Latest Post


माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘माझ्या साथीदारांपैकी कोणी माझ्यापर्यंत कोणासंबंधी वाईट गोष्टीला सांगू नये कारण मला माझे मन साफ असलेले आवडेल जेव्हा मी तुमच्याजवळ येईन.’’

(हदीस : अबू  दाऊद)


स्पष्टीकरण

म्हणजे कोणी माझ्याजवळ दुसऱ्याविषयी वाईट बोलून माझ्या मनात गैरसमज निर्माण करू नये. एखाद्या साथीदारात तुम्हाला कमतरता आढळल्यास सहानुभूती व भले कृत्य हे असावे की त्याला एकांतात त्याविषयी सांगावे. त्याच्यातील वाईटाचा प्रचार करू नये. मी तुमच्याशी भेटलो तर कोणाविषयी माझ्या मनात नाराजीची भावना नसावी, हेच मला प्रिय आहे.

एखाद्याच्या मामल्यास वाढविणे आणि त्यास जबाबदार लोकांपुढे मांडण्याचा मामला सर्वांत शेवटचा आहे. जेव्हा सुधारणा करण्याचे सर्व प्रयत्न संपुष्टात आले असतील आणि मामलासुद्धा असा असेल की त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखाद्या मोठ्या बिघाडाची व धोक्याची शंका असेल.



लेखक - न्या. एस. ए. रहमान

भाषांतर - मुहम्मद शफी अन्सारी

इस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीविधाता आहे. या पुस्तिकेत कायद्याशी अभिप्रेत मदीना येथील ते सर्वकष व आवश्यक कायदे आहेत ज्यांचे पालन सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक आहे.

या पुस्तिकेत कायद्याचा अर्थ, कुरआनी कायद्याचे वैशिष्ट्य, कायदेशीर स्वरुपाची हदीस वचनं, वचन-कराराचे पालन, शासकाचे गुणविशेष, व्याजाची मनाई, भेदभाव विरहीत व्यवस्था व कसोटीपूर्ण स्वातंत्र्य इ. विषय चर्चिले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 245     -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s2knhedl313i6vcbacktz7o3myyo0u7y





हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन  त्यांच्याशी   लढत  देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु  उबैदा  यांना  पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल   खचले  आहे.  जर  आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि  मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये  अरबांसारखे  साधेपण  गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर  यांना  ही    अवस्था  पाहून  राग  आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात   घेऊन   त्यांच्या   दिशेने  भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?

जाबिया या ठिकाणी  बराच  काळ  ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे   निघाले.  त्यांच्या  घोड्याचे  नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि  पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या  स्वागतासाठी  पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.

(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी) 

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


 


माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी तर अल्लाहचा एक दास आहे. म्हणून तुम्ही मला अल्लाहचा दास आणि अल्लाहचा पैगंबर म्हणत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘पदप्रतिष्ठेतील अंतराला दृष्टीसमोर ठेवून असणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक आपल्या थोरांची प्रशंसा करण्यात अतिशयोक्ती करतात. याच कारणाने ईसा मसीह (अ.) यांच्या अनुयायींनी ईसा मसीह (अ.) यांना ईशपुत्र घोषित करून टाकले, आणि भक्तीच्या (बंदगी) पंक्तीत प्रेषित्वाला सामील केले. यहुदी (ज्यू) लोकांनी आदरणीय उजैर (अ.) यांना ईश्वरपुत्र म्हटले. खरे तर ईश्वराच्या ईशत्वात कोणीही भागीदार बनू शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांनी त्यांची प्रशंसा करताना अतिशयोक्तीने काम घेण्यास रोखले.  साक्षवचन (कलमे शहादत) अर्थात ‘‘मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य नाही. तो एकमेव आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहे.’’ या वाक्यातील शब्द ‘अब्दुहु व रसूलुहु’ (त्याचे दास व त्याचे पैगंबर) निरंतर स्मरण करून देतात की पैगंबर व रसूल अल्लाहचा एक दास असतो जरी ते श्रेष्ठत्व व पूर्णत्वप्राप्त व्यक्ती असतात. अशा प्रकारे इस्लामने अनेकेश्वरत्वाला समूळ नष्टकेले आहे.


लेखक - जैनुल आबेदिन मन्सुरी

भाषांतर - एम. हुसेन गुरूजी

या पुस्तिकेत पैगंबर येशु आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या ख्रिस्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशु आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक आहेत.

कुरआनात येशुविषयी एकूण तीस आयतींचा उल्लेख त्यांचा अलौकिक जन्म, दर्जा, विशेष धर्मकार्य व धर्मप्रसाराचे वर्णन आहे. येशुची जन्मदाती मेरी अन्य पैगंबरांच्या मातेहून सर्वथा भिन्न आहे, हे सत्य उलगडण्यात आले आहे. या पुस्तिकेमुळे अभ्यासकाची शोधवृत्ती अवश्य परिपूर्ण होईल, असा लेखकाचा दृढविश्वास आहे.  

आयएमपीटी अ.क्र. 244   -पृष्ठे - 53     मूल्य -28   आवृत्ती-1(2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3123q18tzuaxctl1uaa3j47comw9nfg6



मजबूत समाज हे मजबूत कुटुंबाच्या समुच्चयाचे नाव आहे. मजबूत कुटुंब मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत लोकांमुळे बनते आणि असे लोक ईशपारायणतेच्या माध्यमातून घडतात. जगात असे कुठेच आणि कधीच घडले नाही की मजबूत समाज हा व्यसनाने पोखरलेल्या दुराचारी लोकांमुळे अस्तित्वात आला. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वाखाली सातव्या शतकात जरूर एक मजबूत समाज अस्तित्वात आला होता. पण त्यांच्यानंतर हळूहळू तो समाज लोप पावत गेला. परंतु, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या प्रक्रियेद्वारे अरबांसारख्या रानटी समाजाचे रूपांतरण नैतिकदृष्ट्या मजबूत समाजात केले होत. ती प्रक्रिया शरीयतच्या रूपाने आज देखील अस्तित्वात आहे. स्वतः मुस्लिम समाज बऱ्यापैकी शरियतवर आचरण करत असल्यामुळे त्यांची कुटुंब व्यवस्था इतरांच्या तुलनेत मजबूत आहेत. म्हणूनच की काय मुस्लिम तरूण-तरूणी यांच्यामध्ये आत्महत्येसारख्या आत्मघाती कृत्यापासून ते व्यसनाधिनतेचे व अश्लिलतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

मात्र अलिकडे प्रगतीच्या नावाखाली जो काही भौतिकवाद समाजामध्ये बोकाळत चाललेला आहे त्यातून स्वार्थी समाज आकारात आलेला आहे. कुटुंबाचे अस्तित्व संकटात सापडलेले आहे. कुटुंबाला पर्याय म्हणून लीव इन रिलेशनशिपसारखी स्त्रियांवर अत्याचार करणारी अनैतिक पद्धत मोठ्या शहरात सुरू झालेली आहे. नव्हे रूढ झालेली आहे. पण ही पद्धत मजबूत कुटुंब तर सोडा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या नात्याला सुरक्षासुद्धा पुरविण्यास सक्षम नाही. इस्लामच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे जबाबदारी, नात्यांचे रक्षण होय. म्हणूनच शरियतने वैध लग्नाशिवाय इतर पद्धतीने अस्तित्वात येणाऱ्या कुटुंबांना निषिद्ध ठरविलेले आहे. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत अस्लम गाझी यांच्या मते मानवसमाजाचे सर्वांग सुंदर चित्र कुटुंबाच्या परिघामध्ये दिसून येते. यात पती-पत्नीचे एकमेकावरचे प्रेम, आई-वडिलांची कृपा, धाकट्यांवर प्रेम, मोठ्यांचा सन्मान, कुटुंबातील विवश किंवा दिव्यांग लोकांची मदत, वृद्धांचा आधार, अडी-अडचणींमध्ये एकमेकांच्या कामाला येणे, सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, आनंद आणि दुःखाच्या क्षणात एकत्र गोळा होणे. थोडक्यात असे कुटुंब म्हणजे छोटा समाजच असतो. हा छोटा समाज जेवढा मजबूत आणि सुंदर असतो तेवढाच मोठ्या समाजासाठी उपयोगी आणि मदतीचा असतो. मानवी गरजा ह्या झुंडीतून पूर्ण होत नाहीत. त्यांना पूर्ण करण्यासाठी पावलो-पावली नातेवाईकांची गरज पडते. आणि मजबूत कुटुंबातूनच मजबूत नाती निर्माण होतात. ज्याप्रमाणे वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या क्षमतेचा कस लागतो तसाच संकटाच्या समयी कुटुंबातील सदस्यांचा कस लागतो. कुटुंब मजबूत असेल तरच एकमेकाच्या सहकार्याने कुटुंबातील सदस्य त्या संकटावर मात करतात. नाती ही माणसाची मुलभूत गरज आणि अधिकार दोन्ही आहेत. ते आनंद आणि दुःख दोन्ही समयी उपयोगाला येतात. मात्र अलिकडे कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असतांना पाहतांना दुःख होते. 

ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळांपासून तुटल्यावर वाळून जाते त्याचप्रमाणे कुटुंबाचे सदस्य कुठल्याही कारणांमुळे कुटुंबापासून लांब गेल्यामुळे वाया जाण्याची शक्यता वाढते. आज अनेक तरूण मुलं-मुली उच्च शिक्षणाच्या निमित्ताने आपले कुटुंब सोडून मोठ्या शहरात किंवा विदेशामध्ये राहतात. तेथे त्यांच्यावर कुटुंबाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा मुलां-मुलींचे पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. कुटुंब हे समाजाचे मूळ घटक आहे म्हणून होता होईल तितके हे मजबूत कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. 

’’आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली,निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (सुरे अर्रूम : आयत नं. 21)

कोणत्याही श्रद्धावान कुटुंबाची सुरूवात एका मुलाच्या लग्नाच्या प्रस्तावाला एका मुलीने होकार दिल्याने होते. या प्रक्रियेद्वारे दोन कुटुंब एकत्र येतात आणि तिसऱ्या एका नवीन कुटुंबाची पायाभरणी होते. इस्लाममध्ये लग्नाची आवश्यकता पतीने पत्नीपासून संतोष प्राप्त करावा, या प्राथमिक हेतूने केलेली आहे. ज्याचे संकेत वर नमूद आयातीमध्ये दिलेले आहेत. याशिवाय, मानव वंशाचा विस्तार कुटुंब व्यवस्थेतून अपेक्षित आहे. वर नमूद आयातीमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेम आणि करूणा ही ईश्वरीय देणगी आहे. या मजबूत पायावर एका नवीन कुटुंबाची सुरूवात होते आणि लवकरच त्या कुटुंबामध्ये मुलांच्या स्वरूपात नवीन सदस्यांचा प्रवेश होतो. सुरूवातीला दोघांवर आधारित असलेले कुटुंब पुढे विस्तारत जाते आणि स्वतंत्र कुटुंबाचे स्वरूप धारण करते. या कुटुंबातून चांगले चारित्र्यवान आणि सभ्य स्त्री-पुरूष निर्माण होणे आवश्यक असते, असे तेव्हाच शक्य असते जेव्हा कुटुंब नावाची ही प्राथमिक ईकाई ही मजबूत तर समाज मजबूत. 

जमाअते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे येत्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मजबूत कुटुंब मजबूत समाज या नावाने जी मोहिम सुरू झालेली आहे ती आजच्या काळाची गरज आहे. कारण कुटुंब व्यवस्थेचा ठिसूळ होत चाललेला पाया पुनःश्च मजबूत केल्याशिवाय आपला समाज मजबूत होणार नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश या मोहिमेतून जाणार आहे. या मोहिमेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  


- मिनहाज शेख, 

पुणे (९८९०२४५५५०)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget