व संपत्तीचे नुकसान होताना दिसेल, तसेच ईश्वरीय कायदा आणि मर्जीनुसार जीवन जगण्याकरिता समस्त विश्वाचे वैर ओढवून घेण्यासमान असेल, परंतु तुमच्या उद्दिष्टाच्या अथांग सागरात किचितही हेलकावा येता कामा नये. अर्थात हीच आहे वास्तविक उपासना, याचेच नाव आहे ईश्वराचे स्मरण, हीच ती ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण आहे, ज्याच्याकडे दिव्य कुरआनाने अंगुलीनिर्देश करून म्हटले आहे की,
‘‘नमाज संपल्यावर भूतलावर अल्लाहची कृपा (उपजीविका) प्राप्त करा आणि अल्लाहचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हास यश मिळावे.’’ (दिव्य कुरआन)

बोले तैसा चाले,‘ या म्हणीनुसार आपण नेहमीच पाहतो की कोणत्याही समाजसुधारकाच्या शिकवणींचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होत असतो की स्वतः समाजसुधारक त्या शिकवणींवर आचरण करीत असतो. अन्यथा ‘लोकां सांगे विश्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण‘ अशी अवस्था असेल तर त्याच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव इतरांवर पडत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण हे नेमके कुरआनाच्या शिकवणींचे परिपूर्ण स्वरूप होय. ईश्वरी आदेशावर कशाप्रकारे आचरण असावे, याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक म्हणजेच त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) हे बालपणापासून खरे बोलणारे आणि लोकांच्या अनामतींचे रक्षण करणारे असल्याची ख्याती पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या याच गुणविशेषणामुळे ‘अमीन‘ व ‘सादिक‘ अर्थात सत्यवचनी व अनामतदार अशा गौरवास्पद विशेषणानी लोक संबोधित असत. त्यांनी कधीही अरब समाजातील अज्ञानता व अमानवी परंपरांचा बालपणापासूनच स्वीकार केला नाही. अन्याय व अत्याचारांची कधीही साथ दिली नाही. ते अत्यंत गंभीर, मधुरभाषी आणि दयाळू स्वभावाचे होते. इतरांचे दुःख त्यांना पाहवत नसे. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट उचलायचे, लोकांच्या आर्थिक अडचणी स्वतःचा कमाईतून खर्च करून सोडवायच्या, स्वतःजवळ पैसे नसल्यास इतरांकडून कर्ज घ्यायचे, मात्र कोणत्याही याचकास त्याची अडचण भागविल्याशिवाय परत करीत नसत. स्वतः भूकेले तहानलेले राहून इतरांचे पोट भरायचे. फक्त मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करायचे. अनाथ, वृद्ध, विधवा आणि गरिबांवर त्यांची विशेष कृपा असे. त्यांच्या याच दयाळू आणि कृपाळू वृत्तीमुळे ते समाजात सर्वांचे लाडके आणि प्रिय होते. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी स्वतःकरिता काहीही ठेवले नाही. जे प्राप्त झाले, ते इतरांना वाटले.
दरिद्री आणि रंजल्यागांजल्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी रंजल्यागांजल्यांसाठी कल्याण केले. एवढेच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या या अंतिम प्रेषितास जीवनभर कधीही पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. (संदर्भ : सीरतुन्नबी, प्रथम खंड) ते नेहमी म्हणत असत,
‘‘तुम्हास ईश्वराकडून जी सहायता आणि उपजीविका मिळते ती गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मदतीकरिता मिळते.‘‘ (संदर्भ : सहीह मुस्लिम)
त्यांच्या या वचनावरून हीच बाब स्पष्ट होते की आपल्याकडे असलेल्या संपत्ती, सामर्थ्य आणि शक्तीवर दीनदुबळ्यांचासुद्धा अधिकार आहे. त्यांचीच सेवा करण्यासाठी ईश्वराने आपल्याला हे ‘तन-मन-धन‘ प्रदान केलेले आहे.
संयम, शांती, दया आणि कृपाळू वृत्ती असलेल्या आदरणीय मुहम्मद (स.) यांची ही घटना अवश्य लक्षात घ्यावी. एकदा काय झाले की प्रेषित नेहमीप्रमाणे नमाज पढण्यासाठी मस्जिदकडे जात होते. रस्त्यात एका ‘ज्यू‘ समाजाच्या म्हातारीने त्यांच्या अंगावर कचरा फेकला. ते कचरा धुवून व कपडे बदलून परत मस्जिदीकडे गेले. हा नित्याचाच क्रम झाला. एके दिवशी म्हातारीचा कचराच अंगावर पडला नाही आणि प्रेषित अस्वस्थ झाले. ते सरळ म्हातारीस पाहायला व तिच्या खुशालीची विचारपूस करायला तिच्या घरी पोचले. म्हातारी आजारी पडली होती. प्रेषितांनी मोठ्या आपुलकीने तिची विचारपूस केली म्हणाले, ‘‘माते! आज तू माझ्या अंगावर कचरा फेकला नाही. म्हणून मला वाटले की कदाचित तू आजारी असावी. म्हणूनच तुला पाहायला आलो.‘‘ तिची शुश्रूषा केली. हा प्रकार पाहून म्हातारी दंग झाली. तिच्या डोळ्यांतून ढळा-ढळा अश्रु वाहायला लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांची हीच सहानुभूती आणि त्यांच्या मनातील सर्वांविषयी असलेले अपार प्रेम जेव्हा राजकीय आणि सामाजिक नभांच्या क्षितीजावर उगवले, तेव्हा समस्त मानवसमाज या सोनेरी किरणांनी उजळून निघाला. प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि वैरभावाचे अंधकार नष्ट झाले. कोणी स्वीकारो अथवा न स्वीकरो! वस्तुस्थिती तर हीच आहे की, समाजाची अशा प्रकारे निःस्वार्थ भावाने सेवा केल्याशिवाय लोकांच्या मनमस्तिष्कावर आणि हृदयावर कोणासही अधिराज्य गाजविता येत नाही, हा सृष्टीचा नियमच आहे. त्यागाशिवाय प्रेम आणि सहानुभूती निरर्थक होय! हेच सत्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का शहरावरील विजयाप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी याप्रसंगी लोकांना आणि समस्त मानवजातीस आपल्या अंतिम प्रवचनात स्पष्टपणे संबोधून म्हटले,
‘‘आज अज्ञानतेने बरबटलेल्या या वांशिक अभिमान आणि अहंकाराचा ईश्वराने नाश केला आहे. समस्त मानवजात आदम (अ.) अर्थात जगातील प्रथम मानवाची संतती असून आदमची निर्मिती मातीपासून झालेली आहे.‘‘ (संदर्भ : सीरतुन नबी, भाग - १)
मुळात हाच संदेश समस्त विश्वातील मानवांना ऐक्याची जबरदस्त आधारशिला उपल्बध करून देतो. प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी प्रचंड जमलेल्या जवळपास सव्वालाख लोकांवर दृष्टी टाकली आणि मग कुरैश कबिल्यावर दृष्टी टाकली. या ठिकाणी ते अन्यायी व अत्याचारी लोकसुद्धा होते, ज्यांनी प्रेषितांनी सुरु केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, प्रेषित आणि त्यांच्या सहकार्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यांना रक्तबंबाळ करून सोडले होते, त्यांना परिवार, संपत्ती आणि मायभूमीचा त्याग करण्यास भाग पाडले होते, कित्येकांना शहीद केले होते, कटकारस्थान कले होते, प्रत्येक प्रकारचा छळ केला होता. समस्त विश्वाकरिता दया आणि कृपा असलेल्या या अत्यंत उदार मनाच्या प्रेषितांनी त्यांना संबोधित करून विचारले,
‘‘आज मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार करणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?‘‘
या निष्ठूर, कठोरहृदयी, अन्यायी व अत्याचारी स्वभावाच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा स्वभाव किती उदार आणि दयाळू आहे! ते किती थोर आहेत! त्यांनी साद घातली,
‘‘तुम्ही आमचे परम बंधु आहात!‘‘
विश्वबंधुत्वाचे आणि सत्य व न्यायाचे स्थापक प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सार्वजनिक अभयदानाची व क्षमादानाची घोषणा करीत म्हटले,
‘‘आज तुम्हा सर्वांना अभय देण्यात येत आहे! तुम्हा सर्वांना क्षमा करील आहे!‘‘
ही क्षमाशीलता, दया, प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण जगाच्या मानवेतिहासात कोठेच सापडू शकत नाही. आज म्हणजे मक्केच्या विजयाच्या प्रसंगी प्रेषितांकडे सर्वकाही होते. सत्ता होती, लष्करी सामर्थ्य होते. त्यांच्या फक्त एकाच इशार्यावर इस्लामविरोधी कृत्य करणार्यांच्या रक्तने मक्का शहराची भूमी लाल झाली असती. मक्का त्यागण्याच्या प्रसंगी विरोधकांनी हडपलेल्या संपत्ती आणि मालमत्ता परत घेता आली असती, मात्र प्रेषितांच्या या उदारपूर्ण स्वभावाचे कौतुक करण्याचा मोह इतिहासतज्ञ आवरू शकला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या इस्लामविरोधक विचारवंतांनासुद्धा हे सत्य नाकारण्याचे धारिष्ट्य, झाले नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली ही क्रांती खरोखरेच अहिंसापूर्ण क्रांती होय.
इतिहासात ही बाब आपल्याला सातत्याने दिसून येते की एखाद्या समूहाने दुसर्या समूहावर जर का विजय प्राप्त केला की समजा विजेत्या पक्षाकडून लूटमार, हिंसा, सूड, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, मानभंग यासारख्या असंख्य बाबी घडतात. पराजयाची नामुष्की पत्करलेल्या पक्षाच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येतात. सर्वत्र अन्याय व अत्याचाराची आग लागलेली असते. दुसर्या महायुद्धाचे उदाहरण आजही इतिहासात प्रत्यक्ष पाहायला मिळते. या महायुद्धात फक्त पावने दोन कोटी लोकांच्या रक्तने लाल क्रांतीची लाल पहाट उगवली. या रक्तरंजित क्रांतीने इतिहासाची पाने आजही रक्तळलेली आहेत. अर्थात क्रांती म्हणजेच रक्तपात असे जणू समीकरणच झाले. मात्र इस्लामी क्रांती ही अहिसात्मक क्रांती होय, एवढे मात्र निश्चित! या क्रांतीची पहाट उगवली आणि मानवतेस अभय मिळाले. म्हणूनच मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती घोषित केले.
एक सामाजिक विश्लेषण
प्रारंभीच आपण इस्लामपूर्वीच्या अरब समाजाचे ‘सी.राइट मील्स‘ यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर तीन प्रकारे विश्लेषण केले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती मानवजातीने अनुभवली, त्यानंतर अरब समाजाचे याच तीन प्रकारांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले तर ते अशा प्रकारे होईल.
  1. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली. मानवसमाज ऐक्य आणि न्यायाच्या भक्कम आधारावर उभा राहिला. समाजाच्या प्रत्येक भागात शोषण आणि विरोधपूर्ण संबंध नष्ट होऊन त्या ठिकाणी न्यायसंगत आणि शोषणरहित संबंध स्थापित झाले. वांशिक आणि वर्णावर आधारित तसेच गरिबी आणि श्रीमंतीच्या आधारावर असलेला भेदभाव नष्ट झाला. उच्च-नीच आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावरील विषमता कायमची नष्ट झाली.
  2. मानवी इतिहासात या नवीन समाजास अत्यंत उच्च स्थान प्राप्त झाले. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले. अर्थात मानवतेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
  3. या नवनिर्मित समाजात जे लोक सत्तेमध्ये आले ते मानवतावादी, विनयशील, दयाळू, मानवसमानतेचे ध्वजवाहक, शोषणविरोधी मानसिकता असलेले आणि मानवतेचे खर्या अर्थाने प्रेरक होते. असत्यापासून दूर आणि सत्याची जीवंत उदाहरणे आहेत.
आजही जगाला याच परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आजच्या शोचनीय परिस्थितीत विव्हळत असलेल्या, व्याकूळ आणि भेदभावाच्या आगीत होरपळत असलेल्या मानवतेस मुक्ती देण्याची गरज आहे. सर्वत्र फक्त न्याय, प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचे नंदनवन फुलविण्याची गरज आहे, शेवटी एवढेच!

माननीय सहल बिन असद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर एखादा मनुष्य आपल्या मुखाची आणि आपल्या लज्जास्थानाच्या रक्षणाची हमी देत असेल तर मी त्याच्यासाठी स्वर्गाची हमी देतो.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण : मनुष्याच्या शरीरात हे दोन धोकादायक व दुर्बल जागा आहेत जेथून शैतानाला हल्ला करण्यात खूपच सवलत मिळते. अधिकांश पाप याच दोन ठिकाणांहून घडतात. जर कोणी शैतानाच्या हल्ल्यापासून त्यांचा बचाव करील तर उघड आहे की त्या मनुष्याचे राहण्याचे ठिकाण स्वर्गच (जन्नतच) असेल.
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास एक गोष्ट मुखावाटे काढतो ची अल्लाहला खूश करणारी असते. दास त्याच्याकडे लक्ष देत नाही (म्हणजे त्याला महत्त्व देत नाही), परंतु अल्लाह त्या गोष्टीमुळे त्याच्यावर कृपा करतो. अशाप्रकारे मनुष्य अल्लाहला नाराज करणारी गोष्ट मुखाने निष्काळजीपणाने काढतो जी त्याला नरकात ढकलून देते.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे की मनुष्याने आपल्या जिव्हेला स्वच्छंद सोडू नये, जो काही उच्चार करील विचारपूर्वक करील. अशी वाणी मुखावाटे काढू नये जी नरकात घेऊन जाणारी असेल.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन काय होते?
    माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, हरकलने अबू सुफियानला विचारले ‘‘हा मनुष्य (मुहम्मद (स.)) तुम्हाला काय म्हणतो?’’ अबू सुफियानने उत्तर दिले, ‘‘हा मनुष्य आम्हाला म्हणतो की अल्लाहचे दासत्व पत्करा आणि शासन व सत्तेत कोणाला भागीदार ठरवू नका आणि तुमच्या वाडवडिलांचा जो धर्म होता आणि जे काही करीत होते ते सोडून द्या आणि हा मनुष्य आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा, सत्याचा अवलंब करा, पावित्र्याने जीवन व्यतीत करा आणि नातेवाईकांची काळजी घ्या.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : हा एका मोठ्या हदीसचा भाग आहे. ती हदीस हरकलच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे स्पष्टीकरण असे आहे की रोमन बादशाह हरकल बैतुल-मकदिसमध्ये होता तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे इस्लामच्या आवाहनाचे पत्र त्याला मिळाले. त्यावेळी तो एका माहीतगार व्यक्तीचा शोध घेत होता. योगायोगाने अबू सुफियान आणि त्याचे काही सहकारी त्याला भेटले. हरकलने त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न असा होता– ‘‘या पैगंबराच्या (नबी) आवाहनाच्या मूलभूत वचने सांगा.’’ अबू सुफियान म्हणाला, ‘‘तो एकेश्वराची शिकवण देतो आणि म्हणतो की फक्त एक ईश्वराला (अल्लाहला) माना. फक्त तोच आहे ज्याची सत्ता आकाशांवर व जमिनीवर आहे. वरच्या जगाचेही तोच नियोजन करतो आणि या जमिनीवरील नियोजनदेखील त्याच्याच हातात आहे. सत्ता व नियोजनात त्याने कोणाला भागीदार बनविलेले नाही आणि कोणीही जोरजबरदस्तीने व प्रभावाने त्याचा भागीदार बनू शकत नाही. असे असल्यामुळे फक्त त्याच्याच समोर नतमस्तक व्हा (सजदा करा). प्रत्येक प्रकारच्या संकटप्रसंगी त्याचीच मदत मागितली पाहिजे. वाडवडिलांनी अनेकेश्वरत्वाच्या आधारावर जीवन व्यतीत करण्याची जी व्यवस्था बनविली आहे, तिला तिलांजली द्या. अशाप्रकारे तो आम्हाला म्हणतो की नमाज अदा करा आणि सत्याचा अवलंब करा, बोलण्यात आणि करण्यातदेखील. तसेच प्रतिष्ठा व पवित्रतेला हातातून जाऊ देऊ नका. मानवतेविरूद्ध असलेले कर्म करू नका. बांधवाबरोबर चांगला व्यवहार करा. सर्वजण एकाच आईवडिलांची संतती आहे आणि सर्व एकमेकांचे सख्खे बांधव आहेत.’’
    माननीय अमर बिन अबसा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे मक्केत त्यांच्या पैगंबरीच्या सुरूवातीच्या काळात गेलो. मी विचारले, ‘‘आपण काय आहात?’’ आदरणीय मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी नबी (पैगंबर) आहे.’’ मी विचारले, ‘‘नबी काय असतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने आपला ‘रसूल’ (संदेशवाहक) बनवून पाठविले आहे.’’ मी विचारले, ‘‘संदेश देऊन त्याने आपणास पाठविले आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी लोकांना चांगुलपणाची शिकवण द्यावी आणि मूर्तींची पूजा करणे बंद करावे आणि अल्लाहच्या एकमेवत्वाचा स्वीकार करावा आणि त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनवू नये.’’ (हदीस : मुस्लिम, रियाजुस्सालिहीन)
स्पष्टीकरण : ही हदीसदेखील नबी (पैगंबर) च्या आवाहनाच्या मूलभूत गोष्टी सांगते. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या आवाहनाला अल्पश: शब्दांत एकवटून सांगितले आहे, ‘‘माझे आवाहन हे आहे की अल्लाह आणि दासाच्या खNया संबंधाला योग्य आधारांवर निश्चित करणे, दास व अल्लाहच्या संबंधाची खरा पाया एकेश्वरत्व आहे. म्हणजे अल्लाहच्या सत्तेत कोणालाही सहभागी केले जाऊ नये आणि फक्त त्याचीच उपासना केली जावी, फक्त त्याचीच आराधना केली जावी आणि मानवांदरम्यान योग्य संबंधाचा पाया समान आणि एकमेकांच्या सहानुभूतीचा आहे. म्हणजे सर्व मानव एकाच आईवडिलांची संतती आहे आणि खरे तर आपसांत हे सर्व बांधव आहेत. म्हणून त्यांचे एकमेकांवर प्रेम असायला हवे. त्यांच्या सुख-दु:खात हातभार लावला पाहिजे. असहाय व लाचार बांधवांची मदत केली पाहिजे. कोणावर अत्याचार होत असेल तर सर्वांनी अत्याचाNयाविरूद्ध उभे ठाकले पाहिजे. कोणी अचानक एखाद्या संकटात सापडला असेल तर प्रत्येकाच्या मनाला धक्का पोहोचला पाहिजे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी धावून गेले पाहिजे.

प्रा. हाजी फातिमा मुजावर 
पनवेल, 8691837086
जगाची निर्मिती झाल्यापासून हजारो प्रेषित आणि सुधारक येवून गेले. सर्वांनीच समाज सुधारणेचे कार्य केले. पण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याद्वारे जी क्रांती अल्पकाळात घडली त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी प्रस्तुत केलेला ‘इस्लाम’ हा धर्म जीवनाचे सर्वांग सुंदर मार्गदर्शन करणारी समता, बंधुता आणि एकता प्रदान करणारी समाज व्यवस्था देतो. तसेच अल्लाहाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी या धर्तीवर ईश ग्रंथाचे नियोजन केले. पवित्र कुरआन हा ईश ग्रंथाच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. हा पवित्र ग्रंथ कुरआन मुहम्मद (स.अ.) यांच्यावर अवतरीत झाला. जो मानव जातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो. या पवित्र कुरआनचे मार्गदर्शनच ‘इस्लाम’ची शक्ती आहे, जी मनुष्याला विचार आणि आचाराच्या उच्चतम शिखरावर विराजमान करते. शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखविते. कुरआनच्या शिकवणीने विचार, मन आणि बुध्दी यांना चालना मिळते, वैचारिक शक्ती प्राप्त होते, असत्याविरूध्द आणि रूढीवादाविरूध्द प्रत्यक्ष आवाज उठवते आणि प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी सादर केलेल्या इस्लामच्या शिकवणुकीचा माणूस स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मुल्यांना उराशी कवटाळतो. प्रेषित मुहम्मद (स.अ.) इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. एक विख्यात गणिततज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच. हार्टने जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या 100 (शंभर) व्यक्तीमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’  च्या नावाने प्रसिध्द केले आहे.  त्यात पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांना देण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला जातो. ‘इस्लाम’ म्हणजे शांति, नम्रता आणि अल्लाहच्या इच्छेपुढे शरणागती. अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी या जगात पाठविलेला हा धर्म आहे. इस्लामचा अर्थ लक्षात घेतला तर या धर्माने विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश या जगाला दिला आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि ‘हजयात्रा’ ही इस्लाम धर्माचे आधारस्तंभ आहेत. 
इस्लामचे पहिले मुलभूत तत्व - “कलमा-ए- तयब्बा” चा अर्थ आहे अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही व मुहम्मद (स.अ.) अल्लाहचे प्रेषित आहेत.
इस्लामचे दुसरे मूलभूत तत्व - ‘रिसालत’ म्हणजे प्रेषितत्व हे आहे. अल्लाह एकमेव एक आहे व ईशभक्तीच्या श्रध्देला एक संकृती, एक सभ्यता आणि एक जीवनपध्दतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यवहारीक मार्गदर्शन करीत असते. त्यांच्याचद्वारे आम्हांला कायदा प्राप्त होतो. या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून (तौहीद) एकेश्वर वादानंतर रिसालतवर ईमान आणते. इस्लामची समाजरचना या तत्वावर आधारलेली आहे. मूर्ती पुजा इस्लाममध्ये निषिध्द मानली जाते. इस्लाम सामाजिक वृत्तीच्या विकासाला जास्त महत्व देतो हे नमाज, रोजा, जकात, हज यासारख्या मूलभुत धार्मिक कार्याने समजते. इस्लाम माणसाची ईश्वर विषयक जी कर्तव्य आहेत त्यापेक्षा त्याची आपल्या बांधवांसंबंधी जी कर्तव्य आहेत त्याला अग्रक्रम देतो व जगात शांति प्रस्थापित करतो. 
नमाज :- उदाहरणार्थ अजान झाली तर सर्व नमाजसाठी मशिदीत जातात. नमाज आदा करतांना मशिदीत गरीब, श्रीमंत, काळे-गोरे एकत्र जमा होतात, राव असो वा रंक असो, खांद्याला खांदा लावून, गुडघे टेकवून परमेश्वराची आराधना (इबादत) करतात. दुसऱ्याला कमी लेखण्याची, तुच्छ समजण्याची प्रवृत्ती इस्लाम धर्मात आढळत नाही. अहंकाराला मुळापासून नष्ट केले जाते. इस्लाम हा पहिला धर्म आहे कि ज्या धर्माने लोकशाही म्हणजे काय हे शिकविले. इस्लामची लोकशाही पाचवेळा दृष्य स्वरूप धारण करते. 
आम्ही सर्व भारतीय. भारतात हिंदू-मंदिरात परमेश्वर आळवतो, मुसलमान - मशीदीमध्ये संभाषण करतो, ख्रिस्त - चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख - गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो. पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून किंवा चर्चमधुन जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिस्त नाही, शीख नाही तो फक्त भारतीय आहे, माणुस आहे हे इस्लाम शिकवतो.  धर्म हा व्यक्ती आणि अल्लाहास जोडण्याचा प्रयत्न करतो हे प्रेषित मुहम्मद (स.अ.) ची शिकवण कुणीही विसरता कामा नये जी जगात शांती निर्माण करते. 
प्रेषित मुहम्मद (स.अ.) जगातले पहिले व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारीक संदेश दिला. केवळ 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन केला. जैद नावाच्या काळया  गुलामाला आपली आत्या बहिण देवून काळया गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या  घस्फोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देवून कोणताच माणूस अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत. सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी एक सिध्दांत आहे. समता, बंधुत्व निरंतर नांदावयास हवे. जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद समाजात कदापी शिरणार नाही अशी इस्लामची तत्वे आहेत जी माणसाच्या वैचारिक प्रगतीची द्योतक आहेत. 
इस्लामचे आगमन भारतात भक्तीमार्गाने इ.स. (629) मध्ये पैगंबराच्या हयातीत झाले. केरळमधील चेरामन पेरूमल मस्जिद भारतामधील पहिली मस्जिद. केरळातील चेरानंद साम्राज्याचा शेवटचा राजाला इस्लामची ओळख झाली आणि त्यांनी मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषित मुहम्मद (स.अ.) याच्या सान्निध्यात राहून त्यांना इस्लाम धर्म स्विकारला आणि स्वत:चे नांव ताजुद्दीन (रजि.) असे ठेवले. जेद्दातील राजाच्या बहीणीशी त्यांनी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाले. जीवनातील अंतिम काळात त्यांनी केरळमधील आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून इस्लाम धर्माचा प्रसार केला. 
इस्लाममधील एक महत्वपूर्ण असलेला स्तंभ जकात आहे. जकात इस्लाम धर्मात गोरगरिबांसाठी आहेत. प्रत्येकी मुस्लीम जो जकात देण्यास पात्र आहे त्यांने आपल्या कमाईच्या प्रतिशेकडा अडीच रूपये प्रमाणे जकात गोरगरिब, अनाथ विधवा अथवा गरजवंतांना द्यावी. गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदतीसाठी प्रेषितांनी जकातची योजना इस्लाममध्ये केली. ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता जकात आहे. दिव्य कुराणच्या सुरह-9:60 मध्ये नमूद केले गेले आहे, जगातील सर्व लोकांनी जर या तत्वावर अनुकरण केले तर भूकबळी, कुपोषण अशा खूपच समस्या दूर होतील. 
इस्लाममध्ये सावकारी निषिध्द आहे. कर्ज दिलेल्या पैशांवर व्याज घेणे निषिध्द (हराम) आहे. अल्लाहने (व्यापाराला वैध केला आहे आणि व्याजाला निषिध्द केले आहे) दिव्य कुरआन (सुरह 2: 275)
व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ 10 वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. गरीब व गरजवंताना पैसे उधार मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येवू दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहतां आर्थिकदृष्टया इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रयाचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेवून फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजविली. या 1000 वर्षांत एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात. आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे.  व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे. 
भारतात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुख्य कारण गरिबी नसून चक्रवाढ व्याजाचा बोजा आहे. कारण शेतकरी पूर्वीही गरीब होते परंतु गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केली नाही. इस्लामचे हे धोरण स्विकारल्यास आज भारताच्या प्रगतीस पोषक ठरणार आहे. मानवी इतिहासात या नवीन समाजास उच्च स्थान प्राप्त होणार आहे. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्व प्राप्त होते. अर्थात मानवतेच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग याने मोकळा होतो. 
रोजा :- प्रेमाने व सहानुभूतीने वागा, कठोर होवू नका, दयाळू राहा. तुम्ही सदाचरणी बनावे, तुमच्यातील वाईटपणा तुमच्यापासून दूर व्हावा म्हणुन उपवास (रोजे) तुमच्यावर अनिवार्य केले आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, व्याभिचार करू नये, रक्तपात करू नये, एका व्यक्तीचे प्राण वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीचे प्राण वाचविणे आणि एका व्यक्तीची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, तसेच दिला शब्द पाळा, पाप टाळा, विश्वासघात करू नका ही इस्लामची शिकवण व तत्वप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. दारूमुळे मनुष्याचे जीवन यातनामय बनते. उपवास दारूबंदीस जालीम उपाय आहे. एके दिवशी सर्वांना ईश्वराच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे हे विसरू नका. वृध्दापकाळात आपल्या मातापित्याकडे लक्ष देण्यासंबंधी विसरू नका. तहानलेल्यांना पाणी देणे, आंधळयांना मदत करणे, रोजा ठेवा, ज्ञानार्जन करा, त्यामुळे काय निषिध्द आहे आणि काय नाही हे लक्षात येईल. 
हज :- जर ऐपत असेल तर मक्केची हज यात्रा करा. येथे जगातील लोक एकत्र येतात. जगभरातील मुस्लिम संस्कृतीची तोंडओळख होते. 
-: मुस्लिमांचे स्त्रियांसाठी योगदान :-
ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देवून टाकले. प्रसिध्द मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम.एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ 13 वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील 1400 वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. 
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापिका अ‍ॅनीमेरी स्किमेल म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असतां असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली. इस्लामच्या शिकवणीत अत्यंत संतुलन आहे तो प्रगतीचा एक मार्ग आहे. 
: इस्लाम मुक्तीचा मार्ग :
मानवी  समाजाला सर्वार्थाने सुखी होण्यासाठी दोन प्रकारच्या मुक्ती आवश्यक असते. एक म्हणजे आध्यात्मिक मुक्ती आणि दुसरी भौतिक मुक्ती. इस्लामच्या अभ्यासाने, शिकवणीने, आचरणाने आध्यात्मिक मुक्ती म्हणजे स्वचित्ताची शुध्दी करणे व विकार मुक्त होणे सहज शक्य आहे. नमाज, रोजा याचे उत्तम उपाय आहेत. भौतिक जगाचे प्रश्‍न व त्यातून उद्भवणारे राग, लोभ हे विकार यापासून तो दूर राहू शकतो. इस्लाम कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भांडण, युध्दापासून दूर राहण्याची शिकवण देतो. अध्यात्माचा खरा अर्थ राग, लोभादी विकारापासून मुक्ती मिळविणे हा आहे. भौतिक मुक्ती मिळवून देण्यासाठी इस्लामने महत्वाची भुमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार, प्रचार इस्लाम नेहमीच करत असतो. प्रचलित काळ भौतिक मुक्तीचा असल्याने दिशा ओळखून सर्व जाती-धर्मीय देशप्रेमींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भौतिक मुक्ती मिळावयास वेळ लागणार नाही.  (लेखिका : अध्यक्षा 11 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल)


लेखक

सय्यद हामिद अली, 

गुलाम रसूल देशमुख

अनुवाद

सय्यद ज़ाकिर अली

या पुस्तिकेत विवाहप्रसंगी जे प्रवचन अरबीमध्ये दिले जाते त्याचा खुलासा आला आहे आणि दुसऱ्या प्रकरणात विवाहप्रसंगीच्या सोपस्कारांचे विवेचन आले आहे.

अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी समस्त अनुयायींना विवाहप्रसंगी जे प्रवचन देण्याची शिकवण दिली आहे ती दोन भागांत आहे. पहिल्या भागात पैगंबरांचे कथन (हदीस) व दुसऱ्या भागात कुरआनच्या चार आयतींचे पठण करण्यात आले आहे. त्यांचा मराठी अनुवाद येथे देण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने भाग दोनमध्ये याचा सविस्तर खुलासा देण्यात आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 214         -पृष्ठे - 24      मूल्य - 16  आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/mdzbzv6xoc654ugbir99mexk04gkr36c




राष्ट्र म्हणून प्रत्येक मुस्लिमाचे जीवन हे इस्लामची साक्ष देण्यासाठी आहे. म्हणून या प्रकारचे जिहादचे महत्त्व अत्याधिक आहे. साक्ष देण्याच्या पुराव्यापेक्षा या जिहादचे महत्त्व अधिक आहे. जोपर्यंत इस्लामला दुसऱ्यापर्यंत योग्यरित्या पोहचविला जात नाही तोपर्यंत इस्लामची साक्ष देण्याचे कार्य पूर्णत्वाला पोहचत नाही. म्हणून साक्षीच्या सर्व आवश्यकतेनुसार इस्लाम दुसऱ्यापर्यंत पोहचला पाहिजे. इस्लामबद्दलचे गैरसमज आणि अप्रचारांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत. इस्लामची साक्ष देणे हे काही गुपित कावा अथवा गुप्त कार्य अजिबात नाही. इस्लाम जरी एक आहे तरी त्याचे विरोधक अनेक आहेत. इस्लामच्या तोंडओळखीसाठी एखादे व्याख्यान अथवा संभाषण पुरेसे आहे. परंतु इस्लामची साक्ष देणे हे यापेक्षा वेगळे आहे. त्याचे महत्त्व इस्लामची औपचारिकरित्या तोंडओळख करून देण्यापेक्षा अधिक पटीने जास्त आहे. ज्यांच्यासमोर इस्लामची साक्ष देण्यात येते ते लोक परधर्मिय असतात. त्यांची श्रध्दा वेगळ्या तत्त्वांवर, धर्मांवर, परंपरांवर आणि वेगळ्या राजकीय पध्दतीवर असते आणि मुस्लिमांना त्यांच्यासमोर इस्लामची साक्ष द्यावी लागते. इस्लामची साक्ष निरनिराळ्या आघाड्यांवर देणे जिकीरीचे आणि त्रासदायक कार्य आहे. या युध्दात कोणकोणत्या प्रकारची शस्त्र, अस्त्र वापरावयाची! किती कठीण आहे ही मोहीम सर करणे! शारीरिक अथवा सशस्त्र जिहाद एका विशिष्ट स्थितीत लढले जाते. परंतु या प्रकारच्या जिहादमध्ये विशिष्ट प्रकारचे वातावरण, वेळ-काळ अथवा परिस्थिती मुळीच नसते. हा अविरत चालणारा संघर्ष आहे. हे असे कर्तव्य आहे जे सदासर्वकाळ आणि कोठेही व कधीही पार पाडावे लागते. हे अंतहीन कार्य आहे. या कार्याला शेवट कधीच नसतो. जोपर्यंत सशस्त्र जिहाद करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत हा जिहाद सतत चालू राहतो.
इतिहास साक्ष आहे की अनेक प्रेषितांचे आयुष्य या प्रकारच्या जिहाद करण्यातच पार पडले परंतु सशस्त्र जिहाद करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. या प्रकारचा जिहाद हा खरा जिहाद आहे. यात बाहेरच्या जगाशी अविरत वैचारिक, बौध्दिक संघर्ष चालूच राहतो. सशस्त्र जिहाद हा विशिष्ट निकडींचा परिणाम आहे. इस्लामचे निमंत्रण देणे आणि इस्लामची साक्ष देणे यांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये अल्लाहच्या श्रेष्ठत्वाची आणि सार्वभौमत्वाबद्दलची जागृती निर्माण करणे आहे. तसेच लोकात श्रध्देला प्रज्वलित करणे आहे. श्रध्देला दुसऱ्यामध्ये प्रज्वल्लित करण्यासाठी आपापसातील सुसंवाद, बुध्दीविवेकाची गरज आहे तलवारीची नव्हे! इस्लामच्या निमंत्रण मार्गातील अडथळे दूर करण्यासाठीच तलवार उगारली जाते.
या प्रकारचा जिहाद अल्लाहला अतिप्रिय आहे. अल्लाहने यास ‘‘माझी मदत’’ म्हणून संबोधले आहे आणि जे त्या जिहादमध्ये सामील आहेत त्यांना ‘‘माझी मदत करणारे’’ म्हणून संबोधले आहे. कुरआन दिव्योक्ती आहे,
‘‘हे लोक हो ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, ‘‘अल्लाहचे सहाय्यक’’ बना ज्या प्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, ‘‘कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?’’ आणि हवारींनी उत्तर दिले होते, ‘‘आम्ही आहोत अल्लाहचे सहाय्यक.’’ त्या वेळी बनी इस्त्राईलच्या एका गटाने श्रध्दा ठेवली आणि दुसऱ्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रध्दावंतांचे त्यांच्या शत्रुविरुध्द समर्थन केले आणि तेच विजयी ठरले.’’ (कुरआन ६१: १४)
हे सर्वश्रुत आहे की येशुचे आमंत्रण कार्य शारीरिक अथवा सशस्त्र जिहाद करण्याच्या स्थितीत कधीच पोहचले नाही. त्यामुळे ते आमंत्रण फक्त प्रचार आणि बुध्दीविवेकास आवाहन करण्यापर्यंत सीमित होते. तरीपण त्यांच्या त्या अविरत संघर्षामुळे येशूचे अनुयायींना (हवारी) अल्लाहचे सहाय्यक म्हणून संबोधले गेले आहे. याचाच अर्थ हा होतो की ही अत्यंत नामांकित उपाधी त्यांना याच कारणाने बहाल केली गेली की त्यांनी अल्लाहच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यास अविरत प्रयत्न केला. त्यांनी या कार्यास पूर्ण न्याय दिला. ‘अल्लाहचे सहाय्यक’ ही अत्यंत नामांकित उपाधी त्यांना त्याच वेळी बहाल करण्यात आली जेव्हा त्यांनी आपल्या पूर्ण शक्तीनिशी, संधी आणि बुध्दीनिशी दुसऱ्यापर्यंत अल्लाहचा धर्म विपरित स्थितीत मोठ्या धैर्याने आणि संयमाने पोहच केला आणि संकटांच्या वावटळांना न घाबरता अथवा शांत न बसता अविरत प्रयत्नशील राहिले. हा काही मानवी बुध्दीचा अनुमान अथवा कल्पना नाही तर ही उपाधी अल्लाहच्या दिव्य प्रकटनाद्वारे कुरआनने बहाल केलेली आहे. कुरआनचा अध्याय ‘आले ईमरान’मध्ये यावर आणखी खुलासा आलेला आहे. प्रेषित येशू (अ.) यांनी तेव्हाच हे शब्द उच्चारले आहेत जेव्हा त्यांच्या श्रोतेगणांना बनीइस्त्राईलच्या लोकांनी शेवटी नाकारले आणि येशूविरुध्दच्या यांच्या कारवाया शिगेला पोहचल्या. कुरआनोक्ती आहे,
‘‘जेव्हा ईसा (अ.) ला जाणवले की बनी इस्त्राईल नाकारण्यामध्ये तत्पर आहेत तेव्हा त्याने सांगितले, कोण अल्लाहच्या मार्गात माझा सहायक बनेल? हवारीनी उत्तर दिले, आम्ही अल्लाहचे सहाय्यक आहोत, आम्ही अल्लाहवर श्रध्दा ठेवली, साक्षी राहा की आम्ही मुस्लिम (अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक होणारे) आहोत. स्वामी! जे फर्मान तू अवतरले आहेस, आम्ही त्याला मानतो आणि प्रेषिताचे अनुसरण स्वीकारतो. आमची नावे ग्वाही (साक्षी) देणाऱ्यांत समाविष्ट कर.’’ (कुरआन ३: ५३-५४)
वरील दिव्य प्रकटनावरून हेच सिध्द होते की ‘‘अल्लाहचे सहाय्यक’’ बनण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जातो जेव्हा इस्लामचे निमंत्रण आणि साक्ष देण्याचे कार्य हे प्रचार प्रसार आणि बुध्दी विवेकांपर्यंत सीमित न राहता अशा स्थितीत पोहचते की संकटांवर संकटे कोसळणे सुरू होते. श्रध्दावंत तेव्हा तोंड बंद करून बसलेले नसतात परंतु संयमाने आणि धैर्याने अल्लाहचा संदेश (इस्लाम) लोकांपर्यंत पोहचवितात. तेव्हाच त्यांना ‘अल्लाहचे सहाय्यक’ म्हटले जाते. कारण अल्लाहच्या मार्गात अविरत संघर्ष हाच खरा जिहाद आहे. आणि यालाच ‘‘अल्लाहच्या धर्माला मदत’’ असे संबोधले आहे.
सशस्त्र जिहाद: कुरआन आणि हदीसमध्ये याबद्दलच्या जिहादचे फायदे आणि वैशिष्ट्यांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. त्यांचे आकलन केल्यानंतर कळते की उपासनेनंतर जिहाद अल्लाहला प्रिय आहे. जो विरोधकांच्या गराड्यात लोकांना सत्याकडे आमंत्रित करतो. अशा श्रध्दावंताना अल्लाहने ‘‘त्याचे सहायक’’ म्हटले आहे. जो या कार्यात आपल्या संपत्तीचा शेवटचा पैसासुध्दा खर्च करतो त्या व्यक्तीला अल्लाहने ‘‘त्याचे सहाय्यक’’ म्हणून न संबोधता ‘त्याचे प्रियजन’ म्हणून संबोधले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘अल्लाहला तर प्रिय लोक ते आहेत जे त्याच्या मार्गात अशा प्रकारे फळी बांधून लढतात जणू काय ते शिसे पाजलेली भींत असावेत.’’ (कुरआन ६१: ४)
या प्रेमाबद्दलचा खुलासा हदीसमध्ये आलेला आहे, ‘‘सीमेचे रक्षण रात्रंदिवस करणारे महिनाभर उपवास व नमाज अदा करणाऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत.’’
‘‘स्वतःचे कर्तव्य आपल्या मृत्युपश्चात संपुष्टात येते परंतु त्या व्यक्तीचे उदाहरण वेगळे आहे जो युध्दात भाग घेताना मृत्यू पावतो. तो अल्लाहसाठी युध्द करत होता. त्याचे हे कर्तव्य कयामतपर्यंत वृधिंगत होणार.’’ (तिरमीजी)
‘‘ते जे जिहादमध्ये भाग घेतात आणि ते जे सतत उपवास ठेवतात, नमाज अदा करतात आणि कुरआन पठण करतात दोघांचे कृत्य सारखेच आहे जोपर्यंत धर्मयोध्दा युध्दातून परत येत नाही.’’ (मुस्लिम, बुखारी)
अल्लाहच्या मार्गात जिहाद करणारेच फक्त त्याच्या प्रसन्नतेचे, कृपेचे पात्र ठरतात, असे नाही तर अशा व्यक्तींनासुध्दा चांगले स्थान प्राप्त होते जे अप्रत्यक्षरित्या जिहादला मदत करतात. प्रेषितकथन आहे,
‘‘जो कोणी मुजाहिदला (धर्मयोध्दा) सहाय्य करील जणूकाही तो स्वतः जिहादमध्ये भाग घेत आहे आणि जो कोणी मुजाहिदच्या कुटुंबाकडे लक्ष देईल तर तोसुध्दा जणूकाही जिहादमध्ये प्रत्यक्ष भागच घेत आहे.’’ (मुस्लिम, बुखारी)
‘‘एका धनुष्यबाणामुळे अल्लाहने तीन लोकांचा स्वर्ग प्रवेश निश्चित केला. एक तो जो धनुष्यबाण अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी बनवतो, दुसरा तो जो प्रत्यक्ष युध्दात त्याचा वापर करतो आणि तिसरी व्यक्ती धनुष्यबाण योध्याला पुरविणारी आहे.’’ (अबु दाऊद)
जर कोणी धनुष्यबाण (युध्दसामग्री) बनवून जिहादसाठी पुरवठा करत आहे अशा व्यक्तीस अल्लाह उत्तम मोबदला देतो तर ती व्यक्ती जो प्रत्यक्ष युध्दात आपले घरदार सोडून भाग घेतो आणि अल्लाहसाठी आपले रक्त सांडतो आणि शेवटी अल्लाहसाठी मरण पत्करतो त्याच्यासाठी किती महान मोबदला असेल? कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले त्यांना मृत समजू नका, ते तर खरे पाहता जिवंत आहेत, आपल्या पालनकर्त्यापाशी उपजीविका प्राप्त करीत आहेत, जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यावर ते फार खूष आहेत आणि समाधानी आहेत.’’ (कुरआन ३: १६९-१७१)
येथे हे स्पष्ट केले पाहिजे की कुरआनने त्या मनमोहक वाक्यरचना आणि उपाधी उल्लेख त्यांच्यासाठी केला आहे जे अल्लाहच्या मार्गात हुतात्मे बनले आहेत. कुरआनची ही खास शैली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘जे स्वर्गात दाखल होतील नंतर ते पृथ्वीवर परत येण्याचे विचारसुध्दा मनात आणणार नाहीत जरी त्याला पृथ्वीवरील सर्वकाही त्याचे मालकीचे करून दिले तरी! परंतु हुतात्मा (शहीद) ची ही स्थिती नसणार. जेव्हा त्यांच्यावर अल्लाहची कृपादृष्टी होईल आणि त्याला बहुमानित केले जाईल तेव्हा त्याला वाटेल की दहा वेळा पृथ्वीवर परत जावे आणि दहावेळा अल्लाहच्या मार्गात शहीद व्हावे.’’ (मुस्लिम, बुखारी)
परलोकात हुतात्मा (शहीद) विशेष प्राविण्य आणि बहुमान प्राप्त करील. जो मृत्युपावतो त्याला आंघोळ घातली जाते व शुभ्रवस्त्र परिधान केले जाते. परंतु हुतात्म्याला (शहीद) आंघोळ घातली जात नाही की पांढरे शुभ्रवस्त्र गुंडाळले जात नाही. त्यांना त्याच रक्ताने माखलेल्या कपड्यात दफन केले जाते. माननीय अब्बास (रजि.) यांनी माहिती दिली आहे,
‘‘प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की हुतात्म्याजवळून शस्त्र काढून घ्यावे. आणि त्यास जसे आहे त्या स्थितीत दफन करावे रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी आणि रक्तबंबाळ शरीरासह.’’ (अबुदाऊद)
अशीच दुसरी हदीससुध्दा आहे. शहीदचे रक्त हे काही साधे रक्त नसते. याशिवाय इतर काहीही इतके पवित्र असूच शकत नाही. हे ते रक्त आहे की पावित्र्य आणि स्वच्छतेपेक्षा ते अधिक चांगले आहे. अल्लाहने त्यास मश्क अत्तराहून अधिक सुगंधित म्हटले आहे,
‘‘त्याचा रंग केसरसारखा आणि सुगंध ‘मश्क’ सारखा आहे.’’ (तिरमिजी)
कुरआन आणि हदीसनुसार हुतात्मा लोकांचा दर्जा परलोकात उच्च असतो. शारीरिक आणि सशस्त्र जिहाद हा उत्तम जिहाद आहे. ते एक श्रेष्ठतम धर्मनिष्ठेचे कृत्य आहे आणि अल्लाहच्या उपासनेचे उत्तम प्रकार आहे. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की जिहादचा उत्तम प्रकार कोणता आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले,
‘‘उत्तम जिहाद ते आहे जे अश्रध्दावंतांशी तन, मन, धनासह संघर्ष केला जातो.’’ (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की उत्तम व्यक्ती कोण आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले,
‘‘श्रध्दावंतांपैकी उत्तम तो आहे जो अल्लाहच्या मार्गात तन, मन, धनाने संघर्ष करतो.’’ (बुखारी)
जो आपल्या तन, मन, धनाने अल्लाहच्या मार्गात संघर्ष करतो तो उत्तम श्रध्दावंत आहे. हे एक पवित्र आणि उत्तम कृत्य आहे आणि त्याचा मोबदला पुरेपूर दिला जातो. खालील हदीस स्पष्ट करीत आहे,
‘‘नरकाग्नी दोन प्रकारच्या डोळ्यांना स्पर्श करणार नाही. जो डोळा अल्लाहच्या कोपच्या भयाने अश्रु ढाळत राहते आणि दुसरे ते जे अल्लाहच्या मार्गात रात्रभर पहारा करतो.’’ (तिरमिजी)
‘‘जिहाद करताना जो धुराडा उडतो तो आणि नरकाचा धुर एकमेकात कधीच एकत्रित होणार नाहीत.’’ (तिरमिजी)
हुनैनच्या युध्दात अनस बिन अबी (रजि.) यांनी रात्रभर खिडीकडे टकलावून पहारा केला. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या समोर हजर झाले. तेव्हा प्रेषितांनी सांगितले,
‘‘तुम्ही स्वर्गाला तुमच्यासाठी आवश्यक बनवले. याच्यानंतर तुम्ही काहीसुध्दा सदाचार केला नाही तरी.’’ (अबु दाऊद)
बदरच्या युध्दात ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) उमर (रजि.) यांचेजवळ म्हणाले, ‘‘तुम्हाला याची कल्पना नाही की अल्लाहने बदरच्या योद्ध्यांकडे पाहिले आणि म्हणाला जा आणि तुम्हाला जे आवडेल ते करा. मी तुम्हाला प्रसन्न झालो.’’ (बुखारी)
शारीरिक आणि सशस्त्र जिहाद अल्लाहजवळ अत्युच्च दर्जाचे कृत्य आहे. जर अल्लाहची भक्ती करणे हेच मुस्लिमांचे जीवनाचे ध्येय असेल आणि मुस्लिम राष्ट्राची उभारणी फक्त एकमेव उद्देशासाठी झाली आहे की त्याने संपूर्ण जगापुढे सत्याची साक्ष द्यावी. अशा स्थितीत या दास्यत्वापेक्षा चांगले दास्यत्व कोणते आणि या साक्षीपेक्षा जास्त चांगली साक्ष कोणती की ज्यात मुस्लिम आपला जीव पणाला लावतो? म्हणून हे अगदी उघड सत्य आहे की हेच श्रेष्ठतम दास्यत्व आणि अति मूल्यवान साक्ष आहे. दुसऱ्या शब्दांत जिहाद हे अगदी योग्य साधन आहे मुस्लिमांपुढील ध्येयप्राप्तीचे! जेव्हा मुस्लिम आपले आयुष्य ध्येयासाठी वेचतो तेव्हा त्याची अल्लाहसाठीची अत्युच्चतम आज्ञाधारकता आणि सत्याची साक्षी देण्याचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले जाते. स्वतःचे आयुष्य वेचून जीव पणाला लावणे हे शेवटचे कृत्य ध्येय प्राप्तीसाठीचे आहे. अशीच व्यक्तीही सत्याचा ध्वज वाहक आणि अत्यंत आज्ञाधारक सेवक ठरतो. याच कारणामुळे प्रत्येक मुस्लिम जो सत्याची साक्ष त्याच्या आचरणाने आणि व्याख्यानाने (कथनी आणि करनी) देतो तो धर्माचा साक्षी (शाहीद) असतो. परंतु उपाधी आणि उत्कृष्ट नावे यांचा मात्र फक्त त्याच लोकांशी संबंध आहे जे आपले जीव अल्लाहच्या धर्मासाठी पणाला लावतात. कारण ते आपली अंतिम गोष्ट (प्राण) सुध्दा इस्लामच्या साक्षीसाठी त्याग करतात. याच कारणामुळे धर्माची साक्ष देणारे ‘‘शाहीद’’ ही उपाधी अशा हुतात्म्यांनाच (शहीद) शोभून दिसते.
येथे हेसुध्दा स्पष्ट केले पाहिजे की धनसंपत्तीचा आणि जीवनाचा त्याग अल्लाहच्या मार्गात करणे हे व्यक्तीच्या श्रध्देचा अत्युच्च बिदू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी मृत्युला कवटाळतो तेव्हा श्रध्देचा कोणताही उच्चबिदू सर करण्याचा शिल्लक राहत नाही. यानंतर फक्त एकच बिदू (जागा) शिल्लक राहते ते म्हणजे प्रेषितांचे स्थान! उत्बा इब्ने अबुस सलमी (रजि.) यांच्यानुसार ‘‘प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जिहादमध्ये श्रध्दावंत हौतात्म्य पत्करतात त्यांचे तीन प्रकार आहेत. प्रथम जो आपल्या धनसंपत्ती आणि प्राणानिशी जिहादमध्ये शत्रुशी लढत राहतो आणि अंततः हौतात्म्य पत्करतो. अशा हुतात्म्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘हा खरा आणि शाश्वत हुताम्या (शहीद) आहे. हा शहीद अल्लाहच्या राजसिहासनाखालील छतामध्ये वास्तव्य करील. प्रेषित याच्यापेक्षा वेगळे फक्त त्यांच्या प्रेषित्वामुळेच असतील.’’ (दारीमी)
शारीरिक जिहादच्या धार्मिक महत्त्वाचा एक पैलू अद्याप अस्पष्ट आहे. कुरआनमध्ये शारीरिक जिहादबद्दल जो उल्लेख आला आहे त्यावरून हे कळते की या प्रकारच्या जिहादचे धार्मिक आणि राष्ट्रीय महत्त्व प्रत्येक वेळी एकसारखे नसते. एक वेळ हे फक्त शौर्याचे आणि श्रेष्ठ कार्य आहे तर दुसऱ्यावेळी हे कृत्य धार्मिक आणि श्रध्देची निशाणी ठरते. जर जिहादची घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्या वेळी आणि काही लोक त्यासाठी पुरेसे असतात. अशी ही मिलेटरी सेवा अशा वेळेस श्रेष्ठ कार्य ठरते. जर कोणी इतर भाग घेत नसेल तर त्याला दोषी ठरविले जात नाही. कुरआनोक्ती आहे,
‘‘मुसलमानांपैकी ते लोक की जे एखाद्या निमित्ताविना घरी बसून राहतात व जे अल्लाहच्या मार्गात प्राण व संपत्तीनिशी जिहाद करतात, दोघांची स्थिती एकसारखी नाही. अल्लाहने बसून राहणाऱ्यांपेक्षा प्राण व संपत्तीनिशी युध्द करणाऱ्यांचा दर्जाश्रेष्ठ ठेवला आहे. असे अल्लाहने प्रत्येकासाठी भलाईचेच वचन दिले आहे परंतु त्याच्याजवळ जिहाद करणाऱ्यांच्या सेवेचा मोबदला बसून राहणाऱ्यांपेक्षा फार जास्त आहे. त्याच्यासाठी अल्लाहकडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा व कृपा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.’’ (कुरआन ४:९५-९६)
मुस्लिम राजाने अथवा नेत्याने (अमीर) जिहादची घोषणा केली तर ते अनिवार्य धार्मिक कृत्य आणि श्रध्देचे प्रमाण ठरते. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जेव्हा काहींनी जिहाद घोषित झाल्यानंतरसुध्दा जिहादमध्ये सामील होण्यास आळस केला अशांना कुरआनमध्ये तंबी देण्यात आली आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या मार्गात निघण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा तुम्ही जमिनीशी खिळून राहिलात? तुम्ही पारलौकिक जीवनाच्या तुलनेत या जगातील जीवनाला पसंत केले आहे का? असे असेल तर तुम्हाला माहीत असावे की ऐहिक जीवनाचा हा सर्व सरंजाम पारलौकिक जीवनामध्ये फारच थोडा भरेल. तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभे करील.’’ (कुरआन ९: ३८-३९)
तसेच ज्यांनी बहाणा केला आणि जिहादमध्ये भाग न घेण्यासाठी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचेकडे विनंती केली अशा लोकांना उद्देशून कुरआनने तंबी दिली आहे,
‘‘हे पैगंबर (स.), अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तुम्ही त्यांना परवानगी का दिली? (तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यावयास नको होती) जेणेकरून कोण खरे आहेत, हे तुम्हावर उघड झाले असते व खोट्यांनादेखील तुम्ही ओळखले असते. जे लोक अल्लाहवर व अंतिम दिनावर श्रध्दा ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी विनंती करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित व वित्तानिशी युध्द करण्यापासून माफ केले जावे. अल्लाह ईशपरायण लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. अशी विनवणी तर तेच लोक करतात जे अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा ठेवत नाहीत, त्यांच्या हृदयात शंका आहेत आणि ते आपल्या शंकेतच द्विधाग्रस्त झाले आहेत.’’ (कुरआन ९: ४३-४५)
वरील आयतींवरून हे सिध्द होते की जिहाद जेव्हा अनिवार्य कार्य ठरते तेव्हा त्यात भाग न घेणे हे श्रध्दाहीनतेचे लक्षण आहे. या आयतींवरून हेसुध्दा कळून येते की अल्लाहच्या मार्गात जिहादसाठी प्रोत्साहित करणेसुध्दा श्रध्देचाच एक अंग आहे. युध्दाचा प्रसंग कधी येईल हे भाकित कोणीही करू शकत नाही. श्रध्दावंत त्यासाठी सतत तयार राहतो. तरी त्याची आंतरिक इच्छा ही प्रतिक्षा करू शकत नाही. मुस्लिम जर खरा श्रध्दावंत असेल तर तो नेहमीच जिहादसाठी तयारीत राहतो. जर परिस्थिती तशी उद्भवली आणि जिहाद पुकारले गेले तर असा मुस्लिम घरात स्वस्थ बसून राहत नाही. जिहाद (शारीरिक) आणि श्रध्देमधील नैसर्गिक संबंधांविषयी खालील हदीस स्पष्ट आहे,
‘‘जो व्यक्ती धर्मासाठी संघर्ष (जिहाद) करू शकला नाही किवा त्याविषयी मनात कधीही विचार आणला नाही तर तो अश्रध्देच्या स्थितीत मरण पावला.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वरील निर्णयानुसार मुस्लिम समाज त्याच्या इच्छेनुसार जीवन जगू शकत नाही जसे दुसरे जगतात. त्याची निर्मिती खास उद्देशासाठी झाली आहे. या उद्दात्त हेतुसाठी त्या समाजातील व्यक्तीने सर्वस्व पणाला लावणे अपेक्षित आहे. अशी व्यक्ती आपल्या ध्येयप्राप्तीपुढे सर्व काही किबहुना स्वतःचा जीवसुध्दा क्षुल्लक समजतो. खरा मुस्लिम समुदाय हा अशा लोकांचा समुदाय असतो जो समर्पणाची भावना उरी बाळगून असतो. अशा वैशिष्टयाशिवाय हा समाज इतर समाजासारखाच गणला जातो. तो मुस्लिम समाज नसतोच मुळी! ज्याच्यासाठी त्याची निर्मिती झाली आहे ते कर्तव्य पार पाडण्यास हा समाज असमर्थ ठरतो. कुरआनच्या निर्णय अशा समाजाविषयी या जगासमोर आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! जर तुमच्यापैकी कोणी आपल्या धर्मापासून पराङमुख होत असेल (तर खुशाल व्हावे) अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल. जे श्रध्दावंतांसाठी मृदू आणि अश्रध्दावंतांसाठी कठोर असतील, जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्टा (जिहाद) करतील आणि कोणत्याही निर्भर्त्सना करणाऱ्यांच्या निर्भर्त्सनेला भिणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे, तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह सर्वव्यापी आहे आणि सर्वकाही जाणतो.’’ (कुरआन ५: ५४)
वरील दिव्य प्रकटणाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. विशिष्ट गुणसंपन्न लोक अल्लाहला त्याच्या धर्मासाठी आवश्यक आहेत. त्यापैकी एक गुणविशेष आहे अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे. ज्याच्याजवळ हा गुणविशेष नाही तो धर्माची सेवा आणि धर्माला सहाय्य करू शकत नाही आणि धर्माची साक्ष देऊ शकत नाही. जो मुस्लिम हे कर्तव्य पार पाडणार नाही. तो मुस्लिम राहूच शकत नाही याच कारणामुळे ‘‘धर्मात कर्तव्यपरायण’’ न राहणे म्हणजे ‘‘धर्मापासून तोंड फिरविणे’’ आहे. कुरआनने हा निर्णय सुरे तौबा मध्ये दिला आहे,
‘‘तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल, आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभे करील.’’ (कुरआन ९: ३९)
मनुष्य अथवा समुदाय तेव्हाच आपल्या पदावरून दूर हटविला जातो जेव्हा तो त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरतो.

अरब समाजाची तर ही परिस्थिती होतीच, शिवाय अरब देशाव्यतिरिक्त जगाच्या पाठीवरील इतर देशांची परिस्थितीसुद्धा कमी-अधिक प्रमाणात अशीच दयनीय होती. मानवता शांती, समाधान आणि संरक्षणासाठी विषम परिस्थितीत सर्वत्र ठेचाळत भटकत होती. तिला कुठेही थारा मिळत नव्हता. अगदी रोम आणि पर्शियासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या साम्राज्यांतसुद्धा मानवता रक्तबंबाळ होती. मानवाधिकारांची पायमल्ली करणे हा शब्द तर खूपच कमी, अगदी शेकडो माणसांना भुकेल्या वाघ, लांडग्यसारख्या हिंस्र पशुंसमोर फेकून देऊन मानवसंहाराचा खेळ पाहण्याची मौजमजा राजे-रजवाडे पाहण्यात दंग असत. असा प्रकार या सुसस्कृत देशात घडत असे.
अशा अमानवी परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या आदेशाने कंबर कसली. सत्य आणि न्याय स्थापनेचे हे जागतिक पातळीवरील आव्हान मोठ्या संयम आणि शौर्याने स्वीकारले आणि समाजसुधारणेचा पाया प्रथम आपल्याच समाजात रोवून एक आदर्श समाज घडविला.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी या अमानवी आणि रूढीवादी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले आणि एका नवीन दृष्टिकोनाचे हत्यार उपसले. हा दृष्टिकोन कुरआनाच्या शब्दांत अशा प्रकारे सादर करण्यात आला,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुम्ही त्या आज्ञांचे अनुसरण करा ज्या अल्लाहने अवतरल्या आहेत तेव्हा ते म्हणतात की ‘‘आम्ही त्याच गोष्टींचे अनुसरण करू ज्याचे अनुसरण आमचे वाडवडील करीत होते.‘‘ त्यांना काहीही कळत नसताना व ते सन्मार्गावर नसतानादेखील त्यांचेच अनुसरण करणार का? इन्कार करणार्या लोकांची अवस्था अशी आहे जणू गुराखी जनावरांना हांक देतो आणि जनावरे ओरड व हांकेखेरीज अन्य काहीच ऐकत नाहीत. ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही.‘‘ (कुरआन: २ - १७०)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असत्याविरुद्ध आणि रूढीवादाविरुद्ध प्रत्यक्ष आवाज उठवला? एका न्यायहीन, अमानवी, शोषणवादी, जीर्ण-शीर्ण, विषमता असलेल्या रुढीवादी समाजाचे स्वरुप बदलून जागतिक क्रांतीच घडविली. सत्य, न्याय, बंधुत्व, समता, मानवता आणि आधुनिकतेची स्थापना केली. हा निश्चितच एक चमत्कार असून त्यांच्या या चमत्काराचे अगदी इस्लामविरोधकांनीसुद्धा तोंडभरून कौतुक केले. रात्रंदिवस दारुच्या झिंगेत वावरणारा, समता, न्याय, बंधुत्वाचा लवलेशही नसलेला, तुरळक कारणांवरुन माणसांचे मुडदे पाडणारा, मुलींना जीवंत गाडून फाजील अभिमान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारा, लूटमार करणारा आणि सावत्र आईस बापाची जागीर समजून शय्येवर ओढणारा हा समाज, व्याजासारख्या भांडवलशाहीच्या भावनेने मस्तीला येऊन आर्थिक शोषण करणारा हा समाज, गुलाम आणि दासींची खरेदी-विक्री करणारा आणि प्राण्यांपेक्षाही तुच्छ वागणूक देणारा हा समाज, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सादर केलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करतो, सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मानवी मूल्यांना उराशी कवटाळतो, महिलांचे वस्त्रहरण करणारा हा समाज महिलांना प्रतिष्ठेच्या सिंहासनावर बसवितो, मुलींच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा करतो, हा चमत्कार जागतिक इतिहासाच्या क्षितिजावर आजपर्यंत प्रखर सूर्याप्रमाणे तळपताना दिसत आहे.
कबीला बंदी
जो समाज विविध कबिल्यांमध्ये विखुरलेला होता आणि कबिलावादाच्या वैरभावाने फणफणत होता, एक-दुसर्याच्या जिवावर बेतलेला होता, एका कबिल्याच्या तलवारी इतर कबिल्याच्या लोकांच्या रक्तसाठी आसुसलेल्या होत्या, अशा असभ्य लोकांमध्ये स्नेह, प्रेम, ममत्व, समता आणि बंधुभाव निर्माण केला. समस्त वैरभाव आणि उच्च-नीचतेच्या भावनांना कायमची मूठमाती दिली. दुभंगलेली मने आणि फाटलेल्या हृदयांना जोडले. विखुरलेल्या समाजास जोडून जातीभेद आणि वर्णभेद नष्ट केला. एकास काटा रुतला तर दुसर्याच्या काळजास वेदना होऊ लागल्या. दुभंगलेल्या आणि विखुरलेल्या मानवतेने एका शरीराचे रूप धारण केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेल्या कामगिरीचे उदाहरण अवघ्या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. समाजातील आर्थिक, वांशिक आणि वर्णावर आधारित विषमता नष्ट करण्याचे समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतामध्ये गांधीजींनी दलित बांधवांना उच्चवर्णीयांबरोबर समान अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी असाधारण प्रयत्न केलेत, कनिष्ठ समजल्या जाणार्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. १९५५ साली स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध कायदासुद्धा करण्यात आला, मात्र जातीय विषमतेचे वातावरण आजही भारतामध्ये मानवतेस होरपळून काढणारे बाकी आहेच, हे विशेष!
समता
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजातील विषमता नष्ट केली. संपत्तीचा भक्त, भौतिकवाद व चंगळवादासमोर मान तुकविणार्या ज्या समाजात संपत्तीच्या आणि शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर माणसाची किंमत ओळखण्यात येत असे आणि श्रीमंत व सामर्थ्यवान म्हणजे प्रतिष्ठित, उच्च व सन्मानित तसेच दीन-दुबळा, गरीब आणि दरिद्री म्हणजे नीच, कनिष्ठ समजण्यात येत असे. अशा ठिकाणी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजाच्या मानसिकतेमध्ये आणि अगदी आत्म्यामध्ये अशी विचारसरणी निर्माण केली की माणूस हा साधन-संपत्ती, शक्ती व सामर्थ्यामुळे मोठा होत नसून सदाचार, उच्च नैतिकता आणि ईशपरायणतेमुळेच मोठा होतो. अर्थातच ईशपरायणता म्हणजे अंतरात्म्यातील अशा स्वरुपाच्या अनुभूतीचे नाव आहे, जिच्या आधारावर माणूस प्रत्येक कार्य ईश्वराच्या आदेशानुसार पार पाडण्याची अत्याधिक श्रद्धा आणि ईश्वरी आदेशांविरुद्ध असलेल्या कार्याप्रति अत्याधिक घृणा करतो. कुरआनात ही बाब अशा शब्दांत मांडलेली आहे,
‘‘आणि जे लोक न दिसणार्या आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात, त्याच्याकरिता उत्तम बक्षीस आणि मोबदला आहे.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-मुल्क – ६७ : १२)
ईश्वर हाच सर्वशक्तीशाली आणि महान असल्याचा निश्चितपणे स्वीकार करण्यात आला आणि सर्वांत जास्त त्याचेच भय मन-मस्तिष्कात असेल तर माणसाचे मोठेपण हे संपत्ती, वर्ण व वंशाच्या आधारे नव्हे तर उच्च नैतिकता आणि सदाचाराच्या आधारावर ठरविण्यात येईल. यावरून निश्चितच समाजाचे विषम स्वरुप समानतेमध्ये परिवर्तीत होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कुरआनाच्या याच आदर्श विचारसरणीच्या आधारावर समाजात समता, न्याय व बंधुभाव निर्माण केला. समाजशास्त्रज्ञ ‘अॅलेक्स इंकलस‘ याने स्पष्टपणे म्हटले आहे की मानवाच्या महानतेमध्ये विश्वास आणि न्यायाची वाटणी आधुनिकता हे प्रमुख अंग होय.
अशा प्रकारे इस्लामने एक आधुनिक दृष्टिकोन सादर केला आणि केवळ सादरच केला नसून त्यास व्यावहारिक स्वरुपदेखील प्रदान करण्याची किमया घडवून आणली.
दारुबंदी
जगातील समस्त दुराचारांची जननी असलेली ही दारू अरबवासीयांच्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक होता, याचा वरील प्रकरणात आपण उहापोह केलेलाच आहे. दारूच्या विरहात एक क्षणही सहन न करणार्या या समाजासमोर जेव्हा कुरआनाची ही शिकवण अवतरित झाली की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू, जुगार, वेदी व शकुन ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-अलमाईदा - ८९)
माननीय अनस (रजी.) यांचे कथन आहे की,
‘‘मी एकदा अबू उबैदा, उबई इब्ने कअब आणि अबू तलहा वगैरेंना दारू पाजीत होतो. एवढ्यात अचानक एका व्यक्तीने येऊन इस्लाममध्ये दारू निषिद्ध झाल्याची सूचना दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा हा आदेश पाठविताच त्या मैफलीत बसलेल्या सर्वांनीच दारू भरलेले माठ फोडून टाकले. ही अवस्था केवळ अबू तलहा यांच्याच घराची नसून समस्त मदीना शहरातील लोकांनी आपापल्या हातांनी दारूचे माठ फोडून टाकले. पूर्ण शहरातील रस्त्यांवर लोकांनी फेकलेल्या दारूमुळे नद्या वाहत होत्या.‘ (संदर्भ : बुखारी - वचनसंग्रह)
जीवापाड प्रिय असलेली दारू इस्लामच्या केवळ एकाच इशार्यावर लोकांनी ठोकारून लावली. विशेष म्हणजे कोणतीही पोलिसयंत्रणा व कोणताही दारूबंदीचा अधिकारी नसताना हे अद्भूत कार्य घडले.
जुगार, व्याजखोरी आणि इतर दुष्कर्म
त्याचप्रमाणे जुगार, व्याजखोरी, व्यभिचार, स्त्रियांवरील अत्याचार, कन्या-हत्या, गुलामांवर अत्याचार आणि यासारख्या अनेक दुष्कर्मांवर कायमचा आळा बसला. व्याजखोरीवर कायमचा आळा बसवून मानवजातीस महाजनी वा भांडवलदारी व्यवस्थेच्या विळख्यातून कायमची मुक्ती मिळाली.
गुलामीची अमानवी प्रथा
गुलामीची अमानुष प्रथासुद्धा नष्ट करण्यात आली. गुलामांचे व दासींचे स्वातंत्र्य आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आंदोलनाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत शिकवण दिली की,
‘‘जे लोक तुमच्या स्वाधीन आहेत (अर्थात गुलाम व दासी) त्यांनादेखील तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि वापरण्यासाठीही तेच वस्त्र द्या, जे तुम्ही स्वतः वापरता. त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम देऊ नका. त्यांच्यावर कामाचे जास्त ओझे झाल्यास तुम्ही स्वतः त्यांची मदत करा.‘‘ (संदर्भ : बुखारी - भाग २ वचनसंग्रह)
प्रेषित मुहम्मद (स.) यांची ही सूचना मिळताच त्यांच्या तात्कालीन अनुयायांनी आपापल्या गुलामांशी असा सद्व्यवहार केला की गुलाम कोण आणि स्वामी कोण, हे ओळखणे अशक्य होऊन बसले. लोक आपल्या कमाईतून गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करू लागले. अशा प्रकारे गुलामीची प्रथा नष्ट करण्यात आली.
वस्तुतः हा सगळा चमत्कार प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या असाधारण प्रभावाचा होता. गुलामांना पायाखाली ठेवणार्यांनी गुलामांना उराशी कवटाळले, सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम व सहानुभूती देऊ लागले. त्यांचा मान-सन्मान वाढला. वर्ण आणि वंशवादाला मूठमाती मिळाली. काळा-गोरा भेद नष्ट पावला. जो अरब समाज कृष्णवर्णीयांना तुच्छ लेखत होता आणि गुलामांना जनावरांपेक्षाही खालच्या पातळीची वागणूक देत होता, तोच अरब समाज आता मात्र कृष्णवर्णीय असलेले गुलाम माननीय बिलाल (रजी.) यांना प्रतिष्ठा व सन्मानाच्या दृष्टीने पाहण्यात धन्यता समजू लागला. त्यांना इस्लामी समाजात इतका मान व सन्मान मिळाला की मस्जिदे नबवीमध्ये आणि काबागृहावर त्यांनी अजान दिली. हा सन्मान इस्लाममध्ये इतर कोणालाही हेवा वाटावा असाच आहे.
आर्थिक परिवर्तन
दारु, जुगार, सट्टा, व्याजखोरी, व्यभिचार व गुलामीची तसेच कन्या-हत्यांची प्रथा नष्ट झाली. व्याजखोरी महाजनी व्यवस्थेच्या आर्थिक शोषणास बळी पडलेल्या सामान्य जनतेला मुक्ती मिळाली. व्याजावर आधारित कर्जाच्या ठिकाणी व्याजरहित कर्जाची आणि अनाथ, गोरगरीब, विधवा, वृद्ध, आजारी, वाटसरू, बेरोजगारांसाठी शासकीय अर्थसाह्याची व्यवस्था करण्यात आली. कुरआनात म्हटले आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकाच्या बहुतेक धर्मपंडित व साधु सन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जो सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने व चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजु आणि पाठींना डागले जाईल. हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.‘‘ (संदर्भ : कुरआन, ९:३४,३५)
अशाप्रकारे इस्लामने भांडवलशाही विचारसरणीच्या ठिकाणी एका समाजहितवादी विचारसरणीची स्थापना केली. आणि ‘सामाजिक न्याय व बंधुत्व‘ सारख्या मानवी मूल्यांची जोपासना होऊ लागली.
सामाजिक परिवर्तन
सामाजिक स्तरावर असमानतेच्या ठिकाणी समतेची स्थापना झाली. वंशभेद, गरिबी-श्रीमंतीतला भेद, वर्णभेद व आपला नि परक्यातील भेद नष्ट झाला. कारण इस्लामने अशी शिकवण दिली की, माणसाची प्रतिष्ठा आणि मोठेपणा हे वर्ण, वंश, संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर नसून ईश्वरी आदेशांवर आचरण करण्याच्या आधारावर आहे.
सांस्कृतिक परिवर्तन
मद्यपान, जुगार, व्यभिचार, लूटमार, चोर्या-मार्या, बलात्कार, गुलामीची प्रथा, भेदभाव आणि यासारख्या अनैतिक आचरण पद्धती नष्ट झाल्या आणि एका आदर्श संस्कृतीवर आधारित आदर्श समाजाची स्थापना झाली. स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार बंद झाले, स्त्री-पुरुषांतील अश्लीलतेने शीलतेचे स्वरुप धारण केले, व्यभिचार, नग्नता व लैंगिक शोषणाविषयी समाजात घृणा निर्माण झाली. व्यभिचार आणि बलात्कारासाठी कडक शिक्षा लागू करण्यात आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये वारसा अधिकार देण्यात आला. भ्रूणहत्या आणि मुलींना जिवंत गाडण्याची प्रथा बंद करण्यात आली. तिच्या सर्वोपरी रक्षणास्तव लोक प्राणांची बाजी लावू लागले.
या ठिकाणी ही बाब मुळीच विसरता कामा नये की, आजही राजस्थान, तामिळनाडू आणि अन्य भागांत नवजात मुलींची हत्या करण्याची प्रथा सुरु आहे. शासनाने याकरिता कायदा करूनही ही प्रथा बंद झालेली नाही. सतीच्या अमानुष प्रथेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात राजाराम मोहन रॉय यांनी आंदोलन केले आणि तात्कालीन ब्रिटीश शासनाने सती प्रथेविरुद्ध कायदासुद्धा केला. मात्र १९८७ साली राजस्थानात ‘देवराला‘ या ठिकाणी धूमधडाक्यात सतीची प्रथा आयोजित करण्यात आली. रुपकुंवर नावाच्या विधवेने सतीच्या नावावर आत्मदहन वा आत्महत्या केली.
यापूर्वीदेखील सतीच्या असंख्य घटना घडल्या आणि मानवतेची सर्रास राखरांगोळी झाली. अन्याय आणि अत्याचाराच्या भयानक आगीत मानवता सती गेली, तिच्या अवार्त टाहोने आजही भारतासारख्या आधुनिक देशाच्या संस्कृतीचे कान फाटत आहेत. देशातील समाजसुधारकांचे समस्त प्रयत्न निष्फळ ठरले, कायदा हतबल ठरला. मात्र ही बाब निश्चितच लक्षणीय आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्त्री-अत्याचारांचा समूळ नायनाट करण्याचा इतिहास घडविला.
राजनैतिक न्यायाची स्थापना
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घडविलेल्या क्रांतीने कबिल्यांवर अधिनायकत्वाच्या ठिकाणी परामर्शदायी सभेची स्थापना केली. परंपरागत पेशवाई नष्ट होऊन रयतेच्या मतदानावर आधारित राज्याची स्थापना झाली. सामान्यजनांना राजकीय घडामोडींमध्ये भाग घेण्याची संधी प्रदान करण्यात आली. शासक हा जनतेसमोर उत्तरदायी ठरविण्यात आला आणि हेदेखील निश्चित करण्यात आले की शासकास सामान्य रयतेच्या जीवनस्तरापेक्षा उच्च स्तरावर जगणे निषिद्ध ठरविण्यात आले. इस्लामने अशा प्रकारचे सत्यनिष्ठ शासन स्थापन करून दाखविले.
अशा प्रकारे एकीकडे समस्त जनतेच्या मानसिकता, स्वभाव आणि विचारसरणीत सुधारणा घडविण्यात आली, व्यक्तीगत आचरणाच्या सर्व पद्धतींत परिवर्तन घडविण्यात आले, तर दुसरीकडे मात्र अमानवी असलेले सामाजिक स्वरुप हे मानवताप्रिय स्वरुपात परावर्तीत करण्यात आले. हे अत्यंत मौलिक स्वरुपाचे परिवर्तन व्यक्तीगत स्तरावरच नव्हे तर सामूहिक स्तरावरसुद्धा झाले आणि ईश्वराच्या प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हे महान कार्य प्रेषितत्वांच्या अवघ्या तेवीस वर्षांतच पार पाडले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा विलक्षण कमाल
या समस्त मौलिक परिवर्तनामागे जी आश्चर्यकारक आणि चमत्कारिक बाब आहे, ती बाब अशी की, या ऐतिहासिक परिवर्तनामागे केवळ २३ वर्षांत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले कार्य होय. हा बदल एका अशा समाजात घडवून आणला, जो समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. त्या ठिकाणी छापखाने नव्हते, वृत्तपत्रे, दैनिके, साप्ताहिके, मासिके नव्हती, टी.व्ही. आणि इंटरनेटसारखी गतिमान प्रसारमाध्यमे नव्हती. टेलिफोन, मोबाईलसेवा नव्हती, रेल्वे, मोटारगाड्या, विमानसेवा नव्हती, अत्याधुनिक शिक्षण संस्था नव्हत्या, ज्ञान व संशोधनाची व्यवस्था नव्हती, ए.टी.एम.सारख्या व्यवस्था नव्हत्या. एखादे संघटित शासनही नव्हते आणि लष्कर व पोलिसयंत्रणा तसेच कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नव्हती. ‘हम करे सो कायदा‘ आणि ‘बळी तो कानपिळी‘ सारख्या अवस्थेत वयाच्या चाळीसाव्या वर्षी मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांनी अवघ्या २३ वर्षांच्या अल्पावधीतच एवढी महान क्रांती घडवून आणण्याचा चमत्कार दाखविला.
धर्माचा कट्टर विरोधक असलेल्या कार्लमाक्र्सने ‘दास कॅपिटल‘ १८८७ मध्ये लिहिले आणि रशियातील समाजवादी क्रांती १९१७ मध्ये अर्थात तीस वर्षानंतर घडली. शिवाय ही क्रांती घडण्यापूर्वी रशियन जनतेत शिक्षण आणि विवेकशक्ती होती, विचारसरणीच्या प्रसारासाठी आधुनिक प्रसारमाध्यमे उपलब्ध होती. सर्वकाही असताना ही विचारसरणी शंभर टक्के जनतेने स्वीकारलेली इतिहासात कोठेही दिसत नाही. शिवाय जी क्रांती घडली तिच्यातील मानवी हिंसा आणि संहार जगजाहीर आहेच. मग आणखीन एक बाब लक्षणीय अशी की या विचारसरणीवर आधारित क्रांती १९९४ साली अर्थात ७७ वर्षानंतर सोविएत संघाची शकले विखुरल्यावर आपला उरला-सुरला प्रभावदेखील हरवून बसली.
‘न्यूज टाइम्स‘ च्या सप्टेंबर १९८८ च्या अंकामध्ये ‘आयगर अॅरिविक‘ यांनी लिहिले आहे की,
‘‘१९१७ साली रशियामध्ये क्रांती घडली आणि समाजाचे स्वरुपसुद्धा बदलले, मात्र यामुळे राष्ट्राची मानसिकता बदलली नाही. पूर्वीची भांडवलशाही मानसिकता तशीच राहिली. हीच मानसिकता अर्थात भांडवलशाही विचारसरणी घेऊन रशियात समाजवादी स्वरुपाचा समाज तयार झाला.‘‘
सदरील लेखकानुसार आतून भांडवलशाहीची कीड लागलेली ही समाजवादी समाजव्यवस्था रशियात उभी करण्यात आली. परिणामी समस्त जनतेच्या शक्तीवर कम्युनिस्ट दलाची शक्ती प्रस्थापित झाली आणि या शक्तीवर केवळ एकट्या व्यक्तीचा अर्थात स्टॅलीनचे प्रभुत्व स्थापन झाले. देशामध्ये खर्या अर्थाने सामाजिक व्यवस्था निर्माण होऊच शकली नाही. जनतेचे वैयक्तीक अधिकार समाजवादी नावाच्या एकाधिकारशाहीने गिळंकृत केले. मान्यवर लेखकाच्या कथनानुसार जनतेस पदव्या आणि नोकर्या त्यांच्या क्षमता आणि पात्रतानुसार न देता सामाजिक स्तराच्या आधारावर देण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच या अन्यायाच्या परिणामस्वरुपी रशियामध्ये स्वतंत्र चिंतन आणि नवनिर्माणाच्या आधारावर जोरदार आंदोलने सुरु झाली. समाजवादाच्या नावावर सुरु असलेल्या एकाधिकारशाहीचे पितळ उघडे पाडण्यासाठी ही आंदोलने जोमाने कार्य करू लागली. स्वतः रशियन विचारवंतानीच रशियात समाजवादी क्रांती खर्या अर्थाने आलीच नसत्याच्या सत्यावरून पडदा उचलला आणि रशियात ख्रिस्ती धर्माने पाय पसरले. मात्र येथील शोकांतिका संपता संपत नव्हती. मायकल हार्ट या अमेरिकी लेखकाने लिहिले की,
‘‘येशू मसीह हे ख्रिस्ती धर्माच्या विशिष्ट नैतिक आणि धार्मिक श्रद्धांचे कर्णधार असले तरी ख्रिस्ती धर्मज्ञानास सेंट पॉल यांनी विशिष्ट प्रगती दिली. त्यांनीच नवीन करारनाम्याचे अधिकांश भाग लिहिले.‘‘
तात्पर्य एवढेच की, जगात मोठमोठे समाजसुधारक आलेत, त्यांनी समाजसुधारणेचे कार्यदेखील केले. मात्र जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत जेवढे समाजसुधारक येऊन गेले, त्यापैकी कोणताही असा समाजसुधारक सापडणे अशक्य आहे, ज्याने अवघ्या वीस-बावीस वर्षांच्या अत्यल्प काळामध्ये अरबच्या एका अशा अज्ञानी, अशिक्षित, मानवताविरोधी भावनांनी पेटलेल्या समाजातील एकेक व्यक्तीच्या व्यक्तीगत स्वभावात समस्त समाजात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळविले असेल. हा ऐतिहासिक विश्वविक्रमी प्रयोग म्हणजे केवळ एक चनत्काराच असू शकतो आणि असा चमत्कार प्रेषितांकडूनच आणि विशेषतः प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडून घडू शकतो. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या सर्व शंभर महानतम व्यक्तीमध्ये मान्यवर लेखकांनी प्रथम स्थानावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठेवले असून पहिला अध्याय त्यांच्यावर आधारित लिहिला आहे, तो अशा प्रकारे,
‘‘जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तीमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रथम स्थानावर ठेवण्याच्या माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना आश्चर्य वाटले असेल आणि काहीजण विरोध करतील मात्र इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) हे एकच असे व्यक्तीमत्त्व होते जे धार्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही स्तरांवर पूर्णरुपाने यशस्वी ठरले.‘‘ (पृष्ठ : ३३)
मान्यवर लेखकांनीसुद्धा तेच लिहिले, जे मी वरील मजकुरात सांगितले आहे,
‘‘या पुस्तकात उल्लेखलेल्या अधिकांश व्यक्तीना ही फायदेशीर संधी मिळाली होती की त्यांचा सभ्य व प्रगत संस्कृती असलेल्या समाजात जन्म झाला, शिक्षण-प्रशिक्षण झाले आणि समाजसुधारणेसाठी आवश्यक असलेली साधने त्यांना उपलब्ध होती. मात्र आदरणीय मुहम्मद (स.) यांना अशा संधी प्राप्त नव्हत्या. ते दक्षिणी अरब प्रदेशामध्ये जन्मले. त्या काळी हा प्रदेश जगाच्या पाठीवरील सर्वांत जास्त मासागलेला, पिछाडलेला, अज्ञानी, अशिक्षित आणि मानवताविरोधी मानसिकतेने पिसाळलेला होता. व्यापार, कला, ज्ञान-विज्ञान आणि संशोधनाचा लवलेशही नव्हता. धार्मिक आणि व्यावहारिक प्रक्रियेचा हा विलक्षण संबंध होता. मला असे मनापासून वाटते की यामुळे आदरणीय मुहम्मद (स.) यांना मानवेतिहासातील सर्वांत जास्त प्रभावशाली व्यक्तीत्व असण्याचा अधिकार प्राप्त आहे.‘‘ (पृष्ठ - ४०)
या ठिकाणी मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताच्या आत्म्याची हाक ऐकल्यावर आपल्यासमोर निश्चितच एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे असा की, हे कोणते आकर्षण होते, कोणती शक्ती होती, कोणता सत्यवाद होता, आणि कोणता चमत्कार होता की ज्यामुळे इतक्या कठीण संकटमय परिस्थिती आणि पावलो-पावली असह्य अडचणी असतानासुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जीवनाच्या अत्यंत अल्पशा काळामध्ये एका नवीन समाज निर्माण केला आणि हा समाज आदर्श नियमानुसार प्रत्यक्ष चालवूनही दाखविला. एक आदर्श आचरणशैली, आदर्श संस्कृतीचा प्रत्यक्ष नमुना जगासमोर ठेवला. एक न्यायसंमत जीवन आणि सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायावर आधारित समाजाचे केवळ सिद्धान्तच स्पष्ट केले नसून अशा आदर्श समाजाची प्रत्यक्ष स्थापनासुद्धा करून दाखविली.
मुस्लिम जगत आणि आदर्श आचरण
आता आपण या ठिकाणी या विषयावरसुद्धा थोडक्यात चर्चा करू या की, आदरणीय मुहम्मद (स.) हे अंतिम प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर आता या भूतलावर ईश्वरी वाणी अगर दैवी शिकवणी घेऊन कोणीही येणार नाही. शिवाय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर जो ग्रंथ अवतरित झाला अर्थात कुरआन, ग्रंथदेखील मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अंतिम ग्रंथ असल्याने प्रेषितांनी केलेल्या समाजसुधारणेच्या महान कार्याची जवाबदारी त्यांच्या अनुयायांवर अर्थात मुस्लिम जगतावर आहे. कुरआनात स्पष्टपणे ईश्वराचा हा आदेश मुस्लिम जगतास संबोधून आहे,
‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात, ज्यास मानवांच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता निवडण्यात आले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता आणि दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.‘‘ (संदर्भ : कुरआन, आलिइम्रान - ११०)
कुरआनाच्या या संदर्भानुसार समाजसुधारणेचे जे कार्य प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केले, त्याची जवाबदारी आता मुस्लिम समुदायावर टाकण्यात आली आहे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आदर्शाचे (अर्थातच कुरआनाची प्रत्यक्षात अंमलबजावणीची कार्यशैली) मार्गदीप आज मुस्लिमंच्या हाती आहे. याच मार्गदीपाच्या प्रखर असलेल्या सत्यप्रकाशाच्या माध्यमाने मानवताविरोधी आणि असत्याच्या अंधारातून स्वतः जीवनाची वाटचाल तर करायचीच आहे, मात्र इतरांना असत्य, अज्ञान आणि अन्यायाच्या अंधारात खितपत पडायला सोडून देणे हा अक्षम्य अपराध आहे. ईश्वराने हा जो मार्गदीप प्रदान केला आहे, तो समस्त मानवजातीस मार्गदर्शन करण्यासाठी दिला आहे. स्वतः पोटभर खाऊन शेजार्यास उपाशी ठेवणेदेखील ईश्वरास पसंत नहा. मग जीवनाच्या सर्वांत जास्त महत्त्वाच्या विषयी ही बाब ईश्वरास मुळीच पसंत नाही की स्वतः मार्गदीपाच्या प्रकाशात चालावे आणि इतरांना मात्र अंधारात चाचपडत सोडून द्यावे. खरे पाहता मुस्लिमांच्या जन्माचा उद्देशच समाजसुधारणेचे हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी झालेला आहे.
ही गोष्ट प्रत्येक मुस्लिम आणि मुस्लिमेतर जनतेने नीट लक्षात घ्यावयास हवी की, केवळ मुस्लिमाच्या घरी जन्म घेतल्यामुळे अथवा मुस्लिमासारखे नाव ठेवल्याने कोणी पूर्णपणे मुस्लिम होत नसतो. कारण मुस्लिम हा केवळ जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार होतो. कारण जात-पात आणि वंश व वर्णाचा इस्लामशी फक्त परिचय करून देण्याइतकाच संबंध आहे. ही बाब कुरआनात अशा शब्दांत मांडण्यात आलेली आहे,
‘‘हे बदावी (ग्रामीण अरबी) समजतात की, ‘‘आम्ही श्रद्धा ठेवली (अर्थात पूर्णपणे मुस्लिम झालो.) (मात्र) त्यांना सांगा की तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, तर असे म्हणा की, आम्ही समर्पित झालो. (खर्या अर्थाने) श्रद्धा अद्यापही तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) यांची अज्ञाधारकता स्वीकारली तर तो तुमच्या कर्ममोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. खरोखर श्रद्धावंत तर ते आहेत, ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर (अर्थात प्रेषित मुहम्मद (स.)) यांच्यावर श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही शंका मनात येऊ दिली नाही. आणि आपल्या जीवितवित्तानिशी अल्लाहच्या मार्गात पराकाष्ठा केली तेच खरे श्रद्धावंत लोक होत.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-हुजरात - १४,१५)
अर्थातच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका सद्क्रांतीचे प्रत्यक्ष स्वरुप मानवजगतासमोर सादर केले आहे. म्हणून मुस्लिमांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी मानवतेच्या कल्याणास्तव सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध दंड थोपटावे आणि सत्य, न्याय, स्नेह व बंधुत्वासाठी प्रयत्नशील असावे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget