Latest Post


कल्पना करा की ’अ’ नावाच्या एका मुलीने वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतले. विद्यापीठातून अनेक पदव्या मिळविल्या. 31 व्या वर्षी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर तिची निवड झाली. खूप संपत्ती कमाविली. खूप प्रसिद्धी मिळाली. कंपनीच्याच एका सहकार्‍यावर प्रेम केले. 4 वर्षापर्यंत त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिली. काही कारणांमुळे त्यांचे बिनसले आणि ब्रेकअप झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली. आई-वडिलांनी आग्रह केल्यामुळे त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर 38 व्या वर्षी लग्न केले. 40 वर्षी आई झाली. तिला एक गोंडस मुलगी झाली. पण कंपनीमध्ये नियमित प्रमोशन होत असल्यामुळे कामाच्या जबाबदार्‍या वाढल्या. म्हणून पुन्हा-पुन्हा आई होण्याचा नैसर्गिक अधिकारी तिने स्वैच्छेने नाकारला. आयुष्यभर सातत्याने काम करत असल्यामुळे मुलीला फारसा वेळ देता आला नाही मात्र तिला पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण तिने दिले. पण मुलगी पुढे चालून तिचे ऐकेणासी झाली. दरम्यान ज्याच्याशी लग्न झाले त्याला तिच्या लिव्ह इनची गोेष्ट कळाली. म्हणून त्याने तिला सोडून दिले. मग ती परत एकटी झाली. कंपनीमध्ये काम करत असतांना कधी-कधी सोशल ड्रिंकिंग करावी लागत असे. एकटी झाल्यामुळे नियमित दारू पिऊ लागली. घर, गाडी, पैसा, कार सर्वकाही मिळाले. पण मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर पळून गेली. तब्बल 30 वर्षे तिला एकटे रहावे लागले. नातवंड नसल्यामुळे तिने कुत्रा आणि मांजर पाळले आणि शेवटी मेली. 

याउलट तिच्याच सोबतच्या ’ब’ नावाच्या एका मुलीचे 20 वर्षे संपताच पदवी पूर्ण होताच आई-वडिलांनी चांगले स्थळ पाहून लग्न लावून दिले. ती सासरी गेली. तिला तीन मुलं आणि एक मुलगी झाली. तिने मन लावून संसार केला. मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांना भरपूर वेळ दिला. त्यांना व्यवस्थित शिक्षण दिले. त्यांचा रोजचा गृहपाठ व्यवस्थित करवून घेतला. सामान्य शाळा, महाविद्यालयात शिकूनही तिची सर्व मुलं उच्चविद्याविभूषित झाली. मुलगी सुंदर व संस्कारी असल्यामुळे चांगले स्थळ चालून आले. जावई आयएएस मिळाला. फुकटात लग्न झाले. तिन्ही मुलं लायक निघाली. एक भारतीय सेनेत अधिकारी, दूसरा खाजगी कंपनीत सीईओ तर तीसरा शिक्षक झाला. तिच्या उतारवयात तिला आणि तिच्या पतीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा सुरू झाली. उतारवयात नातवंडांचे भरपूर प्रेम मिळाले आणि काही वर्षानंतर ती सुद्धा वारली.

आपले डोळे बंद करा ! एक खोल श्‍वास घ्या आणि आपल्या हृदयावर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा कोणाचे आयुष्य यशस्वी झाले? ’अ’ चे का ’ब’ चे? या ठिकाणी ’अ’ ने जी जीवनशैली स्वैच्छेने स्वीकार केली ती पाश्‍चीमात्यांची जीवनशैली आहे. जिचा आज बहुतेक महिलांनी अंगीकार केलेला आहे. ’ब’ ची जीवनशैली इस्लामी तसेच प्राचीन भारतीय जीवनशैली आहे. ज्याचा त्याग आजच्या मुली करत आहेत. 

आजकाल ’भाग बिन्नी भाग’ नावाची एक तद्न फालतू वेबसेरीज नेटफ्लिक्स या ओटीटी (ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस) प्लेटफॉर्मवर आली असल्याचे व त्यात ’अ’ ने अंगीकारलेल्या जीवनशैलीचे महिमामंडन केल्याचे त्या वेबसिरीजच्या समिक्षण अहवालावरून समजले. नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लेटफॉर्मसनीं आता सिनेथिएटर्सची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून, सर्व प्रकारचे कौटुंबिक बंधन झुगारणे म्हणजेच मुक्त जीवन जगणे असा साधा हिशोब हे लोक तरूण मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशस्वीसुद्धा होत आहेत. 

ह्या सर्व वेबसिरीज आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून लोकांना नैतिक बंधन मुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हॉलीवुड, टॉलीवुड, बॉलीवुड, फॅशन उद्योग, संगीत दारू, उद्योग इत्यादीमध्ये जगभर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि हे उद्योग कायम नफेत रहावेत म्हणून हे लोक सर्व माध्यमातून मुक्त जीवनशैलीचे महिमामंडन करत असतात. अवघं जग यांनी कवेत घेतलेले आहे. यांच्यासमोर इस्लामी जीवनशैली वगळता कोणत्याच जीवनशैलीचे आव्हान नाही. म्हणून शक्य त्या मार्गाने इस्लामची बदनामी करून तरूणांना त्याच्या शीतल, सरळ, स्वच्छ आणि नैतिक जीवनापासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न हे लोक करत असतात. कधी दाढी, कधी टोपी, कधी तीन तलाक, कधी बुरखा, कधी खोटा आतंकवाद वगैरे निवडक विषय घेऊन माध्यमातून चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणतात. कधी आपण पाहिले का की व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचे कल्याणकारी परिणाम ? इस्लामच्या नैतिक शिक्षा काय आहेत? जकातमुळे गरीबी कशी दूर होऊ शकते? परद्यामुळे महिलांचे संरक्षण कसे होते? इत्यादी विषयावर कोणी चर्चा घडवून आणल्याचे? कधीच नाही. याचं कारणच हे आहे की, हे लोक चांगल्या प्रकारे जाणून आहेत की, या विषयांवर चर्चा घडवून आणणे म्हणजे आपल्या अनैतिक उद्योगांचा स्वतःच्या हाताने गळा दाबणे होय? इस्लामला चुकीच्या पद्धतीने पोट्रेट करून जगासमोर मांडल्यामुळे सामान्य माणसं विशेषतः तरूण वर्ग फसतो आणि इस्लामपासून लांब जातो. पण अलिकडे ज्या समाजमाध्यमाच्या मार्फतीने हे लोक इस्लामची बदनामी करत आहेत त्याच माध्यमातून इस्लामचा खरेपणा लोकांच्या लक्षात येतो आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. 

या ओटीटी प्लेटफॉर्मवरून महिला व मुलींना स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या नावाखाली अनैतिक जीवनाकडे आकर्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर इस्लाम हा   महिला आणि मुलींना कशा जीवनशैलीकडे बोलावितो हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. तर चला पाहूया थोडक्यात इस्लामच्या नजरेतून स्त्रीकडे. 

इस्लामच्या नजरेतून स्त्री

इस्लामच्या दृष्टीकोणातून पुरूषांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगा, भाऊ, पती आणि बाप, तसेच महिलांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगी, बहिण, पत्नी आणि आई. इस्लामने महिलांना अर्थाजनाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त करून मानववंशाला जन्म देण्याची आणि त्यांच्या संवर्धनाची पुरूषांपेक्षाही महत्त्वाची जबाबदारी सुपूर्त केलेली आहे. अर्थार्जनांची संपूर्ण जबाबदारी पुरूषांची आहे. भौतिक कामं करून अर्थाजन करण्याची महिलांना जरी मुभा असली तरी ती त्यांची जबाबदारी नाही. महिलांच्या आयुष्यातील चारही टप्प्यात पुरूषांनी त्यांच्याशी कसे वागावे याची आचारसंहिताच शरीयतने ठरवून दिलेली आहे. कोणताही श्रद्धावान मुस्लिम पुरूष त्याबाहेर जाण्याचे धाडस करूच शकत नाही.

  महिलांचे सर्वात आदराचे पद हे गृहिणी पद होय. यापेक्षा महत्त्वाचे पद जगात दुसरे नाही. महिलांना स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी एवढे कारण पुरे आहे की, प्रत्येक पुरूष जन्मताच त्यांच्या कृपेवर विसंबून असतो. गृहिणी या पदाचे महत्त्व कमी करून दाखविणे हा ओटीटी प्लेटफॉर्म तसेच प्रत्येक दृकश्राव्य माध्यमांचा प्रमुख हेतू आहे. गृहिणी म्हणून जे काम महिला करतात ते कसे तुच्छ आहे व घराबाहेरची कामे किती सन्मानजनक आहेत हे त्यांच्याच नव्हे तर पुरूषांच्याही मनावर बिंबविले जाते आणि मुर्खासारखे समाजातील अनेक अज्ञानी लोक गृहिणींना कमी दर्जाच्या तर कामकाजी महिलांना श्रेष्ठदर्जाच्या (महिला) समजण्याची चूक करतो. हा गैरसमज इतका व्यापक आणि खोल रूजलेला आहे की, स्वतः गृहिणी असणार्‍या महिला हे श्रेष्ठ काम करत असूनसुद्धा स्वतःला कामकाजी महिलांच्या तुलनेत कमी लेखू लागतात. 

स्त्री-पुरूष दोघे समानतेचा अर्थ

1. इस्लाममध्ये पुरूषापेक्षा स्त्रीला तिप्पट अधिक महत्त्व दिलेले आहे. स्त्री-पुरूष समानतेचा अर्थ असा बिल्कुल नाही की दोघे सारखेच आहेत. दोघांची शारिरिक रचनाच नव्हे तर मानसिक रचनासुद्धा वेगवेगळी आहे. म्हणून जबाबदार्‍यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. उदा. एका स्त्रीला दोन मुले आहेत. एक आठ वर्षाचा आणि दूसरा एक वर्षाचा. तिला दोन्ही मुलं समान आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की ते दोघे सारखे आहेत. ती स्त्री मोठ्या मुलाला जेवण तर लहान मुलाला दूध देणे म्हणजे दोघांमध्ये भेदभाव करते असे नाही. 

2. स्त्रीयांना दर महिन्याला मासिक पाळी येते. त्यांना गर्भधारणा होते आणि या काळात त्यांना एका लांब कालावधीपर्यंत आराम करण्याची गरज असते. कामकाजी महिलांना ते शक्य होत नाही. मॅटर्निटी लिव्ह मिळते पण ती पुरेशी नसते. त्यामुळे काम करणार्‍या महिला ह्या पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या अधिकाराचा स्वेच्छेने त्याग करतात. 

3. काम करणार्‍या महिलांना कार्यालयीन काम करावे लागते. तसेच सोबतच्या सहकार्‍यांच्या आणि वरिष्ठांच्या लैंगिक प्रस्तावांचा सामना करावा लागतो. परत आल्यानंतर घरचे कामही करावे लागते. येणेप्रमाणे त्यांना तिहेरी ओझे घेऊन जीवन जगावे लागते. प्रसिद्ध अमेरिकन लेखक लिसा बेलकीन यांच्या 2003 साली आलेल्या पुस्तकामध्ये ज्याचे नाव ’ए लाईफ वर्क कन्फ्युजन ऑफ अ‍ॅन अनबॅलन्स्ड मॉम’ मध्ये लेखिकेने लिहिलेले आहे की, ”काम करणार्‍या महिलांचे जीवन द्विधेमध्येच संपून जाते. त्या पूर्णपणे बाहेरील कामही करू शकत नाहीत आणि घरच्या जबाबदार्‍याही पूर्णपणे पार पाडू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वतःचेही जीवन ते मुक्तपणे जगू शकत नाहीत. 

4. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरूष असल्यामुळे व त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा लागत असल्यामुळे जीवनामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि नकोती नाती निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात होतात. ज्याचा अंत साधारणपणे गुन्हेगारीमध्ये होतो. 

5. जर स्त्रीही थकून भागून घरी येत असेल आणि पुरूषही थकून भागून घरी येत असेल तर कोण कोणाला सांभाळणार? कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”आणि त्याच्या संकेतचिन्हापैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात”(सुरे ः अर्रूम आयत नं. 21)

6. आई-वडिल दोघेही काम करणारे असतील तर मुलांच्या संगोपनावर त्याचा नक्कीच विपरित परिणाम होतो. मुलांच्या सांभाळासाठी जरी मेड ठेवली तरी तिला आईची सर येत नाही, हे कोणालाही मान्य करावे लागेल. 

7. दोघेही काम करणारे असतील तर घरात असणार्‍या वृद्धांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही. हेच कारण आहे की, वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

हे सत्य आहे की, प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये काही स्त्रिया अशा असतात ज्यांचा कामकाज केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. अशा महिलांना सुरक्षित वातावरणात काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांना शोभेल, साजेल आणि झेपेल अशा क्षेत्रांना चिन्हीत करून त्यामध्ये त्यांना 100 टक्के आरक्षण देउन, सन्मानाने जगण्याचा हक्क देता येतो. परंतु अनुभव असा आहे की, प्रत्येक क्षेत्रात महिलांना सामावून घेउन एक प्रकारे त्यांच्यावर अत्याचाराच केला जातो.  

इस्लाम अगदी याविरूद्ध तत्वज्ञान सादर करतो. तो स्त्रीला घरात केंद्रीय भूमिका देवून तिच्या अवतीभोवती घरातील प्रत्येक सदस्याला फिरविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे घरातील स्त्री ही प्रमुख भूमिकेत येते व घरातील इतर सदस्य तिच्या परिघाभोवती फिरत असतात. अर्थाजन घरचा पुरूष व गृहव्यवस्थापन घरची स्त्री या दोहोंचा जोड एवढा गच्च बसतो की त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक निपजतात व समाजाला उत्कृष्ट कुटुंब व्यवस्था मिळते. परिणामी, समाज सृजनशील होतो व देशाची सर्वांगीण प्रगती होती. 

लक्षात ठेवा मित्रानों ! जगात कधीच, कुठेच दुराचार्‍यांची नेतृत्वाखाली सदाचारी समाजव्यवस्था अस्तित्वात आलेली नाही. आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी आदर्श स्त्री-पुरूष लागतात व आदर्श स्त्री-पुरूष आदर्श कुटुंबातून येतात व आदर्श कुटुंब उत्तम लग्नव्यवस्थेद्वारे निर्माण होते. या व्यतिरिक्त जेवढ्या व्यवस्था आहेत त्या सर्वांमध्ये शेवटी नुकसान महिलेचे होते. कुटुंब व्यवस्थेला फॅशन उद्योगाच्या नफ्याखातर बदलण्याचे षडयंत्र वेळीच ओळखले नाही तर उध्वस्त कुटुंब व्यवस्था, मनोरोगी वृद्ध, लिंगपिसाट पुरूष, बलात्कारी तरूण, लज्जाविरहित स्त्रिया आणि मुल्यहीन समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही. जी सर्वांसाठीच हानिकारक असते. 

बुद्धिवादी लोकांनी तरी किमान इस्लामने समाजामधील महिलेचे स्थान जे ठरवलेले आहे ते किती उत्कृष्ट आहे, याचा पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा जरूर अभ्यास करावा. जय हिंद !


- एम.आय.शेख



प्रत्येक वेळेस, पावला- पावलावर आर्थिकरित्या कमकुवत लोकांना पैशाची आवश्यकता असते. जे जेव्हा कुणाला पैशाची मागणी करतात, तेव्हा एक दोघांचा अपवाद सोडल्यास इतर त्याला सावकाराकडे जाण्याचा सल्ला देतात. याच व्याजाच्या चक्रात फसून तो आपल्या गरजा पूर्ण करतो. याप्रकारे सावकारी पद्धत सभ्य समाजात रुढ झालेली आहे. खरे पाहता सभ्य समाज आणि व्याजाची व्यवस्था एकमेकांच्या विरोधी आहे. एकाचे प्रभुत्व दुसर्‍यासाठी मृत्युचा संदेश आहे. या दोन परस्परविरोधी बाबींमध्ये कधीच सामंजस्य असू शकत नाही. जे व्यक्ती आणि समाजावर व्याज प्रणालीचे प्रभुत्व असते ते नेहमीच वास्तविक सुख आणि समृद्धीपासून वंचित असतात. त्यांच्यावर ईश्‍वर आपली कृपादृष्टी ठेवत नाही. असा समाज तक्रारीच्या आगीत जळत असतो. अशा ठिकाणी माणसं माणसाविषयी सहानुभूती ठेवण्याऐवजी एकमेकांचे रक्त शोषण्यात व्यस्त असतात. यालाच ते आर्थिक सफलता समजतात. लोकांचा असा विश्‍वास आहे की, जर ही व्यवस्था बंद केली तर जगाचे आर्थिक चक्र थांबून जाईल.  

आश्‍चर्यांची बाब ही की, 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 पर्यंत अमेरिकेच्या बर्टन वूड शहरातील माऊंट वॉशिंगटनमध्ये बँकींग व्यवस्थेवर कॉन्फ्रन्स घेण्यात आली. यामध्ये 44 देशांच्या 730 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यांचा उद्देश जगात वैश्‍विक वित्तीय व्यवस्था कशी लागू करावी यावर विचार करणे हा होता. त्यावेळेव व्याजाधारित आर्थिक व्यवस्थेस मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ती जगात लागू करण्यात आली. या वैश्‍विक कराराअंतर्गत एक बँक सुरू करण्यात आली, तिचे नाव ’इंटरनॅशनल बँक ऑफ सेलटमेन्ट’ ठेवण्यात आले. प्रत्येक देशासाठी कागदाचे एक चलन अनिवार्य करण्यात आले. कागदावर सुंदर चित्र छापून त्या चलनाचे मुल्य निर्धारित करणे याचा मुख्य उद्देश होता. कागदाचे मुल्य एक रुपयापासून तर पाच हजार रुपयांपर्यंतच्या वास्तविक स्विकार्हता होऊन जाते.

व्याजाच्या वापराने आपल्या शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. सावकारांच्या उन्मुलनाला सोप्या पद्धतीने समजने फार कठीन आहे. मनुष्याचे अस्तित्व फक्त भौतिक नसून नैतिक सुद्धा आहे. व्याज मनुष्याला स्वार्थी, कठोर हृदयी आणि निर्दयी बनवितो. त्याला पैसे आणि संसारिक लोभी बनवितो. व्याज मनुष्याला समाजातील पिडित व्यक्तींप्रति नैतिक जबाबदारीतून मुक्त करतो. आपल्या परिघात तो गतीहीन जीवन जगण्यास बाध्य करतो. यामुळे सेवा, सहकार्य, आपलेपणाचा स्वभाव नष्ट होत आहे़  आज या भौतिकता आणि पुंजीवादामुळे अतिथी सत्कारातही चहाचा कप सुद्धा व्याजाच्या दुष्प्रभावामुळे मागे ओढला जात आहे. कुणालाही जराशी सवड किंवा वेळ नाही की, आसपासच्या वातावरणाची समीक्षा करावी. आपला गरीब शेजारी, असहाय्य लोक किती समस्यांचा सामना करीत आहे हे बघायलाही वेळ नाही, ह्या सर्व जणू जुन्या गोष्टी झाल्या आहेत.

त्याच्यावर मायेची चादर टाकणारा कुणी नाही. त्यामुळेच आज गल्लोगल्ली सावकारांचे जाळे पसरले आहे, जे एखाद्या जळू प्रमाणे छोट्या राशीच्या मोबदल्यात व्याजावर व्याज चढवून अवैध वसूली करीत आहेत. हे सर्व होत असतांना समाज मात्र तंद्रीत गेल्याप्रमाणे वागतांना दिसतो, 

कर्जदारांमध्ये असेही लोक असतात जे हातावर आणून पानावर खाणारे आहेत. आपल्या परिवाराचे कसेबसे पालन पोषण करणार्‍या या लोकांवर कर्जाची परतफेड करण्याची मोठी जबाबदारी सुद्धा असते. मात्र यांना या संकटातून मार्ग दाखविणारा व यातून बाहेर काढणारा कुणीच नसतो. चांगल्या लोकांचे उदाहरण तसेच आहे ज्यात स्वयं दु:खात असतांना दुसर्‍याची मदत केली जाते. इतकेच नाही तर मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, मोठे व्यापारी, उद्योगपती आणि उद्योग यांचाही कर्जाशी जवळचा संबंध असतो. विविध उद्योग आवश्यकतेच्या नावावर कर्जाचे आदान प्रदान हा कर्करोगाप्रमाणे असाध्य रोगाचे रूप धारण करीत आहे. व्याजावर आधारित कर्ज प्राप्तीसाठी संगठित व सशक्तपणा बघायला मिळतो. व्याजासाठी नवनव्या आकर्षक योजना बघायला मिळतात. बोटांवर मोजता येणारे पुंजीपती या कर्ज व व्याजाच्या योजनांवर नियंत्रण ठेऊन आहेत. जेव्हा की हेच मोठे लोक कर्ज किंवा व्याज न देता अत्यंत सहजपणे ‘पळ’काढतात. त्यांना न्यायाच्या कठड्यात उभे करणे कठीन होऊन जाते. जेव्हा की अशाच वेळी गरीबांची बेआब्रु केली जाते.

देशात कर्जदरांना जीवंत राहणे कठीन झाले आहे व या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात अनेक क्षेत्र असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात. कर्जावरील व्याज आणि मुद्दल रक्कम परत न करण्याच्या परिस्थितीने पिडित व निराश व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडतो आहे आणि आपल्या कुटुंबाला समस्येच्या मार्गावर नेऊन सोडतात. अशी स्थिती सामान्य नागरिक, शासनकर्ते, राजकीय व्यक्ती, व्यापारी, शिक्षित आणि बुद्धिजीवी यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशातही सरकार आणि राजकारणातील जादूगर सहानुभूती आणि मानवतेचे ढोंग करण्यात मागे राहत नाही.

धर्मग्रंथानुसार आपल्याला शक्यतोवर कर्जापासून स्वत:ला वाचवायला हवे, मात्र आजच्या भौतीकतावादी युगात जीवनातील गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. यात बँकेकडून घेण्यात येणार्‍या आणि इतर माध्यमातून घेण्यात येणार्‍या कर्जाचा समावेश आहे. ‘लोन’ किंवा कर्ज घेण्यात काहीच वाईट नाही, मात्र जर कर्ज घेणार्‍याकडून कर्जाचे हप्ते फेडण्यात उशीर होत असेल, किंवा त्याला कर्जाचा परतावा करण्यात अडचण येत असेल, अशा परिस्थितीत कर्ज घेणार्‍याकडून व्याजाच्या रकमेची मागणी करणे हे माणवतेला कलंकित करणारे आहे.

वैदिक काळ प्राचिन भारतीय संस्कृतीचा एक कालखंड आहे. याच काळात वेदांची रचना करण्यात आली. हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर भारतात अनेक नवीन संस्कृतींचा जन्म झाला. वेदातही कर्जावर व्याज घेणार्‍यांचा उल्लेख ‘व्याजखाणारा’ असा करण्यात आला आहे. वेदातही व्याजाला वर्जीत ठरविण्यात आले. ‘जास्त धन प्राप्तीच्या लोभात, पैसे उधार देणार्‍याकडून संंबधित धन ईश्‍वरही हिसकावून घेतो’ (ऋग्वेद - 3:53:14).

बायबलच्या नियमांच्या आधारावर ख्रिस्ती धर्मातही व्याज घेण्याची निंदा करण्यात आली आहे. 1179 पासून व्याज घेणार्‍याला बहिष्कृत करण्यास सांगण्यात आले होते. कॅथलिक चर्च नुसार व्याज खाने निषिद्ध समजण्यात आले आहे. बायबल मध्ये व्याजाचा विरोध पुढील प्रमाणे केला आहे़ ‘तू आपल्या भावांना व्याजावर कर्ज देऊ नको, ते भोजन असो, पैसा असो किंवा इतर वस्तू असो.’ (बायबल अनुवाद व्यवस्था विवरण 23:19).

कुरआनमध्ये व्याजाला वर्जित ठरविण्यात आले आहे. ‘आणि जे लोक व्याज खातात, ते त्याच प्रकारे उठतात जसे तो व्यक्ती उठतो ज्याला सैतानाने हात लावून बावळट केले आहे, आणि ते म्हणतात व्यापार हा व्याजाप्रमाणेच आहे.’ जेव्हा की अल्लाहने व्यापाराला वैध आणि व्याजाला अवैध ठरविले आहे. अंतत: ज्याला त्याच्या ईश्‍वराकडून चांगला मार्ग मिळाला आणि तो सुधरला, तर जे काही त्याने आधी घेतले होते ते त्याच्याजवळ राहिले आणि नंतर निर्णय अल्लाह करणार. मात्र जो सुधरला नाही आणि पुन्हा तेच व्याज घेण्याचे कार्य केले तर त्याला नरकातील आग मिळेल, व ते नेहमी त्या आगीत राहतील. (कुरआन 2:275).

इस्लामच्या दृष्टीने व्याजाच्या निंदेसंदर्भात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांचा राग बघितल्यानंतर, इस्लामला मानणार्‍या कुणालाही ही परवानगी नाही की तो एका क्षणासाठीही प्रामाणिकपणा, अंतरात्माची हत्या करणार्‍या आणि बंधुभावाचा वैरी असणाजया व्याजाला सहन करेल.


- डॉ. एम.ए. रशीद 

(नागपूर) 



माननीय अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वर्ग (जन्नत) आणि याचप्रमाणे नरक (जहन्नम) सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या चपलांच्या तळव्यापेक्षासुद्धा त्याच्या अधिक जवळ आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे स्वर्ग व नरक यांना लांब समजून बसू नका. ते तर तुमच्या अतिनिकट आहेत. जन्नत (स्वर्ग) मधील देणग्या आणि त्यातील सुख-समाधान तसेच नरकातील आपत्ती, कष्ट इ. सर्वांचा आमच्या आचार-विचारांशी घनिष्ट संबंध आहे. आमचे कर्म व विचारांमुळेच आमचे जीवन स्वर्ग बनेल अथवा नरक बनेल. आमचे कर्म हे आमच्यापासून दूर व विलग असत नाही. कर्मानुसार आमचे अस्तित्व व व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते. कर्म जर सदाचारी व ईशपरायणशील असतील तर आमची जन्नत (स्वर्ग) आमच्यापासून काहीच दूर नाही. अथवा याच्या विपरित आमचे चारित्र्य व कर्म असतील आणि त्यामुळे प्रभु-स्वामीला आम्ही इतर काहीr समजू लागतो आणि तो जीवनमार्ग स्वीकारून बसतो जो मार्ग प्रभुला अप्रिय आहे. अशा स्थितीत आम्ही जन्नतऐवजी नरकाशी (जहन्नम) दृढ संबंध स्थापित करून बसलेलो असतो.


माननीय हुजैफा (रजि.) यांचे कथन आहे.

‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखादे वेळी काही संकटांना सामोरे जावे लागले तर नमाज अदा करू लागतात.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

हे यासाठी की दासासाठी सर्वांत मोठा आधार त्याचा प्रभु-स्वामी आहे. ईशसान्निध्याव्यतिरिक्त अन्य कोणते दुसरे शरणस्थळ असूच शकत नाही.



- डॉ. मुस्तफा सबाही

या ग्रंथात इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये वर्णन करण्यात आली आहेत. तसेच याविषयीचा ऐतिहासिक आढावासुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी दिव्य कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात चर्चा केलेली दिसून येते.

ग्रंथात इस्लामी संस्कृतीच्या वैशिष्ट्यांसह, संस्कृतीचे ऐतिहासिक अवशेष, मानवप्रेम, समानता, धार्मिक सहिष्णुता, युद्धविषयी नीती, जनावरांवर कृपा व करुणा इ. शीर्षकांखाली सविस्तर विवरण आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 241     -पृष्ठे - 116 मूल्य - 50  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/64qu15zrb2rs6su88sqq2va8naxt0ykr









प्रकाशाचे महत्त्व काय? हे अंधार झाल्यावर कळते. अंधार पडायला लागला की जीवनाची गती कमी होऊन जवळपास थांबते. लाईट गेल्यावर पेटवलेली एक काडीसुद्धा किती उपयोगाची हे आपल्याला माहित आहे. प्रकाश नसेल तर कित्येकदा गंभीर प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अंधारात तर पानांची नुस्ती सळसळ ऐकूनच भीती वाटते. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या गंभीर स्वरूपाची असते. पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखल पसरलेला असतो. अशा रस्त्यावरून दिवसाही चालणे तसे कठीणच असते मात्र अंधाऱ्या रात्री पाण्यातून, चिखलातून वाट कशी काढावी ते सूचत नाही.  पुढेही जाता येत नाही अन् मागेही वळता येत नाही. काय करावं ते कळत नाही.

  मनात प्रकाशाचा अभाव असल्यावर पत्नीच्या फक्त वाईट सवयी दिसतात आणि मन प्रकाशमय असेल तर पत्नीने न बोलताही तिच्या डोळयातल्या भावना, संवेदना पतीला दिसू लागतात. मग तो वैतागुन, भडकून तक्रार करत नाही की, " मी जसं सांगतो तसं तू करत नाही आणि काय करावं ते स्पष्ट बोलतही नाही. खूप टेन्शन देतेस तु ". दुसरीकडे बायकोला आपल्या अधिकारांची मर्यादा दिसत नाही. मग तिची कुरकुर सुरू होते. " घरात माझं काही चालतं का? मी बोलते तसं करता का कधी तुम्ही? आणि स्पष्ट बोलून काय करू? तुमचा पारा चढतो अन घर डोक्यावर घेतात. आई-वडील तक्रार करत असतात की " काय झालं या पिढीला ते कळतच नाही हो! आजकालची पोरं ऐकतच नाही. आमच्या काळात बघा कसं होतं." असं बोलताना आई-वडिलांना हे दिसत नाही की, कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण मुलांना नैतिक शिक्षण देण्यात, त्यांच्यावर संस्कार करण्यात आपण किती मागे पडलो.

मग अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? जेणेकरून अंधारं दूर होतील. आणि माणसांचा जीवन प्रवास सुखद आणि आनंददायी बनेल?

कुरआनातील अध्याय नंबर 14 ज्याचे नाव सूरह इब्राहीम आहे त्यातील पहिल्या आयतीचा अर्थ आहे, 

अलीफ लाम रा. (हे पैगंबर) हा एक ग्रंथ आहे, जो आम्ही तुमच्यावर अवतरित केला आहे. (कशासाठी?) अशासाठी की तुम्ही तुमच्या पालनकर्त्याच्या हुकुमाने लोकांना अंधःकारातून बाहेर काढून प्रकाशात आणावे. त्याच्या मार्गावर जो प्रभावशालीही आहे,गुण वैशिष्ट्यांनीही युक्त आहे.

हा आहे तो महान उद्देश ज्याकरिता पवित्र कुरआन अवतरित केले गेले. म्हणजे लोकांना काल्पनिक श्रद्धा आणि दुराचाराच्या दाट अंधकारातून बाहेर काढावे आणि खरी श्रध्दा व विश्वासाच्या आणि सदाचाराच्या तेजस्वी प्रकाशात आणावे.

या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. खरी श्रध्दा आणि विश्वास कुणावर ठेवलं पाहिजे? उत्तर अगदी सोपं आहे. माणसाने कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्विकारू नये. आपल्या विवेकबुद्धीने तपासूनच श्रद्धा ठेवावी, पण कुणावर?

प्रत्येक अशा प्रसंगाची आठवण करा जेंव्हा आपण मोठ्या संकटात, अडचणीत सापडतो. किंवा आपला जीव धोक्यात येतो, किंवा आपल्या जवळची एखादी व्यक्ती जेंव्हा अंतिम घटका मोजत असते आणि भले भले डॉक्टरही जिथे हात टेकतात. जेंव्हा सगळे पीर, अवलीया, देवी-देवतांना हाका मारूनही काही उपयोग होत नाही. तेंव्हा आपोआप कुणाला मदतीसाठी हाक मारतो? "हे ईश्वरा!, Oh God!, या अल्लाह! आपण आपल्या सर्वशक्तिमान ईश्वराला स्मरण करून याचना करू लागतो. अशा वेळी फक्त आस्तिकच नाही तर नास्तिकही भयभीत होऊन नम्र बनतो. 

जीवन सुरळीत चालू असेपर्यंत माणसाला आपले ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्याचा फाजील गर्व वाटत असतो पण एकूण संपत्ती, सामर्थ्य, सर्व साधनं, माध्यमं निकामी ठरल्यावर स्वाभाविकपणे त्याच्या तोंडातून निघते की " हे ईश्वरा ! हे अल्लाह! दया कर. तूच रक्षणकर्ता आहे. तूच संकटमोचक आहे. दुःखहर्ताही तूच आणि सुखकर्ताही तूच आहे. त्यावेळी महत्त्वपूर्ण बाब ही असते की अशा प्रत्येक प्रसंगी माणूस त्या सर्वांना विसरतो, ज्यांना ईशकृपेमध्ये सहभागी समजून आत्तापर्यंत ज्यांची भक्ती केली. आणि ज्यांच्या समोर नतमस्तक होत राहिला. 

अशा प्रसंगी प्रार्थना करताना माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर जो साऱ्या जगांचा पालनकर्ता, स्वामी आहे. अशा वेळी माणूस कोणत्याही पीर- अवलीयाकडे मदतीची याचना करत नाही. कोणत्याही देवीदेवताची, संताची त्याला आठवण येत नाही, किंवा ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही शक्तीकडे, वस्तूकडे माणूस धाव घेत नाही. माणसाच्या ध्यानीमनी फक्त ईश्वर असतो. एकमेव ईश्वर, अल्लाह जो साऱ्या जगांचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, स्वामी, शासक आहे. पण ईश्वर जेंव्हा त्याला संकटातून मुक्त करतो तेव्हा माणूस मागील सर्वकाही विसरून परत आपल्या शक्ती-सामर्थ्यांचा गर्व करू लागतो. पुन्हा त्याला उन्माद चढतो. ईश्वराच्या मर्जीविरुद्ध, आदेशांविरूध्द द्रोह करू लागतो. ईश्र्वराचे उपकार विसरून जेंव्हा माणूस कृतघ्न बनतो तेंव्हा त्याच्या मनात पुन्हा अहंकार भरण्यास सुरुवात होते आणि लोभ, द्वेष, ईर्ष्या, निराशा यासारखे रोग त्याच्या मनाचा ताबा घेतात.

मनाची अवस्था ही खुल्या मैदानात पडलेल्या लहानशा तिनक्यासारखी असते. ज्याला वारा इकडून तिकडे हेलकावे देत असतो. एका अवस्थेत राहूच देत नाही. म्हणूनच आपल्या आसपास किंवा जगामध्ये जे काही घडतं, त्याचा प्रभाव मनावर पडत असतो. मग अशा स्थितीत आपण काय करावं? जेणेकरून आपले मन निरोगी राहील. याचे उत्तर कुरआनच्या आयतीमध्ये मिळते. अध्याय नंबर 64 सूरह अत-तगाबूनच्या 11व्या आयतीत सांगितले गेले आहे. 

" जो कोणी अल्लाहवर श्रद्धा ठेवतो, अल्लाह त्याच्या मनाला मार्गदर्शन करतो " (64/11)

म्हणजे त्याच्या मनाला भटकंतीसाठी सोडत नाही. आणि सूरह नंबर 65 अत-तलाकच्या तिसऱ्या आयतीत सांगितले गेले आहे.

"जो कोणी अल्लाहवर विश्वास ठेवेल अल्लाह त्याच्यासाठी पुरेसा आहे " (65/3)

एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण त्या एकमेव ईश्वरा खेरीज अन्य कोणीही करू शकत नाही म्हणून तो संकटासमोर, कठीण परिस्थिती समोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो. एकेश्वरवादीच्या मनात फक्त अल्लाहचे भय असते, म्हणूनच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय निघून जातात.  तो हा विचार करतो की नफा-नुकसान सर्वकाही अल्लाहने निर्धारित केलेले आहे मग लबाडी का करावी? म्हणून तो कुणाला धोका देत नाही. आणि कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवत नाही. एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणारा माणूस भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण हातावर हात धरून बसत नाही. तर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. मग कितीही अपयश आले तरीही तो हाच विचार करतो की जे काही घडलं ते अल्लाहने निर्धारित केलेल्या भाग्यानुसारच घडलं. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. या अपयशातही जरूर माझ्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी भलाईचा पैलू असेल. मी आणखीन प्रयत्न करेन पण खचून जाणार नाही आणि निराशही होणार नाही. एकेश्वरवादीचा हाच विश्वास आणि एकमेव ईश्वर, अल्लाहवर असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मग मोठमोठ्या संकटातून, दुःखातून, आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला दिसू लागतात. म्हणूनच तर खरा एकेश्वरवादी कधीही आत्महत्येचा करत नाही.

बंधू आणि भगिनींनो, कुरआन हा ग्रंथ जसे एका व्यक्तीला अंधकारातून बाहेर काढतो आणि प्रकाशात आणत़ो, तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कुरआन प्रकाशमय मार्ग दाखवतो. कौटुंबिक वाद का निर्माण होतात? पती म्हणतो " घरात माझी सत्ता चालेल! " तर पत्नी म्हणते " मी म्हणेन ती पूर्व दिशा ! " पती पत्नीचे हक्क काय? दोघांचे अधिकार किती? आणि मुख्य म्हणजे दोघांची कर्तव्ये कोणकोणती? हे जाणून न घेता प्रत्येक जण हक्कांच्या नावावर लढतोय पण कर्तव्यांचं काय? अल्लाह जो नवरा-बायको दोघांचा निर्माणकर्ता आहे, जो दोघांचा शुभचिंतक आहे, जो दोघांवर प्रेम करतो. त्याचे मार्गदर्शन घेऊन सुखानं संसार करण्याची गरज वाटत नाही का? 

अल्लाहने आपल्या लाडक्या मेसेंजरला 'उज्ज्वल दिवा' का म्हटले आहे?. कारण मूहम्मद (स) साहेबांच्या चरित्रात अंधारामध्ये भटकणाऱ्या जगाला लख्ख दिसणारी प्रकाशवाट मिळाली. ज्ञानाचा प्रकाश उजळल्याने मनातील अंधार दूर करणे सोपे झाले. ज्ञानाचा प्रकाश उजळला. पैगंबर साहेबांनी जगासमोर विश्व रहस्यांचा आणि नैसर्गिक घटनांचा स्पष्ट सिद्धांत मांडला. ईश्वरावर श्रध्दा आणि विश्वासाचे स्वरूप कसे असावे हे पटवून दिले. मनुष्य आणि ही सृष्टी यांच्यातील संबंध काय? आणि ती कोणती 'मुल्ये' आहेत? ज्यांच्या आधारे ही सृष्टी टिकलेली आहे हे स्पष्ट केले. या सृष्टीत माणसाचे स्थान काय? त्याच्या जगण्याचा उद्देश काय? हे निदर्शनास आणले. माणसांच्या खऱ्या गरजा कोणत्या?  आणि त्या कशा प्राप्त कराव्यात? ह्या बाबतीत मार्ग निश्चित केले. कठीण आणि अत्यंत गुंतागुंतीच्या समस्यांना आणि जीवनात येणाऱ्या चढ उतारांना कसं सामोरं जावं हे शिकवले. आणि तेही अगदी स्पष्ट भाषेत आणि स्वाभाविक शैलीत, अशा प्रकारे की माणसाच्या मनात खोलवर जाऊन रुजतात.

आदरणीय अंतिम प्रेषित साहेबांची शिकवण कयामत येईपर्यंत म्हणजे न्यायाच्या दिवसापर्यंत जगातील प्रत्येक मानवासाठी, प्रत्येक देशासाठी आणि प्रत्येक काळासाठी एक उज्ज्वल दिव्याप्रमाणे आहे. त्यांच्यामुळेच अंधारात भटकणाऱ्या जगाला सुविधापुर्ण आणि सुरक्षित मार्ग मिळाला. ज्याचा सुखद अनुभव आजही त्या मार्गाने जाणाऱ्यांना होतो. पण त्यांनी दिलेल्या शिकवणीकडे जर दुर्लक्ष केले तर निश्चितच मानवतेला अंधारातच भटकावे लागेल. हा स्पष्ट संदेश सर्वप्रथम आम्ही आमच्या मुस्लिम बांधवांना देतो. स्वतःला मूहम्मद (स) साहेबांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या प्रत्येक मुस्लिम बांधवाला आम्ही नेहमीच अपील करतो की त्याने कुरआन व हदीसनूसार आपले जीवन व्यतीत करावे. आणि स्वतः दिव्यासारखे बनून जगात पसरलेल्या अंधकारांना मिटवण्यासाठी, दृढनिश्चयाने प्रामाणिक प्रयत्न करावे.

अंधारातून प्रकाशाकडे यायचं असेल, तर सैतानी मार्ग, ईशद्रोहाचे मार्ग सोडावे लागतात. ईश्वराने प्रत्येकाला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतच राहावं लागतं. शिरजोरी करता येत नाही. अधिकारांचा गैरवापर न करता सदुपयोग कसा होईल हे बघावं लागतं. दंडेलशाही, इच्छाभक्ति सोडून मनमानीला आळा घालावा लागतो. हे मान्य नसेल तर भटकण्याशिवाय पर्याय नाही.रस्त्यावरून गाडी चालवताना कोणता मार्ग योग्य? आणि कोणता धोकादायक यासंबंधी स्पष्ट इशारा देणारे बोर्ड समोर असूनही जर माणूस बेफिकीरीने जात असेल तर पुढे अडचणीच्या वाटा तर येणारच. लुटमारही होऊ शकते आणि अपघातही होतात. 

मरणोत्तर जीवनात कयामतच्या दिवशी जेंव्हा संपूर्ण मानवजातीला अल्लाहच्या न्यायालयात हजर केले जाईल. जिथे प्रत्येक माणसाला आपल्या कर्मांचा जाब द्यायचा आहे. त्यावेळी मृत्यू येईपर्यंत जो अनेकेश्वरवादीच राहीला, त्याला माफी नाही. त्याच्याशिवाय अल्लाह आपल्या कृपादृष्टीने ज्या ज्या माणसांच्या एकंदरीत कामगिरीवर प्रसन्न होऊन, त्यांच्या अपराधांना दुर्लक्ष करून क्षमा करेल आणि स्वर्गात दाखला देईल, ते आहेत यशस्वी लोकं. अल्लाहचा प्रकोप आणि नरकाग्निपासून जे सूटतील ते आहेत खरी सफलता प्राप्त करणारे. सर्व प्रेषितांनी वास्तविक मुक्ती यालाच म्हटले आहे.

पहिलं काम आहे श्रद्धा :- संपूर्ण सृष्टीचा निर्माणकर्ता, मालक, पालक असलेल्या अल्लाहवर त्या एकमेव ईश्वरावर श्रद्धा ठेवावी. त्याच्या अस्तित्वात आणि गुणांमध्ये कुणालाही भागीदार ठरवू नये. अनेक ईश्वरांची कल्पना करून त्यांची भक्ती करणाऱ्याला माफ केले जाणार नाही. हे खुद्द ईश्वराने कुरआनमध्ये म्हटले आहे.

 दुसरे आहे सत्कर्म :- दुराचार सोडून सदाचाराचा मार्ग धरावा. प्रत्येकाला त्याचे हक्क द्यावे आणि आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडावीत.

तिसरे :- आपण स्वतःसाठी जो श्रद्धा आणि सदाचाराचा मार्ग निवडला त्याची शिकवण, उपदेश एकमेकाला करत राहणे. एकमेकांच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे. वाईट गोष्टींना किमान मनात तरी वाईटच समजावे, आणि ते मिटवण्याकरता प्रयत्न करत राहावे. जास्त मागे न जाता फक्त या शंभर वर्षांचा इतिहास बघा. स्वार्थापोटी लाखो निरपराध माणसं युद्ध ,दंगली आणि इतर भेदभावाच्या नावावर मारली गेली. 'मुलगी नको' असे म्हणत गर्भावस्थेत कित्येक जीव घेतले गेले. याविरोधात किती लोकांनी आवाज उठवला? जाणीवपूर्वक किती प्रयत्न केले?  कित्येक महिला आणि निरागस मुला-मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला.पण लोकं आपापल्या दूनीयेत मग्न. जणु काही शेजारच्या घराला लागलेली आग माझ्या घरापर्यंत पोहोचणार नाही. 

आणि चौथे :- हे की, ही वाटचाल करताना आपल्यावर कितीही संकटे आली, कसल्याही अडचणी निर्माण झाल्या,  कितीही कष्टांना तोंड द्यावे लागले आणि कोणताही त्याग करावा लागला तरी त्यासाठी लागणारी सहनशीलता, धैर्य, आणि संयम आपल्या अंगी बाळगणे.

आपण प्रार्थना करू या की हे अल्लाह! तू प्रसन्न होईल अशा मार्गावर चालण्याची आम्हाला शक्ती दे. आमीन

- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636  औरंगाबाद.



माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन ‘रकअत’ फङ्का (प्रात:काळ) जग आणि जे काही त्यात आहे, त्यापेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

एक हदीस कथनात आले आहे की ‘दोन रकअत’विषयी पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘ते मला समस्त जगापेक्षा आणि भौतिक संसाधनांपेक्षा अधिक प्रिय आहे.’’


माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर मी ‘सुबहानल्लाही वलहम्दुलिल्लाही वलाइलाहा इल्लल्लाहु वलाहु अकबर’ म्हटले तर हे मला जगातील त्या सर्व संसाधनांपेक्षा प्रिय आहे ज्यावर सूर्य उगतो.’’(हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

हे शब्द जे पैगंबर मुहम्मद (स.) यांना सर्वांपेक्षा प्रिय आहेत त्यांचा अर्थ ‘‘महानता अल्लाहसाठीच आहे. सर्व स्तुती अल्लाहसाठीच आहे आणि अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य (पूजनीय) नाही. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे.’’

शंका : पवित्र कुरआनमध्ये कठोरता आणि क्रूरतेची शिकवण मिळते. विरोधकांसाठी कसलीही सहानुभूति आणि सहनशीलता अथवा उदारतेची शिकवण नाही.

जगातील कोणताही ग्रंथ अथवा कोणत्याही व्यक्तीचे व्याख्यान त्यातील संदर्भाला व प्रसंगाला वगळून नवीन संदर्भ व प्रसंग आपल्याकडून टाकून अध्ययन केले तर कधीही त्याचा योग्य अर्थ समजणार नाही. प्रत्येक गोष्टीबाबत मनाप्रमाणे आक्षेप व आरोप ठेवले जाऊ शकतात. कुरआनचा विरोध करणारे लोक आरंभिक काळापासून दुव्र्यवहार करीत व विक्षिप्त प्रदर्शन करीत होते. हे कार्य आजही सुरु आहे व भविष्यातही असे होत राहील, याची खात्री वाटते. याचे निराकरण करण्याकरिता सर्वोत्तम उपाय हा आहे, की एकदा संपूर्ण कुरआनचे अध्ययन केले जावे. म्हणजे आरोपाची वास्तविकता कळेल. कुरआनमधील उदारता आणि कठोरता याचे सर्व संदर्भांचे निरीक्षण केले जावे. वास्तविकता स्पष्टपणे कळेल.

कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे. त्याचा हेतू संपूर्ण मानव जातीला मार्गदर्शक व कल्याणकारी आहे. पूर्ण मानवजात अल्लाहच्या परिवारासारखी आहे. त्याने निर्माण केल्याकारणाने त्याला मानवाप्रति प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याने निर्मित केलेल्या सर्व निर्मिती न्यायावर आधारित आहेत. मग तो स्वत: अन्यायचा वाहक कसा होऊ शकतो?

तुम्ही स्वत: या बाबीवर विचार करावा की न्याय व अन्यायाच्या कल्पनेला काय प्रमाण आहे? मानवाला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून चांगल्या आणि वाईट मार्गापैकी कोणा एकाचा स्वीकार करावा लागेल. या प्रकारे प्रत्येक काळात आपल्या वागण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक चांगले असतात, तर काही वाईट. काय समाजाने या दोन्ही प्रकारच्या माणसांना समान दर्जा दिला आहे? दोघांना समान लेखणे म्हणजेच अन्याय होय. वाईट माणसांना त्यांच्या वाईटपणापासून दूर करणे व त्यांना चांगला व हिताचा मार्ग दाखविणे हे माणसाचे कर्तव्य आहे. वाईट माणसे आपल्या आचरणात सुधारणा करीत नसतील तर समाजाला वाचविण्यासाठी त्यांना शिक्षेची, दंडाची तरतूद आहे. न्यायालय व तुरूंगाचे अस्तित्त्व याचकरिता आहे की समाजात न्याय व शांती प्रस्थपित व्हावी.

कुरआनने वाईट लोकांना त्यांची दुष्टता सोडण्यासाठी आणि माणुसकी साधण्यासाठी शिक्षा-दीक्षा, विचार-विनिमय, सुधारासाठी दीर्घकाळ मुदत, क्षमायाचना इत्यादी व्यवस्था केलेल्या आहेत. तरीपण वैयक्तिक व वैचारिक क्षेत्रांत जर ते ऐकत नसतील तर ``तुमचा मार्ग मोकळा'' म्हणून समाजापासून अलिप्त होण्याची तरतूद आहे, त्यांच्या दुष्टपणाची फळे त्यांना दाखवून दिली की काय लाभदायक आहे व काय हानीहारक. या जगातच निवाडा होण्यापूर्वी त्यांना संधी दिली गेली आहे की त्यांनी त्यांचा कार्यकाळ पुरा करावा. न्यायाचा एक दिवस निश्चित आहे. तेथे त्यांच्या कर्माची फळे व भरपूर बदला मिळेल. याप्रकारे प्रत्येक बाबतीत निपटारा करण्यासाठी कुरआन शिकवण देत आहे. ही सगळी शिकवण सहानशीलतेच्या परिसीमेचे द्योतक आहे.

दुसरा दृष्टिकोन असा की कुरआन या गोष्टीची शिकवण देत आहे की एखादी व्यक्ती अथवा समूह पूर्णपणे वाईट आचरणापासून दूर जात नाही आणि थोडा भलेपणा त्याच्याजवळ आहे तर तेवढ्यापुरताच त्याला सहयोग करावा. त्याला उदारता आणि सहानुभूती नाही तर काय म्हणणार?

कुरआनच्या नजरेत सर्व माणसे समान आहेत. वर्ण, वंश, भाषा, प्रदेश यासारख्या विविध बाबींमुळे मानवाच्या दरम्यान एकता व सहिष्णुतेसाठी बाधक मानीत नाही. परिस्थितीनुसार स्वभाविक गुण दाखवून एका आई-बापाची संतानच्या रूपात परिचय देत परस्पर भाऊ-भाऊ म्हणून जोडले. कोणत्याही व्यक्तीबाबत घृणा, भेदभाव वर्णभेद करणे म्हणजे अपराध होय, असे कुरआन सांगतो. अल्लाहजवळ सर्वश्रेष्ठ तो आहे जो निष्ठावान, प्रार्थना करणारा व अल्लाहचे भय बाळगणारा आहे. जो सदाचारी आहे, दुष्कर्मापासून दूर आहे, दुसऱ्यांच्या हितासाठी आपले सर्वकाही त्याग करतो, चांगल्या कामात सहकार्य करतो आणि लोकांना अडचणींतून काढतो तो अल्लाहला आवडतो. कुरआनचे आदेश सर्वांसाठी व्यापक आहेत. त्यात पक्षपात व संकीर्णता नाही. काही उदाहरणे येथे देण्यात येत आहेत.

``जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका.''

``हे पैगंबर (स.)! सांगा हे ग्रंथधारकांनो, ऐका अशा बाबीकडे जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान समान आहे, हे की आपण अल्लाहशिवाय कोणाचीही भक्ती करू नये, त्याच्याबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये.'' (दिव्य कुरआन - ३ : ६४)

``धर्माच्या बाबतीत कोणतीही जोर जबरदस्ती नाही सत्य, असत्यापासून वेगळे

केले गेले आहे.'' (दिव्य कुरआन - २ : २५६)

``आम्ही त्याला मार्ग दाखविला, मग त्याने कृतज्ञ बनावे अथवा द्रोह करणारा.'' (दिव्य कुरआन ७६ : ३)

``हा तर एक उपदेश आहे. आता ज्याची इच्छा असेल त्याने यापासून धडा घ्यावा.'' (दिव्य कुरआन - ७४ : ५४-५५)

``स्पष्ट सांगून टाका, हे सत्य आहे तुमच्या पालनकर्त्याकडून, आता ज्याची इच्छा असेल मान्य करावे आणि ज्याची इच्छा असेल त्याने नाकारावे.''

(दिव्य कुरआन - १८ : २९)

``जो कोणी सत्कृत्ये करील, स्वत:साठीच करील आणि जो वाईट करील तो स्वत: त्याचे दुष्परिणाम भोगेल. नंतर जायचे तर सर्वांना आपल्या पालनकर्त्याकडेच आहे.'' (दिव्य कुरआन - ४५ : १५)

``जर तुझ्या पालनकर्त्याची इच्छा अशी नसती (की पृथ्वी तलावर सर्व ईमानधारक  व आज्ञाधारक असावेत.) तर सर्व भूतलवासियांनी श्रद्धा ठेवली असती. मग तू लोकांना भाग पाडशील का की ते ईमानधारक  बनतील?''

(दिव्य कुरआन १० : ९९)

टीप : जेव्हा अल्लाहने लोकांना विवश केले नाही तुम्ही कोण विवश करणारे?स्वत:च्या इच्छेने स्वीकारलेली श्रद्धाच (ईमान) लाभदायी आहे. वैचारिक स्वातंत्र्य हीच तर परीक्षा आहे. विवशतेत परीक्षा समाप्त होईल. तेव्हा पुरस्कार अथवा दंड निरर्थक होईल.

कुरआनात अल्लाहने जे युद्धाचे आदेश दिलेले आहेत ते काही वैचारिक मतभेदांसाठी अथवा सांप्रादायिक द्वेषापोटी नाही. धरतीवर पसरलेल्या अत्याचाराविरुद्ध, अशांती व उपद्रवाला समाप्त करण्यासाठी, पीडितांना स्वतंत्र करण्यासाठी, आतताई दुष्ट लोकांपासून सुटका करण्यासाठी कुरआन मध्ये आले आहे.

``मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष स्त्रीया आणि मुलांकरिता लढू नये ज्यांचे दुर्बल असल्यामुळे दमन केले गेले आणि धावा करीत आहेत की हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहाय्यक निर्माण कर.''

(दिव्य कुरआन - ४ : ७५)

``आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाही.''

(दिव्य कुरआन - २ : १९०)

``काय तुम्ही लढणार नाहीत अशा लोकांशी जे आपल्या प्रतिज्ञा भंग करीत राहिले

व ज्यांनी पैगंबराला देशातून काढून टाकण्याचा निश्चय केला होता व अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते. तुम्ही त्यांना भिता काय? जर तुम्ही ईमानधारक असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पात्र आहे की तुम्ही त्याची भिती बाळगावी.''

(दिव्य कुरआन - ९ : १३)

कुरआनद्वारा प्रस्तावित ही युद्धे ज्या कारणाकरिता लढली गेलीत ती कारणे व सबब महत्त्वपूर्ण होते. मानवाच्या हितासाठी व धरतीवरील बिघाड दूर करण्यासाठी ती युद्धे लढली गेली, ती अभिशाप नव्हती परंतु मानवकल्याणासाठी ती वरदान होती. यामुळेच अल्लाहने जगातील मानवासाठी ती त्याची कृपा व दान ठरविले.

``जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवीत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती. परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की, (अशा तऱ्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)'' (दिव्य कुरआन - २ : २५१)

कुरआनचे असेही आदेश आहेत की, विरोधी मत असणारे शांती भंग करणार नाहीत व अत्याचार करणार नाहीत व मानवी सीमेचे उल्लंघन करणार नाहीत तर अशा लोकांबरोबर मनापासून व मोकळेपणाने कल्याणकारी व्यवहार करावा. निरपराधी लोकांवर अन्याय केला जाऊ नये. आणि मानवाच्या गौरवाचे रक्षण केले जावे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget