Latest Post


कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 

ये पहला सबक था किताबे हुदा का

के मखलूक सारी है कुन्बा खुदा का

एक काळ होता जेव्हा मुस्लिम हे जागतिक महासत्तेच्या ठिकाणी होते. औद्योगिक क्रांतीनंतर त्यांचे हे स्थान ब्रिटिशांनी हरवून घेतले. कालांतराने अमेरिकन्स त्यांच्या जागी आले आणि सुपर पॉवर झाले. आज त्यांच्या स्थानाला चीन धक्के देत आहे. या घटनाचक्राच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम उम्माहच्या पतनाची कारण मिमांसा करून त्यावर काही उपाय सुचविता येतील का हा या आठवड्याचा चर्चेचा विषय आहे. 

इस्लामला पृथ्वीवर का आणले गेले

मिटाया कैसरो किसरा के इस्तब्दाद को जिसने 

वो क्या था जोरे हैदर, फकरे बुज़र, सिद्दीके सलमानी

या पृथ्वीवर अवतरित झालेले पहिले जोडपे म्हणजे अ‍ॅडम आणि ईव्ह यांच्यापासून आजतागायत सात अब्जांपेक्षा जास्त लोकसंख्येचा विस्तार झालेला आहे. हजारो वर्षांच्या कालखंडात मानवाने अनेक चढउतार पाहिले, अनेक चांगली कामं केली, अनेक वाईट कामं केली, पुण्य केले, पाप केले, जेव्हा-जेव्हा पाप जास्त झाले, माणूस पथभ्रष्ट झाला, नेकीपासून लांब गेला, त्या-त्या वेळी ईश्वराने त्याला सरळ मार्गावर आणण्यासाठी पैगंबर पाठविले. ज्यांची संख्या 1 लाख 24 हजार मानली जाते. शेवटी मानवाने एवढी प्रगती केली की पुढे प्रेषित पाठविण्याची गरज उरली नाही. म्हणून ईश्वराने शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यानंतर प्रेषित पाठविण्याचा सिलसिला बंद केला. परंतु हा सिलसिला बंद करण्यापूर्वी त्यांच्यापासून ते प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जीवन जगण्याची एक आचारसंहिता ईश्वराने ठरवून दिली. प्रेषित सल्ल. यांनी ती अरबस्थानामध्ये प्रत्यक्षात लागू केली आणि शेवटच्या हजच्या समापनाच्या दिवशी अराफातच्या मैदानातील टेकडीवर उभे राहून शेवटचे संबोधन करताना सांगितले की, ’’इस्लामचा हा जो संदेश मी तुम्हाला दिलेला आहे आज पूर्ण झाला. आज जे या ठिकाणी हजर आहेत त्यांचे हे कर्तव्य आहे की, जे या ठिकाणी हजर नाहीत त्यांच्यापर्यंत हा संदेश जसाचा तसा पोहोचवावा.’’ येणेप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेल्या एक लाखापेक्षा जास्त जनसमुदायाने प्रेषितांचा तो आदेश शिरसावंद्य मानला व जगात विखुरले गेले. भारतातही केरळच्या समुद्रकिनारी मलबार येथे सन 51 हिजरी मध्ये सहाबा रजि. यांचा एक काफिला हजरत तमीम अन्सारी रजि. यांच्या नेतृत्वाखाली आला व त्यांनी इस्लामचा संदेश केरळमधील लोकांपर्यंत पोहोचविला. राजा चिरामन पेरूमल आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तो स्विकारला. आजही त्यांच्या काळात मालिक बिन दिनार यांनी बांधलेली चिरामन जामा मस्जिद आबाद आहे.

थोडक्यात इस्लामला पृथ्वीवर आणण्याचे एकमेव कारण होते मानवकल्याण. म्हणून मुस्लिमांचे ही जगण्याचे एकमेव कारण मानवकल्याणच आहे. नैतिकतेचा आदेश देणे आणि अनैतिक कामांपासून रोखणे हेच इस्लामचे म्हणजेच पर्यायाने मुसलमानांचे प्राथमिक कर्तव्य आहे, यालाच कुरआनच्या भाषेत अम्रबिल मारूफ व नही अनिल मुनकर असे म्हणतात. (संदर्भ : सुरे आलेइम्रानः110)   

आजच्या मुस्लिमांची अवस्था

परंतु इस्लाम स्थापनेच्या 1442 वर्षानंतर मुस्लिमांची अवस्था काय आहे? याचा आपण जेव्हा मागोवा घेतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, इस्लाम आहे तसाच आहे मात्र मुसलमानांतील बहुसंख्य लोक हे इस्लामच्या शिकवणीपासून लांब गेलेले आहेत. दूरची गोष्ट सोडा भारतीय मुस्लिम समाजाची काय अवस्था आहे हे पहा. मुस्लिम सदृश्य नाव असलेल्या मात्र इस्लामची सर्व गुणवैशिष्ट्य हरवलेला हा समाज म्हणजे फक्त 20 कोटी लोकांची गर्दी बणून राहिला आहे. काही हजार, फारतर काही लाख लोक इस्लामी चारित्र्याचे आहेत असे म्हणता येईल. बाकी 20 कोटी लोक इस्लामचा इबादतींपुरता भाग घेऊन त्यातच संतुष्ट राहून बाकी इस्लामचा त्यांनी व्यवहारातून त्याग केलेला आहे. मानवतेचे कल्याण तर सोडा आज मुस्लिमांना स्वतःचेच कल्याण करता येत नाही. आपसात प्रचंड तंटे आहेत, बहुसंख्य मुस्लिम संधी मिळेल तिथे भ्रष्ट आचरण करतात, अन्याय व अत्याचार करतात, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, गटातटात विखुरलेले आहेत, त्यांना भारतात सत्तेत स्थान नाही, त्यांच्या हातात सत्ता असती तर त्यांनी भारताची अवस्था ही पाकिस्तानसारखी करून टाकली असती यात शंका नाही. त्यांचे आपसातील हितसंबंधही चांगले नाहीत. मसलकी (स्कूल ऑफ थॉट) कलह एवढा मोठ्या प्रमाणात आहे की, अफगानिस्तानसारखी खुली आर्म पॉलिसी असती तर यांनी  अफगानिस्तान आणि पाकिस्तानसारखा आपसात हिंसाचार केला असता, यातही शंका नाही. त्यांची सामाजिक अवस्थाही फारशी चांगली नाही. जवळ-जवळ प्रत्येक लग्नात इस्लामी निकाह संहितेच्या विरूद्ध जावून वरपक्ष, वधूपक्षाकडून जमेल तेवढी लूट करतो. व्यसनाधिनता कमी जरी असली तरी ती आहे. प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये मुस्लिमांचा सहभाग दखलपात्र असा आहे. याच स्थितीला पाहून इ्नबालनी म्हटले होते की, 

रह गई रस्मे अजां रूहे बिलाली न रही

फलसफा रह गया तलकीने गजाली न रही

इस्लाम धर्मच नव्हे एक जीवन व्यवस्था

मुस्लिम असे म्हणताना थकत नाहीत की इस्लाम फक्त धर्मच नाही तर एक जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था आहे पण त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर उत्कृष्टता तर सोडा ती सरासरी दर्जाची सुद्धा नसल्याचे दिसून येते. मग बिगर मुस्लिमांनी का बरे त्यांच्या या तथाकथित (अल्लाह क्षमा करो) सर्वोत्कृष्ट जीवन पद्धतीच्या दाव्यावर विश्वास ठेवावा? दूसरी महत्त्वाची बाब अशी की, सामाजिक शिष्टाचार हा इस्लामी जीवन पद्धतीचा पाया आहे. बहुसंख्य मुस्लिमांच्या जीवनातून तोच गायब आहे. मग बिगर मुस्लिमांनी त्यांच्या उत्कृष्टतेच्या दाव्यावर का विश्वास ठेवावा? पहा ! इस्लामी जीवन शैलीचा त्याग केल्याने आपण आपली तर हानी करूनच घेत आहोत उलट आपल्या वागण्याने आपणच आपल्याच दाव्याला सुरूंग लावत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्याला नाही. यापेक्षा दुर्दैव ते कोणते? 

केवळ इस्लाम महान आहे व इस्लामी जीवनशैली परिपूर्ण आहे म्हणून भागणार नाही. इस्लामचा उदोउदो केल्याने काहीच बदलणार नाही. उलट आपण खोटारडे आहोत हे सिद्ध होईल. नुकतीच ईदुल अजहा झाली किती लोकांना या ईदचा मूळ गाभा माहित आहे? ईदुल अजहाला बकरी ईद म्हणणारे हे अज्ञानी लोक या ईदवर पशुबळी दिला जातो, असा आरोप करणाऱ्यांना नीट उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांना हे म्हणता आले नाही की पशुबळी आणि कुर्बानी याच्यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करता आलेला नाही? म्हणून मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सदस्याला इस्लाम आणि इस्लामी जीवनशैलीकडे केवळ भावनाशील होवून पाहून जमणार नाही तर त्यासाठी वस्तुनिष्ठ प्रयत्न करावे लागतील. 

कल्पना करा एक गुन्हा सामान्य नागरिकाने केला आणि तोच गुन्हा पोलिसाने केला तर न्यायाधीश कोणाला जास्त शिक्षा देईल? नक्कीच पोलिसाला. कारण सामान्य माणसाच्या तुलनेत पोलिसांची जबाबदारी अधिक असते. गुन्हेगारीचा नायनाट करण्याची त्यांची जबाबदारी असते. ज्याला की खलनिग्रहणाय असे म्हणतात. हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे. अशा परिस्थितीत त्यांनी गुन्हा केला तर तो सामान्य माणसाच्या तुलनेत जास्त गंभीर मानला जातो. म्हणूनच त्याची शिक्षाही जास्त असते. ठीक अशीच परिस्थिती मुस्लिमांची आहे. त्यांचा जन्मच सदाचाराची स्थापना करण्यासाठी व दुराचाराविरूद्ध यथाशक्ती निरंतरम् लढा देण्यासाठी झालेला असतांना तेच जर वाईट कृत्य करू लागले, अप्रामाणिकपणे वागू लागले, गुन्हे करू लागले तर त्यांची शिक्षा मुस्लिमेत्तरांपेक्षा जास्त असणारच हे ओघानेच आले आणि हेच होत आहे आणि मुस्लिमांच्या पतनाचे हेच प्रमुख कारण आहे. 

मुस्लिम आपले जन्मजात कर्तव्य विसरले आणि त्याची त्यांना ईश्वरीय शिक्षा मिळत आहे. सत्तेत असो की नसोत, बहुसंख्य असो की अल्पसंख्यांक असोत ते सर्व क्षेत्रात अयशस्वी होत आहेत नव्हे पराजित होत आहेत. जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक एकत्रितरित्या हा निर्णय करणार नाहीत की, व्यवहार्यरित्या आपल्यामधील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्या प्रवृत्तींची (जाणीवपूर्वक) जोपासना करू व इस्लामचा संदेश इतरांपर्यत पोहोचवू तोपर्यंत समाजसुधारणेचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल.

त्यांच्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली व त्यांनी इस्लामच्या मानवतेचा संदेश व्यापक प्रमाणात आपल्या वर्तणुकीतून देशबांधवांना दिला तरच बहुसंख्य हिंदू बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवतील नसता फाळणीला जबाबदार नसूनही आजच्या मुस्लिम पीढिला ज्या तिरस्काराचा सामना करावा लागत आहे तो पुढेही करावा लागेल, यात शंका नाही.

ही झाली भारतीय मुस्लिमांची अवस्था. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांची अवस्था काय आहे हे पाहू. जगात एकूण 56 मुस्लिम राष्ट्र आहेत. त्यापैकी शुद्ध इस्लामी म्हणावे असे एकही राष्ट्र नाही. आज त्यांचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, वैयक्तिक वर्तणूक ही बिगर इस्लामीच आहे. जोपर्यंत ती इस्लामी होणार नाही तोपर्यंत ते यशस्वी होणार नाहीत व दुसऱ्यांना संदेश देण्याचा तर प्रश्नच उत्पन्न होणार नाही. 

बिगर इस्लामी वर्तणुकीमागची कारणे

हो मुबारक तुम्हे बातील की परस्तीश लेकीन

हक का खुर्शीद जरा देर सही चमकेगा

इस्लामी वर्तणुकीपासून लांब जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मुस्लिमांवर झालेला पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव होय. कारण या जीवनशैलीमध्ये माणसाच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही इच्छापूर्तींची कशाही मार्गाने पूर्ती करण्याची मूभा आहे. माणूस प्रवृत्तीनेच आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीकडे प्राधान्याने पाहत असतो. इस्लामी जीवनशैलीमध्ये हलाल, हरामची कैद असल्यामुळे व पाश्चात्य जीवनशैलीमध्ये ती नसल्यामुळे ज्यांची श्रद्धा कमकुवत आहे असे लोक इस्लामी जीवनशैलीपासून दूर गेलेले आहेत. 

दुसरे कारण मुस्लिाम समाजातील एका मोठ्या गटाने इस्लामी आदेशांची प्रत्यक्षात जवळ-जवळ अवहेलना केलेली आहे. मुस्लिमांमध्येही पुरोहितवाद वाढलेला आहे. केवळ 4 टक्के मुस्लिम मदरशात जातात म्हणून त्यांच्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हेच 4 टक्के तरूण धर्माचा अभ्यास करतात आणि समाजाचे धार्मिक नेतृत्व करतात. प्रत्येक मस्जिदीवर त्यांचे वर्चस्व असते आणि सामान्य लोक त्यांचेच ऐकतात. भारतीय मदरशातून शिकवला जाणारा इस्लाम हा परिपूर्ण नाही हे खेदाने म्हणावे लागते. या 4 टक्क्यांमधील अर्धेअधिक मुलं केवळ कुरआन मुखोद्गत करून बाहेर पडतात व जे आलीम, मुफ्ती होतात त्यांचा अभ्यासही कालबाह्य झालेल्या पारंपारिक पद्धतीने करवून घेतला जातो म्हणून त्यांच्यात आधुनिक सामाजिक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होत नाही. मदरश्यातून बाहेर पडल्यानंतर हे विद्यार्थी दैनंदिन आणि जनाजाची नमाज पढविणे तसेच लग्न लावण्यापुरते मर्यादित होऊन राहिले आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर मुस्लिम समाजात प्रचंड बिगर इस्लामी रूढी-परंपरा रूजलेल्या आहेत. त्यांच्याविरूद्ध हे मदरश्यातून निर्माण झालेले नेतृत्व चळवळ उभी करू शकत नाहीत. कुरआन जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याचे फक्त वाचन करून व करवून घेऊन हे धार्मिक नेतृत्व संतुष्ट आहे. नमाजमध्ये इमाम काय पठण करत आहे? काय दुआ मागत आहे? हे नमाजींना माहितच नाही आणि ते समजून सांगण्याची इमामांना गरजही वाटत नाही. कुरआन कळत नाही म्हणून जीवन वळत नाही. कलमा आणि इबादती गळ्याखाली उतरत नाहीत. हृदयापर्यंत पोहोचत नाहीत म्हणून त्या आचरणात येत नाहीत. मुस्लिम जनता ही न कळणाऱ्या भाषेत इबादतीकरून संतुष्ट झाल्यामुळे, त्या इबादतींचा खोलवर परिणाम न झाल्यामुळे, भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहते आणि इस्लामी जीवनशैलीपासून लांब जाते. त्यामुळे त्यांना इस्लामी आचरण करण्याचे व तिचा संदेश इतरांना देण्याचे कर्तव्य पार पाडता येत नाही. 

मुस्लिम ही इतरांप्रमाणे सतत भौतिक गोष्टींमध्ये व्यस्त राहिल्यामुळे मानवतेची मोठी हानी होत आहे. यातून एक अशी विचित्र कोंडी निर्माण झालेली आहे की, मुस्लिम मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींना उत्तेजन जरी देत नसले तरी ईश्वराला अपेक्षित असा विरोधही करतांना दिसत नाहीत. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय  मुस्लिम समुदाय हा ईश्वरीय सैन्य आहे जे की, वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत वाईट गोष्टी आजूबाजूला घडत असतांना हे सैन्य जर मूक दर्शक बणून त्याकडे कानाडोळा करत असेल तर या लष्कराला निलंबित करणे हाच एक मार्ग उरतो. म्हणून मुस्लिम उम्मा ही ईश्वराकडून निलंबित केलेली गेलेली उम्मा आहे. निलंबित अधिकारी जसे तिरस्कारास पात्र असतात तसेच मुस्लिमही तिरस्काराला पात्र झालेले आहेत. म्हणून सर्वत्र त्यांचा तिरस्कार केला जातोय. या तिरस्कारातून सुटका करून घ्यावयाची झाल्यास काय करावे लागेल? याची चर्चा खालीलप्रमाणे -

उपाय

1. इस्लामच्या दृष्टीने मृतप्राय झालेल्या या उम्माहमध्ये पुन्हा जीव फुंकावयाचा झाल्यास सर्वप्रथम त्यांना कुरआन समजून वाचण्याचे आंदोलन सुरू करावे लागेल. हे सहजशक्य आहे. फक्त त्याची जाणीव समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. नियोजनपूर्वक जनजागृती केल्यास कुरआन समजून वाचणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि एकदाका बहुतेक मुस्लिमांनी कुरआन समजून घेतला तर ईश्वराला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपोआपच त्यांना कळेल. मग आपोआपच त्यांच्या मनात वाईट गोष्टींबद्दल तिरस्कार व चांगल्या गोष्टींबद्दल आकर्षण निर्माण होईल. कारण वाईट गोष्टी करणाऱ्यांनासुद्धा शेवटी चांगल्याच गोष्टी आवडतात. कुठल्याही चोराला वाटत नाही की आपली मुले चोर व्हावीत. तद्वतच कुरआन समजून वाचल्यावर वाईट मुस्लिम माणसाला सुद्धा वाटणार नाही की, आपली मुलं वाईट व्हावीत. त्याच्या मनातसुद्धा पश्चातापाची भावना निर्माण होईल व त्याचे परिमार्जन करण्यासाठी तो पेटून उठेल व मुल्ला-मौलवींपेक्षा जास्त तीव्रतेने इस्लामी जीवनशैली प्रमाणे वागू लागेल. कुरआन समजून घेण्याची व्यक्तीगत पातळीवर सुरू झालेली ही मोहीम  बघता-बघता सामाजिक होईल. कारण निलंबित जरी असला तरी शेवटी तो ईश्वरीय फोर्समधील शिपाई आहे. एकदा का त्यानं चांगलं वागण्याचा निश्चय केला व कुरआनला कवटाळले की त्याचा मार्ग आपोआप सुखर होईल. ईश्वरीय मदत वेगाने त्याच्याकडे आकर्षित होईल व अम्र बिल मआरूफ व नही अनिल मुनकर या मिशनचा मार्ग सुकर होईल आणि मुस्लिम उम्माह गतवैभवाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही. 

सदाचाराने वागा असा सल्ला, मॉबलिंचिंग करू नका असा सल्ला देण्याइतपतसोपा आहे पण त्याची अमलबजावणी करण्याच्या मार्गात इतक्या अडचणी आहेत. इतक्या की ईश्वरी मदतीशिवाय सदाचारी समाजाची स्थापना होणे शक्य नाही. उदाहरणार्थ 10 बाय 10 च्या खोलीमध्ये अंगार फुलवून त्यात मधोमध एका परातीमध्ये बर्फ ठेवण्यासारखे आहे. बर्फ हा सदाचार असून अंगार हा दुराचार आहे. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेले आहेत. ईश्वरीय मदतीशिवाय बर्फ हा मोठ्या प्रमाणात खोलीत पसरलेल्या विस्तवाला थंड करू शकणार नाही. तसेच प्रचंड संख्येत पसरलेल्या दुराचाऱ्यांच्यामध्ये परातभर मुस्लिमांनी एकदा का सदाचाराचा निश्चय केला तर ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर मुठभर मुसलमानांची मोठ्या लष्कराच्या तुलनेत कशी मदत करतो याचे दाखले जंगे बदर पासून ते अफगानिस्तानच्या ताज्या परिस्थितीपर्यंत विखुरलेले आहेत. प्रश्न फक्त विश्वासाचा आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’मुस्लिम समाजाला कुरआन समजून इस्लामी जीवनशैली प्रमाणे जीवन जगण्याचा व इस्लामचा संदेश इतर लोकांना देण्याची समज व शक्ती देओ’’ (आमीन) 

- एम.आय. शेख



माझ्या प्रिय बंधुनो! आपण कदाचित असे समजू नये की मी मुस्लिमांना अनेकेश्वरवादी (काफिर) ठरवू इच्छितो. असे नव्हे. माझा हा हेतु कदापि नाही. मी स्वत:देखील विचार करतो आणि असे इच्छितो की आमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने स्वत: विचार करावा की शेवटी असे काय घडले आहे की आम्ही अल्लाहच्या कृपेपासून वंचित राहिलो आहोत? आमच्यावर चोहीकडून संकटे का येत आहेत? ज्यांना आम्ही अनेकेश्वरवादी अर्थात अल्लाहची अवज्ञा करणारे दास म्हणतो त्यांचे सर्वत्र आमच्यावर प्रभुत्व आहे. याचे कारण काय?आणि आम्ही जे अल्लाहचे आज्ञाधारक (मुस्लिम) असल्याचा दावा करतो ते सर्वत्र प्रभावहीन होण्याचे कारण काय? याच्या कारणासंबंधी जितका जास्त मी विचार केला तितका मला विश्वास होत गेला की आमच्यात व अनेकेश्वरवादीमध्ये केवळ नावाचा फरक उरला आहे. नाहीतर आम्हीसुद्धा अल्लाहकडून बेपर्वा व त्याच्यापासून निर्भय आणि त्याची अवज्ञा करण्यात त्यांच्यापेक्षा काही पाठीमागे नाही. आमच्यात व त्यांच्यात थोडा फरक अवश्य आहे. परंतु यामुळे आम्ही कोणत्याही चांगल्या मोबदल्यास पात्र ठरत नाही तर उलट शिक्षेस पात्र ठरतो. कारण आम्हास माहीत आहे की पवित्र कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे आणि असे असूनदेखील त्याला आम्ही अशी वागणूक देतो जसा एक अनेकेश्वरवादी (इन्कार करणारा) देतो. आम्हाला माहीत आहे की प्रेषित मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत. असे असूनदेखील आम्ही त्यांच्या अनुयायित्वापासून असे पलायन करतो जसा एखादा अनेकेश्वरवादी करतो. आम्हाला याची जाणीव आहे की खोटारड्याला अल्लाहने धिक्कारले आहे, लाच खाणाऱ्याला व देणाऱ्याला नरकवास निश्चित ठरविले आहे. व्याज खाणाऱ्याला व देणाऱ्याला घोरतम अपराधी ठरविले आहे. निंदा करण्यास आपल्या स्वत:च्या बावाचे मांस भक्षण करण्यासारखे पाप ठरविले आहे. अश्लीलता, निर्लज्जपणा व व्यभिचाराच्या कृत्यावर भयंकर प्रकोपाची धमकी दिलेली आहे. परंतु या सर्व गोष्टी माहीत असूनदेखील आम्ही ही सर्व कृत्ये स्वैरपणे करतो, जणू आम्हाला अल्लाहचे अजिबात भय नाही. हेच कारण आहे की आम्ही अनेकेश्वरवाद्यांच्या तुलनेत थोडेफार मुस्लिम म्हणून आहोत असे दिसते. त्याबद्दल आम्हाला बक्षीस मिळत नाही तर उलट शिक्षा दिली जाते. अनेकेश्वरवाद्यांचे आमच्यावर अधिपत्य असणे व सर्वत्र पराभव पत्करणे याच अपराधाची शिक्षा आहे की आम्हाला इस्लामची देणगी दिली गेली होती आणि असे असूनदेखील आम्ही त्याची कदर केली नाही.

प्रियजनहो, आजच्या प्रवचनात जे काही मी सांगितले आहे ते या उद्देशाने नव्हे की मी तुमची निंदा करावी. निंदा करण्याचा माझा हेतु नाही. माझा उद्देश असा आहे की जे काही आम्ही हरविले आहे ते परत प्राप्त करण्याची आम्ही चिंता करावी. हरविलेली  वस्तु परत मिळविण्याची चिंता माणसाला त्याच वेळी होते जेव्हा त्याला माहीत असते की कोणती वस्तु त्याने हरविली आहे आणि ती किती मौल्यवान होती. म्हणूनच मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हीसुद्धीवर आला आणि जर तुम्हाला कळले की खरोखर बहुमूल्य वस्तु तुमच्याजवळ होती तर तुम्ही ती परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.



माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे.

ते सर्व अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकणे व आज्ञापालनासाठी प्रतिज्ञा करीत असत तेव्हा ते म्हणत, ‘‘असेसुद्धा सांगा की जितके काही माझ्याकडून शक्य आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

हदीसकथन करणाऱ्यांचे वर्णन आहे की जेव्हा आम्ही यावर प्रतिज्ञा घेत असू की आम्ही आदेशपालन करू आणि त्यास स्वीकारू आणि त्यानुसार अनुसरण करू. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) असे सांगत असत, ‘‘तुमच्या प्रतिज्ञेत या शब्दांची भर टाका की आम्ही आज्ञापालन आमच्या सामथ्र्यानिशी करू.’’ ही खरे तर पैगंबरांची करुणा होती. त्यांची अपेक्षा होती की एखादे कार्य त्या व्यक्तीच्या सामथ्र्यापलीकडचे असेल तर तो मनुष्य त्या कार्यासाठी अल्लाहकडे अपराधी ठरू नये.



जो मैं ये साफ-साफ कह दूं 

जो है फर्क तुझ में मुझ में 

तेरा दर्द-दर्द-ए-तनहा,

मेरा ग़म गम-ए-ज़माना

अनेकांना हे सत्य माहित नसेल की  जगामध्ये इस्लाम स्विकारणारी पहिली व्यक्ती महिला होती. पहिली व्यक्ती जिची संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी उपयोगी ठरली ती महिला होती. एवढेच नव्हे तर इस्लामच्या नावावर लिंच झालेली पहिली शहीद व्यक्तीसुद्धा महिला होती. प्रेषित सल्ल. हे जेव्हा गारे हिरा मधून जिब्राईल अलै. यांची भेट घेऊन घाबरलेल्या अवस्थेत घरी आले तेव्हा त्यांना दिलासा देणारी पहिली व्यक्तीही  महिला होती. एवढेच नव्हे तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. सारख्या रागीट, कनखर आणि कट्टर मूर्तीपूजकाला इस्लाममध्ये येण्याची दावत देणारी पहिली व्यक्तीसुद्धा महिलाच होती. सर्व प्रथम ईस्लाम स्विकारणाऱ्या व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना दिलासा देणाऱ्या आणि आपली  संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी दान करणाऱ्या महिलेचे नाव हजरत खतिजतुल कुब्रा रजि. आहे. तर पहिल्या शहीद महिलेचे नाव हजरत सुमैय्या रजि. होत्या. हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना इस्लामची दावत देणाऱ्या महिलेचे नाव फातेमा बिन खत्ताब रजि. असे होते.

इस्लामच्या सुरूवातीच्या काळात महिलांनी इतरांपर्यंत सत्याचा संदेश पोहोचविण्यामध्ये जी चमकदार कामगिरी केली त्याचा विसर आजच्या मुस्लिम महिलांना कसा पडला याचेच आश्चर्य वाटते. आज महिला या फक्त गृहिणी म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यातच समाधान मानतात. वास्तविक पाहता शारीरिक रचना व त्या अनुकूल करावयाची  कामांची जबाबदारी वगळता इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांदरम्यान कोणताच भेद नाही. बाकी जबाबदाऱ्या सारख्याच आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची जबाबदारी इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची आहे. ही जबाबदारी दोघांचीही आहे. पुरूषांना तर या जबाबदारीचा काही प्रमाणात तर अंदाज आहे मात्र महिलांमध्ये या जबाबदारी संबंधी मोठी गफलत दिसून येते. याच गफलतीतून बाहेर काढण्यासाठी आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या आठवड्यात चर्चेसाठी हा विषय निवडला आहे.

इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांचे अनेक कर्तव्य समान आहेत. उदा. शिक्षण घेणे दोघांचेही कर्तव्य आहे. या संदर्भात प्रेषित सल्ल. यांनी  फर्माविले आहे की, ’’शिक्षण घेणे हे प्रत्येक स्त्री पुरूषांना अनिवार्य आहे.’’ महिलांना गृहिणीची भूमिका बजावतांना मल्टी टास्कींग (एकाच वेळी अनेक कामं) करावी लागते. त्यांना जर का इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्यावर असलेल्या पैगंबरीय जबाबदारीची व्यवस्थित जाणीव करून दिली तर मला सूर्य तेजस्वी असण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास महिला ह्या आपली ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक चांगल्यापणे पार पाडतील यावर आहे. कारण जमाअते इस्लामी  हिंद महाराष्ट्राच्या महिला विभागाने, जो की या जाणीवेने ओतप्रोत भरलेला आहे, नेहमी इस्लामचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. अलिकडेच म्हणजे 22 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान राबविण्यात आलेल्या ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभर ज्या उत्साहाने त्यांनी काम केले ते पुरूषांपेक्षा कमी तर नव्हतेच उलट त्यांच्यापेक्षा काकणभर उजवेच होते. हा त्यांच्या मल्टि-टास्कींग अ‍ॅबिलिटीचा करिश्मा होता. सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे ही जबाबदारी स्त्रियांवर साक्षात परमेश्वराने टाकलेली आहे, याचे पुरावे खालीलप्रमाणे.

 पैगंबरीय जबाबदारी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की - 

1. ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’  (सुरे आलेइमरान :110)

2. ’’सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा एक गट तुमच्यात अवश्य असला पाहिजे, अशा लोकांना साफल्य लाभेल.’’  (सुरे आलेइमरान :104). 

वरील दोन्ही आयातींमध्ये असे कुठेच म्हटलेले नाही की, सदाचाराचा आदेश देण्याची जबाबदारी फक्त पुरूषांची आहे. याचाच अर्थ ही जबाबदारी महिलांची सुद्धा आहे. कारण जनसमुदाय आणि गट या दोन्ही शब्दात स्त्री आणि पुरूष दोहोंचाही समावेश होतो. 

3. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ ऐ मुहम्मद सल्ल. ! ची लाडकी लेक फातेमा रजि. आणि मुहम्मदची लाडकी आत्या सफिया रजि. तुम्ही दोघी नरकापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्याशी तुमचे असलेले नाते त्या ठिकाणी तुमच्या कामी येणार नाहीत.’’ (संदर्भ : औरत और इस्लामी इन््नलाब, लेखक सय्यद असद गिलानी, पान क्र. 13).

4. याशिवाय, प्रेषित सल्ल. यांनी आपल्या शेवटच्या हज यात्रेच्या अंतिम पाडावामध्ये अराफतच्या मैदानात एका टेकडीवर उभे राहून जवळ-जवळ सव्वा लाख मुस्लिमांसमोर बोलताना हा आदेश दिला होता की, ’’तुम्ही सर्व लोक जे या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलेला इस्लामचा हा संदेश, जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्यापर्यंत

ठीक त्याच शब्दांत पोहोचवा ज्या शब्दात मी तुमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे.’’

प्रेषितांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की, इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य सर्वांचेच आहे. त्यात स्त्री-पुरूष असा भेद नाही. सर्वसाधारण मुस्लिम स्त्रियांमध्ये या कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याची मोठी जबाबदारी तहेरीके इस्लामी महाराष्ट्राच्या महिला विभागावर आहे. 

5. ’’म्हणून तुम्ही उपदेश करा, जर उपदेश लाभदायक असेल.’’ (सुरे अलआला:9).

माणसाची मनस्थिती सारखी बदलत असते, अशावेळेस कोणती घटिका असेल ज्यात तो उपदेश स्विकारेल हे सांगता येण्यासारखे नाही म्हणून सातत्याने सत्याचा संदेश देत राहणे हे स्त्री-पुरूष दोघांचेही आद्य कर्तव्य आहे, हे तहेरीके इस्लामीच्या भगिनींनी लक्षात ठेवायला हवे. मुळात हे काम कठीण आणि व्यापक आहे म्हणून हे एकट्याने करता येत नाही. त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज  आहे आणि त्यासाठी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग हे अत्यंत उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

महिलांना या कामात येणाऱ्या अडचणी

या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यावर हे काम करण्यासाठी ज्या महिला आणि तरूणी पुढे येतील त्यांच्या मार्गात खालीलप्रमाणे अडचणी येण्याची शक्यता आहे. 

1. पुरूषी मानसिकता :- महिलांना या कामी सर्वात मोठी अडचण त्यांच्याच घरातील पुरूषांकडून निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मुस्लिम पुरूष हे महिलांसंबंधी मोठे पझेसिव्ह (वर्चस्ववादी) असतात. घरातील महिलांना या कामी बाहेर जाण्याची परवानगी देतांना त्यांच्या मनात अनेक शंका, कुशंका जन्म घेतात. म्हणून ते त्यांना बाहेर जाऊ देण्यासाठी उत्सुक नसतात. म्हणून महिलांना त्यांना या कामाचे महत्त्व पटवून देऊन हे काम करण्याची परवानगी मिळविताना त्यांचे कसब पणाला लावावे लागेल, ईश्वराकडे दुआ मागावी लागेल. मला विश्वास आहे की ज्या प्रमाणे महिला विभागाच्या महिला अतिशय सुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य बजावत आहेत याचे उदाहरण महिलांनी आपल्या घरातील पुरूषांसमोर ठेवल्यास ईश्वराच्या कृपेने ते या कामासाठी त्यांना परवानगी देतील. 

2. महिलांची गफलत :- दूसरी सर्वात मोठी अडचण स्वतः महिलांची मानसिकता आहे. दावते इस्लामीचे काम हे महिलांचेही आहे याचा मागमूससुद्धा बहुतांश महिलांना नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे मोठे कठीण आव्हान तहेरीके इस्लामीच्या महिलांसमोर आहे. रात्रंदिवस  प्रयत्न करून त्यांना हे आव्हानात्मक काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी सुरूवात आपल्या घरातील महिलांपासून करावी लागेल. त्यानंतर शेजारी-पाजारी आणि इतर नातेवाईक महिलांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडावे लागेल. 

3. शेजाऱ्यांचे टोमणे :- भारतीय मुस्लिम समाज हा अनेक गटांमध्ये विभागला गेलेला असून, जमाअते इस्लामी हिंद सोडल्यास इतर कोणत्याही गटाकडे सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची सुसंघटित योजना तसेच यंत्रणा नाही. (अपवाद खेरीज करून) म्हणून महिला जेव्हा या कामासाठी बाहेर पडतील तेव्हा शेजारी-पाजारी महिला त्यांचा संदेश एक तर ऐकण्याच्या मनस्थितीत  नसतील दूसरे त्यांच्या उत्साहावर पाणी  टाकण्याचे काम मात्र व्यवस्थित करतील. या स्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन तहेरीकी (चळवळीतील)महिलांना आपले काम सुरूच

ठेवावे लागेल. त्यासाठी त्यांना प्रेषित सल्ल. व महिला साहबियात रजि. यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी लागेल. त्यांना अगोदर प्रेषित सल्ल. आणि सहाबियात रजि. यांचे चरित्र आवर्जुन वाचावे लागेल.

या कार्यामुळे होणारे दिव्य फायदे हे कठीण काम केल्याने होणाऱ्या फायद्यांचे वर्गीकरण दोन गटात करता येईल. पहिल्या गटात आपल्या स्वतःच्या घरात आणि ज्या मुस्लिम महिलांनी हे काम करण्याची जबाबदारी स्वेच्छेने उचललेली आहे त्यांच्या घरात असलेल्या गैरइस्लामी परंपरा, वाडवडिलांपासून चालत आलेल्या  वाईट चालीरिती बंद पडतील. निकाह सोपा होईल कारण निकाहला्निलष्ट बनविण्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिलांची भूमिका असते हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. याशिवाय, घराचे वातावरण शुद्ध इस्लामी झाल्यामुळे घरातील मुली आणि मुलं हे पुढे चालून चांगले नागरिक बनतील. मुलं रेपिस्ट बनणार नाहीत आणि मुली आई-वडिलांच्या तोंडाला काळे फासले जाईल, अशी कृत्ये करणार नाहीत. आज मुस्लिम समाजामध्ये अशी कोणती वाईट गोष्ट नाही जी इतर समाजामध्ये आहे. अगदी व्याज खाण्यापासून ते पॉर्नमध्ये काम करण्यापर्यंत मुस्लिमांचा सहभाग  नाकारण्यासारखा नाही. सत्याचा संदेश दूसऱ्यांना देतांना त्याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, संदेश देणाऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. अनेक मुस्लिम तरूण, तरूणी मोठ्या संख्येने लग्नापूर्वी प्रेमसंबंध ठवेून आहेत जे की, इस्लाममध्ये हराम आहेत, ते कमी होतील. घरेलू हिंसा कमी होईल, आंतरधर्मीय विवाह कमी होतील.  कारण या संबंधामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सत्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास या समस्या आपोआप समाप्त होतील. या चळवळीचा सर्वात मोठा लाभ हा होईल की, इस्लाम हा केवळ ईबादतींपुरता मर्यादित धर्म आहे हा गैरसमज दूर होवून ती एक जीवन जगण्याची एकमेव यशस्वी पद्धत आहे हे महिलांच्या लक्षात येईल. आणि एकदा का मोठ्या प्रमाणात महिलांच्या लक्षात हे सत्य आले की, मुस्लिम समाजामध्ये एक रक्तविरहित अशी सामाजिक क्रांती निर्माण होईल की ज्यामुळे समाज सदाचारी होवून जाईल. त्यातून देशाला प्रामाणिक नागरिक मिळतील आणि कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी देशाला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य करण्याची संधी मुस्लिम महिलांकडे चालून आलेली आहे. दूसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळे ज्यांना इस्लामची समज मिळेल ते त्यांच्या पारलौकीक जीवनामध्ये एक मोठी उपलब्धी ठरेल. म्हणून ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐे अल्लाह! आमच्या भगिनींना सत्याचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्याची सद्बुद्धी व शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेख



बंधुनो! तुम्ही स्वत:ला मुस्लिम म्हणून संबोधता आणि तुमचा विश्वास आहे की अल्लाहची मुस्लिमावर कृपा असते. परंतु जरा डोळे उघडून पाहा की काय खरोखर अल्लाहची कृपा तुमच्यावर अवतरित होत आहे? पारलौकिक जीवनात जे काही घडेल ते तुम्ही नंतर पहालच, परंतु या जगात तुमची जी स्थिती आहे त्यावर दृष्टी टाका. या हिंदुस्थानात (लक्षात असावे की ही प्रवचने त्या काळात लिहिली गेली होती जेव्हा हिंदुस्तानची फाळणी झाली नव्हती.) तुमची संख्या नऊ कोटी आहे. तुमची इतकी मोठी संख्या आहे की जर एका एका व्यक्तीने एक एक खडा टाकला तर पर्वत बनेल, परंतु जेथे इतके मुस्लिम आहेत तेथे अनेकेश्वरवादी राज्य करीत आहेत. तुमच्या माना त्यांच्या मुठीत आहेत की तुम्हाला त्यांनी हवे तिकडे वळवावे. तुमचे मस्तक जे अल्लाहशिवाय कोणासमोर नमत नसे ते आता मनुष्यासमोर नमत आहे. तुमची ती प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली जात आहे. तुमचा हात जो सदैव उंच राहत असे आता तो खाली असतो आणि तो अनेकेश्वरवाद्यांसमोर पसरला जातो. अज्ञान, गरीबी व कर्जबाजारीने तुम्हाला सर्वत्र अपमानित व लज्जित करून सोडले आहे. काय हीच अल्लाहची कृपा आहे? ही कृपा नव्हे तर हा उघड प्रकोप आहे. हे किती आश्चर्य आहे की मुस्लिमावर अल्लाहचा प्रकोप व्हावा! मुस्लिम आणि तो अपमानित व्हावा! मुस्लिम आणि तो गुलाम असावा! हे तर अशक्य कोटीचे आहे की एखादी वस्तु पांढरी शुभ्र आहे व काळीकुट्टही आहे. मुस्लिम अल्लाहला प्रिय असतो, मग अल्लाहचा प्रिय जगात तो कसा अपमानित व तुच्छ असू शकेल? काय तुमचा अल्लाह अत्याचारी आहे की तुम्ही तर त्याचा अधिकार ओळखावा, त्याच्या आज्ञेचे पालन करावे आणि त्याने अवज्ञा करणाऱ्यांना तुमच्यावर शासक बनवावे? आणि तुम्हाला मात्र आज्ञाधारकतेचा मोबदला म्हणून शिक्षा द्यावी? तुमचा विश्वास आहे की अल्लाह जुलूम करणारा नाही आणि तुमची खात्री आहे की अल्लाहच्या आज्ञापालनाचा मोबदला अपमान म्हणून मिळू शकत नाही. तर तुम्हाला हे स्वीकार करावे लागेल की मुस्लिम असण्याचा जो तुम्ही दावा करता त्यातच काहीतरी चूक आहे. सरकारी कागदपत्रात तर तुमच्या नावाची नोंद मुस्लिम म्हणून अवश्य केली जाते. परंतु अल्लाहच्या न्यायालयात इंग्रज सरकारच्या दफ्तराच्या सनदीवर निर्णय केला जात नाही. अल्लाह आपला वेगळाच दफ्तर ठेवतो. त्यात शोधा की तुमचे नाव आज्ञाधारकाच्या यादीत नोंदले आहे की अवज्ञाकारींच्या यादीत?

अल्लाहने तुमच्याकडे ग्रंथ पाठविला आहे जेणेकरून तुम्ही हा ग्रंथ वाचून आपल्या स्वामीस ओळखावे आणि त्याच्या आज्ञापालनाची पद्धत समजून घ्यावी. काय तुम्ही कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की या ग्रंथात काय लिहिले आहे? अल्लाहने आपल्या प्रेषितांना तुमच्याकडे पाठविले जेणेकरून त्यांनी तुम्हाला आज्ञाधारक (मुस्लिम) बनण्याची पद्धत शिकवावी. काय तुम्ही कधी हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्या प्रेषितांनी काय शिकविले आहे? अल्लाहने तुम्हाला या जगात व पारलौकिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त करण्याची एक आदर्श जीवनपद्धत दाखविली. काय तुम्ही त्यावर चालता? ज्यांच्यामुळे मनुष्य या जगात व पारलौकिक जीवनात लज्जित होतो. काय तुम्ही अशा कामापासून अलिप्त राहता? सांगा, तुमच्यापाशी याचे काय उत्तर आहे? जर तुम्ही हे मान्य करता की तुम्ही अल्लाहचा ग्रंथ आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या जीवनापासून कोणतेही ज्ञान प्राप्त केले नाही आणि त्यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुसरणसुद्धा केले नाही, तर तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) तरी कुठे झाला की तुम्हाला याचा चांगला मोबदला मिळेल? ज्या प्रकारचे तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) आहात त्याच प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळत आहे आणि त्याच प्रकारचा मोबदला तुम्ही पारलौकिक जीवनात प्राप्त कराल.

यापूर्वी मी सांगितले आहे की मुस्लिम व अनेकश्वरवाद्यामध्ये केवळज्ञान व कर्माशिवाय अन्य कोणताही फरक नाही. एखाद्या माणसाचे ज्ञान व कर्म अनेकेश्वरवादीप्रमाणेच असेल आणि स्वत:ला तो मुस्लिम म्हणवितो तर तो साफ खोटे बोलत आहे. अनेकेश्वरवादी पवित्र कुरआनचे पठण करीत नाही आणि त्याला माहीत नसते की यात काय लिहिले आहे. हीच स्थिती जर मुस्लिमाचीसुद्धा असेल तर त्याला काय म्हणून मुस्लिम म्हणावे? अनेकेश्वरवादीला जाणीव नसते की प्रेषित (मुहम्मद स.) यांची काय शिकवण आहे आणि त्यांनी ईश्वरापर्यंत पोहचण्याचा कोणता सरळ मार्ग दाखविला आहे. मुस्लिमसुद्धा त्याच्याप्रमाणे अज्ञानी असेल तर तो कसा मुस्लिम असू शकतो? अनेकेश्वरवादी ईश्वराच्या मर्जीप्रमाणे चालण्याऐवजी स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालतो. मुस्लिमसुद्धा त्याच्या व आपल्या मताप्रमाणेच चालणारा असेल, त्याच्याप्रमाणेच अल्लाहकडून बेपर्वा व आपल्या इच्छेचा गुलाम असेल तर त्याला स्वत:ला मुस्लिम (अल्लाहचा आज्ञाधारक) म्हणण्याचा काय अधिकार आहे? अनेकेश्वरवादी हलाल (धर्मसंमत) व हराम (धर्मनिषिद्ध) मध्ये फरक करीत नाही आणि ज्या कामात स्वत:ला फायदा व गोडी वाटेल त्याचा अवलंब करतो, मग अल्लाहच्या दृष्टीने ते हलाल असो की हराम. आणि असाच व्यवहार मुस्लिमाचासुद्धा असेल तर त्याच्यात व अनेकेश्वरवाद्यामध्ये फरक तो कोणता? याचा अर्थ असा की मुस्लिमसुद्धा इस्लामच्या ज्ञानापासून तितकाच कोरा असेल जितका की अनेकेश्वरवादी असतो, आणि मुस्लिमसुद्धा ते सर्वकाही करतो जे अनेकेश्वववादी करतो तर त्याला अनेकेश्वरवाद्याच्या तुलनेत श्रेष्ठत्व का प्राप्त व्हावे? अंतिमदिनी त्याचा निवाडा अनेकेश्वरवाद्याप्रमाणेच का केला जाऊ नये? ही गोष्ट अशी आहे की जिचा विचार शांत मनाने आम्ही सर्वांनी केला पाहिजे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget