Latest Post


अल्लाहचा सच्चा दास आणि श्रद्धावंत नेहमीच प्रयत्न करीत असतो की आपल्याकडून आपल्या स्वामी अल्लाहची अवज्ञा होऊ नये. मात्र शेवटी तो एक मानव असतो. त्याच्या स्वभावातच सत्यमार्गात असंख्य अडचणी निर्माण करणाऱ्या बाबी असतात. त्यातल्यात्यात तो स्वत: चुकीचा पुतळा असल्यामुळे कळत-नकळत त्याच्याकडून चुका घडत असतात. मात्र चुकीची जाणीव होताच त्याचा आत्मा थरथर कापायला लागतो. ईशअवज्ञेचे कारण दुष्परिणामाला तो जाणतो. त्यास ईशकोपाचा भयावह परिणाम माहीत असतो. त्याला आपल्याकडून झालेल्या चुकीचा खूप पश्चात्ताप होतो आणि यापुढे परत ही चूक घडू न देण्याचा पक्का निश्चय करतो. याप्रसंगी तो पश्चात्तापाने अल्लाहसमोर आपल्या अपराधाची गयावया करून क्षमा मागतो आणि परत अल्लाहशी आपले भक्तीसंबंध पूर्ववत जोडतो.

अल्लाहचा सच्चा आज्ञाधारक आणि आत्मसमर्पित माणूस अर्थात मुस्लिम आपले तन-मन-धन ईशमार्गात झोकून देतो आणि एवढे करूनही त्याला अल्लाहच्या दासत्वाच्या नात्याशी न्याय केल्याचे समाधान होत नाही. त्यास या गोष्टीची सतत जाणीव असते की अल्लाहने आपल्याला अस्तित्व देऊन आणि जगण्यासाठी सर्व सोयी करून आपल्यावर प्रचंड उपकार केले. आपले तन-मन-धन हे अल्लाहनेच आपल्याला प्रदान केलेले आहे. मग त्याच्या एका इशाऱ्यावर त्याने प्रदान केलेल्या या बाबी त्यालाच समर्पित केल्यास आपले काय बिघडणार? उलट याचा सर्वोच्च मोबदला आपल्याला मिळणार.

त्याला हे चांगलेच ठाऊक असते की, पैगंबर मुहम्मद (स.) एक निरपराध व्यक्तिमत्त्व असूनही ते अल्लाहच्या प्रत्येक आज्ञेचे तंतोतंत पालन करीत, त्याची भक्ती करीत आणि त्यांच्यासारखा भक्त इतर कोणीही नाही. तरीसुद्धा ते आपल्या स्वामी, प्रभू आणि उपास्य अल्लाहसमोर माफी व मुक्तीची प्रार्थना करताना अश्रु ढाळत असत. 



माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाह! मी मनुष्य आहे म्हणून ज्या मुस्लिम व्यक्तीला मी वाईट म्हणेन, त्याला मारेन किंवा धिक्कारेन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेचा वर्षाव होण्याचे निमित्त बनव आणि यास त्याच्यासाठी उत्कृष्ठतेचे साधन बनव.’’

स्पष्टीकरण

मनुष्य असल्याकारणाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना रागसुद्धा येत असे, परंतु ही दयालुतेची पराकाष्ठा आहे की पैगंबरांनी अल्लाहशी प्रार्थना केली, ‘‘जर मी एखाद्या मुस्लिमाला वाईट म्हणेन किंवा त्याला मारेन अथवा त्याचा धिक्कार करीन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेसाठी निमित्त बनव आणि त्यास उत्कृष्ठता प्रदान कर.’’

एका कथनाद्वारे कळते की पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी म्हणत, ‘‘हे अल्लाह!मी ज्या मुस्लिमाला वाईट संबोधित करेन तर तू कयामतच्या दिवशी यास त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : मुस्लिम)

एका हदीसमध्ये आहे, ‘‘यास त्याच्यासाठी त्याच्या अपराधांचे प्रायश्चित्त बनव.’’


family

समाजाचा पाया मजबुत कुटुंब व्यवस्थेवर अवलंबून आहे. स्वस्थ समाजासाठी कुटुंबामध्ये सशक्तता, स्थिरता, आवश्यक असते. व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीबरोबर प्रेमाने, जिवाभावाने, आनंदी जीवन व्यतीत करतो. तेव्हाच समाजात शांतता प्रस्थापित होते. घर आनंंदी तर समाज समाधानी ! कुटुंबातच सामाजिक मुल्ये रुजतात. नैतिक मुल्ये विकसीत होतात.

कुटुंब म्हणजे पती-पत्न्नी, आई-वडिल, मुले, बहिण, भाऊ, इतर नातलग मिळून सशक्त परिवार बनतो. कुटुंबासाठी विवाह पवित्र बंधन, जीवन व्यतीत करण्याचा मार्ग, भावभावनांचा समन्वय. अशा कुटुंबात जन्मलेले बालक आत्मविश्वासाने जीवन व्यतीत करणारे, भविष्यातील एक जागरूक नागरिक बनते. आई बालकांची प्राथमिक ज्ञानपीठ, प्राथमिक ज्ञानाचे भंडार, आयुष्याची शिदोरी मिळण्याचे ठिकाण. याच ठिकाणी प्रेम, माया, त्यागावर आधारीत जीवन जगण्याचा धडा मिळतो. व्यक्तिमत्व विकसित करण्यास समर्थता येते. तेच कुटुंब, तोच समाज सुरक्षित, सुखी, समाधानी असू शकतो. पण जर का कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ पती-पत्नीच जर मजबूत नसतील तर समाजाची इमारत भक्कम उभी राहणार का? 

आज माणवाने तांत्रिक युगात प्रगतीपथावर पाऊल टाकले असले तरी अनेक सामाजिक कलह पहावयास मिळतात. कुटुंबातील पती-पत्नीमधील तणाव, इतर नात्यातील कलह, भेदभाव, आपसातील अंतर, द्वेषाची भावना पहावयास मिळत आहे. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. निर्मळ, प्रेमळ नाती दूरावली जात आहेत. खानदानी कलाहांनी समाज अनेक समस्यांनी पोखरला जात आहे. सुदृढ कुटुंबच सुदृढ समाज निर्मिती करु शकते. म्हणूनच कौटुंबिक कलह, सामाजिक अस्थिरतेला कारण काय याचा विचार करावा लागेल.

एखाद्या रोगाचे निदान झाल्याशिवाय डॉक्टर उपचाराला सुरुवातच करत नाही. तिच स्थिती आज आमच्या परिवाराची, खानदानाची होत आहे. आज विवाहासारख्या पवित्र बंधनाचे खेळणे केले आहे. विवाहात दोन व्यक्ती स्त्री-पुरुष पवित्र बंधनात बांधले जातात. नवीन जीवनाची सुरुवात वेगवेगळ्या घराण्यात जन्न्मलेले, वाढलेले, संस्कारीत झालेले, स्वभाव निराळे, अनोळखी परिचयात येणे व आपल्याला एका नवीन वातावरणात समाविष्ट करुन घेतात. पसंती-नापसंती गुंडाळून नवीन नात्याला जोडली जातात. पण आज नवीन जोडपी सामंजस्याची भूमिका निभावण्यासाठी कोठे तरी कमी पडत असल्याचे पहावयास मिळते. कुटुंब विस्तारित करण्याच्या आधीच त्यांच्यात ताण-तणाव पहावयास मिळत आहे आणि अशातच कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. एकमेकांना समजून घेण्याची शक्तीच नसल्यामुळे ती कुटुंबे रोगट बनतात. मानसिक खच्चीकरणामुळे कौटुंबिक स्वास्थ्य पार ढासळते. नाती विखुरली जातात. कुटुंबाचा आधारस्तंभ पती-पत्न्नीच जर घरात शांतता, समाधान, प्रेम स्थापित करु शकत नाहीत तर संसार रूपी गाड्याची चाके रूतली तर प्रवास थांबणारच ! 

आज घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. हजारो कौटुंबिक कलहाची प्रकरणे न्यायालयात चालू आहेत. अनेक फायली जीवनाची वाट पाहत आहेत. जीवनात अंध:कार घेऊन जगणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कुटुंबे विखुरली जात आहेत. घरात, समाजात वृध्दांना मान-सन्मान दिला जात नाही. ज्येष्ठ नकोसे झाले आहेत. ज्येष्ठ घरात अडगळ वाटू लागले आहेत. त्यामुळे वृध्दाश्रमात त्यांची रवानगी होत आहे. वृध्दाश्रमात वृध्द स्त्री असो की पुरुष संख्या वाढत आहे.

खरे पाहिले तर तरूणपिढीला ज्ञानाचे धडे देणारे, संस्कारीत करणारी ज्येष्ठ मंडळीच महान. पण त्यांचा या आधुनिक म्हणून घेणाऱ्या कुटुंबाला विसर पडत आहे. खरे तर ज्या घरात वयस्क आजी-आजोबा वृध्द मंडळींच्या ज्ञानाचा लाभ घरातील मुलांना होतो ते घर एखाद्या विद्यापीठापेक्षा कमी नाही.

आजही वृध्दाश्रमातील भावी पिढी घडविणारी मंडळी प्रेमाला आसुसलेली आहेत, याचा विसर पडता कामा नये. आईचे प्रेम, वात्सल्यसिंधु, तिच्या चरणाखाली स्वर्ग आहे, पण मुले तिच्या प्रेमाला वंचित होत आहेत. पती-पत्नीच्या तणावात मुलांचा वनवास पहावयास मिळतो. जे घर व आई ही मुलांची पहिली शाळा असते, तेथेच जर ती मुले अस्वस्थ असतील तर ते कुटुंब, तो समाज कसा विकसीत होईल. मुलांच्या या तणावाचा वाईट परिणाम होतो व  मुले बाहेरख्याली बनतात. खोटे बोलण्याचे धाडस करतात. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या शोधात चूकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पावले वाकडी पडतात. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचाराला ऊत येतो.  श्रशर्रींश ळप ठशश्ररींळेपीहळि वासना तृप्ती एकमेव उद्देश बनतो आणि परिणाम वाईटच ! वेळ निघून गेलेली असते, दु:ख ऐकणारे कोणी शिल्लक राहात नाही आणि जीवनाचा अंत करण्याइतपत पावले उचलली जातात. आत्महत्येला मीठी मारली जाते.

मुलींना वडिलांच्या वारसा हक्कात तिचा वाटा दिला जात नाही. त्यामुळे तंटे-भांडणे न्यायासाठी कोर्ट, कचेरीमुळे मानसिक संतुलन संपत जाते. फेसबुकवर मैत्री करणे व जीवनाच्या अंताला तयार होणे, परिणाम अंध:कारमय पहावयास मिळतात. माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती संपली तर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगांचे जंतू ठाण मांडून बसतात तसेच मानसिक, शारीरिक रोगाने शरीर ग्रासले जाते. मग कुटुंबं व त्यानंतर समाज कुचकामी होत जातात.

आज कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जवळीक राहिलेली नाही. आपसातील संवाद होत नाही. त्यामुळे पण दूरावा वाढतो. घराच्या सभ्यतेची आधारशिला स्त्री विवाहाचे आवश्यक अंग, जीवनाच्या गाड्याचे एक चक्र, विवाह पवित्र बंधन, स्त्रीला मानाचे स्थान देणे आवश्यक. पण हुड्याची मागणी यामुळे समाजातील वातावरण दूषित झाले आहे.

प्रेमाने मुलांचे संगोपन करण्यासाठी माता-पित्यास वेळच नाही. आज जस जशा गाड्या किरायाने मिळतात तसे पालक पाल्याच्या संगोपनाला मिळतील का ? अशी जाहिरात आम्हा आदर्श सुसंस्कारीत भारतीयांना म्हणण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. पाश्चिमात्यांप्रमाणे एका रात्रीसाठी पती-पत्नीचे नाते ठेवायचे व सकाळी विभक्त व्हायचे, अशी रीत आहे. पशुपेक्षाही हीन वृत्ती कुटुंबाला पोखरून समाजातील नीतिमत्तेला धक्का देणारी आहे.

विवाह म्हणजे पुण्यकर्म, तो अतिशय सोप्या पध्दतीने व्हावा, विवाहाला मुलीची संमती असलीच पाहिजे. पती-पत्नीचे नाते इतके जवळचे की ईश ग्रंथ कुरआनात म्हटले आहे,’’ त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात.’’ (सुरह अलबकरा-02-187)

जसे पोशाख आणि शरीराच्या दरम्यान काही एक पडदा नसतो. किंबहुना दोघांचे परस्पर संबंध अभिन्न आहे. त्याचप्रमाणे तुमचा आणि तुमच्या पत्नीचा संबंध सुध्दा अभिन्न आहे.

विवाह पवित्र बंधन, सुनही घरची मालकीन म्हणून येते. मान-सन्मानासह वागणूक मिळविणारी ती घरची एक सदस्य आहे, याची आठवण ठेवणे गरजेचे असते.

पैगंबर मुहम्मद (सल्ल) म्हणतात, ’’पतीचे पत्नीवर हक्क आहेत. तसेच पत्न्नीचेही पतीवर हक्क आहेत. आपल्या पत्न्नीला प्रेमाने व सहानुभूतीने वागवा, कठोर होऊ नका, दयाळू राहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. ईश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर सहभागी झालेल्या असतात, हे विसरु नका.’’

स्त्रीशी चांगली वर्तणूक ठेवण्याची ताकीद दिली आहे. इमारत किती मोठी आहे त्यापेक्षा त्या घरातील वृध्दाच्या चेहऱ्यावरील हास्यावर सुखी कुटुंबाची ओळख होते. ज्येष्ठांना कुटुंबाचा भाग बनविण्याचे आदेश आहेत. आपुलकीच्या बळावर सशक्त कुटुंब बनविणे अत्यंत आवश्यक आहे.

घरातील व्यक्ती एकमेकांशी मिळून-मिसळून राहतील तर तोच समाज, तोच देश एकोप्याने राहणार. जग एक परीक्षा गृह आहे. सत्याच्या कसोटीवर मानवता टिकवता येते. आदर्श कुटुंब, समाज, देश बनवायचा असेल तर सहानुभूती, प्रेम, समता, बंधुता इत्यादी मुल्यांना जोपासावेच लागेल.

पवित्र ईश ग्रंथात म्हटले आहे, ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. (पवित्र कुरआन सुरह अन्नीसा आयत नं.1)

जीवनातील प्रत्येक क्षणी आपण ईशभय मनात ठेवावे. इथपावेतो की त्याच परिस्थितीमध्ये त्याला पारलौकिक जीवन प्राप्त व्हावे.


- डॉ. आयेशा पठाण, 

नांदेड 

9665366489


Quran

विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते सुद्धा इस्लामसंबंधी चर्चा करण्यास सहसा तयार होत नाहीत. त्याचे कारण म्हणजे इस्लाम संबंधी व्यापक असे गैरसमज समाजामध्ये रूजलेले आहेत. पहिला गैरसमज असा की, इतर धर्माप्रमाणे हा एक धर्म आहे आणि त्याचा संबंध त्याच्या अनुयायांच्या वैयक्तिक जीवनाशी आहे; समुह जीवनाशी याचा काहीएक संबंध नाही. हा समज एवढा व्यापक आणि घट्ट रूजलेला आहे की, अनेक मुस्लिम सुद्धा याच विचाराचे आहेत. अनेकांना असे वाटते की, मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला की तो मुसलमान झाला. हे अर्धसत्य आहे. कोणी हे लक्षात घ्यायला तयारच नाही की, फक्त मुस्लिम कुटुंबात जन्म घेणे पुरेसे नाही तर इस्लामला जाणूनबुजून धारण करावे लागते. ही बाब लक्षात न आल्याने अनेकजण नावापुरतेच मुसलमान राहतात. म्हणूनच अनेक मुसलमान, ’’धर्म अफूची गोळी आहे’’ असे म्हणणाऱ्या साम्यवादी पक्षात जाऊन स्थिरावलेले आहेत. अनेकांनी हराम समजल्या जाणाऱ्या अश्लिल सीनेउद्योगात मुस्लिम नाव आडवे येत असल्याने ते बदलून इतर नाव धारण केलेले आहे. अनेकांनी बिगर मुस्लिम स्त्रियांशी लग्न करून बाकायदा मूर्तीपूजा केली आहे व करत आहेत. काहींनी तर फक्त मुस्लिम सदृश्य नाव कायम ठेऊन इस्लामविरूद्ध आचरण सुरू केले आहे. मुस्लिम होण्यासाठी मुस्लिम सदृश्य नाव असणे किंवा फक्त काही उपासणा नित्यनियमाणे करत राहणे हे जरी पुरेसे असले तरी एवढ्यावरच समाजाधान माणने इस्लामला मान्य नाही. हे बहनसंख्य मुस्लिमांनी लक्षातच न घेतल्याने मोठा गोंधळ उडालेला आहे. 

वास्तविक पाहता इस्लाम फक्त एक धर्मच (रिलीजन) नसून ती एक जीवनपद्धती (निजाम/व्यवस्था) आहे. तो रंजल्या गांजलेल्यांचा सर्वात मोठा कैवारी आहे. अन्याय व अत्याचाराविरूद्ध ठामपणे उभे राहण्याची शिकवण देतो. तोपर्यंत जोपर्यंत अन्याय व अत्याचाराचा नायनाट होत नाही. त्यासाठी यथाशक्ती निरंतर प्रयत्न करण्याची शिकवण देतो. यालाच जिहाद म्हणतात. आयएसआयएस, बोकोहाराम इत्यादी संघटनांच्या हिंसक कारवायांना जिहाद म्हणत नाहीत, हे बहनतेकांच्या लक्षातच येत नाही. निरपराध लोकांच्या विरूद्ध नियोजित हिंसेचा वापर करून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करणे व त्याला जिहाद म्हणणे हा इस्लाम नव्हे, इस्लामला हे मान्य नाही. हे ही कोणी समजून घ्यायला तयार नाही. एवढेच नव्हे तर मानवतेला हानी पोहोचविणाऱ्या सर्व रूढी, परंपरांचा नायनाट करण्याची इस्लाम शिकवण देतो. अंधश्रद्धेला इस्लाममध्ये थारा नाही. कुटुंब व्यवस्थेला अस्थिर करणाऱ्या गोष्टींना  इस्लाम, ’’नाजायज’’ घोषित करून त्याचा वापर प्रतिबंधित करण्याचे इस्लामी शासकाला निर्देश देतो. व्याज ही समग्र आर्थिक समस्यांची जननी असल्याकारणाने त्याला हराम घोषित करतो व जकात देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो. थोडक्यात इस्लाम फक्त व्यक्तीगत बाब नाही तर तो व्यक्तीगत आचरणासहीत समूह जीवनाच्या नियमानाचेही काम करतो. मानव समुहाच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या प्रत्येक पैलूसाठी इस्लामने आचारसंहिता दिलेली आहे व ताकीद केलेली आहे की, जे लोक याचे पालन करणार नाहीत ते यशस्वी होणार नाहीत. ईश्वराची कृपा त्यांना प्राप्त होणार नाही. ईश्वराच्या कोपाचा त्यांना भागीदार व्हावे लागेल. समाजाला व स्वतःला हानी सहन करून त्याचे मुल्य चुकवावे लागेल. सारांश मानवी जीवनाशी संबंधित कोणताच पैलू असा नाही ज्यासाठी कुरआनमध्ये निर्देश दिलेले नाहीत. गरज आहे ती हे सर्व निर्देश जाणून घेण्याची व प्रत्यक्षात आचरणात आणण्याची. 

इस्लाम एक असा धर्म आहे ज्याची स्थापना 1442 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अरबस्थानात केली. असाही एक व्यापक गैरसमज समाजामध्ये रूजलेला आहे. वास्तविक पाहता या पृथ्वीवर पहिल्यांदा पाय ठेवणारे हजरत आदम अलै. (अ‍ॅडम) हे पहिले प्रेषित असून, ते जनतधून मुस्लिम म्हणूनच पृथ्वीवर पाठविले गेले. त्यानंतर हजारो वर्षांच्या पृथ्वीच्या ज्ञात अज्ञात इतिहासात जवळ-जवळ 1 लाख 24 हजार पैगंबर पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात येवून गेले. प्रेषित मुहम्मद सल्ल. हे इस्लामचे संस्थापक नसून शेवटचे प्रेषित आहेत. ईश्वराने त्यांच्यावर कुरआनचे अवतरण करून मानवी जीवनाची आचारसंहिता संपूर्ण झाल्यामुळे प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केलेला आहे. आता प्रलयांपर्यंत कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. हेच मानवतेचे अंतिम मार्गदर्शक असून, या मार्गदर्शनाचा अव्हेर करणारे मग मुस्लिम असोत का बिगर मुस्लिम निश्चितपणे अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जे या मार्गदर्शनाचा स्वीकार करतील तेच यशस्वी होतील हे ओघानेच आले. माझे हे मत व्यक्तीगत नसून कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ईश्वराने कुरआनमध्ये फरमाविले आहे की, ‘‘अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान आयत नं.:19).

वर नमूद आयात इतकी स्पष्ट आहे की, यानंतर इतर धर्माचा विचार करण्याची शक्यताच शिल्लक राहत नाही. ही एक जीवन जगण्याची ईश्वरीय, त्रुटीविरहित, परीपूर्ण व्यवस्था आहे.  या व्यवस्थेशिवाय इतर व्यवस्थेच्या आधीन राहून जीवन जगण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते अयशस्वी झाले व आजही होत आहेत, याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. जे लोक केवळ भौतिक साधन सामुग्रीला यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली समजतात त्यांचा समज त्यांना लखलाभ असो. इस्लाममध्ये मात्र व्यक्तीगत जीवन आणि सामुहिक जीवन तसेच भौतिक जीवन आणि नैतिक जीवन असा फरक नाही. या सर्व गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. या सर्वांची व्याख्या कुरआनमध्ये केलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीची पद्धतही शरीयतमध्ये ठरवून दिलेली आहे. ईशभय मनात बाळगून प्रत्येक काम केल्यास स्वतःच्या कल्याणासह समाजकल्याणही सहज साध्य करता येते, हा या व्यवस्थेचा गाभा आहे. 

इस्लाममध्ये राजकारण करण्याची मुभा आहे. भारतात बहनतेक धार्मिक वृत्तीचे मुस्लिम लोक राजकारणाला बहिष्कृत वृक्ष असल्यासारखेवागतात. त्यांचे हे वर्तन बिगर इस्लामी आहे. मुल्याधारित राजकारण व त्याद्वारे स्थापन झालेले सरकार व इस्लामी मार्गदर्शनाप्रमाणे केले गेलेले शासन हे जनकल्याणासाठी उपयुक्त असल्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्यानंतर आलेल्या चार पवित्र खलीफांनी आपल्या शासनाद्वारे अरबस्थानामध्ये सिद्ध करून दाखविलेले आहे. हा इतिहास आहे; काल्पनिक कथा नाही. 

यानंतर मात्र दनर्भाग्य असे की, आज आंतरराष्ट्रीय मुस्लिम उम्माह पैकी बहनसंख्यांना या पवित्र शासनप्रणालीचा विसर पडलेला असून त्यामुळेच जग मानवकल्याणाला मुकलेले आहे. 56 मुस्लिम देशांपैकी एकाही देशात इस्लामला आवडणारी व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी यशस्वीपणे राबविलेली शासनपद्धती नसावी व तेथेही तीच मानवतेला काळीमा फासणारी भांडवलशाही शासन पद्धती असावी, यापेक्षा मोठे दनर्दैव ते कोणते? जगातून अन्याय आणि अत्याचाराच्या निर्मुलनासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीगत आणि सामुहिक जीवनामध्ये इस्लामी जीवनपद्धतीचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की हानी सहन करून ती पद्धत अवलंबवयाची की बिगर हानी सहन करून. लक्षात ठेवा मित्रानों ! इस्लाम हीच सर्वश्रेष्ठ कृपा आहे.


- एम.आय.शेख



- प्रा. अब्दुर्रहमान शेख

कुरआनचे प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. कुरआनोक्तींचा हा विषयानुकूल असा एक संग्रह आहे. यावरुन त्यांचे आचरण, अल्लाहची त्यांच्यावर विशेष कृपा, पैगंबरांचेे आज्ञापालन याविषयीची दिव्यप्रकटणे एकाच ठिकाणी संकलित आहेत.

पैगंबरांच्या जबाबदाऱ्या, सत्यमार्गातील संकटे व अडथळे, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावरील इमान याविषयीची दिव्यप्रकटणं देण्यात आली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 248      -पृष्ठे - 40 मूल्य - 20      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nt60mz1vk1u08jvlih4ye9vp8cfz9s1u








अल्लाह आपला निर्माणकर्ता, स्वामी, प्रभू, पालनकर्ता, आम्हावर उपकार करणारा आणि पूज्य आहे. या सर्व संबंधाची निकड हीच आहे की, आम्ही नखशिखांत कृतज्ञ बनून आंतरबाह्य त्याचे दास बनून राहावे. त्याच्याप्रति आपले काही कर्तव्य असते. मात्र ज्यावेळी आपण अल्लाहस शरण जाण्याचा निश्चय करतो, तेव्हा आपला अहंकार व मन यामध्ये सर्वांत मोठी अडचण ठरतो. आपल्या स्वैर इच्छा, अभिलाषा आणि अत्यंत आकर्षक व विलोभणीय आणि स्वप्नरंजित वासनांचे एक जबरदस्त लष्कर सैतानाच्या प्रेरणेने आपल्या मार्गात अडसर बनते आणि सत्यमार्गात जीवनाची वाटचाल करणाऱ्यावर जबरदस्त हल्ले चढविते.

अर्थातच विवाहासारख्या अत्यंत आनंददायक प्रसंगी इच्छा-अभिलाषांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या असतात आणि अशा प्रसंगी प्रत्येकास असे वाटते की याप्रसंगी आपण जिवांचे सर्व लाड पुरवावे, सर्व इच्छा व आकाक्षांची बिनधास्तपणे पूर्तता करावी. मग अल्लाह व पैगंबरांशी आदेशांची अशावेळी तो पायमल्ली करतो. भावना, इच्छा आणि स्वैर अभिलाषांचे सैतान मानगुटीवर बसलेले असते आणि माणूस इच्छा व स्वैर अभिलाषांच्या सुंदर, आकर्षक आणि विलोभणीय मोहपाशात अडकून अल्लाहशी असलेले निसर्गदत्त नाते तोडून टाकतो आणि मग हळू-हळू त्यास हा अतिसुंदर मोहपाश अल्लाहच्या आज्ञांना पायदळी तुडवित नरकाग्नीकडे घेऊन जात असतो. यदाकदाचित या सुंदर मोहपाशात अडकलेल्या व्यक्तीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतलीच आणि परत सत्यमार्गाकडे वाटचाल केली तर आणखीन एक संकट त्याची वाटच पाहत असते आणि ते म्हणजे घर-परिवार, नातलग आणि मित्रमंडळी होय. स्वत:ची कशीबशी सुटका केली असली तरी यांच्या जिवाचे चोचले पुरविण्याच्या अगदी स्नेहपूर्ण मागण्या समोर आलेल्या असतात आणि याचे आव्हानसुद्धा स्वीकारून सतत लढा द्यावा लागत असतो. मग अशा दोन-दोन संकटांच्या कचाट्यात सापडणाऱ्याकडे अल्लाहसमोर रक्षण आणि अभयदानाच्या मदतीची याचना केल्याशिवाय इतर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो. म्हणूनच प्रत्येक नमाजच्या प्रत्येक रकअतीमध्ये अल्लाहस शरण आलेला हा दास अल्लाहची मदत मागतो आणि त्याचा धावा करतो ते अशा शब्दांत, 

``आम्ही तुझीच बंदगी (भक्ती) करतो आणि तुजपाशीच मदतीची याचना करतो.''   (दिव्य कुरआन ,१ : ४)

कारण याचकास हे चांगलेच ठाऊक असते की या समस्त विश्वावर केवळ अल्लाहचाच आदेश चालतो, प्रत्येक बाब त्याच्याच अखत्यारीत असून त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणातही सामर्थ्य नाही. जीवन, मृत्यू, नफा, तोटा, मान-प्रतिष्ठा, अपमान, अप्रतिष्ठा, शासन, संपत्ती, उपजीविका, संतती, भाग्य, यश, अपयश, इहलोक, परलोक वगैरे सर्वकाही अल्लाहच्या हाती आहे. त्याच्याशिवाय इतराजवळ काहीच नाही. म्हणून त्याचा सच्चा भक्त केवळ त्याला प्रभू आणि स्वामी मानतो आणि त्याच्या कोपाची भीती बाळगतो व त्यावर पूर्ण भरवसा ठेवतो.

``ज्यांना लोकांनी सांगितले की, `तुमच्याविरुद्ध मोठ्या फौजा गोळा झाल्या आहेत, त्यांची भीती बाळगा' तर हे ऐकून त्यांची श्रद्धा अधिक वृद्धिंगत झाली आणि ते उत्तरले की, ``अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तोच सवोत्कृष्ट कार्य सिद्धीस नेणारा आहे.'' (दिव्य कुरआन ,३:१७३) 

अल्लाहचे हे गौरोवोद्गार त्याच्या कानात गुणगुणत राहतात, ``जो अल्लाहवर भिस्त ठेवील त्याच्यासाठी तो पुरेसा आहे.'' (दिव्य कुरआन , ६५:३)

त्यास चांगलेच ठाऊक आहे की, तो अतिशय दुर्बल आणि सामर्थ्यहीन आहे. इच्छा-आकांक्षा आणि स्वैर अभिलाषांच्या मायाजालात अडकविण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत ईशमार्गाकडे येण्यासाठी त्यास प्रचंड मोठ्या मदतीची गरज असते आणि संकटमय परिस्थितीत केवळ अल्लाहच त्याची मदत करू शकतो. त्याच्या मदतीशिवाय तो एक पाऊलसुद्धा उचलू शकत नाही. चोहोबाजुंनी घेरलेल्या संकटापासून आपला बचाव करण्यासाठी तो महान अल्लाहचा धावा करतो आणि अल्लाह त्याला आपल्या मदतीच्या छायेत अभय देतो. अशा स्थितीत तो निश्चिंत होतो की त्याला एकाच महान अस्तित्वाची (अल्लाह) मदत प्राप्त आहे आणि भक्ताच्या अंत:करणातून अल्लाहचे स्तवन करणारे शब्द नकळत बाहेर पडतात, 

``अल्लाहु अकबर!!!'' अर्थात ``अल्लाह महान आहे.''


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget