Latest Post


- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

साम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. प्रसारमाध्यमं भांडवलदारांच्या इशाऱ्यावर कशी नाचू लागतात याचा खुलासा या पुस्तिकेत आहे.

या पुस्तिकेत या व्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या दुष्परिणामांना विशद करण्यात आले आहे. स्त्रियांचे शोषण, स्त्री शरीर एक वस्तू, वेश्यावृत्ती, सौंदर्यप्रसाधणे, फॅशन, उपभोक्तावाद यावर चर्चा आली आहे आणि शेवटी यावर इस्लामी उपाय कुरआन व हदीसच्या प्रकाशात विशद करण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 253     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ehr15oakjpubcux9ix4o3ed5xfajmqzr




Ramzan

गत वर्षापासून अख्ख जग कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे जगण्याशी झूंजत आहे लहान, थोर, गरीब, श्रीमंत सर्व स्तरातील नागरिकांची फरफट सुरू आहे अशातच या महामारीमुळे भारतात 1 लाख 66 हजार लोक जग सोडून गेले आहेत तर जगात 28 लाख 7 हजार मृत्यू पावले आहेत. मात्र आपणा सर्वांना यंदाचा रमजान पाहण्याची संधी मिळाली आहे, आपल्या भाग्याची रेषा गडद असल्याचं सध्यातरी वाटत आहे कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागलं त्यामुळे यंदाच्या रमजानमधील रौनकही फिक्कटच राहणार. मात्र जबाबदारी वाढली आहे रमजानचा खरा हक्क अदा करण्याची

संयम, शांती, त्याग, एकात्मता, चारित्र्यसंपन्नता, ईशपरायणता, दानशुरता, प्रेमभाव,  शारीरिक संपन्नता आदी सद्गुणांनी भरपूर रमजान आम्हाला मेजवानी देणार आहे त्याचा लाभ घेणं श्रद्धावान ईमानधारकांसाठी अनिवार्य आहे रोजा इस्लामच्या पाच मुलभूत अनिवार्य कार्यापैकी एक. रोजा इमानधारकांसाठी अध्यात्मिक पर्वणीबरोबरच ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सखोल मार्गदर्शन करतो रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाल्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट ईश्वराकडून आम्हाला कुरआन स्वरूपात रमजानमध्येच मिळालेले आहे  म्हणून रमजानचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुरआनमध्ये एकूणएक मानवहितासाठी आवश्यक सर्वच बाबींचा उलगडा करण्यात आला आहे यशस्वी जीवनाची गुरूकुल्ली कुरआनमध्ये सापडते यासाठी प्रत्येक व्यक्ती जो जीवनाचे खरे रहस्य, खरे महत्व व खरे साफल्यता जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, ईश्वराशी संवाद साधायचा आहे अशी मनोमन इच्छा बाळगतो त्याने कुरआनचं समजून पठन करणं अनिवार्य आहे 

ईश्वराची कृपा पदरी पाडून घेण्यासाठी जगातील सर्व मानवांकरिता रमजानचा महिना अतिमहत्वाचा आहे रोजांचे महत्व अधोरेखित करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘ हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.’’ 

‘‘ हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वत:साठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.’’ 

‘‘ रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.’’  (संदर्भ : कुरआन सुरे अलबकरा आयत नं 183 ते 185)

सदर आयातींमध्ये रोजाची अनिवार्यता आणि त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही सांगितल्या आहेत तसेच रमजान रोजेधारकांसाठी तर पर्वणी आहेच शिवाय जे गरीब, गरजवंत आहेत त्यांच्याकरिताही आनंदाचा महिना आहे या महिन्यात जकात, सदका, फित्राच्या माध्यमातून गरीब, गरजवंतांची सेवा करण्याचा मान ऐपतदार ईमानधारकांना मिळतो 

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपसुकच लॉकडाऊनमुळे आपल्यावर बाहेर पडण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी, बाजारात फिरण्यासाठी, हॉटेल आदी ठिकाणी मिष्टांनाचा आस्वाद घेण्यावर बरीचशी बंधने आल्यामुळे रमजानच्या रौनकपासून काही प्रमाणात आम्हाला मुकावं लागणार आहे मात्र स्वत:मध्ये मानवकल्याणासाठी आवश्यक ते बदल करून घेण्याची संधी आहे रोजा फक्त उपवासाचं नावं नाही तर सर्व इंद्रियांचा विकास करण्याची संधी देतो त्यामुळे रमजान महिन्याचं स्वागत करतो आणि आपणां सर्वांना रमजानचा हक्क अदा करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. आमीन.  

- बशीर शेख




धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव हे एकाच माता-पित्याची संतती असल्याने आपण समस्त मानव एकाच परिवाराचे सदस्य आहोत. आपसांत बंधु आणि नातलग आहोत. म्हणून प्रत्येकाचे एकमेकांवर हक्क आहेत. हे हक्क पूर्ण करणे नितांत आवश्यक आहे. जसी अल्लाहची दासत्व हदीसद्वारा माहीत होते अल्लाह कुफ्र व शिर्कशिवाय अल्लाहस वाटल्यास  इतर अपराधांची माफी देईल, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली मुळीच खपवून घेणार नाही व माफ करणार नाही जोपर्यंत मनुष्य स्वत: माफ करत नाही.

विवाहप्रसंगी मानवाधिकार आणि नातलगांचे अधिकार पूर्ण करण्याची शिकवण अत्यंत महत्त्वपूर्ण असून नववधू आणि वराच्या नातलग व याप्रसंगी हजर असलेल्या लोकांसाठी अमूल्य भेट आहे. पतीने पत्नीचे हक्क पूर्ण केल्यास, मुलांनी मात्यापित्यांचे, मातापित्यांनी मुलांचे आणि नातलगांनी एकदुसऱ्यांचे आणि शेजाऱ्यांने शेजाऱ्याचे तसेच प्रत्येकाने दुसऱ्याचे हक्क जर पूर्ण केले तर या भूतलावर स्वर्गरूपी नंदनवन बहरेल.

या आयतीवरून हे स्पष्ट होते की सर्व मानव एकाच माता-पित्याची संतती असून सर्वजण एकाच परिवार आणि एकाच वंशाचे सदस्य आहेत. म्हणून वर्ण आणि वंश तसेच जाती-पातीच्या आधारे कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. त्या आधारावर वरिष्ठ-कनिष्ठ आणि उच्च-नीच भेदभाव इस्लामने नष्ट केला आहे.



माननीय आएशा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा आधार घेऊन बसले असताना सांगितले, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि माझ्या जगतसखा! मला तुझी भेट घडू दे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

आयुष्यभर ईशमार्गात सक्रिय राहूनसुद्धा अल्लाहपाशी क्षमादान आणि दयेची, कृपेची याचना करीत आहेत आणि कामना करीत आहेत की ‘जीवनसखा’ची भेट घडावी. हीच विनम्रता आणि भक्तीभाव आहे जो ईमान (श्रद्धाशीलते) चा वास्तविक आत्मा, हृदय तथा प्राणसौंदर्य आहे.



- सय्यद सुजाअत हुसैनी

भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रुप धारण करतात.

ही पुस्तिका वाचकांना भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामीक उपाय कुरआन प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 252     -पृष्ठे - 48 मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/50ia0bgr9huh60hjr2lputz6jsfkevph






हजरत उमर (र.) यांनी सर्वप्रथम प्रतिनिधी सभा आणि मार्गदर्शक मंडळाची संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केले होते की सल्लामसलतीविना खिलाफत अवैध आहे. विशेष प्रसंगी मजलिसे शूरा (मार्गदर्शक मंडळ) भरविल्या जात होत्या. या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाजासाठी मस्जिदे नबवीमध्ये सभांचे आयोजन होत होते. विविध प्रांत आणि जिल्ह्यांचे जे अहवाल प्राप्त होत असत ह. उमर या सभेत सर्वांना त्याची माहिती देत असत. एखाद्या समस्येविषयी ह. उमर या सभेतील सभासदांशी विचारविनिमय करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आणि त्यानुसार त्यांचे निवारण केले जात असे.

मजलिसे शुराच्या सभासदांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांनाही शासकीय कामकाजाच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात असे. जिल्ह्यावर प्रभारींची नियुक्ती जनतेच्या सहभागानने केली जाई. काही प्रसंगी तर निवडणुकीच्या प्रक्रियेतून जिल्ह्यांचे प्रभारी निवडला जात असे. कुफा, बसरा आणि शाम (सीरिया) या जिल्ह्यांतील नागरिकांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील अशा व्यक्तींची निवड करावी जो सदाचारी, प्रामाणिक आणि सक्षम असावेत.

लोकतांत्रिक शास्त्र पद्धतीचे सौंदर्य असे की राज्यकर्ता – सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांना एकसारखे अधिकार प्राप्त असावेत. या उलट कोणते कायदे – नियम केले जाऊ नयेत.

सत्ताधारीला आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता होईल यापेक्षा जास्त त्याने राज्याच्या खजिन्यातून घेऊ नये. सामाजिक क्षेत्रात शासनकर्त्याला कोणते विशेष अधिकार, मानमरातब दिले जाऊ नयेत. त्याचे अधिकार मर्यादित असावेत. सामान्य नागरिकांना आपल्या राज्यक्त्यावर टीका-टिप्पणी करण्याची मुभा असावी. यापेक्षा अधिक अधिकार ह. उमर यांच्या पूर्वीच्या कोणत्याही काळात, कोणत्याही राष्ट्रात, कुण्या शासक-राज्यकर्त्याने दिलेले नव्हते. ह. उमर यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटले होते की,

"मला राष्ट्राच्या तिजोरीतून इतकाच खर्च दिला जावा, जो एका अनाथाच्या दैनंदिन गरजांची सोय करणअयासाठी आवश्यक असेल. जर मला श्रीमंती लाभली असती तर मला काहीही घेण्याचा अधिकार नसता. माझ्यावर तुमचे अनेकविध हक्काधिकार आहेत, ज्यांचा तुम्ही मला हिशोब मागितला पाहिजे. दुसरे असे की वाममार्गांनी राज्याच्या तिजोरीत भर घालू नये. माझ्या हाती कर आकारणी आणि युद्धापासून मिळालेल्या मालमत्तेच्या संपत्तीचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होता कामा नये. देशाची सुरक्षा आणि तुम्हाला खर्चासाठी सोय करणे माझ्यावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोणत्याही हानीकारक परिस्थितीपासून तुमची सुरक्षा करणं माझे कर्तव्य आहे."

(संदर्भ – अल-फारुक, मौलाना शिवली नुअमानी)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget