Latest Post

आणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी) विचारले, ’’ काय, तू हिच्यामध्ये त्याला बनविणार आहेस, जो हिच्यामध्ये अनाचार घडवील आणि रक्तपात करील? (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगाण होत आहे, पवित्रगान होत आहे.’’ (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ’’ मी जाणतो ते तुम्ही जाणत नाही.’’  (सुरे अलबकरा : आयत नं.30)

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, जनता ज्या लायकीची असते त्याच लायकीचे नेतृत्व तिला मिळत असते. पण अरबीमध्ये ठीक याच्या उलट एक म्हण आहे, जिचा मतीतार्थ असा की, अवाम अपने खलीफा की मजहब पर होती है. अर्थात जनता ही आपल्या नेत्याचे अनुसरण करते. म्हणजेच यथा राजा तथा प्रजा. आता या परस्पर विरोधी म्हणींमध्ये कोणती म्हण खरी आहे हे जरा बाजूला ठेवून जगात सध्या ज्या प्रकारचे नेतृत्व दिसून येत आहे त्या संबंधी चर्चा करू आणि त्यांच्या तुलनेमध्ये वैकल्पिक इस्लामिक नेतृत्वाची संकल्पना काय आहे? हे ही समजून घेऊ. कारण नेतृत्वावरच समाजाचे भले बुरे अवलंबून असते.

जगात ज्या प्रकारची शिक्षण प्रणाली अवलंबिली जाते आणि ज्या प्रकारच्या सांस्कृतिक घडामोडी घडत असतात त्यांचा लोकांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो व त्या संस्कारांना सोबत घेवूनच ते लोक पुढे येत असतात, ज्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. एकदा का एखादी व्यक्ती सत्तेवर आली की त्याच्या मागे जाण्याशिवाय जनतेकडे दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसतो. म्हणून असे म्हटले जाते की, नेता निवडताना खूप काळजीपूर्वक निवडायला हवा. परंतु या सुभाषितवजा सल्ल्याचा फारसा उपयोग होत नाही. प्रत्यक्षात नेता निवडताना जात, धर्म, रंग, हितसंबंध, क्षेत्रवाद, वंशवाद इत्यादी गोष्टींचा परिणाम होत असतो. परिणामी प्रत्येक क्षेत्रात असे लोक शिर्षास्थानी निवडून येतात ज्यांच्यात आक्रमकता, धाडस आणि हिंसक प्रवृत्ती कमी-जास्त प्रमाणात असते. सभ्य, शांत आणि संयमी लोक फार कमी वेळा शिर्षस्थळावर पोहचत असतात. 

नेतृत्वाची व्याख्या

समुहाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुयायी म्हणविल्या जाणाऱ्या लोकांना एकात्मतेने वागण्यास उत्तेजन देणारी व्यक्ती म्हणजे नेता होय. नेत्याने स्थळ, काळ, परिस्थिती पाहून घेतलेल्या निर्णयाचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच रज्मी यांनी म्हटले आहे की, 

ये जब्र भी देखा है तारीख की नज़रोंने,

लम्हों ने खता की थी सदीयों ने सज़ा पाई. 

  

नेतृत्वाचे गुण 

खरे पाहता नेतृत्व सर्वांना जमत नाही तो एक विशेष गुण आहे. प्रत्येक माणूस जन्मजात स्वार्थी असतो. स्वार्थसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो. त्याच दिशेने प्रगती करत असतो. परंतु जो माणूस स्वतःबरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार करतो, स्वतः निरंतर पुढे जात असतांना दुसऱ्यांनाही सोबत घेऊन जातो तो नेता-

हयात लेके चलो कायनात लेके चलो ,

चलो तो चलो सारे ज़माने को साथ लेके चलो

आपल्या प्रगतीबरोबर दुसऱ्यांच्या प्रगतीचा विचार हा स्वार्थी माणूस कधीच करू शकत नाही. हा एक विशेष गुण असतो जो सर्वांमध्ये नसतो. म्हणून नेता हा सामान्य नसतो खरा नेता असामान्यच असतो. प्रगतीच्या वाटेवर चलण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरित करणे, त्यांच्यातील कमकुवत लोकांना मदतीचा हात देणे, प्रसंगी त्यांच्यासाठी आपल्या हितांचा त्याग करणे असे गुण असणारे फार कमी नेते जन्माला येतात.    परंतु जे जन्माला येतात ते इतिहास घडवितात. बुलंद नेतृत्वासाठी खालील गुण असणे आवश्यक आहे. 1. निःस्वार्थीपणा, 2. दूरदृष्टीपणा 3. ऐकण्याची इच्छा 4. न्यायीपणा 5. उदारता 6. कणखरपणा, 7. प्रेरक वृत्ती. 

नेतृत्व करतांना सारेच लोक एकसारखे नसतात. हे जेव्हा खऱ्या नेत्यांच्या लक्षात येते तेव्हा देखील ते सर्वांना सारखीच वागणूक देत असतात. आपल्या विरोधकांचा सुद्धा सन्मान करत असतात. त्यांचेही आर्थिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष पुरवितात. 


इस्लामी नेतृत्व

इस्लाममध्ये निरंकुश नेतृत्वाला मान्यता नाही, नव्हे सर्वसत्ताधीश ईश्वराशिवाय दुसरा कोणीही नाही, अशीच श्रद्धा आहे. इस्लाममध्ये निरंकुश फक्त ईश्वर आहे, हे तत्व सर्वमान्य आहे. म्हणून कोणताही नेता निरंकुश असण्याचा विषयच उपस्थित होत नाही. लोकशाहीमध्ये सत्तेचे स्त्रोत जनता आहे इस्लाममध्ये ईश्वर आहे. लोकशाहीमध्ये सत्तेची चौकट राज्यघटनेमध्ये निहित आहे. इस्लाममध्ये सत्तेची चौकट कुरआनमध्ये निहित आहे. इतर नेतृत्व स्वमर्जीने निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. इस्लामी नेतृत्वाला मात्र तसे करता येत नाही. त्याला शरियतच्या परिघामध्ये राहूनच निर्णय घ्यावे लागतात. उदा. जनतेतून मागणी आली आणि लोकप्रतिनिधींनीही दुजोरा दिला की देशात अल्कोहोलची निर्मिती करावी व दारूची दुकाने उघडावीत किंवा व्याजाधारित अर्थव्यवस्था लागू करावी. जनतेतून निवडून आलेल्या नेतृत्वाला तसे करता येते परंतु, इस्लामी नेतृत्वाला तसे करता येत नाही. या ठिकाणी लोकेच्छेवर ईश्वरी इच्छा श्रेष्ठ मानली जाईल व अल्कोहोल निर्मिती आणि व्याजाधारित अर्थव्यवस्था लागू केली जाणार नाही. याचं कारण असं की, लोकांना आपलं भलं बुरं कळत नाही. ते कळत असतं तर त्यांनी दारू आणि व्याजाधारित अर्थव्यवस्थेसारख्या घातक मागण्या केल्याच नसत्या. निर्मिकालाच निर्मितीच्या काय हिताचे आहे आणि काय नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 


इस्लामी नेतृत्वाचा उगम

’’आणि (आठवण करा) जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना सांगितले की, ’’मी पृथ्वीवर एक खलीफा (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ (तेव्हा त्या दुतांनी) विचारले, ’’ काय, तू हिच्यामध्ये त्याला बनविणार आहेस, जो हिच्यामध्ये अनाचार घडवील आणि रक्तपात करील? (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगाण होत आहे, पवित्रगान होत आहे. (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ’’ मी जाणतो ते तुम्ही जाणत नाही.’’ (सुरे अलबकरा : आयत नं.30).

जेव्हा ईश्वराने पृथ्वीवर मनुष्यवस्ती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने माणसाला आपला खलीफा (नायब/ प्रतिनिधी) बनवून पाठविले. म्हणजे मुळात माणूस हा जन्मतः नायब आहे. तो मालक कधीच होवू शकत नाही. मालक एकच आहे तो म्हणजे ईश्वर. एकदा का ही स्थिती स्पष्ट झाली की पृथ्वीवर स्वतःला निरंकुश राजा म्हणविण्याचा कोणालाच अधिकार राहत नाही. म्हणूनच मक्का-मदिनासारखे पवित्र शहर ज्या देशात आहेत त्या देशाचे नाव किंगडम ऑफ सऊदी अरेबिया असे असल्याने जगातील बहुतेक मुस्लिमांना त्या नावावर आक्षेप आहे. 

वरील आयत हीच इस्लामी नेतृत्वाचा पाया आहे. या आयतीतून स्पष्ट होते की, इस्लामी नेतृत्व स्वयंभू नाही. ती ईश्वराची कृपा आहे. निरंकुश नेतृत्व आणि इस्लामी नेतृत्व यात मुलभूत फरकच हाच आहे की, इस्लामी नेतृत्व ही ईश्वराची कृपा मानली जाते तर निरंकुश नेतृत्व ही जनतेची कृपा मानली जाते. याच कारणामुळे इस्लामी नेतृत्वाने ईश्वराशी एकनिष्ठ असावे जनतेशी नाही. ईश्वराशी एकनिष्ठ राहून शरियतच्या परिघामध्ये घेतलेल्या निर्णयामुळेच जनतेचे सर्वोच्च कल्याण साध्य होते. इतर पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे नाही. 

जगातील जवळ-जवळ सर्वच देशात जनतेतून निवडलेल्या निरंकुश नेतृत्वाने त्या-त्या देशात जनतेचे किती कल्याण केले आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. देशाच्या संसदेवर हल्ला करण्यासाठी आपल्या समर्थकांना प्रेरित करण्यापर्यंत ह्या निरंकुश नेतृत्वाची मजल जाते हे नुकतेच जगाने अनुभवलेले आहे, असे पक्षपाती नेतृत्व फक्त आपले नेतृत्व कसे टिकून राहील व आपल्या समर्थकांचे कसे हित होईल, एवढेच पाहते. यापुढे पाहण्याची त्याची लायकीच नसते. परंतु इस्लामी नेतृत्वाला स्वतःच्या नेतृत्वाची परवा न करता सर्व नागरिकांच्या कल्याणाचा विचार करावा लागतो. 

इस्लामी नेतृत्वाची जबाबदारी

निगाह बुलंद सुखन दिलसोज जां पुरसोज 

यही है रख्ते सफर मेरे कारवां के लिए 

जनतेतून निवडून आलेले नेतृत्व हे जनतेला जबाबदार असते. असे अभिमानाने सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात ते कोणालाच जबाबदार नसते. फार तर पाच वर्षानंतर त्याला बदलता येवू शकते इतकेच. पण त्याने त्याच्या पाच वर्षाच्या शासनकाळात किती धिंगाना घातला? देशाचे किती नुकसान केले? किती चुकीचे निर्णय घेतले? त्यामुळे नागरिकांची किती हानी झाली? या संबंधी त्याला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही. एवढेच नव्हे तर त्याच्या शासन कालावधीत वृद्ध, विधवा, निराधार, अपंग आणि गरीब यांची जबाबदारी कोणाचीच नसते. केवळ जनकल्याणाच्या योजना घोषित केल्या जातात परंतु प्रत्यक्षात समाजाच्या अंतिम पायरीवर उभ्या असलेल्या वंचित गटाच्या पदरात फारसे काही पडत नाही. असे नसते तर देशात गरीबीच शिल्लक राहिली नसते.

इस्लामी नेतृत्व 

’’आणि म्हणतील! हे आमच्या पालकनकर्त्या! आम्ही आमच्या सरदारांचे व आपल्या ज्येष्ठांचे आज्ञापालन केले आणि त्यांनी आम्हाला सरळ मार्गापासून मार्गभ्रष्ट केले. हे पालनकर्त्या, यांना दुप्पट यातना दे आणि त्यांचा भयंकर धिक्कार कर.’’ (सुरे अलएहजाब आयात नं. 67-68) 

वर नमूद आयातींमध्ये निरंकुश नेतृत्वाचे मृत्यूपरांत जीवनामध्ये काय हाल होणार आहेत याचे काळजाचा थरकाप उडविणारे वर्णन केलेले आहे. थोडक्यात नेतृत्व ही फार मोठी जबाबदारी आहे. जिचा हिशोब या जगात व परलोकात दोन्ही ठिकाणी द्यावा लागतो. म्हणून खरा श्रद्धावान व्यक्ती स्वतःहून कधीच नेतृत्व प्राप्त करण्यासाठी उत्सुक नसतो. मात्र नेतृत्व स्वतः चालून आले तर त्याने ते स्विकारावे, असा धार्मिक दंडक आहे. अशावेळी त्याच्या नेतृत्वाला यशस्वी बनविण्यासाठी ईश्वरीय मदत येते, अशी श्रद्धा आहे व ती खरी आहे. 

इस्लामी नेतृत्वाचा इतिहास

जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिले होते. याबाबतीत मायकल एच. हार्ट पासून, ते साने गुरूजीपर्यंत सर्वच बुद्धीजीवींचे एकमत आहे. अपवाद फक्त इस्लाम विषयी वैराची कावीळ ज्यांना झालेली आहे त्यांचा. 

साधारणपणे नेतृत्व बदलते म्हणजे फक्त नेता बदलतो, जनता तशीच राहते. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. ज्यावेळेस ते अरबस्थानाचे नेेते म्हणून पुढे आले त्यावेळेस अरबस्थानातील त्या काळात प्रस्थापित असलेले रानटी नेतृत्वच बदलले नाही तर नागरिकही बदलले, त्यांचे स्वभावही बदलले, उद्धट स्वभावाचे अरब मेनासारखे मऊ झाले, वाईट प्रवृत्तींसाठी जगभर ख्यात असलेले अरब सभ्य समाजाचे आदर्श उदाहरण झाले.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर आलेल्या चार पवित्र खलीफा (रजि.) यांनी सुद्धा उत्कृष्ट इस्लामी नेतृत्व कसे असते याचे उदाहरण जगासमोर सादर केले. जे की प्रलयाच्या दिवसापर्यंत जगाला प्रेरणा देत राहील. 

त्यानंतर मात्र इस्लामी इतिहासाने वळण घेतले आणि काही अपवाद वगळता इस्लामी नेतृत्वही इतर नेतृत्वासारखेच झाले. खलीफाच्या जागी बादशाह आले त्यांनी इतर निरंकुश राजाप्रमाणे सत्ता गाजविली. स्वतःच्या साम्राज्यांच्या सीमांचा विस्तार करत असतांना अनेक निरपराध्यांवर अत्याचार केले. भोगविलासाचे नवनवीन किर्तीमान रचले. ते धर्माने जरी मुस्लिम होते तरी त्यांचे नेतृत्व इस्लामी नव्हते, हे सत्य वाचकांच्या तेव्हाच लक्षात येईल जेव्हा खिलाफत आणि बादशाहत यामधील सूक्ष्म फरक वाचकांच्या लक्षात येईल. (यासंबंधी अधिक माहिती ज्यांना हवी त्यांनी खिलाफत और मुलूकियत हे मौलना सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांचे पुस्तक वाचावे.) 

आज परिस्थिती इतकी विदारक आहे की, स्वतः मुस्लिमांचा उर्दू आणि अरबी भाषेशी फारसा संबंध उरलेला नाही. म्हणून खिलाफत म्हणजे इस्लामी नेतृत्व आणि मुखालफत म्हणजे विरोध हा सुक्ष्म फरक किमान हा लेख वाचणाऱ्या वाचकांनी तरी लक्षात घ्यावा.

सध्या जगात 56 मुस्लिम राष्ट्रे असून, त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हटले जाईल  असे एकही राष्ट्र नाही. त्या देशांचे नेतृत्व आणि इतर देशांच्या नेतृत्वात फारसा फरक राहिलेला नाही हे खेदाने नमूद करावे लागते. हे नेतेही तेवढेच भ्रष्ट आणि विलासी आहेत जेवढी की इतर नेते, असे दुर्दैवाने म्हणणे भाग आहे. 


- एम.आय.शेख



- नसीम गाझी

ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे.

मार्गभ्रष्ट आत्म्यांनी सत्यधर्माच्या सत्यप्रकाशाने उजळून निघावे आणि जीवनाप्रति गंभीर निर्णय घेण्यास त्यांना साहस व हिंमत प्राप्त व्हावी याच उद्देशाने हे पत्र प्रकाशित करण्यात येत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 246    -पृष्ठे - 12     मूल्य - 10  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/4a05owbepl3hw0qq8n7h02x0fesdh3tk










अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सोबत्यांना आणि समस्त अनुयायांना निकाह अर्थात विवाहाप्रसंगी तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे भाषण उद्घृत करण्याची शिकवण दिली आहे. या भाषणालाच इस्लामी परिभाषेत `खुतबा-ए-निकाह' असे म्हणतात. म्हणून निकाह आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी या खुतब्याचे वाचन करावे म्हणजे हे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण होईल. या भाषणाच्या माध्यमाने इस्लामच्या मौलिक शिकवणी आत्मसात करणेदेखील शक्य होईल. हा `खुत्ब-ए- मसनूना' खालीलप्रमाणे आहे.....

अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या या प्रवचनाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात अंतिम पैगंबरांचे कथन असून त्याचा मराठीत अनुवाद देत आहोत...

``महिमा आणि कृतज्ञता अल्लाहसाठीच आहे. आम्ही त्याचे आभार मानतो. त्याच्यासमोर मदतीची याचना करतो, (झालेल्या चुका आणि अपराधांची त्याच्या दरबारी) क्षमा मागतो आणि आपल्या इच्छा अभिलाषांच्या तसेच वाईट कर्मांच्या वाईट परिणामापासून रक्षण होण्यासाठी त्याच्या अभयछत्राखाली येतो. तो ज्याला मार्ग दाखवील त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि तो ज्याला मार्ग दाखविणार नाही, त्यास कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही. मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूजा अगर उपासनेस पात्र नाही आणि मुहम्मद (स.) त्याचे दास आणि पैगंबर आहेत.''

यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयतींचे पठण केले, त्याचा अनुवाद अशा प्रकारे आहे.

``लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.'' (दिव्य कुरआन , ४ :१)

``हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा जसे भय बाळगले पाहिजे आणि तुम्हाला अशा अवस्थेत मृत्यू यावा की तुम्ही अल्लाहचे आज्ञाधारक असावे.'' (दिव्य कुरआन , ३:१०२) 

``हे श्रद्धावंतांनो! अल्लाहच्या कोपाचे भय बाळगा आणि सत्य व रास्त गोष्टकरीत जा. अल्लाह तुमचे आचरण सुधारील आणि तुमचे अपराध क्षमा करील. जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या (स.) आज्ञांचे पालन करील, त्याला महान यश मिळेल.'' (दिव्य कुरआन , ३३:७०- ७१)


माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘माझ्या साथीदारांपैकी कोणी माझ्यापर्यंत कोणासंबंधी वाईट गोष्टीला सांगू नये कारण मला माझे मन साफ असलेले आवडेल जेव्हा मी तुमच्याजवळ येईन.’’

(हदीस : अबू  दाऊद)


स्पष्टीकरण

म्हणजे कोणी माझ्याजवळ दुसऱ्याविषयी वाईट बोलून माझ्या मनात गैरसमज निर्माण करू नये. एखाद्या साथीदारात तुम्हाला कमतरता आढळल्यास सहानुभूती व भले कृत्य हे असावे की त्याला एकांतात त्याविषयी सांगावे. त्याच्यातील वाईटाचा प्रचार करू नये. मी तुमच्याशी भेटलो तर कोणाविषयी माझ्या मनात नाराजीची भावना नसावी, हेच मला प्रिय आहे.

एखाद्याच्या मामल्यास वाढविणे आणि त्यास जबाबदार लोकांपुढे मांडण्याचा मामला सर्वांत शेवटचा आहे. जेव्हा सुधारणा करण्याचे सर्व प्रयत्न संपुष्टात आले असतील आणि मामलासुद्धा असा असेल की त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखाद्या मोठ्या बिघाडाची व धोक्याची शंका असेल.



लेखक - न्या. एस. ए. रहमान

भाषांतर - मुहम्मद शफी अन्सारी

इस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीविधाता आहे. या पुस्तिकेत कायद्याशी अभिप्रेत मदीना येथील ते सर्वकष व आवश्यक कायदे आहेत ज्यांचे पालन सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक आहे.

या पुस्तिकेत कायद्याचा अर्थ, कुरआनी कायद्याचे वैशिष्ट्य, कायदेशीर स्वरुपाची हदीस वचनं, वचन-कराराचे पालन, शासकाचे गुणविशेष, व्याजाची मनाई, भेदभाव विरहीत व्यवस्था व कसोटीपूर्ण स्वातंत्र्य इ. विषय चर्चिले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 245     -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s2knhedl313i6vcbacktz7o3myyo0u7y





हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन  त्यांच्याशी   लढत  देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु  उबैदा  यांना  पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल   खचले  आहे.  जर  आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि  मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये  अरबांसारखे  साधेपण  गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर  यांना  ही    अवस्था  पाहून  राग  आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात   घेऊन   त्यांच्या   दिशेने  भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?

जाबिया या ठिकाणी  बराच  काळ  ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे   निघाले.  त्यांच्या  घोड्याचे  नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि  पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या  स्वागतासाठी  पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.

(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी) 

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget