Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, लोकांशी नैतिकतेचा व्यवहार करा, याशिवाय तुम्ली सदाचारी असू शकत नाही. लोक असे समजतात की सदाचार म्हणजे केवळ अल्लाहच्या अधिकारांचे पालन करणे. तसे नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटत राहणे म्हणजे सदाचार आहे. तुमच्या नैतिकतेत प्रामाणिकपणा असावात, एकमेकांशी बंधुभावाचा व्यवहार करा, हा सदाचार आहे. सर्वोत्तम मुस्लिम तो आहे ज्याचे चारित्र्य सर्वोत्तम असेल.

पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की, अशा लोकांसाठी स्वर्ग तयार केले गेले आहे जे कोणत्याही परिस्थितीत आपला माल खर्च करतात. मग ते संपन्न असोत की गोरगरीब. जे लोक आपल्या रागावर नियंत्रण करतात, एकमेकांच्या चुकांना क्षमा करतात, असेच लोक नेक आहेत, ज्यांना अल्लाह पसंत करतो.

असे लोक आपल्या विधात्यावर निष्ठा व्यक्त करतात जे पापांपासून, व्यभिचारापासून अलिप्त राहतात. आपल्या कार्यात एकमेकांशी सल्लामसलत करतात. आम्ही जी काही साधने त्यांना दिलेली आहेत, त्यातून ते खर्च करतात. त्यांच्यावर अतिरेक केला जात असेल तर त्याचा सामना करतात. कुणी तुमच्याशी वाईट वर्तन केले असेल तर तितकाच वाईट व्यवहार तुम्ही करू शकता, पण जर तुम्ही क्षमा केली तर यासाठी अल्लाह तुम्हाला मोबदला देईल. अल्लाहला अत्याचारी लोक पसंत नाहीत. तुम्ही जर चांगले वर्तन करत असाल तर ते तुमच्यासाठीच भल्याचे असते. आणि जर तुम्ही कुणाशी वाईट केले तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे. (पवित्र कुरआन सार)


आपसातील देवाणघेवाणीमध्ये व्यावहारिकता

गरीब, श्रीमंत, व्यापारी, कर्मचारी, मजूर कुणीही असो, प्रत्येकास कधी ना कधीया ना त्या कारणामुळे कुणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते. देवाण-घेवाण करावी लागते. कुणाकडून कर्ज घेऊन आपल्या अडचणी सोडवण्यात काही गैर नाही. पण कर्ज घेण्याचे आणि त्याची परतफेड करण्याचे काही नियम-कायदे आहेत. तसे आपल्या देशात तर बँकांकडून कर्ज घेणे हा मोठ्या उद्योगपतींचा शंभर टक्के फायद्याचा एकमेव धंदा बनलेला आहे. ते कर्ज घेतात ते बुडविण्यासाठी. परतफेड करण्यासाठी नाही.

पवित्र कुरआनात दोन माणसांमध्ये कर्ज देवाणघेवाण कशी व्हावी यासाठी नियम दिले आहेत. यात सर्वप्रथम जी अट घातली आहे तीअशी की कर्ज ठराविक मुदतीसाठी घ्यावे म्हणजे परतफेड कधी करायची ते अगोदरच निश्चित केले जावे. दुसरे असे की कर्ज घेताना त्याचा लेखी करार करावा. उभय पक्षांतील एकाने ते लिहून घ्यावे, करार लिहिण्यास कुणी नकार देऊ नये. या करारात काय लिहायचे आहे, कोणत्या अटी आहेत, कर्जाचा अवधी काय असेल या सर्व बाबी कर्ज घेणाऱ्याकडून ठरवाव्यात. देणाऱ्याने आपल्या मर्जीत येईल तशा जाचक अटी घालू नयेत. कर्ज घेण्याची ज्याच्यावर पाळी असेल त्यालाच स्वतःची आर्थिक क्षमता माहीत असते. जर कर्ज घेणाऱ्यास स्वतः करार लिहून काढणे जमत नसेल तर त्याच्याकरवी त्याच्या पालकाने, वकिलाने लिहून द्यावे. लिहिणाऱ्याने यात कमीजास्त करता कामा नये. लिहून झाल्यावर ते कर्जदाराला वाचून दाखवावे. त्या करारावर दोन व्यक्तीच्या स्वाक्षरी घ्याव्यात. जर दोन पुरुष हजर नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रियांनी साक्षीदार व्हावे. अल्लाह म्हणतो, कर्ज अल्पावधीचे असो की दीर्घावधीचे, हीच पद्धत न्याय्य आहे. साक्षीदारांनीही प्रामाणिकपणा दाखवावा. कर्ज घेणाऱ्यास कराराची भाषा समजत नसेल तर त्याला समजावून सांगावे. लिहिणारा आणि साक्षीदार यांनी संगनमत करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात एका व्यक्तीने कर्ज घेतले, पण त्याची परतफेड जमत नव्हती. अशा वेळी प्रेषितांनी इतर लोकांना त्याला मदत करण्यास सांगितले आणि ज्याच्याकडून कर्ज घेतले होते त्यास प्रेषितांनी काही कर्ज माफ करण्यास सांगितले. हे लक्षात असू द्यावे की इस्लाममध्ये व्याजावर कर्ज दिले जात नाही. (संदर्भ- पवित्र कुरआन, २:२८१)

- सय्यद इफ्तिखार अहमद



- डॉ. अब्दुल हक अन्सारी 

ही पुस्तिका म्हणजे जाहीर सभेत दिलेले एक भाषण आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पणच इहलोक व परलोकात सफलता व मुक्ती प्राप्तीचा मार्ग आहे.

इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे आणि ही एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. लोकांना दयाळुतेची, प्रसन्नतेची, सफलता व मुक्तीची शुभसूचना देणारा धर्म इस्लाम आहे. या पुस्तिकेत इस्लामी न्यायाचा सिद्धान्त कुरआनचे आवाहन, राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय, भारतातील न्यायाची स्थिती इ.विषयी चर्चिले गेले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 257       -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xpqf6swyv0cez669n3xwfckbk6d48nte






माननीय आएशा (रजि.) सांगतात,

‘‘मी कधी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना अशा प्रकारे हसताना पाहिले नाही की तोंड पूर्णत: उघडे आहे आणि आतील कंठी दिसू लागेल. पैगंबर केवळ स्मितहास्य करीत असत जेव्हा आकाशात ढग व सोसाट्याचा वारा पहात तेव्हा त्यांचा चेहरा बदलून जात ज्याला सहज समजले जात असे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांचा चेहरा भयभीत होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत असत. त्यांचे हृदय नेहमी ईशभययुक्त असे. आकाशात ढग आच्छादित होणे व सोसाट्याचा वारा वाहणे, यावर ते अधिक चिंतीत होत असत, कारण ढग व हवेच्या मागे एखादे वेळी ईशप्रकोपाची वीज तर दडलेली नसावी.

एका हदीसनुसार कळते की अशा परिस्थितीत त्यांची चिंता अधिक वाढत असे, ज्यामुळे ते घरात व घराबाहेर ये-जा करीत असत. त्यांची ही व्याकुळ स्थिती तेव्हाच संपत असे जेव्हा पाऊस पडणे सुरू होत असे.

माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबरांना त्यांच्या व्याकुळतेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे आएशा! कोणास ठाऊक, हे ढग तेच तर नाहीत ज्यांच्याविषयी आदच्या राष्ट्रातील लोकांनी सांगितले होते, ‘हे ढग आहेत, पाऊस पडेल.’ परंतु आद लोकसमुदाय भ्रमात राहिला होता. ईश्वराने त्या राष्ट्राला नष्ट करून त्वरित त्यांचा हा भ्रम दूर केला.’’



जीवनात तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी असतो ज्याचे शरीर निरोगी आणि मन शुद्ध असते. ईश्वराने मानवानिर्मितीपासून त्याच्या कल्याणाची सोय करून ठेवलेली आहे. वेळोवेळी त्याच्या गरजेनुसार त्यामध्ये बदलही करण्यात आले आहेत. आजचा व्यक्ती तणावाने ग्रस्त असून, विषाणूजन्य आजारांनी त्रस्त आहे. यामुळे तो शरीर अन् मनाने खचत चालला आहे. दिवसेंदिवस माणसाचे आयुष्यमान हे कमी होत असून, सुखसुविधां असूनही तो तणावमुक्त नसल्याचे दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीत माणसाच्या आरोग्य अन् मनाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजाची उपासना पद्धती फक्त विशेष समाजघटकांसाठी मर्यादित नसून ती सर्व मानवकल्याणाच्या हिताची आहे. 

रोजाचे शारीरिक फायदे

1. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो. 

3) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याच्या सवयीमुळ अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले गेल्यामुळे पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोने्निटन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते. 

4) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते.  

मनोवैज्ञानिक फायदे

फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. शरीरासोबत मनही शुद्ध होते.



प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शेजाऱ्यांशी आदर-सन्मानाचा व्यवहार करण्यास सांगितले आहे. शेजाऱ्याला त्रास देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एकदा एका अनुयायाने प्रेषितांना विचारले की कोणता गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे? त्यावर प्रेषित म्हणाले की अल्लाहला भागीदार जोडणे आणि आपल्या आपत्यांना ठार करणे, ते तुमच्या सुखसुविधांमध्ये भागीदार होतील या भीतीने. आणि हे की तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. प्रेषित पुढे म्हणाले की कुणी दहा स्त्रियांशी व्यभिचार केला तरी तो एखाद्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्यापेक्षा कमीच आहे. तसेच एखाद्याने दहा घरांमध्यो चोरी केली तरी ती शेजाऱ्याच्या घरी चोरी करण्याच्या तुलनेत कमीच समजली जाईल. प्रेषित पुढे म्हणतात की अशी व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचाराला बळी पडत असेल. जर एखादी स्त्री आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत असेल आणि त्याचबरोबर ती नमाज अदा करीत असेल आणि रोजे ठेवत असेल तरीदेखील ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तसेच एखादी महिला नमाज अदा करते, दानधर्म करते, त्याचबरोबर जर ती शेजाऱ्यांशी सदवर्तन करत असेल तर ती स्वर्गात जाईल. प्रेषितांनी घोषणा केली की आपल्या घराच्या अवतीभवती ४० घरे शेजारी समजले जावेत. एकदा मुस्लिमांच्या माता ह. आयेशा यांनी प्रेषितांना विचारले की माझे दोन शेजारी आहेत. मी कुणाला भेटवस्तू देऊ? प्रेषित म्हणाले, ज्याचे दार तुमच्या दाराजवळ असेल. शेजाऱ्यांचे हक्काधिकार विशद करताना प्रेषित म्हणतात, त्याने तुमची मद मागितली तर त्याला मदत करा. त्याला कर्ज लवे असेल तर कर्ज द्या. तेवढ्यावर भागले नसेल तर पुन्हा द्या. आजारी पडल्यास त्याची विचारपुस करा. त्याला कोणते यश लाभले असेल तर शुभेच्छा द्या. अडचणीत सावडल्यास त्याच्या मदतीला धावून जा. त्याच्या घरात हवा जात नसेल तर आपल्या घराच्या भिंतीची उंची कमी करा. एखादे पक्वान्न केल्यास ते पदार्थ त्याच्या घरी पाठवा. जर फळे आणली असतील तर शेजाऱ्यालाही द्या. देऊ शकत नसाल तर तुमच्या मुलांना फळ घेऊन घराबाहेर पाठवू नका जेणेकरून शेजाऱ्यांच्या मुलांना दुःख होणार नाही.

पुरुष आणि स्त्री

पुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”

- सय्यद इफ्तिखार अहमद



- प्रा. उमर हयात खान गौरी

बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्र्चाश्नांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रुप देण्यात आले. सामाजिक नीतीमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. ही पुस्तिका विश्लेषनात्मक महत्त्व ठेवून असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.

या पुस्तिकेत या चळवळीचे दुष्परिणामांना स्पष्ट करुन वाचकांपुढे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 256      -पृष्ठे - 64 मूल्य - 30        आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/hkk64qggokzcl43lvo78fxncazeegnf9








statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget